Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.

Aug 26, 2024 17:26:23
Yavatmal, Maharashtra

राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UPUmesh Parab
Mar 27, 2026 12:32:00
Ranbambuli, Maharashtra:सिंधुदुर्ग --- बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या.. सिंधुदुर्ग हदरला.. कणकवली तालुक्यातील बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांची गोळ्या घालून करण्यात आली निर्घृण हत्या.. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घटना घडल्याचा पोलीसांचा अंदाज.. दळवी यांची हत्या नेमकी का झाली? कारण गुलदस्त्यात... श्वविच्छेदनासाठी मृतदेह नेला जाणार कोल्हापूरला... डोक्यात गोळी लागल्याने बांधकाम व्यवसायिकाचा झाला मृत्यू... अधिक तपासासाठी आवश्यक आहे श्वविच्छेदन रिपोर्ट.. मात्र ही सुविधा सिंधुदुर्ग जिल्ह्यात नसल्याने मृतदेह नेण्यात येणार कोल्हापूर येथे, वैध्यकीय सूत्रांनी दिली माहिती... सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह... बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या खुणानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात उडालीय खळबळ... सिंधुदुर्ग पोलीस करत आहेत अधिक तपास...
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 27, 2026 12:18:15
Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्वेतील सत्यम उर्फ गणेश भुवन डान्सबार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा बार शासकीय जागेत असल्याने गेल्या दीड वर्षात या बारवर दोन वेळा कारवाई झाली होती मात्र हा बार पुन्हा एकदा सुरू झाला. आज पुन्हा तहसीलदाराचे पथक प्रचंड पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि या बार वर तोडक कारवाई केली. तहसीलदारांच्या पथकाच्या या कारवाईला बार चालकासह बारमधील कर्मचाऱ्यांनी जोरदार विरोध केला. जेसीबीच्या खालीच बारचे कर्मचारी व चालक बसून राहिले. त्यामुळे कारवाईला काही काळ अडथळा निर्माण झाला. अखेर तहसीलदारांच्या पथकाने पोलीस फौजफाटा मागवून ही कारवाई पुन्हा एकदा सुरू केली. यावेळी बार चालकाने तहसीलदारांचे पथक ही कारवाई आकस बुद्धीने करत आहे प्रत्यक्षात ही शासकीय जमीन असेल तर येथील संपूर्ण परिसर शासकीय जमिनीवर वसलेला आहे मात्र कारवाई फक्त आमच्याच बार वर सातत्याने होते. आम्ही सगळे टॅक्स भरतोय, आमच्याकडे कायदेशीर परवानगी आहे मात्र केवळ आणि केवळ काही ब्लॅकमेलरची पैशांची मागणी आम्ही पूर्ण केले नाही त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून आकस बुद्धीनेच हे कारवाई सुरू असल्याचा आरोप केला.
756
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 27, 2026 12:07:30
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर शहरातील डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयात बीएड सीईटी परीक्षेत दरम्यान गोंधळ, महाविद्यालयातील संगणक लॅब अद्ययावत नसल्याने परीक्षार्थींना सहन करावा लागला त्रास अँकर:--चंद्रपूर शहरातील डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयात बीएड सीईटी परीक्षेत दरम्यान गोंधळ बघायला मिळाला. महाविद्यालयातील संगणक लॅब अद्ययावत नसल्याने परीक्षार्थींना नाहक त्रास सहन करावा लागला. महाविद्यालयात सोयीचं नसल्याने परीक्षा दीड तास उशिरा घेतली गेली मात्र ती पूर्ण झाली नसल्याने वर्ष वाया जाण्याची भीती परीक्षार्थींनी व्यक्त केली. परीक्षार्थींच्या तक्रारींकडे कोणीही लक्ष दिले नसल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी परीक्षार्थींनी केली आहे. बाईट १) पीडित परीक्षार्थी
942
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 27, 2026 12:04:06
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:शिराळा तालुक्यातल्या वाकुर्डे बुद्रुक सिंचन योजनेच्या पाणी वाटपावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं. तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये तलाव कोरडे पडत असल्याने नागरिकांच्या कडून पिण्याच्या पाण्याची मागणी होऊ लागलेली आहे, या पार्श्वभूमीवर आमदार सदाभाऊ खोत यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन कोरड्या तलावांची पाहणी केली, यावेळी सिंचन योजनेच्या रखडलेली काम आणि कोरड्या तलावांमध्ये पाणी सोडण्यात येत नसल्यास वरून आमदार सदाभाऊ खोत यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंचं धारेवर धरले. ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई नाही, त्याठिकाणी योजनेचे पाणी दिल जात आहे, मात्र ज्या ठिकाणी पाणीटंचाई आहे, त्या ठिकाणी पाणी दिलं जात, नसल्याचा आरोपदेखील सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
1064
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 27, 2026 11:35:57
Shirur, Maharashtra:ब्रेकिंग आंबेगाव प्रांत कार्यालयात खळबळ: प्रांत अधिकारी लाच प्रकरणात अटक प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि कर्मचारी खैरनार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. VO -आंबेगाव तालुक्यातील प्रांत कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मोठी कारवाई केली. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि त्यांचे सहकारी कर्मचारी खैरनार यांना 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कामासाठी तक्रारदाराकडून लाच मागितल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचत ही कारवाई केली. ठरल्याप्रमाणे लाच स्वीकारताना दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून मंचर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, थेट प्रांत अधिकारीच लाच प्रकरणात अटकेत सापडल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू असून नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
1093
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 27, 2026 11:18:15
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील इस्पुर्ली पोलिसांनी बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणाचा छडा लावून यातील प्रमुख आरोपी डॉक्टर युवराज पाटील याला यापूर्वी जेरबंद केलं. डॉक्टर युवराज पाटील हा बिद्री मधील श्रद्धा हॉस्पिटल मध्ये राजरोस गर्भलिंग निदान करत होता, त्याच बरोबर हजारो रुपये घेऊन याच हॉस्पिटलमध्ये आईच्या पोटातच मुलीच्या हत्या करत गर्भपात करत होता. इस्पुर्ली पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जावून तपासला सुरुवात केल्यानंतर अनेक सहभागी आरोपीची नावे समोर येत आहेत. पोलिसांनी यापूर्वी डॉक्टर युवराज पाटील आणि संभाजी शिंदे यांना अटक करून लाखो रुपये जप्त केले होते. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास करत असताना आणखी सहा जणांचा सहभाग दुष्कृत्यात आढळून आला आहे. पोलिसांनी डॉक्टर युवराज पाटील यांच्या सोबत हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मनीषा दिनकर कांबळे आणि नंदा ईश्वरा गुरव यांच्यासह बाजीराव तोकडे, विक्रम आनंदा पाटील सुखदेव पाटील, सुनील सदाशिव गुरव यांना अटक केली आहे.
1086
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 27, 2026 11:02:18
Malegaon, Maharashtra:मालेगांव में चार वाहनों में अचानक आग लग गई। शालिमार होटल के पास गैरेज लाइन में आग ने आतंक मचा दिया। मालेगांव शहर के शालिमार के पास गैरेज लाइन में खड़ी चार चाकी वाहनों में अचानक आग फैल गई। आग पहले एक कार तक सीमित थी, लेकिन बाद में उसने आगे की तीन गाड़ियों को भी चपेट में ले लिया। शुक्रवार होने के कारण उस समय वहाँ कोई मौजूद नहीं था। सड़क पर शिवसेना जिल्हाध्यक्ष विनोद वाघ ने घटना देखी और उन्होंने फौरन फायर ब्रिगेड को बुलाया। फायर ब्रिगेड के चार टैंकर और अधिकारी-जनशक्ति ने आग पर काबू पाया। सौभाग्य से किसी के जीवन की हानि नहीं हुई, लेकिन चार गाड़ियाँ जलकर खाक हो गईं, जिससे लाखों रुपए के नुकसान की खबर है।
1015
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 27, 2026 10:17:28
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:इंधन भरण्यावरील मर्यादा अखेर उठवली. ANC : छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने दुचाकीसाठी 200 रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी 2 हजार रुपयांपर्यंत इंधन भरण्याची घालण्यात आलेली मर्यादा अखेर उठवण्यात आली आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. दरम्यान, राज्यातील सुमारे 10 जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर घालण्यात आलेली बंधने देखील आजपासून पूर्णपणे मागे घेण्यात आली आहेत. संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने यासंदर्भातील पूर्वीचे आदेश रद्द करत नागरिकांना दिलासा दिला आहे. आता इंधन भरण्यावर कोणतीही मर्यादा राहणार नसल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बाईट : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
975
comment0
Report
Advertisement
Back to top