icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

28 साल बाद गिरफ्तार: जोगेश्वरी पुलिस ने 1998 के आरोपी उमेश गौंडर को पकड़ा

Mumbai, Maharashtra:मुंबईतील जोगेश्वरी पोलिसांनी तब्बल २८ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. जोगेश्वरी पोलीस ठाण्यात १९९८ साली गुन्हा क्रमांक १०७/१९९८ अंतर्गत घरात घुसखोरी, फसवणूक, मालमत्तेचे नुकसान आणि चोरीच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी उमेश मुत्तुस्वामी गौंडर हा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात हजर राहत नसल्याने त्याच्याविरोधात अंधेरी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट आणि जाहीरनामा जारी केला होता. दरम्यान, २७ जुलै २०२६ रोजी जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या समन्स वॉरंट पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळला. तांत्रिक तपासाद्वारे आरोपी डोंबिवली परिसरात राहत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला त्याच्या राहत्या घराजवळून ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन हजार रुपयांचा दंड, दहा हजार रुपयांच्या रोख जामिनावर आणि पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मुक्त करण्याचे आदेश दिले.
0
0
Report

साकीनाका पुलिस ने वर्षों से फरार आरोपी अयुब मोहम्मद सफात चौधरी को गिरफ्तार किया

Mumbai, Maharashtra:मुंबईतील साकीनाका पोलिसांनी तब्बल १५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. साकीनाका पोलीस ठाण्यात २०१० मध्ये गुन्हा क्रमांक ५४९/२०१० अंतर्गत जमावबंदीचे उल्लंघन, शासकीय कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणणे आणि हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी अयुब मोहम्मद सफात चौधरी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात हजर राहत नसल्याने त्याच्याविरोधात न्यायालयाने स्थायी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. दरम्यान, २९ जुलै २०२६ रोजी साकीनाका पोलीस ठाण्याच्या तडीपार पथकाला गोपनीय माहिती मिळाली की आरोपी पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिम येथील सपकाळे नाका परिसरात वास्तव्यास आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिताफीने सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
0
0
Report

गडचिरोली पुलिस की मदद से लाहेरी में रोगी का हेलीकॉप्टर से तात्कालिक मेडिकल ट्रांसफर

Chandrapur, Maharashtra:गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने अतिदुर्गम लाहेरी येथील रुग्णाचे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तात्काळ वैद्यकीय स्थलांतर, जिल्हा रुग्णालयात दाखल, तातडीच्या हालचालींमुळे वाचला जीव. मागील काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊसामुळे इंद्रावती, पामुलगौतम व पर्लकोटा नद्यांना आलेल्या पाण्यामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. अशातच भामरागड तालुक्यातील मौजा लाहेरी येथील रहिवासी शामसुंदर नरोटी ( 35 ) यांची प्रकृती विषबाधा अथवा सर्पदंश कारणाने गंभीर झाली. मदतीची माहिती मिळताच त्यांना तातडीने गडचिरोलीला हलवण्याची व्यवस्था करण्यात आली. गडचिरोली पोलीसांचे पवन हंस हेलिकॉप्टर तात्काळ भामरागडसाठी रवाना करण्यात आले. शामसुंदर नरोटी यांना सुरक्षितपणे गडचिरोलीला आणण्यात आले आहे, त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये कुठल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ जवळच्या रुग्णालयात किंवा आपत्कालीन सेवांशी संपर्क करुन वेळेत उपचार मिळवावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
0
0
Report
Advertisement

पानी के लिए आमरण उपोषण: रत्नागिरी के कुटगिरी-येडगेवाडी में नया गतिरोध

Ratnagiri, Maharashtra:कुटगिरी-येडगेवाडी पाण्यासाठी आमरण उपोषण; चर्चahi निष्फळ, संघर्ष दुसऱ्या दिवशीही कायम रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी-येडगेवाडी येथील धनगर समाजाच्या पाच कुटुंबांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी देवरुख पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. शासकीय विहिरीवरून टाकण्यात आलेली पाणीपुरवठ्याची पाईपलाईन तोडल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून या कुटुंबांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.दरम्यान,उपसभापती,प्रभारी गटविकास अधिकारी,सरपंच तसेच संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष कुटगिरी-येडगेवाडी गावात जाऊन पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. त्यानंतर उपोषणकर्त्याशी पहाटे सहा वाजेपर्यंत चर्चाही झाली.मात्र,कोणताही समाधानकारक तोडगा निघाल्याने उपोषण दुसऱ्या दिवशीही कायम असून प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

धुले में तीव्र वर्षा से बाढ़, कन्नेर नदी में पिता-पुत्र लापता

Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यात पाऊसाने हाहाकार माज्वला आहे. आंबोडे येथे कन्नेर नदीच्या पुरात पिता-पुत्र वाहून गेल्याची घटना समोर आली असून, त्यांना शोधाण्याचे कामं सुरु आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुळे तालुक्यातील आंबोडे गावात कन्नेर नदीला आलेल्या पुरामुळे दुर्दैवी घटना घडली आहे. नदीकाठावर असलेल्या श्रीराम नाश्ता सेंटर या दुकानातील पिता-पुत्र पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. वाहून गेलेल्यांची नावे आनंदा पारखे (वय ६०) आणि त्यांचा मुलगा दिनेश आनंदा पारखे (वय २५) अशी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून दोघांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.
0
0
Report
Advertisement

प्याज की कीमतों में गिरावट: सरकार की खरीद योजना फर्जी, किसान परेशान

Lasalgaon, Maharashtra:एकीकडे शासकीय कांद्याच्या दरात 210 रुपयांची वाढ होईल 2335 रुपये प्रति क्विंटल दराने कांद्याची खरेदी सुरू असताना दुसरीकडे कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सोमवारच्या तुलनेत आज शुक्रवारी कांद्याच्या जास्तीत जास्त घरात दीडशे रुपये द्यायची घसरण होत कांद्याचे दर 2470 रुपयांपर्यंत खाली आले तर सरासरी कांद्याला दोन हजार रुपये दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे श्रीलंका आणि आखाती देशात अद्यापही कांद्याला मागणी नाही तसेच देशांतर्गत उत्तरेकडील राज्यांमध्ये श्रावण महिना सुरू झाल्याने कांद्याच्या मागणीत घट झाली असत मुळे कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचे व्यापारी सांगत आहे तर शासकीय कांदा खरेदी फसवी योजना असून तीन हजार रुपये भावंतर योजना जाहीर करत केंद्र व राज्य सरकारने बाजार समितीमध्ये विक्री होणाऱ्या कांद्या च्या बाजारभावातील फरक द्यावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहे
0
0
Report

चंद्रपूर समेत राज्य में ड्रग्स व साइबर क्राइम पर गृहमंत्री ने लिया आढ़ावा

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूरसह राज्यात ड्रग्ज व्यापार और सायबर गुन्हे आहेत महत्वाचे मुद्दे, जिल्ह्यातील गुन्हे विषयक स्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी घेतली आढावा बैठक अँकर:-- राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील गृह विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील गुन्हे स्थिती आणि अनुषंगिक बाबींचा आढावा घेतानाच त्यांनी चंद्रपूर पोलीस प्रशासनाने गेल्या काही काळात ड्रग्ज व्यापार आणि सायबर विषयक गुन्हे कमी करण्यासाठी केलेल्या उपायांची माहिती घेतली. देश व राज्यातही ड्रग्ज व्यापार आणि सायबर गुन्हे हे महत्त्वाचे मुद्दे असून त्यासंदर्भात प्राथमिकता दिली जात असल्याचे भोयर म्हणाले. बाईट १) पंकज भोयर, गृहराज्यमंत्री
0
0
Report

कोकण के कुंभार्ली घाट पर खड्डों का कहर, यात्रियों की जिंदगी खतरे में

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कुंभार्ली घाटाची ‘चाळण’! कोट्यवधींचा निधी खड्ड्यांत; कोकण-पश्चिम महाराष्ट्राचा संपर्क धोक्यात!.. कुंभार्ली घाटात सध्या प्रवाशांचा प्रवास अक्षरशः 'जीवघेणा' ठरतोय! कोट्यवधी रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसाळ्यात या महामार्गाची भीषण चाळण झाली असून, रस्त्यावर तब्बल पाच ते सात फुटांचे अवाढव्य खड्डे पडले आहेत.. मुसळधार पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने भीषण अपघात घडत आहेत. प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून या मृत्यूच्या सापळ्यातून प्रवास करावा लागतोय.. प्रशासकीय हलगर्जीपणा आणि निकृष्ट दर्जाच्या कामाचा थेट फटका सामान्य प्रवाशांना सोसावा लागतोय.. आता प्रश्न हाच उपस्थित होतोय की,एखादा मोठा अपघात होऊन बळी जाण्याची प्रशासन वाट पाहतंय का?.. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..
0
0
Report
Advertisement

मेळघाट आश्रम स्कूल में 70 विद्यार्थियों की विषबाधा: अधीक्षक पर सप्लायर होने का नया आरोप

Amravati, Maharashtra:AMT_NEW_SCHOOL_PKG पाच फाईल आहे रिपोर्टर :- अनिरुदऽ्य डवाले, अमरावी 9503131919 मेळघाटातील आश्रम शाळेत 70 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे प्रकरण टीटंबा शासकीय आश्रम शाळेचा अधीक्षकच निघाला सप्लायर? सेंट्रल किचनला लागणारे साहित्य घेण्यासाठी अधीक्षकाचा किचनच्या अधिकाऱ्याला तगादा? आश्रम शाळेत घातपात झाल्याचा सेंट्रल किचनचा आरोप, घातपाताचे सर्व पुरावे पोलिसांना दिले अँकर :- मेळघाटातील टीटंबा शासकीय आश्रम शाळेत तब्बल 70 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचे प्रकरण झी 24 तास ने उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती मात्र आता या घटनेत आणखी एक नवीन बाब समोर येतेय. टीटंबा येथील शासकीय आश्रम शाळेचा अधीक्षकच सप्लायर असल्याचे एका वायरल ऑडिओ क्लीपमधून समोर येतंय. या ऑडिओ क्लीपची झी 24 तास पुष्टी करत नाही. परंतु ही क्लीप आता व्हायरल झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वत्र खळबळ उडाली आहे. या विषयाची सेंट्रल किचनचे अधिकारी आणि अधीक्षक संदीप गोळे याच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप झी 24 तास च्या हाती लागली असून या ऑडिओ क्लिपच्या संभाषणात टीटंबा येथील शाळेच्या अधीक्षकाने सेंट्रल किचनच्या अधिकाऱ्याला त्याच्या जवळील साहित्य घेण्यासाठी तगादा लावल्याचे दिसून येत आहे. तसेच आश्रम शाळेत घातपात झाल्याचा सेंट्रल किचनच्या अधिकाऱ्यांनी आरोप केला असून घातपाताचे सर्व पुरावे पोलिसांना दिले असल्याचं सांगितला आहे त्यामुळे या प्रकरणात पुन्हा नवीन वळण आला आहे काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया झी 24 तास स्पेशल रिपोर्ट.... Vo:१ टीटंबा येथील शासकीय आश्रम शाळेचा अधीक्षकच सप्लायर असल्याचे एका वायरल ऑडिओ क्लीपमधून समोर येतंय. या ऑडिओ क्लिपच्या संभाषणात टीटंबा येथील शाळेच्या अधीक्षकाने सेंट्रल किचनच्या अधिकाऱ्याला त्याच्या जवळील साहित्य घेण्यासाठी तगादा लावल्याचे दिसून येत आहे. मी अधीक्षक कमी असून सप्लायर आहे... मी बिनधास्तपणे काम करत असून डिपार्टमेंटला हे माहिती आहे... मी गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला, किराणा माल, धान्य, केळी आणि अंडी पुरवत आहे माझ्याकडे सर्व सेटिंग आहे... माझ्याकडे चार-पाच प्रकारचे लायसन्स असून मी एम्पलोयी असल्याने माझ्या भावाच्या नावाने हे लायसन घेतले आहे मात्र माझा भाऊ यामध्ये कुठेही दिसणार नाही... असे टीटंबा शासकीय आश्रम शाळेचा अधीक्षक संदीप गोळे सेंट्रल किचनच्या अधिकाऱ्याला सांगत असल्याच या ऑडिओ क्लिप मध्ये ऐकायला मिळत आहे. दरम्यान या प्रकरणी सेंट्रल किचनच्या मालकासह सहा जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काय खुलासे पुढे येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे... साउंड बाईट :- ऑडिओ क्लिप Vo:२ दरम्यान हे प्रकरण आज झी 24 तास ने पुन्हा लावून धरले असून या प्रकरणाला नवीन वळण लागला आहे. टीटंबा शासकीय आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या प्रकरणावर सेंट्रल किचनला घातपात असल्याचा संशय असून त्यांनी घातपाताचे पुरावे आम्ही पोलिसांना दिलं असल्याचं सेंट्रल किचनच्या वतीने सांगण्यात आला आहे. त्यामुळे सेंट्रल किचनच्या या आरोपाने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. टीटंबा आश्रम शाळेचा अधीक्षक आम्हाला त्याच्याकडून साहित्य घेण्यासाठी दबाव टाकून धमकावत होता मात्र त्याच्याकडून आम्ही साहित्य न घेतल्याने त्याचे परिणाम तुम्हाला भოგावे लागतील असे म्हणत वारंवार धमक्या दिल्या मात्र तरीही सेंट्रल किचनने त्याच्याकडून साहित्य खरेदी न केल्याने त्याने हा घातपात घडवून आणला आहे. या घातपाताचे सर्व पुरावे आम्ही पोलिसांना सादर केले आहे. असे सेंट्रल किचनचे सहव्यवस्थापक यांनी सांगितल्याने एकच खळबळ उडाली आहे. बाईट :- श्रीकांत गिरम, सह व्यवस्थापक, सेंट्रल किचन Vo:३ सेंट्रल किचनच्या या आरोपाला शाळेच्या अधीक्षकाने प्रतिउत्तर दिले आहे. मेळघाटातील आश्रम शाळेतील विषबाधा प्रकरणात टीटंबा शाळेच्या अधीक्षकाला निलंबित करण्यात आला आहे. या निलंबनाविरोधा अधीक्षकाने 29 जुलै पासून चाकी कार मध्ये फुल्ल AC वातानुकूलित फाईव्ह स्टार उपोषण सुरू केले आहे. निलंबर तात्काळ मागे घेण्याची मागणी या अधीक्षकाने केली असून निलंबन मागे न घेल्यास 1 ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. मी सुट्टीवर असताना मला निलंबित करण्यात आला आहे... हा माझ्यावर अन्याय आहे. तसेच वायरल झालेली ऑडिओ क्लिप ही खोटी आहे तसेच आश्रम शाळेत मी घातपात केल्याचा आरोप सेंट्रल किचनने केला असून हा आरोप हसण्यासारखा आहे अशी प्रतिक्रिया अधीक्षक संदीप गोळे याने दिली आहे. 121 :- संदीप गोळे, अधीक्षक, टीटंबा आश्रम शाळा Vo:४ मेळघाटातील 70 विद्यार्थ्यांच्या विषबाधेच्या घटनेने आधीच राज्यभरात चिंता निर्माण झाली असताना आता कथित ऑडिओ क्लिप, सेंट्रल किचनचे घातपाताचे आरोप यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. आता पोलीस तपास आणि संबंधित यंत्रणांच्या चौकशीनंतरच होणार आहे. मात्र झी 24 तास ने हे प्रकरण लावून धरल्यानंतर काही सामाजिक संघटना आक्रमक होत उद्या पोलीस अधीक्षकांना भेटून अधीक्षकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहे.
0
0
Report
Advertisement

मंगरूळपीर में शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिविर: महिला बचत समूहों को 72.3 लाख ऋण वितरित

Washim, Maharashtra:वाशीम: मंगरूळपीर येथे आमदार श्याम खोडे यांच्या पुढाकारातून महसूल अभियानांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली नागरिकांना देण्यात आला. शिबिरामध्ये उमेद अभियानांतर्गत १६ महिला बचत गटांना तब्बल ७२ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले.तसेच प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजना,शेतकरी कर्जमाफी,कामगार कल्याण मंडळ, दिव्यांग कल्याण विभाग आदी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी आणि सुलभपणे मिळावा, या उद्देशाने या समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आलेल्याची माहिती आमदार श्यम खोडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
0
0
Report

यवतमाल के भारी बारिश से चंद्रपूर में बाढ़ जैसे संकेत, कई मार्ग बंद

Chandrapur, Maharashtra:यवतमाळ जिले में हुई मुसलधार बारिश का प्रभाव अब चंद्रपूर जिले में दिखाई देने लगा है। यवतमाळ जिले से चंद्रपूर जिले की ओर आने वाले पैनगंगा नदी के पानी के बढ़ने के कारण वर्धा नदी के जलस्तर में भी तेज वृद्धि हुई है। वर्धा नदी के जलस्तर बढ़ने के कारण चंद्रपूर शहर के इरई और झरपट नदियों पर भी पानी का स्तर बढ़ गया है, जिससे चंद्रपूर शहर से सस्ती, हडस्ती और राजुऱ्या की ओर जाने वाला मार्ग इरई नदी के जलस्तर में वृद्धि के कारण बंद हो गया है। इसके साथ इरई और झरपट नदी के पानी के बढ़ते स्तर के कारण चंद्रपूर शहर पर इसका प्रभाव पड़ सकता है। स्थिति फिलहाल नियंत्रण में है, पर प्रशासन वर्धा नदी के जलस्तर में हो रही वृद्धि पर नजर रखे हुए है।
0
0
Report

नवी मुंबई क्राइम ब्रांच ने अमन पांडे को गिरफ्तार, 12 रिक्शे 9.55 लाख रुपए बरामद

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई गुन्हे शाखेने केली सराईत चोरट्याला अटक, 9 लाख 55 हजार रुपयांच्या 12 रिक्षा केल्या हस्तगत. सिवूड विभागात झालेल्या रिक्षा चोरी गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी कोपरखैरणे येथून एका सराईत चोरट्याला अटक केलेय. मोकळ्या जागাा आणि पार्किंगला असलेल्या रिक्षाचा मास्टर की द्वारे लॉक उघडून त्या रिक्षांची विक्री करण्याच्या उद्येश्याने हा चोरटा चोरी करत होता. नवी मुंबई गुन्हे शाखेने सिसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपी अमन पांडे याला अटक केली असून नवी मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीत दाखल 12 गुन्ह्यांची उकल करण्यात आलेय. आरोपी कडून पोलीसांनी चोरी केलेल्या 9 लाख 55 हजार रुपये किंमतीच्या 12 रिक्षा हस्तगत केल्या असून अधिक तपास सुरु आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top