icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Vaijapur के युवक को ऑनलाइन शेयर धोखाधड़ी में 6.25 लाख का नुकसान

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANC : शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवत वैजापूरमधील एका तरुणाची तब्बल ६ लाख २५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजगोपाल राजेंद्र गवळी हे खासगी कंपनीत असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. जानेवारी २०२६ मध्ये गुगलवर गुंतवणुकीची माहिती शोधत असताना त्यांना 'बार्कलेज इन्व्हेस्टमेंट बँक'च्या नावाने बनावट वेबसाइटची लिंक मिळाली. त्यानंतर एका महिलेने व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत टप्प्याटप्याने विविध बँक खात्यांमध्ये एकूण ६ लाख २५ हजार रुपय deposito करायला सांगितले. गवळी यांनी ऑनलाईन ही रक्कम भरल्यानंतरही कोणताही परतावा मिळाला नाही. सतर्कतेमुळे पुढील व्यवहार थांबविण्यात आले असून संबंधित रक्कम 'होल्ड' करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वैजापूर पोलीस करत आहेत.
0
0
Report

सातारा: फलटण में दूध मिलावट के संदेह पर FDA ने दबिश; मिलावट के उपकरण और मिक्सर जप्त

Satara, Maharashtra:सातारा: फलटण तालुक्यातील होळ येथे दूध भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली. जनावरांच्या गोठ्यावर छापा टाकला. या कारवाईत बनावट दूध तयार करण्यासाठी वापरले जात असल्याचा संशय असलेले साहित्य आणि मिक्सर जप्त झाले. जप्त साहित्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवालानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत कारवाई केली जाईल. कुणाल भोसले, मंगल भोसले, दिलीप भोसले आणि पावडर पुरवणारे अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया फलटण पोलिस ठाण्यात सुरू होती. छाप्यादरम्यान गोठ्यातून सुमारे ४ किलो औद्योगिक वापरासाठीची व्हे पावडर, ३ किलो नॉन-डेअरी क्रीम पावडर तसेच साहित्य एकत्रित करण्यासाठी वापरला जाणारा मिक्सर जप्त झाला.
0
0
Report

संत ज्ञानेश्वर पालखी लोणंद आगमन के लिए सुरक्षा-तैयारी पूरी की

Satara, Maharashtra:सातारा: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे १५ जुलै रोजी लोणंद नगरीत आगमन होत असून, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधांसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत नीरा नदीचा घाट आणि मुख्य पालखी स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला. वारी दरम्यान भाविकांना कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून १८०० शौचालये, आरोग्य पथके आणि रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवण्याचा निर्देश त्यांनी दिला. तसेच आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पालखी मार्गावरील १२ कोटींच्या भूमिक विमानचालना प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
0
0
Report
Advertisement

द दूध भेसळ मामले में पूर्व मंत्री दिलीप वळसे पाटील का विपक्ष पर तीखा हमला; जांच जारी

Shirur, Maharashtra:राज्यात सध्या दूध भेसळीचा मुद्दा चांगलाच तापला असून, यावरून आता माजी मंत्री दिलीप वळसे पाटील कमालीचे आक्रमक झाले आहेत. या दूध भेसळ प्रकरणाशी माझा दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नाही, असं सांगत वळसे पाटलांनी विरोधकांवर आणि बेछूट आरोप करणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. केवळ आंबेगावच नव्हे, तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात अशा कारवाया झाल्या आहेत. जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही, एफआयआर दाखल होत नाही किंवा दोषारोपपत्र निश्चित होत नाही, तोपर्यंत त्यावर जाहीर भाष्य करणे योग्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, काही लोक राजकीय हेतूने या तालुक्याला बदनाम करण्याचा कट रचत असल्याचा आरोप करत, 'पडद्यामागचा सूत्रधार मी नाही' असं म्हणत त्यांनी आरोप करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.
0
0
Report

मालेगांव संगमेश्वर में SIR शिबिर: मतदाताओं की रिकॉर्ड भीड़

Nashik, Maharashtra:मतदारांची गर्दी... मालेगाव संगमेश्वरात SIR शिबिरात मतदारांची मोठी गर्दी शिवसेनेच्या वतीने शिबिराचे आयोजन.. राज्यात, संपूर्ण देशात SIR प्रणालीचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग आज मालेगाव शहरातील माळी मंगल कार्यालयात मंत्री दादाजी भुसे व युवा सेनेचे आविष्कार भुसे यांच्या मार्गदर्शनाने व नरेंद्र सोनवणे, लताताई घोडके, मीनाताई अहिरे आणि नितीन झालते या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींच्या वतीने SIR प्रणालीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला संगमेश्वर वासियांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला यात 50 च्या वर बी एल ओ यांनी देखील मोठे सहकार्य केल्याने हजारोंच्या संख्येने मतदारांनी या शिबिराचा लाभ घेतला नागरिकांनी आभार देखील व्यक्त केले.
0
0
Report

वाडेगाव स्मशानभूमी के टिनशेड की शीघ्र दुरुस्ती की मांग, बरसात में अंत्यविधि कठिन

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथील स्मशानभूमीतील टिनशेडची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. टिनपत्रे फुटल्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काहीवेळा पावसाच्या पाण्यामुळे चिता विझण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, यामुळे मृतदेहाचा सन्मान राखला जात नसल्याची खंतही व्यक्त केली जात आहे. या गंभीर समस्येमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वाडेगाव येथील स्मशानभूमीमध्ये उभारण्यात आलेले टिनशेड सध्या पूर्णपणे जीर्ण झाले आहे. अनेक ठिकाणी टिनपत्रे फुटली असून पावसाचे पाणी थेट अंत्यसंस्काराच्या ठिकाणी गळत आहे. त्यामुळे पावसाळ्यात अंत्यविधी पार पाडणे अत्यंत कठीण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मुसळधार पावसात चिता पेटविणे आणि ती कायम ठेवणे अवघड होत असून काहीवेळा चिता विझण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात अडथळे निर्माण होत असून नातेवाईकांनाही मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप केला आहे. स्मशानभूमीतील टिनशेडची तातडीने दुरुस्ती करून नवीन टिनपत्रे बसवावीत, तसेच नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
0
0
Report
Advertisement

मिरज पंचायत समिति की नयी इमारत उद्घाटन को लेकर सांसद विशाल पाटल के बयान पर मंत्री जयकुमार गोरे और भाजपा विधायक सुरेश खाडे की तीखी टिप्पणी

Sangli, Maharashtra:सांगली के खासदार विशाल पाटील के विधानानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे और मिरजे के भाजपा आमदार सुरेश खाडेंकडुन खासदार विशाल पाटलांवर जोरदार टीका किया गया है। मिरज पंचायत समिती के नूतनीमारती के दोनों बार उद्घाटन हुए हैं। सत्ताधारी महाविकास आघाडीकडून प्रशासकीय उद्घाटनाला डावलण्यात आल्याचा आरोप करत शासकीय उद्घाटनाच्या आदल्या दिवशी नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पाडला, यावेळी खासदार विशाल पाटलांनी शासकीय निधीवरून प्रशासनावर गंभीर टीका करत थेट प्रशासनाचा बाप काढला..यावरून प्रशासनाकडुन आयोजित उद्घाटन समारंभाच्या सभेतून भाजप नेत्यांनी खासदार विशाल पाटलांनी जोरदार टीका केली. इमारतीसाठी तुमच्या बापाने चेक, डीडी, का ऑनलाइन पैसे पाठवले होते, असा सवाल करत उद्घाटन करायची, एवढीचं खूमखुमी असेल तर खासदार फंडाच्या बाहेरून एक रुपयाचा निधी आणून विकास करून मग रूबाब करा, असा टोला लगावला आहे. तर आपल्या बापाच्या वैशिनाथ बिल्डिंग बांधली नाही शासकीय निधीतूनच बिल्डिंग बांधली गेलीये, पण यापुढे तुम्ही तुम्हाला तुमच्या बापाच्याच पैश्यांनी विकास करावा लागेल..असा विधान माजी मंत्री सुरेश खाडेंनी विशाल पाटलांवर केला आहे.
0
0
Report

FDA के नए दूध नियम: 3.2 फैट और 8.3 SNF से किसान संकट में

Shirur, Maharashtra:FDA च्या दुध खरेदीच्या फॅट आणि SNF च्या नव्या नियमांमुळे राज्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची भीती माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे. नव्या नियमावलीनुसार stateात कोणत्याही डेअरीने ३.२ फॅट आणि ८.३ SNF पेक्षा कमी दर्जाचे दूध खरेदी करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. जर दूध या निकषांवर उतरले नाही तर ते कंपन्यांना परत करावे लागेल, ज्यामुळे दूध संकलन कमालीचे घटण्याची शक्यता आहे. या जाचक अटींमुळे ग्रामीण आणि विशेषतः आदिवासी भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून, या निर्णयाचा दुग्ध व्यवसायावर दूरगामी परिणाम होईल, अशी चिंता वळसे पाटील यांनी व्यक्त केलीय.
0
0
Report
Advertisement

विद्यार्थी शिकायतों के बाद अमिगो एविएशन अकैडमी पर MSBVT से जांच की मांग

Mumbai, Maharashtra:विद्यार्थ्यांच्या तक्रारींनंतर अमिगो एव्हिएशन अकॅडमी अडचणीत; मनविसेकडून चौकशीची मागणी मुंबई : विद्यार्थ्यांकडून प्रवेशावेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे, दिशाभूल करणे तसेच इतर गंभीर तक्रारी समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने अमिगो एव्हिएशन अकॅडमीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरचिटणीस अॅड. स्नेहल आडारकर यांनी विद्यार्थ्यांसह अकॅडमीच्या मुख्य कार्यालयाला भेट देत व्यवस्थापनाची जाब विचारणा केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रलंबित तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याची मागणी करण्यात आली. तसेच अकॅडमीच्या माजी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, विद्यार्थ्यांना दिलेली कथित दिशाभूल करणारी आश्वासने आणि संस्थेच्या कार्यपद्धतीबाबतही व्यवस्थापनाकडे कठोर शब्दांत खुलासा मागण्यात आला. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आता महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण मंडळ (MSBVT) यांच्याकडे अधिकृत चौकशीची मागणी करणार आहे. यासोबतच महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या सर्व एव्हिएशन प्रशिक्षण संस्थांचे स्वतंत्र लेखापरीक्षण (ऑडिट) करून त्या शासनाच्या नियम व मानकांचे पालन करतात का, याची सखोल तपासणी करण्याची मागणीही करण्यात येणार आहे. “विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक किंवा त्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही संस्थेला पाठीशी घातले जाणार नाही. आवश्यक असल्यास कायदेशीर लढा आणि तीव्र आंदोलनही उभारले जाईल,” असा इशारा अॅड. स्नेहल आडारकर यांनी दिला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना हा पाठपुरावा शेवटपर्यंत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
0
0
Report

यवत में वारकरी अन्नदान: दीढ़ टन पिठलं और दीढ़ लाख भाकरी की भव्य मेजबानी

Rui, Maharashtra:अन्नदानाचा लावा मेळा । भुकेल्यांचा भरा घास पेला ॥॥ अन्न पूर्णब्रह्म जाणावे । प्रेमे सर्वांना वाढवावे ॥१॥ दारी आला जो भुकेला । विठ्ठल भेटे त्या रूपाला ॥२॥ सेवाभाव अंतरी ठेवा । दीनजनांचा धावा घ्या ॥३॥ दानामध्ये नाही अभिमान । तेथे वसे श्रीनारायण ॥४॥ तृप्त झाले जेवणारे । आशीर्वाद देते सारे ॥५॥ तुका म्हणे सेवा खरी । विठ्ठल भेटे अंतरी ॥॥ यवतमध्ये वारकऱ्यांसाठी दीड टन पिठलं, दीड लाख भाकऱ्यांची मेजवानी; ८२ वर्षांची अखंड परंपरा यंदाही कायम... लोणी काळभोर ते यवत हा पायी प्रवास करून आलेल्या लाखो वारकरी भाविकांसाठी तब्बल दीड टन पिठलं आणि दीड लाख भाकऱ्यांची मेजवानी आयोजित करण्यात आलीय. गावातील घराघरांत भाकऱ्या तयार करण्याचे काम सुरू असतानाच, यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात सकाळपासूनच पिठलं तयार करण्याची लगबग सुरू झाली होती. मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या विशाल कढईंमध्ये पारंपरिक पद्धतीने पिठलं तयार करण्यात आले. एका कढईत सुमारे ६० किलो पिठलं बनविण्यात येत होते. त्याासाठी २० किलो बेसण तसेच सुमारे ४० किलो कांदा, मिरची, लसूण, तेल, मसाले व इतर साहित्य वापरण्यात आले. अशा एकूण १४ ते १५ कढईंमध्ये पिठलं तयार करून भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या अन्नदानासाठी गावातील युवकांनी दिवसभर परिश्रम घेतले. पिठलं तयार करणे, भाकऱ्या जमा करणे, भोजन वाढणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता आणि शिस्तबद्ध नियोजन अशा विविध जबाबदाऱ्या ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने स्वीकारल्या. ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी सेवाभावाची ही परंपरा पुढे चालवत समाजासमोर आदर्श निर्माण केलाय. मागील वर्षी एक टन पिठलं आणि एक लाख भाकऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र यंदा पिठलं-भाकरीच्या भोजनासाठी वाढलेली मागणी लक्षात घेऊन त्यामध्ये वाढ करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. जावेद मुलानी, झी 24 तास, दौंड
0
0
Report
Advertisement

दारू के नशे में दोस्ती के कारण पर्यटक अक्षय जाधव की हत्या

Satara, Maharashtra:सातारा: दारूच्या नशेत घरात डोकावल्याच्या कारणावरून महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथे भिगवणच्या अक्षय रमेश जाधव या पर्यटक युवकाची लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी चिखलात तुडवून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांबरोबर पाचगणी परिसरात फिरण्यासाठी आलेल्या अक्षय याला मित्रांनी दारूच्या नशेत असल्याच्या कारणातून खोलीत कोंडून ठेवले असताना त्याने रूम बाहेर येऊन शेजारील एका घरात डोकावल्याने संबंधित मुलीच्या वडिलांनी आणि त्यांच्या साथीदारांनी त्याला जीवघेण्य मारहाण केली. गंभीर जखमी अक्षयचा बारामती येथे उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून याप्रकरणी पाचगणी पोलिसांनी मुख्य संशयित सूर्यकांत गोळे याच्यासह वाई परिसरातील चार आरोपींना अटक केली है.
0
0
Report

अघोरी आरोपों की जांच तेज: फिरोज आदम शेख की गिरफ्तारी

Oras Bk., Maharashtra:माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुना गिरीजा गितेश राऊत यांनी केलेल्या कथित जादूटोणा आणि अघोरी प्रथांच्या आरोपानंतर या प्रकरणातील तपासाला वेग आला असून, सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील फिरोज आदम शेख याला ठाणे पोलिसांनी काल सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या कारवाईनंतर फिरोज आदम शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी माध्यमांशी बोलताना आरोप फेटाळून लावले आहेत. "आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे अघोरी कृत्य केले जात नाही. येथे कोणाचे केस काढणे किंवा अशा प्रकारचे विधी होत नाहीत. फिर्यादी आणि संबंधित कुटुंबामधील वैयक्तिक वाद काय आहेत, याची आम्हाला कोणतीही माहिती नाही. काल अचानक पोलीस आले आणि फिरोज आदम शेख यांना ताब्यात घेऊन गेले. ही कारवाई अन्यायकारक आहे," असा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे पोलीस करत असून, आता पाहूया फिरोज आदम शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली...
0
0
Report

विनायक राऊत के परिवार से जुड़े आरोपों की जांच तेज, फिरोज बाबा ताब्यात

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग अँकर : माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या जादूटोणा आणि कथित अघोरी प्रथांच्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणातील तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात नाव आलेल्या सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील फिरोज बाबा याला ठाणे पोलिसांनी शनिवारी दुपारी सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. फिरोज बाबा याच्यावर तक्रारदार महिलेने तिच्यावर कथित जादूटोणा आणि अघोरी विधी केल्याचा आरोप आपल्या फिर्यादीत केला आहे. त्यानंतर ठाणे पोलिसांचे पथक सावंतवाडीत दाखल झाले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने कोलगाव येथून फिरोज बाबाला ताब्यात घेण्यात आले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top