icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सांगली में गणेशोत्सव-दहीहंडी के दौरान डॉल्बी-डीजे पर पाबंदी और लेज़र लाइट प्रतिबंध

Sangli, Maharashtra:स्लग - आगामी गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवामध्ये डॉल्बीसह लेझर लाईटवर निर्बंध.. अगणकर सांगली जिल्ह्यात दहीहंडी आणि आगामी गणेशोत्सवामध्ये प्लाजमा,लेझर लाईटवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच डॉल्बी,डीजेच्या आवाजावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी गणेशोत्सव व दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सामाजिक संघटना, गणेशोत्सव मंडळांची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, महापौर यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये आगामी सण-उत्सवामध्ये मिरवणुकी दरम्यान नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असणाऱ्या डॉल्बी,डीजे यांच्या आवाज मर्यादेवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत, तसेच प्लाजमा,लेझर लाइट,लेझर बीम,शार्पि वापरावर निर्बंध असणार असल्याचे स्पष्ट करत नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
0
0
Report

आदित्य ठाकरे के उपोषण से महाराष्ट्र सरकार पर दबाव बढ़ा; पुणे में आंदोलन तेज

Nashik, Maharashtra:आदित्य ठाकरे Byte point - उपोषणाला बसलेले आहे बाकी सगळे ताकत द्यायला आलो आहे - त्यांच्या काही खूप मोठ्या मागण्या नाही - मुख्य मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे - सरकारकडून टोलवाटोलवी केली जात आहे - अगदी साध्या मागण्या आहे - राहुलजी यांनी देखील काल आदिवासी उपोषणाला पाठिंबा काल दिला आहे - पुण्यात देखील असे आंदोलन सुरू होते सरकारने उठवले - रस्ते बघा, कारभार बघा,काय चालले आहे - उपोषण करून कोणी मरत असेल तर या सरकार ला काही फरक पडत नाही On पुणे रिल स्टार - ते खूप मोठे सामाजिक कार्य करत आहे - कायद्यानुसार काय काम कसे असले पाहिजे ते ते दाखवत असतात - आता काय त्यांच्या घरी NIA पाठवणार आहे का On बापट मारहाण - dj वरूनच चर्चा ते करत आहे ,dj लावले पाहिजे की नाही - अनेक या गोष्टींवर चर्चा केली पाहिजे - समृद्धीवर दरोडे पडत आहे - हे काय चालले आहे - देशात काय चालले आहे On नवनीत राणा - त्यावर नको - प्रत्येक शहरात काही गोष्टी मान्य असतात काही मान्य नसतात - सर्वांनी मिळून जो निर्णय घेतला तो मान्य असला पाहिजे - मुंबईत देखील अनेक काही ठराविक मतदार संघात बळच dj लावला जातो त्रास देण्यासाठी - काही लोकांच्या सांगण्यानुसार Dj लावण्यात येतो On राम मंदिर - चंदा चोरी झाली ही तुम्ही मान्य केले आहे - मंदिराच्या बॉडीवर माणसे नेमली कोणी - मिश्रा , चंपत राय यांची नेमणूक कोणी केली होती - अनेक हिंदूंची त्या मंदिराशी आस्था जोडलेली आहे - एवढी वर्ष लोक सांगत आहे चंदा चोरी होत आहे,तुम्ही CEO नेमत आहे - एक प्रकारे तूम्ही हे मान्य करत आहात की चंदा चोरी झालेली आहे - उपमुहुमनात्री आहे,तलाठकथाईत शिवसेनेचा वारसा पुढे. नेताही त्यांनी उत्तर द्यावे - नुसता आरक्षणाचा मुद्दा नाही,धनगर समाज आंदोलन करत आहे आदिवासी समाज आंदोलन करत आहे,महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यांनी आंदोलन सुरू आहे - आंदोलन करण्याची वेळ का आली - कारण हे सरकार प्रश्न सोडवू शकत नाही - शहर कोलमडली आहे गाव गोलमडली आहे - सुपर alnino येणार आहे ,कधी ही चर्चा मुख्यमंत्र्यांकडून ऐकले ka - मुख्यमंत्री फक्त राजकारण करत आहे - इन्फ्रास्ट्रक्टर collapse झाले आहे - मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेणार असे वाटत नाही - वेज नॉनव्हेज सारखे वाद भाजपच्या राज्यातच का होते - काही तरी मोठे घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.. - मी येऊन गेलो पाहणी करून गेलो,संजय राऊत यांनी देखील मोर्चा काढला - अनेक रस्ते तसेच आहे - कोपरी जवळ मोठे खड्डे आहे
0
0
Report

गेटवे ऑफ इंडिया के पास अन्वरी फेरी रुक गई; 38 यात्री सुरक्षित बचाए गए

Mumbai, Maharashtra:मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात समुद्रात फिरण्यासाठी गेलेली फेरीबोट अचानक बंद पडल्याने काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आज रात्री साडेआठच्या सुमारास ‘अन्वरी’ फेरीबोट गेटवे ऑफ इंडियापासून सुमारे दीड नॉटिकल मैल समुद्रात असताना अचानक बंद पडली. या बोटीवर 34 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर असे एकूण 38 जण होते. घटनेची माहिती कंट्रोल रूमकडून मिळताच बिट क्रमांक 1 चे पोलीस शिपाई अभिजित शिंदे आणि पोलीस नाईक गुरव यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेत मदतीसाठी जवळच्या बोटींचा शोध सुरू केला. यावेळी ‘आझाद हिंद’ फेरीबोट जवळ असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी बोटीचे मालक जुनेद मुल्ला यांच्याशी संपर्क साधून ‘आझाद हिंद’ बोटीच्या क्रू मेंबर्सना घटनास्थळी पाठवले. त्यानंतर ‘आझाद हिंद’ बोट तातडीने बंद पडलेल्या ‘अन्वरी’ बोटीपर्यंत पोहोचली आणि तिला टो करून रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी गेटवे ऑफ इंडिया जेट्टी क्रमांक 2 येथे सुखरूप आणण्यात आले. या घटनेत बोटीवरील सर्व 34 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे
0
0
Report
Advertisement

दहिसर में टैक्सी-रिक्शा मीटर मिलावट से यात्री ठगी: पांच गिरफ्तार

Mumbai, Maharashtra:मुंबईच्या दहिसरमध्ये टॅक्सी आणि रिक्षाच्या भाडे मीटरमध्ये तांत्रिक फेरफार करून प्रवाशांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दहिसर पोलिसांनी कारवाई करत पाच आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल पाच टॅक्सी-रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांना माहिती मिळाली होती की, टॅक्सी आणि रिक्षांच्या मीटरमध्ये LED रनिंग किटसारखे बनावट तांत्रिक डिव्हाइस बसवून मीटरमध्ये छेडछाड केली जात आहे. या माध्यमातून सामान्य प्रवाशांकडून अधिक भाडे आकारून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 1293/2026 अंतर्गत कलम 318(4) आणि महाराष्ट्र मोटार वाहन नियमांतील संबंधित कलम 145(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत जोएब देशमुख, अमीन पठाण, रियाझ शेख, नाजीर पटेल आणि आनंद कुमार राय या पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी पाच काळ्या-पिवळ्या टॅक्सी-रिक्षांसह मीटरमध्ये फेरफार करण्यासाठी वापरलेले LED सर्किट आणि इतर डिव्हाइस जप्त केले आहेत. सपोनि निलेश साळुंके यांच्या नेतृत्वाखाली गुंडा विरोधी पथकाने ही कारवाई केली असून, मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
0
0
Report

इंदापुर के वडापुरी में ससुराल के दमन से महिला ने आत्महत्या; तीन आरोपी गिरफ्तार

Rui, Maharashtra:सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या..... इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील धक्कादायक घटना.... विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी पतीसह सासू-सासरा तिघांवर इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील एका 21 वर्षीय विवाहित महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. सोनाली समाधान चंदनशिवे असं मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी थेट इंदापूर पोलीस स्टेशन बाहेर मोठी गर्दी केली. मयत सोनाली चंदनशिवे हिचे वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी पती समाधान उर्फ कार्तिक गौतम चंदनशिवे, सासरे गौतम नामदेव चंदनशिवे आणि सासू पार्वती गौतम चंदनशिवे या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर पोलिसांनी तात्काळ मयत सोनाली हिचा पती समाधान उर्फ कार्तिक चंदनशिवे आणि सासरा गौतम चंदनशिवे दोघांना अटक केली आहे. मयत सोनाली चंदनशिवे ही साडेपाच महिन्याची गर्भवती होती, सातत्याने तिला सासरी माहेरहून एक लाख रुपये हुंडा घेऊन ये यासाठी शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता या त्रासाला कंटाळून आज तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केले आहे असा आरोप मयत सोनालीचे वडील हनुमंत बनसोडे यांनी तक्रारीद्वारे केला आहे.
0
0
Report
Advertisement

एसीबी ने के-पश्चिम में 60 हजार रुपये रिश्वत लेते कर्मियों को रंगे हाथ पकड़ा

Mumbai, Maharashtra:मुंबई | अंधेरी पश्चिम मुंबई महापालिकेच्या के-पश्चिम विभागातील कनिष्ठ अभियंता आणि एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच एसीबीने लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. बेकरीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आणि महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी 60 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप दोघांवर आहे. एसीबीच्या माहितीनुसार, 50 वर्षीय बेकरी व्यावसायिकाकडे कर्मचारी विजय रमेश पाटील यांनी सुरुवातीला 70 हजार रुपयांची लाच मागितली होती. ही रक्कम स्वतःसह कनिष्ठ अभियंता निरवकुमार चुनीलाल जैसूर यांच्यासाठी मागण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर कनिष्ठ अभियंत Jaasir यांनी लाचेची रक्कम 60 हजार रुपयांवर ठरवल्याचे समोर आले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. के-पश्चिम विभागीय कार्यालयाच्या तळमजल्यावरील लिफ्टजवळ 60 हजार रुपये स्वीकारताना विजय पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तर कनिष्ठ अभियंता निरवकुमार जैसूर यांना त्यांच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. एसीबीने जैसूर यांच्याकडून दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. तर पाटील यांच्याकडून एक मोबाईल फोन आणि 40 हजार 820 रुपयांची रोकड मिळाली. तसेच त्यांच्या बॅगेतून तब्बल 2 लाख 37 हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.
0
0
Report

डीजे बंदी सवाल: सिर्फ हिंदू त्योहारों पर ही क्यों, नीति समानता पर उघड़े सवाल

Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - प्रवीण दटके, भाजप आमदार. - डीजे बंदीला विरोध नाही, परंतु फक्त हिंदूंच्या सणांवरच निर्बंध का? असा भाजप नेते तथा आमदाराचा प्रवीण दटके यांचा सवाल... - नागपूरात डीजे बंदीच्या पोलिस आयुक्तांच्या आदेशाच भाजपचे नेते संदीप जोशी यांनी स्वागत केलं.. तर दुसरीकडे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. - डीजे बंदीला आमचा विरोध नाही, मात्र हा आदेश फक्त हिंदूंच्या सणांच्या आधीच का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. - मारबत, बडग्या, पोळा, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवरच पोलिसांनी परिपत्रक काढल्याचा त्यांचा आरोप आहे. इतर -धर्मांच्या सणांच्या वेळी असा आदेश का काढला गेला नाही ? असा थेट सवाल त्यांनी पोलिस प्रशासनाला केला आहे. -- हे परिपत्रक एक जानेवारीला का काढले नाही ? 3 सप्टेंबरलाच परिपत्रक का काढले? चार,पाच सहाला दहीहंडी आहे म्हणून.. ऑक्टोबर महिन्यात गरबा नवरात्र आहे म्हणून... फक्त हिंदूंना त्रास देण्याकरता पोलीस प्रशासनाने परिपत्रक काढल्याचा आरोप -- एक जानेवारी 2027 पासून परिपत्रक काढले पाहिजे... आणि सरसकट जाती-धर्मांकरता असले पाहिजे --- कायद्याची अंमलबजावणी करायची असेल तर ती सर्व धर्मांच्या सणांना समान पद्धतीने लागू करा, अशी मागणी केली आहे. - फक्त हिंदूंच्या सणांना त्रास देण्यासाठी हे परिपत्रक काढलं असेल, तर ते आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. - तसंच, डीजेच्या आवाजाची मर्यादा तपासण्याला विरोध नसून पोलिसांनी ती सर्व ठिकाणी आणि सर्व सणांमध्ये समानपणे तपासावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. - पोलिस आयुक्तांनी हे परिपत्रक मागे घ्यावं, अशी मागणी करत भाजप आमदार दटके यांनी भाजप कार्यकर्ता, गणपती मंडळाचा सदस्य आणि हिंदू म्हणून आपली भूमिका मांडत असल्याचंही प्रवीण दटके यांनी स्पष्ट केलं.
0
0
Report

पंकजा मुंडे ने बुजुर्ग के साथ सेल्फी लेकर सबका दिल जीता

Kolhapur, Maharashtra:राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. दिवसभरातील विविध कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी त्या कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी दाखल झाल्या. यावेळी त्यांना भेटण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली होती. याचवेळी एक ज्येष्ठ नागरिक पंकजा मुंडे यांच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना फोटो काढताना होत असलेली धडपड पाहून पंकजा मुंडे यांनी स्वतः पुढाकार घेतला. पंकजा मुंडे यांनी त्या ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल स्वतःच्या हातात घेतला आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढला. मंत्र्यांनी दाखवलेल्या या आपुलकीमुळे ज्येष्ठ नागरिकाच्या चेहऱ्यावरही आनंद दिसून आला.
0
0
Report
Advertisement

नोव्हेंबर 2026 तक धार्मिक आयोजनों पर बैन: आयुक्त के आदेश पर राजनीतिक घमासान

Nagpur, Maharashtra:बाईट संदीप जोशी माजी आमदार व माजी महापौर (प्रवीण दटके-DJ परिपत्रक) मी अध्यादेश अत्यंत बारकाईने वाचला आहे... त्याच्यात गणेशोत्स्व असो की ताजुद्दीन बाबांचे उरूस असो आणि इतर समाजाचे जे काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमांवर एक नोव्हेंबर 2026 पर्यंत बंदी टाकली आहे. माझी अनौपचारिक काही जणांशी चर्चा झाली आयुक्तांना 60 दिवसांसाठीच अध्यादेश काढण्याचा अधिकार असतो... त्यानंतर पुन्हा रिनेवल होईल त्यावेळेस इतर धर्मियांचे सण असतील त्यांच्यावर लागू होईल. *त्यांनी शेण खाल्लं म्हणून मी पण शेणखाईल ही भूमिका अयोग्य आहे*. प्रवीण जी आमचे आमदार आहेत जेष्ठ नेते आहेत..त्यांनी जी भूमिका घेतली ती त्यांच्या दृष्टीने योग्य असावी
0
0
Report

गडचिरोली पुलिस ने 50 आत्मसमर्पित नक्सलियों का पुनर्वास हेतु जिलों में विदाई समारोह आयोजित किया

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद आता संपुष्टात आला असून पोलीस दलाच्या अभिलेखावर एकही सशस्त्र माओवादी शिल्लक नाही. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी नक्षल विरोधी अभियानांसोबतच शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून 819 नक्षलवाद्यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला. यापैकी एकूण 50 आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्रात परत पाठविण्यात येऊन त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. आत्मसमर्पणानंतर या सदस्यांचे समाजाच्या मुख्य प्रवाहात पुनर्वसन व्हावे यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणानुसार त्यांना विविध लाभ देण्यात आले आहेत. यामध्ये आर्थिक सहाय्य, आवश्यक शासकीय व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता तसेच पुनर्वसनासाठी विविध रोजगार, स्वयं रोजगार, प्रशिक्षणाचा लाभ यांचा समावेश आहे.  गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून या पुनर्वसन कालावधीत केवळ प्रशासकीय प्रक्रिया न राबवता आत्मसमर्पित सदस्यांना नवीन ओळख, आत्मविश्वास, कौशल्य आणि सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आला. त्यांच्या आरोग्य व शारीरिक क्षमतेकडे विशेष लक्ष देण्यात आले. ऑपरेशन रोशनी अंंतर्गत नेत्रोपचार शिबीरे व नसबंदी री-ओपनिंग सारखी आवश्यक शस्त्रक्रिया, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन आणि सामाजिक समावेशन, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ध्यान, योग, शिबीरे आयोजीत करण्यात आले. तसेच प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून आतापर्यंत सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करुन 46 आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले. 88 आत्मसमर्पित नक्षल्याना कंपनीत कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
0
0
Report

पुलिस ने पर्यावरण बैठक में जाने से रोका राजू शेट्टी, फिर अनुमति मिली

Kolhapur, Maharashtra:पर्यावरण संदर्भातल्या बैठकीत जातताना राजू शेट्टीना अडवलं पोलिसांनी. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहे. आज सायंकाळी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापुरातील पर्यावरण प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आले. मात्र पोलिसांनी राजू शेट्टी यांना बैठकीत जाण्यास सुरुवातीला अडवणूक केली. काही काळ राजू शेट्टी यांनी पोलिसांमध्ये चर्चा झाल्यानंतर राजू शेट्टी यांना बैठकीला सोडण्यात आला.
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर-गडचिरोली में 80% स्थानीय रोजगार के लिए रोजगार हक महामोर्चा, 7 सितम्बर

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक लोकाधिकार सेनेच्या वतीने स्थानिक भूमिपुत्रांना जिल्ह्यातील विविध उद्योगात 80 टक्के रोजगारासाठी 7 सप्टेंबर रोजी रोजगार हक्क महामोर्चाचे आयोजन अँकर:-- चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक लोकाधिकार सेनेच्या वतीने जिल्ह्यातील विविध उद्योगांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना 80 टक्के रोजगार मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर 07 सप्टेंबर रोजी रोजगार हक्क महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक लोकाधिकार सेनेच्या प्रमुख गोमती पाचभाई यांच्या नेतृत्वात हा महामोर्चा शहरातील गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. चंद्रपूर जिल्हा कोळसा- वीज -खनिज संपत्ती आणि मोठ्या उद्योगांनी समृद्ध असलेला जिल्हा आहे. मात्र इथले सुशिक्षित बेरोजगार स्थानिक भूमिपुत्र रोजगारासाठी संघर्ष करत अन्य राज्यांमध्ये स्थलांतर करत आहेत. स्थानिक कारखान्यांमध्ये परप्रांतीयांना प्राधान्य दिले जात असून आपल्याच मातीतील तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोਸळत आहे. या विरोधात हा महामोर्चा आयोजित केला असून मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी 88 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनासोबत स्थानिक लोकाधिकार सेनेच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक देखील आयोजित करण्यात आली आहे. बाईट १) गोमती पाचभाई, अध्यक्ष, स्थानिक लोकाधिकार सेना आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

नवी मुंबई के प्रथम संदर्भ अस्पताल में मरीज की मौत, तीन स्टाफ निलंबित

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी इथल्या प्रथम संदर्भ रूग्णालयात एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत रूग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. परिसेविका गीता केणी, सुरभी मोडसकर, फार्मसिस्ट दिपक नलावडे अशी या तिघांची नावं आहेत. महापालिका रूग्णालयात 31 ऑगस्ट रोजी 50 वर्षीय गोपीराम खडसे या रूग्णाला मलेरिया च्या उपचारा साठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर मुदत संपलेलं सलाईन रूग्णाला दिल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. रूग्णांची प्रकृती चिंताजनक झाल्यावर त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज सकाळी रूग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांनी दिली. तसेच हा रुग्ण मलेरियाच्या उपचारा साठी दाखल केले होते, जेव्हा महापालिका रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्यांना मुदत संपलेले सलाईन चढवले त्यानंतर त्यांना त्रास झाल्याने फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मद्ये शिफ्ट झाल्यावर त्यांच्या सर्व टेस्ट केल्यावर मेंदू मधील मलेरिया दाखवण्यात आला होता,यामुळे ते गंभीर आजारी असल्याचे समोर आले असल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी सगीतेल.
0
0
Report

किसानों का अहिल्यानगर जलसंपदा में वांबोरी चारी टप्पा-2 को शामिल करने का अर्धनग्न उपवास

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई गावचा वांबोरी चारी टप्पा दोन मध्ये समावेश करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अहिल्यानगर जलसंपदा कार्यालयासमोर अर्धनग्न उपोषण सुरू केले आहे...संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे...शिंगवे तुकाई गावाचा वांबोरी चारी टप्पा दोन मध्ये समावेश करावा या मागण्यासाठी मागच्या सहा वर्षांपासून गावातील ग्रामस्थ आणि शेतकरी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करत आहेत मात्र जलसंपदा विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी आणि नागरिकांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top