Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळच्या बसस्थानक उद्घाटनाला मिळाला 5 वर्षानंतर मुहूर्त.

Oct 14, 2024 06:50:44
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या बसस्थानकाचे उद्घाटन 5 वर्षानंतर होत आहे. 11 महिन्यात पूर्ण होणार्‍या या कामात कंत्राटदाराच्या संथगतीने व न्यायालयीन अडथळ्यांमुळे विलंब झाला. लोकप्रतिनिधींनीही यावर योग्य पाठपुरावा केला नाही. त्यामुळे प्रवाश्यांना तात्पुरत्या बसस्थानकातून बस सुटत असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. निवडणुकीच्या तोंडावर, मुख्यमंत्र्यांकडून आभासी पद्धतीने उद्घाटन होणार आहे. प्रवाश्यांना नवीन बसस्थानकातून सर्व सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Dec 13, 2025 10:48:14
Washim, Maharashtra:निवडणुकीच्या पुढे ढकललेला प्रचार पुन्हा एकदा सुरू झाला असून उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास वेग दिला आहे. काही दिवस शांत असलेले शहर पुन्हा एकदा प्रचार भोंग्यांच्या आवाजाने गजबजून गेले आहे. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल केंदळे यांच्या उमेदवारीविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी 25 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने सदर याचिका फेटाळून लावली. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी आवश्यक असलेला तीन दिवसांचा कालावधी न मिळाल्याने निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निवडणूक विभागाकडून 20 डिसेंबर रोजी घेण्याचे आदेश दिले होते. या निर्णयानुसार 29 नोव्हेंबरपासून निवडणूक प्रचारावर स्थगिती देण्यात आली होती. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा प्रचाराला जोर आला असून गुलाबी थंडीतही शहरातील राजकीय वातावरण तापत आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 13, 2025 10:47:57
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली पोलीसांनी मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे 04 विविध गुन्हे केले उघड, आरोपींना केली अटक, चारचाकी, दूचाकी वाहन व मोबाईल टॉवरच्या बॅट-यांसह एकूण 27 लाख 71 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त गडचिरोली पोलीस दलाच्या संरक्षणाखाली जिल्ह्यात दुर्गम अतिदुर्गम भागांमध्ये मोबाईल टॉवरची उभारणी झाली आहे. परंतु गेल्या काही काळापासून मोबाईल टॉवर बॅटरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने तपास वेगवान केला. जिल्ह्यात संवेदनशील भागातील रामपूर, तुमडीकसा, कनगडी, कुलभट्टी व तोयागोंदी गावात मोबाईल टॉवर बॅट-यांच्या चोरीच्या घटना नोंद झाल्या होत्या. पोलीस पथकाने तपासादरम्यान बालोद (छत्तीसगड) मार्गावरील विविध सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि विशिष्ट वाहन मालकावर पाळत ठेवली. हा संशयित येरकड हद्दीत संशयितरित्या फिरत असल्याचे स्पष्ट झाले. मोवाड येथुन 04 आंतरराज्यीय आरोपी नामे 1) साबीर रमजान मलिक, वय 39 वर्षे, रा. मोहल्ला कल्याणसिंग मवाना (उ.प्र.), 2) अशोक हरीसींग मोर्या, वय 49 वर्षे, रा. न्यु सरेंद्रनगर थट्टीपूर, ग्वालीयर (म.प्र.), 3) जितेंद्र कुमार लक्समीचंद राठोड, वय 26 वर्षे, रा. नेताजी नगर, जाजगीर ता. जि. जाजगरी (छ.ग.) व 4) नामदेव रामा कांबळे, वय 43 वर्षे, रा. नेताजी नगर, एम.पी. नगर, भोपाल (म.प्र.) यांना ताब्यात घेण्यात आले.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 13, 2025 10:19:43
Nagpur, Maharashtra:नागपूर - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री - (On पट्टे वाटप) गेल्या 30-40 वर्षात झोडपट्टीत राहणाऱ्या लोकांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले पाहिजे... यासाठी संघर्ष केलाय, त्याही वेळेस पट्टेवाटप सुरू केले होते आता पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर सगळे अडथळे आम्ही दूर केले आज एक हजार लोकांना मालकी हक्काचे पट्टे दिले, अडीच लाख लोकांना त्याचा फायदा होईल, मालकी हक्काचे पट्टे देणार आहोत त्याबरोबर सिंधी निर्वासितांना पट्टे देत आहोत नागपूर मॉडेल आम्ही तयार केल आहे, त्याच्या जीआर आम्ही आता पूर्ण महाराष्ट्राला लागू केला आहे, महाराष्ट्रात जिथे-जिथे झोपडपट्टी लोक आहेत तिथे एम एम आर डी ए मध्ये एसआरए करतो म्हणून त्यांनाही लागू नाही कोणाचा कच्च घर असेल तर कोणालाही पक्क घर बांधण्यास अर्थसहाय्य देणार 50 हजार लाभार्थी होतील, आतापर्यंत 25 हजार झाले आहेत, यात वेगवेगळे प्रोसेस असते ती प्रोसेस सुरू असते हापट्टे बँकेबल आहेत, कुणाला कर्ज काढायचं असेल तर त्यांना कर्ज काढता येईल (On भाजप मुंबई कार्यकर्ते नाराजी ) मला असं वाटतं की फार कोणात नाराजी असेल असं वाटत नाही, कार्यकर्त्यांना वाटतं मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा लावणे, विकासविमुख आणि पारदर्शक शासन आणणे आणि त्यासाठीच आम्ही महायुतीचा निर्णय घेतला आहे (On पालघर आदिवासी मुली -) याच्या चौकशीचे आदेश मी दिलेले आहेत, आणि लवकरच चौकशी केली जाईल (On भाजप कल्याण डोंबिवली जागा - ) फक्त 55 जागांची मागणी भाजप का करेल?, भाजपा महत्त्वाचा पक्ष आहे त्यांनी अजून कुठली मागणी केली नाही, कल्याण डोंबिवली मध्ये मागच्या वेळेस 42 आमच्या जागा आल्या होत्या, तिथे दोनच प्रमुख पक्ष आहेत एक शिवसेना आणि दुसरा भाजप तिसरा पक्षाचा तिथे काही वजुद नाही, आम्ही आपसात बसून जागा वाटप करू - फॉर्मुला कुठेच राहणार नाही, जिंकणे हाच फॉर्मुला आहे (On अजित पवार बार्टी/सारथी) दादा अनेक वेळा एखादी गोष्ट बोलतात तेव्हा लोक वेगळा अर्थ काढतात, पण मुळात ही योजना सुरू केली आहे ते जे काही आपले हुशार मुलं आहेत पण पीएचडी एफोर्ड करू शकत नाही, त्याकरिता ते काढलाय, त्यामुळे पाच लोक जर योजनेचा लाभ घेतील तर इतर घरातील जे होतकरू गरीब लोक आहेत त्यांना लाभ मिळणार नाही, याची चिंता दादांनी व्यक्त केली योग्य प्रकारे याबाबत निर्णय घ्यावा लागेल (On मनरेगा प्रियांका गांधी -हिंदी ) मला असं वाटतं त्या मनरेग कधी बोलतात,काम केलं नाही तरी त्या बोलतात, त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही, खूप सकारात्मक बदलाव मोदीजींच्या सरकारने केला आहे त्यामुळे ग्राम विकास और ग्राम रोजगार निर्मितीत खूप मोठा फायदा होईल ( On संजय राऊत भाजप - शिंदे ) भाजपच्या नेतृत्वाला आम्ही जास्त ओळखतो की संजय राऊत (On राज ठाकरे पत्र - ) मी अजून पत्र वाचलेलं नाही, पण बेपत्ता होणाऱ्या मुली संदर्भात मी आकडेवारी सहित त्याची कारणे दिली आहेत, परत किती येतात हेही सांगितलेल आहे, यात महत्त्वाचा मुद्दा आहे की एखादी मुलगी घरून भांडून गेली आणि परत तीन दिवसात आली तरीही आपण बेपत्ता कंप्लेंट दाखल करतो त्यामुळे त्याची संख्या मोठी दिसते वर्षभरात 90% च्या वर मुली परत आणतो... (On नवाब मलिक-नवनाथ बन -) यावर आमची भूमिका यापूर्वी स्पष्ट केली आहे. रोज स्पष्ट करण्याची गरज नाही (On विरोधक अधिवेशनात - ) आमची कुठलीही रणनीती नाही, उलट या अधिवेशनात भरपूर चर्चा चालली आहे, याचा मला आनंद आहे ..- जे बिल मंजूर झाले त्याचाही आनंद आहे, चर्चा चालली त्याचा आनंद मानला पाहिजे, पायऱ्यावर आंदोलन करायचा आणि चर्चेत भाग घ्यायचं नाही याला लोकशाहीत स्थान नाही,त्यामुळे जास्तीत जास्त चर्चा करते याचा मला आनंद आहे (On संजय राऊत विदर्भ - ) हे काय बोलतात, ते काय बोलतात, त्याचा उत्तर देण्याकरिता मुख्यमंत्री आहेत का, एवढेच काम राहिले का मुख्यमंत्र्यांना
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 13, 2025 10:16:23
Pandharpur, Maharashtra:राज्यातील 164 पैकी 51 साखर कारखान्यांनी पहिली उचल 3हजार 500 पेक्षा अधिक दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हे मोठे यश, उर्वरित साखर कारखान्यांनी सर्वाधिक दर दयावा यासाठी आंदोलन सुरू राहील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. पंढरपूर मध्ये मागील सहा दिवसापासून ऊस दर संघर्ष समितीचे समाधान फाटे त्यांचे सहकारी आमरण उपोषणाला बसले होते. त्यांच्या उपोषणाची सांगता माजी खासदार शेट्टी यांनी केली. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार उत्पादित साखर लपवून ठेवतात. ती रेकॉर्ड वर दाखवत नाहीत. पुन्हा ती काळया बाजारात विक्री करतात. असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.सोलापूर जिल्ह्यात एफआरपी कमी होण्याचे ही एक कारण आहे. शेतकऱ्यांच्या बाजार समिती लुटण्याचे सरकारचे काम आहे. तिथे आता मंत्री राज्यमंत्री येणार असतील तर शेतकऱ्यांचे काय, बाजार समिती चराऊ कुरण आहे. त्यामुळे ते इकडे वळत आहेत. असा आरोप शेट्टी यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी ब्लॅकमेलरची भूमिका बजावली आहे. 15 रुपये न देणाऱ्या साखर कारखान्याची काटा मारी बाहेर काढणार म्हणाले. त्यांना माहित आहे तर कारवाई का होत नाही. 15 रुपये दिले की विषय थांबणार ка असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 13, 2025 10:16:00
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 13, 2025 09:47:51
Yavatmal, Maharashtra:झी 24 तास ने उघडकीस आणलेल्या ऑपरेशन सैतान चे वृत्त अतिशय गंभीर आहे, आदिवासी मुलींचीच नव्हे तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल समाजातील मुलींची विक्री करणारे दलाल मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे पोलिसांनी असे रॅकेट ठेचून काढायला पाहिजे, अनेक शहरांमधून महिन्याला मोठ्य प्रमाणात मुली बेपत्ता होत आहेत अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी झी 24 तास शी बोलताना व्यक्त केली आहे. आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाचा निधी त्या दृष्टीने खर्च होत असून दुर्बल कुटुंबांना सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असेही शिरसाठ यांनी सांगितले.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 13, 2025 09:38:49
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत पुन्हा प्रदूषणचा मुद्दा आला पुढे.. पुन्हा एकदा रस्ता झाला गुलाबी... एमआयडीसी फेज 2 मधील प्रकार... एमआयडीसी अधिकारी आणि एमपीसीबी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष... Anc रासायनिक कंपन्यांच्या प्रदुषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीत चक्क गुलाबी रस्ता पाहायला मिळाला. डोंबिवली एमआयडीसीत अनेक रासायनिक कंपन्या असून यामुळे डोंबिवलीकरांना नेहमीच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस, ऑरेंज ऑईल मिश्रित पाऊस पडला होता.तर आता केमिकलमुळे एमआयडीसी मधील रस्ता गुलाबी रंगाचा झाला आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या प्रमाणात गटारात केमिकल असल्याचे ही दिसून आले आहे.या केमिकल मुळे उग्र वास सुटला आहें, असे स्थानिकांनी सांगितले. 2020 साली हाचं गुलाबी रस्ता विषय लावून धरला होता, त्यामुळे तात्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली होती. आता 5 वर्षानी पुन्हा हा विषय पुढे आला असून अधिकारी वर्ग लक्ष देणार कां असा सवाल उपस्थित होतं आहे याचा आढावा घेतला आहे आतिश भोईर यांनी.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 13, 2025 09:37:33
Pune, Maharashtra:अहिल्यानगर शहरात असलेली पुरातन माळीवाडा वेळेस पाडण्यासाठी महापालिकेने जाहीर प्रकटनाद्वारे नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवल्या आहेत मात्र पालिकेच्या निर्णयाविरोधात माळीवाडा येथील नागरिक एकवटले आहेत. माळीवाडा वेस ही अत्यंत पुरातन असून यावेसीचा एक दगडही हलवू देणार नसल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. शहरातील नागरिक वेशीसमोर एकत्र येत महापालिकेविरुद्ध हरकती घेण्यासाठी अभियान राबवलं जात आहे जास्तीत जास्त संख्येने नागरिकांकडून हरकती नोंदवून त्या महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करून सोमवारी महापालिकेत आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यामुळे नगर शहरातील ऐतिहासिक माळीवाडा वेस रक्षणासाठी नागरिक एकवटत असल्याचे पहायला मिळत आहे.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 13, 2025 09:36:41
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 13, 2025 09:04:00
Junnar, Pune, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्याच्या मातीतून पिकलेला आंबा आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. जुन्नरमधील प्रयोगशील शेतकरी भरत जाधव यांनी विकसित केलेल्या ‘जुन्नर गोल्ड’ आंबा वाणाला केंद्र शासनाकडून जीआय टॅग/शेतकरी वाण म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे. जुन्नर तालुक्यातील डोंगरदऱ्यांमध्ये पिकलेला आंबा देशपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. या आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे हापूसचा स्वाद, केशरचा रंग आणि राजापुरीचा आकार — तिन्ही गुणांचा अनोखा संगम. जवळपास ९०० ग्रँम ते १ किलो वजनाचे फळ, आकर्षक रंग आणि चव यामुळे बाजारात याला मोठी मागणी आहे. या यशामुळे भरत जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत असून, जुन्नर तालुक्याच्या कृषी परंपरेला नवी ओळख मिळाली आहे. विशेष म्हणजे हा वाण विकसित करण्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. एका शेतकऱ्याच्या जिद्दीतून जन्माला आलेला ‘जुन्नर गोल्ड’ आता जुન્નरच्या नावाला सुवर्णमुद्रा ठरतोय.
0
comment0
Report
Advertisement
Back to top