Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412210

गुढीपाडव्ये पर रांजणगाव गणपती के दर्शन के लिए भक्तों की भीड़, महागणपती मंदिर सजावट

HCHEMANT CHAPUDE
Mar 19, 2026 09:47:44
Shirur, Maharashtra
शिरूर/पुणे Anc - राज्यात गुढीपाडव्याचा उत्साह संचारला असताना शिरूर तालुक्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र रांजणगाव गणपती येथे महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलीली पाहायला मिळत आहे. आगामी नववर्ष हे सुख,समृध्दी भरभराटीचं जावं यासाठी भाविकांनी आज हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केलीय,गुढी पाडव्याच्या निमित्ताने मंदिर गाभाऱ्याला आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजविण्यात आलंय याचाच मंदिर गाभाऱ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... "झी मिडीया रांजणगाव पुणे...",
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MNMAYUR NIKAM
Mar 19, 2026 11:05:53
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 19, 2026 11:05:30
Shirdi, Maharashtra:अशोक उर्फ कॅप्टन खरात अटक झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात याच्या सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.. यावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होतेय.. चाकणकरांनी मात्र कॅप्टन खरात याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि होणाऱ्या आरोपांबाबत माहित नसल्याचं म्हंटल आहे.. एक वर्षापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका स्थानिक वृत्तपत्रात, थेट नाव न घेता "कॅप्टन भोंदूबाबा" या मथळ्याखाली वृत्त छापून आले होते.. त्यासमयी मात्र अशोक खरात याने वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रेय खेमनर यांना 5 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली होती.. यासह महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील खेमनर यांना फोन करून माफीनामा सादर करण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. त्यामुळे चाकणकर यांना खरंच अशोक खरातचे काळे कारणामे माहीत नव्हते का? असा प्रश्न उपस्थित होतोय.. एक वर्षापूर्वी नेमकं काय घडलं होतं? याबाबत दत्तात्रेय खेमनर यांच्याशी सविस्तर बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 19, 2026 10:49:54
965
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 19, 2026 10:22:29
949
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 19, 2026 10:06:16
Ambernath, Maharashtra:बदलापुरात 15 लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचं लोकार्पण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते लोकार्पण शिरगाव आपटेवाडी परिसरातील पाण्याची समस्या निकाली आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बदलापूरमध्ये तब्बल 15 लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचं लोकार्पण आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या जलकुंभामुळे शिरगाव आपटेवाडी परिसरातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. नगरोत्थान महाभियान योजनेतून हा जलकुंभ उभारण्यात आले आहे. तब्बल २२, मीटर उंच आणि 15 लाख लिटर पाण्याची क्षमता असलेला हा जलकुंभ उभारण्यात आला आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागलेल्या असतानाच या जलकुंभачं लोकार्पण झाल्यामुळे आता शिरगाव आपटेवाडी परिसरातील रहिवाशांना मुबलक पाणी मिळणार असून या भागातील पाण्याची समस्यााही कायमस्वरूपी मार्गी लागली आहे.
971
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 19, 2026 09:48:47
Akola, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी रूपाली ठोंबरे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. रूपाली ठोंबरे पाटील यांनी जो काही संशय व्यक्त केला आहे, तो संशय गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचं मिटकरी म्हणाले. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा लागू असतानाही अशा प्रकारे अघोरी पूजा झाल्याची माहिती मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं. बारामतीतील सहयोग सोसायटीसमोर, दादांच्या बंगल्यासमोर तसेच देवगिरी बंगल्यासमोर अशा प्रकारचे प्रकार झाल्याचं समजत असलं तरी या गोष्टींवर आमचा विश्वास नसल्याचंही ते म्हणाले. मात्र अघोरी विद्येचा प्रकार का केला गेला? काही लोकांना अजित पवार नकोसे झाले होते का? यामागचा मास्टरमाइंड कोण? कॅप्टन अशोक खरात यांचे काही मोठे भक्त आहेत का? तसेच त्यांचे व्ही. के. सिंग यांच्याशी संबंध आहेत का? या सर्व गोष्टींचा एसआयटी तपासातून खुलासा झाला पाहिजे, अशी मागणीही मिटकरी यांनी केली. तसेच अघोरी पूजा आणि अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेचा संबंध नाकारता येत नाही, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
1059
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 19, 2026 09:15:23
Shirur, Maharashtra:निसर्ग कोपलाय... आणि नशीब फाटलंय! ज्या मातीतून सोनं उगवण्याची स्वप्नं पाहिली, त्याच मातीने आज शेतकऱ्याचे अश्रू प्यायलेत. पश्चिम महाराष्ट्राचा वैभव असलेल्या पुणे जिल्ह्यात आभाळ फाटलं आणि इंदापूर, बारामतीसह शिरूरच्या काळजाला घरं पडलीत! कुठे सोसाट्याचा वारा, तर कुठे आभाळातून बरसणारे पांढरे गारांचे गोळे! अवघ्या काही मिनिटांच्या या निसर्ग कोपाने उभा शेतीमाल आडावा झालाय बळीराजा च्या डोळ्यात अश्रृ आलेत. आब्याच्या बागात कैय्रांच खच गळून पडलाय गव्हाचं सोनं काळं पडलंय, तर टोमॅटोचा शेतातच लाल चिखल झालाय. हा पाऊस नव्हता... हा बळीराजाच्या घामावर पडलेला नियतीचा घाव होता! नुकसान ग्रस्त शेतकरी: नाना फुलसुंदर नुकसान ग्रस्त शेतकरी: गणेश जामदार सांगा आता आम्ही जगायचं कसं? खतं, बी-बियाणं आणि औषधांसाठी कर्ज काढलं होतं. पीक काढणीला आलं की कर्ज फेडू ही आशा होती, पण या गारांनी सगळं स्वप्नच चिरडून टाकलं. वावरात आता फक्त चिखल आणि अश्रू उरलेत! टोमँटो उत्पादक शेतकरी जगाचा पोशिंदा आज स्वतःच्या अन्नासाठी हवालदिल झालाय. बाजारभाव पडलेत म्हणून आधीच कंबरडं मोडलं होतं, आता निसर्गाने उरलं सुरलंही हिरावून नेलंय. आता प्रश्न एकच आहे... सरकारला या रडणाऱ्या डोळ्यांची आणि पडलेल्या शेतीमालाची दखल घ्यायला वेळ मिळेल का? की पुन्हा एकदा पंचनाम्यांच्या खेळात बळीराजाचा जीव टांगणीला लागणार? धर्मराज रासकर (नुकसान ग्रस्त शेतकरी) बळीराजा संकटात सापडलाय मदतीची हाक देतोय. त्यामुळ जगाच्या पोशिद्यांची आर्त हाक ऐकून मायबाप सरकार बळीराजा च्या मदतीला धावणार का हे येत्या काळात पाहणं महत्वाचं असणार आहे. बारामती वरून जावेद मुलाणी सह शिरूर वरूण हेमंत चापुडे झी मिडीया पुणे...
1045
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 19, 2026 09:00:52
1021
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 19, 2026 08:40:51
Latur, Maharashtra:मराठवाड्यावर पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा... गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान... गुढीपाडव्याच्या आनंदावर विरजण... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू... हिंगोली, बीड, लातूरमध्ये पावसाचे थैमान... उभी पिकं जमिनीवर... मराठवाड्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे... हिंगोली, बीड, लातूरसह संभाजीनगरच्या काही भागात गारपीट आणि वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे.. खास करून हिंगोली आणि लातूर जिल्ह्याला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. नव्या सुरुवातीचा, स्वप्नांना पंख देणारा आणि समृद्धीची चाहूल देणारा गुढीपाडवा सण आज साजरा होत असतानाच... अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आयुष्यात दुःखाचं सावट निर्माण केलं आहे... वर्षभर कष्ट करून उभी केलेली पिकं एका रात्रीत जमिनीवर आडवी झाली... नेमकी काय आहे मराठवाड्यातील परिस्थिती पाहूया ZEE 24 TAAS चा स्पेशल रिपोर्ट...
1047
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 19, 2026 08:16:32
1060
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 19, 2026 08:02:09
1045
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 19, 2026 08:00:12
Akola, Maharashtra:अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे परिसरात निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली असून पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. काल रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास अकोला शहरातील डाबकी रोड परिसरातील एका चहा टपरीवर काही युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. “तू काय पाहत आहेस माझ्याकडे?” या कारणावरून सुरू झालेला शाब्दिक वाद काही वेळातच हाणामारीत रूपांतरित झाला.या वादादरम्यान तीन युवकांनी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली आणि धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्धैवी मृत्यू झाला.या घटनेनंतर डाबकी रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे खदान पोलिसांनी केवळ सहा तासांत तीन आरोपींना दर्यापूर येथून अटक केली. आरोपी मध्य प्रदेशकडे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.
1098
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 19, 2026 07:48:46
950
comment0
Report
Advertisement
Back to top