icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

लातूर में पुलिस प्रताड़ना से महिला ने आत्महत्या, परिवार ने आरोपीयों से कार्रवाई की मांग

Latur, Maharashtra:लातूरच्या औसा तालुक्यातील नागरसोगा गावात धक्कादायक घटना घडली आहे... पोलिसांच्या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे... महिलेच्या आत्महत्येनंतर नातेवाईक आक्रमक झाले असून, दोषी पोलिसांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे... याच मागणीसाठी नातेवाईकांनी औसा पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे... सध्या हे आंदोलन सुरू असून, दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे. रात्रीपासूनच गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
0
0
Report

क्लस्टर मुद्दे पर शिंदे बनाम गणेश नाइक का संघर्ष तेज, बड़े घर का वादा

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत दहीहंडी निमित्त क्लस्टरचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घणसोली येथे आयोजित दहीहंडी उत्सवाला भेट देत तेथील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या क्लस्टर वर भाष्य केलेय. तुम्हाला हक्काची मोठी घरे दिल्याशिवाय एकनाथ शिंदे राहणार नाही. मोठं घर देण्याचं पुंण्याचं काम केलं पाहिजे. मोठं घर प्रत्येकाचं स्वप्न असतं ते पूर्ण करण्याचं काम महायुती सरकार करेल असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिलाय. त्यामुळे क्लस्टर वरून एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असा संघर्ष पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे.
0
0
Report

No hospital access on tough roads, now another woman’s death

Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिले के जळगाव जामोद तालुक्यात दुर्गम आदिवासी पाड्यावर पुन्हा एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यात सर्पदंश झालेल्या २५ वर्षीय सादुरी खरात यांना रस्ता नसल्याने झोळीतून उपचारासाठी न्यावं लागलं होतं. उपचाराला विलंब झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी रस्त्याअभावी मोठ्या अडचणींचा सामना केल्याचं सांगितलं. अखेर सादुरी खरात यांचा मृत्यू झाला. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच शालकीबाई सोलंकी या महिलेचा काल मृत्यू झाला. आजारी पडल्यानंतर शालकीबाई सोलंकी यांनाही रस्ता नसल्याने झोळीतूनच उपचारासाठी न्यावं लागल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. दोन घटनांनी या दुर्गम आदिवासी पाड्यावरील रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा प्रकार गावातच घडला असून आजारी व्यक्तीसाठी रुग्णवाहिका येत नाही कारण रस्ताच नाही. रुग्णाला वाहनातून नाही तर झोळीतून घेऊन जावं लागतं. मागील आठवड्यात सादुरी खरात यांच्या बाबतीतही हेच घडलं. सर्पदंश झाल्यानंतर उपचारासाठी त्यांना झोळीतून घेऊन जावं लागलं. आणि आता शालकीबाई सोलंकी यांच्या मृत्यूने ग्रामस्थांच्या चिंता आणखी वाढल्या आहेत. आजारी पडल्यावर वेळेत उपचार मिळतील का? नेहमी तेच तेच होत असल्याने ग्रामस्थांची निराशा स्पष्ट होती. आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा सवाल मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांचा बोर्ड इथे आहे. प्रत्यक्षात वाहन जाईल असा रस्ता कुठे आहे? जर रस्ता पूर्ण झाला असेल तर तो दिसत का नाही? आणि जर रस्ता पूर्ण झालेला नसेल तर रस्ता झाल्याचा बोर्ड इथे कसा? नामांतरानंतरही रस्ता असा का दिसत नाही? सादुरी खरात असोत किंवा शालकीबाई सोलंकी—नावं वेगळी आहेत, घटना वेगळ्या आहेत—पण प्रश्न एकच आहे—रस्ता! कारण रस्ता नसेल तर रुग्णवाहिका पोहोचणार कशी? रुग्णालय वेळेत गाठणार कसं? वेळेत उपचार मिळणार कसे?
0
0
Report
Advertisement
Advertisement

दहीहंडी उत्सव में बिना अनुमति डीजे बजाने पर चार गिरफ्तारी

Rui, Maharashtra:दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग... विनापरवाना डीजे वाजवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या ४ जणांविरुद्ध माळेगांव पोलिसात गुन्हा दाखल केला. माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत काही इसमांनी एकत्रितपणे दहीहंडी संघ जमवून विनापरवाना डीजे वाद्य वाजवून तसेच चिथावणीखोर स्वरूपाची गाणी वाजवून एकमेकांना खुन्नस देत सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचे निदर्शनास आले. यावरून ४ जणांविरुद्ध माळेगांव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामध्ये डीजेची दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत....
0
0
Report
Advertisement

हिंदू उत्सवों के दौरान डीजे पर लगी बंदिश पर सांसद संग्राम जगतاپ ने सवाल उठाए

Ahilyanagar, Maharashtra:हिंदूंचे सण हे केवळ दोन-तीन तासांचे आनंदोत्सव असतात. मात्र, काही लोक जाणीवपूर्वक अपप्रचार करून आपल्याच लोकांना चिथावण्याचे आणि उत्सवांवर गदा आणण्याचे काम करत आहेत," असा आरोप अहिल्यानगर येथील आमदार संग्राम जगताप यांनी केला. दहीहंडी उत्सवातील भाषणा दरम्यान साऊंड सिस्टीमवरील बंदीच्या मुद्द्यावरून संग्राम जगताप यांनी प्रशासकीय यंत्रणा आणि विरोधकांवर टीका केली. वर्षभरात गणपतीचे १० दिवस, नवरात्रीचे ९ दिवस आणि दहीहंडीच्या काही तासांसाठीच हे साऊंड वाजतात. मग त्यावरच एवढा आक्षेप का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "रात्री १० वाजताच खाकी वर्दीवाले येऊन सिस्टीम बंद करायला सांगत असतील, तर आपण कायदा पाळतोच; पण हिंदू सणांच्या वेळीच असा त्रास का दिला जातो? त्यामुळे जनतेने यापुढे हिंदू परंपरेला आणि सणांना विरोध करणाऱ्यांना उघडे पाडण्याचे आवाहन करत संग्राम जगताप यांनी केलंआहे.
0
0
Report

हिंगोली के सेनगांव में खेत-झगड़े में दो गुट भिड़े, वीडियो में महिलाएं मारपीट करती दिखीं

Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वझर खुर्द येथे शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांवर सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारहाणीचा व्हिडिओ सध्या समोर आला असून फवारणीचे ट्रॅक्टर शेतीच्या धुऱ्यावरून नेण्याच्या कारणावरून हा वाद झाला आहे या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आला असून व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत. तसेच, एका महिलेच्या हातात शस्त्र असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येत या घटनेनंतर सेनगाव पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल झाले आहेत.
0
0
Report
Advertisement

मनमाड में सर्पदंश से 11 वर्षीय बच्चे की दर्दनाक मौत

Nashik, Maharashtra:सर्पदंशाने 11 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू...\nमनमाडच्या अमरधाम परिसरातील घटना..\nअरुण सुनील पवार असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव..\nसर्पदंशाने अरुण सुनील पवार या अकरा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या मनमाड मध्ये घडली.अमरधाम परिसरात राहणाऱ्या अरुण शाळेत घरी परतल्यानंतर पलंगावर असलेल्या सर्पाने त्याला दंश केले. त्याला उपचारासाठी मालेगाव येथे नेत असतांना रस्त्यात त्याची प्राणज्योत मावळली.मयत अरुण इयत्ता 5 वी शिकत होता .शाळेत हुशार आणि गुणी होता. त्याच्या आकस्मित निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
0
0
Report

हिंदू त्योहारों की आवाज़ पर रोक नहीं: योगेश कदम ने बापट को दिया सीधा चैलेंज

Ratnagiri, Maharashtra:दापोली - रत्नागिरी हिंदू सणांचा आवाज बंद होणार नाही; विद्याआनंद बापट यांच्या वक्तव्यावर योगेश कदम यांचं थेट आव्हान.. हिंदू सणांमधील ध्वनिप्रदूषणावरून पुण्यात विद्याआनंद बापट यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद पेटला आहे.. यावर खेडमधील दहीहंडी उत्सवातून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बापट यांना थेट आव्हान दिले आहे.. "हिंदू सण आणि उत्सव परंपरेनुसार उत्साहातच साजरे होणार, त्यांचा आवाज कोणीही बंद करू शकत नाही," अशी ठाम भूमिका कदम यांनी मांडली असून,त्यांच्या या वक्तव्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.. बाईट मंत्री योगेश कदम..
0
0
Report

वाशीम में रानभाजी खाद्य महोत्सव में 23 प्रकार की रानभाज्यें प्रदर्शित

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर: पारंपरिक आहारपद्धती, स्थानिक जैवविविधता आणि रानभाज्यांचे पोषणमूल्य विद्यार्थ्यांना समजावे, यासाठी वाशिमच्या कामरगाव येथील पीएम.श्री.जिल्हा परिषद विद्यालयात रानभाजी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात तब्बल २३ प्रकारच्या पावसाळी रानभाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले, तर त्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध पारंपरिक पदार्थांचेही सादरीकरण करण्यात आले. मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात कर्टुले, शेवगा, अंबाडी, चवळी, सुरणकंद, अळू, समुद्रशोक, केना आणि चमकोरा यांसह विविध रानभाज्यांचा समावेश होता. ज्वारी-बाजरीच्या भाकरी, धपाटे, अंबाडीची भाकर, शेवगा व समुद्रशोकबिर्याणी, तसेच करवंद, चिंच आणि पुदिन्याच्या सरबताचा उपस्थितांनी आस्वाद घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पारंपरिक आहारपद्धतीसोबतच स्थानिक रानभाज्यांचे महत्त्व आणि त्यांचे पोषणमूल्य जाणून घेण्याची संधी मिळाली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top