Back
पालघरच्या मुलांचा जीवघेणा प्रवास: टायर ट्यूबवर शाळेत जाण्याची कथा!
Palghar, Maharashtra
Anchor
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील म्हसे गावात टायर ट्यूबवर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीवघेणी कसरत या करावी लागते . एका टायरच्या ट्यूबवर पाच मुले बसून नदी मधून जीव घेणा प्रवास करतात.
vo _1
मुलांच्या डोक्यावर दप्तर, एका हातात शाळेचा ड्रेस , पडत असलेल्या पावसात भिजत असलेली दप्तरातील पुस्तके, वाहत्या नदीतून तो जीवघेणा प्रवास, त्या मुलांना सुखरूप पोहचविण्यासाठी पालकाची होणारी नदीच्या प्रवाहातील दमछाक , हे पाहल्यानंतर आमची प्रशासकीय यंत्रणा इतकी खिळखिळी झाली आहे का ? या मुलांचे काही बरेवाईट झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेला पान्हा फुटेल का? असा प्रश्न येथील गावकरी प्रशासनाला करीत आहेत. विक्रमगड तालुक्यातील म्हसे गावातून पिंजाळ नदी पार करून टायर ट्यूबवर हि मुले वाकी या गावातील शाळेत येतात. दरवषी आदिवासी ग्रामीण भागात हजारो कोटी रुपये खर्च होतात. तरी पण आम्हला शिक्षण ,आरोग्य ,पाणी या समस्या ला सामोरे जाताना जो आज संघर्ष करावा लागतो हा संघर्ष आमच्या पाचवीलाच पुजलेल्या आहे का हा प्रश्न आम्हला पडतो.
बाईट -विध्यार्थी
बाईट -पालक
vo 2 -म्हसे गावातून पिंजाळ नदी पार करून टायर ट्यूबवर हि मुले वाकी या गावातील शाळेत येतात.रोज कपडे भिजत असल्याने सोबत एक ड्रेस आणून मग पुन्हा शाळेचा ड्रेस घालून हि मुले शाळेत पोहचतात . हा जीवघेणा प्रवास या मुलांना करावा लागतो टायर ट्यूब सोबत पालक मुलांना नदी किनारी सोडून पुन्हा टायर घरी नेतात पुन्हा संध्यकाळी मुलाची नदी किनारी वाट पाहतात मुलाचा आवाज आला कि मग टायर ट्यूब घेऊन मुलांना घेण्यासाठी येतात . सरकारने यांची पुलाची मागणी पूर्ण करावी आणि हा जीवघेणा प्रवास थांबवावा अशी या आदिवासी गावकऱ्यांची मागणी आहे.
हर्षद पाटील झी मीडिया पालघर.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement