icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कोंकण में लक्ष्मी ऑरग्निक विरोधी आंदोलन तेज, राज ठाकरे ने समर्थन का संकेत दिया

Ratnagiri, Maharashtra:ब्रेकिंग.. लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात कोकणात रणकंदन.. राज ठाकरेंचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा!.. अँकर कोकणातील खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत आता संघर्षाची ठिणगी पडली आहे. लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात स्थानिक ग्रामस्थ आणि संघर्ष समित्यांनी आक्रमक पाऊल उचललं असून, येत्या ६ एप्रिलला एका भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या आंदोलनाला आता राजकीय बळही मिळालं आहे.आज आंदोलकांच्या शिष्टमंडळाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना मोर्चाचं निवेदन दिलं.. यावेळी राज ठाकरेंनी या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.. मनसेच्या एन्ट्रीमुळे आता या आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झालं असून प्रशासनाचं धाबं दणाणलं आहे.. पर्यावरण आणि स्थानिक प्रश्नांवरून पेटलेलं हे आंदोलन आता लक्ष्मी ऑरगॅनिकसाठी मोठी अडचण ठरणार,असं चित्र सध्या कोकणात पाहायला मिळतंय.. नितीन सरदेसाई.. मनसे नेते.. मनीष पात्रे (रायगड जिल्हा संपर्क प्रमुख) मनसे Feed remove 2c
0
0
Report

रायगड़ लोकसभा में शिवसेना भगवा फड़केगी, रामदास कदम ने सुनील तटकरे को दी चुनौती

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रायगड लोकसभेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार.. रामदास कदम रामदास कदम यांचा सुनील तटकरेंना पुन्हा टोला... अँकर राजकारणातून यावेळची मोठी बातमी समोर येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणात राजकीय घडामोडींना वेग आला असून, खेडमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. खेडमध्ये शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख दत्ताराम भिलारे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. केवळ शिवसेनाच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही यावेळी 'धनुष्यबाण' हाती घेतला आहे. या कार्यक्रमात बोलताना रामदास कदम यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. "रायगड लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचाच भगवा फडकणार" असे विधान करत त्यांनी थेट सुनील तटकरे यांना आव्हान दिले आहे. खेड तालुक्यातील या मोठ्या फेरबदलामुळे आगामी निवडणुकांपूर्वी शिंदे गटाला मोठा 'बूस्टर' मिळाला असून, रायगडमधील राजकीय समीकरणे आता पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
0
0
Report

नांदेड गैंगवार: तीन की मौत, चार गिरफ्तार

Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड शहरात काल मध्य रात्रीनंतर झालेल्या गँग वॉर मध्ये तिघांचा मृत्यू झाला. जखमी असलेल्या एकाला रुग्णालयात दाखल करत असताना त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. साई लाला आणि अर्जितसिंह चव्हाण या दोन गँग मध्ये हे टोळीयुद्ध झाले. हे सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर एम पी डी ए अंतर्गतही गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे मयत अर्जितसिंह चव्हाण हा महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधून उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार होता. अर्जितसिंह चव्हाण आणि त्याचे दोन ई-स्क्वेअर मधून धुरंधर चित्रपट पाहून बुलेट वर निघाले होते. त्यांना गाठण्यासाठी साई लाला गँगचे सदस्य दबा धरून होते. चित्रपट पाहून थोडे अंतरावर आले असता त्यांना गाठून हल्ला करण्यात आला. तलवार, चाकू दोन्ही गँगमध्ये हाणामारी झाली. त्या मध्ये अर्जितसिंह चव्हाण आणि सय्यद आवेज या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमीना विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते. रुग्णालयात अर्जितीसिंह चव्हाण याचा भाऊ आणि वडील आले होते. रुग्णालयात जखमी महम्मद आवेज याला दाखल करत असताना अर्जितसिंह चव्हाण याच्या भावाने आवेज वर चाकूने वार केले. यात अवेज चा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केलीये. या गँग वॉर च्या घटनेमुळे नांदेड शहरात खळबळ उडालीये.
0
0
Report
Advertisement

हिंजवड़ी IT पार्क में आरएमसी ट्रक से सीमेंट गिरने से सड़क पर हादसों का खतरा

Pimpri-Chinchwad, Maharashtra:आरएमसी ट्रक मधील सीमेंट-कांक्रीट लिकेज के कारण हिंजवड़ी परिसर की सड़क पर दुर्घटना का खतरा बढ़ गया है. हिंजवड़ी IT पार्क परिसर में आरएमसी ट्रक चालक बेजबाबदार तरीके से ट्रक चला रहे हैं, जिससे ट्रक के चाकों के नीचे कई निष्पाप नागरिक घायल या मौत की स्थिति में आ सकते थे. अभी फिर एक बार आरएमसी ट्रक चालक की बेजबाबदारी सामने आ रही है. हिंजवड़ी IT पार्क फेस थ्री क्षेत्र में एक आरएमसी टैंकर से मुख्य सड़क पर सीमेंट-कांक्रीट गिरते वीडियो वायरल हो रहा है. सड़क पर गिरने वाले सीमेंट से रस्ते पर गिरने और दुर्घटना होने की संभावना बढ़ने लगी है. ऐसे में हिंजवड़ी यातायात पुलिस यह देखेगी कि आरएमसी ट्रक के खिलाफ क्या-क्या कानूनी कार्रवाई होती है — सभी की नजर अब उसी पर है.
0
0
Report

समता पतसंस्थे में एक दिन में 100 खाते: अशोक खरात पर बड़ा घोटाला आरोप

Shirdi, Maharashtra:भोंदू अशोक खरात याचे अनेक कारनामे आणी गोरखधंदे आता समोर येत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील समता नागरी पतसंस्थेत एकाच दिवशी विविध लोकांच्या नावाने राहाता येथील एकाच शाखेत 100 खाते उघडली गेली आणी विशेष म्हणजे हे सर्व खाते हा भोंदू अशोक खरात ऑपरेट करत होता.. गेल्या काही वर्षांत तब्बल 60 कोटीपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार या खात्यावरून करण्यात आले असून भोंदू खरातने आपल्या सानिध्यात असणा-या लोकांच्या नावे हे खाते परस्पर उघडली असल्याच आता शिर्डी पोलीसांच्या तपासातून समोर येतंय यामुळे समता पतसंस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही वेळातच समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयते हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत...ते काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..
0
0
Report
Advertisement

अंजनगाव खेळोबा गांव में बाहरी लोगों के कारण विवाद, ग्रामस्थों ने शांति बनाए रखी

Solapur, Maharashtra:Sol Rajan Patil 121 Live U Anc: सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव खेलोबा इथं बाहेरच्या लोकांनी येवून वाद वाढविला, पण गावातील ग्रामस्थ हे अतिशय समजूतदार आहेत, त्यामुळे गावात निर्माण झालेला वाद मिटला आहे अशी प्रतिक्रिया माजी आमदार राजन पाटील यांनी दिलीय. तर गावातील सरपंच प्रदीप चौगुले यांनी देखील बाहेरच्या लोकांमुळेच गावातील सलोखा बिघडला असा आरोप केला. यावेळी गावातील सलोखा संदर्भात बोलताना त्यांना अश्रू आणावर झाले. माजी आमदार राजन पाटील आणि गावचे सरपंच प्रदीप चौगुले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
0
0
Report

अमरावती के मोर्शी में आंधी-बारिश से संतरे और गेहूं समेत फसलें बर्बाद

Amravati, Maharashtra:अमरावतीच्या मोर्शी तालुक्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका; वादळी वाऱ्याने संत्र्याची झाडे पडली ऊन-मळून, गहू, कांदा आणि संत्राच नुकसान अमरावती जिल्ह्यात काल मध्यरात्री मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून मोर्शी तालुक्याला मोठ्या प्रमाणात गारपिटीचा फटका बसला आहे. मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली या वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागेतील संत्र्याची झाडे ऊन-मळून पडली असून शेतात काढून ठेवलेला गहू उन्हाळी कांदा आणि संत्रा च नुकसान झालं आहे. दरम्यान अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा हवालदिल झाला असून सरकारकडे मदतीची आस लावून बसला आहे.
0
0
Report

रेड्स ऐप से नागपुर के अज्ञात शव की पहचान सिर्फ दो घंटे में

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरी पोलिसांच्या 'रेडस् ॲप'चा डंका!.. नागपुरातील 'त्या' अज्ञात मृतदेहाची ओळख अवघ्या दोन तासांत पटली... अँकर तंत्रज्ञानाच्या जोरावर गुन्हेतपासाला वेग देणाऱ्या रत्नागिरी पोलिसांच्या 'रेडस् ॲप' (REDS App) ने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.या ॲपच्या मदतीने नागपूर पोलिसांनी एका अज्ञात मृतदेहाची ओळख अवघ्या दोन तासांत पटवून गुन्हे तपासात मोठी यश मिळवले आहे.. नागपूरच्या वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका जंगलात विद्रूप अवस्थेत मृतदेह सापडला होता.ज्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या कल्पकतेतून तयार झालेल्या 'रेडस् ॲप'ची मदत घेतली गेली.यातील एआय तंत्रज्ञानाद्वारे विद्रूप चेहऱ्याचे डिजिटल पुनर्निर्माण करण्यात आले.. या प्रक्रियेनंतर तयार झालेल्या अचूक छायाचित्रामुळे त्या व्यक्तीची ओळख पटली.. रत्नागिरी पोलिसांचे हे तंत्रज्ञान आता महाराष्ट्र पोलीस दलासाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरताना दिसत आहे.. रत्नागिरी पोलिसांच्या या तांत्रिक यशाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे..
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के परशुराम घाट पर कार दुर्घटना, नाशिक के पर्यटक की मौत, तीन घायल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. परशुराम घाटात कारचा भीषण अपघात; नाशिकच्या पर्यटकाचा मृत्यू, तिघे गंभीर! रत्नागिरी जिल्ह्यातून एक मोठी आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात मध्यरात्री एका कारचा भीषण अपघात झाला आहे..पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे जात असताना, चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. या अपघातात नाशिकच्या रोहित संतोष भालेकर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. कारमधील इतर तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर चिपळूणच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. नाशिकमधील कांची येथील हे सर्व पर्यटक कारने गणपतीपुळ्याला जात होते. परशुराम घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले.. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.
0
0
Report

सातारा: जिल्हा परिषद अध्यक्ष चयन के दौरान पुलिस ने पत्रकारों को रोका

Satara, Maharashtra:सातारा - आज देखील जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी सातारा पोलिसांची आडमुट भूमिका पहायला मिळत आहे. सभापती पदाचा वृत्तंकनासाठी जाणाऱ्या पत्रकारांना जिल्हा परिषदेच्या इमारती पर्यंत देखील जाऊ दिले जात नाही. मागे 20 मार्च ला देखील जिल्हा परिषद अध्यक्ष ,उपाध्यक्ष निवडी वेळी देखील याच पद्धतीने पोलिसांनी आडमुठ भूमिका घेतल्यामुळे मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती. वास्तविक पाहता वृत्तांकना पासून पोलिसांनी पत्रकारांना रोखने इतपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जातो आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी...
0
0
Report
Advertisement

वाशीम में गारपिट से टरबूज व कांदों की फसलें भारी नुकसान

Washim, Maharashtra:वाशीम जिले में काल झालेल्या गारपिटाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. वाशीम तालुक्यातील केकत उमरा येथील शेतशिवारात बिजवाई कांदासह टरबूज पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विक्रीसाठी तयार असलेली टरबूज पिके गारांच्या तडाख्याने फुटली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चित दर यामुळे शेतकरी अडचणीत असताना या गारपिटिने संकट अधिकच गडद केले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top