416416
Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक
Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
उल्हासनगर हत्या केस में दो आरोपी गिरफ्तार; वीڈیو समेत सबूत बरामद
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी थेट पुरावा नसतांना हत्येचा गुन्हा आणला उघडकीस जुन्या वादातून केली होती हत्या anchor मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इसमांनी निर्घृण हत्या करण्यात आली होती. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी आरोपींनी अत्यंत क्रूरतेने मृतदेहाचे मुंडके धडापासून वेगळे केले होते आणि दोन्ही हात कापून टाकले होते. त्यानंतर हे प्रेत एका निर्जन स्थळी फेकून देण्यात आले होते. कोणताही थेट पुरावा किंवा मृतदेहाची प्राथमिक ओळख नसताना, उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत या क्रूर हत्येचा कट उघडकीस आणला असून , या प्रकरणातील मुख्य आरोपी फैज सुलतान मालीम आणि अल्बान सुलतान मालीम या दोघांना आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 13 मार्च रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास अमन मुस्तकीन शेख याला आरोपींनी मुंब्रा येथील श्रीलंका भागातून एका रिक्षामध्ये बसवून खर्डीगाव येथील निर्जन ठिकाणी नेले. तिथे धारदार चाकूने त्याचा गळा चिरून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आणि ओळख लपवण्यासाठी त्याचे मुंडके आणि दोन्ही हात कापून वेगवेगळ्या निर्जन ठिकाणी टाकून दिले. धक्कादायक बाब म्हणजे, हत्या करताना आरोपींनी आपल्या मोबाईलमध्ये या गुन्ह्याचे व्हिडिओ शूटिंग देखील केले होते. पोलिसांनी तो मोबाईल पुराव्यासाठी जप्त केला आहे. चंद्रशेखर भुयार उल्हासनगर0
0
Report
टिटवाला के KNt स्कूल में गणवेश तीन गुना महंगा, अभिभावकों का धरना
Kalyan, Maharashtra:गणवेश सक्ती करणाऱ्या शाळेवर कारवाईच्या मागणीसाठी पालकांचे ठिय्या आंदोलन. मान्यता रद्द करण्यासाठी उपसंचालकांना पत्र. टिटवाळा येथील केएनटी शाळा प्रशासनाकडून तिप्पट दराने ठराविक दुकानातच गणवेश खरेदी करण्याची सक्ती पालकांवर केल्याने याविरोधात पालकांनी शिक्षण विभागावर तीन वेळा आंदोलन छेडले. मात्र, तरीही संबधित शाळा प्रशासनावर कोणतीही कारवाई होत नाही. यासाठी आज पुन्हा या पालकांनी केडीएमसीच्या शिक्षण मंडळ कार्यालयात ठिय्या मांडत आंदोलन केले. शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासनाचे साटे लोटे असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय देशेकर यांनी केला आहे. तर, शाळेकडून वाढीव दराने गणवेश विक्री केल्याच्या तक्रारीची दखल घेत याप्रकरणी शाळेविरोधात कारवाई करण्यासाठी उपसंचालकांना पत्र पाठवले असून, त्यांच्याकडून आदेश प्राप्त होताच कारवाई केली जाईल. असे केडीएमसी शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी भारत बोरनारे यांच्या स्पष्ट केले आहे.0
0
Report
सावळीविहीर में अतिक्रमण हटाने की बड़ी कार्रवाई शुरू, ट्रैफिक की राहत की उम्मीद
Shirdi, Maharashtra:तीन दिवसांच्या अल्टिमेटमनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील सावळीविहीर येथे अतिक्रमण हटवण्याची मोहीम अखेर सुरू झाली आहे. नगर–मनमाड महामार्गालगतच्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी होत असून , शिर्डीकडे येणाऱ्या भाविकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामातही अडथळे निर्माण होत होते. या पार्श्वभूमीवर मागील तीन दिवसांपूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी करत अतिक्रमण धारकांना इशारा दिला होता मात्र तरी देखील अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमण न हटवल्याने प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, सावळीविहीर परिसरात आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. अतिक्रमण हटवल्यानंतर परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे.0
0
Report
Advertisement
धाराशिव में ओमराजे निंबाळकर और कैलास पाटिल के बैनर से जन्मदिन की बहस शुरू
Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आणि ठाकरेंचे आमदार कैलास पाटलांचे एकत्र बॅनर\n\nखासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त झळकले बॅनर\n\nआम्ही दादा प्रेमी म्हणत शिवसेना पदाधिकाऱ्याची बॅनरबाजी \n\nधाराशिव मध्ये फक्त ओके पॅटर्न म्हणत दोघांचे फोटो लावत बॅनर वरून वाढदिवसाच्या शुभेच्छा \n\nदुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांना समाज माध्यमावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं कैलास पाटलांनी टाळलं\n\nAnc: उद्धव ठाकरेंची साथ सोडून एक एकनाथ शिंदें सोबत गेलेले खासदार ओमराजे निंबाळकर आणि ठाकरेंच्या आमदार कैलास पाटील यांचे धाराशिव मध्ये एकत्र बॅनर झळकले. ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर लावण्यात आले असून धाराशिव मध्ये फक्त ओके पॅटर्न म्हणत ओमराजे निंबाळकर यांना शुभेच्छा देण्यात आले आहे. त्यावर आम्ही दादा प्रेमी असेही लिहिण्यात आला आहे. ओमराजांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर त्यांचा पहिलाच वाढदिवस या वाढदिवसाला शिवसैनिकाकडून ही बॅनर बाजी करण्यात आली. दुसरीकडे आमदार कैलास पाटलांनी मात्र समाज माध्यमावरून ओमराजे निंबाळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे टाळले आहे.0
0
Report
गीतांजली एक्सप्रेस में छेड़छाड़ के आरोप पर युवतियों ने युवक को जवाब दिया; वीडियो वायरल
Akola, Maharashtra:बडनेरा–अकोला के बीच चलने वाली गीतांजली एक्सप्रेस में एक युवती ने कथित तौर पर एक युवक की छेड़छाड़ करने पर उसे जवाब देकर सबक दिया. वीडियो इस समय सोशल मीडिया पर वायरल हो रहा है. हालांकि यह वीडियो अमरावती रेलवे विभाग के क्षेत्र का है या आकोला क्षेत्र का, इस बारे में आधिकारिक पुष्टि नहीं है. इसलिए वीडियो के स्थान के बारे में हम कोई दावा नहीं कर रहे. उपलब्ध जानकारी के अनुसार ट्रेन यात्रा के दौरान एक युवक ने युवती को छेड़छाड़ का आरोप लगाया. इस घटना से गुस्साई युवतियों ने युवक को खूब सबक सिखाने की कोशिश की. इस दौरान युवक को लिस्टीप लगवाने का दृश्य कुछ यात्रियों ने मोबाइल में कैद किया. घटना का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है और विभिन्न स्तरों से इसके बारे में प्रतिक्रियाएं आ रही हैं. परंतु रेल्वे पुलिस से अभी तक कोई आधिकारिक जानकारी या मामला दर्ज होने की पुष्टि नहीं हुई है. इसलिए वायरल वीडियो के बारे में सावधानी बरतने की दिशा में कहा जा रहा है.0
0
Report
शिवसेना बनाम भाजपा: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी घमेळ कुणाचा?
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरची जिल्हा बँक निवडणूक चांगलीच गाजली, शहरातील नेते निवडणुकीत सहभागी झाले आणि निवडणूक जिंकली; शिवसेनेने नऊ जागा जिंकलेल्या तर भाजपने सहा जागा आल्या, त्यामुळे अध्यक्ष कोण याबद्दल चर्चा सुरू झाली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष पदावरून भाजपा शिवसेना आमने-सामने आले. भाजपा-शिवसेना दोन्ही पक्षात अध्यक्षपदासाठी दावा करू लागले. अंबादास दानवे (उबाठा) आणि काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्या हातात झुकणारी स्थिती दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरची औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक यावेळी वजनदार नेत्यांच्या प्रतिष्ठेमुळे चांगलीच गाजली; मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाठ, खासदार संदीप भुमरे, आमदार प्रशांत बंब, आमदार सतीश चव्हाण यांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली. निवडणुकीत शिवसेनेच्या पदरी नऊ जागा आल्या तर भाजपच्या पदरी सहा जागा आल्या; म्हणून आपसातच एकमेव संतुलन राखण्यासाठी अपक्षांनी तीन जागा मिळवल्या, आता शिवसेनेसोबत ते नऊ जागांचे समान वाटीकरी झाले आहेत. त्यामुळे भाजपही अध्यक्षपदाच्या दाव्यास सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे. आमचे 9 सदस्य आधी निवडून आले असल्याने आमचा दावा पक्का असल्याचे संजय शिरसाठ यांनी सांगितले. पुढील गोंधळ महालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीप्रमाणेच या जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निर्णयातही केंद्रित होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तेत भागीदार असलेल्या भाजप-शिवसेना द्वंद्वात सध्या वाद स्पष्ट दिसत आहे.0
0
Report
Advertisement
अंबोली में बाढ़ में फंसे चार किसान सुरक्षित बाहर निकलें; रेस्क्यू टीम ने बचाव किया
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग ब्रेकिंग आंबोलीत पुराच्या पाण्यात अडकलेल्या चार शेतकऱ्यांना जीवदान. आंबोली नांगरतासवाडी परिसरात भात लावणीसाठी गेलेले चार शेतकरी अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात अडकले. सह्याद्री एडवेंचर रेस्क्यू ग्रुप आंबोली-सांगली च्या पथकाने तत्परतेने घटनास्थळी धाव घे awak चारही जणांना सुखरुप बाहेर काढले.0
0
Report
कागल में नया स्मार्ट मीटर अचानक आग लगा खाक, लोगों ने हटाने की मांग उठाई
Kolhapur, Maharashtra:राज्यभर स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे काम सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील नानीबाई चिखली येथे नव्याने बसवलेल्या स्मार्ट मीटरने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेत मीटर पूर्णपणे जळून खाक झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गावातून स्मार्ट मीटर हटविण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. कागल तालुक्यातील नानीबाई चिखली येथे महावितरणकडून महिनाभरापूर्वी एका घरावर स्मार्ट वीज मीटर बसविण्यात आले होते. मात्र, अचानक या स्मार्ट मीटरमधून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच मीटरने पेट घेतला. या आगीत नवीन स्मार्ट मीटर पूर्णपणे जळून खाक झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनेची दखल घेतली असून, मीटरला आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू करण्यात आला आहे.0
0
Report
देवगड के साळशी गांव में भल्ली भल्ली भावई उत्सव: मिट्टी और पानी की मस्ती
Oras Bk., Maharashtra:देवगड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साळशी गावात 'भल्ली भल्ली भावई' हा वार्षिक उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात पार पडला. गेले काही दिवस पावसाने दडी मारल्याने मोटर पंपाद्वारे विहिरीत पाणी उपसा करून सर्वत्र चिखल करून त्यात खेळण्याचा आनंद सर्वांनी लुटला. आषाढी महिन्याच्या कर्क संक्रांतीच्या दिवशी भावई या उत्सवाने या देवीच्या उत्सवाला प्रारंभ होतो पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या उत्सवाला खरी रंगत येते. भात शेतीच्या कामातून वेळ काढत गावकरी मंडळी अतिशय आनंदाने आणि भक्तिमय वातावरणात या उत्सवात सामील होतात या दिवशी सकाळी श्री देवगांगो, श्री देव वशिक तळखंबा व श्रीदेवी पावनाई या देवतांना नैवेद्य दाखवीला जातो त्यानंतर दुपारी गावातील सर्व बारा पाच मानकरी, ग्रामस्थ भावई या ठिकाणी जमा होतात व ढोल ताशांच्या गजरात एकमेकांवर चिखल फेक आणि पाण्याचा मारा करीत या उत्सवाला प्रारंभ होतो. हा चिखल फेक उत्सव सुरू असताना कोणीही कुणावर रागवत नाही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्व गावकरी हा कार्यक्रम पारपाडतात. अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने ऐतिहासिक साळशी गावात दरवर्षी आषाढी महिन्याच्या कर्क संक्रांतीच्या दिवशी भल्ली भल्ली भावई हा उत्सव संपन्न होतो.0
0
Report
Advertisement
जामीन मिलने के बाद IMA की आक्रामक प्रतिक्रिया; अस्पताल 24 घंटे बंदी की चेतावनी
Kalyan, Maharashtra:शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मिळाल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन आक्रमक. डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील रुग्णालयांचा सोमवारपासून २४ तासांचा बंदचा इशारा. रमेश म्हात्रे यांच्या विरोधात पक्षांतर्गत कारवाई अद्याप नाहीच. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या 3 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर रमेश म्हात्रे यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आक्रमक भूमिका घेतली आहे. डॉक्टरांवरील हल्ल्याच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतरही रमेश म्हात्रे यांच्यावर पक्षाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याबद्दल असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भातील कायदा अधिक कठोर करण्यात यावा आणि इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी डॉक्टर सोमवारपासून २४ तास सेवा बंद ठेवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या काळात आपत्कालीन आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहेत.0
0
Report
भाजपा के अंदरूनी वाद के बीच अविश्वास प्रस्ताव नगराध्यक्ष के विरुद्ध पास
Shirdi, Maharashtra:भाजपतील अंतर्गत वाद आला समोर... अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्षावर अविश्वास ठराव मंजूर... भाजपच्या साथीला शिवसेना व राष्ट्रवादी... भाजपचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्या विरोधात सत्ताधारी आणी विरोधकांनी आणला अविश्वास ठराव.. 17 पैकी भाजपचे 4 आणी काॅग्रेसचा 1 नगरसेवक गैरहजर.. अविश्वास ठरावाच्या बाजूने भाजपचे 8 , शिवसेनेचे 2 तर राष्ट्रवादीच्या 2 जणांचे मतदान.. 12 /0 मतांनी अविश्वास ठराव मंजूर... नगरसेवकांशी असलेला असमन्वय आणी विकासनिधीमुळे होती नाराजी... भाजपच्या नगरसेवकांचीच होती हटवण्याची मागणी...0
0
Report
जालना में बारिश के संकट के बीच किसान कृत्रिम वर्षा की मांग कर रहे हैं
Jalna, Maharashtra:जालना |ब्रेकिंग | जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड मंठा शिवारात कपाशीला तांब्याने पाणी कृत्रीम पाऊस पाडण्याची शेतकऱ्यांची मागणी अँकर- जालना जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडला असून पिके वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत.. मंठा भागात कपाशीला शेतकरी तांब्याने पाणी देऊन पिक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात पावसाने हजेरी लवली होती. त्यामुळं शेतकऱ्यांनी खरीप पिकांची लागवड केली. मात्र त्यानंतर पावासाने मोठी दडी मारली असून सोयाबीन कपाशीसह बाजरी पिके धोक्यात आली आहे. त्यामुळं येत्या आठ दिवसात पाऊस पडला नाही तर पिके जळून जाण्याची भिती आहे. त्यामुळं कृत्रीम पाऊस पाडावा किंवा सरकारने पेरणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीये.0
0
Report
Advertisement
बीड़ के आश्रम स्कूल में संचालक पर महिला कर्मी के शोषण, वेतन रोकना—वीडियो वायरल
Beed, Maharashtra:ANC- बीड जिल्ह्यातील एका आश्रमशाळेच्या संस्थाचालकाविरोधात महिला कर्मचाऱ्याच्या शोषणाचे गंभीर आरोप समोर आले आहेत. शाळेतील कामासोबतच घरातील धुणी-भांडी, साफसफाई आणि शेतातील मजुरी करण्यास भाग पाडल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. एवढेच नाही, या कामांना नकार दिल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून वेतन रोखल्याचाही दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी शासकीय कार्यालयात गेलेल्या महिलेच्या पतीला संस्थाचालकाने अधिकाऱ्यांसमोरच शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे बीडमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. सुरेखा चव्हाण यांनी संस्थाचालक तथा सचिव दिनेश लाला पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शाळेतील नियमित कामाव्यतिरिक्त त्यांच्या घरी धुणी-भांडी, फरशी पुसणे, झाडलोट करणे, तसेच शेतात खुरपणी आणि कापूस वेचणीसारखी कामे करण्यास भाग पाडले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. या अतिरिक्त कामांना नकार दिल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून वेतन रोखण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला आहे. रोखून ठेवलेल्या वेतनाबाबत विचारणा करण्यासाठी सुरेखा चव्हाण या पती सतीश राठोड यांच्यासह इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक कार्यालयात गेल्या होत्या. त्यावेळी संस्थाचालक दिनेश पवार यांनी अधिकाऱ्यांसमोरच दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर कार्यालयाबाहेर सतीश राठोड यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली. आणि जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये धक्काबुक्की आणि वादाचे दृश्य दिसून येत आहेत. पीडित दाम्पत्याचा आणखी दावा असा आहे की, नोकरी देताना यापूर्वी लाखो रुपये घेतल्यानंतरही आता पुन्हा पैशांची मागणी केली जात आहे. पैसे देण्यास नकार दिल्यास राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचाही त्यांनी दावा केला आहे. तसेच संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांकडूनही घरगुती आणि शेतातील कामे करून घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सतीश राठोड यांच्या तक्रारीवरून बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिनेश लाला पवार यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. शासकीय कार्यालयात घडलेल्या या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले जात असून, कायद्यानुसार आवश्यक ती कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी दिली. आश्रमशाळेतील महिला कर्मचाऱ्यांकडून शाळेच्या कामाऐवजी घरगुती आणि शेतातील कामे करून घेतल्याचे आरोप, सहा महिन्यांचे वेतन रोखल्याचा दावा आणि त्यानंतर शासकीय कार्यालयात झालेली कथित मारहाण, या सर्व घटनांमुळे संबंधित संस्थेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दुसरीकडे, संस्थाचालकांनी सर्व आरोप फेटाळले असून हे आपल्याविरोधातील षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणातील पोलीस तपास आणि पुढील कायदेशीर कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
पालकमंत्री के कार्यक्रम में सुरेश खाडे ने पलट दिया चेहरा, मिरज में उभरी चर्चाएं
Sangli, Maharashtra:सांगलीच्या मिरजेत शास्त्रीय रुग्णालयातल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमाकडे मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी पाठ फिरवल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मिरज शासकीय रुग्णालयाच्या विविध सुविधांचा लोकार्पण सोहळा पार पडला, मात्र या कार्यक्रमाकडे सुरेश खाडे यांनी दांडी मारली होती, विशेष म्हणजे पालकमंत्र्यांच्या कार्यक्रम संपल्यावर काही वेळानंतरच आमदार सुरेश खाडे यांनी मिरजेमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे मिरजेत उपस्थित असून देखील सुरेश खाडे हे पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याची चर्चा सध्या मिरज शहरासह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहू शकले नव्हते, त्यामुळे सुरेश खाडे हे नाराज होते, या नाराजीतून त्यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांच्याच मतदारसंघातल्या शासकीय रुग्णालयाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याची चर्चा देखील रंगली आहे.0
0
Report
संदीप राजपूत आत्महत्या मामले में दोषियों पर कार्रवाई की मांग शिरपूर में प्रदर्शन
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील शिरपूर शिरपूर येथे संदीप राजपूत आत्महत्या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत शिरपूर शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी "न्याय द्या... संदीप राजपूतला न्याय द्या" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. संदीप राजपूत यांनी कंपनीच्या कथित जाचाला कंटाळून तापी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत काही व्यक्तींवर गंभीर आरोप केले होते. चोवीस तास उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याने आंदोलन तीव्र झाले. अखेर पोलिसांनी तीन दिवसांत चौकशी पूर्ण करून योग्य ते कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.0
0
Report
Advertisement
