icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पश्चिम विदर्भ में बारिश की कमी से मेंढ़पालों की मुसीबत, हजारों पशु लौटने को तैयार

Washim, Maharashtra:पश्चिम विदर्भात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांसोबतच मेंढपाळाच्या अडचणीही वाढल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने हजारो मेंढ्या-बकऱ्यांसह धनगर बांधवांचा परतीचा प्रवास ठप्प झाला आहे. सध्या त्यांचा वाशीम जिल्ह्यातील माळरानांवरच मुक्काम असून चारा, पाणी आणि इतर मूलभूत सुविधांसाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. बुलढाण्यात चांगला पाऊस पडून कुरणे हिरवीगार झाल्यानंतरच त्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याने पावसाच्या प्रतीक्षेत मेंढपाळाच्या नजरा आकाशाकडे लागली आहे
0
0
Report

सुनेत्रा पवार ने जेजुरी पहुँचलकर घायल वारकरों से मुलाकात की; दुर्घटना की जानकारी ली

Rui, Maharashtra:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरीत जाऊन जखमींची घेतली भेट... प्रशासनाशी सुनेत्रा पवार यांनी साधला संवाद..... सासवड जेजुरी मार्गावरील अपघाताची घेतली माहिती..... ग्रामीण रुग्णालयात जाऊन सुनेत्रा पवार यांनी घेतली माहिती.... आज माऊलींच्या वारीत सासवड ते जेजुरी मार्गावर बेलसर फाट्या नजीक एका टेम्पोची धडक बसून तीन महिला वारकरी यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती विकास पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जेजुरी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली आहे. सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाशी संवाद साधत या अपघाताची माहिती घेत जखमींना आवश्यात ते उपचार करण्यात यावेत अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
0
0
Report

कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार किसानों के मुद्दे उठा रहे, दुष्काळ और कर्ज माफी पर आरोप

Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते. समाजाची एकजूट करणे आणि हक्क मिळवणे हा प्रश्न आहे.. शेतकऱ्याचे प्रश्न निर्माण झाले, कर्जमाफीचा पत्ता नाही, शेतकरी यांचे बियाणं न उगवल्यानं हाल होत आहे. शेतकरी चिंतेत आहे... 3 ऑगस्ट 9 ऑगस्ट मंडल यात्रा होईल...यात शेतकरी प्रश्न मांडून जनजागृती करू... On लाडकी बहीण लाभार्थी कमी झाले निवडणुका होत्या तेव्हा सरसकट बहणीना दिले, आता अटी शर्ती लावण्याचे पाप सरकारने केलं. कर्जमाफीत इन्कम टॅक्स अट लावली... यात लाखो शेतकरी वगळण्याचा डार्हा आहे... अंगणवाडी सेविका, कंत्राटी काम करणारे शेतकरी आहे, पोराने फॉर्म 16 भरला म्हणून यात त्याचे नाव वगळेंले जाईल, शेतकरी यांना काही फायदा होणार नाही... पुन्हा मतदानासाठी जेव्हा सत्ताधारी जाईल तेव्हा महिला मतदान करताना जाब विचारेल, लाडकीचे नाव कमी केले रेवडी वाटायला पैसे आहे.... कोटीच्या जमिनी देतात, निवडणुका संपल्या म्हणून मस्तीत असल्या प्रमाणे सत्ताधारी वागत आहे... On गिरीश महाजन दाराडेचा पराभव का झाला हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांची मैत्री युती आहे. त्यामुळे एकमेकांना पाडण्याचे काम करत आहे... On मुंबई SRA SRA मध्ये गोंधळ आहे... चौकशी झाली तर मुंबईत चार पाच लाख कोटींचा घोटाळा बाहे येईल, पुण्यात TDR घोटाळा झाला, 5 हजार कोटींचा घोटाळा आहे... सरकारी जागेचा TDR घेतला, मुंबइ जुहूत सत्ताधारी पक्षाचा आशीर्वादाने SRA सुरू आहे, पैसे कमावण्याचा सत्ताधारी यांचा धंदा आहे... ON पाऊस नाही दुष्काळ अल निनोचा पाऊस कोकणात झाला, विदर्भ मराठवाडा बेल्टमध्ये चिंतेचे वातावरण आहे..लावलंल जे उगवलं ते जाणार आहे.. दुबारसाठी सरकारने तातडीने व्यवस्था करावी, तरच शेतकरी वाचेल, प्रचंड कोरडा दुष्काळ असेल.. सरकारचे यावर चिंतन बैठक नाही, हे दुर्दैव आहे... विधानसभेत बियाण्यासाठी विचारले, मंत्र्यांनी सांगितलं कारवाई करू, काय कारवाई करते याकडे लक्ष आहे... बियाण्यासाठी बैठक लावून, शेतकरी आणि लोकप्रतिनीधी यांना बोलावून बैठक घ्यावी, निवेदन दिले, यात आम्ही शेतकरी यांची भेट घेऊ दौरा करू, बियाणे घेतले, त्याच्यावर कारवाई करा, शेतकरी यांच्या पाठीशी उभे राहू... ON पाऊस तूट पाऊस नाही, यावर्षी अल निनोचा प्रभाव दर्शवला आहे...कमी पावसात कोणतं बियाणे घ्यावे, यावर सरकारने काम केले पाहिजे होते... जे पर्याय द्यायला पाहिजे होते, या संकटातून कसे सावरायचे हे सरकारने सांगावे.. ON चंद्रपूर वाद मनपा मला माहित नाही, निवडला गेलेला नेता, स्थानिक नेते पाहत बसतील. ON एकनाथ खडसे सध्या महाराष्ट्रात भाजपात धुसफू सुरु आहे. मुख्यमंत्री दिल्लीत जाणाऱ्या चर्चेमुळे त्यामुळे मोकळ्या मैदान कसे खेळायचे यासाठी दुसरा गट सक्रिय झाला आहे.... त्यासाठी दुसरा गट सक्रिय झाला असावा असं वाटते त्याबद्दल मला माहित नाही... On खडसे - महाजन पूर्वी महाजन म्हणत होते खडसेंना कसे घेतात मी पाहीन? आता म्हणतात मी रोखलेल नाही. काही ना काही गडबड नक्की आहे... वरून आकाचा आदेश आल्यावर हे काय कोणाचा बाल बाका करतील. On वारकरी अपघात वारकऱ्यांना पैसे देतो पाणी देतो म्हणून निवडणुकीच्या तोंडावर सांगून घोषणा करण्यात आल्या... आज वारकऱ्यांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे₹ सुरक्षेच्या प्रश्न आहे वारकऱ्यांचे हाल होत आहे. मी स्वता वारीत जाणार आहे.. काय परिस्थिती असेल ते पाहणार आहे. दरवर्षी निघणाऱ्या वारी आणि वारकरी संप्रदाय या संदर्भात सरकारच्या तोकड्या व्यवस्था आहे. हे आता लपून राहिलेलं नाही...त्यामुळे अशा पद्धतीचे घटना घडत आहे...
0
0
Report
Advertisement

नाशिक के ग्रामीण क्षेत्र में बारिश से किसानों की चिंता बढ़ी; तुषार सिंचन निर्भरता बढ़ी

Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह येवला तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन, बाजरी, मूग यासह विविध खरीप पिकांची पेरणी केली. पिके उगवू लागली आणि चांगली वाढही सुरू झाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे पिकांसमोर पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी विहिरीतील साठवलेल्या पाण्याच्या आधारावर तुषार सिंचन करून पिके जगवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हा पर्यायही मर्यादित असून, लवकरच दमदार पाऊस झाला नाही तर खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे या संदर्भात थेट शेतकऱ्याच्या बांधावरून आढावा घेतला आहे
0
0
Report

चंद्रपुर में मानसून ने कोवाली फसलें संकट में डाल दीं, किसान चिंतित

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर आता पुन्हा पावसाने मोठी उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतातील कोवळी पिके करपू लागली असून शेतकरी चिंतेत आहेत. पिके वाचवण्यासाठी अनेक शेतकरी तुषार सिंचनाच्या माध्यमातून पानी देत आहेत. काही ठिकाणी बांधावरून मोटार सुरू करून दिवस-रात्र पिकांना जीवदान देण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले असून लवकर पाऊस न झाल्यास खरीप पिकांवर मोठे संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

28 साल से डॉक्टर बनकर दिखाने वाला नकली डॉक्टर गिरफ्तार, 10 करोड़ का घोटाला

Mumbai, Maharashtra:मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-१ ने तब्बल २८ वर्षांपासून स्वतःला डॉक्टर म्हणून सादर करणाऱ्या एका तोतया डॉक्टराला अटक करत मोठा गैरप्रकार उघडकीस आणला आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत आरोपी बनावट ओळखपत्रे, पॅन कार्ड, व्हिजिटिंग कार्ड आणि विविध संस्थांची बनावट प्रमाणपत्रे वापरून डॉक्टर असल्याचा बनाव करत असल्याचे समोर आले. प्राथमिक तपासात आरोपीने विविध बँकांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे खाती उघडून साथीदारांच्या मदतीने मागील तीन वर्षांत सीएसआर फंडाच्या माध्यमातून सुमारे १० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आरोपीच्या घरातून महाराष्ट्रासह इतर राज्यांतील व्यक्ती आणि कंपन्यांच्या नावांची कागदपत्रे, प्रोजेक्ट रिपोर्ट तसेच वैद्यकीय उपचारासाठी वापरले जाणारे साहित्यही जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराचे जाळे अनेक राज्यांमध्ये पसरल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे, वैद्यकीय व्यवसाय अधिनियम आणि राष्ट्रीय चिकित्सा आयोग अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून गुन्हे शाखेकडून त्याच्या इतर साथीदारांचा आणि आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू आहे.
0
0
Report

धनज बुद्रुक में तहसील कार्यालय शुरू करने की मांग पर वाशीम में बड़ा प्रदर्शन

Washim, Maharashtra:वाशीम : वाशीमच्या कारंजा लाड तालुक्यात प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय कामरगावऐवजी धनज बुद्रुक येथेच सुरू करावे,या मागणीसाठी धनज बुद्रुक येथे ग्रामस्थांनी आंदोलन केले.बसस्थानक चौकात घोषणाबाजी करत शासनाचा निषेध करण्यात आला. धनज बुद्रुक हे प्रशासकीय व भौगोलिक दृष्ट्या सक्षम केंद्र असल्याने कार्यालय येथेच सुरू करण्याची मागणी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास चक्काजामसह तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. तसेच हस्ताक्षर अभियान सुरू असून,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
0
0
Report
Advertisement

मंचर दूध मिलावट विरोधी मेळावे में विजय शिंदे ने मुंडे को महापूजे का सम्मान मांगा

Shirur, Maharashtra:महाराष्ट्रातील प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नावाची सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मंचर येथे आयोजित दूध भेसळविरोधी एल्गार मेळाव्यात शिवसेना नेते विजय शिंदे यांनी एक अशी मागणी केली आहे, ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तुकाराम मुंडे यांना पंढरपूरच्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान मिळायला हवा, अशी थेट मागणी शिंदे यांनी केली आहे. मंचर येथील मेळाव्यात बोलताना विजय शिंदे म्हणाले की, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समाज प्रबोधनाचे काम केले, तर आधुनिक काळातील तुकाराम मुंडे हे लोकांचे आरोग्य आणि अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी भेसळखोरांविरुद्ध लढा देत आहेत. शेतकऱ्यांच्या आणि लहान मुलांच्या जिवाशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर कडक कारवाई करण्यासाठी अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे. म्हणूनच, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या विठ्ठलाच्या महापूजेच्या वेळी तुकाराम मुंडे यांनाही मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने पूजेचा मान दिला जावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. आता विजय शिंदे यांच्या या मागणीवर राज्य सरकार आणि खुद्द मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, या मागणीमुळे महाराष्ट्रातील प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी जनता कशी खंबीरपणे उभी राहते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
0
0
Report
Advertisement

अक्कलकोट आगार में पांच नई राजमाता जिजाऊ बसों का लोकार्पण, यात्रियों को सुविधाएं

Solapur, Maharashtra:सोलापूर - परिवहन विभागाकडून अक्कलकोट आगारास मिळालेल्या पाच नव्या राजमाता जिजाऊ बसचे लोकार्पण. अक्कलकोट आगारास पाच नव्या राजमाता जिजाऊ बस प्राप्त झाल्या असून त्याचे लोकार्पण आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. अक्कलकोट शहरात श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक येत असतात त्यामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध करण्यात आलीय. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट मध्ये येणाऱ्या स्वामीभक्तांचा प्रवास सदैव सुखकर होण्यासाठी आम्ही कटिबंध असल्याचा विश्वास व्यक्त केलाय.
0
0
Report

वर्धा में नेतृत्त्व स्वागत के लिए गणवेश का दुरुपयोग, विद्यार्थी गेट पर खड़े

Wardha, Maharashtra:वर्ध्यात चक्क नेत्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांचा शालेय गणवेशाचा वापर. सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेशात गेटवर ठेवले उभे, काँग्रेसच्या मेळाव्यातील धक्कादायक प्रकार. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, आणि इतर नेत्यांच्या स्वागतासाठी सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थ्यांचा वापरल्याचा प्रकार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, अंतोरा या शाळेच्या लहान मुले चक्क सुट्टीच्या दिवशी काँग्रेसच्या नेत्यांचे स्वागत करायला हजर. राजकीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा वापर, शिक्षण विभागाची भुमिका काय याकडे लक्ष. काल रविवारी महात्मा ज्योतिबा फुले शताब्दी सोहळा असल्याचा होता कार्यक्रम. तब्बल दोन तास नेते उशिरा आले असतांना देखील विद्यार्थ्यांना त्रास. शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात घडला विद्यार्थ्यांनासोबत प्रकार. आष्टी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील असलेल्या अंतोरा गावातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थी असल्याची माहिती.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top