411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वर्धा में 12 वर्षीय लड़की की हत्या: 3 आरोपी हिरासत में
Wardha, Maharashtra:वर्ध्यात 12 वर्षीय मुलीची दगडाने ठेचून हत्या - तीन संशयित आरोपीना घेतले ताब्यात. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून सावंगी पोलीस गुन्हा दाखल केलेला आहे पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. रोठा गावापासून मुलीचा शेतामध्ये त्याचाच घरामध्ये मृतदेह मिळाला. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ घटनास्थळात पोहोचून तपास सुरू केला. मयत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून सावंगी पोलीस गुन्हा दाखल केलेला आहे पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा गांभीर्य लक्षात घेता गुन्ह्याचा तपास एचडीपीओ दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे. फॉरेन टीम आणि सायबर पथकांकडून काही उपविभागीय ते 14 पथक तयार करण्यात आलेल्या तांत्रिक विभागातील दोन पथक तयार करण्यात आलेले आहे तपासामध्ये काही महत्त्वाची माहिती मिळाली असून त्यावर काम सुरू आहे. त्या माहितीवरून काही लोकांची चौकशी सुरू असून लवकरात लवकर आरोपी पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी स्वतः पोलीस अधीक्षक. या गुन्ह्यामध्ये मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला एफआरमध्ये लैंगिक अत्याचाराचे कलम समाविष्ट आहे. ओव्हरऑल लक्षात घेता तशी शक्यता आहे मेडिकल ओपिनियन घेणार आहे. तीन लोकांकडून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.0
0
Report
सिंधुदुर्ग में बारिश से फसलें टूटीं, मंत्री ने तुरंत नुकसान की जाँच और सहायता योजना की दी जानकारी
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, Impact बातमी --- अँकर — तळकोकणात पावसाने दडी मारल्याने बळीराजाच्या शेताला तडे जाऊन रोप देखील सुकून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान झाले होते. त्याची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी त्याच नुकसानग्रस्त भागात जात नुकसानीची पाहणी केली. व तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देत ही परिस्थिती कोकणात प्रथमच उद्भवलेली असून कोणत्या निकषांच्या अंतर्गत मदत करता येईल त्याची माहिती घेऊन उपाय योजना करू अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे, पालकमंत्री, सिंधुदुर्ग0
0
Report
चंद्रपुर में बारिश के लंबे अंतराल से धान की फसल संकट, दुबारा बुवाई की संभावना
Chandrapur, Maharashtra:राज्यातील पूर्व विदर्भातील चंद्रपूर- गडचिरोली -भंडारा -गोंदिया -नागपूर हे जिल्हे भाताचे कोठार समजले जातात. या पिकासाठी भरपूर पावसाची गरज असते. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या १६ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील धान आणि सोयाबीन पिके संकटात सापडली आहेत. सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून केलेली पेरणी आता पावसाअभावी करपू लागली असून, शेतातील ओलावा पूर्णपणे कमी झाला आहे. धानाची रोपे पिवळी पडत असून अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. पुढील तीन ते चार दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच बियाणे, खत आणि मजुरीवर मोठा खर्च झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, पावसाकडेच त्याच्या आशा लागल्या आहेत.0
0
Report
Advertisement
पंकजा मुंडे ने गेवराई के विकास के लिए पालकत्व स्वीकारने की घोषणा की
Beed, Maharashtra:बीड : "पालकमंत्री" सुनेत्रा वहिनी आहेत, पण मी जिल्ह्याची पालक आहे – मंत्री पंकजा मुंडे ANC - गेवराई नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध विकासकामांचा शुभारंभ मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी गेवराईच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, गेवराईचे पालकत्व मी स्वीकारते, अशी घोषणा केली. मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा वहिनी आहेत. मात्र मी जिल्ह्याची पालक आहे. संपर्कमंत्री म्हणून जिल्ह्यातील विकासकामांवर माझे लक्ष राहणार आहे. असही पंकजा म्हणाल्या.. सुनेत्राताईंशी माझी बैठक झाली असून जिल्ह्यातील विविध विकासकामाबाबत आम्ही चर्चा केली. आपण मिळून विकासकामे करूया, असे मी त्यांना सांगितले. त्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. गेवराईच्या विकासाबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "गेवराईचा संपूर्ण विकास करण्यासाठी मी गेवराईचे पालकत्व स्वीकारत असल्याची आज घोषणा करते. यापूर्वीही ही जबाबदारी मी पार पाडत होतेच, मात्र नव्या नगरपरिषदेच्या निमित्ताने ती अधिकृतपणे स्वीकारत आहे. गेवराईच्या विकासातील प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहीन. असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला माजी मंत्री बदामराव पंडित, नगराध्यक्षा गीता पवार, भाजप नेते बाळराजे पवार यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. साऊंड बाईट : पंकजा मुंडे, मंत्री.0
0
Report
जेजुरी दिंडी हादसे में घायल महिला वारकरी की मृत्यु
Sangli, Maharashtra:जेजुरी दिंडी अपघातातील जखमी महिला वारकरीचा मृत्यू,मृतांची संख्या ४ शैलजा जगताप वय 57 असे महिला वारकऱ्याचे नाव आहे,दोन दिवसांपूर्वी दिंडीत ट्रकच्या अपघातात सांगली जिल्ह्यातल्या तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता आणि चार jण गंभीर जखमी होते,त्यापैकी पुण्यातील रुग्णालयामध्ये कोल्हापूर येथील शैलाच्या जगताप यांच्यावर उपचार सुरू होते दरम्यान आज सकाळी त्यांचं निधन झालं आहे.मृत्यूची बातमी कळताच कवलापूर गावावर शोककळा पसरली आहे,कवलापूर मधील एका महिला वारकरीचा आधीच मृत्यू झाला आहे.त्यामुळे कवलापूर मधील वारकरी मृत्युची संख्या दोन झाली आहे,तथापि दिंडी सोहळ्यातल्या अपघाताच्या वारकरी मृत्यूंची संख्या चार झाली है।0
0
Report
विठुराय के 24 घंटे दर्शन शुरू, अब रोज 50 से 70 हजार भक्तों को दर्शन
Pandharpur, Maharashtra:विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीची वाट चालू लागले असताना पंढरी देखील हजारो भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेली आहे . आषाढी साठी येणाऱ्या लाखो भाविकांना देवाच्या दर्शन घेता यावे यासाठी आज देवाचा चांदीचा पलंग काढून दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले करण्यात आले आहे . विठुरायाचे नवरात्र सुरू होत असल्याने देवाच्या विश्रांतीचा चांदीचा पलंग या नवरात्री काळात काढण्याची परंपरा असल्याने विधिवत पूजा करून हे नवरात्र बसविण्यात आले . आज सकाळी देवाच्या पूजे नंतर देवाच्या मागे आणि रुक्मिणी मातेच्या पाठीला मऊ कापसाचा लोड लावण्यात आला असून आता २४ तास दर्शनासाठी उभ्या असलेल्या विठुरायाला थकवा जाणवू नये यासाठि ही व्यवस्था करायची परंपरा आहे . अणे... सकाळी देवाच्या शेजघरातील पलंग बाहेर काढण्यात आला . यावेळी या चांदीच्या पलंगावरील देवाच्या गाद्या गिरद्या देखील बाहेर काढून ठेवण्यात आल्या . देवाचे शेजघर मोकळे करून ठेवण्यात आले . आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करून देव फक्त भाविकांच्या दर्शनासाठी सज्ज झाला आहे . असे असतील विठुरायाचे नित्योपचार -- पहाटे साडेचार वाजता देवाचे स्नान आणि नित्यपूजा करण्यात येईल या काळात फक्त १ तास दर्शन बंद असेल . यानंतर दुपारी महानैवेद्याला १५ मिनिटे आणि रात्री नऊ वाजता लिंबू पाणी देण्यासाठी १५ मिनिटे दर्शन थांबविण्यात येणार आहे . याशिवाय संपूर्ण दिवस रात्र विठुराया आपल्या लाडक्या भक्तांना दर्शन देत उभा असणार आहे . देवाचे दर्शन २४ तास खुले केल्याने आता रोज पायावर ५० हजार तर मुखदर्शनातून ७० हजार भाविकांना दर्शन मिळू शकणार आहे . सध्या गर्दी वाढू लागत असल्याने मिनिटाला ४० भाविकांच्या दर्शनाचा वेग आता मंदिर समितीला वाढवावा लागणार असून मुखदर्शन रांगेत देखील जास्तीतजास्त भाविकांना दर्शन देता यावे यासाठी वेग वाढवावा लागणार आहे . आषाढी यात्रा काळात देवाचे दर्शन घेण्यास १८ ते २० तास अवधी लागत असल्याने सध्या रोज लाखभर भाविक दर्शनासाठी येथे येत असून सध्या ८ ते १० तासात देवाचे दर्शन मिळत आहे . आता आजपासून २४ तास दर्शन व्यवस्था सुरू झाल्याने हाच अवधी कमी होऊ शकणार आहे.0
0
Report
Advertisement
यवतमाळ: ढाणकी में स्मार्ट मीटर के विरोध में जनआंदोलन तेज, व्यापारी बंद का साथ
Yavatmal, Maharashtra:स्मार्ट मीटर सक्ती, वाढीव वीजबिले तसेच महावितरणच्या कार्यपद्धतीविरोधात यवतमाळच्या ढाणकी येथे जनआंदोलन उभे झाले असून, आज व्यापारी महासंघाकडून ढाणकी शहर कडकडीत बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. स्मार्ट मीटर बसविण्याच्या सक्तीविरोधात आणि वाढीव वीजबिलांच्या निषेधार्थ ढाणकी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी वेळोवेळी महावितरण कार्यालयात लेखी व तोंडी निवेदने दिली होती. मात्र, या निवेदनांची कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. महावितरणकडून वीज ग्राहकांचे जुने मीटर जबरदस्तीने काढून नवीन स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या विरोधात ३५ गावांतील नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि सर्वपक्षीय आज जन आक्रोश मोर्चा देखील काढला .0
0
Report
अहमदनगर के श्रीरामपूर में अपराध चरम पर, नागरिकों ने उग्र प्रदर्शन शुरू किए
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीने उच्छाद मांडला आहे.. दिवसाढवळ्या व्यावसायिकाची हत्या होतेय, गुन्हेगार कुणाला जुमानायला तयार नाही, अवैध व्यवसाय फोफावले आहेत या विरोधात आता नागरीकही आक्रमक झाले आहेत.. तीन दिवसापूर्वी किरकोळ कारणावरून हाॅटेल चालक आकाश दुबय्या या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली त्याला न्याय मिळावा आणी श्रीरामपूर शहरातील गुन्हेगारीचे उच्चाटन व्हावे असा विडा सर्वपक्षीयांनी उचलला आहे.. भाजपचे विधानपरिषदचे आमदार विवेक कोल्हे यांनी आज हत्या झालेल्या तरूणाच्या कुटूंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.. मुंबई नंतर सर्वात जास्त गुन्हे घडणारा अहिल्यानगर जिल्हा झाला असून श्रीरामपूरात वाढत चाललेली गुन्हेगारी चिंताजनक आहे याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं आमदार विवेक कोल्हे यांनी म्हणटलंय...0
0
Report
अमरावती के चांदूर रेलवे स्टेशन पर पेपरफुटी विरोधी आंदोलन में विद्यार्थी भारी संख्या में
Amravati, Maharashtra:अमरावतीच्या चांदूर रेल्वेत पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांच आंदोलन; विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी अँकर :- राज्यातील कथित पेपरफुटी प्रकरणावरून विरोधाचा सूर अधिक तीव्र होताना दिसत आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी विद्रोही कवी आणि व्याख्याते बेधुंदकार गोविंद पोलाड यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे पूर्वी पक्ष फोडले नंतर आमदार फोडले त्यानंतर खासदार फोडले आणि आता विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करत पेपरच फोडले जात आहेत असा आरोप केला. परीक्षांतील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांवरील अन्याय थांबवून पारदर्शक परीक्षा प्रक्रिया राबवावी अशी मागणी आंदोलकांनी केली. बाईट :- गोविंद पोलाद, कवी0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में लोककला अनुदान योजना में भजन कला को शामिल करने की घोषणा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..लोककला अनुदान योजनेत भजन कलेचाही समावेश होणार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची रत्नागिरीमध्ये ग्वाही यामध्ये नमन खेळे, जाखडी, वहीगायन आणि झाडीपट्टी या लोककला प्रकारांचा समावेश लोककला अनुदान योजनेत करण्यात आला आहे; त्याचप्रमाणे येत्या महिनाभरात भजन कलेचाही लोककला अनुदान योजनेत समावेश करणार असल्याची घोषणा राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी रत्नागिरी येथे केली. याशिवाय कोकणात मराठी सिनेमा महोत्सव आयोजित करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रचारासाठी नमन, नमन लोककला रत्नागिरी जिल्हा मातृसंस्था, कोकण नमन कलामंच, रत्नागिरी तालुका संस्था, कलगी-तुरा समाज उन्नत्ती मंडळ, रत्नागिरी जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आदि उपस्थित होते.0
0
Report
नवी मुंबई पोलिस ने हाइड्रो गांजा और कोकेन तस्करी के लिए अंतरराष्ट्रीय रैकेट का पर्दाफाश किया; 6 गिरफ्तारी
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने हायड्रो गांजा आणि कोकेनची तस्करी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला असून एकूण 6 आरोपीना अटक केलेय. नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने नशा मुक्त भारत अभियानांतर्गत तुर्भे येथील हॉटेल मंडे, मीरा रोड, चेंबूर, घाटकोपर आणि डोंबिवली परिसरात छापेमारी करून ही कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 1 किलो 300 ग्राम हायड्रो गांजा, 5 ग्रॅम कोकेन आणि 12 मोबाईल फोन असा एकूण 1 कोटी 33 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. याप्रकरणातील मुख्य आरोपी वृशांग भानुशाली हा थायलंडमध्ये राहून भारतात हायड्रो गांजाचा पुरवठा करत असून पोलिस अधिक तपास करत आहेत.0
0
Report
वर्धा में 12 वर्षीय लड़की की हत्या: खून से लथपथ बाथरूम में चेहरा-पसर गया सच
Wardha, Maharashtra:वर्ध्यात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या वर्ध्याच्या रोठा शिवारातील धक्कादायक घटना रक्ताच्या थारोळ्यात बाथरूम मध्ये पडून होती माझी मुलगी-आई माझ्या मुलीवर आधी अत्याचार केला नंतर हत्या केली-आई0
0
Report
Advertisement
दूध में भेसळ रोकथाम: Shirur लैब में दूध की कड़ी जाँच प्रक्रिया
Shirur, Maharashtra:Anc - राज्यात सध्या दूध भेसळीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठे भेसळ रॅकेट उघडकीस आणल्यानंतर दूध सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, शेतकऱ्यांकडून संकलित होणाऱ्या दुधात भेसळ झाली आहे की नाही, हे दूध प्रक्रिया उद्योग कसे ओळखतात? दूध स्वीकारण्यापूर्वी कोणत्या तपासण्या केल्या जातात आणि दुधातील भेसळ कशी शोधली जाते? याचाच आढावा आपण आता घेणार आहोत. शेतकऱ्यांकडून संकलित झालेले दूध प्रक्रिया उद्योगात पोहोचल्यानंतर ते थेट उत्पादनासाठी वापरले जात नाही. सर्वप्रथम त्याची प्रयोगशाळेत अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने तपासणी केली जाते. दुधातील फॅट, एसएनएफ, पाण्याची भेसळ, आम्लता, युरिया, स्टार्च, डिटर्जंट, साखर तसेच इतर रासायनिक भेसळीची चाचणी करूनच दूध स्वीकारले जाते. कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास संबंधित दूध तात्काळ नाकारले जाते. ही संपूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही शिरूर तालुक्यातील अंधळगाव येथील ऊर्जा मिल्क अँड कुतवळ मिल्क फूड्सच्या अत्याधुनिक दूध तपासणी प्रयोगशाळेला भेट दिली. यावेळी उद्योगाचे प्रमुख तथा राज्य सरकारच्या दूध प्रक्रिया उद्योग सल्लागार समितीचे सदस्य आणि राज्य दूध प्रक्रिया उद्योजक कल्याणकारी संस्थेचे सचिव प्रकाश कुतवळ तसेच प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी दूध तपासणीची संपूर्ण प्रक्रिया उलगडून सांगितली.0
0
Report
केतन अग्रवाल हत्या: राजस्थान दौरे से जुड़ी नई चौंकाने वाली जानकारी सामने
Varsoli, Maharashtra:केतन अग्रवाल हत्या प्रकरणी नवीन जानकारी समोर येत असून पुणे ग्रामीण पोलिसांचा एक पथक राजस्थान येथे तपासासाठी दाखल झाला आहे. सिया और चेतन यांनी राजस्थानातील विविध ठिकाणी केलेल्या दौऱ्याची माहिती पोलिसांनी गोळा केली आहे. घटनास्थळावरील तपास अंतिम टप्प्यात आहे; सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल फोन रेकॉर्ड व अन्य डिजिटल पुरावे यांची सांगड घालण्यावर जोर देण्यात आला आहे. तपास पथकाच्या माहितीनुसार अभ्यास हत्येच्या दिवसापासून मागील घटनाक्रमाचा मागोवा घेत आहे आणि आरोपींच्या हालचाली व क्रिया याची साखळी जोडली जात आहे. एक पथक राजस्थानला पाठवण्यात आला आहे. सिया आणि चेतन यांच्या राजस्थान दौऱ्याचा या प्रकरणाशी संबंध आहे का, याचा तपास केला जाईल. यापूर्वी पोलिसांनी सांगितले होते की घटनेच्या काही महिन्यांपूर्वी सिया आणि चेतन यांनी गुप्तपणे विवाह केला होता का, याचाही तपास सुरू आहे.兩घांमधील संवादाच्या विश्लेषणातून अशा कथित विवाहाबाबत धागेदोरे मिळाले असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे; विवाह कायदेशीररित्या नोंदणीकृत होता का, याचीही चौकशी केली जात आहे.0
0
Report
बारिश में पालखी महामार्ग से जुड़े वाखरी पुल के पास सर्विस रोड टूट गया
Pandharpur, Maharashtra:संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाला जोडणारा वाखरी पंढरपूर महामार्ग रस्त्याचा सर्व्हिस रोड पहिल्याच पावसात खचला. वाखरी पुलाजवळ जुन्या रस्त्याचे काम केले आहे. याठिकाणी केलेला डांबरी रस्ता पहिल्याच पावसात खचला आहे. त्यासाठी लावलेले संरक्षक कठडे सुद्धा खचले आहेत. याठिकाणी वापरलेले मुरूम डांबर हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आहे. पालख्या जाण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ठेकदार कडून घाईघाईत काम पूर्ण करताना या कामाचा दर्जा राखला नसल्याचे समोर आले0
0
Report
Advertisement
