Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.

Aug 26, 2024 17:26:23
Yavatmal, Maharashtra

राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VNVishal Nagesh More
Dec 19, 2025 03:50:30
Malegaon, Maharashtra:लोकसहभागातून रस्त्याची डागडुजी; नाशिकच्या देवळा येथील चिंचवे गावातील तरुणांचा पुढाकार... - मालेगाव तालुक्यातील चिंचवे गावाकडे जाणारा मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत होता. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, पावसाळ्यात चिखल आणि वाहतुकीस अडथळा अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शाळकरी मुले, शेतकरी, रुग्ण व सर्वसामान्य ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत गावातील तरुणांनी गुरु गोरक्षनाथ सेवाभावी बहुउद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून लोकसहभागातून पुढाकार घेतला. कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता, स्वतः श्रमदान व आर्थिक योगदान देत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले. तरीही हा तात्पुरता उपाय असून संबंधित विभागाने रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आत आहे. गावाच्या हितासाठी पुढाकार घेणाऱ्या संस्थेचे व तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 19, 2025 03:50:09
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील टोप गावात गुंगीचे औषध फवारून घरफोडी झोपेत असलेल्या चौघा जणांवर गुंगीचे औषध फवारत सव्वातीन लाखाचा ऐवज पळवला. चोरट्यांनी कुत्र्यावरही फवारला मुंगीच्या औषध कोल्हापूर शहराजवळ असणाऱ्याटोप टोप गावाजवळ महामार्गाच्या लगत असणाऱ्या वैभव बाळासो पाटील यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोड़ילי केलीय. चोरट्यांनी घरात झोपलेल्या व्यक्तींच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून ही चोरी केल्याचे समोर आले आहे. या चोरट्यांनी सव्वा तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरी करणारे तिन्ही चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून शिरोली या चोरांचा शोध सुरू केला आहे. शिरोली पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, पुणे बंगळूर महामार्गावर टोप गावच्या पूर्वेला ग्रामपंचायत शेजारी वैभव बाळासो पाटील यांचे घर आहे.गुरुवारी रात्री पाटील यांची आई, भाऊ, आजी सर्व मंडळी झोपी गेले असता चोरट्यांनी घरासमोरील पाळीव कुत्र्यांला गुंगीचे औषध घातले, आणि घराचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. आणि घरात झोपलेल्या लोकांच्या तोंडावर ही गुंगीच्या औषधाचा स्प्रे मारुन घरातील तिजोरी उघडून तिजोरीतील दोन तोळे सोन्याचे दागीने, चांदीचे दागिने, तीन मोबाईल फोन, रोख ३० हजार रुपये असा ३ लाख २१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. यावेळी पाटील यांच्या घराशेजारी असलेले नातेवाईक कृष्णात गायकवाड हे पहाटे ३.३० वाजता लघुशंकेसाठी उठले असता त्यांनी घराचा दरवाजा उघडला असल्याचे पाहिले आणि घरात गेलो आणि घरातील लोकांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते गुंगीत होते.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 19, 2025 03:49:50
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 19, 2025 03:47:43
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 19, 2025 03:38:38
Washim, Maharashtra:अंदाज: वाशिम निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे.ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरुवातीपासूनच खबरदारी घेण्यात आली आहे. याच अनुषंगाने उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी वाशिम शहरातील पोलीस बंदोबस्ताचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी मतदान केंद्र परिसर, संवेदनशील भाग आणि शहरातील प्रमुख चौकांवर बंदोबस्त कसा राहील याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. नगराध्यक्ष पदासह १६ प्रभागांतील ३२ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. गरज भासल्यास तात्काळ कारवाईसाठी स्वतंत्र स्ट्रिकिंग फोर्सही सज्ज ठेवण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी : १ पोलिस निरीक्षक : २ सहाय्यक/उपनिरीक्षक : १३ महिला पोलीस : २६ पोलिस कर्मचारी : १३० पुरुष होमगार्ड : १०४ महिला होमगार्ड : ६ SRPF : २ तुकड्या स्ट्रिकिंग फोर्स : १
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 19, 2025 03:38:13
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 19, 2025 03:38:02
Nagpur, Maharashtra:अधिवेशनादरम्यान चे मोर्चाचे, आंदोलकांचे व्हिडिओ वापररावे नागपूर - हिवाळी अधिवेशनात आंदोलनकर्त्यांना कडाक्याच्या थंडीत निवारागृह देण्याऐवजी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना जबरदस्तीने हाकलल्याचा ठपका. - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलिसांना खडेबोल सुनावले. - “पोलिसांचे दावे फोल ठरले”, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवले - कडाक्याच्या थंडीत आंदोलनकर्त्यांना रस्त्यावर झोपण्याची वेळ आली. - ५०–५५ पोलिसांच्या बंदोबस्तात आंदोलनकर्त्यांना जागा खाली करण्यास भाग पाडले. - नागपूरमध्ये हिवाळ्यात कुणीही उघड्यावर झोपू नये, असे निर्देश देऊनही त्याच पालन झालं नसल्याच निरिक्षण - याचिकेवर पुढील सुनावणी ख्रिसमस सुटीनंतर होणार,
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 19, 2025 03:34:56
Nanded, Maharashtra:नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेला कालपासुन सुरूवात झाली. येळकोट येळकोट जल मल्हारचा जयघोष करत देव स्वारीने माळेगाव यात्रेला सुरुवात झाली. देवस्वारीवर हळद , खोबरे , बेल भंडाऱ्याची उधळन करत , हराजो भाविक यात्रेत सहभागी झाले होते. खंडोबाची भारतातील ही सर्वात मोठी यात्रा आहे. हवस्या, नवस्या, गवस्या ची यात्रा म्हणूनही ही यात्रा प्रसिद्ध आहे. पाच दिवस ही यात्रा चालते. माळेगाव येथे खंडोबाचे पुरातन मंदीर आहे. इथे खंडोबा आणि म्हाळसाकांत यांच्या मूर्ती आहेत. महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना, आदी राज्यातुन भाविक खंडोबाचा नवस फेडण्यासाठी इथे येतात. या यात्रेत पशू प्रदर्शन देखील लक्षवेधी असते. पंजाब, राजस्थान, गुजराथ इथून व्यापारी या यात्रेत येतात. माळेगव यात्रेत घोड्यांचाही मोठा बाजार भरतो. शिवाय सर्वच प्रकारच्या विविध वस्तू विक्रीसाठी व्यापारी इथे 5 दिवस व्यवसाय करतात.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 19, 2025 03:34:36
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करीत असल्याने ठाकरे यांच्या शिवसेनेचे विधानसभा प्रमुख संतोष ढवळे यांची पक्षातून हकालपट्टी झाली मात्र अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिकच राहणार, निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना भेटणार असे ढवळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी समर्थकांचा मेळावा घेऊन आपल्या विरुद्ध पक्षातूनच षडयंत्र झाल्याचे सांगितले नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सोबत शिवसेनेची युती झाल्याची घोषणा केल्या गेली मात्र अचानक युती तुटली. भाजपाला फायदा व्हावा म्हणून खासदार संजय देशमुख यांनी युती तोडली का असा प्रश्न ढवळे यांनी उपस्थित केला आहे. बाईट : संतोष ढवळे
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 19, 2025 03:20:59
Kolhapur, Maharashtra:मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच नियमानुसार स्थापन झाल्याचा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने या विरोधातील आव्हान याचिका फेटाळली आहे. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया या खंडपीठाने कोल्हापूर सर्किट बँक विरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोल्हापूर खंडपीठाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बँक कोल्हापुरात होण्यासाठी एक ऑगस्टला अध्यादेश निघाला होता. त्यानंतर देशाचे तात्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बँकेचे उद्घाटन झाले होते. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका पुण्यातील रणजीत निंबाळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 19, 2025 03:15:38
Akola, Maharashtra:राज्य शासनाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर करून देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागून त्यातील ३ हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अकोला जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात रंगेहाथ पकडलेल्या खासगी शिक्षक व एजंट शैलेंद्र बगाटे प्रकरणाला अखेर न्यायालयाचा पूर्णविराम मिळाला आहे.अकोला जिल्हा व सत्र न्यायालयातील विशेष प्रथम न्यायालयात या प्रकरणी दोन्ही बाजूंनी सविस्तर युक्तिवाद झाला. यानंतर न्यायालयाने आरोपी शैलेंद्र बगाटे यांची निर्दोष मुक्तता करत नस्ती बंद करण्याचा आदेश दिला. ही कारवाई जिल्ह्यातील तसेच राज्यातील पहिली अशी ठरू शकते, असा दावा ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. पी. डी. हातेकर यांनी केला आहे. तसेच लाच स्वीकारणाऱ्या संबंधित व्यक्तीबाबत सविस्तर माहिती घेऊन त्या व्यक्तीवर कारवाई करावी, असा सल्लाही न्यायालयाने अमरावती एसीबीला दिला आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 19, 2025 03:15:22
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस च्या ऍड. सीमा तेलंगे यांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यावर विविध आरोप करीत त्यांनी कुटुंबीयांना धमकविल्याचा आरोप केला आहे. उईके यांनी सूतगिरणीसाठी आदिवासी शेतकऱ्याची जमीन हडपली, नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणाऱ्या त्यांच्या कन्येला मंत्रीपदाचा वापर करून मुंबई उच्च न्यायालयात ब वर्ग समुपदेशक पदी नियुक्ती करून घेतली याबाबत पत्र परिषद घेतल्याने मंत्री यांनी कुटुंबीयांना धमकाविले आणि सोशल मीडियावर देखील धमकी वजा पोस्ट केल्या असा आरोप सीमा तेलंगे यांनी केला. तर तेलंगे यांचे आरोप खोटे व बिनबुडाचे आहे, काँग्रेस अस्तित्वहीन झाल्याने व नेत्यांना जनाधार न उरल्याने हे बेमालुम आरोप केल्या जात असल्याची टीका भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चौहान यांनी केली.
0
comment0
Report
Advertisement
Back to top