icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कोल्हापुर में देवेंद्र फडणवीस का पुतला जलाने के विरोध में आंदोलन, पुलिस से झड़प

Kolhapur, Maharashtra:गृहमंत्री देवेंद्र फडणवीस और शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात करण्यात आलेल्या आंदोलनात आंदोलक आणि पोलिसांची जोरदार झटापट पाहायला मिळाली. पुरोगामी संघटनांच्यावतीने शहरातील बिंदू चौकात आमदार संजय गायकवाड यांच्यावर दखलपात्र पुन्हा दाखल न करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात आंदोलन पुकारलं होते. या आंदोलनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळण्यात येणार होता. त्यामुळे सकाळपासूनच पोलिसांनी बिंदू चौकात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तरीही आंदोलकांनी बिंदू चौकात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतीकात्मक सुद्धा आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी पुतळा आणलेल्या कार्यकर्त्यावर झडप टाकून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलन आणि पोलिसात जोरदार झटापट पाहायला मिळाली.. यावेळी पोलिसांनी पुतळा काढून घेऊन आंदोलन करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असताना पोलिस अशा पद्धतीने बाळाचा वापर करत असतील तर ते योग्य नाही अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी मांडली.
0
0
Report

भंडारा में कृषि विक्रेताओं का अघोषित बंद, किसानों को खेती उपकरण खरीद में भारी मुश्किल

Bhandara, Maharashtra:आज पासून कृषी विक्रेत्यांचे बेमुदत बंद भंडारा जिल्ह्यातील कृषी केंद्र हे पूर्णपणे बंद असून याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे. आजपासून संपूर्ण राज्यामध्ये कृषी केंद्र विक्रेत्यांनी बेमुदत बंद फुकारलेला आहे. याचा फटका आता भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. कृषी विक्रेतेना रासायनिक खतासोबत अन्य औषधे घेण्याची तंबी ही रासायनिक खत पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून केली जाते मात्र शेतकऱ्यांना त्या औषधांची गरज नसल्याने त्या औषधी केंद्रात पडून राहतात. याचा आर्थिक भूदड विक्रेत्यांवर पडतो त्यामुळे अशा अनेक मागण्या घेऊन आजपासून कृषी विक्रेतेांनी बेमुदत बंद फुकारला आहे. आता उन्हाळी धान पीक लागवड करण्यात आली असून शेतकऱ्यांना शेतीउपयोगी साहित्य कसे खरेदी करावा असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
0
0
Report
Advertisement

संघमनर में गडगे बाबा के कथित कारनामे: नया वीडियो वायरल, पुलिस मामला दर्ज

Shirdi, Maharashtra:Sangmner News Flash भोंदू राजेंद्र गडगे याचा पुन्हा नवीन व्हिडिओ समोर... भोंदू गडगे याला डायरेक्ट लिव्हरमधलं इन्फेक्शन दिसलं... संगमनेर तालुक्यातील दत्तधामच्या गडगेबाबाचे कारनामे उघड... भोंदू गडगे याने भक्तावर मंत्र टाकला आणि भक्ताला झालेलं इन्फेक्शन खेचून घेतलं... दत्त प्रभूंच्या शक्तीने कमाल केलेली आहे , घरातील सदस्यांच्या मनामधे प्रवेश केलेला आहे आणि मनातील कपाट पूर्णपणे खोललेले आहे , भोंदू गडगे याला भाविकांच्या मनातलं समजलं... भोंदू गडगेयाच्या कारनाम्याचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.... गडगेवर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल... गेल्या नऊ दिवसांपासून गडगे पोलीस कोठडीत... गडगेयाच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता पोलीस चौकशीच्या रडारवर.... संगमनेर तालुका पोलीस गडगेयाची आणखी पोलीस कोठडी मागणार... कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष....
0
0
Report

कृषि विक्रेताओं के हड़ताल से किसानों को बड़ा झटका, दुकाने बंद

Shirur, Maharashtra:राज्यातील कृषी विक्रेते आजपासून बेमुदत संपावर गेले असून राज्यातील जवळपास 85 हजार खते औषधे विक्रीची दुकाने बंद झाल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी कृषी विक्रेत्यांनी हा संप पुकारला असून यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री कृषी मंत्री कृषी आयुक्त आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्यात उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलंय. या संपाचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय याचाच शिरूर तालुक्यातील जांबूत मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी.
0
0
Report

सातारा के मंत्री जयकुमार गोरे ने विरोधियों पर करारा तंज, फलटण की राजनीति गर्म

Satara, Maharashtra:सातरा-सातारंयातील वाईमध्ये झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यात मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी करत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. विशेष म्हणजे, मकरंद आबांच्या बालेकिल्ल्यातूनच त्यांनी फलटणच्या दिशेने राजकीय निशाणा साधत वातावरण तापवलं. जयकुमार गोरे म्हणाले, “मी इथे कोणाची जिरवायला आलो नाही, तर आमच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आलो आहे. पण कोणी उगाच उचकावण्याचा प्रयत्न केला, तर उत्तर देण्याची ताकद आमच्यात आहे.” विरोधकांकडून होत असलेल्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “कोणाच्या नादाला लागू नका. आम्ही कुणाच्या वाट्याला जात नाही, पण आमच्या नादी लागल्यास सोडत नाही.” तसेच, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा दाखला देत टीका करणाऱ्यांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “जेव्हा आमच्यावर अन्याय झाला, तेव्हा कुठे होते हे विचार?” असा थेट सवाल त्यांनी केला. आपल्या राजकीय प्रवासातील संघर्षांचा उल्लेख करत गोरे यांनी सांगितलं की, “सामान्य कुटुुंबातून येऊन संघर्ष करत मी इथपर्यंत पोहोचलो. पण मला अडचणीत आणण्यासाठी अनेक प्रयत्न झाले.” या सभेतून जयकुमार गोरे यांनी फलटणच्या राजकीय नेतृत्वावर अप्रत्यक्षपणे टीका करत पुढील राजकीय समीकरणांची चुणूक दाखवली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
0
0
Report
Advertisement

वाशीम में कृषी विक्रेताओं का अनिश्चित बंद, खरीप के पहले आपूर्ति प्रभावित

Washim, Maharashtra:वाशीम: एकीकडे शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला लागलेला असतानाच राज्य शासनाकडून प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ राज्यातील कृषी साहित्य विक्रेत्यांनी आजपासून बेमुदत बंद पुकारला आहे. या बंदमध्ये वाशिम जिल्ह्यातील तब्बल 1343 कृषी केंद्र संचालकांनी सहभाग घेतला आहे, या मध्ये कंपन्यांकडून रासायनिक खतांच्या पुरवठ्यात लिंकिंग बंद करणे, पर राज्यातून येणाऱ्या अप्रमाणित एच टी बी टी कापूस बियाण्यावर बंदी घालावी ,विक्री करण्यात आलेल्या बियाणे व खतांची तपासणी नापास झाल्यास विक्रेत्यांना दोषी ठरवू नये अश्या अनेक विविध मांगण्यासाठी या संपात जिल्ह्यातील कृषी साहित्य विक्रेते सहभागी झाले आहेत.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में 1503 पद रिक्त, विद्यार्थियों के भविष्य पर प्रश्न चिन्ह

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्हा शिक्षणाचा खेळखंडोबा.. 1503 पदे रिक्त..पदवीधर भाषा शिक्षकांचा भरणा.. रत्नागिरी जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असतानाच प्राथमिक शिक्षण विभागातील रिक्त पदांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.. जिल्ह्यातील मराठी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये रिक्त पदांची आकडेवारी समोर आली आहे ती धक्कादायक आहे.. यामध्ये विज्ञानासारख्या महत्त्वाच्या विषयांच्या शिक्षकांचा तुटवडा आहे तर भाषा आणि समाजशास्त्र विषयांच्या शिक्षकांची संख्या मंजूर पदांपेक्षा कितीतरी अधिक असल्याचे वास्तव समोर आले आहे.. मराठी माध्यमात गणिताच्या 854 मंजूर पदांपैकी केवळ 287 शिक्षक सध्या कार्यरत आहेत..567 जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.. उर्दू माध्यमातही 79 मंजूर पदांपैकी 55 जागा रिक्त आहेत.. विज्ञान शिक्षकांशिवाय ग्रामीण भागातील मुले विज्ञान तांत्रिक शिक्षणात मागे पडण्याची भीती व्यक्त होत आहे..
0
0
Report

खत टंचाई पर राजू शेट्टी का इशारा: खरीफ में खत नहीं मिला तो लूट करेंगे

Sangli, Maharashtra:स्लग - खत टंचाई व वाढलेल्या दराला राज्यकर्त्यांचा नाकारतेपणा जबाबदार, हंगामात खते नाही मिळाली,तर शेतकरी गोडाऊन मधील खते लुटतील,राजू शेट्टींचा इशारा. अँकर - खत टंचाई आणि वाढलेले दर राज्यकर्त्यांचा नाकारतेपणा आहे,अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.केंद्र सरकारचे धोरण खत टंचाई व दरवाढीला जबाबदार असून केंद्र सरकारनेच हा प्रश्न सोडवला पाहिजे, येणाऱ्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना जर खत मिळाली नाही तर तस्करी करून गोडाऊन मध्ये ठेवलेली खत लुटायला आम्ही कमी करणार नाही, असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला आहे,ते सांगलीच्या ईश्वरपूर येथे बोलत होते.
0
0
Report
Advertisement

रवी राणा की तीखी टिप्पणी: विजय वडेट्टीवार को मर्यादा की सीख

Amravati, Maharashtra:विजय वडेट्टीवारांनी पगारापेक्षा जास्त बोलू नये, अशाप्रकारे महिलांना बोलण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही; आमदार रवी राणा यांची वडेट्टीवारांवर जोरदार टीका अँकर :- भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा या सि ग्रेड च्या पॉप्युलर हीरोइन आहे. अशी टीका काही दिवसाआधी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती त्यांच्या या टीकेला रवी राणा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे त्यामुळे वडेट्टीवार विरुद्ध राणा हा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. आमदार रवी राणा हे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर चांगलेच भडकले आहे. विजय वडेट्टीवारांना काँग्रेसचा जेवडा पगार देता त्याच्यापेक्षा ते जास्त बोलतात विजय वडेट्टीवार यांनी वायफळ बोलण्यापेक्षा आपल्या मर्यादा मध्ये राहून बोललं पाहिजे त्यांची औकात किती लेवल किती विजय वडेट्टीवार कोण आहे काय आहे हे सगळं मला माहिती आहे असेही राणा म्हणाले आहे. तुमच्या घरी सुद्धा आई, बहिणी आहे महिला बद्दल कसं बोलायला पाहिजे जेवळा पगार भेटतो त्यापेक्षा जास्त विजय वडेट्टीवाराणी बोलू नये वायफळ बोलून आपला कचरा करू नये असा सल्ला रवी राणा यांनी विजय वडेट्टीवार यांना दिला आहे. दरम्यान त्यांची आणि भेट झाली तर त्यांना मि समज देनार महिलांना वेगळ्या प्रकारे बोलणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असे रवी राणा यांनी म्हटले आहे.
0
0
Report

चंद्रपुर के मुख्यमंत्री ग्राम सडक योजना के रस्ते की पोल, 8-थर नकली निर्माण का मामला

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्याची पोलखोल नागरिकांनीच केली आहे. वरोरा तालुक्यातील माढेळी भागात नव्याने निर्मित रस्ता ग्रामस्थ हाताने काढून उखडून काढत आहेत. यामुळे दर्जाहीन कामांचे पितळ उघडे पडले आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत T-06 हा वंध-निलजई- आमडी- नविन सोईट हा सुमारे 14 किमीचा मार्ग बांधण्यात आलाय. या रस्त्यावर बांधकाम विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या फलकावर एकूण 8 थरांचा वापर करून रस्ता बनविण्यात येत असल्याचा उल्लेख आहे. यात 1) मातीकाम 2) दाणेदार उपआधार 3) सिमेंट मिश्रणाचे 2 थर, 4) WMM चा एक थर 5) मुरूम, 6) डांबर प्राईम कोट 7) उष्णमिश्रित डांबर कोटचा समावেশ आहे. मात्र ज्या पद्धतीने हा रस्ता हाताने उखडला जातोय त्यावरून यात फसवणुकीचे 8 थर टाकण्यात Ary आल्याचे लक्षात येत आहे.
0
0
Report

कोकण रेलवे की सभी प्रमुख ट्रेनों की बुकिंग फुल, यात्रियों के लिए कठिन इंतजार

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..कोकण रेल्वे कोकणची वाट कठीण! उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वे हाऊसफुल्ल.. चाकरमान्यांची वेटिंगसाठी धावपळ.. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होताच आता सर्वांना वेध लागलेत ते कोकणच्या सफरीचे! पण जर तुम्हीही यंदा गावी जाण्यासाठी रेल्वे आरक्षणाच्या विचारात असाल,तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.. उन्हाळी हंगामामुळे कोकण मार्गावर धावणाऱ्या सर्व प्रमुख गाड्यांचे आरक्षण आता फुल्ल झाले आहे.. मुंबई ते मडगाव,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मार्गावरील गाड्यांची वेटिंग लिस्ट आता शंभरी पार गेली असून,मे महिन्यापर्यंत एकही जागा रिकामी नसल्याचे चित्र आहे. आरक्षणाअभावी आता चाकरमान्यांना शेवटचा पर्याय म्हणून 'तत्काळ' तिकीटावर अवलंबून राहावे लागत आहे किंवा जादा बसेसचा शोध घ्यावा लागत आहे.. रेल्वे प्रशासनाने काही विशेष उन्हाळी गाड्या जाहीर केल्या असल्या,तरी वाढत्या गर्दीसमोर त्याही अपुऱ्या पडताना दिसत आहेत.त्यामुळे यंदाचा कोकणचा प्रवास प्रवाशांसाठी चांगलाच 'वेटिंग'चा ठरणार आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top