416416
Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक
Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
शिंदे गट बनाम भाजपा: भोंडेकर के बयानों से राजनीति गर्म
Bhandara, Maharashtra:भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून नाराजीचा सुरु.... कालच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना शिंदे गटाची अनुपस्थिती.... काम पडला तर फोन करायचा काम झालं की विसरून जायचा.... नरेंद्र भोंडेकर....0
0
Report
कोल्हापुर में दो गुटों के बीच हिंसक भिड़ंत, दगडफेकी और गाड़ियों को तोड़फोड़
Solapur, Maharashtra:कोल्हापूर ब्रेकिंग - कोल्हापुरात दोन गटात तुंबळ हाणामारीसह दगडफेक, सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद कोल्हापूरातील गंजीमाळ, टिंबर मार्केट परिसरात मध्यरात्री तरुणांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी तरुणांच्या जमावाने या परिसरातील दुचाकी चार चाकी गाड्यांची केली तोडफोड किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचं पर्यवसान वाहनांच्या तोडफोड़ीत आणि दगडफेकीत तरुणांच्या टोळक्यांनी अनेक वाहनांसह घरांवर देखील केली दगडफेक दगडफेक आणि तोडफोड करून पळून जाणारे तरुण सीसीटीव्ही कैद0
0
Report
महंगाई के बीच पीएम विदेश दौरे में मेलडी चॉकलेट बाटे? कांग्रेस ने विरोध किया
Yeola, Maharashtra:अमेरिका इराण इजरायल युद्धानंतर भारत देशामध्ये इंधनाचे दर गगनाला भिडले असून देशात महागाई वाढली आहे असे असताना देशाचे पंतप्रधान दुसऱ्या देशात जाऊन मेलडी चॉकलेटचे वाटप करतात. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने नाशिकच्या येवल्यात पेट्रोल पंपावर मेलडी चॉकलेटचे वाटप करून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.0
0
Report
Advertisement
अकोला में भारी बारिश से यातायात बाधित, पुल के निर्माण से पानी भराव पर ट्रक पलट—आरोप कंपनी पर
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात काल तेल्हारा आणि अकोट तालुक्यात जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पावसामुळे परिसरातील छोटे-मोठे नाले दुथडी भरून वाहू लागले होते. दरम्यान, अकोट तालुक्यातील आडगाव येथून जाणाऱ्या अमरावती–बुलढाणा मार्गावरील सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे तयार करण्यात आलेल्या पर्याय्री वळण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. या वळण रस्त्याखालून पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने पावसाचे संपूर्ण पाणी रस्त्यावरच साचून राहिले. याच दरम्यान एका ट्रक चालकाने साचलेल्या पाण्यातून वाहन काढण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने ट्रकचा तोल जाऊन वाहन पलटी झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आज सकाळी जेसीबीच्या सहाय्याने साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र पुलाचे बांधकाम करणाऱ्या संबंधित कंपनीने पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना न केल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने योग्य व्यवस्था करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.0
0
Report
इंझोरी में रानडुकरा हमले से किसान घायल, वन विभाग से कार्रवाई की मांग
Washim, Maharashtra:इंझोरी तालुक्यातील शेतकरी राधेश्याम नानाजी ढोरे यांच्यावर रानडुकराने प्राणघातक हल्ला केला. शेतातील मोटार पंप दुरुस्त करण्यासाठी ते शेत परिसरात गेले असताना अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात ढोरे गंभीर जखमी झाले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने तिथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या स्थितीबद्दल अद्याप स्पष्ट माहिती येत नसल्याचे समजते. या घटनेमुळे इंझोरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतशिवारात जंगली प्राण्यांचा वावर वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना करून जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
रत्नागिरी में भीषण गर्मी, तापमान 35°C तक पहुंचा; लोग पसीने से तरबतर
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण.. सध्या ऑक्टोबर हिट प्रमाणे उष्मा जाणवतोय..तापमानाचा पारा पोचला 35 वर.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला होता..मात्र पाऊस हुलकावणी देत आहे.. दुसरीकडे उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऑक्टोबर हिट सारखे तापमान वाढत आहे.. दमट-उष्ण हवामानामुळे रत्नागिरीकर घामाघुम होत आहेत.. सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत उखाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.. वातावरणातील दमटपणा 75 ते 78 टक्क्यांवर गेला आहे..0
0
Report
Advertisement
शिवसेना-शिंदे गट के बादल बनते सवाल: संजय राऊत का आरोप-प्रत्यारोप तेज
Shirdi, Maharashtra:खा.संजय राऊत पत्रकार परिषद मुद्दे - ऑन अहिल्यानगर शिवसेना ठाकरे गट पक्ष संघटना ढासळने अहिल्यानगरमध्ये विधानसभेला यश मिळालं नाही हे खरं आहे.. मात्र दोन्ही मतदारसंघात शिवसेना आणि महाविकास आघाडीचे खासदार आहेत... नगर शहरातील आमदार कसे जिंकतात आणि हिंदुत्ववादी कसे होतात हे सांगता जगाला माहिती.. आमदार संग्राम जगताप यांच्यावर खा.संजय राऊत यांची टीका... एक दोन निवडणुका हारलो म्हणजे कमजोरी आली असे होत नाही... पुढील कालावधी आम्ही पक्ष बांधणीसाठी झोकून देणार आहोत.. आम्ही प्रत्येकजण जिद्दीने कामाला लागलोय.. या जिल्ह्यात कोण ओरिजनल आहे , सगळे काँग्रेसचे... शेपूट घालून आता भाजपमध्ये गेले संस्था वाचविण्यासाठी... बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा हे लोक त्यांच्या पायापाशी बसायचे... महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर हे सगळे लोक आमच्या उंबरठ्यावर रांग लाऊन उभे असतील... खा.संजय राऊत यांची भाजपच्या नेत्यावर जहरी टीका... ऑन विखे राऊत टीका श्रद्धांजली विखे पाटील आमच्या शिवसेना पक्षात होते आणि आमच्या पक्षातून गेल्यावर आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिली.. आमच्या पक्षातून गेलेल्या लोकांना आम्ही तेव्हाच श्रद्धांजली वाहिली आहे... हे लोक फक्त सत्तेसाठी भाजपमध्ये गेलेत... भाजपची सत्ता गेल्यावर पुन्हा ते दुसरीकडे जाते , विखे पाटलांचे तसेच होईल... भाजपची सत्ता गेल्यावर ते दुसरीकडे जातील.. ऑन अमित शहा राज्यातील कोर्ट हे सगळे भाजपचे गुलाम , यांनी सगळे संघाचे नेते नेमले आहेत... भाजपचा वरचष्मा राजकारणात कधीच नव्हता... शिवसेना शिंदे गटाचे नेते अमित शहा म्हणून वारंवार त्यांना दिल्लीला जावं लागतं... ती अमित शहा यांची सेना आहे... संजय राऊत सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल.. त्यामुळेच निकाल लांबवला जातोय.. ज्यांना पश्चाताप होतोय, त्यांनी परत यावं.. मात्र काही लोकांना प्रवेश मिळणार नाही.. शिवसेना पक्ष सुनावणीवर प्रतिक्रिया... संजय राऊत - शिंदे गटातील काही लोकांना पश्चाताप होत असल्यं, तर त्यांनी आमच्याकडे परत यावं.. संजय राऊत - भाजपमध्ये अनेकजण आयात केलेले.. भविष्यात भाजपाचा अध्यक्ष बाहेर देशातील झाला तर नवल वाटायला नको...0
0
Report
दानिश शेख मामले में परिवार ने असिफ शेख से संपर्क कर वकील नियुक्ति का दावा
Nashik, Maharashtra:नाशिक के आय टी कंपनी निदा खान प्रकरण अपडेट... आय टी कंपनी प्रकरणातील संशयित आरोपी दानिश शेखच्या परिवाराने केला मालेगावचे माजी आमदार असिफ शेख यांना संपर्क... संपर्क केल्याने मालेगावात उडाली एकच खळबळ.. मालेगावचे इस्लाम पार्टीचे प्रमुख असिफ शेख यांच्या कडून आय टी कंपनी प्रकरणातील संशयित आरोपी दानिश शेखला देण्यात आला वकील? Anc: नाशिकचे आय टी कंपनी धर्मांतरण प्रकरणातील संशयित आरोपी दानिश शेखच्या परिवाराने मालेगावचे माजी आमदार असिफ शेख यांच्याशी संपर्क साधला व नंतर मालेगावातून दानिश शेख साठी वकील पत्र देखण्यात आले असा दावा शेख चे वकील adv फैजी यांनी केला.0
0
Report
पुणे के किसान आंदोलन में 24-25 रुपये हमी भाव की मांग
Shirur, Maharashtra:नाशिकनंतर पुण्यात आंदोलन घेतोय. या जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहे, त्यांची तशी मागणी आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जातायेत. - मुख्यमंत्र्यांनी आधी 12.50 रुपये दर सांगितला. मग निवडणुकीपूर्वी 24 रुपये दर देणार म्हणाले होते. म्हणून आम्ही हा दर देण्याची मागणी केली. - आंदोलन सुरु केलं तेंव्हा 7 ते 8 रुपये दर होता. दुसऱ्या आंदोलनावेळी 12.50 रुपये दर सरकारने केला. मात्र आमची मागणी 24 ते 25 रुपये हमीभाव देण्याची मागणी आहे. - 10 लाख टन कांदा खरेди करावा. - व्यापारी शेतकऱ्यांकडून 4 ते 5 रुपयांनी कांदा खरेदी करतात आणि नाफेडला कांदा विक्री करतात. यातून व्यापाऱ्यांचा फायदा होतोय. त्यामुळं थेट शेतकऱ्यांकडून नाफेडने कांदा खरेदी करावा. दुर्दैवाने अद्याप तशी खरेदी सुरु झालेली नाही. - आजच्या मुंबईत होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत ठोस निर्णय व्हावा. - नाशिकमध्ये नाफेडद्वारे खरेदी करावी, असे आदेश दिलेत. मात्र प्रत्यक्षात नाफेडद्वारे खरेदी सुरु झालेली नाही. दिल्लीत झालेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली ही आम्हाला कल्पना नाही. मुळात तसा अद्यादेश आलेला नाही, त्यামुळं ही केवळ घोषणा केली का? - शेतकऱ्यांचे आंदोलन आहे. माझं दिलीप वळसे पाटलांना म्हणणं आहे, शेतकऱ्यांच्या मागणी केल्यानं आम्ही आंदोलन करतोय. एसी मध्ये बसून प्रश्न सुटणार नाहीत. तुम्ही केवळ माध्यमांत बोलू नका. रस्त्यावर येऊन चर्चा करा. - शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही भांडायला हवं. पण तुम्ही विधानपरिषदेच्या तिकिटासाठी भांडताय. घोडेबाजार करताय, मग शेतकऱ्यांसाठी का भांडत नाही? - दिलीप वळसेंनी त्यांचं वजन वापरावं, त्यांचं दिल्लीत ऐकलं जात नसेल पण राज्यात ऐकतायेत का पहावं. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कांदा प्रश्नाबाबत ठोस निर्णय घ्यावा.0
0
Report
Advertisement
अतुल लोंढे के पक्ष में गुप्त मतदान से जीत का दावा, कांग्रेस-भाजपा की चर्चा तेज
Nagpur, Maharashtra:नागपूर - अतुल लोंढे आमचे राष्ट्रीय प्रवक्ते असून आंतरराष्ट्रीय प्रश्नावर ते बोलतात याबाबीवर मतदार आकर्षित होऊन मतदार त्यांना निवडून देतील - बलाढ्य नेते आमच्याकडे आहे, नितीन राऊत यांना काँग्रेस पक्षात अनेक वर्षे काम करण्याचा अनुभव असल्याने ते ही जागा निवडून आणतील - भाजपकडे बहुमत असलं तरी 100 मतांनी अतुल लोंढे निवडून येतील गुप्त मतदान आहे, या बाबत अतुल लोंढे यांनी तयारी केली आहे - भाजप ची मत फोडण्याची तयारी देखील लोंढे यांनी केली आहे - मी नाराज नाही, मी मतदार देखील नाही त्यामुळे अतिक्रमण कारवाई सुरू असताना लोकांच्या मदत्तीला मी काल धावून गेलो होतो माझ्या साठी तो प्रश्न महत्वाचा होता0
0
Report
उर्स अवसर पर गौतमी पाटिल का डांस शो बिसूर में आकर्षण का केंद्र
Sangli, Maharashtra:स्लग - बिसुर येथे उरुसानिमित्त गौतमी पाटीलचा पार पडला डान्स शो. अँकर - सांगलीच्या मिरज तालुक्यातील बिसुर येथे ग्रामदैवत पीर बावरदिन वली दर्गा उरसानिमित्त गौतमी पाटीलचा डान्स शो पार पडला. गौतमी पाटीलच्या डान्स शोला पुरुषांच्या बरोबर महिलांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला, उरसा निमित्त यात्रा कमिटी कडून सलग तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने गौतमी पाटीलचा डान्स शो आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये गौतमी पाटीलने हिंदी- मराठी गाण्यावर आपली बहारदार अदा सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली, गौতमीचा डान्स शो पाहण्यासाठी बिसुर सह आसपासच्या गावातील हजेरी गावकऱ्यांनी हजेरी लावली होती.0
0
Report
अमरावती विधान परिषद चुनाव: काँग्रेस से वंचित उम्मीदवार को समर्थन की मांग, बातचीत तेज
Amravati, Maharashtra:अमरावती विधान परिषद चुनाव के लिए कांग्रेस ने वंचित के उम्मीदवार को समर्थन देने की मांग की है और वंचित के साथ कांग्रेस की चर्चा चल रही है। अमरावती विधान परिषद चुनाव में भाजपा की ओर से प्रवीण पोटे, कांग्रेस की ओर से हर्षजित देशमुख और वंचित के उम्मीदवार के रूप में निलेश विश्वकर्मा ने नामांकन दाखिल किया है। वंचित के उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर ने कहा है कि कांग्रेस से वंचित उम्मीदवार को समर्थन मिल सकता है और अन्य पहलुओं पर भी बातचीत जारी है। इससे विधानसभा चुनाव की राजनीतिक चर्चाओं में उथल-पुथल बढ़ गई है।0
0
Report
Advertisement
नागपुर: कांदा घोटाले और किसानों के संघर्ष पर कांग्रेस नेता का पक्ष
Nagpur, Maharashtra:नागपूर On विधान परिषद निवडणूक - - अतुल लोंढे हे योग्य उमेदवार,चांगला प्रवक्ता,बहुजन समाजातील चेहरा आम्ही निवडणुकीत उतरवला आहे, आमच्या उमेदवाराला विजयाची संधी आहे आणि आम्ही त्या दिशेने प्रयत्न करू - बेरीज-वजाबाकी झाली आहे,हा सांगण्याचा विषय नाही, आम्ही किती नगरसेवक फोडले हे तुमच्या लक्षात येईलच On कांदा प्रश्न - - या देशातील संपूर्ण शेतकरी हवालदिल झाले आहेत, सरकारवर नाराज आहे,पंतप्रधान येतात आणि म्हणतात की रास्त भाव देऊ,एमएसीपी पेक्षा जास्त देऊ,मात्र शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे,अशात शेतकरी रस्त्यावर नाही तर कुठे उतरणार? - विदर्भाचा शेतकरीही हवालदिल झाला आहे,शेतकऱ्यांचा विस्फोट झाल्याशिवाय राहणार नाही - कर्जमाफी काँग्रेसने नेहमी।दिली आहे,यांची मानसिकता नाही,लाडक्या बहिणीच्या तोंडचा घास हिरावून नेणारे हे सरकार आहे0
0
Report
यवतमाळ महायुती के उम्मीदवार चयन में नेतृत्व का बड़ा फैसला
Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - आशिष जयस्वाल, राज्यमंत्री, शिवसेना नेते on यवतमाळ विधान परिषद महायुतीतील मतभेद - प्रत्येक निवडणुकीत पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व निर्णय घेत असते आणि त्या निर्णयानुसार सर्वजण संबंधित उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न करतात. महाराष्ट्रातील महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने महायुतीला स्पष्ट जनादेश दिला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात मतदारांचे पाठबळ आहे. काँग्रेसमधील अनेक मतदारही महायुतीच्या पाठीशी राहतील आणि महायुतीचे उमेदवार विजयी होतील. On नाशिक व पुणे उमेदवारी मतभेद - अशा प्रकारच्या घटना निवडणुकांमध्ये घडत असतात. पक्षश्रेष्ठींकडून अंतिम निर्णय झाल्यानंतर संबंधित उमेदवार आपले अर्ज मागे घेतात. यवतमाळमध्येही काही उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, त्याच्या पाठीशी सर्व उमेदवार ठामपणे उभे राहतील आणि आवश्यक असल्यास उमेदवारी अर्ज मागे घेतील.0
0
Report
तुळजाभवानी मंदिर में अधिक मास के चलते भक्तों की भीड़, पेड़ दर्शन से दो करोड़ रुपये जुटे
Dharashiv, Maharashtra:तुळजाभवनी मंदीर संस्थानला पेड दर्शनातुन दोन कोटींचे उत्पन्न उन्हाळी सुट्ट्या व अधिक मासामुळे भाविकांची मोठी गर्दी अधिक महीन्यात पेड दर्शनाला भाविकांची पसंती तर १७ दिवसात ७० हजारांहुन अधिक भक्तांनी घेतले देणगी दर्शन Anc: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात अधिकमासामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अधिकमासाचा फायदा मंदिर संस्थानाला ही चांगलाच होताना दिसून आला असून पेड दर्शनाच्या माध्यमातून मंदिर संस्थानला 15 मे ते 30 मे या कालावधीत जवळपास दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.पेड देणगी दर्शनास भाविकांनी मोठी पसंती दिली असून या कालावधीत जवळपास 70 हजार भाविकांनी पेड दर्शन घेतल आहे.आगामी काळात ही गर्दी कायम राहिल्यास मंदिर संस्थांच्या तिजोरीत आणखी मोठी भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान दोनशे रुपयांच्या देणगी पास मधून एक कोटी तीन लाखाहून अधिक उत्पन्न मंदिर संस्थांना मिळाला आहे.तर पाचशे रुपयांच्या दर्शन पास मधून 94 लाखाहून अधिक महसूल मंदीर संस्थानला जमा झाला आहे.0
0
Report
Advertisement
