Back
नंदुरबार: रुग्णाला झोळीमध्ये रुग्णालयात नेण्याचा जीवघेणा प्रवास!
Dhule, Maharashtra
ANCHOR - नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा च्या डोंगर रांगांमध्ये निसर्गाने आरोग्य विभागाचे वाभाडे चव्हाट्यावर आणले आहेत. सातपुडा डोंगर रांगांमध्ये असलेल्या केलापानी येथून एका रुग्णाला बाबू ची झोळी करून तब्बत 3 ते 4 तासांची जंगलातून वाट काढत रुग्णालयात आणावे लागले. केलापाणी गावातील रतीलाल पारता पाडवी या 30 वर्षीय आदिवासी बांधवला बांबूच्या झोळीतून रुग्णालयात घेऊन जाण्याची नातेवाइकांवर वेळ आली. दुर्दैवाची बाब म्हणजे हा रुग्ण केल्या काही दिवसांपासून आजारी होता. मात्र पूर परिस्थितीमुळे रस्ते बंद असल्याने आणि रुग्णवाहिका येऊ शकत नसल्यामुळे तो तशाच स्थितीत घरी पडून होता. शेवटी स्थानिकांनी त्याला झोळीमध्ये आणत रुग्णालयात दाखल केले. ऐन पावसाळ्यात रुग्णाला घेऊन 15 ते 20 किलोमीटरची जीवघेणी पायपीट स्थानिलांना करावी लागली. उंच डोंगरावरून चिखलातून वाट काढत जंगलातून हा प्रवास जीवघेणा होता. अक्राणी तालुक्यातील केलापाणी गावाला रस्ता नसल्याने रुग्णहिका पोहचू शकत नसल्याची परिस्थिती आहे. प्रशासनाला वारंवार याबाबत तक्रारी करून निवेदन देऊनही त्याचा उपयोग झालेला नाही.
byte - स्थानीक नागरिक
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलाचा दमदाटी करतानाचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल
- बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलाचा दमदाटी करतानाचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल
- माजी आमदार राजेंद्र राऊत यांचा मुलगा रणवीर राऊतचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ आला समोर
- गाडीला कट लागल्याच्या कारणावरून झाली बाचाबाची
- व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल होताच रणवीर राऊत यांनी व्हिडिओ बाबत दिले स्पष्टीकरण
बाईट -
रणवीर राऊत ( बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे सुपुत्र )
0
Share
Report
Buldhana, Maharashtra:
पैनगंगेच्या कालव्याला 'मुक्ती' मिळाली, पण शेतकऱ्यांचा 'विकास' वाहून गेला!
Anchor - मेहकर तालुक्यातील पैनगंगा नदीच्या मुख्य कालव्याने आज प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचा अक्षरशः पाणउतारा केला. कालवा फुटल्याने शेकडो हेक्टरवरील उभ्या पिकांची नासाडी झाली असून, या भीषण नुकसानीला कारण ठरला आहे एक बंद नाला! शेतकऱ्यांच्या मते, कालव्यातील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी असलेला नाला बंद असल्याने हा जलप्रलय ओढवला. म्हणजे, कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचे दावे करणाऱ्या प्रशासनाला एक साधा नाला मोकळा ठेवता येत नाही, यावर आता हसावं की रडावं हेच कळेनासं झालं आहे. या अनास्थेमुळे अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून गेली असून, दुबार पेरणीची शक्यता आता शून्य आहे. एकीकडे सरकार 'आत्मनिर्भर' भारताचे नारे देते, तर दुसरीकडे त्यांच्याच बेफिकिरीमुळे शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त होत आहे. पेरणीसाठी केलेला खर्च आणि मेहनत वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
विशेष म्हणजे, हा अनर्थ टळू शकला असता. शेतकऱ्यांनी अनेकदा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संभाव्य धोक्याची कल्पना दिली होती. पण, नेहमीप्रमाणे 'ऐकतोय, करतोय' अशा आश्वासनांच्या पलीकडे काहीच झाले नाही. 'साहेबांना मोठे कामे असतात, शेतकऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष द्यायला वेळ कुठाय?' अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. आज उशिरा, जेव्हा पाणी बांधावरून नाही तर डोक्यावरून गेले, तेव्हा अधिकारी महोदय शेतकऱ्यांच्या बांधावर अवतरले. अर्थात, ही केवळ औपचारिकता होती. संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. "आता काय पाहणी करायला आलात? जेव्हा वेळ होती, तेव्हा साधा फोन पण उचलला नाहीत!" असे प्रश्न विचारत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. यावर अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे 'चौकशी करू' आणि 'सरकार मदत करेल' यांसारखी पोकळ आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
0
Share
Report
Chakan, Maharashtra:
Feed 2C
Slug: Chakan Traffic
File:02
Rep: Hemant Chapude(Chakan)
*ब्रेक*
*चाकण/पुणे*
* पुणे नाशिक महामार्गावरील चाकण येथे मोठी वाहतूक कोंडी
* चाकण ते चिंबळी दरम्यान पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा
* सिग्नल यंत्रणा , ट्रॅफिक पोलिस आणि वॉर्डन नसल्याने मोठी वाहतूक कोंडी
* गेल्या पाच तासांपासून मोठी वाहतूक कोंडी
* वाहतूक कोंडी मुळे वाहन चालक आणि प्रवाशांना मोठा मनःस्ताप
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया चाकण पुणे...
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
*
अँकर:-
नाशिक शहरातील नांदुरनाका येथे रस्त्यावर पीक अप गाडीचा अपघात झाला. या परिसरातून मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा जात असताना त्यांनी तातडीने आपला ताफा थांबविला. यावेळी ताफ्यातील पोलिस कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघात ग्रस्त वाहकाला गाडीतून बाहेर काढले. तसेच तातडीने गाडी बाजूला करण्यात आली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी अपघात ग्रस्त वाहकाची विचारपूस केली. यावेळी पोलिसांच्या मदतीने संपूर्ण वाहतूक सुरळीत करण्यात आली.
0
Share
Report
Palghar, Maharashtra:
पालघर - बोईसर मध्ये खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार पैकी तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे . मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुरज यादव , धीरज यादव , अंकित गुप्ता अशी या मृत अल्पवयीन मुलांची नाव असून बोईसर मधील गणेश नगर परिसरात असलेल्या खाजगी जागेतील खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडल्याचा समोर आला आहे . दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली . गणेश नगर परिसरातील झोपडपट्टीत राहणारी चार शाळकरी मुले दुपारच्या सुमारास भिंत ओलांडून घराच्या पाठीमागील असलेल्या मोकळ्या जागेतील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेली . मात्र पोहताना यापैकी तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला असून एका मुलाला पाण्याबाहेर निघण्यास यश मिळाल . या घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस आणि तारापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोचून खड्ड्याने भरलेल्या पाण्यातून तीन मुलांचे मृतदेह बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी बोईसर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत .
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - शक्तीपीठ महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी धरली रोखून,अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या मध्ये वादा-वादा..
अँकर - शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातल्या तिसंगी येथे रोखून धरण्यात आले आहे,मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या सोबत शेतकऱ्यांचा वादावादीचा प्रकार देखील घडला आहे. सकाळपासून प्रशासनाचे अधिकारी पोलीस पाऊस फाटा घेऊन मोजणीसाठी तिसंगी मध्ये तळ ठोकून आहेत,मात्र शेतकऱ्यांकडून विरोध दर्शवण्यात आला आहे.कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी होऊ देणार नाही,अशी भूमिका शेतकऱ्यांकडून घेण्यात आली आहे.त्यामुळे तिसंगी मध्ये शासकीय अधिकाऱ्यांना सकाळपासून थांबून राहावे लागत आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्यपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे,अशी भूमिका शेतकऱ्यांकडून घेण्यात आली आहे.
बाईट - दिगंबर कांबळे - नेते - शक्तिपीठ विरोधी महामार्ग कृती समिती,सांगली.
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_RINGAN
सातारा - संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण तरडगाव येथील चांदोबाचा लिंब या ठिकाणी पार पडले. मात्र यावेळी मंदिरापासून तब्बल अर्धा किलोमीटर पुढे या वारीचे रिंगण पार पडल्यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली.दिंडींमध्ये मधील पडलेल्या अंतरामुळे दरवर्षी चांदोबाच्या लिंब या मंदिरा समोर होणारे उभे रिंगण अर्धा किलोमीटर लांबल्यामुळे वारकऱ्यांसह प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.दोन उभ्या रिंगणातून धावणारा झेंडा घेतलेला अश्व हे या रिंगणाचे वैशिष्ट असते.या रिंगणावेळी वारकरी रस्त्याचा दोन्ही बाजूला उभे राहतात आणि मग अश्व या वारकऱ्यांच्या मधोमध धावतो.धावलेल्या अश्वाच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी होते.
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2706ZT_CHP_CONG_MORCHA_1
( single file sent on 2C)
टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचा मोर्चा, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती
अँकर -शेतकरी, शेतमजूर तसेच संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ब्रह्मपुरी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा निघाला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून मोर्चाला सुरुवात झाली.या मोर्चातून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी देणे, शेतकऱ्यांचा बोनस आठ दिवसांत जमा करणे, तसेच निराधारांच्या थकीत मानधनाचे तातडीने वितरण करणे या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.यावेळी बोलताना आमदार वडेट्टीवार यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. हे सरकार उद्योगपतींचे असून सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोप त्यांनी केला.
बाईट १) आ. विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
Nsk_nasikpolitics
Feed by 2C and mojo
Anchor नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे आता जोर धरू लागले आहेत. 2025 च्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. नेत्यांचे पक्षांतर, नव्या आघाड्या आणि प्रभाग रचनेतील बदल यामुळे नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
Vo 1 नाशिक उभाठा गटाचे हे आहेत विलास शिंदे.... सध्याचे महानगर प्रमुख असलेले विलास शिंदे आता आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त करू लागले आहेत... नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसाची निमित्त आयोजित केलेल्या मिसळ पार्टीमध्ये राजकीय पक्षांतर करण्याची वेळ आली असल्याचं आग्रह त्यांना केलाय...माजी शिवसेना नेते सुधाकर बडगुजर, माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप आणि माजी महापौर अशोक मूर्तडक यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी भाजप प्रवेश केलाये. तर दुसरीकडे, ठाकरे गटाला मोठा धक्का देत महानगरप्रमुखांसह आठ माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता विलास शिंदे सुद्धा नाराजी व्यक्त करत शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत
Byte 1 विलास अण्णा शिंदे नाराज महानगरप्रमुख उबाठा सेना ( सकाळी वन टू वन मध्ये पाठवला आहे)
Vo 2 यामुळे नाशिक शहरात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील स्पर्धा तीव्र झाली आहे. प्रभाग रचनेत बदल आणि सत्तेची समीकरणे यामुळे नेते आपली पावले जपून टाकत आहेत. उभाठा गटाने मात्र पक्षांतर करणारे संधी साधू नेते असल्याचे आरोप करत आम्ही भक्कम असल्याचा दावा केला आहे
Byte दत्ता गायकवाड ज्येष्ठ नेते डीजे सूर्यवंशी जिल्हाप्रमुख उबाठा सेना
gfxनाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. 11 ते 16 जून 2025 दरम्यान प्रगणक गट तयार झाले असून, 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल.
vo 3 मात्र, या प्रभाग रचनेवरून महायुतीतच अंतर्गत कलह दिसून येत आहे. आपले भवितव्य सुरक्षित करण्यासाठी उभाटा गटाचे आणि महायुतीतील काही अजून काही नेते भाजपा सेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. . भाजप स्थानिक पातळीवर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतेय. भाजप आणि शिंदे गटात प्रभाग रचनेवरून रस्सीखेच सुरू असून, स्थानिक पातळीवर भाजप स्वबळावर निवडणूक लढवावी अशी स्थानिकांची इच्छा आहे
Byte सुनील केदार शहराध्यक्ष भाजपा
देवयानी फरांदे आमदार भाजपा ( या दोघांपैकी एक बाईट बीजेपी बाईट नावाने लाईव्ह युने मिळेल )
Vo 4 नाशिक महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नसून, राज्यातील राजकीय ताकदीची कसोटी आहे. बदलत्या राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक आणखी रंगतदार होणार आहे.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
डोंबिलीतून मुंबईच्या मोर्चासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसे एकत्र निघणार..
Anc..डोंबिवलीच्या पलावा ब्रिज च्या आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे पक्षाकडून एकत्र येत मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात आले होते याची चर्चा संपूर्ण राज्यांमध्ये झाल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत पाच तारखेला हिंदी भाषा संक्ती विरुद्ध आणि मराठीच्या अस्मितेसाठी मोठो ना भविष्य असा मोठा असा मोर्चा निघणार आहेत या मोर्चासाठी डोंबिवलीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते हे एकत्र निघणार आहे
Vo..महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा मोर्चा मुंबई मध्ये होतोय तो मोर्चा ऐतिहासिक मोर्चा असणार आहे आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे मराठीच्या अस्मितेसाठी आणि हिंदी सक्तीच्या एकत्र आल्याने एक वेगळा आनंद प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे मी हा मोर्चाला भविष्य असा मोर्चा मुंबईमध्ये ठरेल अशी अपेक्षा प्रत्येक मराठी माणसाला आहे साहेबांनी जे पत्र दिलेले आहे ते पत्र डोंबिवली मधील मराठी कलाकार डॉक्टर वकील की सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना उद्धव ठाकरे यांचे पत्र पोचणार आणि मोठ्या संख्येने लोक या मोर्चासाठी सहभागी होतील मनसे नेते व माजी आमदार राजू पाटील ला देखील आम्ही आव्हान करणार आहे की आमच्याबरोबर एकत्र लोकलचा प्रवास करत मुंबईला यावे आणि मोर्चे सहभागी व्हावे
Byte.. दीपेश म्हात्रे
जिल्हा प्रमुख
0
Share
Report