Back
शालेय शिक्षण अभ्यास समितीचा मोर्चा: काय आहे कारण?
Mumbai, Maharashtra
Anchor
शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समिती देखील पाच जुलै रोजी होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. यासोबतच कृती समितीकडून 29 जून शासन निर्णयाची होळी केली जाणार आहे आणि सात जुलै च्या धरणे आंदोलनावर देखील कृती समिती ठाम आहे. राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर कृती समिती देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. सरकार हे एका आंदोलनामुळे बदलणार नाही त्यामुळे आमची ही दोन आंदोलने आम्ही रद्द करणार नसल्याचं कृती समितीचे दीपक पवार यांच्याकडून सांगण्यात आलं
बाईट. दीपक पवार
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2706ZT_CHP_BJP_PRAWESH
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपुरात कॉंग्रेसच्या माजी महिला जिल्हा अध्यक्षा नंदा अल्लुरवार यांचा भाजपमध्ये प्रवेश, आ. जोरगेवार आणि आ. भांगडीया यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश
अँकर:-- कॉंग्रेसच्या माजी महिला जिल्हा अध्यक्षा नंदा अल्लुरवार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार किर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या उपस्थितीत नंदा अल्लुरवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नंदा अल्लुरवार माजी मंत्री स्व. वामनराव गड्डमवार यांची कन्या असून त्यांच्या घराण्याचा जिल्ह्यातील राजकारणात ठसा आहे. त्या तीस वर्षांहून अधिक काळ चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक राहिल्या असून सहकार , महिला विकासात आणि सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे. शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कार्यरत असताना त्यांनी संघटना मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. भाजपात राहून लोकांसाठी अधिक चांगले योगदान देता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बाईट १) नंदा अल्लूरवार, भाजप नेत्या
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Oros, Maharashtra:
अँकर ---- २६ ते २८ जून पर्यंत समुद्रात ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असून साडेचार ते पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याने किनारपट्टी भागातील नागरिकांना हवामान खात्याने सावधानतेचा इशारा दिला आहे. समुद्र खवळलेला असल्याने समुद्राच्या लाटा जोराने उंच उंच उसळत असून कुणकेश्वर मंदिर नजीकच्या संरक्षण भिंतीचे सिमेंट कोसळत असल्याने संरक्षक भिंतीला धोका निर्माण झालाय. तर दुसरीकडे उधानामुळे मळई खाडीच्या पाणीपात्रात वाढ झाल्याने खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात पाणी उसळत आहे याचा या मार्गाने जाणाऱ्या वाहनांना अडथळा ठरत आहे.
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
27062025
Slug - PPR_AMBULANCE_DRIVER
feed on 2c
file 01
----
Anchor - आषाढी वारीच्या तोंडावर पंढरपुरातील शासनाच्या 108 रुग्णवाहिकेच्या चालक आणि डॉक्टरांनी काम बंद करून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. समान वेतन समान काम या तत्त्वावर 108 रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांना सेवा सुविधा पुरविण्यात याव्या. जुन्या जीर्ण गाड्यांऐवजी नव्या रुग्णवाहिका द्याव्यात. अशा अनेक मागण्यासाठी रुग्णवाहिकेचे डॉक्टर आणि कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. आषाढी मध्ये पंधरा लाख भाविक येतात. अशा परिस्थितीत येणाऱ्या भाविकांमध्ये आपात्कालीन व्यवस्थेसाठी रुग्णवाहिकेची गरज असते. मात्र आता 108 रुग्णवाहिका चे डॉक्टर आणि चालक संपावर गेले तर प्रशासनाची मोठी डोकेदुखी वाढणार आहे.
0
Share
Report
Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग ब्रेकींग
वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली जवळील कावळेसाद पॉईंटवर कोल्हापूर येथील युवक खोल दरीत कोसळला.
रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी गेला असता पाय घसरून पडल्याचा अंदाज.
सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल
सोबत असलेल्या युवकांची पोलिसांकडून चौकशी.
घटनास्थळी दाट धुके तसेच मोबाईल रेंज नसल्यामुळे मदतकार्य अडचणी.
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2706_BHA_RAIN
FILE - 3 VIDEO
भंडाऱ्यात पावसाची हजेरी....शेतीकामाला वेग आल असून शेतीसाठी पाऊस ठरणार पूरक
Anchor ;- आज सकाळपासूनच भंडारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीकामांना वेग आले आहे तर हा पाऊस शेतीला पूरक ठरणारा आहे या आजच्या जोरदार पावसामुळे शेतकरी सुखावला असून वातावरणात गारवा निर्माण झाल्यावर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
0
Share
Report
Oros, Maharashtra:
अँकर --- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राणजीवन सहयोग संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये तब्बल ५ हजार रेनकोट वाटप करण्यात येणार आहेत. प्राणजीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या माध्यमातून त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ जिल्ह्यात पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलाना रेनकोट वाटप करण्यात येत असून संदीप चौकेकर हे राबवत असलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहेत.
0
Share
Report
Buldhana, Maharashtra:
सख्ख्या भावाने मित्रांच्या मदतीने केला भाऊ आणि वाहिनीवर जीवघेणा हल्ला...
मारहाणीचा सीसीटीव्ही आला समोर, हतेडी बुद्रुक गावातील घटना, तिघांवर गुन्हा दाखल...
Anchor - सख्ख्या भावानेच दोन मित्राच्या मदतीने आपल्या भाऊ आणि वहिनीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुलढाणा तालुक्याच्या हतेडी बुद्रुक येथे घडली आहे, पती-पत्नी शेतात जाण्यासाठी रस्त्यावर उभे असताना अचानक आलेल्या तिघांनी मारहाण सुरू केली, ज्यामध्ये एकजण गंभीरित्या जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत, या प्रकरणी तीनही आरोपी विरोधात बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे, जुन्या वादातून ही मारहाण झाल्याच बोलल जात आहे, अधिकचा तपास पोलीस करत आहेत...
0
Share
Report
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलाचा दमदाटी करतानाचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल
- बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलाचा दमदाटी करतानाचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल
- माजी आमदार राजेंद्र राऊत यांचा मुलगा रणवीर राऊतचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ आला समोर
- गाडीला कट लागल्याच्या कारणावरून झाली बाचाबाची
- व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल होताच रणवीर राऊत यांनी व्हिडिओ बाबत दिले स्पष्टीकरण
बाईट -
रणवीर राऊत ( बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे सुपुत्र )
0
Share
Report
Buldhana, Maharashtra:
पैनगंगेच्या कालव्याला 'मुक्ती' मिळाली, पण शेतकऱ्यांचा 'विकास' वाहून गेला!
Anchor - मेहकर तालुक्यातील पैनगंगा नदीच्या मुख्य कालव्याने आज प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचा अक्षरशः पाणउतारा केला. कालवा फुटल्याने शेकडो हेक्टरवरील उभ्या पिकांची नासाडी झाली असून, या भीषण नुकसानीला कारण ठरला आहे एक बंद नाला! शेतकऱ्यांच्या मते, कालव्यातील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी असलेला नाला बंद असल्याने हा जलप्रलय ओढवला. म्हणजे, कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचे दावे करणाऱ्या प्रशासनाला एक साधा नाला मोकळा ठेवता येत नाही, यावर आता हसावं की रडावं हेच कळेनासं झालं आहे. या अनास्थेमुळे अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून गेली असून, दुबार पेरणीची शक्यता आता शून्य आहे. एकीकडे सरकार 'आत्मनिर्भर' भारताचे नारे देते, तर दुसरीकडे त्यांच्याच बेफिकिरीमुळे शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त होत आहे. पेरणीसाठी केलेला खर्च आणि मेहनत वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
विशेष म्हणजे, हा अनर्थ टळू शकला असता. शेतकऱ्यांनी अनेकदा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संभाव्य धोक्याची कल्पना दिली होती. पण, नेहमीप्रमाणे 'ऐकतोय, करतोय' अशा आश्वासनांच्या पलीकडे काहीच झाले नाही. 'साहेबांना मोठे कामे असतात, शेतकऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष द्यायला वेळ कुठाय?' अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. आज उशिरा, जेव्हा पाणी बांधावरून नाही तर डोक्यावरून गेले, तेव्हा अधिकारी महोदय शेतकऱ्यांच्या बांधावर अवतरले. अर्थात, ही केवळ औपचारिकता होती. संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. "आता काय पाहणी करायला आलात? जेव्हा वेळ होती, तेव्हा साधा फोन पण उचलला नाहीत!" असे प्रश्न विचारत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. यावर अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे 'चौकशी करू' आणि 'सरकार मदत करेल' यांसारखी पोकळ आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
0
Share
Report
Chakan, Maharashtra:
Feed 2C
Slug: Chakan Traffic
File:02
Rep: Hemant Chapude(Chakan)
*ब्रेक*
*चाकण/पुणे*
* पुणे नाशिक महामार्गावरील चाकण येथे मोठी वाहतूक कोंडी
* चाकण ते चिंबळी दरम्यान पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा
* सिग्नल यंत्रणा , ट्रॅफिक पोलिस आणि वॉर्डन नसल्याने मोठी वाहतूक कोंडी
* गेल्या पाच तासांपासून मोठी वाहतूक कोंडी
* वाहतूक कोंडी मुळे वाहन चालक आणि प्रवाशांना मोठा मनःस्ताप
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया चाकण पुणे...
0
Share
Report