Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812

समुद्रात ५० किमी वेगाने वारे, किनारपट्टीवर सावधगिरीचा इशारा!

Umesh Parab
Jun 27, 2025 14:30:44
Oros, Maharashtra
अँकर ---- २६ ते २८ जून पर्यंत समुद्रात ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असून साडेचार ते पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याने किनारपट्टी भागातील नागरिकांना हवामान खात्याने सावधानतेचा इशारा दिला आहे. समुद्र खवळलेला असल्याने समुद्राच्या लाटा जोराने उंच उंच उसळत असून कुणकेश्वर मंदिर नजीकच्या संरक्षण भिंतीचे सिमेंट कोसळत असल्याने संरक्षक भिंतीला धोका निर्माण झालाय. तर दुसरीकडे उधानामुळे मळई खाडीच्या पाणीपात्रात वाढ झाल्याने खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात पाणी उसळत आहे याचा या मार्गाने जाणाऱ्या वाहनांना अडथळा ठरत आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement