icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रिठद–अटकळी मार्ग पुलों का काम देरी से रुका, छात्रों को 10 किमी अतिरिक्त यात्रा

Washim, Maharashtra:वाशिम जिला रिठद–अटकळी मार्ग पर पुलों के निर्माण कई महीनों से अधूरे पड़े हैं, जिससे नागरिकों और स्कूल के विद्यार्थियों को बड़ी कठिनाई हो रही है. पुलों के काम रुक जाने से मार्ग पर यातायात बाधित है और स्कूल बसें भी बंद हो चुकी हैं. परिणामस्वरूप विद्यार्थियों को प्रति दिन लगभग 10 किलोमीटर अधिक दूरी तय कर स्कूल जाना पड़ रहा है. इससे विद्यार्थियों के समय और आर्थिक खर्च में वृद्धि हो रही है, जबकि माता-पिता को भी दिक्‍तें हो रही हैं. येवती, रिठद, अटकळी और रिसोड क्षेत्र की दैनिक आवाजाही पर भी इसका असर पड़ा है. बरसात के मौसम को देखते हुए नागरिकों की कठिनाइयाँ बढ़ने की संभावना है, और पुलों के काम को तात्कालिक रूप से जल्द पूरा करने की मांग की जा रही है.
0
0
Report

चिपळूण में बरसात के बिना सड़कें गड्ढों में डूबीं, नागरिक बोले- सड़क या गड्ढा?

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..पावसाच्या सुरुवातीलाच चिपळूणचे रस्ते पाण्याखाली.. 'रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?' नागरिकांचा प्रशासनाला सवाल.. अँकर चिपळूण शहरात पावसाने जोर धरताच अंतर्गत दुरवस्था उघडी पडली असून अवघ्या बारा दिवसांतच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसून दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.. या लपलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका प्रचंड वाढला असून शहरातील वाहतूक कमालीची मंदावली आहे.. स्थानिक प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन न केल्याचा आरोप करत, नागरिकांनी 'रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?' असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.. प्रशासनाने आतातरी डोळे उघडून तातडीने हे खड्डे बुजवावेत आणि पाण्याचा निचरा करून जनतेला दिलासा द्यावा,अशी तीव्र मागणी चिपळूणवासीयांकडून केली जात आहे..
0
0
Report
Advertisement

नेवासाकी ज्ञानेश्वरी आषाढ़ी पालखी को देहू-आळंदी जैसी सरकारी सुविधाएं मिलेंगी

Shirdi, Maharashtra:ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनात्मक असलेल्या क्षेत्र नेवासा येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी आषाढी पालखी सोहळ्याला आता देहू आणी आळंदी प्रमाणे शासकीय सुविधा मिळणार आहेत.. यावर्षीपासून या सोहळ्यास शासकीय दर्जा बहाल करण्यात आला असून 8 जुले रोजी प्रस्थान होणा-या पालखी सोहळ्यात 20 हून अधिक दिंड्या सहभागी होणार आहेत... अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नेवासा येथून गेल्या 50 वर्षांपासून आषाढी वारी निमित्त निघणाऱ्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडीचे आता भव्य पालखी सोहळ्यात रूपांतर झाले आहे . गेल्यावर्षी 20 हून अधिक दिंड्या एकत्र येत निघालेल्या या भव्य-दिव्य सोहळ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. याकडे आमदारांनी विधान भवनात लक्षवेधी उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले होते..शासनाने या पालखी सोहळ्याची तत्काळ दखल घेतली असून यावर्षीपासून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी, लाईट व्यवस्था, निवारा, स्वच्छता व कडेकोट पोलीस बंदोबस्तासह सर्व आवश्यक उपाययोजना शासनाकडून दिल्या जाणार आहेत. देहू-आळंदीप्रमाणेच नेवासाच्या पालखीलाही शासनाकडून सुविधा पुरवल्या जाणार असल्याने वारकऱ्यांसह- भाषिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे..
0
0
Report

रत्नागिरी के धरण तीन दिन की बारिश से फुल, शहर की जल आपूर्ति बढ़ेगी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी-गेले तीन दिवस पडणाऱ्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ रत्नागिरीतील शीळ धरण ओव्हर फ्लो रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारे धरण तुडुंब भरले रत्नागिरी शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस धरण भरल्याने शहराला पाणीपुरवठा करण्याचा कालावधी देखील वाढवला जाणार रत्नागिरीतील शीळ धरणातून 90% पाणीपुरवठा होतो शहराला रत्नागिरी जिल्ह्यातील इतर धरणांच्या पाणी साठ्यातही चांगली वाढ दापोलीतील सुकोंडी, पंचनदी ही धरणं देखील 100 टक्के भरली तर 20 धरणं 50 टक्के पेक्षा जास्त भरली
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर में ड्रग रैकेट का भांडाफोड़: लॉज से MD ड्रग्स के साथ तीन तस्कर गिरफ्तार

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा रामनगर पोलिसांनी भांडाफोड केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे जटपुरा गेट परिसरातील सुपर लॉजवर ही धाड घातली गेली. यात 22.32 ग्रॅम MDMA जप्त करण्यात आले असून अकोला आणि चंद्रपूरच्या तीन सराईत तस्करांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण एक लाख 66 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रात्रगस्तीच्या दरम्यान रामनगर पोलीस ठाण्याच्या पथकाला ड्रग तस्कर लॉजमध्ये थांबले असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी अकोला येथील शेख मुस्तफा शेख रहीम आणि अब्दुल राजीक अब्दुल रशीद यासह अन्य एकाला ताब्यात घेतले आहे.
0
0
Report

राहाता में 58 वर्षीय फादर पर नाबालिग से अश्लील कृत्य का आरोप, विनयभंग समेत POSCO मामला दर्ज

Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात सोमवारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. 58 वर्षीय फादर संजय योसेफ पंडित नावाच्या फादरने चर्चसमोरील मैदानात खेळत आलेल्या 9 वर्षीय पीडित चिमुरडीला जवळ बोलावून बळजबरीने तिच्यावर अश्लील कृत्य केल्याची घटना घडलीय. राहाता तालुक्यात घडलेल्या या घटनेने तीव्र संतापाची लाट उसळली आहे. चर्चच्या अंगणात खेळत असलेल्या मुलीला जवळ बोलावून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न या नराधमाने केला. मुलीने आरडाओरड केल्यानंतर तीला सोडून दिल्याने अनर्थ टळला. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारी वरून लोणी पोलिसांनी आरोपी फादर संजय पंडित याच्या विरुद्ध विनयभंग आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास लोणी पोलीस करीत आहेत.
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर- गडचिरोली में सागवान लकड़ी से ब्रांड बना वनविकास महामंडळ, पांच साल में 6.5 करोड़ उलाढाल

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर- गडचिरोली जिलेतील घनदाट जंगलातील मौल्यवान ठेवा म्हणजे सागवान लाकूड. इथले सागवान लाकूड लाकूड जगतात आता ब्रँड बनले आहे. FDCM अर्थात वनविकास महामंडळ हे वनविभागाचे एक सरकारी महामंडळ आहे. जंगलव्याप्त जिल्ह्यात इमारतीसाठी लागणारे सागवान आणि इतर प्रजातीचे लाकूड कापून ते व्यावसायिक पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध करून देणे महामंडळाचे काम आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर म्हणजे इथला मध्यवर्ती भांडार आणि बाजार आहे. चंद्रपूर FDCM प्रकल्पात आलापपल्ली येथील आरा गिरणीचा देखील समावेश आहे. 1921 पासून 2021 पर्यंत या प्रकल्पाची साधारण उलाढाल 60 लाखांची होती. आधी नवे संसद भवन मग राम मंदिर, PMO, उपराष्ट्रपती निवास यासह आता काशी विश्वनाथ मंदिरात होणाऱ्या जीर्णोद्धार कार्यात इथले जगप्रसिद्ध सागवान लाकूड वापरले जात आहे. FDCM चंद्रपूरने मागील 5 वर्षात चक्क 6.5 कोटींची उलाढाल केली आहे. आता देशभरातून ऑर्डर्सचा प्रचंड ओघ वाढला आहे. यात सरकारी आणि खाजगी खरेदीदार यांचा समावेश आहे. मूल्यवर्धन करत केवळ सागवान लाकूड उपलब्ध करून देण्याऐवजी आता वनविकास महामंडळतयार फर्निचर व्यवसायात उतरले आहे. उत्तमोत्तम यंत्रसामुग्री वापरून ग्राहकाला हवे तसे फर्निचर बनवून देण्यात इथले शेकडो कुशल हात गुंतले आहे. सरकारी खात्याने टीम म्हणून काम करायचे ठरवले तर काय होऊ शकते याचे उदाहरण FDCM चंद्रपूरने घालून दिले आहे. चंद्रपूर FDCM आता सागवान व्यवसायात एक ब्रँड बनले आहे.
0
0
Report

सांगली जिला बैंक में अध्यक्ष-पूर्व विधायक के बीच घमासान, प्रशासक नियुक्ति की मांग तेज

Sangli, Maharashtra:स्लग - जिल्हा बँकेवरून आमदार गोपीचंद पडळकर व बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्यात जुंपली.. अँकर - सांगली जिल्हा बँकेवरून बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात जुंपली आहे.संचालक मंडळाच्या कर्जमाफी,आरबीआयची नोटीस यामुळे पडळकरंकडून बँकेवर भ्रष्टाचाराचे आरोप करत प्रशासक आणण्याची मागणी केली आहे.मात्र बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी पडळकर यांच्या आरोपांचा खंडन करत पुरावे दाखवा राजीनामा देतो,नसेल तर तुम्ही राजीनामा द्या,असे खुले आव्हान दिले आहे... व्ही वो - सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जयंत पाटील विरुद्ध आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यातला संघर्ष सुरूच आहे,कोणत्या ना कोणत्या कारणातून पडळकर आणि खोत यांच्याकडून टार्गेटवर असतात.जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सांगली जिल्हा बँकेवर पडळकर आणि खोतांकडून बँकेवर झालेल्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या आरोपावरून सातत्याने टीका केली जाते. मात्र आता,रिझर्व बँकेकडून देण्यात आलेली नोटीस,संचालक कर्ज आणि नोकर भरती,यावरून राजकारण तापलय. व्ही वो - वास्तविक आमदार जयंत पाटील, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम,माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा मध्यवर्ती बँकेत सर्वपक्षीय सत्ता आहे.जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पद हे भाजपाकडे आहे.भाजपाचे दिग्गज नेते संचालक देखील आहेत.मात्र आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत,हे दोघे जिल्हा बँकेच्या विरोधात असून बँकेवर प्रशासक आणावे,अशी मागणी सातत्याने करत आहे. व्ही वो - याला आता,आरबीआय कडून देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिसीमुळे बळ मिळाले आहे.बँकेकडून सध्या कडे देणारी नोकर भरती आणि संचालक मंडळाला देण्यात आलेलं कर्जमाफी यावरून पडळकर यांनी पुन्हा जयंत पाटील आणि बँकेला टारगेट केलंय.बँकेने विद्यमान संचालकांना कोट्यावधीची कर्ज देऊन कर्जमाफी केली आहे,असा आरोप करत, सध्या होणाऱ्या जम्बो नोकरी भरतीवर संशय व्यक्त करत बँकेवर प्रशासक आणावी,अशी मागणी केली आहे. बाईट - गोपीचंद पडळकार - आमदार, भाजपा. व्ही वो - दरम्यान आमदार गोपीचंद पडळकरांचे आरोप आणि मागणीचे बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी खंडन करत गोपीचंद पडळकरांच्या मागणीवर संशय व्यक्त करत, एक रुपया कर्जमाफी केल्याचं पडळकर यांनी दाखवावे आपण राजीनामा देऊ,नसेल तर पडळकर यांनी राजीनामा द्यावा,असं थेट आव्हान नाईक यांने केले आहे. बाईट - मानसिंगराव नाईक - अध्यक्ष, जिल्हा बँक, सांगली. व्ही वो - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 444 लिपिक पदकांसाठी,सध्या नोकर भरती सुरू झाली आहे,याआधी ही जिल्हा बँकेकडून नोकर भरती करण्याचा प्रयत्न करण्यात आला,मात्र गोपीचंद पडळकर यांनी आणि खोत यांनी केलेल्या तक्रारीनंतर राज्य सरकारने नोकर भरतीला स्थगिती दिली होती,मात्र आता पुन्हा ही नोकर भरती सुरू झाली आहे,पुन्हा या नोकर भरतीवर संशय व्यक्त केला आहे. व्ही वो- खरंतर गोपीचंद पडळकर हे भाजपाचे आमदार आहेत,जिल्ह्यातील अनेक भाजपाचे दिग्गज नेते,जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक आहेत.बँकेच्या कथेत गैरव्यवहार प्रकरणी स्थगिती मिळाल्या चौकशी पडळकर यांच्यामुळे पुन्हा सुरू देखील झाली आहे.त्यामुळे जयंत पाटलांना नामोहरम करताना,भाजपाच्या जिल्ह्यातल्या दिग्गज नेत्यांची नाराजी देखील पडळकर ओढवून घेत आहेत,हे देखील नक्की आहे..
0
0
Report

नाशिक में संतोष श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की पालखी पहुँची, वारकरी उत्साह से भरे

Nashik, Maharashtra:संतोष श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशकात दाखल झाली शहरातील पंचायत समिती येथे या पालखीचं स्वागत करण्यात आलं...हजारोच्या संख्येत वारकरी सहभागी झाले आहे... गेल्या 3 दिवसापासून पालखी पंढरच्या दिशेने प्रस्थान करत आहे... पालखी चालत असताना अनेक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह दिसून आला... पंढरीच्या नावाचा जयघोष करत टाळ मृदंगाच्या तालावर नाचत हा पालखी सोहळा साजरा करताना वारकरी दिसले... या संदर्भात आढावा घेत वारकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
0
Report
Advertisement

आसाम में आटपाड़ी के युवक से 55 करोड़ रुपये का सोना बरामद: पुलिस ने किया गिरफ्तार

Sangli, Maharashtra:सांगलीच्या आटपाडी येथील तरुणाला आसाममध्ये 55 कोटीचे सोने तस्करी करताना अटक. अक्षय बनसोडे असे या तरुणाचं नाव असून तो आटपाडीचा असल्याचा आसाम पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.त्याच्याकडून तब्बल ५५ कोटी रुपयांचा सोन्याचे बिस्कीट जप्त करण्यात आले आहेत.त्याच्याकडून चार मोबाईल फोन आणि १३ ग्रॅम चांдиही जप्त करण्यात आली आहे.आसामच्या गुवाहाटीतील खारघुली परिसरात छापा टाकुन अक्षय बनसोडे याच्याकडील दोन बॅगांची झाडाझडती घेतली असता बॅगमधून ३७ किलो २४ कॅरेट सोन्याची बिस्किटे सापडली असून सोना जप्त करत अक्षय बनसोडे याला आसाम पोलिसांनी अटक केल्याचे गुवाहाटी पोलीस उपायुक्त शंभवी मिश्रा,यांनी स्पष्ट केले आहे.तर बनसोडे हा आटपाडी मधला असल्याचं समोर आल्याने,त्याच्या अटकेने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
0
0
Report

यवतमाळ के खैरगाव में अवैध और मुदतबाह्य कीटनाशक-खत जब्त, 17.82 लाख मूल्य

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव देशमुख येथे अवैध आणि मुदतबाह्य कीटकनाशके तसेच रासायनिक खताचा साठा जप्त करण्यात आला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या माथी ही मुदतबाह्य खते व औषधी बनावट लेबल लावून मारल्या जात होती. कृषी विभागाने केलेल्या या कारवाईत 17 लाख 82 हजाराचा साठा जप्त करण्यात आला. यश शिवनवार या व्यक्तीच्या गोदामावर अधिकृत परवाण्याशिवाय थेट आदिलाबाद आणि सारखणी येथून मोठ्या प्रमाणात ही अवैध खते व कीटकनाशके मागविल्या जात होती. कमी दरात माल आणून तो बनावट लेबल चिटकवून शेतकऱ्यांना विकला जात होता. या कारवाईमुळे खरीप हंगामामध्ये भोळाबाबडा शेतकरी नागविला जात असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top