Back
यवतमाळमध्ये नालीचे सदोष बांधकाम, दुकानदारांचे नुकसान!
Yavatmal, Maharashtra
AVB
Anchor : यवतमाळच्या दत्त चौक ते वीर वामनराव चौक मार्गावर नालीचे सदोष बांधकाम केल्यामुळे पावसात रस्त्यावर जमा होणारे पाणी थेट दुकानांमध्ये शिरत आहे. जोराचा पाऊस झाल्यास रस्ते जलमय होऊन तेथील पाणी अनेक दुकानांमध्ये जात असल्याने येथील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. हा मार्ग तयार होत असतानाच स्थानिकांनी त्याच्या कामाबद्दल आक्षेप नोंदविले होते, मात्र नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप व्यवसायिकांनी केला आहे. परिणामी पावसाच्या पाण्यामुळे दुकानातील साहित्याचे नुकसान होत आहे.
बाईट : अनुप लिंगावार : व्यावसायिक
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Kolhapur, Maharashtra:
Story':- Kop Badyachiwadi PKG
Feed:- 2C
Feed :- Live U
Anc:- कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरानजीक असणाऱ्या 40 जणांच्या वस्तीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने 91 वर्षीय आजीला बैलगाडीत घालून उपचारासाठी न्यावं लागलं आहे.. हे भीषण चित्र लोकप्रतिनिधी आणि सरकारला लाजवेल असंच आहे. कारण या रस्त्यावरून चालत जात असताना गुडग्याभर चिखलातून वाट काढत जावे लागत..
VO 1:- ही दृश्ये आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील्या बड्याचीवाडी खोरी वसाहती मधील .. खोरी वसाहत मधील 91 वर्षीय सुंदराबाई दळवी यांना अर्धांग वायूचा झटका बसला, त्यामुळे तातडीने त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला नेणे आवश्यक होत.. पण वस्तीवर जायला रस्ता नाही, त्यामुळे चिखलाने माखलेल्या याच रस्त्यावरून सुंदराबाईना नाईलाजास्तव बैलगाड्याच्या छकडामधून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागले. बड्याचीवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत असणाऱ्या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने आजीला बैलगाडीच्या छकडातून नेण्याची वेळ आलीय... आजीला सध्या गडहिंग्लज मधील रुग्णालयामध्ये उपचारासाठी ऍडमिट केलय.. त्यामुळे त्याचे चिरजीव अर्जुन दळवी हे रोज अशाच पद्धतीने चिखलातून वाट काढत ये जा करत आहेत.. सध्या आईची परिस्थिती चिंताजनक आहे.. अशा परिस्थितीत ये जा कशी करायची असा प्रश्न त्यांना सतावतोय.
Byte :- अर्जुन दळवी, ग्रामस्थ
VO 2:- गडहिंग्लज तालुक्यातील बड्याचीवाडी इथे अनेक वर्षांपासून रस्त्यांसाठी या ग्रामस्थांचा संघर्ष सुरू आहे.. ग्रामस्थांच्या अनेक पिढ्या याच वसाहतीवर गेल्या.. तरी देखील वहिवाटीचा रस्ता असणाऱ्या रस्त्याची डाक डूजी झालेली नाही..
Byte :- बाबुराव दळवी, ग्रामस्थ
VO 3:- 40 ते 50 मतदार असलेल्या या वस्तीवर रस्ता करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. वारंवार मागणी करून देखील रस्ता होत नसल्याने या विधानसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. पण निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाने याची दखल घेत हा रस्ता आम्ही पूर्ण करून देऊ अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली होती, पण निवडणूक संपतात सोयीस्कररित्या जिल्हा प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मोठ्यांसह लहानांची अक्षरशा फरफट सुरू आहे.
Byte संचित दळवी
Byte अनिल दळवी
VO 4 :- सुंदराबाई सिंधू दळवी याच्या सारख्या अनेक रुग्णांना हॉस्पीटल पर्यंत न्यायचे असेल तर हीच परिस्थिती.. 90 वर्षीय सुंदराबाई यांना मतदानाला नेण्यासाठी लोकप्रतिनिधी यांनी वाहनाची व्यवस्था केली.. पण नंतर मात्र यांना त्याचा वीसर पडला. बड्याचीवाडीची पासून या वस्तीला येण्यासाठी एक किलोमीटर ते सव्वा किलोमीटरचा रस्ता आहे.. पण हा रस्ता खाजगी वहिवाटेतून जात असल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी पक्का रस्ता करायला विरोध केलाय. कोर्टाने देखील जैसे थे ठेवण्याचे आदेश दिलेत.. त्यामुळे प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली या रस्त्याची डाग डुजी करणार असल्याचं आश्वासन दिलय.
Byte:- ऋषिकेश शेळके, तहसीलदार गडहिंग्लज
VO 5 :- खाजगी मालमत्तेतून जाणारा हा रस्त्याला विरोध केला असला तरी चार ते पाच पिढ्यांपासून ही लोक हाच वहाटीचा रस्ता वापरतात.. त्यामुळे प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन हा रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे.. अन्यथा लाल फितीच्या कारभारात या लोकांना अशाच पद्धतीने जीव धोक्यात घालून अशी बिकट वाट तुडवत राहावे लागणार आहे..
End P2C :- प्रताप नाईक, प्रतिनिधी
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0307_BHA_GOSE_DAM
FILE - 1 VIDEO
गोसेखुर्द धरणाचे 9 दरवाजे खुली करण्यात आली आहे.....
Anchor :- भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या वैनगंगा नदीच्या पानी पातळीत वाढ झाली आहे. भविष्यात दमदार पाऊस झाला तर गोसेखुर्द धरण ओव्हरफ्लो होण्याची शकता असल्याने आज गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवज्या पैकी 9 दरवाजे खुली करण्यात आली आहे. या 9 दरवाज्यातून 1158 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी पात्रातून आवागमन करणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0307ZT_JALNA_JARANGE(1 FILE)
जालना | ब्रेकिंग
न्या.संदीप शिंदे समितीला राज्य सरकारकडून 6 महिन्यांची
मुदतवाढ
समितीला नुसती मुदतवाढ देऊन आम्हाला नांदी लाऊ नका,आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा,अन्यथा मुंबईत 100 टक्के येणार म्हणजे येणार : जरांगे
मि एक वर्षाची मुदतवाढ मागीतली, सरकारनं फक्त 6 महिन्यांची मुदतवाढ दिली असं करून चालणार नाही,निर्णयाचं स्वागत पण एक वर्षाची मुदतवाढ पाहिजे : जरांगे
समितीनं रेकॉर्डही तपासले पाहिजे,कुणबी प्रमाणपत्र वाटपही झाले पाहिजे
सगे-सोयरेची अंमलबजावणी करा
मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा
हैद्राबाद गॅझेट तात्काळ लागू करा,सातारा, बॉम्बे गॅझेटही लागू करा
अँकर | कुणबी नोंदी शोधण्यासाठी नेमण्यात आलेल्या न्या.संदीप शिंदे समितीला राज्य सरकारनं 6 महिन्यांची पुन्हा मुदतवाढ दिलीय.30 जून रोजी या समितीची मुदतवाढ संपुष्टात आली होती. अखेर राज्य सरकारनं 2 जुलै रोजी नवा अध्यादेश काढत 31 डिसेंबरपर्यत न्या.शिंदे समितीला मुदतवाढ दिलीय.दरम्यान राज्य सरकारने या समितीच्या मुदतवाढीबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिलीय.
न्या.संदीप शिंदे समितीला मि एक वर्षाची मुदतवाढ मागीतलीय. सरकारनं फक्त 6 महिन्यांची मुदतवाढ दिली असं करून चालणार नाही या निर्णयाचं स्वागत पण शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ पाहिजे असं जरांगे यांनी म्हटलंय.समितीला नुसती मुदतवाढ देऊन आम्हाला नांदी लाऊ नका,हैद्राबाद गॅझेट तात्काळ लागू करण्याबरोबरच आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा,अन्यथा मुंबईत 100 टक्के येणार म्हणजे येणार असा ईशारा जरांगे यांनी दिलाय.
बाईट :मनोज जरांगे पाटील
0
Share
Report
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- आमदार धमकी
फीड 2C
अँकर:-अहिल्यानगर शहरातील आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी संग्राम जगताप यांच्या खाजगी स्वीय सहाय्यकाच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे आली आहे. या संदर्भात स्वीय सहाय्यका कडून कोतवाली पोलीस ठाण्यात यासंदर्भात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला असून धमकीचा मेसेज आलेला मोबाईल नंबरच लोकेशन परराज्यातील असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांकडून सायबर सेलच्या माध्यमातून अधिक तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी दिली आहे.
बाईट:- अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
एकाच रात्रीत मोबाईल व मेडिकल अशी दोन दुकाने फोडून चोरट्यानी केला लाखोंचा मुद्देमाल केले लंपास
कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पोलीस तपास सुरु.
शहाड स्टेशनं लगत असलेल्या मुख्य रस्त्यावरील इमारतीत चोरीची घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण.
पोलिसांकडे गस्त वाढवण्याची मागणी
Anc.. कल्याणच्या शहाड रेल्वे स्टेशन परिसरात पुन्हा एकदा चोरट्यांनी एका रात्रीत दोन दुकान फोडली,स्टेशनं लगत असलेल्या मुख्य रस्त्यावर असलेल्या मोबाईल आणि मेडिकल दुकानांची शटर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या वेळेस पोलिसांची गस्त कमी असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हे कृत्य केल्याचे दिसून येत आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून व्यापारी वर्गाकडून पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.
व्यापारी 1,2
0
Share
Report
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_ROBARY
ऑनलाईन गेम च्या जाळ्यात अडकला,
कर्जबाजारी झालेल्या बँक मॅनेजरने रचला चोरीचा बनाव
पोलीस तपासात मॅनेजरचा 24 तासात बनाव उघड
माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या बँकेतील प्रकार
Anchor
धाराशिव –
ऑनलाइन गेमच्या व्यसनात अडकलेल्या बँक मॅनेजरने तब्बल 25 लाखांच्या चोरीचा बनाव केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गमध्ये माजी मंत्री आणि भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल बँकेत ही घटना घडली.
कैलास घाटे असे मॅनेजरचे नाव असून त्याने दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी हल्ला करून डोळ्यात मिरची पूड टाकून रक्कम लुटल्याचा बनाव केला होता.
मात्र पोलीस तपासात सत्य समोर आलं.
ऑनलाइन गेममुळे झालेल्या कर्जातून सुटका मिळवण्यासाठी घाटेने हा कट रचल्याचं निष्पन्न झालं आहे.
विशेष म्हणजे, पोलिसांनी संपूर्ण 25 लाखांची रक्कम हस्तगत केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
Byte – रितू खोखर, जिल्हा पोलीस अधीक्षक, धाराशिव
0
Share
Report
Akola, Maharashtra:
4 फाईल्स, 1 फोटो आहे..AVB
Anchor : अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये एका सावत्र बापाने आपल्या नऊ वर्षाच्या चिमुकल्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहेय...दर्शन वैभव पळसकार असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहेय..या घटनेने समाज मन सुन्न झालं आहेय..सावत्र बापाने दर्शनची हत्या का केली याचं कारण अद्यापही समोर आलं नसून अकोट पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत..हत्या केल्यानंतर आरोपीने दर्शनचा मृतदेह जंगलात फेकून दिला होता , आणि काल रात्री दर्शनची मिसिंग कंप्लेंट पोलिसात दाखल करण्यात आली..
पोलिसांनी कसून तपास करत आरोपीला अटक केल्याची माहिती आहेय..
Byte : अनमोल मित्तल, पोलिस अधिकारी..
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर - शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त टिपणी करणारे माजी मंत्री बबनराव लोणीकरच्या तोंडाला काळ फासेल किंवा चाबूकाने झोडपले त्याला औंढा तालुका प्रमुखाकडून माऊली झाटे यांच्याकडून 1 लाखाचे बक्षीस तर लोणीकरांना जोड्याने मारणार्याला जिल्हाप्रमुखा संदेश देशमुख यांच्या कडून दोन लाख 51 हजार रुपयाचे बक्षीस जाहीर करून वादग्रस्त वक्तव्य केल आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज शेतकेयांचा कर्जमाफी करावी,शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा,शेतकर्यांसाठी जुना 1 रुपयात पीक विमा योजना सुरू करावी. शेतीला 24 तास वीज द्यावी यासह विविध मागण्यांसाठी आज औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथे रास्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले होते, यावेळी हजारो शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले,यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेतकऱ्याबद्दल अपशब्द काढणारे माजी मंत्री बबनराव लोणीकर हिंगोली जिल्ह्यात दोन वर्षात कधी ही आल्यास बबनराव लोणीकर यांच्या तोंडाला काळ फासल किंवा त्यांना चाबकाने झोडपले तर 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा औंढा तालुकाप्रमुख माऊली झाटे यांनी केले.यावेळी जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी तालुका प्रमुखांच्या पुढे जाऊन बबनराव लोणीकर यांचा बुटाने हाणनाऱ्याला 2 लाख 51 हजार रुपये बक्षीस देणार असल्याची घोषणा करून वादग्रस्त वक्तव्य केले.
बाईट- माऊली झटे- शिवसेना उबठा- तालुकाप्रमुख औंढा
बाईट- संदेश देशमुख- जिल्हाप्रमुख,हिंगोली
0
Share
Report
Pune, Maharashtra:
हिंजवडीत रस्त्याचं काम सुरु, पक्का रस्त्याला स्थानिकांचा विरोध
pimpri it
kailas puri Pune 3-7-25
feed by 2c
ऍंकर : आयटी हब हिंजवडीची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे पीएमआरडीए कडून रस्त्याच्या कामाला सुरुवात झालीये. मारुंजी ते फेज दोन विप्रो सर्कल दरम्यानचा हा 300 मीटर चा रस्ता आहे. मात्र स्थानिकांनी या मार्गाला विरोध दर्शविला आहे. आम्ही कच्चा रस्ता बांधायला देऊ पण पक्का रस्ता उभारायला देणार नाही. पीएमआरडीए ने आम्हाला कोणतीही नोटिया बजावलेली नाही, तरी ही कारवाई का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. दुसरीकडे हिंजवडी मधील नाले बुजवणाऱ्या बिल्डर्स वर तीस तारखे नंतर गुन्हे दाखल करणार असे सांगण्यात आले होते मात्र त्यावर कारवाई झालेली नाही..! त्यामुळे pmrda कोणाला वाचवत नाही ना असा सवाल उपस्थित केला जात आहे...याच संदर्भात स्थानिकांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी....
kailas 1 to 1+vis
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0307ZT_JALNA_PISTAL_CRIME(1 FILE)
जालना | गावठी पिस्तुल खरेदी विक्री करणाऱ्या दोघांना घेतलं ताब्यात
गुन्हे शाखेची कारवाई
अँकर | गावठी पिस्तूल खरेदी विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय.समीर उर्फ उस्मान शौकत सय्यद आणि राजकुमार शिंदे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत.आरोपींच्या ताब्यातून एका गावठी पिस्तुलासह 5 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलीयत. आरोपींवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
0
Share
Report