Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

मराठा समाजासाठी अंतिम बैठक: जरांगेंचा विजयाचा विश्वास!

NITESH MAHAJAN
Jun 28, 2025 07:03:47
Jalna, Maharashtra
FEED NAME | 2806ZT_JALNA_JARANGE_BYTE(4 FILES) जालना | ब्रेकिंग | मराठा समाजाच्या लेकरांच्या हितासाठी ही अंतरवालीतली शेवटची बैठक-जरांगे आतापर्यंत काय मिळालं.काय मिळवायचं? मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार.? याबाबत उद्या चर्चा होणार आपापली कामे सोडून बैठकीला या-जरांगे मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबवणं हा बैठकीचा अजेंडा ही अंतरवालीतील शेवटची बैठक आता विजयच मिळवायचा-जरांगे मराठा समाजासमोर सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार,आत्ताच सगळं सांगणार नाही-जरांगे पूर्ण मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही जरांगे यांचा राज्य सरकारला ईशारा आंदोलन शांततेत होणार पण विजय घेऊनच माघारी फिरणार-जरांगे आमचा हा लढा शेवटचा पण आमचा संयम बघू नका,पुन्हा पुन्हा मराठ्यांचा अवमान करु नका लेकरा बाळांच्या कल्याणासाठी कुणीही घरी राहू नका,सोशल मीडियावर या बैठकीचा आढावा पाहू नका प्रत्यक्ष बैठकीत सहभागी व्हा आम्ही 2 वर्ष सरकारला वेळ दिला,अजून किती वेळ द्यायचा.? अँकर | आम्ही 2 वर्ष सरकारला वेळ दिला अजून किती वेळ द्यायचा.? असा सवाल उपस्थित करत मराठा समाजाच्या लेकरांच्या हितासाठी ही अंतरवालीतली उद्याची शेवटची बैठक असल्याचं सांगत उद्याच्या मराठा समाजाच्या बैठकीत प्रत्यक्ष सहभागी व्हा असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे. आतापर्यंत काय मिळालं.काय मिळवायचं? मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार.? याबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होणार असून आपापली कामे सोडून बैठकीला या असंही जरांगे म्हणाले आहेत.मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबवणं हा बैठकीचा अजेंडा असून ही अंतरवालीतील शेवटची बैठक आहे. आता विजयच मिळवायचा असं सांगत मराठा समाजासमोर सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार,आत्ताच सगळं सांगणार नाही असंही जरांगे यांनी स्पष्ट केलंय. पूर्ण मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय यावेळी मुंबई सोडणार नाही असाही गर्भित ईशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय.29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन शांततेत होणार पण विजय घेऊनच माघारी फिरणार असा ठाम विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.आमचा हा लढा शेवटचा पण आमचा संयम बघू नका,पुन्हा पुन्हा मराठ्यांचा अवमान करु नका अशा शब्दात जरांगे यांनी राज्य सरकारला ठणकावलंय.लेकरा बाळांच्या कल्याणासाठी कुणीही घरी राहू नका,सोशल मीडियावर या बैठकीचा आढावा पाहू नका उद्या दुपारी 12 वाजता होणाऱ्या प्रत्यक्ष बैठकीत सहभागी व्हा असं आवाहनही जरांगे यांनी केलं. बाईट :मनोज जरांगे पाटील
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement