icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 08:30 am

Sangli- प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा विजय, बीसी फाउंडेशनची चमक

Sangli, Maharashtra:सांगलीच्या बिसूर येथे खासदार चषक राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे सह राज्यातील 15 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने मॅट पार पडलेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बीसी फाउंडेशनने,पुण्याच्या सतीश बाणेर संघावर विजय मिळवत,दीड लाखांचं पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नास वर्ष पूर्ती निमित्ताने या राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्रो कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून यवेळी सांगण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

दिल्ली दौरे में मंत्री-चर्चाओं से चंद्रपुर के विकास को नई राह मिली

Nagpur, Maharashtra:Ngp Mungantiwar byte live u ने फीड पाठवले -------------------- सुधीर मुंगटीवार बाईट On Delhi भेट * दहापेक्षा जास्त मंत्री आणि आयोगांच्या अध्यक्षांची भेट घेतली.. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न बद्दल चर्चा केली.. सर्वांकडून आमच्या मागण्यांना सकारात्मक पाठिंबा मिळाला आहे.. राजनाथ सिंह यांची चंद्रपुरातील सैनिक शाळेच्या विस्तारा संदर्भात चर्चा केली.. सायन्स सेंटर बद्दलही जितेंद्र सिंह यांच्याशी चर्चा केली... त्याशिवाय राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय ओबीसी आयोग यांच्या अध्यक्षांशीही भेट घेतली.. * गडकरी यांच्यासोबत चंद्रपुरातील रिंग रोड संदर्भात चर्चा झाली.. * मी दिल्लीला जात नव्हतो, मात्र दिल्लीमध्ये गेल्यानंतर जिल्ह्याच्या विकासासाठी फार मदत होते ही गोष्ट लक्षात आली... On दिल्ली भेट राजकीय चर्चा * ज्याची जशी दृष्टी त्याला दिसते तशी सृष्टी... मी दिल्लीला जात असतो लोकांच्या प्रश्नासाठी जातो.. पुढील पंधरा दिवसानंतर पुन्हा जाईल.. * मी फक्त चंद्रपूर नाही, तर विदर्भाच्या ही कामाला लागलो आहे... धान खरेदीचा प्रश्न उचलला, खतांचे लिंकिंग बद्दलही संबंधित मंत्र्यांशी बोललो.. On मंत्री पद * उद्या प्रत्येक जिल्ह्यासाठी केंद्रातही मंत्री पद मागितले तर हे शक्य आहे का... * एखाद्या प्रश्नाबद्दल किती मंत्री तुम्हाला मदत करतात ते महत्त्वाचे आहे.. एखाद्या जिल्ह्यात मंत्री आहे, मात्र कामच होत नाही अशा मंत्रिपदाला चाटायचे का??? On परिषद निवडणुकीत काँग्रेसची स्थिती * एखादा जीर्ण वस्त्र फाटलं म्हणून तो शिवण्याचा प्रयत्न केला, तर तो दुसऱ्यांदा फाटतं, काँग्रेसचे तसेच झाले आहे.. जोवर काँग्रेस साधे विश्लेषण करेल तोपर्यंत त्यांचे अच्छे दिन कधीच येऊ शकणार नाही.. त्यांच्या राजकारणात सामान्य माणूस केंद्रबिंदू नाही.. त्यांच्या राजकारण फक्त मोदी द्वेष एवढा आहे... याचे बाहेर जोवर ते जाणार नाही त्यांचे दिवस बदलणार नाही.. काँग्रेस त्यांची सत्ता असलेल्या राज्यात काही विकासाचे मॉडेल उभे करून दाखवणार नाही, तोवर त्यांचे दिवस बदलणार नाही.. On काँग्रेस ममता बॅनर्जी प्रस्ताव * त्यात चूक कुठे आहे?? मात्र, काँग्रेसचा प्रस्ताव ममता बॅनर्जी थोडी मान्य करणार आहे.. ममता बॅनर्जी आपला स्वतंत्र पक्ष आणि आपले अधिकार तिथे का विलीन करतील.. काँग्रेसमध्ये गेल्यावर अधिकार त्यांच्या हातात राहणार नाही हे त्यांना माहीत आहे.. * इंडिया आघाडी मधील काही नेते सल्ला देत आहे की इंडिया आघाडीमधील सर्व पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, मात्र हे शक्य नाही... On संजय राऊत मोदी कॉक्रोच पार्टी अमेरिका भेट * संजय राऊत यांच्याकडे काय माहिती असेल मला माहित नाही.. मात्र, ते संजय आहे, महाभारताच्या संजय ला घरी बसून युद्ध दिसत होता, यांना घरी बसून अमेरिकेचे दृश्य दिसत असेल तर मला माहित नाही... * आंदोलन करण्याचा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, मात्र आंदोलनाचा विषय जनतेशी संबंधित असायला हवं.. भाजपला संघाला शिव्या देणे हे आंदोलन नाही... On मोदी नेहरू तुलना * मोदी कुठे म्हणाले की माझी तुलना नेहरू शी करा.. नेहरूंच्या काळातले प्रश्न आणि मोदींच्या काळातले प्रश्न वेगळे आहेत.. नेहरुंच्या काळात धान्य सुद्धा आयात करावे लागायचे... दर्जाहीन धान्य आयात करावं लागलं.. काँग्रेस गवतही तेव्हा बाहेरून आली... * नेहरूंच्या काळातली अर्थव्यवस्था आणि आजची अर्थव्यवस्था याच्यामध्ये जमीन आसमान अंतर आहे... * नेहरू आणि मोदींच्या काळाची तुलना होऊ शकत नाही.. नेहरूंनी काही संस्था उभ्या केल्या मात्र बोटावर मोजणे एवढे एम्स आज 22 झाले हे पण लक्षात ठेवा... महामार्ग वाढले, पूल वाढले.. On ऑपरेशन टायगर * मला वाघाचा चांगला अभ्यास आहे.. राज्यात 112 वाघ असताना मी सहाशे पर्यंत पोहोचवले.. ऑपरेशन टायगर जेव्हा केव्हा होते, तो कधीच अशक्य होत नाही.. वाघ शिकार करायला जातो, तेव्हा पहिल्या प्रयत्नात कदाचित त्याचा पंजा योग्य ठिकाणी लागत नाही, मात्र दुसऱ्या प्रयत्नातून नक्कीच यशस्वी होतो... एकनाथ शिंदे अचूक नेम घेणारे नेते आहे, त्यांचा अचूक नेम लागेल असा विश्वास माझ्या मनात आहे....
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर के गोसीखुर्द घोटाले में चार वरिष्ठ अधिकारियों समेत ठेकेदार पर केस दर्ज

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या उजव्या मुख्य कालव्यात घोटाळाप्रकरणी चार बड्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात गोसेखुर्द उजवा मुख्य कालवा बांधकामात सुमारे 14 कोटींच्या घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या फिर्यादीवरून चार बड्या अधिकार्‍यांसह कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बनावट अनुभव प्रमाणपत्रे सादर करणे, नियमबाह्य अद्ययावतीकरण करणे, निविदेची किंमत वाढविणे यासह विविध गैरप्रकार या अधिकारी आणि कंत्राटदारांनी संयुक्तपणे केल्याचे उघड झाले आहे. जलसंपदा विभाग नागपूरचे तत्कालीन मुख्य अभियंता सोपान सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता संजय कोल्हापूरकर, विभागीय लेखाधिकारी सुधाकर घेगारे, कार्यकारी अभियंता देवेंद्र शिर्के यांच्यासह दोन खाजगी कंपनी संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
0
0
Report

ऑपरेशन टायगर पर शिंदे की भूमिका पर मची सियासी घमासान

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर... मंत्री संजय शिरसाट पत्रकार परिषद पॉइंटर ऑन ऑपरेशन टायगर - आम्ही कोणतेही ऑपरेशन टायगर करीत नाही. जण यायचे त्यांना आम्ही नाही म्हणणार नाही. आता आमची मानसिकता नाही मात्र जेव्हा ऑपरेशन टायगर करायचे तेव्हा एकनाथ शिंदे ठरवतील. आमच्या संपर्कात अनेकजण आहेत. काही महिन्यात हे सर्व एकत्र राहतील असे वाटत नाही. ऑन मुंबई चालक मराठी भाषा. - सरनाईक यांनी ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यासाठी काही वेळ दिला होता. अनेक राज्यात त्या त्या राज्याची भाषा बोलली जाते. मग मुंबईत मराठी का नाही. एवढे करूनही ऐकत नसतील तर ही मुजोरी म्हणावे. मग कारवाई होईल. ऑन दीपके मोदी भेट.राऊत विधान. - हवेत गोळ्या मरण संजय राऊत यांचं काम आहे. आता पर्यंत त्यांचे एकही विधान सत्य झाले नाही. ऑन रोहित पवार आंदोलन. - आमचा विरोध होण्याचा कारण नाही.राजकीय पोलिस भाजून घेण्याचे काम रोहित पवार करीत आहेत. पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी. - विरोधकांच्या पाणी फिरले आहेत. आमचे 17 चे 17 उमेदवार निवडून येतील. ऑन चाकणकर पोस्ट - यावर भाष्य करणे योग्य राहणार नाही. ऑन मंत्री भरणे विवादित विधान. - मंत्री भरणे यांचा बोलण्याचा उद्देश चुकीचा न्हवতা, शेतकरी राज्याला कुणीही हिणवण्याचा प्रयत्न कुणी करू नये. ऑन वेरूळ हत्या. - वेरूळची घटनेत 307चा आरोपी होता त्याला पकडण्यासाठी पोलिस गेले होते. या प्रकरणात जो आरोपी असेल त्यावर कारवाई केली जाईल. ऑन FDA कारवाई. - Fda च्या मोहिमेचा अभिनंदन केलं पाहोजे. मोठी कारवाई सुरू आहे. त्याचा स्वागत आहे जे प्रोटेक्शन पाहिजे ते सरकार देईल. - आतापर्यंत जे अधिकारी झोपले होते, अधिकारी काय करीत होते हा प्रश्न आहे. का आपल्याकडे लॅब नाहीत, तपासणी होत नाही. काही लोकांचे लागेबांधे व्यापाऱ्यासोबत होते. ही कारवाई थांबता कामानये. ऑन खत विक्री. - मुख्यमंत्र्यांनी परवाच्या बैठकीत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. आपल्याकडे मुबलक साठा आहे. असे सचिवांनी सांगितले आहे. बोगस खत विक्रीवर कठोर करावी करणार. - काँग्रेसचे अस्तित्व संपलेलेलं आहे. उमेदवार म्हणतो मी का खपू, उमेदवाराने निर्णय घेतले असेल तर गैर नाही. ऑन यशोमती ठाकूर आरोप. - तुम्ही जेव्हा सत्तेत होतात तेव्हा का आरोप केला नाही. 2019 मध्ये तुम्ही सत्तेत होता, तुम्ही किती देऊन मंत्रिपद दिले. ऑन ऑनलाइन खातविक्री आणि शेतकरी अडचणी. - ऑफलाईन खते मिळत नसल्याने शेतकरी कुठेही अडचणीत येऊ नये याबाबत सचिवाना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
0
0
Report
Advertisement

घाटसावळी में रेलवे पुल के लिए जमीन के मुआवजे में भारी फर्जीवाड़ा सामने: आम के पेड़ों को लाखों, घरों को कम?

Beed, Maharashtra:बीड: घरांपेक्षा आंब्याच्या रोपांना लाखोंचा मावेजा; घाटसावळी भूसंपादनावर संशयाचे सावट..! घाटसावळी येथे रेल्वे उड्डाणपुलासाठी करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राहत्या घरांपेक्षा आंब्याच्या छोट्या रोपांना लाखों रुपयांचा मावेजा मंजूर झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. काही झाडांना लाखोंचा मोबदला, तर काहींना केवळ दोन हजार रुपये मिळाल्याने या प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याची चर्चा रंगली आहे. पाहूयात आमचा हा विशेष रिपोर्ट... हातात मावेजाची कागदपत्रे घेऊन ती तपासणारे हे ग्रामस्थ आहेत बीड जिल्ह्यातील घाटसावळी गावचे. या गावातून रेल्वेचा उड्डाणपूल गेल्याने परिसरातील अनेक नागरी वसाहतींचे भूसंपादन करण्यात आले आहे. मात्र या भूसंपादनातील मोबदल्याच्या आकडेवारीने सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण राहत्या घरांपेक्षा तब्बल पाच पट अधिक मावेजा आंब्याच्या रोपांना मंजूर झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बॅरलमध्ये लावलेल्या एका आंब्याच्या रोपाला तब्बल आठ लाख रुपयांचा मावेजा मंजूर झाला आहे. तर जमिनीत लागवड केलेल्या काही आंब्याच्या झाडांना केवळ दोन हजार रुपयांचा मोबदला मिळाला आहे. एवढी मोठी तफावत कशी, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. घाटसावळी गावातील अनेक नागरिकांनी घरासमोर आंब्याची झाडे लावली आहेत. परिसरात सुमारे पन्नास आंब्याची झाडे असून त्यापैकी तब्बल तीस झाडांना प्रत्येकी चार लाख रुपयांचा मावेजा मंजूर करण्यात आल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. दुसरीकडे काही झाडांना अत्यल्प मोबदला देण्यात आला, तर काही झाडांची नोंदही करण्यात आली नसल्याचा आरोप आहे. ज्यांना चार लाख रुपयांचा मोबदला मिळाला, त्याच निकषांवर इतर पात्र झाडधारकांनाही मावेजा मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. घाटसावळी गावातून गेलेल्या या रेल्वे उड्डाणपुलासाठी सर्वे क्रमांक १८ मधील सुमारे चारशे मीटर परिसरातील जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे. या प्रक्रियेत अनेक घरे आणि नागरी वसाहतींचा समावेश आहे. मात्र इथेही मोबदल्यातील मोठी विसंगती समोर आली आहे. काही मोठ्या इमारतींना केवळ दहा लाख रुपयांचा मावेजा मिळाल्याचा दावा केला जात आहे, तर तुलनेने साध्या घरांना तब्बल चाळीस लाख रुपयांचा मोबदला देण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून यात भ्रष्टाचार झाला असावा, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. भूसंपादनात घोटाळा झाल्याची तक्रार ग्रामस्थानी करताच जिल्हा प्रशासन देखील आता सतर्क झाले आहे. याप्रकरणी चौकशी समिती नेमून अहवाल मागितला जाईल त्यानंतर रीतसर कारवाई करू असे आश्वासन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहे. त्यामुळे भूसंपादन अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. आंब्याच्या रोपांपासून ते घरांच्या मोबदल्यापर्यंत दिसून येणारी ही मोठी तफावत अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. भूसंपादन प्रक्रियेत नेमके कोणते निकष लावण्यात आले, मोबदल्याचे दर कसे ठरविण्यात आले आणि या सर्व प्रकरणात कोणाची जबाबदारी आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वस्तुस्थिती जनतेसमोर आणणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महेंद्रकुमार मुधोळकर Zee 24 तास बीड..
0
0
Report
Advertisement

अकोला के अकोट तालुके में सातबारा अनिवार्य, यूरिया-डीएपी वितरण पारदर्शी और शिकायत कम

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून युरिया आणि डीएपी खतासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. खतांच्या उपलब्धतेबाबत माध्यमांमध्ये बातम्या प्रसारित झाल्यानंतर प्रशासन आणि कृषी विभागाने परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला आधार कार्डच्या आधारे टोकन पद्धतीने युरिया वाटप सुरू करण्यात आले होते. मात्र या निर्णयावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेत, केवळ आधार कार्डच्या आधारे शेती नसलेले लोकही युरिया खरेदी करून साठेबाजी किंवा काळाबाजार करू शकतात, अशी भीती व्यक्त केली होती. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत प्रशासनाने निर्णयात बदल केला असून आता युरिया खरेदीसाठी आधार कार्डसोबत सातबारा उतारा सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे खऱ्या शेतकऱ्यांनाच खताचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.अकोला जिल्ह्यासाठी एकूण 7 हजार 101 मेट्रिक टन युरियाचा साठा उपलब्ध होणार असून, अकोट शहरात आज 818 मेट्रिक टन युरियाचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे युरियाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. तसेच सातबारा अनिवार्य केल्यानंतर कृषी सेवा केंद्रांवरील गर्दीही लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून येत आहे.अकोट तालुक्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया आणि डीएपी खतांची मागणी वाढली होती. पुरवठा कमी पडत असल्याने कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने टोकन पद्धत सुरू केली.मात्र केवळ आधार कार्डच्या आधारे खत वाटप केल्यास गैरव्यवहार होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आधार कार्डसोबत सातबारा उतारा बंधनकारक करण्यात आला.आज अकोट शहरात 818 मेट्रिक टन युरियाचा पुरवठा झाल्याने खत उपलब्धतेची समस्या मोठ्या प्रमाणात सुटली आहे. तसेच नवीन नियम लागू झाल्यानंतर कृषी केंद्रांवरील गर्दी कमी झाल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. Final Vo : सातबारा अनिवार्य केल्याने युरियाच्या वितरणात पारदर्शकता वाढणार असून साठेबाजीक आणि काळाबाजाराला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

जालना में पूर्व सरपंच पर 17 वर्षीय के दुष्कर्म का मामला दर्ज

Jalna, Maharashtra:जालना | माजी सरपंचाचा एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nजालना जिल्ह्यातल्या आष्टी पोलीस स्टेशनमध्ये पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल\nनवनाथ सोपान आयंदे असं संशयित आरोपीचं नाव\nअँकर- जालना जिल्ह्यातल्या एका गावात माजी सरपंचाने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडलीये.. या प्रकरणात पीडितेच्या फिर्यादेवरून जिल्ह्यातल्या आष्टी पोलिस स्टेशनमध्ये पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.. नवनाथ आयंदे असं संशयित आरोपीचे नाव आहे.. पीडित मुलीचे वडील आरोपीचे मित्र आहेत.. या ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने मुलीला पैशांचे अमिष दाखवून अत्याचार केला. पीडितेचे 12 वीचे शिक्षण पूर्ण झाले असून ती पालकांना शेती कामात मदत करत असे. संशयित आरोपी नवनाथ आयंदे हा पीडितेच्या वडिलांचा मित्र असल्याने शेतात आणि घरी येणे-जाणे होते. चार महिन्यांपूर्वी पीडिता शेतात काम करत असताना आरोपीने शरिरसुखाची मागणी केली. तरुणीने वारंवार नकार दिला. तरिही आरोपीने तिच्यावर वारंवार बळजबरीने अत्याचार केला. काही दिवसांपासून पीडितेला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरु झाला. उपचारासाठी तिला रुग्णालया नेले असता पीडित चार महिन्यांची गरोदर असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं. पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान या प्रकरणी आष्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
0
0
Report
Advertisement
0
0
Report

मिरा भाईंदर: शिवाजी महाराज के पुतले के पास खुलेआम दारू, संदीप राणे ने कड़ी चपत दी

Mira Bhayandar, Maharashtra:मिरा भाईंदर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उघड्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांना भरचौकात मनसे शहर अध्यक्ष संदीप राणेने दिला चोप. काशिमिरा नाका परिसरात उघड्यावर मद्यपान करून महिला व ज्येष्ठ नागरिकांना त्रास देणाऱ्यांचा सुळसुळाट वाढला होता. मनसे कडून बॅनर लावण्यात आला आहे कीं दारू पिणाऱ्या बेवड्यानो सावधान इथे दारू पियाल्यास चांगलाच चोप दिला जाईल. नागरिकांच्या तक्रारीनंतर मनसे शहराध्यक्ष संदीप राणे आणि कार्यकर्त्यांनी थेट घटनास्थळी धाव घेत तळीरामांना चांगलाच चोप दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या pुतळ्याच्या परिसरात दारू पिऊन पावित्र्य भंग करणाऱ्यांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा सज्जड दम मनसेने दिला.
0
0
Report

एकबुर्जी पर्यटन स्थल की हालत सुधारने की मांग तेज़

Washim, Maharashtra:वाशीम शहरालगत असलेल्या एकबुर्जी प्रकल्पावरील पर्यटन स्थळाची सध्या दयनीय अवस्था झाली असून पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने येथे गार्डन, लहान मुलांसाठी खेळण्यांची सुविधा तसेच बोटिंगची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र गेल्या तीन वर्षांपासून या पर्यटन स्थळाकडे दुर्लक्ष झाल्याने ते धूळखात पडले आहे. पावसाळ्यात एकबुर्जी प्रकल्पावरील धबधब्याचा आनंद घेण्यासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. मात्र लगतचे पर्यटन स्थळ बंद अवस्थेत असल्याने पर्यटकांची निराशा होत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हे पर्यटन स्थळ तातडीने सुरू करून आवश्यक दुरुस्ती व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,अशी मागणी जोर धरू लागली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top