icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

औरंगाबाद खंडपीठ ने नौकरशाही को कड़ा नोटिस दिया: सात दिन में फाइल निस्तारित करें

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शासकीय कार्यालयातील फाईल ७दिवसांत निकाली काढा, अन्यथा शिस्तभंगाची कारवाईस सामोरे जा, अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोकरशाहीला इशारा दिला आहे. अधिकाऱ्यांच्या या लालफीतशाहीमुळे नागरिक न्यायापासून वंचित राहतात आणि न्यायालयाचा अमूल्य वेळ अशा याचिकांमध्ये खर्च होतो, अशी उद्विग्नता खंडपीठाने व्यक्त केली. खंडपीठात दरवर्षी दाखल होणाऱ्या सुमारे १८ ते १९ हजार याचिकांपैकी तब्बल ७ ते ८ हजार याचिका 'केवळ अधिकाऱ्यांना प्रस्तावांवर निर्णय घेण्याचे निर्देश द्या' अशा स्वरूपाच्या असतात. या धक्कादायक बाबीची न्या. नितीन बी. सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब डी. शिंदे यांच्या खंडपीठाने अत्यंत गंभीर दखल घेत, स्वतःहून  जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. लातूरच्या एका शेतकऱ्याचा भूसंपादनासंदर्भातील अर्ज १९९९ पासून म्हणजे तब्बल २७ वर्षे अनिर्णीत असल्याचे, तर सामाजिक न्याय विभागाकडे २०१८पासून एक प्रस्ताव धूळ खात पडून असल्याचे सुनावणीदरम्यान खंडपीठाच्या निदर्शनास आले, त्यावरून हे निर्देश देण्यात आले..
0
0
Report

256 कॉलेजों के खिलाफ बोर्ड की करारी कार्रवाई, मान्यता बिना परीक्षा फॉर्म दाखिले का खुलासा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:विनामान्यता विषय चालवून बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेचे अर्ज भरून घेतले, अशा छत्रपती संभाजीनगर विभागातील २५६ उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांवर शिक्षण मंडळाने कठोर कारवाई केली आहे. या संस्थांना प्रतिविद्यार्थी २ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. १८४ संस्थांचे बोर्ड संकेत , स्कूल कोड गोठवण्यात आले आहेत. संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि क्राफ्ट सायन्स या विषयांची पूर्वपरवानगी न घेताच विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचऑनलाइन प्रक्रियेदरम्यान समोर आले. ऑक्टोबरअखेरपर्यंत संस्थेने दंडाची रक्‍कम भरून मान्यतेची प्रक्रिया पूर्ण न केल्यास, या शाळांमधील १२ हजार विद्यार्थ्यांना बारावीचे परीक्षेचे अर्ज भरता येणार नाहीत. बोर्डाच्या वतीने परीक्षेला विद्यार्थी बसवताना त्या विषयांची आणि मंडळाची मान्यता आवश्यक आहे. परंतु मान्यर विषय असलेल्या क्राफ्ट सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकशास्त्र या विषयांची मान्यता न घेता अकरावी- बारावी परीक्षेला विद्यार्थी बसवण्यात आले. विद्यार्थी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करत असल्याने नंतर ही बाब समोर आली. त्यानंतर आता बोर्डाने या २५६ संस्थांवर कारवाई केलीय.
0
0
Report

शहर भर में हेलमेट नहीं पहनने पर पुलिस ने 5175 बाइक चालकों पर कार्रवाई

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांकडून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर बुधवारीही कारवाई सुरू आहे, शहरभरात विविध चौकांमध्ये राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ५,१७५ विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर कारवाई केली. शहर वाहतूक पोलिसांनी मंगळवारपासून ही कारवाई सुरू केली. हर्सल टी, मुकुंदवाडी चौक, केंब्रिज चौक, हायकोर्ट सिग्नल, सेव्हन हिल्स, आकाशवाणी, क्रांती चौक, रेल्वे स्टेशन, अमरप्रीत चौक, कार्तिकी चौक, मिल कॉर्नर, एएस क्लब, ओअॅसिस चौक, नगर नाका आदी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. २ टप्प्यांत पोलिसांनी शहरातील विविध चौकांत सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी ५ ते सायंकाळी ७ अशी २ टप्प्यांत ६ तास कारवाई केली. ही कारवाई सुरूच राहणार आहे..
0
0
Report
Advertisement

STS स्मार्ट कार्ड से यात्रियों को परेशानियाँ: रिचार्ज और टिकट सुविधाओं में दिक्कतें

Buldhana, Maharashtra:एसटीच्या स्मार्ट कार्डमुळे प्रवासी हैराण! प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने स्मार्ट कार्डची सुविधा सुरू केली. मात्र, हेच स्मार्ट कार्ड आता प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. कधी कार्डमध्ये रिचार्ज होत नाही, तर कधी रिचार्ज केलेले कार्ड बसमध्ये चालत नाही. विशेषतः हाफ तिकीट किंवा पूर्ण तिकीट सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना या समस्यांचा अधिक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. बस प्रवासादरम्यान स्मार्ट कार्डवरून प्रवासी और वाहकांमध्ये वादाचे प्रसंगही घडत आहेत. नेमकी अडचण काय आहे? स्मार्ट कार्डची सुविधा की प्रवाशांसाठी मनस्ताप? याच प्रश्नाचा बसस्थानकावरून थेट रिअॅलिटी चेक केलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी...
0
0
Report

कोयना डैम 100% भरा, अचानक विसर्जन संभव; किसानों-गांवों के लिए चेतावनी जारी

Satara, Maharashtra:कराड, सातारा - सातारा जिल्ह्यातील कोयना धरण 100 टक्के भरले असून आता कोयना धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. कोयना धरण 105 टीएमसी पाणीसाठाCapacity असलेले असून ते 100% भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सातारा सांगली जिल्ह्यासह कृष्णा कोयना नदीकाठच्या शेकडो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा पाण्याची चिंता मिटली आहे तर राज्याला आवश्यक असलेले वीज निर्मितीसाठी पाण्याचा उपलब्ध साठाही निर्माण झाल्याने विजेची चिंता ही मिटली आहे. सध्या धरणाच्या पायथा वीज गृहातून 1050 क्युसेक विसर्ग सुरू आहे मात्र धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग सुरू केला जाऊ शकतो त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
0
0
Report
Advertisement

साताऱ्यात लड़की के हॉस्टेल में आत्महत्या: नोट मिलने के बाद गहरे सवाल, जांच जारी

Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत १९ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे . रात्री सृष्टी भानुदास बिरामणे या 19 वर्षीय विद्यार्थिनीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. ती महाविद्यालयात फूड अँड टेक्नॉलॉजीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. तिच्याजवळ एक चिठ्ठी सापडली आहे. सृष्टी ही महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात राहत होती. वसतिगृहातील बाथरूममध्ये आक्षेपार्ह शब्द लिहिल्याची तक्रार झाल्यावर हॉस्टेल समितीने विद्यार्थिनींची चौकशी सुरू केली होती. या प्रकरणात संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांना बोलावण्याबाबतही चर्चा सुरू होती.दरम्यान, बुधवारी रात्री सृष्टी बाथरूमला जात असल्याचे सांगून वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावर गेली. त्यानंतर तिने तेथून खाली उडी घेतली. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. मात्र, उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.पालकांना बोलावण्यात येणार असल्याच्या चर्चेतून घाबरून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक चर्चा सुरू होती. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

रत्नागिरी में मतदाता सूची सत्यापन के लिए स्विप हस्ताक्षर अभियान शुरू

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत प्रारूप मतदार यादी पडताळणीसाठी ‘स्वीप’ स्वाक्षरी मोहीम; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन.. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘स्वीप’ मोहिमेचा फलक प्रदर्शित करण्यात आला.विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांच्यासह जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहायक पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकाऱ्यांनी या फलकावर स्वाक्षरी करत,नागरिकांनी मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करावी,असे आवाहन केले.
0
0
Report

नागपुर: अलंकार टॉकीज के पास हिट-एंड-रन में 74 वर्षीय रामदास पाटिल की मौत

Nagpur, Maharashtra:नागपूर - - नागपूरच्या धरमपेठ परिसरातील अलंकार टॉकीज चौकात हिट अँड रनची धक्कादायक घटना काल संध्याकाळी समोर आली. - दुचाकीवर डबल सीटने जात असलेल्या पती पत्नीला काळ्या रंगाच्या डस्टर कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ७४ वर्षीय रामदास पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी जखमी झाली आहे. - रामदास पाटील हे पत्नी सह नागपूरच्या व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन अजनी परिसरातील आपल्या घरी जात होते. अलंकार टॉकीजजवळ, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतींच्या बंगल्यासमोर त्यांच्या दुचाकीला काळ्या रंगाच्या डस्टर कारने धडक दिली. - धडकेनंतर कारचालक घटनास्थळी न थांबता फरार झाला. या प्रकरणी पोलिसांकडून नागपूर शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, फरार कारचालकाचा शोध घेतला जात आहे. - दरम्यान, संध्याकाळच्या वेळेस ही घटना घडल्याने अलंकार टॉकीज परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात केली. * रामदास पाटील निवृत्त बँक व्यवस्थापक होते...
0
0
Report
Advertisement

अर्धनग्न यात्रा से मनमाड हाईवे की बदहाली पर प्रशासन-विरोध प्रदर्शन

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर - मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव ते नगर अर्धनग्न यात्रा केली...आज ते अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले... अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांची भेट देखील त्यांनी घेतली...दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित रस्ता 10 वर्ष टिकेल, रस्ता कामात तोडण्यात आलेल्या वडाच्या एका झाडाच्या बदला 5 झाडे लावून त्याचे 10 वर्ष संगोपन केले जाईल असे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र द्यावे अशी मागणी काळे यांनी केली...मात्र आम्ही असे प्रमाणपत्र देऊ शकत नाही , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पत्रावर तसे देण्यास सांगू असं जिल्हाधिकारी यांनी सांगितले... मात्र यासाठी आम्ही न्यायालयात जाऊ असं काळे यांनी म्हणताच जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला न्यायालयात जायचे तर जा असं म्हंटल्याचे सामजिक कार्यकर्ते काळे यांनी सांगितले आहे...दरम्यान जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी मिळून हा रस्ता खड्डामय ठेवण्याचं चंग बांधला असल्याचा आरोप काळे यांनी केलाय.
0
0
Report

गणेशोत्सव में प्लाझ्मा, प्रेशर मिड और माइकिंग पर पूर्ण रोक; शांत विसर्जन के निर्देश

Ahilyanagar, Maharashtra:आगामी गणेशोत्सवात आगमन और विसर्जन मिरवणुका डीजेमुक्त ठेवण्याच्या प्रशासकीय आवाहनला अहिल्यानगर लाईट साऊंड असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सुमारे १५० ते २०० व्यावसायिकांच्या बैठकीत त्रासदायक प्लाझ्मा, प्रेशर मिड, कॉम्पिटिशन आणि मायकिंगवर पूर्णपणे बंदी घालण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बाहेरील साऊंड व्यावसायिकांवर वकिलांमार्फत कायदेशीर कारवाई आणि गुन्हे दाखल करण्याचा इशारा लाईट साऊड जनरेटर असोसिएशनचे अध्यक्ष शिवदत्त पांढरे यांनी दिला. त्रासमुक्त आणि शांततापूर्ण विसर्जन मिरवणुकीसाठी लाईट साऊण्ड जनरेटर संघटनेचा पुढाकार असल्याचा विश्वास संघटनेचे चेतन अरकल यांनी व्यक्त केला.
0
0
Report
Advertisement

भंडारा की दूध कंपनी के दूषित पानी ने किसानों की फसलें बिगाड़ी

Bhandara, Maharashtra:दूध कंपनीच्या दूषित पाण्याचा शेतकऱ्यांना फटका! जांब-सकरला परिसरातील धान पीक धोक्यात दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे शेतीचे नुकसान.... शेतकरी आक्रमक दूषित पाण्यामुळे शेतीत काम करणंही कठीण.... प्रदूषण नियंत्रण विभागाची कंपनीवर कारवाईची तयारी.... VO :- मोहाडी तालुक्यातील जांब आणि सकरला परिसरातील ही शेती... शेतकऱ्यांच्या कष्टावर उभं राहिलेलं धानाचं पीक... मात्र आता याच पिकाला दूषित आणि रसायनयुक्त पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. जांब येथे गेल्या काही महिन्यांपासून दूध प्रक्रिया कंपनी सुरू आहे. दूध पावडर, पनीर, खोवा यांसारख्या पदार्थांची निर्मिती या ठिकाणी केली जाते. मात्र कंपनीतून बाहेर पडणारं सांडपाणी प्रक्रिया न करता थेट परिसरातील ओढ्यात आणि शेतीच्या दिशेने सोडलं जात असल्याचा शेतकाऱ्यांचा गंभीर आरोप आहे. या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य पसरल्याचं शेतकरी सांगत आहेत. दूषित पाणी शेतात शिरल्याने उभी धान पिकं आणि भाजीपाला खराब होत असल्याचं दावा करण्यात येतोय. इतकंच नाही तर या पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर शेतात काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या हाताला दुखापत झाल्याचंही सांगण्यात येत आहे. दुर्गंधी आणि दूषित पाण्यामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, शेतात काम करण्यासाठी मजूरही येण्यास तयार नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. एकीकडे शेतीसाठी वाढता खर्च... त्यात पिकाला मिळणारा भाव अनिश्चित... आणि आता दूध कंपनीच्या सांडपाण्यामुळे पीकच धोक्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरातील जलचर प्राण्यांवरही परिणाम झाल्याचं आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय. त्यामुळे कंपनी बंद करा किंवा सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करूनच ते बाहेर सोडा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. BYTE :- किरण अंतकरी, शेतकरी BYTE :- ऋषिकांत नेरकर, शेतकरी BYTE :- शेतकरी BYTE :- शेतकरी VO :- शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण विभागाने दूध प्रक्रिया कंपनीची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी कंपनीतून बाहेर पडणाऱ्या पाण्याचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पाहणीदरम्यान काही त्रुटी आढळून आल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. याप्रकरणी कंपनी चालकाला नोटीस बजावण्यात आली असून, समाधानकारक उत्तर न दिल्यास पुढील कारवाई केली जाईल, असा इशारा प्रदूषण नियंत्रण विभागाने दिला आहे. BYTE :- किशोर पुसदकर, प्रदूषण नियंत्रण विभाग अधिकारी भंडारा VO : - आता या तपासणीच्या अहवालातून दूषित पाण्याचं नेमकं वास्तव समोर येणार आहे. मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतातील उभं पीक धोक्यात आहे... शेतकऱ्यांचं नुकसान कोण भरून देणार? आणि कंपनीच्या सांडपाण्यामुळे शेती आणि पर्यावरणाचं नुकसान होत असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई कधी होणार? याकडेच आता जांब आणि सकरला परिसरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
0
0
Report

शिवेंद्रराजे भोसले सीधे निरीक्षण करेंगे मुंबई-गोवा महामार्ग, चिपळूण- संगमेश्वऱ के खराब रस्ते हल होंगे?

Ratnagiri, Maharashtra:मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची आज सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून पाहणी; चिपळूण, संगमेश्वरमधील रखडलेल्या रस्त्यांवरून चाकरमान्यांचे हाल कायम.. गणेशोत्सवापूर्वी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्‍यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज स्वतः मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.. रत्नागिरीपर्यंतच्या या दौऱ्यात ते संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत जागोजागी आढावा बैठका घेणार आहेत.. चिपळूणच्या बहादूर शेख नाक्यावरील उड्डाणपूल आणि संगमेश्वरमधील तळेकांटे येथील ३०० मीटर रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याने प्रवाशांना चिखल आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.. या पाहणी दौऱ्यानंतर मंत्री महोदय प्रत्यक्ष कामावर काय तोडगा काढतात आणि माध्यमांसमोर कोणती भूमिका मांडतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..
0
0
Report

यवतमाळ के उमरखेड में मातंग समाज का महा मोर्चा, उपवर्गीकरण पर तेज बहस

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या उमरखेड येथे सकल मातंग समाजाच्या वतीने उपवा्गीकरण च्या सॅर्थनार्थ जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जातीतील अविकसित जातींचे उपवर्गीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे उपवर्गीकरणाला विरोध आणि समर्थन करणारे दोन समाज घटक आमने-सामने आले आहे. अनुसूचित जातीतील 59 जातींचा विकास करण्यासाठी 1987 साली बार्टी ची स्थापना झाली, मात्र बार्टी ने समान न्याय न दिल्याने मातंग समाज मागे राहिला. उपवर्गीकरणाला विरोध चुकीचा आहे, 15 सप्टेंबर पर्यंत उपवर्गीकरणाचा निर्णय न घेतल्यास 29 सप्टेंबरला मुंबईत मातंग समाजाचा मोर्चा धडक देईल असा इशारा यावेळी माजी आमदार नामदेव ससाणे यांनी दिला.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top