icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अकोला के शिक्षक मुकुंद पाध्ये ने 1 करोड़ दान देकर राष्ट्रभक्ति को प्रेरित किया

Akola, Maharashtra:देशसेवा हीच सर्वोच्च सेवा मानणाऱ्या अकोल्यातील एका सामान्य शिक्षकाने आपल्या कृतीतून असामान्य आदर्श घालून दिला आहे. शहरातील शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व मुकुंद पाध्ये यांनी भारतीय सेनेच्या सेंट्रल वेल्फेअर फंडासाठी तब्बल एक कोटी रुपयांची देणगी देत समाजासमोर प्रेरणेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. Vo 1 : अत्यंत संघर्षमय परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून प्रामाणिकपणा, अथक परिश्रम आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या तळमळीच्या जोरावर प्रा.मुकुंद पाध्ये यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिक्षण क्षेत्रात कार्य करत असतानाच त्यांच्या मनात देशभक्तीची भावना कायम जिवंत राहिली आहे.गेल्या ३६ वर्षांपासून ते शिक्षण क्षेत्रात आहे.यापूर्वीही १९९९ मध्ये कारगिल युद्धाच्या काळात त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपल्या एका बँकेतील संपूर्ण एफडीची रक्कम सैनिक कल्याणासाठी अर्पण केली होती. त्या वेळी एका सामान्य शिक्षकाने केलेल्या या मदतीची राज्यभर चर्चा झाली होती.आता तब्बल २६ वर्षांनंतर पुन्हा एकदा त्यांनीच देशभक्तीच्या भावनेतून त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी एक कोटी रुपयांची देणगी देत “देशसेवा हीच खरी सेवा” असल्याचा संदेश समाजाला दिला आहे. Final Vo: मुकुंद पाध्ये यांच्या या कार्यामुळे अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या या योगदानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
0
0
Report

कोयना डैम में 8 टीएमसी पानी का बाष्पीभवन, 22.81 टीएमसी शिल्लक

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोयना धरणातील 8 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन.. कडक ऊन वाढत्या तापमानाचा फटका.. धरणात 22.81 टीएमसी पाणी.. अँकर महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणात सद्यस्थितीत 22.81 टीएमसी इतकं पाणीसाठा शिल्लक आहे.. यंदाचा कडक उन्हाळा आणि दिवसेंदिवस वाढते तापमान यामुळे एक,दोन नव्हे तर तब्बल 8 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे..त्यामुळे यंदा 31 मे पर्यंत पाण्याचे ऐतिहासिक बाष्पीभवन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून उपयुक्त पाणीसाठा 17.69 टीएमसी इतका असल्याने सिंचन व वीजनिर्मितीसाठी धरणात पुरेसे पाणी उपलब्ध आहे..
0
0
Report
Advertisement

महाराष्ट्र की राजनीति में तेज घमासान: उद्धव-शिंदे-फडणवीस के बीच जारी दावे

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संजय शिरसाट PC ऑन विधानपरिषद जागा वाटत महायुती स्थानिक स्वराज्य संस्था जे काही निवडणूक होत त्या दोन टप्प्यात बैठक होत आहे. आमच्या नेत्यांच्या बैठका होत आहे, तर फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा वहिनी निर्णय घेऊन पत्रकार परिषद घेतील, बोलणी सुरू आहे, डावळले जाते हे प्रश्न आता उपस्थित होत नाही. बोलणी सुरू आहे, कोण कुणावर दावा करत आहे या फक्त चर्चा आहे. कोणत्या जागा घाययाचे सोडायचे हा निर्णय वरिष्ठ घेतात ऑन उद्धव ठाकरे बच्चू कडु आधी काय घडले आणि त्याचे कारणे काय होते उद्धव ठाकरे आणि कडू यांना माहीत आहे, आता बोलून काय फायदा ऑन एकनाथ शिंदे फोन राष्ट्रवादी वक्तव्य राष्ट्रवादी सबाधित बाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ घेतला. मला शिंदे यांचा फोन आला होता, कोणता वाद होईल याला संधी देऊ नका असे मला सांगितले आहे, मी आदेशाचे पालन ककरेल ऑन इंधन काही ठिकाणी stok केले जात आहे. यावर नियंत्रण आले पाहिजे, शेतकरी यांना गरज आहे आत्ता, त्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे, काही ठिकाणी टंचाई आहे, तो दूर केला जाईल... काही ठिकाणी लोक पॅनिक झाले आहे, पण असे कारण नाही, काही अडचण होईल अशी परिस्थिती नाही ऑन संजय राऊत संजय राऊत यांच्या टिकेला महत्व देत नाही, त्यांनी ubt पहा, आमची प्रगती त्यांनी पाहावे, शिवसेना अजून मजबूत करण्यासाठी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तालुका निहाय पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहे... ऑन एकनाथ शिंदे सुनावले... एकनाथ शिंदे पक्षाचे प्रमुख आहे, त्यांनी सुनावले असे नाही, त्यांनी आदेश दिले असेल तर पालन करणे माझ्यासाठी म्हत्वाचे आहेत, यापुढे राष्ट्रवादीबाबत परिस्थिती नुसार बोलेले, पण शिंदे साहेबांना विचारून ऑन काँग्रेस काँग्रेसकडे कोणतेही मुद्दे नसल्याने, नसलेले मुद्दे समोर आणले जात आहे, जगात इंधन दरवाढ आहे, पेट्रोल टाकून काँग्रेस भडका उडवण्याचा प्रयत्न करत आहे... ऑन इंधन टंचाई शेतकऱ्यांना खरी अडचण आहे, यावेळी शेतकरी यांना डिझेल गरज आहे, मशागत झाली नाही तर वर्ष वाया जाईल, त्यासाठी तो डिझेक मिळवण्यासाठी जागून काढत आहे.. त्यासाठी आम्ही सरकार शेतकरी पाठीशी आहे... ऑन नवनाथ बन पेट्रोल काँग्रेस वक्तव्य रांगा कोण लावत आहे, यावर बोलणार नाही, काँग्रेस लावत आहे की नाही माहीत नाही... ऑन सुप्रिया सुळे तपासात काय समोर आले ,हे पोलीस सांगू शकतात, त्यामुळे काही विधाने करून कुणी मारले हे आपण ठरवू शकत नाही... ऑन खरात मी आधीच म्हणालो होतो की बरेच काही बाहेर पडेल, अनेक गोष्टी बाहेर येत आहे. ऑन मोटेगावकर मोटेगावकर याने जसा पसारा वाढवला आहे, बांधकाम अनधिकृत असेल तर पाडले जातील, त्याचे सारखे अनेक क्लास चालक आडकतील
0
0
Report
Advertisement

केंद्रीकृत प्रवेश प्रणाली से एडमिशन देरी, नागपुर में डेडलाइन बढ़ाई गई

Nagpur, Maharashtra:नागपूर के डॉक्टर पंकज भोयर, शिक्षण राज्यमंत्री (11 ऑनलाइन एडमिशन अडचण) मध्यातल्या काळामध्ये पोर्टल स्लो होणे के कारण अनेक विद्यार्थ्यांना एडमिशन लेते समय अड़चण आईं। प्रशासन को सूचना दी गई और प्रवेश की तारीख बढ़ाई गई है। प्रत्येक विद्यार्थी को प्रवेश मिलेगा ऐसी व्यवस्था सरकार कर रही है। सर्व प्रवेश पारदर्शक पद्धति से हो, इसके लिए राज्य में पहली बार केंद्रीकृत प्रवेश प्रणाली लागू की गई है। अभी शुरू होने के कारण विद्यार्थियों को समस्या आ रही है। एक बार अभ्यास हो जाए तो सब कुछ सुचारू होगा। सरकार ने आश्वस्त किया है कि एक भी विद्यार्थी प्रवेश से वंचित नहीं रहेगा।
0
0
Report

चंद्रपूर की घुग्घूस नगरपरिषद में भाजपा का गो गोवा आंदोलन

Chandrapur, Maharashtra:टायटल:---चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस नगरपरिषदेसमोर भाजपचे आक्रमक 'गो गोवा' आंदोलन, जनतेच्या पैशांवर सत्ताधाऱ्यांनी गोव्यात उधळपट्टी केल्याचा नगरसेवक विवेक बोाढे यांचा घणाघात शहरातील पाणीटंचाई आणि मूलभूत समस्यांकडे साफ दुर्लक्ष करून, जनतेच्या तब्बल २० लाख रुपयांच्या कररुपी निधीची उधळपट्टी करत गोव्याला मौजमजा करण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या सत्ताधारी नगरसेवकांविरोधात घुग्घूस शहरात जोरदार राजकीय भडका उडाला. घुग्घूस नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व उप-नगराध्यक्षांसह सत्ताधारी नगरसेवक शासकीय पैशातून 'गोवा वारी'वर गेल्याचा थेट आरोप करत भाजपा नगरसेवकांनी नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र 'गो गोवा आंदोलन' केले. प्रशिक्षणाच्या नावाखाली केवळ मौजमजा आणि शासकीय निधीची लूट करण्यासाठीच ही गोव्याकडे झेप घेण्यात आली आहे, असा आरोप भाजपने केला. गेल्या दोन दिवसांपासून नगराध्यक्षांची केबिन बंद असल्याने सामान्य जनतेची शासकीय कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. "विकास गेला खड्ड्यात आणि हे चाललेत जनतेच्या पैशाने गोव्याला," अशा घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. भीषण उन्हाळ्यात संपूर्ण शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना पदाधिकारी मात्र गोवा सहलीवर आहेत. शहरात नागरिकांच्या नळाला पाणी नाही, शुद्ध पाण्याचे आरो (RO) प्लांट बंद पडले आहेत, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत आणि रात्रीच्या वेळी शहरात पथदिवेही लागत नाहीत; अशा गंभीर परिस्थितीत काँग्रेसचे नगर परिषदेतील पदाधिकारी गंभीर नसल्याचे भाजपने म्हटले आहे. बाईट १) विवेक बोढे, विरोधी नगरसेवक, भाजप आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

अमरावती में 24 वर्षीय युवक की बिजली खंबे पर शॉक से मौत, कारणों पर सवाल

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यातील एका युवकाचा खांबावर शॉक लागून दुर्दैवी मृत्यू; अचानक लाईट सुरू झाल्याने झाला अपघात अमरावती जिल्ह्यात सावंगी संगम येथे 11 केव्ही विद्युत लाईनचा शॉक लागतून 24 वर्षीय युवकाचा विद्युत खांबावरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत युवकाचे नाव अंकुश नेवारे असे असून त्यांच्या शेतातील लाईनची DP बंद पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, LN KV 11 या मुख्य विद्युत लाईनवर पुरवठा बंद असल्याचे समजून अंकुश नेवारे हे झंपर जोडण्यासाठी विद्युत खांबावर चढले होते. मात्र अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने त्यांना जोरदार शॉक बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. विद्युत खांबावरच युवकाचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधित विभागाच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाचा जीव गेल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
0
0
Report
Advertisement

ताडोबा-अंधारी बफर में टी-87 नर बाघ जेरबंद: मानव-वन्यजीव संघर्ष में बढ़ोतरी के बीच

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील पेठ जंगलात बळी घेणारा T87 वाघ जेरबंद. आशीष अम्बाडे सोन: चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनात वाढ झाली होती. मागील चार वर्षात चार वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांना वाघाने ठार केल्याच्या घटना घडल्या होत्या. या वाढत्या घटना नंतर वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावून हा हल्लेखोर वाघ निश्चित केला. टी 87 नर वाघ असल्याचे लक्षात आल्यानंतर या जंगलात प्रशिक्षित शूटरच्या सहकार्याने त्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले.
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर में बाढ़ के तैयारी के लिए अग्निशामक ने पंचगंगा में बचाव प्रदर्शन किया

Kolhapur, Maharashtra:आगामी पावसाळा आणि संभाव्य पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाने पंचगंगा नदी पात्रात बचाव कार्याचे प्रात्यक्षिक सादर केले. संभाव्य महापूर काळात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करताना बचाव कार्य अधिक प्रभावीपणे कसे राबवता येईल, याचा आढावा महापालिका आयुक्त राजेंद्र भारुड यांनी घेतला. यावेळी अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बोटीद्वारे बचावकार्य, पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत वापरल्या जाणाऱ्या विविध साहित्यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या बोटी, लाईफ जॅकेट, दोरखंड आणि इतर बचाव साहित्य सुस्थितीत असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज असल्याची खात्रीही आयुक्तांनी करून घेतली. पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तातडीने बचाव व मदतकार्य राबविण्यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
0
0
Report

अमरावती में ओपन बार पर पुलिस धावा, स्नैक सेंटर के मालिक समेत चार गिरफ्तार

Amravati, Maharashtra:अमरावतीत ओपन बार चालवणाऱ्यांवर गुन्हे शाखेची धडक कारवाई; स्नॅक्स सेंटरच्या मालकांसह ४ जण ताब्यात अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधपणे दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या ४ जणांना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने फ्रेजरपुरा परिसरातील आदित्य वाईन्सच्या बाजूला असलेल्या आहान अंडा व स्नॅक्स सेंटर आणि जय गजानन सोडा व स्नॅक्स सेंटर'वर छापा टाकला. येथे येणाऱ्या लोकांना बेकायदेशीरपणे दारू पिण्याची जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी अमोल मोतीराम डाके, सोपान लक्ष्मण दुर्गे, करण सुदर्शन आणि आकाश राय (सर्व राहणार अमरावती) या चालकांना ताब्यात घेतले आहे. या चारही आरोपींवर फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी अवैधपणे चालणाऱ्या अशा ओपन बारवर पोलिसांची ही कडक कारवाई मानली जात आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top