411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रत्नागिरी में सीएनजी संकट, दो दिन से स्टेशन बंद, रिक्षाचालक परेशान
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी देखील cng गॅसचा तुटवडा पहाटेपासून सीएनजी मिळावा यासाठी सीएनजी स्टेशन बाहेर भली मोठी लाईन रत्नागिरी शहरातील माळ नाका परिसरातल्या सीएनजी स्टेशनवर पहाटेपासून 450 रिक्षांची लाईन रांगेत उभे राहिल्यानंतर पाच तासानं रिक्षामध्ये भरला जातोय गॅस पहाटे सहा वाजल्यापासून शेकडो रिक्षाचालक cng च्या लाईन मध्ये ऐन हंगामात सीएनजीच्या तुटवड्यामुळे रिक्षाचालक त्रस्त तांत्रिक अडचणीमुळे शहरातील एक सीएनजी स्टेशन दोन दिवसांपासून बंद0
0
Report
मुंबई-गोवा हायवे पर टोल शुरू, स्थानीय विरोध के बीच टोल मुक्त प्रवास की मांग
Chendhare, Maharashtra:मुंबई गोवा महामार्गावर टोलवसुली सुरू ..... खारपाडा इथला पहिला टोलनाका सुरू ...... टोलवसुलीला कोकण वासियांचा विरोध ...... महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसताना टोल आकारणीला कोकण वासियानी विरोध करायला सुरुवात केली आहे. विशेषतः स्थानिकांना विश्वासात घेता टोलनाका सुरू करण्यात आल्याने नाराजी आहे. स्थानिक वाहनांना टोलमुक्त प्रवास करता आला पाहिजे अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे. ३१ मे पर्यंत मुंबई गोवा महामार्ग १०० टक्के पूर्ण होईल असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे. परंतु सद्यस्थिती पाहता हे आश्वासन पूर्ण होईल असं दिसत नाही. असं असताना टोलवसुली कशासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या धोरणाविरोधात कोकण वासियांना मध्ये नाराजी असून लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालावं अशी मागणी होत आहे.0
0
Report
ईंधन संकट के बीच EV कारों की मांग बढ़ी, शहरों में बुकिंग तेज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:इंधनाची टंचाई भाव वाढ, आणि इ व्ही वापरायचे आवाहन यामुळं आता EV गाड्यांची मागणी प्रचंड वाढलीय, छत्रपती संभाजी नगर शहरात ज्या शो रूम मधून एक गाडी दिवसाला जायची तिथं आता 5 गाड्या जाताय, EV लोकांनी घ्यावी म्हणून मार्केटिंग टीम ला लोकांना राजी करावे लागे मात्र आता लोकच माहिती घेताय असे चित्र EV विक्रेते अनुभवताय, ज्या शहरात महिन्याला अवघ्या 30 EV विकल्या जायचा तो आकडा आता 200 वर गेलाय, बुकिंग वाढली आणि आता गाड्यांसाठी वैटिंग आली, असे विक्रेते सांगताय, EV च्या चारचाकी आणि दुचाकी दोन्ही गाड्यांसाठी हीच अवस्था आहे.. त्यामुळे इंधनाची टंचाई आणि EV वापरण्याच्या आवाहनानंतर EV गाड्यांना आणि त्याच्या विक्रेत्यांना चांगले दिवस आले असे म्हणता येईल..0
0
Report
Advertisement
यवतमाल पेट्रोल पंप पर दंपति को टिपर से धक्का, दोनों घायल
Yavatmal, Maharashtra:पेट्रोल पंपावर दुचाकी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या पती-पत्नीला एका टिप्पर ने धडक दिली जात दोघेही जखमी झाले आहेत. यवतमाळच्या लाडखेड येथील रेणुका पेट्रोल पंपावर. सीसीटीव्ही मध्ये अपघाताची दृश्य चित्रित झाली आहे. मोरगव्हाण गावातील सुलभा व एकनाथ राठोड हे दाम्पत्य पेट्रोल पंपावर दुचाकी घेऊन आले. पेट्रोल भरल्यानंतर डोक्याला दुपट्टा बांधत असताना तेथे आलेल्या दोघांनाही टिप्परने धडक दिली, ज्यात सुलभा राठोड यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले.0
0
Report
हिंगोली के सावना ग्रामपंचायत के ग्रामसेवक रिश्वत लेते पकड़े गए, निलंबित
Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोलीच्या सवना येथील ग्रामसेवकास घरकुलाच्या पाहणी अहवालावर स्वाक्षरीसाठी अडीच हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्यानंतर ग्रामसेवक रामप्रसाद खिल्लारी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे त्यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी काढले आहेत..0
0
Report
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर के BVG कर्मचाऱ्य ने भक्तों से पैसे लिए, सेवा रद्द
Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कडे काम करणाऱ्या BVG कंपनीच्या कर्मचाऱ्याची सेवा रद्द, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांना मंदिराकडे आणण्यासाठी इ रिक्षा ठेवल्या आहेत. सदर रिक्षा चालवणारा कर्मचारी कुणाल घोडके याने इ रिक्षात बसलेल्या भाविकांकडून पैसे घेतल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याची सेवा रद्द केली आहे. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.0
0
Report
Advertisement
चंद्रपूर नगर निगम में जनगणना घोटाले में 15 कर्मचाऱ्यां पर मामला, भद्रावती बीएलओ पर कार्रवाई
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर शहर मनपा हद्दीत जनगणना कामात हयगय करणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल, भद्रावती येथे बीएलओ देखील कारवाईच्या कक्षेत अँकर:-- जनगणना कामात हयगय करणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांवर चंद्रपूर शहर मनपा हद्दीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय भद्रावती तालुक्यात एका बीएलओ वर देखील प्रशासकीय कामात ढिसाळपणा दाखवण्याच्या मुद्द्यावरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे एकीकडे प्रशासन ॲक्शन मोडवर असल्याचे स्पष्ट होत आहे तर जनगणनेच्या कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. चंद्रपूर शहर मनपाच्या सहाय्यक आयुक्तांनी यासंदर्भात तक्रार दिली असून यातील सर्वाधिक कर्मचारी सोमय्या पॉलिटेक्निक या संस्थेचे आहेत. भद्रावती तालुक्यातील शिक्षक धनराज मगरे यांच्यावर बीएलओ म्हणून जबाबदारी होती. मात्र त्यांनी हे काम टाळले. यासंदर्भात त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील देण्यात आली होती मात्र त्यानंतरही कुठलाही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली0
0
Report
परतवाड़ा के आठवड़ी बाजार में शॉर्ट-सर्किट से बीयर शॉप में आग, लाखों का नुकसान
Amravati, Maharashtra:परतवाडा येथील आठवडी बाजार परिसरातील बिअर शॉपीला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; आगीने व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान आगीची माहिती मिळताच अचलपूर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेत आग नियंत्रणात आणली आहे. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आग इतर दुकानांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले असून या आगीत दुकान संचालक जयस्वाल आणि सुरेश वाधवानी यांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले असून व्यापाऱ्यांनीही आग विझविण्यासाठी मदत केली आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवित हाणी झाली नाही.0
0
Report
बोरगांव में बिबटिए के हमले से पांच भेड़ें मौत, किसान भयभीत
Sangli, Maharashtra:स्लग - बोरगावात बिबट्याचा थरार.. बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्यांचा जागीच मृत्यू.. अँकर :- सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे हल्ल्यात पाच शेळ्या जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.बोरगाव येथील शेतकरी लहू सलगर यांच्या शेतात रात्रीच्या वेळी मेंढ्या व शेळ्यांचा कळप बसवण्यात आला होता. रात्री २ वाजण्याच्या sुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक या कळपावर हल्ला चढवला.बिबट्याचा हा हल्ला इतका भयानक होता की,यात निपाणी येथील मेंढपाळ संजय हजारे यांच्या २ कोकरू आणि ३ मेंढ्या अशा एकूण ५ जनावरांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर परिसरात जनावरांची मोठी पळापळ झाली.या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, वारंवार होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून वनविभागाने तात्काळ नुकसान भरपाई देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
प्रशांत बंब का इंधन बचत प्लान: ग्रामीण कर्मचारियों को मुख्यालय में रहने की सलाह
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:देशात राज्यात सगळीकडे सध्या इंधन वाचवा असे आवाहन केल्या जातंय, त्यात भाजप आमदार प्रशांत बंब यांनीच इंधन अपव्यव बाबत एक गंभीर मुद्दा उपस्थित केलाय. ताफ्यातील वाहने इतर गोष्टी करून थोडी बहुत बचत होईल मात्र मात्र ग्रामीण भागात काम करणारे कर्मचारी मुख्यालयी राहिले तर कोट्यवधींचे शेकडो लिटर इंधन वाचेल असे त्यांच्या म्हणणे आहे.. प्रशांत बंब छत्रपती संभाजी नगरातील गंगापूर चे आमदार आहेत त्यांच्या मतदार संघात 1600 वर शिक्षक, 300 वर आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, असे 2300 वर कर्मचारी आहेत हे सगळे शहरात राहतात आणि कामांसाठी अप डाउन करतात, नियमानुसार या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे असे नियम आहे त्याची तर सर्रास पायमल्ली होत असल्याचं बंब म्हणतात, किमान या कठीण काळात हे सगळे कर्मचारी मुख्यालयी राहिले तर इंधन बचत होईल असे बंब सांगताय.. एक तालुक्यत 2300 म्हणजे जिल्ह्यातील 9 तालुक्यत 21 हजार वर कर्मचारी आणि हेच गणित राज्यावर लावले तर हा आकडा शेकडो कर्मचारी कोट्यवधी पैसे, आणि लाखो लिटर इंधन पर्यंत जातोय, त्यामुळे सत्ताधारी आमदारांचा हा प्रस्ताव बाबत राज्य सरकार काही निर्णय घेईल का याचीच चर्चा आहे...0
0
Report
सोलापुर में आज से तीन दिन बारिश की संभावना, गरज के साथ तेज हवाओं की संभावना
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात आजपासून तीन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज - सोलापूर जिल्ह्यात 16 ते 18 मे च्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता - विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडण्याचा व्यक्त करण्यात आला अंदाज - ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता - हवेच्या अस्थिरतेमुळे वादळी वारे आणि पावसाचा व्यक्त करण्यात येतो अंदाज - शुक्रवारी सकाळी सोलापूरकरांना अकरा वाजेपर्यंत ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन नाहीच - सोलापूरकरांना कडक उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता0
0
Report
वाशिम: अमरावती-करंजा हाईवे पर मध्यरात्रि ट्रैक्टर-ट्रक हादसा, Ek की मौत, एक घायल
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील अमरावती-कारंजा महामार्गावर मध्यरात्री भीषण आणि विचित्र अपघात झाला. कामरगावजवळील टाकळी फाट्यावर भरधाव ट्रॅव्हल्सने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. धडकेनंतर घटनास्थळी मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मागून येणाऱ्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याखाली पलटी झाला. सुदैवाने ट्रक चालक बचावला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामुळे अमरावती-कारंजा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. अपघातात ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून,जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
वैजपूर में ग्राम पंचायत भ्रष्टाचार के विरोध में प्रदर्शन के दौरान आरोपी ने आत्मदहन का प्रयास; पुलिस ने की समय रहते हस्तक्षेप
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील सावखेड खंडाळा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणात तक्रारदार किरण भागिनाथ पवार यांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने चौकशी सुरू केली नसल्याचा आरोप करत त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. वैजापूर तालुक्यातील सावखेड खंडाळा येथील रहिवासी किरण भागिनाथ पवार यांनी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराबाबत जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत अनेक तक्रारी केल्याचा दावा केला आहे. तक्रारीनंतरही कोणतीही ठोस चौकशी किंवा कारवाई होत नसल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत त्यांनी आज जिल्हा परिषद कार्यालयात आंदोलन केले. यावेळी त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी तत्काळ धाव घेत त्यांना रोखलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.0
0
Report
रत्नागिरी सीट पर महायुती बनाम शिवसेना-राष्ट्रवादी के बीच पेच
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकण विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत पेच.. गुरु-शिष्य येणार आमने-सामने.. शिंदे शिवसेनेसह राष्ट्रवादीत चढाओढ.. अँकर कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या रिक्त जागेसाठी लवकरच निवडणूक होणार आहे.. यापूर्वी या जागेचे प्रतिनिधित्व खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांनी केले होते,मात्र आता राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे आणि कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षनिहाय संख्याबळ पाहता या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे.. विशेषतः रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांमध्ये शिंदेच्या शिवसेनेने आपलें वर्चस्व वाढविले आहे..त्यामुळे ही जागा शिवसेनेने आपल्याकडे राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले तर महायुतीत या जागेवर मोठा पेच निर्माण होणार आहे.. कोकण विभागात या मतदार संघात शिवसेनेचे पारडे जड आहे.. रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मिळून एकूण 831 मतदार सदस्य आहेत.. यामध्ये एकट्या शिंदेच्या शिवसेनेच्या सदस्यांची संख्या 219 वर पोहोचली आहे..अशा परिस्थितीत ज्या पक्षाकडे सर्वाधिक संख्याबळ आहे त्याच पक्षाचा उमेदवार विधानपरिषदेवर जावा असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे.. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गुरु-शिष्यांची राजकीय लढाई.. खासदार सुनील तटकरे हे मंत्री उदय सामंत यांचे राजकीय गुरू मानले जातात,मात्र आता राजकीय अस्तित्वाची वेळ आल्यावर उदय सामंत आपल्या शिवसेनेसाठी ही जागा पदरात पाडून घेण्यात यशस्वी होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.. सुनील तटकरे आपल्या मुलासाठी पुन्हा एकदा आग्रही राहणार आहे हे निश्चित मानले जात आहे.. परंतु शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ही पाडलेल्या संख्याबळाच्या जोरावर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केल्याची अंतर्गत चर्चा सुरू आहे.. त्यामुळे महायुतीत या जागेवर मोठा पेच निर्माण होऊ शकतो0
0
Report
कोल्हापुर में कंटेनर से 40 लाख के दारू का भंडाफोड़, चालक गिरफ्तार
Kolhapur, Maharashtra:Anc:- परवाना औषधाचा असताना कंटेनर मधून तब्बल 40 लाखाचा दारू साठा वाहतूक करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात असणाऱ्या मजले गावाजवळ कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करत हा कंटेनर पकडला आहे. कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाला औषधाचा परवाना असताना कंटेनर मधून अवैधरीत्या दारू साठा वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कोल्हापूर सांगली रोडवर असणाऱ्या मजले गावाजवळ सापळा लावला.. संबंधित कंटेनर जात असताना वाहकाकडे कागदपत्रांची मागणी. त्यावेळी वाहकाने औषधांची वाहतूक करत असल्याची कागदपत्रे दाखवली. पण पथकाला संशय आल्याने गाडीची झडती घेतली. त्यावेळी कंटेनर मध्ये तब्बल 40 लाखाचा दारू साठा सापडला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने गाडी जप्त करत राजस्थानचा चालक भलाराम भीष्मोई याला अटक केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने चाळीस लाखाची दारू आणि 25 लाखाचा कंटेनर असा एकूण 65 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.0
0
Report
Advertisement
