Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442402

बल्लारपूर-गोंदिया रेल्वेमार्गावर गर्भवती सांबराचा मृत्यू, वन्यजीवांसाठी संकट!

ASHISH AMBADE
Jun 28, 2025 13:06:38
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 2806ZT_CHP_DEER_DEATH ( single file sent on 2C)  टायटल:-- घनदाट जंगलातुन जाणारा बल्लारपूर- गोंदिया रेल्वेमार्ग ठरतोय वन्यजीवांसाठी कर्दनकाळ, गर्भवती मादी सांबराचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू, सतत होणारे वन्यजीवांच्या मृत्यूसंदर्भात शास्त्रीय पद्धतीने उपाययोजनांची गरज, हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी सदस्यांनी रेल्वे- वनविभाग आणि प्रशासनाला याकडे गांभीर्यानें लक्ष देण्याची केली मागणी अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील घनदाट जंगलातुन जाणारा बल्लारपूर- गोंदिया रेल्वेमार्ग वन्यजीवांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. लोहारा-जुनोना जंगलातून जाणाऱ्या रेल्वे रुळावर रकसोल एक्सप्रेसने आज रूळ ओलांडणा-या गर्भवती मादी सांबराला चिरडले.  रेल्वेच्या धडकेने सतत होणा-या वन्यजीवांच्या मृत्यूसंदर्भात शास्त्रीय पद्धतीने उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी सदस्यांनी रेल्वे- वनविभाग आणि प्रशासनाला याकडे गांभीर्यानें लक्ष देण्याची मागणी केली आहे. या मार्गावर जास्त अपघात हे  लोहारा ते मूल दरम्यान होतात. आता पुन्हा दुसरी रेल्वे लाईन टाकण्याचा प्रस्ताव रेल्वेने मंजूर केला आहे.  वन्यजीवांचा हा भ्रमण मार्ग कसा सुरक्षित राहील याची चिंता वन्यजीवप्रेमींना पडली आहे. या जागी अशास्त्रीय पद्धतीने कुंपण तयार  करण्यात आले आहे.  ५ फुटांवरून सांबर, हरीण ,वाघ ,बिबट हे सहज उडी मारून जाऊ शकतात ,मग ह्या तुटपुंज्या  योजना  कुठल्या कामाच्या असा सवाल हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीने विचारला आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement