445001
यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.
Yavatmal, Maharashtra:राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रत्नागिरी के खेड में नदी में डूबे ही परिवार के तीन सदस्य, दर्दनाक मौत
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधून एक अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी बातमी समोर येत आहे...खेड तालुक्यातील धामणंद काजूफाटा परिसरातील नागझरी नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे...दुपारच्या sुमारास ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.. नदीतील पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने हा घात झाल्याचे बोलले जात आहे.. या दुर्घटनेत १५ वर्षांची लावण्या पार्टे, ३८ वर्षांचे नितीन जाधव आणि अवघ्या १२ वर्षांच्या विराज जाधव या तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.. हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईक होते.. घटना माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ शोधमोहीम राबवून तिघांचेही मृतदेह बाहेर काढले.. या घटनेमुळे संपूर्ण खेड आणि धामणंद परिसरात शोककळा पसरली असून, खेड पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत...0
0
Report
नीट पेपर लीक के विरोध में कांग्रेस का देशव्यापी चक्का-जाम
Kalyan, Maharashtra:नीट पेपर फुटीच्या विरोधात कॉग्रेसचे चक्का जाम आंदोलन कॉग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.. नीट पेपर फुटी प्रकरणाच्या विरोधात संपूर्ण देशभरात आंदोलन सुरु आहेत.आज याच्याच निषेधार्थ कल्याण काँग्रेसच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आला. कल्याणच्या रेल्वे स्टेशन बाहेर रस्त्यात बसून केंद्र सरकार विरोधात जोरदार यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. सात वर्षात ७० पेपर लीक झाले तरी मोदी सरकार का गप्प आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपली जबाबदारी स्वीकारून त्वरित आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली गेली. आंदोलनाची तीव्रता बघता आंदोलन कर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतलं.0
0
Report
नाशिक के येवला वनपरिक्षेत्र में रिश्वतखोरी के आरोप, आठ लोगों पर एसीबी कार्रवाई
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातल्या येवला वनपरिक्षेत्र विभागात तब्बल आठ जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई वनपरिक्षेत्र हद्दीतील झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी लाच मागितल्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मिळाली होती तक्रार याबाबत पकडलेल्या लोकसेवकांची कसून चौकशी सुरू असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती समोर आली आहे0
0
Report
Advertisement
کوکن सीट پر महायुती की रस्साकशी: शिवसेना का नया दांव
Chendhare, Maharashtra:स्लग - कोकण विधान परिषदेसाठी महायुतीत रस्सीखेच ? विकास गोगावले यांचे नाव पुढे करून शिवसेनेनं टाकला डाव ? कोकणच्या जागेसाठी पालमंत्रीपदाचा सौदा ? सुनील तटकरे यांच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष अँकर - विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतच जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या असून, संभाव्य उमेदवारांच्या चर्चेला वेग आला आहे. माजी आमदार अनिकेत तटकरे यांचे नाव आघाडीवर असतानाच, आता राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे नाव चर्चेत आणून शिवसेनेकडून सुनील तटकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्हिओ १ – गेली काही वर्षे रखडलेली विधान परीषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. आता या जागेवरून महायुतीतच रस्सीखेच सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बाईट घ्यावा व्हिओ २ – रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील तीन जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी या निवडणूकीसाठी मतदान करणार आहेत. या तीनही जिल्हयांतील मतदारांचा विचार केल्यास महायुतीमध्यये शिवसेनेकडे सर्वाधिक मतदार आहेत. त्याखालोखाल भाजप आणि सर्वात कमी मतदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. त्यामुळे या मतदार संघावर शिवसेना या मतदार संघावर दावा सांगण्याची दाट शक्यता आहे. विकास गोगावले यांचे नाव पुढे करून शिवसेनेने राजकीय डाव टाकला आहे. गोगावले यांचया नावाची चर्चा सुरू झाली असली तरी मंत्री भरत गोगावले यांनी याबाबत सावध पवित्रा घेतला आहे. बाईट 2 – भरत गोगावले, मंत्री व्हिओ ३ – रायगडात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रसमधील वाद काही नवीन नाही. पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आदिती तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे अजूनही रायगडचे पालकमंत्रीपद रिक्तच राहिलं आहे. मात्र या निवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसची पर्यायाने सुनील तटकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू असल्याचं बोललं जात आहे. विधान परीषदेच्या जागा राष्ट्रवादीला सोडली तर त्याबदल्यात पालकमंत्री पदाची मागणी शिवसेनेकडून होवू शकते. बाईट – भरत गोगावले, मंत्री फायनल व्हिओ – सद्याची राजकीय परीस्थिती पाहता चेंडू सुनील तटकरे यांच्या कोर्टात आहे. काय निवडायचे या निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे. आता तटकरे लेकीसाठी पालकमंत्री पद घेतात की लेकासाठी विधान परीषदेची आमदारकी घेतात कर आणखी काही प्रतिडाव टाकतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. प्रफुल्ल पवार, झी 24 तास रायगड0
0
Report
headline
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर विधान परिषद स्थानीय स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला चार वर्षे उशीर झाला आहे एकत्रित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरुण जगताप हे याआधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर आमदार होते 2022 साली त्यांचा कार्यकाल संपला त्यानंतर निवडणूक झाली नाही 2022 मध्ये कार्यकाल संपलेले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची देखील अजूनही निवडणूक झाली नाही त्यामुळे सध्या एक महानगरपालिका और 14 नगरपालिका नगरपंचायत चे 461 सदस्य मतदार असणार आहेत यातही भाजप सर्वाधिक 199 सदस्य संख्या असलेला पक्ष आहे त्या खालोखाल राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 50 नगरसेवक आहेत निवडणुकीत निवडून येण्यासाठी 231 मतदान या दोन्ही पक्षाकडे आहे गेल्या वेळी जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असली तरी यावेळी भाजप जागेसाठी दावा करेल तर राष्ट्रवादीकडून देखील ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी दावा केला जात आहे0
0
Report
चंद्रपूर के नागभीड़ में बाघ का हमला: तेंदुपत्ता कटने गई महिला की मौत
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात वाघाचा हल्ला, तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलेचा जागीच मृत्यू चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याची घटना समोर आली आहे. किटाळी मेढा परिसरात तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या ५५ वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला करून तिला जागीच ठार केले. वनिताबाई शंकर उईके असे मृत महिलेचे नाव असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वनपथक आणि नागभीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
चालक अवकाश पर, मुंबई कंटेनर टर्मिनल में हजारों कंटेनर फंसे, नाराज कारोबारी
Navi Mumbai, Maharashtra:Anchor- उरण मधील 'जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी' अंतर्गत येणाऱ्या 'भारत मुंबई कंटेनर टर्मिनल'मध्ये गेल्या 10 दिवसांपासून आयातीत मालाचे हजारो कंटेनर अडकून पडले आहेत. कंटेनर चालक सुट्टीवर गेले असल्याने हे कंटेनर अडकले असल्याची माहिती जे एन पी टी प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे. दरवर्षी या काळात कंटेनर चालक गावी जात असतात त्यामुळे वाहतूक खोळाबा झाल्याचे समोर आले असून, सागरी व्यापारी नियमांनुसार, जहाजावरून माल उतरविल्यानंतर कंटेनर बंदराबाहेर वाहून नेण्याचा कमाल 'टर्नअराउंड वेळ' ४८ तासांचा असतो. म्हणजेच ग्राहकांनी त्यांचे कंटेनर ४८ तासांत बाहेर काढणे बंधनकारक असते मात्र १० मे पासून भारत मुंबई कंटेनर टर्मिनल'मध्ये कंटेनर बाहेर काढण्यास विलंब सुरू झाला असल्याने व्यापारी आणि आयातदर ना याचा फटका बसत आहे।0
0
Report
NEET पेपरफुटी मामले: लातूर के डॉक्टरों के बच्चों तक क्यों पहुंची CBI की सख्ती?
Latur, Maharashtra:लातूर… शिक्षणाचं हब… डॉक्टर घडवणारी फॅक्टरी… पण आता हाच लातूर देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणामुळे चर्चेत आलं आहे. NEET पेपरफुटी प्रकरणात अटक झालेल्या शिवराज मोटेगावकर यांच्यावर स्वतःच्या मुलासाठी पेपरफुटी केल्याचा गंभीर आरोप CBI कडून करण्यात आला आहे. इतकंच नाही… तर क्लासमधील काही निवडत विद्यार्थ्यांसाठी… तसेच लातूरमधील काही नामांकित डॉक्टरांच्या मुलांना आणि नातेवाईकांनाही प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मोटेगावकर याचा मुलगा आणि लातूरमधील काही दिग्गज डॉक्टरही आता CBI च्या रडारवर आले आहेत का…? शिवराज मोटेगावकर यांच्या नंतर आता मुलगा ही CBI च्या रडारवर... लातूरतील दिग्गज डॉक्टरही CBI च्या रडारवर… NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ने शिवराज मोटेगावकर यांना अटक केल्यानंतर आता तपासाची दिशा त्यांच्या मुलाकडेही वळली आहे. मोटेगावकर यांच्या मुलाने यंदा बारावीची परीक्षा दिली असून, त्यालाही फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा फायदा झाला का…? यात तपास आता CBI करत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे लातूरच्या शिक्षण पद्धतीवर आणि खासगी कोचिंग व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. डॉक्टर बनण्याचं स्वप्न… ते पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांची रात्रंदिवस मेहनत… पालकांनी घेतलेली कर्जं… आणि भविष्य घडवण्यासाठी सुरू असलेली धडपड… परंतु जर याच स्वप्नांचा सौदा पैशांनी… ओळखीने… आणि पेपरफुटीच्या माध्यमातून होत असेल… तर हा केवळ गुन्हा नाही… तर लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवरचा सर्वात मोठा अन्याय आहे. शिवराज मोटेगावकर यांच्यावर स्वतःच्या मुलासाठी… क्लासमधील निवडक विद्यार्थ्यांसाठी… आणि काही दिग्गज डॉक्टरांच्या मुलांसाठीही पेपरफुटी केल्याचे आरोप होत आहेत. मोटेगावकर यांच्या स्पेशल बॅच मध्ये नेमकं कोण होतं…? आणि या रॅकेटची मुळं आणखी किती खोलवर गेली आहेत…? या प्रश्नांची उत्तरं आता संपूर्ण राज्य शोधत आहे…0
0
Report
रत्नागिरी: समुद्र में डूबती महिला को युवक करण महेश मिलके ने बचाया, वीडियो वायरल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - अल्ट्राटेक जेट्टी ते मिरकरवाडा या दरम्यान समुद्रात बुडणाऱ्या महिलेला करण महेश मिलके या तरुणानं वाचवलं सकाळी 7 वाजताच्या दरम्यानची घटना; महिलेला वाचतानाचा सर्व थरार मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद सकाळी 7 च्या दरम्यान महिला गेली होती कालवे काढायला समुद्राचा पाण्यात झालेली वाढ बेतली असती महिलेच्या जीवावर; तरुणाच्या धाडसाने वाचला महिलेचा जीव समु्द्र किनारापासून अंदाजे 150 ते 200 मीटर समुद्रात बुडत होती महिला महिलेला वाचवल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये महिलेवर उपचार सुरू0
0
Report
Advertisement
खारघर पुलिस ने वर्षभर की चोरी सुलझाकर 94.74 लाख का माल लौटाया
Navi Mumbai, Maharashtra:खारघर पोलिस ठाणे हद्दीत वर्षभरात घडलेल्या जबरी चोरी, घरफोडी, मोबाईल चोरी आणि हरविलेल्या मोबाईल प्रकरणांचा तांत्रिक तपास करत मिळालेला मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आलाय. खारघर पोलिसांनी 57 तोळे सोन्याचे दागिने, घरफोडीतील 27 लाख रोख रक्कम, चोरीला गेलेले अथवा हरवलेले मोबाईल हस्तगत करुन एकूण 94 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल मुळ मालकांना परत करण्यात आलाय.0
0
Report
मुखेड के कुएँ में बिबट्या गिरा, बचाव दल पहुँचा; पानी में डूबकर मौत
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील मुखेड येथे एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये बिबट्या पडला असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती वन विभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहोचण्याच्या आधीच मृत्यूशी झुंज देत असलेला बिबट्या अखेर पाण्यात बुडून मृत पावला हा संदर्भात घटनास्थळावरून आढावा घेतला आहे0
0
Report
चॉकलेट के लालच में चार वर्षीय बच्ची के साथ दुष्कर्म, नागभीड़ में आरोपी गिरफ्तार
Chandrapur, Maharashtra:चॉकलेटचे आमिष दाखवून चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात संतापजनक घटना आज उघडकीस आली. अवघ्या चार वर्षीय बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून 19 वर्षीय युवकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी संचित याला नागभीड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा पीडित बालिकेच्या कुटुंबातील नात्याने मेव्हणा असून त्याचे कुटुंबात नेहमी येणे-जाणे होते. घटनेच्या दिवशी आरोपीने बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखववत गावातील सुरू असलेल्या नवीन घराच्या बांधकामाच्या ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर बालिका घरी परतल्यावर तिने आईकडे घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर नागभीड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे..0
0
Report
Advertisement
लातूर के प्रोफेसर MOTEGAVAKAR पर ED जाँच की माँग, शिक्षण साम्राज्य पर राजनीति गरम
Latur, Maharashtra:AC- लातूर जिल्ह्यातील हनुमन्तवाडी या छोट्याशा खेड्यातून आलेल्या प्रा. शिवराज मोटेगावकर यांचा २५ वर्षांतील प्रवास थक्क करणारा आहे. RC क्लासेसच्या माध्यमातून राज्यभरात शिक्षणाचं मोठं नेटवर्क उभं करत हजारो विद्यार्थी आणि कोट्यवधींची उलाढाल त्यांनी केला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उभ्या राहिल्या मालमत्तांमुळे आता त्यांच्या संपत्तीची ED चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे... VO 01- लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील हनुमंतवाडी गावातून आलेल्या ४७ वर्षीय प्रा. शिवराज मोटेगावकर यांचा प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील एका महाविद्यालयात तासिका तत्वावरील शिक्षक म्हणून सुरू झालेला प्रवास पुढे शिक्षण क्षेत्रातील मोठ्या नेटवर्कपर्यंत पोहोचल्याचं बोललं जात आहे. गेल्या २५ वर्षांत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये क्लासेसची सेंटर सुरू केलंय ताकद शिकवण्यासाठी त्यांनी मोठं शैक्षणिक साम्राज्य उभं केलं आहे. आता त्या साम्राज्याची ED मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखानी केली आहे... VO 02- लातूरजवळील खोपेगाव परिसरातील आलिशान इमाराती, शहरातील विविध भागांतील भूखंड, कोचिंग क्लासेस, महाविद्यालय तसेच रेणापूर परिसरातील CBSई शाळेसह विविध मालमत्तांमुळे आता त्यांचं नाव पुन्हा चर्चेत आल्यं आहे. दरम्यान, या संपूर्ण मालमत्तेची EDमार्फत चौकशी झाल्यास मोटेगावकर यांच्या पाय अजून खोलात जाऊ शकतात असं बोललं जात आहे... WKT- वैभव बालकुंदे रिपोर्टर ( ग्राउंड रिपोर्ट ) VO 03- खोपेगाव परिसरातील मालमत्तांवरून आता विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात उभ्या उभारण्यात आलेल्या इमारतीबाबत अनाधिकृत बांधकामाचे आरोपही समोर येत आहेत... VO END- दरम्यान, प्रा. मोटेगावकर यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत आहे. शिक्षण क्षेत्रातील वाढता प्रभाव, राजकीय संबंध आणि आता समोर येणाऱ्या मालमत्तांच्या चर्चेमुळे त्यांच्या भोवतीचं वर्तुळ अधिक गडद होताना दिसत आहे. खोपेगावातील मालमत्तांपासून सुरू झालेला हा वाद पुढे आणखी कोणतं वळण घेतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे...0
0
Report
नीट पेपरफुटी मामले में गिरफ्तारियां और छात्रों के भविष्य पर सवाल
Akola, Maharashtra:नीट पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत इतर संबंधितांवरही कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, या प्रकरणात प्राध्यापक मोटेगावकर यांना अटक करण्यात आल्यानंतर अकोल्यात काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अकोल्यातील मोटेगावकर यांच्या शिकवणी वर्गावरील बोर्डाला काळ फासलं होत तर आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अकोल्यातील मोटेगावकर यांच्या आरआरसी क्लासेससमोर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले. संतप्त कार्यकर्त्यांनी क्लासेसच्या बोर्डवर शेण फेकून आपला रोष व्यक्त केला. नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.0
0
Report
नवी मुंबई विमानतल के नामकरण पर याचिका फेटी, आंदोलन तेज
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली असली तरी आंदोलनाच्या मद्यमातून विमानतळाला नाव देण्यावर स्थानिक भूमिपुत्र ठाम असून, 24 जून पर्यत नाव न दिल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा. विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी आमच्या एक ग्रुप कोर्टात गेला होता पण राज्य सरकार ने प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकार कडे दिला आहे, केंद्रात त्याला मंजुरी मिळणे गरजेचे असून आम्ही त्याचा पाठपुरावा करत असल्याचे नवी मुंबई विमानतळ कृती समिती कडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊन नऊ महिने झाले आहेत 24 जून पर्यत दिले नाही तर मात्र आम्ही मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबई एअरपोर्ट कृती समिती. विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव मिळेल असा विश्वास दि बा पाटील यांचे सुपुत्र अतुल भगत यांनी सगीतेल आहे. नवी मुंबई एअरपोर्टला दि बा पाटील यांचे नाव द्यावे ही आमची आज पण भूमिका आहे.. गरज पडली तर एकनाथ शिंदे पण पाठपुरावा करतील.. पण या भूमिकेवर आम्ही कायम आहोत. उदय सामंत - मंत्री0
0
Report
Advertisement
