icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मुंबई-गोवा महामार्ग पर क्लिष्ट ट्रैफिक, संगमेश्वर पुल के अधूरे काम से दो किमी लम्बी कतारें

Ratnagiri, Maharashtra:संगमेश्वर - रत्नागिरी.. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा.. महामार्ग रुंदीकरणाच्या अर्धवट कामांमुळे वाहतुकीचा खोळंबा.. मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर शास्त्री नदीवरील पुलाच्या अर्धवट स्थितीत असलेल्या कामांमुळे महामार्गावर दोन किलोमीटरच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत.. त्यात पडलेल्या पावसामुळे रस्ता चिखलमय झाल्यामुळे या चिखलातूनच वाहनांना प्रवास करावा लागतोय.. अगदी संथ गतीने या ठिकाणी वाहतूक सध्या सुरू आहे.. गेल्या अर्धा तासापासून ही वाहतुक ठप्प झाली आहे..
0
0
Report

राज ठाकरे-मनोज जरांगे पर सदावर्ते का हमला: ज्वलनशील पदार्थ पर खुली बहस

Jalna, Maharashtra:जालना :ऑईल फेकीनंतर सदावर्ते यांची प्रतिक्रिया.. अँड गुणरत्न सदावर्ते यांची राज ठाकरेंसह मनोज जरांगेंवर टिका राज ठाकरे तुला सांगतो आजचा प्रकार तुझ्या माणसांनी माझ्या गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला, त्यांचा जाळण्याचा उद्देश होता का? जालन्यामध्ये झालेल्या शाईफेक प्रकरणावरून सदावर्ते यांचा राज ठाकरे आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप राज ठाकरे मी तुला आव्हान करतो की तू सांग मी म्हणशील तिथे येतो वैचारिक चर्चा करू मी डंकी की चोट पर हेच म्हणेल की राज ठाकरे वैचारिक लढण्याची कुवत संपली का रे बाबा ... मनोज जरांगे वैचारिक लढण्याची कुवत संपली का रे बाबा. ... यांचे जे काही संवेदनशील आणि अप-परवृत्तिचे विचार आहे... लोकशाहीच्या विचारणं जी माणसं प्रेरित असतात ती अशा लोकांसमोर वाकत नसतात. कारण आम्ही वाळू वाले नाही आणि टन टन टोलवाले सुद्धा नाही ...असं म्हणत शाही फेक केल्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली .. आज जो काही प्रकार घडला आहे तो ज्वलनशील पदार्थ आहे, तो ऑइल आहे, त्यांचा जाळायचा उद्देश होता का यामध्ये मनोज दरांगे आणि राज ठाकरे यांच्या अप परावर्त विचाराचे आणि अर्ध्या हळकुंडाने धुतलेले, पावशेरी पिलेले होते का राज ठाकरे यांचे दूध खुळे विचार आणि मनोज जरांगे यांचे कुचे विचार या दोन्ही विचारांसमोर आम्ही थांबणारे आणि थकणारे नाहीत. बाईट - ॲड. गुणरत्न सदावर्ते
0
0
Report

नाशिक में कार दुर्घटना: सातवी कक्षा के ओंकार की दुखद मौत, परिजन उग्र

Shirdi, Maharashtra:कारच्या धडकेत 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू... मृतदेह घेऊन नातेवाईक थेट राहाता पोलिस ठाण्यात... संतप्त नातेवाईक मोठ्या संख्येने थेट पोलिस ठाण्यात घुसले... गुरुवारी रात्री सातवीत शिकणाऱ्या ओंकार दिपक गायकवाड याला कारने उडवले... नाशिक येथे उपचारादरम्यान आज ओंकारचा दुर्दैवी मृत्यू... घटनेतील कार पोलिसांच्या ताब्यात, आरोपी मात्र फरार... आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईक आणि परिसरातील नागरिक आक्रमक... नातेवाईकांचा राहाता पोलिस ठाण्यासमोर ठिय्या... राहता पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सहकार्य करत नसल्याने मयत मुलाचे नातेवाईक संतप्त... मयत ओंकारच्या आईचा आक्रोश...
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में तेज़ तूफान से घर-आम बागान भारी नुकसान

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी रत्नागिरीत पावसाचं तांडव!..वादळी वाऱ्याने घरांची कौले-छपरे उडाली.. हातातोंडाशी आलेला आंबा हिरावला!.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यात निसर्गाचा कोप पाहायला मिळतोय,जिथे सलग तिसऱ्या दिवशी पावसाने अक्षरशः दाणादाण उडवून दिली आहे.. आज दुपार्नी विजांच्या कडकडाटासह आलेल्या वादळी वाऱ्याने रत्नागिरीला झोडपून काढले,ज्यामध्ये अनेक घरांची कौले आणि पत्रा शेड पत्त्यासारखी उडून गेली आहेत.. विशेषतः मंडणगड तालुक्यात पावसाचे रौद्ररूप पाहायला मिळाले असून,झाडे कोसळल्याने घरांचे आणि गोठ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.. रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली असून प्रशासन युद्धपातळीवर मार्ग मोकळा करत आहे.. दुसरीकडे,या पावसाने कोकणच्या राजाला म्हणजेच आंबा बागायतदारांना रडकुंडीला आणले आहे.. मे महिन्याच्या ऐन हंगामात काढणीला आलेला आंबा आणि काजू गळून पडल्याने बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.. महामार्गावरील चिखलामुळे प्रवाशांचे हाल होत असले तरी,या वादळी पावसाने जिल्ह्यात मोठी वित्तहानी केली आहे. वाढत्या उष्म्यापासून दिलासा मिळाला असला तरी, डोळ्यादेखत घरांची झालेली पडझड आणि पिकांचे नुकसान पाहून जिल्हावासीय सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत..
0
0
Report
Advertisement

यवतमाळ में Western Coalfields खदान भूस्खलन, डंपर दबे, चालक बेचे

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ च्या वणी येथे वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या उकणी खुल्या कोळसा खाणीत भूस्खलन होऊन दोन डंपर गाळयुक्त मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले. ही तर तेवढीच भयावह दुर्घटना मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीत झाली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने दोन्ही चालकांनी प्रसंगावधान राखत डंपरमधून बाहेर पडण्यात यश मिळविले आहे. या ठिकाणी मशीनद्वारे मातीचे उत्खनन करून कोळसा काढला जातो. जवळपास १०० मीटरपर्यंत माती हटविल्यानंतर कोळशाचा थर मिळतो. उत्खननामुळे खाणीत प्रचंड खोल खड्डे तयार झाले आहेत.पावसाळ्यात या खाणीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. हे पाणी पंपाद्वारे बाहेर काढून खाणीच्या वर तयार करण्यात आलेल्या शिल्ड मध्ये साठविले जाते. त्याच पाण्याखालील कोळसा काढण्याचे काम सुरू असताना अचानक शिल्डमधून गाळयुक्त पाणी आणि मातीचा प्रचंड लोंढा खाली आला. त्याखाली दोन डंपर पूर्णपणे गाडले गेले. या घटनेनंतर वेकोली प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
0
0
Report

गडचिरोली के कोरची में रानडुक्कर हमला: 3 ग्रामीण घायल, एक महिला की हालत गंभीर

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिले के कोरची तालुक्यात जंगल परिसर में तेंदूपत्ता तोड़ने के लिए गए मजदूरों पर एक रानडुक्कर ने अचानक हमला कर दिया। इस हमले में तीन ग्रामीण घायल हो गए, जिनमें एक महिला की हालत गंभीर है और उसे आगे के उपचार के लिए गडचिरोली जिला सामान्य अस्पताल में भर्ती किया गया है। बोडेना गाँव से लगभग तीन किलोमीटर दूर जंगल क्षेत्र में तेंदूपत्ता तोड़ने का काम चल रहा था। इस हमले में सु. पुष्पा कालिदास भैसारे (45, कोरची) को सीने पर गंभीर चोट आई है; नंदकिशोर किशनलाल बोरकर (54, भीमपुर) के बाएं हाथ, जांघ और पेट में चोटें आईं; कृष्णा बुढ़राम पडोटी (61, कोरची) के दाहिने जांघ में चोट आई है।
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर में मौसम बदला, आकाश भीगा, दोपहर में बारिश ने राहत दी

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपुरात अचानक बदलला वातावरणाचा नूर ,आकाश ढगाळलेले होत बरसल्या जोरदार पाऊस सरी ( single file sent on 2C) टायटल:--- चंद्रपूरात अचानक वातावरणाचा नूर बदलला. भर दुपारी आकाश ढगाळलेले होत जोरदार पाऊस सरी बरसल्या. प्रचंड उन्हाच्या काहीलीने त्रस्त झालेल्या चंद्रपूरकरांना दिलासा मिळाला. टपोऱ्या थेंबांचं नर्तन सुमारे 15 मिनिटे सुरू होतं. जिल्ह्यातील काही भागात गेले दोन दिवस हलक्या सरी कोसळत होत्या. मात्र आज चंद्रपूर शहरात जोरदार पाऊस सरींनी दुपार आल्हाददायक केली. मे महिन्याच्या प्रारंभी आलेल्या सुखकर सरींनी नागरिक आनंदले.
0
0
Report

गर्मी में कबूतर बचाने पर अकोला पुलिस की इंसानियत मिसाल

Akola, Maharashtra:अकोल्यातील प्रचंड उष्म्यामुळे नागरिकांसह पशुपक्ष्यांचेही हाल होत आहेत. अशातच अकोला पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. अशोक वाटिका चौक परिसरात तहानेने व्याकुळ झालेले एक कबूतर अचानक जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या चमुच्या वाहनासमोर येऊन पडले. प्रसंगावधान राखत पोलिसांनी तात्काळ वाहन थांबवले आणि कबूतराला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.सुमारे पाच ते दहा मिनिटांच्या प्रयत्नांनंतर कबूतराला गाडीच्या चाकाखालून सुखरूप बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर त्या कबूतराला पाणी पाजून काही वेळ विश्रांती देण्यात आली. प्रकृती सुधारल्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. उन्हाच्या तीव्र झळांमध्ये एका छोट्याशा जीवासाठी पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि माणुसकी नागरिकांच्या मनाला स्पर्शून गेली असून या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में भारी बारिश, आम-आयात और काजू बागायतदारों पर बड़ा असर

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीला पावसाने झोडपले.. आंबा-काजू बागायतदारांचे कंबरडे मोडले!.. कोकणात पावसाने रौद्र रूप धारण केले असून रत्नागिरी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वरुणराजाने जोरदार बॅटिंग केली आहे. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले असून, विशेषतः हापूस आणि काजू बागायतदारांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे... रत्नागिरी शहर, चिपळूण, खेड आणि दापोली या पट्ट्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग तिसऱ्या दिवशी आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे... सर्वात मोठा फटका फळबागांना बसला आहे. आंबा आणि काजू आता काढणीच्या शेवटच्या टप्प्यात असतानाच निसर्गाचा हा कोप पाहायला मिळाला.. पावसाचा जोर इतका आहे की, मुंबई-गोवा महामार्गावरील दृश्यमानता कमी झाली असून, महामार्गावर वाहतूक अत्यंत संत गतीने सुरू आहे. सखल भागात पाणी साचल्याने स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे...
0
0
Report

रोहित पवार बोले: सातारा बालिका हत्या का न्याय अभी नहीं, कानून सशक्त करे

Satara, Maharashtra:सातारा - ऑक्टोबर २०२५ मध्ये सातारा जिल्ह्यातील सासपडे येथे अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली होती .सहा महिने होऊनही न्याय मिळालेला नाही .या प्रकरणाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी या पिडीत कुटुंबीयांची भेट घेतली यावेळी या कुटुंबाला न्याय कधी मिळणार असा सवाल करत शक्ती कायदा महाराष्ट्रात आणलाच पाहिजे या साठी प्रयत्न करणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे. विओ 2- कीर्तनकार भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांच्यावर शाई फेक केल्या केल्याच्या प्रकरणावर बोलताना रोहित पवार चांगलेच भडकले आहेत. भंडारे हा भोंदू कीर्तनकार आहे. त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. वारकरी संप्रदाय हा नेहमी शांत आणि संयमी असतात आणि कोणतीही गोष्ट समजून सांगतात मात्र हा भोंदू हा शिव्या देतो. वारकरी संप्रदायांनी अशा भोंदू बाबांना का स्थान द्यावं असा सवाल देखील उपस्थित केला आहे. बागेश्वर महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता त्यावेळी हा भोंदू भंडारे दाढीचे केस उपटत बसला होता का? असा सवाल रोहित पवार यांनी विचारलाय. ही भोंदूगिरी संपली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे असं देखील रोहित पवार म्हणाले आहेत त्याचशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी..
0
0
Report

अकोला में मध्यरात्रि बारिश से तापमान में भारी गिरावट, न्यूनतम 22°C तक

Akola, Maharashtra:Anchor : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अकोल्यातही मध्यरात्री झालेल्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल जाणवला. विशेष म्हणजे शहराच्या किमान तापमानात तब्बल ५ अंश सेल्सिअसने घट झाली आहे.अकोल्यात याआधी १९ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे अधिकतम तापमानात घट झाली होती, मात्र किमान तापमानात फारसा बदल झाला नव्हता. त्या काळात शहराचे किमान तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. मात्र काल मध्यरात्री बरसलेल्या पावसामुळे हवामानात अचानक बदल झाला असून किमान तापमान २७.५ अंशांवरून थेट २२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.तापमानात झालेल्या या घसरणीमुळे आज शहरात गारव्याचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, किमान तापमानात घट झाल्यानंतर आता अधिकतम तापमानातही घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top