Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

शेतकऱ्यांचा उपोषण: १६ तास वीज पुरवठा न मिळाल्यास खुर्ची खाली करा!

PRAVIN TANDEKAR
Jul 03, 2025 02:32:54
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara Slug - 0307_BHA_UPOSHAN FILE - 3 VIDEO १६ तास कृषी वीज द्या, अन्यथा खुर्ची खाली करा कोका परिसरातील शेतकरी आंदोलनावर उपोषणकर्त्यांनी केली मागणी Anchor : भंडारा जिल्ह्याच्या पालोरा, जांभोरा, करडी, कोका परिसरातील शेतकऱ्यांनी १६ तासांऐवजी केवळ १२ तास कृषी वीज पुरवठा करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ, जांभोरा येथून पायदळ पदयात्रा काढून करडी येथील वीज वितरण कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांना लागणारा किमान १६ तास वीज पुरवठा करण्यासाठी हे आंदोलनाचे पाऊल उचलण्यात आले आहे. १२ फेब्रुवारी रोजी १६ तास वीज पुरवठा मिळावा, अशी मागणी करत उपोषण सुरू करण्यात आले होते. त्यावेळी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी भेट देऊन १२ तास वीज पुरवठ्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यामुळे उपोषण सोडवण्यात आले होते. वीज वितरण विभागाने पुढील १० दिवस १२ तास वीज पुरवठा केला, मात्र नंतर ते पुन्हा ८ तासांवर कमी करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. शेतकऱ्यांना पीक घेताना पाणी आणि विजेची अत्यंत गरज असल्याने त्यांनी शेतात बोअरवेल लावले असून वीज कनेक्शनही घेतले आहे. मात्र ८ तासांमध्ये वारंवार वीज कट होऊन खऱ्या अर्थाने फक्त ४ ते ५ तास विजेचा पुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलं आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement