Back
यवतमाळच्या मडकोना ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापनात साधला आर्थिक उन्नतीचा मंत्र!
Yavatmal, Maharashtra
AVB
Anchor : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत, यवतमाळच्या मडकोना ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापनावर विशेष लक्ष देऊन, ग्रामस्वच्छता साधण्यासोबतच आर्थिक उन्नती देखील साधली आहे. घनकचरा व्यवस्थापनामुळे गावातील कचरा कमी करणे, पुनर्वापर करणे, कंपोस्ट खत बनवणे आणि कचरा प्रक्रिया आणि व्यवस्थापनाचा उद्देश साधण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामपंचायत ने प्रत्येक कुटुंबाला कचराकुंडी वितरित केली, त्यातून ओला आणि सुखा कचऱ्याचे विलगीकरण करण्यात येऊन कंपोस्ट खत तयार करण्यात आले या खताच्या विक्रीतून ग्रामपंचायतला आर्थिक उत्पन्न देखील मिळाले.
बाईट : नरहरी हरगुडे सरपंच
सुधीर क्षीरसागर ग्रामपंचायत अधिकारी
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2706ZT_JALNA_DELIEVERY(15 FILES)
जालना | ब्रेकिंग | प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्या पोटाला प्रसूतीपूर्वी डॉपलर टेस्ट करताना करताना नर्सने जेली ऐवजी अँसिड लावल्याचा रुग्ण महिलेच्या नातेवाईकांचा आरोप
महिलेने दिला बाळाला जन्म,पण महिलेच्या पोटासह गुप्तांगाला गंभीर दुखापत
या प्रकारानंतर नर्स दोन तास फरार झाल्याचाही नातेवाईकांचा आरोप
महिलेवर उपचार सुरु
भोकरदन ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार आला समोर
अँसिड नव्हे तर फिनाईल सदृश्य पदार्थ लावला गेल्याची शक्यता, घटनेचा अहवाल बोलावला: जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती
दोषींवर कारवाई करा,महिला रुग्णाच्या नातेवाईकांची मागणी
अँकर : जालन्यातील भोकरदन ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेची प्रसूतीपूर्वी डॉपलर टेस्ट करताना महिलेच्या पोटाला नर्सने अँसिड लावल्याचा आरोप या महिलेसह तिच्या नातेवाईकांनी केलाय. प्रसूतीपूर्वी बाळाच्या हृदयाच्या ठोके ऐकण्यासाठी ही डॉपलर टेस्ट केली जाते.या रुग्ण महिलेच्या पोटाला अज्ञात पदार्थ लावण्यात आल्यानं या महिलेच्या पोटासह गुप्तांगाला गंभीर ईजा झालीय.या प्रकारानंतर नर्स गायब झाल्याचा आरोपही जखमी महिलेच्या नातवाईकांनी केला.दरम्यान या घटनेनंतर महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून बाळ सुखरूप आहे मात्र महिलेला गंभीर ईजा झाल्यानं या महिलेवर भोकरदन ग्रामीण रुग्णालयातच उपचार सुरू आहे.
या प्रकारानंतर या घटनेला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाईची मागणी महिलेच्या नातवाईकांनी केलीय.तर चुकून हा प्रकार घडलाय.डॉपलर टेस्ट करताना अँसिड नव्हे तर फिनाईल सदृश्य पदार्थ वापरला गेला असावा अशी शक्यता जिल्हा शल्य चिकित्सकांनी व्यक्त केलीय.दरम्यान या घटनेचा अहवाल देण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांनी वैद्यकीय अधीक्षकांना दिलेत.
बाईट:शिला भालेराव जखमी,रुग्ण महिला
बाईट: साखराबाई भालेराव ,रुग्ण महिलेची सासू
बाईट :रवी पाखरे,महिलेचा नातेवाईक
बाईट : डॉ.राजेंद्र पाटील,जिल्हा शल्य चिकित्सक,जिल्हा सामान्य रुग्णालय जालना
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2706ZT_CHP_SC_COMM_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील चोरा गावातील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अनुसूचित जाती आयोग उपाध्यक्ष पोचले गावात, मात्र प्रशासकीय अनास्थेने आयोगाने व्यक्त केली नाराजी, तपासात हयगय- माहितीचा अभाव आणि मदत देण्यात कुचराईसाठी जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले.
अँकर:---चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील चोरा गावातील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अनुसूचित जाती आयोग उपाध्यक्ष एड. धर्मपाल मेश्राम या गावात पोचले. त्यांनी कुटुंबियांशी चर्चा करत सत्यस्थिती जाणून घेतली. मात्र प्रकरणाच्या प्रशासकीय अनास्थेबाबत आयोगाने नाराजी व्यक्त केली. तपासात हयगय- माहितीचा अभाव आणि मदत देण्यात कुचराईसाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले. 20 मे रोजी या अल्पवयीन मुलीचा गावातील विहिरीत संशयास्पद मृतदेह आढळला. पोलिसांनी वैद्यकीय अहवालानुसार आत्महत्या असल्याचे स्पष्ट केले. मात्र मृतक मुलीचे आईने आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचेवर ९ जणांनी लैंगिक अत्याचार करून हत्या केली असा आरोप केला. या प्रकरणात पोलिसांनी अक्षम्य निष्काळजीपणा केला. अत्याचार प्रकरणी आरोप अमोल दोडके याला अटक केली. त्याचेवर पास्को सहित अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र उर्वरित आठ आरोपींना मोकळे सोडण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात अजून पर्यंत कोणाचेही बयान नोंदवले नाही. शवविच्छेदन भद्रावतीला करण्याऐवजी चंद्रपूरला करण्यात आले. मृतदेह जमिनीत पुरवण्याऐवजी जाळण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. जिल्हा प्रशासनाला आयोगापुढे संपूर्ण माहितीसह पुढील बैठकीत उपस्थित राहण्याच्या कठोर सूचना याप्रसंगी देण्यात आल्या.
बाईट १) एड. धर्मपाल मेश्राम, उपाध्यक्ष, राज्य अनुसूचित जाती/जमाती आयोग
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
6 FILES
SLUG NAME -SAT_MANJU_AJOBA
सातारा - मराठी मालिकांमध्ये सध्या लोकप्रिय असलेली कॉन्स्टेबल मंजू ही मालिका अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आहे. या मालिकेतील मुख्य पात्र ‘मंजू’चे प्रेम इतके वाढले आहे की एक 84 वर्षीय आजोबा दत्तू कारणे यांनी तिची भेट घेण्यासाठी सोलापूरहून थेट साताऱ्यापर्यंत प्रवास केला.
दत्तू कारणे हे मालिका नियमित पाहतात आणि मंजूचे काम त्यांना विशेष भावते. मंजूच्या काळजीवाहूपणाने आणि लोकांप्रती असलेल्या प्रेमळ वृत्तीमुळे ते खूप प्रभावित झाले. मालिकेतील एका भावनिक सीननंतर त्यांनी ठरवलं – “तिला प्रत्यक्ष भेटलंच पाहिजे! मग काय ते कसे बसे हे आजोबा मंजूचा काळजीपोटी साताऱ्यात पोहचले.साताऱ्यातील एका ठिकाणी पोलिस ठाण्यात या मालिकेचं शूटिंग सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते थेट खऱ्या खुऱ्या पोलिस ठाण्यात पोहचले आणि मंजु ची चौकशी करू लागले.सातारा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना काहीच समजेना .अखेर हे आजोबा मंजु मालिकेतील पोलिस कॉन्स्टेबल ला शोधतायत हे समजले मग या खऱ्या पोलिसांनी या आजोबांना मंजु चे चित्रीकरण सुरू असणाऱ्या सेट वर पोहचवले.मग काय अभिनेत्रीनेही त्यांच्या प्रेमाला मान देत त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.
byte - मंजू (मोनिका राठी)
वीओ 2- ही घटना केवळ मालिकेच्या लोकप्रियतेचंच नव्हे, तर आजच्या काळातही टेलिव्हिजनमधील कथानक प्रेक्षकांच्या मनाला किती भिडू शकतं याचं जिवंत उदाहरण ठरली आहे.
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
27062025
Slug - PPR_LIGHTING_ASHADHI
feed on 2c
file 01
-------
Anchor,- आषाढी वारीच्या सोहळ्यानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे.
आषाढी एकादशीचा सोहळा सहा जुलै रोजी साजरा होणार आहे.सर्व संतांच्या पालख्यांनी पंढरपूर कडे प्रस्थान ठेवले आहे.रोज हजारो भाविक पंढरपूरमध्ये येऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेत असतात. त्यामुळे आषाढी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे शिखर तसेच संपूर्ण मंदिरावर सुंदर अशी विद्युत रोषणाई केली आहे.तसेच संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप संत तुकाराम महाराज भवन या ठिकाणी सुद्धा सुंदर अशी विद्युत रोषणाई केली आहे. मंदिर परिसरात आलेले भाविक आवर्जून ही विद्युत रोषणाई पाहण्यासाठी थांबत असतात.
0
Share
Report
Pune, Maharashtra:
रिपोर्टर - लैलेश बारगजे
स्लग:- वामानभाऊ दिंडी
फीड 2C
अँकर:- बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गढ येथील संत वामनभाऊ महाराज यांची दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे आज तिसऱ्या दिवशी अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील जमादवाडी येथे दिंडीचं पहिलं गोल रिंगण पार पडलं.. 125 वर्षांपासून सुरू असलेली गहीनाथ गढच्या दिंडीची परंपरा अतिशय जुनी असून यावर्षी तीस ते पस्तीस हजार वारकरी दिंडी मध्ये सहभागी झाले आहेत. महंत विठ्ठल महाराज यांच्या नेतृत्वात या दिंडीने मागच्या काही वर्षांपासून भव्य दिव्य स्वरूप प्राप्त केलं आहे. जमादवाडी येथे पहिलं रिंगण सोहळा होत असल्याने या ठिकाणी वारकऱ्यांसोबतच जामखेड, आष्टी आणि पाटोदा तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने हा सोहळा पाहण्यासाठी येतात. या सोहळ्याचे ड्रोन च्या माध्यमातून घेतलेले हे व्यंगमदृश्य...
ड्रोन सौजन्य- शरद गर्जे
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2706ZT_CHP_BJP_PRAWESH
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपुरात कॉंग्रेसच्या माजी महिला जिल्हा अध्यक्षा नंदा अल्लुरवार यांचा भाजपमध्ये प्रवेश, आ. जोरगेवार आणि आ. भांगडीया यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश
अँकर:-- कॉंग्रेसच्या माजी महिला जिल्हा अध्यक्षा नंदा अल्लुरवार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार किर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या उपस्थितीत नंदा अल्लुरवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नंदा अल्लुरवार माजी मंत्री स्व. वामनराव गड्डमवार यांची कन्या असून त्यांच्या घराण्याचा जिल्ह्यातील राजकारणात ठसा आहे. त्या तीस वर्षांहून अधिक काळ चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक राहिल्या असून सहकार , महिला विकासात आणि सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे. शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कार्यरत असताना त्यांनी संघटना मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. भाजपात राहून लोकांसाठी अधिक चांगले योगदान देता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बाईट १) नंदा अल्लूरवार, भाजप नेत्या
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Oros, Maharashtra:
अँकर ---- २६ ते २८ जून पर्यंत समुद्रात ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असून साडेचार ते पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याने किनारपट्टी भागातील नागरिकांना हवामान खात्याने सावधानतेचा इशारा दिला आहे. समुद्र खवळलेला असल्याने समुद्राच्या लाटा जोराने उंच उंच उसळत असून कुणकेश्वर मंदिर नजीकच्या संरक्षण भिंतीचे सिमेंट कोसळत असल्याने संरक्षक भिंतीला धोका निर्माण झालाय. तर दुसरीकडे उधानामुळे मळई खाडीच्या पाणीपात्रात वाढ झाल्याने खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात पाणी उसळत आहे याचा या मार्गाने जाणाऱ्या वाहनांना अडथळा ठरत आहे.
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
27062025
Slug - PPR_AMBULANCE_DRIVER
feed on 2c
file 01
----
Anchor - आषाढी वारीच्या तोंडावर पंढरपुरातील शासनाच्या 108 रुग्णवाहिकेच्या चालक आणि डॉक्टरांनी काम बंद करून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. समान वेतन समान काम या तत्त्वावर 108 रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांना सेवा सुविधा पुरविण्यात याव्या. जुन्या जीर्ण गाड्यांऐवजी नव्या रुग्णवाहिका द्याव्यात. अशा अनेक मागण्यासाठी रुग्णवाहिकेचे डॉक्टर आणि कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. आषाढी मध्ये पंधरा लाख भाविक येतात. अशा परिस्थितीत येणाऱ्या भाविकांमध्ये आपात्कालीन व्यवस्थेसाठी रुग्णवाहिकेची गरज असते. मात्र आता 108 रुग्णवाहिका चे डॉक्टर आणि चालक संपावर गेले तर प्रशासनाची मोठी डोकेदुखी वाढणार आहे.
0
Share
Report
Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग ब्रेकींग
वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली जवळील कावळेसाद पॉईंटवर कोल्हापूर येथील युवक खोल दरीत कोसळला.
रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी गेला असता पाय घसरून पडल्याचा अंदाज.
सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल
सोबत असलेल्या युवकांची पोलिसांकडून चौकशी.
घटनास्थळी दाट धुके तसेच मोबाईल रेंज नसल्यामुळे मदतकार्य अडचणी.
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2706_BHA_RAIN
FILE - 3 VIDEO
भंडाऱ्यात पावसाची हजेरी....शेतीकामाला वेग आल असून शेतीसाठी पाऊस ठरणार पूरक
Anchor ;- आज सकाळपासूनच भंडारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीकामांना वेग आले आहे तर हा पाऊस शेतीला पूरक ठरणारा आहे या आजच्या जोरदार पावसामुळे शेतकरी सुखावला असून वातावरणात गारवा निर्माण झाल्यावर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
0
Share
Report