Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

मेळघाटात पाण्याची भीषण टंचाई; १२९ गावांना टँकरने मिळत आहे पाणी!

ANIRUDHA DAWALE
Jun 27, 2025 04:02:16
Amravati, Maharashtra
Feed slug:- AMT_MELGHAT_WATER तीन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 भर पावसाळ्यात मेळघाटात १२९ गावांत भीषण पाणीटंचाई; दहा गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू अँकर :- पावसाळा सुरू असून अमरावती जिल्ह्यातील मेळघाटासह गैर आदिवासी भागातील १० हजारांवर नागरिकांना २० टँकर व १२७ विहिरी आणि बोअरवेल अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करून १२९ गावांची तहान भागविली जात आहे. पावसाळा सुरू झाला असून अद्याप जोरदार पावसाने हजेरी लावली नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्याची स्थिती बिकट झाली आहे. चिखलदऱ्यातील १० गावांत टँकरने पाणी पुरवठा सुरू असून मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आकी, खडीमल, मोथा, लवादा, शहापूर, तारुबांदा, गौलखेडा बाजार, मेहरीअम, बहादरपूर, धरमडोह, गवळीढाणा, आलाडोह, खिरपाणी आदी १० गावांत २० टँकरने नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement