Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422303

नासिक के निफाड क्षेत्र में तेज आंधी-बारिश से फसलें प्रभावित, किसान चिंतित

SKSudarshan Khillare
Mar 19, 2026 12:17:21
Niphad, Maharashtra
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याच्या पूर्व भागात हवामानात अचानक मोठा बदल झाला असून मानोरी, देवगाव, वाकद आणि रूई या परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. गेल्या काही तासांपासून ढगाळ वातावरण असून सोसाट्याचा वारा वाहत आहे. अनेक ठिकाणी पिकांची नासाडी झाली असून शासनाने त्वरित पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करीत आहे. मानोरी, देवगाव, वाकद आणि रूई परिसर. वादळी वाऱ्यासह हे थरारक दृश्य ऋषी संभेराव यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. अचानक झालेल्या या बदलामुळे बळीराजाची चिंता वाढली असून, काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Mar 19, 2026 13:34:17
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील आबेक भागात अवकाळी पाऊस आणि गरपिटीने झोडपून काढले. गरपितीचा सर्वाधिक फटका साक्री तालुक्यातील कासारे, पेरेजपूर परिसरात बसला असून, काढणीला आलेले रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. धुळे तालुक्यातही अनेक भागात मेघ गरजनेसह पुसने हजेरी लावली. अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट सुरु झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार गारपीटीचा तडाका बसला असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. या गारपीटमुळे कांदा, गहू, हरभरा पिकाला फटका बसला आहे. जवळपास अर्धा तास चाललेल्या पावसामध्ये सुरुवातीचे दहा मिनिट गारपीट व त्यानंतर वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेल आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 19, 2026 13:23:49
Akola, Maharashtra:राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातले असून काही ठिकाणी गारपीटही होत आहे. हवामान खात्याने अकोला जिल्ह्यासाठी 18 ते 20 मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला होता आणि त्यानुसार आज अकोला जिल्हा मधील अकोट – दर्यापूर रोड परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या भागात काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. सध्या अकोला जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांची गहू काढणी सुरू होण्याच्या टप्प्यावर आली आहे. मात्र अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अकोट–दर्यापूर रोड परिसरात शेतात उभे असलेले गहू पीक पावसामुळे आडवे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर गव्हा बरोबरच टरबूज, निंबू, संत्रा पिकांना सुद्धा धोका निर्माण झाला आहे.यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील इतर भागातही हवामान ढगाळ असून पुढील काही तासांमध्ये पावसाची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले जात आहे.
871
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 19, 2026 13:07:57
899
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 19, 2026 13:03:35
Beed, Maharashtra:बीड: जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाला सुरुवात; अनेक ठिकाणी गारांचा वर्षाव, रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान..! ANC - गेल्या आठवडा भरापासून हवामानातील आद्रता वाढल्याने गर्मीने नागरिक परेशान झाले असतानाच आज दुपारीच बीड जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचाही वर्षाव झाला. त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. बऱ्याच ठिकाणी रब्बी पिकांसह फळबागांचेही नुकसान झाले आहे. पहिल्याच अवकाळी पावसात गारांचा वर्षाव झाल्याने बच्चे कंपनीचा आनंद गगनात मावेनासा झालाय, यावेळी बच्चे कंपनी मोठ्या आनंदात गारा गोळा करण्याचा मनमुराद आनंद लुटला. अचानक झालेल्या या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. कांदा, गहू, ज्वारी यासह आंबा पिकांचे नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बाईट: शेतकरी
972
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 19, 2026 12:00:27
Beed, Maharashtra:बीड: निवडणूकीच्या काळात मला मोठमोठे नेते संपवायला निघाले होते; आमदार धनंजय मुंडे यांचं धक्कादायक विधान ज्यावेळी नगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्यावेळी महाराष्ट्रभर निवडणुकीचे वातावरण होतं. मी मात्र वेगळ्याच वातावरणात होतो.. सर्वदूर जे एकट्या धनंजय मुंडे यांना बदनाम करता येईल त्याकरिता महाराष्ट्रातील मोठ मोठे नेते सर्व काही करत होते. शेवटी मला वाटलं आपल्या मध्ये काहीतरी नक्कीच आहे... हे बाबा आपल्याला पुरून उरेन.. असे त्यांनी वाटत असावे..! एवढं वातावरण सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया युट्युबचे चैनल या परिस्थितीत सुद्धा परळीच्या मायबाप जनतेने महायुतीच्या मागे भक्कम पाठिंबा दिला आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिला. असे वक्तव्य परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्या मनातील सल पुन्हा एकदा बाहेर पडली आहे.
1056
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 19, 2026 11:51:16
Bhandara, Maharashtra:वाघाने घेतला एकाचा बळी.... मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला केलं ठार..... भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील बांपेवाडा येथील वसंत मेश्राम 52 वर्ष हा व्यक्ती सकाळी शेतावर मोहफुल वेचण्यासाठी गेला असताना अचानक वाघाने हल्ला करत ठार केला आहे. गावातील व्यक्ती वाघाने मारल्यावर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी वनविभागाची टीम दाखल झाली. मृत व्यक्तीच्या कुटुंबाला 25 लाखांची मदत व परिवारातील व्यक्तीला नोकरी देण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या नंतर मृतकाचे स्वविछेदनकरीता पाठविण्यात आले. मात्र वाघाने एक बळी घेतला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे....
1065
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 19, 2026 11:40:08
Chandrapur, Maharashtra:2027 मधील मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मी पुन्हा चंद्रपुरात येईन, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले संकेत, चंद्रपूरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्रीांनी मी पुन्हा येईल असे म्हटले होते, त्याच पद्धतीने मी पुन्हा चंद्रपुरात येईन, विकासाचा झंझावात करेल असे भाष्य चंद्रपूर विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर त्यांनी बल्लारपूर येथून सलग चार वेळा निवडणूक जिंकली आहे. चंद्रपुरातून त्यांना तीन वेळा मतदारांनी संधी दिली आहे. चंद्रपूरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्रीांनी ज्या पद्धतीने मी पुन्हा येईन असे म्हटले होते, त्याच पद्धतीने मी पुन्हा चंद्रपुरात येईन, विकासाचा झंझावात करेन असे भाष्य केले. चंद्रपूर मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार असा पक्षांतर्गत वाद सुरू आहे. नवे भाष्य या अंतर्गत राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. सध्या किशोर जोरगेवार चंद्रपूर येथून भाजपचे स्थानिक आमदार आहेत.
1097
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 19, 2026 11:39:44
Yavatmal, Maharashtra:यवतमाल के किसान साहेबराव करपे ने निराशा और कर्जबारी से प्रेरित होकर परिवार सहित सामूहिक आत्महत्या कर ली थी। उनकी स्मृति में पुसद में अन्नत्याग आंदोलन किया गया। किसानों की आत्महत्याओं को रोकने के लिए बळीराज के लिए अन्नत्याग आंदोलन हर वर्ष किया जाता है। किसानों की फसलें—कॉटन, सोयाबीन, प्याज, हरभरा आदि—सरकारी हस्तक्षेप के कारण प्रभावित हो रही हैं। किसानों के आत्महत्याओं की संख्या बढ़ी है। इसलिए नागरिकों सहित विविध संघनों ने एक दिन उपवास किया। सरकार को किसानों के श्रम की कीमत चुकानी चाहिए, फसल के लिए हमीभाव देना चाहिए और उन्हें कर्जमुक्त करना चाहिए—यह मांग इस अवसर पर की गई।
1034
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 19, 2026 11:19:30
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग स्लग - सांगलीच्या खानापूर घाटमाथ्याला गारपीठीचा तडाखा,द्राक्षांना फटका. अँकर - सांगलीच्या खानापूर घाट माथ्यावर गारपीट झाली आहे.वादळी वारयासह भिवघाट,हिवरे सहपळशी व आसपासच्या परिसरला गारपिटीचा तडाखा बसला आहे. दुपारच्या सुमारास जोरदार अशी गारपीट झाली आहे.गारपीटीचा मोठा फटका हा द्राक्ष बागांना बसण्याल्याची भीती व्यक्त केली जात आहे.द्राक्षांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या पळशीला देखील मोठी गारपीट झाली आहे, या गारपिटीमुळे द्राक्षांना मोठा फटका बसला आहे.पळशी मध्ये निर्यातक्षम द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाते,त्यामुळे छाटणीसाठी आलेल्या द्राक्षांना गारपिटीचा द फटका बसल्याचं भीती व्यक्त केली जात आहे. एक दिवसापूर्वी सांगलीसह मिरज तालुक्याला गारपिटीने झोडपून काढलं होतं, आज खानापूर घाटमाथ्यावर गारपीट झाली आहे.त्यामुळे द्राक्ष शेतीला याचा फटका बसणार आहे.
1100
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Mar 19, 2026 11:05:53
1098
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 19, 2026 11:05:30
Shirdi, Maharashtra:अशोक उर्फ कॅप्टन खरात अटक झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात याच्या सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.. यावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होतेय.. चाकणकरांनी मात्र कॅप्टन खरात याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि होणाऱ्या आरोपांबाबत माहित नसल्याचं म्हंटल आहे.. एक वर्षापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका स्थानिक वृत्तपत्रात, थेट नाव न घेता "कॅप्टन भोंदूबाबा" या मथळ्याखाली वृत्त छापून आले होते.. त्यासमयी मात्र अशोक खरात याने वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रेय खेमनर यांना 5 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली होती.. यासह महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील खेमनर यांना फोन करून माफीनामा सादर करण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. त्यामुळे चाकणकर यांना खरंच अशोक खरातचे काळे कारणामे माहीत नव्हते का? असा प्रश्न उपस्थित होतोय.. एक वर्षापूर्वी नेमकं काय घडलं होतं? याबाबत दत्तात्रेय खेमनर यांच्याशी सविस्तर बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी
1097
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 19, 2026 10:49:54
1087
comment0
Report
Advertisement
Back to top