411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
ल Lasalagav के सोهان नगर में गैस टैंक विस्फोट; पांच बच्चे बचे, आग पर काबू
Lasalgaon, Maharashtra:लासलगाव येथील सोहन नगर परिसरात गैस टाकीचा भीषण स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली पत्र्याचे घर असल्याने प्रचंड उकाड्यामुळे घरातील सदस्य घराबाहेर झाडाखाली बसले होते त्यामुळे पाच जण थोडक्यात बचावले असून मोठी जीवितहानी टळली आहे स्फोट इतका जोरदार होता की घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच स्फोटानंतर लागलेल्या आगीमुळे परिसरातील काही झाडेही जळून खाक झाली घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले दरम्यान, सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या टँकराच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते0
0
Report
गडचिरोली के अटापल्ली में इलाज देर से मिलने से महिला की मौत
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात एक अत्यंत धक्कादायक घटना पुढे आली आहे. एटापल्ली तालुक्यातील कांदोळी गावच्या एका महिलेचा वेळेत उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झालाय. या घटनेमुळे आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका उपलब्धता आणि रस्त्यांच्या दुरवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कांदोळी गावातील एका महिलेने घरगुती कारणावरून विष प्राशन केले. तिला दुचाकीवरून गंभीर अवस्थेत जवळच्या बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. या भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रतीक मुधोळकर यांनी परिस्थितीची जाणीव होताच पुढाकार घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली. बुर्गी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले. मात्र रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात हलविणे आवश्यक होते. मात्र रुग्णवाहिकेचा चालक अनुपस्थित होता. वेळ न दवडता मुधोळकर यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवत महिलेला एटापल्ली येथे पोहोचवले. मात्र खराब व खड्डेमय रस्त्यामुळे प्रवासात विलंब झाला, ज्याचा थेट परिणाम उपचारांवर झाला. एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र उपचारादरम्यान महिलेची ऑक्सिजन पातळी सतत घसरत गेल्याने अखेर तिचा मृत्यू झाला. दुर्गम भागातील रस्त्यांची स्थिती, रुग्णवाहिकेचा अभाव, जीवरक्षक प्रणालीची गरज याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.0
0
Report
विट्ठलवाड़ी स्टेशन पर युवक ने लोकल ट्रेन के टप पर चढ़कर ट्रेन रोक दी
Ambernath, Maharashtra:लोकल ट्रेनच्या टपावर एक तरुण चढला. विठ्ठलवाडी स्थानकात लोकल ट्रेनचा खोळंबा. विठ्ठलवाड़ी रेल्वे स्थानकात ही लोकल आल्यानंतर प्रवाशांना एक तरुण लोकलच्या टपावर चढल्याचं दिसलं. त्यांनी रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या तरुणाला खाली उतरण्याचा प्रयत्न केला. यासाठी दोन ते तीन हमालही लोकलवर चढवण्यात आले. अखेर मोठ्या शर्थीच्या प्रयत्नांनी हा तरुण खाली उतरला. या सगळ्यामुळे लोकल ट्रेनचा खोळंबा झाल्यानं प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.0
0
Report
Advertisement
शिर्डी जमीन घोटाले के मुख्य आरोपी अशोक खरात को कोर्ट ने 5 दिन की पुलिस कोठडी दी
Shirdi, Maharashtra:शिर्डीत गाजत असलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी भोंदू अशोक खरात याला शिर्डी पुलिस न्यायालयात हजर केलं. न्यायालयात हजर केल्यानंतर तपासी अधिकारी, सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलाचा जोरदार युक्तिवाद झाला. या एक ते दिड तासांच्या युक्तिवादानंतर अशोक खरातला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. नेमकं राहता कोर्टात काय घडलं, पाहूया हा रिपोर्ट. न्यायाधीशांसमोर भोंदू अशोक खरातला हजर करण्यात आलं. कोर्टात उभा असताना खरात खाली मान घालून स्तब्ध उभा होता. न्यायाधीशांनी विचारलं काही सांगायचं आहे का, यावर खरातने नकारार्थी मान हलवली. शिर्डी पोलिसांनी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत युक्तिवाद मांडायला सुरुवात केली. तपासी अधिकारी PSI निवांत जाधव यांनी गुन्ह्याची गंभीरता अधोरेखित केली. जमीन खरेदीसाठी आलेली कोट्यवधींची रक्कम, व्याजाचे व्यवहार आणि इतर सहभागी आरोपी यांचा तपास करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. या प्रकरणात एकूण 14 व्यवहार झाले असून तब्बल 5 कोटी 52 लाखांची उलाढाल झाल्याचा दावा पोलिसांनी युक्तिवादात केला. दरम्यान, आरोपीची पत्नी कल्पना खरात फरार असून तिचा शोध घेण्यासाठी अशोक खरातची चौकशी केल्यास आणखी माहिती मिळेल अस पोलिसांनी म्हटलं. त्याचबरोबर सरकारी वकील अॅड. गौरव बोर्डे यांनीही आरोपींच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. विविध पतसंस्थांमधील खाती, मोठ्या रकमेचे व्यवहार आणि फसवणुकीचा उद्देश स्पष्ट होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. मात्र, बचाव पक्षाने म्हणजेच आरोपीच्या वकिलाने सर्व आरोप फेटाळले. जमीन व्यवहाराची संपूर्ण रक्कम फिर्यादीला देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. तसेच, फिर्यादीने का उशिरा गुन्हा दाखल केला असा प्रश्नही उपस्थित केला. सावकारीचे कलम लावण्यावरही बचाव पक्षाने आक्षेप घेतला. कल्पना खरात फरार असल्याचा पोलिसांचा दावा फेटाळत, आरोपी 18 मार्चपासून नाशिक पोलीस आणि SIT च्या ताब्यात असल्याचं आरोपीच्या वकिलाने कोर्टात सांगितलं. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर एक तासाने न्यायालयाने या सुनावणीवर निर्णय देत अशोक खरातला 9 मेपर्यंत म्हणजेच चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती सरकारी वकील अॅड. गौरव बोर्डे यांनी दिली. मात्र त्यांनीही या प्रकाराबाबत माध्यमांशी जास्त बोलणं टाळलं. न्यायालयाने गुन्ह्याचं भयावह गांभीर्य ओळखत भोंदू अशोक खरातला न्यायालयाने थेट पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आता या पाच दिवसांत शिर्डी पोलीस पैशांचा काळा प्रवाह, बनावट व्यवहारांची जाळी आणि फरार कल्पना खरातचा ठावठिकाणा उघड करण्यासाठी शिर्डी पोलिस दिवसरात्र एक करून कसून चौकशी करणार आहेत. या तपासातून मोठं रॅकेट उघडण्याची दाट शक्यता असून, खरातच्या अडचणी आता आणखी वाढणार हे निश्चित.0
0
Report
पश्चिम बंगाल में भाजपा की सत्ता: संघ की योजना और स्वयंसेवकों का बड़ा योगदान
Yavatmal, Maharashtra:पश्चिम बंगाल मध्ये भाजपाने इतिहास घडवीत सत्ता मिळविली असली तरी त्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूक्ष्म नियोजनाचं आणि झटलेल्या स्वयंसेवकांचं मोठं योगदान आहे. पश्चिम बंगाल मध्ये भाजपचं काम नसताना 1969 च्या कालखंडात संघाने देशभरातून प्रचारक तेथे पाठविले, त्यावेळी यवतमाळचे बबनराव सारोळकर ह्यांनी देखील आठ ते दहा वर्ष पश्चिम बंगाल मध्ये प्रचारक म्हणून काम करीत संघ विस्तार केला. राष्ट्र प्रथम हा भाव ठेऊन निरपेक्ष सेवाकार्य केले. त्यामुळे आज भाजपच्या हाती सत्ता आल्याने तेथील असुरक्षिततेचा भाव दूर व्हावा व जनतेने मोकळा श्वास घ्यावा अशी अपेक्षा वयोजेष्ठ स्वयंसेवक बबनराव सारोळकर यांनी व्यक्त केली आहे, त्यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी.0
0
Report
पुणे के लोणी काळभोर में भीषण धमाका, एक जन घायल, बड़ा हादसा टला
Shirur, Maharashtra:पुणे लोणी काळभोरमध्ये भीषण स्फोट,एक जखमी, मोठी दुर्घटना टळली, घटने घटनेचा सीसीटीव्ही समोर पुण्याच्या लोणी काळभोर येथील माळी मळा परिसरात भीषण स्फोटाची घटना घडली असून या दुर्घटनेत एक जण जखमी झाला असून या स्फोटाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डिझेल-पेट्रोल वाहतूक करणाऱ्या टँकरवर वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला.या घटनेत एक कामगार जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने स्फोटाची तीव्रता मर्यादित राहिल्याने मोठी दुर्घटना टळली।0
0
Report
Advertisement
12 घंटों में आरोपी गिरफ्तार: वृद्ध की सोने की अंगूठी चुराने वाला पकड़ाया
Akola, Maharashtra:अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली आहे. या कारवाईत सुमारे १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. फिर्यादी हे कामानिमित्त बाहेर गेले असताना एका अनोळखी युवकाने मोटारसायकलवर येत त्यांना धमकावून त्यांच्या हातातील सुमारे ४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी हिसकावून नेली होती. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला अटक केली. आरोपीकडून चोरीस गेलेली अंगठी व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
श्री वरदविनायक मंदिर में भक्तों की भारी भीड़, आज अष्टविनायक में विशेष पूजा
Mahad, Maharashtra:महड येथील श्री वरदविनायक मंदिर येथे आज भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या या मंदिरात आज विशेष पूजा-अर्चा करण्यात आली. आजच्या दिवशी मंदिरात तब्बल एक लाख मोगऱ्याच्या फुलांचे अर्पण करण्यात आले. तसेच आंब्याच्या फळांचेही श्रींना नैवेद्य अर्पण करण्यात आले. फुलांच्या सुगंधाने आणि भक्तीमय वातावरणाने परिसर भारावून गेला होता. अंगारका चतुर्थी निमित्ताने मंदिरात अन्नछत्र सुरू करण्यात आले असून, मोठ्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दिवसभर दर्शनासाठी भाविकांची रांग लागलेली पाहायला मिळाली.0
0
Report
मस्साजोग ग्रामपंचायत ने आवादा कंपनी का NOC रद्द किया; स्थानीय रोजगार की शर्तें लागू
Beed, Maharashtra:बीड: आवादा कंपनीकडे खंडणी प्रकरणातून मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. आता त्या कंपनीवरून मस्साजोग येथील ग्रामपंचायतीने ठराव पारित केला आहे. ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या कंपनीमध्ये स्थानिक मजुरांना रोजगार मिळावे, कंपनीचा ठेकेदार हा स्थानिक रहावा असा ठरावच पारित करण्यात आलाय.. अटी शर्ती मान्य नसल्यास याआधी दिलेली NOC थेट रद्द करण्यात येईल असा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्या प्रकरणी दोन गट भिडले होते. याच वादातून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. घटनेला 18 महिने पूर्ण होत आहेत. घटनेनंतर तब्बल 18 महिन्यांनी सरपंच पदासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला. स्वरूपानंद देशमुख ही विजयी झाले. काल सरपंच स्वरूपानंद देशमुख यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला. पदभारानंतर पहिलच ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत आवादा कंपनीमुळे गावाचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान झाल्याची चर्चा झाल्यानंतर कंपनीची थेट NOC रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नाही तर या कंपनीत स्थानिक मजुरांनाच काम मिळाले पाहिजे, कंपनीचा ठेकदार हा स्थानिक असला पाहिजे. असा ठराव एकमताने पारित करण्यात आला. स्थानिकांना रोजगार मिळेल यासाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांनी आवादा कंपनीला NOC दिली होती. मात्र त्यांची हत्या झाल्यानंतर कंपनीत दोन कामगार वगळता स्थानिकांना काम देण्यात आले नाही. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पहिल्याच झालेल्या ग्रामसभेला सदस्यांसह ग्रामस्थानी मोठी हजेरी लावली होती. ठरावाप्रमाणे आवादा कंपनीने न्याय नाही दिल्यास कंपनीचे काम सुरू करू देणार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ज्या कंपनीमुळे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली त्याच नवनिर्वाचित ग्रामपंचायतीने हा ठराव घेतल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दोन समाजात मोठे तेढ निर्माण झाले. जिल्ह्याची सामाजिक स्थिती खालावली. त्यामुळे ग्रामस्थानी घेतलेला ठराव हा योग्य असल्याचे मत सामाजिक जाणकार व्यक्त करत आहे. या ठरावाची प्रशासनाने पुढाकार घेऊन तत्काळ अंमलबजावणी करावी जेणेकरून वाढलेली सामाजिक अस्वस्थता कमी होईल असे मत समोर येत आहे. एकंदरीत, मस्साजोग ग्रामपंचायतीने घेतला हा ठराव केवळ एका कंपनीविरोधातील भूमिका नसून स्थानिक हक्क, रोजगार आणि सामाजिक न्यायासाठीचा ठोस संदेश मानला जातोय. गावाच्या विकासात स्थानिकांचा सहभाग आणि सन्मान याला प्राधान्य देण्याची भूमिका ग्रामस्थांनी स्पष्ट केली आहे. आता या ठरावावर प्रशासन आणि संबंधित कंपनी काय भूमिका घेतात, तसेच गावातील तणाव कमी करून विकासाचा मार्ग कसा मोकळा केला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महेंद्रकुमार मुधोळकर, ZEE 24 तास बीड0
0
Report
Advertisement
लोकशाही दिन में प्रशासन ने लंबित अर्ज तुरंत निपटाने के निर्देश दिए
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. लोकशाही दिनात सीईओंचा इशारा! प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढा रत्नागिरीत पार पडलेल्या लोकशाही दिनात प्रलंबित अर्जांच्या प्रश्नावर प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी सर्व विभागांना स्पष्ट सूचना देत, प्रलंबित तसेच नव्याने दाखल होणारे अर्ज तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा सहभाग होता, तर क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे जोडले गेले होते. मागील अर्जांचा आढावा घेत संबंधित विभागांना अहवाल सादर करण्यासही सांगण्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारींना वेळेत न्याय मिळावा, यासाठी प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे…0
0
Report
मराठवाड़ा के शहरों में पानी आपूर्ति 5-15 दिनों के अंतराल पर
Jalna, Maharashtra:जालना: मराठवाड्यातील शहरांना साधारणतः दर 5 दिवसांनी पाणीपुरवठा, पाणीपुरवठयात प्रशासनाकडून नियोजनाचा अभाव (पॅकेज) जालना मध्ये 8 ते 15 दिवसाआड पानीपूरवठा, नागरीक हतबल एक किंवा दोन दिवसाआड पानीपुरवठा करवण्याची नागरीकांची मागणी अँकर: मराठवाड्यात सध्या तीव्र पाणीटंचाई पाहायला मिळतेय. याशिवाय पानीपुरवठा करताना महानगरपालिका, नगर परिषदांकडून नियोजनाचा अभाव असल्याचं पाहायला मिळतोय. मराठवाड्यातील प्रमुख शहरांना नियोजनाचा चांगलाच फटका बसलेला दिसून येत असल्याचं दिसतंय. प्रमुख शहरांना साधारणपणे 5 दिवसाधारणपणे पाणीपुरवठा होत असल्याचं दिसतंय. बघूया हा स्पेशल रिपोर्ट व्हिओ:०१: सध्या मराठवाडा तापत्या उन्हानं चांगलाच गरम झालाय. त्यात महानगरपालिका आणि नगरपरिषद कार्यालयाकडून पाणीपुरवठयात नियोजनाचा अभाव दिसून येतोय. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालनासह सर्वच प्रमुख शहरात साधारणतः दर पाच दिवसांनी पाणीपुरवठा होतोय. त्यात एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड पाणीपुरवठा व्हावा अशी ठिकठिकाणच्या नागरिकांची मागणीय. पण महापालिका आणि नगर परिषदांच्या पाणीपुरवठयाच्या नियोजनाअभावी नागरीक हतबल झालेत. तर जालन्यात 8 ते 15 दिवसाआड शहरात पाणीपुरवठा होतो. त्याचं कारण आहे जलशुद्धीकरण प्रकल्पाचं रखडलेलं काम. जालन्यात जेईएस महाविद्यालयाच्या परीसरात 15 एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम संथ गतीने सुरू आहे. या प्रकल्पाचं काम 60 टक्के पूर्ण झालंय. पण प्रकल्पाला गरजेचा असलेला 72 पैकी 33 कोटींचाच निधी मिळाला त्यामुळे या प्रकल्पाला 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्यानं ऑक्टोबर अखेर पर्यंत जालना शहराला 15 दिवसाआडच पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. वाक थ्रू- नितेश महाजन, प्रतिनिधी व्हिओ:02: मराठवड्यात नुसत्या जालन्यात ही परिस्थिती नाही तर ईतर शहरात देखील काही अपवाद वगळता अशीच परिस्थिती आहे. बघूया कोणत्या शहराला किती दिवसाआड पाणीपुरवठा होतो. ● छत्रपती संभाजी नगरात अजूनही पाच दिवसाआड पाणी येतं. प्रस्तावित पाण्याची योजना अजून पूर्ण झाली नाही. त्यामुळे पाण्याची ही गैरसोय आहे ● जालन्यात 8 ते 15 दिवसाआड पाणी पुरवठा होतो. ● धाराशिवमध्ये 8 ते 10 दिवसांनी ● नांदेडमध्ये 3 दिवसाआड ● लातूरमध्ये 5 ते 6 दिवसांनी ● बिडमध्ये 10 दिवसांनी ● हिंगोलीत 6 दिवसांनी तर परभणीत 4 ते 5 दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्यानं नागरीकांना गरजेईतका पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे टँकर विकत घेऊन नागरिकांना पाण्याची गरज भागवावी लागते बाईट : प्रिती खर्डेकर, महिला नागरीक बाईट : उध्दव ठाकर, नागरीक(निळा शर्ट) बाईट : निखिल जाधव, भगवा टी शर्ट व्हिओ:०३: दरवर्षी उन्हाळा आला की नागरीकांची मदार ही टँकरच्या पाण्यावर पाहायला मिळते. यंदा यात बदल होईल असं नागरिकांना वाटत होतं. मात्र प्रशासनाकडून पाणीपुरवठयाबाबत कोणत्याही ठोस उपाययोजना होत नसल्यानं नागरीकांना एक किंवा दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत नाहीय. त्यामुळे मराठवड्यात अनेक भागात विकतच्याच पाण्यावर नागरिकांची मदार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय.0
0
Report
एपीएमसी फलों बाजार में आमों पर घातक रसायन फवारना: नवी मुंबई में प्रशासन सख्त
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात आंब्यावर घातक रसायनांची फवारणी करुन कुत्रीमरित्या आंबा पिकावण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्याने याची दखल प्रशासनातर्फे घेतली . अन्न व औषध विभागातर्फे एपीएमसी फळ बाजारात धाड टाकत आंबे व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेय. अन्न व औषध विभागाने आंब्याच्या पेट्या, केमिकलं आणि फवारणी साठी वापरण्यात येणारे साहित्य तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत । केलेल्या कारवाई योग्य असल्याचे आंबा व्यापारी चे म्हणणे आहे,कृत्रिम रीत्या आंबा पिकवणाऱ्या वर कारवाई करावी ,आंबा रायपनिग चेंबर मद्ये पिकवलेले आंबे ग्राहकांनी खरेदी करावे असे आवाहन आंबा व्यापारी करत असून, शासनाने देखील जे स्प्रे फवरण्यात येत आहे ते योग्य आहे का याचा खुलासा करावा आशा कंपनी जे स्प्रे तयार करत असतील त्याच्यावर बंदी घालावी अशी मागणी व्यापारी करत आहेत。0
0
Report
Advertisement
बीड़ में नसरापुर की चिमुरड़ी पर अत्याचार के विरोध में सभी दलों ने प्रदर्शन
Beed, Maharashtra:बीड: नसरापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात बीडमध्ये निदर्शने... ANC- पुण्याच्या नसरापूरमध्ये चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांकडून बीडमध्ये निदर्शने करण्यात आली. यावेळी महिलांना.. नको मानधन, द्या संरक्षण आणि आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. तर चिमुरडीवरील अत्याचाराच्या घटनेचा बीड जिल्ह्यात सर्वच स्तरातुन निषेध नोंदवला जात आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळावी यासाठी तर कायदा करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतच्या मागण्यांची निवेदन दिले. बाईट: महिला आंदोलक0
0
Report
लोकल ट्रेन की छत पर चढ़े युवक से ट्रेन आधे घंटे रुकी
Kalyan, Maharashtra:लोकल ट्रेनाच्या टपावर चढला तरुण, लोकल ट्रेनचा खोळंबा. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात लोकल ट्रेन आली असता त्या लोकल ट्रेनच्या टपावर एक तरुण चढला. त्याला खाली उतरण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. मात्र या तरुणाच्या या करामतीने लोकल ट्रेनचा जवळ जवळ अर्धा ते पाऊण तास खोळंबा झाला. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात ही लोकल आल्यानंतर प्रवाशांना एक तरुण लोकलच्या टपावर चढल्याचं दिसलं. त्यांनी रेल्वे पोलीसांना याची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे पोलीस या तरुणाला खाली उतरण्याचा प्रयत्न करत होते, त्यासाठी दोन ते तीन हमाल त्याला खाली उतरवण्यासाठी पाठवण्यात आले, कसं बसं करून त्याला खाली उतरवण्यात आलं. मात्र या सगळ्यामुळे लोकल ट्रेनचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.0
0
Report
नांदेड: विरोधी पक्षनेते पद के लिए एमआईएम को दिए जाने को लेकर विवाद अदालत तक पहुंचा
Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड महानगरपालिका में विरोधी पक्षनेते पद निवडी पर वाद बना हुआ है. एम आय एम के संख्या 14 रहते हुए उसे विरोधी पक्षनेते पद दिया गया. पर कांग्रेस और वंचित बहुजन आघाडी के कुल 15 होने पर भी इसे नहीं दिया गया. इस पर कांग्रेस अदालत में दाद मागने की तैयारी कर रही है. नांदेड महापालिका चुनाव में भाजप ने 45 सीटें जीती एकहाती सत्ता प्राप्त की. दूसरे क्रम पर एमआईएम 14 सीटें जीत कर सामने है. चुनाव से पहले आघाडी कर लड़ने वाले कांग्रेस और वंचित ने कुल 15 सीटें जीतीं. पर single largest party के साथ गठबंधन को विरोधी पक्षनेतात पद देने को लेकर पेच बना रहा. कल महापौर ने एमआईएम को विरोधी पक्षनेता के रूप में मान्यता दी. इसके बाद कांग्रेस आक्रामक हुई है. कांग्रेस और वंचित बहुजन आघाडी की सीटें चुनाव से पहले आघाडी में दर्ज हैं, विभागीय आयुक्त कार्यालय में. इसलिए नियम अनुसार कांग्रेस और वंचित आघाडी का विरोधी पक्षनेता पद पर दावा है. महापालिका चुनाव से पहले कुछ दिनों पहले कांग्रेस के 14 पूर्व नगरसेवकों ने एमआईएम में प्रवेश किया था. यह प्रवेश भाजपा के एक बड़े नेता के आदेश पर हुआ, कांग्रेस ने आरोप लगाया. धर्मनिरपेक्ष मतों के विभाजन से भाजपा को लाभ पहुंचाने के उद्देश्य से एमआईएम और भाजपा ने छुपी कमिटमेंट की थी. उसी के अनुसार एमआईएम को विरोधी पक्षनेता का उपहार दिया गया है—यह आरोप कांग्रेस ने लगाया. अब कांग्रेस अदालत में दाद मांग रही है. Byte - अब्दुल गफार - नगरसेवक, कांग्रेस. दूसरे क्रम के पक्ष को विरोधी पक्षनेते पद देने के नियम के अनुसार होना चाहिए. कानूनी विशेषज्ञ की सलाह लेकर ही एमआईएम को मान्यता दी गईं—महापौर कविता मुळे ने कहा. Byte - कविता मुळे - महापौर. भाजप और एमआईएम की छुपी रिश्तेदारी बाहर आने के बाद स्पष्ट हुआ था. कांग्रेस और वंचित आघाडी की संख्या अधिक होने के बावजूद भाजपा ने एमआईएम को विरोधी पक्षनेता पद देकर छुपी युति की पुष्टि की—कांग्रेस सांसद रविंद्र चव्हाण ने कहा. Byte - खा. रविंद्र चव्हाण. भाजपा ने एमआईएम को विरोधी पक्षनेता दिए जाने से नांदेड में सबकी आंखें खुली हैं. अब यह मामला न्यायालय जाएगा. अदालत में निर्णय का इंतजार होगा.0
0
Report
Advertisement
