416416
Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक
Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अकोला के मूर्तिजापुर में अंधविश्वास के नाम पर बच्चों को इलाज देने वाले बाबाजी गिरफ्तार
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावात भोंदू बाबाच्या अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. चेतन मुळे उर्फ गुलालशेश महाराज या बाबाने आजारग्रस्त लहान मुलांना दातात पकडून उपचार केल्याचा प्रकार व्हिडिओतून समोर आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेल्या या बाबाला अखेर अमरावतीतून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.0
0
Report
अहमदपूर में मतिमंद विद्यार्थी पर अमानुष मारहाण: दो शिक्षकों पर मामला दर्ज
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज: अहमदपूरमध्ये मतिमंद विद्यार्थ्याला शिक्षकांकडून अमानुष मारहाण प्रकरणी दोन मारकुट्या शिक्षकांवर गुन्हा दाखल. झी २४ तासच्या बातमीचा दनका… मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होताच संतापाची लाट. अहमदपूर येथील श्री संत ज्ञानेश्वर निवासी मतिमंद विद्यालयात काही दिवसांपूर्वी शाळेतील शिक्षकांकडून एका मतिमंद मुलाला अमानुष मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ZEE २४ तास ने दखल घेत याची बातमी प्रसारित केली होती. अखेर या प्रकरणात आता ZEE २४ तास च्या बातमी नंतर या दोन मारकुट्या शिक्षकावर कारवाई करण्यात आली असून, संबंधित मारकुट्या दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाइकवाडे यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.0
0
Report
महाराष्ट्र में 50 लाख बोगस मतदाताओं का संदेह, बीजेपी ने जांच तेज़ की
Dhule, Maharashtra:राज्यच्या मतदार यादीत किमान 50 लाख बोगस मतदार असल्याचा संशय आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातही एसआयआरची अंमलबजावणी होईल तेव्हा हा प्रकार स्पष्ट होईलच, पण महाराष्ट्र भाजपने यावर स्वतंत्र शोधमोहीम राबवून बोगस मतदारांचा पर्दाफाश केला आहे अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली. धुळे येथे 24 एप्रिलला आमदार अनुप अग्रवाल यांच्यासोबत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की महाराष्ट्रात 50 मतदार संघ असे आहेत, की गेल्या 20 वर्षात तेथील मुस्लिम समाजाच्या मतदारांमध्ये दुप्पट किंवा तिप्पट वाढ झाली आहे. याचाच अर्थ तेथे बाहेरुन आलेल्या मतदारांचा शिरकाव करुन घेण्यात आला आहे. ही चिंताजनक बाब आहे. भाजपने केेलेल्या पाहणीत तेथील मुस्लिम लोकसंख्या 30 हजारांपासून तीन लाखापर्यंत वाढल्याचं दिसून आले. दुसरीकडे हिंदूंची मतदारसंख्या नैसर्गिक 20 टक्के वाढली आहे. ही तफावत मतदार यादीत शिरकाव करण्याचे षडयन्त्र दाखवून देणारी आहे. अशा मतदार संघांमध्ये विशेष निरीक्षक नेमावा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. तीन लाख बोगस जन्म प्रमाणपत्रे आम्ही हुडकून काढली व ती रद्द ठरवली. त्यातही विशिष्ट समुदायाचाच भरणा होता. काही ठिकाणी मुस्लिम मतदार नोंदणी अधिकार्यांनी कट रचून मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये 80 टक्के नोंदी जुळत असल्याचा अहवाल सादर केला असून हिंदूबहुल वस्तींमध्ये मात्र तेच प्रमाण अत्यंत कमी असल्याचा रिपोर्ट दिल्याचा धक्कादायक प्रकारही घडला आहे. धुळे व मालेगाव या दोन्ही मतदार संघात नावे समाविष्ट असून दोन्हीकडे मतदान करणारे 22 हजार मतदार आम्ही शोधून काढले आहेत. त्यांना आता कुठेही मतदान करता येणार नाही यासाठी प्रशासनाकडे यशस्वी पाठपुरावा केल्याचेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.0
0
Report
Advertisement
खेड के कुंडेश्वर के पास अचानक जंगल की आग, वन विभाग ने दम लगा दिया
Khed, Maharashtra:खेड (पाईट ) Anc : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील सह्याद्रीच्या डोंगरांमधील श्रीक्षेत्र कुंडेश्वर या निसर्ग संपन्न डोंगराच्या पायथ्याला आज अचानक मोठा वनवा लागल्याने या परिसरातील निसर्ग वनव्याच्या आगीमध्ये बेचीराख झाला, याबाबतची माहिती कुंडेश्वरी माता गोशाळेच्या वतीने वनविभागाला देण्यात आली यानंतर वनविभागाने घटनास्थळी धाव घेतली वनवाव विझवन्याचे काम केले0
0
Report
चाकण के ज्वेलर्स दुकान में लूट, CCTV में कैद
Chakan, Maharashtra:पुण्यातील चाकण शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. चाकणमधील गजबजलेल्या परिसरातील "खिमत ज्वेलर्स"वर चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकला आहे. या चोरीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, चोरीचा हा सर्व थरार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहू शकता की, चोरटे कशा प्रकारे दुकानात शिरले आणि अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी करत लाखो रूपयांच्या सोन्याची चोरी केलीय.0
0
Report
2016 में 24 गांव जोड़ने के बाद अकोला महानगरपालिका के विस्तार के बावजूद नागरिक नाराज़
Akola, Maharashtra:सन २०१६ में २४ गावांचा समावेश करून अकोला महानगरपालिकेची हद्दवाढ करण्यात आली; मात्र “हद्दवाढ म्हणजे विकास” हे स्वप्न आजही अपूर्णच राहिल्याची तीव्र नाराजी नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. मूलभूत सुविधांचा अभाव आणि वाढते कर यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.हद्दवाढीतील प्रभाग क्रमांक ३, ४, ५, १२, १३ आणि १४ मध्ये आजही पाणीटंचाई, खराब रस्ते, अपुरी स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न कायम आहे. नागरिकांना अपेक्षित असलेल्या सोयीसुविधा मिळालेल्या नाहीत. उलटपक्षी, मालमत्ता करासह विविध करांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांचा रोष अधिकच तीव्र झाला आहे.या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, अकोला पूर्व शहराच्या वतीने गांधी-जवाहर बाग ते महानगरपालिका असा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत आपल्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, नागरिकांच्या या वाढत्या संतापामुळे प्रशासनावर दबाव वाढत असून, आता महानगरपालिका यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
सप्तशृंगी गढ़ मंदिर की चांदी में 22 किलो की कमी, जांच जारी
Nashik, Maharashtra:सप्तशृंगी गडावरील आदिशक्तीची चांदी गायब झाल्याचा दावा... अंमळ अपडेट... देवीच्या साडेतीन शक्ती पीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या श्री सप्तशृंग गडावरील आदिमायेच्या मंदिर गर्भगृहातील चांदीमध्ये २२ किलोची तफावत चौकशीत आढळून आली आहे. मंदिरातील ही २२ किलो चांदी नेमकी कुठे गायब झाली? सध्या कळवण प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्याकडे चौकशी सुरू आहे. १३-१४ किलोचा फरक असल्याचे निष्कर्ष या चौकशेत आढळले आहेत. गेल्या २२ वर्षात चांदीत घट झाली असल्याचा दावा सप्तशृंग गड व्यवस्थापनाने केला आहे. वास्तव्य वजनानुसार ४०६ किलो असलेली चांदी ३८६ किलो झाली असल्याने २२ किलोची तफावत आढळली. विश्वस्तांनी वजन तपासताना ही बाब समोर आली. या प्रकरणी ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष, विश्वस्तांसह संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी झाली आहे. भाविकांनी दान केलेली चांदी मंदिर गाभऱ्यात ठेवली जाते. सन १९९८ ते २०१४ या काळात ४०६ किलो चांदी नसून ३९७ किलो चांदी विश्वस्त मंडळाने गाभाऱ्यात लावली होती; पुढे काहीकाळात ३८३ किलो भरली होती. १३-१४ किलोचा फरक तीन महिन्यांपासून चौकशीत उघड होत आहे. चांदीमध्ये कुठेही अपहार झाला नाही असे ट्रस्टच्या प्रभारी व्यवस्थापक म्हणाले. श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी... दान केलेली चांदी गाभाऱ्यात ठेवली जाते. १४ किलोची तफावत असल्याची तक्रार शंकास्पद. चौकशीमध्ये सत्य समोर येईल. अंतिम निष्कन्न होईपर्यंत चौकशी चालणार आहे.0
0
Report
जगताप धमकी मामले पर नेताओं की संयमित प्रतिक्रिया; आबिटकर बाईट मुद्दे पर जाँच के निर्देश
Kolhapur, Maharashtra:मंत्री प्रकाश आबिटकर बाईट मुद्दे ऑन बीड जिल्ह्यात महिला रुग्ण जमिनीवर बेड मी तिथल्या अधिकारांशी बोललो, संबंधित पेशंटची देखील बोललो, दर महिन्याला जो कॅम्प आयोजित करतात, त्या कॅम्पमध्ये पेशंट संख्या अचानक वाढली, त्यामुळे पेशंटला थोडासा त्रास झाला. डेप्युटी डायरेक्टरांना वस्तुस्थिती काय ? याची चौकशी करायला सांगितले आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी जी कारवाई करावी लागेल ते करायच्या सूचना दिल्या आहेत. On जगताप प्रशांत आंबी धमकी प्रकरण लोकप्रतिनिधी म्हणून अशा घटना होणे बरोबर नाही. हा विषय ज्या पद्धतीने झाला तो अपेक्षित नाही. अशा घटनेबाबत आम्हा मंडळींनी संयमाने जायला हवे. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. प्रत्येकाला मनाप्रमाणे मागणी करण्याची मुभा आहे. सार्वजनिक जीवनात लोकप्रतिनिधी यांनी अतिशय संयमाने गेले पाहिजे. कारण त्यांना साठी सामुदायिक आचारसंहिता असते, त्यामुळे समज द्यायला पाहिजे असं काही नाही. या घटने संदर्भात आमचे मुख्य नेते त्यांच्याशी बोलतील आणि त्यांना सूचना देतील.0
0
Report
शिवाजी महाराज के सम्मान को अडिग रखने की मांग, नेताओं ने माफीनामा जारी किया
Buldhana, Maharashtra:छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान अबाधित ठेवावा. प्रकाशाला केलेल्या अयोग्य शब्दांबद्दल गायकवाडांची दिलगिरी. तर पुस्तकांमधील एकेरी नाव न घेता आदराने घ्या, आणि महाराजांचे एकेरी नाव घेऊन करोडो हिंदूंचा अपमान करू नका. शिवाजी कोण होता या पुस्तिकेचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी फोनवर अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. यांबद्दल त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केलीय. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख नेहमी सन्मानपूर्वकच व्हावा, ही आपली ठाम भूमिका असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. Related पुस्तकातील एकेरी उल्लेखांवर आक्षेप घेत त्यांनी हा विषय वादाचा नसून संस्कार आणि आदराचा असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान, अलीकडील वादात आपल्या तोंडून काही अयोग्य शब्द गेले असल्याची जाणीव व्यक्त करत त्यांनी मनापासून दिलगिरीही व्यक्त केली. तसेच, छत्रपती शिवरायांविषयी निष्ठा आणि सन्मान कायम ठेवत संबंधितांनी योग्य ती दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय. महाराजांचा अपमान करून करोडो हिंदूंचा अपमाना करू नये अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी केलीय.0
0
Report
Advertisement
महिला आरक्षण पर राजनीति तेज, कांग्रेस ने बीजेपी पर प्रचार-झूठ का आरोप लगाया
Akola, Maharashtra:महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापताना दिसत आहे. भाजपकडून “नारीवंदन”च्या नावाखाली दिशाभूल केली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “नारीवंदन” या नावाचा कोणताही उल्लेख संबंधित अमेंडमेंट बिलमध्ये नाही. तरीही भाजपकडून खोटा प्रचार केला जात आहे. 2023 मध्ये महिला आरक्षणाचा कायदा लोकसभा आणि राज्यसभेत सर्वानुमते मंजूर झाला होता, मग आता भाजप हे नाटक का करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्या पुढे म्हणाल्या की, भाजप दुहेरी भूमिका घेत आहे. जर खरंच महिलांना आरक्षण द्यायचं असेल, तर 2023 च्या कायद्याच्या आधारे ते तात्काळ लागू करता येऊ शकते. मात्र भाजप महिलांच्या नावाखाला पुनर्रचना (डिलिमिटेशन) प्रक्रियेला पुढे रेटत आहे. काँग्रेसचा महिला आरक्षणाला विरोध नसल्याचं स्पष्ट करत ठाकूर यांनी सांगितलं की, आरक्षण देण्याआधी संविधानानुसार जातनिहाय जनगणना, पुनर्रचना आयोगाची नियुक्ती आणि त्यानंतर डिलिमिटेशन प्रक्रिया पार पडली पाहिजे.0
0
Report
लासलगाव में लैंगिक शोषण व जादू टोणा के आरोप: भोंदू महेश गिरी निफाड अदालत में पेश किया गया
Yeola, Maharashtra:लासलगाव (नाशिक) :ब्रेकिंग - लैंगिक शोषण व जादू टोणा संदर्भात है लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल... भोंदू महेश गिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला केले निफाड न्यायालयात हजर... निफाड येथील प्रथम वर्ग न्यायाधीश श्रीमती एस.एस. सुक्रे यांच्या समोर केले हजर... सरकारी अभियोक्ता ॲड. मनोज तोरणे यांनी लैंगिक शोषण व जादू टोणा सारखे गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे केले होते युक्तिवाद... 7 दिवसांची तपास कामी पोलीस कोठडीची केली होती मागणी.... 5 दिवसांची भोंदू महेश गिरी उर्फ महेश दिलीप काकडे ला निफाड न्यायालयाकडून पोलीस कोठडी... बाईट:- दिपक पाटील - सहाय्यक निरीक्षक लासलगाव पोलीस ठाणे0
0
Report
टेंबा अस्पताल में 1.65 करोड़ रुपये की एक्सपायर्ड दवाओं का घोटाला; मंत्री ने जांच के आदेश दिए
Mira Bhayandar, Maharashtra:मीरा-भाईंदरमध्ये टेंबा रुग्णालयातील तब्बल १ कोटी ६५ लाखांच्या एक्स्पायरी औषधांच्या कथित घोटाळ्यामुळे खळबळ उडाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज टेंबा रुग्णालयाची अचानक पाहणी करत हा प्रकार उघड केल्याचा दावा केला. २७ मार्च रोजी सक्षम फाउंडेशनमार्फत रुग्णालयात देण्यात आलेल्या औषधांची एक्सपायरी अवघ्या ४८ तासांवर असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे ही औषधे रुग्णालयाने मागवलेली नव्हती. डॉक्टर आणि अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही औषधे वापरण्यास नकार देण्यात आला आणि संभाव्य धोका टळला. या प्रकरणात काही लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आणि दबावाखाली हा प्रकार घडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मंत्री सरनाईक यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देत, “गोरगरिबांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही,” असा इशारा दिला आहे.0
0
Report
Advertisement
चंद्रपुर में आयरन ओर मालढक्का से प्रदूषण बढ़ेगा; विरोध शुरू
Chandrapur, Maharashtra:टायटल: प्रदूषणाच्या क्रमवारीत अव्वल असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आणखी एक मालधक्का, पोलाद निर्मितीसाठी लागणाऱ्या आयर्न ओरच्या वाहतुकीसाठी मूल रेल्वे स्थानकावर हा मालधक्का प्रस्तावित, नगर परिषद और नागरिकांनी सुरू केलाय प्रचंड विरोध अँकर: प्रदूषणाच्या क्रमवारीत अव्वल असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आणखी एक मालधक्का येऊ घातलाय. पोलाद निर्मितीसाठी लागणाऱ्या आयर्न ओरच्या वाहतुकीसाठी हा मूल रेल्वेस्थानकावर हा मालधक्का प्रस्तावित असून, याला नागरिकांनी प्रचंड विरोध सुरू केलाय. व्हीओ १) चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या तालुक्याच्या ठिकाणच्या रेल्वेस्थानकावर रेल्वेकडून मालधक्का प्रस्तावित आहे. प्रारंभी हा मालधक्का तांदळाच्या वाहतुकीसाठी नियोजित होता. मुल तालुका तांदूळ उत्पादक भाग असल्याने त्याची वाहतूक देशात सर्वत्र व्हावी, यासाठी या मालधहक्याचे प्रयोजन होते. मात्र आता वेगळाच घाट घातला जात आहे. मुल रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेरुळाच्या बाजूलाच प्रदूषणात मोठी भर घालणाऱ्या खनिजासाठी हा मालधक्का निर्माण करण्याचे प्रयत्न काही राजकारणी करीत आहेत. सुरजागड इथून उत्खनन केलेल्या लाल रंगाच्या लोहयुक्त दगडांची (आयर्न ओर) वाहतूक देशभरातील लोह निर्मिती प्रकल्पांना करता यावी, यासाठी हा प्रयत्न चाललाय. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भाग या लोहखनिज वाहतुकीने लाल झाले आहेत. नदी नाल्यातील पाणीही लाल होऊन प्रदूषित झाले आहे. यावर पर्यावरणवादी ओरड करीत असतानाच हे खनिज सुरजागड इथून मुलला आणला जाणार आणि रेल्वेने तो देशभर पाठवले जाणार आहे. यासाठी हा मालधक्का प्रस्तावित आहे. मूल नगरपालिका ने एकमताने ठराव घेत हा मालधक्का विरोध केला असून, गरज पडल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा नगराध्यक्षांनी दिला.0
0
Report
राहुरी उपचुनाव: शांत मतदान, स्ट्रॉंग रूम में तीन स्तर की सुरक्षा के बीच ईवीएम सुरक्षा
Ahilyanagar, Maharashtra:राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल शांततेत मतदान पार पडले... या निवडणुकीत सात उमेदवार निवडणूक रिंगणात होते... आता ईव्हीएम मशीन राहुरी महाविद्यालयात बनवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेत...4 मे रोजी मतमोजणी याच परिसरात होणार आहे...ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम परिसरात तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिलीये0
0
Report
अहिल्यानगर में गर्मी से पानी की किल्लत: 43 गांवों में 20 टैंकर
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून अनेक तालुक्यांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. जिल्ह्यात सध्या 43 गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी 20 टँकर सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये पारनेर आणि संगमनेर तालुक्यांमध्ये सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. संगमनेर तालुक्यात 7 तर पारनेरमध्ये 8 टँकर सुरू आहेत. अकोले तालुक्यात 2 आणि नगर तालुक्यात 3 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी टँकर सुरू केले आहेत. नवीन प्रस्ताव प्राप्त होताच त्यानुसार तातडीने कारवाई करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी पंकज अशा यांनी म्हटला आहे. तसेच इतर गावांमधूनही टँकरसाठी प्रस्ताव दाखल होत असून प्रशासनाकडून त्यावर तत्काळ कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.0
0
Report
Advertisement
