Back
डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचा भव्य मेळावा, भरत गोगावले उपस्थित!
Kalyan, Maharashtra
डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये भरत गोगावले उपस्थित
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या सर्व नेते पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा आहे
पुढची दिशा आणि महायुतीत लढत असताना कुठल्या ठिकाणी काय परिस्थिती आहे ज्याला आम्हाला सामोर्य जायचं आहे त्यासाठी आजची ही बैठक आहे
On हिंदी संक्ती निर्णय मागे उद्धव आणि राज ठाकरे जल्लोष करणार आहे....
उद्धव ठाकरे वर राज ठाकरे यांच्या विजयी सभेबद्दल आमचे दुमत नाही.... आमच्या सरकारने मराठी माणसासाठी जे काय चांगले निर्णय घ्यायचे ते घेतलेले आहेत यापुढेही हे शंकर मराठी माणसासाठी कटीबंधक आहे
On नारायण राणे बद्दल भाष्य..
चुकून झालेला शब्द आहे त्यांना आम्ही सांगितलं आहे असं बोलण्याचा आमचं कोणताही हेतू नव्हता हे चुकून झालं ते त्यांना सांगितले चुकून शब्द गेला आमचा बाकी दुसरं काही कारण नाही
byte.. भरत गोगावले
मंत्री
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 3006ZT_CHP_NCP_SP_JOLT
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का, शरद पवार गटाचे 4 माजी नगरसेवक आणि 11 पदाधिकारी उद्या अजित पवार गटात करणार प्रवेश, अजित पवार गटामध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान शहराध्यक्ष दीपक जयस्वाल आहेत प्रमुख चेहरा
अँकर:--चंद्रपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का अपेक्षित आहे. शरद पवार गटाचे 4 माजी नगरसेवक आणि 11 पदाधिकारी उद्या अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. अजित पवार गटामध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्यासह मंगला आखरे, राजू आखरे आणि विनोद लभाने यांचा समावेश आहे. उद्या मुंबईत संध्याकाळी हा पक्षप्रवेश होणार आहे. महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठं पाठबळ मिळाले असून दुसरीकडे शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Palghar, Maharashtra:
Anchor
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील म्हसे गावात टायर ट्यूबवर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीवघेणी कसरत या करावी लागते . एका टायरच्या ट्यूबवर पाच मुले बसून नदी मधून जीव घेणा प्रवास करतात.
vo _1
मुलांच्या डोक्यावर दप्तर, एका हातात शाळेचा ड्रेस , पडत असलेल्या पावसात भिजत असलेली दप्तरातील पुस्तके, वाहत्या नदीतून तो जीवघेणा प्रवास, त्या मुलांना सुखरूप पोहचविण्यासाठी पालकाची होणारी नदीच्या प्रवाहातील दमछाक , हे पाहल्यानंतर आमची प्रशासकीय यंत्रणा इतकी खिळखिळी झाली आहे का ? या मुलांचे काही बरेवाईट झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेला पान्हा फुटेल का? असा प्रश्न येथील गावकरी प्रशासनाला करीत आहेत. विक्रमगड तालुक्यातील म्हसे गावातून पिंजाळ नदी पार करून टायर ट्यूबवर हि मुले वाकी या गावातील शाळेत येतात. दरवषी आदिवासी ग्रामीण भागात हजारो कोटी रुपये खर्च होतात. तरी पण आम्हला शिक्षण ,आरोग्य ,पाणी या समस्या ला सामोरे जाताना जो आज संघर्ष करावा लागतो हा संघर्ष आमच्या पाचवीलाच पुजलेल्या आहे का हा प्रश्न आम्हला पडतो.
बाईट -विध्यार्थी
बाईट -पालक
vo 2 -म्हसे गावातून पिंजाळ नदी पार करून टायर ट्यूबवर हि मुले वाकी या गावातील शाळेत येतात.रोज कपडे भिजत असल्याने सोबत एक ड्रेस आणून मग पुन्हा शाळेचा ड्रेस घालून हि मुले शाळेत पोहचतात . हा जीवघेणा प्रवास या मुलांना करावा लागतो टायर ट्यूब सोबत पालक मुलांना नदी किनारी सोडून पुन्हा टायर घरी नेतात पुन्हा संध्यकाळी मुलाची नदी किनारी वाट पाहतात मुलाचा आवाज आला कि मग टायर ट्यूब घेऊन मुलांना घेण्यासाठी येतात . सरकारने यांची पुलाची मागणी पूर्ण करावी आणि हा जीवघेणा प्रवास थांबवावा अशी या आदिवासी गावकऱ्यांची मागणी आहे.
हर्षद पाटील झी मीडिया पालघर.
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 3006ZT_CHP_MNS_JALLOSH_1
( single file sent on 2C)
टायटल:-- महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात मनसेने केला जल्लोष, हा मराठी एकजुटीचा विजय असल्याची व्यक्त केली भावना
अँकर:-- महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाई भरवत या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. मराठीच्या मुद्द्यावर व हिंदी सक्तीचा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी 5 जुलै रोजी मुंबई उबाठा सेना आणि मनसे असा संयुक्त मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आधीच जीआर रद्द करून ही मागणी पूर्ण केली. हा मराठी एकजुटीचा विजय असल्याची भावना मनसे नेत्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
बाईट १) राहुल बालमवार, मनसे नेते
बाईट २) मनदीप रोडे, मनसे नेते
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या उदासीनते विरोधात लक्षवेध आंदोलन केले. राष्ट्रीय आरोग्य अभियान एकीकरण समितीच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले होते. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने हे कर्मचारी १५ ते २० वर्षांपासून काम करत आहेत. त्यामुळे शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचे समायोजन तत्काळ करण्यात यावे, मानधनात १०% वाढ करावी, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांसाठी एकवेळ बदली धोरण लागू करावे, सर्व कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण आणि भविष्य निर्वाह निधी योजना लागू कराव्यात अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
'रिक्षाचालकांनी शिस्त मोडल्यास कडक कारवाई करणार'
पोलीस उपायुक्तांचा बदलापुरातील बेशिस्त रिक्षाचालकांना इशारा
रिक्षा चालकांनी नियमांचं पालन करण्याचा आवाहन
Bdl auto action
Anchor - बदलापुरातील रिक्षा चालकांनी शिस्त न पाळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिलाय. रांगेत प्रवासी घेणं, रिक्षा चालवताना लेनची शिस्त पाळणं, युनिफॉर्म तसंच वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा आवाहनही त्यांनी रिक्षा चालकांना केलय.
बदलापूर शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी नगरपालिका मुख्यालयात महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड, बदलापूर रेल्वे स्टेशन प्रबंधक धनश्री गोडे इतर अधिकारी तसच रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिक्षाचालकांना सूचना देण्यात आल्या. ओव्हर टेकिंग करणं, ओव्हर सीट घेणं तसंच स्टॅन्ड सोडून इतरत्र रिक्षा उभी करणं असे प्रकार रिक्षा चालकांकडून सर्रास वाढले आहेत. मात्र यापुढे रिक्षाचालकांनी शिस्तीचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. वेळप्रसंगी वाहनही जप्त करण्यात येईल असा इशाराही पोलीस उपयुक्तांनी या बैठकीत दिला. तसंच बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन लवकरच काही नवीन रिक्षा स्टॅन्डही सुरू केले जातील अशी माहितीही त्यांनी दिलीय.
Byte - पंकज शिरसाट, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Share
Report
Wardha, Maharashtra:
वर्धा
SLUG- 3006_WARDHA_PROTEST
- विविध मागण्यांकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांचे लक्षवेध आंदोलन
- राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी संघटना एकीकरण समितीचे आंदोलन
- वेतन सुसूत्रीकरणाचा निर्णय घ्यावा, समान काम समान वेतन लागू करावे, राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बदली धोरण लागू करा, कर्मचाऱ्यांना विमा कवच मिळावे, १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार समायोजन करावे आदी मागण्यासाठी आंदोलन
- आंदोलनात राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग
- विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 3006ZT_JALNA_ACCIDENT(7 FILES)
जालना | खडी वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकची दुचाकीस्वाराला धडक,दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
जिल्हाधिकारी कार्यालया समोरील घटना
तालुका पोलिसांकडून आयशर ट्रक जप्त,चालक फरार
अँकर | खडी वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकनं एका दुचाकीस्वाराला धडक दिलीय.या घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही घटना घडली.
40 वर्षीय राजेश अनावडे असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव असून तो छत्रपती संभाजीनगर शहरातील हनुमान नगर भागातील रहिवासी आहे.या अपघातानंतर आयशर ट्रकचा चालक फरार झालाय.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ट्रक जप्त केला. दरम्यान या प्रकरणी तालुका पोलीस अधिक चौकशी करत आहे.
0
Share
Report
Nagpur, Maharashtra:
नागपूर
नागपूर शहरात दमदार पाऊस
संध्याकाळी पाच नंतर ढग दाटून आले... त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली....
--- काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती
-- दरम्यान पुढील 24 तासासाठी पूर्व विदर्भात नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे
-- जून महिन्यात पावसाची मोठी तूट नागपूर जिल्ह्यात आहे...
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
हिंदी सक्तीविरोधी मोर्चा रद्द, पण ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची कार्यकर्त्यांची मागणी कायम
कल्याणमध्ये उद्धव, बाळासाहेब व राज ठाकरे यांच्या एकत्रित फोटोसह भावनिक बॅनर झळकले
हीच ती वेळ महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी, मराठी माणसासाठी एकत्र या.." अभि नहीं तो कभी नही " अशा आशयाने लागले बॅनर
Anchor :- हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू एकत्र आले . पाच जुलै रोजी मनसे आणि ठाकरे गटाचा एकत्रित मोर्चा निघणार होता मात्र त्याआधीच सरकारने हिंदीभाषा सक्ती रद्द केली . ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने ठाकरे गटासह मनसे कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे . मोर्चा रद्द झाल्याने आता या दोघांना एकत्रितपणेच पाहण्याची इच्छा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे . या पार्श्वभूमीवर कल्याण मध्ये झळकलेला बॅनर हा चर्चेचा विषय ठरलाय . या बॅनर मध्ये उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र फोटो लावण्यात आलाय .तसेच मोर्चा जरी रद्द झाला असेल तरी एकत्र या , "हीच ती वेळ महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी, मराठी माणसासाठी एकत्र या.." अभि नहीं तो कभी नही " अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आलाय . गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी ठाकरे गटासह मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी केली जात आहे . त्यातच आता मोर्चा रद्द झाला असला तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र यावं अशी भावना कार्यकर्त्यांनी बॅनरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे
0
Share
Report