icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

हिंगोली में मराठा आरक्षण के लिए मनोज जरागे पटेल का आमरण उपवास, बंद का आह्वान

Hingoli, Maharashtra:मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरागे पाटील यांचा आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे मात्र शासनाकडून जरांगे पाटील यांच्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आज हिंगोली बंदच आवाहन करण्यात आला आहे, या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठान हे बंद ठेवली आहे..काल देखील हिंगोली जिल्ह्यात ठिकाणी करण्यात आली होती आंदोलने, आज देखील हिंगोली औंढा नागनाथ या शहरांमध्ये बंदचा आवाहन करण्यात आलं होत आणि यानंतर आता हिंगोलीत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे
0
0
Report

नेपाल में महाप्रलय के बाद नेपाली नाविक घर लौटे, मछुआरों के लिए संकट बढ़ा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी प्रलययामुळे नेपाळी खलाशी गावी मासेमारीला फटका अनेक खलाशी नेपाळला रवाना नौका मालक संकटात नेपाळमध्ये झालेल्या महाप्रलयानंतर कुटुंबीय नातेवाईकांच्या काळजीने जिल्ह्यातील मासेमारी नौकांवर काम करणाऱ्या शेकडो नेपाळी खलाशांनी आपल्या कुटुंβαιांकडे परतण्याचा मार्ग धरला आहे त्यामुळे मासेमारी हंगामात मनुष्यबळाअभावी नौका मालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत गेल्या आठवड्यात नेपाळमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे मोठी हानी झाली आहे अनेक गावेच्या गावे वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात मनुष्यांनी झाली आहे यामुळे जिल्ह्यात काम करणारे खलाशी त्यांच्या कुटुंबीयांच्या काळजीने आपल्या गावी गेलेत
0
0
Report
Advertisement

मुंबई-गोवा महामार्ग की नई डेडलाइन: जनवरी तक 100% काम पूरा, भोसले ने आश्वासन

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गासाठी आता पुन्हा नवी डेडलाईन. जानेवारीपर्यंत शंभर टक्के काम पूर्ण. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आश्वासन. मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे येथील उड्डाणपूल लवकरच हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे. तसेच माणगाव व इंदापूर बायपास सह उर्वरित ठिकाणाचे महामार्गाचे काम जानेवारी 2017 पर्यंत शंभर टक्के पूर्ण होईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी दिले. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गाची मंत्री भोसले यांनी गुरुवारी पाहणी केली त्यानंतर महाड येथे आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी बोलत होते.
0
0
Report
Advertisement

विद्यानंद बापट के माता-पिता से रत्नागिरी पुलिस की पूछताछ, पुणे में मारपीट

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- विद्यानंद बापट यांच्या आई वडिलांची रत्नागिरीच्या पोलिसांकडून विचारपूस काल रात्री रत्नागिरी पोलिसांचे पथक विद्यानंद बापट यांच्या मूळ घरी मूळ घराबाहेर पोलीस बंदोबस्त देण्याच्या दृष्टीने रत्नागिरी पोलिसांच्या हालचाली रत्नागिरी पोलिसांकडून आई-वडिलांची विचारपूस करत काळजी घेण्याच्या सूचना डीजे मुक्त गणेशोत्सवाचा आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना काल पुण्यात झाली होती मारहाण बापट यांचे राहतात रत्नागिरी तालुक्यातील गोळप इथे वडील सुहास बापट आणि आई कल्पना बापट वयोवृद्ध आई-वडिलांनी मुलाची भूमिका योग्य असल्याचं सांगत विद्यानंदचं केलं होतं समर्थन
0
0
Report

तळेगाव गणेशोत्सव पर पुलिस की कड़ी नजर

Varsoli, Maharashtra:Headline: तळेगावच्या गणेशोत्सवावर पोलिसांची करडी नजर डीजे-लेझरला कडक विरोध Anchor : तळेगाव दाभाडेतील गणेश मंडळांच्या आढावा बैठकीत पोलिसांनी डीजे आणि लेझरच्या वापराबाबत कडक भूमिका घेतली आहे. गणेशोत्सव शिस्त, सुरक्षा आणि समन्वयाने साजरा करण्याचे आवाहन करत, मिरवणुकीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कडक कारवाईचा इशारा पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी दिला आहे. डीजेच्या कर्कश आवाजामुळे ज्येष्ठांसह तरुणांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याने डीजे पूर्णपणे बंद करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली. डीजेऐवजी टाळ-मृदंगासारख्या पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले. VO : यंदा डीजे आणि लेझरच्या वापरावर पोलिसांची करडी नजर राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले.
0
0
Report

कोयना डैम 100% भर गया; पिछले साल से 17 दिन पहले ओवरफ्लो

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोयना धरण शंभर टक्के भरले; गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल १७ दिवस आधीच ओव्हरफ्लो.. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाणारे कोयना धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरले आहे.. ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असूनही पाणलוט क्षेत्रातील सततच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्याने १०५.२५ टीएमसीचा टप्पा गाठत १०० टक्के पातळी गाठली आहे.. विशेष म्हणजे,गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल १७ दिवस आधीच हे धरण ओव्हरफ्लो झाले असून,यामुळे राज्यावरील पाणी आणि वीजनिर्मितीचे संकट टळल्याने मोठा दिलासा मिळाला आहे..
0
0
Report
Advertisement

राष्ट्रीय स्तर की कुश्ती खिलाड़ी अश्विनी पौळ ने तीन बच्चों के साथ नेळदुर्ग किले से छलांग लगाई

Dharashiv, Maharashtra: धाराशिव: राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी ३ लहान मुलांसह ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून घेतली १०० फूट खाली उडी. आईसह दोन मुलांचा मृत्यू, एक मुलगी मृत्यूशी झुंजतेय धाराशिवमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटूने आपल्या तीन लहान मुलांसह ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून १०0 फूट खोल दरीत उडी घेतली आहे. या थरकाप उडवणाऱ्या घटनेत कुस्तीपटू अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू, तर अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांती नावाच्या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू.जुळ्या मुलींपैकी दुसरी मुलगी वीरा ही गंभीर जखमी असून, तिच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू. अश्विनी मनोहर पौळ असे या महिला कुस्तीपटूचे नाव असून, राष्ट्रीय स्तरावर कुस्तीत नाव कमावलेल्या अश्विनी पौळ यांनी आपल्या कारकिर्दीत ५ सुवर्ण आणि ६ रौप्य पदके जिंकून महाराष्ट्राचा गौरव वाढवला होता. मात्र मुलांना घेऊन आत्महत्याच टोकाचे पाऊल उचललेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि क्रीडा जगतातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.पती आणि सासरच्या मंडळींच्या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळूनच मुलीने आत्महत्या केल्याचा अश्विनी यांच्या वडिलांचा गंभीर आरोप; पोलीस करत आहेत चौकशी.
0
0
Report

शिर्डी में भास्कर जाधव ने परिवार के साथ साईंबाबा के दर्शन किए

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी : राज्यात राजकीय वातावरण तापले असताना भास्कर जाधव साईचरणी लीन पत्नी, कन्या आणि नातीसह घेतले शिर्डीतील साईबाबांचे दर्शन; महाप्रसादाचाही घेतला लाभ अँकर : राज्यात राजकीय वातावरण तापले असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी शिर्डी येथे श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. पत्नी, कन्या आणि नातीसह त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, जनसंपर्क अधिकारी लोखंडे आणि सहकाऱ्यांनी त्यांचे आपुलकीने स्वागत केले. मंदिरातील विविध कक्षांची माहिती घेतल्यानंतर भास्कर जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी श्री साईंच्या महाप्रसादाचाही लाभ घेतला. सुमारे दोन तास साईबाबांच्या दरबारात घालवल्यानंतर मन अतिशय प्रसन्न झाल्याची भावना भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.
0
0
Report
Advertisement

यवला के उपजिला अस्पताल का विस्तार: 30 से 100 बिस्तर, नई सुविधाएं लागू

Yeola, Maharashtra:अँकर:-मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघ असलेल्या येवला शहरातील उपजिल्हा रुग्णालयाबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या यावेळी यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनी तक्रारीची शहानिशा करण्यासाठी रुग्णालयाला भेट घेऊन वैद्यकीय अधिकारी सोनवणे यांच्याकडून माहिती घेतलीदरम्यान यापूर्वी येवल्यात ग्रामीण रुग्णालय कार्यरत होते मंत्री छगन भुजबळ यांनी मतदार संघाची धुरा सांभाळल्यानंतर सर्वात प्रथम आरोग्य सुविधा भर देत 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर 100 खटांच्या उपजिल्हा रुग्णालयात केलेत्यानंतर या ठिकाणी अस्थिरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, श्री रोग तज्ञ, जनरल फिजिशन ,बालरोग तज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली असून अपघात विभाग हा 24 तास कार्यरत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली या ठिकाणी सिटीस्कॅन सुविधा, सोनोग्राफी, एक्स-रे, अशा सुविधा देखील उपलब्ध असून कोविड काळात नाशिक जिल्ह्यातला पहिला ऑक्सिजन प्लांट या रुग्णालयात बसवण्यात आला आहे शेकडो नागरिक येथील सुविधेचा फायदा घेत असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी दिली
0
0
Report

Onion Express led to price drop, farmers struggle with concerns

Yeola, Maharashtra:कांद्याच्या दरात दररोज होत असलेल्या चढ-उतारामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.. त्यातच गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या ढगाळ हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून, चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने चाळीत साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडून खराब होत आहे.. कांदा साठवणुकीचा कालावधी वाढल्याने उत्पादन खर्चही वाढत असून, शेतकऱ्यांवर आर्थिक अडचणीत वाढत असतांना अशातच कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमधील कांदा दिल्ली आणि चेन्नईसारख्या बाजारपेठांमध्ये ‘कांदा एक्सप्रेस’च्या माध्यमातून पाठवला यानंतर बाजारभावात सुमारे ५०० ते ६०० रुपयांची घसरण झाल्याचे शेतकऱ्यांने कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य आणि समाधानकारक बाजारभाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडून केली जात आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top