416416
Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक
Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
दिनदहाड़े लूट: अकोला के आदर्श कॉलनी में बंदूक दिखाकर सोना-चांदी लूट, पुलिस तलाश में
Akola, Maharashtra:अकोला शहरातील गौरक्षण रोड परिसरातील आदर्श कॉलनी येथे असलेल्या सप्तश्रृंगी ज्वेलर्समध्ये भरदिवसा बंदुकीचा धाक दाखवत सोन्या-चांदीच्या ऐवजाची लूट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सराफा व्यवसायिक दुकानात एकटे असताना हातात बंदूक घेऊन एक अज्ञात व्यक्ती दुकानात शिरला. आरोपीने व्यवसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील मौल्यवान सोन्या-चांडीचा ऐवज लुटला आणि घटनास्थळावरून पसार झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, हा दरोडेखोर एकटाच आला होता.घटनेनंतर व्यवसायिकाने आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. या प्रकरणी खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.दिवसाढवळ्या घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या गस्त आणि सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.0
0
Report
जुन्नर में पिता ने साढ़ेतीन साल की बेटी की गला घोंटकर हत्या, बेटे पर भी हमला
Barav, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी सोडून गेल्याच्या रागातून एका पित्याने स्वतःच्या साडेतीन वर्षांच्या मुलीचा गळा आवळून खून केला, तर पाच वर्षांच्या मुलालाही जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना आळेफाटा परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. सागर सदाशिव शिंदे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो मोशी येथील रहिवासी आहे. आरोपीची पत्नी सहा महिन्यांपूर्वी घर सोडून गेल्यानंतर तो दोन लहान मुलांसह राहत होता. कौटुंबिक तणाव आणि मानसिक चिडचिडीतून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. आरोपीने मुलगा आर्यन आणि मुलगी हर्षदा यांना फिरायला नेतो असं सांगून घराबाहेर नेलं. त्यानंतर पुणे-नाशिक महामार्गालगत संतवाडी परिसरातील निर्जन जंगलात नेऊन प्रथम मुलाचा गळा दाबून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मुलगा मृत झाल्याचं समजून त्याला जंगलात टाकून दिल्यानंतर आरोपीने मुलगी हर्षदाचा गळा आवळून निर्घृण खून केला. आर्यन हा जंगल परिसरात बेवारस अवस्थੇत आढळून आळेफाटा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने दाखवलेल्या ठिकाणाहून पोलिसांनी चिमुरडीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात खून आणि खूनाचा प्रयत्न यांसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.0
0
Report
गोवा में पैरासेलिंग हादसा: पर्यटक महिला मौत के करीब
Ratnagiri, Maharashtra:गोव्यात पॅरासेलिंगचा थरार;..दोरी गळ्याभोवती आवळल्याने पर्यटक महिला मृत्यूच्या दारात गोव्याचा समुद्र... पर्यटकांची गर्दी... आणि हवेत झेपावणारे पॅरासेलिंग! पण याच पॅरासेलिंगचा आनंद एका महिलेसाठी मृत्यूचा सापळा ठरणार होता. अवघ्या एका मिनिटाचा तो थरार, गळ्याभोवती आवळलेला फास आणि डोळ्यासमोर दिसणारा काळ! सुष्मिता नावाच्या पर्यटक महिलेसोबत गोव्याच्या समुद्रात नेमकं काय घडलं? पाहुयात या विशेष रिपोर्टमधून... निळाशार समुद्र आणि आकाशात पॅरासेलिंगचा आनंद... प्रत्येक पर्यटकाचं हे स्वप्न असतं. पण याच स्वप्नाचं रूपांतर भयानक स्वप्नात कसं होतं, याचा प्रत्यय गोव्यात आला आहे. सुष्मिता नावाची पर्यटक महिला जेव्हा पॅरासेलिंग करत होती, तेव्हा तांत्रिक बिघाडामुळे ती थेट समुद्रात कोसळली. मात्र, भयानक गोष्ट ही की, पॅरासेलिंगची दोरी तिच्या गळ्याभोवती एखाद्या फासासारखी आवळली गेली..0
0
Report
Advertisement
लातूर में अस्पतालों के लिए ड्रम में डीज़ल मानक, प्लास्टिक कैन बैन
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... लातूर जिल्ह्यात हॉस्पिटलसाठी अधिकृत बॅरलमधून डिझेल पुरवठ्यास परवानगी.... चीफ कंट्रोलर ऑफ एक्सप्लोझिव्ह मंजूर ड्रममधूनच इंधन विक्रीचे आदेश.... प्लास्टिक कॅन आणि अनधिकृत बॅरलमधून डिझेल विक्रीला बंदी.... वैद्यकीय सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय.... नियमभंग करणाऱ्या पेट्रोल पंप चालकांवर कडक कारवाईचा इशारा..... लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात डिझेल आणि पेट्रोल हे प्लास्टिक कॅन मध्ये सर्रास दिलं जात आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात इंधन विक्रीबाबत प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे... अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरळीत राहाव्यात यासाठी आता सरकारी आणि खासगी रुग्णालयांन आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवांना अब चीफ कंट्रोलर ऑफ एक्सप्लोझिव्हने मंजूर केलेल्या अधिकृत बॅरल किंवा ड्रममधून डिझेल पुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र प्लास्टिक कॅन किंवा अनधिकृत बॅरलमध्ये डिझेल देण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. डिझेल देताना संबंधित हॉस्पिटलची कागदपत्रे तपासणे, नोंद ठेवणे आणि सर्व सुरक्षा नियमांचे पालन करणे पेट्रोल पंप चालकांना बंधनकारक असणार आहे... नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पेट्रोलियम ॲक्टनुसार कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.0
0
Report
वाशीम में तूफान से सोलर खंबा गिरा, 6 घायल; दो महिलाएं गंभीर
Washim, Maharashtra:वाशिमच्या मानोरा तालुक्यातील वडगाव इथ वादळी वाऱ्यामुळे ग्रामपंचायतीचा सोलर खांब विद्युत तारांवर कोसळून अपघात झालाय. यात सोलर खांब विद्युत तारांवर पडल्याने विद्युत तारा तुटून थेट लग्न मंडपावर पडल्याने एकच गोंधळ उडाला होता. या घटनेत सहा जण जखमी झाले असून, विजेचा शॉक लागून काही जण किरकोळ जखमी झाले. तर सोलर खांब अंगावर पडल्याने 2 महिला गंभीर जखमी झाली आहेत. गंभीर जखमी महिलेला उपचारासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे दाखल करण्यात आले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे लग्नस्थळी काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.0
0
Report
नवापूर में बर्ड फ्ल्यू से पोल्ट्री उद्योग की मंदी: हजारों रोजगार खतरे में
Dhule, Maharashtra:पोल्ट्री उद्योगाचे देशातलं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवापूर परिसरामध्ये बर्डफ्लू चा विळखा पडला आहे, या विळख्यामुळे या परिसरात पोल्ट्री उद्योग धोक्यात आला आहे. व्यवसायिकांचे कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत. त्यासोबतच आता बेरोजगारीच नव संकट या भागामध्ये उभे राहत आहे, तरुणांवर आणि पोल्ट्री व्यवसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. बर्ड फ्ल्यूमुळे नवापुरातील कोट्यावधींची उलाढाल अचानक ठप्प झाली आहे. लाखो कोंबड्यांचं कलिंग आणि लाखो अंडी नष्ट करण्यात आली आहेत. मात्र या संकटाने आता बेरोजगारीचेही नवं संकट उभं केलं आहे. हजारो कामगारांवर उपामारीची वेळ बर्डफ्लू मुळे आली आहे. या भागात कधीकाळी 40 पेक्षा अधिक पोल्ट्री उद्योग सक्रीय होते. बर्ड फ्लूच्या माऱ्यामुळे आता ती संख्या 25 च्या खाली आलेली आहे आणि आता पुन्हा बर्ड ठेवणे डोकं वर काढल्यामुळे या भागात पोल्ट्री व्यवसायिक देशोधळीला लागले आहेत तर पोल्ट्री उद्योग बंद पडल्यामुळे हजारो हात हे बेरोजगार झाले आहेत. कामगार चिंकन शॉप मालक यांच्या सांगण्यावरून ही स्थिती स्पष्ट होते. महाराष्ट्रातील पोल्ट्रीहबमुळे ओळखल्या जाणाऱ्या नवापूरात सध्या बर्ड फ्ल्यूचे संकट असून, त्यामुळे येथील रोजची एक कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. हजारावर कामगारांचे हात रिकामे झाले आहेत. दरम्यान, अंग भाजणाऱ्या तापमानात PPE कीट घालून क्लिंग ऑपरेशन राबविणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांची अक्षरशः लाहीलाही झाली आहे. त्यामुळे व्यवसाय ठप्प होत असून, गेल्या २० वर्षात ११ पोल्ट्रीफार्म बंदही झाले आहेत. रोज जवळपास 10 ते 12 लाख अंड्यांचा पुरवठा महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेस आलेला नवापूर हे पोल्ट्रीहब म्हणून परिचित आहे. केवळ १० किलोमीटर अंतराच्या परिसरात येथे ३८ पोल्ट्री फार्म असून, जवळपास १२ लाखांपेक्षा अधिक पक्षी आहेत. याशिवाय गुजरातची सीमा जवळच असल्याने नवापूरच्या उद्योजकांनी गुजरातमध्येही भव्य पोल्ट्री फार्म सुरू केले आहेत. या भागातून रोज जवळपास १२ ते १४ लाख अंडी महाराष्ट्र व गुजरातमधील विविध भागात पाठविली जातात. मात्र या संकटामुळे पशुसंवर्धन विभागाने कठोर उपाय योजना राबवत बर्ड फ्यूचरसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या वीस वर्षांमध्ये तीन वेळा बर्ड फ्लूचा संकट या परिसरावर आलेला आहे. बर्ड फ्यूच्या संकटामुळे या भागातले उद्योग हे आता हळूहळू कमी होत चाललेले आहेत. पोल्ट्री उद्योग या भागातून कमी होत असल्याने बेरोजगारीचे प्रमाण हे वाढत आहे. आता नव्याने बर्डफ्लू च्या या संकटामुळे हजारो बेरोजगार झाले असून, येणाऱ्या अनेक महिन्यांपर्यंत या बर्ड फ्लूचा फटका पोल्ट्री उद्योगाला जाणवणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी शक्यता नाही.0
0
Report
Advertisement
कामोठे में सुरक्षा गार्ड ने 3 नाबालिग लड़कियों के साथ दुराचार; स्कूल ने गुड टच
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई के कामोठे में 3 नाबालिग लड़कियों का विनयभंग होने की धक्कादायक घटना सामने आई है। सोसाइटी के पार्किंग क्षेत्र में इमारत के सुरक्षा गार्ड ने यह कृत्य किया। एक लड़की की स्कूल में गुड टच-बैड टच के बारे में शिक्षक को जानकारी दी गई। पालकों को जानकारी मिलने पर सोसाइटी के सीसीटीवी फुटेज देखने पर पाया गया कि आरोपी ने 6 वर्ष, 7 वर्ष और 9 वर्ष की तीन नाबालिग लड़कियों के साथ हिंसक क्रिया की। मामले में आरोपी सुरक्षा गार्ड पंकज सिंह के खिलाफ कामोठे पुलिस थाने में पॉक्सो कानून के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस ने आरोपी पंकज सिंह को तुरंत गिरफ्तार कर लिया है और आगे जांच जारी है।0
0
Report
नायब तहसीलदार को जेसीबी से खींचे जाने का वायरल वीडियो: अवैध खनन पर पुलिस एक्शन तेज की
Nagpur, Maharashtra:नागपूर जिले के कुही तालुक के बोरी नाइक शिवार में अवैध मुरूम उत्खनन के लिए कार्रवाई करते समय नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे को जेसीबी पर लटकाकर लगभग तीन से चार किलोमीटर तक खींचे जाने की घटना घटी। नागपूर ग्रामीण पुलिस ने आरोपी को गिरफ्तार किया है और जेसीबी चालक के खिलाफ जीवित मारने का प्रयास और अवैध उत्खनन के मामले दर्ज किए गए हैं। इस बीच महसूल पथक द्वारा दबिश दी जा रही थी पर नागपूर पुलिस को किसी भी मदद की मांग या सूचना नहीं दी गई थी, ऐसी जानकारी भी सामने आई है। इस घटना के बाद अवैध उत्खनन माफियाओं द्वारा सुरक्षा व्यवस्था और पुलिस सहायता पर सवाल उठ रहे हैं।0
0
Report
कल्याण में तीन जगहों पर हवा शुद्धीकरण प्रणाली स्थापित, प्रदूषण कम होने की उम्मीद
Kalyan, Maharashtra:कल्याण शहरामध्ये होत असलेल्याप्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता सातत्याने ढासळत आहे. ही गुणवत्ता सुधारण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने कल्याण शहरातील तीन प्रमुख ठिकाणी हवा शुद्धीकरण प्रणाली सिस्टम बसवली आहे. दरम्यान ही प्रणाली हवेमधील सगळं प्रदूषण खेचून घेते आणि शुद्ध केलेले हवा पुन्हा वातावरणात सोडते. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेत एक चांगली सुधारणा पाहायला मिळते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हवा गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत एका तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली बसवण्यात आली आहे. टाटा नाका, १०० फूट रोड आणि वाणी विद्यालयाच्या बाहेर ही उपकरणे बसवण्यात आलेली आहेत. शहरातील महत्त्वाच्या भागातील प्रदूषणाचा धोका कमी करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून निधी पुरवला गेला असून कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने तीन वर्षाच्या कालावधीसाठी या प्रणालीची देखभाल दुरुस्ती कंत्राटदाराकडे सोपवलं आहे. दरम्यान या प्रणालीमुळे कल्याण शहरातील हवेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.0
0
Report
Advertisement
परळी के निजी अस्पताल में इलाज की लापरवाही से गर्भस्थ शिशु की मौत, 19 घंटे पोट में भ्रुण रहा
Beed, Maharashtra:बीड: गर्भातील बाळाचा मृत्यू, तब्बल 19 तास मृत भ्रुण पोटात ठेवले...! परळीतील धक्कादायक घटना,उपचारात हलगर्जीपणा केल्याचा पतीचा आरोप...!! परळीच्या बीडच्या परळीतील एक खाजगी रुग्णालयात डॉक्टरांच्या उपचारातील हलगर्जीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप महिलेच्या पतीकडून करण्यात आलाय. त्याचबरोबर या ह्रदयद्रावक घटनेनंतरही गांभीर्य न घेता या गरोदर मातेच्या पोटात तब्बल 19 तास मृत भ्रुण ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या डाॅक्टरच्या हलगर्जीने बाळ तर दगावलेच पण त्यानंतर या बाळाच्या मातेची प्रचंड हेळसांड करुन तिच्याही जीवाशी खेळ केल्याचा अमानवीय व वैद्यकीय क्षेत्राला डाग लावणारा गंभीर प्रकार या डाॅक्टरांनी केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरां विरोधात आता जिल्हा शल्य चिकित्सक,परळी शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून कर्तव्यात कसूर, बाळाच्या मरणास कारणीभूत व मातेच्या जीवाशी खेळण्याच्या प्रकाराची सखोल चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी मागणी महिलेच्या पतीने केली आहे. तर या प्रकरणी चार सदस्यांची चौकशी समिती नेमली असून लवकरच अहवाल मागवला जाईल असा विश्वास शल्य चिकित्सकानी व्यक्त केला आहे.0
0
Report
उल्हासनगर अस्पताल में मौत के बाद डॉक्टर-स्टाफ का विरोध, तोड़फोड़ से हड़कंप
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात डॉक्टरांच कामबंद आंदोलन. रुग्णांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी केली होती रुग्णालयाची तोडफोड. तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल आणि अटकेची डॉक्टरांची मागणी. Anchor : उल्हासनगर जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयामध्ये बुधवारी रात्री दीडच्या सुमारास रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली होती यामध्ये काही डॉक्टरांना धक्काबुक्की देखील करण्यात आली होती या विरोधात सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल आहे. Vo : उल्हासनगर जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयामध्ये भगवान निंबोरे हा रुग्ण उपचार घेत असताना त्याचा बुधवारी रात्री एक ते दीड च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर संबंधित नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड करत डॉक्टरांना धक्काबुक्की करत मारहाण केले तसेच रुग्णालयातील काचा देखील फोड़ण्यात आला या विरोधात आज सकाळपासूनच रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे दरम्यान घटनेस्थळी पोलीस आणि महापौर अश्विनी निकम हे दाखल झाले असून संबंधित व्यक्तीवर गुन्हा आणि त्याला अटक करण्याची मागणी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे, यावेळी डॉक्टरांनी संबंधित राजकीय कार्यकर्ते अशा तोडफोड करत असतात त्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी यावी करण्यात आली आहे याबाबत महापौरांनी हे सर्व आरोप फेटाळत ते आमचे कार्यकर्ते नाहीत आम्ही जनतेचे सेवक आहोत संबंधित जो कोणी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल होणार अशी प्रतिक्रिया महापौर यांनी दिली आहे. Byte : अश्विनी निकम महापौर Byte : शिवाजी रगडे, सामाजिक कार्यकर्ता Byte : डॉक्टर चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर0
0
Report
headline
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ कडक ऊन तापत असतानाच अचानक वातावरणात बदल होऊन सोसायट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासহ मुसळधार पाऊस बरसला. अचानक झालेल्या या पावसामुळे नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली. वादळी वाऱ्यामुळे उन्हाळी मूग तीळ व ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले. झाडांना लगडलेले आंबे देखील मोठ्या प्रमाणात पडल्याने नुकसान झाले आहे. एकीकडे उन्हाच्या झळांनी नागरिक घामाघुम होत असतानाच अचानक बरसलेल्या अवकाळी पावसामुळे उकड्यातून काहीसा दिलासा मिळाला आहे.0
0
Report
Advertisement
म्हसळा नगरपंचायती میں शिवसेना کی भगوا لہر، شاہید جانجزیرकर جیتے नगराध्यक्ष
Chendhare, Maharashtra:म्हसळा नगरपंचायतीवर अखेर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मंत्री अदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना–काँग्रेस आघाडीने विजय मिळवत राजकीय समीकरणे बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे शाहिद जंजिरकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेडगे यांचा पराभव केला. जंजिरकर यांना 9 मते मिळाली, तर राष्ट्रवादीला 6 मतांवर समाधान मानावे लागले. गेली दहा वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या म्हसळा नगरपंचायतीवर आता शिवसेनेचा भगवा फडकला असून, मंत्री भरत गोगावले यांच्या रणनीतीमुळे हा विजय शक्य झाला आहे. निकालानंतर शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजय साजरा केला.0
0
Report
ओबीसी जनगणना में स्वतंत्र कॉलम के लिए घर-घर स्टिकर के साथ विरोध तेज़
Bhandara, Maharashtra:ओबीसी जनगणनेत स्वतंत्र कॉलमच्या मागणीसाठी जनजागृती....घरोघरी स्टिकर लावत निषेध अभियान.... होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम नसल्याने समाजबांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विविध संघटनांचे पदाधिकारी घरोघरी जाऊन नागरिकांना याबाबत माहिती देत जनजागृती करत आहेत. जनगणना प्रक्रियेवर निषेध नोंदवत जनगणनेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य करू नये, असे आवाहनही करण्यात येत आहे. यासाठी तशा आशयाचे स्टिकर घरांवर लावून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. ओबीसी समाजाची अचूक नोंद व्हावी, यासाठी स्वतंत्र कॉलमची मागणी करण्यात येत असून येत्या काही दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे。0
0
Report
अकोला के पातूर-नंदापूर में आंधी-बारिश ने किसानों की परेशानी बढ़ा दी
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील पातूर नंदापूर येथे आज 12 च्या sुमारास अचानक हवामानात मोठा बदल झाला. चक्रीवादळासह जोरदार वारे, गारपीट आणि मुसळधार पावसाने परिसराला अक्षरशः झोडपून काढले. अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पातूर नंदापूर परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्याची माहिती समोर आली आहे. काही भागात विजांचा कडकडाट आणि गारपीटही झाली. अचानक झालेल्या या बदलामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. विशेषतः उन्हाळी पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी काढणीसाठी तयार ठेवलेले पीक आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. दरम्यान, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
