Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.

Aug 26, 2024 17:26:23
Yavatmal, Maharashtra

राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Dec 13, 2025 05:36:21
Kolhapur, Maharashtra:कर्नाटकातील सौंदत्ती डोंगरावरील रेणुका यात्रेनंतर कोल्हापूरात होणा-या यल्लम्मा देवीच्या यात्रेला अनन्य साधारण महत्त्व आहे. ही यात्रा उदं ग देवी उदं च्या जयघोषात आज सुरू आहे. या यात्रेला ओढ्यावरच्या यात्रा म्हणुनही ओळखलं जातं. या यात्रेसाठी कोल्हापूर जिल्हयातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरवर्षी मार्गशीर्ष चतुदर्शीला कर्नाटकातील सौंदत्ती डोंगरावर श्री रेणुका देवीची यात्रा होते. याला कंकण विमोचन सोहळा म्हणुन ओळखलं जातं. श्री जमदग्नीच्या वधानंतर रेणुकादेवीला वैधव्य येते. या विधीसाठी कोल्हापूरातील मानाचे जग कर्नाटकातील सौंदत्तीला रवाणा होतात. तीथली यात्रा झाली की यल्लमादेवी आणि तिच्यासोबत विधवा होऊन देवदासीँ कोल्हापूरात परततात. या सगळ्याचं सांत्वन करण्याचा दिवस म्हणजे यल्लम्मा देवीची यात्रा होय. या यात्रेच्यास येताना भाविक यल्लमादेवीचे आवडते अन्नपदार्थ म्हणजे दहीभात , अंबिल, वडी -भाकरी , वरना -वांग्याची आणि मेथीची भाजी गाजर , केळी , कांद्याची पात ,लिंबू आणि फळे देवीला अर्पण करतात. हे पदार्थ देवीला अर्पण करुन देवीचे दुख हलक करण्याची प्रथा अनेक वर्षांची आहे. राज्यात अनेक ठिकाणी भरणा-या यात्रा जत्र्यांना वेगवेगळे धार्मिक महत्त्व आहे. असंच महत्त्व कोल्हापूरातील या यल्लाम्मादेवीच्या यात्रेला आहे. त्यामुळचं कोल्हापूर जिल्ह्यातील भक्त आवर्जुन देवीच्या यात्रेला हजेरी लावतात.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 13, 2025 05:06:02
Nashik, Maharashtra:गोवर्धन शिवारात फाशीच्या डोंगराजवळ निर्जनस्थळ मजुराचा खून करणाऱ्या एकास बिहार, तर दुसऱ्यास उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. दारूच्या वादातून दोघांनी खून केल्याची कबुली दिली. अरविंद ऊर्फ पप्पू पशुपतिनाथ पांडे असे मृत्यू मजुराचे नाव आहे... २९ नोव्हेंबरला त्याचा मृतदेह गोवर्धन शिवारात फाशीच्या डोंगराजवळ निर्जनस्थळी आढळून आला होता. मुख्य संशयित धर्मेंद्र शिवनारायण प्रजापती व मंजय केशव पंडित अशी अटका केलेल्या संशयितांची नावे आहेत. मजुर अरविंदवर धारदार हत्याराने वार करण्यात आले होते. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृत अनोळखी पुरुषाबाबत अंबड, सातपूर एमआयडीसी परिसरात शोध घेण्यात आला.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 13, 2025 05:04:24
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 13, 2025 04:53:46
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - ऊस कारखान्यांच्या विरोधात सुरू असलेल्या जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला आले यश - जनहित शेतकरी संघटनेने पुणे साखर आयुक्तालयात समोर केलेल्या आंदोलनाला यश - सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने ऊसाचा दर जाहीर न करणे, ऊसाला साडेतीन हजार रुपये दर देण्याची मागणी, गेल्या वर्षी साखर कारखान्यांनी थकीत बिलावर 15 टक्के व्याज देण्याची मागणी करण्यात आली होती - जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख दोन दिवसापासून पुणे साखर आयुक्तालयासमोर करत होते आंदोलन - साखर आयुक्तांनी जनहित शेतकरी संघटनेच्या सर्व मागण्या मान्य करत जिल्हा प्रशासनाला दिले आदेश - जिल्ह्यातील कारखानदाराने साडेतीन हजार रुपये उसाचा दर जाहीर करावा अन्यथा कारखाने बंद पाडण्याचा इशारा जनहित शेतकरी संघटने कडून देण्यात आला..
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 13, 2025 04:53:31
Amravati, Maharashtra:उद्धव ठाकरे यांच्या विधानावर नवनीत राणा यांची जोरदार टीका; तुम क्या थे और क्या हो गये राणा यांचा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना “तुम क्या थे, तुम क्या हो गये” असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपा नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. राणा म्हणाल्या उद्धव ठाकरे जी तुम्ही फडणवीसजींना काय बोलता त्यापेक्षा आधी स्वतःला हा प्रश्न विचारा तुम क्या थे और क्या हो गये? असे म्हणत नवनीत राणा यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. हिंदूंच्या बाजूने जेव्हा न्यायालय महत्त्वाचा निर्णय देते, जसे मदुराई येथील सुब्रमण्यम स्वामी मंदिरात दिवा लावण्याबाबत न्यायमूर्तींनी दिलेला निर्णय तेव्हा विरोधी पक्षातील नेते त्या न्यायमूर्तींच्या विरोधात जाऊन सह्या करतात. हेच तुमचे खासदार विरोधी पक्षात बसून हिंदूविरोधी भूमिकेचा भाग बनतात आणि त्या पत्रावर सही करतात. त्यामुळे उद्धव ठाकरे जी दुसऱ्यांवर टोमणे मारण्यापूर्वी स्वतःच्या पक्षातील लोकांचे कृत्य पाहा. देशातील हिंदूंच्या भावनांविरोधात जाणाऱ्या भूमिकेचे उत्तर तुम्हालाही द्यावे लागेल अशा शब्दांत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बाईट :– नवनीत राणा, माजी खासदार
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 13, 2025 04:46:30
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज भाजप नेते अशोक चव्हाण यांनी घेतले अंत्यदर्शन...शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले....अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली भावना... भाजप नेते खा. अशोक चव्हाण यांनी आज सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले... शिवराज पाटील चाकूरकर यांनी केंद्रात वेगवेगळी पदे भूषवली....राज्यासाठी आणि मराठवाड्यासाठी खूप मोठे काम त्यांनी केले...देशाच्या राजकारणात त्यांनी एक वेगळे स्थान निर्माण केले....त्यांच्या जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले..अशी भावना खा. अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली...
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 13, 2025 04:30:26
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश चाचणी परीक्षा आज ही परीक्षा सकाळी १०.३० ते दुपारी १.30 या वेळेत जिल्ह्यातील एकूण३२ परीक्षा केंद्रांवर घेण्यात जाणार आहे. वाशिम शहरात आठ परीक्षा केंद्रे असून उर्वरित केंद्रे जिल्ह्यातील विविध तालुका व शहरांमध्ये आहेत.परीक्षा सुरळीत व पारदर्शक पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात ओळखपत्रा शिवाय प्रवेश तसेच मोबाईल व इलेक्ट्रॉनिक साधनांवर बंदी घालण्यात आली आहे.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात आल्या असून कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 13, 2025 04:18:00
Washim, Maharashtra:वाशिम नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षशिस्त मोडणाऱ्या बंडखोरांवर कठोर कारवाई केली आहे. अधिकृत उमेदवारांविरोधात उमेदवारी दाखल केल्याने १६ बंडखोरांना पुढील सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. भाजपच्या जिल्हा कोरकमिटीच्या बैठकीनंतर जिल्हा अध्यक्ष पुरषोत्तम चितलांगे यांनी हा निर्णय घेतला आहे. या कारवाईत जिल्हा, शहर तसेच महिला मोर्चा, युवा मोर्चा व उत्तर आघाडीतील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. भविष्यात पक्षविरोधी भूमिका घेतल्यास आणखी कठोर कारवाई केली जाईल, असे इशाराही भाजपकडून देण्यात आला आहे. करून काळे, छाया पवार, प्रभाकर काळे, वैभव उलेमाले, राजेश विश्वकर्मा, आशा खटके, गजानन ठेंगडे, धनंजय हेंद्रे, संगिता पिंजरकर, मदन राठी, मुकेश चौधरी, अनंत रंगभाळ, सावंतसिंग ठाकूर, सचिन पेंढारकर, अनिता इंगोले आणि गजू लांडगे यांना निलंबित करण्यात आलं आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 13, 2025 04:17:24
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 13, 2025 04:07:15
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस स्टेशनचा ठाणेदार नरेश रणधीर याला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महिला अधिकाऱ्यांनी वेषांतर करून ही कारवाई यशस्वी केली आहे. तक्रारदाराने मित्राला उसने दिलेले दहा लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी नरेश रणधीरने पाच लाख रुपये लाच मागितली होती. तडजोडीत तीन लाख रुपये देण्याचे ठरले. त्यातील १ लाख रुपये स्वीकारत असताना महिला अधिकारी वेषांतर करून लहान मुलाला कडेवर घेऊन ठाणेदाराच्या कक्षात पोहोचली आणि लाच घेणाऱ्या ठाणेदार रणधीरला रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 13, 2025 04:04:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:हरसूल चेतनानगर येथील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या बहुमजली टॉवरांना महानगरपालिकेने खास नावे दिली आहेत. अतिक्रमण विभागप्रमुख संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली १४५ अतिक्रमणे यशस्वीपणे हटवून प्रकल्प जागा मोकळी केली. झोन ४ चे सहायक आयुक्त अशोक गिरी व अतिक्रमण विभागाचे नागरी मित्र पथकातील संजय पवार यांच्या समन्वयाने ही कारवाई झाली. यामुळे आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी पाहणी करून त्यांच्या धाडसाचे कौतुक करत या तीन इमारतींना या 3 अधिकाऱ्यांची नाव दिली आहेत, संतोष, अशोक आणि संजय अशी नाव इमारतीला देण्याचे ठरले आहे... मात्र महापुरुषांची नाव सोडून  अधिकाऱ्यांची नावे इमारतीना का  असा सवाल उपस्थित करत आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे...
0
comment0
Report
Advertisement
Back to top