416416
Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक
Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गडचिरोली के आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय मार्ग पर भारी वाहनों के लिए रोक, 31 अक्टूबर तक बंद रहेगा
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्हा प्रशासनावर नामुष्कीची वेळ, सलग सात वर्षे निर्माणाधिन असलेल्या आलापल्ली -सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा जड वाहतुकीस बंदी, 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहने बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आँकर: मागील सात वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग निर्माणाधीन आहे. दरवर्षी पावसाळ्यात हा महामार्ग वाहनचालकांसाठी जीवघेणा आणि दलदलीचा ठरला आहे. यंदाही जिल्हा प्रशासनावर या महामार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे. या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी वर सुरू असलेल्या बांधकामामुळे पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेता 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतूक थांबवण्यात आली आहे. आपत्कालीन सेवा, प्रवासी बस ,पाणीपरवठा, पोलीस, अन्न व औषध प्रशासन, महावितरण, दूरसंचार ,आरोग्य विभाग या वाहनांना यातून वगळण्यात आले. पहिल्याच पावसात हा महामार्ग ठीकठिकाणी अवरुद्ध झाला होता. चिखल झाल्याने आणि पर्यायी रस्ता वाहून गेल्यामुळे ठिकठिकाणी वाहने अडकून पडली होती. यंदाही दीर्घकाळ हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहे.0
0
Report
पुणे के आंबेगांव में बारिश से खेत-खेत बाढ़, फसलें डूबीं
Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यात रात्रीपासून वरुणराजाने जोरदार बॅटिंग केली आहे. शिरूर, आंबेगाव, खेड आणि जुन्नर तालुक्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून, संपूर्ण शेतशिवार पाण्याखाली गेले आहे. अनेक ठिकाणी शेतांना अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले असून, नव्याने केलेली पेरणी आणि काढणीला आलेली पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. या परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर अनेक शेतकऱ्यांच्या घरातही पुराचे पाणी शिरला आहे, पुरात झालेल्या नुकसानीचा थेट आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी.0
0
Report
राजदेरवाडी में पहाड़ी से पत्थर गिरा, 52 वर्षीय इंदूबाई देवरे की मौत
Chandvad, Maharashtra:अँकर-नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी येथे आज पहाटे अत्यंत दुर्दैवी घटना घडली. इंदुबाई संतोष देवरे (वय ५२, रा. दरेगाव) या नातेवाईकांकडे राजदेरवाडी येथे आल्या होत्या. पहाटे प्रातर्विधीसाठी घराबाहेर गेल्या असता, डोंगरावरून अचानक मोठा दगड कोसळून त्यांच्या अंगावर पडला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. स्थानिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून देवरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून घटनेची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.या परिसरात सध्या पावसाची सारखी रिप रिप सुरू असल्याने डोंगरावरून माती दगड येत असतात त्यातूनच ही घटना घडल्याचे बोलले जात आहे0
0
Report
Advertisement
अमरावती से पंढरपूर: 50 वारकरी साइकिल रैली में महिलाओं सहित 600 किमी यात्रा
Washim, Maharashtra:अँकर:आषाढी एकादशी निमित्त अमरावती सायकल असोसिएशनच्या वतीने 50वारकरी सायकलने पंढरपूर वारीसाठी निघाले आहेत.यंदा या सायकल रॅलीचा चौथं वर्ष असून दिवसेंदिवस सायकलवारीमध्ये वारकऱ्याची संख्या वाढत आहे.या वारीत13महिलांसह 40 ते 80 वयोगटातील वारकऱ्यांचा समावेश आहे.अमरावतीहून 7 जुलै रोजी निघालेल्या या वारकऱ्यांनी रात्री वाशिमच्या मुक्कामानंतर आज पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत.दररोज 100 ते 120 किलोमीटर प्रवास करत हे वारकरी 600 किलोमीटर अंतर पार करून 12 जुलै रोजी पंढरपूरला पोहोचणार आहेत.पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनाचा संदेश देणारी ही सायकल वारी मागील चार वर्षांपासून सुरू असल्याचे वारकरी सांगत आहेत。0
0
Report
सातारा जिले में भारी बारिश से बाढ़, भू-स्खलन और नदी-घाटों पर जलभराव
Satara, Maharashtra:सातारा -गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे, कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगम असलेल्या संगम माहुली येथील छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या समाधीला पुराच्या पाण्याने वेढा दिला है त्याचबरोबर काशीविश्वेश्वर मंदिराच्या पायरीला देखील पाणी लागले आहे. एकूणच सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपून काढून जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे, अनेक ठिकाणी घरांची पडझड तर काही ठिकाणी जनावरे देखील दगावली आहेत, घाटमाथा परिसरात दरड कोसळली आहे त्याचबरोबर रस्ते खचले आहेत, अनेक गावात भूस्खलन झाले आहे, एकूणच जिल्ह्यातील याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी....0
0
Report
मूसलाधार बारिश से वांगणी-बदलापूर का राज्य मार्ग बंद, यातायात प्रभावित
Ambernath, Maharashtra:मुसळधार पावसामुळे वांगणी-बदलापूर दरम्यान राज्य महामार्ग बंद काजगाव जवळ राज्य महामार्गावर पाणीच पाणी उल्हास नदी ओव्हर फ्लो0
0
Report
Advertisement
अहिल्यानगर पुलिस ने गैंग्स के खिलाफ कार्रवाई कर 68 सराईत अपराधियों को तड़ीपार किया
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्या और सराईत गुन्हेगारांविरुद्ध कार्रवाई मोडवर येत, झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारले आहे। राहाता, शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, अकोले, नेवासा यासह श्रीरामपूर पोलीस उपविभागातील १२ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६८ सराईत गुन्हेगारांना हद्दपार म्हणजेच तडीपार केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिलीय.0
0
Report
कोल्हापुर में कसारी नदी का पानी राजापूर मार्ग पर, ड्राइवर पानी में वाहन पार कर रहे
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिले के पन्हाळा तालुक्यात असणाऱ्या कासारी नदीचे पाणी कोल्हापूर राजापूर राज्य मार्गावर आल आहे. त्यामुळे वाहनचालक याच पाण्यातून वाट काढत पुढे जात आहेत. गेल्या तीन दिवासांपासून या मार्गावर पाणी असल्याने वाहतुकीला काही प्रमाणात अडचणी येत आहेत. ज्यांना पाण्याचा अंदाज येत नाहीत त्याचा अपघात देखील घडत आहेत. हीच दृष्ये कॅमेरात कैद झाली आहेत.. याच ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
बारिश से सिन्नर के समृद्धि महामार्ग किनारे प्राकृतिक झरने लोगों को आकर्षित कर रहे हैं
Sinnar, Maharashtra:अँकर : नाशिक जिल्ह्यात सुरूलेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र धबधबे प्रवाहित झाले असून सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गालगत अनेक ठिकाणी नैसर्गिक धबधबे वाहू लागले आहेत. रस्त्याच्या कडेला कोसळणारे हे मनमोहक धबधबे वाहनधारक आणि प्रवाशांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना निसर्गाचे हे मोहक रूप अनुभवता येत असल्यून प्रवासात नयनरम्य दृश्यांचा आनंद घेत आहेत. सततच्या पावसामुळे सिन्नर परिसरातील हा निसर्गरम्य नजारा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.0
0
Report
Advertisement
बारिश से बदला चिखलदार घाट: पर्यटक जान जोखिम में डालकर फोटोग्राफी
Amravati, Maharashtra:धक्कादायक, चिखलदऱ्यात पर्यटकांची जीवघेणी फोटोग्राफी; नुसतं धाडस कशाला गेल्या आठ ते दहा दिवसांपासून चिखलदर्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे पर्यटक चिखदऱ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. सध्या चिखलदरा पर्यटकांनी हाऊसफुल झालं असल्याच पाहायला मिळत आहे तर काही पर्यटक हुल्लडबाजी करत असल्याच पाहायला मिळत आहे तर काही अतीउत्साही पर्यटक चिखलदऱ्यातील गावीलगड शेजारी असलेल्या पॉईंटवर बॅरिकेट नसलेल्या ठिकाणी टेकडीच्या काठावर जाऊन आपला जीव धोक्यात टाकून जीवघेणी फोटोग्राफी करत आहे. तर काही पर्यटक किल्ल्याच्या भिंतीवर अगदी काठावर जाऊन फोटो काढत आहे त्यामुळे हे नुसतं धाडस कशाला असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला0
0
Report
महाराष्ट्र–कर्नाटक सीमा मुद्दे पर CM फडणवीस की अध्यक्षता में उच्चअधिकार समिति मुंबई में बैठक
Kolhapur, Maharashtra:महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नी आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चअधिकार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीकडे बेळगावसह सीमा भागातील बांधवांच्या नजरा लागून राहिल्यात. येत्या काळात सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे. विधानभवनामधील मंत्रिमंडळ सभागृहात दुपारी दीड वाजता ही बैठक होणार आहे.0
0
Report
कृष्णा नदी का जलस्तर 24 फुट पर पहुँचा, सांगली में खतरे के संकेत
Sangli, Maharashtra:सांगली में कृष्णा नदी के जलस्तर में वृद्धि जारी है। कृष्णा नदी का जलस्तर 24 फुट पर पहुँच गया है, जो आयर्विन पुल के पास है। एक दिन में जलस्तर में सात फुट की वृद्धि दर्ज की गई। राहत की बात यह है कि कृष्णा नदी जलग्रहण क्षेत्रों में बारिश का जोर कमजोर हुआ है। सातारा जिले में वर्षा का प्रचंड दबाव अभी भी बना हुआ है, जिसके कारण कृष्णा नदी के जलस्तर में वृद्धि हो रही है। हमारे प्रतिनिधि सरफराज सनदी ने इसका आढ़ावा लिया।0
0
Report
Advertisement
अहिल्यानगर जिले में यलो अलर्ट, भारी बारिश जारी
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्हयास यलो अलर्ट ; जिल्हयात सर्वदूर पावसाची हजेरी... दोन दिवसांपासून पावसाची संततधार , मुसळधार पाऊस सुरू.. शिर्डी , अकोले , संगमनेर ,कोपरगाव , नेवासा, राहुरी तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी... तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची हजेरी... भंडारदरा , मुळा आणि निळवंडे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ... भंडारदरा 50% , मुळा 40 तर निळवंडेत 26 टक्के पाणीसाठा.. खरिप पेरणीला मिळणार मुहूर्त... गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके रखडली... अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...0
0
Report
मुंबई में भारी बारिश से अंधेरी सबवे पानी में, सुरक्षा कारणों से अस्थायी बंद
Mumbai, Maharashtra:मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पुन्हा एकदा पाण्याखाली गेला असून सुरक्षिततेच्या कारणास्तव तो वाहतुकीसह नागरिकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी सबवे बंद झाल्याने कार्यालयीन कर्मचारी, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच प्रवाशांची गैरसोय झाली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांना व विद्यार्थ्यांना गोखले पूल मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.0
0
Report
मुंबई समेत बोरीवली में बारिश, यातायात धीमा; रेलवे सेवाएं सामान्य
Mumbai, Maharashtra:मुंबईसह बोरीवली परिसरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्याने रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला असून वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागत आहे. रेल्वे सेवा सध्या सुरळीत सुरू असली तरी प्रवाशांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडणे टाळावे तसेच पाणी साचलेल्या भागातून जाताना काळजी घ्यावी.0
0
Report
Advertisement
