Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.

Aug 26, 2024 17:26:23
Yavatmal, Maharashtra

राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Mar 04, 2026 05:02:34
Shirdi, Maharashtra:शाळेत मुलगी एकटी राहत असल्याच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत तिच्याशी जवळीक वाढवत शिक्षकाने आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संगमनेर तालुक्यात घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय..या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ नराधाम शिक्षकाला अटक केली असुन आरोपी शिक्षक अमोल भोसले (वय २३, ता. संगमनेर) याचे विरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय...पिडित मुलगी ग्रामीण भागातील एका खासगी शाळेत सध्या आठवीत शिक्षण घेत आहे.ती तिच्या घरात एकटी राहत होती.वडील माझ्यापेक्षा मोठेया भावाचे जास्त लाड करत होते...त्यामुळे मला एकटेपणा वाटे.मी शाळेत एकटी राहत असे त्यामुळे सदर शिक्षकाने आपल्याशी कारण विचारले...पुढे शिक्षकाने आपल्याशी मैत्री वाढवली.आईच्या मोबायवर आपल्याशी संपर्क केला. त्यानंतर घरी येऊन आपल्यावर वारंवार अत्याचार केला, असे सदर पिडित मुलीने फिर्यादीत म्हणटले आहे.शाळेत आणि वर्गात एकटी राहत होती. त्याचा गैरफायदा घेत शिक्षक भोसले यांनी तिच्याशी सातवीत असतानापासून मैत्री केली. पुढे तिच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केले. मुलीच्या पोटात वेदना होऊ लागल्यानंतर पुण्यातील रुग्णालयात तपासणी केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे...अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने शाळा प्रशासनाने प्रत्येक महिन्यात शिक्षक - पालक मेळावा घ्यावा यात पोलिस सहभाग घेऊन मार्गदर्शन करतील असे यावेळी घारगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात यांनी म्हणटलय...
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 04, 2026 05:01:56
Dhule, Maharashtra:इस्रायल आणि इराणीच्या युद्धामुळे दुबई शहरावरती अनेक ठिकाणी हल्ले झालेत. त्यामुळे भारतीय नागरिक तिथे अडकून पडलेले आहेत. मात्र सुरुवातीच्या दोन दिवसानंतर आता दुबईमध्ये परिस्थिती पूर्व पदावर येत असल्याचं चित्र दिसून येत आहे. या ठिकाणी अडकलेल्या धुळ्यातील मॉन्टी पाटील यांनी व्हिडिओ शेअर करत त्या ठिकाणी आनंद उत्सवाचं वातावरण असल्याचं सांगितलं आहे. या ठिकाणी सर्व परिस्थिती नियंत्रणात असून फक्त विमानसेवा सध्या बंद असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. पर्यटक खुल्या मैदानात येऊन दुबई शहरात आनंद घेत असल्याचेही या दृश्यांमध्ये दिसून येत आहे. बुर्ज खलिफा ला हजारो लोकं एकत्र आल्याचं दृश्यमध्ये दिसतं असून, युद्धाचा परिणाम येथे दिसूनच येत नाही अशी स्थिती आहे. दुबईत कुठे काहीही गैरसोय नाही, 3 तारीखला मार्केट सुरु आहे आणि फक्त विमान सेवा सुरु होण्याचो वाट पाहत आहेत, अशी माहिती मॉन्टी यांनी दिली है.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 04, 2026 05:01:39
Beed, Maharashtra:दुबईत पर्यटनासाठी गेलेले परळीतील डॉ.कल्याणे दांपत्य अडकले राज्य व केंद्र सरकारला केले मदतीचे आवाहन ANC- आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पर्यटनासाठी गेलेले नागरिक अडकल्याचे समोर येत आहे. बीडच्या परळीतील डॉ.मयूर कल्याणे आणि डॉ.पूनम कल्याणे हे दांपत्य 22 फेब्रुवारी रोजी दुबई येथे पर्यटनासाठी गेले होते.28 फेब्रुवारी रोजी कल्याणे दांपत्य परतणार होते मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे ते 28 तारखेपासून दुबईमध्ये अडकून पडले आहेत. त्यांनी इंडियन ॲम्बेसी आणि काउंसल जनरल ऑफ इंडिया इथे मदतीसाठी गेले असता आम्हाला काहीच रिस्पॉन्स भेटला नसल्याचं त्यांनी सांगितलय. राज्य व केंद्र सरकारने आमची दखल घेऊन आम्हाला इथून बाहेर काढण्याची आव्हानही त्यांनी केले आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 04, 2026 04:33:02
Bhandara, Maharashtra:पेवठा परिसरात वाघाची दहशत...पाळीव जनावरांची केली शिकार...परिसरातील गावात भीतीचे वातावरण...वनविभागाकडून शर्तीचे प्रयत्न सूरु...वाघाला पकडण्यासाठी ट्रॅप कॅमरे व पिंजरा लावले असले तरी वाघ वनविभागाच्या सर्व प्रयत्नांना हुलकावणी देत आहे. दररोज गावातील नागरीकांना वाघाचे दर्शन होत असल्याने भीतीचे वातावरण, दिवसा ढवळ्या सुद्धा नागरिक शेतावर जाण्यास घाबरत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतातील कामे खोळंबली आहेत; चना, तूर, लाखोरी, कापूस काढणीला आले आहेत मात्र वाघाच्या भीतीने मजूर वर्ग सुद्धा शेतावर जात नाही. पेवठा परिसरात वाघाने दोन शिकार केल्याने भीतीचे वातावरण पसरले असून महिला मजूर ह्या सुद्धा शेतावर जायला धजावत आहेत. आयुध निर्माणी भंडारा येथे कर्मचाऱ्यांचे देखील कोंडी, पेवठा, लोहारा, सालेबर्डी या गावात रहिवास असल्याने रात्रपाळीच्या वेळी कामावर जाताना कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी व तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 04, 2026 04:02:11
Kolhapur, Maharashtra:Kop Sahayadri Tiger Feed:- 2C Anc:- सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अजून एका नवीन नर वाघाची नोंद झालीय. नवीन वाघाला STR T9 असे सांकेतिक नंबर देण्यात आले आहे. स्थानिक गाईड मंडळीनी या वाघाचे नामकरण शिलेदार असे केले आहे. नवीन वाघ हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात गेले दोन महिने विविध कॅमेरा ट्रॅप मध्ये दिसून आला आहे. सध्या हा STR T9 शिलेदार हा वाघ STR T5 तारा वाघिणीच्या ट्रेटरी मध्ये तिच्या मागे मागे फिरत असताना दिसत आहे. शिलेदार या नर वाघामुळे सह्याद्रीमध्ये एकूण वाघांची संख्या सात झाली आहे. सह्याद्रीच्या जंगलात असणाऱ्या वाघांना सह्याद्रीला साजसे अशी नावे या सात वाघांना देण्यात आले आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात असणाऱ्या वाघांची नावे नेमके काय आहेत त्यावर एक नजर टाकूया. GFX T1 सेनापती T2 सुभेदार T3 बाजी T4 चंदा T5 तारा T6 हिरकणी T9 शिलेदार GFX Out Anc/ Tag :- सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील T5 (तारा) ह्या वाघिणीच्या क्षेत्रात T1 सेनापती , T 2 सुभेदार, व नव्याने आलेला T 9 शिलेदार हे तीन वाघ फिरत आहेत.. आता तारा T5 ही वाघीण कोणत्या जोडीदाराची निवड करते हे पाहणे उत्सुकतेच आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 04, 2026 04:01:59
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 04, 2026 04:01:19
Chendhare, Maharashtra:बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे उपोषण सहाव्या दिवशीही सुरूच. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. होळीच्या सणातही आंदोलक ठाम. अँकर - पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्प ग्रस्तांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेलं उपोषण आज सहाव्या दिवशीही सुरूच आहे. होळी सारख्या सणासुदीच्या दिवसात देखील आंदोलन या ठिकाणी ठाण मांडून असून सरकारच्या नावाने शिमगा करीत आहे. मात्र त्यांच्या या आंदोलनाची प्रशासनाने अपेक्षित दखल घेतलेली दिसत नाही. धरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम पूर्ण होण्यापूर्वी आमच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात असे आंदोलकांची मागणी आहे. प्रकल्पासाठी न वापरलेली जमीन परत करून तो सातबारा कोरा करावा, अशी प्रकल्पग्रस्तांची प्रमुख मागणी आहे. बाईट - आंदोलक
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 04, 2026 04:00:43
Nagpur, Maharashtra:विजय वडेट्टीवार बाईट शरद पवार राज्यसभा उमेदवार आज तीन पक्षाची बैठक आहे, तो रिपोर्ट आम्ही दिल्लीला देऊ.. आज कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार निश्चित होईल.. अजूनही कुठल्याही नावावर अंतिम निश्चिती झालेली नाही.. आमची आग्रही मागणी होती की राज्यसभेची जागा आम्ही राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आम्हाला मिळावी. विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळावी. तीन पक्षाच्या आघाडीमध्ये जे काही ठरेल, ते अंतिम होईल.. हाय कमांड त्याबद्दल अंतिम निर्णय घेईल.. サуп्रिया सुळे काय म्हणत आहेत, ते उद्धव ठाकरे यांना भेटून काय बोलल्या, हे मला माहित नाही.. आम्हाला अजूनही दिल्लीवरून काँग्रेसच्या भूमिकेबद्दल कुठल्याही सूचना आलेल्या नाही.. आ आखाती देशात भारतीय अडकले दुबईमध्ये परिस्थिती फार काही वाईट नाही. मात्र मोठ्या संख्येने लोक तिथे अडकलेले आहे.. त्यांच्यामध्ये भीती आहे.. त्यामुळे केंद्र सरकारची, राज्य सरकारची जबाबदारी आहे ki ते लवकरात लवकर सुरक्षित भारतात परत आणावे.. मुस्लिम उमरा भाविक ते सर्व भारतीय आहेत, त्यात हिंदू मुस्लिम असे फाटे फोडण्याची गरज नाही.. जे लोक अडकले आहेत, ते सर्व भारतीय असून त्यांना सुरक्षित आणणे भारत सरकारचे काम आहे... एसबीएल स्फोट नागपूरचे दहा किलोमीटरच्या अंतरावर 14 स्फोटक कारखाने असून दरवर्षी तिथे दुर्घटना होत असतात.. अनेकांचे मृत्यू होत असतात.. PESO स्फोटक सुरक्षिततेसाठीच्या संस्थेचा मुख्यालय नागपुरात आहे.. मुख्यमंत्री नागपूरचे आहे, मात्र दरवर्षी घटना घडतात.. सरकारचा गांभीर्याने याकडे लक्ष नाही.. एसबीएल स्फोट प्रकरणी मृत्युसंख्या वाढण्याची शक्यता आहे.. आम्ही SBL स्फोट प्रकरणी विधिमंडळात या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव दिले आहे.. आम्ही सरकारला या संदर्भात प्रश्न विचारू.. मोठी मदत जाहीर केली म्हणजे पैशाने जीव खरेदी करता येत नाही.. तिथल्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने सरकार काय प्रयत्न करत आहे असा आमचा प्रश्न आहे... या प्रकरणात सदोष मनुष्य वधाचा नाही तर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे... ओबीसी छात्रावास महापुरुष नाव प्रस्ताव चांगला आहे, मात्र महापुरुष कोण हे आधी ठरवा.. शाहू, फुले L, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांची नावे द्या.. भाजपचे नेत्यांची नावे देऊ नका... महापुरुषांच्या नावाने भलतीच नाव देऊ नये अशी अपेक्षा आहे...
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 04, 2026 04:00:28
Amravati, Maharashtra:अमरावतीचे 25 पेक्षा अधिक पर्यटक अडकले दुबई, पर्यटकांना आखाती देशांच्या युद्धाचा फटका; गोळ्या, औषध आणि पैसे संपल्याने पर्यटकांचे हाल. अमरावतीचे 24 पर्यटक 26 फेब्रुवारीला दुबईत दाखल झाले होते; संपूर्ण दुबईची सैर केल्यानंतर पर्यटक मायदेशी परत येणार असताना त्यांना स्फोटाचे आवाज आल्याने सर्व पर्यटक सध्या दुबईतील नाईट कॅसल हॉटेलमध्ये सुखरूप आहेत. हॉटेल बाहेर पडू नका अशा सूचना स्थानिक प्रशासनाने दिल्या असून पर्यटकांसाठी हेल्पलाइन जारी करण्यात आली आहे. जवळपास अडकलेल्या सर्वच पर्यटकांशी अमरावती जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला असून सर्व पर्यटक हे 25 पेक्षा अधिक असल्याची माहिती उपजिल्हाधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान आता पर्यटकांजवडील गोळ्या, औषध आणि पैसे संपल्याने पर्यटकांचे मोठे हाल होत असून आम्हाला मायदेशी लवकर परतण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 04, 2026 03:46:01
Nagpur, Maharashtra:नागपूर - कामठीतील चौधरी हॉस्पिटल परिसरात धक्कादायक घटना, वाहनाला साईड देण्याच्या कारणावरून किरकोळ कारणावरून झाला वाद - मात्र टोकाला जात वादाचे हाणामारीत रूपांतर झालं यात तरुणाचा मृत्यू - रवी शिवकुमार गुटलेवार असं मृतक तरुणाच नाव आहेय... - अक्षयकुमार धनराज गेडाम असं आरोपीचे नाव आहेय... - धक्काबुक्कीत खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत, लागलीच उपजिल्हा रुग्णालय, कामठी येथे उपचार - त्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलविण्यात आले - उपचारादरम्यान प्रकृती खालावून मृत्यू, एक वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता, पत्नीसमवेत भाड्याच्या घरात वास्तव्यास होता... - होळीच्या दिवशी घडलेली घटन घडल्यान शहरात तणावाचे वातावरण - जुनी कामठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सुरू
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 04, 2026 03:45:42
Satara, Maharashtra:कराड:- पुणे- बेंगळोर महामार्गावर रस्त्यातच कंटेनर आडवा पलटी झाल्याने मध्यरात्री एक वाजेपर्यंत वाहन चालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. पुणे मुंबई सातारा या शहरांकडे जाणाऱ्या मार्गावर रात्री नऊ वाजता पलटी झालेला कंटेनर एक वाजता बाजूला करण्यात आला तर त्यानंतर जवळपास दहा ते बारा किलोमीटर लागलेल्या वाहनांच्या रांगा रिकाम्या करण्यात आल्या. कराड जवळ खोडशी येथे हा अपघात झाल्याने पूर्ण रस्ता बंद झाला होता. कंटेनर मोठा असल्याने अनेक वाहन चालकांनी आणि प्रवासी ने रस्त्यातच जेवण उरकून घेतले. यावेळी ॲम्बुलन्स देखील या ट्रॅफिक मध्ये बराच काळ अडकली होती.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 04, 2026 03:45:27
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ च्या वणी येथे होळी च्या धुळवडीला गुद्दलपेंडीचा थरार रंगला. रंगनाथ स्वामी मंदिरापुढील जत्रा मैदानावर दोन स्पर्धक एकमेकांना ठोसे मारून हा पारंपरिक खेळ खेळतात. एका खांबाला बांधलेला नाडा, एक हाताने पकडून दुसऱ्या हाताने प्रतिस्पर्ध्यावर ठोसे मारले जातात. नाडा सोडला तर तो स्पर्धक बाद ठरतो. विजयी व पराभूत स्पर्धक शेवटी गळाभेट घेऊन खेळ संपवतात. विशेष म्हणजे या खेळाला वयाची मर्यादा नाही. गुद्दलपेंडी हा केवळ मारामारीचा खेळ नसून ‘कायमचे वैर संपवणारा खेळ’ अशी त्याची ओळख आहे. पूर्वी एकमेकांशी वैर असलेले लोक या खेळातून राग व्यक्त करून शेवटी गळाभेट घेत आपले मतभेद मिटवायचे, शंभर वर्षांहून अधिकची परंपरा लाभलेल्या या गुद्दलपेंडी खेळामुळे वणी शहराची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 04, 2026 03:45:13
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 04, 2026 03:32:44
Wardha, Maharashtra:वर्धा के हनुमान टेकड़ी परिसरात अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. टेकड़ीवरील कोरड्या गवताला व झाडाझुडपांना आग लागल्यानंतर काही मिनिटांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचे फवारे व विशेष उपकरणांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य केले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र नैसर्गिक वनस्पतींचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top