icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

संगमेश्वर में इतिहास बन गया, पुलिस ने संभाजी महाराज की स्मारक पर सम्मान दिया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. ऐतिहासिक कसबा संगमेवरमध्ये घुमला शिवशंभूंचा जयघोष!.. स्मारकाजवळ पोलीस दलाने दिली प्रथमच शासकीय मानवंदना.. अँकर रत्नागिरीच्या संगमेश्वर कसब्यात आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी जनसागर उसळला होता.. याचं मुख्य आकर्षण ठरलं ते म्हणजे पोलीस दलाने दिलेली मानवंदना.. ​महाराजांच्या स्मारकाजवळ पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रथमच अशा प्रकारे शासकीय मानवंदना देण्यात आली.. अत्यंत शिस्तबद्ध संचलन आणि सलामी देऊन पोलीस दलाने शंभूराजांना मानाचा मुजरा केला. या ऐतिहासिक क्षणामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण आहे..
0
0
Report

मुंबई के घाटकोपर के पान शॉप पर बुलडोजर कार्रवाई, अवैध ड्रग्स बिक्री के आरोप

Mumbai, Maharashtra:मुंबईच्या घाटकोपरमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या पान शॅाप वर “बुलडोझर कारवाई”.. घाटकोपर पूर्व येथील टिळक रोडवरील त्रिवेदी पान शॉप या पान शॅاپ मधून चोरीछुपे अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी स्थानिक भाजप आमदार पराग शाह यांना प्राप्त झाल्या होत्या. या गंभीर प्रकरणाची दखল घेत आमदार पराग शाह आणि स्थानिक नगरसेविका राखी जाधव , नगरसेवक धर्मेश गिरी यांनी पंतनगर पोलीस ठाणे आणि मुंबई महानगरपालिका ‘एन’ विभाग कार्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने पान शॅап वर बुलडोजर कारवाई करत पान शाॉप जमिनधोस्त केले.
0
0
Report

नीट पेपर लीक मामला: जुन्नर के युवक ने सोशल मीडिया पर अपनी सफाई दी

Shirur, Maharashtra:Junnar/Pune Anc - नीट पेपर फुटी प्रकरणात जुन्नर तालुक्यातील एका युवकाला ताब्यात केल्याची चर्चा आज दिवसभर सुरू होती. याबाबत जुन्नर पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांना काहीच माहीत नसल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता ज्या युवकाबद्दल ही चर्चा सुरू होती त्याच युवकाने समाज माध्यमांवर आपली बाजू मांडली आहे. या प्रकरणात सीबीआयने चौकशी साठी बोलावलेल्या जुन्नर तालुक्यातील चौदा नंबर येथील रहिवाशी ओंकार शिंगोटे यांने समाज माध्यमांच्या माध्यमातून आपली बाजू मांडताना आपल्याला अटक केली नव्हती तर सीबीआय ने आपल्याला चौकशी साठी बोलावले होते व या प्रकरणात आपला काहीच संबंध नसल्याने मला लगेच सोडून दिल्याची माहिती दिली आहे.
0
0
Report
Advertisement

मोदी के आवाहन पर गडकरी के कार्यक्रम में सांसद-आमदार एक ही गाड़ी में यात्रा

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनला प्रतिसाद देत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमासाठी शिवसेना खासदार, भाजप आमदारांचा एकाच वाहनातून प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनला प्रतिसाद देत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमासाठी शिवसेना खासदार आमदारांचा मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद अक्कलकोट येथील केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमाला जाताना शिवसेना भाजप खासदार आमदारांचा मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना डिझेल आणि पेट्रोल यांची बचत करण्याचे केले होते आवाहन शिवसेना खा. ज्योती वाघमारे, भाजपा आ.देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल यांचा एकाच गाडीतून प्रवास सोलापूर ते अक्कलकोट तीस किलोमीटरचा प्रवास एकाच गाडीतून प्रवास करत दिला सकारात्मक संदेश
0
0
Report

पुरंदर किले पर धर्मवीर संभाजी महाराज की जयंती धूमधाम से मनाई गई

Rui, Maharashtra:पुरंदर किल्ल्यावर धर्मवीरांचा जयघोष संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी Anc स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज त्यांच्या जन्मस्थळी अर्थात पुरंदर किल्ला येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली… शासन आणि पुरंदर प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पाळणा गायन, शस्त्र पूजन मर्दानी खेळ आणि मिरवणुकीने वातावरण शिवमय झालं होतं… मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या पुरंदर किल्ल्यावर आज धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हजारो शिवभक्तांनी गर्दी केली होती… ढोल-ताशांच्या गजरात आणि “ छत्रपती संभाजी महाराज की जय… जय शिवराय…”च्या घोषणांनी संपूर्ण किल्ला दुमदुमून गेला… शासनाच्या वतीने आयोजित जयंती कार्यक्रम प्रांत अधिकारी वर्षा लांडगे,तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या उपस्थितीत पार पडला…
0
0
Report
Advertisement

डोंबिवली में भूमाफिया ने सस्ते मकान के बहाने 140 लोगों से 1.7 करोड़ की ठगी

Kalyan, Maharashtra:स्वस्ते मकान देण्याचं अमिष दाखवून १४० लोकांची १ कोटी ७० लाख रुपयांना फसवणूक डोंबिवली मानपाडा पोलिसांनी दोन जणांना ठोकल्या बेड्या मध्यमवर्गीयांना स्वस्तात घर देण्याचं आमिष दाखवून भूमाफियांच्या टोळीने १४০ नागरिकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याप्रकरणी डोंबिवली मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून मनोज धुमाळ आणि सचिन सुर्वे या दोन आरोपींना अटक केलीय. त्यांना न्यायालयात हजर केला असता १९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. हे दोघे भूमाफिया डोंबिवलीच्या खोणी भागात साई माऊली कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाखाली स्वस्तात घर देण्याचं अमिष दाखवत होते. शिवाय कधी संरक्षण खात्याच्या तर कधी वनविभागाच्या जागेवर त्यांनी चाळी उभारल्या होत्या. तब्बल २०० ते २५० नागरिकांकडून २ आणि ४ लाख रुपये त्यांनी यासाठी घेतले होते. मात्र घर न देता हे दोघेजण वारंवार टाळाटाळ करत होते. त्यामुळे फसवणुक झाल्याचं लक्षात येताच या नागरिकांनी डोंबिवली मानपाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करत अखेर या दोन भूमाफियाना अटक केली. यापूर्वी देखील त्यांच्या वर वनविभागाच्या जागेमध्ये अशाच प्रकारे चाळी बांधून नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे .शिवाय यांच्या या टोळीमध्ये आणखीन कोणी सहभागी आहे का? याचा देखील पोलीस तपास करत आहेत.
0
0
Report
Advertisement

9 वर्षीय बच्चे की डूबकर मौत: हिमायतनगर स्विमिंग पूल में सुरक्षा को लेकर आक्रोश

Nanded-Waghala, Maharashtra:Anchor - स्विमिंग पुलामध्ये पोहोण्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या एका 9 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. सक्षम गायकवाड हा आपल्या आजोळी हिमायतनगर आला होता. हिमायतनगर मध्ये नव्यानेच सुरु झालेल्या गिरीजा स्विमिंग पूल मध्ये नेण्याचा त्याने आईकडे हट्ट केला. दुपारी सक्षमला घेऊन त्याची आई गिरीजा स्विमिंग पूलवर गेली. सक्षम आतमध्ये गेला आणि त्याची आई बाहेर वाट पाहत थांबली. स्वमिंगचा एक तास वेळ संपूनही सक्षम बाहेर न आल्याने आईने विचारपूस केली. आईने विचारपूस केल्यानंतर सक्षमचा शोध घेतला असता तो पाण्याच्या तळाशी आढळला. तात्काळ त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. पण तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सक्षमचा मृत्यू झाल्याने आईने आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दरम्यान स्विमिंग पूलमध्ये प्रशिक्षित ट्रेनर आणि पुरेशी काळजी घेतली गेली नसल्याने ही घटना घडली. स्विमिंग पूल चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केलीये.
0
0
Report

नाशिक में भूत-भोंदू बाबा गिरफ्तार: सोशल मीडिया के जरिए ठगी का जोर

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर में तोफखाना पुलिस ने एक भोंदू बाबाला जेरबंद किया है. शिव सोनवणे इस भोंदू बाबा का नाम है जो घर का गुप्त धन निकालने का दावा करता है और अघोरी पूजा करता है. भोंदूबाबा रील स्टार भी है और उसकी भोंदगिरी सोशल मीडिया पर वायरल होती है. पुलिस ने उसकी गतिविधियों पर रोक लगाई है. पोलिस ने कहा कि यह युवक अपने भोंदूगिरी के प्रदर्शन के लिए रील बनाता है और सोशल मीडिया पर हिंदी गानों पर भी रिल्स डालता है. उसने कुछ दिनों पहले महेश काळोखे को कहा कि आपके घर में गुप्त धन है और घर को ढहा दिया गया; 50,000 रुपये भी लिये. बाद में काळोखे ने शिकायत दर्ज कराई. इस प्रवृत्ति के चलते समाज में भोंदूगिरी से लाखों रुपये लूटने वालों के खिलाफ कड़ी कार्रवाई ज़रूरी बताई गई है.
0
0
Report

नागपुर में आरक्षित वर्ग के उम्मीदवारों के लिए खुला वर्ग: नया फैसला हलचल मचा रहा

Nagpur, Maharashtra:नागपूर - On आरक्षित प्रवर्ग अर्ज उमेदवार - एखाद्या ओबीसी समाजाच्या व्यक्तीला जर खुला वर्ग तिथे अर्ज द्यायचा असेल त्याला अर्ज भरता येणार नाही असाच त्याचा अर्थ निघतो, काय निर्णय घेतला हे बघावे लागेल पण जी काही पूर्वीपासूनची प्रथा होती ती सर्व लोकांना मान्यवर असेल तर ते बदलायचं कारण काय - आरक्षणाच्या बाबतीत रोटेशन असतं ते डिस्टर्ब करून रिसेट करण्यात आला त्यामुळे अनेकांना अडचण झाले त्यामुळे असा निर्णय का घेतला याचा अभ्यास करावा लागेल - आपल्याला सगळं समजून घ्यावे लागेल आकडेवारी बघावी लागेल कारण प्रथा आणि पद्धत बदलू असो तर काही ना काही गोष्टी डिस्टर्ब होत असतात On साखर निर्यात - अचानक असे निर्णय घेऊन होत नसतं त्याला कुठेतरी प्लॅनिंग करावे लागतं असे निर्णय घेतल्यामुळे साखरेच्या दरावर फटका बसू शकतो आज साखरेचा दर जास्त असेल तरच शेतकऱ्यांना पेमेंट देता येईल नाहीत शेतकऱ्याला जास्त भाव असेल तर साखरेचे भाव जास्त असणे महत्त्वाचे आहे - एका बाजूला तेलाच्या बाबतीत कुठेतरी फेल गेलेला आहात परराष्ट्र धोरण नीट पद्धतीने करता आलं नाही इराण बरोबर चांगले संबंध ठेवता आले नाही म्हणून आज गॅसच्या किमती वाढल्या आहेत तेल मिळत नाही - पेट्रोल डिझेलमध्ये कुठेतरी आरक्षण येईल असे बोलले जात आहे त्यामुळे हे केंद्र सरकारचं फेलीवर आहे आणि हे सगळ्या गोष्टी सामान्य माणसाच्या माथ्यावर मारले जात आहेत - साखरेचे भाव वाढवून खूप लोकांना त्या ठिकाणी फरक पडत नव्हता पण हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे कारण इराण आणि अमेरिकेच्या वादात फर्टीलायझर चे रेट खूप वाढले आहेत - साखरेचे भाव कामे आणि मग उसाला भाव कसे द्यायचे असा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहणार आहे इथेनॉल हे शुगर इंडस्ट्रीने बनवलेला आहे परंतु ज्या कॅपॅसिटी मध्ये ऑइल कंपनीने घेतलं पाहिजे ते मात्र न घेतल्याने साखर उद्योगाचा तोटा होत आहे On संत्रा उत्पादक शेतकरी - - फळ हातात आले आणि विकण्याची वेळ येईल तेव्हा निर्णय कधी घेतला जात नाही शेवटचा महिना आला की निर्णय घेतला जातो म्हणजे शेतकऱ्याला दाखवलं जातं की आम्ही तुमच्या बाबतीतला निर्णय घेतला परंतु पुन्हा तो निर्णय कॅन्सल केला जातो त्यामुळे हा काही सपोर्ट कायम ठेवला तर शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो On पंतप्रधान आवाहन - - इराण बरोबर भारताचे संबंध पूर्वी पासून चांगले होते आणि त्यामुळे तेल हे स्वस्तात मिळत होतं, इराणची बाजू आपण न घेता अमेरिका आणि इजराइल ची बाजूने भूमिका घेतली, त्यामुळे ज्या बोटी भारतात येणार होत्या त्या इराणने येऊ दिल्या नाही आणि त्या बोटीत चायना कडे गेल्या आणि आता मित्र समजणाऱ्या अमेरिकेने ब्लॉक केल्याने डिझेल पेट्रोल गॅस हे पुढच्या काही दिवसातच संपतील हे फार भीतीदायक आहे - कदाचित पुढच्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे भाव गॅसचे भाव अशा पद्धतीने वाढवले जातील की सामान्य लोकांना गरिबाला कधीही परवडणार नाही - नोटबंदी झाली तेव्हा सामान्य लोकांना फटका बसला परराष्ट्र धोरण फासले आहे On पक्ष बैठक - 10 जूनला आमच्या पक्षाचा वर्धापन दिन असतो त्याबद्दल ही बैठक असू शकते पूर्ण काही माहिती नाही On संजय गायकवाड - - पूर्वी ओळखत होतो आता ओळखत नाही On काँग्रेस शेळके टीका - - अंधश्रद्धेबद्दल देखील बोलले असावे, आता खरात प्रकरणात बोलले ना, भविष्य म्हणजे अंधश्रद्धा, तुमच्याच पक्षाच्या एका नेत्यांवर कारवाई केली आहे आणि तरी नेत्यांवर भोंदू बाबाच्या नादी लागल्याने ईडीची कारवाई होणार आहे, सत्यता असणारा दुसरा पक्ष हे सुद्धा त्यात अडकले आहेत आणि सत्तेत असल्याचा सर्वात मोठा पक्ष म्हणजे भाजप याचे नेते वाकून नमस्कार करतात त्यामुळे भविष्यवाणी बद्दल आम्हाला कोणीही सांगू नये - आम्ही एवढेच सांगतो एका गोष्टीची भविष्यवाणी करतो ज्याप्रकारे केंद्र राज्य सरकार चाललाय गरीबाचा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे On तटकरे पवार भेट - - पवार साहेब कोणालाही भेटतात त्यामुळे तुम्ही असो कोणी असो किंवा सुनील तटकरे असो किंवा एखादा गरीब व्यक्ती असून पवार साहेबांचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत तिथे गेल्यावर आत चर्चा काय झाली हे मला सांगता येत नाही तब्येतीच्या बाबतीत चर्चा झाली असेल - पवार साहेबांचे टायमिंग हे 24 तास अकरा वर्षभर आणि 60 65 वर्ष सामान्य लोका ंसाठी दरवाजा उघडला गेला आहे आता एखादा व्यक्ती अचानक तीन वर्षानंतर भेटायला का येतो याबद्दलचा टाइमिंग त्यांच्याच पक्षाने त्यांना विचारायला पाहिजे - टाइमिंग चा महत्व कितीही असला कितीही अंदाज असला आणि आपला विरोधक कितीही हुशार असला तर विरोधकाच्या मनात काय हे असं ओपनली व्यक्त होऊन चालत नाही योग्य वेळी योग्य वेळी करून त्याला आउट करणे महत्त्वाचे असतात On अजित पवार राष्ट्रवादी यादी - - तो त्या पक्षाचा निर्णय मी या ठिकाणी काय बोलणार On मंत्रीमंडळ वाहन ताफा - - काही लोक आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला चालत गेले कोणी अजून काय केलं कोणी सायकलवर गेलो परत काही झालं मला असं वाटतं की त्यांनी आता सुरुवात केली असेल तर अशी सुरुवात त्यांनी कायम ठेवली पाहिजे एका दिवशी केवळ बातम्या होण्यासाठी करत असेल तर योग्य नाही - पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलं खर्च कमी करण्याचे त्यामुळे मी विनंती करतो या सरकारला की शक्ती पीठ महामार्ग जो या राज्याला आवश्यक नाही जो सुरुवातीला 56 हजार कोटीचा होता आता एक लाख दहा हजार कोटीला गेला, जो नॅशनल हायवे पेक्षा महाग झालाय आणि त्यात तीस हजार कोटीचा मलिदा किंवा करप्शन आहे असा आमचा ठाम मत आहे पुराव्यानशी आम्ही बोलू शकतो ते थांबवावं - आणि महाराष्ट्राला न लागणारे बुलेट ट्रेन सुद्धा काही काळ थांबवली तर बरं राहील मात्र सामान्य लोकांना बसवू नका एवढे सरकारला विनंती करतो - सरकारची जबाबदारी असते तेल देना पेट्रोल देना डिझेल देना सामान्य लोकांना ज्या महत्त्वाच्या गोष्टी देणे त्याचा नियोजन करणे On मुख्यमंत्री बुलेट पियुसी - - मुख्यमंत्री साहेबांवर कार्यवाही केली जाऊ असं मला वाटत नाही त्यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयावर नक्कीच कारवाई केली privilegi कारण या राज्याचे मुख्यमंत्री एपीयूसी आहे की नाही ते बघणार नाही - झेड सिक्युरिटी काय भजे तळण्यासाठी दिली जाते का अजित दादा च्या बाबतीतही असंच झालं - जे कार्यालयाचे ओएसडी असतील त्यांना शंभर टक्के जबाबदार ठरवता येईल
0
0
Report
Advertisement

बीड में मोकाट कुत्तों के समूह ने 6 वर्षीय राजवीर जायभाये पर हमला किया

Beed, Maharashtra:बीड शहरातील पंढरी नगरी परिसरात मोकाट कुत्र्यांच्या टोळीने 6 वर्षीय राजवीर जायभाये या चिमुकल्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यावर खेळत असताना कुत्र्यांनी त्याला अक्षरशः 15 ते 20 फूट फरफटत ओढून नेल्याचे CCTV मध्ये कैद झाले आहे. सुदैवाने परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत कुत्र्यांना हुसकावून लावल्याने मोठा अनर्थ टळला. जखमी राजवीरवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बीड शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत असून अनेक चावा घेण्याच्या घटना घडत आहेत. तरीही नगरपालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “एखाद्याचा जीव गेल्यावरच नगरपालिका जागी होणार का?” असा संतप्त सवाल करत नागरिकांनी मोकाट कुत्र्यांचा तात्काल बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report

सोलापूर: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे ने सांसद प्रणिती शिंदे को कानूनी नोटिस जारी किया

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेना कायदेशीर नोटीस - काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंची अब्रूनुकसान केल्याचा आरोप करत मंत्री गोरेना कायदेशीर नोटीस. - खासदार प्रणिती शिंदे यांना सोलापूरमधील स्थानिक विकासापेक्षा फक्त दिल्लीचा रस्ता आणि राहुल गांधी यांच्या घराकडेच लक्ष केंद्रित करतात. - जयकुमार गोरे यांच्या बोलण्याचा स्पष्ट हेतू लैंगिक दृष्टिकोनातून टिप्पणी करण्याचा आणि एका महिलेचे चारित्र्यहनन करण्याचा होता असा दावा या नोटीसीत करण्यात आलाय - खासदार प्रणिती शिंदे यांचे सातत्याने चारित्र्यहनन करणे, अपमानास्पद, बदनामीकारक आक्षेपार्ह भाषेचा वापर करणे, मानहानीकारक विधान करणे आणि स्त्रीत्वाचा अपमान केल्याप्रकरणी नोटीस - नोटीस मिळाल्यापासून सात (७) दिवसांच्या आत जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांची बिनशर्त सार्वजनिक माफी मागावी - तसेच सामाजिक माध्यमांमध्ये तसेच मुद्रित माध्यमांमध्ये (प्रिंट मीडिया) सार्वजनिक माफी प्रकाशित करावी - अन्यथा न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही असे या कायदेशीर नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आलेय. - खासदार प्रणिती शिंदेंच्या वतीने ऍड. असीम सरोदे, ऍड. श्रिया आवले, ऍड. आर्या राजेभोसले यांनी पाठवली नोटीस.
0
0
Report

दळवटणे गांव ने 100% स्वगणना से रत्नागिरी में इतिहास रचा

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण - रत्नागिरी.. जनगणनेत दळवटणे गावाची ऐतिहासिक भरारी; १००% स्वगणना पूर्ण करणारे रत्नागिरीतील पहिले गाव! रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत चिपळूण तालुक्यातील दळवटणे गावाने जनगणना २०२७ च्या मोहिमेत मोठी कामगिरी केली आहे.. १ ते १५ मे या कालावधीत राबवण्यात आलेल्या उपक्रमात गावातील सर्व ९ वाड्यांमधील ४२५ कुटुंबांनी सक्रिय सहभाग नोंदवत आपली स्वगणना शंभर टक्के पूर्ण केली असून, असे यश मिळवणारे हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे.. या प्रक्रियेेमुळे गावाची लोकसंख्या आता २२६२ च्या घरात पोहोचल्याचे समोर आले असून, जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली दळवटणे गावाने मांडलेला हा लोकसहभागाचा आदर्श आता संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे॥
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top