icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मुंबई-गोवा महामार्ग के पूर्ण होते ही गड्ढों की समस्या, ठेकेदार पर गंभीर आरोप

Chendhare, Maharashtra:गेल्या 14 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्णत्‍वाच्या प्रश्न अद्याप कायम असतानाच, पूर्ण झालेल्या भागांमध्येच तडे आणि भेगा पडू लागल्या आहेत. लोणेरे ते दासगाव दरम्यानच्या टोळ गावानजिकच्‍या उड्डाण पुलावर खराब झालेल्या रस्त्याचे दुरुस्ती काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या भागात जेसीबीच्या सहाय्याने खराब झालेला काँक्रीटचा थर काढून नव्याने काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. मात्र, अवघ्या दोन वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या या कामातच मोठ्या प्रमाणावर तडे आणि भेगा पडल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांच्या मते, सुरुवातीपासूनच कामात हलगर्जीपणा आणि निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर झाल्याची चर्चा सुरू आहे. परिणामी, महामार्ग पूर्ण होण्याआधीच दुरुस्तीची वेळ आल्याने संबंधित कंपनी आणि ठेकेदारांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
0
0
Report

नितीन गडकरी नागपूर भाजपा स्थापना दिवस मौके पर सेकुलरिज्म और हिंदुत्व पर बोले

Nagpur, Maharashtra:नागपूर भाजपा स्थापना दिवसाच्या निमित्ताने टिळक पुतळा येथे झालेल्या समारंभातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री भाषण नागपूर आजच्या दिवस आमच्यासाठी आणि खूप भाग्यशाली दिवस आहे. आजपासून 40 वर्षे आधी संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली होती त्यावेळी देशात 30 जागेवर मोठे मोठे कार्यक्रम झाले होते. आजच्या दिवशी 40 वर्षे आधी न्यू इंग्लिश महाल मध्ये नागपूरला राम जेठवानाजी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या स्थापना झाली होती असे वीस जागी अनेक नेता त्या त्या ठिकाणी गेले होते. ते जे कार्यक्रम झाले होते त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्याबाबत, संविधानाच्याबाबत आणि उद्दिष्टाबाबत चर्चा झालेली होती. त्यानंतर मुंबई बांद्रा येथे अधिवेशन झालेल होत. त्यामध्ये मोहम्मद करिम शागला हे प्रमुख पाहुणे होते. ते त्यावेळी बोलले होते की देशाच्या भविष्यतील जबाबदारी ज्या पक्षावर येणार आहे आणि ज्यांचा पंतप्रधान बनणार आहे त्यांच्यासोबत मी आज इथे उपस्थित आहे हे माझा भाग्य आहे. शागला यांनी म्हटलेलं होतं ते खरं झाल. अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झाले. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या भाषणात चांगली गोष्ट सांगितली हो. ती ते आज सुद्धा मनात आठवण आहे. अंधेरा छटेगा सूरज निकलेगा और कमल खिलेगा। मला वाटतं की त्यांची भविष्यवाणी आज सिद्ध झालेली दिसतेय. पक्षाची स्थापना कुणा व्यक्तीला प्रधानमंत्री बनवण्याकरता नव्हती झाली। अटल बिहारी म्हणत होते देशातला पंतप्रधान कोण होणार हा महत्वपूर्ण नाही तर हा देश कसा असणार हे महत्वपूर्ण आहे. त्याला घेऊन आम्ही चाळीस वर्षे काम करतोय. अनेक उद्दिष्ट आम्ही पूर्णत्वास नेले. येणाऱ्या काळात चाळीस वर्षात आणि त्याच्या आधीपण आमचे जे विरोधी होते त्यांनी जहर घोळण्याचे काम केलं. मात्र आमचा पक्ष जातीवादी, सांप्रदायिक नाही. आमची पार्टी कोणत्या धर्माविरोधी नाही, आमचा पक्ष मानतो की समाजात उपासना वेगवेगळी आहे. कोणी मंदिरात जात असेल कोणी मस्जिद वाव गुरुद्वारा जात असेल. प्रत्येकाला अधिकार आहे. ज्याच्यावर त्याची विश्वास आहे त्याची पूजा करणे. मात्र वेगवेगळ्या पूजा करून आपण भारतीय आहोत. आमचचा इतिहास सांस्कृतिक विरासत एक आहे. अब्दुल रहमान अंतुले आमचे मुख्यमंत्री होते. एकदा त्यांनी मला सांगितले की मी कोण आहे कोकणस्थ ब्राह्मण असल्याचे त्यांनी सांगितले आणि माझे नाव करंदीकर आहे मात्र त्यावेळी आमच्या हिंदू धर्माने अशा चुकीच्या प्रथा होत्या. कोंबडी खाल्ल्यानंतर बाकीचा पार्ट कोणाच्या घराबाहेर टाकल्या की तो गेला असे म्हणत सात समुद्र पार गेला तर त्याला हिंदू धर्मातून काढून घ्यायचे... काही पंडितांनी, आणि ब्राह्मणांनी चुकीच्या बाबींमुळे नुकसान केले अस्पृश्यता, जातीयता नव्हती ना आम्ही ती मानतो. आम्ही एवढेच म्हणतो कोणताच व्यक्ती जात धर्म पंथ यामुळे नव्हे तर त्याच्या गुणांमुळे मोठा होतो. त्यामुळेच आज आमच्या बाबत चुकीचा प्रचार करण्यात येतो की या जातीचा पक्ष आहे गांधीचे हत्यारे आहेत अल्पसंख्यांकाच्या विरोधात आहे मुसलमानांच्या विरोधात आहे. जावेद अख्तर यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची मुलाखत घेतली होती आणि विचारलं होतं तुमचा पक्ष आल्यानंतर सेक्युलरवाद संपेल का मुसलमानांना या देशातून बाहेर काढणार? तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी उत्तर दिले होते की हा देश सेक्युलर आहे आणि सेक्युलर राहणार. सेक्युलर राहणार त्याकरता भाजपा किंवा आरएसएस कारण नसेल कारण या देशातील बहुसंख्य हिंदू समाजाचे इतिहास संस्कृती विरासत यांच्यातील जी सर्वसमावेशकता आहे ती भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे कोणत्याच धर्मावर अन्याय होणार नाही. मात्र त्याचा इंटरप्रिटेशन अनेकदा चुकीचे केले जाते त्यामुळेच आपल्याला भारतीयत्व म्हणजेच आपण ज्याला राष्ट्रीयत्व म्हणतो तेच हिंदुत्व आहे हिंदू हे जात, धर्म, पंथ नव्हे सुप्रीम कोर्टाने डेफिनेशन केली आहे वे ऑफ लाइफ जीवनपद्धती आहे सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्षता हा अर्थ होत नाही त्याचा अर्थ सर्व धर्म समभाव आहे एक बाब नक्की आहे सरकार सेक्युलर असली पाहिजे राजा सेक्युलर असला पाहिजे व्यक्ती कधी धर्मनिरपेक्ष राहू शकत नाही असते तर राजीव गांधी आणि Indira गांधींच्या मृत्यूनंतर ब्राह्मणांना बोलवून मंत्रागनी करण्यात आले तर ते सेक्युलर होते तर त्यांनी कशाला ब्राह्मणांना बोलावले कारण त्यांच्यासोबत धर्म जोडलेला आहे. स्वीकारत होते. सर्व धर्म समभाव हा आमचा अर्थ आहे सर्व धर्माचा सन्मान करायचा आहे आणि आमची राष्ट्रीयत्व हे भारतीयत्व आहे. आमचा मुसलमान मक्का, मदीना जातो त्याला हिंदी मुसलमान है असं म्हणतात इंग्रजांनी आपल्या संस्कृती आणि इतिहासबाबत चुकीच्या बाबी भरवल्या त्यामुळे आपल्याला जो अप्रचार झाला जातीयवादी आहे मुसलमान विरोधी आहे हे जे आरोप होतात ते चुकीचे आहेत. भाजपमध्ये कोणतंही चांगले कार्य झाले की असे नाही म्हटत परिवाराचे, जातीचे कल्याण व्हावे आम्ही म्हणतो विश्वाचे कल्याण व्हावे हीच भारतीय संस्कृती आहे आणि याचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे. तुम्ही कधी शिवाजी महाराजांच्या इतिहासात पाहिले आहे का एकातरी मशिदीला तोडून मंदिर बनवले महिलांच्या बाबतीत नेहमीच आदर आणि सन्मान ठेवले. पाणी, रोजगार मिळो असा भारत घडवायचा आहे मी त्यांना फक्त निवडणुका दिसतात आमचं काय होणार मला एक संधी हवी मात्र आम्ही यांना संधी देण्याकरता नाही समाज बदलवण्याकरता आलो आहे देशाला बदलावयाचे आहे ईमानदारीने काम केले तर संधी मागण्याची गरजच नाही जनता तुमच सपोर्ट करेल चाळीस वर्षात बरेच कार्य झाले मात्र पुढे अजून बरेच काम करायचे आहे नेतृत्वाच्या पोटातून नेते नको
0
0
Report

वासिम में पाइपलाइन टूटने से पानी बर्बाद, आपूर्ति 15–20 दिन में संभव

Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:एकबुर्जी धरणातून वाशीम शहराला पाणीपुरवठा केला जात असला तरी धरणातील जलपातळी कमी झाल्यामुळे शहरात१५ ते २० दिवसांनीच नळ सोडले जात आहेत.त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.अशातच शहरातील पोस्ट ऑफिस चौक परिसरात पाईपलाईन फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. सध्या शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांदरम्यान निष्काळजीपणामुळे पाईपलाईन ला फुटल्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याचे दिसून येत आहे.एकीकडे पाण्यासाठी नागरिकांना दिवसन्‌दिवस प्रतीक्षा करावी लागत असताना, दुसरीकडे होणारी ही नासाडी संताप वाढवणारी ठरत आहे.त्यामुळे या पाईपलाईनची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली जातं आहे.
0
0
Report
Advertisement

प्रणिती शिंदे शहराध्यक्ष बनने पर विचार कर रहीं, बारामती में नया राजनीतिक उलटफेर?

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : खा. प्रणिती शिंदे h्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचा विचार करतात आणि तुम्ही त्यांना शहराचा अध्यक्ष करणार का ? असे म्हणत मंत्री जयकुमार गोरेंचा खा. प्रणिती शिंदेंना टोला बारामती पोटनिवडणूक - बारामतीतून सुनेत्रा वहिनी यांना बिनविरोध निवडून द्यावे ही आमची भावना.. - काँग्रेस पक्षाने काय करावं, हा काँग्रेस पक्षाचा विषय आहे. - सातत्याने संस्कृती शिकवणारा काँग्रेस पक्ष, स्वतः आचरण करण्याच्या जेव्हा गोष्टी येतात त्यावेळेस दुसरी भूमिका घेतो. - बारामतीत सुनेत्रा वहिनी बिनविरोध होतील अशी स्थिती आहे - मात्र जरी बिनविरोध झाल्या नाहीत तरी निवडून येण्यात काहीही अडचण नाही. - साधारण संकेत असतात एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर तिथली निवडणूक बिनविरोध व्हावी. - संविधानामध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार दिला आहे त्यामुळे प्रत्येक जण आपला निर्णय घेण्यासाठी सक्षम असतो. ऑन प्रणिती शिंदे शहराध्यक्षपद - राष्ट्रीय नेत्यांना तुम्ही कुठे कुठे आणणारे आहात, मला माहिती नाही. - प्रणिती शिंदे h्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचा विचार करतात आणि आता तुम्ही त्यांना शहराचा अध्यक्ष करणार का? - कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्यांनी अध्यक्ष व्हावं तर त्यांनी विचार करावा. ऑन विजयकुमार देशमुख जाहिरात - प्रत्येक आमदाराने आपल्या कार्यालयात पक्षाचा वर्धापन दिन साजरा करावा हा संकेत आहे. - संविधानाने त्यांना अधिकार दिला आहे. कोणाचा फोटो कुठे घालावा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जाहिरातीच बिल त्यांनी पेड केला आहे. - प्रोटोकॉल हा ज्यांनी खर्च केला आहे त्याचा अधिकार आहे..
0
0
Report

राहुरी विधानसभा चुनाव: अक्षय कर्डिले के खिलाफ महाविकास आघाड़ी कौन उतारेगी?

Ahilyanagar, Maharashtra:राहुरी विधानसभा उमेदवारी राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून अक्षय शिवाजी कर्डिले यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारीची चर्चा असताना अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही प्राजक्त हे अपक्ष उमेदवारी करणार असल्याची चर्चा आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून प्राजक्त यांनी उमेदवारी घेतली नाही तर माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते यासोबतच शिवसेना यु बीटी कडून अहिल्यानगर उत्तर विभागाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी देखील उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील काँग्रेसचा उमेदवार असेल असं विधान केलेलं आहे त्यामुळे भाजपाच्या अक्षय कर्डिले यांच्या विरोधात महाविकास आघाडी एकत्रित उमेदवार मैदानात उतरवतात की मव्यामधील तीनही पक्ष आपले उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतात हे अवघ्या काही तासातच कळणार आहे
0
0
Report

चंद्रपूर के भटाड़ा-मेवाड़ पुरातत्त्व स्थल खनन से खतरे में; हाईकोर्ट समिति ने किया निरीक्षण

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील भटाडा-मेवाडचा प्रागैतिहासिक पुरातत्त्व स्थळ अनियंत्रित खाणकामामुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नियुक्त केलेल्या विशेष समितीने परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. भटाडा-मेवाड ही स्थलें पाषाणयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे महत्त्वपूर्ण पुरावे जपणारी मानली जातात. येथे अशूलियन प्रकारातील दगडी कुऱ्हाडी, स्क्रॅपर आणि चॉपर यांसारखी हत्यारे मोठ्या प्रमाणात आढळून आली आहेत. त्यामुळे हा परिसर मानवी उत्क्रांतीच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. गेल्या काही वर्षांत वाढलेल्या खाणकामामुळे जमिनीचे नैसर्गिक थर उध्वस्त होत आहेत, ज्यामुळे पुरातत्त्वीय अवशेषांचे मूळ संदर्भ नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. संशोधनासाठी आवश्यक असलेली महत्त्वपूर्ण माहिती कायमची नष्ट होण्याची भीती व्यक्त केली गेली आहे. उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला असून, नियुक्त समितीने प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीची नोंद केली आहे. समितीचा सविस्तर अहवाल लवकरच न्यायालयात सादर होणार असून, त्यानंतर खाणकामावर निर्बंध लावण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
0
0
Report
Advertisement

डिंभे धरण क्षेत्र में साग की अवैध कटाई, वन संसाधन खतरे में

Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण परिसरात सागाच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर बेकायदा वृक्षतोड होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भीमाशंकर अभयारण्याच्या खालच्या भागातील या जंगल परिसरात नियमांना धाब्यावर बसवत झाडे तोडली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. डिंभे धरणालगतच्या जंगलामध्ये रात्रीच्या वेळी सागाची झाडे तोडून त्याची तस्करी केली जात असल्याची माहिती स्थानिकांकडून समोर आली आहे. हा परिसर पेसा क्षेत्रात मोडत असल्याने कोणतीही वृक्षतोड करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. तसेच अधिकृतपणे तोडलेल्या झाडांवर वन विभागाचा हॅमर म्हणजे अधिकृत शिक्का मारणे बंधनकारक असते. मात्र समोर आलेल्या दृश्यांमध्ये अशा कोणत्याही परवानगीशिवाय सागाची झाडे तोडली जात असल्याचे दिसून येत आहे. डिंभे धरण परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याने वनसंपत्तीला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान या प्रकरणात वन विभाग नेमकी काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

चंद्रपूर के मामा मेल नामक बाघ ने दिन के उजाले में गाए को खींचा — Highway पर Viral वीडियो

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर-मूल महामार्गावर "मामा मेल" वाघाच्या शिकारीचा थरार, भर दिवसा महामार्गावरून ओढत नेली गाईची शिकार, व्हिडीओ वायरल अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर-मूल महामार्गावर "मामा मेल" वाघाच्या शिकारीचा थरार बघायला मिळालाय. त्याने भर दिवसा महामार्गावरून गायीची शिकार ओढत नेली. रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी हे दृश्य मोबाईल कॅमेरात कैद केले. मामा मेल या अतिशय प्रसिद्ध वाघाचा अधिवास मुल- चंद्रपूर महामार्गावरील मामला परिसरात आहे. आगडी भागात काल महामार्गाच्या बाजूला त्याने गाईची शिकार केली आणि शिकारीवर ताव मारला. त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांनी त्या ठिकाणी मोठी गर्दी केली. त्यामुळे मामा मेलने आपली शिकार महामार्ग ओलांडून जंगलाच्या आत नेली. मामा मेल च्या या थरारक शिकारीचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. --------वाघ हल्ला वायरल व्हिडीओ------
0
0
Report
Advertisement

Shirdi land case: Suspects' police remand ends, court hearing may reveal big disclosures

Shirdi, Maharashtra:शिर्डीतील जमीन गैर व्यवहारातील आरोपींची आज पोलिस कोठडी संपणार... शिर्डी पोलिस करणार दुपारी न्यायालयात हजर... दोघा आरोपींकडून चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासे उघड झाल्याने आणखी पोलिस कोठडी मिळावी , शिर्डी पोलिस करणार न्यायालयाकडे मागणी... समता आणि जगदंबापतसंस्थेत अशोक खरात नोमिनी असलेल्या 132 खातेधारकांची चौकशी सुरू... चौकशीत धक्कादायक खुलासे समोर , आम्ही कधीही पतसंस्थेत खाता उघडायला गेलो नाही आम्हाला याबाबत काहीच माहित नाही ; खातेदारांची पोलिस तपासात माहिती... शिर्डी पोलिसांकडून 19 खातेदारांची चौकशी... मुंबईतील दिनेश परब यांनी अशोक खरातवर केला राहता पोलिसांत गुन्हा दाखल.. समता पतसंस्थेच्या मॅनेजरवरही गुन्हा.. या प्रकरणात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता... बनावट अकाउंट उघडून कोट्यावधीचा व्यवहार झाल्याने ED कडून देखील आर्थिक व्यवहारांचा तपास होणार.. कुठल्याही क्षणी कल्पना खरातला अटक होण्याची शक्यता , विश्वसनीय सूत्रांची माहिती... दोन आरोपींना आज पोलीस कोठडी मिळणार का..? पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आणखी काय धक्कादायक खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं...
0
0
Report
Advertisement

सोलापूर BJP प्रचार अभियान से मंत्री गोरे का फोटो हटाने पर आंतरिक विवाद उभरा

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : भाजपा स्थापना दिनानिमित्त देण्यात आलेल्या जाहिरातीतून पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा फोटो गायब - भाजप स्थापना दिनानिमित्त दिलेल्या जाहिरातीत पालकमंत्री जयकुमार गोरेंचा फोटो वगळला - आमदार विजयकुमार देशमुखांनी दिलेल्या जाहिरातीतून पालकमंत्री गोरेंचा फोटो वगळला - पालकमंत्री गोरे आणि भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर - विशेष म्हणजे या जाहिरातीत सोलापूरच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांचा फोटो वगळला - भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख दोघेही ध्वजारोहणाला अनुपस्थित
0
0
Report

उमेश खताते शिंदे गट में प्रवेश करेंगे; ठाकरे गट को बड़ा झटका

Ratnagiri, Maharashtra:ब्रेकिंग चिपळूणात 'उबाठा'ला खिंडार; युवासेनेचे आक्रमक नेते उमेश खताते उद्या शिंदे गटात!.. उमेश खताते यांचा 'धनुष्यबाण' हाती घेण्याचा निर्णय;खेर्डी परिसरात राजकीय खळबळ.. उद्धव ठाकरेंची साथ सोडत उमेश खताते यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश!.. रत्नागिरीतल्या चिपळूणमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून,युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख आणि सक्रिय नेते उमेश खताते हे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत.. उमेश खताते हे केवळ राजकारणातच नव्हे,तर समाजकारणातही अत्यंत सक्रिय आहेत.त्यांनी आजवर अनेक स्थानिक प्रश्न आक्रमकपणे मांडून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे.. विशेषतः खेर्डी परिसरातील पक्ष संघटना मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो. उद्या मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.. खताते यांच्या या निर्णयामुळे रत्नागिरीच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top