icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

डिंभे बोगदा मामला: शरद पवार के साथी छोड़ने का कारण क्या बना?

Ambegaon, Maharashtra:शरद पवारांची साथ सोडण्यामागील खरं कारण अन् महायुती सरकारला निर्वाणीचा इशारा; वळसे पाटलांच्या विधानाने चर्चांना उधाण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अनेक नेत्यांनी पक्षांतरामागे विकासाचे कारण पुढे केले होते. मात्र, शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडण्याचे खरे कारण उघड केले असून, त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. "डिंभे धरणातून निघणारा बोगदा रद्द करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता, केवळ आणि केवळ त्या एका शब्दासाठी मी साहेबांची साथ सोडली," असा थेट आणि खळबळजनक खुलासा वळसे पाटलांनी केला आहे. डिंाभे ते माणिकडोह या १६ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित बोगद्यावरून आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटलांनी आपल्या राजकीय भूमिकेचा उलगडा केला. विधानसभा निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि माझ्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत हा वादग्रस्त बोगदा कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही, असा शब्द देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. हा बोगदा रद्द व्हावा आणि शेतकऱ्यांचे पाणी वाचावे, म्हणूनच आपण शरद पवार यांच्यापासून दूर होऊन अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पुणे जिल्ह्याच्या रांजणगाव येथे एका कार्यकामात ते बोलत होते.
0
0
Report

खेड बस अड्डे पर भाजपा का प्रदर्शन; प्रशासन ने आश्वासन के बाद आंदोलन रोका

Ratnagiri, Maharashtra:खेड एसटी आगाराच्या मनमानी कारभाराविरोधात भाजपचे धडक आंदोलन; प्रशासनाची लेखी आश्वासनानंतर माघार. खेड आगारातील नियोजनशून्य कारभार, विद्यार्थ्यांचे होणारे हाल आणि कर्मचाऱ्यांच्या अरेरावीविरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने खेड बस स्थानकावर आक्रमक आंदोलन छेडण्यात आले. माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विद्यार्थी आणि नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाचा वाढता दबाव पाहून अखेर आगार व्यवस्थापकांनी नमती घेत फेऱ्या नियमित करणे, सर्व थांब्यांवर बसेस थांबवणे आणि वादग्रस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले; त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
0
0
Report
Advertisement

मालेगांव में नाबालिग के साथ अत्याचार-हत्या, डोंगराळे केस का निर्णय जल्दी संभव

Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) : ब्रेकिंग... - डोंगराळे येथील अल्पवयीन मुलगी अत्याचार व खून प्रकरण.... - मा.मालेगाव अपर जिल्हा व सत्र न्यायालयात सरकारी पक्षाचा अंतिम युक्तीवाद संपला... - सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड.उज्वल निकम यांनी मांडला अंतिम युक्तिवाद... - आरोपी पक्षातर्फे 16 सप्टेंबरला ' युक्तिवाद ' मांडण्यात येणार... - त्यानंतर मा.न्यायालय निकालाची तारीख जाहीर करेल.. - मा. अपर जिल्हा सत्र न्यायालयात डोंगराळे खटल्याची ' इन कॅमेरा ' करण्यात आली सुनावणी... - आतापर्यंत 24 साक्षीदारांची तपासणी पूर्ण... - डोंगराळे खटल्याचा लवकरच निकाल लागणार.. - डोंगराळे खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लागले लक्ष..
0
0
Report

इंदापुर में तेज बारिश से किसानों को बड़ी राहत मिली

Rui, Maharashtra:इंदापूर शहरासह तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात..पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा.. अंकोर - अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे इंदापूर शहर आणि परिसरात एक तासापेक्षा अधिक काळ पावसाने हजेरी लावली. सकाळपासून उकाडा जाणवत होता. मात्र, दुपारनंतर अचानक पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतर पावसाचा जोर कायम आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या शेतातील पिकांना पाण्याची मोठी गरज असताना हा पाऊस झाल्याने पिकांना चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे...
0
0
Report
Advertisement

डेरवण में 12वीं क्रॉस कंट्री: 700 से अधिक धावकों ने मचाई धूम

Ratnagiri, Maharashtra:डेरवण (चिपळूण).. रत्नागिरी डेरवणमध्ये १२वी क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहात; ७०० हून अधिक धावपटूंचा सहभाग.. एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकॅडमी व रत्नागिरी जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे आयोजित १२वी कमलाकरपंत वालावलकर स्मृती क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहात पार पडली.. राज्यातील ७०० हून अधिक खेळाडूंच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत प्रन्मय शेंबेकर, ईश्वरी मुळे, श्रावण साळुंखे, अबोली वास्के, वैभव गाडे, स्वरा उपशेटे, athर्व ताटे आणि रिया गोंडाळ यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंना ५५ हजार रुपयांची रोख पारितोषिके व पदके देऊन गौरवण्यात आले.
0
0
Report

Shweta Mahale's power display sparks response; Sanjay Gaikwad strikes back

Buldhana, Maharashtra:‘बाप तो बाप रहेगा’वर श्वेता महालेंचा ठेका... गायकवाडांचा पलटवार, ‘बापासारखं शरीर कुठून आणणार?’ ANCHOR बुलढाण्यात महायुतीच्या संसारात पुन्हा एकदा ठिणगी पडलीये... भाजप आमदार श्वेता महाले यांच्या पतीच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात झालेलं शक्तिप्रदर्शन आता चांगलंच चर्चेत आलंय... ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर श्वेता महालेंचा ठेका... धनुष्यबाणाचं चिन्ह दाखवत दिलेला राजकीय इशारा... t्यानंतर संजय गायकवाडांना दिलेलं थेट ओपन चॅलेंज... आणि आता गायकवाडांचा तुफान पलटवार... ‘माझ्याकडे हरामाचा पैसा नाही, मोठ्या रॅली काढायला... बाप तो बाप रहेगा, पण बापासारखं शरीर कुठून आणणार?’ या वक्तव्यामुळे बुलढाण्यातील राजकीय संघर्ष आणखी पेटलाय... --- VO-1 वाढदिवस... पण शक्तिप्रदर्शन मात्र एखाद्या निवडणूक प्रचाराच्या रॅलीसारखं... कार्यकर्त्यांची गर्दी... घोषणांचा गजर... आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी भाजप आमदार श्वेता महाले... ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर महालेंनी ठेका धरला... मात्र, गाण्यापेक्षा चर्चेत आलं ते त्यांचं धनुष्यबाणाचं चिन्ह दाखवणं... नेमकं हे चिन्ह कुणासाठी? राजकीय इशारा कुणाला? याची चर्चा सुरू असतानाच वीजपुरवठा खंडित झाला... आणि श्वेता महाले थेट आक्रमक झाल्या... --- VO-2 वीज गेल्यानंतर श्वेता महालेंनी नाव न घेता संजय गायकवाडांवर निशाणा साधला... ‘हिम्मत असेल तर समोरासमोर येऊन लढा... बुजदिलासारखं काम करू नका,’ असा थेट इशाराच त्यांनी दिला... इतकंच नाही... ‘बुलढाण्यात हुकूमशाही चालणार नाही... बुलढाणेकरांनी घाबरू नये, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,’ असं म्हणत महालेंनी गायकवाडांना थेट आव्हान दिलं... BYTE – श्वेता महाले --- VO-3 महालेंच्या या आव्हानानंतर आता संजय गायकवाडांनीही मैदानात उतरत पलटवार केलाय... शक्तिप्रदर्शनावरून गायकवाडांनी महालेंना लक्ष्य केलं... ‘माझ्याकडे हरामाचा पैसा नाही, मोठ्या रॅली काढायला...’ असा थेट हल्लाबोल त्यांनी केला... पण गायकवाड इथेच थांबले नाहीत... ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्याचा धागा पकडत त्यांनी श्वेता महालेंची खिल्ली उडवली... ‘बाप तो बाप रहेगा... पण बापासारखं शरीर कुठून आणणार?’ असा खोचक टोला गायकवाडांनी लगावला... BYTE – संजय गायकवाड --- VO-4 म्हणजे एकीकडे महालेंचं ओपन चॅलेंज... तर दुसरीकडे गायकवाडांचा बोचरा पलटवार... आणि या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या शक्तिप्रदर्शनाची... विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी संजय गायकवाड यांच्या पुत्राचाही चिखलीत शक्तिप्रदर्शन करत वाढदिवस साजरा झाला होता... आता महाले यांच्या कार्यक्रमातही तसंच शक्तिप्रदर्शन... त्यामुळे हे केवळ वाढदिवसाचे कार्यक्रम आहेत? की बुलढाण्यातील आगामी राजकीय ताकद आजमावण्याची रंगीत तालीम? हा सवालही आता उपस्थित होतोय... --- OUTRO एकाच महायुतीतले दोन आमदार... पण बुलढाण्यात मात्र आरोप-प्रत्यारोपांची धग... ‘हिम्मत असेल तर समोरासमोर या’, म्हणणाऱ्या श्वेता महाले... आणि त्याला... ‘माझ्याकडे हरामाचा पैसा नाही, मोठ्या रॅली काढायला... बापासारखं शरीर कुठून आणणार?’ असं म्हणत पलटवार करणारे संजय गायकवाड... वाढदिवसाच्या रॅलीपासून सुरू झालेला हा वाद आता थेट व्यक्तिगत टोमण्यांपर्यंत पोहोचलाय... महायुतीत दोन्ही नेते एकत्र... पण बुलढाण्यात राजकीय तलवारी मात्र म्यानातून बाहेर... तर सवाल आता हाच— महायुतीच्या मंचावर एकत्र असलेले हे नेते बुलढाण्यात एकमेकांविरोधातच मैदानात उतरलेत का? आणि बुलढाण्यात महायुतीच्या संसारात पडलेला हा मिठाचा खडा... पुढे मोठ्या राजकीय वादळाचं रूप घेणार का? मयुर निकम, झी 24 तास, बुलढाणा.
0
0
Report

केडीएमसी मुख्यालय के बाहर आशेळेकर समर्थकों का पानी के लिए आक्रोश

Kalyan, Maharashtra:आशेळेकरांचा पाण्यासाठी आक्रोश; रिकामे हांडे-बादल्या घेऊन केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा. केडीएमसी आतुक्त अभिनव गोयल च्या कार्यालय बाहेर ठिय्या आंदोलन.. केडीएमसी आशेळेगाव परिसरातील पाणी समस्येवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या वतीने पाणी समस्येमुळे केडीएमसी मुख्यालयत बाहेर हंडा,कळशी मोर्चा काढण्यात आला नागरिकांनी रिकामे हंडे कळशी घेऊन केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाच्या विरोधात आक्रोश करत रिकामे नळ आता नाही चालणार’, ‘पाणी नाही... जगणं कठीण’ हातात बँनर घेत जोरदार घोषणा देत नागरिकांनी संताप व्यक्त केला. आशेळेकरांना हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच जोपर्यत आयुक्त लेखी लिहून देत नाही तो पर्यत केडीएमसी आतुक्तच्या कार्यालया बाहेर बसून राहणार अशी भूमिका नगरसेविका कीर्ती ढोणे आणि नागरिकांनी घेतली आहे.
0
0
Report
Advertisement

नाशिक में गणेशोत्सव बैठक: डीजे बंदी पर अभी निर्णय नहीं

Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळे आणि पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, आमदार देवयानी फरांदे आणि सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या आयोजनादरम्यान येणाऱ्या विविध अडचणी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडल्या. या सर्व अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असं आश्वासन आमदार देवयानी फरांदे यांनी दिलं आहे. 'आपलं नाशик, आपला कुंभ, आपला गणेशोत्सव' या ब्रीदवाक्याने यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन आमदार देवयानी फरांदे यांनी गणेश मंडळांना केलं आहे. दरम्यान, डीजे बंदीबाबत या बैठकीत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. पुढील दोन ते तीन दिवसांत यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी दिली. तर डीजे बाबत न्यायालयाच्या नियमांचे पालन करूनच परवानगी दिली जाईल, अशी स्पष्ट भूमिका नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मांडली आहे. दरम्यान या बैठकीनंतर आमदार देवयानी फरांदे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी काय भूमिका मांडली ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे...
0
0
Report
Advertisement

भंडारा के विधायक पर कालाबाजार का आरोप, जेल से बाहर आना कठिन?

Bhandara, Maharashtra:भंडारा जिले में एक सत्ताधारी विधायक ने कालाबाजार करके संपत्ति जमा की है. अगर उसे सजा होती है तो जेल से लौटना मुश्किल हो सकता है. रोहित पवार ने राष्ट्रवादी विधायक राजू कारेमोरे पर तीखी टिप्पणी की है. भंडारा जिले के एक विधायक के बारे में कहा गया है कि वे धान माफिया हैं और उन्होंने धान का कालाबाजार कर हजारों एकड़ जमीन खरीदी है. मुख्यमंत्री फडणवीस ऐसे माफिया विधायक की समर्थन करते हैं ऐसी शिकायतें की जा रही हैं और अगर सजा होती है तो जेल से छूटना संभव नहीं होगा. राष्ट्रवादी विधायक राजू कारेमोरे पर इस बारे में कठोर टीका किया गया है.
0
0
Report

बुलढाणा के किसानों का आक्रोश: सूखा घोषित करने की मांग तहसील कार्यालय तक पहुंची

Buldhana, Maharashtra:जळगाव जामोद | बुलढाणा कोरडा दुष्काळ जाहीर करा! शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर आक्रोश पावसाने दडी मारल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि मका यांसारखी पिके पाण्याअभावी धोक्यात आली असून, अनेक गावांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जळगाव जामोद तहसील कार्यालयावर आक्रोश केला. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीक विम्याची नुकसानभरपाईं आणि कर्जाबाबत दिलासा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, 30 आणि 31 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला होता. अनेक ठिकाणी शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले, तर जनावरेही वाहून गेली. मात्र अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. शेतीपिके आणि वाहून गेलेल्या जनावरांची तातडीने नुकसानभरपाई द्यावी, तसेच नद्यांचे खोलीकरण करावे, या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात जोरदार आक्रोश केला.
0
0
Report

हिंदी में क्या होगा एक क्लिकबेट headline

Jalna, Maharashtra:जालना : जरांगे पाटलांना शिष्टमंडळाची हुलकावणी,जरांगे पाटलांकडून विखे,फडणवीस टार्गेट (पॅकेज) जालना : जरांगे पाटलांचे आमरण उपोषणाचा आज 11 वा दिवस होता.आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांच्याकडे चर्चेसाठी अंतरवालीत येणार असलयाची चर्चा होती.पण जरांगे यांच्याकडे शिष्टमंडळ चर्चेला जाणार नाही अशी भूमिका मराठा आरक्षण उमसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आणि जरांगे यांना पुन्हा शिष्टमंडळाने ह Hulकावणी दिली.त्यामुळे जरांगे यांनी विखे पाटीलंवर चांगलीच आगपाखड करत फडणवीस यांना टार्गेट केलं.बघूया हा स्पेशल रिपोर्ट राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीत शिष्टमंडळ जाणार नसल्याची भूमिका मांडल्यानंतर जरांगे पाटील यांच्या आक्रमक रूप पाहायला मिळालं.त्यांनी थेट विखे यांचा एकेरी उल्लेख करायला सुरु केला. तू अंतरवालीत ये अथवा येऊ नको,तुला कुणी बोलावलं नव्हतं असं म्हणत सरकारला समजून घ्यायला सरकार आमचा बाप है का असा सवाल जरांगे यांनी विखेना केला. तसेच आमच्या नियोजित मुंबई आंदोलनासाठी फडणवीस आणि विखे या दोघांनी मिळून हल्ल्याचा प्लान तयार केल्याचा आरोप जरंगे यांनी केलाय.मात्र असा हल्ला तुम्ही करूनच दाखवा असं आव्हान जरांगे यांनी विखेना दिलंय. शिष्टमंडळ अंतरवालीत नाही आलं तर नाही आलं पण वर्षभरात तू मराठा समाजाचं वाटोळं केलं असा आरोप जरांगे यांनी विखेवर केला. तसेच फडणवीस यांचं गुणगाण गाण्यासाठी तू अंतर वालीत आला पण वर्षभर तू मराठा समाजाचे वाटोळं केलंस असा टीकेचा भडिमार जरांगे यांनी विखेवर केला विखे लुचाड आणि धोखेबाज असल्याचं जरांगे यावेळी म्हणाले यावेळी जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधलाय.तुमच्या समोर ताटच राहणार नाही अशी टिका जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर केलीय.दोन महिन्यात तुम्ही हैदराबाद गॅझेटियर नुसार आरक्षण देणार होते त्याच काय झालं उत्तर द्या असा सवाल जरंगे यांनी फडणवीस यांना केलाय शिष्टमंडळाने चर्चेसाठी दिलेली हुलकावणी मनोज जरांगे यांच्या चांगलीच जिव्हारी लागलीय. त्यामुळे जरांगे यांना संताप अनावर झालाय.राधाकृष्ण विखे आणि देवेंद्र फडणवीस जरांगे यांच्या टार्गेटवर आलेत.अंतरवालीतील चर्चा फिस्कटल्यानंतर आता जरांगे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलंय
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top