Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.

Aug 26, 2024 17:26:23
Yavatmal, Maharashtra

राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Mar 01, 2026 15:45:20
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - दुबईत घडत असलेल्या घडामोडी बद्दल भारतीय तरुणाने दिली सविस्तर माहिती - इराण, इजराइल, अमेरिका यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे अनेक भारतीय परदेशात अडकल्याने व्यक्त होतेय चिंता - दुबईमध्ये जॉबसाठी गेलेल्या भारतीयांची आहे मोठ्या प्रमाणात संख्या - सध्या दुबईच्या मध्ये हल्ले होत असल्याबाबत अनेक माहिती समोर येत असताना मूळचे भारतीय मात्र सध्या दुबईमध्ये स्थायिक असलेल्याने तरुणाने दिली सविस्तर माहिती - अनेक भारतीय युद्ध सुरू असलेल्या देशांमध्ये अडकल्याने व्यक्त करण्यात येतेय चिंता तानाजी गोरड ( मूळचे - सोलापूर जिल्हा मंगळवेढ़ा ) ( सध्या वास्तव्य - दुबई )
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 01, 2026 15:34:20
Nagpur, Maharashtra:राज्य अल्पसंख्याक आयोगाने सर्वांना सुरक्षित पुन्हा आणण्यासाठी सुरू केली मोहीम. राज्यातील किमान 50 हजार ( कदाचित हा आकडा लाखापर्यंतही पोहोचेल) मुस्लिम बांधव सौदी अरब मध्ये अडकल्याची भीती राज्य अल्पसंख्याक आयोगाने व्यक्त केली आहे... "उमरा" या धार्मिक विधीसाठी या काळात (रमजानच्या काळात) मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव मक्का मदीनाला जात असतात... उमरा साठी जाणारे यात्री कोणताही रजिस्ट्रेशन सरकारकडे करून जात नाहीत, तर ते खाजगी टूर अँड ट्रॅव्हल्स ऑपरेटर्सच्या माध्यमातून सौदी अरब ला जात असतात.. त्यामुळे त्यांच्या कुठलाही निश्चित आकडा सध्या सरकारकडे नसला, तरी या वर्षी राज्यातील 500 पेक्षा जास्त टूर ऑपरेटर्सनी मुस्लिम बांधवांना उमरासाठी सौदी अरब ला पाठवले असल्याचे लक्षात आले आहे.. त्यामुळे सौदी अरब मध्ये गेलेल्या मुस्लिम बांधवांची संख्या 50,000 पेक्षा जास्त असेल असं मत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केला आहे.. अल्पसंख्याक आयोगाने सर्व टूर ऑपरेटर ची संपर्क साधने सुरू केले असून उद्यापर्यंत सौदी अरब मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांची संख्या स्पष्ट होईल असे प्यारे खान म्हणाले... यासंदर्भात आम्ही राज्य सरकारच्या संपर्कात आहोत, सरकारने सर्वांना सुरक्षित आणण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.. * महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, शहर, जिल्हा महानगरातून उमरासाठी मुस्लिम बांधव जातात... * हजमध्ये जाणाऱ्या यात्रेची सरकारकडे नोंदणी होते. मात्र उमरासाठी जाणाऱ्यांची कुठलीही नोंद सरकारकडे नसते. त्यामुळे आकडा निश्चितपणे सांगता येत नाही.. * राज्यातील सुमारे 500 टूर ऑपरेटर्सनी मुस्लिम बांधवांना उंबरासाठी सौदी अरबला पाठवले आहे.. * मुंबईतून सर्वाधिक 100 ऑपरेटर्सनी मुस्लिम बांधवांना उमरासाठी पाठवले आहे.. * तिथे अडकलेल्या मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे.. भारतीय दूतावास त्यासाठी काम करत आहे.. * उमरासाठी मोठ्या संख्येने गरीब मुस्लिमही जातात.. त्यांचा युद्धजन्य परिस्थितीमुळे सौदी अरब मधील थांबणं वाढलं, तर त्यांच्याकडे पैशाची अडचण निर्माण होऊ शकते.. * त्यामुळे सरकारने या प्रकरणी मदत करावी अशी अपेक्षा आहे... आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संपर्क साधणार आहोत..
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 01, 2026 15:34:02
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 01, 2026 15:02:06
Kolhapur, Maharashtra:एक लाख युवकांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेण्याचे ध्येय ठेवले असल्याचे भाजपाचे नूतन युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी म्हटलय. भाजपच्या युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आज कोल्हापुरात कृष्णराज महाडिक यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कोल्हापूरच्या ताराराणी चौक ते शिवाजी चौक या दरम्यान मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये भाजपाचे राज्यसभा खासदार आणि कृष्णाराज महाडिक यांचे वडील धनंजय महाडिक आणि भाजपचे पदाधिकारी हे देखील सहभागी झाले होते. यावेळी हजारो तरुण मोटरसायकल घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झाले. भाजप पक्षाने खूप मोठी जबाबदारी दिली आहे. राज्यभरातील नेत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचे आभार मानतो. भाजपमधील सर्व वरिष्ठ नेत्यांचा विश्वास सार्थ ठरवून पक्ष वाढीसाठी काम केलं जाणार आहे असंही कृष्णराज महाडिक यांनी बोलून दाखवलं आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 01, 2026 14:16:37
Kalyan, Maharashtra:कल्याणच्या बाजारपेठांमध्ये होळी आणि रंगपंचमी निमित्त नागरिकांची खरेदीची लगबग ANC- होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर कल्याण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बाजारपेठे ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत. धुलिवंदन आणि रंगपंचमीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाले आहेत. होळी सणासाठी लागणारे एम गौऱ्या, पेंढा तसेच पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांची विशेष गर्दी पाहायला मिळत आहे. तर रंगपंचमीसाठी लहान मुलांमध्ये पिचकारी, रंगीबेरंगी बंदुका आणि विविध प्रकारचे रंग घेण्याचा उत्साह दिसून येत आहे. कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील बाजारपेठेत दिवसभर ग्राहकांची वर्दळ कायम होती. आज रविवारची सुट्टी असल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची संख्या आणखी वाढल्याचे चित्र दिसून आले. लहान मुलांसोबत त्यांचे पालकही खरेदीसाठी मोठ्या उत्साहात बाजारात फिरताना दिसत होते. विविध रंगांच्या पिचकार्‍या, हर्बल रंग आणि आकर्षक खेळण्यांच्या स्टॉल्सना विशेष प्रतिसाद मिळत आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 01, 2026 13:46:47
Kalyan, Maharashtra:कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी येथील बिस्मिल्ला मशीद परिसरात सांडपाण्याचे साम्राज्य पसरले आहे. घाण पाण्याचा निचरा होत नसल्याने दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात महापौरांनी परिसराचा दौरा करून पाण्याचा निचरा करण्याबाबत निर्देश दिले होते; परंतु अधिकाऱ्यांनी महापौरांच्या आदेशांकडे दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप नगरसेविका समीना शेख यांनी केला. गोविंदवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात तबेले आहेत, त्या तबेल्यातून निघणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात साचत आहे. रमजान महिना असल्यामुळे रोज पाच वेळा नमाज पठणासाठी नागरिक येथे येतात परंतु घाण पाण्यामुळे त्रास होतो. पूर्वरात महापौरांच्या पाहणीनंतर तात्काळ उपाययोजनांची सूचना दिली गेली होती, परंतु त्याचे पालन न झाल्याचा दावा नगरसेविका समीना शेख यांनी केला.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 01, 2026 12:30:15
Akola, Maharashtra:अकोला शहरातील खडकी परिसरात पुन्हा एकदा घरफोडीची घटना समोर आली आहे. वृंदावन नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वृंदावन नगर, खडकी येथील रहिवासी विजय धनराज पाटील हे खासगी कंपनीमध्ये नोकरी करतात, त्यांच्या घरातून शनिवार मध्यरात्रीच्या Sुमारास अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. पाटील कुटुंब शेगाव येथे दर्शनासाठी गेले असताना चोरट्यांनी बाहेरील प्रवेशद्वार व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट फोडून त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आली. यामध्ये सुमारे ३५ ग्रॅम सोने, ५० ग्रॅम चांदी तसेच ९ हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज लंपास करण्यात आला आहे. खदान पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 01, 2026 11:50:16
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - ज्या पद्धतीने टिपू सुलतानचा इतिहास लिहिला तो मुळातच चुकीचा लिहिला गेला आहे - मंत्री जयकुमार गोरे जयकुमार गोरे पालकमंत्री, सोलापूर *ऑन संभाजी महाराज बलिदान मास* आज शिवाजी महाराजांच्या विचाराने राज्य आणि केंद्र काम करतंय. संभाजी महाराजांनी जो त्याग आणि धर्माचे शिक्षण दिलं आहे. यातून नव्या पिढीला माहिती व्हावी हा उद्देश असतो. 42 वर्षापासून बलिदान मास साजरा केला जातो त्याला आपण व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न करतोय. *ऑन छत्रपती शाहू महाराज टिपू सुलतान वक्तव्य* छत्रपतींच्या वंशजाने काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. पण छत्रपतींचे मावळे म्हणून आम्हाला तो विचार अजिबात पसंत नाही. आणि छत्रपतींच्या विचारांची आम्ही पाठराखण करत राहू. ज्या पद्धतीने टिपू सुलतानचा इतिहास लिहिला तो मुळातच चुकीचा लिहिला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन जात असताना त्यांचेच विचार आपण मांडले पाहिजे. आणि त्याच विचारांचा पुरस्कार आपण केला पाहिजे. त्यापलीकडे जाऊन मला वाटतं, टिपू सुलतान आणि अशा व्यक्तींचं गुणगान करणे उचित नाही. अशा प्रकारचे बोलणं किमान त्यांच्या वंशातील लोकांकडून येऊ नये हीच भावना. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून मी व्यक्त करतो. *ऑन इराण युद्ध* दहा ते पंधरा दिवसापासूनच इराण मधील भारतीय नागरिकांना इराण सोडा असे सांगितलं होते. भारत सरकारच्या विनंतीला मान देऊन काही लोकांनी इराण सोडून सुरक्षित ठिकाणी पोहचले. भारत देशाच्या प्रत्येक नागरिकाचा सुरेक्षेचा प्रश्न आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. प्रत्येक भारतीयाला परत आणण्याचा प्रयत्न भारत सरकार करत आहे. ऑन जिल्हापरिषद अध्यक्ष सोलापुरातील जनतेने विक्रमी बहुमत आम्हाला दिलं आहे. तीस ते पस्तीस वर्षात भारतीय जनता पार्टीला एवढं बहुमत कधी आलं नव्हतं. पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून 20 मार्चपर्यंत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड झाली असेल.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 01, 2026 11:04:16
Akola, Maharashtra:अकोल्यात ज्येष्ठ विधिज्ञ बी. के. गांधी यांच्या विधी सेवेला तब्बल पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र एन्ड गोवाचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला. या प्रेरणादायी कार्यक्रमाला भारताचे माजी सरन्यायाधीश भाषण गवई यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि बॉम्बे हाय कोर्टाचे न्यायमूर्ती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात भूषण गवई यांनी बी. के. गांधी यांच्या प्रदीर्घ आणि निस्वार्थ विधी सेवेचा गौरव करत नवीन पिढीने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी, असे आवाहन केले. प्रामाणिकपणा, निष्ठा आणि समाजसेवेची भावना हीच यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी बी. के. गांधी यांनीही आपल्या पन्नास वर्षांच्या प्रवासातील अनुभव सांगताना, “वकीली हा केवळ व्यवसाय नसून तो समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे,” असे सांगितले. सतत अभ्यास, संयम आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास यामुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात उपस्थित विधिज्ञ, तरुण वकील आणि कायद्याचे विद्यार्थी यांच्यासाठी हा सोहळा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला. पाच दशकांची निष्ठावंत सेवा ही केवळ वैयक्तिक यशाची गोष्ट नसून संपूर्ण न्यायव्यवस्थेसाठी अभिमानाची बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अशा कार्यकर्तृत्वातूनच समाजात न्याय, विश्वास आणि मूल्यांची पायाभरणी अधिक भक्कम होत असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 01, 2026 11:02:57
Yavatmal, Maharashtra:यवतमाल च्या दिग्र्रस तालुक्यातील मांडवा गावात होळीनिमित्त विद्यार्थ्यांकरिता पारंपरिक चाकोल्या तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. ग्रामीण संस्कृतीची परंपरा जपत पर्यावरण संरक्षणाचा संकल्प विद्यार्थ्यांनी घ्यावा या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संस्थेने चाकोली बनवा स्पर्धा व ‘प्लास्टिक निर्मूलन' स्पर्धेचे आयोजन केले. 'नवा ध्यास पर्यावरणपूरक होळी करू खास' या प्रेरणादायी संदेशातून प्लास्टिकमुक्त व स्वच्छ गावाचा संकल्प देखील यावेळी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी घेतला. गावातील प्लास्टिक कचरा संकलित करून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 01, 2026 10:50:37
Nala Sopara, Maharashtra:वसई–विरारमध्ये भव्य महास्वच्छता अभियान; आमदार राजन नाईक यांचा सहभाग वसईत ३,८४० स्वयंसेवकांकडून शहराची स्वच्छता मोहीम. ३९ टन कचरा संकलित डाॅ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज वसई–विरार महानगरपालिका क्षेत्रात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. नालासोपारा पश्चिम एसटी डेपो पासून सुरुवात केलेल्या स्वच्छता मोहिमेत नालासोपारचे आमदार राजन नाईक यांनी स्वतः सहभाग घेतला ..... सकाळी ८ वाजल्यापासून दुपारपर्यंत मुख्य व अंतर्गत रस्ते, बाजारपेठा, सरकारी कार्यालये, दवाखाने, पोलीस ठाणे, एसटी स्टँड व rail्वे स्थानक परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमात ३ हजार ८४० स्वयंसेवक सहभागी झाले. एकूण ३९ टन ओला व सुका कचरा संकलित करण्यात आला. पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेमुळे स्वच्छतेबाबत जनजागृती झाली. नागरिकांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 01, 2026 10:34:55
Kalyan, Maharashtra:कल्याण-डोंबिवली परिसर के महात्मा फुले पुलिस थाना के पुराने भवन में लॉकअप की दुरवस्था सामने आई थी, जिससे सुरक्षा पर प्रश्न उठ रहे थे. DCP अतुल झेंडे ने संबंधित विभाग के अधिकारीयों के साथ प्रत्यक्ष निरीक्षण किया और पावसाळे से पहले दुरुस्ती व देखभाल करने के निर्देश दिए.LOCKअप की दीवारों में दरारें, छत की क्षति औरOverall हालत खराब होने से सुरक्षा के खतरे थे. निरीक्षण के दौरान उन्होंने कहा कि सुरक्षा की दृष्टि से लॉकअप की तात्कालिक देखभाल और दुरुस्ती जरूरी है, बारिश शुरू होने से पहले मरम्मत का काम शुरू किया जाएगा और संबंधित विभाग को निर्देश दे दिए गए हैं. जल्द ही इन मरम्मत के कामों की शुरुआत होगी और आरोपी व पुलिस कर्मियों की सुरक्षा को प्राथमिकता दी जाएगी.
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top