icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कोकण में गणेशोत्सव के दौरान रिक्शा मंहगाई पर नियंत्रण: जिलाधिकारी ने आधिकारिक दरपत्रक लगाने के निर्देश दिए

Ratnagiri, Maharashtra:गणेशोत्सवात कोकणात रिक्षांच्या मनमानी भाडेवाढीला चाप; थांब्यांवर अधिकृत दरपत्रक लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमानी आणि स्थानिक प्रवाशांची वाढीव भाडे आकारून होणारी लूट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे.. उत्सवाच्या काळात प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू नये,यासाठी प्रत्येक रिक्षा थांब्यावर अधिकृत दरपत्रकाचे फलक तातडीने लावण्याचे कडक निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.. गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत त्यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाला हे आदेश दिले.. याशिवाय,आरटीओने रिक्षाचालकांची तातडीने बैठक घेऊन मीटर तपासणी पूर्ण करावी,अशा स्पष्ट सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत..
0
0
Report

कोल्हापुर के संत बालूमामा मंदिर ट्रस्ट घोटाले में प्रशासक व सचिव की जमानत खारिज

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील 60 कोोटी 75 लाख घोटाळ्याप्रकरणी तात्कालीन प्रशासक रागिनी खडके आणि देवस्थान सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यावर गुन्हा दाखल होता. त्यानंतर या दोघांनीही कोल्हापुर जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्वक जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. पण हा अर्ज कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे या दोघांनाही कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये तब्बल 60 कोटी 75 लाखाचा गैरव्यवहार झाल्याचं तपास अहवालात उघडकीस आला होता, त्यानंतर तात्कालीन प्रशासक आणि धर्मदाय निरीक्षक रागिनी खडके, देवस्थान सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्या तात्कालीन विश्वस्त मंडळातील अनेकांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या दोघांनी कोल्हापूर जिल्हा न्यायालयात धाव घेऊन जामीन्यासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान त्या देवस्थान घोटाळ्याची चौकशी विशेष पथकाच्या माध्यमातून सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी दौरे पर रुबल अगरवाल ने चिपळूण-खेड में प्रशासनिक कामकाज की दमदार समीक्षा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागीय आयुक्त रुबलअगरवाल यांचा रत्नागिरी दौरा; चिपळूण प्रशासकीय कामकाजाची केली विशेष प्रशंसा.. अँकर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला.. या दौऱ्यादरम्यान त्यांनी खेड,चिपळूण आणि रत्वागिरी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठका घेऊन प्रशासकीय कामांची थेट पाहणी केली.. पूर नियंत्रण,पर्यावरण संवर्धन,पारदर्शक भूसंपादन आणि मतदार यादी पुनर्निरीक्षणात चिपळूण विभागीय कार्यालयाने बजावलेली कामगिरी अव्वल दर्जाची असल्याचे नमूद करत त्यांनी स्थानिक प्रशासनाचा गौरव केला..तसेच,कामाचा हाच आदर्श पुढेही कायम ठेवण्याचे निर्देश दिले.. या दौऱ्यात त्यांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा क्रमांक एकमधील मतदान केंद्राची पाहणी केली आणि शाळकरी मुलींशी आत्मीय संवाद साधत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या..
0
0
Report

सोलापुर में विजपुरवठा बाधित, उळे सब स्टेशन बंद, किसान उग्र प्रदर्शन

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : विजपुरवठा सुरळीत होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बंद पाडले एमएससीबीचे सब स्टेशन विजपुरवठा सुरळीत होत नसल्याने सोलापुरातील शेतकरी आक्रमक दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे सब स्टेशन शेतकऱ्यांनी बंद पाडले उळे सब स्टेशन बंद पाडल्याने 11 गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा आणि शेतीला 8 तास वीज मिळावी यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन जवळपास 200 ते 250 शेतकऱ्यांनी एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत सब स्टेशन बंद पाडले. या भागातील शेतकऱ्यांची रात्री 1 वाजता लाईट येते पहाटे 6 वाजता लाईट जाते त्यातही दर 10 मिनिटाला लाईट ये जा होते त्यामुळे सर्व शेतकरी कंटाळले आहेत त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज सकाळपासून उळे सब स्टेशन बंद पाडले आहे
0
0
Report

प्याज के दाम 60-70 रुपए तक पहुँचे, घर खर्च बढ़ा

Washim, Maharashtra:अवघ्या दहा दिवसांत कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली असून,३० रुपये किलो असलेला कांदा आता थेट ६० ते ७० रुपये किलोवर पोहोचला आहे.त्यामुळे घरखर्चाचे गणित बिघडले असून, रोजच्या स्वयंपाकात कांद्याचा वापर कमी करण्याची वेळ गृहिणींवर आली आहे.कांद्यासोबतच लसणाच्या दरातही मोठी वाढ झाली असून,बाजारात लसूण सध्या २०० ते २२० रुपये किलो दराने विकला जात आहे.त्यातच इतर भाजीपाल्याच्या दरातही वाढ झाल्याने रोजच्या बाजारहाटीचा खर्च वाढला आहे.कांदा, लसूण आणि भाजीपाल्याच्या वाढत्या दराचा थेट फटका सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटला बसत आहे.
0
0
Report
Advertisement

गडचिरोली के सिरोंचा तालुक़े में 3.6 भूकंप; अहेरी-नागेपल्ली में भी हल्के धक्के, नुकसान नहीं

Gadchiroli, Maharashtra:टायटल:--- गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप, अहेरी-नागेपल्ली परिसरातही जाणवले सौम्य धक्के, प्राथमिक माहितीनुसार कोणतीही हानी नाही; नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता बाळगण्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन अँकर:--  गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असून त्याचे केंद्र गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याचे प्राथमिक माहितीत दर्शविण्यात आले आहे. अहेरी तालुक्यातील अहेरी व नागेपल्ली परिसरातही हे धक्के जाणवल्याची माहिती अहेरी तहसील प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेण्यात येत आहे. सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती प्राप्त झालेली नाही. नागरिकांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे घाबरून जाऊ नये. शांतता राखून आवश्यक ती दक्षता बाळगावी. तसेच भूकंपासंदर्भातील अफवा अथवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
0
0
Report

केदारनाथ नवले ने कांदा बाजार के उतार-चढ़ाव के बीच वांग्या की नई खेती शुरू की

Yeola, Maharashtra:कांद्याच्या बाजारभावात दररोज होत असलेल्या चढ-उताराला कंटाळून शेतीत वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय येवला सोमठाणे देश येथील कांदा उत्पादक शेतकरी केदारनाथ नवले यांनी घेतला त्यांनी अर्धा एकर क्षेत्रात भरीतासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या बारकू कंपनीच्या वांग्याची तब्बल २२०० रोपांची लागवड केली मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन आणि इतर खर्च मिळून आतापर्यंत ६० ते ७० हजार रुपये खर्च केला आज पहिल्या तोडणीला सुरुवात झाली असून सुमारे ७० ते ८० कॅरेट वांगी निघाली मात्र, अपेक्षित ३० रुपये किलो दराऐवजी नाशिक बाजार समितीत सध्या १० ते १५ रुपये किलोचा दर मिळत असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे उत्पादन खर्चही भरून निघेल की नाही, अशी भीती शेतकरी केदारनाथ नवले यांनी व्यक्त केली
0
0
Report
Advertisement

औरंगाबाद खंडपीठ ने नौकरशाही को कड़ा नोटिस दिया: सात दिन में फाइल निस्तारित करें

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शासकीय कार्यालयातील फाईल ७दिवसांत निकाली काढा, अन्यथा शिस्तभंगाची कारवाईस सामोरे जा, अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोकरशाहीला इशारा दिला आहे. अधिकाऱ्यांच्या या लालफीतशाहीमुळे नागरिक न्यायापासून वंचित राहतात आणि न्यायालयाचा अमूल्य वेळ अशा याचिकांमध्ये खर्च होतो, अशी उद्विग्नता खंडपीठाने व्यक्त केली. खंडपीठात दरवर्षी दाखल होणाऱ्या सुमारे १८ ते १९ हजार याचिकांपैकी तब्बल ७ ते ८ हजार याचिका 'केवळ अधिकाऱ्यांना प्रस्तावांवर निर्णय घेण्याचे निर्देश द्या' अशा स्वरूपाच्या असतात. या धक्कादायक बाबीची न्या. नितीन बी. सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब डी. शिंदे यांच्या खंडपीठाने अत्यंत गंभीर दखल घेत, स्वतःहून  जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. लातूरच्या एका शेतकऱ्याचा भूसंपादनासंदर्भातील अर्ज १९९९ पासून म्हणजे तब्बल २७ वर्षे अनिर्णीत असल्याचे, तर सामाजिक न्याय विभागाकडे २०१८पासून एक प्रस्ताव धूळ खात पडून असल्याचे सुनावणीदरम्यान खंडपीठाच्या निदर्शनास आले, त्यावरून हे निर्देश देण्यात आले..
0
0
Report

256 कॉलेजों के खिलाफ बोर्ड की करारी कार्रवाई, मान्यता बिना परीक्षा फॉर्म दाखिले का खुलासा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:विनामान्यता विषय चालवून बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेचे अर्ज भरून घेतले, अशा छत्रपती संभाजीनगर विभागातील २५६ उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांवर शिक्षण मंडळाने कठोर कारवाई केली आहे. या संस्थांना प्रतिविद्यार्थी २ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. १८४ संस्थांचे बोर्ड संकेत , स्कूल कोड गोठवण्यात आले आहेत. संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि क्राफ्ट सायन्स या विषयांची पूर्वपरवानगी न घेताच विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचऑनलाइन प्रक्रियेदरम्यान समोर आले. ऑक्टोबरअखेरपर्यंत संस्थेने दंडाची रक्‍कम भरून मान्यतेची प्रक्रिया पूर्ण न केल्यास, या शाळांमधील १२ हजार विद्यार्थ्यांना बारावीचे परीक्षेचे अर्ज भरता येणार नाहीत. बोर्डाच्या वतीने परीक्षेला विद्यार्थी बसवताना त्या विषयांची आणि मंडळाची मान्यता आवश्यक आहे. परंतु मान्यर विषय असलेल्या क्राफ्ट सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकशास्त्र या विषयांची मान्यता न घेता अकरावी- बारावी परीक्षेला विद्यार्थी बसवण्यात आले. विद्यार्थी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करत असल्याने नंतर ही बाब समोर आली. त्यानंतर आता बोर्डाने या २५६ संस्थांवर कारवाई केलीय.
0
0
Report
Advertisement

शहर भर में हेलमेट नहीं पहनने पर पुलिस ने 5175 बाइक चालकों पर कार्रवाई

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांकडून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर बुधवारीही कारवाई सुरू आहे, शहरभरात विविध चौकांमध्ये राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ५,१७५ विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर कारवाई केली. शहर वाहतूक पोलिसांनी मंगळवारपासून ही कारवाई सुरू केली. हर्सल टी, मुकुंदवाडी चौक, केंब्रिज चौक, हायकोर्ट सिग्नल, सेव्हन हिल्स, आकाशवाणी, क्रांती चौक, रेल्वे स्टेशन, अमरप्रीत चौक, कार्तिकी चौक, मिल कॉर्नर, एएस क्लब, ओअॅसिस चौक, नगर नाका आदी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. २ टप्प्यांत पोलिसांनी शहरातील विविध चौकांत सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी ५ ते सायंकाळी ७ अशी २ टप्प्यांत ६ तास कारवाई केली. ही कारवाई सुरूच राहणार आहे..
0
0
Report

STS स्मार्ट कार्ड से यात्रियों को परेशानियाँ: रिचार्ज और टिकट सुविधाओं में दिक्कतें

Buldhana, Maharashtra:एसटीच्या स्मार्ट कार्डमुळे प्रवासी हैराण! प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने स्मार्ट कार्डची सुविधा सुरू केली. मात्र, हेच स्मार्ट कार्ड आता प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. कधी कार्डमध्ये रिचार्ज होत नाही, तर कधी रिचार्ज केलेले कार्ड बसमध्ये चालत नाही. विशेषतः हाफ तिकीट किंवा पूर्ण तिकीट सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना या समस्यांचा अधिक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. बस प्रवासादरम्यान स्मार्ट कार्डवरून प्रवासी और वाहकांमध्ये वादाचे प्रसंगही घडत आहेत. नेमकी अडचण काय आहे? स्मार्ट कार्डची सुविधा की प्रवाशांसाठी मनस्ताप? याच प्रश्नाचा बसस्थानकावरून थेट रिअॅलिटी चेक केलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी...
0
0
Report

कोयना डैम 100% भरा, अचानक विसर्जन संभव; किसानों-गांवों के लिए चेतावनी जारी

Satara, Maharashtra:कराड, सातारा - सातारा जिल्ह्यातील कोयना धरण 100 टक्के भरले असून आता कोयना धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. कोयना धरण 105 टीएमसी पाणीसाठाCapacity असलेले असून ते 100% भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सातारा सांगली जिल्ह्यासह कृष्णा कोयना नदीकाठच्या शेकडो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा पाण्याची चिंता मिटली आहे तर राज्याला आवश्यक असलेले वीज निर्मितीसाठी पाण्याचा उपलब्ध साठाही निर्माण झाल्याने विजेची चिंता ही मिटली आहे. सध्या धरणाच्या पायथा वीज गृहातून 1050 क्युसेक विसर्ग सुरू आहे मात्र धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग सुरू केला जाऊ शकतो त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top