icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

फार्मेसी छात्रा के फोटो मॉर्फ कर इंस्टाग्राम पर पोस्ट करने वाला आरोपी गुजरात गिरफ्तार

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मधील फार्मसी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीचे फोटो मॉर्फ करून ते बनावट इंस्टाग्राम अकाउंट वरून अपलोड करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गुजरात मधून अटक केली आहे. फरहान अली सुभान अली असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. याप्रकरणी विद्यार्थिनींनी तक्रार केल्यानंतर आरोपी गुजरात मध्ये लपून बसला होता. त्याने दोन फेक इंस्टाग्राम आयडीवर विद्यार्थिनीच्या मित्र व मैत्रिणींचे फोटो मॉर्फ करून अश्लील फोटो तयार केले. त्या फोटोंना अश्लील मजकूर देऊन ते इंस्टाग्राम सारख्या सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर अपलोड केले. आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
0
0
Report

पंढरपूर कॉरिडोर के मुआवजे मुंबई दरों के अनुरूप, पुनर्वसन सहित दीर्घकालीन योजना

Pandharpur, Maharashtra:पंढरपूर प्रस्तावित कॉरिडॉर मधील जमीन व मालमत्ता अधिग्रहणासाठी देण्यात येणारा मोबदला हा थेट मुंबईतील दरांच्या धर्तीवर देण्यात आला आहे. संपूर्ण भारतात एवढा मोठा मोबदला अन्यत्र दिला गेला नसावा, बाधितांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती प्रस्तावित कॉरिडॉर बाधितांची मुख्यमंत्र्या सोबत बैठक झाली. पंढरपूरचा विकास हा पुढील ५० वर्षांचा विचार करून भाविकांच्या सोयी-सुविधांसह स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने केला जात आहे, दरवर्षी पंढरपुरला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असल्याने संपूर्ण शहराचा एकात्मिक आणि दीर्घकालीन विचार करून नियोजन होत आहे. बाधितांचे योग्य पुनर्वसन करून ‘जागेस जागा’ देण्याचे शासनाचे धोरण आहे.विकास आराखड्यामुळे बाधित होणारे दुकानदार, रहिवासी आणि इतर व्यावसायिक यांच्या पुनर्वसनाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील. पूर्वीच्या अनुभवांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला अविश्वास दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. बाधित दुकानदारांना पर्यायी दुकाने, तर बाधित होणाऱ्या ५०० हून अधिक घरांतील नागरिकांना योग्य पर्याय उपलब्ध करून देत नियोजन केले आहे
0
0
Report

नागपुर जलशुद्धीकरण केंद्र में क्लोरीन गैस लीकेज, सुरक्षित निकासी

Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर जिल्ह्याच्या शंकरपूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरीन वायू गळतीची घटना. गोधनी येथील क्लोरीन वायू गळतीची घटना ताजी असताना गुरुवारी संध्याकाळी शंकरपूर मध्येही वायू गळती झाली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ घबराट पसरली होती मात्र तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे मोठी दुर्घटना टळली. जलशुद्धीकरण प्रकल्पात 900 किलो चे सिलेंडर लावण्यात आले होते, त्याचे वॉशर निघाल्याने गॅस गळती झाल्याची माहिती. जलशुद्धीकरण प्रकल्पात उपस्थित कर्मचाऱ्यांना गॅसची दुर्गंधी आल्यावर तात्काळ पोलीस आणि आग्निशमन विभागाला माहिती दिली. पोलिसांनी आजूबाजूचा परिसर रिकामा करून घेतला, तसेच अग्निशमन विभागाने गॅस गळती बंद करून सिलिंडरला तेथून हटवण्यात आले. हा जलशुद्धीकरण प्रकल्प गावापासून दूर असल्याने कुणीही प्रभावित झाले नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या या जलशुद्धीकरण केंद्रातून आजूबाजूच्या 14 गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो.
0
0
Report
Advertisement

वर्धا में शेड मामले पर सांसद अमर काळे ने प्रशासन की कार्रवाई पर सवाल उठाए

Wardha, Maharashtra:वर्ध्यात खासदार अधिकाऱ्यांवर संतापले; थार गावातील शेड प्रकरणावरून प्रशासनाला जाब अँकर - वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील थार गावात सर्वसामान्य नागरिकाच्या शेडविषयी सुरू असलेल्या कारवाईवरून खासदार अमर काळे यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याची घटना समोर आली आहे. भास्कर घोरपडे यांच्या सुमारे २० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या शेडवर कारवाई करण्यासाठी प्रशासन आणि आमदार दबाव आणत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. घोरपडे यांच्यावर वैयक्तिक रागातून ही कारवाई केली जात असल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर खासदार अमर काळे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत सर्वसामान्य नागरिकावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात येत आहे. शेड हटविण्याच्या कारवाईमागे राजकीय दबाव असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. खासदारांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत संबंधित नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी भूमिका घेतल्याने या घटनेची परिसरात चर्चा रंगली आहे.
0
0
Report

रक्षा बंधन के पूर्व धनूर में मोटरसाइकिल दुर्घटना: मेघना शिरसाट की मौत

Dhule, Maharashtra:धुळे तालुक्यातील धनूर लोणकुटे येथील विवाहित महिला ऐन रक्षा बंधनाच्या पूर्वसंध्येला एका दुर्दैवी अपघातात जागीच मृत्युमुखी पावली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त झाली आहे. धनूर लोणकुटे येथील मेघना धनराज शिरसाट (४०) या विवाहित महिला गुरुवार दि. २७ रोजी रक्षाबंधनाचे औचित्य साधून आपल्या पतीसोबत मोटरसायकलने अंमळनेर येथील बहिणीकडे रक्षा बंधन साजरा करण्यासाठी जात होत्या. यावेळी पतीसोबत मोटर सायकलने जात असतांना वाघाडी गावाजवळ अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने तोल जाऊन मेघना शिरसाट दुखापतग्रस्त झाल्या. त्यांना जखमी अवस्थेत धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी डोक्याला जबर मार लागल्याने मृत घोषित केले. त्यांनी गुरुवार रोजी सायंकाळी धनूर लोणकुटे येथील सासरी सायंकाळी अंत्यसंस्कार झाले; त्यांच्या पित्य, दोन मुली, एक मुलगा, सासू, सासरे असा परिवार आहे. त्या धुळे दूध संघाचे संचालक अरविंद भालचंद्र शिरसाट यांच्या सून होती.
0
0
Report
Advertisement

देवेंद्र फडणवीस को एक वर्ष का एक्सटेंशन मिला: हिंदी-मराठी भाषा पर बहस तेज

Nagpur, Maharashtra:देवेंद्र फडणवीस को एक वर्ष का एक्सटेंशन मिला। उन्होंने बाहर के दुश्मन खत्म किए, पर अंदरूनी स्थितियाँ बाकी रहीं। शिवसेना के खिलाफ विरोध हो रहा है क्योंकि बाहरी राज्य में चुनाव हैं। कोई हिंदी में बोल रहा है, उग्र व्यवहार किया जा रहा है। आकांक्षा की माँ-बाप मराठी नहीं जानते, वे प्रांत से आए हैं; वे दुखी हैं; मैंने उनके साथ हिंदी में बात की। परदेशी भाषा से मराठी उच्चारण से लोगों को बोलना कठिन लगता है। अगर कोई उग्र बोलता है या लोगों को परेशान करता है तो उसे चोट लग सकती है। आप हिंदी में बोलिए, ऐसी न कहा जाए? कितने वाक्य सीखना जरूरी है— दायें जाएँ, बाएँ जाएँ। ओटीपी क्या है— क्या एक वर्ष में सीखना संभव है। किसी धोखाधड़ी चुनाव के लिए एक्सटेंशन देना उचित है。
0
0
Report

साखर की कृत्रिम कमी के आरोप, निर्यात-स्टॉक सवालों के घेरे में

Kolhapur, Maharashtra:राजू शेट्टी, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना Byte मुद्दे मुळामध्ये साखरेची टंचाई आहे का हा प्रश्न आहे.. साखरेची एव्हढा चढ उतार कशासाठी पेट्रोल टंचाई असल्यानंतर पेट्रोल घेण्यासाठी लोकांची राग असते, खतटंचाई असल्यानंतर खताच्या दुकानासमोर लोक रांगेत उभे असतात मग दुकानांच्या समोर साखरेसाठी रांगा का लागल्या नाहीत ? कोणत्याही दुकानदाराने आमच्याकडे साखर नाही असं का सांगितले नाही. बाजारपेठेत साखर मुबलक होती, केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे प्रत्येक महिन्याला 22 लाख मॅट्रिक टन साखर रिलीज करत आहे. साखर मिळत नाही असं कुठेही तक्रार आलेली नाही. कारण यावर्षी आपल्या गरजेएवढी साखर उपलब्ध होती सीजन सुरू असताना 47 लाख मॅट्रिक टन साखर शिल्लक होती. एकूण ठरलेल्या कोट्या पैकी केवळ आठ लाख मेट्रिक टन साखर निर्यात झाली... मग उर्वरित साखर गेली कुठे. आता सरकार म्हणते 35 लाख टन साखर शिल्लक आहे. मग राहिलेली 35 ते 40 लाख मेट्रिक टन साखर कुठे गेले उर्वरित साखर नेपाळ मार्गे बांगलादेशला गेली का ? केंद्र सरकारने मोठ्या व्यापाऱ्यांचे स्टॉक तपासले असते तर सगळं सापडले असते. कृत्रिम रीतीने दरवाढ करण्यात आली. जनतेमध्ये घबराट निर्माण करून अधिक पैसे कमवायचे असा यांचा डाव होता साखरेचे भाव अचानक वाढले का ? आणि ते नंतर कमी का झाले ? याचे उत्तर आम्हाला मिळायला पाहिजे आता जे साखरेचे भाव आहेत ते स्थिर राहावेत असे आमचे मत आहे , 4800 च्या खाली भाव जाता कामा नये आयात होणारी साखर ही आक्टोंबर महिन्यात येणार आहे. त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कर्नाटकातील कारखाने अवघ्या काही दिवसात सुरू होणार आहेत. मग साखर आयात करण्याची गरज काय होती आत्ताच भाव कसे खाली आले याची चौकशी सरकारने करायला पाहिजे. *ऑन मंत्री अमित शहा आणि प्रल्हाद जोशी* केंद्राने 15 लाख मॅट्रिक टन साखर निर्यात करण्याचा कोटा दिला होता. त्यातील फक्त आठ लाख मेट्रिक टन साखर निर्यात झाली, उर्वरित साखर गेली कुठे ? अमित शहा यांना सध्या साखरेची खूप काळजी वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी याचे उत्तर द्यायला हवं. अन्नपुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांना देशातील साखर कारखानदारांकडे किती साखर शिल्लक आहे याची माहिती तात्काळ उपलब्ध होते, ती साखर तपासायचे अधिकार त्यांच्याकडे आहेत, मग ते का तपासत नाहीत. कारण तस्करीच्या मार्गे ही साखर बाहेर देशात गेली असेल. काही व्यापाऱ्यानी साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण करून sाखर जादा दराने विकायची या उद्देशाने साखरेचा साठा केला असेल. खाजगी व्यापाऱ्यांच्या गोडाऊनवर धाडी टाकायला पाहिजे होत्या. साखर देशाबाहेर गेले असेल तर आमचे गृहमंत्री अमित शहा काय करत होते ? अमित शहा यांना जबाबदारी झटकता येणार नाही.
0
0
Report
0
0
Report
Advertisement

भारत में चीनी के दाम छूते, सरकार आयात से कीमतें नियंत्रण में लाने को तत्पर

Kolhapur, Maharashtra:Anc :- साखर उत्पादनात ब्राझील जगात आघाडीवर तर भारताचा क्रमांक दुसरा… भारत जगातील सर्वात मोठ्या साखर उत्पादक देशांपैकी एक असला, तरी सध्या देशात साखरेच्या दराने उच्चांक गाठलाय… यंदा उत्पादन घटलं… साखरेचा साठा कमी झाला… आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली… त्यामुळे साखरेचे दर वाढले असा दावा केला जात आहे…पण प्रत्यक्षात ही स्थिती नसल्याचा दावा काही साखर अभ्यासक आणि शेतकरी नेते करत आहेत. त्यामुळे आगामी काळात वाढलेले साखरेचे भाव कमी होणार की स्थिर राहणार याची चर्चा सुरू झाली आहे.. पाहूया त्याचाच स्पेशल रिपोर्ट. साखर... प्रत्येकाच्या घरातील रोजच्या वापरातील वस्तू...चहा असो… मिठाई असो… बेकरी पदार्थ असोत किंवा शीतपेय, साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, म्हणूनच साखरेच्या दरात झालेली थोडीशी वाढही थेट ग्राहकांच्या खिशावर परिणाम करते… त्यामुळे साखरेचा नेमकं गणित काय आहे याकडे सर्वांचेच लक्ष असते.. जगाच्या बाजारपेठेत साखर उत्पादनात ब्राझील नंतर भारताचा नंबर लागतो. पण ब्राझील आणि भारताच्या साखर उद्योगात मोठा फरक आहे… ब्राझील हा जगातील सर्वात मोठा साखर निर्यातदार आहे, तर भारतात तयार होणाऱ्या साखरेचा मोठा हिस्सा देशांतर्गत बाजारातच वापरला जातो, भारताचं साखर गणित… देशात दरवर्षी साधारण 280 ते 285 लाख टन साखरेची गरज असते… त्यामुळे देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन, सुरुवातीचा साठा, आयात आता या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. पण 2025-26 च्या हंगामात उत्पादनाला मोठा फटका बसला… सुरुवातीला देशात सुमारे 343 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता… पण उत्पादन झालं 305 लाख मॅट्रिक टन इतके. येत्या हंगामात देखील साखरेचे उत्पादन सुमारे 306 लाख टन राहण्याची शक्यता आहे… यातील देशांतर्गत बाजारपेठेत 280-285 लाख टन मॅट्रिक टन साखर लागणार आहे. त्यामुळे उत्पादित झालेली साखर आणि स्थानिक बाजारपेठेत लागणारी साखर यातील अंतर कमी आहे.. मागील साठा, निर्यात, इथेनॉलकडे वळवलेली साखर आणि बाजारातील उपलब्धता…या सगळ्याचा विचार केला तर देशातील उपलब्ध साठ्यावर दबाव निर्माण झाला आणि याचाच परिणाम साखरेच्या दरावर झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या दोन-तीन महिन्यातील बाजारपेठेत साखरेला मिळणारा भाव पहिला तर जुलैमध्ये साखरेचा सरासरी किरकोळ दर सुमारे 50 रुपये किलो होता. ऑगस्टमध्ये तो 55 रुपयांपेक्षा पुढे गेला आणि आता अनेक बाजारपेठांमध्ये किरकोळ दर 65 रुपये किलोच्या आसपास पोहोचला आहे… याचा अर्थ जवळपास 40% हून अधिक भाववाढ काही महिन्यात झाली. तोंडावर गणेशोत्सव, दसरा, दिवाळी…हे सणासुदीची दिवस असताना वाढलेले साखरेचे दर ग्राहकांना चटका देणारे आहेत. त्यामुळे साखरेच्या भावाने अचानक घेतलेल्या उसळीमुळे ग्राहक संतप्त झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे केंद्र सरकार देखील खडबडून जागे झाले. बाजारात साखरेचा पुरवठा वाढवण्यासाठी 10 लाख टन कच्ची साखर शुल्कमुक्त आयात करण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय परदेशातून कच्ची साखर आयात करून प्रक्रिया करणाऱ्या रिफायनर्सकडील सुमारे 3 ते 3.5 लाख टन तयार साखर देशांतर्गत बाजारात आणण्याचा निर्णय घेण्यात आलाय. म्हणजेच एकीकडे आयात आणि दुसरीकडे उपलब्ध साठा बाजारात आणण्याचा प्रयत्न केंद्राने केला आहे. यामध्ये केंद्राची भूमिका ही साखरेचा पुरवठा वाढवून दर नियंत्रणात आणण्याची आहे, सरकारच्या या निर्णयाचा परिणाम बाजारात दिसायलाही लागलाय. पण झालेला हा बदल ग्राहकांना अपेक्षित असणारा असा नाहीये. त्यामुळेच शेतकरी संघटनेचे नेते देखील या भाव वाढीमुळे आवाक झाले आहेत.. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
0
0
Report

मराठ्य उपोषण जारी: सरकार पर दबाव बढ़ाने के लिए 28 अगस्त का आह्वान

Jalna, Maharashtra:जालना : मनोज जरांगे पाटील बाईट पॉईंटर महाराष्ट्रातील मराठ्यांनी त्यांची अडी-अडचण घेऊन अंतर वालीत यायचं आहे तुमचे अर्ज आल्यानंतर सरकार तुमची अडचण कशी सोडवत नाही हे मि बघतो पुणे, सातारा,कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी लगेच घेणार त्यांना सोडणार नाही मराठ्यांनी डाव टाकणं शिकावं घरात झोपणं शिकू नका एकही राजकारण्याने अंतरवालीतील उपोषणाला गैरहजर राहू नये लहान मोठ्या सर्व राजकारण्यांनी यावे मराठ्यांचे आमदार खासदार मंत्र्यांनी देखील उपोषणात यावे 29 ऑगस्टच्या उपोषणाचे सर्वांनी साक्षीदार व्हा अंतरवालीच्या उपोषणाला भेट द्या तुमच्या लेकरा बाळाच्या कल्याणाची जबाबदारी माझी-जरांगे ऑन फडणवीस देवेंद्र फडणवीसांनी जाणून बुजून मराठ्यांवर अन्याय करायचं ठरवलं आहे.मराठ्यांनी मुंबईत येऊ नये म्हणून त्यांनी नियम बदलले सरकारने नियमबाबत काढलेली नोटीस भडकाऊ जर आमचं मुंबईत जायचं ठरलं तर कोण आम्हाला आझाद मैदानावर आणि वर्षावर आंदोलन करू देत नाही ते मि बघतो.मुंबईत रस्त्या रस्त्यावर आंदोलन होणार तुम्हाला काय वाकडं करायचं ते करा 40 ते 45 लाख गाड्या मुंबईत घुसणार आम्हाला कोण अडवत ते बघतो ऑन 28 ऑगस्ट कार्यक्रम उद्या अंतरवालीत बैठक नाही.ज्यांनी हैद्राबाद गॅझेट नुसार प्रमाणपत्रसाठी अर्ज केले त्यांनी ते अर्ज घेऊन अंतरवालीत यायचं आहे.काम होईपर्यंत परत जायचं नाही ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रसाठी अर्ज केले पण प्रमाणपत्र मिळाले नाही त्यांनी देखील अर्ज घेऊन यायचे.प्रमाणपत्र मिळाले पण व्हॅलीडिटी मिळाली नाही त्यांनी देखील अर्ज घेऊन यायचे आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या पण प्रमाणपत्र मिळाले नाही,प्रमाणपत्र मिळले पण व्हॅलीडिटी दिली नाही त्यांना जागेवर द्यायला लावणार ECBC, EWS मधून निवड होऊनही नियुक्ती झाली नाही त्यांनी उद्या अर्ज घेऊन यावे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळचे व्याज परतावे थांबले त्यांनीही अर्ज घेऊन यावे सारथीचा लाभ न मिळालेल्या मराठ्यांनी अर्ज घेऊन यावे सरकार म्हणत मराठ्यांचा एकही प्रश्न मागे ठेवलाेला नाही मला त्यांना दाखवायचं आहे हे बघा अर्ज केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सारख्या सारख्या लढाया लढल्या तशा आपल्याला लढाव्या लागतील सरकारला आपल्या नोंदी कमी करायच्या आहेत,त्यांना वाटत मराठे फार मोठे होतील सरकारने नोंदी कमी करण्याचे षड्यंत्र रचले आहे माझ्या विरोधात आपलेच लोक घालायचे षड्यंत्र रचले आहे त्यामुळे मला साथ द्या मी प्रामाणिक काम करतो म्हणून हे सुरू आहे ऑन विजय वडेट्टीवार सुप्रिया सुळे OBC प्रमाणपत्र मलाही माहीत नाही आहे की नाही पण याची कारण दुखती?असू दे ना असेल तर तुला काय करायचं? तुमच्या सगळ्या लोकांकडे नाही का.? तुमच्या सगळ्या नेत्यांकडे नाही का.? का हे जळतात मला काही कळत नाही.मि याच समर्थन करत नाही.पण मराठ्यांविषयी हे किती जळाऊ वृत्तीचे लोक आहे यावरून हे लक्षात येते.मराठ्यांकडे असलं म्हणून आमच्या बोकांडी बसता का? शिष्टमंडळ भेट हो शिष्टमंडळ आज माझ्याकडे येणार होतं पण त्यांना मि मागण्या लिहून दिल्या आहे त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मि उपोषण थांबवणार नाही असं मि त्यांना सांगितल आहे 58 लाख कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय मि आंदोलन थांबवणार नाही जीआर काढला की मि आता उपोषण थांबवणार नाही तो जीआर महाराष्ट्रातील मराठ्यांना देणार.मराठे जेव्हा जीआर चांगला आहे याची अंमलबजावणी करायला सांगा असं सांगत नाही तोपर्यन्त उपोषण सोडणार नाही पूर्वी जीआर आला की आंदोलन थांबवत होतो पण सरकार फसवत आतापर्यंत जी फसवणूक झाली ती आता होणार नाही याची काळजी घेईन
0
0
Report

विजय वडेट्टीवार ने सुप्रिया सुळे पर आरोप लगाए; माफी या ओबीसी प्रमाणपत्र पेश कराने की मांग

Nagpur, Maharashtra:नागपुर - चरण वाघमारे - (नेते,राष्ट्रवादी शरद पवार पक्ष) On विजय वडेट्टीवार सुप्रिया सुळे वक्तव्य - - विजय वडेट्टीवार यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचे म्हणत आहेत.. मात्र आमच्या पक्षाची भूमिका जातीवाद किंवा धर्मवाद करायची भूमिका कधीच राहिली नाही.. - विजय वडेट्टीवार यांनी सुप्रिया ताईवर आरोप केल्यावर त्यांनी याचा खुलासा केला आहे.. आणि विजय वडेट्टीवार यांना माफी मागायला सांगितल आहे. - त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी सुप्रिया ताई यांची माफी मागावी किंवा ओबीसी प्रमाणपत्र सादर करावे.. - सुप्रिया ताई यांनी यापूर्वी देखील खुलासा केला आहे. केंद्रातील काँग्रेसमध्ये व्यवस्थित मात्र राज्यातील काँग्रेसमध्ये तालमेळ नाही.. - केंद्रात कोणत्याही अडचणी येत नाही मात्र महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे या अडचणी निर्माण झाले आहे..
0
0
Report
Advertisement

कुर्ला में मोमोज खाने से १६ लोग फूड पॉइज़निंग, हालत स्थिर

Mumbai, Maharashtra:कुर्ल्यात मोमोज खाल्ल्याने १६ जणांना फूड पॉइझनिंग. सुंदरबाग परिसरातील घटना. मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना उलटी, जुलाब, ताप, पोटदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास. त्रास जाणवल्यानंतर सर्वांना कुर्ला येथील भाभा रुग्णालयात आणले. १६ पैकी १४ जण रुग्णालयात दाखल. २ जणांवर ओपीडीच्या माध्यमातून उपचार. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांमध्ये लहान मुलांचाही समावेश. घटना २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर. डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णांवर उपचार सुरू. मुंबई महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांची भाभा रुग्णालयाला भेट. हरिष भांदिर्गे यांनी रुग्णांची विचारपूस करून डॉक्टरांकडून घेतली प्रकृतीची माहिती. पूर्ण प्रकरणाची आवश्यक ती तपासणी करून योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना. फूड पॉइझनिंगचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपासणी सुरू.
0
0
Report

ठाकरे सेना के आंदोलन से कोल्हापुर की सड़कों पर गड्ढे, 100 करोड़ सवाल

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरात ठाकरे सेनेच्या वतीने निकृष्ट दर्जाच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. शहरातील मध्यवर्ती भाग असणाऱ्या आणि अंबाबाई मंदिराला लागून असणाऱ्या बिनखांबी गणेश मंदिराजवळ ठाकरे सेनेन आंदोलन करून निषेध नोंदवला. यावेळी कोल्हापूर शहरासाठी शंभर कोटीचा निधी मंजूर झाला मग तो निधी गेला कुठे असा जाब विचारत ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी खड्डे पडलेल्या रस्त्यात झाडे लावत निषेध नोंदवला. यावेळी पैसा झाला मोठा पण रस्ता झाला खोटा अशी भूमिका मांडत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.. लोकप्रतिनिधी असोत किंवा सरकार हे रस्त्यामध्ये डांबर घालण्यापेक्षा डांबर खाण्याचे काम करत असल्याचा आरोप केला.
0
0
Report

श्रीराम पुल पर एक महीने में खड्डे, 7 करोड़ के काम पर सवाल

Karjat, Maharashtra:मनहुनाभरातच नव्या श्रीराम पुलाला खड्डे; ७ कोटींच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह कर्जतजवळील उल्हास नदीवरील नव्या श्रीराम पुलाचे उद्घाटन होऊन महिनाही उलटला नसताना पुलावर आणि जोडरस्त्यावर खड्डे पडले आहेत. सुमारे ७ कोटी रुपये खर्चाच्या या कामाच्या गुणवत्तेवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ४ जुलै रोजी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन झाले होते. जुन्या पुलावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी हा नवीन पूल उभारण्यात आला आहे. मात्र, अल्पावधीतच खड्डे पडल्याने ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, दहिवली बाजूचा वीज ट्रान्सफॉर्मर आणि अनधिकृत बांधकामांमुळे अडथळा निर्माण होत असून उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पुलामुळे वाहतूककोंडीत काही प्रमाणात घट झाल्याचेही नागरिकांनी मान्य केले. संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली असून खड्डे अत्याधुनिक पद्धतीने भरणार आहोत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंत्ता राहुल देवांग यांनी दिली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top