icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सांगली के बुर्ली में परडी सोहळा: ढोल-ताल और पालखी मिरवणूक की धूम

Sangli, Maharashtra:सांगलीच्या पलूस तालुक्यातील बुर्ली येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणाऱ्या बंच्याप्पा बनात परडी सोहळा रंगला. दर तीन वर्षांनी हा परडी सोहळा आयोजित करण्यात येतो, कृष्णामाईला परडी सोडण्याचा परंपरा असून यानिमित्ताने बांधवांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले, ढोल कैताळाच्या गजर आणि फटाक्यांच्या आतशबाजीसह कृष्णानदी पर्यंत मानाच्या पालख्यांची मिरवणूक संपन्न झाली. यानिमित्ताने बुर्ली, आमणापूर, कुंडल रामानंदनगर येळावी यासह महाराष्ट्र, कर्नाटकातील धनगर बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
0
0
Report

नांदेड हल्दी बाजार में किसानों ने लिलाव रोककर भाव गिराने का आरोप लगाया

Nanded-Waghala, Maharashtra:Anchor - नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरु असून व्यापाऱ्यांनी हळदीचे भाव पाडल्याने शेतकरी संघटनेने आक्रमक होत लिलाव बंद पाडला. प्रति क्विंटल दोन ते तीन हजार रुपयांने भाव पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. युद्धाचे कारण पुढे करीत व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची खुली लूट होत असल्याचा आरोप होतोय. नांदेडच्या लगत असलेल्या जिल्ह्यात हळदीला सोळा ते साडेसोळा हजार भाव मिळतोय मात्र नांदेडच्या बाजार समितीत केवळ साडेबारा ते तेरा हजार रुपये भाव दिला जातोय. व्यापाऱ्यांनी संगणमत करून हळदीचे भाव पाडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. व्यापारी हळदीचे भाव पाडत असताना बाजार समिती मात्र यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. व्यापारी आणि बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांचे संगणमत असल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केलाय. जोपर्यंत 16 हजार रुपये भाव मिळत नाही तोपर्यंत लिलाव प्रक्रिया सुरू न करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय.
0
0
Report
Advertisement

बिल्डिंग गेट गिरने से 13 माह की बच्ची की मौत, नासिक शहर में शोक

Nashik, Maharashtra:आई के साथ कचरा फेंकने के लिए गई 13 महीने की बच्ची आराध्या दीपक मामुलकर के ऊपर बिल्डिंग का गेट गिर गया जिससे वह गंभीर रूप से घायल हो गई और बाद में उसकी मृत्यु हो गई। मृतक का नाम आराध्या दीपक मामoolकर है। घटना नासिक शहर में हुई और शहर में दुख की लहर दौड़ गई। सोमवार दोपहर करीब 1 बजे नेहा नाम की माँ अपने बच्ची आराध्या के साथ बिल्डिंग के नीचे कचरा डालने के लिए गईं थीं। कचरा फेंकने के बाद लौटते समय गेट को नीचे खींचते समय ट्रक ऊपर से गिरे गेट ने आराध्या के माथे पर चोट पहुंचाई। उसे जिला अस्पताल में भर्ती किया गया, लेकिन उपचार से पहले उसकी मौत हो गई। दुर्घटना की खबर गंगापुर पुलिस ठाणे के अकस्मात मृत्यु रिकॉर्ड में दर्ज की गई है। पुलिस ने कहा कि जो भी दोषी पाया जाएगा उसके खिलाफ कड़ी कार्रवाई होगी और जांच जारी है। बच्चों की सुरक्षा के लिए लोगों से निवेदन किया गया है कि अपने बच्चों को बाहर निकालते समय अधिक सावधानी बरतें ताकि ऐसी घटनाएं न हों।
0
0
Report

धाराशिव में जात पंचायत के बहाने महिला पर मारपीट, 2.55 लाख दंड वसूल; पुलिस मामला दर्ज

Dharashiv, Maharashtra:तुमच्यामुळे देव कोपला, मुलाचा अपघात झाला, धाराशिव येथील महिलेला जात पंचायतीतून अडीच लाखाचा ओठावला दंड. गुन्हा दाखल ANCHOR धाराशिव जिल्ह्यात अंधश्रद्धेला खतपाणी घातणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘तुझ्या मुलाने आमच्या देवाच्या कार्यक्रमात जेवल्यामुळे देव कोपला आणि माझ्या मुलाचा अपघात झाला’, असा आरोप करत एका महिलेला जात पंचायतीतून बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना धाराशिव शहरातील जुना बस डेपो परिसरातील पारधी वस्तीत घडली. या प्रकरणात पीडित महिला गायत्री श्याम चव्हाण (वय 35) असून, आरोपी म्हणून सांगिता जगु पवार, ज्योती ज्योतीराम पवार, ज्योतीराम जगु पवार आणि प्रियंका गणेश पवार यांची नावे समोर आली आहेत. आरोपी महिलांनी जात पंचायत बसवून गायत्री चव्हाण यांना चप्पलने मारहाण केली, तसेच तब्बल २ लाख ५५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यापैकी ६० हजार रुपये तात्काळ वसूल केल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अंधश्रद्धा आणि जात पंचायतच्या या अमानवी प्रथेविरोधात आता कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.
0
0
Report

सोलापुर में दोपहर 42.7°C तापमान, शाम को 11.6 मिमी बारिश

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात दुपारी तापमानाचा पारा 42.7 अंशावर तर सायंकाळी 11.6 मिमी गारांसह जोरदार पावसाची हजेरी - सोलापूरकर अनुभवतायत लहरी निसर्ग - शहरात मंगळवारी दुपारी तापमानाचा पारा 42.7° वर तर सायंकाळी अर्ध्या तासात 11.6 मिमी गारांसह पाऊस - कमी दाबाच्या पट्ट्याचा होतोय परिणाम तर पुढील पाच दिवस असणार पूर्वमोसमीचे - दिवसभरात उन्हाची तीव्रता आणि उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवत असताना सायंकाळी मात्र सोलापूरकरांना मोठा दिलासा - वादळी वाऱ्यासह पावसाच्या हजेरीने शहरातील अनेक भागातील बत्ती गुल - सतत बदलणाऱ्या हवामानामुळे एकीकडे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दुसरीकडे शेतकरी मात्र मोठ्या चिंतेत
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के हरने समुद्र तट पर डीज़ल तस्करी का पर्दाफाश; डाभोल कस्टम ने दो फिशिंग बोट पकड़ीं

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत डिझेल तस्करीचा पर्दाफाश.. दाभोळ कस्टमची मोठी कारवाई!.. रत्नागिरीतील दापोलीच्या हर्णे समुद्रकिनारी रात्रीच्या अंधाराचा फायदा लेते डिझेलची तस्करी करणाऱ्या दोन फिशिंग बोटींना दाभोळ कस्टम पोलिसांनी रंगेहात पकडले आहे... मिळालेल्या माहितीनुसार दाभोळ कस्टम विभागाने ही धडक कारवाई केली.. डिझेलची अवैध वाहतूक करणाऱ्या दत्त जयंती IND.MH.04.MM.2847, रत्ना माऊली IND.MH.07.MM.4531 एकूण दोन फिशिंग बोटी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.. सध्या या दोन्ही बोटींचा आणि त्यावरील साहित्याचा कस्टम पोलिसांकडून पंचनामा सुरू आहे... या तस्करीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
0
0
Report

रत्नागिरी के तीन तालुकों के 64 गाँवों में टैंकर से पानी पहुँचा, 26 हजार लोग लाभान्वित

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. तीन तालुक्यातील 64 वाड्यांना टँकर चा आधार.. उन्हाची तीव्रता वाढतेय..26 हजार ग्रामस्थांना केला जात आहे पाणीपुरवठा.. वाढत्या उन्हाळ्याच्या तडाख्याने दिवसागणित पाणी टंचाईग्रस्त गावांच्या संकेत भर पडू लागली आहे..सध्या जिल्ह्यात रत्नागिरीसह चिपळूण आणि मंडनगड या तालुक्यात पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ होताना दिसत आहे..या तीन तालुक्यातील एकूण 25 गावे आणि त्यामधील 64 वाड्यातील 26 हजार 885 ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे..दर दिवशी वाढत्या तापमानामुळे पाणी पातळीत घट होऊ लागली आहे..परिणामी पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत..
0
0
Report

मांडवा में 1500 करोड़ के मरिना प्रकल्प के लिए आठ दिन में टेंडर प्रक्रिया शुरू

Chendhare, Maharashtra:स्लग - मांडवा येथे उभा राहणार भव्य मरिना प्रकल्प ..... १५०० कोटी रुपये खर्च करणार ........ आठ दिवसात प्रकल्पाचा आराखडा तयार करा ...... मंत्री नितेश राणे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश ...... अँकर - अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे अत्याधुनिक मरिना प्रकल्प उभारण्यास गती मिळाली असून, यासाठी सुमारे १५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा पुढील आठ दिवसांत तयार करून टेंडर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मांडवा परिसरात सध्या बोटी उभी करण्यासाठी आवश्यक सुविधा अपुर्या असल्याने भरती-ओहोटीच्या काळात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. वाढते पर्यटन आणि स्थानिक विकास लक्षात घेता जेट्टी परिसरात मरिना उभारण्याची मागणी आमदार महेंद्र दळवी यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
0
0
Report
Advertisement

पिंपरी चिंचवड़ में भीषण गर्मी पानी संकट, टँकर दर 800 से 1100 रुपये तक बढ़े

Pimpri-Chinchwad, Maharashtra:उन्हाळ्याची तीव्रता जसजशी वाढत चालली आहे तसा पिंपरी चिंचवड करांवरचे पाणी संकटा चावट अधिकच गडद होऊ लागले आहे. वाकड पिंपळे सौदागर पिंपळे निलख या भागात मोठ मोठ्या वसाहतींना दररोज दहा ते बारा टँकर पाणी मागवावे लागत आहे. त्यामुळे सोसायटी धारकांवर मोठा आर्थिक बोजा पडला असून लाखो रुपये पाण्यावर खर्च होत आहेत. त्यातच आता टँकर पाणीपुरवठा करणाऱ्यांनी 800 रुपये वरून थेट अकराशे ते बाराशे रुपये टँकर दर केल्याने सोसायटी धारकांना अधिकच पैसे मोजावे लागत आहेत. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सोसायटी धारक करत आहेत. याच संदर्भात सोसायटी धारकांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...
0
0
Report

नागपूर की संस्था युवतियों पर धार्मिक नियम थोपने के आरोप, भाजयुमो ने जांच की मांग

Nagpur, Maharashtra:नागपूर शहरातील मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कार्यरत असलेल्या 'युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी' या संस्थेत काम करणाऱ्या तरुणींवर धार्मिक नियम लादण्याचा दबावचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी भाजप भारतीय जनता युवा मोर्चा शिष्टमंडळाने पोलीस उपआयुक्त नविनचंद्र रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. या निवेदनाद्वारे भाजयुमोने या संपूर्ण प्रकरणामागे केवळ एक व्यक्ती नसून, धर्मांतराचे एखादे मोठे संघटित रॅकेट किंवा षडयंत्र असण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तांत्रिक आणि सखोल तपास करून पडद्यामागून काम करणाऱ्या सर्व संशयित सूत्रधारांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी केलीय
0
0
Report

नेरुल में स्लैब गिरा, जान बची; दमकल ने लोगों को सुरक्षित बाहर निकाला

Navi Mumbai, Maharashtra:नेरुळ सेक्टर 16ए मधील वूडलँड इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याची घटना घडलेय. सुदैवाने घरातील सदस्य स्वयंपाक घरात असल्याने जीवितहानी थोडक्यात टळली आहे. स्लॅब कोसळल्यामुळे चौथ्या मजल्याचे छत पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून त्याचा दाब तिसऱ्या मजल्यापर्यंत खाली पोहोचला आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाने तात्काळ बचावकार्य राबवत सर्व रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. बाधित कुटुंबांना कुकशेत येथील बाजार संकुलात तात्पुरते ठेवण्यात आले असून काही जण त्यांच्या नातेवाईकांच्या घरी गेले आहेत. या दुर्घटनेमुळे जीर्ण झालेल्या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलााय.
0
0
Report
Advertisement

कोल्हापूर में शराबी बेटे की हत्या: पिता ने चाकू से मारी, गिरफ्तार

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर :- दारू पिऊन घरच्यांना शिवीगाळ करणाऱ्या मुलाचा बापानेच खून केल्याची घटना कोल्हापूर शहरातील विक्रम नगर मध्ये उघडकीस आली आहे. मुलगा जुनेद मिरवणुकीत गेल्यानंतर तो जखमी झाला होता असा बनाव करत गफूर पठाण याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी खाक्या दाखवताच आपण स्वतःच आपल्या मुलाचा चाकूने भोकसून खून केल्याची कबुली गफूर सुलतान पठाण ( वय 40 ) या बापाने दिली आहे. राजारामपुरी पोलिसांनी गफूर पठाण याला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गफूर पठाण हे आपली पत्नी, दोन मुले, वृद्ध आईसह राहतात. मुलगा जुनेद भंगारांच्या दुकानात काम करत होता, या दरम्यान त्याला दारूचे व्यसन जडले होते, त्यातून तो दारू पिऊन घरात कुटुंबियांना शिवीगाळ करत होता, त्याचा सर्वच कुटुंबियांना कंटाळा आला होता. जुनेद सोमवारी रात्री पुन्हा दारू पिऊन घरी आला, त्याने सर्व कुटुंबीयांना शिवीगाळ करायला सुरुवात केली , त्यावेळी वडील गफूर पठाण यानी काकडी कट करण्यासाठी ठेवलेला चाकू घेऊन जुनेदच्या छातीत खुपसला, त्यामुळे जुनेद गंभीर जखमी झाला. त्यानंतर जखमी अवस्थेत पडलेल्या जुनेदला गफूर पठाण याने उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. जुनेदच्या छातीवर धारदार शस्त्राने वार झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये कळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला, त्यावेळी गफूर पठाण याच्या जबाबवावात तफावत आढळून आली, पोलिसांनी वडील पठाण याला पोलिसी खाक्या दाखवताच आपणच आपल्या मुलाचा खून केल्याची कबुली गफूर पठाण यांनी दिली.
0
0
Report

पिंप्रड़ हादसे में पति-पत्नी की मौत, पालखी महामार्ग पर ट्रक ने टक्कर दी

Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील पिंप्रद येथे लग्नासाठी दचाकीवरून जात असलेल्या" पती-पत्नीचा भीषण अपघातात मृत्यू झाला. फलटण ते पंढरपूर ' पालखी महामार्गावर ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात गजानन जाधव आणि त्यांच्या पत्नी सिंधताई जाधव रा. राजूरी चौफला, यांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक केली. पालखी महामार्गावर दोन दिवसांत तिघांचा मृत्यू झाला आहेसलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या या र्र्घटनेमुळे पंढरपूर-फलटण मार्ग अपघातप्रवणक्षेत्र बनत आहे. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ आणि प्रवासी वर्गातून होत आहे.
0
0
Report

यवतमाळ के रालेगांव में लड़कियों की बिक्री गलत प्रचार, भाजपा नेता पर आरोप

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव येथील मुलींच्या विक्री प्रकरणी चुकीची माहिती देऊन उगीचच अपप्रचार करण्यात आला असा आरोप भाजपाचे आमदार राजू तोडसाम यांनी केला असून त्यांनी भाजप जिल्हाध्यक्षांचा दावा खोटा ठरविला. भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहान यांनी प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती सांगितली, समाजात गैरसमज निर्माण केला. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची भूमिका देखील चुकीची होती. याबाबत आपण पोलिस अधीक्षकांकडून माहिती घेतली असता, 34 मुली बेपत्ता असल्याच्या दाव्यात तथ्य नसल्याचे समजले. त्यामुळे जिल्ह्याची व आदिवासी समाजाची बदनामी झाली, अशी खंत आमदार राजू तोडसाम यांनी व्यक्त केली. आदिवासी विकासमंत्र्यांच्या मतदारसंघातील या प्रकरणात भाजप जिल्हाध्यक्षांचा दावा भाजपाच्याच आमदाराने खोडून काढल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top