icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

फलटण में सामाजिक कार्यकर्ता अतुल लाळगे की आत्महत्या: मानसिक उत्पीड़न का आरोप, कैन्डल मार्च

Satara, Maharashtra:सातारा: पुण्यातल्या फुरसुंगी येथील निवारा गृहात कार्यरत असलेल्या २६ वर्षीय सोशल वर्कर अतुल लाळगे यांच्या आत्महत्येप्रकरणी फलटण तालुक्यातील वडले गावात ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वरिष्ठांकडून होणारा कथित मानसिक छळ, धमक्या आणि अतिरिक्त कामाच्या ताणामुळे अतुलने जीवन संपवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्राच्या आधारे दोषी संस्थाचालकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी वडले गावामध्ये कॅन्डल मार्च काढला. घटना घडूनही प्रशासन कारवाईत दिरंगाई करत असल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
0
0
Report

पालखी सोहळे में बैल जोड़ी विवाद समाप्त, रानवडे परिवार की जोड़ी को मान

Pimpri-Chinchwad, Maharashtra:संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या दरम्यान रथाला जोडण्यात येणाऱ्या बैलजोडी वरून सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. माऊलींच्या रथाला यंदा आळंदीतील रानवडे कुटुंबातील तिघांच्या बैल जोडीला मान मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातून पालखी प्रवास करत असताना जाताना आणि येताना हर्षवर्धन प्रदीप रानवडे यांची बैल जोडी रथाला जुंपण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात रथाला उमेश लक्ष्मण रानवडे यांची तर सोलापूर जिल्ह्यात पालखी जाताना येताना तुळशीराम न्यानोबा रानवडे यांची बैल जोडी रथाला जुंपण्यात येणार आहे. बैल जोडीचा मान देण्यात दावल गेल्याचा आरोप करत उमेश रानवडे यांनी नाराजी व्यक्त करत काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं. अखेर त्यावर तोडगा काढत हा वाद मिटवण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement

घोसला में विद्युत तार टूटने से बैल की मौत, किसान महावितरण से मुआवजे की मांग

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील घोसला येथे शेतरस्त्यावर तुटून पडलेल्या महावितरणच्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन एका बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शेतकरी छबिलदास तडवी हे आपल्या गाडीबैलांसह शेतात जात असताना रस्त्यावर पडलेल्या विद्युत तारेचा एका बैलाला स्पर्श झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने छबिलदास तडवी आणि त्यांचा दुसरा बैल थोडक्यात बचावले. या घटनेनंतर महावितरणच्या निष्काळजी कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.
0
0
Report

केन्द्र के कीमत स्थिरीकरण कोष से प्याज खरीद बढ़ाने पर किसान संगठनों की नाराज़गी

Yeola, Maharashtra:शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून यंदाही 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून मात्र, बाजारभावापेक्षा कमी दराने शासकीय खरेदी सुरू असल्याने गेल्या दीड महिन्यात केवळ 2,500 ते 2,600 मेट्रिक टन कांद्याची खरेदी झाली असतांना आता केंद्र सरकारने अतिरिक्त 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेдиसाठी नव्याने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे यावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे संघटनेचे जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले यांनी शासकीय कांदा खरेदीचा दर किमान 3,000 रुपये प्रतिक्विंटल करावा, अन्यथा ही खरेदी तात्काळ बंद करावी, अशी मागणी केली तसेच शासकीय खरेदीतील कांद्याचा वापर देशांतर्गत Shेतकऱ्यांच्या कांद्याचे बाजारभाव पाडण्यासाठी न करता तो परदेशात निर्यात करावा, अन्यथा stateभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशार महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष केदारनाथ नवले यांनी दिला
0
0
Report
Advertisement
Advertisement

श्री गजानन महाराज की पालखी का शिरपूर जैन में भव्य स्वागत, लाखों भक्तों का उत्साह

Washim, Maharashtra:अषाढी वारीनिमित्त श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचा शिरपूर जैन येथील मुकाम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. पालखीचे आगमन होताच भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि "गण गण गणात बोते"च्या जयघोषात श्रींचे उत्स्फूर्त स्वागत केले. रात्री पालखीची नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. दर्शनासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर जामगीर महाराज संस्थानमध्ये पालखीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. संस्थानच्या वतीने ७०० वारकरी तसेच हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तन सेवेमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
0
0
Report

सरकार ने 7 जलाशयों से गाद नियंत्रण के लिए परीक्षण योजना मंजूर, नाथसागर क्षमता बढ़ेगी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पाणी साठवण क्षमता पुन्हा पूर्ववत करण्यासाठी राज्य शासनाने ७ मोठ्या जलाशयातून प्रायोगिक तत्त्वावर गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी दिली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी प्रकल्प आणि ahिल्यानगरमधील मुळा प्रकल्पाचा समावेश आहे. शासनाच्या या सुधारित धोरणानुसार गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत जायकवाडी तसेच मुळा प्रकल्पातील गाळ काढला जाणार आहे. याशिवाय उजनी (सोलापूर), गिरणा (नाशिक), गोसीखुर्द (भंडारा), हतनूर (जळगाव) आणि कोयना (सातारा) या अन्य ५ मोठ्या प्रकल्पांचाही यात समावेश आहे. यामुळे जयकवाडीच्या  नाथसागराची क्षमता ८ टीएमसीने वाढेल
0
0
Report
Advertisement

कोका अभयारण्य के पास अतिक्रमण हटाने के लिए वन विभाग ने बुलडोजर चलाया

Bhandara, Maharashtra:वनविभागाची मोठी कारवाई... कोका अभयारण्यालगतच्या अतिक्रमणावर बुलडोजर... भंडाऱ्यातील कोका वन्यजीव अभयारण्यलगतच्या बफर क्षेत्रात वन जमिनीवर करण्यात आलेले मोठे अतिक्रमणावर वनविभागाने धडक कारवाई केली असून पालोरा बफर क्षेत्रातील मौजा बोंडे येथील शासकीय वन जमिनीवर काही व्यक्तींनी अतिक्रमण केले होते. या जमिनीवर आपला कायदेशीर हक्क प्रस्थापित करण्यासाठी संबंधितांनी वन हक्क दावे सादर केले होते. मात्र या दाव्यामध्ये सादर केलेले दस्तावेज अपूर्ण व नियमात बसणारे नसल्यामुळे जिल्हाधिकारी सावंन कुमार यांनी हे सर्व दावे अयोग्य ठरवल्या नंतर वनविभागाने त्या संबंधित व्यक्तीला वारंवार नोटीस बजावून त्यांनी जागा रिकामी केले नसून अखेर वनविभागाने वनअधिकारी सुरज गोखले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुलडोजर चालवून अतिक्रमण हटविण्यात आले.
0
0
Report

ओपन टू ऑल फेरी से 4 लाख से अधिक छात्रों को प्रवेश का मौका

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या ३ फेऱ्या पार पडूनही ४ लाख १४ हजार ४४४ विद्यार्थी अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रवेशापासून वंचित राहिलेल्या या विद्यार्थ्यांसाठी सोमवारपासून ओपन टू ऑल ही विशेष फेरी सुरू होत आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील ९ हजार ६४९ कनिष्ठ कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १४ लाख ३७हजार ६५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी ७ लाख ३५ हजार ९५८ जणांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तिसऱ्या फेरीत अर्ज लॉक केलेल्या छत्रपती संभाजीनगर विभागातील ३४ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ १ लाख ४९ हजार ८५६ विद्यार्थ्यांनीच २५ जूनपर्यंत प्रवेश निश्चित केला. त्यामुळे प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांसाठी ही खुली फेरी आधार ठरणार आहे.
0
0
Report

भंडारा के हनुमान मंदिर में किसानों के लिए बारिश की सामूहिक प्रार्थना, उम्मीद जागी

Bhandara, Maharashtra:लाखांदूर येथे पावसासाठी हनुमंताच्या चरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे साकडे....बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी सामूहिक प्रार्थना भंडारा जिल्हात गेल्या अनेक दिवसांपासून समाधानकारक पाऊस होत नसल्याने खरीप हंगाम धोक्यात झाला असून शेतकरी चिंतेत सापडला आहे.पावसाअभावी पेरणी, मशागतीसह शेतीची अनेक कामे खोळंबली असून बळीराजा आकाशाकडे आशेने डोळे लावून बसला आहे.या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी भगवान हनुमानाच्या चरणी साकडे घालत तालुक्यात लवकर दमदार पाऊस पडावा, शेतकरी सुखी-समृद्ध व्हावा आणि शेतीवरील संकट दूर व्हावे अशी मनोभावे प्रार्थना केली.यावेळी मंदिरात विशेष पूजन करून बळीराजाच्या हितासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीचा उल्लेख करत,वेळेत आणि मुबलक पाऊस झाल्यास खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळेल व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top