icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पैसे के विवाद में मित्र की बेरहमी से पिटाई, अस्पताल में मौत; आरोपी सुरेश अग्रवाल गिरफ्तार

Akola, Maharashtra:पैसे के विवादातून आधी मित्राला बेदम मारहाण केली... त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या मित्रालाच स्वतः उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं..मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा प्रकार अपघाती मृत्यू असल्याचा बनाव करण्यात आला होता. अकोला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन तासांत या खुनाचा छडा लावत मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं आहे. डाबकी रोड परिसरातील रेल्वे गेटजवळ गंभीर जखमी अवस्थेत एका युवकाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचा मृत्यू अपघातात झाल्याचं आरोपींकडून सांगण्यात आलं. मात्र पोलिसांना संशय आल्याने स्थानिक गुन्हे शाखेने याचा तपास सुरू केला.तपासादरम्यान मृतकाच्या अंगावरील जखमा अपघातातील नसून मारहाणीच्या असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. चौकशीत पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादात आरोपीने मित्रालाच बेदम मारहाण केल्याचं समोर आलं. त्यानंतर संशय टाळण्यासाठी त्यालाच उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.अवघ्या तीन तासांत स्थानिक गुन्हे शाखेाने मुख्य आरोपी सुरेश अग्रवालला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

फरार कृष्णा आंधळे: पुलिस उसे पकड़ पाएगी या यंत्रणा हतबल?

Beed, Maharashtra:फरार कृष्णा आंधळे - यंत्रणेला आव्हान..! PKG ANC- सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 7 आरोपी गजाआड आहेत पण 1 आरोपी अजूनही मोकाटच आहे! वाल्मिक कराडसह 7 आरोपी तुरुंगात आहेत. पण या खून प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी त्याला फरार घोषित करून डोक्यावर बक्षिसही ठेवलंय. तपास यंत्रणेचे शेकडो पथक कामाला लावलेत, तरीही आंधळे सापडत नाही. मग प्रश्न आहे... कृष्णा आंधळे अखेर गायब कुठे झाला? की तो यंत्रणेलाच आव्हान देतोय? पाहुयात आजचा खास रिपोर्ट... 9 डिसेंबर 2024... मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून अमानुष हत्या झाली. या प्रकरणात CID ने वाल्मिक कराडसह 8 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं. त्यापैकी 7 जण सध्या जेलमध्ये आहेत. पण आठवा आरोपी कृष्णा आंधळे 18 महिन्यापासून फरार आहे. पोलिसांनी त्याच्यावर 1 लाखाचं बक्षिस जाहीर केलं. महाराष्ट्रासह शेजारील राज्यात पथक पाठवली. त्याचे बँक खाते, मोबाईल, नातेवाईकांच्या घरी छापे... सगळं करूनही आंधळ्याचा पत्ता लागला नाही. तो देशाबाहेर पळाला का? की गावातच कोणाच्या आश्रयाला आहे? याचं उत्तर अद्याप पोलिसांकडे नाही... फरार झाल्यानंतर कृष्णा आंधळे सोशल मीडियावरूनही सक्रिय नाही. त्याचे फोटो व्हायरल करूनही माहिती मिळत नाही. याचा अर्थ तो पूर्णपणे भूमिगत झाला आहे. बनावट नावाने, बनावट कागदपत्रांसह तो लपून बसला असावा असा संशय आहे. पण एक आरोपी जर पोलिसांना चकवा देत असेल तर "कायदा सर्वांसाठी सारखा" हा दावा कितपत खरा?... आंधळा सापडल्याशिवाय हे प्रकरण पूर्ण होऊ शकत नाही. कारण त्याची साक्ष आणि जबाब हा खटल्यासाठी महत्वाचा आहे. तो कदाचित पाकिस्तानमध्ये गेला असावा, एरवी काश्मीर मधून आरोपी अटक करणाऱ्या बीड पोलिसांना कृष्णा आंधळे कसा सापडत नाही असा संतप्त सवाल शिंदे गटाने केला आहे. आंधळे प्रकरणात बीड पोलिसांना राष्ट्रपती पुरस्कार देण्यात यावा अशी अजब मागणी करण्यात आली आहे. कृष्णा आंधळे कुठे आहे? हा फक्त पोलिसांचा प्रश्न राहिला नाही... तर तो बीडच्या जनतेचा प्रश्न झाला आहे. जर यंत्रणेला एक आरोपी सापडत नसेल तर मग सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळणार? कृष्णा आंधळे यंत्रणेला आव्हान देतोय... की यंत्रणाच हतबल झाली आहे? उत्तर शोधणं आता गरजेचं आहे. महेंद्रकुमार मुधोळकर ZEE 24 तास बीड...
0
0
Report
Advertisement

नाशिक में भारी बारिश से मिलिंद नगर के 20-25 परिवारों के घर पानी में डूबे

Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये आज पहाटे मुळासधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले. तर काही ठिकाणी घरात पाणी साचले.... शहरातील मिलिंद नगर परिसरातही 20 ते 25 घरात मध्यरात्री पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. आणि अनेकांचे घर ,कुटुंब रस्त्यावर आले.... बघूया याचा खास रिपोर्ट ही आहे नाशिक शहराच्या मधोमध असलेले मिलिंद नगर वस्ती या वस्तीच्या बाजूनेच जाते ती नंदीदी नदी... रात्री झालेल्या पावसाने नंदीदी नदी दुधडी भरून वाहू लागली... मात्र याच परिमाण मिलिंद नगर परिसरात असलेल्या कुटुंबाच्या घरात पाणी शिरले. त्यात शेवरे कुटुंबाचं घरही पूर्णपणे पाण्याखाली गेलं. घरातील फर्निचर, कपडे, धान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दैनंदिन वापराचं सामान पाण्यात भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेवरे च 6 जनाच कुटुंबात आहे. यात दोन चिमुकल्यांचा सुद्धा समावेश आहे.... मंगला शेवरे हे आपला उदरनिर्वाह मॉल मुजरी करून करतात अचानक आलेल्या पावसामुळे शेवरे कुटुंबांच्या घरात पाणी शिरलं आणि यात शौर्य कुटुंबाचा संपूर्ण संसार उघड्यावर येऊन पडलाय... घरातील कडधान्य देखील या पावसात भिजून गेल्यामुळे खाण्याचा प्रश्न देखील समोर आल्याचा शिवरायांच्या कुटुंबांनी सांगितले.... शासनाने आम्हाला आमच्या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी शेवरे कुटुंबांनी केली आहे.... मिलिंद नगर परिसरात अनेक कुटुंब राहतात.. यात 20 ते 25 कुटुंभावरांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. बाजूलाच सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या कामामुळे नुकसान झाले असल्याचा आरोप नुकसानग्रस्त नागरिकांनी केलाय. तर प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केलाय. नागरिकांचे होणारे नुकसान हे अधिकाऱ्यांच्या निष्काळजी मुळे झालेले नुकसान आहे...शहरात सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांचे मोठे नुकसान होतंय... शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले नागरिकांच्या घरात पाणी शिरले याचं सर्व कारण नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी आणि संस्था कुंभमेळाच्या पार्श्वभूमी सुरू असलेल्या ठेकेदारांनी केलेल्या कामांमुळे ही परिस्थिती नाशिकवर आली असल्याचं नाशिक महानगरपालिकेचे उपमहापौर विलास शिंदे यांनी म्हटले यासंदर्भात जोशी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे देखील उपमहापौर विलास शिंदे यांनी म्हंटल आहे... मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या या पावसामुळे नागरिकांच्या थेट घरात पाणी शिरलं यामुळे अनेकांची कुटुंब थेट रस्त्यावरती आलीये... त्याचबरोबर कुंभमेळ्यानीमित्त शहरात विकास कामे सुरू आहेत. मात्र याचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागलाय... झालेल्या पावसामुळे नागरिकांना लवकरात लवकर भरपावी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली جاتیये...
0
0
Report

आळंदी में बाढ़ के कारण संत तुकाराम पालखी प्रस्थान सीमित उपस्थिति के साथ

Akola, Maharashtra:आळंदीतील इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा अत्यंत मोजक्या उपस्थितीत पार पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतिहासात प्रथमच अशा प्रकारे पालखी सोहळा मर्यादित स्वरूपात होत असल्याचे सांगत, या परिस्थितीसाठी अनियोजित बांधकामे, उद्योजक, कंत्राटदार आणि त्यांना पाठबळ देणारे राजकारणी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुसळधार पावसामुळे आळंदी शहरात पूरस्थिती निर्माण झाली असून इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेचा विचार करून पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित उपस्थितीत घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयावर माजी आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त करत, हा वारकरी परंपरेसाठी वेदनादायी क्षण असल्याचे म्हटले. शहरातील अनियंत्रित बांधकामे, नदीपात्रावरील अतिक्रमणे आणि नियोजनशून्य विकासामुळे आज ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप त्यांनी केला. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळेच आळंदीला वारंवार पूरस्थितीचा सामना करावा लागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. प्रशासनाने यापुढे अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
0
0
Report
Advertisement

राम मंदिर दान मामले पर शिवसेना का प्रदर्शन: देणगी की जाँच की मांग

Yavatmal, Maharashtra:मंदीर दान के चोरो को, अब हिंदू माफ नही करेगा... अशি घोषणाबाजी करीत यवतमाळ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी निषेध आंदोलन केले. दत्त चौकातील श्री दत्त मंदिरात प्रभू श्रीरामाची आरती करून राम रक्षा आंदोलन करण्यात आले.यावेळी राम मंदिरासाठी जमा झालेल्या देणगीचा हिशोब जाहीर करून, कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. शिवसेना संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी यासंदर्भात भूमिका मांडली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
0
0
Report

जालना की जिलापरिषद शालाओं में जीर्ण दशा, पानी और टूटी क्लासरूम से छात्र भयभीत

Jalna, Maharashtra:जालना : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची दयनीय अवस्था,विंचू, सापाच्या सहवासात विद्यार्थ्यांना घ्यावं लागतंय शिक्षण (पॅकेज) अँकर : जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्ग खोल्यांची दुरावस्था झालीय.अनेक वर्ग खोल्या मोडकळीस आल्यायत.काहींच्या विटा खचतायत तर काही काही शाळांची टिनपत्रे ही गळक्या अवस्थेत असल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची चांगलीच अडचण झालीय.बघूया हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ:१: जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील कुंभारझरी गावची ही जिल्हा परिषाद शाळा पाहा. शाळेतील 4 वर्ग खोल्या मोडकळीस आल्यात.शाळेवरची पत्रे वाकलीय.तर काही पत्रांमधून पावसाचं पाणी थेट वर्ग खोल्यांमध्ये कोसळतय. जुन्या खोल्यांच्या अवती भोवती विंचू आणि सापांनी डोकं वर काढायला सुरुवात केलीय.शाळेत वारंवार साप निघत असल्यानं विद्यार्थी चांगलेच भयभीत झालेत. बाईट : विद्यार्थ्यांचे बाईट टाकावेत. व्हिओ :०२: .कुंभारझरी जिल्हा परिषद शाळेनं या जीर्ण झालेल्या खोल्या पाडण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवलाय. पंचायत समितीने हा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवलाय.पण त्यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांनी असंच भीतीच्या वातावरणात शिक्षण घ्यायचं का असा प्रश्न निर्माण झालाय. बाईट :बी.टी.तळेकर, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा,कुंभाझरी(पांढरा शर्ट) ग्राफिक्स व्हिओ :०३: जालना जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1 हजार 488 शाळा आहेत.यातील 1 हजार 36 वर्ग खोल्या मोडकळीस आल्यात.काही जीर्ण झाल्यायत.अनेक वर्ग खोल्याची पत्रे गळकी असल्यानं शाळेत पाणी साचतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं तरी कसं असा प्रश्न विद्यार्थ्यांबरोबरच पालकांना पडलाय.आता कोणत्या तालुक्यातील किती वर्ग खोल्यांची अवस्था खराब आहे ते पाहूया जालना तालुक्यात 129,अंबडमध्ये 178,घनसावंगीत 115,बदनापूरमध्ये 138,मंठा तालुक्यात 65,परतुरमध्ये 76,भोकरदनमध्ये 225 तर जाफ्राबाद तालुक्यात 110 शाळा खोल्यांची अवस्था अत्यंत बिकट झालीय.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जीर्ण खोल्या पाडून नवीन बांधकामांसाठी तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी सरपंचांनी केलीय. बाईट : विजय परीहार,सरपंच,कुंभारझरी(निळा शर्ट असलेले) व्हिओ ०४: गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील हजारो जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्या शेवटच्या घटका मोजतायत. शिक्षण विभागाचे अधिकारी या जीर्ण खोल्यांची पाहणीही करतात मात्र कोणताही ठाम निर्णय होत नाही.त्यामुळे या वर्गखोल्यांची अवस्था आणखीनच बिकट होत चाललीय END P 2C -नितेश महाजन
0
0
Report

रोहित पवार ने रमेश म्हात्रे के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की

Kalyan, Maharashtra:इथे कुठला आरोग्यमंत्री राज्यमंत्री आला ka ? श्रीकांत शिंदे आलेत ka ? रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत कडचे आमदार आहेत चौथ्यांदा निवडून आले ते तरी आलेत ka पाठबळ देण्यासाठी .. इलेक्शन आलं की एकमेकांच्या विरोधात ठेवी करतात आणि सामान्य लोकांच्या जीवनाचा खेळ झाला तर येत नाही असं असेल तर रवींद्र चव्हाण यांना पाचव्यांदा शंभर टक्के निवडून नाही दिला पाहिजे श्रीकांत शिंदेने ट्विट केलं मात्र त्यांनी इथे येऊन डॉक्टर नर्सेस न पाठबळ द्यायला पाहिजे होतं हे अत्यंत दुर्दैव आहे आज संध्याकाळपर्यंत रमेश म्हात्रे याला अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन करू
0
0
Report
Advertisement

डोंबिवली KDMC हॉस्पिटल में डॉक्टर-स्टाफ हड़ताल से सेवाएं ठप्प, मरीज परेशान

Kalyan, Maharashtra:सलग दुसऱ्या दिवशी केडीएमसी चे हॉस्पिटल ची सेवा ठप्प. आपत्कालीन व्यवस्था सुरू, रुग्णांचे हाल. दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीच्या शस्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये शिवसेनेचे नगरसेवक यांनी डॉक्टर, नर्सेस और कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी कालपासून हॉस्पिटल बंद ठेवण्यात आले आहे. आजच्या दुसऱ्या दिवशीदेखील डॉक्टरांनी नर्स, कर्मचारी काम बंद आंदोलन सुरू ठेवले आहे, त्यामुळे रुग्णांची हाल होत आहे. डॉक्टर यांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि चार जणांवर विष्णूनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे, परंतु अद्याप अटक केले नसल्याने आजही काम बंद आंदोलन ठेवण्यात आलेला आहे. तसेच कल्याण आयएमए संघटना यांनी देखील खाजगी हॉस्पिटलचे ओपीडी आयपीडी सेवा देखील बंद केल्यात. जो पर्यंत आरोपी ला अटक केली जात नाही तो पर्यंत आंदोलन सुरु राहणार असे स्पष्ट केलं आहे. त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आशिष भोईर यांनी
0
0
Report

वाशीम-हिंगोली टोल प्लाजा जप्ती: अदालत ने एनएचएआई को बढ़ा हुआ मोबदला देने के आदेश दिए

Washim, Maharashtra:वाशीम: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मोठा दणका दिला आहे. वाढीव मोबदला न दिल्याने वाशीम -हिंगोली महामार्गवरील धुमका-तोंडगाव टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. वाशिम येथील शेतकरी बेबी गर्जे आणि विठ्ठल गर्जे यांच्या अकृषक जमिनीतून अकोला -नांदेड राष्ट्रीय महामार्ग गेला होता. मात्र मोबदला देताना प्लॉटचा मोबदला देण्यात आला, तर रस्ते आणि खुल्या जागेचा मोबदला देण्यात आला नव्हता. तसेच प्लॉटचाही मोबदला कमी दराने देण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.न्यायालयाने गर्जे यांच्या बाजूने निकाल देत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिले. मात्र आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी तोंडगाव टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.20 जुलैपर्यंत वाढीव मोबदला न दिल्यास टोल प्लाझावर प्रत्यक्ष जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गर्जे यांचे वकील उदय देशमुख यांनी दिली. बाईट : उदय देशमुख,वकील बाईट : दिनकर गर्जे,शेतकरी.
0
0
Report
Advertisement

डोंबिवली के अस्पताल में डॉक्टर-नर्स के विरोध से सेवाएँ ठप, गिरफ्तारी की मांग तेज

Kalyan, Maharashtra:सलग दुसऱ्या दिवशी केडीएमसीच्या रुग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प झाली आहे. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू ठेवलं आहे. आपत्कालीन सेवा सुरू असल्याने ओपीडी आणि इतर नियमित सेवा बंद असल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद अद्याप कायम आहेत. डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करत कालपासून रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरू असून रुग्णालयातील नियमित आरोग्य सेवा ठप्प झाल्या आहेत. आपत्कालीन सेवा मात्र सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मात्र ओपीडी, तपासण्या आणि इतर सेवांवर परिणाम झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top