Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.

Aug 26, 2024 17:26:23
Yavatmal, Maharashtra

राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Mar 02, 2026 16:00:30
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - इटकरे येथे राहत्या घराला भीषण आग, आगीत साडेसात लाखांची रोकडसह सोन्या- चांदीचे दागिने जळून खाक.. अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या इटकरे येथे राहत्या घराला भीषण आग लागली आहे.ज्यामध्ये सुमारे नऊ लाखांचं नुकसान झालं आहे.इटकरे येथील माने बंधूंच्या घराला ही आग लागली आहे. ज्यामध्ये दोन्ही भावांचे घर जळून खाक झाली आहेत,या आगीमध्ये साडेसात लाखांच्या रोकड आणि सोन्या चांदीचे दागिनेही जळाले आहेत.घराच्या बांधकामासाठी दोघा भावांनी ही रक्कम घरात ठेवली होती.दुपारच्या सुमारास माने यांच्या घरातुन अचानकपणे धुराचे लोळ उठले,काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केलं, ज्यामध्ये घरातील संसार साहित्यासह इतर साहित्य रोख रक्कम आणि सोने चांदीचे दागिने जळून खाक झाले आहेत, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे,मात्र आगीचं कारण हे समजू शकलो नाही,पण या घटनेमुळे इटकरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 02, 2026 16:00:14
Kalyan, Maharashtra:कल्याण मोहने परिसरात उल्हास नदी किनारी निषेध होळी निषेध व्यक्त करत नदी वाचवा,भविष्य वाचवा असा जोरदार घोषणा देत निषेध होळीच्या माध्यमातून नदी प्रदूषणाविरोधात जनजागृती करण्याचा आणि संबंधित यंत्रणांना जागे करण्याचा प्रयत्न करून निषेध होळी पेटवण्यात आली उल्हास नदीतील वाढते सांडपाणी, औद्योगिक रसायने आणि कचऱ्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याचा थेट परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याची भावना गावकरी आणि स्थानिकांनी व्यक्त केली. या वेळी मोठ्या संख्येने गावकरी व स्थानिक नागरिक आणि नदी बचाव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रशासनाचा निषेध व्यक्त करत नदी वाचवा – भविष्य वाचवा असा जोरदार घोषणा देखील दिली . निषेध होळीच्या माध्यमातून प्रशासनाने तातडीने कारवाई करून नदी स्वच्छतेसाठी ठोस पावले उचलावीत, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी गावकऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 02, 2026 15:47:38
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 02, 2026 15:46:13
Akola, Maharashtra:अकोल्यात आज होळीचा पारंपारिक उत्सव पहायला मिळाला. शहरातील राणीसती मंदिरात पारंपारिक पद्धतीने ' होळीका दहना 'चा कार्यक्रम पार पडला. गेल्या 25 वर्षांपासून येथील होळी दहनाच्या कार्यक्रमाला अकोलेकर मोठी गर्दी करत असतात.आज रात्री आठच्या सुमारास होळी दहन करण्यात आली.पौराणिक काळात राजा हिरण्यकष्यपूची बहिण होलीका हिच्या वधाचा दिवस होळी म्हणून साजरा केला जातो.भक्त प्रल्हादाचा वध करण्यासाठी भक्त प्रल्हादसह सरणावर बसलेल्या होलीकेचाच मृत्यू यामध्ये झाल्याची आख्यायिका आहे. राणीसती मंदिरात याच आख्यायिकेचा सुंदर देखावा निर्माण करून होलीका दहन केले जाते.आज या कार्यक्रमात होलीकेचे दहन करून वाईट विचारांची होळी करण्यात आली. या निमित्ताने हजारोच्या संख्येने अकोलेकर या ठिकाणी दर्शनाला येतात.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 02, 2026 15:34:52
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 02, 2026 15:31:27
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरात होळी सणादिवशीचं निवडणूक भत्ता मिळावा यासाठी आशा सेविका रस्त्यावर उतरून आंदोलन केले.. कोल्हापुर महापालिकेची निवडणूक होवून दीड महिना झालं तरीसुध्दा 275 आशा सेविकांना निवडणूक भत्ता मिळालेला नाही.. त्यामुळे आज भारतीय मजदूर संघाच्या वतीने आशा सेविकांकडून महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आलीत.. यावेळी आंदोलक महिलांनी जोरदार घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला.. दरम्यान महापौर रुपाराणी निकम यांनी या आंदोलक महिलांची भेट घेत निवेदन स्विकारलं.. शिवाय येत्या 12 दिवसात निवडणूक भत्ता देण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय.. तसचं महिला आपल्या हक्कांसाठी लढत असल्याचं कौतुक केलंय.. यावेळी आपण महापालिकेच्या कारभारावर कंटाळलो आहे.. त्यामुळे आता मी ॲक्शन मोडवर आल्याचं म्हणतं आपण ताराराणीच्या लेकी आहात.. रस्त्यावर आंदोलन करायला लागतयं हा कमीपणा असल्याची खंत महापौरांनी बोलून दाखवली.. महिलांनी रस्त्यावर बसलेलं मला आवडणार नाही.. आपण काय भीक मागत नाही.. त्यामुळे यापुढे कोणत्याही प्रश्नांसाठी महापालिकेत आपल्याला पहिल्यांदा भेटावं अस महापौरांनी सांगितलं..
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 02, 2026 15:15:51
Amravati, Maharashtra:अमरावती शहराचे ग्रामदैवत असलेल्या आंबा देवी संस्थान समोर परंपरेप्रमाणे नवसाच्या होळीचे दहन; महिनाभर नवस बोलून रचली जाते होळी अमरावती शहराचे ग्रामदैवत असलेल्या आंबा देवी संस्थान समोर दररोज प्रमाणे याहीवर्षी परंपरेप्रमाणे नवसाच्या होळीचे दहन करण्यात आले आहे. माघ पौर्णिमेपासून या होळी उत्सवाची औपचारिक सुरुवात होत असून यंदा १ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रतिष्ठापना करण्यात आली होती. नवसाची होळी म्हणून या होळीची ओळख असून महिनाभर नवस बोलून भाविक नारळ करतात. होळीच्या मध्यभागी हेटीच्या झाडाचे खोड रोवले जाते त्याचा धूर औषधी मानला जातो अशी श्रद्धा आहे. शास्त्रोक्त विधीने शेणाच्या गोवऱ्या, लाकडे व गाठींची रचना करून होळी उभारली जाते. महिला भाविकांची मोठी गर्दी इच्छा पूर्ण झालेल्या महिला होळीची ओटी भरतात अनेक महिला आगामी मनोकामनेसाठी नवस बोलून नारळ वाहतात अंबा देवी मंदिर संस्थांच्या नोंदीनुसार ही परंपरा सुमारे १२5 वर्षांहून अधिक काळा पासून अखंड होळी सुरू आहे. आज या होळीची सूर्यास्तावेळी विधीवत पूजा करून होळी दहन करण्यात आले असून यावेळी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 02, 2026 15:01:41
Nagpur, Maharashtra:नागपूर में SBL कंपनी में स्फोटातल्या जखमींना भेटण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑरेंज सिटी हॉस्पिटलला पोहोचले. डॉक्टरांकडून जखमींच्या प्रकृतीची माहिती जाणून घेतली. 19 जणांचा मृत्यू झाला आहे. इथे अजून 17 जणावर उपचार सुरू आहेत; सर्व क्रिटिकल आहेत. 21 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे; मॅनेजिंग डायरेक्टरसह 11 जणांना अटक झालीय. काही लोकं फरार आहेत; नुकसान भरपाई देण्याचं जाहीर केलं आहे. मागील घटना पाहता, या प्रकियेकडे अवलोकन करण्याची गरज आहे. केंद्राचे कायदे अनुषंगाने बदल केले पाहिजेत; अभ्यासपूर्ण रिपोर्ट्स केंद्राला पाठवले जाणार आहेत. बॉक्स पडला तरी मोठा स्फोट होऊ शकतो; ऑटोमेशन करण्याच्या अनुषंगाने बदल केल्या येतील का यावर केंद्राला अहवाल पाठवला जाईल. नियम जुने झाले आहेत; ज्वलनशील पदार्थांची तयारी आस्तित्वात असल्यामुळे सगळे गरीबांना सुरक्षित उपचार उपलब्ध करावेत, याबद्दल विचार केला पाहिजे. पेसो आणि डिशचे दुर्लक्ष असल्याचं मुद्दा मांडला गेला. पेसोने आपले प्रोटोकॉल रिवाईज करायचे आहेत; हे गरजेचे आहे. 2008 साली नियम होते, आजच्या स्तरावर तेच प्रोटोकॉल तपासायला हवेत. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली; कडक कारवाई नक्की होईल. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून उपाययोजना चालू असावी. मागील स्फोटानंतर ऑडिट झाले पाहिजे; मानव त्रुटी टाळण्यासाठी काय करायचं ते पाहणार आहेत.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 02, 2026 14:33:36
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी काठावर असणाऱ्या प्रोसेस व केमिकल कंपन्या, औद्योगिक वसाहती तसेच साखर कारखान्यांकडून रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने गंभीर प्रदूषण होत आहे. परिणामी नदीकाठच्या गावांमध्ये साथीचे आजार पसरत आहेत. या प्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघठनाच्या कार्यकर्त्यांनी केलीय. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन संबंधित घटकांवर तातडीने कारवाई करा अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य, शेती व जलचरांवर परिणाम होत असून त्वचारोग, अतिसार, ताप व कावीळसारखे आजार वाढले असल्याचं देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेंन आपल्या निवेदनात म्हटले आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 02, 2026 14:32:01
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Mar 02, 2026 14:17:34
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 02, 2026 14:01:10
Kolhapur, Maharashtra:आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दीडशे नागरिक विविध ठिकाणी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात अल्या आहेत. आखाती देशांमध्ये अडकलेल्या सुमारे 150 कोल्हापूरकरांपैकी 130 जणांची अधिकृत माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली आहे. या सर्व नागरिकांशी प्रशासन सातत्याने संपर्कात असून ते सुरक्षित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता संबंधित नागरिकांशी संपर्क साधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सर्व सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी केली जात असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 02, 2026 13:51:10
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top