445001
यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.
Yavatmal, Maharashtra:राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सेवन हिल्स से शाहनूरमियाँ दरगाह विवाद: दिव्यांग महिला का वीडियो वायरल, जांच शुरू
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सेव्हन हिल्स ते शाहनूरमियाँ दर्गा दरम्यान झालेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेनंतर, प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्यासाठी एका दिव्यांग महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिशाभुल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी या प्रकरणाची प्रत्यक्ष चौकशी केली. तेव्हा व्हिडिओत दिसणाऱ्या दिव्यांग महिलेचा माठ विक्री व्यवसायाशी कोणताही संबंध नाही हा व्हिडिओ खोटा आहे असे पुढे आले, काही समाजकंटकांनी प्रशासनाविरुद्ध रोष निर्माण करण्यासाठी तिचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळं आता महापालिका कारवाईच्या पवित्र्यात आहे...0
0
Report
महाराष्ट्र में ओबीसी नेताओं की 100 सभाओं का आयोजन, जनगणना के लिए जागरूकता अभियान शुरू
Pune, Maharashtra:ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके हे जात निहाय जनगणनेसाठी महाराष्ट्रात १०० सभा घेणार आहेत. पहिली सभा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी जवळ शिरसाटवाडीत ११ मे रोजी संध्याकाळी ६.०० वाजता होणार आहे. राज्यातील ओबीसींची संख्या या जनगणनेच्या माध्यमातून समोर येणार आहे, त्यासाठी जनजागृतीपर सभा होणार आहेत. नसरापुरात चिमुकलीला श्रद्धांजली वाहिली गेली. तायक्वांदो विद्यार्थींनी मेनबत्या पेटवून चिमुकलीस श्रद्धांजली वाहिली आणि मारेकऱ्यास कठोर शिक्षेची मागणी केली. पुण्यातील आरएमसी प्लॉन्टचा मुद्दा चांगलाच पेटला. कलेक्टरांनी सर्व एएमसी प्लॉन्ट चालकांची बैठक घेऊन त्यांना सहा महिन्याच्या आत पुणे शहराच्या हद्दीबाहेर प्लांट नेण्याच्या सुचना केल्या आहेत. प्रदुषणाबद्दल मी पुणेची दिल्ली होऊ देणार नाही, अशी कठोर भूमिका जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी घेतलीय; तर आरएमसी प्लॉन्ट असोसिएशनने नेमकी या यावर उलट भूमिका घेतलीय. प्लान्ट शहरातच राहतील, अशी ठाम भूमिका या चालकांनी घेतल्याने प्रदुषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. उबाठा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आज विधीमंडळ हक्कभंग समितीसमोर हजर राहणार आहेत. प्रवीण दरेकर यांनी हा विशेषाधिकार हक्कभंग दाखल केलेला आहे. पुणे 100 वे साहित्य संमेलनासाठी जागेचा शोध सुरू; 14 जूनला संमेलन कुठे होणार याची घोषणा होणार. शंभरावे साहित्य संमेलन पुण्यात होणार असून स्थळ निश्चित करण्यासाठी सात जणांची समिती नेमण्यात आली आहे. याआधी शहरात झालेल्या संमेलनाची ठिकाण तसेच इतर जागांची पाहणी निवड समिती करणार आहे. स प महाविद्यालय शिवाजीनगर पोलीस मुख्यालय फरगुशन कॉलेज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणाचा विचार केला जात आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक साहित्य परिषदेमध्ये पार पडलेल्या बैठकीत निवड समिती तयार करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात 50 टक्के शिक्षक नसल्यास प्रवेश रोखणार. संलग्न महाविद्यालयांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा इशारा माहिती अपडेट करण्याचे आदेश. बीओटी पोर्टलवर माहिती अपडेटसाठी महाविद्यालयांना वेळोवेळी मुदत देऊनही माहिती न भरल्याने 18 मे पर्यंत माहिती भरण्याची आदेश. दिलेल्या मुदतीत शिक्षकाची माहिती अपलोड करून देणाऱ्या महाविद्यालयाचे यावर्षीचे प्रवेश थांबवले जाणार. पुणे शहराचे तापमान 41 अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याची नोंद झाली. 2016 नंतर मे महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे. लोहगावमध्ये 42.7 अंश, हडपसर मध्ये 38.2 अंश अशी नोंद झाली. राज्यात 99.18 लाख टन साखर उत्पादन, ऊस गाळप हंगाम ०वर्ष चालला; 102 सहकारी आणि 107 खाजगी साखर कारखान्यांनी ऊस गाळप घेतले; ऊस गाळप 191.76 लाख मॅट्रिक टन अधिक झाले असून 182.51 लाख क्विंटल साखर उत्पादनात वाढ झाली. राज्यात दूध उत्पादनात २५ टक्क्यांची घट झाली. उन्हाच्या तीव्रतेमुळे गाईंच्या दूध उत्पादनात घट झाली असून हिरवा चारा कमी झाला आहे. दूध उत्पादकांना सरकारी पातळीवर आधाराची गरज. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता; पुणे व परिसरात दिवसांतर आकाश निरभ्र, दुपारनंतर ढगाळ वातावरण. मेफेड्रॉन निर्मितीचा कारखाना सुरू करण्याच्या तयारीत अटक; आरोपींकोंडून 45 लाखांचे एमडी व अन्य मौद्रकात जप्त; अशोक ढवळे, रामविलास विष्णू आणि बिपिनकुमार पंडित असे आरोपींचे नाव. पुणे पोलिसांच्या वाघोली पोलीसांची मोठी कारवाई. निलेश घायवळ टोळीय तुमच्या गुन्हे शाखेनं जेरबंद झालाय; गुरुदत्त गुणाजी साळवे असे आरोपीचे नाव; सोलापूर निजामपूर भागात राहत असल्याची माहिती, कोथरूड पोलिसांनी मोक्कातर्गत कारवाई केली.0
0
Report
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार का रायगढ़ दौरा: रोहा में 16 करोड़ के विकास कार्यों का भूमिपूजन
Chendhare, Maharashtra:स्लग - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगड दौऱ्यावर ...... रोह्यातील १६ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन ........ अँकर - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. रोहा शहरातील तब्बल १६ कोटी ३२ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होत आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर हा त्यांचा पहिलाच रायगड दौरा आहे.0
0
Report
Advertisement
नागपुर में दंपत्ति विवाद के बीच छत पर फंसा युवक दमकल ने बचाया
Nagpur, Maharashtra:नागपूर कौटुंबिक वादातून रागाच्या व नशेच्या भरात एक तरुणाने एका इमारतीच्या गच्चीवरून पाईपच्या सहाय्याने खाली उतरण्याचा प्रयत्न केला. पण अर्ध्या वाटतेच धास्तीने तो तरुण पाचव्या माळ्याच्या अरुंद खिडकीच्या सज्जावर अडकला आणि जीवाच्या आकांताने मदतीची प्रतीक्षा करू लागला. रामदासपेठ येथील आशिष अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. वाडी परिसरात राहणाऱ्या या तरुणाचा पत्नी माहेरी राहत होता. दारूच्या नशेत त्या ठिकाणी पोहोचला. दोघांमध्ये वाद झाला आणि आरोप-प्रत्यारोप झाले. या वादामुळे हा तरुण पाचव्या- सहाव्या माळ्या दरम्यानच्या खिडकीच्या सज्जावर अडकला. नागरिकांनी पाहिले व तात्काळ पोलीस व अग्निशमन दलाला बोलावले. अग्निशमन दल व पोलिसांनी दोरखंड व शिडीच्या मदतीने त्याला वर ओढले.0
0
Report
फल बाग बचाने के लिए टैंकर पानी पर निर्भर, कुकड़ी आवर्तन से किसानों की लागत बढ़ी
Ahilyanagar, Maharashtra:फीड 2c Anc- अहिल्या नगरच्या श्रीगोंदा तालुक्यात कुकडी प्रकल्पाच्या कालव्याचं आवर्तन लाभल्याने फळबाग असलेल्या शेतकऱ्यांना फळबाग वाचवण्यासाठी टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर फळबागा आहेत...या फळबागांना पाणी टंचाईचा फटका बसतोय...फळबागांना वाचवण्यासाठी टँकरचे पाणी विहिरीत सोडून नंतर फळबागांना देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे तालुक्यातील कोळगाव पांढरेवाडी येथील विश्वनाथ लगड या शेतकऱ्यांची पाच एकर संत्रा बाग आहे, गेल्या दीड महिन्यापासून त्यांनी आपली फळबाग वाचवण्यासाठी जवळपास एक लाख रुपयांचे विकतचे पाणी टँकरद्वारे घेतले आहे...अजूनही एक ते दीड लाख रुपयांचे पाणी त्यांना लागू शकते असं त्यांनी सांगितले आहे...त्यातच कुकडीचे आवर्तन लांबल्याने शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचे कोळगावचे सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी म्हंटले आहे...0
0
Report
हिंगोली में एक ही दिन में तीन बाल विवाह रोक दिए गए
Hingoli, Maharashtra:हिंगोली जिल्ह्यात सर्व विवाह सोहळ्यावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यंत्रणेला सूचना दिल्या होत्या याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात बासंबा कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथे ग्राम बाल विकास संरक्षण कक्षाने तीन मुलींचे बालविवाह थांबवले आहेत मुलींच्या कुटुंबाला बालविवाहाचे परिणाम समजावून सांगत होणारे बालविवाह थांबवण्यात आले आहेत ग्रामीण भागात आजही लहान मुलांना बोहल्यावर चढवले जाते,आर्थिक परिस्थिती मुलींची सुरक्षितता रोजगार ही कारणे बालविवाह ला जबाबदार असल्याचं समोर आलं आहे हिंगोली जिल्ह्यात बाल संरक्षण समितीला एकाच दिवशी तीन बाल विवाह रोखण्यात यश आलं आहे0
0
Report
Advertisement
मालेगाव महापालिका पर 256 दावे, सालाना लाखों खर्च; नागरिक सुविधाओं पर अदालत की नजर
Nashik, Maharashtra:उत्तर महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या मालेगाव महापालिकेवर २५६ दावे प्रलंबित.. दरवर्षाला दाव्यांवर होतो लाखो रुपयांचा खर्च... मालेगाव मनपा विरोधातील खटले प्रामुख्याने भूसंपादन, घरपट्टीव पाणीपट्टी दरवाढ, विकासकामांतील ठेके, मक्तेदारांशी बाद, तसेच नोकरभरती व पदोन्नतीसंबंधी असतात. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी निगडित तक्रारीही न्यायालयात पोहोचत असल्याचे दिसते. यातील काही प्रकरणे तब्बल १० ते १५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. मागील वर्षी तर या खटल्यांसाठी तब्बल 23 लाख रुपये लागल्याचे समजते. सर्व सामान्य नागरिकांचा कर स्वरूपातला पैसा नाहक खर्च होत असल्याचा आरोप आता मालेगावकर करत आहेत.0
0
Report
शिरूर आंधळगांव फाटा हादसा: दो मजदूरों की मौत, 12 घायल
Shirur, Maharashtra:शिरूर तालुकے के आंधळगांव फाटा में भीषण हादसा हुआ. सीएनजी पंप के पास पिकअप और कंटेनर की तेज भिड़ंत से दो ऊसतोड़ मजूरों की मौत हो गई है, 12 लोग घायल हैं. मृतकों में रविंद्र सोनवणे और संगीत मोरे शामिल हैं. हादसे के समय पिकअप चौक की दिशा में जा रही थी, सामने से आ रहे तेज कंटेनर ने उसे पीछे से जोरदार धक्का दिया. टक्कर इतनी भीषण थी कि पिकअप में सवार मजदूर सड़क के किनारे फेक दिए गए. स्थानीय नागरिकों ने मदद के लिए दौड़ लगाई. मांढवगण फराटा पुलिस ने तुरंत घटनास्थल पर पहुंचकर घायलों को अस्पताल पहुँचाया। घायल में एक महिला की स्थिति गंभीर है. पुलिस इस हादसे की आगे की छानबीन कर रही है.0
0
Report
नागपूर में RSS द्वितीय कार्यकर्ता विकास वर्ग शुरू, 25 दिन, 40+ आयु के लिए वर्ग
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपुरात आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय सुरु होतोय... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण प्रणालीत अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा मानला जाणारा कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात होईल. 25 दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण वर्गासाठी देशभरातील स्वयंसेवक आले आहेत. महर्षी व्यास सभागृहात उद्घाटन होणार आहे. 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यानंतर 1927 मध्ये पहिल्या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. 2024 मध्ये तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग या ऐवजी कार्यकर्ता विकास वर्गात द्वितीय असे नाव ठेवण्यात आले. महत्त्वं म्हणजे यंदा 40 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या स्वयंसेवकांसाठी विशेष वर्गाचे वेगळे आयोजन करण्यात आलेयं0
0
Report
Advertisement
उल्हासनगर में बर्निंग कार का डरावना घटनाक्रम, दमकल ने आग पर काबू पाया
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात बर्निंग कारचा थरार उल्हासनगरच्या शहाड परिसरात भर रस्त्यावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला , रस्त्यावरून जात असलेल्या एका कारने अचानक पेट घेतला , मात्र चालकाच्या प्रसावधानाने मोठी दुर्घटना टळली, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, माझं कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व वाहन थांबवण्यात आली त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली त्यानंतर अग्निशमन दलाला जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले , आगीचे कारण मात्र समजू शकले नाही,0
0
Report
मुंबई-गोवा महामार्ग पर निर्माण कार्य से 2 किलोमीटर लंबा ट्रैफिक जाम
Ratnagiri, Maharashtra:संगमेश्वर - रत्नागिरी..\nमुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा..\nमहामार्ग रुंदीकरणाच्या अर्धवट कामांमुळे वाहतुकीचा खोळंबा..\nमुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर शास्त्री नदीवरील पुलाच्या अर्धवट स्थितीत असलेल्या कामांमुळे महामार्गावर दोन किलोमीटरच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत..\nचार तासांपासून महामार्गवरील वाहतूक ठप्प आहे..\nत्यात आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे महामार्गावरील रहदरीचे प्रमाण सर्वात जास्त..0
0
Report
राजापूर में बॉक्साइट खदान विरोध, जनसुनावणी रद्दीकरण की मांग तेज
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी राजापूरमध्ये बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरून वातावरण तापलं बॉक्साईट उत्खननाला राजापूरवासीयांचा तीव्र विरोध विनाशकारी बॉक्साईड खाण प्रकल्प विरोधी संघर्ष समिती आक्रमक 20 मे और 26 मे रोजी होणारी जनसुनावणी रद्द करण्याची मागणी जनसुनावणी रद्द झाली नाही तर जनसुनावणी उधळण्याचा ग्रामस्थांचा इशारा राजापूर तालुक्यातील नाणार आणि सागवे गावात प्रस्तावित आहे बॉक्साइट उत्खनन प्रकल्प नाणारमध्ये 144.95 हेक्टर, आणि सागवे गावात 120.48 हेक्टरवर होणार उत्खनन बॉक्साईट उत्खननाविरोधात राजापूर पंचायत समितीनेही केला आहे विरोधाचा ठराव दोनन्ही शिवसेनेचाही आहे विरोध, स्थानिक आमदार किरण सामंत यांचाही विरोध.. जनसुनावणी रद्द करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक0
0
Report
Advertisement
रायगढ़ में सीएनजी टैंकर चालक संघ के बंद से पंप ठप, पर्यटक प्रभावित
Chendhare, Maharashtra:टँकर चालकांच्या संपामुळे रायगडमध्ये सीएनजी पंप बंद. कोकण फिरायला आलेलेल्या पर्यटकांना मोठा फटका. रायगड जिल्ह्यातील सीएनजी टँकर चालक संघटनेने पुकारलेल्या बंदमुळे रायगडमध्ये सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. सीएनजीच्या गाड्या येत नसल्याने अनेक सीएनजी पंप बंद झाले आहेत. याचा थेट फटका कोकण फिरायला निघालेल्या पर्यटक आणि सर्वसामान्य नागरीकांना बसत आहे. भविष्य निर्वाह निधीची सुविधा, 25 हजार रुपये पगार मिळावा, इन्शुरन्स मिळावा त्याच बरोबर ड्युटीची वेळ निश्चित असावी अशा अनेक मागण्यांसाठी रायगड मधील सीएनजी टँकर चालक संघटनेने बंद पुकारला आहे. कालपासून हा बंद सुरू झाला आहे. सीएनजी घेऊन येणारी एकही गाडी आज पंपावर न आल्याने टँकर चालकांच्या बंदची झळ सर्वसामान्य नागरीक आणि पर्यटकांना बसत आहे. प्रशासनाने न्याय मागण्यांचा विचार करून मागण्या पूर्ण कराव्यात असा आग्रह संपकरी चालकांकडून केला जात आहे.0
0
Report
डोंबिवली महापालिका के सामने सात दिनों से आमरण उपोषण, अनधिकृत बंगला हटाने की मांग
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर गेल्या सात दिवसांपासून ज्योती म्हात्रे, या महिला आमरण उपोषणाला बसल्या असून, आपल्या पागडी पद्धतीवरील घराचा मोबदला दिल्याचे आश्वासन दिले गेले होते, मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला गेला नाही, तसेच संबंधित जागेवर अनधिकृत बंगला उभारण्यात आला आहे, या अनधिकृत बंगल्यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याच्या आरोप त्यांनी केला आहे. ज्योती म्हात्रे, यांच्या म्हणण्यानुसार, डोंबिवली पश्चिमेतील गायकवाडवाडी परिसरात ज्या ठिकाणी त्यांचे पागडी पद्धतीवरील घर होते ते घर पाडण्यात आले. घरावर जेव्हा कारवाई केली गेली होती संबंधित व्यक्तीने त्यांना मोबदला दिला जाईल, असा आश्वासन दिलं होतं, मात्र आतापर्यंत ज्योती म्हात्रे, यांना कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई अथवा पर्यायी व्यवस्था देण्यात आलेली नाही. त्याच जागेवर सध्या बंगला उभारण्यात आला असून त्या अनधिकृत बंगल्यावर केडीएमसीकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या मागण्यांसाठी त्या गेल्या सात दिवसांपासून केडीएमसी मुख्यालयासमोर सात दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याबाबत महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता संबंधित बंगला अनधिकृत असल्याचे मान्य करण्यात आले. मात्र तो खाजगी जागेवर बांधण्यात आला असल्याने तात्काळ कारवाई करण्यात आलेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच संबंधित बंगला मालकाने बांधकाम नियमित करण्यासाठी केडीएमसीकडे अर्ज दाखल केला असून त्या अर्जावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे सध्या कारवाई स्थगित ठेवण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. एकीकडे आपल्याला न्याय आणि मोबदला मिळत नसल्याची तक्रार ज्योती म्हात्रे करत असताना, दुसरीकडे अनधिकृत बांधकामावर कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवराही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.0
0
Report
सांगली के पांडोझरी में महावितरण कर्मी की गोलीबारी हत्या, दो संदिग्ध गिरफ्तार
Sangli, Maharashtra:सलग- जतच्या पांडोझरी येथे महावितरण कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या,दोन संशयित ताब्यात घटना: सांगली जिल्ह्यातील संख महावितरण वसुली कर्मचाऱ्याची त्याच्या राहत्या घराच्या परिसरात गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना घडली आहे. संतोष उर्फ Kumar बिराजदार असे आहेत, संख नजीक असणाऱ्या पांडोझरी गावाच्या हद्दीत मध्यरात्री अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार करून हत्या केली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे झाले. या घटनेने जत तालुक्यात खळबळ माजली आहे. या घटनेची उमदी पोलिसांत नोंद झाली आहे, या प्रकरणी उमदी पोलिसांनी دوघांना ताब्यात घेतलं आहे. मात्र या घटनेचे कारण स्पष्ट नाही, अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची चर्चा सुरू असून अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.0
0
Report
Advertisement
