भीमाशंकर के कायापालट के लिए 172 करोड़ की नई आदर्श ग्राम योजना मंजूर
Shirur, Maharashtra:पवित्र ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानच्या कायापालटासाठी मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत भीमाशंकरच्या विकासासाठी तब्बल १७२ कोटी २२ लाख रुपयांच्या 'आदर्श ग्राम विकास आराखड्याला' मंजुरी देण्यात आली आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी सोडवणं, पर्यावरणपूरक EV शटल बस सुरू करणं आणि भाविकांना अत्याधुनिक सोयी-सुविधा देण्याचा निर्णय यात घेण्यात आलाय. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि एकनाथजी शिंदे यांच्यासह अनेक मंत्री प्रमुख अधिकारी उपस्थित होते.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पुणे ग्रामीण क्षेत्र में CNG की कीमत दो रुपये बढ़ी, 96.50 रुपए पहुंचे
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात CNG दोन रूपयांनी महाग झालाय,पुण्याच्या ग्रामीण भागात आता CNG 96.50 रूपयांवर पोहचलाय,CNG च्या दरांचा भडका उडाल्याने सर्वसामान्य वाहन चालकांना याचा मोठा फटका फसणार आहे,गँस भरण्यासाठी आधीच तासंतास रांगेत वाहने घेऊन थांबावे लागत असताना तो हि CNG वेळेवर मिळत नव्हता आता त्यात हि नविन दर वाढ आमच्या खिशाला परवडणारी नसल्याच्या प्रतिक्रिया वाहन चालक देत आहेत.0
0
Report
आंबेगाव के केले पर भीषण गर्मी का कहर, निर्यात-बाजार पर बड़ा असर
Ambegaon, Maharashtra:आखाती देशात सुरू असलेल्या महायुध्दाचा आधीच मोठा फटका जुन्नर आंबेगाव शिरूर च्या केळी उत्पादक शेतकय्रांना बसला असून केळीची निर्यात ठप्प झाल्याने केळी चे बाजारभाव मोठ्या प्रमाणात गडगडल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले असताना आता वाढत्या तापमानामुळे केळी उत्पादक शेतकय्रांची डोकेदुखी वाढलीय, वाढत्या तापमानामुळे केळी वरती दाग चट्टे पडून केळी मोठ्या प्रमाणात खराब झालीय परिणामी वाढत्या उष्णतेमुळे शेतकय्रांच मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय याचाच नुकसान ग्रस्थ शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी0
0
Report
Advertisement
जुन्नर के पश्चिम आदिवासी क्षेत्र में जल संकट पर प्रशासन ने ठोस आदेश दिए
Barav, Maharashtra:*ब्रेकिंग* *पुणे* *जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील भीषण पाणीटंचाईचा प्रश्न आता थेट पुणे जिल्हा परिषदेत पोहोचला* जिल्हा परिषद सदस्या माई लांडे यांनी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन पुणे जिल्हा परिषद सीईओ यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले* जुन्नरच्या आदिवासी भागात शासनाचे पाण्याचे टँकर वेळेत पोहोचत नसल्याचा आरोप करत, जलजीवन मिशनची कामेही अत्यंत बोगस पद्धतीने झाल्याचा गंभीर आरोप माई लांडे यांनी केला. अनेक गावांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने संतप्त झालेल्या माई लांडे थेट हंडा घेऊन जिल्हा परिषदेत दाखल झाल्या. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी परिस्थितीची दखल घेत प्रशासनाला तातडीचे आदेश दिले. जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात टँकर वेळेत पोहोचवावेत, गरज पडल्यास टँकर संख्या वाढवावी तसेच रोजचा अहवाल सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गत ज्या ठिकाणी निकृष्ट किंवा बोगस कामे झाली आहेत, त्या प्रकरणांची चौकशी करून संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. पुढील आठवड्यात पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पश्चिम आदिवासी भागाचा दौरा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यावेळी बोलताना माई लांडे म्हणाल्या, “माझ्या माणसांना पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे। समस्या सुटल्या नाहीत तर जिल्हा परिषद जनरल बॉडीमध्ये अधिक आक्रमक भूमिका घेऊ, आणि गरज पडल्यास आदिवासी महिलांसह उपोषण आंदोलन करू.” पाणीटंचाईच्या प्रश्नावर आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आमनेसामने आल्याने जुन्नर तालुक्यातील परिस्थितीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.0
0
Report
पाबळ में घर में भीषण आग, शेड में मंडप और सामग्री जलकर खाक
Shirur, Maharashtra:शिरूर/पुणे पाबळमध्ये घराला भीषण आग, मंडपाच्या साहित्याचे मोठे नुकसान ANC..शिरूर तालुक्यातील पाबळ येथे राजू झोडगे यांच्या घराला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत शेडमध्ये ठेवलेले मंडपाचे साहित्य जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अचानक घरातून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेडमधील मंडपाचे कापड, सजावटीचे साहित्य, प्लास्टिक साहित्य तसेच इतर वस्तूंना आग लागली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग परिसरात पसरून मोठी दुर्घटना होण्यापासून टळली. मात्र, आगीत मंडप व्यवसायासाठीचे मोठ्या प्रमाणात साहित्य जळून नुकसान झाले आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.0
0
Report
जुन्नर मंडवे गांव में पेयजल संकट, तीन-चार दिन पर एक बार टैंकर पर निर्भर
Shirur, Maharashtra:जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील मांडवे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले असून विहिरींनी तळ गाठला आहे. तर ज्या काही नैसर्गिक पाणी स्रोतांमध्ये थोडेफार पाणी शिल्लक आहे ते पण दूषित असल्याने सुमारे दोन ते अडीज हजार लोकसंख्या असणाऱ्या मांडवे गावाला पिण्याच्या पाण्यासाठी तीन ते चार दिवसातून एकदा येणाऱ्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.0
0
Report
Advertisement
कांदा MSP नहीं मिलने पर सासवड में कांग्रेस का प्रदर्शन, 25 रुपये MSP माँग
Rui, Maharashtra:कांद्याला नसलेल्या भावामुळे काँग्रेसचे सासवडमध्ये निषेध आंदोलन... रस्त्यावरती कांद्याच्या पिशव्या टाकून आंदोलककर्त्यांनी केला निषेध व्यक्त ... नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केलाय ... कांद्याला हमीभाव मिळालाचं पाहिजे,महायुती सरकारचा धिक्कार असो आशा घोषणा यावेळी कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या...0
0
Report
इंदापुर के किसानों ने खडकवासला पानी संकट के खिलाफ पुणे- सोलापुर NH पर रास्ता रोको
Rui, Maharashtra:JAVEDMULANI SLUG 1805ZT_INDAPURROAD FILE 5 कृषिमंत्र्याच्या इंदापूर तालुक्यात खडकवासल्याच्या पाण्यावरून शेतकरी आक्रमक; पुणे–सोलापूर महामार्गावर रास्ता रोको.... हजारो शेतकरी रस्त्यावर पाण्यासाठी उतरले.... Anchor _ कृषिमंत्र्याच्या तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळत असून शेतकरी आक्रमक होऊन पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग पुणे धरला आहे... इंदापूर तालुक्यात खडकवासला उजव्या कालव्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन अद्याप मिळाले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डाळज नंबर दोन चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आहे.... खडकवासला कालव्याचे उन्हाळी हंगामातील दुसरे पाणी आवर्तन इंदापूर तालुक्याला अद्याप मिळालेले नाही. यामुळे आधीच पाण्याअभावी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर आज इंदापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले आणि पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डाळज नंबर दोन चौकात रास्ता रोको आंदोलन छेडले. आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. “शेतकऱ्यांना तात्काळ पाणी द्या”, “उन्हाळी आवर्तन सुरू करा” अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार संताप व्यक्त केला. प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे....0
0
Report
पिंपरी-चिंचवड में भीषण गर्मी, पारा 40 डिग्री से ऊपर
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड शहरामध्ये सातत्याने उष्णता वाढतच असून अनेक वेळा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला असून महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. दरदरून घाम आला किंवा चक्कर आली तर तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे यांनी दिला आहे. महापालिकेची सर्वच रुग्णालय आपत्कालीन व्यवस्थेसाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर लक्ष्मण गोफणे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी.0
0
Report
Advertisement
खेड के किसान घोड़े से खेत में, ईंधन महंगाई के बीच पारंपरिक खेती की मिसाल
Shirur, Maharashtra:*बुलेट-कारच्या युगात खेडच्या शेतकऱ्याचा घोड्यावरून प्रवास; इंधन बचत आणि पारंपरिक शेतीचा अनोखा संदेश* ANC :आजच्या काळात माणूस अलिशान गाड्या आणि महागड्या प्रवासामागे धावत असताना, खेड तालुक्यातील पाईट गावातील शंकर हेंगले मात्र रोज घोड्यावरून शेतात जातात. वाढते पेट्रोल दर, खराब रस्ते आणि गोवंश आधारित शेती यामुळे त्यांनी हा मार्ग निवडला आहे. VO :पाईट गावातील शंकर खेंगले यांनी आधुनिक वाहनांऐवजी घोडीला आपल्या जीवनाचा भाग बनवलेय शेतातील खराब रस्ते आणि वाढत्या इंधन दरांमुळे ते रोजच्या प्रवासासाठी घोडीचाच वापर करतात.गोवंशाचे संगोपन करत असताना त्यांनी महाराष्ट्राच्या खिल्लार गाईच्या संगोपनाचा ध्यास घेतलाय ट्रॅक्टरपेक्षा बैल आणि गोपालनावर आधारित शेतीच जमीन टिकवते, असा विश्वास व्यक्त करत कप पेट्रोल शंभरी पार करत असताना, दुचाकीऐवजी घोड्यावरून प्रवास करणारा हा शेतकरी इंधन बचतीचाही संदेश देतोय. मुंबईतील आयुष्य सोडून गावाकडे परतलेल्या शंकर हेंगले यांनी पारंपरिक शेती आणि गोवंश संवर्धनाची वाट निवडत आधुनिक दिखाऊ जीवनशैलीसमोर वेगळा आदर्श उभा करत खिल्लार गाईचे संगोपन, इंधन बचत आणि पारंपरिक शेती जपत आधुनिक जीवनशैलीला चपराक दिलीय Byte: शंकर धोंडीबा खेंगले (शेतकरी ) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे...0
0
Report
पिंपरी चिंचवड़ में वायरल वीडियो: मंगला कदम ने विलास लांडे के काम को नकारा
Pimpri-Chinchwad, Maharashtra:विलास लांडे यांचे काम केले नाही...महेश लांडगे तुमचे काम केले - राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल...! पण पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका.निवडणुकीत भाजप वासी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मंगला कदम यांनी तशी जाहीर कबुली दिलीय. त्यांच्या कबुलीच हा व्हिडिओ सध्या पिंपरी चिंचवड मध्ये प्रचंड व्हायरल होत आहे..,वास्तविक पाहता मंगला कदम या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक ताकतवाण नेत्या... त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा उमेदवार विलास लांडे यांचे काम केले नसल्याची जाहीर कबुली दिलीय. 2014 मध्ये विलास लांडे राष्ट्रवादी चे उमेदवार होते. तेव्हा महेश लांडगे अपक्ष उमेदवार होते तर 2019 मध्ये विलास लांडे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार होते...! या दोन्ही वेळी सांगून तुमचे काम केले विलास लांडे यांचे नाही हे मंगला कदम यांनी महेश.लांडगे यांना तोंडावर सुनावले. संभाजी नगर मध्ये सुरू असलेल्या कामावरून भाजप आमदार महेश लांडगे आणि मंगल कदम यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. त्या वेळी मंगला कदम यांनी महेश.लांडगे यांना त्यांचे काम केल्याची आठवण करून दिली. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून त्याची जोरदार राजकीय चर्चा सुरू झालीय...0
0
Report
जुन्नर बेल्हे में ST बस पलटी, एक की मौत, कई घायल
Shirur, Maharashtra:जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील गुळुंचवाडी फाट्यावर आज सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची लालपरी एसटी बस पलटी झाल्याची घटना घडली आहे. यात चालकासह 1 प्रवासी मृत झाले आहेत. बस क्रमांक MH14-BT 4023 ही बस भिवंडी डेपोची असून शेगावहून कल्याणकडे जात होती. अपघाताच्या वेळी बसमध्ये प्रवाशांची संख्या 30 ते 35 होती. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य करण्यात आले. सर्व जखमींना उपचारासाठी अळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
आळेफाटा पुलिस ने मंदिर चोरी के अंतरराज्यीय गैंग को दबोचा, 3 लाख रुपए के सामान बरामद
Shirur, Maharashtra:जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील प्रसिद्ध मुक्ताई माता मंदिरात चोरी करणाऱ्या आणि भर लग्नसराईत साऊंड सिस्टीमवर डल्ला मारणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा आळेफाटा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून तब्बल ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमधून पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतलं असून, त्यांनी मंदिर और साऊंड सिस्टीम चोरीची कबुली दिली आहे.0
0
Report
ओतूर लॉज में 31 वर्षीय महिला की संदिग्ध मौत, पुलिस जांच जारी
Barav, Maharashtra:जुन्नर/पुणे. जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे एका लॉज मध्ये ३१ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्नेहल अमोल शिंदे (रा. अवसरी, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओतूर येथील वाघिरे महाविद्यालयासमोर असलेल्या अमृत लॉजमध्ये स्नेहल शिंदे या मयत अवस्थेत आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत प्राथमिक पाहणी केली. त्यानंतर त्यांना ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे ओतूर परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा मृत्यू नैसर्गिक आहे की अन्य काही कारणामुळे झाला, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. घटनास्थळावरील परिस्थिती, लॉजमधील नोंदी तसेच संबंधित व्यक्तींची चौकशी यावरून पुढील तपासाची दिशा निश्चित केली जाणार आहे. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.0
0
Report
शिरूर में अचानक बारिश से किसानों की फसल पर संकट, कांदा और फलों को बड़ा नुकसान
Shirur, Maharashtra:Anc: पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाने झोडपलं असून अचानक पडलेल्या या अवकाळी पावसाने काढणीला आलेला कांदा तसेच फळबागांना मोठा फटका बसणार आहे तर उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना मात्र वातावरणात गारवा निर्माण झाल्याने अवकाळी च्या या पावसाने दिलासा मिळालाय प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...0
0
Report
Advertisement
