Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Apr 15, 2025 08:30:20
Sangli, Maharashtra
सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Mar 20, 2026 07:48:54
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 20, 2026 07:48:13
Dhule, Maharashtra:धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाला मातीमोल दर दिले जातं आहेत. गेल्या वर्षी 2700 रुपये प्रति क्विंटल विकला जाणारा गहू आता केवळ 2200 रुपये प्रति क्विंटल विकला जातं आहे. युद्धाचा गहू बाजारावर परिणाम झाला असून, बिस्किट कारखाने गहू खरेदी करत नसल्याने गव्हाचे दर कमी झाल्याचे व्यापारी सांगून न परवडणाऱ्या दरात गहू खरेदी करीत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. रक्ताचे पाणी करून वाढवळेलता पिकाला दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सपाडाला आहे. गव्हाची उचल नसल्याने कमी भाव आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे बिस्कीट बनवणाऱ्या कंपन्या गहू खरेदी करत नाहीत त्यामुळे मोठ्या प्रमाणात गहू आलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या गावाला क्विंटल मागे शंभर ते दीडशे रुपयांचा तोटा सहन करावा लागतो आहे. सध्या गहू 2200 ते 2400 रुपये क्विंटल दर कृषी उत्पन्न बाजार समितीने मिळतो आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 20, 2026 07:40:05
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर काही अधिकारी, कर्मचारी व शिक्षक सेवाविषयक विविध प्रकारचे लाभ घेत आहेत. या प्रकारामुळे खर्‍या दिव्यांग लाभार्थ्यांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अश्या 490 दिव्यांगाची तपासणी आरोग्य विभागाचे उपसंचालक अकोला यांच्याकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे या अधिकारी आणि कर्मचारी यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळविली अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी झालेल्या कागदपत्रांच्या तपासणीत 21 शिक्षक, कर्मचार्‍यांकडे युडीआयडी कार्ड आढळून आले नाही. अशा कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. परंतु इतरही विभागातील लाभ घेणार्‍या शिक्षक, कर्मचार्‍यांची तपासणी करावी, अशी मागणी सुरू होती. त्यामुळे 490 दिव्यांग अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांची लाक्षणिक तपासणी करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी घेतला आहे.
972
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 20, 2026 07:39:00
884
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 20, 2026 07:31:17
781
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 20, 2026 07:20:31
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - आखाती युद्ध के संकट में सापडलेल्या द्राक्ष बागों पर आसमानी कहर... एंकर - सांगली जिले में गारपिटी का बड़ा तडाखा पड़ा है, आखाती युद्ध के संकट में सापडले द्राक्ष बाग शेतकऱ्यां पर गारपिटी की आसामानी कहर बरसने से द्राक्ष बाग शेतकरी उध्वस्त हो गए हैं. मिरज तालुक्यात सलग दो दिनों से गारपिटी ने द्राक्षबाग अक्षरश उध्वस्त कर दिए हैं. हजारों हेक्टेयर पर फैले द्राक्ष बागों को गारपिटी और वादली बारिश के कारण नुकसान पहुंचा है, फलस्वरूप बागों में अब केवल द्राक्ष के गुच्छे बचे हैं. किसानों को बड़ा आर्थिक नुकसान हुआ है और यदि समय पर सरकार मदद नहीं मिली तो वे कठिन स्थिति में आ सकते हैं. गारपिटी से नुकसान के मामले में सलगर गाँव के द्रাক্ষ बागों का आकलन कर किसानों से बातचीत की गई.
1009
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 20, 2026 07:20:12
Wardha, Maharashtra:रस्ता नाही तर मत नाही; गोपुरी चौक ते बायपास रस्त्यावर गावकऱ्यांचा रस्ता रोको रस्ता नाही तर मत नाही; गोपुरी चौक ते बायपास रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आज रस्ता रोको आंदोलन सुरु केले..संबंधित कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत “रस्ता नाही तर मत नाही” असा इशारा दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असून त्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. आतापर्यंत अनेक जण जखमी झाले असून दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आंदोलकांनी दिली. याबाबतीत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांचा रोष वाढला आहे.विशेष म्हणजे, बांधकाम विभागाच्याअधिकाऱ्यांकडूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. “तुम्ही आंदोलन करा, खासदार-आमदारांचे जगणं मुश्किल करा,” असा सल्लाच अधिकाऱ्यांकडून दिला जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला.या पार्श्वभूमीवर अखेर गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन सुरू केले असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून काम पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.या आंदोलनाचा आढावा आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी...
1030
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 20, 2026 06:19:27
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात गॅस टंचाई अधिक तीव्र झाली एजन्सीबाहेच्या रांगा वाढता वाढता वाढे अँकर:--चंद्रपुरात गॅस टंचाईची स्थिती अधिक तीव्र झाली आहे. शहरातील गॅस एजन्सीबाहेच्या रांगा वाढता वाढता वाढे अशा ठरत आहेत. 10-10 दिवस नंबर लावूनही सिलिंडर घरपोच येत नसल्याने त्रस्त ग्राहक एजन्सीमध्ये गर्दी करत आहेत. एजन्सीमालकांकडे देखील या टंचाईवर उपाय नाही. केवळ नव्या तारखा देत सिलिंडर पुरवठा झाल्यास प्राधान्यक्रम ठरवून ते वितरित केले जात आहेत. या टंचाईमुळे ग्राहकांच्या पहाट आणि सकाळ एजन्सीपुढे जात आहेत. रोज नव्या समस्या आणि नवे तंटे यामुळे ग्राहक आणि एजन्सीधारक त्रस्त झाले आहेत. बाईट १) ,२) त्रस्त ग्राहक आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
1070
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 20, 2026 06:18:14
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील 40 गावांना अवकाळी वादळी पावसाचा तडाखा... जिल्ह्यातील श्रीरामपूर , राहता , संगमनेर , अकोले , राहुरी , नेवासा ,भागातील शेती पिकांचे मोठे नुकसान... गारपीट आणि वादळी पावसामुळे गहू , टोमॅटो , मका , कांदा पिकांचे मोठे नुकसान... अवकाळी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान... जिल्ह्यातील 40 गावांना वादळी पावसाचा तडाखा बसल्याने अनेक पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल... अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला.... रब्बी पिके काढणीच्या टप्प्यावर असताना आलेल्या या नैसर्गीक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेलं शेती पिकांचे उत्पादन अक्षरशः नष्ट .. सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी , शेतकऱ्यांची मागणी....
1094
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 20, 2026 06:17:33
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यात पोलिसांना अपयश येत आहे. खुनाच्या एकापाठोपाठ एक घटना घडत असतानाच आर्णी मार्गावर तुषार सोळंके या युवकाच्या पाठीत हल्लेखोराने चाकू भोसकला. हा चाकू पाठीत फसल्याने जखमी तुषार त्याच अवस्थेत रुग्णालयात पोहोचला. चाकू खुपसल्याचा फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाल्यावर पोलीस जखमी पर्यंत पोहोचले. त्याची तक्रार घेत पोलिसांनी आरोपीवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. खुनाच्या प्रयत्नांचा हा प्रकार असतानाही मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण झाले आहे. अमली पदार्थांचे सेवन करून अनेक नशेखोर युवक गुन्हेगारी घटनां घडवीत आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.
1010
comment0
Report
Advertisement
Back to top