Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.

Aug 26, 2024 17:26:23
Yavatmal, Maharashtra

राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Mar 18, 2026 11:16:21
Yavatmal, Maharashtra:पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाच्या पथकाने माकडावर मारलेला डार्ट निशाणा चुकल्याने ग्रामस्थाला लागला. त्यामुळे माकडा ऐवजी ग्रामस्थ जखमी झाला. हा गंभीर तेवढाच मानवी जीवित्वाशी खेळ करणारा प्रकार यवतमाळ च्या भवानी गावात घडल्याने वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहे. VO १ : यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील भवानी या गावात एक माकड काही दिवसांपासून धुमाकूळ घालत आहे, ग्रामस्थांवर हल्ले करीत आहे त्यामुळे या पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाचे पथक गावात पोहोचले. त्यांनी माकडाला बेशुद्ध करण्यासाठी ट्रॅन्क्विलायझर गन मधून डार्ट सोडला, मात्र निशाणा चुकल्याने तो डार्ट थेट गर्दीत उभे असलेल्या सदानंद खराटे यांना लागला. त्यामुळे माकडा ऐवजी ग्रामस्थच बेशुद्ध झाल्याने गावकरी संतप्त झाले. जखमी सदानंद खराटे यांचेवर तातडीने उपचार करण्यात आले, डार्ट शरीरात खोलवर न गेल्याने त्यांचा जीव बचावला. बाईट : डॉ किशोर मानकर : मुख्य वनसंरक्षक VO २ : पिसाळलेल्या माकडाने दोन ग्रामस्थांसह एका वन कर्मचाऱ्यालाही जखमी केले आहे. आता या माकडाला पुन्हा जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी वन्य प्राण्यांना डार्ट करताना मानक प्रणालीचे पालन होणे गरजेचे आहे, तेथे वन विभागाचे जबाबदार अधिकारी, तज्ज्ञ पशुवैद्यक, औषधीचा योग्य डोस, आणि सुरक्षित अंतराची आवश्यकता असते. प्राण्यांच्या जीवाला धोका होई नये तसेच मानवी सुरक्षेबाबतही लक्ष देणे अनिवार्य आहे. फक्त प्रशिक्षित वन्यजीव पशुवैद्यक किंवा वन विभागाच्या मान्यताप्राप्त पथकाकडूनच डार्टिंग करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे आहेत. मात्र अनेकदा या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येते. भवानी येथेही डार्ट करताना चुकलेला निशाणा आणि झालेली ग्रामस्थांची गर्दी बघता वन विभागाची मार्गदर्शक तत्वे पाळल्या गेली का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. बाईट : डॉ किशोर बन्सोड : पशुसंवर्धन अधिकारी (गुलाबी शर्ट) : यादव तरटे : वन्यजीव अभ्यासक (टी शर्ट) VO ३ : वन्य जीव व जंगल संपत्तीचे रक्षण करण्याचे काम जोखमीचे आहे, त्यामुळे पुरेशी साधनसामग्री व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण हे महत्त्वाचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने यवतमाळच्या हिवरी वन क्षेत्रात वनवा विझविताना एका वनपालाचा जळून मृत्यू झाला तर त्या पाठोपाठ आता माकडाचा बंदोबस्त करताना डार्ट चा निशाणा चुकला, अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातही वन कर्मचारी ठार झाले. या गंभीर घटना बघता वन विभागाने ही आता गांभीर्य दाखवणे गरजेचे आहे.
0
comment0
Report
SKShubham Koli
Mar 18, 2026 11:04:42
Thane, Maharashtra:*गँगस्टर रवी पुजारीला दहा दिवसाची पोलीस कोठडी...* Anchor ठाणे : कुख्यात गॅंगस्टर रवी पुजारीला आज ठाणे कोर्टामध्ये हजर करण्यात आला... रवी पुजारी याला ठाणे न्यायालयातील मोक्का कोर्टामध्ये हजर करण्यात आला... काही वर्षांपूर्वी ठाण्यातील कासरवाडी पोलीस स्टेशनमध्ये रवी पुजारी यांनी खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.... रवी पुजारी यांचा ताबा बेंगलोरु कोर्टातून घेऊन आज ठाणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आला यावेळी सरकारी पक्षाचे वकील संजय मोरे यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करून पंधरा दिवसाची रवी पुजारीला पोलिस कोठडीची मागणी केली होती परंतु ठाणे मोक्का न्यायालयाने दहा दिवसाची पोलीस कोठडी रवी पुजारीला सुनावलेली आहे.... 27 मार्चला पुन्हा एकदा रवी पुजारीला ठाणे मोक्का कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे...
465
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 18, 2026 10:24:23
Kolhapur, Maharashtra:गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी… ऑनलाइन साडी अर्पण करण्याच्या नावाखाली फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे… AI Generated वीडियोच्या माध्यमातून भक्तांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू असून त्यामुळे भक्तांनो सावधान करवीर निवासिनी आई अंबाबाई देवीच्या भक्तानो सावधान. गुडी पाडावा निमित्ताने भक्तांना ऑनलाइन लुटणारी टोळी सक्रिय. 351 रुपये दया आम्ही तुमची साडी गुढीಪाडव्याच्या निमित्ताने आई अंबाबाईला अर्पण करू अस आश्वासन देणारे भामटे उघड. गुढीपाडव्याच्या निमित्ताने देवीला साड़ी अर्पण केली तर घरात सुख समृद्धी आणि भरभराट येणार असल्याचा केला जात आहे दावा. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अलर्ट मोडवर. देवस्थान समितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून भक्तांना गंडवणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात केला गुन्हा दाखल. कोल्हापूर सायबर पोलिसांकडे देखील दिली तक्रार. भक्तांची देवीप्रती असणारी श्रद्धा आता काही भामट्यांनी कमाईचं साधन बनवली आहे… सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय… ज्यामध्ये “फक्त ३५१ रुपया द्या, महालक्ष्मी साडी सेवा आणि शृंगार सेवा” देऊ असा दावा या व्हिडिओत करण्यात आल आहे… यामध्ये घरबसल्या देवीच्या चरणी साड़ी अर्पण होईल, व्हिडिओ मिळेल, ब्लाऊज पीस आणि हलदी-कुंकू घरपोच दिलं जाईल, असं देखील आमिष दाखवलं जातं आहे… खरंतर हा संपूर्ण प्रकार फसवणुकीचा आहे… हा व्हिडिओ AI तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आला असून, मंदिर प्रशासनाचा याच्याशी काहीही संबंध नाही… त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने संबंधित व्हिडिओ ज्या वेबसाईटवर प्रसारित करण्यात आला त्यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. फक्त प्रशासनच नाही, तर अंबाबाई मंदिरातील हक्कदार पुजाऱ्यांनी देखील या प्रकारावर आक्षेप घेतलाय… देवीच्या नावाने अशा प्रकारचं मार्केटिंग करून भक्तांचे पैसे लुटण्याची कृती चुकीचं असून, मंदिरात ठरलेल्या विधी व्यतिरिक्त कोणतीही पूजा केली जात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मंदिरात अधिकृतरित्या पाद्य पूजा, कुकुमार्चन पूजा, महाअभिषेक और शाश्वत पूजा अशा सेवा उपलब्ध आहेत… त्यामुळे इतर कोणत्याही ऑनलाईन सेवांचा दावा करणाऱ्यांपासून भक्तांनी सावध राहणं गरजेचं आहे…दररोज ऑनलाईन पद्धतीने अनेकांची फसवणूक होत असल्याच्या घटना समोर येत आहे, पण आता देवीवर असणाऱ्या श्रद्धेचा बाजार करून काहीजण अंबाबाई देवीच्या भक्तांना लुटण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कोणतीही ऑनलाईन सेवा घेण्यापूर्वी तिची अधिकृतता तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे.. भक्तांनो… देवीवरील श्रद्धा ठेवा, पण ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क राहा.. अन्यथा तुमची फसवणूक अटळ आहे.
1050
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 18, 2026 10:24:04
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवरून आमदार जयंत पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आमने-सामने सांगली जिल्हा परिषदेतल्या महाविकास आघाडीच्या विजयानंतर आमदार जयंत पाटील व आमदार गोपीचंद पडळकर कार्यकर्ते आले समोरा-समोर गोपीचंद पडळकर जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर येताच जयंत पाटील समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी जयंत पाटलांच्या विजयाबरोबर आता कसं वाटतंय गार गार वाटतंय अशी घोषणाबाजी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासमोरच जयंत पाटील समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी जयंत पाटील समर्थकांकडुन झालेल्या घोषणेनंतर पडळकर समर्थक देखील आक्रमक पडळकर समर्थकांकडून देखील जोरदार घोषणाबाजी करत देण्यात आले प्रत्युत्तर पडळकर व पाटील समर्थकांकडुन देण्यात आलेल्या घोषणामुळे वातावरण बनला तणावपूर्ण पोलिसांकडून पडळकर समर्थकांना बाजूला करत ,पडळकरांना निघून जाण्याची केली विनंती पोलिसांची सतर्कता आणि सुरक्षा व्यवस्था मुळे टळला मोठा अनर्थ
1089
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 18, 2026 10:02:44
Washim, Maharashtra:हिंगोली महामार्गाचे काम वाशीम शहरात सुरू असताना, हिंगोली नाका परिसरात रात्री मुरूमाच्या ढिगाऱ्याखाली मानवी शरीराचे अवशेष आढळून आल्याने खळबळ उडाली होती।तुकड्यांत सापडलेल्या अज्ञात मृतदेह प्रकरणात पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे।आज पुन्हा घटनास्थळी तपास मोहीम राबवून जेसीबीच्या सहाय्याने मुरूम हटवत sखोल पाहणी करण्यात आली। यावेळी आणखी काही मानवी अवशेष सापडल्याची माहिती समोर आली आहे।हा प्रकार अपघात आहे की घातपात,याबात अद्याप स्पष्टता नसली तरी सर्व शक्यतांचा तपास सुरू आहे।मृतदेह मुरूमासोबत आला की मुद्दाम दडवण्यात आला,याचाही शोध पोलीसांकडून घेतला जात आहे।शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा तपास करत असून मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिली。
937
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 18, 2026 09:39:18
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - राष्ट्रवादी के सदस्यांवर महाविकास आघाडीकडून दडपण डालने के आरोप – राष्ट्रवादी अजित पवार गट के नेता संजयकाका पाटल ने महाविकास आघाडी पर आरोप लगाए। एंकर - सांगली जिला परिषद निर्वाचन के दौरान राष्ट्रवादी अजित पवार गट के सदस्यों पर दडपण डालकर उनके फोन छीनने जैसी घटनाएं हुईं, यह आरोप राष्ट्रवादी अजित पवार गट के नेता माजी सांसद संजयकाका पाटिल ने महाविकास आघाडी पर किया है। लेकिन इस पर आज ज्यादा बोलेंगे नहीं, चुनाव खत्म होने पर बोलेंगे, पर चुनाव में चमत्कार की आशा है; लड़ना हमारा धर्म है, ऐसी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गट के माजी सांसद संजय काका पाटिल ने दी है; राष्ट्रवादी के 2 सदस्यों सहित संजयकाका पाटील ने महायुती को समर्थन भी जाहिर किया है। बाइट - संजयकाका पाटील - माजी सांसद
1032
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 18, 2026 09:38:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:आखातात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सगळीकडे होतोय खास करून गैस टंचाई ने उद्योगांना घरघर लागलीये, संभाजी नगर त्याला अपवाद नाही, संभाजी नगरात ऑटोमोबाइल और पूरक उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना गैस टंचाई चा मोठा फटका बसला... पाहुयात काय झालं परिणाम गैस टंचाई छत्रपती संभाजी नगरात उद्योगांच्या मुळावर उठली आहे, संभाजी नगरात ऑटोमोबाइल उद्योगांना जवळपास 3 हजारावर पूरक उद्योग आहेत मात्र त्यातील खास करून पेंटिंग और पावडर कोटिंग उद्योगांना गैस टंचाईने पुरते जमिनीवर आणले आहे, पेंटिंग और पावडर कोटिंग च्या जवळपास 100 वर कंपन्या आहेत, त्याचा गैस हा अत्यंत महत्वाचा घटक आहे मात्र तोच मिळत नसल्याने या कंपनी बंद पडायला लागल्या आहेत, परिणामी सर्व पुरवठा चैन उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, एक गाडी बनवायला 2500 सुटे भाग लागतात त्यातील पेंटिंग और पावडर कोटिंग बंद पडल्याने पूर्ण पुरवठा चैन बंद पडणार आहे... गैस अभावी तयार होणाऱ्या लोखंडी बेल्ट बनवणाऱ्या कंपन्या ही गैस अभावी ठप्प पडल्या आहेत, खास करून ऑटोमोबाइल उद्योग, साखर कारखाने यांना स्टील मजबुती साठी हे बेल्ट बनवण्यात येतात त्या उद्योगाला गैस अभावी घरघर लागली आहे... गॅस उद्योगाची टंचाई आता उद्योगांच्या मुळावर उठली आहे त्यामुळं सरकारने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी उद्योजकांची आहे त्यामुळं आखातातील युद्ध मराठवाडयातील उद्योगांच्या मुळावर उठले आहे...
929
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 18, 2026 09:31:59
Nanded, Maharashtra:अपंग असलेल्या चुलत भावाला शेतात जाऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजपचे नांदेड जिल्ह्यातील आमदार राजेश पवार यांच्या विरुद्ध चौकशी करण्याचे आदेश न्यायलयाने दिले. आमदार राजेश पवार आणि त्यांचे चुलत भाऊ श्रीराम पवार यांच्यात शेतीचा वाद न्यायप्रविष्ट आहे. श्रीराम पवार आणि त्यांच्या पत्नी आपल्या शेतात काम करत असताना आमदार राजेश पवार, त्यांची पत्नी आणि इतर सात ते आठ जण शेतात जेसीबी मशीन घेऊन आले. श्रीराम पवार यांच्या शेतातील बांबूची झाडे तोडण्यास सुरुवात केली. श्रीराम पवार आणि त्यांच्या पत्नीने विरोध केला असता त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात दिल्याची तक्रार आहे. जून 2023 मधील ही घटना आहे. या प्रकरणी श्रीराम पवार यांनी नायगाव पोलीसांपासून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत तक्रार दिली. पण पोलीसांनी कुठलीही कारवाई न केल्याने श्रीराम पवार यांनी न्यायालयात धाव घेतली. हा प्रकार दाखलपात्र गुन्ह्याचा असल्याने चौकशी करण्याचे आदेश नायगाव न्यायालयाच्या प्रथमर्वग न्याय दांडाधिकाऱ्यांनी दिले. 13 मार्च रोजी न्यायालयाने हे आदेश दिले. या प्रकरणात स्टे मिळण्यासाठी आमदार राजेश पवार यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेतल्याची माहिती आहे.
998
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 18, 2026 09:31:08
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अब्दुल सत्तार pc आम्ही बाजूला पडलो नाही ,वरिष्ठ नेते उदय सामंत आणि चव्हाण साहेब यांच्यात बोलणे झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा आदेश होता, त्यानुसार आम्ही चालत होतो. पण असा विश्वासघात राजकारणात माझ्यासोबत पहिल्यांदा झाला आहे. समन्वयात आम्ही निवडणूक लढली,अध्यक्ष पद देणार असल्याचे त्यांनी आम्हाला  सांगितले, पण आमचा विश्वासघात करण्यात आला. शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचे आदेश नुसार काम करते. आम्हाला अध्यक्ष पद देण्याचे ठरले होते, केसाने गळा कापणे असा खेळ आमच्या सोबत झाला आहे. शिंदे साहेब आदेश देतील त्यानुसार पुढचा निर्णय घेऊ ... मी शेवटच्या दोन दिवसांत मी प्रक्रियेत सहभागी झालो होते, ((( byte : विलास पारकर ठाकरे गटाचे सदस्य सभाळण्याचे काम भाजपने केले ,पाच लोकांना घेऊन मुंबईला गेले होते,  त्यांची आर्थिक बोलणी झाली होती...))) आमच्या सोबत कुणीही आले तर आम्ही नाही म्हणणार नाही. पण हा विश्वास घात आहे , हा आता भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला की कुणी केला माहीत नाही... सिल्लोड सोडून आम्ही भाजप सोबत युती केली होती, युती पाळली पाहिजे, आम्ही गोवाहाटी मध्ये गेल्यावर सर्वकाही हातात घेऊन गेलो होतोच... याचे विश्वासघाता चे परिणाम राज्यात दिसतील ,सुरवात संभाजीनगरपासून झाली आहे. आता वरिष्ठ चर्चा करणार, आम्हाला आमचे नेते वाऱ्यावर सोडणार नाही.आमच्या नेत्यांनी सांगतील तर आम्ही विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा देऊन टाकू* मला वाटते आमचा गळा कापण्यात जिल्ह्यातील नेते असावे, प्रांत अध्यक्ष यांना देखील माहिती होती उद्धव ठाकरे यांचे 6 लोक त्यांनी आधी बाहेर नेले होते. महानगरपालिका त्यांच्याकडे आहे आणि जिल्हा परिषद आमच्याकडे द्यावी अशी आमची मागणी होती. त्यांनी मागणी देखील मान्य केली, पण ऐनवेळी धोका झाला आहे... आता शिकण्यासारखी आहे, आमचे पाय आम्हीच तोडून घेतले. ही परिस्थिती निर्माण झाली त्याला आमची रणनीती चुकिली, आमच्या नेत्यामध्ये समनव्य चुकले,  आता आमच्यात कोण चुकले कुणी पाय तोडले हे तुम्हाला माहिती आहे ( शिरसाथ याना टोला ) (((Byte : विलास भुमरे उबाठा उमेदवारशी  आम्ही कोणताही संपर्क केला नाही. आमच्या भाजप सोबत बैठक झाल्या होत्या. सभापती पद वाटप देखील झालं होतं...
966
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 18, 2026 09:20:40
1092
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 18, 2026 08:50:41
Kalyan, Maharashtra:केडीएमसी अंतर्गत कचरा उचलणाऱ्या सुमित कंपनीच्या कंत्राटी कामगारांचे वेतन रखडल्याने शहरातील कचरा व्यवस्थापन यंत्रणा ठप्प होण्याच्या मार्गावर पोहोचली आहे. अचानक पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आजच पगार देण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, पगार न मिळाल्यास उद्यापासून एकही कचरा गाडी रस्त्यावर उतरू देणार नाही, असा इशारा कामगार संघटनेने दिला आहे. केडीएमसी हद्दीत कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे वेतन पुन्हा एकदा रखडल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली. वेतन न मिळाल्याच्या निषेधार्थ कामगारांनी अचानक कामबंद आंदोलन पुकारल्याने सकाळपासूनच शहरातील कचरा उचलण्याची संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली.या आंदोलनाचा फटका नागरिकांना बसला असून शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. विशेषतः डोंबिवली-ठाकुरली परिसरात परिस्थिती गंभीर बनली असून दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान, लोकनेते पुंडलिकशेठ म्हात्रे संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यानंतर कामगार संघटनेचे पदाधिकारी, भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे और केडीएमसीचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सुमित कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या चर्चेनंतर आजच कामगारांचा पगार देण्याचे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले.या आश्वासनानंतर कामगारांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले असले तरी, आज पगार न मिळाल्यास उद्यादून एकही कचरा गाडी रस्त्यावर येऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा संघटनेने दिला आहे. तसेच पुढील काळातदर महिन्याच्या दहाव्या तारखेपर्यंत पगार न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. उपायुक्त घनकचरा विभाग यावेळी केडीएमसी प्रशासनानेही सुमित कंपनीला कडक शब्दांत इशारा दिला. कामगारांना वेळेवर वेतन देणे ही कंपनीची जबाबदारी असून त्यात कसूर झाल्यास पुढील महिन्यापासून कठोर कारवाई करण्यात येईल, असे उपायुक्त रामदास कोकरे यांनी स्पष्ट केले. तसेच पालिकेला वेळेवर बिल न सादर करता कामगारांना वेतन न देणे आणि अशा प्रकारे कामबंद आंदोलन घडवून आणणे सहन केले जाणार नाही, असेही घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले आहे.एकूणच, या संपूर्ण प्रकारामुळे केडीएमसीच्या कचरा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
1092
comment0
Report
GMGajanan MAchindar
Mar 18, 2026 08:50:06
Parbhani, Maharashtra:अँकर- राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने आम्हाला धोका दिला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर म्हणजे, रंग बदलणारा सरडा असल्याची घाणघाती टीका, शिवसेना शिंदे गटाचे परभणीचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी केली आहे. परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आज निवड होणार होती. यासाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी एकत्रित येऊन सत्ता स्थापन करणार, अशी रात्रीपर्यंत चर्चा सुरू होती. यामध्ये भाजप अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष पद, तर शिवसेना शिंदे गटाला सभापती पद देण्यात येणार होते. परंतु ऐनवेळी आम्हाला उपाध्यक्ष ऐवजी, सभापती पद देण्याचे ठरवल्याने, आम्ही सत्तेत बसणार नाही. असं सांगत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर टीका केली आहे..
951
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 18, 2026 08:49:46
Yeola, Maharashtra:इंदोर–पुणे महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून २४ मार्चपासून दिवसा अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यात येणार आहे. हा निर्णय येवला–मनमाड–मालेगाव या मार्गावर लागू राहणार असून येथील नागरिकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे येवला परिसरात अलीकडील काळात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून येवला व मनमाड दरम्यान वारंवार मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत होती या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीस नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, २४ मार्चपासून इंदोर–पुणे महामार्गावर दिवसा अवजड वाहतुकीस बंदी राहणार असून रात्री १० ते सकाळी ७ वाजेदरम्यान अवजड वाहतुकीस परवानगी देण्यात येणार आहे मात्र अत्यावश्यक सेवांतील अवजड वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे या निर्णयाबाबतचा अधिकृत आदेश नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जारी केला है
1062
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 18, 2026 08:37:11
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली महापालिकेच्या सभेत काँग्रेस नगरसेविका पाणी प्रश्नावर आक्रमक - सभेमध्ये चक्क मोकळ्या घागरी आणून काँग्रेस नगरसेविकांचे लक्षवेधी आंदोलन अँकर सांगली महापालिकेच्या महासभेत आज काँग्रेस नगरसेविका पाणी प्रश्नावर आक्रमक झाल्या. यावेळी सभेमध्ये चक्क मोकळ्या घागरी आणून काँग्रेस नगरसेविकांनी लक्षवेधी आंदोलन केले. यावेळी काँग्रेस नगरसेविकांनी पीठासनावर महापौर धीरज सूर्यवंशी आणि आयुक्त सत्यम गांधी तसेच उपमहापौर गजानन मगदूम यांना मोकळ्या घागरी भेट दिल्या. यावेळी जनतेला पाणी द्या, अशा घोषणाबाजी करत काँग्रेस नगरसेवकांनी आक्रमकपणे पाणी प्रश्नाचा मुद्दा मांडला. त्यामुळे काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
1059
comment0
Report
Advertisement
Back to top