416416
Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक
Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नांदेड में हत्या-घटना के बाद प्रशासन सतर्क, राजनीति में आरोप-प्रत्यारोप पुरानी रवायत
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - राजकारणात एकमेकांवर चिखलफेक करणे किंवा एकमेकांना टार्गेट करणे ही जुनी पद्धत आहे - अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण बाईट पॉइंटर्स राजकारणात एकमेकांवर चिखलफेक करणे किंवा एकमेकांना टार्गेट करणे ही जुनी पद्धत आहे, यात नवीन काहीच नाही ऑन विमान तपासणी एखाद्या घटनेचा निष्कर्ष काढण्यापूर्वी सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. चौकशीचा अहवाल समोर आल्याशिवाय घाईघाईने कोणतीही कारवाई करणे योग्य नाही ऑन चार्टर्ड विमानसेवा देशात सर्वत्र चार्टर्ड आणि कमर्शियल विमान सेवा उपलब्ध आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक असले तरी, तपासाअंतीच योग्य तो निर्णय घ्यावा ऑन नांदेड गुन्हेगारी घटना नांदेडमध्ये काल घडलेल्या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील दोन्ही गट हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट होत आहे अशा हिंसक घटनांमुळे सामान्य जनतेत भीतीचे वातावरण निर्माण होते. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था चोख राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असून पोलीस प्रशासन यावर लक्ष ठेवून आहे समाजात भीती पसरू नये आणि सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न होणे गरजेचे आहे बाईट - अशोक चव्हाण ( माजी मुख्यमंत्री, भाजप नेते )0
0
Report
रायगढ़ के पायथ्य हिरकणी वाडी में भीषण पानी की किल्लत, ग्रामस्थों को पानी खरीदना मजबूर
Chendhare, Maharashtra:किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडच्या हिरकणी वाडी येथील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. गावातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटले आहेत तर बोअर वेल देखील कोरड्या पडल्या आहेत. ग्राम पंचायतीकडून आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा होतो. त्यामुळे विकतचे पाणी घेण्यावाचून ग्रामस्थांना पर्याय नाही. त्यासाठी 2 ते 3 हजार रुपये मोजावे लागत आहेत. मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांना पाणी पुरवणे अवघड झालं आहे. सरकार दरबारी व्यथा मांडूनही दखल घेतली जात नसल्याची ग्रामस्थांची खंत आहे.0
0
Report
बीड़ के लिंबागणेश गाँव में पंप-विहिरी वायर चोरी से पानी सप्लाई प्रभावित
Beed, Maharashtra:बीड तालुक्यातील लिंबागणेश गावामध्ये ग्रामपंचायतीमार्फत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेतील विहिरीच्या मोटारीचे विद्युत वायर गेल्या दीड महिन्यात दोन वेळा चोरीला गेल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप आहे. गावाच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या या योजनेवर चोरीच्या घटनांमुळे परिणाम होत असून पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला. तर वारंवार होणाऱ्या चोरीमुळे ग्रामपंचायतीवर मोठा आर्थिक बोजा पडत असून आतापर्यंत सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सरपंचांकडून देण्यात आली. यापूर्वी झालेल्या चोरीबाबत नेकनुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पुन्हा चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप पहायला मिळतोय तर एकाच ठिकाणी दोन वेळा चोरी करणाऱ्या चोरट्यांनी नेकनुर पोलिसांसमोर आव्हान उभ केलं आहे.0
0
Report
Advertisement
अकोला में सम्राट अशोक के 2300वें जयंती पर विशाल रंगोली, ड्रोन से रिकॉर्डिंग
Akola, Maharashtra:सम्राट अशोक महान यांच्या २,३०० व्या जयंतीनिमित्त अकोल्यात एक अनोखा आणि आकर्षक उपक्रम राबवण्यात आला आहे. तिक्ष्णगत मल्टिपरपझ वेलफेअर सोसायटी अकोला यांच्या पुढाकारातून पंचशील नगर आणि न्यू तापडिया नगर परिसरातील चक्रवर्ती सम्राट अशोक प्रवेशद्वारासमोर तब्बल ३५०० स्क्वेअर फूट क्षेत्रफळाची भव्य महाकाय रांगोळी साकारण्यात आली.या रांगोळीचे ड्रोन चित्रीकरण विशेष आकर्षण ठरत असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी सम्राट अशोक यांनी अखंड भारतभर शांती, अहिंसा आणि धम्माचा संदेश दिला होता. त्यांच्या कार्याचा प्रभाव आजही कायम असून तो युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.या पार्श्वभूमीवर त्यांच्या विचारांचा गौरव करण्यासाठी आणि तरुणांना प्रेरणा देण्यासाठी ही भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. या उपक्रमाला अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आणि सम्राट अशोकांना अभिवादन केले.या महाकाय रांगोळीच्या निर्मितीसाठी कलाकार आणि स्वयंसेवकांनी तब्बल १६ तास अखंड परिश्रम घेतले. यामध्ये सुमारे दोन क्विंटल रंगांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली.रांगोळीत सम्राट अशोक यांची प्रतिमा, धम्मचक्र (अशोक चक्र) तसेच बौद्ध धम्माचा अहिंसेचा संदेश प्रभावीपणे साकारण्यात आला आहे.0
0
Report
Shirdi-Nashik: 132 खातों में करोड़ों के संदिग्ध घोटाले, ED की एंट्री की संभावनाएं
Shirdi, Maharashtra:भोंदू अशोक खरात प्रकरणात ED ची एन्ट्री होणार...? महिला अत्याचारानंतर खरात याचे कोट्यवधींचे व्यवहार आले रडारवर... नाशिक आणि शिर्डीतील मालमत्ता आणि 132 बँक खात्यांमधील कोट्यवधींचे व्यवहार यंत्रणांच्या रडारवर... अशोक खरात नॉमिनी असणारी समता पतसंस्थेत 100 तर जगदंबा पतसंस्थेत 32 खाती... या 132 खात्यांमधून कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे उघड... जगदंबा पतसंस्थेत इतर लोकांचे कागदपत्र वापरून खरात स्वतः 32 खाती ऑपरेट करत असल्याचे पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांची कबुली... तर समता पतसंस्थेतील 100 खात्यांमध्येही मोठे गौडबंगाल असण्याची शक्यता... कोट्यवधींच्या संशयास्पद व्यवहारांमुळे अशोक खरात प्रकरणात ED ची एन्ट्री होण्याची शक्यता....0
0
Report
नितेश राणे के बयानों पर राजासिंह बोले: मदरसे बंद करो और औरंगजेब कब्र के मुद्दे पर विवाद
Nanded-Waghala, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Rajasinh Feed on - 2C ------------------------------- Anchor - मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याला माझे समर्थन आहे. महाराष्ट्रातील सगळे मदरशे बंद करा. महाराष्ट्राच्या मदरशामध्ये देश विघातक शिक्षण देत आहे त्यामुळे मदरशे बंद करा. अनाधिकृत मदरशे बंद करण्या पेक्षा उध्वस्त करा असे वक्तव्य हैद्राबादचे आमदार टी राजासिंह यांनी केले. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे काल रात्री आयोजित धर्मासभेत त्यांनी हे वक्तव्य केले. आपल्या महाराष्ट्रात बुलडोजरचा नियम लागू झाला आहे. जर मदरशे बंद केले तर पुन्हा चालू होईल, त्यामुळे अनाधिकृत मदरशावर बुलडोजर चालवण्याची गरज आहे. दाऊद इब्राहिम आणि अफजल कसाब अश्याच मदरशातून तयार झालेत. मदरशामध्ये शिकवलं जाते हिंदुची हत्या करा. नितेश राणेना माझे निवेदन आहे तुम्ही बोललेल्या वक्तव्याची अमलाबजावणी करा असे राजासिंह म्हणाले. Sound Byte - आ. टी. राजासिंह. --------------------------- औंरंगजेबची कबर उखाडून शौच्छालय बांधा Anchor - मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना औरंगजेबची कबर हटवण्यासाठी भीती का वाटतं आहे. तुम्हाला वाटते की तुम्हाला मतदान मिळणार नाही, ते तुम्हाला मतदान करणार नाही हे लिहून घ्या..मुख्यमंत्री यांना निवेदन आहे महाराष्ट्रच्या हिंदू यांना वाटत आहे औरंगजेबची कबर उखडून तिथे शौच्छालय बांधा असे वक्तव्य आमदार टी राजासिंह यांनी केले. औरंग्याची कबर महाराष्ट्रासाठी नको आहे. माझ्या संभाजी राजाला हळहळ करून मारलं. ती कबर उखडवन्यासाठी मावळे हवी असेल तर लाखो ने येऊ असे राजासिंह म्हणाले. Sound Byte - आ. टी. राजासिंह ------------------------------ घरात शस्त्र ठेवा Anchor - घरात शस्त्र ठेवा. देवाच्या गाभाऱ्यात शस्त्र ठेवणे कायदेशीर आहे. बाहेर काढून हल्ला केला तर तो वेगळा विषय आहे. जर युद्ध झाल शस्त्र नसतील तर, तुम्ही काय करणार. कस लढणार धर्मासाठी लढणाऱ्या लोकांनी बंदुकीचा परवाना घ्यावा. जिथे मदत लागेल तिचे आम्ही घेऊन देऊ. एका एका घरात पाच पाच बंदूक असली पाहिजे. देशद्रोही हल्ला करण्यासाठी आले, त्यांना गोळी मारण्यासारखे हत्यार राहिले पाहिजे असे आमदार राजासिंह म्हणाले. Sound Byte - आ. टी. राजासिंह0
0
Report
Advertisement
धाराशिव में स्टडी टाइम: शाम 7 से 9 बजे गाँवों में टीवी बंद, पढ़ाई पर जोर
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्ह्यात ‘स्टडी टाइम’ साठी अनोखा प्रयोग. जिल्ह्यातील गावात सायंकाळी ७ ते ९ टीव्ही बंद ठेवण्याचा निर्णय. भोंग्यावरून सायरन वाजवत अभ्यासाची सूचना. विद्यार्थ्यांची अभ्यासाकडे लक्ष वाढवण्यासाठी जिल्हा परिषदे चा पुढाकार अँकर : धाराशिव जिल्ह्यातून एक सकारात्मक आणि वेगळा प्रयोग समोर आला आहे… विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे वाढते दुर्लक्ष रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय… सायंकाळी ७ ते ९ या वेळेत गावागावात टीव्ही बंद ठेवण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे… टीव्ही आणि मोबाईलमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे होणारा कल कमी होत असल्याचं लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय… धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागात दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ‘स्टडी TIME’ पाळला जाणार आहे… यासाठी गावागावात ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांना या उपक्रमाचं महत्त्व समजावलं जाणार आहे… सायंकाळी ७ वाजता मंदिर, मशीद किंवा ग्रामपंचायतच्या भोंग्यावरून सायरन वाजवून अभ्यासाची वेळ सुरू झाल्याची सूचना दिली जाईल… तर रात्री ९ वाजता पुन्हा सायरन वाजवून अभ्यासाचा वेळ संपल्याचं जाहीर केलं जाईल… मुख्यमंत्री ग्रामविकास योजनेअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येत असून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय वाढवण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे… बाइट : अर्चना पाटील0
0
Report
कांग्रेस के सपकाळ के बयानों से सियासी घमासान, भाजपा पर लोकतंत्र बचाओ बुलंद
Buldhana, Maharashtra:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बाईट्स. पोट निवडणुका... एकंदरीत ही पोट निवडणूक इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्या दृष्टीने भाजपच्या लोकशाही विरोधी धोरणा विरोधात लढण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आमच्या निर्णयावर आम्ही ठाम होतो आणि आहे. उद्या दुपारपर्यंत दोन्ही पोट निवडणुकांचे उमेदवार आम्ही जाहीर करू. संजय राऊत वक्तव्य.. निवडणूक लढणं हा राजकीय अधिकार आहे, निकाल हा आपल्या ठिकाणी बाब आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आपण सर्वांनी एकत्र लढलं पाहिजे. निकाल काय लागेल याचा विचार न करता लढलं पाहिजे. कारण भारतीय जनता पार्टी ही लोकशाही गुंडाळून घेण्याकरता निघाली आहे. बावनकुळे यांनी बारामतीकडे लक्ष न देता त्यांची जी 200 एकर जमीन समोर आली आहे त्याकडे लक्ष द्याव. सिलिंगचा कायदा असूनही त्यांच्याकडे जर एवढी संपत्ती असेल तर ते प्रकरण कसं दाबायचं त्याकडे त्यांनी लक्ष द्याव. सुनेत्रा पवार यांच्या उद्धव यांना फोन , तुम्हाला आला होता का. अजित पवारांच्या काँग्रेसने काँग्रेस पक्षाशी कुठलाही प्रकारचा संपर्क केलेला नाही. बिनविरोध निवडणुका होण्यासाठी चर्चा आवश्यक असते व चर्चेसाठी कुठल्याही प्रकारचे चारित्र्य भाजपमध्ये नसल्याने व दबाव तंत्राने निवडणुका पुढे घेऊन जात असल्याने जे दोन उमेदवार दोन्ही ठिकाणी राहणार आहे त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. RSS कार्यालयावर मोर्चा... RSS कार्यालयावर जो मोर्चा काढला तो संवाद साधण्यासाठी होता. नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्यावा, यासाठी RSS कडे गेलो होतो. मोदी यांनी राष्ट्रहिताच्या सर्व गोष्टी गुंडाळून ठेवल्या आहेत. RSS ने भाजपशी असलेले नाते तोडावे आणि मोदी यांचा राजीनामा घ्यावा. राष्ट्रवादीत दोन गट झाले का. दादांचा घटनेसह इतर ज्या घटना होतायत त्यात राजकारण सुरू आहे. याचा पर्दाफाश झालेले आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. संजय राऊत, राष्ट्रवादी आणि शिंदेचे २५ आमदार भाजपचे संपर्कात आहे. अनेक दिवसांपासून चर्चा आहे , भाजपा ज्यांना सोबत घेते त्यांना गिळंकुरूत करते. पक्ष फोडल्याशिवाय किंवा सोबत घेतला शिवाय त्यांचे सत्तेचे राजकारण होत नाही. दमानिया, शिंदे यांचे खरात ल १७ कॉल खरात प्रकरणाचे लागेबांधे सत्ताधाऱ्यांपर्यंत आलेले आहेत. खरात चे भक्त ही तसेच आहेत. स्कँडल मध्ये असलेल्या शी जर सत्ताधाऱ्यांचे संबंध असतील तर त्यांच्यावर ही गुन्हे दाखल झाले पाहिजे. नितेश राणे त्यांना जातीयवाद जो करायचा तो त्यांनी करत रहावा. जो शिवाजी महाराजांचा विचार आहे तो पुढे घेऊन गेले पाहिजे. सुनेत्रा पवार, पत्र माघारी घेणार. त्यांचाच पक्ष आहे, पक्ष आधीच अडचणीत आलेला आहे , अडचण कशी सोडवायची हा त्यांचा विषय आहे. मोदी आसाम मधील चहाच्या शेतात गेले. आसामच्या निवडणुका आहेत म्हणून ते गेले. खरात सोबत असलेल्या कायदा लागू होत नाही का कायदा गुंडाळून ठेवला, संविधान बदलायला भाजपा चालली आहे. सज्जनानं संपुष्टात आणण्यासाठी गृहविभाग कार्यरत आहे.0
0
Report
उत्तर पुणे में अवकाली बारिश-गारपिटी से कांदा किसान परेशान, फसल डूब गई
Shirur, Maharashtra:गेली चार-पाच दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्यात सातत्याने पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे कांदा पिकाचं अत्योनात नुकसान झालं असून दुपारी पडणारं कडाक्याचं ऊन आणि सायंकाळी करणाऱ्या अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे शेतात काढणीसाठी आलेला कांदा शेतातच सडून खराब होऊ लागल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्यात याचाच नुकसान ग्रस्त शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी.. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे..0
0
Report
Advertisement
दापुरी खुर्द में पानी की टंकी अधूरी, भ्रष्टाचार के आरोप
Washim, Maharashtra:वाशीम: वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील दापुरी खुर्द गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गावातील पाणीटाकीत पाणी नसल्याने पुरवठा ठप्प असून दुसऱ्या टाकीचे कामही अर्धवट आहे. दूषित बोअरवेल्समुळे नागरिकांना लांब अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. पाणी नसतानाही पाणीपट्टी वसुली होत असल्याने संताप वाढला आहे. दरम्यान, पाणीपुरवठा योजनांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप होत असून कामे पूर्ण करून नियमित पुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.0
0
Report
जय पवार युवा नेतृत्व के लिए राष्ट्रवादी में उम्मीदें बढ़ाते हुए नया चेहरा
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - जय पवार हे तरुण नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्याचे युवा नेतृत्व आहे - खा. सुनील तटकरे सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी ऑन सुनेत्रा पवार अर्ज राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार उद्या आपला अर्ज दाखल करणार आहेत आमच्या सर्वांसाठी अतिशय भावनाप्रधान आणि संवेदनशील प्रसंग आहे पण ज्या पद्धतीने वहिनी सरकारमध्ये कामे करत आम्हाला उभारी देण्याचा प्रयत्न करतायत तेच आमच्यासाठी उद्याच्या भविष्याची वाटचाल करणारे आधारास्थभ आहे वहिनींची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय महाविकास आघाडतील शरद पवार साहेबांच्या पक्षाने उमेदवारी देणारं नाही हे आधीच घोषित केलं त्याबद्दल त्यांचे आभार उद्धवजी देखील उमेदवार देणारं नाहीयेत, काँग्रेस सोबत देखील आम्ही संपर्क करतोय काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत कदाचित आज आमचं बोलणं होईल, त्यांना देखील आम्ही विनंती करणार असतील बारामतीचे नेतृत्व पवार साहेब, अजित दादा आणि आता सुप्रिया सुळे करताय त्यामुळे यावं यासाठी विनंती करणार.. ऑन VSR मालक अटक जय पवार मागणी जय पवारांची मागणी आहे तीच राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी.. अजय पवार यांच्या प्रकरणात तपास शीघ्र गतीने व्हावा. ज्या नेत्यांनी शंका उपस्थित केल्या त्या सर्वांच्या शंकेसह तपास करावा. मी ज्या वेळेस संसदेत होतो त्यावेळेस देश पातळीवरील विविध खासदारांनी दादा बद्दल हळहळ व्यक्त केली. त्यामुळे देशाला समजलं पाहिजेल की, दादांचा अपघात नेमकं कश्यामुळे झाला.. ऑन राष्ट्रवादी नेते टार्गेट जय पवार हे तरुण नेते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्याचं युवा नेतृत्व आहे.. त्यामुळे त्यांनी भावना व्यक्त करणे हे योग्य आहे.. पक्ष संघटनेसाठी जय पवार यांनी केलेलं विधान महत्त्वाचं बाईट : सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी0
0
Report
कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026: ड्रोन शो ने पाटण को आकाशी रोशनी दी
Satara, Maharashtra:सातारा -सातारा जिल्ह्यातील पाटण नगरी सध्या एका ऐतिहासिक सोहळ्याची साक्षीदार ठरत आहे. राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष पुढाकारातून आयोजित 'कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६' ने केवळ जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या भव्य लेझर आणि ड्रोन शोने पाटणकारांची मने जिंकली असून आकाशात उमटलेल्या प्रकाशाच्या किमयेने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आहे.या नेत्रदीपक ड्रोन शोमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आकाशात विविध प्रतिमा साकारण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने प्रभू श्रीराम, विठ्ठल, श्री गणेश आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या दैदिप्यमान प्रतिमांनी आकाश उजळून निघाले.छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ पुतळ्याची प्रतिकृती देखील अवकाशात लक्षवेधी ठरलेली पाहायला मिळाली.याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या हुबेहूब प्रतिकृती ड्रोनच्या माध्यमातून आकाशात पाहताना आलेले नागरिकही थक्क झाले.पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवासाठी दररोज हजारो नागरिक पाटणमध्ये दाखल होत आहेत. लेझर शोचा झगमगाट आणि संगीताच्या तालावर होणारे ड्रोनचे संचलन पाटणच्या जनतेसाठी वेगळ्या आकर्षक ठरलेले पाहायला मिळत आहे. या शोच्या माध्यमातून आपल्या महान संस्कृतीचे दर्शन नव्या पिढीला आधुनिक पद्धतीने घडवणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे.0
0
Report
Advertisement
यवतमाल के रालेगांव में महिलाओं ने जलसंकट और अर्धपूर्ण विकास पर प्रशासन को घेरा
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ राळेगाव तालुका वार्षिक आमसभा आणि पाणीटंचाई आढावा सभेत विविध समस्या मांडत महिलांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या समक्ष प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी तालुक्यातील रखडलेल्या विकास कामांवरून, आणि पाणीटंचाई वरून ग्रामस्थ आक्रमक झालेले बघायला मिळाले. महिलांनी संतप्त होत प्रशासकीय कारभाराचे वाभाडे काढले. यामध्ये आपटी येथील महिला प्रतिनिधी कविता धुर्वे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा पंचनामा केला. गावात पाईपलाईनचे काम अर्धवट अवस्थेत आहे, रस्ते उखडलेले आहेत, स्मशानभूमीची दयनीय अवस्था आहे आणि सौर ऊर्जा संच बसवण्यात आलेले नाहीत या समस्या मांडत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.0
0
Report
तुमसर के किसानों के सौर पंप चोरी से खेती में डर, केबल लापता
Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात शेतकऱ्यांचे शेतात असणारे सौर ऊर्जेवरील कृषी पंपाचे केबल चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन उन्हाळी धान पिकांचे हंगामात चोरांनी शेतकऱ्यांचे कृषी पंपांना टार्गेट केले असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बिनाखी गावांत चार शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे केबल एकाच रात्री चोरट्यानी लंपास केले आहेत. शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकांची लागवड केली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी शेती सिंचित करण्यासाठी सौरऊर्जेवरील सोलर पॅनल घेतले आहेत. या सोलर पॅनलला चोरांनी टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. सोलर पॅनलमध्ये तांब्याचे प्रमाण अधिक असल्याने चोरटे केबल चोरी करीत आहेत.0
0
Report
कांग्रेस नेता बोंद्रे के बयान पर विवाद, महिलाओं पर आपत्तिजनक टिप्पणी के बाद विरोध
Buldhana, Maharashtra:पक्ष प्रवेश पर उत्तर देते समय कांग्रेस के पूर्व विधायक राहुल बोंद्रे की जीभ फिसली... 'जी कोई महिला होती है जो उसे दिखवाना पड़ता है कि मैं पतिव्रता हूँ, वह बड़ा कुंकू लगाती और बड़ा मंगलसूत्र पहनती है.' चिखली के कांग्रेस के पूर्व विधायक और बुलढणा जिला कांग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे की टिप्पणी से विवाद की संभावना। बुलढाणा: चिखली के कांग्रेस के पूर्व विधायक और बुलढाणा जिला कांग्रेस कमिटी के अध्यक्ष राहुल बोंद्रे ने पत्रकार परिषद में कहा कि कल बुलढाणा के शिवसेना विधायक संजय गायकवाड़ ने उनके निवास पर आकर मिलने का अनुरोध किया, इस पर सवाल किया गया कि क्या वे कांग्रेस छोड़कर शिवसेना में प्रवेश करेंगे; उनका जवाब देते समय उनकी जीभ फिसली और उन्होंने कहा... 'जो महिला होती है... जिसे दिखवाना पड़ता है कि मैं पतिव्रता हूँ।' इस बयान के कारण जिल्ह्यात भाजपा महिला मोर्चा आक्रामक हो गई और बोंद्रे के विरोध में रस्ते पर उतर आए; उनके प्रतिमाओं पर चप्पल फेंकी गईं और कुंकू, लिपस्टिक भी लगाई गईं।0
0
Report
Advertisement
