416416
Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक
Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
लातूर के किल्लारी में युवकों ने चाकू दिखाकर दादागिरी, पुलिस ने पकड़े
Latur, Maharashtra:किल्लारीत पोलिसांनाच जिवे मारण्याची धमकी.. दोन तरुण अटकेत. भर चौकात हातात चाकू घेऊन दादागिरी... व्यापाऱ्यांना धमकावल्यानंतर पोलिसांशीही हुज्जत... व्हिडिओ व्हायरल. किल्लारीत दोन तरुणांचा भररस्त्यात धिंगाणा... पोलिसांशी अरेरावी आणि शिवीगाळ... सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या घटनेची जोरदार चर्चा..... कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनाच खुलेआम चॅलेंज... भर चौकात दादागिरी... आणि जिवे मारण्याच्या धमक्या. लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे दोन तरुणांनी हातात चाकू घेऊन व्यापाऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे. त्यानंतर कारवाईसाठी आलेल्या पोलिसांसमोरही या दोघांनी दमदाटी करत शिवीगाळ आणि दादागिरी केल्याचा प्रकार घडला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली आहे. भर चौकात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे....0
0
Report
पत्रकार सुरक्षा कानून लागू हो; अतुल खूपसे करेंगे संजय पाटील के घर सामने प्रदर्शन
Pandharpur, Maharashtra:खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाई व्हावी, जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल खूपसे खासदार पाटलांच्या घरासमोर करणार आंदोलन. पत्रकारांना केलेल्या शिवीगाळ प्रकरणानंतर जन शक्ती शेतकरी संघटनेचे नेते अतुल खूपसे यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्या भांडुप येथील घरासमोर काळी फित लाऊन सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.0
0
Report
वसई-विरार महापालिका की इलेक्ट्रिक बस में अचानक आग, दमकल ने पाया नियंत्रण
Vasai-Virar, Maharashtra:वसई-विरार महापालिका मुख्यालय परिसरात उभी असलेल्या महापालिकेच्या इलेक्ट्रिक बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना दुपारी घडली. आगीमुळे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली असून, धुराचे मोठे लोळ आकाशात पसरले होते. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली असल्याची माहिती नाही. आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध घेण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू करण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
Beed murder case: OBC leader meets GhuLe family, demands hanging
Beed, Maharashtra:बीड : विलास घुले खून प्रकरण; ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी घेतली कुटुंबीयांची भेट.. प्रकाश आंबेडकरांकडून फोनवरून घुले कुटुंबाचे सांत्वन, लढ्यात सोबत असल्याची दिली ग्वाही..! सौरभ सोनवणे सह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी नवनाथ वाघमारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले या तरुणाचा खून करण्यात आला होता.. या घुले कुटुंबीयांच्या सांत्वन पर भेटीला ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे टाकळी येथील निवासस्थानी दाखल झाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही घुले कुटुंबीयांना फोनवरून संवाद साधत न्यायिक लढ्यासाठी आम्ही तुमच्या सोबत असल्याची ग्वाही दिली. दरम्यान या खून प्रकरणी बीडच्या खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर गुन्हा दाखल करून मुख्यमंत्र्यांनी घुले कुटुंबीयांना न्याय द्यावा, सौरभ सोनवणे याच्यासह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.0
0
Report
सुकळी उभार प्रकल्प से किसान आज भी सिंचाई से वंचित, अधिकारियों की लापरवाही पर बढ़ी नाराज़गी
Wardha, Maharashtra:सुकळी उभार प्रकल्प मतलब धरण उराशी, कोरड घशाशी अँकर - सुमारे १७५० हेक्टार क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळावा या उद्देशाने उभारण्यात आलेला सुकळी उभार प्रकल्प २०१४ मध्ये पूर्ण झाला. मात्र कालव्यांतील तांत्रिक त्रुटी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आजही अनेक शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. २०१६ मध्ये प्रथमच पाणी सोडण्यात आले असले तरी लाभधारकांपर्यंत ते प्रभावीपणे पोहोचले नाही.या समस्येवर माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री गफाट यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी आमदार राजेश बकाने यांच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी आंजी, पुलई, कामठी, पवणुर, नरसुला, बेलगाव, पेठ व बोरगाव सावली परिसरातील डावा व उजवा कालवा यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी अपुऱ्या पाणीपुरवठ्यासह कालव्यांच्या दुरवस्थेबाबत तक्रारी मांडल्या. पाहणीनंतर आवश्यक दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार असून त्यासाठी आमदार राजेश बकाने पाठपुरावा करणार आहेत. सुकळी उभार प्रकल्पातील सर्व त्रुटी दूर करून प्रत्येक शेतकऱ्याला शंभर टक्के सिंचनाचे पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सुनील गफाट यांनी दिली.0
0
Report
देवली पुलिस ने प्रतिबंधित सुगंधित तंबाकू, गुटखा और पान मसाला की अवैध बिक्री पर बड़ी कार्रवाई
Wardha, Maharashtra:अँकर : सार्वजनिक आरोग्याला घातक ठरणाऱ्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा व पान मसाल्याच्या बेकायदेशीर साठवणूक आणि विक्रीविरोधात देवळी पोलिसांनी मोठी कारवाई केली. २५ जून २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वायगाव (नि.) येथील देशमुख लेआउटमध्ये आरोपी सतीश गंगाधर नांडे यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत जनम तंबाखूची ५० पॅकेट, भाग्य गुटख्याची ३६३ पॅकेट, रत्ना तंबाखूचे १० टिन, ५०० ग्रॅम खर्रा असा एकूण ३२,८२६ किमतीचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात हा माल बेकायदेशीर विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
जालना में हनीट्रैप बनाकर पैसे मांगे, महिला समेत छह गिरफ्तार
Jalna, Maharashtra:जालना: ब्रेकिंग :जालन्यात हनीट्रॅप करणा-या महिलेसह सहा जणांना पोलिसांकडून बेड्या सोशल मीडियावर अश्लिल व्हिडिओ बनवून करायची पैशांची मागणी विविध पोलिस स्टेशनमध्ये आरोपी महिलेविरोधात सात गुन्हे दाखल सपना निकाळजे (वय 23 वर्ष) असं आरोपी महिलेचं नाव अँकर- जालन्यात हनीट्रॅप करून पुरुषांकडून पैशांची मागणी करणार्या एका महिलेसह सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्याात. सपना निकाळजे (वय 23 वर्ष) असं आरोपी महिलेचं नाव असून ती बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरी येथील रहिवासी आहे.. मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ओळख करून पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि त्यांच्याकडून पैसे उकळल्याच्या घटना घडत होत्या.. तशीच एक घटना दोन दिवसांपूर्वी नवीन मोंढा भागात घडली.. एका बोलेरो चालकाला अडवून त्याला डांबून पैसे मागणी करण्यात आली. तसेच फिर्यादीच्या नातेवाईक आणि मित्रांकडून फोन पे वर पैसे मागवून घेतले.. या प्रकरणी चंदनझिरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तपास करत असताना अवघ्या चार तासात पोलिसांनी हनीट्रॅप करणारी टोळीच गजाआड केलीये.. सपना निकाळजे असं मुख्य आरोपी महिलेचे नाव असून अविनाश गणेश झोटे, अर्जुन राजपूत, शंकर माणिक जाधव आणि आतिष सतीष गायकवाड या साथिदारांना अटक केलीये.. दरम्यान आरोपींकडून 2 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत.0
0
Report
केतन अग्रवाल हत्या मामले में अब तक 10 लोगों के बयान दर्ज, साहिल भी पूछताछ के लिए बुलाया गया
Varsoli, Maharashtra:केतन अग्रवाल हत्या प्रकरण में अब तक 10 व्यक्तियों के बयान दर्ज हो चुके हैं. आज सुबह सिया गोयल के भाई साहिल को भी पूछताछ के लिए बुलाया गया है. लोणावळा में सिया गोयल के इशारे के बाद चेतन ने केतन को ढकेलने की बात प्रथम जांच में सामने आई है. अग्रवाल परिवार द्वारा दिए गए सभी बयानों को गंभीरता से लिया जा रहा है. एक अहम बयान नीरज कुमार का भी दर्ज किया गया है. इस पूरी जांच के बारे में हमारे प्रतिनिधि चैत्राली राजापूरकर ने बातचीत की.0
0
Report
चंद्रपूर: जटपुरा गेट के पान दुकान पर धावा, 104.210 ग्राम MD ड्रग्स के साथ आरोपी गिरफ्तार
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर एलसीबीची मोठी कारवाई, जटपुरा गेटच्या प्रसिद्ध पान दुकानावर धाड, इटनकर पान दुकानावर धाड घालून 104.210 ग्रॅम MDMEPHEDRONE ड्रग्ज ताब्यात; पान दुकान संचालक अटकेत; एकूण 6,23,370/- किमतीचा मुद्देमाल जप्त. आरोपी ओम संतोष इटनकर (वय 25 वर्षे) याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने ड्रग्ज इरफान उर्फ भुऱ्या पठाण याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची माहिती दिली. या प्रकरणी रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला. इटनकर पान दुकानावर ड्रग्जविषयक धाड घालून मोठ्या प्रमाणात ड्रग जप्त करण्यात आल्याने परिसरात खळबळ.0
0
Report
Advertisement
केतन हत्या मामले में सिया के भाई से पिछले तीन घंटों से पूछताछ जारी
Varsoli, Maharashtra:केतन हत्या प्रकरणात सियाच्या भावाची मागील तीन तासांपासून चौकशी सुरू.. चेतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता सियाच्या भावाला चौकशी साठी बोलविण्यात आले आहे. मागील 3 तासांपासून सियाचा भाऊ साहिल याची चौकशी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू आहे. या हत्येबाबत कुटुंबाला याची काही माहिती होती का याची सखोल चौकशी त्याच्याकडे करण्यात येत आहे. याच लोणावळा ग्रामीण पोलिस ठाणे परिसरातून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी....0
0
Report
आशियाड कॉलनी में रानडुकर के हमले से बुजुर्ग की मौत, CCTV फुटेज में
Amravati, Maharashtra:मॉर्निंग वॉकला जाताय, सावधान! रानडुकराच्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू शहरातील आशियाड कॉलनी परिसरातील गोविंद पिंजरकर (वय ७५) बुधवारी पहाटे सव्वापाच वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. कॉलनीतील विघ्नहर्ता गणपती मंदिरासमोरील मोकळ्या जागेतून अचानक आलेल्या रानडुकराने त्यांच्यावर भीषण हल्ला चढवला. हा हल्ला इतका भयानक होता की डुकराने पिंजरकर यांच्या संपूर्ण अंगावर चावे घेतले. या जीवघेण्या हल्ल्यात त्यांना आपला एक बोटही गमावावे लागले. त्यांना लगेच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.0
0
Report
सिद्धार्थ खरात की पोस्ट से राजनीति में हलचल, ऑपरेशन टायगर पर नया मोड़
Buldhana, Maharashtra:आमदार सिद्धार्थ खरातांच्या 'हमे याद रखना' पोस्टने वाढवला संभ्रम.. जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण.. दोन दिवसांपासून सोशल मिडीयावर आमदार खरात यांची पोस्ट व्हायरल. पोस्टमुळे 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेला नवा रंग.. Ancjor - बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.. त्यांनी 'हमें याद रखना, हमें याद करना, कोई सितम आए, चेहरे याद रखना' असा शेर लिहित उद्धवसेनेच्या दोन आमदारां सोबतचा फोटो शेअर केला आहे.. या छायाचित्रात बाळापूरचे ठाकरे यांचे आमदार नितीन देशमुख आणि उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील दिसत आहेत.. या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क- वितर्कांना सुरुवात झाली असून उद्धवसेनेच्या सहा खासदारांच्या 'ऑपरेशन टायगर' नंतर राज्यातील राजकारण आधीच ढवळून निघाले असताना, आता काही आमदारही त्याच मार्गावर असल्याच्या या पोस्टमुळे बळ मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.. मात्र या तिघांच्या भेटीचा नेमका उद्देश काय होता, याबाबत कोणतेही अधिकृत माहिती समोर आली नाही.. दरम्यान, आमदार नितीन देशमुख यांनी यापूर्वीच 'मातोश्री'प्रती आपली निष्ठा स्पष्टपणे दाखवून दिली, तर कैलास पाटील हे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी मानले जातात.. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सेनेला आणखी धक्के देणार असल्याचे वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार खरात यांच्या या पोस्टमुळे राजकीय संभ्रम अधिक वाढला आहे.. एव्हढे मात्र निश्चित ..0
0
Report
Advertisement
सावंतवाड़ी में तेज बारिश से किसानों में खुशी, गर्मी से मिली राहत
Oras Bk., Maharashtra:अँकर —--- सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस दडी मारलेल्या पावसाने अखेर सावंतवाडीत दमदार पुनरागमन केले आहे. सकाळपासून उन्हाळ्या सारखे वातावरण असताना अचानक दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. या मुसळधार सरींमुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असून, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशाही पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. मात्र जिल्ह्याच्या इतर भागात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी कडकडीत ऊन पडलेल दिसून येत. भातशेतीसह खरीप हंगामातील कामांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेले दोन दिवस पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर झालेल्या या दमदार पावसामुळे सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागात पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
जंगलना-खत टंचाई: किसान परेशान? डीएपी-यूरिया की कमी पर सरकार एक्शन लेle
Jalna, Maharashtra:जालना : जालना,हिंगोली,परभणी जिल्ह्यात खतांची टंचाई,डीएपी,युरीया मिळत नसल्यानं शेतकरी हतबल(पॅकेज) खतांचं लिंकिंगही होत असल्याच्या तक्रारी अँकर :मराठवाड्यातील जालना,परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या काळात खत टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागतंय.तर काही ठिकाणी खतांचं लिंकिंग होत असल्याचं समोर आलंय.बघूया यावरचा स्पेशल रिपोर्ट व्हिओ:०१: मराठवाड्यात तीन दिवसांपूर्वी चांगला pाऊस झालाय.त्यामुळे शेतकरी पेरणी आणि लागवडीच्या कामात गुंतलाय.मात्र ज्या पिकांच्या पेरणीसाठी डिएपी आणि युरीया खतांची आवश्यकता आहे त्याच खतांची सध्या जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात टंचाई असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. बाईट : किसन गिते, शेतकरी,हिंगोली (पाठीमागे दुकानचा बोर्ड) बाईट : भरत उंडे, शेतकरी(पांढरा शर्ट, खांद्यावर रुमाल,) बाईट : प्रकाश सुरवसे,शेतकरी, जालना(पिवळा शर्ट) व्हिओ ग्राफिक्स :०२: परभणी : १६ हजार टन कमी पुरवठा परभणी जिल्ह्यात सरासरी खतांचा वापर १ लाख १२ हजार ११ टन आहे. त्यानुसार खरिपातील गरज लक्षात घेऊन एप्रिल ते ग्रेडच्या १ ७७ हजार सप्टेबर कालावधीसाठी विविध खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे नोंदविली होती. मागणीच्या तुलनेत १६ हजार ६५० टन कमी खते मंजूर झाली आहेत. युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश, डीएपी ही खते कमी तर कमी तर संयुक्त खते जास्त मंजूर झाली आहेत. जालना : डीएपीसोबत युरिया घेण्याची शेतकऱ्यांना सक्ती जालना जिल्ह्याला ३ लाख ०९ हजार ११९ मेट्रीक टन खताची गरज असून २लाख ०९ हजार २४१ मेट्रीक टन साठा उपलब्ध आहे. सध्या प्रामुख्याने युरिया, डीएपी या खतांचा तुटवडा जाणवतो आहे. तसेच खतांची लिंकिंग होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. २ हजार २०० रुपयांच्या डीएपीसोबत ७३० रुपयांचे सल्फर किंवा ५५० रुपयांचा लिक्विड युरिया दिला जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. हिंगोली : मागणी वाढल्याने डीएपी खताची सध्या टंचाई जिल्ह्यात डीएपी खताची टंचाई असून सध्या युरिया व संयुक्त खते मुबलक उपलब्ध आहेत. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सरासरी ८१ हजार मेट्रीक टन खतांचा वापर केला जातो. त्यानुसार कृषी खात्याने ९० हजार हेक्टरसाठी मागणी नोंदवली होती. आयुक्त कार्यालयाने ९८ हजार मेट्रीक टनाचे आवंटन मंजूर केले आहे. मात्र कृषी केंद्र चालकाकडे डीएपी आणि युरीया उपलब्ध नसल्यानं सरकारने डीएपी खतांचा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी कृषी केंद्र चालकांनी केलीय. बाईट : बाईट - हरीश झंवर,कृषी केंद्र चालक,हिंगोली(लायनिंग शर्ट) व्हिओ :3: दरम्यान जालना जिल्ह्यातील खत टंचाई बरोबरच खतांच्या लिंकींग वरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीय. कृषी विभागाने साठे बाजी करणाऱ्यावर कारवाई न keल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना खतांच्या गोडाऊनवर धाडी टाकून आंदोलन करेल असा ईशारा स्वाभिमानीने दिलाय. bाईट :सुरेश काळे,जिल्हाध्यक्ष ,स्वाभिमानी शेतकरी संघटना, जालना(पांढरा लायनिंग शर्ट, थोडं टक्कल असलेले) व्हिओ :०4: ऐन पेरणीच्या हंगामात डीएपी आणि युरीया ही महत्वाची खते मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर पेरणी करावी कशी असा प्रश्न उभा राहिलाय.शेतकरी खत टंचाईमुळे हतबल झालाय. END0
0
Report
कडगांव में मोहरम जुलूस, हिंदू-म muslim ऐक्य की गगनचुंबी ताबूत भेटी
Sangli, Maharashtra:कडगांव, सांगली में हिंदू- मुस्लिम ऐक्य का प्रतीक मोहरम का जुलूस बड़े उत्साह के साथ मनाया गया। इस अवसर पर गगनचुंबी 100 फुट ऊँचे लकड़ी के ताबूतों की भेटी का समारोह आयोजित हुआ। बाराबलुतेदारों द्वारा कडेगांव में मोहरम और ताबूत भेटी का समारोह सदियों से चला आ रहा है; इस वर्ष भी बड़े उत्साह के साथ यह समारोह सम्पन्न हुआ। हजारों भक्त कडेगांव पहुंचे। इसका अवलोकन हमारे सांगली प्रतिनिधि सरफराज सनदी ने किया।0
0
Report
Advertisement
