icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अकोला नगर परिषदच्या नाल्यांवर आक्रोश: पावसाळ्याआगमनाआधी साफसफाईची मागणी जोरदार

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही नाल्यांच्या साफसफाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये नाले कचऱ्याने तुडुंब भरले असून नागरिकांमध्ये नगर परिषद प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नेमकी काय आहे परिस्थिती, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट... मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभागातील राम मंदिर परिसर, जुनी वस्तीतील देवरण रोड तसेच लकडगंज परिसरात नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाल्यांमध्ये प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या आणि विविध प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात साचला असून नाले अक्षरशः तुडुंब भरले आहेत. पावसाळा अवघ्या पंधरा दिवसांवर आला असतानाही नगर परिषद प्रशासनाकडून नाल्यांची वेळेवर साफसफाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. नाल्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना पावसाचे पाणी घरात शिरण्याची भीती सतावत आहे. विशेष म्हणजे लकडगंज परिसरात भाजप आमदारांचे निवासस्थान असतानाही येथील नाल्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यामुळे “जर इथेच अशी परिस्थिती असेल, तर उर्वरित शहराचं काय?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नालेसफाई न झाल्याने परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची तातडीने साफसफाई करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी आणि सुरक्षेशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे नगर परिषद प्रशासन कधी लक्ष देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
0
0
Report
Advertisement

कर्ज के दबाव में दोस्त को मौत दिखाकर जिंदा रहने का खेल, आठ महीने बाद सच सामने

Bhandara, Maharashtra:ANCHOR :- कर्जाच्या ओझ्यात दबलेल्या एका तरुणाने स्वतःचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यासाठी थेट मित्राचाच जीव घेतल्याची थरारक घटना गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आली आहे. स्वतःचे कपडे, आधार कार्ड आणि कागदपत्रे मृतदेहाजवळ ठेवत रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आला. इतकेच नाही तर कुटुंबीयांनी त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून तेरवीही केली. मात्र तब्बल आठ महिन्यांनंतर आरोपीने स्वतःच वडिलांना फोन करत आपण जिवंत असल्याचे सांगितले... आणि उघड झाला थरारक कट... गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथील अंतिम ओमप्रकाश खोटेले याने पोल्ट्री व्यवसायासाठी बँकेतून पाच लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र व्यवसाय तोट्यात गेल्याने कर्ज फेडणे अशक्य झाले. वाढत्या तणावातून सुटका मिळवण्यासाठी अंतिमने थेट स्वतःचाच “अंत” घडवण्याचा प्लान तयार केला. या कटासाठी त्याने गावातीलच ओळखीचा ४३ वर्षीय चंद्रकुमार सराटे याला लक्ष्य केले. आधी दारू पार्टी... त्यानंतर गळा आवळून हत्या... आणि मग सुरू झाला मृत्यूचा थरारक खेळ. आरोपीने चंद्रकुमारचा मृतदेह मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील रुळांवर नेऊन टाकला. मृतदेहाला स्वतःचे कपडे घातले... खिशात आधार कार्ड, पर्स आणि कागदपत्रे ठेवली... जेणेकरून मृतदेहाची ओळख अंतिम खोटेले म्हणून पटावी. काही वेळातच रेल्वेच्या धडकेत मृतदेह विद्रूप झाला... आणि आरोपीचा प्लॅन यशस्वी झाल्याचे दिसून आले...... दुसऱ्या दिवशी रेल्वे रुळाजवळ अंतिमची दुचाकी आणि चप्पल आढळल्या. त्यामुळे गावकऱ्यांनी मृतदेह अंतिमचाच असल्याचे समजले. कुटुंबीयांनीही तोच मृतदेह अंतिमचा असल्याचे मान्य करत अंत्यसंस्कार केले. इतकेच नाही तर तेरवी करून गावाला जेवणही घालण्यात आले. दरम्यान, सर्वांना मृत समजला गेलेला अंतिम तब्बल आठ महिने नागपुरात राहत होता. कर्जमाफी झाल्याचे समजल्यानंतर त्याने स्वतःच्या वडिलांना फोन करून “मी जिवंत आहे” असे सांगितले... आणि इथूनच संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला. आमगाव पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे नागपुरातून आरोपीला अटक केली. चौकशीत आरोपीने मित्राची हत्या करून स्वतःचा मृत्यू दाखवण्याचा कट रचल्याची कबुली दिली आहे. कथन :- तिरुपती राणे, पोलीस निरीक्षक, आमगाव मृतक चंद्रकुमार सराटे यांच्या कुटुंबीयांनी मात्र या हत्येमागे आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. आरोपी अंतिमने एकट्याने हा कट रचणे शक्य नसल्याचा दावा करत त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. माहिती :- रमेश सराटे, मृतकाचा भाऊ कथन :- कर्जातून सुटका मिळवण्यासाठी मित्राचाच जीव घेण्याऱ्या या थ्रिलर कटाने संपूर्ण गोंदिया जिल्हा हादरला... स्वतःच्या मृत्यूचे नाटक करत आठ महिने पोलिसांनाही चकवा देणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला... आणि “मृत” असलेला तरुण जिवंत बाहेर आला...
0
0
Report
Advertisement

पक्षी थांबा से चवळी में प्राकृतिक कीड़नियंत्रण, खर्च घटे, उत्पादन बढ़े

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशीमच्या मानोरा तालुक्यातील बेलोरा येथील शेतकरी विशाल ठाकरे यांनी चवळी पिकात ज्वारी आणि बाजरीची उंच झाडे लावून ‘पक्षी थांबे’ तयार केले आहेत.या झाडांवर बसणारे पक्षी पिकावरील अळ्या आणि किडी खात असल्याने नैसर्गिक पद्धतीने कीड नियंत्रण होत आहे.त्यामुळे रासायनिक फवारणीचा खर्च कमी झाला असून उत्पादनात वाढ झाली आहे.चवळीच्या लागवडीमुळे १६५ दिवसांनंतरही शेंगांची विक्री सुरू आहे. पर्यावरणपूरक आणि विषमुक्त शेतीचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. व्हिओ:बदलते हवामान, वाढتا उत्पादन खर्च और रासायनिक फवारण्यांचे दुष्परिणाम यामध्ये विशाल ठाकरे यांचा ‘पक्षी थांबा’ प्रयोग शाश्वत शेतीसाठी नवा मार्ग ठरत आहे.कृषी विभागानेही या प्रयोगाचे कौतुक केले असून पर्यावरणपूरक शेतीसाठी अशा नैसर्गिक पद्धतींची गरज असल्याचे सांगितले आहे. बाईट :विशाल ठाकरे, प्रयोगशील शेतकरी बाईट : विष्णू ठाकरे,शेतकरी बाईट :उमेश राठोड, मंडळ कृषी अधिकारी मानोरा
0
0
Report

अधिक मास के अवसर पर पंढरपुर में भक्तों की भारी भीड़, विठ्ठल-रुक्मिणी दर्शन शुरू

Pandharpur, Maharashtra:दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासानिमित्ताने विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी सुमारे एक लाख भाविकांनी पंढरपुरात पहिलाच दिवशी गर्दी केली आहे. वारकरी संप्रदायामध्ये अधिक मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यांमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन आणि चंद्रभागा स्नानासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये येतात आज पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर गेले असून चार ते पाच तास दर्शनासाठी लागत आहेत. अधिकमासाच्या निमित्ताने पंढरपुरातील मठ मंदिरांमध्ये हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पंढरपूरात विठू नामाचा जयघोष सुरू आहे
0
0
Report

प्रेम त्रिकोण के कारण युवक का अपहरण, मारपीट और सिगरेट से चोट, 2 गिरफ्तार

Mira Bhayandar, Maharashtra:प्रेम त्रिकोणातून तरुणाचे अपहरण? मारहाण करत सिगारेटचे चटके भाईंदर पूर्वेतील पूजा नगर येथे १२ तारखेला रात्री फिर्यादी श्रेयस मिश्रा याला आरोपींनी इनोव्हा गाडीत बसवून शहरभर फिरवत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी त्याच्या अंगावर सिगारेटचे चटके दिल्याचाही आरोप आहे. सकाळी त्याला घरी सोडण्यात आल्यानंतर तो उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला. या प्रकरणी नवघर पोलिसांनी अपहरण, दरोडा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर तीन आरोपी फरार आहेत. प्राथमिक माहितीनुसार प्रेम त्रिकोणातून हा प्रकार घडल्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे. बाईट -राहूल चव्हाण DCP मिरा भाईंदर झोन वन
0
0
Report
Advertisement

मराठा आरक्षण मुद्दे पर मनोज जरांगे का उपवास, विपक्ष ने कड़ा तंज किया

Ahilyanagar, Maharashtra:मनोज जरांगेंची सेटिंग पूर्ण न झाल्याने आंदोलन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषण आंदोलनाला बसणार आहेत, यावरून कधी काळीचे त्यांचे सहकारी आणि सध्याचे विरोधक अजय महाराज बारस्कर यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे...मुंबईत करोडो मराठा बांधवांना घेऊन गेल्यानंतर हैद्राबाद गॅजेटचा जीआर मनोज जरांगे घेऊन आले, गुलाल घेतला मग आता उपोषण कशाला करता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला...सोबतच मनोज जरांगे यांना स्वतःचा फायदा करता आला नाही, त्यांच्या ठरलेल्या सेटिंग पूर्ण झाल्या नाहीत म्हणूनच त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप अजय महाराज बारस्कर यांनी केला. मनोज जरांगे हे "मराठा योद्धा" नाही तर "मुस्लिम योद्धा" मनोज जरांगे यांच्यामुळे मराठ्यांचे EWS आरक्षण गेल्याने अनेक मराठा युवकांचे नुकसान झाल्याचे अजय महाराज बारस्कर यांनी म्हंटले...त्यासाठी त्यांनी बीड जिल्ह्यातील पोलीस भरतीचे उदाहरण दिले...कुणबी प्रमाणपत्र मिळवलेल्या युवकांना अधिकचे गुण असताना त्यांच्यापेक्षा कमी गुण असलेल्या मुस्लिम EWS प्रमाणपत्र धारक युवकांना नोकरी मिळाली तर कुणबी युवकांना नोकरी मिळाली नाही, त्यामुळे मनोज जरांगे हे "मराठा योद्धा" नाही तर "मुस्लिम योद्धा"असल्याचे अजय महाराज बारस्कर यांनी म्हंटले आहे.
0
0
Report

Wardha Bor Tiger Reserve में हिरणों के बीच शांति से चलता बाघ

Wardha, Maharashtra:हरणांच्या कळपातून ऐटीत चालणारा वाघ; बोर व्याघ्र प्रकल्पाची समृद्ध जैवविविधता पुन्हा अधोरेखित वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पातील समृद्ध वन्यजीवसंपदेचे दर्शन घडविणारा एक अप्रतिम व्हिडिओ सध्या वन्यजीव प्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. वन्यजीव छायाचित्रकार अमेय ठाकरे (अमरावती) यांनी सफारीदरम्यान हा दुर्मिळ क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. या व्हिडिओमध्ये हरणांच्या कळपामधून एक वाघ शांतपणे आणि ऐटीत चालताना दिसत आहे. विशेष म्हणजे, वाघाच्या उपस्थितीतही हरणांचा कळप काही अंतर राखून सावधपणे उभा असल्याचे दृश्य निसर्गातील संतुलन आणि वन्यजीवनातील नैसर्गिक हालचालींचे जिवंत उदाहरण ठरत आहे. काही वर्षांपूर्वी देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळख मिळालेला बोर व्याघ्र प्रकल्प आज जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कमी क्षेत्रफळ असूनही येथे वन्यजीवांची मोठी विविधता आढळून येते. वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, चितळ, नीलगाय, रानडुक्कर यांसारख्या सस्तन प्राण्यांसह अनेक दुर्मिळ पक्षी, सरपटणारे प्राणी आणि रंगीबेरंगी फुलपाखरांच्या विविध प्रजाती येथे पाहायला मिळतात. त्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पाने राज्यातील महत्त्वाच्या पर्यटन आणि संवर्धन केंद्रांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
0
0
Report

बार्शी में IPS अंजना कृष्णा की गुटखा छापेमारी: तीन टेम्पो गुटखा जब्त

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांची बार्शीत गुटख्यावर छापेमारी, कारवाईत तब्बल 3 टेम्पो गुटखा जप्त - लेडी सिंघम आयपीएस अंजना कृष्णा यांचा बार्शीत कारवाईचा धडाका - बार्शीतील बडा गुटख्याचा व्यापाऱ्यावर आयपीएस अंजना कृष्णा आणि पथकाची धाड - बार्शीतील गुटख्याच्या या कारवाईमध्ये तब्बल तीन टेम्पो गुटखा जप्त - बार्शी शहर पोलीस स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या अवैध व्यवसायावर कारवाई केल्याने अनेक चर्चांना उधाण - बार्शीतील अवैध धंद्यांच्या विरोधात आयपीएस अंजना कृष्णा ॲक्शन मोडवर - अंजना कृष्णा यांच्या धाडसी कारवाईचे बार्शीकरांकडून स्वागत
0
0
Report
Advertisement

सातारा के खेतों में बैलों के बदले ट्रैक्टर, ड्रोन से दिखी दस बैलों की नांगरपीठ की परंपरा

Satara, Maharashtra:सातारा - शेतातील मशागत करणे, आता बैलांचं काम राहिलं नाही. विशेषतः नांगरट आता सर्रास ट्रॅक्टरनेच होत आहे. 1990 च्या दशकात नांगरटीसाठी बैलजोड्या बांधल्या जायच्या, आता ट्रॅक्टरने जागा घेतली. यांत्रिकीकरणाला पूर्णतः शरण गेलेल्या या युगात साताऱ्यातील कराड तालुक्यातील शेणोली या गावात सूर्याच्या उगवतीला दहा बैलाच्या नांगराच्या फाळानं रान नांगरल जात. पिढ्यान पिढ्यांची मशागतीची पारंपारिक पद्धत नामशेष होत असताना भल्या पहाटे नांगर, शिवाळं, सोलं, सापत्या, चाबूक याची जमवाजमव करून दहा बैलाच्या औताचा मेळ घातला गेला. या मशागतीचे दृश्य आपण ड्रोनमधून पाहतोय.... प्राध्यापक कणसे यांच्या यशोहिरा या शेती केंद्रावर जिल्हा परिषद पुरस्कार प्राप्त मानसी चैतन्य कणसे यांच्या शेतातील मळ्यात दहा बैलाचा नांगर चालवत शेताची नांगरठ करण्यात आली.
0
0
Report

नाशिक के सिन्नर में बंधार के पानी में डूबकर महिला समेत चार की मौत

Sinnar, Maharashtra:नाशिकच्या सिन्नर मध्ये मन सुन्न करणारी घटना काल दुपारच्या सुमारास घडली आहे नांदूर शिंगोटे परिसरातील नागरे बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी महिलेसोबत तीन मुले देखील गेली होती महिला कपडे धूत असताना मुले बंधाराच्या पाण्यात बुडत असताना महिलेने पाहिले यावेळी महिलेने देखील त्याांना वाचवण्यासाठी धाव घेतल्याने महिलेसह तिच्या मुलासह दोन भाच्यांचा बंधाऱ्याच्या खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेबाबत वावी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार निरगुडे हे करत आहेत मृतांची नावे :- मनीषा विजय रामजोशी (आई) कार्तिक विजय रामजोशी (मुलगा) आदित्य राहुल शिंदे (भाचा) अविनाश राहुल शिंदे (भाचा)
0
0
Report

घाटी अस्पताल के लिए 90 करोड़ की मांग; आधुनिक लैब और कैंसर दवा योजना

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय  येथील आरोग्य सेवा अधिक सक्षम, आधुनिक करण्यासाठी घाटी हॉस्पिटल  प्रशासनाने कंबर कसली आहे. घाटी रुग्णालयातील विविध अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, साधनसामग्री, औषध पुरवठ्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे तब्बल ९० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. घाटी रुग्णालयात संपूर्ण मराठवाड्यातून, आजूबाजूच्या जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने रूग्ण उपचारासाठी येतात. या वाढत्या रुग्णसंख्येला वेळेत दर्जेदार उपचार मिळावेत. प्रशासनाने ९० कोटींचा सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावामध्ये प्रामुख्याने गंभीर आजारांचे अचूक निदान करणारी मॉलिक्युलर लॅब समाविष्ट आहे. रुग्णालयात येणाऱ्या गरजू कर्करुग्णांसाठी कॅन्सरवरील महागडी औषधे उपलब्ध करून देण्याची मागणीही आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top