icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मराठा आंदोलन: 12 सितंबर की राज्य स्तरीय बैठक से मांगों पर ठोस संकेत

Jalna, Maharashtra:जालना : मुंबई आंदोलनाची तारीख ठरवण्यासाठी 12 सप्टेंबर रोजी अंतरवालीत होणार मराठा समाजाची राज्य स्तरीय बैठक, गावातील मराठ्यांनी उपस्थित राहण्याचं जरांगे यांचं आवाहन, मुख्यमंत्री फडणवीसांनाही जरांगेंचा ईशारा (पॅकेज) मुकाम: मुंबई आंदोलनाची तारीख ठरवण्यासाठी 12 सप्टेंबर रोजी अंतरवालीत मराठा समाजाची राज्य स्तरीय बैठक पार पडणार आहे. राज्यातील गावा-गावातील मराठ्यांनी उपोषणाला नाही आलात तरी चालेल पण या बैठकीला उपस्थित राहण्याचं आवाहन जरांगे यांनी केलंय. दरम्यान मुंबई आंदोलना दरम्यान एकाही मराठ्याचं डोकं फोडल्यास 10 मिनिटात महाराष्ट्र बंद करण्याचं आवाहन करत जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांनाही ईशारा दिलाय. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट. येत्या 12 सप्टेंबर रोजी अंतरवालीत राज्यातील मराठा समाजाची राज्य स्तरीय बैठक पार पडणार आहे. सध्या सुरू असलेल्या उपोषणाला हजेरी लावण्यासाठी मराठ्यांनी नाही आलं तरी चालेल पण 12 सप्टेंबर रोजीची बैठक चुकवू नका असं सांगत मराठ्यांनी आपल्या मुला-बाळाचं भविष्य ठरवण्यासाठी या बैठकीला आवर्जून उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 3 वर्षांपूर्वी मराठा आंदोलन सुरु झालं.इतक्या वर्षात सरकारला मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करता आल्या नाहीत.त्या मागण्या सरकार 5 दिवसांत काय पूर्ण करेल असा सवाल जरांगे यांनी राज्य सरकारला करत मुंबईत आझाद मैदानावर नाही तर थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासाजवळच आंदोलन करणार असल्याचा ईशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय. मुम्बईत मराठे शांततेत आंदोलन करतील. पण एकाही मराठ्याच्या डोक्याचं रक्त सांडल्यास मराठयांनी 10 मिनिटात महाराष्ट्र बंद करावा असं सांगत राज्य अस्थिर करण्याचा फडणवीस यांचा डाव आहे याची सुरुवात फडणवीस यांच्या कडून होईल. मात्र दंगली होणार नसतील तर आंदोलन कुठेही जाऊ शकते असा ईशारा देखील राज्य सरकारला दिलाय. दरम्यान आज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या 10 व्या दिवशी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नांदेड मधील आमदार प्रतापपाटील चिखलीकर यांनीही भेट दिली. यावेळी दानवेंनी राज्य सरकारने जरांगे यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास गावोगावी आंदोलन होतील असं सांगलंय. तर चिखलीकर यांनीही जरांगे यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देत जरांगे यांची तब्बेत खलावल्याच सांगत राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केलीय. मराठा समाजाच्या मागण्यांवर 12 सप्टेंबर पर्यत तोडगा काढला नाही तर जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत जाणाऱ्या मराठा आंदोलनाची टांगती तलवार सरकारच्या डोक्यावर असणार हे नक्की. त्यामुळे सरकार या उपोषणावर तोडगा काढणार की सरकार समोर आंदोलनाचा तिढा वाढणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल हे नक्की
0
0
Report

चंद्रपुर में दहीहंडी पर कांग्रेस-भाजपा के बीच सियासी टकराव तेज, धानोरकर-वादेट्टीवार की हरकतें सामने

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या अंतर्गत राजकीय दहीहंडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्रह्मपुरी मतदार संघाच्या ब्रह्मपुरी दहीहंडी कार्यक्रमात काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या, तर सावली शहरात विजय वडेट्टीवार यांनी दहीहंडी आयोजित केली. काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांच्या वेगवेगळ्या कृतीने पक्षातील आगामी काळातील संघर्षाची नांदी झाल्याचे बोलले जात आहे. प्रतिभा धानोरकर यांनी ब्रह्मपुरी मतदार संघातून मला निमंत्रण येत होतं आणि त्यामुळे मी दहीहंडीच्या सार्वजनिक कार्यक्रमाला होकार दिल्याचं स्पष्ट केलंय. सावली उपविभागात विजय वडेट्टीवार यांनी दहीहंडी आयोजित केली. भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंचावर वडेट्टीवार यांच्या विरोधकांनी टीका केली.
0
0
Report
Advertisement

मराठा आरक्षण पर जल्द निर्णय की मांग: सातारा में मराठा क्रांती मोर्चा का बंद

Satara, Maharashtra:मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सातारा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदच्या आवाहनाला साताऱ्यात संमिश्र प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो आहे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रशांत नलावडे यांनी साताऱ्यातून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट केले आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा दहावा दिवस असूनही प्रशासनाने अद्याप दखल न घेतल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मराठ्यांचा हा उग्र रूप सरकारला काही दिवसांत दिसेल असा इशारा देत, आता गाजर दाखवणे बंद करून मराठा आरक्षणावर लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
0
0
Report

रायगढ़ में वीर शिंग्रोबा धनगर के नाम पर कनेक्टिंग लिंक रखने की मांग

Khopoli, Maharashtra:कनेक्टिंग लिंकला शिंग्रोबा धनगरांचे नाव द्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील नव्या कनेक्टिंग लिंकला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी रायगड जिल्हा धनगर समाजाने केली आहे. यासंदर्भात खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयातील लढाई पूर्ण ताकदीने लढावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यासोबतच आमदापूरच्या बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये धनगर समाजाला प्रतिनिधित्व, चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासह चार मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आक्रोश मोर्चाला रायगड धनगर समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे.
0
0
Report
Advertisement

किसानों ने नाल्यावर पुल बनाने की मांग पर नाल्यात अनोखा आमरण उपोषण शुरू किया

Amravati, Maharashtra:नाल्यावर पूल बांधण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी चक्क नाल्यात सुरू केले उपोषण; अनोख्या उपोषणाची जिह्यात जोरदार चर्चा अँकर :- अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड परिसरातील शेतकऱ्यांनी खारवगळ नाल्यावर पक्का पूल बांधण्याच्या मागणीसाठी चक्क नाल्यात अनोखे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनोख्या उपोषणाची जिल्ह्यात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी नाल्यातच ट्रॅक्टर-ट्रॉली उभी करून पाण्यात बसून आंदोलनाला सुरुवात केली आहे. पावसाळ्यात नाल्याला पूर आल्याने शेतात जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे. आश्वासन नको पुलाचे प्रत्यक्ष काम सुरू करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या आंदोलनाची दखल घेऊन काय भूमिका घेतात याकडे परिसराचे लक्ष लागले आहे. बाईट :- अनिल वानखडे, आंदोलक शेतकरी बाईट :- संजय गिरुळकर, आंदोलक शेतकरी बाईट :- जनार्दन शेंडे, आंदोलक शेतकरी
0
0
Report

सांगोल्या में सूखे के कारण किसान ने दो एकड़ खरबूजे की फसल उखाड़ दी

Pandharpur, Maharashtra:सांगोल्यात दुष्काळाची दाहकता... पाण्याअभावी शेतकऱ्याने दोन एकर खरबुजाचे उभे पीक उपसून टाकले! गेल्या ५० दिवसांहून अधिक काळ पावसाने पाठ फिरवल्याने सांगोल्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली आहे. बंडगरवाडी येथील नवनाथ बंडगर यांनी दोन एकर खरबुजाची लागवड केली होती. टँकरच्या पाण्यावर पीक जगवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा खर्च परवडत नसल्याने अखेर फळाला आलेले उभे पीक उपसून टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली. तालुक्यात अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती असून सध्या आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. शेतकऱ्यांची नजर आता आभाळाकडे लागली आहे...
0
0
Report

कोल्हापुर के बहिरेश्वर में पुलिस ने डॉल्बी पर कार्रवाई; 8 डॉल्बी सिस्टम और 8 ट्रैक्टर जब्त

Kolhapur, Maharashtra:आता एक महत्त्वाची बातमी कोल्हापुरातून. डॉल्बीचा दणदणाट करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेश्वर गावात पोलिसांनी कारवाई करत तब्बल आठ डॉल्बी सिस्टीम आणि आठ ट्रॅक्टर जप्त केलेत. बहिरेश्वर गावात श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित केलेल्या यात्रेत या डॉल्बीचा वापर करण्यात आला होता. कोल्हापुर शहरातील करवीर पोलिसांनी डॉल्बी विरोधात जोरदार कारवाई केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील डॉल्बी चालक, सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांचे धाबे दनाणलेत. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
0
0
Report
Advertisement

नांदेड में सूखा घोषित करने की मांग, किसान फसल बचाने को चिंतित

Nanded-Waghala, Maharashtra:तब्बल महिनाभरापासून पाऊस गायब झाल्याने शेतातील उभी पिके कोमेजली आहेत. त्यात ऊन वाढत असल्याने पिके करपून जात आहेत. यावर्षी पर्जन्यमान कमी असल्याने शेतातील विहिरींनाही पाणी नाही आणि बोरही कोरडे पडत चालले आहेत. त्यामुळे पीक जगवावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा टाकलाय. अजूनही पावसाची कुठलीही शक्यता दिसत नसल्याने नांदेड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कोरडा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
0
0
Report
Advertisement

अकोला की कावड़ यात्रा ने सर्वधर्म एकता और उत्साह का जलवा दिखाया

Akola, Maharashtra:आज सारं अकोला शहर हर-हर महादेव, बम-बम भोले के गजरों से दुमदुमून गया था. यह स्वागत स्वातंत्रपूर्व काल की काल्पनिक पार्श्वभूमी वाली विदर्भ की अकोला की प्रसिद्ध कावड यात्रा के लिए था, जो 82 वर्ष की परंपरा रखती है और श्रावण महीने के अंतिम सोमवार को निकलती है. अकोलेकरांचा ग्रामदैवत श्री राज राजेश्वराला 17 कि.मी. दूरी के गांधीग्राम से पुर्णा नदी के जलाभिषेक के साथ अभिषेक किया जाता है और अकोला में बारिश की मान्यता होती है. यह महोत्सव सभी धर्मों के people के बीच समभाव की धारा है. आज संपूर्ण अकोला शहर एक नई खुशी और उत्साह में नहाए थे. अकोल्याची कावड यात्रा भारत की एकल प्रकार की सबसे बड़ी यात्रा मानी जाती है, जिसकी शुरुआत स्वतंत्रता आंदोलन के दौरान एक जल अभिषेक की परंपरा से मानी जाती है. 1944 के दशक में अकोला शहर को भीषण पानी की तंगी का सामना करना पड़ा था, तब कुछ युवाओं ने ग्रामदैवत राजेश्वर के जलाभिषेक का संकल्प किया और गांधीग्राम से पुर्णा नदी का जल लाकर अभिषेक किया गया, और तब से यह परंपरा चली आ रही है. राजेश्वर महाराज के मंदिर को जागृत देवस्थान माना जाता है. यात्रात प्रमुख आकर्षण रहती है हरिहर पेठ की 1111 भरण्याची कावड, जो 250 फूट लम्बी और 14 फूट चौड़ी होती है, इसमें लगभग एक हजार से अधिक युवक शामिल होते हैं. इस वर्ष यात्रा में लगभग 200 कावड़ और 150 पालखी शामिल हैं. यह यात्रा देश के भीतर और बाहर सभी को एक साथ लाने का प्रयास करती है ताकि शांतता और किसान सुख बरकरार रहे. कावड यात्रा के बाद अब अकोला के लोगों को गणेश उत्सव की तैयारी का आभास होता है. जयेश जगड, अकोला
0
0
Report

सांगली में धनगर समाज के लिए आरक्षण समेत प्रमुख मागों पर धरणे आंदोलन

Sangli, Maharashtra:धनगर समाजाच्या विविध बांधण्यासाठी सांगलीमध्ये आक्रोश आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त धनगर समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. पारंपारिक ढोल ताशाच्या गजरात सरकारला जाग आणण्यासाठी आक्रोश आंदोलन केले.. यावेळी परिसर दणाणून सोडला.धनगर समाजाला आरक्षण द्या, बाळूमामा ट्रस्टच्या व्यवस्थापनामध्ये मेंढपाळ बांधवांना योग्य प्रतिनिधित्व देऊन, मेंढपाळ बांधवांमधूनच अध्यक्षाची नियुक्ती करण्यात यावी, ‘मिसिंग लिंक’ला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, या सहित विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
0
0
Report

तहसीलदार के निजी इंस्टाग्राम रील ने नियमों की उड़ाई धज्जियाँ, जांच तय

Washim, Maharashtra:अँकर: वाशिम च्या रिसोड तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी आपल्या शासकीय पदाचा आणि कार्यालयाचा वापर वैयक्तिक प्रसिद्धीसाठी करण्यास मनाई असताना देखील त्यांनी चक्क तहसील कार्यालयातच 'प्रोफेशनल सिनेमॅटिक रील' शूट करून शासनाच्या आदेशाला हरताळ फासली आहे.'लाईट, कॅमेरा आणि ॲक्शन'च्या थाटात तयार केलेल्या ही रील व्हायरल होत असून प्रशासकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.नियम मोडणाऱ्या या जबाबदार अधिकाऱ्यावर तात्काळ शिस्तभंगाची कडक कारवाई होणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरामबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 28 जुलै 2025 रोजी स्पष्ट परिपत्रक जारी केलं आहे. या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यासाठी बंधनकारक आहे. मात्र रिसोड तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी सर्व नियमांना पायदळी तुडविल्याचे त्यांच्या इंस्टाग्राम वरील रिल वरून दिसून येत आहे.शासनाच्या परिपत्रकातील नियम 10 नुसार, वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवर फोटो,रील किंवा व्हिडिओ अपलोड करताना शासकीय पदनाम,लोगो, गणवेश तसेच शासकीय इमारत व वाहनांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे.मात्र रिसोड तहसिलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी आपल्या रीलमध्ये, वैयक्तिक प्रसिद्धीच्या मोहापोटी तहसील कार्यालयातच व्यावसायिक कॅमेरामन लावून हे चित्रीकरण केल्याचे स्पष्ट दिसत आहे.​यावर आता वरिष्ठ अधिकारी आणि शासन या 'रीलस्टार' तहसीलदारावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना विचारले असता त्यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले. इंस्टाग्राम पोस्टची लिंक. https://www.instagram.com/reel/Dc0wSMAvBsd/?igsi=MjlpdDdxa2Y4NnZm
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top