416416
Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक
Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चंद्रपूर जिला खेल संकुल में खेलो इंडिया गर्मी प्रशिक्षण शिविर शुरू, 100+ खिलाड़ी
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 0605ZT_CHP_SUMMER_SPORT ( single file sent on 2C) टायटल: - क्रीडा विभागाच्या वतीने चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल येथे खेलो इंडिया अंतर्गत विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर सुरू, १०० हून अधिक खेळाडू सहभागी. अँकर:-- जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूरच्या वतीने जिल्ह्यातील उदोन्मुख खेळाडूंना आधुनिक व तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी खेलो इंडिया अंतर्गत उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हा स्टेडियम येथे सकाळी व सायंकाळी शिबिर सुरू असून, यात व्हॉलीबॉल, बॉक्सिंग, जलतरण, कराटे, बास्केटबॉल, बॅडमिंटन व वुशू या खेळांचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच, खेळाडूंना कौशल्य विकास, समुपदेशन, चर्चासत्रे व परिसंवाद तज्ञ मार्गदर्शकांकडून घेतले जात आहेत. १२ वर्षांवरील ते १९ वर्षांखालील मुली-मुलांसाठी असलेल्या या शिबिरात १०० hून अधिक विद्यार्थी खेळाडू सहभागी झाले आहेत. बाईट १) संदीप उईके, तालुका क्रीडा अधिकारी, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
चंद्रपुर नगरपालिका के ठेकेदार कर्मियों के आंदोलन की मांग मान ली गई; आज लौटे
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर महानगरपालिकेसमोरील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन अखेर मागण्या मान्य, आजपासून कामावर रुजू कंत्राटी कामगारांना किमान वेतनानुसार वाढीव वेतन देणे, डम्पिंग यार्डमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांचे मागील सहा महिन्यांचे वेतन तातडीने अदा करणे, तसेच कंत्राटी कामगारांच्या पगारातून ईएसआयची रक्कम कपात करणे, या आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू झाले होते. आज संबंधित मागण्या मान्य करण्यात आल्या असून, त्यानंतर आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. परिणामी, हे कर्मचारी आजपासून पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.0
0
Report
भंडारा में आंधी-बारिश से किसानों के धान को नुकसान, मुआवजे की मांग तेज
Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार झोडपून काढलं. कालचा सर्वात जास्त पाऊस हा तुमसर, मोहाडी तालुक्यात पडला आहे. जिल्ह्यात बहुतेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात धान पीक लागवड केली आहे. आता चार दिवसात शेतकरी धान पीक कापणार होते. इतक्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे धान भुईसपाट झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आतातरी शासनाने पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी...0
0
Report
Advertisement
अकोला के चन्नी गांव में 55 वर्षीय वृद्ध ने बच्ची के साथ अत्याचार
Akola, Maharashtra:नरसपूर येथील घटनेनंतर अकोला जिल्ह्यातील चान्नी गावातून आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका 55 वर्षीय वृद्धाने 10 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील शेतमजুরিसाठी बाहेर जात असताना शेजारी राहणाऱ्या या वृद्धाने संधी साधत सलग तीन ते चार दिवस मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. भीतीमुळे गप्प बसलेल्या चिमुकलीने अखेर धैर्य दाखवत आपल्या आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा नोंदवला असून फरार आरोपीच्या शोधासाठी पथक तैनात करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.0
0
Report
चंद्रपुर में टीने शेड गिरी, युवक की मौत; चार घायल
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात मुल तालुक्यातील राजोली गावात टीनेचं शेड कोसळून युवकाचा मृत्यू झालाय. प्रशांत शेणमारे असं मृतक तरुणाचं नाव आहे. रात्री राजोली, मुल आणि सिंदेवाही परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. दरम्यान रेल्वे स्टेशनजवळ शेतात विटा तयार करण्यासाठी तयार केलेला टीनेचा शेड अचानक आलेल्या वादळामुळे कोसळल्याने शेड मालक प्रशांत शेणमारे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मुल पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील प्रक्रिया पूर्ण केली. दुसऱ्या एका घटनेत मुल-डोंगरगाव मार्गावर वादळी वाऱ्यामुळे एक झाड मार्गावरील चालत्या कारवर कोसळले. या कार मध्ये चार लोकं असल्याची प्राथमिक माहिती आहे. कार मधील चौघेही जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठवण्यात आले आहे.0
0
Report
राहाता में चरम प्रताड़ना से विवाहिता ने आत्महत्या, तीन आरोपी गिरफ्तार
Shirdi, Maharashtra:हुंड्यासाठी छळाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आपली जिवनयात्रा संपवली.. राहाता तालुक्यातील एकरुखे येथील धक्कादायक घटना... प्रियाशुभम ढगे ( वय 23 ) अस मृत विवाहितेचे नाव... घराच्या बांधकामासाठी चार लाख रुपयांच्या मागणीसाठी सासरकडून विवाहितेचा सतत छळ... पती शुभम ढगे, सासरा राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे ( सर्व राहणार को-हाळे , तालुका - राहाता , अहिल्यानगर ) यांच्या विरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..तिघही आरोपींना पोलिसांकडून अटक... 2024 ते 2026 दरम्यान मानसिक आणि शारीरिक छळ सुरू असल्याची माहिती... छळ सहन न झाल्याने महिलेने उचलले टोकाचे पाऊल... घटनेनंतर परिसरात खळबळ, पोलिसांचा पुढील तपास सुरू... आरोपींवर भारतीय न्याय संहिता के विविध कलमांनुसार गुन्हा दाखल...0
0
Report
Advertisement
ममता बनर्जी के मुख्यमंत्री पद पर बहुमत और सुप्रीम कोर्ट की भूमिका
Bhor, Maharashtra:खूप गंभीर प्रश्न राज्य घटनासमोर निर्माण झाली आहे .ममता बॅनर्जी सत्ता गेली तर चांगलं झाला असते त्याची दुसरी बाजू आहे सत्ताधारी पक्षाने नियम पाळले पाहिजे इंदिरा गांधी यांनी 39 घटना दुरुस्ती केली पंतप्रधान आव्हान दिले जात नव्हते हे हि बेकायदेशीर होते निवणूडणूक आयौग प्रश्न यौग्य आहेत कारणे घटनात्मक कायदे पाळणाऱ्या संस्था अंपायर सारखे वागत नाही ज्यावेळी विधानसभा विसर्जित झाली त्या दिवशी मुख्यमंत्री पद रिक्त होते बहुमत आलेल्या पक्षच मुख्यमंत्री होईल त्यामुळे उद्या पर्यन्त ममता बॅनर्जी बहुमत सरकार आहे उद्यापासून त्याचा कार्यकाळ संपले सुप्रीम कोर्ट हे अंतिम हस्तक्षेप करणारी संस्थां आहे मात्र त्याचा निकाल कधी लागेल माहिती नाही0
0
Report
उजनी डैम में पानी घटे: अगले दो-तीन महीनों में जलापूर्ति संकट
Rui, Maharashtra:पुणे सोलापूर नगर जिल्ह्यासाठी वरदायनी ठरलेलं उजनी धरण मायनस आजमध्ये गेलं आहे. सध्या उजनी धरणामध्ये एकूण पाणी साठवण क्षमतेच्या 63 पूर्णांक 31 टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे. उजनी धरण 100% क्षमतेने भरते त्यावेळी उजनी धरणात 117 टीएमसी पाणीसाठा मावतो. यातून 54 टीएमसी पाणीसाठा जीवंत तर उर्वरित 63 टीएमसी पाणीसाठा मृत पाणीसाठा म्हणून गणला जातो. उजनी धरणावर पुणे सोलापूर जिल्ह्यातील शेतीचा पाणी प्रश्न यासोबत लहान मोठ्या शेकडो पाणीपुरवठ्याच्या योजना अवलंबून आहे. आज उजनी मायनस गेले असल्यामुळे पुढील दोन अडीच महिने आहेत त्या उपलब्ध पाणी साठ्यावर काढावी लागणार आहेत.0
0
Report
जालना में युवती के अश्लील फोटो लेकर धर्मांतरण का दबाव: चार आरोपी गिरफ्तार
Jalna, Maharashtra:जालना :जालन्यात तरुणीचे अश्लील फोटो काढून धर्मांतरासाठी दबाव आणून अत्याचार अँकर: जालन्यात तरुणीचे अश्लील फोटो काढून धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.जालन्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावात ही घटना घडली आहे.आरोपी शेख इम्रान शेख हबीबविरुद्ध तरुणीची पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तरुणीवर नमाज पढण्याचा आणि बुरखा घालण्याचा दबाव आणण्यात आल्याचं देखील या तरुणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन आरोपीने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याचं देखील तरुणीने पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.दरम्यान या प्रकरणी पारध पोलिसांनी शेख इम्रानसह कुटुंबातल्या चौघांवर गुन्हे दाखल केले असून आरोपी शेख इम्रान शेख हबीब सह दोन जणांना अटक करण्यात आली आहे.पारध पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत0
0
Report
Advertisement
बीड़ में 24-वर्षीय शौर्यगाथा: आमिर सय्यद को शिरूर कासार में घोड़ों की सलामी के साथ सम्मान
Beed, Maharashtra:बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील रहिवासी आमिर सय्यद यांनी भारतीय सैन्य दलात तब्बल 24 वर्षे सेवा बजावून निवृत्ति घेतली. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेला मानाचा मुजरा देण्यासाठी ग्रामस्थांनी एक अनोखा आणि भव्य सोहळा आयोजित केला होता. गावातील तरुणांना सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रेरणा मिळावी, या उद्देशाने सय्यद यांना घोड्यावर बसवून शहरातून मिरवणूक काढण्यात आली. देशभक्तीपर गाण्यांच्या तालावर सजवलेले घोडे अक्षरशः नृत्य करत सलामी देत होते, ज्यामुळे वातावरण आणखीनच देशभक्तीने भारावून गेले. या अनोख्या सोहळ्याला संपूर्ण गाव उपस्थित होते. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सय्यद यांच्या कार्याचा गौरव केला. मिरवणुकीनंतर त्यांना त्यांच्या कुटुंबासह सजवलेल्या जीपमधूनही गावात फिरवण्यात आले. या अभिमानास्पद क्षणामुळे शिरूर कासारमध्ये उत्साहाचे आणि देशप्रेमाचे वातावरण निर्माण दिसून आले.0
0
Report
नाशिक के मालगांव तालुक में 14 गांवों में पानी टैंकर पहुंचते, बढ़ने की संभावना
Nashik, Maharashtra:नाशिक ( मालेगाव ) विशाल मोरे - मालेगाव तालुक्यात पंधरा दिवसात सहा गावांमध्ये वाढल्या टँकर फेऱ्या... 14 गावे 28 वाड्यांना टँकरने होतोय पाणीपुरवठा... महिना अखेरीस संख्या वाढण्याची शक्यता... नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील 14 गावे व 28 वाड्यांना 14 टँकरच्या 24 फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.या माध्यमातून 32 हजार 500 इतक्या लोकसंख्येला पाणी दिले जात आहे. तालुक्यात पंधरा दिवसात पाच गावांना टँकर वाढले असून तालुक्यातील स्थानिक पाणीपुरवठा योजनेच्या जलस्त्रोतांची पाणी पातळी जलद गतीने घसरत आहे. त्यामुळे मे अखेरीस टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या प्रकोपामुळे नैसर्गिक जलस्त्रोत जलद गतीने आटत असल्याने याचा परिणाम स्थानिक पाणीपुरवठा योजनांवर होत आहे. यामुळे पंचायत समिती व तहसील कार्यालयाकडे येणाऱ्या टॅकर्स मागणीच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी दिली जात आहे.0
0
Report
जैकवेल गेट में लीकेज से छत्रपति संभाजी नगर में पानी आपूर्ति जून तक स्थगित?
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर नवीन पाणी योजनेला पुन्हा ब्रेक; जॅकवेल गेटला गळती, पाणीपुरवठा महिनाभर लांबणार जाण्याची शक्यता ANC : छत्रपती संभाजीनगरकरांसाठी महत्त्वाची बातमी… शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. जायकवाडी धरणातील जॅकवेलच्या गेटला गळती लागल्यामुळे पाणीपुरवठा आता मेा़जवजी जूनपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. शहराच्या नव्या पाणी योजनेसाठी जायकवाडी धरणात उभारण्यात आलेल्या जॅकवेलच्या गेटमध्ये गळती आढळली आहे. यासोबतच अँप्रोच ब्रिजवरील चेअरबेड्सनाही तडे गेल्याचे समोर आले आहे. या त्रुटींबाबत न्यायालयीन समितीने अडीच महिन्यांपूर्वीच तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले होते. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जीव्हीपीआर या कंत्राटदार कंपनीकडून अद्याप काम पूर्ण झालेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, समितीने दाखवून दिलेल्या त्रुटींपैकी सुमारे ५० टक्के त्रुटी अजूनही प्रलंबित आहेत. दरम्यान, जॅकवेल गेटची दुरुस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा तात्पुरता बंद करावा लागणार आहे.0
0
Report
Advertisement
कामशेत में पुलिस ने नशीले पदार्थ के खिलाफ दबिश, दो युवक गिरफ्तार
Varsoli, Maharashtra:कामशेत येथे अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची धडक कारवाई करण्यात आली असून दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. आरोपींची झडती घेतली असता त्यांच्या जवळून सुमारे 6 लाख 20 हजार रुपये किमतीचा एमडी (अंमली पदार्थ) जप्त करण्यात आला. तसेच एक चारचाकी वाहन, मोबाईल फोन व इतर साहित्यही हस्तगत करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अंमली पदार्थांच्या साखळीवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपींची कामशेत बाजारपेठेतून धिंड काढत अंमली पदार्थ गुन्हेगारी विरोधात कडक इशारा दिला असून दोन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे...0
0
Report
जुन्नर, पुणे में तालाब डूबने से जुड़वा भाई-बहन की दर्दनाक मौत
Barav, Maharashtra:जुन्नर तालुक्यातील तळेरान गावात अत्यंत हृदयद्रावक दुर्दैवी घटना घडलीय, खेळता खेळता पाझर तलावात उतरल्याने, श्रावणी और गणेश या १० वर्षांच्या जुळ्या भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय, साबळे कुटुंबातील ही दोन्ही मुले चौथीत शिकत होती. कुटुंबीय तलावाकाठी कामात व्यस्त असताना ही घटना घडलीय, एकाच वेळी दोन चिमुरड्यांचा अंत झाल्याने संपूर्ण जुन्नर तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.0
0
Report
संजय राऊत के साथ अब ममता बनर्जी आघाड़ी के साथ; चुनाव जीतने के बाद ममता बोलीं- मैं resignation नहीं दूंगी
Mumbai, Maharashtra:संजय राऊत काल पर्वा पर्यंत ममता बॅनर्जी इंडिया आघाडी सोबत नव्हत्या आता मात्र आघाडी मात्र आता त्यांच्या सोबत आहे आम्ही सगळ्यांनी त्यांना फ़ोन केला आणि सोबत आहोत म्हणून सांगितलं त्या निवडणूक जिंकलेल्या आहेत हे खर आहे ममता बॅनर्जी म्हणाल्या की मी राजीनामा देणार नाही, हा त्यांचा आंदोलनाचा भाग आहे0
0
Report
Advertisement
