445001
यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.
Yavatmal, Maharashtra:राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नवी मुंबई: अदालत ने होल्डिंग पॉन्ड के आदेश दिए — महापौर दावा तीन पॉन्ड पर्याप्त
Navi Mumbai, Maharashtra:सानपाडा जुईनगर भागात होल्डिंग पॉन्ड बुजवून मैदान निर्माणण्यात आलेय. आता अतिक्रमित मैदानावरील भराव काढून पुन्हा होल्डिंग पॉन्ड पुनरस्थापित करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. दुसरीकडे महापौर सुजाता पाटील यांनी सानपाडा जुईनगर भागात 3 होल्डिंग पॉन्ड असून चौथ्याची गरज लागणार नाही असा अजब दावा केलाय. सानपाडा जुईनगर विभागात असलेल्या होल्डिंग पॉन्ड वरून आता संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे. होल्डिंग पॉन्ड बुजवून त्याठिकाणी सध्या मैदान उभं राहिलेलं दिसत असलं तरी न्यायालयाने होल्डिंग पॉन्ड मधील भराव 3 महिन्यात काढण्याचे आदेश नवी मुंबई महापालिकाेला दिले आहेत. असे असले तरी नवी मुंबई मनपा महापौर यांनी शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मैदान अधिक महत्वाचे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.0
0
Report
सोलापुर विधानपरिषद सीट पर भाजपा उम्मीदवार का फैसला कौन करेगा?
Solapur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यात विधानपरिषदेच्या एका जागेसाठी अनेक दिग्गज नेत्यांनी देव ठेवले पाण्यात - राज्यात तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणार विधान परिषदेच्या निवडणुका - सोलापूर जिल्ह्यात विधान परिषदेच्या एका जागेसाठी निवडणूक - जिल्ह्यात स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवल्यानंतर विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत अनेक चर्चांना उधाण - मंत्री जयकुमार गोरे जो ठरवतील तोच असणार उमेदवार ? - सोलापूर जिल्ह्यातील विधानपरिषदेची एक जागा बिनविरोध होण्याची दाट शक्यता आजपासून आचारसंहिता लागू झाली असून प्रत्येकाने त्याचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एस. कार्तिकेन यांनी दिले आहेत. बाईट - एस. कार्तिकेयन ( जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सोलापूर ) सोलापूर जिल्ह्यातील एका विधानपरिषदेच्या जागेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे एकूण 616 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. --------------------------------- *खालील प्रमाणे मतदार असतील* 1) सोलापूर महानगरपालिका - 102 + 9 ( स्वीकृत ) = एकूण 111 2) जिल्हापरिषद - 68 3) पंचायत समिती सभापती - 11 4) नगरपरिषद / नगरपंचायत - 374 ( नगरसेवक ) + 12 ( नगराध्यक्ष ) + 40 स्वीकृत नगरसेवक = 426 *एकूण - 616 मतदार* --------------------------- सोलापूर जिल्ह्यातील विधानपरिषदेच्या एका जागेसाठी प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, राम सातपुते, शशिकांत चव्हाण, रणजितसिंह नाईकनिंबाळकर, शहाजी पवार, दिलीप माने, राजन पाटील इत्यादींची नावे चर्चेत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाल्याने जिल्ह्यात आता चांगले वर्चस्व निर्माण झाले आहे.0
0
Report
पुणे-मुंबई एक्सप्रेसवे पर स्कोडा कार दर्दनाक हादसा, 2 की मौत, 3 घायल
Varsoli, Maharashtra:पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर स्कोडा गाडीचा भीषण अपघात झाला आहे... मुंबई कडून पुण्याकडे येणाऱ्या लेन वर हा अपघात झाला आहे... चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला असून घटनास्थळी आयआरबी यंत्रणा, पोलीस व ऍम्ब्युलन्स दाखल झाले.. गाडीत मध्ये एकूण 5 जण होते. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी डिव्हायडर ला जाऊन धडकली. डिव्हायडरचा पत्रा हा थेट गाडीमध्ये घुसल्याने गाडीत असलेले 2 जण जागीच ठार झाले. गाडीचे दरवाजे व पत्रा कापून गंभीर जखमी व मयत झालेल्यांना बाहेर काढण्यात आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
वर्धा में गरमी ने मचा दिया कहर, पारा 46.5°C
Wardha, Maharashtra:वर्ध्यात उष्णतेचा उच्चांक, पारा 46.5 अंशांवर नागरिक हैराण - कडक उन्हाचा तडाखा, दुपारच्या वेळेत शहरात शुकशुकाट - उष्माघाताचा धोका वाढला, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा ॲंकर - वर्धा जिल्ह्यात उष्णतेचा कहर कायम असून आज तापमानाने उच्चांक गाठला आहे. आज वर्ध्यात कमाल तापमान 46.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. सकाळपासूनच वर्ध्यात कडक उन्हाचा तडाखा जाणवत होता. दुपारपर्यंत तापमान 46.5 अंशांवर पोहोचल्याने जनजीवनावर परिणाम झाला. काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त जात आहेय..वर्ध्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी..0
0
Report
नाशिक में नाबालिग के व्हॉट्सएप पर अश्लील संदेश भेजने वाला आरोपी गिरफ्तार
Nashik, Maharashtra:Nashik breaking देवळाली कॅम्प परिसरात अल्पवयीन मुलीला व्हॉट्सॲपवरून अश्लील संदेश पाठवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकरोड पोलिसांकडून संशयित आरोपी मोहम्मद मोहिद्दीन सैय्यद याला ताब्यात चोरीच्या मोबाईलवरून मुलीला अश्लील मेसेज आणि भेटण्यासाठी बोलावल्याचा आरोप बिटको रुग्णालयात दाखल महिलेचा मोबाईल चोरीला गेल्याचे तपासात उघड संशयिताने त्याच मोबाईलवरून अन्य महिलेलाही पाठवले अश्लील संदेश सम्राट ग्रुप सिग्नल परिसरातून संशयित पकडला; संतप्त नागरिकांकडून मारहाण, पुढील तपास सुरू0
0
Report
सांगली में शरद पवार गुट के कार्यालय-घर पर पथराव, गाड़ियों की तोड़फोड़
Sangli, Maharashtra:सांगली के विटा में राष्ट्रवादी शरद पवार गट के पदाधिकारियों के घर-कार्यालय और गाड़ियों की तोड़फोड़ की घटना घटी। आमदार गोपीचंद पडळकर के कार्यकर्ताओं द्वारा तोड़फोड़ कराए जाने के आरोप राष्ट्रवादी कांग्रेस के सरचिटणीस महेश कुपाडे ने लगाए। मोबाइल पर एक स्टेटस पोस्ट करने के बाद संतप्त पडळकर समर्थकों ने फोन पर धमकी देकर व्यवसायिक कार्यालय की बड़े पैमाने पर तोड़फोड़ की। इसके साथ ही घर पर भी पत्थरबाजी कर दी गई, यह भी आरोप लगाया गया है; विटा थाने में कुपाडे द्वारा रिपोर्ट दर्ज कराई गई है और कठोर कार्रवाई की मांग की गई है।0
0
Report
Advertisement
राजू शेट्टी ने एस्सेल ग्रुप की 100वीं वर्षगांठ पर शुभकामनाएं दीं
Sangli, Maharashtra:एस्सेल ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपण्याबरोबर विश्वास कमवण्याचे काम केलेला आहे, समूहाचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष चंद्रा यांच्यासोबत संसदेत काम करण्याची संधी मिळाली, तो अनुभव खूपच चांगला होता, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त करत एस्सेल ग्रुपच्या 100 वर्षाच्या कामगिरीबद्दल माजी खासदार व शेतकरी नेते राजू शेट्टींनी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.0
0
Report
हिंगोली में डीज़ेल आपूर्ति बाधित, किसान मांग रहे तुरंत आपूर्ति
Hingoli, Maharashtra:हिंगोली ब्रेकिंग \n\nहिंगोलीत डिझेल पुरवठा विस्थळीत..\nशेतकरी रिकाम्या कॅनसह जिल्हाधिकारी कार्यालयात \nशेतकऱ्यांच उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन..\nहिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध होत नसल्याने शेतकरी आक्रमक...\nडिझेल अभावी शेतीची कामे ठप्प तात्काळ डिझेल पुरवठा करा शेतकऱ्यांची मागणी0
0
Report
कोल्हापूर में 85 खतरनाक इमारतें, नोटिस के बावजूद मालिकों की अनदेखी
Kolhapur, Maharashtra:राज्यात धोकायदायक इमारती कोसळल्यानं अऩेकांचे बळी गेले आहेत. असा प्रकार कोल्हापूरातही घडु शकतात. शहरातील अनेक धोकायदक इमारती काढुन घेण्यासंदर्भात कोल्हापूर महानगरपालीकेनं संबधीतांना अनेक वेळा नोटीसा काढल्या, पण धोकादायक इमारतीच्या मालकांनी या नोटीसीला कच-याची टोपली दाखविली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या इमारतींना धोका निर्माण होऊन पडू शकतात.. कोल्हापूर महानगरपालिकेन केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरात तब्बल 85 हुन अधिक धोकादायक इमारती असल्याच समोर आल आहे. या सर्वेक्षणानंतर कोल्हापूर महानगरपालीकेनं संबधीत इमारत मालकांना नोटिस लागू करून इमारत काढुन घेण्याची विनंती केली होती. पण बहुतांश धोकादायक इमारत मालकांनी या नोटीसीला केराची टोपली दाखवली आहे, त्यामुळे शहरात धोकादायक इमारती कधी पडतील याचा नियम नाही.. खर तर कोल्हापूर महानगरपालिकेन पुढाकार घेवुन धोकादायक इमारती उतरवून घ्यायला हवेत.. पण ढिम्म प्रशासनान याकडे लक्ष द्यायला तयार नाही, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय..0
0
Report
Advertisement
डिज़ेल की कमी से नांदेड के ग्रामीण पंपों पर किसानों की लंबी कतारें
Nanded-Waghala, Maharashtra:डिझेलच्या तुटवाड्यामुळे ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांची रांगा लागल्याचे चित्र नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर, भोकर तालुक्यात दिसून आले. खरीप हंगाम जवळ आल्यामुळे शेतीचं मशागतीचं काम सुरू आहे. कमी वेळात जास्त मशागत होत असल्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरने जमिनीची मशागत करत आहेत; परंतु डिझेल मिळत नसल्याने ते त्रस्त आहेत. तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर पहाटेपासूनच लांबलांगी रांगा दिसत आहेत. तसेच कॅनमध्ये डिझेल घेण्यासाठी रांगा लागल्यात. काही ठिकाणी डिझेल संपल्याचे फलक लावण्यात आले असल्यामुळे नागरिकांना एक पंपातून दुसऱ्या पंपाकडे भटकंती करावी लागत आहे. उन्हात तास काही प्रतीक्षा करूनही इंधन मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.0
0
Report
रिसोड में पिसलते कुत्ते ने 25 लोगों को काटा, शहर में भय फैल गया
Washim, Maharashtra:वाशीमच्या रिसोड शहरात पिसाळलेल्या एका कुत्र्याने २५ जणांना चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. जखमींमध्ये लहान मुले व महिलांचा समावेश असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. चांदणी चौक,लोणी फाटा आणि रामनगर परिसरातील नागरिकांना चावा घेतल्यानंतर सर्व जखमींना रिसोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागरिकांनी मोकाट श्वानांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.0
0
Report
अमरावती देश का सबसे गर्म शहर; तापमान 46°C पार, हीटवेव अगले पाँच दिनों तक जारी
Amravati, Maharashtra:देशात सर्वाधिक हॉट शहर म्हणून अमरावतीची नोंद; पारा पोहचला 46 अंशाच्या पुढे, पश्चिम विदर्भात पुढील पाच दिवस कायम राहणार उष्णतेची लाट अँकर :- दक्षिण अंदमानमध्ये मान्सून दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली असली तरी दुसरीकडे पश्चिम विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याचे चित्र आहे. देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद अमरावती जिल्ह्यात झाली असून काल अमरावतीचा पारा तब्बल 46 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. त्यामुळे अमरावती देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. विदर्भासह अमरावतीत सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत असून दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. प्रचंड उकाड्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. Vo :१ अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि नागपूरसह संपूर्ण पश्चिम विदर्भ सध्या उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात सापडला आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवस विदर्भात हीट वेव्ह कायम राहण्याचा इशारा दिला आहे. दुपारच्या वेळी गरम वाऱ्यांचे फटके बसत असून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. परिणामी नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अनेक भागात रस्ते ओस पडले असून बाजारपेठांमध्येही गर्दी कमी झाल्याचे दिसत आहे. Vo:२ दरम्यान या उन्हामुळे गेल्या दोन ते अडीच महिन्यात 15 उष्माघाताचे रुग्ण अमरावती जिल्ह्यामध्ये आढळले असून जिल्हा सामान्य रुग्णालयात या रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी पाठवले आहे. तसेच आतापर्यंत तीन ते चार रुग्णांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र अजून पर्यंत अधिकृत ही आकडेवारी पुढे आली नाही. काही काम करायचे असल्यास सकाळी करून घ्यावी व बाहेर जायचे असेल तर भरपूर पाणी प्यावे तसेच पोटभर नाश्ता करून बाहेर पडावे व उन्हात गडद कपडे न घालता पांढऱ्या कपड्यांचा वापर करावा आणि बाहेरील काम करायास संध्याकाळच्या वेळेचा उपयोग करण्याचे आव्हान अमरावती जिल्हा शल्य चिकित्सक विनोद पवार यांनी केला आहे. बाईट :- डॉ. विनोद पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, अमरावती Vo:३ अमरावतीत उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत असून शहरातील तापमान तब्बल ४६ अंशांच्या पुढे गेले आहे. अमरावती जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कडक ऊन आणि घामाच्या धारांमुळे नागरिक हैराण झाले आहे. त्यामुळे या कडक उन्हाळ्यात तरुण वर्ग विशेषतः बच्चे कंपनीला जलतरण तलावांचे म्हणजेच स्विमिंग पूलचे वेध लागल्याचे पाहायला मिळत आहे. शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे सध्या शहरातील स्विमिंग पूलवर मुलांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्विमिंग पूल वर मोठी गर्दी केल्याचा चित्र आहे त्यामुळे सध्या तरुण तसेच बालकांनी आपला मोर्चा जलतरण केंद्रांकडे वळवल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान उन्हाळ्यामुळे पोहायला गेल्याने आतापर्यंत जिल्ह्यात सात बालकांचतरुणण्यात बुडून मृत्यू झाल्याची ही घटना समोर आली आहे बाईट :- अथर्व डबले, पोहायला गेलेले तरुण Vo : ४ उष्णतेमुळे सर्वाधिक फटका मजूर, शेतकरी, वाहतूक कर्मचारी आणि रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांना बसत आहे. दुपारच्या वेळेत अनेक ठिकाणी कामे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघात, डिहायडरेशन, चक्कर येणे, अशक्तपणा अशा तक्रारीमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, डोक्यावर कपडा किंवा टोपी वापरणे, हलका आहार घेणे आणि लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमरावतीने देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद करत उष्णतेचा विक्रम केला असला, तरी आता सर्वांचे लक्ष मान्सूनपूर्व पावसाकडे लागले आहे. पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहणार असल्याने नागरिकांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक बनले आहे.0
0
Report
Advertisement
नागपुर में दवा ऑनलाइन बिक्री रोकने की मांग पर आंदोलन
Nagpur, Maharashtra:नागपूर ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिष्ट संघटनेच्या आवाहनानंतर नागपूरच्या संविधान चौकात निदर्शने करत आंदोलन नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिष्ट संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे आंदोलन सरकारने ऑनलाईन औषध विक्री तात्काळ थांबवावी आंदोलकांची मागणी.. काळ्या फिती बाधून मेडिकल दुकान चालक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी.. आंदोलन आमच्यासाठी नाही तर लोकांचा आरोग्यासाठी हे आंदोलन आहे, शासनाने पाऊल उचलत हे बंद करावे...0
0
Report
अकोला में निजी बस भीषण आग से जली, लोगों की जिंदगी बची
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बाळापूर–शेगाव मार्गावर आज सकाळी एका खाजगी प्रवासी बसला भीषण आग लागून बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील प्रवासी घेऊन जाणारी ही खाजगी बस बाळापूर–शेगाव मार्गावरून जात असताना अचानक बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. बिघाडानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला आणि आगीने संपूर्ण बसला वेढले. आगीची तीव्रता इतकी होती की घटनास्थळी उभी असलेली एक दुचाकीही आगीत सापडून जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. बसमधील सर्व प्रवासी, चालक, वाहक तसेच दुचाकीवरील दोन व्यक्तींना कोणतीही दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशामक दल आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.0
0
Report
विरार पूर्वे इमारत के स्लैब गिरने से महिला गंभीर घायल, मरम्मत में लापरवाही पर सवाल
Vasai-Virar, Maharashtra:विरार पूर्वेत इमारतीचा स्लॅब कोसळला; महिला गंभीर जखमी, निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह सोसायटीच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना; स्लॅब कोसळून महिलेची प्रकृती चिंताजनक विरार : पालघर जिल्ह्यातील विरार पूर्वेतील फुलपाडा परिसरातील प्रथमेश नगर येथे र रात्री एक गंभीर दुर्घटना घडली. साई मल्हार नावाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग अचानक कोसळून खाली पडला. या घटनेत 27 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेची ओळख ज्योती सुनील बागरी (27) अशी असून, अपघातानंतर तत्काळ कुटुंबीय व स्थानिकांच्या मदतीने तिला जवळच्या साई समर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, तिच्या डाव्या हाताला व छातीला गंभीर दुखापत झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, संबंधित इमारत बराच काळ जर्जर अवस्थेत होती. तरीही वेळेवर दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही. मनपाच्या सहाय्यक आयुक्त (प्रभाग समिती ‘सी’) यांनी यापूर्वीच दुरुस्तीबाबत नोटीस बजावली होती, मात्र बिल्डर व सोसायटी प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. पीडित कुटुंबीयांनी असा आरोपही केला आहे की, घटनेनंतर सोसायटीतील काही पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार दाबून टाकण्याचा सल्ला दिला आणि बाहेर माहिती दिल्यास उलट कारवाईची धमकी दिली. या आरोपांमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. साई मल्हार सोसायटीत अनेक कुटुंबे वास्तव्यास असून, त्यात भाडेकरूंची संख्याही मोठी आहे. त्यामुळे इमारतीच्या सुरक्षेबाबत इतर रहिवाशांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे बिल्डर, सोसायटी अध्यक्ष आणि सचिव यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही घटना शहरातील जर्जर इमारतींच्या समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधणारी ठरली आहे. वेळेत योग्य उपाययोजना न केल्यास अशा दुर्घटना पुन्हा घडू शकतात. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.0
0
Report
Advertisement
