416416
Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक
Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सानपाड़ा गैस सिलिंडर विस्फोट: दो भाइयों की हालत गंभीर, दुकानें और इमारतें क्षतिग्रस्त
Navi Mumbai, Maharashtra:anchor: removed सानपाडा सेक्टर-१ येथील प्रतीक सोसायटीतील फास्ट फूडच्या दुकानात मंगळवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन दोन सख्खे भाऊ गंभीररित्या भाजल्याची घटना घडली. मनिष लालबहादुर यादव (२७) आणि अर्जुन लालबहादुर यादव (४६) अशी जखमी भावांची नावे आहेत. दोघांवर ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. सानपाडा सेक्टर-१ मध्ये प्रतीक सोसायटीतील गाळा क्रमांक १ मध्ये यादव बंधू फास्ट फूडचे दुकान चालवत होते. तसेच ते दुकानातच ते राहत होते. सोमवारी दिवसभर काम केल्यानंतर दोघे भाऊ रात्री उशिरा झोपी गेले. प्राथमिक तपासात दुकानात ठेवलेल्या तीन व्यावसायिक गॅस सिलेंडरपैकी एका सिलेंडरमधून रात्रीच्या सुमारास गॅसची गळती झाली..दुकान पूर्णपणे बंद असल्याने गळती झालेला गॅस दुकानातच साचून राहिला. मंगळवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास एका भावाने कामासाठी उठून दिवा लावण्यासाठी विद्युत स्विच दाबला. स्विच दाबताना झालेल्या स्पार्कच्या संपर्कात दुकानात साचलेला गॅस येताच आग भडकल्यानंतर क्षणार्धात सिलेंडरचा bhiषण s्फोट झाला. या स्फोटात दोन्ही भाऊ गंभीररित्या भाजले. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, दुकानाचे शटर उचकटून मोठे नुकसान झाले. आसपासच्या सुमारे पाच दुकानांनाही स्फोटाचा फटका बसला. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या सुरज हॉस्पिटललाही स्फोटाचे हादरे जाणवले. तसेच समोरील आणि आजूबाजूच्या इमारतींमधील घरांच्या व दुकानांच्या काचा फुटल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि सानपाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. दोन्ही जखमी भावांना प्रथम वाशीतील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरमध्ये हलविण्यात आले.0
0
Report
दीघी में देश का सबसे बड़ा ग्रीनफील्ड जहाज निर्माण प्रकल्प; 27 हजार करोड़ निवेश
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रायगडच्या दिघीत देशातील सर्वात मोठे शिपयार्ड; कोकणात २७ हजार कोटींची गुंतवणूक.. कोकणातील दिघी येथे देशातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकार आणि ‘माझगाव डॉक’ यांच्यात २७ हजार कोटींचा ऐतिहासिक करार झाला..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारामुळे देशाच्या जहाजबांधणी क्षमतेत महाराष्ट्राचा वाटा ४० टक्क्यांवर पोहोचणार आहे. युद्धनौका आणि व्यापारी जहाजांची निर्मिती करणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्यात सुमारे ९० हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत..0
0
Report
मराठा आरक्षण उपसमिती के सदस्य के बयान पर रोहित पवार का जवाब मांगा गया
Satara, Maharashtra:कराड, सातारा : मराठा आरक्षणाच्या उपसमितीचा सदस्य म्हणून सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चेदरम्यान दिलेला प्रत्येक शब्द पाळला आहे, असा दावा मंत्री शंभूराज देसाई यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देसाईंनी मराठा आरक्षणाबाबत सत्य सांगावे, असे आव्हान दिले होते. त्याला उत्तर देताना देसाई यांनी हे वक्तव्य केले. हैदाबाद गॅझेटमधील कुणबी नोंदी शोधून त्या शिंदे समितीकडे सोपविण्याचे काम सरकारने प्रामाणिकपणे केले आहे. याबाबत आपण काय केले, हे रोहित पवारांनी मनोज जरांगे पाटील यांनाच विचारावे, असेही देसाई म्हणाले. सातारा व औंध गॅझेटबाबत कायदेशीर बाबींचा विचार करून अॅडव्होकेट जनरल आणि वरिष्ठ कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकर आणि भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण करू नये, अशी विनंती देसाई यांनी केली. आंदोलकांशी चर्चेसाठी सरकारची दारे नेहमीच खुली आहेत, असेही त्यांनी सांगितले.0
0
Report
Advertisement
लंदन में अनिल खेड़ेंकर ने गणपति प्रतिष्ठापना से भारतीय संस्कृति को जीवंत दिखाया
Pandharpur, Maharashtra:इंग्लंड लंडन शहरांमध्ये अनिल खेडेकर यांनी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. परदेशात राहून सुद्धा अनिल खेडेकर यांनी भारतीय संस्कृतीची आपली नाळ तुटू दिली नाही. त्यांनी त्यांच्या घरी बसवलेल्या गणपतीसमोर पंढरपूरच्या आषाढी वारीचा देखावा सुद्धा अत्यंत सुंदरपणे तयार केला आहे. त्यांनी पहिल्यांदच लंडन ते पंढरपूर वारी सुद्धा काढली होती इंग्लंडमध्ये राहून तेथे राहत असलेल्या भारतीयांना एकत्र करून सर्व भारतीय सण साजरा करण्यामध्ये अनिल खेडेकर यांचा पुढाकार असतो.0
0
Report
कोकण में गणेशोत्सव के दौरान ऋषिपंचमी पर 21 भाज्याओं का नैवेद्य
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी: कोकणात गणेशोत्सवात ऋषिपंचमीचे पारंपरिक व्रत २१ भाज्यांचा नैवेद्य; पारंपरिक गीत, फुगड्यांसह महिलांकडून ऋषिपंचमीचे व्रत भक्तिभावाने साजरे0
0
Report
अकोला में सूखे के कारण किसानों ने जिलाधिकारी कार्यालय के सामने भारी प्रदर्शन किया
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अपुरे आणि अनियमित राहिल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे... पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याच प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शंभू सेना सामाजिक संघटनेच्या वतीने अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन करण्यात आले. शेतकरी आपल्या काळजावर दगड ठेवून अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे, हे प्रतिकात्मक पद्धतीने दाखवण्यासाठी आंदोलकांनी चक्क छातीवर दगड ठेवून आंदोलन केले. पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी आणि दुष्काळसदृश परिस्थितीची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.0
0
Report
Advertisement
गंगापुर में 1100 शिक्षक सड़क पर, भाजपा विधायक प्रशांत बंब के खिलाफ मोर्चा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या गंगापूर तालुक्यत आज तब्बल 1100 शिक्षक रस्त्यावर उतरले , हा मोर्चा होता भाजप आमदार प्रशांत बंब आणि जिल्हा परिषद प्रशासन विरोधात, प्रशांत बंब यांनी या 1100 शिक्षकांची तालुक्यत राहत नसल्याबाबत पुराव्यासह तक्रार केली होती प्रशासनाने त्यावर कारवाई करत या शिक्षकांवर कारवाईला सुरुवात केलीय.. त्यामुळं शिक्षक विरुद्ध भाजप आमदार प्रशांत बंब हा वाद चांगलाच पेटण्याची शक्यता आहे... भाजप आमदार प्रशांत बंब विरोधात शिक्षक रस्त्यावर मोर्चा काढून प्रशांत बंब आणि प्रशासनाचा निषेध बंब यांच्या तक्रारीनंतर शिक्षकांवर कारवाईला सुरुवात शाळेत शिकवणारे हे सगळे शिक्षक आज प्रशासन आणि स्थानिक आमदार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत, मोर्चा काढून त्यांनी आमदारासह प्रशासनाचा निषेध केलाय.. आणि याच कारण म्हणजे आमदारांनी शिक्षकांची केलेली तक्रार... ग्रामीण भागात राहणाऱ्या शिक्षकांनी खरंतर मुख्यालय म्हणजे ज्या गावात शिकवतात त्या गावी राहावे असा नियम आहे मात्र शहराजवळ असलेले शिक्षक गावात राहत नाही आणि शहरातून अपडाऊन करतात याच बाबत गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला तक्रार दिली, त्यांच्या तालुक्यातील अकराशे शिक्षक मुख्यालय राहत नाही असं त्यांच्या तक्रारीत होतं, मुख्यालयी न राहता गृह भत्ता सुद्धा उचलत असल्याची तक्रार त्यांनी पुराव्यानिशी सादर केली त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनानं कारवाईचा बडगा उभारला आहे, प्रथमदर्शनी चौकशी करत या शिक्षकांची वेतन वाढ रोखली आहे आणि पुढील चौकशी करून या शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे मात्र ही कारवाई अन्यायकारक असल्याचं शिक्षकांचे म्हणणं आहे आणि त्या विरोधात आज हे सगळे 1100 शिक्षक गंगापूर मध्ये रस्त्यावर उतरले आणि मोर्चा काढून त्यांनी प्रशांत बंब आणि जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध केला इतकच नाही तर कारवाई मागे न घेतल्यास यापेक्षा सुद्धा मोठा आंदोलन करू असा इशारा या शिक्षकांनी दिला आहे.. Byte शिक्षक संघटना Vo 2.. दुसरीकडे आमदार प्रशांत बंब यांनी या मोर्चाकडे दुर्लक्ष केले, या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पिढ्या उध्वस्त kele आहेत शिक्षणाला दर्जा नाही, नियम पाळत नाही त्यामुळे यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी असे प्रशांत बंब यांचा म्हणने आहे.. यापुढेही तक्रार करत राहणार अशी आक्रमक भूमिका आमदार प्रशांत बंब यांनी घेतली आहे.. Byte प्रशांत बंब भाजप आमदार Vo 3.. खरंतर शिक्षकांचा आणि आमदार प्रशांत बंब यांचा हा वाद गेल्या काही काळापासून सुरू आहे मुख्यालयी राहण्याचा नियम शिक्षकांना मान्य नाही तर शिक्षक मुख्यालयी राहिले तर विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळेल असा आमदारांचा दावा आहे फक्त शिक्षकच नाही तर तलाठी ग्रामविकास अधिकारी आणि डॉक्टर यांनी सुद्धा मुख्यालयी राहावे अशी त्यांचा मागणी आहे आणि त्या विरोधात त्यांनी तक्रार मोहीम सुरू केली आहे मात्र दुसरीकडे आता शिक्षकच रस्त्यावर उतरले आहे त्यामुळे हा वाद यापुढेही पेटणार असं चित्र दिसतंय.. विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...0
0
Report
केंद्र के फैसले से ऊस किसान गुस्से में, 25वीं ऊस परिषद और बड़े प्रदर्शन की तैयारी
Kolhapur, Maharashtra:केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकारने चालू वर्षी 15 ऑक्टोबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शासनाचा हा निर्णय एकतर्फी असून यामुळे साखर उद्योग, कारखानदार आणि प्रामुख्याने ऊस उत्पादन शेतकरी यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आगामी १० ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर २५वी ऊस परिषद घेण्याची अधिकृत घोषणा केली. तसेच, साखरेचा हमीभाव आणि इथेनॉलच्या दराबाबत केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी 29 सप्टेबर रोजी कर्नाटक राज्यातील हुबळी येथे देशाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या घरासमोर लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे भव्य धरणे आंदोलन करण्याचा मोठा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.0
0
Report
धुळे: महाराणा प्रताप चौक के सरकारी स्कूल में शिक्षकों की मारपीट का वीडियो वायरल
Dhule, Maharashtra:धुळे शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरातील एका शासकीय शाळा व वसतिगृह परिसरात शिक्षकांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित शिक्षकांनी दारूच्या नशेत शाळा व वसतिगृह परिसरात धिंगाणा घालल्याचा तसेच विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी युवासेनेने जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमুখ मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी संबंधित शिक्षकांमधील हाणामारीचा व्हिडिओ सीईओंना दाखवत या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली. महाराणा प्रताप परिसरातील शासकीय शाळा व वसतिगृहात दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर दोन शिक्षकांमध्ये दारूच्या नशेत धिंगाणा होत एकमेकांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने शाळा व संस्थेची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी शाळा व व वसतिगृह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तातडीने ताब्यात घेण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. संबंधित प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न झाल्यास सीसीटीव्ही फुटेज डिलीट होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने विलंब न करता फुटेज सुरक्षित करावे, अशी मागणी युवासेनेने केली. झी 24 तास या व्हायरल सीसीटीव्ही फुटेज ची पुष्टी करत नाही.0
0
Report
Advertisement
मनोज जरांगे का मुंबई दौरा स्थगित, शंभूराज देसाई ने किया स्पष्ट रोकथाम का आह्वान
Sangli, Maharashtra:मुंबईतील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबई दौरा स्थगित करावा - मंत्री शंभूराजे देसाई. मुंबईतील गणेशोत्सव जागतिक स्वरूपाचा मानला जातो, त्यामुळे मुंबईतील शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मनोज जरांगे-पाटलांनी त्यांचा मुंबई दौरा स्थगित करावा, असे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे, मनोज-जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत, त्या बऱ्यापैकी सरकारने मान्य केले आहेत. जी मागण्या राहिल्या आहेत, त्याबद्दल सरकारकडून योग्य ती पावलं उचलण्यात आली आहेत, असे देखील परड्यांमध्ये शंभूराजे देसाई यांनी स्पष्ट केला आहे, ते सांगलीच्या तासगाव मध्ये रथोत्सव सोहळ्याप्रसंगी बोलत होते. दिशा सालीयन मृत्यूप्रकरणी सीबीआयकडुन तपास सुरू झाला आहे, त्यामध्ये ज्या बाबी आढळतील, त्या सीबीआय कडून तपासण्यात येतील, पण केंद्रीय यंत्रणा असणाऱ्या सीबीआय सारख्या यंत्रणेवर राज्यातल्या आमच्यासारख्या लोकांनी बोलणं योग्य होणार नाही, असं मत पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केला आहे. दिशа सालीयन यांच्या वडिलांकडून जे नाव समोर आली आहेत, त्याबद्दल देखील योग्य तो तपास करेल, आणि सीबीआयकडून या प्रकरणात योग्य न्याय होईल, असा विश्वासही पर्यटन मंत्री शंभराज देसाई यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. आमची बाजू कायदेशीर आणि संविधानिक असून न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, असं मत शिवसेना सुनावणीवरून शिवसेना शिंदे पक्षाचे नेते पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असणाऱ्या सुनावणी बाबत आपल्या पक्षाच्या वकिलांकडून बाजू मांडण्यात येत आहे, आणखी गरज पडल्यास युक्तिवाद आपल्या पक्षाच्या वकिलांकडून केला जाईल, असा विश्वास देखील मंत्री शंभूराजे यांनी व्यक्त केला आहे.0
0
Report
चांदवड में ऋषिपंचमी पर सप्तर्षी पूजा और चंद्रेश्वर का जलाभिषेक
Chandvad, Maharashtra:पवित्र भाद्रपद महिन्यातील ऋषिपंचमीचा सण चांदवडमध्ये मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. ऐतिहासिक श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात भल्याअपहाटेपासूनच सप्तर्षींच्या पूजनासाठी आणि भगवान चंद्रेश्वराच्या दर्शनासाठी महिला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ या सप्तर्षींची विधिवत पूजा करण्यात आली. शिस्तबद्ध रांगेत महिलांनी सप्तर्षींचे दर्शन घेतल्यानंतर चंद्रेश्वर महादेवाला जलाभिषेक करत कुटुंबाच्या आरोग्य आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. श्रद्धा, परंपरा आणि भक्तिमय वातावरणात चांदवडकरांनी ऋषिपंचमी उत्साहात साजरी केली.0
0
Report
गणेशोत्सव के समय महाड के पांच गांव जल संकट में
Chendhare, Maharashtra:पाच गावं, १२ वाड्या पाण्याविना....... १० दिवसांपासून नळ कोरडे; ग्रामस्थांचा संताप धरणात पाणी, गावकऱ्यांच्या नळाला मात्र पाणी नाही ...... रोहन, जुई, कुंबळे, वामने आणि लोअर तुडील या गावांचा पाणीपुरवठा गेल्या दहा दिवसांपासून बंद आहे. खैरे धरणातून या भागाला पाणीपुरवठा केला जतो. मात्र जुनी आणि नवीन पाइपलाइनमध्ये बिघाड झाल्याने पाणीपुरवठा ठप्प आहे. ठेकेदारामार्फत दुरुस्ती सुरू असली तरी काम पूर्ण होत नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. घरगुती वापरासाठी पावसाचं पाणी, तर पिण्यासाठी बाटलीबंद पाणी वापरण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावी आले असतानाच हे संकट आणल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.0
0
Report
Advertisement
श्रीरामपुर में विधायक के सुरक्षा गार्ड ने महावितरण कर्मी के कान छुए, हंगामा
Shirdi, Maharashtra:श्रीरामपुरात आमदाराच्या पोलिस अंगरक्षकाची दादागिरी..? थेट महावितरण कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावली... श्रीरामपूर विधानसभेचे काँग्रेसचे आ.हेमंत ओगले यांच्या पोलीस अंगरक्षकाने महावितरण कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर... श्रीरामपूर नगरपरिषदेच्या आवारात घडली घटना... तालुक्यात खंडित होणारा वीजपुरवठा आणि कमी दाबाने वीजेसंदर्भात बोलावली होती बैठक.... महावितरणच्या समस्यांवरील बैठकीत झाला होता शाब्दिक वाद.. हरेगाव येथील मतमाऊली यात्रेदरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्याबाबत सुरू होती चर्चा.... चर्चा सुरू असताना आ.हेमंत ओगले यांचा पोलिस अंगरक्षक गणेश ठोकळ याने वायरमनच्या कानशिलेत... पंकज अशोक खरात असे महावितरण कर्मचाऱ्याचे नाव... आमदाराच्या पोलीस अंगरक्षकाने महावितरण कर्मचाऱ्यांच्या कानशिलेत लगावल्याने महावितरण कर्मचारी आक्रमक... घडलेल्या घटनेबाबत महावितरण कर्मचारी पंकज खरात याने दिली प्रतिक्रिया...0
0
Report
च Chipळुण में कोकण के राजा के साथ हिरकणी का जीवंत प्रदर्शन, शिवकालीन इतिहास उजागर
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणच्या 'कोकणचा राजा' गणेशोत्सवात अवतरली हिरकणी; बहादूर शेख नाक्यावर जिवंत झाला शिवकालीन इतिहास.. अँकर चिपळूण: येथील बहादूर शेख नाका परिसरातील कोकणचा राजा सार्वजनिक मित्र मंडळाने यंदा गणेशोत्सवात बाप्पाच्या आगमनासोबतच शिवकालीन इतिहासाला उजाळा देणारा 'हिरकणी'चा जिवंत देखावा साकारला आहे.. आपल्या बाळाच्या ओढीने रायगडाचा अतिशय बिकट आणि उभा कडा काळोख्या रात्री उतरणाऱ्या हिरकणीच्या athang मातृत्वाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हे चित्तथरारक चलचित्र उभारण्यात आले आहे.. शिवछत्रपतींनी हिरकणीच्या या साहसाचा गौरव करत त्या कड्यावर बुरुज बांधून त्याचे नामकरण 'हिरकणी बुरुज' केले होते,हाच प्रेरणादायक प्रसंग या देखाव्यातून हुबेहूब मांडण्यात आल्या ने भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे..0
0
Report
कम बारिश के कारण नांदेड में गणेश विसर्जन संकट, बड़ी मूर्तियाँ कहाँ विसर्जित हों?
Nanded-Waghala, Maharashtra:कमी पावसामुळे यंदा नांदेडमध्ये गणेश विसर्जनावर विघ्न ओढवलय. नांदेड शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या मोठ्या गणेश मूर्ती ज्या खदाणीत विसर्जित केल्या जातात त्या दोन्ही खदानित यंदा अत्यल्प पाणी आहे. त्यामुळे विसर्जनापूर्वी मोठा पाऊस झाला नाही तर मोठ्या मूर्तिचे विसर्जन कुठे करायचे असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झालाय. पिकं करपून गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती असतानाच आता गणेश विसर्जनासमोर विघ्न निर्माण झालंय. नांदेड शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन हे दोन खदानितील पाण्यात केले जाते. नांदेड दक्षिणचे विसर्जन झरी येथील खदानित तर नांदेड उत्तरचे विसर्जन पुयनी येथील खदानित केले जाते. पण यंदा कमी पावसामुळे या दोन्ही खदानित पाणी नाहीये. महापालिकेने छोट्या मूर्तिसाठी आसना, पासदगांव, गोवर्धन घाट येथे कृत्रिम तलाव निर्माण केले आहेत. या तलावात आठ ते दहा फुटाच्या मूर्तीचे विसर्जन होऊ शकते. मात्र दहा फुटापेक्षा मोठ्या मूर्तीचे विसर्जन कुठे करावे हा प्रश्न महापालिकेसमोर निर्माण झालाय. याबाबत महापालिका चाचपनी करत आहे. पाऊस कमी झाल्यास आपत्कालीन परिस्थितीत काय करावे याबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. येत्या दहा दिवसात पाऊस झालाच नाही तर मोठ्या मूर्तिचे विसर्जन करू नये अशा सूचनाही करण्यात आल्यात. मात्र पाऊस झाला नाहीतर गणेश मंडळाशी याबत चर्चा केली जाईल आणि पुढील निर्णय घेण्यात येईल असे अतिरिक्त आयुक्त कदम यांनी सांगितले. याबाबत अलनिनोच्या प्रभावामुळे यावर्षी मराठवड्यात कमी पाऊस झालाय. गणेश विसर्जनासाठी आणखी काही दिवस आहेत. आता विघ्नहर्ता हे पावसाचे संकट दुर करो अशी प्रार्थना.0
0
Report
Advertisement
