Back
चिखली गावात 11 विद्युत रोहित्र; ग्रामस्थांचा आनंदोत्सव!
Beed, Maharashtra
बीड: आष्टी तालुक्यातील चिखली गावाला 11 विद्युत रोहित्र उपलब्ध; ग्रामस्थांकडून हलगी वाजवत गावभर आनंदोत्सव
Anc:बीडच्या आष्टी तालुक्यातील चिखली गावाला 11 विद्युत रोहित्र उपलब्ध झालेत. ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा करत हलगी वाजवून गावभर मिरवणूक काढली. गेल्या अनेक वर्षांपासून चिखली गावाला विद्युत रोहित्र उपलब्ध नसल्याने पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होत नव्हता. त्यामुळे अतिरिक्त विद्युत रोहित्र उपलब्ध करण्याची मागणी ग्रामस्थांनी आमदार सुरेश धस यांच्याकडे केली होती. अखेर ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर गावाला विद्युत रोहित्र उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांचा हा आनंद पहायला मिळतोय.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या उदासीनते विरोधात लक्षवेध आंदोलन केले. राष्ट्रीय आरोग्य अभियान एकीकरण समितीच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले होते. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने हे कर्मचारी १५ ते २० वर्षांपासून काम करत आहेत. त्यामुळे शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचे समायोजन तत्काळ करण्यात यावे, मानधनात १०% वाढ करावी, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांसाठी एकवेळ बदली धोरण लागू करावे, सर्व कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण आणि भविष्य निर्वाह निधी योजना लागू कराव्यात अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
'रिक्षाचालकांनी शिस्त मोडल्यास कडक कारवाई करणार'
पोलीस उपायुक्तांचा बदलापुरातील बेशिस्त रिक्षाचालकांना इशारा
रिक्षा चालकांनी नियमांचं पालन करण्याचा आवाहन
Bdl auto action
Anchor - बदलापुरातील रिक्षा चालकांनी शिस्त न पाळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिलाय. रांगेत प्रवासी घेणं, रिक्षा चालवताना लेनची शिस्त पाळणं, युनिफॉर्म तसंच वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा आवाहनही त्यांनी रिक्षा चालकांना केलय.
बदलापूर शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी नगरपालिका मुख्यालयात महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड, बदलापूर रेल्वे स्टेशन प्रबंधक धनश्री गोडे इतर अधिकारी तसच रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिक्षाचालकांना सूचना देण्यात आल्या. ओव्हर टेकिंग करणं, ओव्हर सीट घेणं तसंच स्टॅन्ड सोडून इतरत्र रिक्षा उभी करणं असे प्रकार रिक्षा चालकांकडून सर्रास वाढले आहेत. मात्र यापुढे रिक्षाचालकांनी शिस्तीचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. वेळप्रसंगी वाहनही जप्त करण्यात येईल असा इशाराही पोलीस उपयुक्तांनी या बैठकीत दिला. तसंच बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन लवकरच काही नवीन रिक्षा स्टॅन्डही सुरू केले जातील अशी माहितीही त्यांनी दिलीय.
Byte - पंकज शिरसाट, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Share
Report
Wardha, Maharashtra:
वर्धा
SLUG- 3006_WARDHA_PROTEST
- विविध मागण्यांकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांचे लक्षवेध आंदोलन
- राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी संघटना एकीकरण समितीचे आंदोलन
- वेतन सुसूत्रीकरणाचा निर्णय घ्यावा, समान काम समान वेतन लागू करावे, राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बदली धोरण लागू करा, कर्मचाऱ्यांना विमा कवच मिळावे, १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार समायोजन करावे आदी मागण्यासाठी आंदोलन
- आंदोलनात राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग
- विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 3006ZT_JALNA_ACCIDENT(7 FILES)
जालना | खडी वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकची दुचाकीस्वाराला धडक,दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
जिल्हाधिकारी कार्यालया समोरील घटना
तालुका पोलिसांकडून आयशर ट्रक जप्त,चालक फरार
अँकर | खडी वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकनं एका दुचाकीस्वाराला धडक दिलीय.या घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही घटना घडली.
40 वर्षीय राजेश अनावडे असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव असून तो छत्रपती संभाजीनगर शहरातील हनुमान नगर भागातील रहिवासी आहे.या अपघातानंतर आयशर ट्रकचा चालक फरार झालाय.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ट्रक जप्त केला. दरम्यान या प्रकरणी तालुका पोलीस अधिक चौकशी करत आहे.
0
Share
Report
Nagpur, Maharashtra:
नागपूर
नागपूर शहरात दमदार पाऊस
संध्याकाळी पाच नंतर ढग दाटून आले... त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली....
--- काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती
-- दरम्यान पुढील 24 तासासाठी पूर्व विदर्भात नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे
-- जून महिन्यात पावसाची मोठी तूट नागपूर जिल्ह्यात आहे...
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
हिंदी सक्तीविरोधी मोर्चा रद्द, पण ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची कार्यकर्त्यांची मागणी कायम
कल्याणमध्ये उद्धव, बाळासाहेब व राज ठाकरे यांच्या एकत्रित फोटोसह भावनिक बॅनर झळकले
हीच ती वेळ महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी, मराठी माणसासाठी एकत्र या.." अभि नहीं तो कभी नही " अशा आशयाने लागले बॅनर
Anchor :- हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू एकत्र आले . पाच जुलै रोजी मनसे आणि ठाकरे गटाचा एकत्रित मोर्चा निघणार होता मात्र त्याआधीच सरकारने हिंदीभाषा सक्ती रद्द केली . ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने ठाकरे गटासह मनसे कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे . मोर्चा रद्द झाल्याने आता या दोघांना एकत्रितपणेच पाहण्याची इच्छा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे . या पार्श्वभूमीवर कल्याण मध्ये झळकलेला बॅनर हा चर्चेचा विषय ठरलाय . या बॅनर मध्ये उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र फोटो लावण्यात आलाय .तसेच मोर्चा जरी रद्द झाला असेल तरी एकत्र या , "हीच ती वेळ महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी, मराठी माणसासाठी एकत्र या.." अभि नहीं तो कभी नही " अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आलाय . गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी ठाकरे गटासह मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी केली जात आहे . त्यातच आता मोर्चा रद्द झाला असला तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र यावं अशी भावना कार्यकर्त्यांनी बॅनरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग...
बाल सुधारगृहातून फिल्मीस्टाईल नऊ अल्पवयीन युवतींचे पलायन....
शहरातील छावणी बाल सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या नऊ मुलींचे पलायन....का निघून गेल्या कारण अस्पष्ट
जालना रोडवर दामिनी पथकाने पाठलाग करून सात मुलींना पकडले, दोन मुली अद्यापही फरार...
पलायन करणारा मुलींनी त्यांना थांबवणाऱ्या पोलिसांच्या दामिनी पथकावर केली दगडफेक...
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
शॉक सर्किट मुले एका घराला आग आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक तर,. एक जण किरकोळ जखमी
Anc..कल्याण पश्चिम वल्लीफिर रोडवरील मेहमान मस्जिद परिसरात गुलजार टांगे वाली चाळीतील एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे शॉर्टसर्किटमुळे लागली आग लागल्याची प्राथमिक अंदाज आहे संपूर्ण मात्र या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झाला असून घरात एक वेक्ती किरकोळ जखमी झाला असून त्याच्या वर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.तर सिलेंडर ब्लास्ट होण्याच्या भीतीने परिसरात मोठी धावपळ; नागरिकांनी आपल्या घरातील सिलेंडर घराबाहेर फेकलेअग्निशामक दल घटनास्थळी पोहचत आगीवर मिळवलं नियंत्रण मिळवले
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
भंडारा जिल्हात पावसाने झोडपले
Anchor - भंडारा जिल्हात आज सकाळ पासून संतधार पावसाला सुरुवात झाली असून दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने झोडपले असून जिल्हातील शेतकऱ्यांचे पेरणी खोळमंबली होती. मात्र ह्या दमदार पावसामुळे वातावरणा मध्ये गारवा निर्माण झालं असला तरी शेतकऱ्यांना रोवणी करिता दिलासा मिळाला आहे.
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
30062025
slug - PPR_PALKMANTRI
feed on 2c
file 01
-------
Anchor - पालकमंत्री जयकुमार गोरे आणि त्यांच्या पत्नीने वारीच्या वाटेवर खेळली फुगडी
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले.पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, यांच्या सह प्रशासन मधील अधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी पालकमंत्री जय कुमार गोरे यांनी त्यांच्या पत्नी सौ. सोनिया गोरे यांच्या समवेत वारकऱ्यांच्या उपस्थितीत फुगडी खेळत पालखी सोहळ्यात सहभागी झाले.
0
Share
Report