icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गड़चिरोली के सिरोंचा में आदिवासी पानी के लिए भटक रहे, बोरवेल भी सूने

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यातील आदिवासी नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. ते थेंब-थेंब पाणी गोळा करून दैनंदिन गरजा भागवत आहेत. या गावात विहीरी आणि बोरवेल आहेत. मात्र एकाही बोरवेलमध्ये पाणी नाही. वर्षातील आठ महिने नागरिकांना दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या तलावाच्या एक छोट्याशा खड्ड्यातून पाणी आणावे लागते. जिल्हा प्रशासन, राज्य सरकार, केंद्र सरकारच्या अनेक योजना फक्त कागदावरच आहेत. नळ योजनांच्या नळात आजपर्यंत पाणी आलेच नसून झिंगानूर चेक 1, झिंगानूर चेक 2, लिंगापूर टोला, रामाजीगुडम टंचाईग्रस्त गावांच्या यादीत आहेत. झिंगानूर वासियांचे जल संकट कधी दूर होणार असा सवाल विचारला जात आहे. असीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
0
0
Report
0
0
Report

नागपूर में डिटोनेटर्स बरामद, बारकोड मिटे, वितरक की पहचान प्रभावित

Nagpur, Maharashtra:नागपूरच्या दोसर भवन चौकाजवळ एका घराच्या समोरील परिसरात बेवारस पिशवीत सापडलेले 50 डेटोनेटर्स आणि 15 जिलेटिन कांड्याच्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. एसबीएल कंपनीशी संबंधित या स्फोटकांवरील बारकोड मिटलेले आहे, त्यामुळे कंपनीकडून नेमक्या कोणत्या वितरकाला हे स्फोटक पाठवण्यात आले होते, हे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. डॉ लांजेवार यांच्या घराच्या समोरील मोकळ्या जागेतील बागेत एका बेवारस पिशवीत हे स्फोटक मंगळवारी सकाळी सापडले होते. प्रत्येक डिटोनेटरवर बारकोड आणि त्याचा सिरीयल नंबर छापलेला असतो; त्याच्या माध्यमातूनच उत्पादनक कंपनीकडून नेमक्या कोणत्या वितरकाला ते पाठवण्यात आले होते आणि कुठून त्याची विक्री झाली होती ते स्पष्ट होत असते. आता या स्फोटकांवरील बारकोड मिटलेले असल्याने पोलिसांची अडचण वाढली आहे. दरम्यान पोलीस दोसर भवन चौक तसेच सेंट्रल एवेन्यू वरील विविध सीसीटीव्ही कॅमेरा च्या माध्यमातून या ठिकाणी पिशवीत स्फोटक ठेवणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.
0
0
Report
Advertisement

बारदाने नहीं मिलने से अमरावती में चना-तुरी खरीद बंद, किसान चालक बनाम महंगाई का सामना

Amravati, Maharashtra:तीन फाईल आहे बारदाना अभावी अमरावती जिल्ह्यातील शासकीय तुर व चना खरेदी बंद; खाजगी बाजारात कमी भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणी अँकर :- शासनाच्या हमीदराने होणारी चना व तुरीची शासकीय खरेदी बारदाण्याअभावी रखडली आहे. त्यामुळे याचा फटका आता शेतकऱ्यांना बसताना दिसून येत आहे. खुल्या बाजारात चना व तुरीचे दर पडत आहे त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. शासनाने पणन महासंघ नोडल एजन्सी नियुक्त करून शासनाच्याहमीदराणे खरेदी प्रारंभ केली मात्र अनेक शासकीय खरेदी केंद्रावर बारदाना नसल्याने ही खरेदी बंद पडली आहे. याचा फटका आता शेतकऱ्यांना बसताना दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली मात्र खरेदी बंद असल्याने तूर हरभरा उत्पादन शेतकरी अडचणीत आला आहे. केंद्रावर बारदाना पोहोचल्यावर आम्ही खरेदी सुरू करू असं आता सांगण्यात येत आहे. मात्र खरेदी तात्काळ सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report

रत्नागिरी के जिला अस्पताल में रक्त का संकट, रक्तदान की अपील जारी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्हा रुग्णयालयात रक्त तुटवडा.. आरोग्य यंत्रणेकडून सामाजिक संस्थान आवाहन.. जिल्ह्यातील आरोग्य वस्थेसमोर सध्या रक्त तुटवड्याचे संकट ओढावले आहे.. जिल्हा शासकीय रुग्णालय आणि खाजगी रक्तपेढ्यांमध्ये रक्त साठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे.. सध्या केवळ शंभर पिशव्यांचा साठा शिल्लक आहे.. ही परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन उपचारासाठी रक्तपुरवठा कठीण होणार आहे.. वाढत्या उष्णतेमुळे रक्तदात्यांनी बाहेर पडणे टाळल्याने स्वेच्छ रक्तदानाचे प्रमाण घटले असून रक्ताचा बॅक-लॉग वाढला आहे.. या गंभीर परिस्थितीत आरोग्य यंत्रणा कडून सामाजिक संस्था,राजकीय पुढारी आणि तरुण मंडळांना रक्तदानाच्या आवाहन करण्यात येत आहे..
0
0
Report
Advertisement

उजनी के कारंबा कालवे में ओवरफ्लो, सड़क पर पानी फैलाने से यातायात बाधित

Solapur, Maharashtra:सोलापूर - उजनीच्या कारंबा शाखेतील पाणी हिप्परगा पंपहाऊसपासून ओव्हरफ्लो, रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी Anc : उजनीच्या कारंबा कालव्यातील पाणी हिप्परगा पंप हाऊस जवळ ओव्हर फ्लो झाले असून, ते पाणी थेट ओढ्यात आले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात ओढ्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे जुना कारंबा नाका ते भोगाव टोल नाका या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. सध्या शेतीच्या पाण्यासाठी उजनी धरणातून कारंबा कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. ओढया वरून पाणी वाहत असल्यामुळे वाहन चालकांना कसरत करत मार्ग काढावा लागला.
0
0
Report
Advertisement

अमरावती-परतवाडा मार्ग पर अदालत के आदेश के विरुद्ध पेड़ कटे, पर्यावरण प्रेमी नाराज

Amravati, Maharashtra:अमरावती–परतवाडा मार्ग पर मनाई धुडकाव कर पचास से अधिक पुराने पेड़ काटे गए; पर्यावरण प्रेमियों में नाराज़गी। अँकर: अमरावती–परतवाडा महामार्ग के चौपदरीकरण के कार्य के दौरान न्यायालय के स्पष्ट आदेश की अवहेलना कर पचास से अधिक पुराने पेड़ कटे थे। इस मार्ग पर 100 से 150 वर्ष पुराने कडुनिंब, चिंच, वड, पिंपळ आदि पेड़ बड़े पैमाने पर थे। अचलपूर-परतवाडा के बीच लगभग 6 किमी मार्ग का काम राष्ट्रीय महामार्ग विभाग को सौंपा गया था। कार्य शुरू करते समय इन पेड़ों के कटने का आरोप पर्यावरण कार्यकर्ताओं ने किया। पहले भी इन पेड़ों के कटने का मामला अदालत गया था और पेड़ न काटने के निर्देश दिए गए थे। फिर भी कटाई अदालत के आदेश के उल्लंघन को दर्शाती है, पर्यावरण प्रेमियों का कहना है। पुराने पेड़ कटना पर्यावरण के लिए बड़ा नुकसान है।
0
0
Report

भावसिंगपुरा में घरेलू हिंसा से विवाहित महिला ने दी आत्महत्या; पति समेत सात गिरफ्तार

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील भावसिंगपुरा भागातील श्रावस्ती कॉलनी परिसरात एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जेवणात केस सापडल्याच्या क्षुल्लक कारणावरून पतीने केलेल्या अमानुष मारहाणीला आणि सासरच्या सततच्या छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी छावणी पोलिसांनी मृत महिलेचा पतीसह सासरच्या सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत. ईश्वरी अजय बनकर वय २५ असे मयत झालेल्या विवाहितेच नाव आहे. तर अजय बनकर, दिनेश बनकर, दिलीप बनकर, चंद्रमणी बनकर, छाया बनकर, आशिष बनकर आणि गणेश बनकर अशी आरोपींची नावे आहेत.
0
0
Report

सोलापुर जिला परिषद के विषय समितियों के लिए कई उम्मीदवार, नामांकन की चर्चा शुरू

Solapur, Maharashtra:सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांसाठी अनेक जण इच्छुक, नावांबाबत चाचपणीला सुरुवात Anchor - सोलापूर जिल्हा परिषदेच्या दहा विषय समित्यांच्या सदस्य निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विविध समित्यांसाठी अनेक सदस्यांनी इच्छुकता दर्शविल्याने वातावरण चांगले तापले आहे मात्र जिल्हा परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत असल्यामुळे या निवडी बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थायी, अर्थ, आणि बांधकाम या महत्त्वाच्या समित्यात संधी मिळावी यासाठी अनेक सदस्यांनी फिल्डिंग लावली आहे. महिला व बालकल्याण तसेच समाजकल्याण समित्यांमध्ये महिलांना संधी देण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र सर्व पदांच्या नियुक्ती बाबत पालकमंत्री जयकुमार गोरे हेच अंतिम निर्णय घेणार आहेत.
0
0
Report
Advertisement

एसटी भाड़े में 10% वृद्धि: अप्रैल से जून तक यात्रियों की जेब पर बोझ

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; दहा टक्के एसटीचे भाडे वाढणार महाराष्ट्र राज्य महामंडळाने 15 एप्रिल ते 15 जून पर्यंत एसटी प्रवासाच्या तिकिटाचे 10 टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचे ठरवले आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. पेट्रोल डिझेल वाढले नाही तर भाडेवाढ कशासाठी असा सवाल प्रवासी करताय. 15 एप्रिल ते 15 जून हा सुट्ट्यांचा काळ आहे या काळात प्रवासी संख्या वाढते त्यामुळं हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे आणि यावरून लोकांची नाराजी आहे... सुट्ट्यांच्या दिवसांमध्येच विद्यार्थ्यांना फिरायला घेऊन जावे लागते, लग्न समारंभ याच दिवसात असतात, याच सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये भाडेवाड करणे पूर्णपणे चुकीचे आहे हा एसटीचा चुकीचा निर्णय आहे अशा जनतेच्या भावना आहेत... संभाजीनगर वरून असे असणार नवीन दर * छत्रपती संभाजीनगर ते पुणे सध्याचे दर 393 रुपये, भाडेवाडी नंतर 432 रुपये * छत्रपती संभाजीनगर ते मुंबई सध्याचे दर 645 रुपये, भाडेवाडी नंतर सातशे आठ रुपये * संभाजीनगर ते नाशिक सध्याचे दर 343 रुपये भाडेवाडीनंतर 373
0
0
Report

पटाखे लोड ट्रक में आग, चालक सुरक्षित; पैठण रोड पर ट्रक दुर्घटना के बाद आग पर काबू

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील ढोरकीन शिवारातील बालानगर फाट्याजवळ बुधवारी फटाक्यांनी भरलेल्या ट्रकमध्ये आग लागली. सुदैवाने, या घटनेत चालक आणि क्लीनर 두घेही सुखरूप बचावले असून एक मोठाअनर्थ टळला आहे. अहमदाबादेतून फटाके भरून लातूरकडे ट्रक जाताना बालानगर फाट्याजवळ खड्ड्यात आदळला. त्यानंतर आतल्या छोट्या फटाक्यांनी अचानक पेट घेतला आणि एकामागून एक स्फोट होऊ लागले. चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक काही अंतरावर नेऊन थांबवला; वाहकासहा दोघेही खाली उतरले. बघ्यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळात अग्निशमन केंद्राचा बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी ट्रकमधील आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे पैठण रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
0
0
Report

मानोरा बसस्टँड के पास मोटरसाइकिल चोरी CCTV फुटेज में कैद

Washim, Maharashtra:वाशीम: दुचाकी चोरीची घटना मानोरा बसस्थानक परिसरात घडली असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कैलास भस्मे यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मानोरा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, गेल्या एक महिन्यापासून वाशिम जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top