icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पुणे ग्रामीण पुलिस ने ओतूर में अंतरराज्यीय डकैती गिरोह के छह सदस्यों को गिरफ्तार किया

Shirur, Maharashtra:Rep: Hemant Chapude(Junnar) Anchor:: पुणे ग्रामीण पोलिसांनी ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीतील सहा जणांना अटक केली आहे. आरोपींकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रे तसेच चोरीची बोलेरो जीपसह एकूण १४ लाख ८७ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र व तेलंगणातील २० गंभीर गुन्ह्यांची उकल झाली आहे. सोनूकसिंग कपूरसिंग टाक (30, हडपसर, पुणे), पिलूकसिंग शेरसिंग दुधानी (40, खोपोली, रायगड), करणसिंग गगनसिंग टाक (27, परभणी), पंकजसिंग काळूसिंग शिकलगार उर्फ दुधानी (40, अंबरनाथ), पापीसिंग उर्फ कृष्णसिंग साहेबसिंग टाक (18, परभणी) आणि मंगलसिंग मायासिंग दुधानी (58, परभणी) या सहाही आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून चौकशीदरम्यान दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी आणि वाहनचोरीचे एकूण २० गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये दोन दरोडे, एक दरोड्याचा प्रयत्न, दोन जबरी चोरी, १३ घरफोडी आणि दोन वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. तसेच या आरोपींवर यापूर्वी महाराष्ट्र, तेलंगणा व इतर राज्यांत ५० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्र आणि तेलंगणात सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा मोठा पर्दाफाश झाला असून पुढील तपासातून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, ओतूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिसरातील ग्रामस्थांच्या मोलाच्या सहकार्याने करण्यात आली आहे.
0
0
Report

सोलापूर में धनंजय मुंडे को मंत्री बनाने के लिए सिद्धरामेश्वर को दंडवत दिया

Solapur, Maharashtra:सोलापुर में आ. धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी घातले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांना दंडवत. आ. धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळावे यासाठी सोलापुरात भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने सिद्धरामेश्वरांना दंडवत घालत झाली महाआरती. आ. धनंजय मुंडे यांच्या भावीमंत्री म्हणून उल्लेख ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांना घालण्यात आले साकडे. आ. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 51 किलोचा लाडू महाप्रसाद म्हणून वाटत झाली मागणी. मुंडे कार्यकर्त्यांकडून आमदार धनंजय मुंडे यांना मंत्री पद मिळत नाही तोपर्यंत फेटा न घालण्याचा निर्धार.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी दौरे में आशिष शेलार ने लोककला के लिए बड़े अनुदान की घोषणाएं कीं

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे बीड रेल्वे स्थानकात उत्साहपूर्ण वातावरणात जंगी स्वागत करण्यात आले. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचे लोककला क्षेत्रासाठी घेतलेल्या निर्णयांबद्दल त्यांनी विशेष आभार व्यक्त केले. लोककलावंत आणि कला पथकांच्या भांडवली तसेच प्रयोगात्मक अनुदानात दुप्पट वाढ झाली असल्याची माहिती दिली. कोकणातील पारंपरिक 'नमन' लोककलेचा लोककला योजनेत समावेश करून त्यासाठीही अनुदान वाढविण्यात आल्याचे सांगितले. राज्य सरकार लोककलावंतांच्या पाठीशी ठामपणे उभे असून भविष्यातही लोककलेसाठी अधिक निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील लोककला राज्यभर, देशभर आणि विदेशात पोहोचावी यासाठी लोककला महोत्सवांचे आयोजन अधिक व्यापक स्वरूपात करण्यात येणार असल्याची घोषणा केली. लोककलावंतांना अधिक व्यासपीठ आणि सन्मान मिळावा यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील डळमळीत झालेल्या सांभाळ केंद्राच्या स्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन आवश्यक ती भरीव मदत केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
0
0
Report

नगर पालिका ने प्रॉपर्टी सर्वे/री-वल्यूएशन के लिए निजी एजेंसी नियुक्ति मंजूर कर दी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण आणि फेरमूल्यांकन करण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्याच्या प्रस्तावावर महापालिका सर्वसाधारण सभेत तब्बल ३ तास चर्चा झाली. या वेळी जुन्या एजन्सीने केलेल्या चुकांचा पाढाच नगरसेवकांनी सभेत वाचून दाखवला. जुन्या एजन्सीने केलेल्या चुका दुरुस्त करण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर सर्वपक्षीय पाठिंब्यासह या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यासाठी महापालिकेकडून लवकरच निविदा प्रसिद्ध केली जातील. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मालमत्ता करात कोणतीही वाढ केली जाणार नाही, अशी हमी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

25 गावों के लिए रिंगरोड पर विशेष शिबिर, भूसंपादन विवाद सुनवाई शुरू

Nashik, Maharashtra:रिंगरोड संदर्भात २५ गावांसाठी उद्यापासून विशेष शिबिर रिंगरोड साकारण्यात येणार आहे. यामध्ये नाशिक तालुक्यातील विविध गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण केले जाताय ....काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून भूसंपादनाबाबत हरकती घेतल्या आहेत... या हरकती, सूचना, फेरविचार अर्जावर आता प्रत्यक्ष सुनावणी जिल्हा प्रशासनाकडून घेतली जाणार आहे. यासाठी उद्या २५ गावांसाठी दोन दिवसीय विशेष शिबिर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलाय...कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता वाहतुकीचा विषय मार्गी लावण्यासाठी ६५.५ किलोमीटरचा बाह्य रिंगरोड तयार केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाला एकूण ३६६ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. हा प्रकल्प तीन तालुक्यांतून जाणार असून विविध गावांमधील शेतकऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेला व रिंगरोडला विरोध दर्शविलाय...याबाबत शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या शासन व प्रशासनापुढे मांडून प्रशासनाकडे हरकती, सूचना आणि फेरविचार अर्ज दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांमार्फत नियोजन भवन येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आलेल्या हरकती, सूचना व फेरविचार अर्जावर थेट सुनावणी घेतली जाणार आहे....
0
0
Report

अमरावती कांग्रेस में आंतरिक घमासान: नगरसेवक पैसे लेकर भाजपा के पक्ष में मतदान—देशमुख दावा

Amravati, Maharashtra:अमरावती काँग्रेस मधील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर; विधान परिषद निवडणुकीत नगरसेवकांनी ५ ते ६ लाख रुपये घेऊन भाजप उमेदवाराच्या बाजूने मतदान केल्याचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचा दावा अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आता उघडपणे समोर आला आहे. अंजनगाव सुर्जी येथे आयोजित मतदार जनजागृती व SIR प्रशिक्षण शिबिरात जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी आपल्या पक्षातील काही नगरसेवकांवर गंभीर आरोप केले. विधान परिषद निवडणुकीत काही नगरसेवकांनी ५ ते ६ लाख रुपये घेऊन भाजप उमेदवाराच्या बाजूने मतदान केल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेसच्या निर्देशानुसार कोऱ्या मतपत्रिका जमा करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र जिल्ह्यात केवळ पाचच कोरे फॉर्म जमा झाल्याचे त्यांनी सांगितले. जनतेने काँग्रेसच्या चिन्हावर निवडून दिलेल्या नगरसेवकांनी पैशासाठी पक्षाशी गद्दारी केल्याची टीका करत अशा पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांच्या पक्षपदे काढून घेण्यात येईल असा इशाराही देशमुख यांनी दिला. या आरोपांमुळे जिल्हा काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली. आता वरिष्ठ नेतृत्वाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साउंड बाईट :- बबलू देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
0
0
Report

संजय राऊत के बयानों से महाविकास आघाडी में हलचल

Nagpur, Maharashtra:संजय राऊत आज नीट पेपर फुटी प्रकरणी सोनम वांगचुक उपोषणाला बसले त्याला १७ दिवस झाले हा मोठा प्रश्न आहे.. त्यांची प्रकृती अत्यंत ढासळली हा चिंतेचा विषय.. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि आम्ही डी लिमीटेशन बिलाला पाठिंबा देणार ही माहिती चुकीची.. सुप्रिया सुळे आज १२ वाजता पत्रकार परिषद घेणार.. मे आताच त्यांना फोनवर बोललो..आपले प्रश्न त्यांना विचारले तर योग्य ठरेल.... त्या तयारीशी येणार आहे.. मी मागील काही अशा चर्चा ऐकतोय कोण कुठे जातोय अशी.. या सगळ्या अफवा आहे.. प्रफुल पटेल फुटबॉल वर्ल्डकप साठी परदेशात जातात ते नसावेत.. जयंत पाटील यांच्या मतदार संघातील एका नगरसेवकाला बेकायदेशीर अपात्र केलं.. इस्लामपूर भागातील हा नगरसेवक.. ही लोकशाहीसासाठी गंभीर गोष्ट.. त्या विषयासाठी मुख्यमंत्र्यांना बोलण्यासाठी गेले असावे.. जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत.. महाविकास आघाडीतील देखील महत्त्वाचे नेते आहेत.. हे सर्व शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबद्दल जाणीवपूर्वक अफवा पसरविल्या जात आहे.. भाजप आणि शिंदे गटाला फार काही काम नाही.. माझी सुप्रिया सुळे सोबत आताच चर्चा झाली.. त्यांनाही आश्चर्य वाटतंय त्या आज पत्रकार परिषदेत सविस्तर बोलतील.. मागील अधिवेशनात या बिल कसा असावा यासंदर्भात सरकारसोबत चर्चा झाली होती... आमच्या पक्षातील अरविंद सावंत, सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.. पक्ष फोडणे.. आमदार खासदार फोडून बहुमत दाखवेल यामध्ये काही तथ्य नाही.. राम मंदिरा शेजारील मैदान त्यांचा वाढदिवस हा राममंदिरातील चोरीपेक्षा महत्त्वाचा असेल तर आम्हीदेखील त्यामध्ये सहभागी होऊ.. रामनगर मंदिरात उद्धव ठाकरे यांची सभा वैगेरे नाही.. आम्ही रामरक्षा पठण करणार....रामनगर मंदिर परिसरात रस्त्यावर कार्यक्रम करू.. आम्ही रस्त्यावरील लोक आहोत. थोड्या वेळात आमचे सहकारी येतील तेव्हा अंतिम निर्णय घेऊ.. त्यांच्या वाढीवसाची तयारी आतापासून होत असेल तर चांगलं आहे.. तो मोठा माणूस आहे..प्रभू रामाला या लोकानी रस्त्यावर आणलं..
0
0
Report
Advertisement

कशेडी घाटी में दराड़, मुंबई-गोवा राजमार्ग पर यातायात ठप

Ratnagiri, Maharashtra:कशेडी घाटात आज पुन्हा दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात आज पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूरजवळ धामणदिवी गावच्या हद्दीत ही दरड कोसळली असून,यामुळे कोकणातून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर दरड हटवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र प्रवाशांना मोठ्या कोंडीचा सामना करावा लागत आहे.
0
0
Report

आंबेगाव में भारी बारिश से किसानों की फसलें डूबीं, लाखों का नुकसान

Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यातील लोणी धामणी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे संपूर्ण शेतांना तळ्याचे स्वरूप आले असून, खरीप हंगामातील पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. यात प्रामुख्याने मका, बाजरी, ज्वारी आणि गवार यांसारखी महत्त्वाची पिके पाण्यात बुडाल्याने कुजून खराब झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हा परिसर मुळात दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो, अशातच शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेल्या कमी पाण्यात ही पिके जगवली होती. मात्र, काही तासांतच झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. आता या नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत.
0
0
Report

अमरावती में चार युवकों ने युवक का हाथ काटा, अस्पताल में भर्ती

Amravati, Maharashtra:तीन ते चार तरुणांनी छाटला एका तरुणाच्या हाताचा पंजा; अमरावतीत खळबळ, तरुणाची मृत्यूशी झुंज सुरू अमरावती शहरातील राजेंद्र नगर परिसरात एका युवकाचा तीन ते चार युवकांनी हाताचा पंजा पूर्णपणे छाटून टाकला जखमी युवकाला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. दरम्यान हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज सुरू असून पोलिसांना आरोपी निष्पन्न झाले असून लवकरच अटक केले जाणार असल्याचे माहिती पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी सांगितले आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ आहे.
0
0
Report
Advertisement

धाराशिव पहुँची संत गजानन महाराज की पालखी, भक्तों ने किया भव्य स्वागत

Dharashiv, Maharashtra:शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव शहरात दाखल झाली. शहरात पालखीचे मोठ्या उत्साहात जोरदार स्वागत! शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आज धाराशिव शहरात दाखल झाली. धाराशिव शहरात पालखीचे मोठ्या उत्साहात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे संपूर्ण धाराशिव शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. आज धाराशिव शहरातच पालखीचा मुक्काम असणार आहे. यंदा या पालखीचे 57 वे वर्ष असून तब्बल 700 किलोमीटर पायी प्रवास करून ही पालखी पंढरपुरात दाखल होते. अत्यंत शिस्तबद्ध पालखी म्हणून या पालखी सोहळ्याची ओळख आहे. टाळ मृदंगाचा गजर आणि गण गण गणात बोते च्या जय घोषात शेकडो वारकरी या वारीमध्ये सहभागी झाले असून मजल तर मजल करीत पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top