445001
यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.
Yavatmal, Maharashtra:राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
शिरूर-आंबेगांव में मानसून देरी से पहुंचा, खरीफ की बुवाई अभी बाधित
Shirur, Maharashtra:राज्यात मान्सूनच आगमन झालं मात्र अद्यापही उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाऊसच न झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या पेरण्या रखडल्यात बळीराजाच्या नजरा सध्या आभाळाकडे लागल्या असून मोठ्या प्रमाणात ढग दाटून येत आहे मात्र पाऊसच बरसत नसल्याने सध्या शेतकऱ्यांच्या नजरा या मोठ्या पावसाकडे लागल्या असून पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पेरण्या करता येणार आहे. याचाच थेट शेतातून आढावा घेतला0
0
Report
तळकोकण में भारी बारिश से नदीयां उफान पर, सिंधुदुर्ग में येलो अलर्ट जारी
Oras Bk., Maharashtra:मागील काही दिवसांच्या लपंडावानंतर पावसाने तळकोकणात दमदार हजेरी लावलीय. कालपासून पावसाने तळकोकणात जोर धरलाय, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सिंधुदुर्गात आज येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेच आवाहन करण्यात आलंय.0
0
Report
अक्कलकोट में कारहुणवी मिरवणुकी के दौरान बैल छोड़े गए; ग्रामवासियों की सतर्कता से नियंत्रण काबू
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट मध्ये कारहुणवी सणाच्या मिरवणुकी दरम्यान बैल उधळल्याची घटना समोर, बैलांना तात्काळ नियंत्रणात आणण्यात गावकऱ्यांना मोठे यश - जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात कारहुणवी सण मोठ्या उत्साहात साजरा - अक्कलकोट तालुक्यातील सलगर गावामध्ये मिरवणुकीदरम्यान बैलजोडी उधळल्याची घटना समोर - गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे बैलांना नियंत्रणात आणण्यात मोठे यश - सुदैवाने सदरच्या घटनेत कोणतीही दुर्घटना नाही मात्र गावकऱ्यांची काहीशी पळापळ0
0
Report
Advertisement
अंबरनाथ तालुक्य में धान की बुवाई अंततः शुरू, बरसात के बाद 3700 हेक्टेयर में खेती शुरू
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ तालुक्यात भात पेरणीला अखेर सुरुवात; ३७०० हेक्टरवर क्षेत्रात भात लागवड Anchor यंदा पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. पावसाचे उशिराने आगमन झाल्यामुळे लांबलेली भात शेतीच्या पेरणीची कामे आता तालुक्यात सुरू झाली आहेत. तालुक्यात यंदा सुमारे 3700 हेक्टर क्षेत्रात भात लागवड केली जाणार आहे. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात भात पेरणीच्या कामांना वेग येतो. मात्र, यंदा पावसाने सुरुवातीला मोठी ओढ दिली. पुरेसा पाऊस न झाल्याने भाताचे बियाणे सुकण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवून ठेवल्या होत्या. हवामान कोरडे राहिल्याने शेतकरी राजा पावसाच्या प्रतीक्षेत होता. यामुळे खरिपाचा हंगाम यंदा काहीसा उशिराने सुरू झाला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ तालुक्यात एकूण 3700 हेक्टर जमिनीवर भात पिकाची लागवड झाली आहे. पाऊस उशिरा आल्याने आता शेतकऱ्यांची बियाणे टाकणे, शेत जमीन तयार करणे आणि पेरणीची कामे करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. पेरणी उशिरा झाल्यामुळे पर्यायाने भात लावणीची कामेही जुलै महिन्याच्या मध्यानंतर किंवा शेवटी सुरू होतील . चंद्रशेखर भुयार, बदलापूर0
0
Report
गोंदिया में बारिश से किसानों की पेराई रुकी, अब मौसम ने दी राहत
Bhandara, Maharashtra:गोंदिया जिल्ह्यात अखेर पावसाने हजेरी लावली आहे... एलनिनो मुळे मान्सून उशिरा दाखल झाला. पण गोंदिया जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली होती. आता पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकरी सुखावला आहे. तर दुसरीकडे उकळ्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे...0
0
Report
कल्याण- डोंबिवली में बारिश से पेड़ गिरे, गाड़ियों को नुकसान, बिजली सप्लाई बाधित
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली पावसाची रिमझिम सुरु.. कल्याण मध्ये झाडें कोसळून गाड्याचे नुकसान तर डोंबिवली मध्ये विदयुत वाहिन्याच्या तारांनवर झाडें कोसळून विदयुत पुरवठा बंद. कल्याण डोंबिवली परिसरात काल संध्याकाळी पासून पावसाची संततधार सुरु तर पहाटे पावसाच्या विश्रांती नंतर पुन्हा पावसाची रिमझिम सुरु झाली आहे काल रात्री कल्याण मध्ये अनेक ठिकाणी झाडें पडून गाडयाचे नुकसान झाले आहे तर डोंबिवली मध्ये विदयुत वाहिनीच्या तारवांवर झाडें कोसळून विदयुत पुरवठा खंडित झाला आहे.0
0
Report
Advertisement
एसीबी ने मेयो अस्पताल के सर्जिकल विभाग के प्रमुख और स्टेनो सहित दो के खिलाफ रिश्वतखोरी के आरोप दर्ज किए
Nagpur, Maharashtra:नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्य रुग्णालय म्हणजेच मेयो हॉस्पिटलचे शल्यचिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. नंदकिशोर जयस्वाल आणि त्यांचा लघुलेखक (स्टेनो) आशिष मेटेकर यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे... परिवहन विभागाच्या सहायक मोटर वाहन निरीक्षकाला त्यांच्या प्रदीर्घ वैद्यकीय रजेनंतर वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय मंडळाची अनुकूल शिफारस देण्यासाठी दोघांनी तीस हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता... सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकाने त्याची तक्रार एसीबी कडे केल्यानंतर लाचेची मागणी केल्या संदर्भात आवश्यक तपासणी केल्यानंतर काल रात्री उशिरा एसीबीने डॉ. जयस्वाल आणि त्यांचा लघुलेखक मेटेकर या दोघांच्या विरोधात तहसील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला आहे...0
0
Report
सोलापुर महापालिका: सात समिति सभापतियों के चयन के लिए शुक्रवार मतदान
Solapur, Maharashtra:सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेच्या सात सभापती पदांसाठी शुक्रवारी होणार निवडणूक सोलापूर महानगरपालिकेच्या विविध सात विशेष समित्यांच्या सभापती निवडीसाठी शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. सात समित्यांपैकी महिला व बालकल्याण समितीसाठी नगरसेविकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून कोणाला कौल मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीमध्ये निर्णय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी काम पाहणार आहेत。0
0
Report
कृषि समिति सभापति के निर्देश: किसान को क्षतिपूर्ति जल्दी दें, फार्मर आईडी बनवाने सहयोग
Chendhare, Maharashtra:आंबा-काजू नुकसान भरणपाईसाठी शेतकऱ्यांना तातडीने मिळावी, फार्मर आयडी तयार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे, असे कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. अधिकारी वर्गाच्या सहकार्याअभावी शेतकरी योजनांपासून वंचित राहत असल्याच्या तक्रारींची दखल घेत, यापुढे अशा तक्रारी येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश सभापती वैकुंठ पाटील यांनी दिले. बैठकीत कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.0
0
Report
Advertisement
प्री-स्कूल में तोड़फोड़: MNS नेताओं के खिलाफ FIR दर्ज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर च्या प्री-स्कूलमध्ये २३ महिन्यांच्या चिमुकल्यासोबत झालेल्या प्रकारामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्कूलमध्ये तोडफोड केली होती, मनविसेचे पदाधिकारी रोहित ठेंगे आणि कार्तिक फरतडे यांनी शाळेत दगड फेकून तोडफोड केली. त्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात आता दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. या मूळ प्रकरणी पोलिसांनी आधीच संस्थेच्या संचालक, महाराष्ट्र प्रमुखांसह सातजणांवर गुन्हा दाखल केलेला आहे...0
0
Report
मुंबई-गोवा महामार्ग पर मुसलाधار बारिश से यातायात प्रभावित, पानी भरा क्षेत्र
Chendhare, Maharashtra:रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीलाही बसला आहे. माणगाव जवळ ढालघर फाटा परिसरातील पेट्रोलपंपाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना धोकादायक परिस्थितीतून मार्ग काढावा लागत आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने ही समस्या निर्माण झाली असून, पावसाचा जोर आणखी वाढल्यास महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.0
0
Report
Ashok Kharat: पहली सुनवाई वीडियो कॉन्फ्रेंस से शुरू, SIT ने 105 गवाहों के बयान दर्ज
Nashik, Maharashtra:Nashik Breaking अशोक खरात प्रकरणातील पहिल्या खटल्याची सुनावणी सुरू पहिल्या खटल्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पडली पार एसआयटीकडून आतापर्यंत १०५ साक्षीदारांचे जबाब नोंद साक्षीदारांचे जबाब आणि कागदपत्रांच्या आधारे पुढील सुनावणी होणार अशोक खरात विरोधात सध्या एकूण १९ गुन्हे दाखल त्यापैकी महिला लैंगिक शोषणाचे ८ गुन्हे, चार प्रकरणांत आरोपपत्र दाखल उर्वरित प्रकरणांचा तपास अंतिम टप्प्यात खटल्याच्या गांभीर्यामुळे न्यायालयाकडून सुनावणीला गती शासनाकडून अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी म्हणून झाली आहे नियुक्ती0
0
Report
Advertisement
रेलवे यात्रियों के मोबाइल चोरी मामले में आरोपी गिरफ्तार; 18 मोबाइल बरामद
Washim, Maharashtra:वाशीम: मालेगाव पोलिसांनी रेल्वे प्रवाशांचे मोबाइल चोरी करून कमी किमतीत विक्री करणाऱ्या सराईत आरोपीला अटक केली आहे. किशनलाल शंकरलाल तापडिया (वय ४०, रा. चाटोरी, ता. पालम, जि. परभणी) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून २ लाख ५३ हजार ५०० रुपये किमतीचे १८ मोबाइल जप्तण्यात आले आहेत. मेडशी येथे बिल नसलेले मोबाइल स्वस्तात विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हे मोबाइल रेल्वे प्रवाशांकडून चोरी केल्याची कबुली दिली. आयएमईआय क्रमांकांची पडताळणी केली असता मोबाइलची चोरीची तक्रार भुसावळ रेल्वे पोलिस ठाण्यात दाखल असल्याचे उघड झाले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध मालेगाव पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त मोबाइलच्या मूळ मालकांचा तसेच आरोपीने यापूर्वी आणखी कुठे-कुठे चोरी केली याचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
जलप्रपात: मराठवाड्यात जूनमध्ये पाऊस तुट, जालना जिल्ह्यात जास्त पाऊस; पेरण्या अजूनही खोळंबल्या
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Feed attached Csn rain av छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यात ३० जूनच्या सकाळपर्यंत ७.२ मिलिमीटर पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक पाऊस जालना जिल्ह्यात झाला. या जिल्ह्यात १३.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात आजपर्यंत १११ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मराठवाड्याची वार्षिक सरासरी ६७९.५ मिलिमीटर आहे. गेल्या वर्षी ३० जूनपर्यंत ७८ टक्के पाऊस झाला होता. तर, बहुतांश जिल्ह्यांनी जून महिन्याची वार्षिक सरासरीदेखील पूर्ण केली होती. यावर्षी मात्र तशी परिस्थिती नाही. पावसाची मोठी तुट आहे अनेक ठिकाणी अजूनही पेरण्या सुद्धा खोळंबल्या आहेत...0
0
Report
जिला परिषद ने भवन फर्नीचर के लिए निधि खर्च पर विवाद खड़ा कर दिया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्हा परिषदेच्या उपकराचा निधी मुख्य प्रशासकीय इमारतीच्या फर्निचर आणि विद्युतीकरणासाठी वापरला जावा असा ठराव सत्ताधार्यांनी जिल्हा परिषदे सर्वसाधारण बैठकीत घेतला आणि त्यामुळं आता नवा वाद निर्माण झालाय, महत्वाचे म्हणजे बैठकीत या ठरावावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला मात्र तो झुगारून हा ठराव संमत करण्यात आला..ग्रामीण भागातील मूलभूत विकासकामांवर खर्च होणे अपेक्षित असताना तो मुख्य प्रशासकीय इमारतीच्या फर्निचर आणि विद्युतीकरणासाठी वापरला जाणे ही गंभीर बाब आहे. 'शासनाकडून इमारतीसाठी निधी आणा, सेसचा निधी येथे खर्च करू नका,' अशी मागणी विरोधकांनी केलीय..या ठरवामुळे मुळे ग्रामीण भागातील विकासकामांना मोठी कात्री बसणार असल्याने अनेक सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.0
0
Report
Advertisement
