Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.

Aug 26, 2024 17:26:23
Yavatmal, Maharashtra

राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Mar 23, 2026 02:34:38
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गुजरातमधील सुरत मधून शहरात आणल्या जाणाऱ्या नशेच्या गोळ्या आणि बंदी घातलेल्या सिरपच्या तस्करीचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (ANTF) नगर नाका परिसरात ही धडक कारवाई केली. संशयित आरोपी सय्यद अझर सय्यद अकबर हा सुरतहून ट्रॅव्हल्स बसमधून ड्रग्जची खेप घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार टास्क फोर्सने पहाटे पावणे पाच वाजल्यापासूनच नगर नाका परिसरात सापळा रचला. सकाळी सव्वा सहाच्या सुमारास आरोपी बसमधून खाली उतरताच पोलिसांनी त्याला घेराव घातला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने आपल्या जवळील सॅक आणि चपला रस्त्यावर फेकून दिल्या आणि पोलिसांशी झटापट करत रस्ता दुभाजकावरून उड्या मारत अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी जप्त केलेल्या सॅकची तपासणी केली असता, ब्लँकेटखाली लपवून ठेवलेल्या सुमारे २ हजार नशेच्या गोळ्या आणि ११८ बंदी घातलेल्या सिरपच्या बाटल्या आढळून आल्या. या मुद्देमालाची किंमत अंदाजे ९ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 23, 2026 02:34:23
Beed, Maharashtra:बीड: लिंबागणेश गावातून धनगर समाज बांधव दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना, मराठा आंदोलकांचा देखील पाठिंबा। दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या लिंबागणेश येथील धनगर समाज बांधवांनी मुंबईकडे कूच केलीय. मागील आठ दिवसांपासून दीपक बोऱ्हाडे यांचे आझाद मैदानावर अमरण उपोषण सुरू आहे. याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दोन दिवसांपूर्वी बैठक पार पडली. या बैठकीतून विविध भागातून धनगर समाज बांधव मुंबईकडे मोठ्या संख्येने जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. याच आवाहनाला प्रतिसाद देत लिंबागणेश येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकापर्यंत ताशांच्या गजरात प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत धनगर समाज बांधवांकडून आरक्षणाची मागणी करण्यात आली. तर या मागणीला मराठा समाज बांधवांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 23, 2026 02:34:06
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 23, 2026 02:31:54
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - प्रियकराला गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी अत्याचाराचा खोटा आरोप करणाऱ्या प्रियकर, प्रेयसीवर गुन्हा दाखल. सोलापूर शहरात एका 25 वर्षीय तरुणीने प्रियकराला गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी स्वतःवर सामूहिक दुष्कर्म झाल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र पोलिसांच्या चौकशीमध्ये अत्यंत धक्कादायक बाब समोर आले असून सदरच्या प्रेयसीवर कोणताच अत्याचार झाला नसल्याचे तपासात पुढे आले आहे. तरुणी व तिचा प्रियकर समीर शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे खोटी तक्रार देणाऱ्या तरुणी आणि प्रियकरावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. एम. राजकुमार (पोलिस आयुक्त, सोलापूर शहर)
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 23, 2026 02:31:28
Varasoli, Maharashtra:रायगड जिल्हा परिषद अंतर्गत विविध विषय समित्यांच्या सभापतीपदासाठीची निवड आज पार पडणार आहे. या निवड प्रक्रियेकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून त्‍यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. सभापतीपदासाठी इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान सभापती कोण होणार, शिवसेनेच्‍या पदरात किती सभापतीपदे पडणार याची उत्‍सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. आजच्‍या निवडीनंतर शिवसेनेच्‍या सत्‍तेतील सहभागाबाबतची अनिश्चितता संपणार आहे. रायगड जिल्‍हा परीषदेवर महायुती सत्‍तेत आली असून भाजपचा अध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उपाध्‍यक्ष झाला आहे. मात्र शिवसेनेच्‍या पदारात अजून काहीही पडलेले नाही.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 23, 2026 02:31:13
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर और बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांना सात दिवसांच्या उपचारानंतर साताळकर लोटस रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सात दिवसांपूर्वी स्वतःला जखमी करून घेतलं होतं. त्यांच्यावर डॉ. हर्षवर्धन तनवर यांच्या यशस्वी शस्त्रक्रिये केली होती. रुग्णालयातून निरोप घेताना महाराज भावुक झाले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि आमदार संग्राम जगताप यांनी महाराजांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. डॉक्टरांनी मला मृत्यूच्या दारातून परत आणले. तारकेश्वर गडावर सुरू असलेल्या नारळी सप्ताहला देखील भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आदिनाथ महाराज शास्त्री यांनी केले आहे...
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 23, 2026 02:15:26
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात जुगार अड्ड्यांवर कारवाईचा धडाका सुरू असतानाच उरळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बाळापूर तालुका अंतर्गत उरळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला.उरळ पोलिस स्टेशन च्या पथकाने ही कारवाई केली.शेतात मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. या कारवाईत तब्बल १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी कारवाईदरम्यान एकूण ४ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सुमारे ९० हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच जुगार खेळण्यासाठी वापरली जाणारी वाहने जप्त करण्यात झाली आहेत.या जुगार अड्ड्यावर शेगाव तसेच संग्रामपूर तालुका येथील नागरिकांचा मोठा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास उरळ पोलीस करत आहेत.
849
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 23, 2026 02:01:55
Akola, Maharashtra:काँग्रेस नेते हिदायत पटेल हत्याप्रकरणी आरोपींचा जामीन फेटाळला. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मोहाळा गावात घडलेल्या अत्यंत गाजलेल्या काँग्रेस नेते हिदायत पटेल हत्याप्रकरणात आरोपींना मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांनी या प्रकरणातील दोन्ही आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुद्दीन मोहम्मद आदिल आणि काँग्रेसचे अकोट नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजय बोडखे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने हा अर्ज नामंजूर केला आहे.ही घटना ६ जानेवारी २०२६ रोजी घडली होती आणि त्यापासून हे दोन्ही आरोपी करार आहेत.हिदायत पटेल नमाज अदा करून गावातील मशिदीत बसले होते. त्याच वेळी आरोपीने अचानक त्यांच्यावर चाकूने हल्ला केला होता, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हिदायत पटेल यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. तापासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या पुराव्यांनुसार, मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबातही आरोपींच्या सहभागाचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच साक्षीदारांच्या जबाबांमधूनही आरोपींचा सहभाग स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आरोपींची कोठडीत चौकशी करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे, त्यामुळे या दोन्ही आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहे.
951
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 23, 2026 02:00:25
Akola, Maharashtra:अकोला शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून मलकापूर (अकोला परिसर) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खदान पोलीस स्टेशन हद्दीतील या परिसरात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून लाखो रुपयांच्या चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका अपार्टमेंटमधून दुचाकी चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला आणि संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतरही आरोग्यधाम कॉलनी परिसरात दोन संशयित चोरीच्या उद्देशाने फिरताना पुन्हा सीसीटीव्हीत दिसले. या संशयितांची हालचाल लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी संशयितांनी चाकू काढून नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत पळ काढला. मात्र संतप्त नागरिकांनी सिनेमा स्टाईल पाठलाग करत अखेर एका चोरट्याला रंगेहात पकडले. त्यानंतर त्याला तत्काळ खदान पोलीस स्टेशन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, परिसरात वाढत चाललेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असून या भागात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची मागणी जोर धरत आहे. स्थानिक नगरसेवक पराग गवई यांच्यासह परिसरातील नागरिकांनी पोलिस प्रशासनाने तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. अकोला शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून आता पोलिस प्रशासन या प्रकरणात कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
976
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 22, 2026 17:17:20
Nagpur, Maharashtra:विदर्भातील राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील दिग्गज ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे वयाच्या 89व्या वर्षी रविवारी रात्री नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या मागे सागर व समीर ही दोन मुले, सुना. नातवंडे असा आप्त परिवार आहे. मेघे यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे झाला. दत्ता मेघे यांनी राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरीव काम केले. त त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच पांडे लेआउट येथील निवासस्थानी चाहत्यांनी एकच गर्दी केली. गरीब परिस्थितीतून पुढे आलेले दत्ता मेघे यांनी विदर्भातील राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षात केली. त्त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत लोकसभेसह राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमच नव्हे तर सर्वच निवडणुकीतील रणनितीचा भाग होते. परंतु त्यापूर्वी 1978 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील पुलोदच्या सरकारमध्ये ते विदर्भातून मंत्री होते. तेव्हापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. अनेक वर्ष मंत्री, विरोधी पक्षनेता अशी पदे भूषवित 1991 मध्ये त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजय संपादन केला. यानंतर रामटेक (१९९६ व वर्धा (१९९८) या मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले. विदर्भातील तीन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणारे ते विदर्भातील एकमेव नेते आहेत. वर्धा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून त्यांनी विदर्भात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आहेत.
1079
comment0
Report
Advertisement
Back to top