Back
भंडारा आयडी घोटाळा: तिघांची अटक, बोगस शिक्षकांचा पर्दाफाश!
Nagpur, Maharashtra
शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी अजून तिघा जणांना भंडारा जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे... बोगस शिक्षकांच्या घरी सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे या तिघांना अटक करण्यात आली आहे... भंडारा जिल्ह्यातील बोगस शिक्षक महेंद्रे महेशकरला अटक करण्यात आली होती... त्याची झाडाझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे विविध शाळांमधील बनावट नस्ती सापडल्या होत्या... भंडारा जिल्ह्यातील एका शाळेच्या शिक्षकांच्या नियुक्ती संबंधातील कागदपत्रांचा ही समावेश यामध्ये होता... त्या आधारे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Kalyan, Maharashtra:
डोंबिवलीत मानपाडा पोलिसांची मोठी कारवाई
डोंबिवलीच्या खोणी पलावा परिसरातील हाय प्रोफाईल इमारतीवर छापा मारत २ कोटी १२ लाख किंमतीचा जवळपास दोन किलो एमडी ड्रग्स जप्त करत ड्रग्स तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना ही ठोकल्या बेड्या
आरोपी मध्ये दोन पुरुष एक 21 वर्षीय तरुणीचा समावेश असून तिन्ही आरोपी मुंब्रा चे रहिवासी असून डोंबिवलीतील हाय प्रोफाईल इमारतीत फ्लॅट भाड्याने घेत करत होते एमडी ड्रग्सची तस्करी
हे तिन्ही आरोपी एका कॉल सेंटरमध्ये काम करत असून मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा करत ठाणे सह आसपासच्या शहरात व शाळेच्या परिसरात विक्रीसाठी देत असल्याची माहिती
सध्या या प्रकरणात अजून तीन आरोपी फरार असून पोलिसांची तीन टीम त्या आरोपींच्या शोधात आहे
मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स एका हायप्रोफाईल सोसायटीत मिळाल्याने डोंबिवली एकदा पुन्हा चर्चेत आली आहे
Byte अतुल झेंडे ( कल्याण dcp )
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम :
File:2706ZT_WSM_HOTEL_DAMAGE_WKT
WSM_HOTEL_DAMAGE_SHOTS
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद व कुकसा परिसरातील उतावळी नदी दुथडी भरून वाहत होती.नदीला पूर आल्याने पुलगाव-जालना राष्ट्रीय महामार्गावरील कुकसा फाट्याजवळील हमीद शाहा यांचे हॉटेल पाण्याखाली गेले.पूराचे पाणी हॉटेलमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.विशेष म्हणजे, हॉटेलमधील मलंग शाहा हे सात ते आठ तास पुराच्या पाण्यात अडकले होते. मात्र शिरपूर पोलीस व स्थानिक नागरिकांनी धाडसाने त्यांची सुखरूप सुटका केली.हमीद शाहा यांच्या हॉटेलवरच त्यांचा संपूर्ण परिवार अवलंबून होता.आता उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाल्याने त्यांनी अश्रूंच्या धारा लपवू शकल्या नाहीत. त्यांच्या नुसकानीबाबत हॉटेल चालक शाहा यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी ..
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2706ZT_JALNA_PATIENT(6 FILES)
जालना | ब्रेकिंग | प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्या पोटाला प्रसूतीपूर्वी सोनोग्राफी करताना सोल्युशन जेल ऐवजी अँसिड लावल्याने महिला गंभीर जखमी
नर्स दोन तास फरार झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
घटनेनंतर महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म,महिला गंभीर भाजल्याने महिलेवर भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु
भोकरदन ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार आला समोर
अँकर : जालन्यातील भोकरदन ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असलेल्या महिलेची प्रसूतीपूर्वी सोनोग्राफी करताना महिलेच्या पोटाला सोल्युशन जेल ऐवजी नर्सने अँसिड लावल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय.यामुळे महिला गंभीर जखमी झालीय.जालन्यातील भोकरदन ग्रामीण रुग्णालयात हा प्रकार घडलाय.शिला भालेराव असं प्रसूतीसाठी दाखल होऊन जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. सोनोग्राफीच्या अर्ध्या तासानंतर या महिलेने गोंडस बाळाला जन्मही दिला आहे. बाळ सुखरूप आहे. मात्र महिलेच्या पोटासह गुप्तांग भाजल्यानं महिलेवर उपचार सुरु आहेत.या महिलेला अँसिडचं इन्फेक्शन झाल्यानं महिला गंभीर भाजली आहे.ग्रामीण रुग्णालयातील ब्रदरने सोनोग्राफी रूम मध्ये औषधाच्या ट्रे मध्ये सोल्युशन जेल ऐवजी अँसिड ठेवल्याने चुकून नर्सकडून अँसिड लागलं असल्याची माहिती रुग्णालयात प्रशासनाकडून नातेवाईकांना देण्यात आली.मात्र सोनोग्राफी दरम्यान पोटातील बाळाचे ठोके चेक करताना नर्सने पोटावर अँसिड टाकल्यानंतर गर्भवती महिला ओरडू लागल्याने नातेवाईकांनी नर्सला विचारणा केली असता नर्सने त्यांच्यावरच आरडाओरड करून रुग्णालयातून दोन तास पसार झाल्याचा महिलेच्या नातेवाईकांनी केलाय.
दरम्यान महिला गंभीर भाजल्याने तिच्यावर भोकरदन ग्रामीण रुग्णालयातच उपचार केले जात आहे. या घटनेने भोकरदन ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे
बाईट:शिला भालेराव जखमी,रुग्ण महिला
बाईट: शिला भालेराव यांच्या सासू
0
Share
Report
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_SARI_ARPAN पाच फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून वर्धा नदीत 211 मीटरची अखंड साडी अर्पण; बावनकुळे यांचा हस्ते विठठल रुख्मिनी चे पूजन
अँकर :– अमरावतीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या वतीने कौंढणपूर येथे 211 मीटर ची अखंड साडी अर्पण करण्याचा सोहळा आयोजित केला होता याला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते यावेळी विदर्भाची पंढरी व माता रुख्मिनीचे महेर असलेल्या श्री. क्षेत्र कौडण्यपूरच्या येथे माता रुक्मिणीला वर्धा नदीत 211 मीटरची अखंड साडी अर्पण केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे व भाजपचे आमदार यांनी बोटीतून नदीपात्रात जात साडी अर्पण केली आहे. दरम्यान बावनकुळे यांचा हस्ते विठठल रुख्मिनीचे पूजनही करण्यात आले. विदर्भाची पंढरी म्हणून श्री क्षेत्र कौडण्यपुराची ओळख आहे. यावेळी जगतगुरु रामराजेस्वराचार्य महाराज यांची उपस्थितीती होती या सोहळ्यात आमदार प्रताप अडसड, आ. राजेश वानखडे, आ. दादाराव केचे, आ.सुमित वानखडे यांची उपस्थिती होती.
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
27062025
Slug - PPR_SILVER_MUKUT
feed on 2c
file 02
-------
Anchor - वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल हा समतेचा प्रतीक मानला जातो. याच विठ्ठलाचे सर्व धर्मीयांमध्ये भक्त आहेत. असाच मुस्लिम समाजातील लातूरच्या गणी सय्यद त्याने आज विठ्ठल आज एक चांदीचा मुकुट अर्पण केला आहे. विठ्ठल मंदिराच्या कामामध्ये दगड पुरवताना. विठ्ठलास आपणही काहीतरी द्यावे या हेतून आपण चांदीचा मुकुट अर्पण केला असल्याची भावना सय्यद यांनी व्यक्त केली.
आपण मुस्लिम जरी असलो तरी गेल्या तीन पिढ्यांपासून भजन कीर्तनात आपण जातो. याच भावनेतून आपल्याला विठ्ठलास चांदीचा मुकुट अर्पण करण्याची इच्छा झाली आणि आपण ती पूर्ण केली असल्याची सय्यद यांनी सांगितले.
-------
Byte - गनी सय्यद ,मुस्लिम भाविक
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - शक्तिपीठ विरोधात १ जुलै कृषी दिनी अंकली येथे रास्ता रोको आंदोलन, मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना काळापासून धिंड काढत ठोकून काढण्याचा इशारा..
अँकर - शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात येत्या एक जुलै कृषी दिनी सांगलीच्या अंकली येथे सर्वपक्षीय रस्ता रोको करण्यात येणार आहे.शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच जमीन मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना काळे फासून त्यांची धिंड काढत,ठोकून काढू,असा इशारा देखील या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.शेतकऱ्यांच्या आणि सांगलीतल्या पूरग्रस्तांच्या दृष्टीने शक्तीपीठ महामार्ग हा धोकादायक असून कोणत्याही परिस्थितीत महामार्ग रद्द झाला पाहिजे अशी भूमिका या बैठकीमध्ये घेण्यात आली आहे, यासाठी सरकारच्या विरोधात रस्त्यावरची लढाई करण्यासाठी एक जुलै कृषी दिन,
अंकली या ठिकाणी नागपूर-रत्नागिरी महामार्गावर सर्वपक्षीय रस्ता रोको करण्यात येणार असल्याचा जाहीर करण्यात आले आहे.
बाईट - महेश खराडे - जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना,सांगली.
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
ANCHOR - नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा च्या डोंगर रांगांमध्ये निसर्गाने आरोग्य विभागाचे वाभाडे चव्हाट्यावर आणले आहेत. सातपुडा डोंगर रांगांमध्ये असलेल्या केलापानी येथून एका रुग्णाला बाबू ची झोळी करून तब्बत 3 ते 4 तासांची जंगलातून वाट काढत रुग्णालयात आणावे लागले. केलापाणी गावातील रतीलाल पारता पाडवी या 30 वर्षीय आदिवासी बांधवला बांबूच्या झोळीतून रुग्णालयात घेऊन जाण्याची नातेवाइकांवर वेळ आली. दुर्दैवाची बाब म्हणजे हा रुग्ण केल्या काही दिवसांपासून आजारी होता. मात्र पूर परिस्थितीमुळे रस्ते बंद असल्याने आणि रुग्णवाहिका येऊ शकत नसल्यामुळे तो तशाच स्थितीत घरी पडून होता. शेवटी स्थानिकांनी त्याला झोळीमध्ये आणत रुग्णालयात दाखल केले. ऐन पावसाळ्यात रुग्णाला घेऊन 15 ते 20 किलोमीटरची जीवघेणी पायपीट स्थानिलांना करावी लागली. उंच डोंगरावरून चिखलातून वाट काढत जंगलातून हा प्रवास जीवघेणा होता. अक्राणी तालुक्यातील केलापाणी गावाला रस्ता नसल्याने रुग्णहिका पोहचू शकत नसल्याची परिस्थिती आहे. प्रशासनाला वारंवार याबाबत तक्रारी करून निवेदन देऊनही त्याचा उपयोग झालेला नाही.
byte - स्थानीक नागरिक
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report
Mumbai, Maharashtra:
Anchor
शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समिती देखील पाच जुलै रोजी होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. यासोबतच कृती समितीकडून 29 जून शासन निर्णयाची होळी केली जाणार आहे आणि सात जुलै च्या धरणे आंदोलनावर देखील कृती समिती ठाम आहे. राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर कृती समिती देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. सरकार हे एका आंदोलनामुळे बदलणार नाही त्यामुळे आमची ही दोन आंदोलने आम्ही रद्द करणार नसल्याचं कृती समितीचे दीपक पवार यांच्याकडून सांगण्यात आलं
बाईट. दीपक पवार
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2706ZT_JALNA_PERNI(2 FILES)
जालना | पीकपाणी| जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 30 हजार 679 हेक्टरवर खरीप हंगामातील पेरणी पूर्ण
दडी मारलेल्या पावसाने पुनरागमन केल्याने पिकांना मिळाला दिलासा...
अँकर | जालना जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 30 हजार 679 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरणी पूर्ण झालीय. जिल्ह्यात यंदा 6 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचं नियोजन करण्यात आलय.यापैकी आतापर्यंत 4 लाख 30 हजार 679 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झालीय.जालना जिल्ह्यात मागील 10 दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट घोंघावत होतं. मात्र, दडी मारलेल्या पावसानं पुनरागमन केल्यानं पेरणी झालेल्या खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे.त्यामुळे शेतकरी सुखावलाय.
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File2:2706ZT_WSM_CROPS_DAMAGE_WKT121
WSM_CROPS_DAMAGE_SHOTS
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात जिल्ह्याच्या सर्व भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.यामुळे अनेक नदी-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली होती व काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती.गेल्या पंधरवड्यापासून गायब झालेल्या पावसाने दोन पासून जोरदार आगमन करत वातावरणात गारवा निर्माण केला.या पावसामुळे आधीच पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, मात्र दुसरीकडे, मालेगाव, वाशिम आणि रिसोड तालुक्यांमध्ये या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे.त्यामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने खरीपाच्या सोयाबीन,तूर, उडीद, हळद,मूग या पिकासह फळबागाचे मोठे नुकसान झाले असून, रिसोड तालुक्यातील उतावळी कांच,खारोळ व पैनगंगा या नद्यांचे पात्र फुटून रुद्ररूप धारण केल्याने नदीकाठाच्या हजारो हेक्टर ठिकाणी जमिनीसह पिके खरडून गेली परिणामी शेतकरी हताश झाले आहेत.त्यामुळे गरज आहे या शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकारने खंबीरपणे उभे राहुन आर्थिक मदत देण्याची या परिस्थितीचा थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे..
0
Share
Report