icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पंढरपूर के किसान ने रोजगार सेवक के प्रताड़ना के चलते आत्म-हत्या का प्रयास किया

Pandharpur, Maharashtra:पंढरपूर येथील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कार्यालयात एका शेतकर्याने रोजगार सेवकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून दोरीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. संतोष महादेव बागल असे पिडीत शेतकर्याचे नाव आहे. महादेव बागल यांना महात्मा गांधी रोजगार हमी मधून विहीर मंजूर झाली आहे. कामाचे रोस्टर भरून देण्यासाठी स्थानिक रोजगार सेवकाचे पती भजनदास पवार याला तीस हजार रूपये दिले आहेत. अजून पैशाची मागणी केल्यानंतर पिडीत शेतकर्याने रोजगार सेवकाच्या आर्थिक त्रासाला कंटाळून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेने पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी स्थानिक शेतकऱ्यांनी रोजगार सेवक आणि तीच्या पतीवर कडक कारवाई करावी अशी लेखी मागणी केली आहे.
0
0
Report

नीट पेपरफुटी: लातूर तक पहुंचा मामला, CBआई की तेज जांच शुरू

Latur, Maharashtra:देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट लातूरपर्यंत पोहोचले आहेत... शिक्षणाची पंढरी आणि ‘लातूर पॅटर्न’मुळे देशभर ओळख असलेल्या लातूरमध्ये सध्या सीबीआयने ठाण मांडले असून अनेक नामांकित क्लासेस चालक तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत... सीबीआयच्या वेगवान हालचालीमुळे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली है... पाहूयात याच संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट... या प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी आता पालकांकडून जोर धरू लागली आहे... विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मोठ्या कष्टाने, आर्थिक ताण सहन करत मुलांना नीटच्या तयारीसाठी लातूरमध्ये पाठवले... अनेक पालकांनी लाखो रुपये खर्च करून मुलांच्या भवितव्यासाठी मेहनत घेतली... अशा परिस्थितीत पेपरफुटीसारख्या घटना समोर येणं ही अत्यंत गंभीर बाब असल्याची भावना पालक व्यक्त करत आहेत... दरम्यान, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी... तपास अधिक सक्षम यंत्रणेमार्फत वेगाने व्हावा... तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून संबंधितांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही पालकांकडून केली जात आहे... दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयने लातूरमध्ये वेगवान हालचाली सुरू केल्याने संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष आता या तपासाकडे लागले आहे... अनेक नामांकित क्लासेस चालकांची चौकशी आणि निवृत्त प्राध्यापकांची चौकशी... आणि कथित ‘गेस पेपर’च्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांचा तपास... यामुळे लातूरच्या शिक्षण व्यवस्थेवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत... आता या तपासातून नेमकं काय समोर येणार...? या प्रकरणात आणखी कोणाची नावं पुढे येणार...? आणि देशभर चर्चेत आलेल्या या प्रकरणाचा शेवट नेमका कसा होणार...? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे... वैभव बालकुंदे ZEE 24 TAAS
0
0
Report
Advertisement

अकोला के मूर्तिजापुर में फसल बीमा के विरोध में किसानों का ट्रैक्टर मार्च

Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात पीक विम्याच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. लाखपुरी आणि कुरूम महसूल सर्कलमधील शेतकऱ्यांना एकरी अवघे ३०० ते १००० रुपये इतकाच पीक विमा मंजूर झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर महामोर्चा काढला. विविध शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. तालुक्यातील निंबा, सिरसो, हातगाव, माना, जामठी आणि शेलूबाजार महसूल सर्कलमधील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा नाकारण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. रखरखत्या उन्हात ट्रॅक्टरसह तहसील कार्यालयावर धडक देत शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पीकविमा कंपनी आणि शासनाकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.दरम्यान, तहसील कार्यालयात प्रवेश करून अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला असता पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी काही काळ शेतकरी आणि पोलिसांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. ढकलाढकलीची परिस्थितीही निर्माण झाली होती. मात्र, प्रशासनाने संयमाची भूमिका घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारीांनी स्वतः येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी, या मागणीवर आंदोलक शेतकरी ठाम आहेत.
0
0
Report

जालना की नादी-युसूफ कॉलोनी में कचरा, 10-15 दिन से नहीं आई नगर निगम गाड़ी

Jalna, Maharashtra:जालन्यातील नादी आणि युसूफ कॉलनीत कचऱ्याची समस्या,10 ते 15 दिवस घंटागाडी येत नसल्यानं नागरीक हतबल नाल्यांचीही सफाई होत नसल्यानं नागरीक संतप्त वाक थ्रू+ AVB अँकर : जालनाातील नादी आणि युसूफ कॉलनीत कचऱ्याची समस्या नागरीकांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.या भागात 10 ते 15 दिवस महापालिकेची घंटागाडी येत नसल्यानं नागरीक हतबल झालेत.महिन्यातून केवळ दोनच वेळा या भागातील कचरा साफ केला केला जातो.नियमित कचरा उचलला जात नसल्यानं याच परिसरात मच्छरांच्या त्रासाला नागरीकांना सामोरं जावं लागतंय.शिवाय या भागात नाल्यांची देखील नियमित स्वच्छता केली नससल्यानं महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक या समस्यांकडे मागणी करूनही लक्ष देत नाही.त्यामुळे या स्वच्छता निरीक्षकांवर कारवाईची मागणी या भागातील नागरीकांनी केली आहे. बाईट :साद बिन मुबारक,सामाजिक कार्यकर्ते(व्हाईट हाफ शर्ट) बाईट :मोहम्मद नोही,नागरीक(ग्रे रंगाचा शर्ट,गोल टोपी) बाईट : मोहम्मद आरेफ नागरीक, व्हाईट गोल टोपी आणि भागातील कचरा समस्येचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी वाक थ्रू नितेश महाजन,प्रतिनिधी, जालना
0
0
Report

पनवेल महापालिका: 45 दिन बाद भी अर्थसंकल्प मंजूर नहीं, विपक्ष ने उठाए सवाल

Navi Mumbai, Maharashtra:पनवेल महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. पनवेल महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर होऊन 45 दिवस उलटले तरी अद्याप अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आलेली नाही. पनवेल मनपातील सत्ताधारी भाजपच्या अनागोंदी कारभाराची पोलखोल करणारा स्पेशल रिपोर्ट. 30 मार्च रोजी पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे यांनी 4853 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांच्याकडे सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्यावर त्यात आवश्यक सूचना मांडून तो मंजूर करणे आवश्यक असताना आज 45 दिवस उलटले तरी अद्याप अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला नाही. याविरोधता विरोधकांनी आवाज उठवत हे प्रशासनाचे अपयश आहे की सत्ताधाऱ्यांचे असा प्रश्न उपस्थित केलाय. अर्थसंकल्प मंजूर करायला एवढा कालावधी का असा सवाल उपस्थित करत सत्ताधारी भाजपला महापालिका कशी चालवायची हेच माहित नाही अशी खोचक टीका काँग्रेसचे नगरसेवक हरीश केणी यांनी केलेय. Hariश केणी (नगरसेवक काँग्रेस) बबन मुकादम (स्थायी समिती सभापती - पनवेल मनपा) अर्थसंकल्प हा सेन्सिटिव्ह विषय असून प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर सखोल अभ्यास करुन जनतेच्या आणि नगरसेवकांच्या मागण्यांचा समावेश करुन लवकरच अर्थसंकल्प सादर केला जाईल अशी ओघम प्रतिक्रिया स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांनी व्यक्त केलेय. बबन मुकादम (स्थायी समिती सभापती - पनवेल मनपा) दीड महिना उलटला तरी अद्याप अर्थसंकल्पचं मंजूर झाला नसल्याने नगरसेवकांना काम करण्यात अडचणी निर्माण होतं असून सत्ताधारी आणखी किती दिवस अभ्यास करुन अर्थसंकल्प मंजूर करणार याकडे पनवेलकरांचे लक्ष लागलेय. Swati Naik Navi Mumbai
0
0
Report
Advertisement

पानी की किल्लत पर महिलाओं ने जिला कार्यालय के सामने प्रदर्शन किया

Washim, Maharashtra:अँकर:वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वतीने पार्डी आसरा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात’ पिण्याच्या पाण्याच्या तीव्र समस्येवरून महिलांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.गावात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली असून,नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप महिलांनी प्रशासनावर केला.ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने महिलांनी शिबिरात आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला.अनेक वेळा तक्रारी करूनही प्रश्न कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी महिलांनी तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करून गावात सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.
0
0
Report

पुणे हड़पसर अस्पताल बम मामले के आरोपी राठोड नागपुर ATS ने स्टेशन से गिरफ्तार किया

Nagpur, Maharashtra:पुणे हडपसर yeथील एका हॉस्पिटल परिसरामध्ये बॉम्ब ठेवल्या प्रकरणातील आरोपीला आज नागपूर एटीएसने रेल्वे स्टेशन वरून ताब्यात घेतले... राठोड असे आरोपीचे नाव असून तो मूळचा सोलापूरचा आहे... आज नागपूर रेल्वे स्टेशनवर एटीएस आणि सुरक्षा यंत्रणेतील टीम्सने त्याला पकडण्याकरता सापळा होता... दोन ते तीन ट्रेनची तपासणी केल्यानंतर एटीएस टीम नेत्याला पुणे कोलकत्ता दरम्यानच्या एका ट्रेन मधून प्रवास करताना जनरल बोगीत पकडले... त्यानंतर त्याची नागपूर एटीएस कार्यालयात चौकशी करण्यात आली व मेडिकलला नेण्यात आले.
0
0
Report
Advertisement

संजय राऊत के निवासस्थान के बाहर पुलिस बंदोबस्त, शिवसेना में शिंदे समर्थकों का आक्रामक रुख

Mumbai, Maharashtra:खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे संजय राऊत यांनी केलेली एक्स पोस्ट वादाच्या भवऱ्यात सापडली आहे भारतातील तरुण हा भरकटलेला आणि मंद आहे अशा आशयाची ही एक पोस्ट होती त्यावर दात शिंदे यांची शिवसेना आक्रमक झाली आहे त्यांच्या निवासस्थानाबाहेर शिंदे यांची शिवसेना आंदोलन करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे आणि यासाठीच पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी
0
0
Report

लातूर में नीट पेपरफूटे मामले पर सीबीआई की कार्रवाई, क्लास संचालक घर में छापेमारी

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज : नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये सीबीआयची मोठी कारवाई सुरू झाली आहे. नामांकित खासगी क्लासेस संचालकाची गेल्या ५ तासापासून चौकशी सुरू आहे. CBI कडून महत्वाची कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.. नीट परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या कथित ‘गेस पेपर’च्या अनुषंगाने सीबीआयकडून चौकशी करण्यात येत असल्याचा माहिती समोर आली आहे...काल एका निवृत्त प्राध्यापकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर आज सीबीआयचे पथक संबंधित क्लासेस संचालकाच्या घरी दाखल झाले आहेत... या कारवाईमुळे लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
0
0
Report
Advertisement

लोकप्रतिनिधियों ने सार्वजनिक परिवहन अपनाने का आह्वान, कोल्हापुर जिला परिषद अध्यक्ष ने 60 किलोमीटर की एसटी यात्रा कर पहुंचीं

Kolhapur, Maharashtra:ZP No Vehicle Day Feed :- Live U Anc - लोकप्रतिनिधींनी वाहतुकीसाठी सार्वजनिक व्यवस्थेचा वापर करा या आवाहनाला कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा प्रतिसाद मिळालाय. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोतांनी कागल तालुक्यातील सेनापती कापशी या गावापासून त्यांनी 60 किलोमीटरचा एसटी प्रवास करत कोल्हापुरात आल्या. कोल्हापुरातल्या दसरा चौकातून त्यांनी रिक्षाने जिल्हा परिषदेत प्रवेश केला. मोदींनी केलेल्या आवाहन नंतर संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये दर शुक्रवारी नो व्हेइकल डे देखील पाहण्यास येत असून आज त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
0
0
Report

खरीप मौसम के साथ किसान मैदान में जुटे, प्रमाणित बीजों की खरीद तेज

Akola, Maharashtra:खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची लगबग आता वाढू लागली आहे. काही ठिकाणी शेत तयार करण्याच्या कामे सुरू झाली असून पावसाळ्यापूर्वी मशागतीला वेग आला आहे. शासनाने आजपासून अधिकृतरित्या बियाणे विक्रीला परवानगी दिल्यानंतर अकोला शहरातील कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सोयाबीन, कापूस, तूर आणि मका पिकांच्या बियाण्यांची खरेदी करण्यासाठी शेतकरी सकाळपासूनच दुकानांवर दाखल झाले होते.यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे दर्जेदार आणि प्रमाणित बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. अनेक शेतकरी विविध कंपन्यांच्या बियाण्यांची माहिती घेत खरेदी करताना दिसले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top