Back
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra
पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Chandwad, Maharashtra:
अँकर :-चांदवड तालुक्यातील वाघदर्डी येथील रस्त्याची अत्यंत वाईट दुरावस्था झाली आहे या रस्त्याने पायी चालणे देखील कठीण झाले असून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर रस्ता करून द्यावा अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
Mumbai University' Sub-Centre Senate members visit
मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रास सिनेट सदस्यांची अचानक भेट
पाहाणी दरम्यान अनेक तृटी व उपकेंद्राची दुरावस्था आली समोर...
Anc..शिवसेना नेते युवासेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना सिनेट सदस्य व शिवसेना उपनेत्या शितल शेठ देवरुखकर, प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रास अचानक भेट दिली असता या उपकेद्रात अनेक त्रुटी आढळून आल्या. तसेच उपकेंद्राचे उद्घाटन झाले तेव्हापासून कोणतीही प्रगती या केंद्राची झाली नसल्याचे बाब देखील पाहणीत निदर्शनास आली. या ठिकाणी केंद्र प्रमुखाची नेमणुक कायमस्वरुपी नाही. ठाणे येथील महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या संकुलाला फक्त एकच स्वच्छता कर्मचारी.
जागोजागी स्वच्छतेचा अभाव. इमारतींची दुरावस्था अशा अनेक समस्या या उपकेंद्रात दिसून आल्या. तसेच व्यवस्थापन परीषद सभेत धर्मवीर आनंद दिघे च नाव देण्याचा ठराव मंजुर होऊन देखील अद्याप नाव देण्यात आलेले नाही. अशा अनेक बाबी सिनेट सदस्यांना निदर्शनास आल्या. पुढील दोन दिवसात आनंद दिघे यांच्या नामकरणाचा फलक लागला नाही तर युवासेनेच्या वतीने नामकरण सोहळा करु अशी तंबी सिनेट सदस्यांनी केंद्राला दिली आहे.
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर:-
बांगलादेश सीमा ही गेल्या तीन महिन्यापासून बंद असल्याने यामुळे भारतातील कांदा निर्यात ही थांबली असल्याने त्याचा फटका थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना देखील बसत असून यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण दिसून येत आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गेल्या सप्ताहात कांदा दर 1800 रु प्रति क्विंटल होते मात्र या सप्ताहात हे कांदा दर 1300 रु प्रति क्विंटल खाली आले आहे विशेषता महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कांदा हा बांगलादेशला निर्यात केला जातो मात्र बांगलादेशची सीमा बंदचा फटका कांदा उत्पादकांना बसत असून केंद्र सरकारने बांगलादेशमधील निर्यात सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून होत आहे. या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_cort
अँकर
नाशिक मध्ये वकिलावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ नाशिकच्या कोर्टातील वकील काल संतप्त झाले होते... वकिलांवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक करून काल कोर्टात हजर केले होते.... यावेळी संतप्त वकिलाकडून या घटनेचा निषेध करण्यात आला ..दरम्यान आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे... ,नाशिक कोर्टातील वकिलांनी एकत्र येत या घटनेचा निषेध केला आहे. वकिलांच्या सुरक्षा कायदा संदर्भात देखील यावेळी मागणी यावेळी करण्यात आलीये...
बाईट-वकील
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
अंबरनाथमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
५ जुलैच्या विजयी मेळाव्याचं बैठकीत नियोजन
अंबरनाथमध्ये पहिल्यांदाच मनसे आणि ठाकरे गट एकत्र
Amb sena mns
Anchor : अंबरनाथमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत ५ जुलै रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्याचं नियोजन करण्यात आलं.
Vo : मनसेच्या छत्रपती शिवाजी महाराज नगरमधील उपजिल्हा शाखेत ही बैठक पार पडली. या बैठकीला मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष शैलेश शिर्के, शहराध्यक्ष कुणाल भोईर, तसंच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख संतोष शिंदे, शहरप्रमुख अजित काळे यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ५ जुलैच्या विजयी मेळाव्याला अंबरनाथ शहरातून जास्तीत जास्त पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक यांना घेऊन जाण्यासंबंधी नियोजन करण्यात आलं. ५ जुलैच्या विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असून त्यापूर्वीच अंबरनाथमध्ये पहिल्यांदाच या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्र आल्याने दोन्ही पक्षात नवचैतन्य निर्माण झालं आहे.
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - रेल्वे प्रशासना विरोधात किर्लोस्करवाडी मध्ये विद्यार्थ्यांसह।ग्रामस्थांनी केला आंदोलन.
अँकर - सांगलीच्या किर्लोस्करवाडी येथे रेल्वे
प्रशासना विरोधात आंदोलन करण्यात आले
रेल्वे प्रशासनाकडून बांधण्यात येणाऱ्या
उड्डाण पुला विरोधात ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत धरणे आंदोलन केले.किर्लोस्करवाडी येथे रेल्वे प्रशासनाकडुन चुकीच्या पद्धतीने रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येत आहे,त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला देखील देण्यात येत नसल्याचा आरोप करत रेल्वे उड्डाणपुलाची रुंदी वाढवण्याचा विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे.के.बापू जाधव यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
0
Share
Report
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_RALY
भूममध्ये पाण्यासाठी महिलांचा मोर्चा, अमृत 2.0 योजनेच्या समर्थनार्थ महिला रस्त्यावर
अँकर
धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरात अमृत 2.0 ही पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी आज महिलांनी रस्त्यावर उतरून जोरदार मोर्चा काढला.
भूम शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी ही योजना मंजूर झाली असली तरी अजूनही ती सुरू झालेली नाही.
काही दिवसांपूर्वी या योजनेतील नळांना मीटर बसवण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, आज याच योजनेच्या समर्थनार्थ पाणी बचाव कृती समितीच्या वतीने महिलांनी मोर्चा काढला.
नगरपालिकेपासून निघालेला मोर्चा गोलाई चौकात येताच सभेत रुपांतर झाला आणि महिलांनी शासनाकडे एकमुखाने मागणी केली – अमृत योजना तात्काळ सुरू करा!
बाइट : संयोजिनी गाढवे – माजी नगराध्यक्ष, भूम
बाइट : आंदोलक
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात खड्ड्यांमुळे दुचाकीवरील दाम्पत्याचा अपघात
खड्ड्यांमुळे गाडी स्लिप होऊन लहान मुलासह पडले
एकाच ठिकाणी पुन्हा एकदा अपघात , अपघातानंतरही प्रशासनाला जाग नाही
अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद
Ulh accident cctv
Anchor : उल्हासनगरात दुचाकीवरील दाम्पत्याचा खड्ड्यांमुळे अपघात होऊन ते लहान मूलासह खाली पडल्याची घटना घडली. १७ सेक्शन चौकात घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. धक्कादायक म्हणजे याच ठिकाणी आठवड्यापूर्वी एका लहान बाळासह दांपत्याचा अपघात झाला होता ,
Vo : उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर रस्त्यावर १७ सेक्शन परिसरातून एक दाम्पत्य दुचाकीवर जात असतानाच सिमेंट रस्त्याच्या कडेला असलेला खड्डा चुकवण्याच्या नादात दुचाकी स्लिप झाली आणि हे दाम्पत्य खाली कोसळलं. या दाम्पत्याचा लहान मुलगा ही दुचाकीवर समोर बसला होता . सुदैवाने दुचाकीचा वेग जास्त नसल्यामुळे कुणाला फारशी इजा झाली नाही. अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे, मात्र मागील आठवड्यात याच ठिकाणी अपघात झाल्यानंतर ही अजूनही प्रशासनाला खड्डे बुजवण्याची सुबुद्धी सुचली नाहीये, त्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत
चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर
0
Share
Report
Navi Mumbai, Maharashtra:
story Slug -: विविध मागण्यांसाठी वाहतूकदारांचे आंदोलन सुरूच, दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा दिला इशारा.
transporter strike
FTP slug - nm state transporter strike
shots-
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: वाहतूकदारांकडून होणारी अन्यायकारक दंड वसुली आणि ई चलनावर लावलेले दंड माफ करावे याच्यासह इतर अन्यायकारक कायद्या विरोधात वाहतूकदारांनी स्व-इच्छेनुसार बेमुदत चक्कजाम आंदोलन पुकारले असून हे आंदोलन मागण्या मान्य होई पर्यंत मागे घेणार नसल्याचे आज आयोजित पत्रकार परिषदेत वाहतूकदारांनी घोषित केलेय. उद्या पासून या बंदची तीव्रता वाढताना पहायला मिळणार अत्यावश्यक सेवेवर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेय. वाहतूकदार बचाव कृती समितीतर्फे एपीएमसी बाजार आवारात पत्रकार परिषद घेत राज्य सरकारने आमचे आंदोलन गांभीर्याने न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल ज्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होणार असून तात्काळ आंदोलनाची दखल घेत प्रमुख मागण्या मान्य करण्याचे आवाहन वाहतूकदारांमार्फत करण्यात आलेय.
तर ट्रॅफीक पोलीस वाहतुकदारांना कसे लुटतात याबाबत वाहतूक दारांनी माहिती दिली
बाईट -:उदय बुरगे
बाईत - वाहनचालक
बाईट - वाहन चालक
-----------
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे शहरातील वलवाडी शिवारामध्ये एका शाळेने मुलांना फि न दिल्यामुळे डाबून ठेवण्याचा धक्कादायक आरोप पालकांनी केला आहे. धुळे शहरातील वलवाडी शिवारात असलेले चावरा इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी मुलांना फी साठी डाबून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे, हा प्रकार संबंधित पालकांना लक्षात आल्यानंतर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपंळकर यांनी चावरा शाळेत येऊन मुलांना डाबून ठेवण्याचा प्रकरा बद्दल जाब विचारला. मात्र मुख्याध्यापक उपस्थित नसल्याने सुमारे दोन ते तीन तास भाजपाचे शहराध्यक्ष गजेंद्र अंपंळकर पालकांसह शाळेत ठिय्या मांडून बसले होते, सदर घटनेचा सीसीटीव्ही फुटेज द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. परिस्थितीतचे गांभीर्य लक्षात घेऊन, यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासह पश्चिम पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील उपस्थित होते, मुलांना फी साठी डाबून ठेवण्याचा प्रकार निंदनीय असल्याने या ठिकाणी पालकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. या प्रकरणामध्ये आपण योग्य ते तक्रार केली असून शिक्षण विभागाने कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली
byte - गजेंद्र पपळलकर, शहरजिल्हाध्यक्ष, भाजप
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report