Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411037

पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा

Sept 24, 2024 05:46:17
Pune, Maharashtra

पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Dec 09, 2025 08:49:22
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श बँक घोटाळा चांगलाच गाजला होता. अनेक गोरगरीबांचे पैसे तिथे अडकले. त्यातीलच काही प्रमुख आरोपींचा नुकताच पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश झाला असे आरोप इम्तियाज जलील यांनी केले आहेत. रूपाली शेंडगे आणि सपना निर्मळ असे या बँकांच्या संचालकांचे नाव आहे जे आदर्श बँक घोटाळ्यात आरोपी आहेत. संजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. महत्त्वाचे म्हणजे याबाबत आंदोलन करणारे इम्तियाज जलील यांनी या सगळ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. असाच गरिबांना न्याय देणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. नक्‍की काय आहे इम्तियाज जलील यांच्या आरोप आणि कुणी कुणी शिवसेनेत प्रवेश केला याबाबत इम्तियाज जलील यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी संवाद केला. रुपाली शेंडगे, बँकेच्या संचालक, घोटाळा आरोपी 1 महिना जेल मध्ये सध्या जामिनावर बाहेर. सपना निर्मळ, बँक घोटाळा आरोपी, जामिनावर बाहेर. कधी झाला प्रवेश 24 नोव्हेंबर मुकुंदवाडी परिसरात संजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत प्रवेश झाल्याचं बोललं जातंय.. याबाबतचे फोटो खुद्द संजय शिरसाठ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम वर टाकले आहेत आणि त्यांना कॅप्शन दिलंय शिवसेनेत नव्या ऊर्जेचा प्रवेश.
120
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 09, 2025 08:32:27
124
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 09, 2025 08:01:27
Akola, Maharashtra:गेल्या 13 वर्षांपासून रखडलेला नरनाळा महोत्सव यंदा पुन्हा सुरू होत आहे. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठी तयारी हाती घेतली असताना शहानूर–पोपटखेड या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. लाखोंचा निधी मंजूर असतानाही या रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. डांबराऐवजी गिट्टी–चुरी टाकून तात्पुरत्या पद्धतीने काम सुरू असल्याचे दिसत आहे. कामाच्या ठिकाणी ना कोणतेही अधिकारी, ना ठेकेदार उपस्थित असल्याने मोजणी, गुणवत्ता तपासणीचा पूर्ण अभाव जाणवत आहे. फक्त मोठे दगड टाकून वरून डांबर टाकण्याची घाई केली जात असल्याने हा रस्ता कायमस्वरूपी आहे की फक्त महोत्सवापुरता तात्पुरता, असाही मोठा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्यावरील धूळ, गिट्टी आणि अपूर्ण कामामुळे वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. “खर्च प्रचंड, पण गुणवत्ता शून्य,” अशी नागरिकांची नाराजी असून त्यांनी या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. नरनाळा महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारी होत असली तरी लाखो रुपयांचा निधी वापरला जात असतानाही रस्ता मात्र निकृष्ट पद्धतीने तयार होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. हा रस्ता तात्पुरता आहे की कायमस्वरूपी, याची तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. आदिवासी संस्कृती आणि निसर्गाच दर्शन या हेतूने हा महोत्सव साजरा करण्यात येत आहे मात्र हे दोन्ही हित जपत या ठिकाणी काम होणे तेवढेच गरजेचे सुद्धा आहे.
71
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 09, 2025 07:17:11
Jalna, Maharashtra:जालना : पुद्दुचेरीत एका अल्पवयीन मुलीला आईच्या जातीचे प्रमाणपत्र देण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. महाराष्ट्रातही आईच्या जातीच्या आधारे मुलांना जात प्रमाणपत्र द्या-जरांगे. महाराष्ट्र सरकारनेही सगे-सोयरे कायद्याची अमंलबजावणी करावी. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागणी. अँकर- पुद्दुचेरीत एका अल्पवयीन मुलीच्या शिक्षणाची सोय करण्याच्या उद्देशाने एका दुर्मिळ निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने तिच्या आईच्या जातीच्या आधारावर जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिलेत. त्यामुळं या निर्णयानुसार राज्य सरकारने सगे सोयरे आमच्या व्याख्येनुसार कायद्याची अमंलबजावणी करावी.. अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलीये.. जरांगे यांनी उपोषणावेळी सरकाला दिलेल्या ड्राफ्टनुसार आईची जात त्या मुलाला किंवा मुलीला लागली पाहिजे. आणि त्यानुसार सरकारने जात प्रमाणपत्र द्यावेत अशी मागणी केली होती. असाच एका दुर्मिळ निर्णयात पुदुेचेरी येथील एका अल्पवयीन मुलीला शिक्षणासाठी तिच्या आईच्या जातीचं जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिलेत.. याचा जरांगे यांनी दाखला दिला आहे.
221
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 09, 2025 06:47:50
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीनंतर कल्याण पश्चिमेतही भाजप–शिवसेना आमनेसामने; युती असूनही पॅनलवाद तीव्र! शत्रू भाऊ असला तरी मारल्याशिवाय विजय नाही — मोरे यांचा इशारा; तर 'जशास तसे उत्तर' — भाजपचे वरुण पाटील; महायुतीत तणाव चिघळला! कल्याण–डोंबिवलीतील राजकारण पुन्हा तापलंय! डोंबिवलीतील पक्षप्रवेश बॅनर वादानंतर आता कल्याण पश्चिमेतही भाजप–शिवसेना शिंदे गट आमनेसामने उभे ठाकले आहेत. महायुती अस्तित्वात असली, युतीतर्फे एकत्र निवडणुका लढवण्याचे आवाहन असले तरी स्थानिक पातळीवर पॅनलवाद आणि बालेकिल्ला वाचवण्याचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे कल्याण मध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या तर थेट “शत्रू भाऊ असला तरी मारल्याशिवाय विजय नाही” असा इशारा देत भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक वरुण पाटील यांनीही “जशास तसे उत्तर देऊ… आमच्या मार्गात कोणी आडवे येणार नाही” असा पलटवार केला आहे.महायुतीच्या घरातला अंतर्गत कलह आता उघडपणे समोर आला आहे.कल्याण पश्चिमेतील पॅनल क्रमांक २ हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो.याच पॅनलवरून आता भाजप आणि शिंदे गट आमनेसामने उभे ठाकले असून, दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संतप्त वक्तव्यांमुळे महायुतीतील तणाव चिघळला आहे. विधानसभा निवडणुकीत 80 पैकी 60 जागा शिंदे साहेबांच्या चेहऱ्यामुळे आम्ही जिंकल्या. तेव्हाच्या त्यांच्या नेतृत्वामुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री विराजमान झाले.युती झाली तरी पॅनल क्रमांक २ हा शिवसेनेचाच आहे. एकही सीट भाजपला देणार नाही. विरोधक आमचे असोत वा परके — जमिनीवर आम्हीच उभे राहणार! गीतेने शिकवलंय — शत्रू भाऊ असला तरी मारल्याशिवाय विजय मिळत नाही. आमच्या समोर युतीचा उमेदवार असो वा दुसरा, आम्ही गारद करूनच सोडणार。
250
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 09, 2025 06:34:28
134
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 09, 2025 06:32:55
Parbhani, Maharashtra:अँकर- हिंगोली नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे आणि शिवसेना शिंदे गटाचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांचा वाद राज्यभर चर्चिला गेला. संपूर्ण निवडणूक या दोन्ही आमदारांनी वैयक्तिक पातळीवर जाऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत एकमेकांवर चिखली केली होती. यामुळे हिंगोली नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती मधील भाजप आणि शिवसेना हे पक्ष सातत्याने चर्चेत राहिले होते पण हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच आमदार संतोष बांगर आणि आमदार तानाजी मुटकुळे यांचा स्मित हास्य करीत असलेला विधानभवनातील एक फोटो समोर आल्याने हिंगोलीच्या राजकारणात चर्चेला उधाण आला आहे. आमदार बांगर यांनीच स्वतः हा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल टाकलाय. मग एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर जाऊन केली जात असलेली टीका आहे फक्त मतदारांना फसवून मत घेण्याप्रीतनच होती का अनेकांना पडत असावा.
180
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 09, 2025 06:17:38
Chakan, Maharashtra:चाकण/पुणे चाकण मध्ये EVM च्या सुरक्षा बाबत उमेदवारांच्या शंका वाढल्या जिल्हा प्रशासनाच्या EVM सुरक्षितेवर उमेदवारांचेच प्रश्नचिन्ह Anc... नगरपरिषद निवडणूकांची मतमोजणी ही पुढे ढकलण्याने निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला EVM मशीनच्या सुरक्षित बाबत सूचना दिल्या आहेत पुण्याच्या चाकण नगरपरिषदेच्या EVM मशीन एका खाजगी मंगल कार्यालयात ठेवन्यात आले असुन या कार्यालयाच्या बाहेर सीसीटीव्ही चा डिस्प्ले लावलेला नसल्याने उमेद्वारांनी प्रशासनाला धारेवर धरले तर सीसीटीव्ही डिस्प्ले पाहण्यासाठी उमेदवारांना जाचक अटींचा सामना करावा लागतो त्यामुळे आपली मते सुरक्षित आहे की नाही असाच प्रश्न सध्या उमेदवारांना उद्भवत आहे निवडणूक आयोगाने ईव्हीएम च्या सुरक्षितबाबत दिलेल्या सूचनाचें पालन जिल्हा प्रशासनाने करावे अशी मागणी उमेदवार करत आहे चाकण येथील स्ट्रॉंग रूमच्या बाहेरील परिस्थिती - सीसीटीव्हीचा डिस्प्ले बाहेर लावलेले नाहीत - गेट पासून 200 मीटर अंतरावर आत मध्ये लावण्यात आलाय त्याचा डिस्प्ले अनेकदा बंद असतो - उमेदवार यांना सीसीटीव्ही पहायची असल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय - उमेदवाराच्या प्रतिनिधीना सीसीटीव्ही पाहण्यासाठी बंदी - सुरक्षा अलार्म सिस्टीम लावण्यात आलेली नाही Byte:भाग्यश्री वाडेकर (उमेदवार) Byte: राम गोरे (उमेदवार) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया चाकण पुणे
112
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 09, 2025 06:17:16
Ambernath, Maharashtra:वांगाणी-बदलापूर रस्त्याच्या कामाला सुरुवात. खड्ड्यांमधून वाहनचालकांची सुटका होणार. झी 24 तासच्या बातमीनंतर अखेर वांगणी-बदलापूर महामार्गावर गोरेगाव ते ढवळेपाडा या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 2 कोटी रुपये निधी मंजूर झाला. पावसाळ्यात या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती; त्यामुळे वाहनचालकांना त्रास झाला. या ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या. मागील दोन वर्षांपासून काँक्रिटीकरण सुरू होते; 800 मीटर रस्ता डांबरीकरण झाले. स्थानिक नेतेांनी आवाज उठवला होता. आता 2 कोटींच्या कामाला मंजूरी मिळाली आणि प्रत्यक्ष काम सुरू झाले. सध्यातरी रस्ता कॉंक्रीट असल्यामुळे फक्त 800 मीटर डांबीकरण झाले; भविष्यात रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली.
160
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 09, 2025 04:51:08
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच इतर पिकांची वाढ सध्या उत्तम अवस्थेत झाली असून थंडीही अनुकूल आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी pिकांना वेळेवर सिंचन देण्यावर भर देत आहेत. मात्र, वारंवार रोहित्रात होत असलेल्या बिघाडांमुळे सिंचनाचे मोठे संकट निर्माण झाले आहे.मागील काही वर्षांपासून अनिश्चित हवामान, कमी उत्पादन आणि वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांवरचे कर्जाचे ओझे सतत वाढत आहे.त्यातच रोहित्राच्या वारंवार बिघाडामुळे शेतकऱ्यांची अधिकच गैरसोय होत आहे. त्यामुळे महावितरणने या समस्येची दखल घेऊन रोहित्र तातडीने दुरुस्त करून कृषी पंपांना नियमित वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरू लागली आहे.
96
comment0
Report
Advertisement
Back to top