Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.

Aug 26, 2024 17:26:23
Yavatmal, Maharashtra

राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Mar 05, 2026 02:47:29
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संजयनगरमध्ये मुलीवर चाकू उगारल्याचा प्रकार; व्हिडिओ व्हायरल छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरातील संजयनगर येथील अण्णा भाऊ साठे चौकात काही तरुणांनी दारू व गांजाचे सेवन करून एका मुलीवर चाकू उगारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन पोलिस प्रशासनाने तात्काळ तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याचीही मागणी होत आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 05, 2026 02:46:57
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor राज्यात महत्वाचा यात्रोत्सव म्हणून ओळख असलेल्या नाथषष्ठी सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पैठण येथील ऐतिहासिक नाथवाड्यात आज गुरुवारी दुपारी १२ नंतर पवित्र रांजण भरण्याच्या विधीने सोहळ्याची औपचारिक सुरुवात होत आहे.नाथवाड्यातील रांजण भरण्याची परंपरा अत्यंत पवित्र मानली जाते. विठ्ठलाने नाथांकडे पाण्याचे हे रांजण भरले होते अशी आख्यायिका आहे त्यामुळं नाथ षष्ठी मधील हा एक प्रमुख सोहळा असतो..या विधीनंतर नाथषष्ठी उत्सवाची धार्मिक कार्यक्रमांची मालिका सुरू होते. या कालावहतीत कीर्तन, प्रवचन, भजन, पालखी सोहळा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 05, 2026 02:46:42
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 05, 2026 02:31:47
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 05, 2026 02:31:30
Ahilyanagar, Maharashtra:तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंतीनिमित्त अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी मिरवणुकीतील अडचणी जाणून घेत समन्वयाने मार्ग काढण्याचे सांगितले... ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डीजेऐवजी भारतातील विविध राज्यांतील पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याची संकल्पना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर मांडण्यात आली... तर मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी मंडळांनी स्वयंसेवक नेमून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी बैठकीला उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 05, 2026 02:30:49
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - विनापरवानगी आंदोलन केल्या प्रकरणी सोलापुरात माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह 26 जणांविरोधात गुन्हा दाखल विनापरवानगी आंदोलन केल्या प्रकरणी सोलापुरात माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह 26 जणांविरोधात गुन्हा दाखल काल सोलापूर जिल्हा परिषदेसमोर माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वात माकपने अमेरिका विरोधात केले होते आंदोलन जमावबंदीचे आदेश जुगारून आंदोलन केल्याप्रकरणी माजी आमदार नरसय्या आडम, युसूफ शेख, अनिल वासम, नलिनी कलबुर्गी यांच्यासह 26 जणांविरोधात गुन्हा तर माकपने पुकारलेल्या आंदोलनाला हिंदुत्ववादी कार्यकर्ते सुधीर बहिरवाडे, यतिराज होनमाने या दोघांनी विरोध केला या दोन्ही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी आंदोलन स्थळावरून ताब्यात घेतलं होतं त्यांना देखील महाराष्ट्र पोलीस अधिनियम 69 प्रमाणे शांतता राखण्याची नोटीस बजवण्यात आलीय
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 05, 2026 02:30:31
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पांढरकवडा नगरपरिषदेच्या घनकचरा केंद्राला पुन्हा भीषण आग लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या कचरा डेपोला आगीचे सत्र सुरू आहे. घनकचरा केंद्राच्या ज्या मागच्या बाजूला कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचलेले आहेत, नेमकी त्याच ठिकाणी वारंवार आग लागते. त्यामुळे या आगीवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आग लागल्यानंतरही ती विझविण्यासाठी कुठलीही तत्परता नगरपरिषद प्रशासनाने दाखविली नसल्यानेही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी कचरा साठवून तो शास्त्रोक्त पद्धतीने जमिनीत गाडण्याऐवजी, तो जाळून नष्ट करणे हा सोयीस्कर मार्ग तर नाही ना? या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पांढरकवडावासीय करत आहेत.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 05, 2026 02:16:07
Akola, Maharashtra:चंद्र ग्रहण असल्यामुळे 3 मार्चला काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने धुळीवंदन साजरा करण्यात आले नाही. मात्र काहींनी होळी काल साजरा केली, या पार्श्वभूमीवर अकोल्यात एक धक्कादायक घटना समोर आल्याने सणाला गालबोट लागले आहे. अकोला शहरातील अकोट फाईल पोलीस स्टेशन हद्दीत खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक करण्यात यश मिळवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलोपार्जित घर आपल्या नावाने करून देण्याच्या वादातून सख्या चुलत्या भावाने आपल्या चुलत्या भावाचा खून केला आहे. जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत आरोपी रितीक बहुणे ने मृत विनीत बहुणेचा चाकूने वार करून खून केला आहे. दारूच्या नशेत आरोपी रितीकने विनीत सोबत वाद घातला आणि त्यानंतर त्याने चाकूने विनीतच्या छातीवर वार केला, गंभीर अवस्थेत असलेल्या विनीतला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. आरोपी हा भोपाळ येथे राहणाऱ्या आपल्या मावशीकडे जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर असताना पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अवघ्या दोन तासांत अटक केली. खुनाच्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, सणाच्या दिवशीच घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे तर पुढील तपास पोलीस करत आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 05, 2026 01:00:42
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... गुन्हा दाखल करण्याबाबत कोर्टाचा आदेशाची प्रत जोडली आहे.... त्यासोबत FIR जोडला आहे आणि असाइनमेट नंबरवर पाठवाल......) स्किप्ट :- बनावट सही-शिक्क्याने पदोन्नती... शिक्षकासह मुख्याध्यापकावर गुन्हा... सेवाज्येष्ठता डावलून पदोन्नतीचा डाव ... बनावट ठरावाचा भांडाफोड... न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल.... खोट्या कागदपत्रांमुळे गुन्हा नोंद.... AC :- एखादी शिक्षण संस्था म्हटलं की वशिलेबाजी, पैशांचा खेळ आणि मर्जीतल्या लोकांची भरती… अशा आरोपांची चर्चा नेहमीच होत असते. मात्र आता अशाच एका प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. औसा तालुक्यातील खरोसा येथील नवभारत विद्यालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर सेवा ज्येष्ठता डावलून पदोन्नती मिळवण्यासाठी शालेय समितीचा बनावट अहवाल तयार करण्यात आला. इतकेच नव्हे तर सचिव पदाचा खोटा शिक्काही तयार करून पदोन्नती मिळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार किल्लारी पोलीस ठाण्यात शिक्षक आणि मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून नियम धाब्यावर बसवून पदोन्नती किंवा सेवा ज्येष्ठता डावलल्यास थेट कायद्याचा फास आवळला जाऊ शकतो, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून समोर आला आहे. बाईट :- अशोक खरपडे (संचालक) बाईट :- मल्लिकार्जुन डोके (सचिव)
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 04, 2026 17:18:12
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या जामखेड शहरातील न्यूरानी काँलनी येथे गोळीबारी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे... सायंकाळी सात- साडेसात वाजण्याच्या sumaras गोळीबाराची घटना घडली...यात सागर मोहळकर हा गंभीर जखमी झालाय...जखमी मोहळकर हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असल्याने तो नुकताच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आलेला होता अशी माहिती आहे...गोळीबाराच्या घटनेनंतर जामखेड पोलीसांनी तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, नंतर पुढील उपचारासाठी नगरला हलवले आहे...त्याच्यावर एकुण सात राउंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती आहे...एका अज्ञात व्यक्तीने मोटारसायकलवरून येत त्याच्यावर गोळीबार केला...याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे...मोहळकर हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने नेमका हा गोळीबार कोणत्या कारणाने झालाय हे पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे.
0
comment0
Report
CFChandrakant Funde
Mar 04, 2026 16:32:13
Pune, Maharashtra:लक्ष्मीकांत देशमुख हिंदी सक्ती महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेण्याआधी आमचीही बाजू ऐकून घ्या, असं आवाहन भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलंय...नुकतंच त्यांनी यासंदर्भात थेट मुख्यमंञ्यांना लेखी पत्र लिहून रितसर भेटीची वेळही मागितलीय...हिंदी सक्ती संदर्भात डॉ. नरेंद्र जाधव समितीने नुकताच आपला अहवाल शासनास सादर केलाय त्याआधारेच शासन हिंदी सक्तीचा निर्णय घेऊ शकते, म्हणूनच त्याआधी राज्य भाषा सल्लागार समितीचे म्हणणं शासनाने ऐकून घ्यावं, अशी ठाम भूमिका मराठी भाषाप्रेमी साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी झी 24 तास शी बोलताना मांडलीय...त्यांच्याशी आमचे पुणे ब्युरोचीफ चंद्रकांत फुंदे यांनी केलेली ही exclusive बातचीत... "लक्ष्मीकांत देशमुख, अध्यक्ष, राज्य भाषा सल्लागार समिती"
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top