Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.

Aug 26, 2024 17:26:23
Yavatmal, Maharashtra

राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 26, 2026 03:49:11
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... लातूरमध्ये अखेर पंचनाम्याला सुरुवात.... अवकाळी पाऊस, गारपीट आणि चक्रीवादळात हजारो हेक्टर पिकांचे नुकसान.... लातूर मध्ये अखेर ZEE 24 TAAS च्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळत आहे. लातूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस , गारपीट आणि चक्रीवादळाच्या तडाख्यात शेती पिकाची प्रचंड नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत असताना कृषी विभागाकडून मात्र लेखी आदेश नसल्याचे सांगून पंचनामे करण्यास टाळाटाळ केली जात होती. अखेर ZEE 24 TAAS ने बातमी दाखवतात कृषी विभागाने बातमीची दखल घेत थेट नुकसानग्रस्ताच्या बांधावर जाऊन पंचनाम्याला सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात पाहणी करत पंचनामा प्रक्रिया सुरू केली आहे. थेट बांधावरून कृषी अधीक्षक यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी….
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 26, 2026 03:45:40
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 26, 2026 03:35:42
Chendhare, Maharashtra:इंदापूर येथील बायपासचे काम रखडण्याची शक्यता .... कोकण रेल्वेच्‍या ओव्हरहेड लाईनचा कामात अडथळा.... एकीकडे गेली 13 वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग आणि दुसरीकडे या महामार्गावरील वाहतूक कोंडीला पर्याय व्यवस्था म्हणून सुरू असलेला इंदापूर आणि माणगाव बायपासचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र इंदापूर बायपास जवळील सुरू असलेल्या फ्लायओव्हरच्या कामात अडथळा निर्माण झालाय. या फ्लायओव्हर ब्रीज खालून जाणारी कोकण रेल्वे आणि या कोकण रेल्वेच्या विद्युत लाईनचा भाग समोरासमोर असल्याने कामाला उशीर होण्याची शक्यता आहे. एकूण 5 किलोमीटर लांबीच्‍या या कामात बहुतांश काम अंतिम टप्प्यात आहे मात्र रेल्वेचे खांब आणि विद्युत लाइन मुळे येत असलेल्या तांत्रिक अडचणी येत आहेत. यासदंर्भात बैठका होवूनदेखील त्‍यावर अद्याप तोडगा नि घालेला नाही. रेल्वे विभागाने हा वि षय मार्गी लावावा अशी विनंती ठेकदार कंपनीकडून करण्‍यात आली आहे
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 26, 2026 03:34:57
Nashik, Maharashtra:बनावट चेकद्वारे इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करून दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर गुन्हेशाखा यूनिट क्रमांक एकच्या जाळ्यात अडकला आहे. आरोपी अनिल रमेश कोपरे ने मुंबईनाका येथील मॅन्सन व्हिल्स दुकानातून बनावट चेक देऊन इलेक्ट्रिक दुचाकी स्वतःच्या नावावर खरेदी केली होती. चेक बँकेत वटवण्यासाठी सादर केला असता तो बनावट असल्याचे समोर आले… आणि त्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुप्त माहितीच्या आधारे ओझर येथील पगार मळा परिसरात सापळा रचून आरोपीला शिताफीने अटक करण्यात आली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास मुंबईनाका पोलीस करत आहेत.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 26, 2026 03:34:44
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणीतील लालगुडा येथे बनावट देशी दारूच्या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही मोठी कारवाई एका आलिशान दुमजली घरामध्ये केली. घरात एक भूमिगत खोली तयार करून त्यात ठेवलेले देशी दारू व निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. ‘रुपेश संत्रा’ ब्रँडचे बनावट स्टिकर लावलेल्या ३६०० निप जप्त करण्यात आल्या. तसेच रिकाम्या बाटल्या, झाकण, काचेच्या बाटल्या, प्लास्टिक ड्रम, वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईदरम्यान लाकडी दिवाणामध्ये लपून बसलेल्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर मुख्य आरोपी श्याम मेश्राम हा कुटुंबासह फरार झाला.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 26, 2026 03:34:20
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - उजनीच्या दूषित पाण्यामुळे सोलापुरात कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याचे सांगत आ. देवेंद्र कोठेनीं वेधले सभागृहाचे लक्ष - सोलापूरची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील प्रदूषित होणाऱ्या पाण्याबद्दल सभागृहात आ. देवेंद्र कोठे यांनी मांडली महत्त्वपूर्ण भूमिका - उजनीतील दूषित पाण्यामुळे सोलापुरात कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याचे सांगत सभागृहाचे वेधले लक्ष - गेल्या 30 ते 40 वर्षांपासून एमआयडीसी भागातील कारखान्यांचे दूषित पाणी उजनी धरणात मिसळले जात असून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप - सोलापुरात कर्करोगावर उपचार करणारी पाच ते सहा मोठे रुग्णालय सुरू असून यावर गांभीर्याने विचार करण्याची केली विनंती - शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आग्रही मागणी
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 26, 2026 03:06:33
Kolhapur, Maharashtra:दख्खनचा राजा अशी ओळख असणाऱ्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यंदा प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे.. पर्यावरण रक्षणासाठी घेण्यात आलेला निर्णय अत्यंत कडकपणे राबवण्याचे निश्चित केले आहे. जोतिबा डोंगराचा परिसर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यात्रेदरम्यान भाविकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे टाळून त्याऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या आगरबत्ती, दवना, खोबरे-वाटी आणि इतर पूजा साहित्यासाठी होणारे प्लास्टिक पॅकिंग आता पूर्णपणे बंद असेल. केवळ पूजा साहित्यच नव्हे, तर मिठाई, पेढे, खाद्यपदार्थ आणि खेळण्यांच्या पॅकिंगसाठीही प्लास्टिकचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. चैत्र यात्रेदरम्यान मंदिरात कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक घेऊन भक्तांना प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यात्रेमध्ये अन्नदान करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनीही प्लास्टिक पिशव्या किंवा बाटल्यांचा वापर न करता पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 26, 2026 03:04:15
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शहागंज येथे हातगाडी चालकांकडून बुधवारी दाम्पत्याला मारहाण झाली त्याच भागात मनपाच्या अतिक्रमण विभागाचे पथक मंगळवारी दुपारी हातगाड्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. त्या वेळी एमआयएमचे नगरसेवक व मनपाचे विरोधी पक्षनेते अब्दुल समीर तेथे गेले. त्यांनी पथकाला अरेरावीची भाषा करत माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांचा सत्कार केला. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे, त्यामुळे मनपाच्या कारवाईत अडथळा आणणाऱ्या या विरोधी पक्षनेत्यावरही आता कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे दरम्यान कदाचित मंगळवारची कारवाई झाली असती तर बुधवारी दांपत्याला मारहाण झाली नसती अशीही चर्चा सुरुय...
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 26, 2026 03:04:00
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पुंडा येथे वऱ्हाडी कवी विठ्ठल कुलट यांनी आपल्या वडिलांच्या दशक्रियेतून स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण संवर्धन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा ठोस संदेश देत समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. समाजाला केवळ उपदेश न करता प्रत्यक्ष कृतीतून आदर्श घालून देणारे साहित्यिक विठ्ठल कुलट यांनी आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारापासून ते दशक्रियेपर्यंतचे सर्व विधी पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन पार पाडले.सुतक न पाळणे, अंधश्रद्धांना फाटा देणे, स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे,असे अनेक सामाजिक संदेश त्यांनी या कृतीतून दिले. दशक्रियेच्या दिवशी महिलांना विधीपासून दूर ठेवले जाते.मात्र पुंडा येथील कुलट कुटुंबात दशक्रियेचे सर्व विधी घरातील महिलांनीच वैज्ञानिक दृष्टिकोनातून पार पाडले. अंत्यसंस्कार स्थळी मंडप उभारून कोणताही ‘बाट’ न मानता सर्व धार्मिक विधी महिलांच्या हस्ते करण्यात आले. हिंदू परंपरेनुसार तिसऱ्या दिवशी चितेची राख नदीत विसর্জित केली जाते. मात्र “राखेमुळे नद्यांचे प्रदूषण होते,” असे सांगत विठ्ठल कुलट यांनी राख शेतात खड्डा करून विसर्जित केली. तसेच अस्थी शेतात पुरून त्या ठिकाणी फळझाडे लावण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला." ज्यांनी आपल्याला जन्म दिला, वाढवले, सुख-समृद्धी दिली, त्यांच्या निधनानंतर आपण केवळ केस अर्पण करायचे ka?” असा प्रश्न उपस्थित करत घरातील कुणीही केस न देण्याचा निर्णय घेण्यात आला.पिंडदानाच्या वेळी भात शिजवून कावळ्याने तो खावा, ही प्रथा देखील टाळण्यात आली. समाजात सुरू असलेल्या अनावश्यक खर्चिक प्रथा, अंधश्रद्धा आणि पर्यावरणाला घातक रूढींना आळा घालण्यासाठी प्रत्यक्ष कृतीची गरज असते. विठ्ठल कुलट यांनी आपल्या वैयक्तिक दुःखाच्या प्रसंगीही समाजाला सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांच्या या कृतीमुळे स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण संरक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांचा संदेश समाजात नक्कीच रुजेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जयेश जगड, झी मिडिया, अकोला.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 26, 2026 02:46:37
Shirur, Maharashtra:पुण्याच्या शिक्रापूरमध्ये पुन्हा कोयता गँगची दहशत पहायला मिळालीय. किरकोळ अपघाताच्या वादातून व्यापाऱ्यावर कोयता गँगच्या टोळक्याने हल्ला करत मारहाण केली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. कापड दुकानदार श्रीकांत नरके यांच्या कारला एका दुचाकीस्वाराची धडक झाल्यानंतर केवळ किरकोळ वादावरून १५ ते २० जणांचे टोळके दुकानात घुसले आणि व्यापाऱ्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली या हाणामारीदरम्यान हल्लेखोरांनी गळ्यातील सोन्याची चैन आणि तब्बल ७० हजार रुपयांची रोकड लंपास केली. घटनेनंतर शिक्रापूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवत २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 26, 2026 02:46:07
0
comment0
Report
Advertisement
Back to top