icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सोनम वांगचूक आंदोलन को मनसे का समर्थन, CM परिवर्तन पर शुभकामनाएं

Kalyan, Maharashtra:सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा. मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवर 'दोघांनाही शुभेच्छा', तर NCP फुटीबाबत राज ठाकरेंचं भाकीत खरं ठरल्याचा राजू पाटील यांचा दावा. अमित ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे सोनम वांगचूक यांना पाठिंबा द्यायला पाहिजे राज ठाकरे यांनी देखील पोस्ट केलेली आहे. एक माणूस राजीनामा मागण्यासाठी बसलेला आहे वीस विद्यार्थ्नी आत्महत्या केलेली आणि यावर कुणी लक्ष देत नाही ही चिंतेची बाब आहे. अशा व्यक्तीला पाठिंबा दिला नाही तर याला काही अर्थ नाही त्यामुळे आमचा यांना पाठीमागे आहे. देवेंद्र फडणिस दिल्ली जाणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार या ज्या चर्चा सुरू आहे यावर राजू پाटील यांनी बोलताना دوघांना मनसेच्या शुभेच्छा असे सांगत यावर बोलणं टाळलं. कोणी महाराष्ट्रातला केंद्रात जात असेल आणि इकडे वेगळे मुख्यमंत्री होत असतील एक मराठी म्हणून याचा अभिमान असला पाहिजे फडणवीस साहेब पंतप्रधान याला आमच्या शुभेच्छा यात वाईट वाटण्यासारखं काय. NCP बाबत राज ठाकरे यांनी आधीच भाकीत केली होती की पहिली खेप गेली आहे दुसरी लवकरच जाईल या सर्व गोष्टीला उशीर झाला दुर्दैवाने अजित दादांचा दुर्दैवी अंत झाला मात्र ही लोक तेव्हाच या सगळ्या गोष्टी झाले असेल. दोन्ही सेना एकत्र होतील या विषयावर आम्हाला काय माहिती नाही आणि काही देणं घेणं देखील नाही.
0
0
Report
Advertisement

लड़ाख के सामाजिक कार्यकर्ता के उपोषण पर राजनीतिक प्रतिक्रिया, मोड़ने को लेकर नाराज़गी

Akola, Maharashtra:केंद्र सरकारविरोधात लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुरू केलेल्या उपोषणावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी 21 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मोडून काढत त्यांना रुग्णालयात दाखल केल्याच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मिटकरी म्हणाले, आंदोलनकर्त्याला बळजबरीने रुग्णालयात दाखल करून उपोषण मोडणे हे लोकशाहीला पोषक नाही. देशात संविधान आणि लोकशाही असल्याचा दावा केला जात असताना अशा प्रकारे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होणे अत्यंत वेदनादायी आणि निषेधार्ह असल्याची टीका त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, आम्ही सरकारमधील घटक पक्ष असलो तरी चूक ती चूकच आहे. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला शांततामय आंदोलन করারाचा अधिकार आहे. त्यामुळे ही घटना संतापजनक असून तिचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे, असेही अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले.
0
0
Report

लोकतंत्र खत्म, हुकूमशाही शुरू: देश में आंदोलन उग्र, विपक्ष क्या तय करेगा

Kolhapur, Maharashtra:सतेज पाटील बाईट मुद्दे लोकशाही संपलेली आहे, हुकूमशाही सुरू झाली आहे। राहुल गांधी गेल्या दोन-तीन महिन्यापासून नीट भ्रष्टाचार मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी काँग्रेसकडून देखील पाठपुरावा सुरू आहे हे आंदोलन व्हायच्या आधीच त्यांना दुर्दैवानं हलवण्यात आलं कोर्टातून ऑर्डर घेऊन हे आंदोलन मोडायचं हे नियोजन करण्यात आले यानिमित्ताने हुकूमशाही सुरू झाली आहे। देशात खूप मोठ्या प्रमाणात असंतोष आहे, त्यामुळे काँग्रेसने हा मुद्दा लावून धरला आहे विद्यार्थ्यांसाठी देहराडून मध्ये आयोजित करण्यात आलेल्या छात्रो की गुंज कार्यक्रमात वेगळा मुद्दा समोर आला सरकारला चूक झाली हे माहित आहे, तर शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.. नव्या पिढीसमोर एक संदेश द्यायला पाहिजे.. पण सरकारची भूमिका आंदोलन चिरडण्यासाठी आहे अण्णा हजारेंची भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट करावे. शक्तीपीठ आंदोलन गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा हे महाराष्ट्रातील लोकांची भूमिका बारा जिल्ह्यातील अनेक मंडळी आज पंढरपूरमध्ये एकत्र येऊन शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी नामदेव पायरी इथं साकडे घालणार आहेत. आम्ही शेतकऱ्यांची बाजू घेत आहोत.. किमान विठ्ठलाकडे बघून मुख्यमंत्र्यांनी शक्तिपीठ बाबत निर्णय घ्यावा ही आमची भूमिका.. जयंत पाटील जयंत पाटील जाणार नाहीत याची मला निश्चित खात्री आहे, आज भाजपची अवस्था काय.. मूळ भाजपची अवस्था काय.. कोल्हापूर जिल्ह्यातील सुरेश वाळवांकर यांची अवस्था काय आहे हे पहा.. आज मंत्रिमंडळात मूळ काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्याकडून आलेले लोकच आहेत मूळ भाजपवाले सतरंज्या उतरण्याचं काम करत आहेत.. राम मंदिर राम मंदिरात जो दरोडा पडला आहे, तो उघड व्हावा ही काँग्रेसची भूमिका. लोकांच्या भावना तुम्ही किती दुखवणार आहात.. या संदर्भात एस आय टी नेमली आहे, पण त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाहीये. एका बाजूला प्रभू रामाच्या नावाने मत मागायची आणि कृती मात्र रावणाची करायचे असे दिसून येत आहे. जात पडताळणी आम्ही सातत्याने विधिमंडळात सांगितले आहे. जात पडताळणीची माणसं दबावाखाली काम करत आहेत. जात पडताळणीची विंडो कायमस्वरूपी ओपन ठेवावे.. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जात पडताळणी नको. कोल्हापुरातील महायुतीतील संघर्ष आम्ही पाहिला आहे .. गडहिंग्लज नगराध्यक्ष यांचे देखील जातीचा दाखला अवैध ठरवण्यात आला, पण कोर्टाने त्यांना दिलासा दिला. यावरून महayuतीमध्ये देखील कशा प्रकारचा संघर्ष सुरू आहे हे दिसून येत आहे.
0
0
Report
Advertisement

यवला के धुळगाव में किसान की कारला बाग रातोंरात उखाड़ी, 15 लाख का नुकसान

Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवला तालुक्यातील धुळगाव या ठिकाणी अल्पभूधारक शेतकरी संजय बाळासाहेब वाळके यांनी कांदा पिकाला भाव नसल्यामुळे पारंपरिक शेती सोडून पीक कर्ज काढून मोठ्या कष्टाने कारल्याची बाग उभी केली होती बाजारात कारल्याला 700 रुपये प्रति कॅरेट भाव मिळत असताना मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात मनोविकृताने कारल्याची बाग मुळासकट उपटून नष्ट केली या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून आहे शेतकऱ्याचे तब्बल 15 लाख रुपयांचे नुकसान झाले असून येवला तालुका पोलिसात आज्ञा व्यक्ती विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे या संदर्भात आढावा घेतला आहे
0
0
Report
Advertisement

वाशीम की महिला किसान समूह ने प्राकृतिक खेती से दिखाया सफल मॉडल

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील इंझोरी येथे महिला शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा आदर्शवत प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. उमेद अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या ओम सोयाबीन उत्पादक महिला बचत गटाने गटशेतीच्या माध्यमातून सोयाबीन पिकावर स्वतः तयार केलेल्या दशपर्णी अर्काची सामूहिक फवारणी केली. या नैसर्गिक कीडनियंत्रण पद्धतीमुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होऊन उत्पादन खर्चात बचत, जमिनीचे आरोग्य संवर्धन आणि पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळणार असल्याचा विश्वास महिला शेतकऱ्यांनी व्यक्त केला. महिला शेतकऱ्यांचा हा उपक्रम परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
0
0
Report

पंढरपुर में आषाढ़ी एकादशी दर्शन के लिए भक्तों की भीड़, व्यवस्थाएं तैयार

Pandharpur, Maharashtra:Anchor - आषाढी वारीचा सोहळा आठ दिवसांवर येऊन ठेपला असताना पंढरपूरमध्ये आता वारकऱ्यांची विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग भाविकांच्या गर्दीने हाउसफुल झालेली आहे. व्हीआयपी दर्शनावर बंदी आणल्याने वारकऱ्यांच्या दर्शनाचा वेळ तीन तासांनी कमी झाला आहे. विठुरायाच्या पंढरपूर नगरीला आषाढी एकादशीच्या सोहळ्याचे वेध लागलेले आहेत आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सुविधायुक्त दर्शन मंडप आणि दर्शना रांग तयार केली आहे भाविकांचे ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी सात ठिकाणी दर्शन मंडप उभा केले आहेत तर भाविकांना घुसखोरीचा त्रास होऊ नये दर्शन रांगेतून व्यवस्थित दर्शन करता यावं यासाठी मंदिरापासून जवळपास दहा किलोमीटर अंतरापर्यंत दर्शन रांगेतच बॅरिकेटिंग करण्यात आला आहे विठुरायाच्या पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये पाणी आरोग्य सुविधा भोजन उपवासाचे पदार्थ पायाखाली मॅट पंखे कुलर विद्युत प्रकाश सेवा दर्शन रांगेमध्ये विठुरायाचे लाईव्ह दर्शन सोय अशा सुविधा करण्यात आले आहेत यामुळे भाविकांना थकवा न येता कमीत कमी वेळामध्ये विठुरायाचे दर्शन मिळण्याची व्यवस्था केली आहे.
0
0
Report
Advertisement

सोलapur नगरपालिका नाले सफाई घोटाला: भाजपा नगरसेवक अनंत जाधव पर आरोप, जांच शुरू

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - शहरातील नालेसफाईत मोठा आर्थिक अपहार झाल्याचा आरोप, सत्ताधारी भाजपा पक्षातीलच नगरसेवकाने धक्कादायक घटना आणली उघडकीस - सोलापूर शहरातील महापालिकेच्या ठेकेदाराकडून नालेसफाईत कोट्यावधींचा आर्थिक अपहार झाल्याचा आरोप - सत्ताधारी भाजप पक्षातीलच नगरसेवक अनंत जाधव यांनी कामाचे स्टिंग ऑपरेशन करत केली पोलखोल - अनंत जाधव यांची महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप करत सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची करण्यात आली मागणी - पोकलेनचे भाडे प्रतितास 3000 रुपये असताना मनपाकडून 4800 रुपये वसूल केल्याचा आरोप - रात्रीच्या वेळेत काम सुरू असल्याचे भासवण्यासाठी पोकलेनच्या फक्त लाईट चालू ठेवल्याची माहिती - सदर प्रकरणासंदर्भात पालिका प्रशासनाकडून चौकशी समिती नेमण्यात आली असून एका आठवड्यात त्याचा अहवाल समोर येणार आहे - अनेक बडे मासे सदरच्या प्रकरणात अडकणार असल्याची महापालिका वर्तुळात चर्चा - धक्कादायक घटनेमुळे आणि सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनेच आरोप केल्याने शहरात अनेक चर्चांना उधाण बाईट - अनंत जाधव ( भाजप, नगरसेवक ) बाईट - वीणा पवार ( अतिरिक्त आयुक्त, सोल(cap)ूर महानगरपालिका )
0
0
Report

450 करोड़ के भूमिगत परियोजना में ठेकेदार की लापरवाही, महावितरण ने काली सूची चेतावनी दी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. महावितरणाच्या कंत्रातदारांना काळे यादी टाकण्याचे आदेश सुनील तटकरे यांच्या माहितीनुसार. भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामात हलगर्जीपणा केल्याचे ठपका. अँकर जिल्ह्याच्या किनारी भागातील विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम 450 कोटींचे असून या कामात ठेकेदाराकडून अक्षम्य हलगर्जीपणा झाल्याचे आढावा बैठकीत दिसून आले. वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन दर्जाहीन काम करणाऱ्या महावितरणच्या कंत्राटदारांना थेट काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top