icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सुर्या जलप्रकल्प की मुख्य जलवाहिनी फूटते ही वसई-विरार में पानी संकट गहरा

Vasai-Virar, Maharashtra:वसई-विरार पाणीपुरवठा करणारी सुर्या प्रकल्पाची जलवाहिनी फुटली 50 फुटांपर्यंत उंच उडाला पाण्याचा फवारा मुख्य जलप्रवाहाची कुंडी बंद होईपर्यंत लाखो लीटर पाणी वाया भर उन्हाळ्यात वसई-विरारवर जलसंकटाचे सावट पुढील काही दिवस पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता ANC : वसई-विरार महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या सुर्या प्रकल्पाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने मोठी गळती होऊन भर उन्हाळ्यात नागरिकांसमोर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. मुंबई- अहमदाबाद दिल्ली महामार्गावरील खानिवडे येथे जुन्या टोल नाक्याजवळ, विराम हॉटेलसमोर सोमवारी रात्री साडेडहा ते 11 वाजण्याच्या सुमारास ही जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड दाबाने तब्बल ५० फुटांपर्यंत उंच फवारा उडत होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या पाणी विभागाला सतर्क करण्यात आले असून दुरुस्तीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र मुख्य जलप्रवाहाची कुंडी बंद होईपर्यंत लाखो लीटर पाणी वाया गेले. फुटलेल्या जलवाहिनीतून बाहेर पडलेल्या पाण्यामुळे आजूबाजूच्या शेती भागात अक्षरशः पाणी साचले होते. आधीच वाढत्या उकाड्याने हैराण झालेल्या वसई-विरारकरांसाठी ही घटना मोठी चिंतेची ठरत असून पुढील काही दिवस पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

बागलाण में शराब छुड़ाने वाले बाबा: दो युवकों की संदिग्ध मौत, वजह क्या?

Nashik, Maharashtra:नाशिक के बागलाण तालुक्यातील तिळवण येथील कळवण रस्त्यावरील बारी परिसरात दोन युवकांचे मृतदेह संशयास्पदरीत्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. दोघांच्या मृतदेहाजवळ रस्त्याच्या कडेला त्यांच्या दुचाकीही आढळली. सकाळी शवविच्छेदनानंतर दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. याप्रकरणी सटाणा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. तालुक्यातील कंधाणे येथील राजेंद्र लक्ष्मण सोनवणे (४३) व निकवेल येथील सचिन केशव जाधव (३९) हे दोघे मित्र होते. एकाचवेळी दोघांचा मृत्यू झाल्याने हा विषबाधेचा प्रकार असावा, असा संशय व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांना समजताच घटनास्थळी आंदोलनेपासन मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. सकाळी शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यांचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला. त्या अहवालानुसार मृत्यूचे नेमके कारण ठरणार आहे असे तपास अधिकारी सांगतात. या दोघा तरुणांना मद्याचे व्यसन होते. त्यामुळे तालुक्यातील एका मांत्रिकाकडे ते व्यसनमुक्तीसाठी गेले होते, असे ग्रामस्थांनी सांगितले. परत येत असतानाच बारीत दोघांवर मृत्यू ओढवला. यातील एकाच्या तोंडातून रक्त आल्याचे दिसून आले. तेव्हा ग्रामस्थांनी तसेच मयत तरुणांच्या नातेवाईकांनी आरोप करत दारू सोडणाऱ्या बाबा वर कारवाई करावी अशी तक्रारी सटाणा पोलिसांना दिली. दरम्यान नाशिक जिल्ह्यात भोंदू बाबांचे कांड थांबता थांबेना झाले असून या प्रकरणातील संशयाची सुई दारू सोडणाऱ्या बाबीकडे जात असल्याची चर्चा आहे. या प्रकरणाची पुढील माहिती पोलिस तपास externally प्राप्त होत आहे.
0
0
Report
Advertisement

कोकण के मछुआरों को तूफानी मौसम से भारी नुकसान, सरकार से तत्काल सहायता की मांग

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणातील मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच दक्षिणेकडील वाऱ्याने मच्छीमारांच्या अडचणीत भर टाकली आहे. वारंवार निर्माण होणाऱ्या वादळसदृश्य परिस्थितीमुळे समुद्रात जाणे धोकादायक बनले असून अनेक बोटी किनाऱ्यावरच थांबल्या आहेत. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असलेल्या मच्छीमारांना यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे. पावसाळ्यापूर्वीची शेवटची कमाईही हुकल्याने मच्छीमार बांधव चिंतेत सापडले आहेत. आता शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी कोकण किनारपट्टीवरून जोर धरू लागली आहे.
0
0
Report

कोल्हापुर में ई-चलान के विरोध में ट्रांसपोर्टरों का उग्र प्रदर्शन, दंड माफ़ी की मांग

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरात ई-चलन विरोधात वाहतूकदार आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाकडून वाहनांवर आधीच विविध प्रकारचे कर लावले जात असताना, ई-चलनाच्या माध्यमातून अन्यायी आणि जुलमी पद्धतीने दंड वसूल केला जात असल्याचा आरोप वाहतूकदारांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. ई-चलनामुळे वाहनचालक आणि वाहतूक व्यवसायिक आर्थिक संकटात सापडत असल्याचा दावा आंदोलकांनी केला. सरकारने तात्काळ सर्व प्रलंबित ई-चलन दंड माफ करावेत, तसेच ई-चलन प्रणाली कायमस्वरूपी बंद करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे..
0
0
Report

हरदडा फाटा—पुसद रोड पर काम गति दें, नागरिकों ने किया रास्ता रोको

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यातील हरदडा फाटा ते पुसद रस्त्याचे संथ गतीने सुरू असलेले काम त्वरित पूर्ण करावे या मागणीसाठी ढाणकी येथील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. हरदडा फाटा ते उमरखेड- पुसद रस्त्याचे काम मंद गतीने होत आहे. ज्याचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे आंदोलकांनी स्थानिक आमदार व बांधकाम विभागा विरुद्ध घोषणाबाजी केली.हरदडा फाटा येथे तब्बल दोन तास नागरिकांनी रस्ता रोखून धरल्या नंतर संबंधित कंपनी च्या अधिकाऱ्यांनी कामाला गती देऊन ते लवकरात लवकर पावसाळापूर्वी पूर्ण करू असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
0
0
Report
Advertisement

नालासोपारा में गटर की ढीली जाल से महिला गंभीर घायल, नगरपालिका पर नाराज़गी

Vasai-Virar, Maharashtra:*नालासोपाऱ्यात पालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना* *तुटलेल्या गटारात महिलेचा पाय अडकून गंभीर दुखापत* *नागरिकांच्या अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर महिलेचा पाय बाहेर काढण्यात यश* *संतप्त नागरिकांची पालिकेच्या निष्काळजी कारभारावर तीव्र टीका ANC : नालासोपाऱ्यातील जिजाई नगर परिसरात पालिकेच्या तुटलेल्या गटारामुळे एका महिलेला गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारावरील लोखंडी जाळी तुटलेल्या अवस्थेत असल्याने महिलेला त्याचा अंदाज न आल्याने तिचा पाय खोलवर अडकला. या दुर्घटनेत महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पालिकेच्या निष्काळजी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत, धोकादायक अवस्थेतील गटारे तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. ..
0
0
Report

वाशीम में तापमान 42.6°C: अगले दिनों में और गर्मी के संकेत

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची हजेरी लागल्याने तापमानात घट झाली होती. त्यामुळे नागरिकांना उकाड्या पासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आज पुन्हा तापमानात वाढ झाली; आज वाशीमचे कमाल तापमान ४२.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. तसेच पुढील काही दिवस तापमानात सातत्याने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, उन्हात बाहेर पडताना सतर्कता बाळगावी आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0
0
Report

रायगड़ महामार्ग पर पेट्रोल-डिझेल की कमी से कोकण में पर्यटकों को परेशानी

Chendhare, Maharashtra:रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर सीएनजीच्या तुटवड्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलचाही गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. नागोठणे ते खेडदरम्यान महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपांवर ही परिस्थिती आहे. त्यामुळे कोकणात पर्यटनासाठी निघालेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र वाढत्या मागणीच्या तुलनेत इंधनाचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे ज्या पंपांवर इंधन उपलब्ध होते, त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. वाहन धारकांना मर्यादित स्वरूपात पेट्रोल दिले जात आहे.
0
0
Report
Advertisement

मीरा-भाईंदर में दिव्यांग के साथ VIP ट्रीटमेंट पर पुलिस पर सवाल

Mira Bhayandar, Maharashtra:मीरा-भाईंदर ब्रेक मीरा-भाईंदर मधील भाईंदर वेस्ट पोलीस स्टेशन मध्ये आरोपीला 'व्हीआयपी' वागणूक मीरा भाईंदर मधील दिव्यांगाना करोडो रुपयाला चुना लावणाऱ्या पूनम गुप्ताला कोठडीऐवजी चक्क खुर्चीत बसवून 'व्हीआयपी' वागणूक दिल्याने प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष काजल नाईक यांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला सह six महिने तक्रार न घेतल्याने काजल नाईक यांनी दिव्यांगांसह ठाण्यात मांडला ठिय्या; आरोपीचे 'लाड' करणाऱ्या पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. आरोपी आणि पोलिसांच्या 'कम्फर्ट झोन'चा व्हिडिओ समोर आल्याने सामान्य जनतेतून खाकी वर्दीच्या धाकावर जोरदार चर्चा. अनेक दिव्यांगांना चुना लावणाऱ्या आरोपीला विशेष ट्रीटमेंट मिळत असेल, तर सामान्यांना न्याय मिळणार का? असा संतप्त सवाल.
0
0
Report

सांगली के कवठेमहांकाळ में चीनी बेदाणा प्रोसेसिंग यूनिट का पर्दाफाश

Sangli, Maharashtra:सांगली के कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची येथे चायना बेदाणा आयात करके प्रोसेसिंग करने का प्रकार उजागर हुआ है. सांगली के द्राक्ष बागायतदार संघ ने चीनी बेदाणा प्रोसेसिंग यूनिट का पर्दाफाश किया. अफगानिस्तान मार्गे चीन का बेदाणा भारत में ला कर अफगानीистан ट्रेडमार्क के तहत, कम दर पर विक्री करने का उद्योग शुरू था. तीर्थणकर बेदाणा प्रोसेसिंग यूनिट के स्थान पर अवैध रूप से बेदाणा पर प्रोसेसिंग हो रही थी, यह जानकारी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ की सांगली शाखा से मिली. इससे बाजार में बेदाणा दर चीनी बेदाणा के कारण गिर रहे हैं, परिणामस्वरूप महाराष्ट्र के द्राक्ष उत्पादक किसानों को बड़ा आर्थिक नुकसान हो रहा है.
0
0
Report
Advertisement

हिंदी में क्लिकबेट न्यूज़ हेडलाइन

Washim, Maharashtra:वाशीम शहराला पाणी पुरवठा करनाऱ्या एकबुर्जी प्रकल्पावर वरून वाशिम शहराला पाणी पुरवठा केल्या जातो.प्रकल्पातून पाणी उपसा व वाढत्या तापमानामुळे जल पातळीत झपाट्याने घट होत असल्यामुळे पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने कडक पाऊले उचलत प्रकल्पावरून शेती सिंचन करीत असलेले 60 मोटारपंप हटवत 5 मोटारपंप जप्त केल्याने प्रकल्पात पाणी पातळी कायम असल्याचं चित्र आहे.एरव्ही मे महिन्यात 13 ते 15 टक्के जल साठा असणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात सध्या 23 टक्के जल साठा असल्याने या कारवाईमुळे जुन महिन्याच्या शेवट पर्यंत पाणी पुरणार असल्याचे नगरपरिषद इकडून सांगण्यात आलं आहे.
0
0
Report

इंदापूर थाने में हंगामा: सात पर सरकारी काम में बाधा का मामला

Rui, Maharashtra:इंदापूर पोलीस ठाण्यात थरार.....पोलीस ठाण्यातच अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतत जोरदार गोंधळ......तक्रार नोंदवण्याच्या कारणातून घडली घटना.....इंदापूर पोलिसांनी दाखल केला सात जणांविरोधात Anchor_पुण्याच्या इंदापूर पोलीस ठाण्यात एक थारारक घटना घडली आहे. शेत जमिनीच्या वादातून इंदापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या काहींनी तक्रार दाखल करूनही दखल घेतली जात नाही यासोबत पोलिसांनी या प्रकरणात पैसे खाल्ले असा आरोप करत थेट अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी इंदापूर पोलीस आणि तब्बल सात जणांना विरोधात सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखलब केला आहे. 1) किरण गोफणे रा. तरंगवाडी इंदापुर 2) तानाजी सोपान सातपुते 3) राणी हनुमंत कनसे (तानाजी सातपुते यांची सासु) 4) तृप्ती तानाजी सातपुते 5) स्वप्नील सुभाष सातपुते (6) स्नेहल सुभाष सातपुते 7) कोमल सुभाष सातपुते सर्व रा. सातपुते वस्ती इंदापुर या सात जणांच्या विरोधात इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रार दाखल करण्यासाठी आलेले संबंधित सर्वजण ठाणे अंमलदार कक्षात घुसून जोरदार आरडाओरड करू लागले. यावेळी एका आरोपीने मोबाईलवर चित्रीकरण सुरू केले।गोंधळा दरम्यान काहींनी स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत परिस्थिती आणखी चिघळवली.तुम्हाला अत्ता इथेच पेटवून देतो अशी थेट धमकीही पोलिसांना देण्यात आली. परिस्थिती शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की शिवीगाळ केली शिवाय सरकारी कामात अडथळा निर्माण केला या आरोपाखाली इंदापूर पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
0
0
Report

पुणे-बारामती डेमो ट्रेन के चाक में आग, फौरी रोकथाम से बड़ा हादसा टला

Rui, Maharashtra:पुणे-बारामती डेमो ट्रेनच्या चाकाला आग पुणे-बारामती डेमो पॅसेंजर ट्रेनमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडी क्रमांक 71 411 च्या एका चाकाला अचानक आग लागल्याची घटना घडली. ही ट्रेन दररोज संध्याकाळी 6:54 मिनिटांनी पुण्यावरून सुटते. दरम्यान, प्रवासादरम्यान रात्री 9:30 सुमारास चाकातून धूर आणि ज्वाळा निघताना दिसल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित नागरिकांनी हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. ही घटना लक्षात येताच तत्काळ ट्रेनला पाटस रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आले. रेल्वे प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुढील तपास रेल्वे विभागाकडून सुरू आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top