416416
Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक
Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वाशीम: मानसून पूर्व आपदा प्रबंधन प्रशिक्षण से आपदा तैयारी तेज
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात पावसाळ्यातील पूर व इतर आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पावर मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश दिले. SDRF पथकाने पूरस्थितीतील बचावकार्य, बोटींग, प्रथमोपचार आणि CPR चे प्रात्यक्षिक सादर केले. जिल्ह्यातील १७३ पूरप्रवण गावांपैकी ६ गावे अतिसंवेदनशील असल्याची माहिती देण्यात आली.तसेच १४८ ग्रामपंचायतींना आपत्ती प्रतिसाद किटचे वितरण करण्यात आले.0
0
Report
सोलापुर के मोहोळ में चोरों का धावा: हराळवाडी में रात में छह घर फोड़े
Solapur, Maharashtra:सोलापूर - मोहोळ तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; हराळवाडीत एका रात्रीत सहा घरफोड्या, १० लाखांचा ऐवज लंपास... सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत हराळवाडी गावात एका रात्रीत सहा घरफोड्या केल्या आहेत. अंधाराचा आणि उन्हाळ्या असल्याने उकाडयामुळे नागरिक बाहेर झोपल्याचा फायदा घेत चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. या घरफोड्यांमध्ये जवळपास १० लाख रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गाव मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांच्या निशाण्यावर आले. गावातील नागरिक उन्हाळ्यामुळे घराबाहेर झोपले असताना चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत एकामागून एक तब्बल सहा घरे फोडली. चोरट्यांनी घरातील कपाटे आणि लॉकर फोडून सोने-चांдиचे दागिने, रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला. प्राथमिक माहितीनुसार जवळपास ६ तोळे सोन्यासह सुमारे १० लाख रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.0
0
Report
प्याज के भाव गिरने के बावजूद डाळींब के दाम स्थिर, किसान खुश
Shirdi, Maharashtra:Anc - एकिकडे कांद्याचे दर कोसळत असताना डाळींब उत्पादक शेतकऱ्यांसाठी मात्र दिलासादायक चित्र पाहायला मिळतंय... राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळींबाची आवक वाढली असली तरी शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळत असल्याने बाजारात आनंदाचे वातावरण आहे... एक नंबरच्या डाळींबाला तब्बल २५० रुपये दर मिळत असून वर्गवारीनुसार दर सध्या स्थिर आहेत... दररोज सुमारे १५०० क्रेट डाळींबाची आवक बाजार समितीत होत आहे...राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या डाळींबाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे...गेल्या काही दिवसांपासून डाळींबाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे...विशेष म्हणजे एक नंबर दर्जाच्या डाळींबाला तब्बल २५० रुपये दर मिळत आहे...तर इतर वर्गवारीनुसारही दर स्थिर असून बाजारात चांगली मागणी कायम आहे...दररोज अंदाजे १५०० क्रेट डाळींबाची आवक होत असून व्यापाऱ्यांकडूनही चांगली खरेदी केली जात आहे...कांद्याचे दर कोसळल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी डाळींबाने काहीसा आधार मिळाल्याच पाहायाला मिळतय...0
0
Report
Advertisement
विवेक कोल्हे की चुनाव जीत से अहिल्यानगर में विखे-कोल्हे संघर्ष तेज
Shirdi, Maharashtra:कोपरगाव येथील भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांची विधानपरिषदेवर निवड झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात कोल्हे आणि विखे यांच्यातील पक्षांतर्गत राजकीय संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता आहे.. त्याचाच प्रत्यय, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यात आयोजित कोल्हे यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्या दरम्यान आलाय.. या कार्यक्रमासाठी केवळ भाजपमधील विखे विरोधक नव्हे, तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह मनसेचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..0
0
Report
ठाणा गाव के पास ट्रक चालक की संदिग्ध मौत, शव ट्रक से बंधे मिले
Bhandara, Maharashtra:ठाणा गावाजवळ ट्रक चालकाचा संशयास्पד मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रकला बांधलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शरीरावर जखमा आणि रक्ताचे डाग आढळल्यामुळे या प्रकरणात घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृत चालकाचे नाव केशव उके वय 25 वर्ष राहणार बारबती जिल्हा शिवनी मध्यप्रदेश असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केशव उके हा ट्रकमधून गुळ घेऊन नागपूर येथे जाणार होता. मात्र तो गोंदिया जिल्ह्यातील ठाणा गावाजवळ कसा पोहोचला, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. घटनास्थळी चालकाचा मृतदेह ट्रकाच्या रस्त्याला बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या पायावर आणि गळ्यावर जखमा दिसून आल्या असून शरीरावर रक्ताचे डागही होते. त्यामुळे हा आत्महत्येचा प्रकार आहे की घातपात, याबत संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू करण्यात आला आहे.0
0
Report
पिलांद्री जंगल में मृत बाघ के शावक की खबर: दो बाघों के संघर्ष में मौत की आशंका
Bhandara, Maharashtra:पिलांद्री जंगलात मृतावस्थेत आढळले वाघाचे शावक... मृत शावकाजवळ वाघ बसून होते संघर्षात मृत्यू झाल्याचा निष्कर्ष भंडारा जिल्हाच्या पवनी तालुक्यातील अड्याळ वनपरिक्षेत्रातील पिलांद्री जंगलात गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या पथकाला नाल्याजवळ वाघाचा शावक मृतावस्थेत आढळून आला. चक्क वाघ मृत शावकाजवळ बसून असल्याचे वनविभागाच्या पथकाने ड्रोनद्वारे पाहणी केली असता दिसून आले. शावकाचा मृत्यू हा दोन वाघाच्या क्षेत्रीय संघर्षात झाल्याचा निष्कर्ष पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.0
0
Report
Advertisement
चंद्रपुर में रेलवे के धक्के से वन्यजीव की मौत, सिंडेवाही लोनखैरी में वाघिणी मिली
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर में रेलवे के धक्के से वन्यजीव की मौत, सिंडेवाही लोनखैरी में वाघिणी मिली अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेत वन्यजीवांच्या मृत्यूच्या घटना सातत्याने सुरूच आहेत ताज्या घटनेत शिंदेवाही तालुक्यात एका वाघिणीचा मृत्यू झालाय. सिंदेवाही तालुक्यातील लोनखैरी जवळ गोंदिया-बल्लारपूर चांदा फोर्ट रेल्वे मार्गावर आज पहाटेच्या दरम्यान हा अपघात झाल्याची अंदाज आहे. माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. हाच सिंदेवाही तालुका गेले आठवडाभर वाघाच्या हल्ल्यामुळे गाजत राहिला आहे. एका वाघिणीने केलेल्या हल्ल्यात एकाच घटनेत चार महिलांचा गुंजेवाही जंगलात मृत्यू झाला होता. त्यानंतर या भागामध्ये वाघिणीला जेरबंद करण्यात आले असले तरी तिचे बछडे मात्र याच जंगलात वास्तव्याला आहेत. वनविभाग आता या सर्व बिंदूंचा एकत्रित तपास करत आहेत.0
0
Report
यवतमाळ में जिलाधिकारी ने पेट्रोल पंपों की निगरानी और किसानों को डीजल प्राथमिकता निर्देश दिए
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विविध पेट्रोल पंपांची पाहणी करून इंधन पुरवठा व साठा व्यवस्थेचा आढावा घेतला. पेट्रोल पंप कार्यालयातील नोंदवही, वर्षनिहाय इंधन पुरवठ्याची माहिती, संबंधित दस्तावेज तसेच सीसीटीव्ही यंत्रणेची तपासणी केली. इंधन वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याबरोबरच नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांना प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून द्यावे, पेट्रोल पंपांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे, सीसीटीव्हीचा डेटा सुरक्षित ठेवावा तसेच इंधन साठ्याबाबतची माहिती दर्शनी भागात स्पष्टपणे प्रदर्शित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पेट्रोल पंप चालकांना दिल्या.0
0
Report
आउरंगाबाद-जालना निर्वाचन क्षेत्र में मतदान के दौरान कड़ी निषेधाज्ञा लागू
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Aurangabad-Jalna स्थानिक स्वराज्य मतदारसंघ निवडणूक पारदर्शक वातावरणात पाडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात १८ मे २०२६ ते २५ जून २०२६ रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यत मनाई जमावबंदीचे व दोन्ही जिल्ह्यात पोस्टर्स, बॅनर्स लावण्यास बंदी असल्याचे आदेश दिले आहेत, निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी-कर्मचारी आणि मतदानासाठी रांगेत उभे असलेले मतदार वगळता, जिल्ह्यात पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीला, तसेच मतदान केंद्रातील मतदान प्रतिनिधींना मोबाइल फोन, कॉर्डलेस फोन, मेगा फोन, मायक्रोफोन किंवा वायरलेस सेट वापरण्यास आणि फोटो काढण्यास मनाई असेल. बंदोबस्तासाठी नेमलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी वगळून इतर कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारची शस्त्रे बाळगता येणार नाहीत. तसेच, केवळ परवानगी दिलेल्या वाहनांनाच या परिसरात प्रवेश मिळेल असे आदेश काढण्यात आले आहेत...0
0
Report
Advertisement
शिवाजी नगर अंडरपास पर 3.4 मीटर ऊँची लोहे की चौखट, भारी वाहनों पर रोक से यातायात में कमी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वारावर सार्वजनिक बांधकाम विभागाने ३.४ मीटर उंचीची मजबूत लोखंडी चौकट बसवली आहे. त्यामुळे, आता या मार्गातून जड वाहनांची ये- जा होऊ शकणार नाही. परिणामी वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यास यामुळे मदत होणार आहे. ४ मे पासून सुरू असलेल्या कामानंतर तब्बल २२ दिवसांनी पूर्वीप्रमाणेच जाड स्वरूपाची लोखंडी चौकट याठिकाणी उभारण्यात आली. शिवाजीनगरच्या बाजूने लोखंडी चौकट नसल्याने मार्गात उंच वाहन अडकून वारंवार वाहतूक कोंडी होत होती. नव्याने बसविण्यात आलेल्या संबंधित चौकटीमुळे वाहनचालक आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासातून सुटका होईल.0
0
Report
छत्रपति संभाजीनगर में जलापूर्ति योजना: 12 जून से 50 एमएलडी, धीरे-धीरे 100 एमएलडी तक
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपाती संभाजी नगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे वाढीव पाणी सध्या अस्तित्वात असलेल्या योजनेतूनच दिले जाणार असून, शहरातील पाण्याचा गॅप कमी करण्याला प्रशासनाचे प्राधान्य राहील, अशी माहिती महापालिका आयुक्त यांनी दिली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १२ जूनला सुरुवातीला ५० एमएलडी वाढीव पाणी मिळेल व टप्याटप्याने ते १०० एमएलडीपर्यंत नेले जाईल. नवीन योजनेसाठी नक्षत्रवाडी डोंगरावर एमबीआर जलकुंभ उभारले असून, तेथून ११००, १५०० आणि २००० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिन्या जोडल्या आहेत. पाणीपुरवठा यापैकी प्रथम १५०० व त्यानंतर ४-५ दिवसांनी २००० मिलीमीटरची जलवाहिनी सुरू केली जाईल. यातून पाणी दिल्यानंतर, शिल्लक राहणारे वाढीव पाणी जुन्या योजनेतून वितरित करण्यात येईल अशी माहिती महापालिकेन दिलीय...0
0
Report
मानसून की आहट से नाणेघाट के आदिवासी किसान जल्दी कर रहे धान रोपण
Shirur, Maharashtra:राज्यात मान्सूनची चाहूल लागली असून सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील नाणेघाटात पावसाच्या सरी कोसळू लागल्यात, त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांची भात रोपे टाकण्याची लगबग सुरू झाली असून यंदा मे महिन्यात लवकरच शेतकऱ्यांनी भात रोपे टाकायला सुरुवात केलीय, मागील वर्षी भात रोपे टाकण्याच्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना भातरोपेच टाकता आली नाही त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी लवकर धुळवाफेवरतीच पहिल्या पावसानंतर भात रोपे टाकण्याला सुरुवात केलीय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी0
0
Report
Advertisement
शहर में आकाशीय तूफान और बारिश की चेतावनी: गरज के साथ आंधी-तूफान की संभावना
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात उन्हाचा चटका कायम असतानाच आता हवामानात मोठा बदल होणार आहे. बुधवारीबकमाल तापमान ३९.६ सेल्सियस अंश आणि किमान तापमान २६.१ सेल्सियस अंश नोंदवले गेले असून, हवेत ६१% पर्यंत आर्द्रता होती. दरम्यान, हवामान विभागाने २८ मे ला शहरात वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवारी आकाश अंशतः ढगाळ राहील तसेच दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील, असा अंदाज आहे. २९ मे रोजी आकाश निरभ्र होऊन तापमान ४० सेल्सियस अंश होईल.0
0
Report
महाड में गोदाम आग: जानिए कैसे हुई घटना और क्या नुकसान हुआ
Chendhare, Maharashtra:महाड शहरातील जुने पोस्ट कार्यालय परिसरात असलेल्या गोदामाला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच महाड नगर परिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. गोदामात तेलाचा साठा असल्याने आगीची तीव्रता वाढण्याची शक्यता होती. मात्र आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं. खबरदारीचा उपाय म्हणून काहीकाळ परिसरातील विद्युत पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला होता. आगीत मोठी वित्तहानी झाली आहे तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.0
0
Report
नाशिक में भीषण लू: 7 हजार खर्च कर गौशाला में फॉगर्स, दूध उत्पादन सुधरा
Lasalgaon, Maharashtra:नाशिक जिल्ह्यासह राज्यामध्ये उष्णतेची लाट आल्याने उन्हाच्या कडाक्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे थंडीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातही यंदा कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिऑसच्या वरती कायम असून 43 अंश सेल्सिऑसपर्यंत पोहोचला असून दररोज 41 अंश सेल्सिऑस कमाल तापमान असल्याने या वाढत्या तापमानाचा परिणाम केवळ मनुष्यावरच नव्हे तर जनावरांवरही होत असल्याचे चित्र दिसून येत आहे लासलगाव येथील शेतकरी प्रमोद पाटील यांच्या गाईंची तब्येत उष्णतेमुळे खालावली होती त्यामुळे दुध उत्पादनातही घट झाली होती वाढत्या तापमानामुळे गोठ्यातील वातावरण अधिक गरम होत असल्याने त्यांनी गाईंसाठी विशेष उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला गोठ्यातील तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रमोद व महेंद्र पाटील या पाटील बंधूंनी सुमारे 7 हजार रुपये खर्च करून पाण्याचे 16 फॉगर (स्प्रे) बसवले आहेत या फॉगरमुळे गोठ्यात थंडावा निर्माण होत असून तापमान कमी ठेवण्यास मोठी मदत होत आहे त्यामुळे गाईंच्या तब्येतीत सुधारणा झाली असून दुध उत्पादनही पुन्हा वाढल्याचे ते सांगितले आहे त्यांचा हा अनोखा प्रयोग या निमित्ताने यशस्वी झाला आहे0
0
Report
Advertisement
