icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मालशेज घाट में भारी बरसात, धुंध और जलप्रपात लुभा रहे पर्यटकों को

Barav, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट परिसरात मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. सतत कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे घाटातील निसर्गाला जणू नवसंजीवनी मिळाली असून, येथील उंचच उंच धबधबे आता काहीसे खळखळून वाहू लागले आहेत. सध्या संपूर्ण माळशेज घाट परिसर पांढऱ्याशुभ्र आणि दाट धुक्याच्या चादरीत हरवून गेला आहे. धुक्याने वेढलेला हा संपूर्ण परिसर आणि त्यात कोसळणारे फेसाळणारे धबधबे पर्यटकांना भुरळ घालत असून, येथील विलोभनीय दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरत आहे. पावसामुळे घाटातील सौंदर्य आणखीनच खुलले असले, तरी प्रशासनाकडून वाहनचालकांना घाटातून प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
0
0
Report

कोल्हापुर में 85 इमारतें धोकादायक, 34 खतरनाक, नागरिकों ने हटाने की मांग

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरात तब्बल 85 इमारती धोकादायक स्थितीत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील 34 इमारती ह्या अतिशय धोकादायक असून कधीही कोसळू शकतात. त्यामुळे या इमारती तातडीने उतरून घ्याव्यात अशी मागणी या धोकादायक इमारती परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन पावसाळ्यापूर्वी या इमारतीच्या मालकांना नोटीसा देऊन इमारतीवर फक्त धोकादायक इमारत अशी नोटीस चिकटवतात.. पण इमारती उतरून घेण्यासाठी योग्य त्या उपयोजना करत नाही, त्यामुळे नागरिकांच्या मधून संताप व्यक्त केला जात आहे.
0
0
Report

मुंबई-गोवा हाइवे पर पानी भरा; यातायात बाधित, नागरिकों में नाराजगी बढ़ी

Chendhare, Maharashtra:मुंबई-गोवा महामार्गावरील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. पहिल्या पावसापासून निर्माण झालेली ही समस्या अद्याप कायम असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. साचलेल्या पाण्यातून दुचाकी, रिक्षा, कार आणि अवजड वाहने मार्ग काढत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने किरकोळ वादही होत आहेत. वारंवार ही परिस्थिती उद्भवत असतानाही महामार्ग प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पाण्याचा तातडीने निचरा करून सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
0
0
Report
Advertisement

करमाळा में पुलिस के सामने मुस्लिम समुदाय के दो गुटों के बीच हिंसक झड़प

Pandharpur, Maharashtra:करमाळा पोलीस स्टेशनच्या समोर दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी करमाळा शहरातील मुस्लिम समाजाच्या दोन गटात ही हाणामारी झालीय हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे करमाळा नगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेला जुना वाद हा हाणामारीला कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या काळात झालेल्या भांडणांचा राग मनात धरूनच आजही घटना घडली असल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. पोलीस स्टेशनच्या समोरच ही घटना घडली असली तरी, अद्याप यासंदर्भात करमाळा पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही नाझीया ईलाही खान हिने मोहम्मद पैगंबर व मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीने आज निवेदन देण्यात आले त्यावेळी येताना जाताना जुन्या भांडणाचा मनात राग धरून मुस्लिम समाजाच्या दोन गटात हाणामारी झालीय
0
0
Report

महाबळेश्वर में मानसून ने बढ़ाई पर्यटकों की भीड़

Satara, Maharashtra:सातारा - थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे.एका दिवसात 158 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.म Musaldhaar पडत असलेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर हिरवागार झाला आहे. डोंगर-दऱ्यांवर देखील दाट धुक्याची चादर पसरली असून वेण्णा तलाव, विविध पॉइंट्स आणि घाट परिसरात निसर्गाचे मनमोहक रूप पाहायला मिळत आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून पर्यटक मोठ्या संख्येने महाबळेश्वरकडे आकर्षित होत आहेत. हवामान विभागाने घाट भागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे काही भागांत दृश्यमानता कमी झाली असून घाट रस्त्यांवर वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पावसाच्या या दमदार बॅटिंगमुळे महाबळेश्वर पुन्हा एकदा निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
0
0
Report

खेतों में असमय बारिश न मिलने से बुवाई अभी ठप, किसान चिंतित

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिले में जून मास खत्म होने के बावजूद पर्याप्त बारिश नहीं होने से खेती की बुवाई अभी भी ठप है। बी बीजों की दुकानों पर जून के महीने में बड़ी भीड़ रहती है, पर इस वर्ष कुछ ही किसान दिखाई दे रहे हैं जो बीज खरीद रहे हैं ताकि बुवाई जारी रख सकें। जिले में लगभग 80 प्रतिशत बुवाई अब तक नहीं हो पाई है। जहां बुवाई हो चुकी है, वहाँ यह बारिश की कमी के कारण धूल-परेणी जैसी स्थिति है, जिससे किसानों के साथ कृषि सेवा केंद्र संचालक भी चिंतित हैं। जुलाई में अच्छी बारिश का अनुमान है; अगर बारिश अच्छी हो जाए तो किसानों को बुवाई करनी होगी।
0
0
Report
Advertisement

दरेगांव में बिजली करंट से दो बैल मौत, किसान परिवार को आर्थिक नुकसान

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:खुलताबाद तालुक्यातील दरेगाव येथे विजेचा तीव्र धक्का लागल्याने दोन बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. येथील बाबासाहेब गायकवाड आणि मयूर गायकवाड यांच्या शेतातील विद्युत खांबाजवळ हे बैल बांधलेले होते. अचानक खांबात उतरलेल्या वीजप्रवाहामुळे दोन्ही निष्पाप जनावरांचा मृत्यू झाला, ज्यामुळे गायकवाड कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.​दरम्यान, पावसाळ्यात जमीन ओली असल्याने खांब किंवा रोहित्रांजवळ (डीपी) करंट उतरण्याची भीती असते. त्यामुळे नागरिकांनी विजेच्या खांबाजवळ जनावरे बांधू नयेत आणि लहान मुलांना दूर ठेवावे, असे आवाहन करण्यात येतेय..
0
0
Report

अमरावती में 29-30 जून भारी बारिश से नुकसान, 3 मौत, 70 घर ढहे

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात २९ ते ३० जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान; पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू ७० घरांची पडझड, ४१ पशुधन दगावले, ५ गोठ्यांची पडझड याचा सर्वाधिक फटका चांदूर बाजार तालुक्याला बसला असून पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर तिवसा तालुक्यातील पिंगळाई नदीत बुडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांत एकूण तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असल्याचे या पुरामुळे ४१ पशुधन दगावले असून त्यात १ गाय, २० बकऱ्या आणि २० कोंबड्यांचा समावेश आहे. दरम्यान चांदूर बाजार तालुक्यात ७० घरांची पडझड होऊन नुकसान झाले असून त्यापैकी ६५ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तसेच पावसामुळे ५ गोठ्यांची पडझड झाली असून शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहे. अंतिम अहवालानंतर नुकसान भरपाईची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
0
0
Report

अलिबाग खंडाळा में गुटखा माफियाओं पर बड़ी रेड, पांच लाख का माल जप्त

Chendhare, Maharashtra:अलिबाग तालुक्यात खंडाळा येथे अन्न व औषध प्रशासनाने गुटख्याच्या बेकायदेशीर साठ्यावर मोठी धाड टाकत सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्यात गुटखा बंदी असतानाही ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवारी दुपारी एका घरावर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात गुटख्याच्या गोण्या आणि बॉक्स आढळून आले. संपूर्ण साठा जप्त करून प्रशासनाने तो ताब्यात घेतला. या कारवाईसाठी अलिबाग पोलिसांचेही सहकार्य घेण्यात आले. सायंकाळपर्यंत जप्त मुद्देमाल हलविण्याचे काम सुरू होते, पंचनाम्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या धाडीनंतर जिल्ह्यातील गुटखा साठेबाज आणि विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
0
0
Report
Advertisement
0
0
Report

खटाव के वडूज में नकली उर्वरक-कीटनाशक का बड़ा साठा जप्त

Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 30 लाख 60 हजार रुपयांचा संशयित बनावट खत व कीटकनाशकांचा साठा जप्त केला. कारवाईदरम्यान सुमारे 99 हजार 450 किलो संशयित बनावट दाणेदार खत, नामांकित कंपन्यांच्या बनावट गोण्या, लेबल्स, कीटकनाशके आणि पॅकिंगसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी दिलीप सीताराम काळे आणि प्रतिक दिलीप काळे यांच्याविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम, रासायनिक खते नियंत्रण आदेश, कीटकनाशक अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी यापूर्वीही अशाच प्रकारची कारवाई झाल्याची माहिती समोर आली असून, हा व्यवसाय पुन्हा कसा सुरू झाला, याचा तपास पोलीस आणि कृषी विभागाकडून सुरू आहे. तसेच बनावट खतांचा पुरवठा आणि विक्रीचे जाळे उघड करण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर में आधे घंटे की भारी बारिश से शहर जलमग्न, यातायात बुरी तरह प्रभावित

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरात अर्ध्या तासाच्या मुसळधार पावसाने अनेक रस्ते जलमय झाले. वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली. कस्तुरबा चौक, श्रीकृष्ण टॉकीज भागात नाले अवरुद्ध झाल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढणे कठीण झाले. तर महत्वाचा चौक असलेल्या कस्तुरबा चौकात सखल भागात पाणी साचल्याने पायी चालणारे नागरिक आणि वाहनधारकांची चांगलीच अडचण झाली. तुकुम भागात पाणी साचल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. ठिकठिकाणी जलकोंडी झाल्याने महापालिकेच्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
0
0
Report

2 लाख टन प्याज खरीदी शुरू, मूल्य स्थिरीकरण के लिए नाफेड एनसीसीएफ

Lasalgaon, Maharashtra:केंद्र सरकारच्या वतीने किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत यंदाही नाफेड एनसीसीएफ मार्फत दोन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवत खरेदी सुरू असून या खरेदी बाबत माहिती घेण्यासाठी व सूचना देण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी थेट लासलगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिव आणि नाफेड एनसीसीएफ चे जिल्ह्याचे मॅनेजर यांची बैठक घेतली यावेळी त्यांनी थेट बाजार समितीत शासकीय खरेदी बाबत माहिती शेतकऱ्यांना समजावी यासाठी मोठा फलक लावावा तसेच बाजार समितीचे कामकाज संपल्यानंतरही शासकीय खरेदी ही सुरू ठेवावी असे सांगत बाजार समित्यांमध्ये कमी बाजारभावाने कांद्याची खरेदी सुरू होती त्यात 50 टक्के दर वाढवण्यात आम्ही यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top