Back
निलेश लंके ने लोणीकर को दिया चेतावनी, किसानों की माफी जरूरी!
Pune, Maharashtra
रिपोर्टर - लैलेश बारगजे
स्लग:- निलेश लंके
फीड 2C
निलेश लंके ऑन बबनराव लोणीकर
अँकर:-भाजपच आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्यावर खासदार निलेश लंके यांनी निशाणा साधला आहे. हा सत्तेचा माज आणि सत्तेची मस्ती असल्याचं लंके यांनी म्हटलं आहे... लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही असा इशारा बबनराव लोणीकरांना खासदार लंकेने दिलाय...
बाईट:- निलेश लंके, खासदार राष्ट्रवादी SP
निलेश लंके ऑन मराठी भाषा ऑन ठाकरे बंधू
अँकर:- हिंदी भाषा सक्ती आणि ठाकरे बंधू यांच्या एकत्र येण्यावरून खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठी ही मातृभाषा असून मराठीला प्राधान्य दिल्यास पाहिजेत असं वक्तव्य निलेश लंके यांनी केला आहे. तर मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं महाराष्ट्रात मिटींग होत आहे तर मराठी बोललं पाहिजे असं लंके यांनी म्हटलं आहे. तर ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे असं मत निलेश लंके यांनी व्यक्त केला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकच अजेंडा असून मराठी हा अजेंडा असून या अजेंडा खाली एकत्र आलेच पाहिजे असं खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय.
बाईट:- निलेश लंके, खासदार SP
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग ---- मंत्री उदय सामंत byte पॉईंटर
On जागा वाटप -- आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी 60 टक्के जागांची मागणी केल्यानंतर मी त्यांना असं म्हणालो कि संघटना एवढी मजबूत करा कि आपण 80 टक्के जागा मागू महायुतिच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजितदादा ठरवतील इथल्या जागा वाटपाबाबत नारायण राणे निर्णय घेतील
on 100 टक्के शिवसेना -- भाजपाला आम्ही दोष देत नाही. संघटना वाढीबाबत जी त्यांची भूमिका आहे तीच भूमिका आमची आहे. महायुती म्हणून निवडणुका लढविण्याचे अधोरेखित झालंय. मात्र आपला पक्ष दखल घेण्याऐवढा असावा अशी आमची भूमिका आहे
on दावा --- महायुतीचा मेळावा म्हणून आम्ही 70 टक्के आहोत आमचे आमदार जास्त आहेत असं आम्ही बोललो मात्र निवडणुका महायुती म्हणूनच लढविल्या जाणार. महायुतीची सत्ता जिल्हापरिषद वर येईल
on मोर्चा ( उद्याच्या विजयाची नांदी संजय राऊत वक्तव्य ) -- संजय राऊत यांनी असं अनेक वेळा भविष्य सांगितलं आहे. अनेक गोष्टी त्यांनी ठरविलेल्या त्यांची भाकीत खरं झाली नाहीत. हे सुद्धा होणार नाही.
काही लोक एकत्र आली म्हणजे संघटनेची बांधनी होत असं नाही
on स्थानिक स्वराज्य निवडणुका परिणाम --- आम्ही युती करत आहोत असं कुठलेही ठाकरे बोलले नाहीत.
On मोर्चा -- हिंदीची सक्ती करावी हा अहवाल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारला होता. उबाठा च्या लोकांनी उत्तर द्यावे कि आतां हिंदी नको तर तेव्हा अहवाल का स्वीकारला उबाठाची ही दुटप्पी भूमिका आहे.
On आदित्य ठाकरे -- तीन वर्षपूर्वीच्या सत्ता गेल्याच्या तणावातुन हे लोक बाहेर आलेले नाहीत. आमच्यावर टीका करणं हा त्यांचा उद्योग बनला आहे. मुलांचं नुकसान होणार नाही आमचं सरकार त्यांची काळजी घेईल. आम्हाला कोणाच्या प्रमाणपत्राची आवश्यक नाही. 35 टक्के सुद्धा मार्क न पडलेल्यांनी स्वतःची दखल घ्यावी
on मोर्चा --- मुख्यमंत्री असताना ज्यांनी हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला तेच आज मोर्चात सहभाग घेत असतील तर हे जगातील आठव आश्चर्य आहे.
On विनय नातू --- त्यांच्या वर आमचे जिल्हाप्रमुख बोलतील त्यांच्यावर मी बोललो तर ते राष्ट्रीय नेते होतील.
On कौशल्य विकास ( पगार ) --- कौशल्य विकास मंत्र्यांसोबत चर्चा झालीय. येत्या 15 दिवसात निर्णय होईल
byte --- मंत्री उदय सामंत
0
Share
Report
Palghar, Maharashtra:
slug _ विजेचा शॉक लागून बोईसर मध्ये चार वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू .
पालघर _
विजेचा शॉक लागून बोईसर मध्ये चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय .बोईसर च्या सिद्धार्थ नगर परिसरातील घटना आहे . चार वर्षीय रविकांत यादव या चिमुकल्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालाय. घरात खेळत असताना शॉक लागुण मृत्यू झालाय. दरम्यान या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
Share
Report
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - श्री संत गजानन महाराजांच्या दिंडी सोबत आलेल्या वारकऱ्यांच्या मुक्कामाची उळेगावात करण्यात आली विशेष व्यवस्था ( WKT )
- वारकरी सांप्रदायातील शिस्तबद्ध दिंडी म्हणून ओळख असणाऱ्या संत गजानन महाराज महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल
- दक्षिण सोलापुर तालुक्यातील उळे गावात वारकरी, टाळकरी, सेवेकरांच्या राहण्यासाठी विशेष व्यवस्था
- श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोबत आलेल्या वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी वॉटरप्रूफ तंबूची व्यवस्था
याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी....( WKT )
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
डोंबिवलीत भाजपमधील राजीनाम्यानंतर बॅनरबाजीचा धडाका,
दादा सांगतील ते धोरण, दादा बांधतील ते तोरण, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी....मात्रे समर्थकांचं शक्तिप्रदर्शन!
Anc.. डोंबिवलीत भाजप पक्षातून राजीनामा दिल्यानंतर माजी नगरसेवक विकास मात्रे आणि कविता मात्रे यांच्या समर्थकांनी जोरदार बॅनरबाजी करत शक्तिप्रदर्शन केलं आहे. डोंबिवली पश्चिमेतील विविध चौकांमध्ये पाठिंबा दर्शवणारे बॅनर लावण्यात!@ आले असून, “दादा सांगतील ते धोरण, दादा बांधतील ते तोरण, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी” असा ठळक मजकूर या बॅनरवर दिसत असून बॅनर बाजी करत समर्थकांनी भावनिक आणि ठाम संदेश देत पाठिंबा दर्शवला आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर मूठ बांधलेला हाताचे चिन्ह देऊन एकतेचं आणि संघटीत ताकदीचं प्रदर्शन करण्यात आलं आहे.
0
Share
Report
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- MLC सत्यजित तांबे
फीड 2C
सत्यजित ऑन भाषेच्या आडून राजकारण चुकीच
अँकर- हिंदी भाषेच्या आडून आणि मराठी भाषेच्या पुढून कोणी राजकारण करत असेल तर ते चुकीचं आहे. भाषा शिकण्याचे एक वय असतं लहान वयात अनेक भाषा शिकू शकतात त्या शिकवल्या पाहिजे मात्र त्यासाठी अनिवार्यता किंवा सक्ती नको अशी भूमिका विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हंटले आहे. विद्यार्थ्यांना भाषेसोबतच मूल्य शिक्षण दिले गेले पाहिजे असं त्यांनी म्हंटलं. हिंदी सक्तीच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित मोर्चा काढणार आहे याबाबत विचारले असता त्यांनी हे उत्तर दिलंय.
बाईट:- सत्यजित तांबे, आमदार विधानपरिषद
सत्यजित ऑन शालेय शिक्षण विभाग
अँकर:- अहिल्यानगर शहरातील सीताराम सारडा विद्यालयात आठवीतील विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून केला त्याबाबत विचारले असता हे शालेय शिक्षण विभागाचे अपयश असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हंटले आहे. पूर्वी शाळेत क्रीडा शिक्षक असायचा तो विद्यार्थ्यांना शिस्त लावायचा पण शिक्षण विभागाने क्रीडा शिक्षकांची भरतीच बंद केलीये त्यामुळे शिस्त लावणार तरी कोण? असा सवाल करत शिक्षण विभागाने आपले धोरण बदलायला हवे आणि विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण देणे गरजेचे असल्याचे तांबे यांनी म्हंटले आहे.
बाईट:- सत्यजित तांबे, आमदार विधानपरिषद
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
Anchor - उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचा आता जवळपास निश्चित झालेला आहे. धुळ्यात त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. बदल हवा आहे अशी कार्यकर्त्यांची मागणी असून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर मी लवकरच माझा निर्णय घेणार असल्याचं मत काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तसेच धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी नुकतीच भाजपाचे नेते व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली होती. त्यामुळे कुणाल पाटील हे भाजपा प्रवेश करत असल्याच्या चर्चा जोरात रंगल्या होत्या. दरम्यान मंत्री राहुल यांच्या भेटीनंतर कुणाल पाटील यांनी धुळ्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करत संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी कुणाल पाटील यांना विकासाच्या दृष्टिकोनातून बदल हवा असल्या तर सांगत त्यांच्या भाजपच्या बाबत पाठिंबा दर्शविला. दरम्यान आपण कार्यकर्त्यांशी चर्चा केली असून त्यांच्या भावनात जाणून घेतल्यानंतर निर्णय घेण्यासाठी वेळ मागून घेतला असल्याची प्रतिक्रिया कुणाल पाटील यांनी यावेळी दिली. भाजप प्रवेशाबाबत कुणाल पाटील यांनी स्पष्टपणे होकार दिला नसला तरी या मेळाव्यानंतर ते भाजपा जाणार असल्याचा आता स्पष्ट मानले जात आहे.
byte - कुणाल पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष, काँग्रेस
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यात श्री संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत (WKT)
अँकर : संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. शेगावहुन निघालेली गजानन महाराजांची पालखी आज सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली. सोलापूर जिल्ह्यातील उळे गावात जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम , अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह, आमदार सचिन कल्याणशेट्टी या सर्वानी महाराजांच्या पालखीचे स्वागत केले. उळे येथील ग्रामस्थांनी देखील महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केलेली होती. पालखी मार्गांवर गुलाबाच्या पायघड्या टाकून यावेळी स्वागत करण्यात आले.
आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी....
wkt : अभिषेक आदेप्पा, प्रतिनिधी
बाईट : आमदार सचिन कल्याणशेट्टी
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी जिल्ह्या मधून ही शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध होत असून आम्ही आमच्या जमिनी शक्तीपीठ महामार्गाला देणार नसल्याचा पवित्रा 31 गावच्या शेतकर्यांनी घेतलाय, आज पोखर्णी येथे 31 गावच्या निवडक शेतकरी पुढाऱ्यांची बैठक पार पडली. शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. या निर्णयाला या बैठकीत कडाडून शेतकऱ्यांनी विरोध केलाय,
0
Share
Report
Palghar, Maharashtra:
पालघर _
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रम शाळा वस्तीगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींची सुरक्षितता रामभरोसे असल्याचे पुन्हा एकदा समोर आलंय . डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गिरगाव आश्रम शाळेतील वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीची वस्तीगृहातच आत्महत्या केली आहे . नववीत शिकणाऱ्या पल्लवी शरद खोटरे या विद्यार्थिनीची वस्तीगृहाच्या पहिल्या मजल्यावरील लोखंडी रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . आत्महत्येच कारण अजूनही अस्पष्ट आहे. दरम्यान तलासरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2806ZT_CHP_DEER_DEATH
( single file sent on 2C)
टायटल:-- घनदाट जंगलातुन जाणारा बल्लारपूर- गोंदिया रेल्वेमार्ग ठरतोय वन्यजीवांसाठी कर्दनकाळ, गर्भवती मादी सांबराचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू, सतत होणारे वन्यजीवांच्या मृत्यूसंदर्भात शास्त्रीय पद्धतीने उपाययोजनांची गरज, हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी सदस्यांनी रेल्वे- वनविभाग आणि प्रशासनाला याकडे गांभीर्यानें लक्ष देण्याची केली मागणी
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील घनदाट जंगलातुन जाणारा बल्लारपूर- गोंदिया रेल्वेमार्ग वन्यजीवांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. लोहारा-जुनोना जंगलातून जाणाऱ्या रेल्वे रुळावर रकसोल एक्सप्रेसने आज रूळ ओलांडणा-या गर्भवती मादी सांबराला चिरडले. रेल्वेच्या धडकेने सतत होणा-या वन्यजीवांच्या मृत्यूसंदर्भात शास्त्रीय पद्धतीने उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी सदस्यांनी रेल्वे- वनविभाग आणि प्रशासनाला याकडे गांभीर्यानें लक्ष देण्याची मागणी केली आहे. या मार्गावर जास्त अपघात हे लोहारा ते मूल दरम्यान होतात. आता पुन्हा दुसरी रेल्वे लाईन टाकण्याचा प्रस्ताव रेल्वेने मंजूर केला आहे. वन्यजीवांचा हा भ्रमण मार्ग कसा सुरक्षित राहील याची चिंता वन्यजीवप्रेमींना पडली आहे. या जागी अशास्त्रीय पद्धतीने कुंपण तयार करण्यात आले आहे. ५ फुटांवरून सांबर, हरीण ,वाघ ,बिबट हे सहज उडी मारून जाऊ शकतात ,मग ह्या तुटपुंज्या योजना कुठल्या कामाच्या असा सवाल हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीने विचारला आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report