416416
Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक
Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चंद्रपुर के भद्रावती में बिबट्या सीसीटीवी में कैद: नागरिकों में दहशत
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, सततच्या वावराने गड्डमवार लेआउट भागातील रहिवासी नागरिक भयभीत अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात गड्डमवार लेआउट परिसरात बिबट्याच्या वावराची चर्चा सुरू असतानाच रात्री सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्याने बिबट्या असल्याची पुष्टी झाली आहे. वन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात पिंजरा लावला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिसरात बिबट्यासदृश पाऊलखुणाही आढळल्या आहेत. रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे, लहान मुलांवर व पाळीव जनावरांवर विशेष लक्ष ठेवावे, तसेच संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.0
0
Report
धुळगाव में एक एकड़ करेला बाग अज्ञात आरोपी ने उध्वस्त किया; मंत्री ने कार्रवाई के निर्देश दिए
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील धुळगाव येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याची एक एकर कारल्याची बाग एका अज्ञात मनोविकृत व्यक्तीने उध्वस्त केल्याची बातमी सकाळी झी 24 तास ने प्रसारित केलीया या बातमीची गंभीर दखल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेऊन संबंधित शेतकऱ्याला धीर दिला तसेच आपले स्वीय सहायक यांना घटनास्थळी पाठवून पोलीस, तहसीलदार कृषी अधिकारी, ही सर्व यंत्रणा कामाला लावून शेतकऱ्याला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या असे आदेश दिले0
0
Report
वर्धा में नाबालिग के साथ अत्याचार के विरोध में आक्रोश मोर्चा; सजा की मांग
Wardha, Maharashtra:वर्ध्यात अल्पवयीन मुलीचे अत्याचार प्रकरणी आक्रोश मोर्चा घटनेच्या निषेधार्थ वर्ध्यात कडकडीत बंद समाजातील सर्वच घटकांचा आक्रोश मोर्चात सहभाग छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक अत्याचार घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन पावसातही जनआक्रोश मोर्चा सुरूच; वर्ध्यात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घटनेचा निषेध वर्ध्यात विविध संघटना, सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्ष मोर्च्यात सामील0
0
Report
Advertisement
चंद्रपुर से नागपूर के लिए शिवसेना के रामरक्षा आंदोलन के लिए जत्था रवाना
Chandrapur, Maharashtra:नागपुरात होणाऱ्या शिवसेनेच्या रामरक्षा आंदोलनासाठी चंद्रपुरातून शेकडो शिवसैनिक रवाना, विशेष वाहनाद्वारे शिवसैनिकांनी जल्लोषात नागपूरकडे केले प्रस्थान नागपुरातील राम मंदिरात उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रामरक्षा आणि महाआरतीला उपस्थित राहणार आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या दान चोरी संदर्भात शिवसेना उबाठा पक्षातर्फे आंदोलन मालिका सुरू आहे. शिवसैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसैनिकांची बैठक देखील घेतली होती.0
0
Report
सोलापुर में उजनी जलाशय की पुरानी पाइपलाइन अचानक टूटी, टेंभूर्णी के पास पानी व्यर्थ
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी पाईपलाईनला टेंभुर्णी जवळ मोठी गळती. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारी उजनी जलाशयाजवळील जुनी पाईपलाईन फुटली. टेंभर्णी जवळ पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी गेलं वाया, पाईपलाईन फुटल्यामुळे दिसून आले मोठे फवारे. उजनी धरणातून सोलापूर शहराला जुन्या पाईपलाईन द्वारे केला जातो पाणीपुरवठा. उजनी धरणात 50 टक्के भरले असताना अचानकपणे पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी गेलं वाया.0
0
Report
मालशेज घाट के धबधबे भारी बारिश से फिर से प्रवाहित, पर्यटक जुटे
Barav, Maharashtra:सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध माळशेज घाटातील धबधबे प्रवाहित झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जरी पावसाने विश्रांती घेतली असली आणि धबध्यांचे पाणी काहीसे कमी झाले असले, तरी येथील निसर्गरम्य आणि आल्हाददायक वातावरण पर्यटकांना आकर्षित करत आहे. वीकेंडला माळशेज घाटातील या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मुंबई, जुन्नर आणि इतर परिसरांतून पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
Advertisement
भंडारा नगर परिषद में कांग्रेस नगरसेवकों का ठिय्या आंदोलन, माफी और कार्रवाई की मांग
Bhandara, Maharashtra:भंडारा नगर परिषद येथील अभियंता यांच्या विरोधात काँग्रेस नगर सेवकांनी केला ठिय्या आंदोलन.... प्रश्नाची उत्तर मिळत नाही उलट सुलट उत्तर देत असल्याचं नगर सेवकांचा आरोप.... भंडारा नगर परिषद येथे काँग्रेसचे चार नगरसेवक ठिय्या आंदोलनावर बसले होते.. भंडारा नगर परिषद येथे सभा असताना तांत्रिक अभियंता वंजारी मॅडम यांना काँग्रेस नगर सेविका यांनी काही प्रश्न विचारले. पण सभा संपून देखील उत्तर मिळाले नाही उलट उधट भाषा वापरत तुम्हाला बसायचं असेल तर बसा असे उत्तम दिले. शेवटी काँग्रेसचे चारही नगर सेवक नगर परिषद मध्येच आंदोलनावर बसले. वंजारी यांनी माफी मागावी व त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा घोषणा देखील देण्यात आल्या. शेवटी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले...0
0
Report
आंधळी ग्रामस्थ भारनियमन के विरोध में बैटरी-इन्वर्टर लेकर धरणे
Sangli, Maharashtra:आंधळी ग्रामस्थ भारनियमन के विरोध में अनोखी पद्धति का आंदोलन कर रहे हैं. बैटरी और इन्वर्टर लेकर वीजा न होने पर विद्युत संरक्षित करने के लिए बैटरी और इन्वर्टर उपलब्ध कराने की मांग की गई है. आंधळी ग्रामपंचायत के सामने ग्रामस्थों ने बैटरी व इन्वर्टर लेकर धरणे आंदोलन किया. आंधळी गावाच्या वाड्या वस्त्यांवर कुछ दिनांपासून सायंकाळ के बाद भारनियमन हो रहा है. इससे सभी लोग, किसान, विद्यार्थी प्रभावित हो रहे हैं; अचानक होने वाले भारनियमन के कारण क्या हो रहा है, इसका सवाल उठाते हुए विद्युत सप्लाई सुचारू न होने पर रास्ता रोको आंदोलन की चेतावनी सामाजिक कार्यकर्ता प्रदीप माने ने दी है.0
0
Report
सरकारी कांदा खरीद में पारदर्शिता बढ़ाने के बाद भी लक्ष्य नहीं मिला, किसान नाराज
Yeola, Maharashtra:दरवर्षी सरकारी कांदा खरेदीत गैरव्यवहार आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याचे आरोप होत असल्याने यंदा खरेदी प्रक्रियेत बदल करण्यात आला असून पारदर्शकता वाढविण्याच्या उद्देशाने नाफेड आणि एनसीसीएफच्या सहकारी संस्थांना कांदा खरेदीचे टेंडर देण्यात आले, तर साठवणुकीची जबाबदारी सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनकडे सोपविण्यात आली 30 जूनपर्यंत कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे होते मात्र, खरेदीला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने मुदतवाढ देण्यात आली तरीही आतापर्यंत गेल्या dois महिन्यात केवळ 36 हजार मेट्रिक टन, म्हणजेच उद्दिष्टाच्या अवघ्या 18 टक्के कांद्याचीच खरेदी झाली सुरुवातीला सरकारी कांदा खरेदीचा दर प्रतिक्विंटल 1,235 रुपये निश्चित करण्यात आला होता हा दर बाजारभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली त्यानंतर टप्प्याटप्प्याने दरवाढ करत सध्या 2,125 रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी सुरू आहे हा दर बाजार समित्यांमधील सरासरी दराच्या बरोबरीचा असतानाही शेतकरी सरकारी खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवत असल्याने मुदतवाढ देऊनही केंद्र सरकारचे दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होणार ka असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करत शासकीय कांदा खरेदीला 3 हजार रुपयांचा दर देण्याची मागणी शेतकऱ्यांची आजही कायम आहे0
0
Report
Advertisement
अंबेगांव के ग्रामीणों ने आठवीं कक्षा तुरंत शुरू करने और आश्रमशाला बहाल करने की मांग की
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गम आंबे गावातील ग्रामस्थांनी शिक्षणाच्या हक्कासाठी थेट घोडेगाव येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर सामूहिक उपोषण सुरू केले आहे. गावात आठवीचा वर्ग तात्काळ सुरू करून, पहिली ते दहावीपर्यंत आश्रमशाळा पूर्ववत करावी, अशी ग्रामस्थांची प्रमुख मागाणी आहे. २००३ पासून सुरू असलेली ही शाळा २०१३-१४ मध्ये शासनाने बंद केल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जोपर्यंत शाळा सुरू करण्याचे लेखी आदेश मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.0
0
Report
आषाढ़ी एकादशी के मौके पर जांबुत के जय मल्हार हाईस्कूल ने निकाली भव्य दिंडी
Shirur, Maharashtra:आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील जांबुत येथील जय मल्हार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एका भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. पारंपरिक वेशभूषा, टाळ-मृदंगाचा गजर आणि 'ज्ञानोबा माउली तुकाराम'च्या जयघोषाने संपूर्ण जांबुत गाव भक्तीसागरात न्हाऊन निघालं होतं.0
0
Report
मालाड में सफेद पट्टी विवाद: मनसे ने विरोध किया, प्रशासन ने कार्रवाई का भरोसा दिया
Mumbai, Maharashtra:मालाडमध्ये पांढऱ्या पट्टीवरून वाद; मनसेचा निषेध, कारवाईचे प्रशासनाचे आश्वासन मुंबईच्या मालाड पूर्व परिसरात रस्त्यावर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. नवजीवन शाळेजवळील दाफ्तारी रोड परिसरात जैन साधूंच्या भ्रमंतीनिमित्त एका सोसायटीलगतच्या रस्त्यावर पांढरी पट्टी काढण्यात आली होती. या प्रकाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध दर्शवला. मनसेचे कांदिवली पूर्व विभागप्रमुख महेश फरकासे यांच्या कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पांढऱ्या पट्टीवर काळी पट्टी रंगवत निषेध नोंदवला आणि सार्वजनिक रस्त्यांवर अशा प्रकारच्या खुणा परवानगीशिवाय करण्यात येत असल्याचा आरोप करत प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली. आंदोलनानंतर मुंबई महानगरपालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित पांढरी पट्टी पूर्णपणे काळ्या रंगाने झाकून टाकली. यावेळी पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून नियमांनुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल, तसेच दोषींवर कायदेशीर कारवाईचा विचार केला जाईल, असे आश्वासन मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले. मात्र, या घटनेप्रकरणी अद्याप पोलिस किंवा मुंबई महानगरपालिकेकडून कोणताही अधिकृत एफआयआर दाखल झाल्याची किंवा फौजदारी कारवाई सुरू झाल्याची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात पुढे प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
सोनम वांगचू की रात में अस्पताल दाखिला; नागपुर में उग्र हिंदुत्व प्रदर्शन पर सवाल
Nagpur, Maharashtra:नागपूर : संजय राऊत ऑन सोनम वांगचू धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामासाठी त्यांचा उपोषण होत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा घेतला नाही आणि आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्राणांची कुर्बानी देण्यास तयार असलेल्या सोनम वांगचू यांना मध्यरात्री पोलिसांनी जो जबरदस्तीने उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल केला, हा देश किती हुकूमशाही मार्गाने चाललेला आहे. सोनम वांगचू यांच्या प्राण्यांची तुम्हाला इतकी किंमत असती, तर उपोषण सुरू झाल्यावर त्यांच्या मागण्या संदर्भात सरकारने काही भूमिका घेतली असती, ती भूमिका घेतली नाही सोनम वांगचू यांच्यावर दडपशाही करण्याचे शिक्षकांनी आहे की, आज नागपुरात जी हिंदुत्वाची धडक आहे, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राम मंदिर लुटी विरुद्ध एक एल्गार आहे त्या कार्यक्रमावरच लक्ष वळवाव म्हणून सोनं वगचू यांना काल रात्री दडपशाही मार्गाने अटक करून हॉस्पिटलमध्ये नेलं. ऑन नवनीत राणा पोस्टर याबाबत मला माहित नाही ऑन रामरक्षा निमंत्रण आमच्या कर्तव्य आहे, आम्ही या कार्यक्रमाला अराजकीय कार्यक्रम मानतो, अयोध्येमध्ये मुक्तीचं आंदोलन झालं ते आम्ही अराजकीय मानतो, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना भाजपचे काही लोकं असतील हे सर्व सहभागी झाले, तसंच हे आता अयोध्या आणि राम मंदिर हे चोरांपासून मुक्त करण्याचे जे आंदोलन आहे ते सुद्धा अराजकीय आहे. त्यामुळे जे जे रामभक्त आहे हिंदू आहे, त्या सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही सहसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इकडले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सर्वांना आमंत्रित केले आहे जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्कालीन सरसंघ चालकांच्या हातून त्यामुळे तिची पूजा अर्चना झाली असेल तर स्थापन केले असतील, त्या मूर्तीची आज आम्ही पूजा करणार आहोत म्हणूनच आम्ही संघ मुख्यालयात आमंत्रण दिले आहे तुमच्याच हस्तापर्शने स्पर्शाने पावन झालेल्या या मूर्ती आहेत, यात कुणाला राजकारणाचा गंध येत असेल तो त्यांच्या प्रश्न आहे आम्हाला असे वाटते की सर्वांनी यावे जनता तर येईलच त्यांच्या हिंदीतून वेगळा आमच्या हिंदुत्व वेगळा त्यांच्या राम वेगळा आमचा राम वेगळा असा नाही आहे. राम एकच आहे या राष्ट्राच्या आत्मीयतेचा प्रतीक आहे, आणि जी लढाई रामासाठी अयोध्येत झाली त्याच्यामध्ये सगळेच आघाडीवर होतो आम्ही भाजप कार्यक्रम होर्डिंग 22 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस आहे आम्ही त्यांना उदंड, दीर्घायु, निरोगी, आणि राजकीय कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिलेले आहे. मी तर नेहमी म्हणतो त्यांच्यात राष्ट्रीय नेतृत्व करण्याची क्षमता आहे त्यांनी दिल्लीत जाऊन महाराष्ट्र नाही त्या देशाचे नेतृत्व करावे अशी आमची त्यांना शुभेच्छा आहे त्याच्यासाठी त्यांनी यज्ञ केला असेल तर त्या यज्ञा इतकच आमच्या शुभेच्छा मध्येसुद्धा ताकद आहे. ऑन राम मंदिर पत्र त्यांनी मला पत्र दिले आहे आणि त्या पत्रामध्ये सर्व आमच्या कार्य चालेल, आम्ही मंदिर आणि मंदिराचा परिसरामध्ये कोणतेही राजकारण करणार नाही तर आमचा व्यासपीठ रस्त्यावर आहे शिवसेना पक्षप्रमुख त्या मंचावरून जनतेला संबोधणार आहे. ऑन NCP एकत्र एकत्र येण्याची चर्चा दोन वर्षापासून सुरू आहे सुप्रियाताई, जयंत पाटील असेल की विनायक गर्ग आहे आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. ऑन मोहन यादव (mp CM) असं कानून बनवत आहे काय, असे केलं तर अर्धी बीजेपी रिकामी होईल, समान नागरीक कानून जे आहे किंवा तिहेरी तलाक चा मुद्दा असेल आम्ही त्यांना समर्थन केला तर तुम्हाला बदलाव करावा लागेल जो पत्नीला सोडतो त्यालाही त्या कानून मध्ये आणावे लागेल असे भरपूर आहे ही पब्लिक रॅली नाही आहे, कोणता तिने रॅलीमध्ये इतके लोक येतील असं नाही आहे आम्ही जनतेला निमंत्रण दिले आहे आणि कार्यकर्त्यांना, विशेष करून उद्धव ठाकरे हे मंदिरात पूजा करायला येत आहे आणि पूजेत ज्यांना यायचे आहे ते येतील, विरोधकांना रक्षा पठणकरता येते, पण त्यांनीच तर मंदिरात चोरी केली आहे रामरक्षा तुम्हाला पूर्ण वाचता येते की नाही हे चरित्राचा सर्टिफिकेट नाही आहे, हे लोक आहे जे मंदिरात बसले आहे ते फटाफट राम रक्षा बोलतात त्या लोकांनीच रामाला लुटले आहे ऑन उपराष्ट्रपती वक्तव्य त्याच्यामध्ये शंका घेण्याचा काहीच कारण नाही कारण आता मनामध्ये शंका का येते कदाचित राम मंदिराच्या लुटीमध्ये काही अशा लोकांच्या सहभाग आहे ते समोर आल्यामुळे त्यांना असं बोलावसं वाटलं असेल जेव्हा सोनम वांगचू जेव्हा उपोषणाला बसले, तेव्हा सरकारने त्याच्याशी चर्चा करायला पाहिजे होती 21 दिवस त्यांच्या शरीराची झीज होऊ दिली त्यांच्या ऑर्गन फेलुअरची वेळ आली आणि आता तुम्ही त्या शिक्षण मंत्राची मंत्राला दूर करण्याऐवजी सोनम वांगचू यांना अटक करून हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.0
0
Report
आषाढी एकादशी के लिए ११६ विशेष बस: वारकऱों को पंढरपुर सीधे पहुंचाने की योजना
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष वाहतूक व्यवस्था केली आहे. वाशिम जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या सोयीसाठी तब्बल ११६ विशेष बसचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही गावातील किमान ४० किंवा त्यापेक्षा अधिक वारकरी एकत्र आल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. यंदाची आषाढी यात्रा २० ते ३० जुलैदरम्यान होणार असून,२५ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे.यात्रेच्या पार्श्वभूमीवर अकोला विभागाने आगारनिहाय बसचे नियोजन पूर्ण केले असून, प्रवाशांची संख्या वाढल्यास अतिरिक्त बसही उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.तसेच वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करण्यात आली असून, सुरक्षित किफायतशीर आणि सुलभ प्रवासासाठी एसटी महामंडळाने सर्व आवश्यक व्यवस्था केली आहे.0
0
Report
सोनम वांगचुक मामले पर विपक्ष का तीखा हमला, सरकार पर दबाव बढ़ा
Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - इम्रान प्रतापगडी, काँग्रेस खासदार *ऑन सोनम वांगचुक* - सरकारने आज एका सोनम वांगचुक सारख्या वयोवृद्ध व्यक्तीला इतक्या दिवसांपासून उपोषण सुरू असताना पोलिसांकडून उचलून नेले. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. सरकार आंदोलन दडपण्याचे काम करत आहे. विद्यार्थ्यांचे अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. 21 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितलेला नाही. आम्ही सरकारचा तीव्र निषेध करतो. - लोकसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. हणून लोकांवर अन्याय करायचा का? हे सरकार डरपोक आहे. *ऑन मोहन यादव* - आजचा मुद्दा सोनम वांगचुक यांचा आहे. मोहन यादव यांच्यावरील कथित घोटाळ्यांच्या आरोपांवर सरकार मौन का बाळगत आहे? सरकार निष्ठा, इमानदारी आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या आदर्शांची भाषा करते, मग त्यांच्या कार्यकाळात असा कथित भ्रष्टाचार कसा होऊ शकतो? - एखाद्या व्यक्तीला दवाखान्यात न्यायचे असेल, तर त्याच्याशी संवाद साधून डॉक्टरांकडे नेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांना ओढत-ताणत अशा पद्धतीने दवाखान्यात नेणे चुकीचे आहे. शिक्षणमंत्र्यांची नेमकी भूमिका आणि मनशा काय आहे?0
0
Report
Advertisement
