Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.

Aug 26, 2024 17:26:23
Yavatmal, Maharashtra

राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Dec 27, 2025 17:31:47
Jalna, Maharashtra:जालना : ब्रेकिंग | जालन्यात महायुतीच्या नेत्यांची एकत्रित बैठक संपली, महायुतीतील सर्वच पक्षांच्या अंतिम प्रस्तावावर बैठकीत चर्चा जालन्यात महायुतीय जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला-दानवे, लोणीकर उद्या अंतिम निर्णय होईल-रावसाहेब दानवे युती होण्यात आता कोणतीही अडचण नाही उदया संध्याकाळी शेवटची बैठक-दानवे जागा वाटपाचा फॉर्म्युला पक्ष श्रेष्ठीचा मान्यतेसाठी पाठवणार-दानवे युतीची औपचारिक घोषणा बाकी-खोतकर अँकर : जालना महापालिका निवडणुकीसाठी आज भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाइं आठवले गटाची एकत्रित बैठक झाली आहे. रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. दरम्यान जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर स्थानिक पातळीवर एकमत झाले असून हा जागा वाटपाचा फॉर्म्युला पक्ष श्रेष्ठींकडे मान्यतेसाठी पाठवला जाणार असून उद्या अंतिम बैठक होऊन संध्याकाळपर्यंत निर्णय होईल असं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. तर युतीची केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचं शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी सांगितलं आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 27, 2025 17:31:33
Dhule, Maharashtra:धुळे महापालिकेची निवडणूक राज्यातील अन्य पालिकांच्या तुलनेत वेगळी आणि चर्चेची आहे. वोट जिहादमुळे हा जिल्हा संपूर्ण देशात चर्चेत आला. विधान सभा निवडणुकीतही दोन धर्मांची उभी फाळणी मतदानात पाहायला मिळाली. त्यामुळे विकासाचा मुद्दा या निवडणुकीत गौण ठरून धर्माच्या रंगात हि महापालिका निवडणूक रंगते का हे पाहणे रंजक असणार आहे. धुळे महापालालिकेच्या ७४ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. गेल्या दोन वर्षापासन पालिकेवर प्रशासक राज आहे. त्याआधी या महापालिकेत भाजप स्वयंबळावर पहिल्यांदा सत्तेत आले होते. ७४ पैकी ५१ जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आलं होते, या दरम्यान शकडो कोटींच्या विकासाचा दावा भाजपने केला. सोबतच विरोधकांना आपल्या पक्षात घेत त्यांची ताकद कमी करण्याचा कामही भाजपने समांतर सुरु ठेवले. त्या फायदा लोकसभा निवडणुकीत होईल असं वाटत असताना विशिष्ठ समुदायाने , एकतर्फी मतदान केल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर मात्र भाजपने हिंदुत्वाची री ओढणे सुरु केले असून, विकास आणि हिंदुत्व या दोन मुद्द्यावर भाजप निवडणूक लढेल असे चित्र आहे. युती होताना दिसत नाही , त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वतंत्र निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर ५१ जागा जिंकू असा दावा करीत आहेत. भाजप राष्टवादी काँग्रेस पक्षाच्या ताकदीला घाबरला असल्याचा दावा माजी आमदार फारुख शहा यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे निवडणुकीत रंगत आली असून भाजप कार्यकर्त्यांना शहा यांच्या वक्तव्यामुळे चेव आला आहे. या सर्वांमध्ये एम आय एम देखील महत्वाची ठरणार आहे. अल्पसंख्यांक भागात एम आय एम ला मत मिळाली तर , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आघाडीचे गणित बिघडणार आहे. एम आय एम गेल्या काही निवडणुकांमध्ये निर्णयक भूमिकेत आहे. शहराचा राजकीय इतिहास वैविध्यपूर्ण राहिला आहे. कधी तेलंगी घोटाळ्यात चर्चेत आलेले अनिल गोटे इथले आमदार होतात तर कधी एम आय एम चा आमदार अनपेक्षित निवडणून येतो. आता भाजपमय जिल्हा आहे त्याचा फायदा शहरात राजकीय स्थैर्यासाठी होती कि धुळेकर सत्ते विरोधात कौल देतात हे निवडणुकीत स्पष्ट होईल एकंदरीत धुळ्याची निवडणूक नाराजांच्या पक्ष विरोधी कारस्थानामुळे जास्त गाजेल असं चित्र शहरात आहेत. एक अनार सौ बिमार अशी अवस्था असल्याने निवडणाऱ्यांचा मार्ग पक्षातील तिकीट न मिळालेले उमेदवार अवघड करतील. प्रशांत परदेशी, प्रतिनिधी, धुळे
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 27, 2025 17:19:14
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 27, 2025 14:31:25
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी यांनी एकत्र येत राजर्षी शाहू आघाडीची औपचारिक घोषणा केली आहे. या तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी)चे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी आघाडीची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना व्ही. बी. पाटील यांनी, खासदारकी असो किंवा आमदारकी, आजवर सर्व निवडणुकांमध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून लढलो. मात्र या महापालिका निवडणुकीत इंडिया आघाडीच्या वतीने एकतर्फी भूमिका घेतली गेली. त्यामुळे आता आम्ही आप आणि वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त महापालिका नव्हे तर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही हीच आघाडी एकत्र लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर आज २१ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही दिली. जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी)ला २५ जागा तर वंचित बहुजन आघाडी आणि इतर मित्र पक्षांना ३१ जागा असा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. यावेळी व्हि. बी . पाटील यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे नाव न घेता टीका केली. एका व्यक्तीमुळे इंडिया आघाडी चुकीच्या दिशेने जात असल्याचे नमूद केले.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 27, 2025 14:31:08
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 27, 2025 14:30:26
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 27, 2025 13:54:19
Kolhapur, Maharashtra:महायुती के तौर पर कोल्हापूर महापालिका निवडणूक लढवत असताना जागावाटपात तडजोड करावी लागत असल्याचं भाजपचे सचिव महेश जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. महायुतीकडून तब्बल ७०० ते ८०० इच्छुक निवडणूक लढवण्यासाठी पुढे आल्यामुळे, प्रत्येकाला तिकीट देणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. महेश जाधव यांच्या म्हणण्यानुसार, या परिस्थितीत भाजपला काहीच जागा मिळण्याची शक्यता असून, त्यामुळे अनेक तरुण, निष्ठावंत आणि मेहनती कार्यकर्त्यांना तिकीट मिळणार नाही. तरीही महापालिकेवर महायुतीची सत्ता आणण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यागाची तयारी ठेवावी, असं आवाहन त्यांनी केलं. काही ठिकाणी मित्रपक्षाला जागा गेल्या तरी राग मानू नये, प्रत्येक कार्यकर्त्याचा योग्य सन्मान पक्षाकडून केला जाईल, असा विश्वासही त्यांनी दिला. पक्षविरोधी भूमिका घेऊ नये तसेच बंडखोरी करू नये, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी इशारा दिला आहे. महेश जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आवाहन केलं आहे. पाहूया महेश जाधव नेमकं काय म्हणाले.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 27, 2025 13:47:00
Akola, Maharashtra:अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत बिघाड झाल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. आज जागावाटपाच्या मुद्द्यावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मात्र जागावाटपावर एकमत न झाल्याने ही बैठक निष्फळ ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप 55 शिवसेना एकनाथ शिंदे 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( अ.प ) 10 जागांवर निवडणूक लढणार असल्याचा फार्मूला जवळपास नक्की झाला होता. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र चर्चा केली. त्यानंतर त्यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, अकोला महापालिका निवडणूक फिफ्टी-फिफ्टीच्या ( शिवसेना + राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) फार्मुल्यावर लढण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचा iki पक्षाच्या नेत्यांनी म्हंटलं आहे. मात्र महायुती संदर्भातील अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून चर्चा सुरूच असल्याचे इंद्रनील नाईक , आमदार अमोल मिटकरी आणि एकनाथ शिंदे शिवसेना चे नेते गोपीकिशन बाजोरिया यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, या घडामोडींमुळे अकोला महायुतीतील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली असून पुढील काही तासांत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता וर्तवली जात आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 27, 2025 13:46:37
Vasai-Virar, Maharashtra:वसई विरार में शिवसेना ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढवणार वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये बवीआ, मनसे, काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवणार बहुजन विकास आघाडीच्या चिन्हावर हे दोन्ही पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. पालिकेच्या 29 प्रभागात 115 उमेदवार तिन्ही पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरवले जाणार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या महाविकास आघाडीतून बाजूला होत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला आहे यामुळे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 27, 2025 12:53:03
Pune, Maharashtra:जयकुमार गोरे ऑन शंभूराज देसाई साताऱ्यात महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळाला होता... नाद आणि दहशत या दोन शब्दांवरून मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शंभूराजे यांच्यात वाक्ययुद्ध पहायला मिळालं होतं... शंभूराजे देसाई यांनी बोलताना म्हटलं होतं की आम्ही कोणाचीही दहशत खपवून घेणार नाही...दरम्यान आज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे अहिल्यानगर दौऱ्यावर असताना मंत्री गोरे यांनी शंभूराजे देसाई यांना प्रतिउत्तर दिलं आहे...मंत्री देसाई यांना दहशत नेमकी कोणाची आहे हे चांगलं माहित आहे...ते माझे सहकारी आणि मित्र आहेत...दहशत त्यांनाही चालत नाही आणि म्हणालाही चालत नाही असं गोरे म्हणाले.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 27, 2025 11:52:22
Dharashiv, Maharashtra:धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर पायी साल्हेरच्या किल्ल्यावर प्रसिद्ध शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांच्या शुभहस्ते मला “सह्याद्री भूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला. साल्हेर किल्ला केवळ उंचीचा नाही, तो शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या इतिहासाचा सर्वोच्च शिखर, ओमराजे निंबाळकर यांची फेसबुक पोस्ट मधून व्यक्त केली भावना. हिंदवी परिवार महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित हिवाळी मोहीम अंतर्गत महाराष्ट्रातील सर्वोच्च आणि ऐतिहासिक असा साल्हेर किल्ला पायी सर करण्याचा सुवर्णक्षणाचा साक्षीदार होण्याचा मान मला लाभला. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांतून चालताना प्रत्येक पाऊल इतिहासाशी संवाद साधत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडावर उभं राहिल्यावर मन अभिमानाने भरून आलं आणि स्वराज्याची जाणीव अधिक गडद झाली. शारीरिक थकवा होता, पण मन मात्र उंच आकाशाला गवसणी घालत होतं. या ऐतिहासिक मोहिमेला विशेष अर्थ प्राप्त झाला, जेव्हा प्रसिद्ध शिवव्याख्याते व शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांच्या शुभहस्ते मला “सह्याद्री भूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान वैयक्तिक नसून शिवविचार, सह्याद्री आणि इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताचा आहे. हा पुरस्कार जबाबदारीची जाणीव करून देणारा आणि शिवरायांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प दृढ करणारा आहे. साल्हेर किल्ला | थोडक्यात माहिती • महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला • उंची : सुमारे १५६७ मीटर (समुद्रसपाटीपासून) • जिल्हा : नाशिक • परिसर : बागलाण – साल्हेर–मुल्हेर डोंगररांग • ऐतिहासिक महत्त्व : इ.स. १६७२ मधील साल्हेरची लढाई — छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सैन्यावर मिळवलेला निर्णायक विजय • वैशिष्ट्ये : विशाल पठार, पाण्याच्या टाक्या, प्राचीन अवशेष • साल्हेर–मुल्हेर ही किल्ल्यांची जोडी सह्याद्रीतील अत्यंत महत्त्वाची मानली जाते साल्हेर किल्ला केवळ उंचीचा नाही, तो शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या इतिहासाचा सर्वोच्च शिखर आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 27, 2025 11:51:52
kolhapur, Maharashtra:नागपूर - उमरेड शहरातील गाणगापूर परिसरात आई आणि मुलीची क्षुल्लक कारणातून हत्या, - पार्वताबाई फुकट अस वयोरुद्ध महिलेच तर संगीता रिठे असं मृतक मुलीचे नाव आहे. - गाणगापूर शिवारात माय- लेकी नाल्याला लागून असलेल्या घरामध्ये राहत होत्या, - पार्ववतीबाई यांनी एका व्यक्तीला शिवीगाळ केली त्यामुळे संतापून रागाचा भरात दोघीना लाकडी दांड्याने मारहाण केली. यात दोघीचा मृत्यू झाला. - संगीता रिठे हिचा विवाह शेगाव येथे झाला होता. पतीच्या मृत्यूनंतर ती आई जवळच राहत होती. - लाकडी दांडा नदीकाठवर फेकला, या घटनेने परिसरात खळबळ उडल्यानं मोठया प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. - उमरेड पोलिसांनी एकाला संशयाचा आधारावर ताब्यात घेतल आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top