icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बीड़ में नसरापुर की चिमुरड़ी पर अत्याचार के विरोध में सभी दलों ने प्रदर्शन

Beed, Maharashtra:बीड: नसरापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात बीडमध्ये निदर्शने... ANC- पुण्याच्या नसरापूरमध्ये चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांकडून बीडमध्ये निदर्शने करण्यात आली. यावेळी महिलांना.. नको मानधन, द्या संरक्षण आणि आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या‌‌. तर चिमुरडीवरील अत्याचाराच्या घटनेचा बीड जिल्ह्यात सर्वच स्तरातुन निषेध नोंदवला जात आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळावी यासाठी तर कायदा करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतच्या मागण्यांची निवेदन दिले. बाईट: महिला आंदोलक
0
0
Report

लोकल ट्रेन की छत पर चढ़े युवक से ट्रेन आधे घंटे रुकी

Kalyan, Maharashtra:लोकल ट्रेनाच्या टपावर चढला तरुण, लोकल ट्रेनचा खोळंबा. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात लोकल ट्रेन आली असता त्या लोकल ट्रेनच्या टपावर एक तरुण चढला. त्याला खाली उतरण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. मात्र या तरुणाच्या या करामतीने लोकल ट्रेनचा जवळ जवळ अर्धा ते पाऊण तास खोळंबा झाला. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात ही लोकल आल्यानंतर प्रवाशांना एक तरुण लोकलच्या टपावर चढल्याचं दिसलं. त्यांनी रेल्वे पोलीसांना याची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे पोलीस या तरुणाला खाली उतरण्याचा प्रयत्न करत होते, त्यासाठी दोन ते तीन हमाल त्याला खाली उतरवण्यासाठी पाठवण्यात आले, कसं बसं करून त्याला खाली उतरवण्यात आलं. मात्र या सगळ्यामुळे लोकल ट्रेनचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
0
0
Report

नांदेड: विरोधी पक्षनेते पद के लिए एमआईएम को दिए जाने को लेकर विवाद अदालत तक पहुंचा

Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड महानगरपालिका में विरोधी पक्षनेते पद निवडी पर वाद बना हुआ है. एम आय एम के संख्या 14 रहते हुए उसे विरोधी पक्षनेते पद दिया गया. पर कांग्रेस और वंचित बहुजन आघाडी के कुल 15 होने पर भी इसे नहीं दिया गया. इस पर कांग्रेस अदालत में दाद मागने की तैयारी कर रही है. नांदेड महापालिका चुनाव में भाजप ने 45 सीटें जीती एकहाती सत्ता प्राप्त की. दूसरे क्रम पर एमआईएम 14 सीटें जीत कर सामने है. चुनाव से पहले आघाडी कर लड़ने वाले कांग्रेस और वंचित ने कुल 15 सीटें जीतीं. पर single largest party के साथ गठबंधन को विरोधी पक्षनेतात पद देने को लेकर पेच बना रहा. कल महापौर ने एमआईएम को विरोधी पक्षनेता के रूप में मान्यता दी. इसके बाद कांग्रेस आक्रामक हुई है. कांग्रेस और वंचित बहुजन आघाडी की सीटें चुनाव से पहले आघाडी में दर्ज हैं, विभागीय आयुक्त कार्यालय में. इसलिए नियम अनुसार कांग्रेस और वंचित आघाडी का विरोधी पक्षनेता पद पर दावा है. महापालिका चुनाव से पहले कुछ दिनों पहले कांग्रेस के 14 पूर्व नगरसेवकों ने एमआईएम में प्रवेश किया था. यह प्रवेश भाजपा के एक बड़े नेता के आदेश पर हुआ, कांग्रेस ने आरोप लगाया. धर्मनिरपेक्ष मतों के विभाजन से भाजपा को लाभ पहुंचाने के उद्देश्य से एमआईएम और भाजपा ने छुपी कमिटमेंट की थी. उसी के अनुसार एमआईएम को विरोधी पक्षनेता का उपहार दिया गया है—यह आरोप कांग्रेस ने लगाया. अब कांग्रेस अदालत में दाद मांग रही है. Byte - अब्दुल गफार - नगरसेवक, कांग्रेस. दूसरे क्रम के पक्ष को विरोधी पक्षनेते पद देने के नियम के अनुसार होना चाहिए. कानूनी विशेषज्ञ की सलाह लेकर ही एमआईएम को मान्यता दी गईं—महापौर कविता मुळे ने कहा. Byte - कविता मुळे - महापौर. भाजप और एमआईएम की छुपी रिश्तेदारी बाहर आने के बाद स्पष्ट हुआ था. कांग्रेस और वंचित आघाडी की संख्या अधिक होने के बावजूद भाजपा ने एमआईएम को विरोधी पक्षनेता पद देकर छुपी युति की पुष्टि की—कांग्रेस सांसद रविंद्र चव्हाण ने कहा. Byte - खा. रविंद्र चव्हाण. भाजपा ने एमआईएम को विरोधी पक्षनेता दिए जाने से नांदेड में सबकी आंखें खुली हैं. अब यह मामला न्यायालय जाएगा. अदालत में निर्णय का इंतजार होगा.
0
0
Report
Advertisement

मराठवाडे में ईंधन संकट, पंपों पर भारी कतारें बननों के कारण लोग परेशान

Dharashiv, Maharashtra:मराठवाड्यात इंधन टंचाईचा भडका; पंपांवर वाहनांच्या रांगा ‘नो स्टॉक’ बोर्डामुळे नागरिक त्रस्त; शेतीकामे ठप्प अफवांचा परिणाम की पुरवठा खंडित? प्रशासन म्हणतं सर्व काही सुरळीत मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, तर अनेक ठिकाणी ‘नो स्टॉक’चे बोर्ड झळकत आहेत. या टंचाईमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेतीसह उद्योगधंद्यांनाही मोठा फटका बसतो आहे. अफवांमुळे वाढलीली गर्दी आणि पुरवठा खंडित झाल्याची शक्यता—यामागचं नेमकं कारण काय? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली, परभणी आणि नांदेड—मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये इंधन टंचाईचं गंभीर चित्र आहे. गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल-डिझेल मिळणं कठीण झालं आहे. याचा सर्वाधिक फटका बसतो आहे तो शेतकऱ्यांना... डिझेलअभावी नांगरणी, मोगडणी, विहिरींची कामं, रस्ते दुरुस्ती—सर्वच कामं ठप्प झाली आहेत. छोट्या-मोठ्या उद्योगांनाही या टंचाईचा फटका बसताना दिसतो आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे इंधन दर वाढणार, अशी अफवा पसरल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केली. याचबरोबर कंपन्यांकडून होणारा पुरवठा सुरळीत नसल्याचा दावा पंपचालक करत आहेत. मात्र प्रशासन सर्व काही सुरळीत असल्याचं सांगत आहे—पण प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळं दिसत आहे. धाराशिव जिल्ह्यातील 163 पैकी बहुतांश पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे बोर्ड लागले आहेत. हिंगोलीत 84 पंपांवर तुटवडा असून काही ठिकाणी पंप पूर्णपणे बंद आहेत. लातूर, हिंगोली, नांदेडमध्येही परिस्थिती गंभीरच आहे. जालन्यात प्रत्येक पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर बीड जिल्ह्यातील माजलगाव, केज, धारूर भागात टंचाईने कळस गाठला आहे. एकीकडे प्रशासन सर्व काही सुरळीत असल्याचा दावा करत असलं, तरी प्रत्यक्षात मराठवाड्यात इंधन टंचाईचं गंभीर संकट उभं राहिलं आहे. अफवा, पुरवठा खंडित आणि वाढती मागणी—या सगळ्यांचा परिणाम म्हणून जनजीवन विस्कळीत झालं आहे. आता प्रश्न एकच—ही टंचाई तात्पुरती आहे की आणखी गंभीर होणार? नागरिक आणि शेतकरी मात्र इंधन मिळण्याच्या प्रतीक्षेत... ज्ञानेश्वर पतंगे
0
0
Report

नाशिक में 73 गाँवों को 83 टैंकरों से पानी आपूर्ति जारी

Nashik, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील 73 गावांना 83 टॅंकरने पाणीपुरवठा मे महिना उजाडला असताना नाशिक जिल्ह्यामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय...नाशिक जिल्ह्यात सध्या 73 गावांमध्ये 83 टँकरने पाण्याचा पुरवठा केला जात आहे...तर जेवढी मागणी आहे तेवढे शंभर टक्के पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितला आहे... सध्या नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण धरण क्षेत्रात 37 टक्क्यांच्या वर जलसाठा Shिल्लक आहे...यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण सध्या तरी पिण्याच्या पाण्याची नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल आहे... त्याचबरोबर पाणीपुरवठ्याला कुठलाही खंड पडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष प्रयत्न केले जात आहे... ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर प्रस्तावित मागणी पाहून आणि तपासणी करून प्रांत अधिकाऱ्यांना परवानगी देण्याच्या आदेश देखील देण्यात आले आहे जनावरांना पाणी मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहोत.... त्याचबरोबर गाववाड्यांवर पाण्याची अडचण निर्माण होऊ नये यासाठी विशेष लक्ष दिले जात असल्याच जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.... बाईट- आयुष प्रसाद....जिल्हाधिकारी नाशिक
0
0
Report
Advertisement
Advertisement

दिल्ली में एसी फटने से 9 मौत: जागरुकता और सुरक्षा टिप्स

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:एसीचा sप्‍त होऊन नुकतेच 9 जणांचा दिल्लीत हकनाक बळी गेला खरं तर तापलेल्या उन्हाची काहिलीत एसी थंड हवा देणारी कामाची वस्तू आहे मात्र हाच एसी आता जीवावर उठला आहे, नक्की काय असे झाले त्यातून एसी चा s्फोट झाला काय काळजी घेण्याची गरज आहे पाहुयात एक स्पेशल रेपोर्ट एसी वापरताय सावधान ! एसीच्या s्फोटात दिल्लीत 9 जणांचा मृत्यू का होताय एसीत s्फोट, जबाबदार कोण ? उन्हाच्या काहिलीत थंड हवेची झुळूक मनाला गारवा देते आणि उन्हाळ्यात हेच काम एसी करतो, कधीकाळी फक्त चैनी चा श्रीमंतांच्या घरी असणारा एसी आता प्रत्येक दुसऱ्या घरात असतो मात्र हाच एसी तुमच्या जीवावर उठला तर, असलाच प्रकार दिल्लीत झाला, एसीच्या कॉम्प्रेसर मध्ये s्फोट झाल्याने घराला आग लागली आणि त्यात 9 जणांचा बळी गेला त्यामुळं आता एसीच्या वापरावर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नक्की ka लागतेय एसी मध्ये आग याचा शोध घेतला असता अगदी छोटी कारणं पुढं आली जी जीवावर उठू शकतात... प्रमुख कारणं जिथं 2 टन एसीची गरज आहे तिथं 1 टनाचा एसी लावला की कॉम्प्रेसर वर दबाव येतो त्यातून s्फोट होऊ शकतो एसीचे आयुष्य संपले तरी त्याला कूल होते म्हणून वापरतात त्यातून धोका निर्माण होऊ शकतो एसीमध्ये कूलिंगसाठी वापरला जाणारा रेफ्रिजरंट गॅस जर गळत असेल आणि त्याच वेळी इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाले, तर ठिणगी उडून भीषण s्फोट होऊ शकतो. जुन्या एसीमध्ये ज्वालाग्राही गॅसचा वापर अधिक असायचा, ज्यामुळे हा धोका वाढतो. कॉम्प्रेसर हा एसीचा मुख्य भाग असतो. जर एसी सलग अनेक तास (उदा. १८-२० तास) विश्रांतीशिवाय चालवला, तर कॉम्प्रेसर प्रचंड गरम होतो. अशा स्थितीत वायरिंग वितळून किंवा अंतर्गत दाब वाढून कॉम्प्रेसरचा s्फोट होऊ शकतो. एसीच्या बाहेरील युनिटमध्ये (Outdoor Unit) कंडेन्सर कॉइल्स असतात. जर त्यावर खूप धूळ आणि कचरा साचला असेल, तर उष्णता बाहेर फेकली जात नाही. यामुळे सिस्टीममधील प्रेशर वाढते आणि s्फोटाची शक्यता निर्माण होते. जर एसी बसवताना योग्य तंत्रज्ञानाचा वापर केला नाही किंवा गॅस रिफिल करताना निकृष्ट दर्जाचा गॅस भरला, तर सिस्टीममध्ये बिघाड होऊन अपघात होऊ शकतो. तसेच, अल्युमिनियमऐवजी स्वस्त दर्जाच्या पाईप्सचा वापर करणेही घातक ठरू शकते. विजेचा दाब अचानक वाढल्यास एसीच्या सर्किटवर ताण येतो. यामुळे आग लागून ती कॉम्प्रेसरपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे या sगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे.
0
0
Report

कोल्हापुर में बच्चों पर अत्याचार के मामलों में वृद्धि, सुरक्षा सवाल बने

Kolhapur, Maharashtra:राज्यात बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नरसापूर येथील धक्कादायक घटनेनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विविध जिल्ह्यांतील अशा घटनांनी डोळे उघडले असताना, सदन समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आकडेवारीही चिंताजनक आहे. गेल्या पाच वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 623 बालकांवर अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. बालकांवर होणारे अत्याचार थांबण्याऐवजी वाढत चालले आहेत. लैंगिक अत्याचार, छळ, अपहरण यांसारख्या घटनांमुळे बालकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. कोल्हापूरसारख्या शांत आणि सुसंस्कृत जिल्ह्यातही अशी गंभीर आकडेवारी समोर येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. गेल्या पाच वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 623 बालकांवर अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर 1130 बालकांचे अपहरण झालेाचे पोलीस रेकॉर्ड वरून दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, या घटनांमागे सामाजिक जागरूकतेचा अभाव, डिजिटल माध्यमांचा गैरवापर यासह बिघडलेली विकृत मानसिकता कारणीभूत असल्याचं दिसून येत आहे. बहुतांश वेळा ओळखीच्या व्यक्तीकडूनच अत्याचार होत असल्याचे उघडकीस येत असल्यामुळे अधिकच चिंता वाढली आहे. पालकांनी देखील आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे, त्यांच्याशी संवाद वाढवणे आणि संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.. पण धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात आपल्या मुलांच्याकडे लक्ष द्यायला पालकांना वेळ नसल्याने अशा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि समाजाची सजगता तितकीच महत्त्वाची आहे. अन्यथा ही चिंताजनक आकडेवारी आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न केवळ प्रशासनाचा नाही, तर संपूर्ण समाजाचा आहे. वेळेवर पावले उचलणे आवश्यक आहे, नाहीतर ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते...
0
0
Report
Advertisement

पाली के बल्लाळेश्वर मंदिर में अंगारकी चतुर्थी पर भक्तों की भारी भीड़

Chendhare, Maharashtra:अंगारकी चतुर्थी निमित्त पाली येथे गणेश भक्तांची मोठी गर्दी... हजारो भाविकांनी घेतले श्री बल्लाळेश्वराचे दर्शन... श्री बल्लाळेश्वर च्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा... अष्टविनायक क्षेत्रा पैकी एक महत्त्वाचे क्षेत्र असलेल्या रायगड जिल्ह्यातील पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिरात देखील गणेश भक्तांची मोठी गर्दी पहायला मिळाली; उन्हाची दाहकता असतानाही महिला तसेच आबालवृद्धांनी गणेश दर्शनाला हजेरी लावली. यावेळी मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या. बाजारपेठ फुलली होती प्रसाद तसेच पुजेचे साहित्य घेण्यासाठीही गर्दी होती. मंदिर व्यवस्थापनाने चांगल्या सुविधा दिल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केलं आहे.
0
0
Report

मनमाड़-मनमाड महामार्ग पर गोपालवाड़ी में डीजल-पेट्रोल से भरा टैंकर पलटा; गाड़ियों का आवागमन बंद

Yeola, Maharashtra:अँकर : नगर मनमाड महामार्गावर येवला तालुक्यातील गोपाळवाडी शिवारात डिझेल व पेट्रोलने भरलेला टँकर नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी होऊन भीषण अपघात झाला . या अपघातामध्ये टँकर पलटी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पेट्रोल व डिझेलची गळती सुरू झाली ही बाब महामार्ग पोलिसांना लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने दोन्ही बाजूची वाहतूक बंद केली असून तालुका पोलीस देखील घटनास्थळी दाखল झाले आहेत मनमाड पानेवाडी येथून गळती थांबवणारे पथक थोड्याच वेळात घटनास्थळी दाखल होऊन गळती थांबवण्याचे प्रयत्न करणार आहेत
0
0
Report

मेळघाट में 358 नवजातों की मौत, स्वास्थ्य सेवा बदहाल, सरकार सवालों के घेरे में

Amravati, Maharashtra:धक्कादायक अमरावतीच्या मेळघाटात ३५८ नवजात बालकांचा मृत्यू; बालकांच्या किंकाळ्यानी मेळघाट सुन्न मेळघाट परिसरात नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले असून वर्षभरात तब्बल ३५८ बालकांचा जन्मत: मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मेळघाटातील दुर्गम भागात आजही वैद्यकीय सुविधांचा मोठा अभाव असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. गर्भवती महिलांना वेळेवर उपचार मिळत नाहीत तसेच तज्ज्ञ डॉक्टर, आवश्यक उपकरणे आणि आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही मेळघाटात अजूनही आरोग्यसेवा पोहोचली नसल्याचा धक्कादायक वास्तव समोर आला आहे. दरम्यान जिल्हा स्त्री रुग्णालयात सर्वाधिक म्हणजे २६१ नवजात मृत्यूंची नोंद झाली आहे. अनेक गर्भवती महिलांना अत्यंत उशिरा रुग्णालयात दाखल केले जाते त्यामुळे उपचार मिळण्याआधीच परिस्थिती गंभीर होत असल्याचाही समोर आला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top