Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

काँग्रेसचा धुळ्यातील किल्ला कुणाल पाटीलच्या भाजप प्रवेशाने ढासळणार!

YOGESH KHARE
Jun 30, 2025 09:37:55
Nashik, Maharashtra
Nsk_congresspkg Feed by 2C Video 5 Byte from Mumbai Anchor काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस संपूर्णतः संपणार आहे. कुणाल पाटील यांचा धुळे ग्रामीण मतदारसंघात मजबूत प्रभाव आहे, आणि त्यांच्या पक्षांतरामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसची पकड कमी होऊन धुळे भाजपचा किल्ला होणारे. Vo 1 गेल्या पाच दशकाची अनिर्बंध पिढीजात सत्ता असलेले काँग्रेसचा तरुण चेहरा कुणाल पाटील .... sधुळे ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसकडून 2014 आणि 2019 या वर्षी दोन वेळा आमदार राहिले आहेत . त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 2023 मध्ये धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 18 पैकी 16 जागा जिंकून भाजपचा दारुण पराभव केला होता. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कुणाल पाटील यांना भाजपच्या राम भदाणे यांच्याकडून 66,320 मतांनी पराभव पत्करावा लागला. गेल्या पाच वर्षापासून भाजपप्रवेशाच्या चर्चांना विराम देत ते आता विकास कामांसाठी भाजपच्या ताफ्यामध्ये सामील होणार आहेत. पाटील यांच्यासोबत त्यांचे समर्थक, स्थानिक कार्यकर्ते आणि काही शैक्षणिक संस्थांचा प्रभावही भाजपकडे जाणारे., जिल्ह्यातील सहकार चळवळी वरती काँग्रेसचे जे प्रभुत्व होतं तेही आता कुणाल पाटील भाजपत गेल्यामुळे संपणार आहे. Byte कुणाल पाटील Vo 2 कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये एक स्वच्छ प्रतिमा, उच्चशिक्षित आणि राजकीय पार्श्वभूमी असलेला मराठा नेता भाजपाला गवसला आहे. माजी केंद्रीय मंत्री माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना पर्याय म्हणून कुणाल पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पसंती दिल्याचे बोलले जात आहे. डॉक्टर सुभाष भामरे नंतर पक्षाकडे जिल्ह्यात मजबूत आणि स्वच्छ प्रतिमेचा मराठा चेहरा नव्हता तो कुणाल पाटील यांच्या माध्यमातून मिळाला आहे. त्यामुळे धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यामध्ये पाटील कुटुंबाचं असलेलं नातं गोत आणि शैक्षणिक संस्थांचं जाळ हे भाजपच्या पथ्यावर पडेल. कुणाल पाटील यांच्या पक्षांतरामुळे उरलीसुरली काँग्रेसची ग्रामीण भागातील पकड कमजोर होऊ शकते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवणे आणि नवीन नेतृत्व उभे करणे कठीण होणारे. यासाठी गेल्या तीन पिढ्यांच्या प्रमाणाईकतेला जागत त्यांनी भाजप जाऊ नये असे ज्येष्ठ नेत्यांना वाटतेय Byte 3 हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष GFX सध्याची परिस्थिती धुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचे वर्चस्व 2022 जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी धुळे शहरात AIMIM चे आमदार फारूक शहा यांचा प्रभाव काय होणार फायदा उत्तर महाराष्ट्रात भाजपाला मराठा तरुण चेहरा गवसेल सहकार चळवळीत प्रभुत्व वाढवण्यासाठी ही कुणाल पाटलांची होणार मदत. खानदेशात मराठा समाजाला बळ देण्यासाठी कुणाल पाटील भाजपच्या पथ्यावर पडणार Vo 3 उत्तर महाराष्ट्रातील 47 विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसला 2024 च्या निवडणुकीत मर्यादित यश मिळाले. भाजपने उत्तर महाराष्ट्रात विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या गोटात सामील करून घेण्याची रणनीती अवलंबली आहे. यापूर्वी अमरिशभाई पटेल आणि राजवर्धन कदमबांडे यांच्यासारख्या नेत्यांनीही काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता कुणाल पाटील आणि संभाव्यतः अपूर्व हिरे यांच्या प्रवेशाने भाजपचा प्रभाव आणखी वाढेल. Byte विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते Byte (प्रशांत परदेशी धुळ्याचे स्थानिक पाठवतो आहे )राजकीय विश्लेषक Vo 3 आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होईल. काँग्रेसला या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे आणि नवीन नेतृत्व उभे करणे आवश्यक आहे, तर भाजप या संधीचा फायदा घेऊन आपली पकड आणखी मजबूत करेल.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement