Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळच्या बसस्थानक उद्घाटनाला मिळाला 5 वर्षानंतर मुहूर्त.

Oct 14, 2024 06:50:44
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या बसस्थानकाचे उद्घाटन 5 वर्षानंतर होत आहे. 11 महिन्यात पूर्ण होणार्‍या या कामात कंत्राटदाराच्या संथगतीने व न्यायालयीन अडथळ्यांमुळे विलंब झाला. लोकप्रतिनिधींनीही यावर योग्य पाठपुरावा केला नाही. त्यामुळे प्रवाश्यांना तात्पुरत्या बसस्थानकातून बस सुटत असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. निवडणुकीच्या तोंडावर, मुख्यमंत्र्यांकडून आभासी पद्धतीने उद्घाटन होणार आहे. प्रवाश्यांना नवीन बसस्थानकातून सर्व सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.

2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Nov 17, 2025 09:37:55
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात 11 नगरपरिषद आणि एक नगरपंचायत अशी 12 नगरपालिकांची निवडणूक जाहीर झाली आहे... आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक प्रशासकीय कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू आहे.. अद्यापही महायुती असेल किंवा महाविकास आघाडी यांच्याकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही त्यामुळे संभ्रम देखील आहे... कोपरगाव असेल श्रीरामपूर असेल आणि नेवासा तालुक्यात महायुतीतच बंड होण्याची शक्यता आहे... तर दुसरीकडे महाविकास आघाडीत देखील घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकतील.. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अवघ्या काही तासांमध्येच सर्व नगरपालिकांचे चित्र स्पष्ट होईल...कोपरगाव येथील प्रशासकीय कार्यालया बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 17, 2025 09:23:13
Nagpur, Maharashtra:Ngp Bjp rally live u ने फीड पाठवले ----- चंद्रशेखर बावनकुळे बाईट -- आज आम्ही सर्वच नगरपालिकेत महायुती म्हणून समोर जात आहोत... कामठी मध्ये अजय अग्रवाल( नगराध्यक्ष ) आणि सर्व नगरसेवकांनी फॉर्म भरले आहे.. महायुतीचा विजय होईल.. 51% मत मिळतील -- कामठी येथील जनता विकासाला मत देईल असा मला विश्वास आहे.. धर्मपंथाच्या पलीकडे जाऊन मत देतील -- विदर्भात अनेक ठिकाणी महायुती झाली आहे.... काही ठिकाणी महायुती म्हणून तर काही ठिकाणी मित्रपक्ष म्हणून लढत आहोत... जिथे मित्र पक्षाविरुद्ध लढत आहोत तिथे मनभेद किंवा मतभेद ते होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ -- दोन मुद्दे घेऊन आम्ही चाललो आहे मोदी आणि देवेंद्रजींच डबल इंजिन सरकार... सर्व योजना समाजापर्यंत पोहोचवायचे असल्यास महायुतीचा नगराध्यक्ष होणे गरजेचे आहे... नगरपालिकेचा विकास भाजप, महायुती करू शकते -- काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे पण अर्ज घेण्याचे अखेरच्या दिवसापर्यंत ते अर्ज मागे घेतीला -- गोंदिया भंडारा मध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढत आहे.... on जमीन घोटाळा -- विकास खारगे समिती रिपोर्ट करून आम्हाला देतील 30 दिवसांचा अवधी दिला होता... बारा दिवस झाले 18 दिवस शिल्लक आहे -- on ठाकरे -- ज्या पदाला ज्या व्यक्तीची गरज आहे... त्यावेळेस महाराष्ट्र हा निर्णय घेत असतो कुठलेही सरकार असो... विरोधी पक्षाचे असो ki स्व पक्षाचे असो.... या राज्याची विरासत अशीच आहे... काही विषय भावनिक असतात त्यावर निर्णय होत असतो -- बिहार इफेक्ट महाराष्ट्रातील दिसेल
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 17, 2025 09:15:04
Nashik, Maharashtra:पुण्यामध्ये कोरेगाव पार्कमधील महार वतनाचा ४० एकर जमीन हडपण्यासाठी महसूल यंत्रणेचा बेकायदेशीर कारभाराचा पर्दाफाश झाला होता. त्यानंतर राज्यभरातील अशा तक्रारीचा ओघ झी २४ तासकडे सुरू झालाय. आता नाशिकमध्ये महार वतनाच्या जमिनी हडप करण्यासाठी भूमाफियाना मदत करण्यासाठी महसूल महापालिका आणि स्थानिक यंत्रणा कशा एकत्रित होतात हे आपण पाहणार आहोत... बघूया ४५ एकर वतनाच्या जमिनीचा नवीन पर्दाफाश. आनंद गांगुर्डे यांनी रेल्वेमध्ये नोकरी करत ते आता निवृत्त झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना दसक गावात सर्वे क्रमांक ७८ आणि ७९ मध्ये अडीच ते तीन एकर जमीन शेती करण्यासाठी दिली; परंतु या जमिनीवर नाशिक रोड परिसरातील भूमाफियांनी ताबा घेतला. तो सोडविण्यासाठी खंडणी मागण्यात आली मात्र ती देऊ न शकल्याने जमिनी परस्पर विकल्या गेल्या; अवघ्या १०० रुपयांच्या stamp वर सर्वसामान्य निरक्षर गरजू लोकांना गुंठ्याने विक्री करत लाखोंचे व्यवहार झाले. त्यावेळी गांगुर्डे यांनी तक्रार केली परंतु तलाठी-तहसीलदारांनी लक्ष दिले नाही. नंतर त्यावर बंगले बांधण्यास सुरुवात झाली तर महापालिकेला सूचना दिल्या गेली पण दुर्लक्षच झाले. अखेर गांगुर्डे यांनी विभागीय आयुक्तांकडे पुराव्यासह लेखी तक्रार नोंदविली. वाहतूक विभागातील काहीजणांना तक्रार मिळाली असतानाही प्रशासकीय प्रयत्न उलट्याच दिसले. मात्र गांगुर्डे यांनी १० ते १२ आंदोलने नाशिक महापालिकेसमोर आणि विभागीय आयुक्तांकडे करून प्रशासनाला जागविण्यात अयशस्वी झाले. आजपर्यंत केवळ कागदी कारवाईच झाली आणि जमीनमालक आजही भूमिहीन आहेत. जवळपास ३६७ घरं उभी राहिली असून ३९ जमीन मालकांच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर बांधकाम झाले. कायदा सुव्यवस्था आणि शासनाच्या लाखो रुपयांच्या नजराण्यांवर महसूल घोटाळा सुमारे हजार कोटींपेक्षा अधिक असण्याची शक्यता असून, याप्रकरणी राजकीय व्यक्तींची नावे समोर येत आहेत आणि काहींविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. महार वतनाच्या २ हेक्टर २० आर शेतजमीन शासनाच्या परवानगीशिवाय विक्री किंवा हस्तांतरण करता येत नाही; बांधकाम सुरू झाल्यापासूनच विरोध होत असून राजकीय दबावाचा आक्रमण कायम राहिला. माफियांकडून खर्चही करण्यात आला; त्यामुळे शेतमालक आजही उपाशी आहेत. कायदेशीर लढा अधिक दिवस चालू राहणार आहे.
66
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 17, 2025 09:11:01
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मी पण पाटलाचीच होती ना, मग नगरसेवक ऐवजी नगराध्यक्ष पद द्यायचं होत - उज्वला थिटे उज्वला थिटे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनगार लोकशाहीत निवडणूक लढण्याचा अधिकार सर्वांना अनगर परिषदेचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन-तीन दिवसापासून प्रयत्न करत होते. चार दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करता येत नव्हता. त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी माणसे उभं केली होती.. त्यामुळे जाऊ शकत नव्हतो.. काल मी प्रयत्न केला होता मात्र दहा ते बारा़ गाड्या माझ्या मागे फिरत होत्या.. मोहोळचे पोलीस निरीक्षक यांनी आम्हाला पोलीस सुरक्षा दिलं.. आम्ही तिथे गेलो पोहोचलो आणि उमेदवारी अर्ज दाखल केला ऑन नगरसेवक पद अनगर येथे माझा प्रभाग तर अनुचितजाती जमातीसाठी राखीव आहे त्यामुळे मी कशी नगरसेवक होणार राजन पाटील हे सर्वांना सून, मुलगी असं म्हणतात. तर त्यांनी त्यांच्या सुनेचा अर्ज माघार घेऊन मला नगराध्यक्ष करावा मी पण पाटलाचीच होती ना, मग नगरसेवक ऐवजी नगराध्यक्ष पद द्यायचं होतं सुरक्षा यंत्रणा प्रचाराच्या वेळेस मिळेल काही सांगू शकत नाही.. मला कसा प्रचार करता येईल यासाठी प्रयत्न करणार.. राष्ट्रवादी पक्षाकडे चार-पाच दिवसापूर्वी उमेदवारी अर्ज मागितला.. राष्ट्रवादी हा शिष्टPe पक्ष नाही असे राजन पाटील म्हणतात. आता ते शिष्टPe पक्षात गेले आहेत त्यांची शिस्त कशी होती. एका विधवा महिला चार ते पाच दिवस झालं अर्ज भरू देत नव्हते गुंडगिरी आणि दंगलशाही कुठे आहे.. मैं बोलणार उचित नहीं. प्रचारात महिलांच्या अत्याचार, शिक्षणाबद्दल बोलणार.. फुल देणाऱ्या महिलांचं आधार करतंय. आणि त्यांची माफी ही मागते.. अर्ज बाबत जे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे निवडणूक अधिकारी ठरवतील..
93
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 17, 2025 09:10:32
Nagpur, Maharashtra:नागपूर - कामठी नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या अर्ज दाखल करतेवेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते, कामठी शहरातील गोयल टॉकीज चौकातून भाजपाच्या उमेदवारच शक्ती प्रदर्शन करत मोठी रॅली काढण्यात आली. भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी येथून अजय अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आलीय. यावेळी भाजपच्या रॅलीतून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. बाइट — चंद्रशेखर बावनकुळे यांचा 121 (वन-टू-वन). महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत आम्ही लढत आहे काही ठिकाणी भाजप म्हणून तर काही ठिकाणी स्वबळावर. महाराष्ट्रातील जनता भाजपासोबत राहील महायुती सोबत राहील असा मला विश्वास आहे 51% मत महायुतीला मिळतील. दोन तृतीयांश बहुमताने विदर्भात महायुती जिंकेल. मित्रपक्ष काही ठिकाणी लढत आहे मात्र मतभेद आणि मनभेद होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. अजून अहवाल आलेला नाही अहवाल आल्यावर बोलू.
41
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 17, 2025 09:10:24
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - जत नगरपरिषदेसाठी राष्ट्रवादी अजित पवार,उद्धव ठाकरे आघाडीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अर्ज दाखल.. अँकर - सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार एक गट, अशी आघाडी झाली असून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सुरेश शिंदे यांचा उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी आघाडी कडून दाखल करण्यात आलेला आहे घड्याळ चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढवली जात आहे. शक्ती प्रदर्शन टाळत राष्ट्रवादी शरद अजित पवार आघाडीकडुन साध्या पद्धतीने नगराध्यक्ष पदांचा उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राष्ट्रवादी आघाडी निवडणूक लढवत आहे. बाईट - विलासराव जगताप - माजी आमदार - राष्ट्रवादी अजित पवार गट बाईट - सुरेश शिंदे - उमेदवार,नगराध्यक्ष - जत नगरपरिषद.
74
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 17, 2025 09:02:58
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या शिवसेनेने शक्ती प्रदर्शन करत, नगराध्यक्ष पदासह 17 नगरसेवकांचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यात आले. एकीकडे भाजपाने या ठिकाणी स्वतंत्र उमेदवार उभे केले असून मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी होणार आहे. गटारी, रस्त्यांच्या नावावर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार सत्ताधारी पक्षाने केला असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी केला आहे. मुख्य रस्त्यांची या ठिकाणी मोठी दुरावस्था झाली आहे. विकास कुठेही झालेला दिसत नाही. त्यामुळे यावेळेस पूर्ण ताकदिशी शिवसेना लढेल आणि जिंकेल ही असा विश्वास जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी व्यक्त केला आहे. शिंदखेडा नगरपंचायत साठी उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आल.
92
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 17, 2025 08:51:49
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिका लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, जिल्ह्यात महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मुख्य लढती असून, नवापुरमध्ये मात्र चौरंगी लढत आहे. नंदुरबार, तळोदा आणि शहादा मध्ये तिरंगी तर नवापूर मध्ये चौरंगी लढत रंगणार आहे. महायुतीचे तिघी घटक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढत असल्याने मत विभाजनाचा नगरसेवकाचा पदासाठी महाविकास आघाडीचा उमेदवारांना फायदा होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील चारही नगरपालिकांचे चित्र स्पष्ट झाले असून, नंदुरबार, शहादा आणि तळोदा नगरपालिकेत तिरंगी लढत तर नवापूर नगरपालिकेत चौरंगी लढत पाहण्यास मिळत आहे. नंदुरबार पालिकेच्या निवडणुकीत माजी मंत्री विजयकुमार गावित आणि सेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांची प्रतिष्ठा पणाला लागले आहे. तर शहादा आणि तळोदा नगरपालिकेत भाजपाचे आमदार राजेश पाडवी यांची प्रतिष्ठा पणाला लागले आहेत. नवापूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिला असून, काँग्रेस कडून निवडणूक लढवणाऱ्या जयस्वाल यांच्यासाठी विद्यमान आमदार शिरीष कुमार नाईक आणि खासदार गोवाल पाडवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकूणच निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, नंदुरबार जिल्ह्यात महायुतीचा घटक पक्षांमध्ये मुख्य लढत पाहण्यास मिळत आहेत मात्र नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर झाले असले तरी नगरसेवक पदासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने उमेदवारांची मनधरणी करण्याचे मोठे कसरत पक्षश्रेष्ठींना करावी लागणार आहे.
52
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 17, 2025 08:49:16
Nashik, Maharashtra:पुण्यातील कोरेगाव पार्कमधील महार वतनाचा ४० एकर जमीन हडपण्यासाठी महसूल यंत्रणेचा बेकायदेशीर कारभाराचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर राज्यभरातील अशा अनेक तक्रारीचा ओघ झी २४ तासकडे सुरू झालाय. आता नाशिकमध्ये महार वतनाच्या जमिनी हडप करण्यासाठी भूमाफियाना मदत करण्यासाठी महसूल महापालिका आणि स्थानिक यंत्रणा कशा एकत्रित याचा पर्दाफाश आपण करणार आहोत ...बघूया ४५ एकर वतनाच्या जमिनीचा नवीन पर्दाफाश हे आहेत आनंद गांगुर्डे..रेल्वेमध्ये नोकरी करत ते आता निवृत्त झाले..स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना दसक गावात सर्वे. नं. 78 आणि 79 मध्ये अडीच ते तीन एकर जमीन शेती करण्यासाठी दिली... मात्र या जमिनीवर नाशिक रोड परिसरातील काही भूमाफियांनी ताबा घेतला...तो सोडविण्यासाठी खंडणी मागण्यात आली मात्र ती देऊ न शकल्याने भूमाफियांनी ही जमीन परस्पर विकली...अवघ्या 100 रुपयांच्या स्टॅम्पवर...सर्वसामान्य निरक्षर गरजू लोकांना गुंठ्याने विक्री करत लाखोंचे व्यवहार करण्यात आले. त्यावेळी गांगुर्डे यांनी तक्रार केली मात्र तलाठी तहसीलदार यांनी लक्ष दिले नाही...नंतर त्यावर बंगले बांधण्यास सुरुवात झाली त्यावेळीही महापालिकेला सूचना देण्यात आली मात्र प्रत्येकाने दुर्लक्षच केले....अखेर गांगुर्डे यांनी विभागीय आयुक्तांकडे पुराव्यासह लेखी तक्रार नोंदविली...मात्र तरीही महसूल प्रशासन जागे झाले नाही...गांगुर्डे यांनी त्यांच्या प्रमाणे 39 शेतीमालकाना जागे करण्याचा प्रयत्न केला, संघटितपणे आंदोलने केली..10 ते 12 आंदोलने नाशिक महापालिकेसमोर आणि विभागीय आयुक्तांकडे करून प्रशासनाला जागविण्यात आटोकाट प्रयत्न केला मात्र आजपर्यंत केवळ कागदी कारवाई झाली आजही ते भूमिहीन आहेत..आता जवळपास 39 जमीन मालकांच्या या जागेवर महापालकींच्या नोंदीनुसार 367 घरे बंगले उभी राहिलीयेत. आबंदात तक्रारदार पीडित. या सर्व करत असताना गांगुर्डे यांनी न्यायालयात तक्रार केली . एकूणच या जागेवरील हस्तांतरण आणि बांधकाम याला स्थगिती मिळविली. त्यावेळी 2018 ला विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी एक दोन घरे पाडण्याचे नाटक करण्यात आले. मात्र लोकांनी विरोध केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे संगत काम बंद केले . त्यामुळे टाळाटाळ आजवर सुरूच राहिलीये . शासनाचा लाखो रुपयांचा नजराण्यापोटी महसूल घोटाळा सुमारे हजार कोटींपेक्षा अधिकचा असण्याची शक्यता असून, याप्रकरणी अनेक परिसरातील तत्कालीन नगरसेवक आणि काही राजकीय व्यक्तींची नावे समोर येतायेत... त्यातील काहींविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. खरतर महार वतनाची २ हेक्टर २० आर शेतजमीन शासनाच्या परवानगीशिवाय विक्री किंवा हस्तांतरण करता येत नाही. बांधकाम सुरू झाल्यापासूनच या विरोधात तक्रारी होत असताना कारवाईवेळी नेहमी राजकीय दबाव आणला जात असे. या साठी माफियांकडून मोठ्या प्रमाणावर खर्चही करण्यात आला. त्यामुळे अधिकारी तुपाशी आणि जामीनमालक आजही उपाशी राहिले आहेत. कुंपणच शेत खात असेल तर दहा बारा वर्षापासून लढणाऱ्या या जमीनमालकांना कोण न्याय देणार हाच खरा प्रश्न आहे.
43
comment0
Report
Advertisement
Back to top