Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

Shiv Sena Orders Mayoral Candidates to be Taken to the Assembly Ground Today

ABATISH BHOIR
Jan 22, 2026 10:49:01
Kalyan, Maharashtra
दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आज्ञास्थळी रवाना.. दोनन्ही उनगरसेवकांना श्रीकांत शिंदे यांचा फोन. फोन आल्यानंतर शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील आणि शिवसेनेचे महापौर पदाचे दोन्ही उमेदवार कल्याण मधून रवाना.. खासदार शिका शिंदे यांचा रवी पाटील यांना फोन दोन्ही उमेदवारांना आज्ञास्थळी घेऊन जाण्याची आदेश. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज एसटी प्रवर्गातील आरक्षण पडल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक हर्षाली थवील व किरण भांगले हे दोन्ही नगरसेवक इच्छुक आहेत महापौर या आठवड्यामध्ये होत असल्याने दोन्ही नगसेवकांना शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांच्या निवासस्थानामधून दोघांना घेऊन आज्ञास्थळी रवाना झाले आहेत कोणताही दगा पटका होऊ नये म्हणून खबादारी घेत दोन्ही नगरसेवकांना एक अज्ञात ठेवण्यात येणार आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश होईल यांनी wkt... आतिश भोईर कल्याण
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Jan 22, 2026 12:36:02
Dhule, Maharashtra:राज्याच्या वित्त विभागाकडून धुळे जिल्ह्याला अपेक्षित न्याय मिळत नसल्याची खंत धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे. धुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे पणन व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीत धुळे जिल्ह्यातील आमदारांनी राज्याच्या वित्त विभागाकडून धुळे जिल्ह्याला कमी निधी दिला जात असल्याची खंत व्यक्त केल्याचं मंत्री रावल यांनी सांगितलं. मागील वर्षी धुळे जिल्ह्याचा जिल्हा नियोजनचा बजेट हा 348 कोटी रुपयांचा होता. दरम्यान या वर्षी साडेतीनशे कोटी रुपयांचा बजेट मिळेल अशी अपेक्षा असताना धुळे जिल्ह्याला फक्त 292 कोटी रुपयांचा बजेट दिला गेला. धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासाचा अनुशेष बाकी असून जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्याच्या वित्त मंत्र्यांना धुळे जिल्ह्याला वाढीव विकास निधी देण्यासाठी आग्रह करणार असल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी स्पष्ट केला आहे. दरम्यान गुरुजीला कृषी विद्यापीठ व्हावा ही अनेक दिवसांची मागणी असून कृषी विद्यापीठाचे विभाजन करून स्वतंत्र कृषी विद्यापीठ देण्यात यावं अशी मागणी देखील यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Jan 22, 2026 12:35:36
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 22, 2026 12:02:35
Akola, Maharashtra:सध्या राज्यातील राजकारणात कोण कधी कसा फिरेल आणि कोण कुणाला पाठिंबा देईल, याचा अंदाज बांधणं अत्यंत कठीण झालं असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. मनसेने कल्याण–डोंबिवली महापालикेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला पाठिंबा हा केवळ पाठिंबा नसून एक प्रकारचा इशाराच असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. यावरून सध्याच्या आघाडीत सर्वकाही आलबेल नाही, असं स्पष्ट होत असल्याचंही ते म्हणाले. मनसे आता वेगळ्या वाटेने जाण्याच्या तयारीत असल्याचं संकेत मिळत असून, युतीमध्ये दरार निर्माण झाल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं.यावेळी ठाकरे बंधूंवर मिश्किल टीका करताना त्यांनी, “शादी एक से, प्यार दुसरी से — ही शादी कशी टिकणार?” असा टोला लगावला.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 22, 2026 11:31:58
Akola, Maharashtra:अकोला महापालिकाेत सत्ता स्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपा और कांग्रेसकडून सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाल सुरू असून शहरात ‘हाय व्होल्टेज पॉलिटिक्स’ पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच गोड बातमी देणार असल्याचं वक्तव्य साजिद खान पठाण यांनी केलं आहे. 41 नगरसेवकांच्या संख्याबळासाठी विविध पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी काँग्रेस, एमआयएमचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेविकेचे पती तसेच माजी गृहमंत्री रणजीत पाटील यांचे पुतणे आशिष पवित्रकार उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीबद्दल सकारात्मक चर्चा झाली असून उद्यापर्यंत सत्ता स्थापनेबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असं काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी सांगितलं आहे. दरम्यान, कोणताही अंतिम निर्णय झालेला नसून केवळ चर्चेसाठीच आम्ही आलो होतो, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगरसेवक रफिक सिद्दिकी यांनी स्पष्ट केलं आहे. तर भाजपसोबत युतीचा प्रश्नच उद्भवत नसून भाजपसोबत जाणार नसल्याची भूमिका एमआयएमने स्पष्ट केली आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये विशेष बाब म्हणजे अकोला महापालिकेची निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एकत्र लढवली होती. राष्ट्रवादीच्या एका महिला उमेदवाराचा विजय झाला असतानाच, त्यांचे पती काँग्रेससोबत प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला उपस्थित होते. मात्र आपण केवळ लग्नाची पत्रिका देण्यासाठी आलो होतो, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच माजी गृहमंत्री रणजीत पाटील यांचे पुतणे ,अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार यांनीही प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली असून आपल्याला मोठ्या पदाची ऑफर देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली असून भेटीसाठी आलेल्या सर्व पक्षांनी आधी एकत्रित संख्याबळ दाखवावं, त्यानंतरच आम्ही निर्णय जाहीर करू, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला असून त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं ते म्हणाले. अकोला महापालालिकेतील सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचाली निर्णायक टप्प्यावर पोहोचल्या असून काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. मात्र पाच नगरसेवकांची संख्या असलेली वंचित बहुजन आघाडी नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण अकोल्याचं लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Jan 22, 2026 10:34:42
Malegaon, Maharashtra:नाशिक जिले के मालगांव में शिक्षा घोटाले के मामले में एक और FIR दर्ज किया गया है. महात्मा फुले शिक्षण संस्था की सावित्री बाई प्राथमिक शाला के शिक्षक सहित अध्यक्ष, सचिव, तत्कालीन मुख्याध्यापिका, शिक्षण अधिकारी और लिपीक पर बगैरन नियुक्ति दिखाने, फर्जी बिल जारी करने जैसे आरोपों के तहत मामला दर्ज किया गया. शासन की 75 लाख की धोखाधड़ी के मामले में FIR दर्ज. मालगांव में लगभग 1000 करोड़ रुपये के शिक्षा घोटाले की चर्चा. मालगांव शिक्षा घोटाले की कुल चार मामलों तक पहुंच हो चुकी है और कल मध्यरात्री एक और मामला दर्ज हुआ. संस्थे के अध्यक्ष सुनील वडगे, सचिव झिभाऊ अहिरे, लिपिक निलेश वडगे, तत्कालीन मुख्याध्यापिका लीलाबाई जगताप और शिक्षिका सुवर्णा दिलीप अहिरे के खिलाफ बेकायदेशीय नियुक्ति दिखाने, फरक बिल निकालने जैसे आरोपों पर FIR दर्ज हुई. सामाजिक कार्यकर्ता शेखर पाटील की शिकायत पर यह मामला दर्ज हुआ.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 22, 2026 10:22:51
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर होणार अशा प्रकारची बॅनरबाजी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. या बॅनरबाजी नंतर भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवली असताना आमचा महापौर होणार हे घोषित करणं कोणत्याही पक्षाला उचित नाही अशी भूमिका मांडली आहे. महापौर पदाबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतरच याबाबत निर्णय जाहीर केला जाईल अस देखील धनंजय महाडिक म्हणालेत. इतकच नव्हे तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपचा देखील महापौर चालेल ना? अशी टिप्पणी देखील महाडिक यांनी केली है.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Jan 22, 2026 10:22:36
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर महापालिकेचे महापौर पद इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. 40 नगरसेवकांचा गट नोंदणी केलेल्या शिवसेन मध्ये महापौर पदासाठी इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे. कलानी गटाकडून वंदना युवराज भदाणे, दिलीप जग्यासी, विकीसिंग लबाना, अश्विनी कमलेश निकम आणि डिम्पल कुमारी ठाकूर हे सर्व ओबीसी आरक्षणातून निवडून आलेले नगरसेवक महापौर पदासाठी इच्छुक मानले जात आहेत. तसेच शिवसेनेकडून राजश्री चौधरी, जोत्सना जाधव, राजेश चांपूर आणि इंदिरा पाटील हेही ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले असून, त्यांच्या नावे चर्चेत आहेत. याशिवाय राजेंद्र चौधरी हे स्वतः ओबीसी प्रवर्गातील असून, ते पॅनल क्रमांक 10 मधील सर्वसाधारण जागेतून निवडून आले आहेत. त्यामुळे तेही संभाव्य उमेदवारांच्या यादीत महत्त्वाचे मानले जात आहेत. महापौर पदाचा पहिला अडीच वर्षांचा कार्यकाळ कलानी गटाला शिवसेना सोडते का, की हे पद स्वतःकडेच राखून ठेवते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णयावर महापालिकेतील आगामी सत्तासमीकरणे आणि राजकीय दिशा ठरणार असल्याने उल्हासनगरच्या राजकारणात उत्सुकता निर्माण झाली आहे.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Jan 22, 2026 10:19:50
Dharashiv, Maharashtra:धाराशिव : तुळजाभवानी देवीच्या दरबारात दान की लूट? तुळजाभवानी देवीच्या दानपेटीत भाविकांची चुकून पडलेली सोन्याची अंगठी परत द्यायला मंदिर संस्थानचा नकार नजरचुकीने दानपेटीत पडलेली वस्तू परत देणार नाही, ती दान समजली जाईल तुळजाभवानी मंदिर संस्थानचा वादग्रस्त ठराव,दानपेटीत चुकून पडलेली मौल्यवान वस्तू परत मिळणार नाही, भाविकांमध्ये संताप Anchor: देवाच्या दरबारात श्रद्धेने गेलेल्या भाविकाला न्याय मिळत नसेल, तर तो विश्वासाचा अपमान आहे. तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या एका वादग्रस्त ठरावामुळे सध्या भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जायला आहे. दानपेटीत चुकून पडलेली मौल्यवान वस्तू परत न करण्याचा हा ठराव नेमका काय आहे, आणि एका भाविकाला याचा कसा फटका बसला आहे,पाहूया हा सविस्तरREPORT
0
comment0
Report
Advertisement
Back to top