Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.

Aug 26, 2024 17:26:23
Yavatmal, Maharashtra

राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRANAV POLEKAR
Dec 15, 2025 03:46:21
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीतील जहाजाची प्रतिकृती कोलकाता संग्रहालयात रत्नાગिरी शहरापासून जवळच असलेल्या मिरजोळे पाटीलवाडी येथे दी माॅडेल क्राफ्टच्या टीमने अवघ्या २२ दिवसांत तयार केलेल्या ३५ फूट आकाराच्या ‘आयएनएस ओल्ड विक्रांत’ जहाजाची प्रतिकृती दिल्ली रक्षा मंत्रालयाच्या कोलकाता येथील पी. एम. संग्रहालयाचे आकर्षण ठरणार आहे. टीम लीडर मयूर वाडेकर व त्याच्या १४ जणांच्या टीमने ही जहाजाची भव्य प्रतिकृती तयार केली आहे. रत्नागिरीत तयार झालेली ही भारतातील पहिली प्रतिकृत्ती असल्याचे मयूर याने सांगितले. मयूर हा २०१३ सालचा नेव्हल एनसीसी छात्र असून, त्याने सन २०१९ ते २०२१ या कालावधीत शीप माॅडेलिंगचे प्रशिक्षण कोचिन येथे पूर्ण केले. त्यानंतर २०१७ पासून तो शीप माॅडेलिंग करत आहे. मयूर याच्या दी माॅडेल क्राफ्ट टीमला ‘आयएनएस ओल्ड विक्रांत’ जहाजाची प्रतिकृती अवघ्या एक महिन्यात तयार करण्याची ऑर्डर मिळाली. वूड प्लस जीआरपीमध्ये ही प्रतिकृती तयार करायची असल्याने टीमपुढे आव्हान होते. मात्र गेले २२ दिवस-रात्र अखंड परिश्रम घेत मयूर वाडेकर व त्याच्या टीमला ३५ फूट आकार व तीन टनापेक्षा जास्त वजनाच्या जहाजाची प्रतिकृती तयार करण्यात यश आले आहे. जहाजाची प्रतिकृती तयार करण्यासाठी दीड हजारापेक्षा अधिक खर्च आला आहे. वूड फिनिशिंग, सॅंडिंग, पार्ट फिनिशिंग, स्टील वेल्डिंग, एअरक्राफ्ट तयार करण्यासाठी वेळ अधिक लागतो. वैशिष्ट्य म्हणजे कलाकाैशल्याचा वापर करून जहाजाची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे ‘शिवधनुष्य’ पेलण्यासारखे आहे. मात्र मयूर व त्याची टीम त्यामध्ये यशस्वी ठरली आहे.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 15, 2025 03:46:08
Ratnagiri, Maharashtra:दुचाकीची रिक्षा टेम्पोला धडक दिल्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. राज सुधाकर कोत्रे ( 19, रा. कापडगाव,रत्नागिरी ) याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेले आर्यन विनोद कुरतडकर (19) आणि पार्थ विजय कुरतडकर (19,दोन्ही रा कापडगाव, रत्नागिरी) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.हे तिघेही ऍक्सेस दुचाकीवरून चालले होते. त्याच sुमारास निवळी येथून रत्नागिरीच्या दिशेने जाणारा रिक्षा-टेम्पो (एमएच -08- बीसी- 1279) रात्री 9.20 वाजता खेडशी महालक्ष्मी मंदिराजवळून जात असताना समोरून येणाऱ्या ॲक्सेस दुचाकीने (एमएच- 08- एडब्ल्यू- 1662)ने त्या रिक्षা टेम्पोला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती कि, त्यामुळे दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर पडले. यात राज कोत्रेचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभिर जखमी झाले. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Dec 15, 2025 03:03:05
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 15, 2025 03:02:52
Chendhare, Alibag, Maharashtra:मंत्री भरत गोगावले यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत साकडे रखडलेली कामे पूर्ण करण्याची मागणी महामार्गाच्या कामाबाबत सुचवले महत्वपूर्ण बदल अँकर मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी कारणाचे उर्वरित काम तातडीने करावे यासाठी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी नितीन गडकरी यांना साकडे घातले आहे. गोगावले यांनी गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिलंय. महामार्गावरील रखडलेले पूल, आवश्यक असलेले अंडर पास आणि सर्विस रोड या कामांबाबत त्यांनी काही बदल सुचवले आहेत. याची पूर्तता केल्यास महामार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुखकर होऊन नागरिकांची देखील गैरसोय होणार नाही असेही या पत्रात सूचित करण्यात आले आहे。
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 15, 2025 03:00:31
Jalna, Maharashtra:जालना : शहरातील 12 हजार मालमत्तांवर पडणार 10 हजारांचा बोजा जालना शहरातील विविध भागात 12 हजार अनधिकृत नळ कनेक्शन धारक आहेत. हे नळकनेक्शन नियमानुकूलीत करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली आहे. यात आतापर्यंत 458 नळ कनेक्शनधारकांनी 34 लाख 35 हजार भरुन हे नळ नियमानुकूलीत केले आहेत. परंतु, अजूनही अनधिकृत नळ कनेक्शन धारक आहेत, त्यांनी 20 डिसेंबरपर्यंत 7 हजार 500 रुपये भरुन नळ नियमानुकूलीत न केल्यास अनधिकृत नळ कनेक्शन धारकांच्या मालमत्तांवर 10 हजार रुपयांचा बोजा महानगरपालिका टाकणार आहे. या कारवाईमुळे जालनेकरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जालना शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळ कनेक्शन धारक आहेत. या नळकनेक्शनचा एका एजन्सीव्दारे सव्हें करण्यात आला आहे. नळ कनेक्शन धारकांनी 10 हजारांऐवजी अडीच हजारांची सूट देऊन ७,५०० रुपये भरुन हे नळ कनेक्शन अधिकृत करुन घ्यावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 15, 2025 02:47:49
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती शहराच्या संशोधित विकास आराखड्यातील (डीपी) महत्त्वाच्या २२ रस्त्यांबाबत महापालिकेने घेतलेले आक्षेप नगरविकास विभागाने पूर्णपणे धुडकावल्याची माहिती सूत्रांनी दिली. रस्त्यांची रुंदी घटवणे, अलाइनमेंट बदलणे आणि भविष्यातील लोकसंख्या वाढीचा विचार न करणे या गंभीर मुद्द्यांवर महापालिकेने नोंदवलेले आक्षेप शासनाने ग्राह्य धरले नाहीत. त्यामुळे येणाऱ्या कळात त्या भागात वाहतूक कोंडी वाढू शकते, असे मनपाचे म्हणणे आहे. ३३ वर्षांनंतर सुधारित विकास आराखडा तयार झाला आणि शासनाने मंजूरही केला. मात्र, त्याच आराखड्यातून वगळलेल्या घटकांचा वेगळा नकाशा तयार करून नागरिकांना आणि संस्थांना आक्षेप घेण्याची संधी देण्यात आली. महापालिकेने तेथे २३ पैकी २२ रस्त्यांवरील बदलांविरोधात सविस्तर आक्षेप दाखल केले होते. मात्र नगररचना विभागाने काहीही विचार केला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 15, 2025 02:32:41
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आता दिव्यांग वैश्विक प्रमाणपत्र अर्थात 'युनिक डिसॅबिलिटी आयडी' (यूडीआयडी) प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. त्या अनुषंगाने नुकतेच छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद प्रशासनाने दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली. 'यूडीआयडी' प्रमाणपत्र सादर न केलेल्या ३५३ पैकी १८ कर्मचाऱ्यांना 'कारणे दाखवा' नोटिसा बजावण्यात आल्या. त्यांना सोमवारी सायंकाळपर्यंत प्रमाणपत्र अथवा समाधानकारक खुलासा सादर करावा लागणार आहे, अन्यथा त्यांच्या सेवा धोक्यात येण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांत दिव्यांगाची बोगस प्रमाणपत्रे सादर करून काही जणांनी नोकरी, पदोन्नती, बदली, वेतनवाढ इ. लाभ घेतल्याच्या घटना उघडकीस आल्या. शासनाने आता सर्व शासकीय, निमशासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी 'यूडीआयडी' कार्ड अनिवार्य केले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 15, 2025 02:31:52
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी सोमवार, १५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप मतदार याद्यांवर दाखल झालेल्या ७,५६७ आक्षेपांचे निराकरण करून, दुबार नावे वगळल्यानंतर ही अंतिम यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे... महापालिका निवडणुकीसाठी आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर करून ३ डिसेंबरपर्यंत आक्षेप नोंदविण्याची मुदत वाढवली. त्यानंतर अंतिम याद्या अधिप्रमाणित करून जाहीर करण्याची तारीखही १० डिसेंबरवरून १५ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.दरम्यान, प्राप्त आक्षेपांची छाननी करून चुकीच्या प्रभागात गेलेले मतदार, दुबार नोंदी आणि महापालिका हद्दीबाहेरील नावे वगळण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सर्व बदल कंट्रोल चार्टद्वारे राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले असून, त्यानंतर आज अंतिम मतदार यादी प्रकाशित होत आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 15, 2025 02:31:36
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) तिसऱ्या समांतर धावपट्टीच्या विकासासाठी सविस्तर तांत्रिक-व्यावसायिक व्यवहार्यता अभ्यास करण्याकरिता सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सिडकोने सुरू केली आहे. या अभ्यासासाठी नामांकित व पात्र स्वतंत्र संस्था तसेच संयुक्त उपक्रम/संघटनांकडून निविदा मागविण्यासाठी प्रस्ताव मागणी (Request for Proposal – RFP) तयार करण्यात आली आहे. सध्या मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्राला (MMR) प्रमुखत्वे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) सेवा देत असून, त्याची प्रवासी हाताळणी क्षमता सुमारे ५० ते ५५ दशलक्ष प्रवासी प्रतिवर्ष (MPPA) इतकी मर्यादित आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर, मुंबई व नवी मुंबई येथील विमानतळांद्वारे सुमारे १५० MPPA क्षमतेची नियोजित बहुविमानतळ व्यवस्था कार्यान्वित होणार आहे. यात CSMIA ची क्षमता ५०–५५ MPPA तर NMIA ची क्षमता ९०–९५ MPPA इतकी असेल. NMIA चे आगामी विस्तार टप्पे आणि CSMIA येथील क्षमतेत वाढ यांद्वारे मध्यम कालावधीतील वाढती मागणी पूर्ण करण्यात येणार असली, तरी २०३७ नंतरच्या दीर्घकालीन हवाई वाहतूक मागणीसाठी NMIA वरील तिसऱ्या धावपट्टीसारख्या अतिरिक्त पायाभूत सुविधांचा विचार करण्यात येत आहे. सुमारे १,१६० हेक्टर क्षेत्रावर विकसित होत असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी आणि ३.२ दशलक्ष टन मालवाहतूक हाताळण्याच्या क्षमतेसह नियोजित आहे. या विमानतळावर एकाच वेळी स्वतंत्रपणे कार्य करू शकणाऱ्या दोन समांतर धावपट्ट्या तसेच परस्पर जोडलेल्या चार प्रवासी टर्मिनल्सची उभारणी करण्यात आली आहे. यात टर्मिनल-१ ची क्षमता २० MPPA, टर्मिनल-२ ची ३० MPPA, तर टर्मिनल-३ आणि टर्मिनल-४ प्रत्येकी २० MPPA इतकी आहे. त्यामुळे एकूण टर्मिनल क्षमता ९० MPPA इतकी आहे. हे विमानतळ पाच टप्प्यांत विकसित करण्यात येत असून, पहिला व दुसरा टप्पा (२० MPPA capacity) २५ डिसेंबरपासून देशांतर्गत उड्डाणांच्या प्रारंभासाठी सज्ज आहे. पुढील टप्प्यांमध्ये २०२९ पर्यंत क्षमता ५० MPPA, २०३२ पर्यंत ७० MPPA आणि २०३७ पर्यंत ९० MPPA इतकी वाढविण्यात येणार आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 15, 2025 02:17:27
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn bjp shivsena avb Feed csn bjp shivsena ( काल संध्याकाळी 7.30 ला पाठवले आहे ) भाजप शिवसेना येणाऱ्या महापालिका निवडणुकात युतीमध्ये लढावी यासाठी वरिष्ठ पातळीवरनं हालचाली झाल्या आणि महायुतीत लढण्याचे ठरले , याबाबत वरिष्ठ नेते स्थानिक पातळीवर वारंवार सूचना सुद्धा देताय, मात्र असं असलं तरी स्थानिक पातळीवरचा कुरघोडी चे राजकारण संपेना असे चित्र आहे.. संभाजीनगर मध्ये भाजपाने एक सर्वे केला त्यात त्यांना निम्म्या जागा मिळालेल्या दिसत आहे त्यामुळे अर्थातच मोठा भाऊ या निवडणुकीत आम्हीच असणार असं भाजपचा म्हणणं आहे आणि यातून जागा वाटपात जास्त जागा हव्यात असा संदेशही त्यांनी दिला आहे तर शिवसेना मात्र भाजपच्या या दाव्याला उडवून लावतेय.. निवडणुकीनंतर ठरेल मोठा भाऊ कोण ज्याचा जास्त जागा तो मोठा भाऊ असे शिवसेनेचा म्हणणं आहे आणि त्यांनी भाजपला इतिहास काय आहे याचीही माहिती ठेवा असं टोला हि लगावला आहे, संभाजीनगर महापालिकेत कायमच शिवसेनेच्या जास्त जागा होत्या त्यामुळे नेहमीच ते मोठ्या भावाच्या भूमिकेत होते मात्र भाजपची ताकद आता वाढली आहे त्यामुळे त्यांना जास्त जागा पाहिजे आणि त्यामुळे आम्हीच मोठे असल्याचा ते दावा करतायेत , या दाव्या प्रतिदाव्यातून या दोन्ही पक्षाचा सुप्त वाद मात्र पुढे येतोय आता यावर senior कसा तोडगा काढतात यावरच जागा वाटपाचे गणित अवलंबून आहे... Byte किशोर शितोळे, भाजप शहर अध्यक्ष ( अर्थातच आम्ही मोठे भाऊ हे वाक्य काढा ) Byte राजेंद्र जंजाळ, शिवसेना शहर अध्यक्ष...
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 15, 2025 01:45:17
Chandwad, Maharashtra:जम्मू-काश्मीर येथील कुपवाडा परिसरात हाडे गोठवणाऱ्या उणे २२ अंश किमान तापमानात देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना चांदवड तालुक्यातील पाटे येथील सुपुत्र वीर जवान किशोर अंबादास ठोके यांचे १२ डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यासह शोककळा पसरली आज दुपारी ५ वाजता जवान किशोर ठोके यांचे पार्थिव पाटे गावात दाखल झाले. यावेळी ‘भारत माता की जय, वीर जवान किशोर ठोके अमर रहे’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. अखेरचे दर्शन घेताना आई, पत्नी, भाऊ आणि कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला यावेळी पत्नी वैशाली ठोके यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. “दोन दिवसांनी आपले बाळ जन्माला येणार आहे… जन्मानंतर बाळाला पहिल्यांदा हातात घेण्याचे स्वप्न तुम्ही पाहिले होते, पण ते स्वप्न अपूर्णच राहिले… बाळ तुम्हाला उठायला हाक देत आहे,” असे म्हणत त्या अक्षरशः कोसळल्या. उपस्थितांचे डोळे अश्रूंनी भरून आले देवळाली कॅम्प येथून आलेल्या जवानांनी तसेच नाशिक ग्रामीण पोलिसांनी तीन राउंड फायर करून वीर जवानाला मानवंदना दिली. यावेळी वीर पत्नी वैशाली ठोके यांना तिरंगा सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर भावाने मुखाग्नी देत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले
0
comment0
Report
Advertisement
Back to top