icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बारामती में गोवा बनावट शराब की तस्करी पर बड़ी कार्रवाई; 5.13 लाख का माल जब्त

Rui, Maharashtra:बारामतीत गोवा बनावट दारूच्या वाहतुकीवर मोठी कारवाई; 5 लाखांचा मुद्देमाल जप्त, 2 जण अटक राज्य उत्पादन शुल्क विभाग, बारामती विभागाने गोवा बनावट दारूच्या वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. माळेगाव - सांगवी रोडवरील शिवनगर येथे ही कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने MH 43 AB 0748 क्रमांकाची ह्युंदाई I-20 कार थांबवून तपासणी केली. यावेळी कारमध्ये आणि जवळच्या घरात गोवा राज्यात निर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी दारूचे 18 सीलबंद बॉक्स आढळून आले. रॉयल स्टॅग, इम्पिरियल ब्लू, मॅकडोवेल्स, रॉयल चॅलेंज सारख्या ब्रँडच्या विदेशी दारूसहित एक अँड्रॉईड मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 5 लाख 13 हजार 960 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तुषार रवींद्र कोकर, रा. पणदरे, ता. बारामती आणि संदीप विठ्ठल कासार, रा. खारघर, नवी मुंबई या दोघांना अटक करण्यात आली आहे. आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय...
0
0
Report
Advertisement

पश्चिम घाट में भारी बारिश से उजनी डैम में जलस्तर बढ़ा, भीमा नदी में प्रवाह तेज

Rui, Maharashtra:दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणात मोठी आवक....दौंड बंधाऱ्यातून 1 लाख 45 हजार 561 क्युसेसकने आवक... पश्चिम घाट माथ्यावर पाऊस झाल्याने भीमा नदीत येतोय विसर्ग..... 48 तासात उजनीत वाढलं सव्वाचार टीएमसी पाणी Anchor _ पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावरती मुसळधार पाऊस होतोय त्यामुळे उजनी धरणात दौंड बंधाऱ्यातून पाण्याची मोठी आवक सुरू आहे.दौंड बंधाऱ्यामधून 1 लाख 45 हजार 561क्युसेकने भीमा नदीपात्रात पाण्याचा प्रवाह येत आहे. परिणामी भीमा नदीचे पात्र तुडुंब भरून वाहत आहे. गेल्या 48 तासात उजनी धरणात तब्बल सव्वाचार टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. पाच जुलै रोजी वजा 27 पूर्णांक 96 टक्क्यावर असणारे उजनी धरण 48 तासानंतर 20 पूर्णांक 21 टक्क्यावर आलं आहे. सध्या उजनी धरणात एकूण साठवण क्षमतेच्या 52 पूर्णांक 83 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
0
0
Report

महापालिका के आरोग्य केंद्र की दीवार गिरी, नगरसेवक ने आरोप लगाए

Kalyan, Maharashtra:Anchor- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ड प्रभागात आरोग्य केंद्राची भिंत कोसळली आहे. इथे असलेले एका इमारतीच्या सोसायटी ऑफिसवर ही भिंत कोसळली. Vo- दरम्यान यात जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.इथल्या रहिवाशांचा भिंत बांधण्याला विरोध असताना देखील महापालिकेने जबरदस्तीने इथे भिंत बांधली, त्यामुळे आता ही दुर्घटना झाल्यानंतर महापालिकेच्या अधिकारांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी स्थानिक नगरसेवक महेश गायकवाड यांनी केली आहे. दरम्यान भिंत कोसळल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली . आता कोसळलेला भिंतीचा भाग काढण्याचं काम महापालिकेकडून सुरू आहे .
0
0
Report
Advertisement

Washim mein van mahotsav: vrikshdindi aur vrikharopan se paryavaran jagrukta badhi

Washim, Maharashtra:वाशीम: वनमहोत्सवानिमित्त वाशिममध्ये राष्ट्रीय हरित सेना, एस.एम.सी.स्कूल आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. निसर्ग ईको क्लबच्या विद्यार्थ्यांनी हातात रोपे आणि जनजागृतीचे फलक घेऊन शहरातून वृक्षदिंडी काढत नागरिकांना वृक्षलागवडीचे आवाहन केले. यानंतर शाळा परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्यात आला. पावसाळ्यात अधिकाधिक वृक्षलागवड व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश होता.
0
0
Report
Advertisement

महाड में बाढ़ की स्थिति बनी, सावित्री नदी के रानबाचीरे डैम से पानी जारी

Chendhare, Maharashtra:महाडमध्ये पूरस्थिती कायम. रान बाजीरे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धरणाचे पाणी महाडमध्ये येत असल्याने पूर स्थिती कायम आहेत. रायगड जिल्ह्याच्या बहुतेज भागातील पूरस्थिती ओसरली आहे, मात्र महाडमध्ये अद्यापही पुराचे पाणी कायम आहे. महाबळेश्वरमध्ये पावसाचा हा परिणाम असल्याचं सांगितलं जातं. महाबळेश्वर इथं उगम पावणाऱ्या सावित्री नदीवरील रानबाजीरे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी महाड कडे येत असल्याने महाड शहर आणि परिसरात पूरस्थिती कायम असल्याचं सांगितले जातं. महाडमध्ये सावित्री नदी अजूनही धोका पातळीवरून वाहत आहे.
0
0
Report

Meḷghāṭ meṁ lagātār bāṛiś se chikhla)**दर्यात dhundh cha gaya, pariyṭak umḍe

Amravati, Maharashtra:AMT_FOOG_WKT दोन फाईल आहे रिपोर्टर :- अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 संततधार पावसाने फुलले चिखलदऱ्याचे निसर्ग सौंदर्य; संपूर्ण मेळघाटात पसरली धुक्याची चादर, निसर्गाचा अद्भुत आनंद घेण्यासाठी पर्यटकांची चिखलदऱ्याकडे गर्दी अँकर :- गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यासह संपूर्ण मेळघाटात आणि चिखलदऱ्यात संततधार पाऊस पडल्यानंतर विदर्भाचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात सध्या अल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. सर्वत्र हिरवळ पसरली असून संपूर्ण मेळघाटासह चिखलदऱ्यात धुक्याची चादर पसरल्याने मोठ्या प्रमाणात अल्हाददायक वातावरण निर्माण झाला आहे. त्यामुळे निसर्गाचा संपूर्ण नजारा आपल्या डोळ्यात टिपण्यासाठी विदर्भासह संपूर्ण राज्यातून पर्यटक चिखलदराकडे दाखल होत आहेत. सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात चिखलदऱ्यात धुक्‍याची चादर पसरल्याने रस्ता देखील दिसेनासा झाला आहे या संपूर्ण अल्हाददायक वातावरणाचा च⇄खलदऱ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी
0
0
Report
Advertisement

कृष्णा नदी के बढ़ते जलस्तर से म्हैसाळ के बांधाधिकारी जलमग्न, सांगली में सतर्कता बढ़ी

Sangli, Maharashtra:स्लग - कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे म्हैसाळचा बंधारा पाण्याखाली.. अँकर - सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूचं आहे.कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे कृष्णा नदीवरील म्हैसाळ येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे.सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील शेवटचा मोठा बंधारा म्हणून ओळख आहे.मिरज तालुक्यातून कोल्हापूर जिल्ह्याकडे जाणारा जवळचा मार्ग देखील आहे.मात्र कृष्णानदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोल्हापूर पद्धतीचा असणारा बंधारा पाण्याखाली गेला आहे,या बंधारयावरून कृष्णा नदीचा आढावा घेतला आहे,आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी
0
0
Report

कारंजा सावरकर चौक पर निजी बस-ट्रक भिड़ंत: 35 यात्री सुरक्षित, सुरक्षा मांगें तेज

Washim, Maharashtra:कारंजा शहरातील सावरकर चौकात खाजगी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. नागपूरकडे जाणाऱ्या खाजगी बसमध्ये ३५ प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर कारंजा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातात बस आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. कारंजा येथील सावरकर चौकात वारंवार अपघात घडत असल्याने या ठिकाणी महामार्ग प्रशासनाने तातडीने वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top