445001
यवतमाळ : 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी, शिक्षकांचा संप.
Yavatmal, Maharashtra:राज्य व केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन देत नसल्यामुळे व आश्वासनांची पाने तोंडाला पुसत असल्याने राज्यातील अधिकारी व कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने संपाची अधिसूचना काढण्यासाठीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली होती, परंतु शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती के त्रिभजन का निर्णय रद्द, भाजपा को झटका
Sangli, Maharashtra:सांगली बाजार समितीचे त्रिभजन कोल्हापूर खंडपीठाकडून रद्द, भाजपाला धक्का. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडून रद्द करण्यात आला आहे. राज्याच्या सहकार विभागाने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करत कवठे महांकाळ आणि जत कृषी उत्पन्न बाजार समिती नव्याने निर्माण करण्याचे आदेश दिले होते, त्यांनी विरोधात बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाकडुन मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठामध्ये धाव घेण्यात आली होती. ज्यावर कोल्हापूर खंडपीठाने राज्य सरकारच्या त्रिभजनाच्या आदेश रद्द केला आहे, तसेच राज्य सरकारला त्रिभाजनाबाबत फेर सुनावणी घेऊन, पुढील निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यमान संचालकांना तुर्त दिलासा मिळाला आहे, तर न्यायालयाच्या निर्णयामुळे आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपाला धक्का बसला आहे.0
0
Report
नवी मुंबई महापालिका कोरोना फंड घोटाला: 230 करोड़ खर्च, सिर्फ 55 करोड़ का हिसाब
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मनपा में कोरोना कालात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत असून सहा विभागांना खर्चासाठी दिलेल्या 230 कोटी पैकी केवळ 55 कोटी रुपयांचा हिशोबच प्रशासन देत आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली असून प्रशासनाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलाय. यात आरोग्य विभागावर 120 कोटी खर्च केलेत मात्र आरोग्य विभागाने 20 कोटी चा खर्चचा हिशोब दिला आहे. नवी मुंबई मनपातर्फे कोरोन काळात मार्च 2019 ते 2020 आणि मार्च 2021 ते 2022 या दोन वर्षाच्या काळात आरोग्य, शहर अभियंता, घनकचरा, विद्युत अभियंता, आपत्ती व्यवस्थापन आणि परिवहन अश्या सहा विभागांना एकूण 230 कोटी रूपये खर्चापोटी दिले मात्र या सहा विभागांकडे हा खर्च कुठे व कशासाठी झाला याची माहिती अधिकाराखाली माहिती मागवली असता केवळ 55 कोटी रुपयांचा हिशोबच प्रशासनाकडून देण्यात येतोय. यासंदर्भात लेखी तक्रार मुख्यमंत्र्यांसह आयुक्तांकडे केली असता सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागांना माहिती देण्याचे आदेश दिल्या नंतरही माहिती दडपण्यात येत असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र हडकर यांनी केलाय. नरेंद्र हडकर (आरटीआय कार्यकर्ते) कोरोना काळात सर्वाधिक 120 कोटी रुपयांचा खर्च आरोग्य विभागाने केला मात्र माहितीच्या अधिकारात केवळ 20 कोटींच्या खर्चाचा हिशोब देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आलेय. प्रशासकीय काळात मनमानी पद्धतीने कामे केल्याव्हा आरोप करत या कामांची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या तदर्थ समितीला देखिल माहिती देण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे. कोरोना काळात उभारलेले सेंटर, त्यातील सामान याची देखील माहिती देण्यात येत नसून संपूर्ण माहिती मिळेपर्यंत आम्ही थांबणार नसण्याची प्रतिक्रिया आरोग्य समिती सभापती जयाजी नाथ यांनी व्यक्त केलेय. डॉ .जयाजी नाथ (आरोग्य समिती सभापती) यासंदर्भात मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेले बहुतांश सामान डिसपोजल केले असून उर्वरित सामान काढण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच ऑक्सीजन प्लांट मनपा रुग्णालयात हलवण्यात आले असून बेड चे लिलाव करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केलेय. कैलास शिंदे (मनपा आयुक्त) कोरोना काळात साहित्य खरेदी केले गेले मात्र त्या साहित्याचा हिशोब लपवला जात असल्याने यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट आहे. भयावह संकटकाळात देखिल प्रशासनाने निर्दयीपणे केलेला भ्रष्टाचार संतापजनक असून यावर सत्ताधारी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.0
0
Report
इंस्टाग्राम पर हथियार दिखाते हुए रील बनाते गिरफ्तार, दो चाकू जप्त
Amravati, Maharashtra:इन्स्टावर रील बनवून दहशत माजवणं पडलं महाग; हातात दोन चायना चाकू घेऊन रील बनवणारा पोलिसांच्या जाळ्यात राजापेठ पोलिसांची धडक कारवाई, विधीसंघर्षित बालकाला घेतले ताब्यात, दोन नवीन चाकू जप्त (आरोपी हा विधी संघर्षित असल्याने व्हिडिओ मधील चेहरा मोझॅक करावा)0
0
Report
Advertisement
कोयना डैम का जलस्तर 83 टीएमसी पहुँचा; अन्य डैमों में विसर्ग जारी
Satara, Maharashtra:*सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाचा जोर कायम असून धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा आता 83 टीएमसीवर पोहोचला आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रणासाठी धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून 1 हजार 50 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर धोम धरणातून 1 हजार 668 क्युसक, तर उरमोडी धरणातून 500 क्युसेक आणि कन्हेर धरणातून 3 हजार 217 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या 24 तासांत कोयना परिसरात 88 मिलीमीटर, तर नवजा येथे 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पश्चिम भागात पावसाचा जोर अद्यापही कायम आहे.0
0
Report
सिक्किम में ड्यूटी के दौरान सीमा सुरक्षा बल के इंजीनियर खुशाल मांडवकर का निधन
Chandrapur, Maharashtra:सिक्कीममध्ये कर्तव्य बजावताना वरोऱ्यातील सीमा रस्ते दलात कार्यरत अभियंता खुशाल मांडवकर यांचे निधन बीआरओ अंतर्गत जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्स (GR EF)मध्ये जेई (सिव्हिल) (सूबेदार) म्हणून कार्यरत असलेले खुशाल देवराव मांडवकर यांचे सिक्कीम येथे कर्तव्य बजावत असताना उपचारादरम्यान निधन झाले. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर चुंगथांग (जि. मंगन) येथील ३२७ फील्ड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांनी १६ वर्षे शिस्त, निष्ठा आणि धैर्याने देशसेवा बजावल्याचा उल्लेख बीआरओने केला आहे. त्यांच्या पार्थिवावर वरोरा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे0
0
Report
सड़क निर्माण से एसटी लालपरी फंसी, यातायात दो घंटे से ठप, छात्र-यात्रियों को भारी परेशानी
Hingoli, Maharashtra:हिंगोलीच्या आखाडा बाळापूर ते बोल्डा फाटा मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे एसटी महामंडळाची लालपरी चिखलात फसल्याने वाहतूक तब्बल अडीच तास ठप्प झाली आहे पर्यायी रस्त्याची व्यवस्था न केल्याने विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या कामाबाबत कंत्राटदार आणि संबंधित विभागाला माहिती नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे...0
0
Report
Advertisement
पंढरपुर में भीमा नदी का जलस्तर बढ़ा; NDRF तैनात, आपदा से निपटने की तैयारी
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर मध्ये जिल्हाधिकारी एस कार्तिकेएन यांच्या सूचनेनंतर एनडीआरएफ पथक, भीमा नदीची पाणी पातळी वाढल्याने सर्व बंधारे पाण्याखाली गेले. उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूर मध्ये भीमा नदीची पाणी पातळी वाढली आहे पंढरपूर मध्ये अजूनही वारकरी आहेत ते नदीकाठी जाऊन स्नान करत असतात त्यामुळे कोणताही दुर्घटना घडू नये यासाठी जिल्हाधिकारी एस कार्तिकीएन यांच्या आदेशानुसार एनडीआरएफ पथक तैनात करण्यात आल आहे0
0
Report
चंद्रपुर में रेड अलर्ट: स्कूल बंद, बारिश ने बनाई हलचल
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपुरात पावसाचा रेड अलर्ट, शाळांना सुटी मात्र पावसाची हुलकावणी चंद्रपूर जिल्ह्यात आज हवामान विभागाने अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असून या रेड अलर्टमुळे जिल्हा प्रशासनाने आज शाळा महाविद्यालये, अंगणवाडीसह सर्वच कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मॉन्सून आगमनापासून आतापर्यंत केवळ 28 टक्के एवढाच पावस पडला आहे. हा पावस शेत पिकांसाठी देखील अपुरा असून पाणीपुरवठा योजना सुरळीत होण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अशा परिस्थितीत आजही पावसाने हुलकावणी दिली आहे. शाळांना सुट्टी जाहीर झाल्याने बच्चे कंपनी आनंदात आहे. नक्की रेड अलर्ट प्रत्यक्षात येतो का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
शिंदे गुट में बड़ी इनकमिंग, नवी मुंबई एयरपोर्ट का नाम दि. बा. पाटील के नाम रखने की शिवसेना की मांग
Navi Mumbai, Maharashtra:उलवे विभागात शिवसेना शिंदे गटात मोठी इनकमिंग झाली असून वहाळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि 21 गाव समितीचे कार्याध्यक्ष सचिन केणी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केलाय। उद्योग मंत्री उदय सामंत आणि मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। यावेळी शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियन संलग्न लोकनेते दि. बा. पाटील सामाजिक संस्था शिवभूमी रायगड 21 गाव युनियनचा उद्घाटन सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडला। दरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात येईल यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठपुरावा करत असून त्यांच्याच मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता त्यामुळे विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव मिळावं ही शिवसेनेची ठाम भूमिका असल्याची प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलेय。0
0
Report
Advertisement
नागपूर में मुसलाधार बारिश ने एक परिवार के जीवन को तहस-नहस कर दिया; नुकसान भरपाई की मांग
Nagpur, Maharashtra:नागपूरात मंगळवार झालेल्या मुसळधार पावसाने एका कुटुंबाचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त केले... हातावर पोट असलेल्या मेस, खानावळ व्यावसायिकाच्या घरात आणि खानावळीत पाणी शिरलं... तयार अन्न, धान्य, संसारोपयोगी वस्तू आणि उदरनिर्वाहाचं साधनही पाण्यात वाहून गेलं. नागपूरच्या स्नेहा नगरातील निलेश चिंचोळकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, रात्रभर शेडमध्ये आश्रय घेत त्यांनी जीव वाचवला. आता डोळ्यांसमोर उभं आहे ते फक्त उद्ध्वस्त झालेलं घर, पाण्यात बुडालेली स्वप्नं आणि उद्याच्या उदरनिर्वाहाची चिंता... प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी आणि या परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी आर्त मागणी त्यांनी केली आहे. या संपूर्ण संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी.0
0
Report
लातूर पेपरफुटी विवाद में कांग्रेस नेता पर पुलिस केस: राजनीति गरमाती
Latur, Maharashtra:MPSC अन्न व औषध निरीक्षक कथित पेपरफुटीवरून राजकीय वाद पेटला आहे... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टनंतर औषाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी थेट पोलिसांत धाव घेतली आहे... पेपरफुटी प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसताना आपल्यावर संशय निर्माण होईल अशा पद्धतीने पोस्ट करून बदनामी केल्याचा आरोप पवार यांनी तक्रारीत केला आहे... त्यांच्या तक्रारीवरून औसा पोलिसांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय... त्यामुळे पेपरफुटीच्या आरोपांपासून सुरू झालेला हा वाद आता थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे....0
0
Report
महाराष्ट्र CET-MPSC पेपर फूटे मामले में दादा भुसे से इस्तीफे की मांग; Tower पर प्रदर्शन
Yavatmal, Maharashtra:महाराष्ट्रातील CET व MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनाम्ता द्यावा, अशी मागणी करीत यवतमाळ मध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. मंगरूळ साखर कारखाना येथे असलेल्या या टॉवरवर सकाळीच युवक काँग्रेसचे दहा ते पंधरा कार्यकर्ते हाती काँग्रेसचा झेंडा घेऊन चढले. सरकार लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करीत आहे. CET व MPSC पेपर फुटी प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळावी आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिकता जोपासत राजीनामा द्यावा अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे.0
0
Report
Advertisement
पुणे-मुंबई हाईवे विस्तार पर 5–6 हजार करोड़ खर्च, टोल से वसूली योजना
Pimpri-Chinchwad, Maharashtra:मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुश खबर ...जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या विस्तारीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झालाय.... महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा मार्ग सहा पदरी व्हावा या कामासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू केलंय...या साठी तब्बल ५ हजार ते ६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च टोलच्या माध्यमातून वसूल करण्याचा एमएसआरडीसीचा विचार आहे. सध्या २०३५ पर्यंत असलेली टोलवसुलीची मुदत आणखी १० ते १५ वर्षांनी वाढवली जाऊ शकते. याचीच माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी...0
0
Report
लातूर पेपरफुटी विवाद: सपकाळ के खिलाफ मामला दर्ज, पवार ने आरोप लगाए
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... MPSC अन्न व औषध निरीक्षक कथित पेपरफुटीवरून राजकीय वाद पेटला... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात औसा पोलिसांत गुन्हा दाखल... MPSC अन्न व औषध निरीक्षक कथित पेपरफुटीवरून आता राजकीय वाद पेटला है... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टनंतर औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी थेट पोलिसांत धाव घेतली आहे... पेपरफुटी प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसताना आपल्यावर संशय निर्माण होईल अशा पद्धतीने पोस्ट करून बदनामी केल्याचा आरोप पवार यांनी तक्रारीत केला आहे... त्यांच्या तक्रारीवरून औसा पोलिसांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय... त्यामुळे पेपरफुटीच्या आरोपांपासून सुरू झालेला हा वाद आता थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे0
0
Report
चिपळूण में ग्रामीण एकजुटता से भातलावणी पूरी, मरीजों को राहत
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणच्या खेर्डीत फुलला माणुसकीचा हिरवा अंकुर; ग्रामस्थांकडून सामूहिक भातलावणी.. संकटाच्या काळात माणुसकी और एकजुटी किती मोठा आधार ठरू शकते, याचं एक प्रेरणादायी उदाहरण चिपळूण तालुक्यातील खेर्डी-देऊळ-वरचीवाडीत पाहायला मिळालं आहे.. मुंबईत वैद्यकीय उपचार घेत असलेल्या गजानन उर्फ आप्पा शेवेकर यांच्या शेतीतील भातलावणीचे काम अडकू नये, म्हणून संपूर्ण गाव एकत्र आलं.. महिला, पुरुष और युवकांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता एकत्र येत श्रमदानातून शेवेकरांच्या शेतातील भातलावणी अवघ्या काही वेळात पूर्ण केली.. ग्रामस्थांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे आजाराशी लढा देणाऱ्या शेवेकर कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, कोकणातील पारंपरिक एकोपा और ग्रामीण संस्कृतीचे दर्शन पुन्हा एकदा घडले आहे..0
0
Report
Advertisement
