icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सांगली के रिक्षाचालकों ने एलपीजी पंप फिर से चालू और किराये की अनुमति की मांग

Sangli, Maharashtra:सांगली में व्यावसायिक एलपीजी गॅससाठी रिक्षा चालकांच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे. रिक्षा घेऊन रिक्षा चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत बंद असलेले एलपीजी गॅस पंप तातडीने सुरू करावेत तसेच प्रवासी भाडे करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. सांगली, मिरज शहरामध्ये असणारे चारही एलपीजी गॅस पंप हे बंद झाले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांच्यावर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले असून 4 हजार रिक्षा पैकी 2 हजार हुन अधिक रिक्षा गॅस अभावी बंद पडले आहेत, त्यामुळे रिक्षा चालकांच्यावर उपासमारीची वेळ आली असून प्रशासनाकडून एलपीजी गॅस उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी रिक्षा संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
0
0
Report

शिर्डी में भोंदू अशोक खरात पर आत्महत्या के मामले की फिर से जांच की मांग

Shirdi, Maharashtra:चार वर्षांपूर्वी भोंदू अशोक खरातवर दाखल झाला होता आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा... 2022 मध्ये विकास रामदास दिवटे नावाच्या तरुणाने केली होती आत्महत्या... आत्महत्या करण्यास भाग पाडल्या प्रकरणी मयत विकास दिवटे याने लिहिली होती कॅप्टन अशोक खरातच्या नावाची चिठ्ठी... मयत विकास दिवटे हा साईसंस्थांमध्ये होता नोकरीला... दिवटे याच्या सासरच्या मंडळींसह भोंदू अशोक खरातवर दाखल झाला होता गुन्हा... मयताचे भाऊ राजेंद्र दिवटे यांनी दाखल केला होता शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा... पत्नीसोबत सुरू असलेल्या घरगुती वादात सासरच्या मंडळींसह अशोक खरात भावला मानसिक त्रास देत असल्याचे फिर्यादीत नमूद... अशोक खरात याने विकास याला साईसंस्थातील नोकरीवरून काढून टाकण्यासह जीवे मारण्याची धमकी दिल्याची होती फिर्याद... मानसिक त्रासाला कंटाळून विकास दिवटे याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद भाऊ राजेंद्र दिवटे याने केली होती दाखल... मात्र पोलिस तपासात पुढे दोषारोप पत्रातून अशोक खरात याचे नाव वगळल्याची माहिती... दिवटे आत्महत्या प्रकरणाचा पुन्हा सखोल तपास होऊन तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी.. फिर्यांदी राजेंद्र दिवटे वन टू वन - माझा भाऊ विकास दिवटे मयत झाला त्यावेळी सुसाईड नोट आढळली त्यात भोंदू अशोक खरात ने धमकी दिल्याचे स्पष्ट नमूद... विकास आणि त्याच्या पत्नीमध्ये भांडण झाले ‌त्यावेळी ती माहेरी गेली... तिच्या माहेरचे लोक आणि भोंदू खरात भावाला धमकी देत होता , साईबाबा संस्थानमधून नोकरीवरून काढून टाकेल अशा धमक्या द्यायचा... फिर्यादीत भोंदूचे खरातचे नाव होते मात्र राजकीय दबावामुळे चार्जशिट मधून नाव वगळण्यात आले... पोलिसांवर राजकीय आणि कॅप्टन भोंदू खरात याचा दबाव असल्याने नाव वगळण्यात आले असावी , फिर्यादी रवींद्र दिवटे यांची झी 24 तासाशी बोलतांना प्रतिक्रिया...या प्रकरणाचा पुन्हा तपास व्हावा आणि आम्हाला न्याय मिळावा... फिर्यादी राजेंद्र दिवटे यांच्याशी संपूर्ण प्रकाराबाबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
0
Report
Advertisement

शिंदे-सेना गुट में मतदान विवाद, बैठक नहीं, नेता के आदेश पर कार्रवाई

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:आंबादास दानवे PC अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत असेच व्हीप काढले होते ,आताही बकाही वेगळं केलं नाही. पक्षप्रमुख यांना विचारून हा निर्णय घेतला आहे. भाजप शिंदेसेना फायदा होत होता, म्हणून मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदान न करण्याचा आरोप होतात ,घेतला तरीही आरोप केले आहे. माझी कोणतेही बैठक झाली नाही. मी कर्जतला गेलो होतो, तिथे फक्त आमचे सदस्य होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणतेही बैठक झालं नाही. मी फक्त पक्ष प्रमुख यांच्या आदेशाचे पालन केले आहे. दोन शिवसेना एकत्र येण्यासाठी आमच्या कोणतंही बैठलं झाली नाही. कृष्णा डोंणगावकर आठ दिवसांपूर्वी काय बोलले पहा... प्रताप जाधव आमंत्रण ठाकरे नेते दिल्लीत अशी जेवणावळी होत असतात. गेल्यावर्षी देखील झाली होती. सर्वांच्या घरी दिल्लीत आशा जेवणावळी होत असतात. लाडकी बहीण योजना 71 लाख बहिणी गाळल्या आहेत. त्यातून 21 हजार कोटी आकडा आहे. सरकार बहिणीची फसवणूक करत आहे. नवीन kyc झाल्यावर 71 लाख बहिणी अपात्र केलं आहे. पात्रात अटी ठरल्या असताना मतदानसाठी सरकट देण्यात आले. ऑन नवनीत राणा तिच्यावर काय बोलावे, एवढ्या मोठ्या नेत्या त्या नाहीत... ऑन पार्थ पवार त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, त्यांची कार्यकरणी कोण आसवे त्यांचा विषय आहे. ऑन खरात खरात दोषी आहे, एकटा माणूस असे करू शकत नाही. त्याला मदत करणाऱ्या राजकीय नेते ,अधिकारी यांना चौकशीत आणले पाहिजे. Sit चौकशीत त्यांच्या चौकशी झाली पाहिजे ऑन चाकणकर एकटा अशोक खरातला साथ देणाऱ्याची देखील चौकशी झाली पाहिजे.. ऑन अवकाळी आधीचे एतेहसिक पॅकेज म्हटलेलं अजून मिळाले नाही, एक एक थेंब त्यातील देत आहे. निसर्गाने झोडपले आणि आता राजाही तसाच आहे, कुणाकडे जाणार आहे.
0
0
Report

अमरावती में राणा दंपत्ति ने हनुमान चालीसा पढ़ा; ठाकरे गुट पर बड़ा हमला

Amravati, Maharashtra:हनुमान जयंती निमित्त अमरावतीत राणा दाम्पत्याचे चालिसा पठण; हनुमान चालीसा पठनाला विरोध केल्याने उद्धव ठाकरेंचा साम्राज्य उध्वस्त झालं - रवी राणा उद्धव ठाकरेंच्या सेनेचे 90 टक्के आमदार खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा राणा यांचा गौप्यस्फोट आज हनुमान जयंती निमित्त अमरावतीच्या हनुमान गढीवर आमदार रवी राणा व माजी खासदार नवणीत राणा यांनी हनुमान चालीसाचे पठण केले आहे। अमरावतीच्या हनुमानगढी येथील 111 फुटाच्या हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन राणा दांपत्याने होम हवन करत पूजन केले आहे। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन धांडे, अमरावतीचे उपमहापौर सचिन भेंडे यांच्यासह नगरसेवक व भावीक भक्त उपस्थित होते। यावेळी राणा दांपत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। हनुमान चालीसा पठनाला विरोध केल्यामुळेच उद्धव ठाकरेचा साम्राज्य उध्वस्त झालं; उद्धव ठाकरेना जर संकटातून मुक्त व्हायचं असेल तर त्यांनी घरामध्ये हनुमान चालीसा वाचावी आणि अमरावतीला हनुमान गढीवर यावं लागेल, तशी मी विनंती त्यांना करतो असे राणा दांपत्याने म्हटले आहे। तसेच उद्धव ठाकरेंच्या सेनेचे 90 टक्के आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा राणा यांनी गौप्यस्फोट केला आहे। तसेच येणाऱ्या काळात भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष राहील अशी परिस्थिती असल्याची भविष्यवाणी राणांनी केली आहे。
0
0
Report

सप्तशृंगी गढ़ पर कीर्तिध्वज फलक, लाखों भक्त जुटे

Malegaon, Maharashtra: विशाल मोरे, वणी सप्तशृंगी गड (नाशिक) - चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सप्तशृंग गडाच्या शिखरावर 'कीर्तीध्वज' फडकला -ध्वजाचे दर्शन घेण्यासाठी गडावर लाखो भाविकांनी गर्दी आदिशक्ती सप्तशृंग गडावर भगवतीच्या चैत्रोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला आणि खान्देशवासीयांचे श्रद्धास्थान असलेला मानाचा 'कीर्तीध्वज' आज मध्यरात्री गडाच्या सर्वोच्च शिखरावर पारंपरिक पद्धतीने फडकविण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी आणि ध्वजाचे दर्शन घेण्यासाठी गडावर लाखो भाविकांनी गर्दी केली होती. समुद्रसपाटीपासून सुमारे ४६५९ फूट उंचीवर असलेल्या या वणी गडाच्या शिखरावर जाण्यासाठी कोणताही निश्चित मार्ग नसतानाही ही परंपरा वर्षानुवर्षे अखंड सुरू आहे. सुमारे १३ मीटर लांबीचा भगवा ध्वज, त्याच मापाची काठी तसेच ३० ते ३५ किलो वजनाचे पूजा साहित्य घेऊन गवळी शिखर गाठतात. शिखरावर जुना ध्वज उतरवून नव्या ध्वजाचे विधिवत पूजन करून ध्वजारोहण करण्यात करतात. हा अद्भुत आणि धाडसी सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गडावर उपस्थित होते。
0
0
Report
Advertisement

नांदेड दौरे पर अशोक चव्हाण पर तंज, हेमंत पाटील ने दिया जोरदार जवाब

Nanded-Waghala, Maharashtra:नांदेडला स्वागत है लेकिन आले तर काही देऊन तरी जावे अशी टीका खासदार अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिखे केली होती. चव्हाणांच्या या टिकेला सेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलंय. चव्हानांनी 72 वर्षात फक्त आलेला निधी फस्त केलाय, परत काही फस्त करायचं होतं म्हणून मागणी केली का असा पलटवार हेमंत पाटील यांनी केलाय. शेतकरी मेळाव्यानिमित्त मागच्या रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड दौऱ्यावर आले होते. एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यावरून माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी टोमणा मारला. नांदेडला विमानसेवा सुरु आहे, कोणीही येऊ शकतं, पण आले तर काही देऊन तरी जावे असा टोमणा अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. खा. अशोक चव्हाण यांच्या टोमण्याला शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. 72 वर्षांपासून अशोक चव्हाण यांच्याकडे नांदेडची सत्ता असून त्यांनी फक्त घ्यायचे काम केले आहे. गोदावरी नदीसाठी आलेला 20 कोटीचा निधी फस्त करण्यात आला. अशोक चव्हानांकडे एक टोळके असून हे टोळके सर्व निधी फस्त करतं. जो काही निधी येतो तो या टोळक्याच्या माध्यमातून फस्त केला जातो. परत काही फस्त करायचं होतं म्हणून मगणी केलीका असा माझा त्यांना सवाल आहे म्हणत आमदार हेमंत पाटील निशाणा साधला. नांदेडमधील काय विकता येईल याच्यासाठी त्यांनी आतापर्यंत सत्ता मिळवली असा गंभीर आरोप पाटील यांनी केला. नांदेडला कितीही निधी आला तरी शहराची बकाल अवस्था आहे. कारभाऱ्याचं मुख्य लक्ष कामांचे टेंडर, ठेकेदार आणि टक्केवारी याच्या पलीकडे नाही असे पाटील म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांच्या नांदेड दौऱ्यावरून अशोक चव्हानांनी कोपरखळी मरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या या टिकेवर आमदार हेमंत पाटील यांनी जोरदार पलटवार केला. एकमेकांवरील या टिकेमुळे मात्र मित्रपक्षात जसा वरिष्ठ स्तरावर वाद अधूनमधून दिसून येतो तसा वाद स्थानिक स्तरावरही धूमसत आहे हे दिसून आले.
0
0
Report

Solapur में पिता ने तीन बच्चों को विष देकर आत्महत्या की कोशिश, जिले में हड़कम्प

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सणकी बापाने आत्महत्येपूर्वी तीन चिमूरडयांना पाजले विष, दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ ( PKG ) - सख्या बापानेच तीन चिमूरडयांना केलेल्या विषप्रयोगाने सोलापूर जिल्हा हादरला - सणकी बापाने आपल्या पोटच्या मुलांना कोल्ड्रिंक्स मधून विष पाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर - एका खाजगी कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्डचे काम करणाऱ्या बापाने कौटुंबिक वादातून केले कृत्य Anchor - सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ गावामध्ये हृदय पिळवटून टाकणारे घटनासमोर आलीय. बुधवारच्या दिवशी घरात झालेल्या कुरबुरीनंतर बापाने रागाच्या भरात तीन मुलांना विष पाजले. त्यानंतर स्वतःने देखील विष पीत आत्महत्या केली आहे. भीम अण्णाप्पा वाघमारे वय 30 असे आत्महत्या केलेल्या बापाचे नाव आहे. त्याची तीनही मुले अत्यावस्थेत असून त्यांच्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तीर्थ गावातील भीम वाघमारे हा एका खाजगी कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्डचे काम करतो. भीम वाघमारे याचे शेतकरी पत्नी बरोबर कुरकुर झाल्याने त्याला राग अनावर झाला त्यानंतर तो घराबाहेर पडताना प्रगती वय - 6 वर्षे, प्रतीक - वय 4 वर्षे, आणि प्रतीक्षा वय - 3 वर्षे या तीनही मुलांना दुचाकीवर बसून वळसंग येथील आठवडा बाजार मध्ये काहीतरी खाऊ घालण्याचे आम्हीच दाखवून घेऊन गेला. त्यानंतर तो घर गाठले. त्यानंतर नराधम बापाने आपल्या तीनही मुलींना कोल्ड्रिंक्सच्या माध्यमातून विष पाजले त्यानंतर स्वतःही विष घेऊन आत्महत्या केली आहे. डॉ. संपत्ती तोडकर ( वैद्यकीय अधिकारी, शासकीय रुग्णालय ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ गावामध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येतेय। सहा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या तीनही चिमुकल्यांचे प्राण वाचले पाहिजेत यासाठी डॉक्टरांचे अहोरात्र प्रयत्न सुरू असून सर्वसामान्य नागरिकांकडून देखील प्रार्थना केली जातेय.
0
0
Report

कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2–6 अप्रैल: कला, खेल और पर्व का आयोजन

Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील डोंगरी भागातील नागरिकांना कला, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजन खेळांचा आनंद घेता यावा यासाठी पाटण तालुक्यातील मरळी येथे कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र विकास पर्यटन महामंडळाच्या वतीने हा महोत्सव 2 एप्रिल ते 6 एप्रिल असा पाच दिवसांचा असणार आहे. यामध्ये कोयना नदीवर बोटिंग, मराठी-हिंदी गीतांचा ग्रांड फिनाले, पॅराग्लायडिंग, बोटिंग, हॉर्स रायडिंग आणि उंट सवारी, कृषी प्रदर्शन, पशु-पक्षी प्रदर्शन आणि महिला बचत गटांचा भव्य मेळावा, भव्य फन फेअर आणि खाद्य जत्रा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. हे सर्व कार्यक्रम 5 दिवस सुरू राहणार असून दुर्गम भागातून लोकांनी याचा आनंद घ्यावा असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
0
0
Report
Advertisement

कळंब कार्यालयात शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न; पवनचक्की प्रकल्पाचा आरोप

Dharashiv, Maharashtra:कळंब उपविभागीय अधिकारी कार्यालयात अपंग शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. पवनचक्की प्रकल्पामुळे 3 हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्याचा आरोप. वैद्यकीय अहवाल असूनही कंपनीकडून मदत नाकारली, उलट शेतकऱ्यावर खंडणीचा गुन्हा, पोलिसांकडून अटक अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्ध टळला धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे… कळंबच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात एका अपंग शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे… पवनचक्कीच्या कामामुळे त्याच्या तब्बल तीन हजार कोंबड्या दगावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे… यासंदर्भात वैद्यकीय अहवाल सादर करूनही संबंधित कंपनीने मदत देण्यास नकार दिल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे… इतकंच नाही तर… उलट शेतकऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करत पोलिसांकडून अटक करण्यात आल्यााचा आरोपही करण्यात आला आहे… दरम्यान… मदत मिळत नसल्यामुळे आणि पोलीस कारवाईच्या भीतीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने थेट कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला… शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्यानंतर… कार्यालयातील कर्मचारी आणि उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांनी प्रसंगावधान राखत त्याला पकडलं… आणि मोठी दुर्घटना टळली… घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं… पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली…
0
0
Report

रायगढ़ किले पर अनधिकृत फलक हटे, शिव समाधि स्थल पर शांति बनी रहे

Chendhare, Maharashtra:किल्ले रायगडावरील अनधिकृत फलक हटवला ....... समाधीस्थळी लावण्यात आला होता फलक ....... समाधीस्थळी घोषणा बाजी करू नये, शांतता राखावी अशा आशयाचा मजकूर ....... किल्ले रायगडावरील शिवसमाधी स्थळी असलेला अनधिकृत फलक रायगड जिल्हा परिषद यांच्या उपस्थितीत हटवला. किल्ले रायगडावरील शिवसमाधी स्थळी शांतता राखा, घोषणाबाजी करू नये, अशा मजकुराचा अनधिकृत फलक लावण्यात आला होता. बुधवारी रात्री दीपोत्सवासाठी मंगेश वाकडीकर शिवसमाधी स्थळी गेले असता शिवप्रेमींनी याबाबत तक्रार केली. फलकावर शासन किंवा पुरातत्व विभाग या पैकी कोणाचाच उल्लेख नसल्याने वाकडीकर यांनी शिवप्रेमींना तो फलक काढण्यास सांगितलं. यावेळीshivरायांच्या नावाचा जयघोष देखील करण्यात आला.
0
0
Report
Advertisement

कृष्णा पाटिल ने अध्यक्ष पद के लिए अर्ज नहीं भरा; डोंगावकर-दानवे के आरोप गर्म

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सभापती पदाच्या निवडणूक मध्ये यूबीटी च्या कृष्णा पाटील डोंनगावकर यांनी अर्ज भरायची तयारी केली होती पाठिंबा साठी त्यांनी शिंदे सेनेच्या खासदार भुमरे यांची भेटही घेतली मात्र गोळाबेरीज जमली नाही म्हणून अर्ज भरला नाही मात्र kaळायला मार्ग नाही असे कृष्णा म्हणाले इतकंच नाही तर याबाबत अर्थपूर्ण सौदा झाला आणि तो अंबादास दानवे यांनी केला असा नाव न घेता आरोप कृष्णा पाटील यांनी केला, इतकाच नाही तर अध्यक्ष पद निवडणुकीत ही दोन्ही शिवसेना एकत्र येणार होत्या शिंदे सेनेचे आमदार च्या महेंद्र थोरवे यांच्या कर्जत च्या रिसॉर्ट वर बैठक झाली त्याला अंबादास दानवे ही होते, शिंदे सेनेचे वरिष्ठ नेते होते त्यानंतर आम्हाला सगळ्यांना सोबत गोव्याला नेले मात्र नंतर काय झालं कळले नाही असे कृष्णा पाटील म्हणाले, इतकाच नाही तर अंबादास दानवे वर भाजप ला मदत केल्याचा अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचा जो आरोप आहे त्यावर सुद्धा आग आहे म्हणून धूर येतोय असे म्हणत त्यांनी अंबादास दानवे कडे बोट केले, आता निवडणूक लढली नाही मात्र यातून उद्धव सेनेचे नुकसान झाले आणि यासाठी अंबादास यांचाच हाथ असल्याचे अप्रत्यक्ष त्यांनी सांगितले, गरज पडल्यास याबद्दल सगळे पुरावे आहेत नाव आणि पुरावे उघड केले जाईल असेही कृष्णा पाटील म्हणाले, त्यांच्या सोबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी...
0
0
Report

खेड के शिवदत्त आश्रम में बाबा ने महिला के साथ दुष्कर्म का आरोप, गिरफ्तारी की तैयारी

Khed, Maharashtra:पुणे ग्रामीणमधील खेड तालुका़ा सध्या एका भयानक कृत्याने हादरला आहे. चांडोली येथील शिवदत्त आश्रमात 'महाराज' म्हणून मिरवणारा नवनाथ गवळी हा प्रत्यक्षात वासनांध भोंदू असल्याचे उघड झाले आहे. एका 3 4 वर्षीय महिलेन या गवळीबाबा विरुद्ध धारिष्ठ्य दाखवून खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मे २०२५ पासून पीडित महिला कुटुंबासह आश्रमात दर्शनासाठी जात होती. १७ जुलै २०२५ रोजी पहाटे जप करत असताना आरोपीने महिलाचा विनयभंग केला. 'तुझ्या अंगातील दोष दूर करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवावे लागतील' अशी अश्लील मागणी आरोपीने केली. धक्कादायक बाब म्हणजे, सुरुवातीला केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असला, तरी प्रत्यक्षात आपल्यावर अत्याचार झाल्याची कबुली आता पीडितेने दिली आहे. कुटुंबाची भीती आणि सामाजिक प्रतिष्ठेपोटी महिलेने सुरुवातीला पूर्ण सत्य लपवले होते. मात्र, आरोपीकडून होणारा फोनवरचा त्रास आणि खरात प्रकरणामुळे मिळालेल्या प्रेरणेतून या महिलेने आता सर्व सत्य समाजासमोर मांडले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top