Back
जायकवाडी धरणात १८ हजार क्युसेक पाण्याची आवक, शेतकऱ्यांना दिलासा!
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
csn jayakwadi update
feed attached
वरील धरणातून १८ हजार क्युसेकने पाण्याची आवक...
पैठणच्या जायकवाडी धरणात ६ दिवसांत वाढला १० टक्के साठा
Anc...
पैठणच्या जायकवाडी धरणात सध्या १८ हजार ३७२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाचा साठा २९ टक्क्यांवरून ३९ टक्क्यांवर गेला आहे. वाढलेली पातळी पाहता यंदा शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. नाशिकसह वरच्या भागात जोरदार पाऊस झाल्याने वरच्या धरणांतून गोदावरी नदीत पाणी सोडले जात आहे. त्यामुळे जायकवाडी यंदाही शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. धरणातून संभाजीनगर, जालना, अंबडसह साडेचारशे गावांना पिण्याचे पाणी पुरवले जाते. सध्या दारणा धरणातून ३५३६ क्युसेक, गंगापूरमधून १७६० क्युसेक, कडवामधून १०६० क्युसेक, नांदूर मधमेश्वरमधून ९४६५ क्युसेक आणि पालखेडमधून ७८५४ क्युसेक पाणी गोदावरीमध्ये सोडले जात आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - शक्तिपीठ विरोधात १ जुलै कृषी दिनी अंकली येथे रास्ता रोको आंदोलन, मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना काळापासून धिंड काढत ठोकून काढण्याचा इशारा..
अँकर - शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात येत्या एक जुलै कृषी दिनी सांगलीच्या अंकली येथे सर्वपक्षीय रस्ता रोको करण्यात येणार आहे.शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच जमीन मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना काळे फासून त्यांची धिंड काढत,ठोकून काढू,असा इशारा देखील या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.शेतकऱ्यांच्या आणि सांगलीतल्या पूरग्रस्तांच्या दृष्टीने शक्तीपीठ महामार्ग हा धोकादायक असून कोणत्याही परिस्थितीत महामार्ग रद्द झाला पाहिजे अशी भूमिका या बैठकीमध्ये घेण्यात आली आहे, यासाठी सरकारच्या विरोधात रस्त्यावरची लढाई करण्यासाठी एक जुलै कृषी दिन,
अंकली या ठिकाणी नागपूर-रत्नागिरी महामार्गावर सर्वपक्षीय रस्ता रोको करण्यात येणार असल्याचा जाहीर करण्यात आले आहे.
बाईट - महेश खराडे - जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना,सांगली.
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
ANCHOR - नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा च्या डोंगर रांगांमध्ये निसर्गाने आरोग्य विभागाचे वाभाडे चव्हाट्यावर आणले आहेत. सातपुडा डोंगर रांगांमध्ये असलेल्या केलापानी येथून एका रुग्णाला बाबू ची झोळी करून तब्बत 3 ते 4 तासांची जंगलातून वाट काढत रुग्णालयात आणावे लागले. केलापाणी गावातील रतीलाल पारता पाडवी या 30 वर्षीय आदिवासी बांधवला बांबूच्या झोळीतून रुग्णालयात घेऊन जाण्याची नातेवाइकांवर वेळ आली. दुर्दैवाची बाब म्हणजे हा रुग्ण केल्या काही दिवसांपासून आजारी होता. मात्र पूर परिस्थितीमुळे रस्ते बंद असल्याने आणि रुग्णवाहिका येऊ शकत नसल्यामुळे तो तशाच स्थितीत घरी पडून होता. शेवटी स्थानिकांनी त्याला झोळीमध्ये आणत रुग्णालयात दाखल केले. ऐन पावसाळ्यात रुग्णाला घेऊन 15 ते 20 किलोमीटरची जीवघेणी पायपीट स्थानिलांना करावी लागली. उंच डोंगरावरून चिखलातून वाट काढत जंगलातून हा प्रवास जीवघेणा होता. अक्राणी तालुक्यातील केलापाणी गावाला रस्ता नसल्याने रुग्णहिका पोहचू शकत नसल्याची परिस्थिती आहे. प्रशासनाला वारंवार याबाबत तक्रारी करून निवेदन देऊनही त्याचा उपयोग झालेला नाही.
byte - स्थानीक नागरिक
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report
Mumbai, Maharashtra:
Anchor
शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समिती देखील पाच जुलै रोजी होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. यासोबतच कृती समितीकडून 29 जून शासन निर्णयाची होळी केली जाणार आहे आणि सात जुलै च्या धरणे आंदोलनावर देखील कृती समिती ठाम आहे. राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर कृती समिती देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. सरकार हे एका आंदोलनामुळे बदलणार नाही त्यामुळे आमची ही दोन आंदोलने आम्ही रद्द करणार नसल्याचं कृती समितीचे दीपक पवार यांच्याकडून सांगण्यात आलं
बाईट. दीपक पवार
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2706ZT_JALNA_PERNI(2 FILES)
जालना | पीकपाणी| जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 30 हजार 679 हेक्टरवर खरीप हंगामातील पेरणी पूर्ण
दडी मारलेल्या पावसाने पुनरागमन केल्याने पिकांना मिळाला दिलासा...
अँकर | जालना जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 30 हजार 679 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरणी पूर्ण झालीय. जिल्ह्यात यंदा 6 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचं नियोजन करण्यात आलय.यापैकी आतापर्यंत 4 लाख 30 हजार 679 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झालीय.जालना जिल्ह्यात मागील 10 दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट घोंघावत होतं. मात्र, दडी मारलेल्या पावसानं पुनरागमन केल्यानं पेरणी झालेल्या खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे.त्यामुळे शेतकरी सुखावलाय.
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File2:2706ZT_WSM_CROPS_DAMAGE_WKT121
WSM_CROPS_DAMAGE_SHOTS
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात जिल्ह्याच्या सर्व भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.यामुळे अनेक नदी-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली होती व काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती.गेल्या पंधरवड्यापासून गायब झालेल्या पावसाने दोन पासून जोरदार आगमन करत वातावरणात गारवा निर्माण केला.या पावसामुळे आधीच पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, मात्र दुसरीकडे, मालेगाव, वाशिम आणि रिसोड तालुक्यांमध्ये या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे.त्यामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने खरीपाच्या सोयाबीन,तूर, उडीद, हळद,मूग या पिकासह फळबागाचे मोठे नुकसान झाले असून, रिसोड तालुक्यातील उतावळी कांच,खारोळ व पैनगंगा या नद्यांचे पात्र फुटून रुद्ररूप धारण केल्याने नदीकाठाच्या हजारो हेक्टर ठिकाणी जमिनीसह पिके खरडून गेली परिणामी शेतकरी हताश झाले आहेत.त्यामुळे गरज आहे या शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकारने खंबीरपणे उभे राहुन आर्थिक मदत देण्याची या परिस्थितीचा थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे..
0
Share
Report
Navi Mumbai, Maharashtra:
story slug -उरण मद्ये सिडकोच्या कारवाई मुळे 80 कुटुंबावर भर पावसात बेघर होण्याची वेळ
सिडको की कारवाई
ftp slug - nm uran cidco action
shots-
reporter- swati naik
navi mumbai
anchor -
उरण मधील कामठा गावं येथील चिंतामणी अपार्टमेंटवर सिडकोकडून कारवाई करण्यात येत आहे ,सिडकोच्या कारवाईमुळे भर पावसात 80 पेक्षा अधिक कुटुंब झाली बेघर होणार आहेत।
भर पावसाळ्यात कारवाई करण्यात येत असल्याने रहिवासी संतप्त झाले असून,
पोलिसांचा फौंजफाटा घेऊन सिडकोची घरांवर तोडक कारवाई साठी आल्याने ,
कारवाई थांबाविण्याची रहिवासीयांची मागणी करत जेसीबी समोर अडवून रहिवास उभे राहिले आहेत।
gf -
--–--------
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2706ZT_CHP_VIJAY_1
( single file sent on 2C)
टायटल:-- मुंबईतील 5 जुलै च्या एकत्रित मराठी मोर्चा विषयी निमंत्रण आले आहे, काँग्रेस त्याबाबत सकारात्मक विचार करेल, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
अँकर:--काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत होणाऱ्या एकत्रित मराठी मोर्चावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती नको ही भूमिका आम्ही या आधीच मांडली आहे, जर दोन्ही भाऊ एकत्र येऊन या विषयावर मोर्चा काढणार असतील, जर कुठल्याही बॅनर शिवाय मराठी साठी मोर्चा काढणार असेल आणि निमंत्रण आलं तर आम्ही विचार करू आणि त्याबाबत आमची भूमिका सकारात्मक असेल असे वडेट्टीवार म्हणाले.
बाईट १) आ. विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2706ZT_WSM_SCHOOL_ROOF_COLLAPSED
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यातील भटउमरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले, एक विद्यार्थी गंभीर जखमी.
वर्गात शिकवणी सुरू असताना कोसळला स्लॅब चा भाग
स्लॅब कोसळल्याने विद्यार्थी भयभीत.
वाशिम जिल्ह्यातील भटउमरा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली घटना
डोक्यात स्लॅब पडल्याने जखमी झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले
दहावर्षापूर्वी बांधण्यात आली होती ही शाळेची इमारत.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
कल्याण शहरात अमली पदार्थविरोधात विद्यालयाची जनजागृती.. ‘पोलीस मित्र’ बनून विद्यार्थ्यांना पुढे येण्याचे आवाहन!
झोन ३ पोलिस, शिक्षण संस्था आणि नशामुक्ती संघटनांचा संयुक्त उपक्रम; पथनाट्य, अमली पदार्थांचे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडले
Anc..कल्याण शहरात अमली पदार्थांच्या विरोधात ठोस पावलं उचलत झोन तीन पोलिसांनी शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला
Vo..कल्याण झोन ३ चे पोलिस आणि स्थानिक शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहरभर अमली पदार्थविरोधात जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले शाळा आणि महाविद्यालयात सादर करण्यात आलेले पथनाट्य, ज्यात अमली पदार्थांचे दुष्परिणाम प्रभावी पद्धतीने मांडले गेले.या कार्यक्रमात ॲडिशनल सीपी, झोन ३ चे DCP, कल्याणचे ACP, तसेच शाळा-कोलेजचे प्राचार्य, नशामुक्ती केंद्रातील स्वयंसेवक आणि शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.पोलिसांनी विद्यार्थ्यांना संवाद साधत मार्गर्शन केले अमली पदार्थांचे शारीरिक आणि मानसिक नुकसान स्पष्ट केलं. "कॉलेज किंवा शाळा परिसरात कोणी अमली पदार्थांची विक्री करत असेल, तर ''''पोलीस मित्र'''' म्हणून तात्काळ माहिती द्या," असे आवाहन करण्यात आले.
Byte :- आतूल झेंडे ( कल्याण dcp)
0
Share
Report
Pune, Maharashtra:
hinjeadi ultimetum
kailas puri Pune 27-6-25
feed by 2c
Anchor - हिंजवडी गावाचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समावेश करण्यासाठी गेल्या काही दिवसापासून आयटी कर्मचाऱ्यांकडून स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. पाच दिवसात या मोहिमेत बावीस हजारहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी करत पाठिंबा दर्शवला आहे. आयटी कर्मचाऱ्यांकडून ही मोहीम सुरू असताना सरकारी पातळीवर मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आयटी कर्मचारी संतप्त झाले असून त्यांनी आणखी मोहीम तीव्र केली आहे. ट्राफिक आणि इतर समस्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आयटी पार्क हिंजवडी चेष्टेचा विषय झाला असल्याची खंत व्यक्त करतानाच येत्या काही दिवसात समस्या सोडवल्या नाहीत तर आणखी तीव्र मोहीम सुरू करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. तर ग्रामस्थांनी हिंजवडीला महापालिकेत घ्यायचं असेल तर आत्ताच घ्यावं अन्यथा पुढे आम्ही स्वतंत्र महानगरपालिकेची मागणी करू असा इशारा दिला आहे. याच मुद्द्यावर आयटी कर्मचारी आणि स्थानिकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...!
kailas chaupal+ vis
0
Share
Report