icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

शिर्डी में सांसद भाऊसाहेब वाकचौरे के निवास पर सुरक्षा बढ़ी, सीसीटीवी वैन तैनात

Shirdi, Maharashtra:शिर्डीतील निवासस्थानी जनसंपर्क कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त वाढला. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या इशार्यानंतर वाकचौरे यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ. वाकचौरे यांच्या निवासस्थानी सीसीटीव्ही मोबाईल सर्विलन्स पोलीस व्हॅन 24 तास असणार तैनात. सर्व खासदारांना वाय प्लस सुरक्षा मंजूर. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी. वाकचौरे यांच्या निवासस्थानी गनधारी पोलिस तैनात.
0
0
Report
Advertisement

शिंदे गुट के नेता आशीष जयस्वाल ने बागी शिवसेना सांसदों पर कड़ा रिएक्शन दिया

Chandrapur, Maharashtra:उबाठा शिवसेनेच्या फुटीर खासदारांवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याच्या अर्थ राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांची प्रतिक्रिया. उबाठा शिवसेनेच्या फुटीर खासदारांच्या मुद्द्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याच्या अर्थ राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन केलेला आहे त्यामुळे आता कितीही प्रक्रिया केली तरी ते काही रिवर्स होऊ शकत नाही, मला वाटतं की यावर आत्मचिंतन केलं पाहिजे की का अशा प्रकारे वारंवार परिस्थिती उद्भवत आहे.
0
0
Report

चंद्रपुर GST भवन का लोकार्पण: तीनों जिलों को मिले आधुनिक सुविधाएं

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरात चंद्रपूर -गडचिरोली- वर्धा या 3 जिल्ह्यांच्या जीएसटी भवन मुख्यालयाचे आज लोकार्पण करण्यात आले. राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह पालकमंत्री डॉ. अशोक उईके, जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्थमंत्री पदाच्या काळात या जीएसटी भवनाला मंजुरी मिळाली होती. 22 कोटींचे अंदाजपत्रक असलेली ही इमारत मात्र कामे प्रलंबित असल्याने 30 कोटींवर पोचली होती. त्यामुळे इमारतीचे लोकार्पण रखडले होते. सर्व आधुनिक सुविधा असलेल्या या इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ऍड आशीष जयस्वाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग सर्व पायाभूत सुविधांसह इमारत कशी उभारू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रपूरचे जीएसटी भवन असल्याचे कौतुक केले. या तीन मजल्य इमारतीतुन राज्यातील जनतेला सर्वोत्तम सेवा प्रदान केली जाईल असा विश्वास जयस्वाल यांनी व्यक्त केला.
0
0
Report

ऑपरेशन टायगर के बाद भास्कर जाधव के बयान से राजनीतिक हलचल तेज

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. 'ऑपरेशन टायगर'नंतर भास्कर जाधवांचे थेट बाण! दोन सूचक स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ.. अँकर 'ऑपरेशन टायगर'नंतर आता राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय. पण याच दरम्यान, शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या एका सोशल मीडिया स्टेटसने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय.अत्यंत सूचक आणि मोजक्या शब्दांत भास्कर जाधवांनी अप्रत्यक्षपणे मोठा निशाणा साधलाय.. ​जाधवांनी आपल्या पहिल्या स्टेटसमध्ये लिहिलंय— म्हणजेच,केलेल्या चांगल्या कामाची कोणी पावती देत नाही,पण एखादी चूक झाली की मात्र तिचा हिशोब ठेवला जातो,अशी खंत त्यांनी व्यक्त केलीये.. हजारो अच्छायोकी कोई रसीद नही होती.. पर गलती का पुरा हिसाब रखा जाता है.. म्हणजेच, केलेल्या चांगल्या कामाची कोणी पावती देत नाही,पण एखादी चूक झाली की मात्र तिचा हिशोब ठेवला जातो, अशी खंत त्यांनी व्यक्त केलीये.. एवढ्यावरच न थांबता,त्यांनी दुसरं स्टेटस टाकत शिक्षण व्यवस्थेच्या बहाण्याने थेट यंत्रणेलाच टोला लगावलाय..जाधव लिहितात— "तयार मुलं हवीच, मग शिक्षक कशाला.." 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधवांनी टाकलेले हे स्टेटस नक्की कोणासाठी आहेत? पक्षश्रेष्ठींवरचा हा नाराजीचा सूर आहे की विरोधकांना दिलेला सूचक इशारा? जाधवांच्या या 'पॉवरफुल' स्टेटसचे नेमके राजकीय अर्थ काय निघतात, याकडे आता सर्वांचे डोळे लागलेत..
0
0
Report
Advertisement

अंबरनाथ में वृद्ध महिला की सोनसाखळी खींची गई; चोर पकड़ाया—सीसीटीवी में कैद

Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये वृद्ध महिलेची सोनसाखळी खेचली! कानसई परिसरातील घटना सीसीटीव्हीत कैद चोरट्याला नागरिकांनी पकडून दिलं पोलिसांच्या ताब्यात अंबरनाथमध्ये एका वृद्ध महिलेची सोनसाखळी खेचल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी सोनसाखळी चोरून पळणाऱ्या चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. अंबरनाथच्या कानसई परिसरातील जुन्या चौधरी हॉस्पिटल समोर बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या परिसरात राहणाऱ्या वृद्ध महिला त्यांच्या पतीसोबत इमारतीच्या कट्ट्यावर बसल्या होत्या. यावेळी सोनसाखळी चोर तिथे आला आणि बराच वेळ त्यांच्या आजूबाजूला फिरत राहिला. वृद्ध महिला सात वाजताच्या सुमारास पतीसोबत स्कूटरवर घरी जाण्यासाठी निघाल्या असता या चोरट्याने मागून येऊन त्यांच्या सोनसाखळी ओढली आणि पळून गेला. मात्र यावेळी महिलेने आणि त्यांच्या पतीने चोरट्याचा पाठलाग करत आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी या चोरट्याला पकडलं आणि पोलिसांना पाचारण करत त्यांच्या ताब्यात दिलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत चोरट्याला अटक केली आहे. या घटनेनंतर वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिसांनी या भागात गस्त वाढवण्याची मागणी केली जातेय.
0
0
Report

संजय राऊत पर सादाभाऊ खोत का हमला: शिवसेना को लेकर उकसाने वाले आरोप

Sangli, Maharashtra:संजय राऊत शिवसेना जिवंत ठेवतील असं वाटत नाही. राख करून फुंकून टाकणार - आमदार सदाभाऊ खोत. संजय राऊत हे शिवसेना जिवंत ठेवतील, असं वाटत नाही. त्यांच्या हयातीमध्ये शिवसेना फुकून, राख सुद्धा फुकुन ठेवतील, असं वाटतंय, अशी घणाघाती टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांवर केली आहे. जे गेले ते विकाऊ होते, का ? त्यांना तुम्ही बाजारातले जनावर समजता, का ? तसेच मातोश्रीच्या बाहेर अनेक आमदार प्रदक्षिणा घालायचे, तुम्ही गोशा लावून घरात झोपणार, आणि सामान्य माणसाला रस्त्यावर लढायला लावणार आणि तुम्ही सत्तेचा गाजर हातात घेणार, त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य कार्यकर्ता शहाणा झाला आहे, असा टोला देखील आमदार सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर संजय राऊतां कडून करण्यात आलेल्या पंधरा कोटीच्या आरोपांवरून सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे, ते सांगली मध्ये बोलत होते.
0
0
Report
Advertisement

रामदास कदम के बयान से शिवसेना में घमासान: संजय राऊत के खिलाफ बढ़ती बयानबाजी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रामदास कदम pointer.. महाराष्ट्र राज्य हे कायद्याने चालतं.. आतापर्यंत संजय राऊत यांच्या वरती किती केसेस आहेत किती लोकांचे हातपाय तोडले किती लोकांचे मर्डर केले.. कोणीही काहीही बोलतोय.. शिवसेना आम्ही वाढवली आतापर्यंत आम्ही किती केसेस घेतल्यात.. ही भाषा कोणालाही शोभते का काल राऊत यांनी शिवीगाळ केली महाराष्ट्र त्यांना आज थुंकतोय.. एक सुशिक्षित माणूस सामनाचा संपादक आणि शिवराळ भाषा आणि तेही खासदारांना.. हे करण्यापेक्षा ते का गेले याचं तुम्ही आत्मचिंतन करायला हेवं होतं.. *संजय राऊत तुमच्यामुळेच ही उद्धव ठाकरेंवरती वेळ आली* तुमच्या पायाखालची वाळू आता घसरलेली आहे.. कायदा आणि संविधानापेक्षा कोणीही मोठा नाही.. कुठून गेलेल्या खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर तुमच्या निर्णयाची किंवा निर्णयाचा प्रश्न येतच कुठे.. *उद्धवजी शिवसेना मराठी माणसाची होती तुमच्या आणि आदित्य ठाकरे यांची एकट्याची नव्हती* तुम्ही त्यांच्यावर हुकूमशाही चालवली त्याचे हे परिणाम आहेत.. तुम्ही काय बघताय तुम्ही कसे बोलताय तुमची आता कुवत आहे का.. (संजय राऊत) अशी वायफळ भाषा तुम्ही बोलू नका हे बिहार नाही.. *ही लोकशाही आहे इथे कायद्याचा धाक आहे अशी बडबड पुन्हा केली तर पुन्हा आत मध्ये जाऊन बसाल..संजय राऊत यांना रामदास कदम यांचा सल्ला..*
0
0
Report

राजेश क्षीरसागर ने मंत्रिपद न मिलने पर नाराजगी जताई

Kolhapur, Maharashtra:शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मंत्रिपद न मिळाल्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. 2024 च्या निवडणुकीनंतर मंत्रिपदाची अपेक्षा होती, मात्र पक्षासाठी सातत्याने संघर्ष करूनही आपल्याला डावलण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला कोल्हापुरातून सर्वप्रथम पाठिंबा दिल्याचे सांगत, पक्ष वाढीसाठी आपण मोठे कष्ट घेतल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दोषारोप नसल्याचे स्पष्ट करत, अडीच वर्षांनंतर मंत्रिपद देण्याचे आश्वासन मिळाले असून त्याची अपेक्षा कायम असल्याचे क्षीरसागर म्हणाले. तसेच नवीन येणाऱ्यांपेक्षा जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आपण आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले。
0
0
Report

न नागपुर नगर निगम चुनाव: निरीक्षक के अनुपस्थित रहने से कांग्रेस नगरसेवकों में नाराज़गी

Nagpur, Maharashtra:नागपूर परिषद पोटनिवडणूक मतदान सुरु असताना काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी उघड झालीय निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त झालेले ज्येष्ठ नेते नितीन राऊत मतदान केंद्रावर अनुपस्थित असल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त. महापालिकेतील काँग्रेस नगरसेवक विवेक निकोसे यांनी निरीक्षकांच्या गैरहजेरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेदरम्यान निरीक्षकांची उपस्थिती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात निरीक्षकांची नियुक्ती करताना पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त. आगामी निवडणुकीत जबाबदार व कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध राहणाऱ्या व्यक्तीची निरीक्षक म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी निकोसे यांनी व्यक्त केली. या संदर्भातील माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बाईट - विवेक निकोसे, काँग्रेस नगरसेवक
0
0
Report
Advertisement

मालेगांव-नाशिक: महायुती के उम्मीदवार के पक्ष में दमदार बयान, जीत की उम्मीद

Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) : ब्रेकींग... - मी केवळ कागदोपत्री उमेदवार आहे ; मी महायुतीसोबतच.. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दाच्या पलीकडे मी नाही.. - माहयुतीचाच विजय होणार ; मतदानाच्या अगोदर प्रसाद हिरे यांची प्रतिक्रिया.. - भारतीय जनता पक्ष म्हणून मला निवडणूक लढवायची होती, आणि निवडून यायचं होती..परंतु माझ्या नेत्यांनी दिलेल्या शब्दासाठी मी महायुतीसाठी जीवाचे रान करील..मी महायुतीबरोबर आहे..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दाच्या पलीकडे मी नाही..ही निवडणूक भाजपकडून लढवावी, आणि निवडून यावं अशी आशा होती..शिवसेनेने दिलेला उमेदवार कुचकामी आहे,अकार्यक्षम आहे ही वस्तुस्थिती आहे..पण आमच्याकडून युती धर्म म्हणून कुठलीही प्रतारणा होणार नाही.. महायुतीचाच उमेदवार विजयी होईल याची मला खात्री आहे..
0
0
Report

महायुती की एकजुटता बनाम सत्ता के बीच: सांगली-सातारा चुनाव में उठा शिंदे-शंकर का मुद्दा

Satara, Maharashtra:सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचे मतदान आज पार पडले. महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभय जगताप यांच्यात थेट लढत झाली. संख्याबळाच्या गणितानुसार महायुतीचे पारडे जड मानले जात असले, तरी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेली नाराजी आणि त्यातून मंत्री शंभूराज देसाई व मंत्री मकरंद पाटील यांची भूमिका काय राहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र मतदानाच्या दिवशी महायुतीने एकजुटीचे प्रदर्शन करत सर्व चर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्वाभिमानाचा मुद्दा पुन्हा उपस्थित करत महायुतीवर निशाणा साधला. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गदारोळानंतर महायुतीतील नाराजी उघडपणे समोर आली होती. मंत्री शंभूराज देसाई यांनी "येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू अशी आमची अवस्था झाली आहे," असे वक्तव्य करत आपली नाराजी बोलून दाखवली होती. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत या नाराजीचा परिणाम दिसणार का, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करत महायुतीचा उमेदवार कोणत्याही परिस्थितीत विजयी झाला पाहिजे, असा स्पष्ट संदेश दिला. त्यानंतर मंत्री मकरंद पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी बैठका घेऊन आपल्या सदस्यांना युतीधर्म पाळण्याच्या सूचना दिल्या. मतदानाच्या दिवशी महायुतीची ताकद दाखवण्यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले आणि उमेदवार धैर्यशील कदम एकत्र दिसले. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि मित्रपक्षांचे सदस्य एकत्र आणत महायुतीने एकसंघतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. या वेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महायुतीच्या विजयाबाबत पूर्ण विश्वास व्यक्त केला. आमच्याकडे असलेल्या मतांपेक्षाही अधिक मतदान मिळेल आणि महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत, असा दावा त्यांनी केला. एकीकडे महायुती एकजूट दाखवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मात्र जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महायुतीचाच उमेदवार व्हावा म्हणून आम्ही सहकार्याची भूमिका घेतली होती. मात्र तुमच्याच मित्रपक्षाने तुम्हाला होऊ दिले नाही. त्या संघर्षात महिला सदस्यांच्या मनात निर्माण झालेली खंत आजही कायम आहे, असे शिंदे म्हणाले. स्वाभिमानाला ठेच पोहोचते तेव्हा पक्ष, विचारधारा किंवा धर्म पाहिला जात नाही. त्यावेळी एकच धर्म असतो, तो म्हणजे स्वाभिमान, असा पलटवार करत शिंदे यांनी महायुतीतील नाराजीच्या जखमा अद्यాపभर नाहीत असे सूचीत केले. महायुतीतील नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी आज भाजप नेत्यांनी प्रयत्न केले मात्र शशिकांत शिंदे यांनी पुन्हा स्वाभिमानाचा मुद्दा उपस्थितल्याने जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील वाद अजूनही राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या निवडणुकीच्या निकालातून महायुतीची एकजूट किती भक्कम आहे, याचे उत्तर निकालानंतर मिळणार की महाविकास आघाडीला महायुतीतील वादाचा अप्रत्यक्ष फायदा होणार हे पहावे लागणार आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top