icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

हिंदी में: मालेगांव में SIR प्रकरण में पहली मौत, परिवार ने सुरक्षा पर सवाल उठाए

Malegaon, Maharashtra:भारतात SIR प्रकरणाचा मालेगावात बळी. SIR च्या भीतीने 75 वर्षीय वृद्धाची आत्महत्या - कुटुंबियांचा आरोप. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू. आत्महत्या प्रकरणी इस्लाम पार्टी, MIM, समाजवादी पार्टी और अन्य पक्ष दोषी - भाजप SIR प्रमुखांचा आरोप. भारतात SIR प्रकरणाचा पहिला बळी मालेगावात ठरला असून खैरुद्दीन अब्दुल शकूर मोमिन वय वर्ष 70 राहणार पवारवाडी मालेगाव यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. 2002 च्या मतदान यादीत त्यांचे नाव नव्हते त्यामुळे कागदपत्रांच्या जुळवाजुळव करण्यासाठी ते दोन महिन्यापासून चिंताग्रस्त होते यामुळे त्यांनी शेवटी भीतीपोटी आत्महत्या केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे。
0
0
Report

यवतमाळ के किसानों के कम दाम पर कपास बिके, व्यापारी मालामाल, किसान परेशान

Yavatmal, Maharashtra:कापूस उत्पादक यवतमाळ जिल्ह्यात यंदा शेतकरी कंगाल तर व्यापारी मालामाल असे चित्र पाहायला मिळत आहे. कारण खरीप हंगामातील कापूस हाती आल्यानंतर शेतकऱ्यांनी तो विक्रीसाठी बाजारात आणला असता कवडीमोल भावात तो विकावा लागला. खाजगी व्यापाऱ्यांनी कापूस कवडीमोल भावात खरेदी केला, शेतकऱ्यांना सात हजार 000 ते 7800 रुपये प्रति क्विंटल एवढाच दर मिळाला. आणि आता अचानक कापसाच्या भावात मोठी उसळी आली आहे. कापसाचा दर आठ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा फायदा तर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघालेला नाही.
0
0
Report

मालेगांव: पुणे विद्यापीठ के कुलगुरु पर कड़े आरोप, छात्रों ने इस्तीफे की मांग की

Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मालेगाव - पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंचा मालेगावी निषेध... - कुलगुरूंच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी... सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू विद्यापीठीय कामकाज सुधारण्याऐवजी गलिच्छ राजकारण, कटकारस्थान करण्यात मशगूल आहेत. ब्लॅकमेलिंग, अनैतिक व्यवहार करणाऱ्या गुंडांना आणि त्यांच्या तथाकथित संघटनांना हाताशी धरून RTL, तक्रार अर्ज मागवून कुलगुरू स्वतः विद्यापीठाचे, अधिकारी कर्मचारी यांचे अहित साधत आहेत. या सर्वांची हद्द झाली असून विद्यार्थी विद्यापीठ हितासाठी झटणाऱ्या श्री. सागर वैद्य यांच्यासारख्या सिनेट- मॅनेजमेंट काउन्सिल सदस्यांच्या कुटुंबीयांची सोशल मीडियावर बदनामी करण्याचे षड्यंत्र कुलगुरू कार्यालयात होत असेल तर ही अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. तेव्हा विद्यार्थी विरोधी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी केली आहे. बाईट: सागर वैद्य
0
0
Report
Advertisement

गोबर खिलाओ आंदोलन: KDMC आयुक्त के खिलाफ दस दिन में ठोस कार्रवाई का अल्टिमियम

Kalyan, Maharashtra:गुरचरण जमिनीवर अतिक्रमण..“गोबर खिलाव” आंदोलनातून केडीएमसी ला 10 दिवसांचा अल्टिमेटम! आणी कल्याण डोंबिवली महानगर पालिका अंतर्गत येणाऱ्या कल्याण ग्रामीण भागातील द्वारली पाडा परिसरात गुरांच्या चरण्यासाठी राखीव असलेल्या गुरचरण जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या जागेवर भूमाफियांनी बेकायदेशीरपणे चाळी उभारल्याामुळे तबेला चालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप वेक्त केला जात आहे. या प्रकरणात प्रशासनाकडून कोणत्याही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त नागरिकांनी आज केडीएमसीच्या आय प्रभाग कार्यालयावर धडक देत “गोबर खिलाव” आंदोलन केले. आंदोलनादरम्यान केडीएमसी आयुक्तांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला शेण चारत आरती करण्यात आली, ज्यामुळे आंदोलनाने वेगळेच स्वरूप घेतले. यापूर्वीही स्थानिक रहिवासी सौरभ सिंग यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यामध्ये सौरभ पांडे आणि त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते, तसेच तबेला चालवणाऱ्या कुटुंबांनी सहभाग घेतला होता. आंदोलनादरम्यान एक म्हैस घेऊन प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता, आणि त्या म्हशीच्या पाठीवर “KDMC Commissioner” असे लिहून प्रशासनावर निशाणा साधण्यात आला. तसेच आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत येत्या दहा दिवसांत प्रशासनाने ठोस पावले उचलली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे दरम्यान, आय प्रभाग कार्यालयाचे अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी या विषयावर बोलताना संबंधित बांधकामांना नोटीस देण्यात आली होती आणि आता पुन्हा कागदपत्रांची पडताळणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल असे सागितले मात्र तथापि, गुरचरण जमिनीवर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर केवळ कागदी कारवाई होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
0
0
Report

गडचिरोली में मलेरिया रोकथाम: पुजारियों की मदद से डॉक्टरों के पास पहुँच बढ़ेगी

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया मृत्यू दर घटविणे आणि उपचाराकरिता आरोग्य विभागाची नवी शक्कल लढविली आहे. आदिवासी ग्रामस्थांचे मन वळवून त्यांना डॉक्टरांकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आता पुजारीच प्रशासनाला मदत करणार आहेत. आरोग्य विभागाने 1700 पूजा-यांची यादी तयार केली असून अर्ध्याहून अधिक पुजाऱ्यांना या विषयी प्रशिक्षित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात एटापल्ली आणि भामरागड या अतिदुर्गम तालुक्यातील दोन गावे यासाठी निवडली गेली असून त्याचे उत्तम परिणाम पुढे आले आहेत. गाव पातळीवरील स्थानिक आदिवासींसाठी मलेरियाशी दोन हात करण्यासाठी पुजाऱ्यांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
0
0
Report

ऐरोली में गोलीबारी: दो युवकों पर गोलियां, एक की हालत गंभीर

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईच्या ऐरोली सेक्टर-१ साईनाथ वाडी मधील छत्रपती शिवाजी निवासी चाळीत रविवारी रात्री एका अज्ञात हल्लेखोराने दोन तरुणांवर गोळीबार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे सोमवारी रात्री ही घटना घडली असुन मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर दुचाकीवर बसून आला होता आणि त्याने अमित मौर्य व संदीप गवस या दोन तरुणांना लक्ष्य करून चार राउंड गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात अमित मौर्य गंभीर जखमी झाला आहे... एक गोळी त्यांच्या गळ्यात लागली आहे. घटनेनंतर लगेच त्यांना ऐरोलीतील इंद्रावती रुग्णालयात उपचारासाठी नेले गेले, पण त्यांची स्थिती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर मुंबईतील मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात हस्तांतरित करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता, तेथून चार रिकांमे खोक्ये (खोके) सापडले. आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या फुटेजची तपासणी केल्यावर एक संशयित हल्लेखोर दुचाकीवरून येताना आणि गोळ्या चालवताना दिसतो आहे. रुग्णालयात पोलिसांनी जखमी अमित मौर्य यांची विचारपूस केली असता, त्यांनी सध्या कोणावरही संशय व्यक्त केला नाही. राबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालकृष्ण सावंत यांनी सांगितले की, पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत आणि हल्लेखोराच्या शोधासाठी वेगवेगळ्या टीम्स तयार करण्यात आल्या आहेत. उशिरा रात्री घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
0
Report
Advertisement

शिरूर में 11 माह के बच्चे की हत्या: माँ पर आरोप बनाम न्याय की कसौटी

Shirur, Maharashtra:आईच्या कुशीत बाळ स्वतःला सर्वात सुरक्षित समजतं... पण पुण्याच्या शिरूरमध्ये याच नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. ज्या मातेने नऊ महिने श्वास दिला, त्याच मातेने स्वतःच्या सुखासाठी पोटच्या ११ महिन्यांच्या लेकराचा श्वास रोखलाय. तिसऱ्या लग्नात अडथळा ठरतोय म्हणून एका निर्दयी मातेने आपल्या पोटच्या गोळ्याचा काटा काढलाय. माणुसकीला काळीमा फासणाय्रा या घटनेचा हा स्पेशल रिपोर्ट. तो अवघा ११ महिन्याचा होता... त्याला नीट रांगताही येत नव्हतं. त्याचं जग, त्याचा आधार फक्त त्याची आई 'पूजा' होती. पण त्याला काय ठाऊक, ज्या हातांनी त्याला पाळण्यात थोपटलं, तेच हात एक दिवस त्याचा गळा घोटतील. शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. निष्पाप यश पवार या चिमुकल्याचा गुन्हा एवढाच होता की, तो आपल्या आईच्या तिसऱ्या लग्नाच्या स्वप्नात 'अडथळा' ठरत होता. पूजा पवार... नावात ममता असली तरी कृत्य एखाद्या राक्षसालाही लाजवेल असं. कोकणातून फिरून आल्यावर यश रडत होता, म्हणून या मातेचं पित्त खवळलं. मनात विकृत विचार आला की, 'हा मुलगा सोबत असेल तर तिसरं लग्न कसं होणार?' आणि याच विचारातून तिने रक्ताच्या नात्याचा बळी देण्याचं ठरवलं. यशचं डोकं घरासमोरच्या सिमेंटच्या ओट्यावर तिने इतक्या जोरात आपटलं की त्या कोवळ्या जीवाचा टाहो तिथेच कायमचा शांत झाला. क्रूरतेचा कळस म्हणजे हत्या केल्यानंतरही ही पाषाणहृदयी माता डगमगली नाही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पोटच्या गोळ्याला पाहूनही तिचं काळीज हललं नाही. उलट, एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे तिने पुराव्यांची विल्हेवाट लावली. रक्ताचे डाग धुवून काढले, यशचा मृतदेह कपड्यांच्या बॅगेत कोंबला आणि ती बॅग पाण्यात बुडावी म्हणून त्यात जड दगड भरले. त्यानंतर तो मृतदेह विहिरीत फेकून देऊन तिने मुलाच्या बेपत्ता होण्याचा बनाव रचला. आज भांबर्डे गाव सुन्न आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी या नराधम मातेला बेड्या ठोकल्याात. पण समाजात एकच चर्चा आहे... कलीयुग म्हणतात ते हेच का? स्वतःच्या क्षणिक सुखासाठी एका मातेचं काळीज इतकं कठोर कसं होऊ शकणं? कायद्याच्या न्यायालयात तिला शिक्षा होईलच, पण माणुसकीच्या न्यायालयात या मातेला कधीच माफी मिळणार नाही. आई म्हणजे माया, आई म्हणजे ममता... पण शिरूरच्या या घटनेने या पवित्र शब्दांनाच तडा दिलाय. ११ महिन्यांच्या यशच्या मृत्यूने केवळ एका कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण माणुसकीचा पराभव झालाय.
0
0
Report

शिर्डी पुलिस की जांच: समता पतसंस्थे के 100 खाते में धांधली, दो अधिकारी संदिग्ध

Shirdi, Maharashtra:आर्थिक फसवणूक व सावकारकीच्या गुन्ह्यात शिर्डी पोलिसाच्या तपासाला वेग आलाय.. भोंदू अशोक खरातच्या माध्यमातून उघडलेल्या समता पतसंस्थेतील 56 व्यक्तींच्या 100 खात्यांची चौकशी पोलीस करत आहे... आणि याच तपासा दरम्यान अनेकांचे जबाब नोंदविण्याचे काम वेगाने सुरू आहे.. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या नावाने देखील समता पतसंस्थेत खात असून हे खात बनावट की स्वतःची याबाबत चौकशी आता शिर्डी पोलीस करणार आहेत..जर ही खाती बनावट असेल तर अधिकाऱ्यांची कागदपत्र भोंदू अशोक खरात पर्यंत पोहोचली कशी याचा देखील शोध घेणे महत्त्वाचे असणार आहे.विशेष म्हणजे विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन अधिकाऱ्यांच्या बरोबरच त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांच्या नावे देखील पतसंस्थेत खाती आहेत. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्याच्या परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
0
Report
Advertisement

पिंपरी चिंचवड़ के लघु उद्योगों पर मजदूर कमी और युद्ध के असर से संकट

Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड़ उद्योग नगरी में लगभग आठ हजार छोटे और सूक्ष्म उद्योगों को मजदूरों की कमी के कारण भारी समस्याओं का सामना करना पड़ रहा है। मजदूरों की कमी के कारण शहर में बड़े कंपनियों के साथ-साथ लघु उद्योगों पर असर डाला है; कई प्रवासी मजदूर अपने गांव लौट गए हैं जिससे उत्पादन में कमी आई है और कुछ जगह एक ही शिफ्ट चल रही है, जिससे आय घट रही है। गैस की किल्लत और इसकी बढ़ी हुई कीमतों के बावजूद लोग गैस सिलेंडर उपलब्धता के सहारे काम चलाने का प्रयास कर रहे हैं, जबकि लॉकडाउन की अफवाहें भी उद्योगों के लिए चिंता का कारण बनी हैं। कोरोना के समय पिंपरी चिंचवड़ के लघु उद्यम बुरी तरह प्रभावित हुए थे, अब युद्ध के चलते फिर संकट की आशंका है, जो कुछ महीनों तक बना रहने पर लघु उद्योगों को और जोखिम में डाल सकता है।
0
0
Report

हरित लवाद के स्थगन से वृक्ष प्रेमी खुश, खड्डे पर ट्रैफिक का खतरा

Nashik, Maharashtra:नाशिक * हरित लवादाच्या वृक्ष तोडीला स्थगिती दिल्यानंतर वृक्षप्रेमी मध्ये आनंद... * मात्र हरित लवाद च्या स्थगितीनंतर पालिका प्रशासनाची गोची.. * हरित लवादाच्या निर्णयानंतर अर्धवट तोडून ठेवलेल्या झाडांचं काय करायचं हा प्रशासनासमोर प्रश्न... * उद्यान विभागाने गंगापूर रोड वरील काही मोठ्या झाडांना अर्धवट तोडून ठेवले... * या झाडांचे पुनर्रोपण करायचे म्हणून झाडा भोवती मोठा खड्डा देखील खणून ठेवला.. * आता स्थगिती मिळाल्यावर खड्ड्याच काय करायचं असा प्रश्न.. * गंगापूर रोड वर खणून ठेवलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होण्याची भीती.. गंगापूर रोड वरून आढावा घेत वृक्षप्रेमीशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी
0
0
Report
Advertisement

धाराशिव में बैलगाड़ी दौड़ का उन्माद, 150 से अधिक जोड़ों ने लिया भाग

Dharashiv, Maharashtra:धाराशिव दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार… लोहारा तालुक्यात “एकनाथ केसरी बैलगाडा शर्यत” उत्साहात पार धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात भातागळी येथे मराठवाड्यातील पहिल्याच “एकनाथ केसरी बैलगाडा शर्यती”चे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत राज्यभरातून 150 हून अधिक बैलजोड्यांचा सहभाग पाहायला मिळाला. आकर्षक बक्षिसांमुळे शर्यतीला विशेष रंगत आली, तर भातागळीतील आनंद पाटील यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरही शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले。
0
0
Report

चिपळूण में आलोक कुमार ने परशुराम के दर्शन के साथ हिंदुत्व जागरण का आह्वान किया

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण - रत्नागिरी.. अँकर विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार आज चिपळूण दौऱ्यावर आहेत... यावेळी त्यांनी कोकणाचे आराध्य दैवत असलेल्या भगवान श्री परशुरामाचे दर्शन घेतले... यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.. परशुराम भूमीतून आलोक कुमार यांनी हिंदुत्वाचा जागर करत उपस्थितांशी संवाद साधला.. या दौऱ्याच्या निमित्ताने चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील ''विहिप'' आणि ''बजरंग दला''च्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय.. आगामी काळात संघटनेच्या वतीने कोकणात कोणते नवे उपक्रम राबवले जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top