445001
यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.
Yavatmal, Maharashtra:राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नागपूर पुलिस अधिकारी शिवाजी ननवरे ने धौलागीरी शिखर फतह किया
Nagpur, Maharashtra:नागपूर शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांनी सर केला धौलागिरी शिखर जगातील सातव्या क्रमांकाचे उंच आणि अत्यंत कठीण समजले जाणारे नेपाळमधील धौलागिरी शिखर यशस्वीरीत्या शिवाजी ननवरे यांनी सर केले आहे या शिखराची उंची 8,167 मीटर इतकी असून अशी कामगिरी करणारे महाराष्ट्र पोलीस दलातून ते पहिलेच अधिकारी ठरले आहेत शिवाजी ननवरे यांनी यापूर्वी जगातील अनेक उंच आणि आव्हात्मक शिखरे सर केली आहेत यात माउंट एवरेस्ट, माउंट लोहात्से, माउंट मकालू आणि माउंट मनास्लो या शिखरांचा समावेश आहे0
0
Report
वाशीम में सिंचन की कमी से फसलों का क्षेत्र घटा, ज्वारी की बुवाई बढ़ी
Washim, Maharashtra:यंदा सिंचनाच्या टंचाईमुळे उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात घट झाली आहे. वाढते तापमान आणि रब्बी हंगामातील जादा पाण्याच्या वापरामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला.या परिस्थितीत उडीद, मका, बाजरी आणि सोयाबीन पिकांचे क्षेत्र कमी झाले. मात्र ज्वारीच्या पिकाने चांगली वाढ नोंदवली आहे. सरासरी ६३२ हेक्टरच्या तुलनेत यंदा ९७२ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली असून सुमारे ३४० हेक्टरने वाढ झाली आहे.कमी पाण्यात येणाऱ्या ज्वारी आणि तिळाकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.0
0
Report
वन्यप्राणी रात में पानी के लिए निकलते, 11 मचान से वॉटर होल सेंसेस
Washim, Maharashtra:वाशीम-अकोला सीमेवरील काटेपूर्णा अभयारण्य येथे १ मे रोजी होणाऱ्या वॉटर होल सेन्सससाठी वनविभागाने तयारी पूर्ण केली आहे. बौद्ध पौर्णिमेच्या रात्री होणाऱ्या या उपक्रमासाठी कोअर व बफर क्षेत्रात एकूण ११ मचान उभारण्यात आले आहेत. उन्हाळ्यात नैसर्गिक पाणवठे आटत असल्याने वन्यप्राणी रात्री पाण्यासाठी बाहेर पडतात. त्यामुळे अचूक नोंद घेण्यासाठी मचानांजवळ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. दरवर्षी होणाऱ्या या सेन्ससमधून वन्यप्राण्यांची संख्या, वर्तन व हालचालींचा अभ्यास केला जातो, ज्यामुळे संवर्धनासाठी महत्त्वाचे नियोजन करता येते.0
0
Report
Advertisement
सातारा के कुरकुंभ मंदिर से नया दस्तावेज: शिवाजी महाराज ने ध्वज मंडप बनवाया
Satara, Maharashtra:सातारा: पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील मौजे कुरकुंभ येथील श्री फिरंगाई माता देवस्थानाबाबत एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज उजेडात आला आहे. छत्रपती राजाराम महाराज यांनी १६९८ मध्ये दिलेले एक आज्ञापत्र नुकतेच मोडी लिपीत वाचण्यात आले असून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः या मंदिरात 'ध्वज मंडप' बांधल्याचा आणि देवस्थानच्या नंदादीपाची व्यवस्था केल्याचा स्पष्ट उल्लेख आढळला आहे. या शोधामुळे शिवकाळातील या जागृत देवस्थानाच्या महतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. कुरकुंभ येथील देवीचे पुजारी मच्छिंद्र भगत यांनी पुणे पुरालेखागारातून या पत्राची प्रत प्राप्त केली होती. या पत्रातील गुढ आणि अप्रकाशित माहिती मोडी लिपी वाचक आणि इतिहास अभ्यासक कांचन कोठावळे यांनी प्रकाशात आणली आहे. यांच्या मोडी लिपी वाचक आणि इतिहास अभ्यासक कांचन कोठावळे यांनी सातारच्या राजघराण्यातील मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. आणि या विषयाची पूर्ण माहिती देऊन एकदा या मंदिराला भेट द्यावी अशी विनंती यावेळी त्यांनी केली आहे.0
0
Report
सोलापूर में रिकॉर्ड तापमान: पारा 44°C के करीब, भीषण गर्मी से लोगों की परेशानी
Solapur, Maharashtra:सोलापुरात तापमानाचा पारा 44 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचला; सोमवारी 43.9 °C नोंद झाली. यंदाच्या मोसमातील सोलापूरात सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. सोलापूरकरांना पारा 43.9 अंशावर पोहोचला. सकाळी 8 वाजल्यापासून उन्हाच्या झळा जाणवू लागल्या. प्रशासनाच्या सूचना केवळ गरज असेल तेव्हाच बाहेर पडणे. हवामान विभागाचा अंदाज 5 मेपर्यंत अशी स्थिती राहणार.0
0
Report
कराड-चिपळूण हाईवे पर ST बस ने रिक्षा को टक्कर दी, 3 घायल
Satara, Maharashtra:कराड सातारा:- कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण माजलगाव या एसटी बसने अपे रिक्षाला कराड आरटीओ ऑफिस जवळ जोराची धडक दिली है. एसटी बसने पाठीमागून धडक दिल्याने अपे रिक्षा एका खड्यात पलटी झाली असून चालक हनुमंत सुर्वे यांच्यासह तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. एसटीच्या धडकेत अपे रिक्षा 20 ते 25 फूट लांब फेकली गेली असून एका खड्ड्यात पलटी झाले आहे. अपघातानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जखमींना उपचारासाठी कराडला हलवले आहे.0
0
Report
Advertisement
रांजणगाव में पानी टैंकर चोरी: CCTV फुटेज से बदमाश गिरफ्तार
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे पाण्याचा टँकर चोरी प्रकरण उघड झालंय, शेतकरी अशोक भुजबळ यांच्या घरासमोरून पाण्याचा टँकर चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. चोरट्याने अत्यंत चलाखीने ही चोरी केली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. घटनेची माहिती मिळताच रांजणगाव पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत अखेर त्यांना अटक करण्यात यश मिळवले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, वाढत्या चोरीच्या घटनांवर पोलिसांनी वचक बसवला आहे. पुढील तपास रांजणगाव पोलीस करत आहेत.0
0
Report
नागपुर में पिछले 10 दिनों में 13 अज्ञात लोगों की प्राकृतिक मौत, गर्मी से संकेत
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूरात गेल्या 10 दिवसात 13 अनोळखी व्यक्तींचा नैसर्गिक मृत्यू झालाय -- एकीकडे रणरणत्या उष्णतेमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे... सर्वसामान्य उष्णतेच्या तडाख्यात होरपळत आहेत... त्यामुळे या नैसर्गिक मृत्यूकडे उष्माघाताचा संशय व्यक्त केला जात आहे मात्र ‘डेथ ऑडिट’नंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे... - ૪૧ ते ૪५ अंश सेल्सिअस तापमानामुळे शहर होरपळत आहे . दुपारीच नव्हे तर रात्रीही उष्ण झळा जाणवत आहेत... --दरम्यान या मृत व्यक्तींमधील अनेक जण बेघर असून काही जणांना आरोग्याच्या समस्या असल्याचीही शक्यता आहे - प्रशासनाचा इशारा १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळा, भरपूर पाणी प्या असे आवाहन केले जात आहे... तर मनपाकडून बेघरांसाठी निवारा केंद्र आणि शीतगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे...0
0
Report
हिंगोली में येलो अलर्ट: दोपहर 12-3 बजे बाहर न निकलें, गर्मी से बचाव निर्देश
Hingoli, Maharashtra:हिंगोली जिल्ह्याला आज प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी येलो अलर्ट जाहीर केला आहे.. हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याच आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे शक्यतो नागरिकांनी उन्हात जाणे टाळावे बारा ते तीन या वेळेत बाहेर पडू नये बंद चार चाकी वाहनात लहान मुले किंवा प्राणी ठेवू नयेत असे आव्हानं देखील हिंगोली प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आल आहे…0
0
Report
Advertisement
नाशिक के धर्मांतरण मामले में अंतरराष्ट्रीय मोड़, मलेशिया–मालेगाव कनेक्शन का दावा अदालत में
Nashik, Maharashtra:मल्टी नॅशनल कंपनीतील धर्मांतर प्रकरणाला आंतरराष्ट्रीय वळण मलेशिया आणि मालेگाव कनेक्शनचा न्यायालयात धक्कादायक दावा फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी नाशिकरोड न्यायालयात सविस्तर सुनावणी पूर्ण विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी तपासात मलेशियाशी आर्थिक संबंध आणि मालेगाव कनेक्शनचे प्राथमिक धागेदोरे समोर आल्याचा दावा केला पीडित महिलेचे कथित नाव बदलून तिला मलेशियातील ‘इम्रान’ नावाच्या व्यक्तीकडे नोकरीसाठी पाठविण्याचा कट असल्याचे न्यायालयात नमूद दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकालासाठी २ मे तारीख निश्चित केली तोपर्यंत निदा खानच्या अटकेवरील संकट कायम, तपास यंत्रणांची नजर अधिक तीक्ष्ण प्रकरणातील डिजिटल, आर्थिक आणि बाह्य नेटवर्क तपासामुळे चौकशीचा विस्तार वाढण्याची शक्यता नाशिकातील प्रकरणाचे धागेदोरे आता थेट सीमापार पोहोचल्याच्या दाव्याने खळबळ0
0
Report
कुंभ मेले के लिए 377 एकड़ में 94 एकड़ पहले कब्जा, बाकी अधिग्रहण जारी
Nashik, Maharashtra:Nashik Breaking - - साधूग्रामसाठी तपोवनात भूसंपादन वेगात - जमीनमालकांवर अन्याय होऊ देणार नाही, महापौरांची स्पष्ट ग्वाही - सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक ३७७ एकरपैकी ९४ एकर जमीन आधीच अधिग्रहित, उर्वरित २८३ एकर संपादन प्रक्रिया सुरू - अतिरिक्त १९२ एकर भूसंपादनाचा प्रस्तावही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे पाठवला - तपोवन बैठकीत जमीनमालकांनी सेल इंडेक्सनुसार दर निश्चितीची मागणी करत भरपाईबाबत भूमिका मांडली - महापौर हिमगौरी आडके यांनी मुख्यमंत्री आणि कुंभमेळामंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न शिखर समितीसमोर मांडण्याचे आश्वासन दिले - उर्वरित जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा पर्यायही चर्चेत, प्रलंबित १२.५० कोटींचे वाटप महिनाभरात करण्याचा दावा - कुंभमेळा नियोजनास वेग देताना शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यावर प्रशासनाचा भर - साधूग्राम उभारणीसोबत विकासही, पण जमीनमालकांचा न्याय अबाधित ठेवण्याची मोठी परीक्षा0
0
Report
छत्रपती शिवाजीनगर के भुयारी मार्ग में वर्षा जलजमाव और यातायात जाम, विभागीय समन्वय सवाल
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर च्या शिवाजीनगर भुयारी मार्गात सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे नागरिकांनी लक्ष वेधल्यानंतरही प्रशासनातील समन्वयाचा अभाव पुन्हा उघड झाला. विविध विभागांच्या संयुक्त पाहणीचा गाजावाजा असतानाच सोमवारी केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीच घटनास्थळी पोहोचले. इतर विभागांनी दांडी मारली. परिणामी, कोंडी व पाणी साचण्याच्या समस्येवर ठोस निर्णय होण्याऐवजी प्रश्न आणखी लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. छत्रपती शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या पाहणीसाठी सोमवारी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा होणार होता. मात्र, केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीच पाहणीस आले. इतर विभागांचे अधिकारी न आल्याने काही वेळ प्रतिक्षा करून हे अधिकारी माघारी गेले. पावसाळ्यात भुयारी मार्गात पाणी साचू नये, होणारी वाहतूककोंडी, तसेच सध्या सुरू असलेल्या कामांची पाहणी सोमवारच्या पाहणीत करण्यात येणार होती.0
0
Report
Advertisement
इगतपुरी पंचायत समिति में लाचखोरी मामले में एसीबी ने तीन अभियंताओं को गिरफ्तार किया
Nashik, Maharashtra:इगतपुरी पंचायत समिती उपविभागात लाचखोर त्रिकूट एसीबीच्या जाळ्यात नाशिक जिल्हा परिषद इगतपुरी उपविभागातील सहायक अभियंता सतीश दराडे, सागर रावले आणि रवींद्र गायकवाड यांना अटक बिलावर स्वाक्षरी करण्यासाठी तक्रारदाराकडे ९ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तडजोडीनंतर सोमवारी इगतपुरी कार्यालयात ६ हजार रुपये स्वीकारताना एसीबीने सापळा रचला सहायक अभियंत्याच्या सांगण्यावरून रक्कम ड्रॉवरमध्ये ठेवून पुढे कर्मचाऱ्याकडे देताना कारवाई शासकीय कामासाठी टक्केवारी मागणाऱ्या यंत्रणेचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला पर्दाफाश तीघांविरोधात गुन्हा दाखल, चौकशीला वेग जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना आता एसीबीाचा थेट हिसका0
0
Report
छत्रपति संभाजीनगर में LPG संकट हल, गो गैस स्टेशनों पर आपूर्ति बढ़ेगी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपति संभाजीनगर शहरात एलपीजीच्या तुटवड्यामुळे रिक्षाचालकांना अनेक दिवस पंपांवरून रिकाम्या हाती परतावे लागत होते. आखातातील युद्धस्थितीमुळे पुरवठा विस्कळीत झाल्याने उपलब्ध गॅसचा साठा लवकर संपत होता. आता शहरात गॅसचा मोठा साठा शहरात दाखल झाल्याने दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले की, हा साठा शहरातील 'गो गॅस'च्या चार स्टेशन्ससाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कांचनवाडी एलपीजी स्टेशन आणि बीड बायपास स्टेशनसाठी प्रत्येकी ९ हजार लिटर साठा दिला असून, उर्वरित चिकलठाणा व साऊथ सिटी पंपांसाठी पुढील दिवशी साठा मिळणार आहे.0
0
Report
नगर निगम ने 2 टन प्रतिबंधित कैरीबैग जब्त कर 50 हजार का जुर्माना लगाया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या घनकचरा विभागाने शहर कॅरिबॅगमुक्त करण्याचा निर्धार केला आहे, गेल्या आठवड्यापासून जोरदार कारवाई सुरू आहे. सोमवारी नवीन मोडा भागात दोन व्यापाऱ्यांकडून जवळपास २ टन प्रतिबंधित कॅरिबॅगचा साठा जप्त केला. त्यांच्यावर प्रत्येकी २५ हजारांप्रमाणे ५० हजारांचा दंड वसूल केला. महापालिका प्रशासनाने गेल्या चार दिवसांत ११ टनपेक्षा अधिक कॅरी बॅगचा साठा जप्त केला. हा जप्त केलेला साठा हसूल येथील कचरा प्रक्रिया केंद्रात नेऊन श्रेडिंग मशीनमध्ये त्याचे तुकडे करण्यात आले. ४० ते ५० किलोचे गड्ढे करून हा साठा ठेवण्यात येईल.0
0
Report
Advertisement
