Back
ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची कार्यकर्त्यांची मागणी, बॅनर चर्चा करता!
Kalyan, Maharashtra
हिंदी सक्तीविरोधी मोर्चा रद्द, पण ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची कार्यकर्त्यांची मागणी कायम
कल्याणमध्ये उद्धव, बाळासाहेब व राज ठाकरे यांच्या एकत्रित फोटोसह भावनिक बॅनर झळकले
हीच ती वेळ महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी, मराठी माणसासाठी एकत्र या.." अभि नहीं तो कभी नही " अशा आशयाने लागले बॅनर
Anchor :- हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू एकत्र आले . पाच जुलै रोजी मनसे आणि ठाकरे गटाचा एकत्रित मोर्चा निघणार होता मात्र त्याआधीच सरकारने हिंदीभाषा सक्ती रद्द केली . ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने ठाकरे गटासह मनसे कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे . मोर्चा रद्द झाल्याने आता या दोघांना एकत्रितपणेच पाहण्याची इच्छा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे . या पार्श्वभूमीवर कल्याण मध्ये झळकलेला बॅनर हा चर्चेचा विषय ठरलाय . या बॅनर मध्ये उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र फोटो लावण्यात आलाय .तसेच मोर्चा जरी रद्द झाला असेल तरी एकत्र या , "हीच ती वेळ महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी, मराठी माणसासाठी एकत्र या.." अभि नहीं तो कभी नही " अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आलाय . गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी ठाकरे गटासह मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी केली जात आहे . त्यातच आता मोर्चा रद्द झाला असला तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र यावं अशी भावना कार्यकर्त्यांनी बॅनरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement