icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नागपुर पहुँची मंडल जनजागृती यात्रा, ओबीसी कॉलम के लिए जनगणना में मांग तेज

Nagpur, Maharashtra:नागपुर ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करण्याच्या मागणीसाठी मंडल जनजागृती यात्रा भंडारा येथून नागपुरला दाखल झाली. जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्यास समाजाचे मोठे नुकसान होईल, असा दावा आयोजकांनी केला आहे. ही यात्रा ओबीसी समाजात जनजागृती करण्यासाठी काढण्यात आली असून, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि ओबीसी संघटनांचे पदाधिकारी यात सहभागी झाले आहेत. सरकारने जनगणनेत ओबीसी कॉलमचा समावेश करावा, अन्यथा यानंतर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. नागपुरात या मंडल यात्रेचे स्वागत करण्यात आले नागपूरहून यात्रा आज रात्री वर्धा येथे मुक्कामी असेल
0
0
Report

1.05 लाख रुपये के MD के साथ आरोपी कव्वा गिरफ्तार—पुलिस ने दावा

Mumbai, Maharashtra:मा. पोलीस उपायुक्त उत्तर परिमंडळ 3 श्री गजानन राजमाने, सहा. पोलीस आयुक्त दहिसर दहिसर विभाग मुंबई. श्री जयराज रणवरे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब बनकर, पो. नी. चव्हाण कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली ATC officer API युवराज इनामदार, ATC पथक HC 041013/सणस, PC 112958/ वेदांते ,pc 140816/कोकणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे मुंबई यांनी 1.05 लाख रुपये किंमतीचा एम डी हा अंमली पकडून कारवाई केली असून नमूद गुन्ह्यातील आरोपी -हिरेन पांगजीभाई कावा उर्फ कव्वा 33 वर्षे रा.ठी. रूम न. 404 गुफा दर्शन बिल्डिंग, दत्तपाडा रोड, रोड नंबर 01, राजेंद्र नगर ,बोरिवली पूर्व मुंबई हा अभिलेखावरील सोनसाखळी चोर असून त्याचेविरोधात चोरी मारामारी असे गुन्हे आहेत. फोनवर ऑर्डर घेउन तो प्रत्येक वेळी माणूस बदलून तो एम डी देत असे त्यामळे तो प्रत्येक वेळी पळून जाण्यात यशस्वी होत असे.मात्र 28/07/2026 वेळ - 18.00 वा तो मेघमहल बांधकाम साईडच्या बाहेरील फुटपाथ, दत्तपाडा रोड, रोड नंबर 01, राजेंद्र नगर , बोरीवली पूर्व मुंबई. या ठिकाणी तो स्वतः येऊन माल देऊन पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे मुंबई गु.र. क्रमांक - 539 /2026 कलम- 8(क) सह 22 एन.डी.पी.एस. 1985 अन्वये गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आली आहे. तपासी अधिकारी सपोनि युवराज इनामदार व ए.टी.सी.पथक, पुढील तपास करत आहेत.
0
0
Report
Advertisement

जिला परिषद बैठक: आमदार अंबादास दानवे ने शिक्षा-स्वास्थ्य-निर्माण पर बड़ा फोकस

Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर| आमदार अंबादास दानवे यांनी जिल्हा परिषदेत घेतली आढावा बैठक, बैठकी नंतरची प्रतिक्रिया... जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करायला मी आलो होतो जलजीवन मिशन आणि पिण्याचा पाण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, शिक्षणाचा एक मुद्दा महत्त्वाचा आहे आरोग्याचा मुद्दा एक महत्त्वाचा आहे, त्यामुळे याचा एक आढावा घ्यावा आणि सध्या स्थिती काय आहे हे जाणून घ्यावे यासाठी ही बैठक होती. नवीन इमारत खर्च जिल्हा परिषद इमारत झाले म्हणजे फर्निचर व्हायलाच हवे, रिकाम्या जागेवर सतराच्या टाकून तर नाही बसू शकत ना, इमारतीवर जर एवढा खर्च होत असेल तर त्या इमारतीला साजेस फर्निचर देखील करायला हवे, त्यामुळे याला सपोर्ट आणि विरोध करण्याचं कुणाचं काही कारण नाही शाळांची दुरावस्था मात्र इमारतीवर खर्च शाळा दुरुस्त करणे महत्त्वाचे आहेत, मात्र जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सदस्य रस्त्यावर बसू शकत नाही, तेच नीट बसले नाही तर इतर गोष्टी नीट कशा होतील शाळेच्या दुरुस्तीसाठी DPDC असेल CSR असेल इकडूनही मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकतो जिल्ला परिषदेच्या इमारतीला CSR नाही मिळणार, शाळेला मिळू शकतो त्यामुळे विरोधाला विरोध करण्यात कुठलाही अर्थ नाही, त्यामुळे इमारत जर झाली तर फर्निचर तर चांगलं केलं पाहिजे ढोलेरा प्रकल्प ट्विट प्रकल्प चांगल्या पद्धतीने आणि वेळेत पूर्ण व्हावा अशी अपेक्षा आहे त्यामुळे ज्यांच्याकडे जबाबदाऱ्या आहेत ते जर बेजबाबदारपणे वागत असतील त्यामुळे त्या संदर्भात आवाज उठवण्याचा काम माझ आहे, ते मी काम करतोय ट्रॅव्हल्स महिला गैरवर्तन या ज्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसेस आहेत, यातील जो स्टाफ आहे त्यांचं काय व्हेरिफिकेशन केलेलं आहे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे की शिकलेले आहेत, यांना कुठली ट्रेनिंग आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे एक संभाजीनगरची भगिनी गोव्याला गेले असताना तिला रात्री साडेचार वाजता राजधानी ट्रॅव्हल्स ने येताना त्रास दिला गेला, त्या महिलेने सकाळी मला हे कळवलं त्यानंतर मी पोलीस ठाण्याशी बोललो आरटीओच्या संबंधित अधिकाऱ्यांना कॉल केला परंतु माझी यातली भूमिका अशी आहे की खाजगी बसचे जे चालक असतील कंडक्टर असतील किंवा क्लीनर असतील यांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट तपासले पाहिजेत सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता अतुल चव्हाण राजीनामा अतुल चव्हाण हे चीफ इंजिनियर राहिलेले व्यक्ती आहेत, घाटीच्या प्रकरणावरून बोलले म्हणून राजीनामा देणारे ते नाहीत राजीनामाची त्यांची वेगळी प्रशासकीय कारण असू शकतात वैयक्तिक कारणे असू शकतात त्यामुळे एवढे मी दाव्यासह सांगू शकतो की गाठीच्या प्रकरणामुळे त्यांनी राजीनामा दिलेला नाही जिल्ला परिषद निधी आमदारांना देणार जिल्ला परिषदेचा निधी हा कुणाच्या मालकीचा नाही, पालकमंत्र्यांच्या तर मुळीच नाही DPC चा सहअध्यक्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो, त्यामुळे जेवढा पालकमंत्र्यांना अधिकार आहे तेवढाच जिल्हा परिषद अध्यक्षांना अधिकार आहे मी स्वतः आमदार असून माझं मत असं आहे, जो निधी जिल्हा परिषदेचा आहे तो जिल्हा परिषदेला सरळ वितरित करायला हवा सध्या तर ऑगस्ट महिना सुरू आहे आतापर्यंत हे काम व्हायला हवे होते, जिल्हा परिषदेत एवढ्या दिवस बॉडी नव्हती, त्यामुळे आता निवडून आलेले आपले लोकं आहेत, त्यामुळे त्यांना सक्षम मना जिल्हा परिषदेचा निधी जो आहे त्याचं नियोजन त्यांना करू द्या असं माझं मत आहे आमदाराला आमदार निधी पण, डी पी डी सी चा निधी पण हे कशासाठी, बाकीचे निधी पालकमंत्र्यांनी आमदारांना द्यावेत मात्र जिल्हा परिषदेचा निधी देणं मला तरी वाटतं चुकीचा आहे उद्धव सेनेला अद्याप कार्यालय नाही कार्यालय तर मिळायलाच हवेद, दुसऱ्या पक्षांना मिळतात मात्र आम्हाला नाही त्यामुळे हा प्रश्न तर असणारच शिंदे गटाला कसं काय कार्यालय मिळाले, कार्यालय देण्याचा जर नियम नसेल तर शिंदे गटाला कसे काय मिळाले? नाही मिळाली तर रस्त्यावर मंडप टाकून बसू अध्यक्षाच्या कामावर खुश आहात का? मला असं वाटतं पाच वर्षाचा कालावधीच्या व्यक्तीचा आहे त्याचा तीन महिन्यात परीक्षा घेणे चुकीचे असं मला वाटतं
0
0
Report

बारिश में गड्ढे: कोल्हापूर-आसगाव-गगनबावडा हाईवे पर नागरिकों ने सड़क पर आंदोलन किया

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर-आसगाव-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात प्रवासी, भागातील ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांचा संयम सुटला आहे. भर पावसात, रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. तात्पुरती मलमपट्टी नको, तर कायमस्वरूपी दर्जेदार रस्ता करून द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. गगनबावडा तालुक्यातील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून खड्डेमय राष्ट्रीय महामार्गाचा त्रास सहन करावा लागत आहे. कोल्हापूर-आसगाव-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात हे खड्डे पाण्याखाली जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर भर पावसात ग्रामस्थ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निष्काळजी कारभाराचा निषेध करण्यात आला. तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी संपूर्ण रस्त्याची कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली.
0
0
Report

नाशिक में रोड मरम्मत: खड्डे फिर से उखड़े, नागरिक नाराज

Nashik, Maharashtra:काल रस्त्यावरचे खड्डे बुजवले.... आज पुन्हा रस्ते उखडले.... अँकर नाशिक शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासन जागं झालं असून प्रशासनाच्या वतीने नाशिक मखमलाबाद रोड परिसरात रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतलं होतं.... काल या रस्त्याची संपूर्ण रस्त्याची दुरुस्तीच काम प्रशासनाच्या वतीने करण्यात येत होतं... हा संपूर्ण रस्ता खड्डे मुक्त करण्यासाठी सगळे प्रशासकीय अधिकारी त्याचबरोबर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन या रस्त्याची पाहणी करून गेले होते त्यानंतर संबंधित ठेकेदाराने या रस्ता दुरुस्त केला... मात्र 24 तास उलटून गेले नाहीत हा रस्ता पुन्हा खड्डेमुळे झालाय....यामुळे या कामाचा निष्कृष्ट दर्जा समोर आला असून नागरिकांनी देखील याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे....खडी मुरूम टाकून रस्त्यातील खड्डे बुजवले आहेत हे पावसामुळे पुन्हा उकडून गेलेत आणि यामुळे पुन्हा रस्ता जायचे ते झाल्याचे तक्रार नागरिकांनी केली... यासंदर्भात मखमलाबाद रोड परिसरातून आढावा घेत नागरिकांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी
0
0
Report
Advertisement

नागपुर में युवक कांग्रेस का E20 विरोध प्रदर्शन, पुलिस ने बेरिकेड लगाकर रोका

Nagpur, Maharashtra:नागपुर में युवक काँग्रेस का E20 विरोध प्रदर्शन जोरदार रहा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी के विरोध में घोषणाबाजी करते काँग्रेस के कार्यकर्ता सड़कों पर उतरे. काँग्रेस शहर कार्यालय देवडिया भवन से गडकरी वाडा महाल तक मोर्चा निकाला गया था. लेकिन पुलिस ने बेरिकेट लगाकर चिटणीस पार्क पास युवक काँग्रेस कार्यकर्ताओं को रोक लिया. गडकरी के घर से लगभग 700-800 मीटर दूर होने के बाद भी पुलिस ने रोकथाम की. रोकने के बाद कई कार्यकर्ता बेरिकेट पर चढ़कर गडकरी के विरोध में और E20 के विरोध में घोषणाबाजी करते रहे. इसके बाद पुलिस ने कार्यकर्ताओं को हिरासत में लिया.
0
0
Report

MBBS प्रथम वर्ष तनमय वंगे रैगिंग से परेशान, 18 दिन से गायब, खराड़ी पुलिस केस

Kolhapur, Maharashtra:आता एक धक्कादायक बातमी कोल्हापुरात. पुण्यातील B J मेडिकल कॉलेज मध्ये MBBS प्रथम वर्गात शिकणारा तन्मय वंगे कॉलेजमध्ये झालेल्या रॅगिंगला कंटाळून गेल्या 18 दिवसापासून बेपत्ता झाला आहे. आई वडील शिक्षक असणारे त्याचे सर्व कुटुंबीय आणि मित्र परिवार भूक तहान हरपून तन्मयचा शोध घेत आहेत. या संदर्भात पुण्याजील खराडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस देखील त्याचा शोध घेत आहेत, तरी देखील रॅगिंगला कंटाळलेल्या तन्मयचा थांग पत्ता लागताना दिसत नाहीये. त्यामुळे तन्मयच अख्ख कुटुंब हताश झालं आहे. तन्मयच्या आई विजयालक्ष्मी वंगे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. MBBS प्रथम वर्गात शिकणारा तन्मय वंगे गेल्या 18 दिवसापासून बेपत्ता झाला आहे. पुण्यातील B J मेडिकल कॉलेज तन्मयला सतत रॅगिंग केले जायचे. पुण्याच्या खराडी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल आहे. कॉलेजमधील काही तरुणांनी सातत्याने त्याचे रॅगिंग केलं.. मानसिक छळ केला - कुटुंबियांचा आरोप. तन्मयला NEET च्या पहिल्या प्रयत्नात 568 मार्क दुसऱ्या वर्षीच्या प्रयत्नात NEET मध्ये 558 मार्क सप्टेंबर 2025 मध्ये तन्मयने MBBS च्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला. 18 जुलै 2026 रोजी दुपारी 11 वाजून 50 मिनिटांनी तन्मय हॉस्टेल मधून निघून गेला.
0
0
Report
Advertisement

कॉक्रोज जनता पार्टी की बैठक: ED–CBI विवाद और शिक्षा डिग्री का मुद्दा सामने

Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर - अभिजित दिपके byte... 5 तारखेला बैठक होणार असून मी निवासस्थानीच ही पार पडेल. आम्ही प्रवक्ते असू आणि कोर कमिटीचे सर्व सदस्य असतील. कॉक्रोज जनता पार्टीची पुढील वाटचाल कशी असेल याबाबत चर्चा होईल. वडिलांसंदर्भात तक्रार: माझ्या शिक्षणाबद्दल ती तक्रार आहे; दुसऱ्या देशात माझे शिक्षण झाले तो खर्च मी कसा उचलला यावर माझे म्हणणे आहे की माझं स्कॉलरशिप लॅटर आणि शैक्षणिक लोन यासंदर्भातील कागदपत्रे मी दाखवायला तयार आहे. पंतप्रधानांनीदेखील त्यांची डिग्री दाखवावी, ती सार्वजनिक करावी; त्यांनी कागदपत्रे सार्वजनिक केली तर मीदेखील माजी सर्व कागदपत्रे सार्वजनिक करीन. जो कोणी सरकारच्या विरोधात बोलतो त्याविरोधात ED, CBI लावून दबाव आणतात; त्यामुळे ED,CBI जर पाठवत असेल तर त्यासोबत आपली डिग्रीही पाठवा. झारखंड विद्यार्थ्यांशी मी काल चर्चा केली आहे; कॉक्रोज जनता पार्टी पूर्णपणे तुमच्या सोबत आहे. मागण्या मान्य होईपर्यंत त्यांनी मागे हटू नये; जी कुठली मदत लागेल ती कॉक्रोज जनता पार्टी करण्यास तयार आहे. कोर कमिटीची बैठक बोलावली आहे; कुठले मुद्दे घेऊन कॉक्रोज जनता पार्टी पुढे जाऊ शकते याबाबत ही चर्चा असेल. ज्या पक्षांशी संबंध आहेत, ते ठामपणे सांगत आहेत की राजकारणात जाणार आहोत. आमचा अजून तसा काही उद्देश नाही; आम्हाला सध्या पब्लिक मोमेंट ठेवायची आहे. देशात राजकीय पक्षांची जी काही स्थिती आहे, काय करणार पक्ष बनवून? मतदान डिलीट होत आहेत; लोक सकाळी एकाला मतदान करतात संध्याकाळी दुसर्‍याच निवडून येतो, लोक आमदार-खासदार कुणाला निवडतात आणि ते दुसर्‍या पक्षात असतात. ED आणि CBΙ पाठवून पक्ष तोडण्यात येतात, अशा परिस्थितीत राजकीय पक्ष बनवून काय करता.
0
0
Report

नाशिक में राष्ट्रवादी कांग्रेस के बैनरों पर चर्चा तेज

Nashik, Maharashtra:नाशिक अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात लावलेल्या बॅनर्सची चर्चा भुजबळांना पालकमंत्री करा नाशिककरांच्या मनातील भावना नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांना आवाहन मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने शहरात बॅनर लावल्याने चर्चा शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी लावले शहरभर बॅनर नाशिकचे पालकमंत्री पद भूमिपुत्रालाच द्यावा राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची मागणी या संदर्भात आढावा घेत राष्ट्रवादी व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंबादास खैरे यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड
0
0
Report
Advertisement

मुंबई में PAP फ्लैट घोटाले में 47 लोगों पर 5.57 करोड़ की ठगी, FIR दर्ज

Mumbai, Maharashtra:ब्रेक Hotline FIR मुंबईत SRA PAP फ्लॅटच्या नावाखाली 5.57 कोटींच्या कथित फसवणुकीचा गुन्हा दाखल आकाश राधेश्याम सोनी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी FIR नोंदवून तपास सुरू केला. 2017 पासून अंधेरी, सांताक्रूज, वांद्रे, कांदिवली, माटुंगा परिसरात PAP फ्लॅट देण्याचे आमिष. ४७ ग्राहकांकडून एकूण 5,57,50,000 जमा केल्याचा आरोप. SRA चे वाटपपत्र, कलेक्टर पत्र, NOC, वीजबिलांसह शासकीय कागदपत्रे कथित बनावट असल्याचा आरोप. SRA कार्यालयातील पडताळणीत कागदपत्रे शासकीय नोंदींशी जुळत नसल्याचा दावा. शैलेश काकण, रुपेश वेलेंकर, अभिषेक गुजर, विश्वनाथ जाधव यांच्यासह अनेकांविरोधात गुन्हा. विश्वनाथ जाधव हा पूर्वी शिवसेना आमदाराचा वैयक्तिक सचिव, तर सध्या काँग्रेसच्या एका विद्यमान खासदाराचा पीए असल्याचा तक्रारीत उल्लेख. 25 लाखांत घर मिळवून देण्याचे आश्वासन देत फसवणूक केल्याचा आरोप. पोलिसांकडून आर्थिक व्यवहार, कागदपत्रांची सत्यता आणि आरोपींच्या भूमिकेचा सखोल तपास सुरू.
0
0
Report

नाशिक में खड्डे खत्म: महापालिका ने काम शुरू किया, मंत्री महाजन का एक्शन

Nashik, Maharashtra:नाशिक - - रस्त्याची दुरावस्था आणि खड्ड्यांनी पाच नागरिकांचा बळी घेतल्यानंतर नाशिक महापालिकेला जाग - नाशिक शहरातील खड्डे बुजवण्यास महापालिकेकडून सुरुवात - शहरातील खड्डे बुजवण्यासह रस्त्यांच्या कामांना देखील वेग - कुंभ मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना रस्त्याची दुरावस्था आणि खड्ड्यांच्या मुद्द्यावरून धारेवर धरल्यानंतर मनपा प्रशासनाला जाग अँकर नाशिक शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि खड्ड्यांमुळे पाच नागरिकांचा बळी गेल्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. शहरभर खड्डे बुजवण्याच्या कामांना वेग देण्यात आला असून, कुंभमंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना खडसावल्यानंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. पाहूया आमचा यांचा हा विशेष रिपोर्ट.... रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे पाच नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर नाशिक महापालिकेने शहरातील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. केवळ खड्डे बुजवणेच नव्हे, तर रखडलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांनाही आता वेग देण्यात येत आहे. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन स्वतः रस्त्यावर उतरले...या नंतर नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी आता रस्त्यावरती उतरले असून आज त्याची पाहणी करत लगेच रस्ते बुजवण्याचे काम हाती घेतले आहे... स्वतः मनपा आयुक्त या सुट्टीच्या दिवशी रस्त्यावरती उतरले असून शहरभर फिरत रस्त्याच्या कामाची पाहणी करत असतानाही पाहायला मिळत आहे.....येत्या 8 दिवसात संपूर्ण शहरात पडलेल्या रस्त्यांचे खड्डे बुजवले जाते असं शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी स्पष्ट केलं...तर शहरातील सगळी काम लवकर पूर्ण होतील असा विश्वास मनपा आयुक्त यांनी केलाय.... बाईट- मनीषा खत्री मनपा आयुक्त... बाईट- संजय अग्रवाल...शहर अभियंता.. मनपा यावेळी गिरीश महाजन यांनी एमएनजीएलच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. वारंवार बैठकीसाठी बोलावूनही अधिकारी उपस्थित राहत नसल्याची तक्रार त्यांनी केली. सोमवारी एमएनजीएल अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदून तसेच सोडल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले....आठ दिवसांत नाशिक शहरातील प्रमुख रस्ते खड्डेमुक्त करण्याचा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. तसेच खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या पाच नागरिकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केल्याचेही त्यांनी सांगितले. गिरीश महाजन – कुंभमंत्री विशेष म्हणजे, झी 24 तासने आठवडाभरापूर्वी या परिसरातील खड्ड्यांचा प्रश्न लावून धरला होता. त्यानंतर आता प्रत्यक्षात खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाल्याने स्थानिक नागरिक आणि नगरसेवकांनी झी 24 तासचे आभार मानले आहेत. मात्र, तात्पुरती मलमपट्टी न करता दर्जेदार आणि कायमस्वरूपी रस्ते तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.... बाईट -स्थानिक नागरिक बाईट- स्थानिक नगरपालिका‌व खड्ड्यांमुळे गेलेले पाच जीव पुन्हा परत येणार नाहीत. मात्र, यानंतर तरी प्रशासन कायमस्वरूपी आणि दर्जेदार रस्ते उभारते का, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

नाशिक की सड़कों में खड्डे मुक्त करने के लिए मंत्री गिरीश महाजन का निरीक्षण

Nashik, Maharashtra:अँकर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे रस्त्यावरती उतरले असून सध्या ते नाशिक शहरात तीन मखमलाबाद रोड परिसरात असलेला ग्रीन कॅसल सिग्नल येथे खड्ड्यांची आणि रस्त्याची पाहणी केलीये... गिरीश महाजन हे ईमेजिएलच्या कामावर नाराजी व्यक्त केली असून दोन ते तीन वेळा त्यांना बैठकीसाठी बोलवले तरी ते उपस्थित राहिले नसल्याची देखील तक्रार केलीये.... सोमवारी एम एन जी एल च्या अधिकाऱ्याची बैठक होणार असल्याचे देखील गिरीश महाजन यांनी सांगितला आहे.... अनेक नगरसेवकांची तक्रार एमनजीएल बद्दल आहे शहरात अनेक ठिकाणी च्या कामासाठी रस्ते खोदून ठेवले आहेत.... आठ दिवसाच्या आत हे संपूर्ण रस्ते खड्डे मुक्त होतील असा विश्वास मंत्री गिरीश महाजनांनी व्यक्त केला आहे.... त्याचबरोबर जे पाच नागरिक खड्ड्यांमुळे मृत्यू मुखी पडले आहेत त्यांचे देखील घरी सांत्वन भेट घेतले असल्याचा गिरीश महाजन यांनी सांगितला आहे.....यासंदर्भात गिरीश महाजन अशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी.....
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top