Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422303

नाशिकच्या निफाडमध्ये 5000 हेक्टर शेती नापिक, शेतकऱ्यांचे संकट गडद!

Sudarshan Khillare
Jul 06, 2025 01:31:44
Niphad, Maharashtra
*निफाड (नाशिक) ब्रेकिंग.....* - पाच हजार हुन अधिक हेक्टर शेती नापीक... - पावसाचे व नांदूर मधमेश्वर डाव्या व एक्सप्रेस कालव्याच्या पाण्याच्या गळतीचा परिणाम.... - कोळगाव, रुई, देवगाव, खेडले झुंगे आणि वाकद या पाच गावातील हजार ते बाराशे शेतकरी अडचणीत... - 2 लाख रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्याची मागणी... - कालव्याचे पाणी गळती कायम स्वरूपी थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी... - पाटबंधारे विभागाने तातडीने निर्णय न घेतल्यास आमरण उपोषण, विधिमंडळ समोर आत्मदहन चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा... - कोळगाव येथील सरपंच न्यायालयात पाटबंधारे विभागाच्या विरोधात जाणार... स्लॅग :निफाड तालुक्यातील पाच गावातील पाच हजार हुन अधिक शेती पाण्यामुळे नापिक... हेक्टरी दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी... अँकर :- नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाचा डावा व एक्सप्रेस कालव्याच्या गळती व पावसाच्या पाण्यामुळे कोळगाव, रुई, देवगाव, खेडले झुंगे आणि वाकद या पाच गावातील तब्बल पाच हजारहून अधिक हेक्टरावरील शेती नापिक झाली आहे यामुळे हजार ते पंधराशे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा घेतलेले कर्ज कसे काढावे त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून दोन लाख रुपये हेक्टर नुकसान भरपाई देत या पाण्याचा कार्यकर्ती प्रश्न निकाली काढावा अशी मागणी केली आहे यावर आठ दिवसात निर्णय न झाल्यास या दोन्ही काव्याच्या मध्यभागी आमरण उपोषण आंदोलन करू यावरच न थांबता विधिमंडळा अधिवेशन सुरु असून त्याठिकाणी आत्मदाहन करण्याचा ही इशारा दिला तर कोळगाव येथील सरपंच थेट न्यायलयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगत आहे बाईट :- 01 निवृत्ती गारे (जिल्हाध्यक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक) बाईट :- 02 शांताराम जाधव (सरपंच, कोळगाव)
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement