445001
यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.
Yavatmal, Maharashtra:राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रत्नागिरी में पालकमंत्री ने निजी अस्पताल भेजने पर कड़ी कार्रवाई के निर्देश दिए
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रुग्ण खासगीत पाठवणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा.. रत्नागिरीत पालकमंत्र्यांचे कडक निर्देश!.. मंत्री अँकर रत्नागिरीच्या शासकीय आरोग्य यंत्रणेत हलगर्जीपणा करणाऱ्यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.. PHC मधून मुद्दाम खासगी रुग्णालयात डिलिव्हरीसाठी रुग्ण पाठवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी 'भरारी पथके' तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.. आरोग्य व्यवस्था अधिक गतिमान करण्यासाठी २ कार्डियाक आणि १२ नव्या रुग्णवाहिकांचा प्रस्ताव देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.. गरीब रुग्णांची लूट थांबवा आणि त्यांना शासकीय रुग्णालयातच योग्य उपचार द्या,असे कडक निर्देश यावेळी यंत्रणेला देण्यात आले आहेत..0
0
Report
रत्नागिरी में अगले दो दिनों में भारी बारिश की संभावना, किसान सावधान रहें
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता..हवामान विभागाचा अंदाज अँकर जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.. जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी मेघर्जनेहसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.. त्यामुळे शेतकऱ्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.. शेतकऱ्यांनी शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावी..काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवणीत किंवा ताडपत्री किंवा झाकणांनी सुरक्षित ठेवावीत.. वादळी वारे,पाऊस आणि संभाव्य गारपीट यापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.. शेतमाल भाजीपाला व इतर काढणी केलेले उत्पादन मोकळ्यावर ठेवू नये..0
0
Report
मेहकर में निजी ट्रैवल्स पलटी: डेढ़ वर्षीय बच्चे की मौत, 20–25 यात्री घायल
Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेकिंग . समृद्धी महामार्गावर पुन्हा खाजगी लक्झरी बसचा अपघात .. मोबाईल वर रिल बनवण्याच्या नादात ट्रॅव्हलचा अपघात .. ट्रॅव्हल्स चालक आणि क्लिनर बनवत होते रिल.. मेहकर येथील टोलनाका जवळ खाजगी ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन झाली पलटी.. अपघातात एका दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू .. तर २० ते २५ प्रवाशी जखमी .. ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने चार चाकी वाहनावर आदळले.. त्यामुळे चार चाकी वाहनाचे ही मोठे नुकसान. घटनेनंतर तात्काळ परिसरातील नागरिकांना रुग्णालयात हलविले .. मात्र, मेहकरच्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने जखमींना खाजगी रुग्णालयात हलविले .. तर काहींवर स्वतः नागरिकांना केले थातूरमातूर उपचार..0
0
Report
Advertisement
मानगांव उपजिल्हा अस्पताल के ऑन-कॉल डॉक्टरों ने वेतन नहीं मिलने पर हड़ताल शुरू की
Chendhare, Maharashtra:माणगाव सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचे कामबंद आंदोलन. ऑन कॉल सेवेत असणाऱ्या डॉक्टरांचे आंदोलन. रुग्णालयातील रुग्ण सेवेवर परिणाम. मानधन न मिळाल्याने डॉक्टर आक्रमक. रायगडच्या माणगाव मधील उपजिल्हा रुग्णालयात ऑन कॉल सेवेत असणाऱ्या डॉक्टरांनी काम बंद केले आहे. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम झालाय. ही सात खाजगी डॉक्टर मागील वर्षीच्या नोव्हेंबरपासून सेवा देत आहेत. परंतु त्यांचं ३३ लाख ३० हजार रुपयांचे मानधन शासनाने दिलेलं नाही. त्यामुळे कामबंद आंदोलन करावं लागलं, असं डॉक्टरांनी सांगितलं. डॉ. महेश मेहता, प्रभारी अधीक्षक, माणगाव उपजिल्हा रुग्णालय0
0
Report
रत्नागिरी के दो आरोपी ऑनलाइन बैंकिंग धोखाधड़ी में मुंबई से गिरफ्तार
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. Crime ऑनलाईन फसवणूक.. दोघे मुंबईत गजाआड.. जयगडमधील प्रकार.. लाखांचा अपहार.. अँकर ऑनलाइन बँकिंग द्वारे तब्बल 4 लाख 82 हजारांची फसवणूक करणाऱ्या दोघांच्या रत्नागिरी पोलिसांनी मुंबईतील दहिसर येथून मुस्क्या आवळल्या..देवगड पोलीस स्थानक हद्दीतील साखरी बौध्दवाडी येथील एकाच्या बँक खात्यातून या भामट्यांनी दिनांक 17 फेब्रुवारी ते 9 मार्च 2026 या कालावधीत ही रक्कम काढून घेतली होती..0
0
Report
अक्षय तृतीया पर Ahirani गीत और पुरणपोळी की परंपरा के साथ ग्रामीण महाराष्ट्र में जश्न
Nashik, Maharashtra:अक्षय तृतीया- अहिराणी गीत, पुरणपोळी स्पेशल बातमी। अक्षय तृतीया मतलब आखाजी हा खरा तर माहेर वाशिनींचा सण है। ग्रामीण भागात आजही आखाजी सणाची जुनी परंपरा टिकून आहे। सासरवाशिनी सासर वरून आखाजीला माहेरी येतात, झोका खेळतात, रात्री पुरणपोळी बनवत अहिराणी गाणी म्हणतात। या सणाला आंब्या सोबत मांडा म्हणजेच पुरणपोळिलादेखील खूप महत्व। साडेतीन मुहूर्तापैकी एक अक्षय तृतीया हा सण महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात उत्साहात पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो… घरातील जे व्यक्ती नोकरी व्यवसाय निमित्त बाहेरगावी असतात तेही या दिवशी सणासाठी घरी येत असतात. तसेच सासर वाशिन महिला या सणा निमित्त माहेरी येतात. जुन्या परंपरेनुसार ग्रामीण भागात आजही आखाजी सणाची जुनी परंपरा टिकून असून महिला आपल्या माहेरी येत झोका खेळत, रात्रभर पुरणपोळी बनवत अहिराणी गीत म्हणत असत। आमरस और पुरणपोळी शिवाय अक्षय तृतीया सण साजरा होत नाही। तेव्हा ग्रामीण भागात कशी पुरणपोळी बनवतात त्याची रेसिपी देखील आपण बघू…0
0
Report
Advertisement
वाशी बाजार में अक्षय तृतीये के मौके पर 94 हजार आंबा पेटियों की भारी आवक
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. वाशी बाजार समितीत 94 हजार आंबा पेट्या दाखल.. अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला बाजार समितीत आंब्याचा घमघमाट.. अन्य राज्यातील आंबाही दाखल,कोकणातील हापूसचा वाटा मोठा.. अक्षय तृतीयेचा मुहूर्त गाठण्यासाठी कोकणासह राज्यभरातून तब्बल 94 हजार आंबा पेट्या वाशी बाजारात दाखल झाल्यात.. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी या पेटांमुळे अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला वाशी बाजारपेठेत आंब्याचा दरवळ सुटला आहे.. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंबा खाण्याची प्रथा आजही मोठ्या प्रमाणात पाळली जाते..त्यामुळे या दिवसासाठी आंब्याला मागणी वाढते.. सध्या आंबा पेटीला पंधराशे ते चार हजार रुपये दर आहे..गतवर्षीच्या तुलनेत आंबा कमी आहे त्यामुळे यावर्षी दर टिकून आहे..0
0
Report
महाराष्ट्र बाल अधिकार आयोग ने सभी जिलों में स्वतंत्र बाल पुलिस इकाइयां स्थापित निर्देश दिए
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. बाल पोलीस पथकासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात विशेष स्वतंत्र कक्ष. बालकांच्या सुरक्षेसाठी राज्य बाल हक्क आयोगाचे राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना निर्देश. राज्यातील बालकांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि गुंतागुंतीची कायदेशीर प्रक्रिया पाहता, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातर्गत आता स्वतंत्र विशेष बाल पोलीस पथक कक्ष स्थापन करण्याचे निर्देश आयोगाचे सचिव पंकज देवरे यांनी राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे दिले आहे. हा कक्ष बालस्नेही स्वरूपाचा असावा असेही म्हटले आहे.0
0
Report
माणगाव-इंदापूर बायपास में कोकण रेल्वे अड़चन, डेडलाइन फिर से टलने की संभावना
Chendhare, Maharashtra:माणगाव आणि इंदापूर बायपास कामात कोकण रेल्वेचा अडथळा. सिग्नल यंत्रणा आणि विद्युत खांब हलविण्याच्या कामात दिरंगाई. गडकरी यांनी दिलेली डेडलाइन पुन्हा हुकणार. सुनील तटकरे यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली.0
0
Report
Advertisement
आदिवासी आश्रम शाळाओं के पहले दिन किताब-गणवेश और एएनएम परिचर सेवा, मंत्री उईके का ऐलान
Yavatmal, Maharashtra:राज्यातील आदिवासी आश्रम शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश, विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एएनएम आणि परिचर देणार असल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी केली आहे. तसेच 500 आश्रम शाळांमध्ये आतापर्यंत 1771 शिक्षक नियुक्त केले असल्याने केवळ घोषणा न करता अंमलबजावणीवर आपला भर असल्याचे मंत्री अशोक उईके यांनी सांगितले. याशिवाय शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी व वर्षातून तीन वेळा स्वतः मंत्री, आदिवासी आमदार, आणि आदिवासी विभागाचे अधिकारी आश्रम शाळांमध्ये मुक्कामी थांबतील असेही मंत्री अशोक उईके यांनी जाहीर केले.0
0
Report
भंडार के जंगल में हाथभट्टी शराब निर्माण पर पुलिस धाड, 1.19 लाख का माल जप्त
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या दावेझरी जंगलात हातभट्टी दारूवर पोलिसांची धाड. 1.19 लाखांचा मुद्देमाल जप्त. भंडाऱ्याच्या आंधळगाव पोलिसांनी दावेझरी लगतच्या जंगल परिसरात मोहफुल हातभट्टी दारू निर्मितीवर धाड टाकून मोठी कारवाई केली. करण्यात आलेल्या या कारवाईत 200 लिटर दारू, 30 लिटर तयार दारू, तसेच 360 किलो सडवा मोहफास असा एकूण 1 लाख 19 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मनोज मरसकोल्हे याला ताब्यात घेण्यात आले असून दिपक धुर्वे व बंडू प्रधान हे आरोपी फरार आहेत. पोलिस निरीक्षक नितीन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.0
0
Report
अमेरिका-ईरान-इजरायल युद्ध से भारत में रसायनिक खाद की कीमतें बढ़ीं
Shirur, Maharashtra:अमेरिका इराण इजराइल यांच्यात सुरू असलेल्या महायुद्धाचा परिणाम भारतातील रासायनिक खतांच्या आयातीवर झाला असून खतांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्याात तर ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण होण्याचा हि धोका वाढलाय, तर दुसरीकडे शेतीमालाचे बाजारभाव गडगडल्याने शेतकऱ्यांनी खते बियाणे खरेदीकडे पाठ फिरवल्याने याचाही मोठा फटका विक्रेत्यांना बसतोय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी..0
0
Report
Advertisement
यवतीयाळ के रालेगांव-केळापूर-कलंब: 34 लड़कियों की तस्करी-धर्मांतरण के आरोप, जांच की मांग
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव, केळापूर व कळंब तालुक्यातील 34 मुलींची राज्य व परराज्यात विक्री करून त्यांचे धर्मांतरण केल्या गेल्याचा खळबळजनक आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल चव्हाण यांनी केला आहे. हा प्रकार मानव तस्करी सोबतच बालविवाह आणि लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्मांतरण चा असल्याचाही गंभीर आरोप भाजपा ने केला आहे. या हिंदूविरोधी षडयंत्राचे केंद्रबिंदू राळेगाव असून येथील मजहर कुरेशी नामक व्यक्ती जो अनेक अवैध धंद्यांमध्ये लिप्त आहे, त्याने 200 ते 250 हिंदू मुलींचा छळ केला असूनतो त्याच्या सात ते आठ साथीदारांच्या माध्यमातून लव जिहाद च्या कृत्यामध्ये गुंतला आहे, पुराव्या दाखल याबाबतची एक ऑडिओ क्लिप पोलिसांना दिली असल्याचे तसेच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी देखील प्रकरणाची गंभीरतेनी चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल चव्हाण यांनी सांगितले.0
0
Report
नाशिक: सप्तशृंगी गड़ परिसर में युवक ने आत्महत्या, क्षेत्र में शोक
Nashik, Maharashtra:- कळवण तालुक्यात सप्तशृंगी गड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जयेश शामलाल कुमावत या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वडिलांना संपर्क होत नसल्याने ते नाशिकहून सप्तशृंगी गडावर आले असता, भाड्याच्या घरात मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच कळवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या टोकाच्या निर्णया मागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.0
0
Report
अंबरनाथ में क्रिकेट पिच के कारण राजनीति गरमाई; मनसे का आरोप
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ में क्रिकेट पिच के कारण राजनीति गरमाई; मनसे का आरोप गावदेवी मैदानात सिमेंट काँक्रीटचा पिच - मनसेची तक्रार खेळाडू म्हणतात खेळात राजकारण आणू नका! अंबरनाथमध्ये सध्या क्रिकेटच्या पिचवरून राजकीय वातावरण तापलं आहे. एका क्रिकेट टीमने टुर्नामेंट आयोजित करण्यासाठी गावदेवी मैदानात सिमेंट काँक्रीटचा पिच तयार केला असून मैदानात बांधकामाला परवानगी नसल्याचं म्हणत मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांनी याबाबत पालिकेत तक्रार केलीये. तर खेळाडूंनी मात्र खेळत राजकारण आणू नका, असं आवाहन केलंय. अंबरनाथच्या गावदेवी मैदानात २५ एप्रिल ते ३ मे असे ९ दिवस सायली एक्स क्रीडा मंडळाच्या वतीने क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करण्यात आलीय. या स्पर्धेसाठी पालिकेची परवानगी घेण्यात आली असून यानंतर या मंडळाने गावदेवी मैदानात सिमेंट काँक्रीटचा पिच तयार केलाय. मात्र या पिचला परवानगी नसल्याचं सांगत मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांनी अंबरनाथ पालिकेत तक्रार केलीये. तसंच यामुळे इतर खेळ खेळणारे खेळाडू आणि मैदानात येणाऱ्या नागरिकांना त्रास होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर शिर्के यांच्या या तक्रारीनंतर सायली एक्स मंडळाच्या खेळाडूंनी नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांची भेट घेत आपली बाजू मांडली. याठिकाणी आधीच एक सिमेंटचा पिच होता, त्याचीच दुरुस्ती करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं, तसंच खेळात राजकारण न आणण्याचं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान, सायली एक्स क्रीडा मंडळ हे नगरसेवक संदीप लकडे यांच्याशी संबंधित असून मनसेच्या विरोधाला हे देखील आणखी एक कारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.0
0
Report
Advertisement
