Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळच्या बसस्थानक उद्घाटनाला मिळाला 5 वर्षानंतर मुहूर्त.

Oct 14, 2024 06:50:44
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या बसस्थानकाचे उद्घाटन 5 वर्षानंतर होत आहे. 11 महिन्यात पूर्ण होणार्‍या या कामात कंत्राटदाराच्या संथगतीने व न्यायालयीन अडथळ्यांमुळे विलंब झाला. लोकप्रतिनिधींनीही यावर योग्य पाठपुरावा केला नाही. त्यामुळे प्रवाश्यांना तात्पुरत्या बसस्थानकातून बस सुटत असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. निवडणुकीच्या तोंडावर, मुख्यमंत्र्यांकडून आभासी पद्धतीने उद्घाटन होणार आहे. प्रवाश्यांना नवीन बसस्थानकातून सर्व सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.

2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Nov 19, 2025 13:49:40
0
comment0
Report
SKShubham Koli
Nov 19, 2025 13:37:35
Thane, Maharashtra:ऑन मुंब्रा पाकिस्तान जिंदाबाद नारे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे जितेंद्र आव्हाड उपस्थित असताना त्यांचा पदाधिकारी जो 24 तास त्यांच्या सोबत असतो तो पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतो जितेंद्र आव्हाड त्याला विरोध करत नाहीत देशद्रोही प्रकार जितेंद्र आव्हाड यांच्या समक्ष झालेला आहे देशापेक्षा कार्यकर्ता महत्त्वाचा देशाविरोधात घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला त्यांच्या मुंब्रा राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष आहे शमीम खान जे मनात आहे ते ओठावर आलेला आहे जितेंद्र आव्हाड जर अशा गोष्टींना खतपाणी घालत असतील तर त्यांना आमदार म्हणून राहण्याचा अधिकार नाही विधानसभेत देश प्रेमापोटी राज्य प्रेमापोटी ही शपथ घेतली त्या शपथेच उल्लंघन केलेला आहे जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई होणे गरजेचे आहे ज्या ज्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड त्या त्या ठिकाणी त्यांचा निषेध करणे गरजेचे आहे मला लाज वाटते उबाठा चे नेते हे जितेंद्र आव्हाड यांच्या मांडीला मांडी लावून बसतात मोठ्या आघाडीच्या गप्पा मारतात जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करू शकत नाहीत जो व्हिडिओ समाज माध्यमांवर फिरतोय या व्हिडिओ संदर्भात पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे देशाच्या विरोधात पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा मुंब्र्यामधे दिल्या जातील देशद्रोहाचा गुन्हा लोकांवर दाखल केला पाहिजे शिवसेना शिवसेना स्टाईल मध्ये त्याचे उत्तर देणार आहे गुन्हा करणाऱ्या पेक्षा गुन्हा करणाऱ्याला पाठीशी घालतो त्याच्यावर सुद्धा कार्यवाही केली पाहिजे ही मागणी आम्ही करतो ऑर ठाणे स्थानक सुरक्षा राम भरोसे ठाणे रेल्वे स्थानकात गर्दी असते लाखो प्रवासी त्या ठिकाणी प्रवास करत असतात जर काही चुका असतील रेल्वे स्थानक अधिकारी आहेत महिला अधिकारी आहेत त्यांना त्या संदर्भात योग्य ती कारवाई होईल
41
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 19, 2025 12:47:07
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मोहोळचे माजी आ. राजन पाटलांच्या सुपुत्राचा थेट अजित पवारांना चॅलेंज, पाटील परिवारानी नंतर व्यक्त केली दिलगिरी - अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्यानंतर गावात मोठा जल्लोष - जल्लोषा दरम्यान माजी. आ. राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांचे थेट अजित पवारांना चॅलेंज - जल्लोषावेळी केलेले वक्तव्य हा नावधानाने झाले असून पाटील परिवाराच्या वतीने दिलगिरी व्यक्त - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते आमदार रोहित পवार यांनी बाळराजे पाटलांच्या वक्तव्यावरून माजी. आ. राजन पाटलांचे टोचले कान संपूर्ण राज्यात अनगर नगरपंचायतीची निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली. अनगर नगरपंचायतची निवडणूक गेल्या 70 वर्षांपासून बिनविरोध करण्याची परंपरा आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत मोहोळ चे माजी आमदार तथा भाजपाचे नेते राजन पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते उमेश पाटील यांच्या राजकीय संघर्षामुळे राज्यभरात चर्चेत आली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने दिला सत्तर वर्षांपासून बिनविरोध होणाऱ्या अनगर नगरपंचायतीच्या निवडणूकित उज्वला थिटे यांच्या माध्यमातून अधिकृत उमेदवार देण्यात आला. सुरुवातीच्या काळात उज्वला थेटे यांना अनगर नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरू दिला जात नसल्याच्या कारणावरून प्रचंड आरोप - प्रत्यारोप पाहायला मिळाले. अर्ज छाननीच्या दिवशी उज्वला थेटे यांचा उमेदवारी अर्ज सुचक नसल्याच्या कारणाने रद्द करण्यात आला आणि हा राजकीय संघर्ष आणखी वाढला. अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध होत असल्याचे समजतात राजन पाटील समर्थकांकडून मोठा जल्लोष करण्यात आला. या जल्लोषावेळी माजी आमदार राजन पाटील यांचे मोठे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी "अजित पवार अनगरकरांचा नाद करायचा नाही" असे वक्तव्य करत थेट अजित पवारांनाच चॅलेंज केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी राजन पाटील आणि त्यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. बाईट - उमेश पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष ) राजन पाटील समर्थकांनी केलेला हा जल्लोष नव्हता तर त्यांची विकृती होती अशी जहरी टीका उज्वला थिटे यांनी केलीय. पवारांच्या घराण्याला हाताशी पकडून यांनी 40 वर्षे राजकारण केले आणि सत्ता गाजवल्याचे सांगत टीका केली. तसेच बाळराजे पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध देखील नोंदवला. बाईट - उज्वला थिटे ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या अर्ज बाद झालेल्या उमेदवार ) हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी आमच्या गावात केव्हाही निवडणूक झाली नाही. त्यामुळे तरुण पोरं थोडीशी उत्साही होती. त्यामुळे माझ्या मुलाच्या वक्तव्याचे मी समर्थन करणार नाही. माझ्या मुलाकडून अनावधानाने चूक झालीय. माझ्या दृष्टीने राजकारणात तो लहान असून आपल्या मुलांप्रमाणे त्यांना समजून घ्यावे. आतापर्यंत जे मोठे साम्राज्य निर्माण केलंय त्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. शरद पवार यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि विनंती करतो की आता हा विषय इथेच संपवा.... बाईट - राजन पाटील ( मोहोळ माजी आमदार तथा भाजपा नेते ) चॅलेंज वगैरे काही नाही उत्साहाच्या भरामध्ये माझ्या तोंडून गेलं असेल... गेल्या पाच वर्षांपासून त्यांचे कार्यकर्ते आमच्या गावाला आमच्या कुटुंबाला खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत... पाच वर्षे आम्ही हे सगळं अजित दादांकडे बघत सहन करत गेलो अशा भावना बाळराजे पाटील यांनी व्यक्त केले आहेत... बाईट - बाळराजे पाटील ( माजी आमदार राजन पाटील यांचे मोठे सुपुत्र ) End p2c अनगर नगरपंचायतीच्या निमित्ताने मोहोळ तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले असून राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यातला राजकीय संघर्ष आणखी विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय... ( अभिषेक आदेप्पा, सोलापूर प्रतिनिधी )
168
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 19, 2025 12:34:07
Virar, Maharashtra:झुरळं मारण्याचा (हिट) स्प्रे मुळे ५७ वर्षीय इसमाचा मृत्यू विरार पश्चिम जे पी नगर येथील १५ नंबर इमारतीमधील घटना पाणी भरण्यावरून शेजारील महिलेसोबत झाला होता वाद भांडणात महिलेने स्प्रे तोंडावर मारल्यामुळे उमेश पवार यांचा मृत्यू झाला आहे... अर्णाळा पोलिसांनी आरोपी महिला कुंदा उतेकर हिला अटक केली आहे... सदोष मनुष्य वधाचा गुन्हा तिच्यावर दाखल केला आहे... अँकर - विरारमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. झुरळं मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्प्रेमुळे एका ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना विरार पश्चिम येथील जे.पी. नगरमधील १५ नंबर इमारतीत घडली आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, उमेश पवार असे मृत इसमाचे नाव असून त्यांचा शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत पाणी भरण्याच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद चांगलाच चिघळला आणि संतापाच्या भरात संबंधित महिलेनं घरात असलेला झुरळं मारण्याचा स्प्रे थेट उमेश पवार यांच्या तोंडावर मारला. स्प्रेचा तीव्र परिणाम झाल्याने पवार यांची प्रकृती काही क्षणांतच बिघडली. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच अर्णाळा पोलिसांनी आरोपी महिला कुंदा उतेकर हिला ताब्यात घेतलं आहे. तिच्यावर सदोष खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे... बाईट- निर्मला उमेश पवार, पत्नी.
138
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 19, 2025 12:33:27
Shirdi, Maharashtra:संगमनेरमध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे झपाट्यानं बदलत असताना थोरात खताळ यांच्याकडून आरोप–प्रत्यारोपांची मालिका जोरात सुरू आहे. महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी थोरातांनी संगमनेराकडे पाठ फिरवली आणि संगमनेरातून काँग्रेसचा पंजा चिन्ह मतदारसंघातून गायब झालं असा दावा करत काँग्रेस नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलं. तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना बोलतांना प्रतिक्रिया देत विकासासाठी परिवर्तन हवं असून महायुतीला पराभूत करण्यासाठी सर्वजण एकत्र आलो आहोत असं म्हणलंय... संगमनेर शहराचा मागील कालावधीत विकास झालेला नाही तो विकास करण्यासाठी संगमनेर शहरात परिवर्तन करण्याची गरज... विधानसभा निवडणुकीनंतर संगमनेरातून राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना थोरात यांनी बाय-बाय केलाय.. संगमनेरातून पंजा गायब का झाला..? याबाबत बाळासाहेब थोरात यांनी बोलण्याची गरज... पराभवानंतर राष्ट्रीय नेते म्हणून पुणे नाशिक बाकी काही जिल्ह्यांमध्ये बाळासाहेब थोरातंकडून बैठका घेणे सुरू... बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन बैठका घेताय आणि पंजा चिन्हावर निवडणूक लढवा असं आवाहन थोरात करत आहेत मात्र त्यांच्याच मतदार संघात पंजा गायब झालाय... याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठांनी थोरांताबाबत विचार करण्याची गरज... संगमनेरातील जनतेने विधानसभा निवडणुकीत पंजाला नाकारलं नव्हतं तर थोरात आणि तांबेंना नाकारलं होतं... संगमनेरचे महायुतीचे आ. अमोल खताळ यांचा थोरात यांच्यावर गंभीर आरोप... मी विधानसभेला सांगितलं होतं मामा भाचे एकच आहे ते वेगळे नाही... राजकीय परिस्थिती बदलल्यामुळे अपक्ष उमेदवारी करत पुढे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला... नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा विजय होणार , आ. अमोल खताळांची झी24तास शी बोलताना प्रतिक्रिया.... काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात बाईट मुद्दे - काँग्रेस हा विचार आहे आणि तो आमच्या मनात आहे... आम्ही सर्वांना बरोबर घेत सामावून घेतलय... या नगरपरिषदेच्या निवडणुकीत समोरचा जो महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला पराजित करण्यासाठी सर्वजण एकत्र आलोय... बाईट - काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
173
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 19, 2025 12:21:14
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ नगर परिषदेसाठी महाविकास आघाडी तुटल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेस आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्यावर थेट निशाणा साधत निवडणुकीत आव्हान दिले आहे. तालुक्यात शिवसेना संघटना तरी आहे काय असा प्रश्न आमदार मांगुळकर यांनी विचारून शिवसैनिकांचा अपमान केला, शिवसैनिक झटल्यामुळेच ते विधानसभेत आमदार झाले, आता त्यांच्या ताठर भूमिकेमुळे आघाडी तुटली असा आरोप शिवसेना संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला. घराणेशाहीचा तिटकारा करणाऱ्या भाजपने मंत्र्यांच्या मुलीला तर काँग्रेसने माजी मंत्र्यांच्या सुनेला उमेदवारी दिली. शिवसेना युबीटीने मात्र एक उच्चशिक्षित युवतीला उमेदवारी दिल्याने मतदार त्यांना स्वीकारतील असा विश्वासही गायकवाड यांनी व्यक्त केला. बाईट राजेंद्र गायकवाड संपर्कप्रमुख
72
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 19, 2025 12:20:59
Kalyan, Maharashtra:सरकार महिला सुरक्षा के बारे में असफल है, महिलाओं की सुरक्षा घर-घर में महिलाओं द्वारा ही की जाएगी। महिला सुरक्षा केंद्र का उद्घाटन करेगी.. सिंध्या सव्वालाखे महिला कांग्रेस प्रदेशाध्यक्ष के अपने टिकास्त्र। बैलेट पेपर पर चुनाव अगर होते तो प्रत्येक नगर निगम में कांग्रेस का महापौर दिखेगा। माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी की जयंती के अवसर पर कल्याण में महिला कांग्रेस की ओर से मेळावे का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में महिला कांग्रेस प्रदेशाध्यक्ष सिंध्या सव्वालाखे ने सरकार पर महिलाओं की सुरक्षा के बारे में टिकास्त्र छोड़ा। महिलाओं की सुरक्षा के बारे में सरकार पूरी तरह से असफल साबित हो चुकी है। अब महिलाओं की सुरक्षा महिलाओं को ही संभालनी होगी, ऐसी टिप्पणी सव्वालाखे ने की है। साथ ही महिला सुरक्षा केंद्र के उद्घाटन की घोषणा भी की है。 राज्य भर में महिला कांग्रेस मजबूत बनाने का काम चल रहा है और हमारे पास सवा लाख महिला सदस्य हैं—यह दावा उन्होंने किया। बैलेट पेपर पर चुनाव कराए जाएँ तो प्रत्येक महापालिका में कांग्रेस का महापौर दिखेगा। कल्याण–डोंबिवली कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ताओं में माजी विधायक संजय दत्त के विरोध में नाराज़गी व्यक्त हो रही है। घर के लड़ाई बाहर न जाए इसका संयमित प्रतिक्रिया दी गई। हमारे घर के भांडण हम देखेंगे ऐसा बयान कर उन्होंने पार्टी के मतभेदों पर आप तोड़गा काढ़ने की बात कही। कार्यक्रम में बड़ी संख्या में महिला कार्यकर्ता उपस्थित थीं। महिला सशक्तिकरण, सुरक्षा, संगठन बांधणी और आगामी स्थानीय चुनावों पर इस मेळावे में चर्चा हुई। संध्या सव्वालाखे— महिला कांग्रेस प्रदेशाध्यक्षा
188
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 19, 2025 12:03:53
Shirdi, Maharashtra:माजी आमदार बाळासाहेब थोरात बाईट पॉईंटर्स - आगामी निवडणुका - निवडणूक आयोगावर लोकांचा विश्वास राहिला नाही , निवडणूक आयोग स्वतः निर्णय घेत नाही दुसरे कोणीतरी निर्णय घेतय... आमची विचारधारा भाजपा शिवसेना महायुती विरोधात आहे आणि या निवडणुकीत त्यांना पराजित करून त्यांचे नामोहरण कसे होईल आणि विजय कसा मिळवता येईल या दृष्टीने आम्ही सर्व समविचारी पक्षाचे नेते एकत्र आलोय.. नगरपरिषद निवडणुकीत आम्हाला यश मिळवायचे आहे त्यामुळे आम्हाला काही निर्णय घ्यावे लागले मात्र सर्वांना बरोबर घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जातोय... भारतीय जनता पार्टी हा आमच्या विरोधातील पक्ष आहे त्याला नामोहरण करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी कराव्या लागतात त्यात काही बिघडत नाही... ऑन महायुती नाराजी - महायुती सरकार मध्ये प्रचंड अशी खदखद सुरू आहे त्यांचे वाद विकोपाला गेले आहे ही तर त्यांची सुरुवात आहे पुढे खूप मोठा राजकीय स्फोट होईल... ऑन घराणेशाही आरोप घराणेशाहीचा आरोप करण्याचा भाजपला कुठलाही अधिकार नाही... संगमनेर नगरपालिका निवडणुकीत आम्हाला कुठल्याही परिस्थितीत यश मिळवायचय... यश मिळवण्यासाठी आम्ही सर्वांना सामावून घेतल़... काही वेगळे निर्णय घ्यावे लागतात आणि ते आम्ही घेतले.... भाजप नेत्यांच्या कुटुंबातील अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिनीधीत्व करत आहेत फक्त आरोप करायचा म्हणून करायचा... भाजपला घराणेशाहीचा आरोप करण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही... आता घराणेशाहीला कुठलाही अर्थ राहिला नाही आणि तो कोणीही एकमेकावर करू नये... संगमनेर मध्ये काँग्रेस चिन्ह गायब - काँग्रेस हा विचार आहे आणि तो आमच्या मनात आहे... आम्ही सर्वांना बरोबर घेत सामावून घेतलय... या नगरपरिषदेाच्या निवडणुकीत समोरचा जो महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला पराजित करण्यासाठी सर्वजण एकत्र आलोय... bite - बाळासाहेब थोरात काँग्रेस माजी मंत्री
149
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 19, 2025 11:51:09
36
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 19, 2025 11:50:38
Vasai-Virar, Maharashtra:मामाकडून लग्नाचा तगादा , लग्नाच्या वादात भाचीला ट्रेनमधून ढकलून केले ठार भाईंदर- वसई रेल्वे स्थानक घडला प्रकार आरोपी मामाला प्रवाशनीच पोलिसांना दिले पकडून आरोपी मामाला पोलिस कोठडी अँकर - वसईच्या सातवली परिसरातील एका मुलीच्या अपहरण प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या हातात धक्कादायक माहिती लागली आहे. आपल्या मामासोबत प्रेमसंबंधात असलेल्या मुलीला लग्नाचा तगादा लावल्यामुळे तिच्याच मामाने रेल्वेतून ढकलून देऊन ठार केल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अर्जुन सोनी याला अटक केली असून वसई न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल सोनार हिचे तिच्या सख्ख्या मामासोबत गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. कोमल त्याच्यासोबत लग्न करण्याचा तगादा लावत होती. या पाश्र्वभूमीवर १६ नोव्हंबर रोजी कोमलची मामी अंजली सोनार हिने वालीव पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवली होती. पोलिसांच्या तपासात १७ तारखेच्या दुपारी ही घटना घडल्याचे उघडकीस आले. कोमल आणि अर्जुन हे चर्चगेट–विरार फास्ट लोकलने प्रवास करत असताना भाईंदर–वसई दरम्यान, वादाच्या पार्श्वभूमीवर अर्जुनने कोमलला ट्रेनमधून ढकलून दिले. ती खाली पडून ठार झाली. ट्रेनमधील प्रवाशांनी तत्काळ आरोपीला पकडून वसई रोड रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. अपहरणाचा गुन्हा वालीव पोलीस ठाण्यात असल्यामुळे आरोपीला पुढील तपासासाठी वालीव पोलिसांकडे सोपवण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात मामा–भाचीचे प्रेमसंबंध आणि त्यातून उद्भवलेले वादामुळे खून झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. — दिलीप घुगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे
83
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 19, 2025 11:36:28
157
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 19, 2025 11:26:40
83
comment0
Report
MKManoj Kulkarni
Nov 19, 2025 11:25:06
Navi Mumbai, Maharashtra:आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महानगरपालिकेमध्ये लढवण्यात येणाऱ्या प्राथमिक जागांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील २२७ ही जागांचा आढावा मनसेच्या senior नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ज्यामध्ये ६५ ते ७० जागांवर मनसेचे प्राबल्य आहे असं निरीक्षण मनसेनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून नोंदविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या सगळ्या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिल्या फळीतील नेते आणि शहराध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युतीच्या निर्णयापूर्वी मनसेकडून मुंबईतील प्रत्येक वॉर्डच्या संख्याबळाचा आढावा घेण्यात आला असल्याची माहिती. २२७ वार्ड चा आढावा आणि याबाबतची माहिती मुंबईतील पदाधिकाऱ्यांकडून नेत्यांनी मागवली होती. सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार शिवसा िनग आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेला ७५ जागा देण्यास ठाकरे गटाची तयारी असल्याची माहिती पुढे येत आहे. यूनिटीची अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही मात्र जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनोज कुळकर्णी
115
comment0
Report
Advertisement
Back to top