445001
यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.
Yavatmal, Maharashtra:राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कोकण में अणुऊर्जा प्रकल्प पर भाजपा का विरोध, शिवसेना के खिलाफ स्पष्ट टिप्पणी
Ratnagiri, Maharashtra:chiplun - Ratnagiri भास्कर जाधव अनुऊर्जा प्रकल्प भाजप ने कोकणात आतापर्यंत एकही प्रकल्प आणलाय असं एक तरी उदाहरण द्या शिवसैनिकांनो या प्रकल्पाच्या संदर्भात फार काही एक्साइड होऊ नका भाजप असा कोणताही प्रकल्प आणणार नाही कुठं गेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प रिफायनरी प्रकल्पाच्या वेळेस मी आमच्या पक्षातील लोकांना सांगत होतो की नका बोलू या प्रकल्पाच्या संदर्भात कुठे गेला प्रकल्प आले का त्यांनी आम्ही प्रकल्पाच्या बाजूने आणि शिवसेना प्रकल्पाच्या विरोधात म्हणजेच तरुणांच्या नोकरीच्या विरोधात त्यांना चित्र उभं करायचा आहे आणि त्याला तुम्ही बळी पडताय कुठे गेली बारसू ची ग्रीन रिफायनरी अणुऊर्जा प्रकल्प हा 2012-13 ला आला होता त्याचा पुढे काय झालं तुम्ही नवीन कुठला प्रकल्प आणताय त्यामुळे भारतीय जनता पार्टी या कोकणामध्ये लोकांच्या विकासासाठी कुठलाही प्रकल्प आणणार नाही जो प्रकल्प येणारच नाही त्याच्या विरोधात मला काही बोलण्याची आवश्यकता नाही0
0
Report
चंद्रपुर में बाघ हल्ले में चार महिलाएं मारी गईं, मानव-वन्यजीव संघर्ष तेज
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- राज्याच्या इतिहासातली मानव -वन्यजीव संघर्षातील सर्वात मोठी घटना, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही जंगलात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू ,तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांच्या एका गटावर वाघाचा हल्ला, सर्व महिला घरच्या एकमेव कर्त्या असल्याने गावात तणावाची स्थिती, पोलीस व वनपथक हाताळत आहे परिस्थिती व्ही. ओ. १) चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही आणि परिसर आज वाघ हल्ल्याच्या घटनेने हादरला. जंगलात तेंदू पाने तोडण्यासाठी गेलेल्या कवडूबाई दादाजी मोहुर्ले-45, अनुबाई दादाजी मोहुर्ले-46, संगीता संतोष चौधरी-36, सुनीता कौशिक मोहुर्ले-33 गुंजेवाही गावातील रहिवासी या महिलांवर वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे आणि नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेहमीप्रमाणे या महिला जंगलात पाने तोडण्याच्या दैनंदिन कामासाठी गेल्या होत्या. सर्वजण कामात व्यस्त असताना दबा धरून बसेलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या महिलांना सावरण्याची संधीच मिळाली नाही आणि वाघाने चौघींनाही जागीच ठार केले. माहिती मिळताच घटनास्थळी वनविभाग व पोलीस विभागाची चमू दाखल झाली आणि पंचनामा करून मृतदेह सिंदेवाही येथे रुग्णालयात हलविण्यात आले. ही घटना सांगताना सोबतच्या महिला देखील थरथरत होत्या. बाईट १) ,२),३),४),५) प्रत्यक्षदर्शी व्ही. ओ. २) चंद्रपूरसह विदर्भाच्या जंगलांमध्ये तेंदूपाने अर्थात बिडी वळण्यासाठी आवश्यक असलेली पाने तोडण्याचा हंगाम वन विभाग जाहीर करते. यंदा अनेक शासकीय अडथळ्यानंतर हा हंगाम नुकताच जाहीर झाला. ग्रामीण भागातील गरीब घटकातील कुटुंबांना हा संपूर्ण वर्षासाठी पुरणारा आर्थिक स्रोत आहे. म्हणून जिल्ह्यातील खेडेगावातील कुटुंबेच्या कुटुंबे सकाळी चार वाजेपासून नेमलेल्या भागात पाने तोडणीसाठी जातात. ठेकेदार आणि वनखाते मिळून त्यांना यासाठी रक्कम देत असतात. गेली काही वर्षे मानव -वन्यजीव संघर्षाच्या घटना सातत्याने घडत आहेत म्हणूनच वनविभागाने संघर्षग्रस्त भागातील काही क्षेत्रात तेंदूपाने तोडणी थांबवली आहे. मागील वर्षी याच तालुक्यातील मेंढा माल जंगलात अशाच पद्धतीने पाने तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केला होता. यात तीन महिलांचा मृत्यू झाला होता. आजच्या घटनेनंतर वनविभागाने या भागात कॅमेरा ट्रॅप लावून वाघ जेरबंद करण्याच्या हालचाल सुरू केल्या आहेत. बाईट २) कुमार स्वामी, उपवनसंरक्षक, ब्रम्हपुरी व्ही. ओ. ३) मयत झालेल्या महिला आपल्या घरच्या एकमेव कर्त्या होत्या. कौटुंबिक कारणांनी त्यांना आपले घर मोलमजुरी करून चालवावे लागत होते. मयतांमधील सुनिता मोहूर्ले यांना दोन लहान मुली आहेत तर पतीचे आधीच निधन झाले आहे. मयतांमध्ये कवडूबाई आणि अनुबाई या दोन सख्ख्या बहिणी होत्या. आज या गावामध्ये घटनेनंतर आक्रोश आहे. गेल्या काही महिन्यात या भागात वन्यजीव हल्ल्यात 7 मृत्यू झाले आहेत. तर जिल्ह्यात मानव- वन्यजीव संघर्षात 2026 या वर्षात 19 मृत्यू झाले आहेत. या भागात मानव- वन्यजीव संघर्षाची स्थिती भयावह असताना मंत्री- अधिकारी कुणीही येऊन विचारपूस करत नाही. त्यामुळे आता उपाययोजना करा अन्यथा घटना झाल्यास कायदा हातात घेऊ असा थेट इशाराच या भागातील नागरिकांनी दिला आहे बाईट ३) अभिजीत मुप्पीडवार ,स्थानिक नागरिक व्ही. ओ. ४) वाघ वन्यजीवाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्यास मयताच्या वारसांना नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याने एक संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. हे हल्ले आता नित्याची बाब झाली असल्याने ग्रामीण चंद्रपूरच्या ग्रामीण भागातील स्थिती दहशतची झाली आहे. यावर एकत्रित उपाययोजना न केल्यास स्थिती चिंताजनक होत जाणार आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
डॉलर एक सौ पर मोदी सरकार के खिलाफ सावजी का चौंकाने वाला पत्र
Buldhana, Maharashtra:बुलढाणा डॉलर १०० रुपयांवर गेल्यास स्वखर्चाने दिल्लीत मोदींचा सत्कार करणार; माजी राज्यमंत्री सुबोध सावजींचे पंतप्रधानांना उपरोधिक पत्र Anchor : देशातील वाढती महागाई आणि आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची घसरती किंमत यावरून केंद्र सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून नवनवीन क्लृप्त्या शोधल्या जात आहेत. अशातच महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक अजब आणि कमालीचे उपरोधिक पत्र पाठवले आहे. "देशाच्या अर्थव्यवस्थेत ज्या दिवशी एका डॉलरची किंमत १०० रुपये होईल, त्या दिवशी आम्ही दिल्लीत येऊन आपला स्वखर्चाने भव्य सत्कार करू, त्यासाठी आम्हाला वेळ द्यावी," अशी खोचक मागणी सुबोध सावजी यांनी या पत्राद्वारे केली आहे. सुबोध सावजी यांनी आपल्या पत्रात केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर आणि राजकीय भूमिकेवर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. पत्रात म्हटले आहे की, "भारत देशाच्या अर्थव्यवस्थेत ज्या दिवशी एका डॉलरची किंमत १०० रुपये होईल, तो दिवस देशासाठी सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा असेल. आपल्या ‘विश्वगुरू’ नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळ आणि देशातील भाजपशासित राज्यांमुळे भारत देशाला हा बहुमान मिळणे आता निश्चित झाले आहे. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसला हा बहुमान मिळवता आला नाही." पंतप्रधानांना लिहिल्या्या या पत्रात सावजी यांनी भाजपच्या राजकीय अजेंड्यावरही थेट निशाणा साधला आहे. "देशात जातीयवाद, धर्मवाद आणि जुमलेबाजी यावर आपण सरकारे आणत आहात, याचाही देशवासियांना खूप मोठा अभिमान आहे," असा सणसणीत टोला त्यांनी लगावला आहे. एका डॉलरची किंमत १०० रुपये होणे ही गोष्ट गोरगरीब आणि अडाणी जनतेला आभाळाएवढी मोठी वाटण्याची शक्यता असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. "जे काम ७० वर्षात काँग्रेस करू शकली नाही, ते तुमच्या कारकिर्दीत पूर्ण होत आहे. ज्या दिवशी डॉलर शंभर रुपयांवर पोहोचेल, त्या दिवशी आम्ही आपल्या पदाला साजेसा असा जाहीर मानसन्मान आणि बहुमान दिल्लीत येऊन स्वखर्चाने करणार आहोत. त्यासाठी आपण आम्हाला वेळ आणि तारीख द्यावी," अशी मागणी करत सुबोध सावजी यांनी पत्राचा शेवट केला आहे. बाईट : सुबोध सावजी (माजी राज्यमंत्री )0
0
Report
Advertisement
जरांगे से मिलने से पहले लाड को धमकी: पुलिस ने 2 मराठा आरोपी गिरफ्तार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:भाजप नेते प्रसाद लाड मनोज जरांगे च्या भेटीला छत्रपती नगरात आले मात्र भेटीपूर्वी संभाजी नगरात हाय व्होल्टेज ड्रामा रंगला, लाड रात्री मुक्कामी आले , मात्र आल्या आल्या 2 मराठा आंदोलकांनी लाड याना फोन वर धमकी दिल्याचा आरोप लाड यांनी केलाय, आरोपींनी लाड यांच्या फोन वर फोन केला मात्र फोन पीए ने घेतला त्यात दोघांनी अर्वाच भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याचा लाड यांनी आरोप केलाय...यात 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे... जरांजेच्या भेटी पूर्वीच लाड याना धमकीचे कॉल्सजीवे मारण्याची धमकी, अर्वाच भाषेत शिवीगाळ लाड थांबले असलेल्या हॉटेल बाहेरून 2 जण ताब्यात भाजप आमदार प्रसाद लाड ज्या हॉटेल मध्ये थांबले होते तिथं आज असा पोलीस बंदोबस्त होता, 60 वर पोलीस कर्मचारी 4 पोलिस निरीक्षक, 2 एसीपी, एक डीसीपी असा हा फौज फाटा लाड यांच्या सुरक्षे साठी तैनात होता, करण म्हणजे प्रसाद लाड आज जरांगे ची भेट घेणार होते त्यासाठी ते रात्री संभाजी नगर मुक्कमी आले रात्री 10 च्या सुमारास त्यांच्या पीए ला एक कॉल आला आणि त्यात थेट भेटीसाठी आले म्हणून प्रचंड शिवीगाळ आणि धमक्या देण्यात आला असा लाड यांनी आरोप केलाय पोलिसांनी रात्रीतून तपास सुरू करत धमक्या देणाऱ्या 2 जणांना हॉटेल परिसरातूनच ताब्यात घेतले, गणेश उगले, आणि योगेश शेळके धमोरीकर असे दोघांचे नाव आहे दोघेही मराठा आंदोलक आहेत.. याबाबत स्वतः लाड यांनीच माहिती देत हा सगळा प्रकार उघड केला... यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटल्या, शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी या धमकी प्रकारचा निषेध केला तर याबाबत पोलीस योग्य कारवाई करतील असे संजय शिरसाठ म्हणाले... जरांगे यांनी या प्रकरणात मोठ्या माणसांनी आंदोलकांच्या भावना समजून घ्यावे असे आवाहन केले आहे, भावनेच्या भरात लोक चूक करतात त्याना माफ करावे असे जरांगे पाटील म्हणाले... लाड यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली त्यातून फारसा तोडगा सध्या निघाला नाही मात्र भेटी आधी धमकीचा हा हाय व्होल्टेज ड्रामा मात्र चांगलाच रंगला...0
0
Report
ऑनलाइन फॉर्म गड़बड़ी से दहावी विद्यार्थी परेशान: सरकार ने क्या किया?
Dhule, Maharashtra:शिक्षण विभाग दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा सत्वपरीक्षा घेत असल्याचा दिसून येत आहे, अकरावी साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट व वेळ खाणारी असल्यामुळे विद्यार्थी व पालक हैराण झालेले आहेत. ज्या वेबसाईट वर जाऊन अर्ज भरायचा आहे ती तासंतास स्ट्रीम होत असून अनेक ठिकाणी ती संथ गतीने सुरू आहे. कॅप वन व कॅप टू चे अर्ज भरण्यासाठी गव्हर्नमेंट कडनं जी वेबसाईट देण्यात आलेली आहे ती चालत नसल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढलेले आहेत. आधीच शासनाने एक दिवस मुदतवाढ अर्ज भरण्यासाठी दिलेले आहे. मात्र मुदतवाढ देऊनही वेबसाईट चालत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तासंतास एकेक अर्ज भरण्यासाठी लागत असल्यामुळे वेळ वाढवून द्यावा अशी मागणी पालकांनी केली आहे. तसंच शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने व्यवस्था विकसित केली पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे0
0
Report
मराठा आरक्षण, बुलेट यात्रा और मंत्री-आमदार पर जमकर हमला: भास्कर जाधव की सरकार पर निशाना
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. सरकारविरोधात असंतोष वाढतोय; मराठा आरक्षणापासून बुलेट प्रवासापर्यंत भास्कर जाधवांचा हल्लाबोल.. अँकर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकारण,मनोज जरांगे यांचे आंदोलन,मुख्यमंत्र्यांचा बुलेट प्रवास आणि आमदारांच्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या खरेदीवरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले.. मराठा समाजाची फसवणूक सुरू असल्याचा आरोप करत,सरकारविरोधातील असंतोष आता स्पष्टपणे दिसू लागल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे.. On स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक.. कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जागा या मूळतः शिवसेनेच्या आहेत.स्वर्गीय अनंत तरे येथून सातत्याने निवडून येत होते.सुनील तटकरे यांनी आपल्या भावाला आणि मुलाला निवडून आणले, मात्र स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्यासाठी किंवा आपला मतदार वर्ग वाढवण्यासाठी त्यांनी ठोस काम केले नाही. स्वतःच्या कुटुंबातील उमेदवारांव्यतिरिक्त इतर उमेदवारांसाठी त्यांनी विशेष मेहनत घेतलेली दिसत नाही.. On नोज जरांगे यांचे उपोषण.. मनोज जरांगे यांनी नेमका कोणावर विश्वास ठेवला आहे, हे तपासण्याची गरज आहे.मुख्यमंत्री त्यांना खरोखर आरक्षण देतील का, हा प्रश्न आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मत्स्यविकास मंत्र्यांची जुनी क्लिप पाहावी; त्यात मुख्यमंत्री आरक्षण देणार नाहीत, असे वक्तव्य रेकॉर्डवर आहे.मराठा समाजाची आणि मनोज जरांगे यांची फसवणूक करण्याचे काम सुरू आहे.अंतरवली येथील आंदोलन कोणी घडवून आणले,लाठीचार्ज कोणी केला आणि अचानक मनोज जरांगे प्रकाशझोतात कसे आले, याचे उत्तर फडणवीस यांनी द्यावे.. On कॉकरोच पार्टी.. महाराष्ट्रातील आणि देशातील सत्ताधारी पक्षांना आता कोणी पराभूत करू शकणार नाही, असा भ्रम झाला आहे.निवडणुकीनंतर काय परिस्थिती असेल,हे आत्ताच सांगता येणार नाही; मात्र सरकारविरोधातील असंतोष हळूहळू स्पष्टपणे दिसू लागला आहे. On मुख्यमंत्र्यांचा बुलेट प्रवास.. मुख्यमंत्री बुलेटवरून मंत्रालयात आले, मात्र त्या बुलेटचे एव्हरेज किती असते आणि त्यांच्या ताफ्यात किती दुचाकी सहभागी होत्या,हेही पाहायला हवे.एका चारचाकीत चार लोक प्रवास करू शकतात. त्यामुळे हा इंधन बचतीचा प्रयोग नसून उधळपट्टीचाच प्रकार असल्याची टीका त्यांनी केली.. On आमदार-मंत्र्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या खरेदी.. जे आमदार गुवाहाटीला गेले होते,त्यांच्याकडे आधीच दोन ते अडीच कोटी रुपयांच्या गाड्या आहेत.इलेक्ट्रिक गाड्यांच्या खरेदीच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याची ही एक संधी असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला..0
0
Report
Advertisement
विटा में भोंदुओं ने नरबळी-गर्भपात के झांसे से महिला से ठगी, तीन गिरफ्तार
Sangli, Maharashtra:स्लग - शिवाजी महाराज अंगात येत असल्याचे सांगत नरबळी व गर्भपातीच महिलेला सल्ला,तिघा भोंदू विरोधात गुन्हा दाखल.. अँकर - आमच्या अंगात शिवाजी महाराजांसह अनेक थोर महापुरुष येत असल्याचा बनाव करत एका कुटुं बाला नरबाळी व गर्भपातचा सल्ला देऊन शारीरिक व आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या विटा येथे उघडकीस आला आहे.याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यामध्ये तिघा भोंदू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,विटा येथील कडेश्वर धाम आध्यात्मिक संस्थेच्या माध्यमातून तिघा भोंदूंकडून एका महिलेला तिच्या कुटुंबीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी नरबळी व गर्भपात करण्याचा धक्कादायक सल्ला देत शारीरिक व आर्थिक फसवणूक करण्यात आली,तसेच अघोरी उपचाराच्या नावाखाली पीडित महिलेच्या पतीला काठीने मारहाण देखील करण्यात आल्याची तक्रार पीडित महिलेने विटा पोलीस ठाण्यात दिली आहे. फिर्यादीनंतर विटा पोलिसांकडून महेश बाबर,संकेत निकम आणि सुरज उपाध्याय या तिघां विरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाईट - धनंजय फडतरे - पोलीस निरीक्षक - विटा पोलीस ठाणे. बाईट - विवेक भिंगारदिवे - कार्यकर्ता,अंनिस - विटा0
0
Report
गवार भाव सिर्फ 1 रुपये प्रति किलो, किसान ने रस्ते पर गवार फेंककर किया विरोध
Dhule, Maharashtra:गवारला भाव अवघा १ रुपया किलो मिळाल्याने, संतप्त शेतकऱ्याने दीाड क्विंटल गवार रस्त्यावर फेकल्यावंगी घटना धुळे जिल्ह्यात समोर आली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री येथील शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असून साक्री तालुक्यात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. काशीपूर येथील शेतकरी साहेबराव कारंडे यांनी गवारला अवघा १ रुपया किलो दर मिळत असल्याच्या संतापातून तब्बल दीड क्विंटल गवार थेट रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला. कारंडे हे आपला गवार विक्रीसाठी पेरेजपूर फाट्यावर घेऊन गेले होते. मात्र व्यापाऱ्याने मालाला १०० रुपये क्विंटल असा दर सांगितल्याने ते संतप्त झाले. गवार लागवडीसाठी ६०० रुपये किलोचे बियाणे, महागडी खते, औषधे तसेच मजुरीवर मोठा खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. उत्पादनासाठी हजारो रुपये खर्च करूनही बाजारात खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत गवारचे दर अचानक घसरल्याने व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शशप) पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी संताप व्यक्त करत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.0
0
Report
अमरावती में किसान संगठने ने चॉकलेट बाँटकर केंद्र सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया
Amravati, Maharashtra:अमरावतीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मेलोडी चॉकलेट वाटप; केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अँकर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटली दौऱ्यात तेथील पंतप्रधानांना चॉकलेट भेट दिल्याच्या मुद्द्यावरून आता अमरावतीत राजकीय वातावरण तापू लागले आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आज कपिल पडघान यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. राज्यात शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मशागतीसाठी लागणारे डिझेल-पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहे शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैसे नाही तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान परदेश दौऱ्यावर लाखो रुपये खर्च करून चॉकलेट वाटत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी केली. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे हे प्रकार असल्याचाही कपिल पडघान यांनी म्हटला आहे.0
0
Report
Advertisement
बीड़ के बशीरगंज में वृद्ध महिला के सब्ज़ी लूटते नगर निगम कर्मी: वीडियो वायरल
Beed, Maharashtra:बीड़ शहरातील बशीरगंज परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्यामध्ये कडेला बसून भाजीपाला विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका वृद्ध आजीबाईंंचा भाजीपाला नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी थेट कचऱ्याच्या वाहनात भरल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये वृद्ध महिला हात जोडून विनवणी करताना दिसत आहेत. माझा माल घेऊ नका, माझं पोट यावर चालतं, अशी आर्त हाक त्या देत होत्या. मात्र कर्मचाऱ्यांनी कोणतीही दया न दाखवता तिचा भाजीपाला वाहनात टाकल्याचे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले. या घटनेदरम्यान आजीबाईंना अश्रू अनावर झाले होते. आयुष्याच्या संध्याकाळी दोन वेळच्या भाकरीसाठी रस्त्यावर भाजी विकणाऱ्या या महिलेची झालेली ही अवहेलना नागरिकांच्या मनाला चटका लावणारी ठरली आहे. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नगरपरिषदेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.0
0
Report
वाशिम में पुलिस ने मंगरुळपीर में 38.304 किलो गांजा गिरफ्तार, लाखों का माल जब्त
Washim, Maharashtra:वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगरूळपीर शहरात कारवाई करत एका व्यक्तीकडून ३८ किलो ३०४ ग्रॅम गांजा जप्त केला.या कारवाईत १९ लाख १५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गुप्त माहितीच्या वरून पोलिसांनी कारवाई करण्यात आली असून,यावेळी शेख राजिक ऊर्फ सोनू शेख मोहम्मद याला ताब्यात घेण्यात आले आहे.आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये मंगरूळपीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
करवीर तालुक्यात वडगाव ग्रामस्थों ने पंचायत समिति कार्यालय सामने मोर्चा निकाला और ताला जड़ दिया
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरच्या करवीर तालुक्यातील दऱ्याचं वडगाव ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढून टाळे ठोक आंदोलन केले. रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याच्या निषेधार्थ दऱ्याचे वडगाव ग्रामस्थ आक्रमक झाले. गेल्या दीड वर्षापासून रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांना मंजुरी मिळत नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत करवीर पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी रोजगार हमी योजनेच्या अधिकाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयाला चक्क टाळे ठोक आंदोलन केलं.0
0
Report
Advertisement
नाले की सफाई में कमी: शिवसेना ठाकरे गुट आक्रामक, पानी आने की आशंका
Navi Mumbai, Maharashtra:नालेसफाईच्या अपूर्ण कामा विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक. नाल्यांमधील गाळ काढलाच गेला नसल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप. कार्यकर्ते उतरले थेट नाल्यात. गुडघाभर गाळ दाखवत महापालिकेच्या नाले सफाईची केली पोलखोल. नालेसफाई झाली नसल्याने पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता. तात्काळ गाळ काढा अन्यथा हाच गाळ अधिकाऱ्यांना देणार. Byte -: नंदा काटे (माजी नगरसेविका)0
0
Report
खरीप हंगाम में डीज़ल दर बढ़ी, ट्रैक्टर भाड़े से किसान परेशान, बैलजोडी लौट रहे
Akola, Maharashtra:अकोला जिले में किसान पेराईपूर्व मशाति़ती के काम में व्यस्त हैं। डीज़ेल दरों में लगातार वृद्धि के कारण ट्रैक्टर भाड़े में भारी बढ़ोतरी हुई है, जिससे खेती के खर्च बढ़ रहे हैं और सामान्य किसान आर्थिक कठिनाई में हैं। बढ़ते खर्च के कारण कई किसान अब पारंपरिक बैलगाड़ी के ज़रिये खेती करने लगे हैं। खरीप हंगाम के सामने ईंधन दर वृद्धि सीधे खेती व्यवस्था पर पड़ रहा है। खरीप हंगाम के लिए किसान अभीखरनी और पेराईपूर्व तैयारी कर रहे हैं। पहले बैलगाड़ियों से ज़्यादा काम करने के चलते आधुनिक यंत्रों को अपनाया गया, पर डीज़ेल की बढ़ती कीमतों से ट्रैक्टर मालिकों ने प्रति एकड़ मशागात के दाम बढ़ाए हैं। बीज, उर्वरक और दवाओं की महंगाई के कारण किसान मुश्किल में हैं और कुछ किसान समय पर मशागात पूरी करने में कठिनाई महसूस कर रहे हैं। कुछ किसान मजबूरी में बैलगाड़ी के तरीके अपनाने लगे हैं。 दूसरी ओर शासन द्वारा किसानों को अवरोधन योजनाओं पर चल रही हैं, पर बढ़ती ईंधन दरों से किसान परेशान हैं। ट्रैक्टर भाड़े में बढ़ोतरी छोटे और मध्यम किसानों के लिए आर्थिक गणित बिगाड़ रही है, जिससे कई किसान कम खर्च वाले विकल्प की तलाश कर पारंपरिक बैलगाड़ी की तरफ लौट रहे हैं। इससे ट्रैक्टर चालकों और मालिकों पर असर पड़ रहा है और काम घटने से ट्रैक्टर आमने-सामने खड़े हो रहे हैं। ट्रैक्टर ऋण भुगतान, देखभाल खर्च और बढ़ते ईंधन दरें किसानों को भारी आर्थिक दबाव में डाल रहे हैं। खरीप हंगाम के प्रकाश में डीज़ल दरों की बढ़ोतरी खेती पर सीधा असर डाल रही है और ट्रैक्टर के बढ़े हुए भाड़े किसानों के लिए बड़ी चिंता बन रहे हैं। आधुनिक तकनीक के उपलब्ध होने के बावजूद बढ़ती ईंधन दरों के कारण किसान फिर पारंपरिक पद्धतियों की ओर लौट रहे हैं। इसलिए कृषि के लिए ईंधन दर में सब्सिडी या वैकल्पिक उपायों की मांग ग्रामीण क्षेत्र से तेज हो रही है।0
0
Report
रोहित पवार ने देहू के मुख्य मंदिर में अचानक भेट दी, राजनीति में गूंजे संकेत
Varsoli, Maharashtra:Headline : आमदार रोहित पवार यांनी दिली देहूच्या मुख्य मंदिरात अचानक भेट संत तुकोबारायांच्या पवित्र देहूनगरीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देहू संस्थानला भेट देत संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. यावेळी देहू संस्थानच्या वतीने काळ्या पाषाणातील संत तुकाराम महाराजांची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. अध्यात्म, परंपरा आणि राजकारणाचा सुंदर संगम यावेळी पाहायला मिळाला. “कॉक्रोच जनता पार्टी 2029 च्या निवडणुकीत प्रस्थापितांना भारी पडेल का?” असा प्रश्न विचारला असता रोहित पवार यांनी भाष्य केलं. “कॉक्रोच जनता पार्टी ही प्रत्यक्षात कुठली राजकीय पार्टी नसून सोशल मीडियावर निर्माण झालेली लोकांच्या भावना व्यक्त करणारी एक लाट आहे. पण त्या मागे सामान्य माणसाच्या मनात साचलेला रोष, खदखद आणि असंतोष आहे,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. “आज विरोधी पक्षांनी जर लोकांच्या भावना समजून घेतल्या नाहीत, रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही, तर लोकांचा हा संताप कुठल्या ना कुठल्या स्वरूपात उफाळून येणारच. सरकारच्या विरोधात न घाबरता लढण्याची भूमिका घ्यावी लागेल,” असा थेट इशाराच रोहित पवार यांनी दिलाय.0
0
Report
Advertisement
