icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी में सर्पदंश से ठेकेदार कर्मी की मौत, भाजपा ने 5 लाख की मदद दी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत सर्पदंशाने निधन झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला भाजपची ५ लाखांची मदत.. रत्नागिरी नगर परिषदेच्या उद्यान विभागातील कंत्राटी कर्मचारी काशीनाथ गोताड यांचं गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर साफसफाई करताना सर्पदंश होऊन दुर्दैवी निधन झालं.. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.या घटनेची दखल घेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार,भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे आणि शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी गोताड कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.. तसेच भाजपकडून ५ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.
0
0
Report

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर में ऑनलाइन नोंदणी 3 अगस्त से शुरू

Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी नित्य पूजा, पाद्य पूजा , तुळशी अर्चन पूजा और महा नैवद्य सहभाग योजनेसाठी 3 ऑगस्ट पासून ऑनलाइन नोंदणी सुरू होणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कडून भाविकांसाठी नित्य पूजा , पाद्य पूजा , तुळशी अर्चन पूजा, आणि महानैवद्य सहभाग योजना उपलब्ध करून देण्यात येत आहे. 04 ऑगस्ट ते 31 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या पूजांची नोंदणी 3 ऑगस्ट सकाळी 11 वाजल्या पासून https://www.vitthalrukminimandir.org या संकेत स्थळावर सुरू होणार आहे. भाविकांनी इतर कोणत्याही व्यक्तीच्या आमिषाला बळी न पडता अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन नायब तहसीलदार प्रवीणकुमार घम यांनी केले आहे
0
0
Report

इचलकरंजी महापालिका में 22 करोड़ घनकचरा ठेकों को लेकर भाजपा गुटों की खुली जंग

Kolhapur, Maharashtra:इचलकरंजी महानगरपालिकेतील भाजपमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येऊ लागलाय. आमदार राहुल आवाडे गट आणि माजी आमदार सुरेश हळवणकर गट यांच्यातील सुप्त संघर्ष आता महापालिकेच्या कारभारावरच परिणाम करत असल्याचं चित्र आहे. तब्बल 22 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या ठेक्यावरून दोन्ही गट आमनेसामने आले असून, आता हा वाद थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात पोहोचणार आहे. इचलकरंजी महानगरपालिकेत भाजपचे सत्ताधारी आवाडे गट आणि हळवणकर गट एकमेकाच्या विरोधात. 22 कोटींच्या घनकचरा ठेक्यावरून संघर्ष तीव्र आयुक्त पल्लवी पाटील यांच्या कारभारावर हळवणकर गटाचे गंभीर आरोप, आयुक्तांची बदली करण्याची हळवणकर गटाची मागणी आयुक्तांचे काम चांगले त्यांना कायम ठेवण्याची आवाडे गटाची भूमिका आवाडे आणि हळवणकर गटाचा वाद पोहोचला वरिष्ठापर्यंत. VO 1 :- इचलकरंजी महानगरपालिकेत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विशेष स्थायी समितीच्या बैठकीत 22 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रस्तावाला सत्ताधारी हळवणकर गटाच्या नगरसेवकांनी विरोध केला. त्यानंतर आवाडे गट आक्रमक झाला आणि दोन्ही गटांमधील मतभेद उघडपणे समोर आले. याच वादातून महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्यावरही राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. हळवणकर गटाने आयुक्त मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत त्यांच्या बदलीची मागणी केली. तर आवाडे गटाने शहराच्या विकासासाठी आयुक्तांचे काम समाधानकारक असल्याचे सांगत त्यांना कायम ठेवण्याची भूमिका घेतली. VO 2 :- वाद अधिक चिघळल्यानंतर हळवणकर गटाच्या मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत आयुक्तांविरोधातील तक्रारी मांडल्या. नगरसेवकांना वेळ दिला जात नाही, अवमानकारक वागणूक मिळते, विकासकामांमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही गटांना एकत्र बोलावून समन्वय साधण्याचे आश्वासन दिले . येत्या काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान या वादासंदर्भात बोलताना चंद्रकांत दादा पाटील यांनी, दोन जिवंत माणसे जिवंतपणे काम करतात.. झोपा काढत नाहीत. त्यावेळी काहीतरी असतं. त्यामुळे पेल्यातील वादळ पेल्यात संपेल असं सांगून या वादावर अधिकच भाष्य करणे टाळले. VO 3 :- इचलकरंजी महापालिकेतील हा वाद आता केवळ दोन गटांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो थेट राज्याच्या वरिष्ठापर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीच या प्रकरणात काय निर्णय घेतात आणि भाजपमधील हा अंतर्गत संघर्ष कसा मिटवला जातो, याकडे आता संपूर्ण इचलकरंजीकरांचे लक्ष लागले आहे. पण या संपूर्ण राजकीय संघर्षात शहराचा मूळ प्रश्न मागे पडल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
0
0
Report
Advertisement

नितेश राणे के बयान पर मोदी-शाह के साथ संजय राऊत पर तीखी बहस

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, मंत्री नितेश राणे ऑन महसूल दिन -- प्रगतशील राज्याच्या दिशेने आमचं राज्य वाटचाल करतय. त्यात महसूल विभागाचं महत्वाच काम आहे. महसूल विभागात प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांच्या पाठीवर थाप देण्यासाठी कौतुक करण्यासाठी आणि पुरस्कार देण्यासाठी महसूल दिन साजरा केला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात महसूल विभागाच योगदान वाढेल असा मला विश्वास आहे. ऑन नरेंद्र मोदी व्हिडिओ --- हा आमच्या पंतप्रधान साहेबांचा मोठेपणा आहे. कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी अशा पद्धतीची भूमिका घेणं म्हणजे भारतीय म्हणून आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपल्या देशाच नेतृत्व अशा जबाबदार आणि सुसंकृत माणसाकडे आहे. मोदी साहेब आणि त्यांच्या आईवर टीका केली तरी मनाचा मोठेपणा दाखवलाय. हे क्वचितच असेल. आदरणीय पंतप्रधानानी एक आदर्श घालून दिलाय मला त्यांचा अभिमान वाटतो. ऑन संजय राऊत --- आमच्या आदरणीय मोदी साहेबांनी एवढी तरी भावना व्यक्त केली आणि सुसंकृतपना काय असतो हे दाखवलं संजय राऊत यांचे मालक जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा कोरोना काळात असंख्य लोकांचा जीव केला पत्रकार बांधवांवर खोट्या केसेस टाकल्या समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावेळी त्यांच्या मालकाने कधीच जनतेची माफी मागितली नाही. जनतेसमोर नाक रगडून माफी मागायला हवी היתה. पण उद्धव ठाकरेंसारख्या व्यक्तीकडून आम्हाला अपेक्षा नाही. हा संस्काराचा विषय असतो. संजय राऊत यांनी मातोश्रीच्या तिसऱ्या माळावर जाव आणि संस्कृत पणाचे सल्ले द्यावेत ऑन संजय राऊत ( अमित शहा तडीपार गुंड) --- संजय राजाराम राऊत 420 आहे हे आम्हाला म्हणावं लागेल. पत्रा चाळ प्रकरणी जो जेल मध्ये जाऊन आलाय तो 420च आहे. आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही. खिचडी मध्ये पैसे खाणाऱ्या 420 ने आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत करू नये. ऑन परीक्षा विधेयक --- नीट बाबत जो प्रकार घडला त्यानंतर Modi साहेबांनी शब्द दिलाय असा प्रकार परत देशात होणार नाही. आणि कोणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे हात कापतील असा आदर्श बोलण्यापलीकडे कृतीतून दाखवण्याचं काम मोदी साहेबांनी केलेय. त्यावर आदरणीय राष्ट्रपती महोदयांनी शिक्कामोर्तब केलाय ऑन काँग्रेस आणि वंचित आंदोलन ( अमित शहा ) --- कारण ते रस्त्यावरचे लोक आहेत. देशाच्या गृहमंत्र्यांचे अभिनंदन करण्यासाठी रस्त्यावर उतरल पाहिजे होत. देशाला सुरक्षित ठेवण्याचं काम अमित शहा साहेबांनी केलेय. म्हणून आपण सुरक्षित आहोत. रस्त्यावर उतरून फुलांचा हार अमित शहा यांना घातला पाहिजे तुम्ही राजकीय नेते नंतर अगोदर तुम्ही घरात सुरक्षित आहात ते देशाचा गृहमंत्री कणखर आहे. ऑन दिपके ( आंदोलन ) आंदोलन करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे ऑन फिश टॅक ( सोलापूर ) --- रिपोर्ट मागवला आहे. सोमवारी रिपोर्ट येईल त्यावर आम्ही अभ्यास करू आणि कारवाई करू मच्छीमारांच नुकसान होऊ नये म्हणून आमचं खात पावलं उचलेल. ऑन जुहू चौपाटी ( कचरा ) -- संबंधित यंत्रणेने यावर लक्ष घालावं
0
0
Report

सरडेवाडी टोल नाक्यावर धावत्या सिमेंट टँकर में आग, स्थानीय लोगों की सूझबूझ से बड़ा नुकसान टला

Rui, Maharashtra:सरडेवाडी टोल नाक्यावर धावत्या सिमेंट टँकरला आग; स्थानिकांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्याजवळ सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या धावत्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या टँकरला अचानक आग लागल्याची घटना घडली. यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत फवारणी करणाऱ्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; वेळेत केलेल्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
0
0
Report
Advertisement

पवई झील में मगर का सनबाथ, मुंबई में लोग हैंरान

Mumbai, Maharashtra:गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर लोकांना सनबाथ घेताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, पण मुंबईच्या पवई तलावात चक्क मगरच सनबाथ घेताना दिसत आहे. पवई तलावातील तराफ्यावर निवांत पडलेल्या या मगरबाई सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. यापूर्वीही पवई तलावालगतच्या रस्त्यांवर आणि रहिवासी भागात मगरींचा वावर आढळला होता. एकाीकडे तलाव परिसरात आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असलं, तरी दुसरीकडे ही मगर मात्र कोणतीही चिंता न करता पवईच्या सुंदर वातावरणाचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे. सध्या "मुंबईतला हा व्हीआयपी सनबाथ" पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत असून, पवईची मगर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
0
0
Report

विदर्भ में भारी बारिश से राहत, सरकार ने नुकसान भरपाई की घोषणा

Nagpur, Maharashtra:On Vidarbha Rain * राज्यात गेले काही दिवसात मोठा पाऊस होत आहे.. आधी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि आता विदर्भात मोठा पाऊस झाला आहे.. प्रशासन पूर्णपणे तत्पर आहे.. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, नागरिकांना नुकसान भरपाई सरकार कडून दिली जाईल.. On Anti Narcotics Tadkforce * एन्टी नार्कोटिक्स टास्कफोर्स मध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी अतिशय मेहनतीने काम करत असतात.. हे काम प्रभावी होण्यासाठी या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मूळ वेतन पेक्षा अधिक 30 टक्के भत्ता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे... * नशा मुक्त मुंबई आणि नशा मुक्त महाराष्ट्र अशी मुख्यमंत्र्यांची संकल्पना आहे.. शासनाने तो ध्येय समोर ठेवला आहे.. पोलीस त्यासाठी कामाला लागले आहे आणि लवकरच नशा मुक्त महाराष्ट्राचा स्वप्न पूर्ण होईल... On CJP Funding * सी जे पी असो किंवा देशातील इतर कुठल्याही संघटना असो, ज्यांना फॉरेन फंडिंग होत असेल तर त्याची तपासणी होणे अतिशय आवश्यक आहे... अक्कलकुवा येथील एका संघटना मोठ्या प्रमाणावर फॉरेन फंडिंग झाल्याचे समोर आले होते, पोलिसांनी कारवाई केली होती, तो फंड चुकीच्या कामासाठी वापरला गेला होता.. त्यामुळे अशा स्वरूपात फॉरेन फडिंग घेऊन त्याचा चुकीचा वापर होत असेल तर निश्चितच त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल... On Modi Mafi * एखाद्या घडलेल्या घटने संदर्भात तरुण आणि विद्यार्थी संताप व्यक्त करत असतात.. मात्र काही चुकीचे लोक आणि संघटना खोटं नरेटीव पसरवतात.. अशात काही तरुणांकडून पंतप्रधान किंवा मोठ्या पदावरील व्यक्तींबद्दल चुकीचे शब्द वापरले जाते.. मात्र पंतप्रधानांनी अशा तरुणांना माफ केले आहे निश्चितच त्यांचा हा पाऊल स्तुत्य आहे... On Amit Shah Visit * गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात सहकार क्षेत्र असो किंवा इतर क्षेत्र जोरात काम सुरू आहे.. आणि गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचा संपूर्ण देशात दौरे करत असतात... महाराष्ट्रात आली आहे त्यांचे स्वागत आहे... On अक्कलकोट विकास आराखडा * अक्कलकोट येथे मोठ्या प्रमाणावर भाविक जात असतात.. त्यामुळे म्हाडा अंतर्गत अक्कलकोट येथील विकास आराखडा तयार करण्यात आला आहे लवकरच त्या ठिकाणी काम सुरू होईल आणि त्याचा फायदा भाविकांना मिळेल...
0
0
Report
Advertisement

सातारा में मुसलधार बारिश से कृष्णा नदी में जलस्तर बढ़ा, पुराने पुल डूबे

Satara, Maharashtra:सातारा - मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. लिंब गोवे येथील कोटेश्वर मंदिराजवळील जुना पुल पुराच्या पाण्यामुळे पाण्याखाली गेला आहे. पावसाने पुन्हा जोर धरल्याने कृष्णा नदीवरील धोम-बलकवडी आणि धोम धरणातील पाणी पातळी वाढल्याने दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातो आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. लिंब येथील पुरातन घाटही पाण्याखाली गेला आहे. लिंब गोवेदरम्यानच्या जुन्या पुलाबरोबर मर्ढे - आनेवाडी दरम्यानचा पूलही पाण्याखाली गेला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top