Back
महिला कीर्तनकार संगीता ताई पवार यांची हत्या: पोलिसांचा तपास सुरू!
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn murder update avb
Feed on 2 c
एका महिला कीर्तनकारची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना तालुक्यातील चिंचडगाव शिवारात शनिवार रोजी सकाळी साडे सहावाजेच्या सुमारास उघडकीस आली. हभप संगीता ताई अण्णासाहेब पवार वय 50 वर्षे राहणार चिंचडगाव असे घटनेतील मयत कीर्तनकार महिलेचे नाव आहे.या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितींनुसार हभप संगीता ताई पवार या चिंचडगाव येथील सदगुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रम येथे रहिवासास होत्या,शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिरातील पुजारी शिवाजी चौधरी हे नेहमीप्रमाणे मंदिरात पूजे साठी आले होते,त्यांनी हभप संगीता ताई पवार यांना आवाज दिला मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने मंदिरा शेजारी असलेल्या शेड मध्ये जाऊन बघितले असता त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या,यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच वीरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक, व फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले.उपविभागीय पोलिस अधिकारी फुंदे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहे.
Byte भागवत फुंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Dhule, Maharashtra:
Anchor - उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचा आता जवळपास निश्चित झालेला आहे. धुळ्यात त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. बदल हवा आहे अशी कार्यकर्त्यांची मागणी असून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर मी लवकरच माझा निर्णय घेणार असल्याचं मत काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तसेच धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी नुकतीच भाजपाचे नेते व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली होती. त्यामुळे कुणाल पाटील हे भाजपा प्रवेश करत असल्याच्या चर्चा जोरात रंगल्या होत्या. दरम्यान मंत्री राहुल यांच्या भेटीनंतर कुणाल पाटील यांनी धुळ्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करत संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी कुणाल पाटील यांना विकासाच्या दृष्टिकोनातून बदल हवा असल्या तर सांगत त्यांच्या भाजपच्या बाबत पाठिंबा दर्शविला. दरम्यान आपण कार्यकर्त्यांशी चर्चा केली असून त्यांच्या भावनात जाणून घेतल्यानंतर निर्णय घेण्यासाठी वेळ मागून घेतला असल्याची प्रतिक्रिया कुणाल पाटील यांनी यावेळी दिली. भाजप प्रवेशाबाबत कुणाल पाटील यांनी स्पष्टपणे होकार दिला नसला तरी या मेळाव्यानंतर ते भाजपा जाणार असल्याचा आता स्पष्ट मानले जात आहे.
byte - कुणाल पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष, काँग्रेस
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यात श्री संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत (WKT)
अँकर : संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. शेगावहुन निघालेली गजानन महाराजांची पालखी आज सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली. सोलापूर जिल्ह्यातील उळे गावात जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम , अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह, आमदार सचिन कल्याणशेट्टी या सर्वानी महाराजांच्या पालखीचे स्वागत केले. उळे येथील ग्रामस्थांनी देखील महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केलेली होती. पालखी मार्गांवर गुलाबाच्या पायघड्या टाकून यावेळी स्वागत करण्यात आले.
आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी....
wkt : अभिषेक आदेप्पा, प्रतिनिधी
बाईट : आमदार सचिन कल्याणशेट्टी
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी जिल्ह्या मधून ही शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध होत असून आम्ही आमच्या जमिनी शक्तीपीठ महामार्गाला देणार नसल्याचा पवित्रा 31 गावच्या शेतकर्यांनी घेतलाय, आज पोखर्णी येथे 31 गावच्या निवडक शेतकरी पुढाऱ्यांची बैठक पार पडली. शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. या निर्णयाला या बैठकीत कडाडून शेतकऱ्यांनी विरोध केलाय,
0
Share
Report
Palghar, Maharashtra:
पालघर _
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रम शाळा वस्तीगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींची सुरक्षितता रामभरोसे असल्याचे पुन्हा एकदा समोर आलंय . डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गिरगाव आश्रम शाळेतील वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीची वस्तीगृहातच आत्महत्या केली आहे . नववीत शिकणाऱ्या पल्लवी शरद खोटरे या विद्यार्थिनीची वस्तीगृहाच्या पहिल्या मजल्यावरील लोखंडी रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . आत्महत्येच कारण अजूनही अस्पष्ट आहे. दरम्यान तलासरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2806ZT_CHP_DEER_DEATH
( single file sent on 2C)
टायटल:-- घनदाट जंगलातुन जाणारा बल्लारपूर- गोंदिया रेल्वेमार्ग ठरतोय वन्यजीवांसाठी कर्दनकाळ, गर्भवती मादी सांबराचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू, सतत होणारे वन्यजीवांच्या मृत्यूसंदर्भात शास्त्रीय पद्धतीने उपाययोजनांची गरज, हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी सदस्यांनी रेल्वे- वनविभाग आणि प्रशासनाला याकडे गांभीर्यानें लक्ष देण्याची केली मागणी
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील घनदाट जंगलातुन जाणारा बल्लारपूर- गोंदिया रेल्वेमार्ग वन्यजीवांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. लोहारा-जुनोना जंगलातून जाणाऱ्या रेल्वे रुळावर रकसोल एक्सप्रेसने आज रूळ ओलांडणा-या गर्भवती मादी सांबराला चिरडले. रेल्वेच्या धडकेने सतत होणा-या वन्यजीवांच्या मृत्यूसंदर्भात शास्त्रीय पद्धतीने उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी सदस्यांनी रेल्वे- वनविभाग आणि प्रशासनाला याकडे गांभीर्यानें लक्ष देण्याची मागणी केली आहे. या मार्गावर जास्त अपघात हे लोहारा ते मूल दरम्यान होतात. आता पुन्हा दुसरी रेल्वे लाईन टाकण्याचा प्रस्ताव रेल्वेने मंजूर केला आहे. वन्यजीवांचा हा भ्रमण मार्ग कसा सुरक्षित राहील याची चिंता वन्यजीवप्रेमींना पडली आहे. या जागी अशास्त्रीय पद्धतीने कुंपण तयार करण्यात आले आहे. ५ फुटांवरून सांबर, हरीण ,वाघ ,बिबट हे सहज उडी मारून जाऊ शकतात ,मग ह्या तुटपुंज्या योजना कुठल्या कामाच्या असा सवाल हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीने विचारला आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Sui_Attempt
Feed on - 2C
--------------------------
Anchor - घरगुती वादाच्या कारणातून एका 45 वर्षीय पुलावरून गोदावरी नदीत उडी घेतली. पण नशीब बलवत्तर आणि तिथे असलेल्या जीवारक्षक दलाच्या जवानांनी त्याचे प्राण वाचवले. हा सर्व प्रकार नांदेड शहरात घडला. आंबेडकर नगरमधील रहिवाशी अशोक कांबळे याने गोवर्धन घाटपुलावरून गोदावरी नदीत उडी मारली. नदीला पाणी असल्याने तो तरंगू लागला. जवळच असलेल्या गोदावरी जीवरक्षक दलाच्या जवानांनी त्याला पाहिले. तात्काळ नदीत जाऊन त्यांनी त्या बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढले. या व्यक्तीच्या खिशात एक चिठी आढळली. पत्नीच्या त्रासामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्याने चिठठ्ठीत लिहिले होते. दरम्यान त्या व्यक्तीला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Byte - परमेश्वर कदम - पोलीस निरीक्षक, वाजीराबाद, ठाणे
----------------------
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2806ZT_JALNA_UBT_ANDOLAN(1 FILE)
जालना | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बबनराव लोणीकर यांच्या पोस्टरवरील प्रतिमेला जोडे मारून निषेध
अँकर | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शेतकरी विरोधी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं.जालन्यातील मंठा शहरात हे आंदोलन करण्यात येऊन बबनराव लोणीकरांच्या पोस्टरवरील प्रतिमेला जोडे मारण्यात येऊन लोणीकरांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनादरम्यान लोणीकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
0
Share
Report
Kolhapur, Maharashtra:
Kop UPSC Satkar
Feed :- 2C
Anc :- कोल्हापूरतील वारणानगर इथं UPSC परीक्षेत महाराष्ट्रातून यश संपादित केलेल्या यशवंताचा सत्कार करण्यात आला . वारणानगर मधील सुराज्य फौंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. वारणा समूहाचे प्रमुख आमदार विनय कोरे याच्या हस्ते UPSC परीक्षेत यश संपादित केलेल्या यशवंताचा सत्कार करण्यात आला.यंदा महाराष्ट्रातून 80 हुन अधिक विद्यार्थ्यांनी UPSC परीक्षेत यश संपदान केले होत, त्यापैकी 20 हुन अधिक विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आजच्या सत्कार सोहळ्यात उपस्थित होते..गेल्या 18 वर्षात UPSC मध्ये यश संपादित केलेल्या 500 हुन अधिक विद्यार्थ्यांचे सुराज्य फौंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.
0
Share
Report
Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 2806ZT_GAD_NAX_ARRESTT
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील कोरची दलम उपकमांडर अंकल ऊर्फ मन्नू सुलगे पल्लो याला पोलीसांनी केली अटक, नवनिर्मित पोस्टे कवंडे जंगल परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने करत होता रेकी, 15 जवानांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या भुसुरुंग स्फोटात होता सक्रिय सहभाग, महाराष्ट्र शासनाने त्याच्या अटकेवर जाहीर केले होते 06 लाख रुपयांचे बक्षीस
अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील कोरची दलम उपकमांडर अंकल ऊर्फ मन्नू सुलगे पल्लो याला पोलीसांनी अटक केली. नवनिर्मित पोस्टे कवंडे जंगल परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने तो रेकी करत होता. 15 जवानांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या भुसुरुंग स्फोटात त्याच सक्रिय सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने त्याच्या अटकेवर 06 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे नक्षली सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी माओवाद विरोधी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 104 नक्षल्याना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. भामरागड तालुक्यातील नवनिर्मित पोस्टे कवंडे हद्दीतील कवंडे जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथकाची दोन पथके, पोस्टे कवंडे येथील पोलीस पथक आणि सी कंपनी 37 बटा. सिआरपीएफचे एक पथक नक्षलविरोधी अभियान राबवित असताना त्यांना एक संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आल्याने पथकाच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची अधिक सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे आणले असता सर्व असल्याचे उघड झाले. 01 मे
2019 रोजी उपविभाग कुरखेडा अंतर्गत मौजा जांभूळखेडा जंगल परिसरात झालेल्या भुसुरुंग स्फोटात 15 पोलीस जवानांच्या हत्येमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. त्याच्यावर आजपावेतो 03-चकमक व 2-खून असे एकूण 05 गुन्हे दाखल आहेत.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2806ZT_JALNA_MANTHA_ANDO(3 FILES)
जालना | लोणीकरांविरोधात वंचित बहूजन आघाडी,प्रहार जनशक्ती पक्ष,संभाजी ब्रिगेडचं मंठा शहरात निषेध आंदोलन
अँकर |शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार बबनराव लोणीकरांविरोधात संभाजी ब्रिगेड,वंचित बहूजन आघाडी,प्रहार जनशक्ती पक्ष,एमआयएमनं मंठा शहरात निषेध आंदोलन केलंय.छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आलं.यावेळी लोणीकरांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा निषेध करण्यात आला.यापुढे शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य कराल तर परतूर-मंठा मतदार संघात तुमचं फिरणं मुश्किल करू असा ईशारा लोणीकरांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं देण्यात आला.
बाईट :बाळासाहेब खवणे,तालुकाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड
0
Share
Report