icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नागपुर-मुंबई समृद्धि महामार्ग पर ट्रक सहित एक करोड़ रुपये के प्रतिबंधित गुटखा पकड़ा गया

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर महामार्ग सुरक्षा पथकाने कारंजा जवळ मोठी कारवाई करत ट्रकसह अंदाजे १ कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे कारंजा टोल नाक्यावर संशयित आयशर ट्रकची तपासणी करण्यात आली असता मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. महामार्ग सुरक्षा पथक नागपूरचे पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपी शेख रहमान शेत्र रहीम अमरावती याला ताब्यात घेतले असून हा प्रतिबंधक असलेला गुटखा कुठून आणला होता व कुठे नेण्यात येणार होता पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

चाकण मिडक के Mercedes-Benz परिसर में बिबटिया घुसा; वन विभाग ने रेस्क्यू शुरू किया

Khed, Maharashtra:पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीतील मर्सिडीज बेंज कंपनीमध्ये बिबट्या शिरला असून या बिबट्याला जेरबंद करण्याचं मोठ आव्हान आता वनविभागा पुढे असणार आहे. मर्सिडीज बेंज कंपनीच्या सुरक्षा भिंतीवरून बिबट्या चालत असलेला व्हिडिओ रात्री काही प्रवाशांनी आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केला असून हा बिबट्या सुरक्षा भिंतीवरून पुन्हा खाली उतरून पुन्हा सुरक्षा भिंतीवरून कंपनीच्या आत मध्ये गेल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे या बिबट्याला रेस्क्यू करण्याचं काम सध्या वन विभागाकडून केलं जात असल्याची माहिती मिळत आहे.
0
0
Report

बीड़ के मातंग समाज के उपवर्गीकरण के विरोध में मुंबई कूच का आह्वान—मराठवाड़ा बैठक निर्णय

Beed, Maharashtra:बीड: मातंग समाजाचा उपवर्गीकरणाचा मोर्चा मुंबईत धडकणार; मराठवाडास्तरीय बैठकीत निर्णय ANC- अनुसूचित जातीजमातीच्या आरक्षणामधून मातंग आणि मातंग समाजाच्या पोटजातीला स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर मोर्चे काढण्यात येत आहे. आरक्षणाचे अबकड मधून उपवर्गीकरण करण्यात यावे यासाठी बीडमध्ये आज मातंग समाजाच्या समन्वयकांची मराठवाडास्तरीय बैठक पार पडली. आठ दिवसात उपवर्गीकरणा बद्दल सरकारकडून अंमलबजावणी झाली नसल्यास महाराष्ट्रातील तमाम मातंग समाज मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. अबाल वृद्धासह जितराब घेऊन मुंबईच्या आझाद मैदानावर ठिय्या घालण्यात येईल असा इशार या बैठकीतून देण्यात आला आहे. त्यामुळे सरकारच्या डोकेदुखीत मात्र वाढ होण्याची शक्यता आहे.
0
0
Report
Advertisement

कोकण में आंधी-बारिश का कहर, बिजली आपूर्ति ठप, हजारों परिवार अंधकार में

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणात अवकाळीचा हाहाकार! सलग तिसर्या दिवशी वादळी पाऊस.. वीज पडून दोन महिला जखमी,तर अनेक तालुके अंधारात.. रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात निसर्गाचं तांडव सुरूच आहे.गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसानं आता रौद्र रूप धारण केलं असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.. संगमेश्वरमध्ये घरावर वीज पडल्याची धक्कादायक घटना घडली असून,तर एका म्हैशीचा जागीच मृत्यू झाला आहे.. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं हजारो कुटुंबं अंधारात आहेत.. या वादळामुळे विद्युत खांब आणि तारांवर झाडे पडल्याने अनेक तालुक्यांचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.. मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे दुरुस्तीच्या कामातही अडथळे येत असून,जनजीवन अक्षरशः ठप्प झाले आहे.. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने आंबा,काजू आणि पपईच्या बागांना मोठा तडाखा दिला आहे... लांजा तालुक्यातील झापडे गावात समीर हाजु यांची ११ एकर पपईची बाग जमीनदोस्त झाली असून ३५ लाखांचं नुकसान झालं आहे.. केवळ शेतीच नव्हे,तर घरांचीही मोठी पडझड झाली आहे.. संगमेश्वर,मंडणगड,दापोली आणि राजापूरमधील खारेपाटणमध्ये घरांवरील कौले आणि पत्रे उडून गेले आहेत...अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने घरांचे नुकसान झाले आहे.. कोकणावर ओढवलेल्या या संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला असून,प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून वीज पुरवठा सुरळीत करावा,अशी मागणी आता जोर धरत आहे..
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के लांजा में 11 एकड़ पपीते की बाग उजड़ गई, 35 लाख नुकसान

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. लांजात अवकाळीचा तडाखा.. ११ एकर पपईची बाग भुईसपाट, शेतकऱ्याचे ३५ लाखांचे नुकसान!.. शनिवारी पडलेल्या वादळी पावासाचा तडाखा लांजा येथील शेतकऱ्याला बसला आहे.. एका प्रयोगशील शेतकरी समीर हाजु यांची ११ एकर पपईची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यांदेखत नष्ट झाल्याने हाजु यांचे सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.. वर्षभराची मेहनत मातीत गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाने तातडीने मदत देण्याची मागणी केली जात आहे.. समीर हाजु (शेतकरी).. लांजा
0
0
Report

वाशिम में फुलों के दाम बढ़े, शादी-विवाह की सजावट महँगी

Washim, Maharashtra:वाशीम: लग्नसराई आणि धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर मागणीनुसार आवक कमी असल्यामुळं वाशिम जिल्ह्यात फुलांच्या दरात मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम आता हार, गाडी आणि मंडप सजावटीवरही दिसून येत आहे. गुलाब, मोगरा, काकडा आणि शेवंती या फुलांच्या किमती २० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे लग्न समारंभासाठी हार, वधू-वरांची गाडी सजावट तसेच मंडप डेकोरेशनसाठी नागरिकांना अधिक खर्च करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे बाजारात फुलांची आवक कमी झाली असून मागणी मात्र मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गुलाब ६०० रुपये प्रति किलो, मोगरा १२०० रुपये प्रति किलो तर काकडा १४०० रुपये प्रति किलो दराने विक्रेत्यांना खरेदी करावे लागत आहेत. फुलांच्या वाढत्या मागणीमुळे विक्रेते आणि उत्पादकांना आर्थिक फायदा होत असला तरी सर्वसामान्य नागरिकांचे बजेट मात्र कोलमडत आहे.
0
0
Report

उल्हासनगर महापालिका ने 27 अवैध गाळे गिराकर अतिक्रमण पर कड़ा कदम उठाया

Ambernath, Maharashtra:उल्हासनगर महापालिकेचा ‘हातोडा’; रेजन्सी प्लाझातील २७ अवैध गाळे जमीनदोस्त. कारणे दाखवा नोटीसकडे दुर्लक्ष केल्याने अतिक्रमण विभागाची धडक कारवाई. उल्हासनगर शहरात बढ़ती अवैध बांधकामांविरोधात महापालिका प्रशासन अब अ‍ॅक्शन मोडमध्ये आया है. कैंप नंबर ३ मधील रेजन्सी प्लाझा येथील तब्बल २७ अनधिकृत गाळ्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत ते निष्कासित केले. या कारवाईमुळे भूमाफियांमध्ये खळबळ उडाली असली, रेजन्सी प्लाझा ‘बी’ विंगमध्ये संपूर्ण एक मजला बेकायदा उभारण्यात आल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. नगररचना विभागाने संबंधित विकासकाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, नोटीसनंतरही कोणतीही दखल न घेतल्याने अखेर महापालिका प्रशासनाने कठोर पाऊल उचलले. महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त अजय साबळे आणि अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुरुवारी दुपारी या २७ अवैध गाळ्यांवर पाडकाम कारवाई केली. या कारवाईमुळे शहरातील अवैध बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, ही बांधकामे पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत का, की फक्त वरवरची कारवाई करण्यात आली आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण, अर्धवट कारवाई झाल्यास भविष्यात ही बांधकामे पुन्हा उभी राहण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
0
0
Report
Advertisement

वाशीम में जलसंकट गहराया; एकबुर्जी 24% और सोनल 12.71% जलसंचय बचा

Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने घटत असून,पाणीटंचाईची चिंता वाढू लागली आहे. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी मध्यम प्रकल्पात सध्या २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे,तर सोनल मध्यम प्रकल्पात केवळ १२.७१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.वाढत्या तापमानामुळे प्रकल्पातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असून,प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
0
0
Report

सिल्लोड में कुएँ की गिरावट से एक ही परिवार के तीन लोगों की मौत

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यतील धानोरा येथे शनिवारी रात्री एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. विहिरीत उतरून मोटर पंप बसवण्याचे काम सुरू असताना अचानक विहीर खचली आणि त्याखाली दबून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला. बाजीराव सर्जेराव काकडे, आजिनाथ बाजीराव काकडे आणि शाम बाजीराव काकडे अशी मृतांची नावे असून, या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. रात्री साडे नऊच्या सुमारास घडलेल्या या अपघाताने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, एकाच वेळी घरातील तीन आधारस्तंभ गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
0
0
Report
Advertisement

यवयमाळ के टिपेश्वर अभयारण्य के संवेदनशील क्षेत्र में अवैध रिसॉर्ट-एग्रो टूरिज्म के विरुद्ध याचिका; अदालत ने जवाब मांगा 11 जून तक

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या संवेदनशील क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येत अवैध रिसॉर्ट्स व अॅग्रो टुरिझम केंद्रे चालविली जात असल्याचा प्रकार पुढे आल्यानंतर आदिवासी मंचाचे अंकित नैताम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून यावर येत्या ११ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. टिपेश्वर अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र आहे. या ठिकाणी वाघ, बिबट्या, अस्वल, नीलगाय यासह जैवविविधता आढळते. मात्र वन विभागाच्या उदासीनतेमुळे वन्यजीव व पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसरात अवैध बांधकामे आणि व्यावसायिक उपक्रमांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांना जिल्हास्तरीय निरीक्षण समिती व इतर सक्षम प्राधिकरणांची आवश्यक परवानगी नाही. याशिवाय, खाणकाम व वृक्षतोडही सर्रास केली जात आहे. परिणामी, पर्यावरणाचा हास होत असून, वन्यजीवांच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका वाढत आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. तसेच, वन विभाग व पोलिसांनी यासंदर्भातील तक्रारींची दखल घेतली नाही, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
0
0
Report

लातूर में इंस्टाग्राम धमकियों से 25 वर्षीय युवक ने आत्महत्या; सात गिरफ्तार

Latur, Maharashtra:लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. मोरवड येथे प्रेमप्रकरणातून सुरू झालेल्या वादानंतर इंस्टाग्रामवरून होत असलेल्या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तेजस दिलीप घोडके असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी लिहिल्या सुसाइड नोटमध्ये काही जणांकडून सतत मानसिक त्रास दिला जात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या त्रासाला कंटाळून तेजसने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top