445001
यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.
Yavatmal, Maharashtra:राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सांगली की घाटी लेझीम: पारंपरिक कला में नया जोश और युवा भागीदारी
Kolhapur, Maharashtra:रात्रीचे साडेआठ वाजले की सांगलीच्या विसावा चौकात एक वेगळाच नाद घुमायला सुरुवात होतो. हा नाद आहे हलगीचा, ढोलाचा, आणि लेझीमच्या घुंगराचा. डीजे आणि डॉल्बीच्या वाढत्या दणदणाटातही सांगलीच्या अनेक चौकात आजही लेझीम या पारंपरिक वाद्यांचा ठेका जिवंत आहे. नेमकी ही परंपरा काय आहे पाहूया या विशेष रिपोर्ट मध्ये.. VO 1:- हातात लेझीम..पायात वेग ..अंगात उत्साह आणि चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास बाळगत लेझीम खेळणारे हे आहेत सांगली मधील विसावा मंडळाचे अध्यक्ष संजय चव्हाण.. अनेक शहरात लेझीम खेळाची क्रेझ पूर्वीसारखी राहिलेली नसली, तरी सांगली मधील याच विसावा चौकात घाटी लेझीमची परंपरा जपण्याचं काम गेल्या 40 वर्षापासून अविरत करत आहेत. लेझीमच्या प्रत्येक हालचालीमध्ये लय आहे..ताल आहे…वेग आहे. हलगी- घुमक तालावर सुरू झालेला हा खेळ काही क्षणांतच पाहणाऱ्यालाही आपल्या तालावर नाचायला भाग पाडतो. या खेळाडूंच्या हालचाली पाहिल्या की त्यांच्या अंगात अक्षरशः वीज संचारल्याचा भास होतो. VO 2 : सांगलीच्या गावभागातील विसावा चौक. याच ठिकाणी गेल्या अनेक दशकांपासून लेझीमची परंपरा जोपासली जाते. विसावा मंडळाकडून आसपासच्या मुलांना लेझीम शिकवण्याचं काम तब्बल 40 वर्षांपासून अविरत सुरू आहे. गणेशोत्सव असो, शिवजयंती उत्सव असो किंवा कोणतीही मिरवणूक असो विसावा मंडळाच्या लेझीम पथकाला मोठी मागणी असते. गणेशाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत. लेझीमच्या तालावर सांगलीकरांना मंत्रमुग्ध करण्याची परंपरा या मंडळाने जपली आहे.. VO 3 : रात्री साडेआठ वाजले की विसावा चौकात हळूहळू गर्दी जमायला सुरुवात होते. लहान मुलांपासून तरुणांपर्यंत, तरुणींंपासून विवाहित महिलां आणि अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच लेझीमच्या सरावासाठी इथे हजेरी लावतात. सुमारे अडीच ते तीन तास वेगवेगळ्या प्रकारच्या लेझीमच्या रचनांचा सराव इथ सध्या रोजच केला जातो. लेझीम ही केवळ तरुणांची कला राहिलेली नाही, तर ती पिढ्यान्पिढ्या पुढे नेणारी सामूहिक परंपरा बनली आहे.. 60 वर्षीय सविता बापट काकी असो वा अनेक किलोमीटरचे अंतर पार करून फक्त लेझीम खेळण्यासाठी विसावा चौकाकडे येणाऱ्या अश्विनी कुलकर्णी काकी असोत. लेझीमचा आवाज वाढला की या वयातही त्यांना झिंग चढते त्यामुळे न चुकता घाटी लेझीम खेळण्याचा आनंद घेण्यासाठी त्या आणि इतर महिला देखील आवर्जून दाखल होतात. त्यांना त्यासाठी कोणत्याही निमंत्रणाची गरज नसते. VO :- विनोद चव्हाण यांनी सांगितले, घाटी लेझीम प्रशिक्षक VO 4: घाटी लेझीमचा एक खेळ साधारण सात मिनिटांचा असतो.पण ही सात मिनिटं खेळाडूंसाठी अत्यंत कसोटीची असतात. कारण प्रत्येक क्षणी रचना बदलते. पायांचा वेग कायम ठेवावा लागतो. हातांची हालचाल अचूक ठेवावी लागते आणि त्याच वेळी हलगी आणि घुमक एकरूप व्हावं लागतं. याउलट कवायत लेझीममध्ये मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी होतात आणि खेळ तुलनेने अधिक काळ सुरू राहतो. घाटी लेझीममध्ये मात्र काही मिनिटांतच खेळाडूंच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. घाटी लेझीम हा शिवकालीन काळापासून खेळला जात असल्याचं विसावा मंडळाचे अध्यक्ष संजय चव्हाण सांगतात. VO 5 :- या सरावात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकजण सहभागी होतात. यातील एक नाव विशेष लक्ष वेधून घेतं…विनोद चव्हाण यांचे वय 62 वर्षं. गेल्या जवळपास तीन दशकांपासून लेझीमचा सराव करणारे विनोद चव्हाण आजही तरुणांना लाजवेल अशा जोशात लेझीम खेळतात. हलगीचा ठेका सुरू झाला की वयाचा विसर पडतो, हातात लेझीम घेतली की देहभान हरपतं आणि मग सुरू होतो तो घाटी लेझीमचा भन्नाट खेळ. VO 6 : विनोद चव्हाण यांचा पूर्वी खाजगी व्यवसाय होता. सध्या ते घरीच असतात. पण श्रावण महिना सुरू झाला की त्यांच्या दिवसाचं वेळापत्रक बदलतं. गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात होते आणि त्यासोबत सुरू होतो लेझीमचा सराव. हातात लेझीम घेतलेला हा ज्येष्ठ खेळाडू सरावाच्या ठिकाणी आवर्जून पोहोचतो. एकही दिवस सराव चुकवायचा नाही हा जणू त्याचा नियमच. VO 7 : पूर्वी लेझीम म्हणजे प्रामुख्याने पुरुष आणि तरुण मुलांचा खेळ अशीच धारणा होती.पण आता ही धारणा बदलताना दिसतेय. विसावा मंडळाच्या सरावात तरुण मुली, विवाहित महिला आणि ज्येष्ठ महिलाही सहभागी होत आहेत. डीजेच्या दणदणाटापेक्षा पारंपरिक वाद्यांचा नाद अधिक भावतो म्हणूनच त्यांनी लेझीमची निवड केली. VO 8 : लेझीम हा केवळ मनोरंजनाचा खेळ नाही, तर शरीर आणि मनाच्या विकासासाठीही तो महत्त्वाचा आहे. नियमित सरावामुळे मुलांची शारीरिक क्षमता वाढते. एकाग्रता वाढते. ताल, शिस्त आणि समूहभावना विकसित होते.यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना लेझीमच्या सरावासाठी दररोज पाठवत आहेत. आपली ही मुलं डीजे आणि डॉल्बीच्या जाळ्यातून मुक्त होऊन स्वच्छंद पारंपरिक लेझीम खेळाचा आनंद घ्यावा हा त्याचा प्रयत्न.. VO 9 : सांगली संस्थानच्या काळात संगीत, कला, संस्कृती आणि विविध पारंपरिक कलांना राजाश्रय मिळाल्याचा इतिहास सांगतो. सांगलीची सांस्कृतिक ओळख ही केवळ राजकीय इतिहासापुरती मर्यादित नाही, तर संगीत, नृत्य, लोककला आणि पारंपरिक कलांच्या संवर्धनाशीही ती जोडलेली आहे.याच सांस्कृतिक वातावरणातून पुढे सांगलीच्या विविध पारंपरिक कलांना बळ मिळालं. लेझीमसारख्या लोककलांनीही या भूमीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. VO 10 : लेझीमच्या इतिहासाबाबत अनेक मतप्रवाह आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या खेळाचा वापर शारीरिक प्रशिक्षण आणि युद्धकौशल्याशी संबंधित कवायतींसाठी होत असल्याचं काही इतिहास अभ्यासक सांगतात. लेझीमच्या हालचालींमध्ये शरीराची चपळता, समूहातील शिस्त, आणि तालबद्ध हालचाली…यामुळे या खेळाचा उपयोग शारीरिक प्रशिक्षणासाठीही होत असल्याचं मानलं जातं.आज मात्र हा खेळ लोककला आणि पारंपरिक क्रीडा-संस्कृतीचा महत्त्वाचा भाग बनला आहे. लेझीममध्ये प्रत्येक खेळाडू स्वतंत्रपणे चांगला खेळला तरी पुरेसं नसतं. संपूर्ण पथक एकाच तालात हललं पाहिजे.. एकाच क्षणी रचना बदलली पाहिजे.. एका खेळाडूची चूक झाली तर संपूर्ण रचनेवर परिणाम होतो. त्यामुळे लेझीम मुलांना केवळ शारीरिक व्यायाम शिकवत नाही तर शिस्त, एकाग्रता, संघभावना आणि एकमेकांशी समन्वय साधण्याची कला देखील शिकवतं. VO 11 : लेझीम या शब्दाच्या उगमाबाबतही विविध मते आहेत. हा शब्द फारशी भाषेतील शब्दाशी संबंधित असल्याचं काही संदर्भांमध्ये सांगितलं जातं. मात्र शब्दाच्या उगमापेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे…शतकानुशतकं बदलत गेलेल्या काळातही लेझीमची परंपरा आजपर्यंत टिकून आहे आणि सांगलीसारख्या शहरात तर या परंपरेला आजही हजारो लोकांचा प्रतिसाद मिळतोय .सांगली शहरात सध्या जवळपास पाच लेझीम पथकं सक्रिय आहेत. त्यामध्ये विसावा मंडळाचं पथक हे जुन्या आणि मोठ्या पथकांपैकी एक आहे.आज या मंडळाकडे सुमारे 800 हून अधिक खेळाडू असल्याचं सांगितलं जातं.यामध्ये लहान मुलांपासून तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटांचा समावेश आहे. ही संख्या केवळ पथकाची ताकद दाखवत नाही, तर सांगलीकरांच्या मनात आजही पारंपरिक कलांना असलेलं स्थान अधोरेखित करते. सांगली मधील बलभीम व्यायाम शाळेच्या पटांगणात सराव करणारे हे तरुण-तरुणी त्याचंच उदाहरण. मधुरा लिमये वाजवत असणाऱ्या घुमक्याचा आवाज पाहिल्यानंतर सांगलीकरांच्या अंगात कशाप्रकारे लेझीम हा खेळ भिनला आहे हे दिसून येतं. या खेळामध्ये हलगी, घुमकाचा ठेका आणि कैचाल देखील तितकाच महत्त्वाचा असतो. VO:- मधुरा लिमये, प्रशिक्षक VO:- प्रसाद कुलकर्णी, हलगी वादक. VO 12 : गणेशोत्सवाच्या सुमारे महिनाभर आधी विसावा मंडळ आणि सांगली मधील इतर व्यायाम शाळा या ठिकाणी लेझीम सरावाला सुरुवात होते. दररोज संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत सराव सुरू असतो. लेझीमच्या वेगवेगळ्या रचना, तालबद्ध हालचाली, पथकातील शिस्त आणि मिरवणुटांमध्ये एकसंध सादरीकरण. यासाठी खेळाडूंची मेहनत सुरू असते. गणेशाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत लेझीमचा हा ठेका सांगलीच्या उत्सवाला एक वेगळीच ओळख देतो. गेल्या वर्षी विसावा मंडळाच्या लेझीम पथकाला सुमारे 30 सुपाऱ्या मिळाल्या होत्या. मात्र यंदा या पथकाची मागणी आणखी वाढल्याचं मंडळाकडून सांगण्यात येतं. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातूनही पथकाला मागणी आहे. पारंपरिक कलेतून कलाकारांना व्यासपीठ मिळतं. त्याचवेळी या कलेला आर्थिक आधारही मिळतो. पण या कलेला फक्त आर्थिक आधार म्हणून न पाहता ही परंपरा टिकली पाहिजे यासाठी सांगलीतील विसावा मंडळ आणि इतर तालमीचा उद्देश आहे. VO:- संजय चव्हाण, अध्यक्ष विसावा मंडळ VO:- ज्ञानेश लिमये, प्रशिक्षक बलभीम व्यायामशाळा VO 13 : गेल्या काही वर्षांत सण-उत्सवांची मिरवणूक म्हटलं की डीजे आणि डॉल्बीचा दणदणाट हे समीकरण बनलं आहे.आवाजाची मर्यादा, ध्वनिप्रदूषण आणि सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नांमुळे डीजे-डॉल्बीच्या वापरावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. याच पार्श्वभूमीवर पारंपरिक वाद्यांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं जात आहे. ढोल, हलगी, ताशा, लेझीम, सनई.चौघडा ही वाद्यं केवळ आवाज निर्माण करत नाहीत तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा ठेवा जपतात. त्यामुळे ही परंपरा या पुढच्या काळात देखील अशीच टिकून राहावी अशी अपेक्षा सांगलीकर व्यक्त करतात. VO 14 : गेल्या चार दशकांच्या आसपास विसावा मंडळाने लेझीमचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलं आहे.केवळ गणेशोत्सवापुरता हा खेळ मर्यादित न ठेवता विविध सण, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सार्वजनिक मिरवणुकांमधून लेझीमचा प्रसार केला जाते. त्यामुळे एका मंडळाचा उपक्रम राहिलेला लेझीम, आज सांगलीच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग बनला आहे. इतकंच नव्हे तर या लेझीमची भुरळ विदेशात देखील पाहायला मिळाली. सांगलीच्या मातीतील ही लेझीम कधी साता समुद्रा पार पोहोचली हे विसावा मंडळाला देखील कळाले नाही. त्यामुळेच विसावा मंडळाची तरुण पिढी देखील त्याच जोमाने आपली परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. VO:- संजय चव्हाण, अध्यक्ष विसावा मंडळ VO:- प्रथमेश वैद्य, यूवा प्रशिक्षक विसावा मंडळ VO 15 :- पारंपरिक वाद्यांचा आवाज ऐकला की उत्सवाचं वातावरणच बदलतं..ढोलाचा ठेका, हलगीचा कडकडाट, ताशाचा गजर,आणि लेझीमच्या घुंगरांचा नाद, या सगळ्यांचं एकत्रित सादरीकरण मिरवणुकीला वेगळी ओळख देतं. डीजेच्या मोठ्या आवाजापेक्षा हा नाद कदाचित कमी भासेल, पण त्यामागे असते वर्षानुवर्षांची साधना,परंपरा आणि कलाकारांची मेहनत. म्हणूनच ही कला आणि परंपरा टिकली पाहिजे यासाठी सांगलीतील विसावा मंडळ करत असलेला प्रयत्न वाखाण्याजोगा आहे.0
0
Report
वाशिम के रिसोड में हल्की बारिश, खरीफ फसलों को मिली राहत
Washim, Maharashtra:वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वाकद आणि दापुरी खुर्द परिसरात अखेर पावसाने हजेरी लावली आहे.अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हलक्या पावसाच्या सरी बरसल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि हळद या खरीप पिकांना या पावसामुळे काहीसा आधार मिळाला आहे. मात्र, पिकांची वाढ आणि उत्पादन टिकवण्यासाठी आगामी काळात दमदार आणि नियमित पावसाची गरज आहे.0
0
Report
रत्नागिरी में डिजे-मुक्त गणेश उत्सव: कम आवाज में उत्सव की मांग बढ़ी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- डिजे-मुक्त गणेशोत्सवाच्या मुद्द्यावर सध्या कमी आवाजाच्या इन्स्ट्रुमेंट्सला मागणी वाढली गणेश मंडळं ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी आणि उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी कमी आवाजातील वाद्यांना देत आहेत पसंती परिणामी कमी आवाजात पण भक्तिमय वातावरण टिकवणारा उत्सव साजरा करण्याकडे कल वाढतोय ध्वनीप्रदर्शन टाळत उत्सवाचा उत्साह कायम ठेवण्यासाठी कमी आवाजातील डीजे सेटला पसंती मर्यादित आवाजात चांगली साऊंड क्वालिटी देणाऱ्या सिस्टीमची खरेदी वाढली डीजेच्या ऐवजी ट्रॉली करावकेला इलेक्ट्रॉनिक दुकानातून वाढती मागणी0
0
Report
Advertisement
चिपळूण–सावर्डे में बैल झुंज, ट्रैफिक जाम; पुलिस ने रास्ता साफ किया
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण - रत्नागिरी.. मुंबई–गोवा महामार्गावर दोन बैलांमध्ये थरारक झुंज; सावर्डे येथे वाहतूक ठप्प, पोलिसांनी सोडवली झुंज.. मुंबई–गोवा महामार्गावर चिपळूणजवळील सावर्डे बाजारपेठ येथे भररस्त्यात दोन बैलांमध्ये जोरदार झुंज झाल्याची घटना घडली. अचानक सुरू झालेल्या या झुंजीमुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.. भरधाव वाहनांच्या वर्दळीच्या ठिकाणी दोन्ही बैल एकमेकांना भिडल्याने वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बैलांच्या या झटापटीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सतर्कता दाखवत शर्थीचे प्रयत्न करून दोन्ही बैलांना महामार्गावरून बाजूला हुसकावून लावले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा धोका टळला..0
0
Report
गृहराज्यमंत्री योगेश कदम ने परंडा के मृतक परिवार से मुलाकात कर सहायता की घोषणा
Dharashiv, Maharashtra:प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबीयांची गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतली भेट. प्रथमेशच्या कुटुंसाला शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. घरकुल योजनेचा लाभ तातडीने देण्याचे मंत्री योगेश कदम यांचे निर्देश. प्रथमेशच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत योगेश कदम यांनी जाणून घेतल्या अडचणी. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापूर येथील मयत प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबीयांची राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज भेट घेतली. स्पर्धा परीक्षेतील अपयश आणि आर्थिक विवंचनेतून प्रथमेश देशमुख यांनी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर प्रथमेशच्या कुटुंबीयांची भेट घेऊन योगेश कदम यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत संवेदना व्यक्त केल्या. दरम्यान, प्रथमेशच्या कुटुंबाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री योगेश कदम यांनी दिल्या आहेत. तसेच घरकुल योजनेचा लाभ तातडीने देण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करत कुटुंबाला शासनाच्या योजनांचा आणि मदतीचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचनाही कदम यांनी दिल्या. विशेष म्हणजे, इतकी गंभीर घटना घडूनही एकही मंत्री प्रथमेशच्या कुटुंबीयांच्या भेटीला आला नाही, अशी टीका सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी केली होती. त्यानंतर आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रथमेशच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.0
0
Report
गणेशोत्सव के चलते मुंबई-गोवा राजमार्ग पर भारी वाहन 16 दिन के लिए बंद
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना आजपासून बंदी आरटीओ विभागाकडून अवजड वाहनांची कसून चौकशी 3 टप्प्यात अवजड वाहतुकीवर निर्बंध, 16 दिवसांमध्ये 10 दिवस गणेशोत्सवामध्ये अवजड वाहतुकीसाठी बंदी खारघर ते सावंतवाडी पर्यंत मुंबई गोवा महामार्गावर बंदी रत्नागिरी जिल्ह्यात कशेडी ते चिपळूण, चिपळूण ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते राजापूर अशी आरटीओ विभागाची सहा पथक 24 तास कार्यरत 16 टन किंवा त्यापेक्षा अधिक वजन क्षमतेच्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी भाविकांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि वाहतूक कोंडी मुक्त व्हावा यासाठी राज्य शासनाचा निर्णय महामार्गावरील अवजड वाहतूक रोखण्यासाठी रत्नागिरी आरटीओची पथक तैनात अशी असेल अवजड वाहनांना बंदी... 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर पाच दिवसांचे गणपतीचे विसर्जन 18 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर गौरी गणपती विसर्जन 25 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर अनंत चतुर्दशी जयगड बंदर आणि जेएनपीटी बंदर येथून आयात निर्यात मालाची वाहने, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, औषध, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्, भाजीपाला, नाशवंत माल, या जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना नियम लागू नाही0
0
Report
Advertisement
गणेशोत्सव के दौरान मुंबई-गोवा हाईवे पर भारी वाहनों की रोक
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे.. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाने निर्णय घेतला होता.. या निर्णयाचे अंमलबजावणी करत असताना महामार्ग पोलीस मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटात अवजड वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत.. 16 टन पेक्षा अधिक वाहनांना महामार्गावरती थांबवलं जात आहे.. महामार्गावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी..0
0
Report
इंदापुर में पेपर फुटी के विरोध में विद्यार्थियों ने तहसील कार्यालय के सामने मोर्चा निकाला
Rui, Maharashtra:इंदापूर मध्ये पेपर फुटी वरून विद्यार्थ्यांचं आंदोलन..... इंदापूर तहसील कार्यालयावर काढला मोर्चा.... Anchor _स्पर्धा परीक्षेतील पेपर फुटीच्या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यांमध्ये तीव्र पडसाद उमटत असताना आज पुण्याच्या इंदापूर मध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इंदापूर तहसील कार्यालयावरती मोर्चा काढत पेपर फुटीचा निषेध नोंदवला. इंदापूर नगरपरिषद पासून इंदापूर तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. यात बहुसंख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते.0
0
Report
भेसळयुक्त बटर पर खाद्य सुरक्षा विभाग ने बड़ी कार्रवाई, 75,356 किलो जप्त
Ahilyanagar, Maharashtra:आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या तपासणीसाठी अन्न आणि औषध प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत अहिल्यानगरच्या निंबळक परिसरातील एमआयडीसी भागातील अरिहंत कोल्ड स्टोरेजवर अन्न-औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ७५ हजार ३५६ किलो पाश्चराइज्ड कुकिंग बटरचा साठा ताब्यात घेण्यात आला असून, या साठ्याची किंमत तब्बल ३ कोटी ९५ लाख ६२ हजार रुपये आहे. ‘मधुरामा क्रीमी डिलाईट’ या ब्रँडच्या बटरच्या दर्जा आणि लेबलिंगबाबत संशय निर्माण झाल्यानंतर प्रशासनाकडून रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान विविध बॅचमधील चार बटरचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर बटरचा दर्जा तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे.दरम्यान, संपूर्ण बटरचा साठा सुरक्षितपणे जप्त करून प्रशासनाच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे. प्रयोगशाळेच्या अहवालात भेसळ, निकृष्ट दर्जा किंवा अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांविरोधात अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे. सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न-औषध प्रशासनाकडून तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
वाशिम में मानसून ठिठका: खरीप पिकें डरी, अधिकारी निरीक्षण के बाद राहत की उम्मीद
Washim, Maharashtra:वाशिम:\n\nअँकर:वाशिम जिल्ह्यात पावसाने मागील 45 दिवसापासून दडी मारल्याने खरीप पिके संकटात सापडली असून सोयाबीन, तूर, कपाशी,हळद करपून नष्ट झाली आहेत.या पार्श्वभूमीवर वाशिम तालुक्यातील सावरगाव बर्डे,तामसी आणि पंचाळा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन आमदार श्याम खोडे आणि जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे.सोयाबीन,तूर आणि कपाशीच्या पिकांची पाहणी करत त्यांनी पिकांची सद्यस्थिती आणि पावसाअभावी झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि व्यथा जाणून घेण्यात आल्या.त्यामुळे या पाहणीनंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई किंवा मदतीबाबत काय निर्णय होतो,याकडे आता लक्ष लागलं आहे.0
0
Report
वर्धा में बाघ हमले में किसान की मौत, गांव शव स्वीकारने से इनकार
Wardha, Maharashtra:वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू ; अठेचाळीस तास झाले अंत्यसंस्कार नाही शेतशिवारात शेतकरी भगवान धुर्वे या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावकरी संतप्त झाले. गावाकऱ्यानी रस्ता रोखून धरत वन विभागाचे वाहन अडवून धरले. दुसऱ्या दिवशी गावाने आणखी रोष व्यक्त करीत शव विच्छेदन उरकवून गावात ऍम्ब्यूलन्स ने आलेला मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. जोवर या क्षेत्रातील आमदार तथा पालकमंत्री गावात येत नाही, ठोस आश्वासन देत नाही तोवर आपण मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका गावाकऱ्यांनी स्पष्ट केली. गावात आज दुपारच्या सुमारात खासदार अमर काळे आणि काँग्रेस नेते अभ्यूदय मेघे पोहचले. गावाकऱ्यांनी संताप व्यक्त केली. खासदार अमर काळे यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला पण सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.0
0
Report
पोळा के दिन शिरपूर में बैलों का अचानक बेकाबू व्यवहार, किसान बचा—वीडियो वायरल
Washim, Maharashtra:वाशिम: शिरपूर में पोळा सणाच्या दिवशी धक्कादायक प्रकार घडला आहे. बैलपोळा फुटल्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीचा आवाज होताच बैलजोड्या अचानक बिथरल्या आणि पळत सुटल्या. या वेळेला एका शेतकऱ्याला बैलाने चक्क फरफटत नेल्याची घटना घडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.0
0
Report
Advertisement
उमर्रा के द्वारका उत्सव में बैलों के रथ और नवस की अनोखी परंपरा
Akola, Maharashtra:बैलां प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे पोळा...परंतु अकोला जिल्ह्यातील उमरा गावाने ही कृतज्ञता जोपासण्याची आगळी वेगळी परंपरा जोपासली आहे. उमरा गावात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी बैलांना रथात बसवून शेतकरी स्वतःच रथ ओढतात आणि गावात मिरवणूक काढतात ... सुमारे ३५० वर्ष जुनी ही परंपरा....हा उत्सव "द्वारका उत्सव" म्हणून ओळखला जातो...चला पाहूया "द्वारका उत्सव" .. ऋषीनंतर कृषीला पुजणारी आमची संस्कृती... या कृषी संस्कृतीत बैलांचं स्थान खूप मोठं आहे. वर्षभर शेतकऱ्याच्या सोबत मेहनतीने काळ्या आईची सेवा करणारा! याच वृषभऋणातून मुक्त होण्यासाठी अकोला जिह्यातील अकोट तालुक्यातील उमरा गावात आगळ्यावेगळ्या परंपरेचा जन्म झाला... गावातीलच वाकाजी महाराजांनी तीनशे वर्ष पूर्वी सुरु केलेली परंपरा आजही सुरु आहे .. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी गावात बैलांना रथात बसवून गावभर त्यांची मिरवणूक काढण्यात येते ... वाकाजी महाराजांच्या मानाच्या बैलामागे इतर रथ असतात..ही परंपरा सुरु होण्या मागचं कारणही रोचक आहे.... 350 वर्षांपूर्वी गावात एक रोग पसरला आणि बैल मरू लागले..या संकटाच्या काळात शेतकरी वाकाजी महाराजांच्या शरणी आले...वाकाजी महाराजांनी बैलांना एक अंगारा लावण्यास सांगितले आणि अंगारा लावण्याने बैल रोगमुक्त झाले.. शेतकऱ्यांनी बैल बरे होण्यासाठी नवस केला आणि नवस फेडण्याच्या स्वरूपमध्ये या द्वारका उत्सवाला सुरुवात झाली.या सोहळ्यात सर्वच जाती-धर्माचे लोक सहभाग घेतात...0
0
Report
महाराष्ट्र में हथियारबंद डकैतों ने तमिलनाडु के व्यापारियों से 30 लाख का माल लूटा
Sangli, Maharashtra:जत तालुक्यातील भीवर्गी फाटा येथे तमिळनाडूतील व्यापाऱ्यांवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. बंदुकीचा धाक दाखवून दहा व्यापाऱ्यांकडील २० लाखांची रोकड, दोन तोळे सोने आणि मोबाईल, असा सुमारे ३० लाखांचा मुद्देमाल लुटून दरोडेखोरांनी पोबारा केला आहे. तामिळनाडू सालेम येथील काही व्यापारी जत तालुक्यातील माडग्याळ येथील मेंढ्यांच्या बाजारात निघाले असताना उमदी जवळच्या भीवर्गी फाटा येथे स्कॉर्पीओ गाडीतून आलेल्या दरोडेखोरांनी गाडी अडवून, बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना लुटले आहे. जत तालुक्यात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्यामुळे पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.0
0
Report
चंद्रपुर में अपराध रोकथाम के लिए विशेष प्रतिबंधक अभियान; 570 व्यक्तियों पर कार्रवाई
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष प्रतिबंधक मोहीम, आतापर्यंत 570 इसमांवर प्रतिबंधक कारवाई अँकर:--- चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक निर्माण करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष प्रतिबंधक मोहिमेचे (Preventive Action Camp) आयोजन करण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत जिल्ह्यातील विविध उपविभागांमध्ये हे शिबिर घेऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १२६ व १२९ अन्वये धडक कारवाई करण्यात येत आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 570 इसमांवर प्रतिबंधक कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. पोलिसांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सहा उपविभागांपैकी केवळ एका उपविभागात या संबंधात कारवाई अपूर्ण असून तीही लवकरच पूर्ण केली जाणार आहे. समाजात शांतता व सुरक्षिततेचे वातावरण टिकून राहावे यासाठी चंद्रपूर पोलीस दल कटिबद्ध असून समाजकंटक तसेच उपद्रवी घटकांवर अशा प्रकारची कडक कायदेशीर कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे।सांगितले जात आहे।0
0
Report
Advertisement
