445001
यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.
Yavatmal, Maharashtra:राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नागपुर के एसबीएल कंपनी विस्फोट में उपचार के दौरान एक और महिला की मौत, मृतक संख्या 27 पहुँची
Nagpur, Maharashtra:नागपूर, काटोल तालुक्यातील राहुळगाव येथील एसबीएल कंपनीतील स्फोटातील अजून एका जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. दुर्गा गाडगे असं मृत महिलेचं नाव आहे. एक मार्चला एसबीएल कंपनीतील स्फोटात ती गंभीर जखमी झाली होत्या. आतापर्यंत एकूण मृतांचा आकडा 27 वर पोहोचला आहे.0
0
Report
सातारा में पेयजल संकट: प्रशासन पर गंभीर आरोप, आंदोलन की चेतावनी
Satara, Maharashtra:सातारा: माण और खटाव तालुक्यात पिण्याची पाण्याची टंचाई जाणवू लागली असून प्रशासन या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याचा खळबळजनक आरोप शरद चंद्र पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत विरकर यांनी केला आहे. तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरे-ढोरे घेऊन आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सध्या माण तालुक्यातील ५५ ते ६० गावांनी प्रशासनाकडे टँकरची अधिकृत मागणी केली आहे. मात्र प्रशासनाने केवळ १७ गावांनाच टँकर मंजूर केले आहेत. उर्वरित गावांतील नागरिकांनी पाणी कोठून आणायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ग्रामीण भागात २०० लिटर पाण्यासाठी सर्वसामान्यांना ५० ते १०० रुपये मोजावे लागत आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे. यावेळी त्यांनी मान खटाव विधानसभेचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांचे नाव न घेता यांच्यावर निशाणा साधत टीका केलीये "स्वतःला 'जलनायक' म्हणवून घेणाऱ्या नेत्यांच्या तालुक्यात जर जनतेला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असेल, तर हे त्यांचे अपयश आहे. केवळ घोषणाबाजी करण्यापेक्षा जमिनीवर उतरून लोकांची तहान भागवणे जास्त महत्त्वाचे असल्याचे यावेळी ते म्हणाले...."0
0
Report
भीड़ ने अतिक्रमण रोकथाम के दौरान जेसीबी चालक की पिटाई, पुलिस ने मध्यस्थता की
Nanded-Waghala, Maharashtra:अतिक्रमण पर कार्रवाई शुरू होते ही भीड़ ने जेसीबी पर चढ़कर चालक की बेदम पिटाई कर दी। यह घटना नांदेड शहर के खड़कपुरा से वाघी रोड पर अतिक्रमण हटाने के दौरान घटी। नांदेड नगर निगम ने शहर से अतिक्रमण हटाने के लिए विशेष अभियान चलाया है। इसी अभियान के तहत कल नगर निगम के दल खड़कपुरा से वाघी रोड तक अतिक्रमण हटाने गया था, जहाँ भीड़ ने अतिक्रमण हटाने से रोक दिया। भीड़ ने सीधे जेसीबी पर चढ़कर चालक को मारहाण की। पुलिस ने मध्यस्थता कर जेसीबी चालक को भीड़ से बचाया। इस मामले में प्राथमिकी दर्ज करने की प्रक्रिया शुरू है।0
0
Report
Advertisement
महापौर रितू तावड़े ने मुंबई उपनगर के नालों की सफाई का निरीक्षण किया
Mumbai, Maharashtra:मुम्बईच्या महापौर रितू तावडे यांनी आज सकाळपासून मुंबई उपनगरातील विविध नाल्यांच्या सफाईची पाहणी केली. भांडुप, मुलुंड, घाटकोपर, साकीनाका परिसरातील महत्त्वाच्या नाल्यांवर आज महापौर अधिकाऱ्यांसह पोहचल्या आणि किती टक्के नालेसफाई झाली आहे याची माहिती त्यांनी घेतली. या वेळी त्यांनी नालेसफाईसह विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.0
0
Report
गोकुळ दूध संघ में प्रशासक नियुक्त, राजकीय हस्तक्षेप रोकने की पहल शुरू
Kolhapur, Maharashtra:गोकुळ अर्थात कोल्हापूर जिल्हा दूध संघावर अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत 4 मे रोजी संपल्याने राज्य सरकारने गोकुळ वर प्रशासक नेमला आहे. एकूण पाच सदस्य प्रशासक मंडळामध्ये मंडळाचे अध्यक्ष म्हणून संजीवकुमार सुद्रिक, सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, चंद्रकांत परुळेकर यांचा समावेश आहे. या प्रशासकांनी गोकुळचा पदभार घेतला असून आज पासून प्रशासक मंडळाच्या निगराणी मध्ये गोकुळचे व्यवहार होणार आहेत. त्यामुळे गोकुळ मधील राजकीय हस्तक्षेप थांबला असं म्हणता येईल. प्रशासक मंडळाने गोकुळचा कारभार योग्य पद्धतीने चालावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर आम्ही काळजीवाहू म्हणून काम करू असं देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. गोकुळ दूध संघ सभासद असणाऱ्या संस्थांसंदर्भात सुरू असलेल्या सुनावणी आणि चौकशीनंतर आता गोकुळची निवडणूक होणार आहे.0
0
Report
फडणवीस ने मुंबई में वाळूज के भू-हस्तांतरण और निधि जुटाने को दी मंजूरी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेशाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत वाळूज परिसरातील भूसंपादन, शासकीय जमिनींचे हस्तांतरण आणि सिडको मार्फत निधी उभारणीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची दुसरी बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री संजय शिरसाट, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत उपस्थित होते. महानगर प्रदेशातील विकास योजनांमधील फेरबदल प्रक्रिया अधिक वेगवान व्हावी, यासाठी एमआरटीपी कायद्यातर्गत विशेष अधिकार महानगर आयुक्त व कार्यकारी समितीकडे सोपवला आहे.0
0
Report
Advertisement
सोलापुर में नसरापूर घटना के विरोध में आज सड़क पर उतरे लोग
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - नसरापूर घटनेच्या निषेधार्थ आज सोलूरकर उतरणार रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर होणार आंदोलन - सोलापुरात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने नसरापूर घटनेच्या निषेधार्थ होणार आंदोलन - हजारोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे सकल हिंदू समाजाचे सोलापूरकरांना आवाहन - आज सकाळी दहा वाजता जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथील पूनम गेट जवळ एकत्रित येण्याचे सकाळी हिंदू समाजाचे आवाहन - नसरাপूर घटनेच्या निषेधार्थ राज्यभरातून संताप व्यक्त होत असताना आता सोलापूरकर देखील उतरले रस्त्यावर - लवकरात लवकर नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी0
0
Report
नाशिक के ऐतिहासिक कालाराम मंदिर पर धर्मध्वजारोहण: कोविंद-फडणवीस की खास मौजूदगी
Nashik, Maharashtra:नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरावर मान्यवरांच्या उपस्थितीत धर्मध्वजारोहण होणार माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची विशेष उपस्थिती राहणार श्री काळाराम मंदिरात होणाऱ्या धर्मध्वजारोहणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राहणार उपस्थित काळाराम मंदिर दर्शनानंतर गोदावरीची महाआरती देखील माजी राष्ट्रपती रामनाथ गोविंद आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे देखील उद्या भूमिपूजन आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध बैठका व कार्यक्रमांचे आयोजन0
0
Report
नाशिक: मल्टिनॅशनल कंपनी में धर्मांतरण और महिला शोषण के आरोप, आरोपी आज अदालत में पेश
Nashik, Maharashtra:नाशिक * मल्टिनॅशनल कंपनी धर्मांतर आणि महिला लैंगिक शोषण प्रकरण * संशयित आरोपी तौसिफ आत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन यांना आज न्यायालयात हजर केले जाणार * नाशिक सत्र न्यायालयाने सुनावली होती पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी * आरोपींना पोलीस कोठडी देण्यात येते की न्यायालयीन कोठडी याकडे लक्ष...0
0
Report
Advertisement
आरापूर MIDC के लिए 762.093 हेक्टेयर जमीन की संयुक्त माप-जोड़ शुरू बुधवार से
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरालगत असलेल्या आरापूर एमआयडीसीसाठी ३ गावांमधील ७६२ हेक्टर जमिनीच्या संयुक्त मोजणीला बुधवारपासून सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. एमआयडीसी, भूमी अभिलेख, महसूल तसेच कृषी विभागातील अधिकाऱ्यांची ४ पथके तयार करण्यात येणार आहेत. ही पथके शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. यात ते भूसंपादन करण्यात येणारी जमीन, झाडे, फळबागा, विहिरी तसेच वाळूज एमआयडीसीपासून २१ किलोमीटर, अंतरावर असलेले मौजे आरापूर, सुलतानाबाद व गवळी शिवरा येथील खासगी व सरकारी असे एकूण ७६२.०९३ हेक्टर क्षेत्र भूसंपादनासाठी प्रस्तावित आहे0
0
Report
त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन कालाबाजार: पांच आरोपीयों की जमानत याचिका खारिज
Nashik, Maharashtra:Nashik Breaking - त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन काळाबाजार प्रकरणात पाच आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला - नाशिक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय - त्र्यंबकेश्वर मंदिर समितीचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग सह चार जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळा - VIP दर्शनासाठी पैसे उकळल्याचा आरोप - प्रकरण गंभीर असल्याने जामीन नाकारला - लग्नाच्या कारणावरून एका आरोपीला 3 दिवसांची सवलत - पोलिस देखरेखीखाली घरी जाण्याची परवानगी0
0
Report
संभाजीनगर नगरपालिका के कर्ज से आर्थिक संकट गहराया, जानिए वजह
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असून, यापुढे अत्यावश्यक कामांनाच प्राधान्य दिले जाईल, असे प्रशासनाकडून जाहीर झाले होते. मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीसमोर जवळपास साडेतीन कोटींच्या उधळपट्टीचे प्रस्ताव प्रशासनाकडूनच ठेवलेले आहेत. शालेय विद्यार्थ्यांना विविध खेळांसाठी ४० लाखांची साहित्य खरेदी, वाहतूक सिग्नलसाठी ३६ लाख, शहरातील १४ कारंज्यांसाठी १ कोटी ५१ लाख, सिद्धार्थ उद्यानातील प्राण्यांचे पिंजरे दुरुस्तीवर ४९ लाख खर्च होणार आहेत. २७४० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी ८२२ कोटींचे कर्ज मनपाने घेतले. याची परतफेड पुढील वर्षीपासून सुरू होईल. ८०० कोटींच्या ड्रेनेज लाइन योजनेत मनपाला जवळपास २३० कोटींचा वाटा टाकावा लागणार आहे. अगोदरच स्मार्ट सिटीचा वाटा टाकण्यासाठी २५० कोटींचे कर्ज घेतलेले आहे. जवळपास १६०० कोटींचे कर्ज मनपाच्या डोक्यावर असूनही प्रशासनाकडून मुक्तपणे आर्थिक उधळण सुरू आहे. मनपाच्या ५० शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारासाठी साहित्य खरेदीचा प्रस्ताव असताना मंगळवारच्या स्थायी समितीसमोर आहे.0
0
Report
Advertisement
एसटी महामंडळ ने 'आपली बस, आपकी सेवा' अभियान शुरू किया; चालक मार्ग बताएँगे
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये १ मे २०२६ पासून एसटी महामंडळाने 'आपली बस, आपली सेवा' अभियान हाती घेतले आहे. प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरणासाठी स्वतंत्र यंत्रणेसह अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. बस सुटण्यापूर्वी चालक-वाहक स्वतःची ओळख करून देऊन प्रवाशांना प्रवासाचा मार्ग, थांबे आणि अपेक्षित वेळ याची माहिती देत आहेत. बस सुटण्यापूर्वी चालकाने स्वतःची ओळख करून देत प्रवाशांना प्रवासाचा मार्ग, थांबे, अपेक्षित वेळेची माहिती देणे, औपचारिक भाग नसून, प्रवाशांशी नातं जोडण्याचा प्रयत्न आहे. प्रवासादरम्यान मदतीचा हात पुढे करणारा चालक-वाहक हा एसटीचा खरा चेहरा ठरेल, असे एस टी महामंडळाचे म्हणणे आहे...0
0
Report
कर्जत तापकीर वाडी में दरड़ गिरने का खतरा, गांव में डर बढ़ रहा है
Chendhare, Maharashtra:कर्जत तापकीर वाडी या धनगर वस्तीला दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मातीचे उत्खनन सुरू आहे तसेच मातीचे मोठमोठे ढीग उभे केले जात आहेत. इथल्या खोदकामासाठी अधूनमधून सुरंग स्फोट घडवून आणले जातात त्यामुळे जवळच असलेल्या वस्तीमधील घरांना धोका निर्माण झाला आहे. अनेकदा स्फोटात उडालेले दगड वस्तीत येऊन पडतात त्यामुळे जीवितालाही धोका निर्माण झाल्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करताहेत.0
0
Report
भंडारा साकोली में पुलिस हवलदार की संदिग्ध मौत, खेत में मिला शव
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या साकोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत शेतात आढळल्याने खळबळ उडाली आहे. नवनीत जांभुळकर (वय ४२) असे मृत हवालदाराचे नाव असून ते शनिवारी रात्रीपासून बेपत्ता होते. मोबाइल संपर्क तुटल्यानंतर कुटुंबीयांनी शोध सुरू केला होता. रविवारी राष्ट्रीय महामार्गालगतच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी त्यांची मोटारसायकल व मोबाईलही सापडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मृत्यूचे नेमके कारण अहवालानंतर स्पष्ट होणार असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
