icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

लोणावळा में ऑनलाइन विला बुकिंग स्कैम से पर्यटकों में हड़कंप

Varsoli, Maharashtra:पर्यटन नगरीとして देशभर प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात सध्या पर्यटकांची फसवणूक करणारा ऑनलाईन व्हिला बुकिंग स्कॅम उघडकीस आला आहे. थंड हवेच्या ठिकाणाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. मात्र आता याच पर्यटकांना लक्ष्य करत सोशल मीडियावर आकर्षक व्हिला आणि बंगल्यांचे फोटो टाकून ऑनलाइन भामटे सक्रिय झाले आहेत. बुकिंगच्या नावाखाळे २० ते २५ हजार रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम घेतली जाते… इतकंच नाही तर विश्वास बसावा म्हणून संबंधित ठिकाणाचे लाईव्ह लोकेशनही पाठवले जाते. मात्र प्रत्यक्षात पर्यटक लोणावळ्यात पोहोचल्यावर त्या ठिकाणी कोणताही व्हिला किंवा बंगला अस्तित्वात नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय. या वाढत्या फसवणुकीमुळे पर्यटक आर्थिक फटका सहन करत आहेत. तर दुसरीकडे स्थानिक व्यावसायिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.या स्कॅममुळे लोणावळ्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर स्थानिक व्यावसायिकांच्या मते, हे स्कॅम लोणावळ्यातील नसून बाहेरील भामट्यांकडून रचले जात आहेत. त्यामुळे पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंग करताना अधिकृत वेबसाईट्सचाच वापर करावा आणि सतर्क राहावे, असं आवाहन करण्यात येत आहे. “ऑनलाईन बुकिंग करताना खात्री करूनच व्यवहार करा, अधिकृत माध्यमांचा वापर करा.” सह्याद्रीच्या पर्वत रांगेत हिरवाईने नटलेल्या लोणावळ्यात पर्यटनाचा आनंद घ्यायला येणाऱ्या पर्यटकांसाठी हा मोठा इशारा आहे. पर्यटन नगरीत फिरायला येण्यापूर्वी ऑनलाइन बुकिंगच्या फंद्यात न पडता फसवणुकीपासून सावध रहा आणि थेट लोणावळ्यात आल्यावरच व्हीला, रिसॉर्ट, बुकिंग करण्याचं आवाहन पर्यटकांना करण्यात येत आहे.
0
0
Report

नाशिक के पंचवटी में सिगरेट मांगने पर आरोपी ने चॉपर से हमला कर राहुल राऊत की मौत

Nashik, Maharashtra:सिगारेट देण्यास नकार दिल्याच्या रागातून संशयित आरोपीने चॉपरने हल्ला करत तरुणाचा जीव गमवावा लागल्याची घटना नाशिकच्या पंचवटी परिसरात घडलीये... राहुल कृष्णा राऊत असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय... राहुल राऊत हा टिल्लू पवार व सुनील गुंजाळ या मित्रांसोबत शनिवारी 18 तारखेला रात्री साडेनऊच्या सुमारास नवनाथ नगर परिसरातील साईबाबा मंदिराजवळ बसला होता. यावेळी रोहिदास वामनराव आहेर हा तेथे आला व त्याने राहुलकडे सिगारेटची मागणी केली. मात्र राहुलने नकार दिल्याने संतापलेल्या आहेरने आपल्या जवळील चॉपरच्या उलट्या बाजूने राहुलच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला. मात्र राहुल याचा सोमवारी पहाटे दोनच्या sसमयी त्याचा मृत्यू झाला. मयताचे वडील कृष्णा हरी राऊत यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे... यात संशयित आरोपी रोहिदास आहेर सराईत गुन्हेगार असून कुणाच्या प्रयत्नात त्याला वर्षभरापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती... यावर तो जामीनावर काही दिवसांपूर्वीच सुटलेला होता... केल्यानंतर रोहिदास फरार असून हा संशयताला शोधण्यासाठी पोलिसांनी दोन पथक रवाना केली आहे.... बाईट- सुनील पवार, पोलीस निरीक्षक
0
0
Report
Advertisement

यवतमाळ के रालेगांव में 34 लड़कियों की कथित बिक्री पर घमासान

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील ३४ मुलींच्या कथित विक्री प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. भाजप जिल्हाध्यक्षांनी केलेल्या या दाव्यामुळे हिंदुत्ववादी संघटना चांगल्यााच आक्रमक झाल्या, मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात फारसे तथ्य नसल्याचे सांगितले तर भाजपचे आमदार राजू तोडसाम यांनीही भाजप जिल्हाध्यक्ष व आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केल्याने भाजपची चांगलीच कोंडी झालेली बघायला मिळत आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या मतदारसंघासह आदिवासी बहुल भागात हिंदू मुलींची विक्री होत असल्याचा दावा भाजपाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल चौहान यांनी केला. मुलींची विक्री लव जिहाद च्या कृत्यातून धर्मांतरणासाठी होत असल्याचा आरोप चौहान यांनी केला. त्यामुळे आक्रमक होत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल सारख्या संघटनांनी संताप व्यक्त करीत राळेगाव बंद पाळला. संशयित आरोपीच्या घरावर हल्ला चढविल्या गेला. या आरोपीला पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी न करता सोडून दिल्याचा आरोप करीत त्याला निलंबित करण्याची मागणी देखील भाजपा ने केली. पार्श्वभूमी: दो ऑडिओ क्लिपचा दाखला दिला, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके देखील पोलीस ठाण्यात ठाण मारून बसले, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या पोलिसांकडून माहिती जाणून घेतली. परंतु ऑडिओ क्लिप मधील संभाषण करणारी तरुणी मात्र पोलिसांच्या चौकशीत काहीच बोलायला तयार नाही, मुलींची विक्री व लव जिहाद बाबतही कुठलीच तक्रार पुढे आली नाही. याउलट भाजप जिल्हाध्यक्षांचा दावा भाजपचेच आमदार राजू तोडसाम यांनी खोडून काढला, यात एका बालविवाह खेरीज काहीच निष्पन्न झाले नाही. झालेल्या अपप्रचारामुळे आदिवासी समाजाची बदनामी झाल्याची खंत ते बोलून गेले. भाजपचे जिल्हाध्यक्ष, मंत्री आणि आमदार यांचीच एक वाक्यता नसेल तर मुलींच्या विक्री प्रकरणात ते कसे आणि किती गंभीर आहे हा प्रश्न उपस्थित होतो, भाजपचा डाव हा धार्मिक द्वेष पसरविण्यासाठी असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. तर भाजपा अंतर्गत चढाओढीच्या राजकारणामुळे सर्वसामान्य नागरिक भरडल्या जात असल्याची चर्चा आता रंगत आहे.
0
0
Report
Advertisement

बारामती उपचुनाव के लिए कल 478 मतदान केंद्र, CCTV निगरानी के साथ मतदान

Rui, Maharashtra:बारामती पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान.... 478 मतदान केंद्रावरती होणार मतदान..... ..... मतदान केंद्रावरती असणार सीसीटीव्हीची करडी नजर..... Anchor _बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या गुरुवारी 23 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे एकूण 478 मतदान केंद्रांवर ती मतदान प्रक्रिया पार पडली जाणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व मतदान केंद्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली असणार आहेत अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली आहे. आज या प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन पोहोचवल्या जात आहेत. निवडणूक व्यवस्था, मतदानासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती,सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग सुविधा,कायदा व सुव्यवस्थेसाठी सीसीटीव्ही व पोलिस बंदोबस्त तसेच आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आलीय... बारामती तालुक्यात एकूण मतदार : ३लाख ८४हजार ५७९ मतदार असून पुरुष १,९३,८७१ आहेत. तर महिला १,९०,६८४,असून तृतीयपंथी २४ मतदार आहेत. तालुक्यात एकूण ४७८ मतदान केंद्रे आहेत.यामध्ये ईव्हीएम ४७८,बॅलेट युनिट्स ९५६, व्हीव्हीपॅट ४७८,यंत्रणा आहेत. तर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट ६०,बॅलेट युनिट्स १२०राखीव यंत्रे ठेवण्यात आली आहेत.. एकूण वाहने १६५ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी,स्वच्छतागृहे,वैद्यकीय संच उपलब्ध करू. देण्यात आले आहे. मतदान प्रकिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस बंदोबस्ताबरोबरच ८ तपासणी नाके (चेक पोस्ट), १६ स्थिर पथके,८ भरारी पथके अशी एकूण ९६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पुढील महिन्या ४ मे २०२६ रोजी याच ठिकाणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदामात मतमोजणी प्रकिया पार पडणार आहे.
0
0
Report

संगमनेर के भोंदू राजेंद्र गडगे पर पुलिस का फिर छापा, लाखों रुपये जब्त

Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील भोंदू राजेंद्र गडगे याच्या दत्तधाम दरबाराची आज उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून पुन्हा झाडाझडती घेण्यात आली.. गुह्या संदर्भात महत्वाचे पुरावे जमा करण्याचं काम पोलीसांकडून वेगाने सुरू आहे.. मंत्र तंत्राने असाध्य रोग बरे करण्याचा दावा करणारा संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील भोंदू राजेंद्र गडगे गजाआड गेला आहे.. सोमवारी पोलीसांनी दरबाराची झाडाझडती घेत त्याचा दत्तधाम सरकार दरबार सिल केला होता.. आज पुन्हा आरोपीला घेऊन पोलीस गडगेच्या घरी पोहचले आणी महत्वाचे दस्तऐवज, सिसीटिव्हीचे डिव्हीआर यासह लाखो रूपये जप्त केले आहे.. डॉ कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलिस अधिकारी..
0
0
Report

राहुरी विधानसभा पोटनिवड: कल मतदान, 3,33,543 मतदाता, 374 केंद्र, सुरक्षा मजबूत

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्या नगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे... राहुरी मतदारसंघात 3 लाख 33 हजार 543 मतदार आहेत... मतदान प्रक्रियेसाठी एकूण 374 मतदान केंद्र आहेत तर मतदान प्रक्रियेसाठी 1745 कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहेत. या मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी प्रशासनाकडून करण्यात आलीये... केंद्रासाठी लागणारे ईव्हीएम व्हीव्हीपॅट आणि इतर लागणारे साहित्य मतदान कर्मचाऱ्यांना थेट मतदान केंद्रावर उपलब्ध होणार आहे...उन्हाचा कडाका लक्षात घेता मतदान केंद्रावर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
0
0
Report
Advertisement

सिंधुदुर्ग में टोल वसूली फिर शुरू, विपक्ष का तीखा हमला—गडकरी पर आरोप

Oras Bk., Maharashtra:मुंबई गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या ओसरगाव येथील टोल नाक्याच्या शुभारंभाचे संकेत मिळाले आहेत. केंद्र शासनाने याबाबत निविदा प्रक्रिया सुरू केली असून 23 तारीख पर्यंत निविदा स्वीकारल्या जाणार असून 24 तारीख रोजी टोल वसुली साठी ठेकेदार नेमण्यात येणार आहे. 2023 साली टोल वसुली सुरू करण्यात आली होती मात्र स्थानिक पदाधिकारी आणि प्रवासी संघटनांनी विरोध केल्यामुळे टोल वसुली थांबली होती. मात्र आता पुन्हा एकदा टोल वसुली केली जाणार असल्याने विरोधक आक्रमक झाले असून नितीन गडकरी हे सिंधुदुर्गात टोल सुरू करण्यासाठीच आले होते असा आरोप करत टोल वसुलीला आपला विरोधच राहील अशी भूमिका ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतलीय.. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होणाऱ्या टोल वसुली नंतर राजकीय नेते व स्थानिक काय भूमिका घेतात या कडे आता सर्वांच लक्ष लागलेय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी
0
0
Report
Advertisement

वाशीम में सीड बैंक प्रदर्शन से पर्यावरण जागरूकता बढ़ी

Washim, Maharashtra:वाशीम: वाढते प्रदूषण,वृक्षतोड, पाण्याची टंचाई आणि ग्लोबल वॉर्मिंग यांसारख्या समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहेत.या पार्श्वभूमीवर पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २२ एप्रिल रोजी जागतिक“वसुंधरा दिन” साजरा केला जातो.याच निमित्ताने वाशिम येथील एस.एम.सी.शाळेत निसर्ग इको क्लब,राष्ट्रीय हरित सेना आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सीड बँक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या बियांची माहिती सादर केली.तसेच या बियांचा उपयोग शाळेच्या परिसरातील बॉटनिकल गार्डन विकसित करण्यासाठी आणि सामाजिक वनीकरणाच्या उपक्रमांसाठी करण्यात येणार आहे.
0
0
Report

वाशीम के NH पर सर्विस रोड के काम से ट्रैफिक जाम; एक एम्बुलेंस भी फंसी

Washim, Maharashtra:वाशीम शहरातून जाणाऱ्या अकोला–नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. आज शहरातील पुसद नाका या वर्दळीच्या चौकात चारों बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, ज्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दुपारच्या उन्हात वाहनचालक, प्रवासी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे, एका Ambulanceलाही या कोंडीत अडकावे लागल्याने रुग्णसेवेवर परिणाम झाला. सर्व्हिस रस्त्याच्या कामा दरम्यान योग्य पर्यायी व्यवस्था नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला है.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top