icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बीड में मजदूर हत्या: आरोपी की गिरफ्तारी नहीं, परिजनों ने थाने में धरना दिया

Beed, Maharashtra:बीड: कामगाराचा खून प्रकरण; आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या, 35 तासांपासून कामगाराचा मृतदेह जिल्हा रुग्णालयातच..! ANC - अवैध दारूच्या दुकानात कामगार असलेल्या उमेश दळवी या तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपी लाला शेख याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. घटना घडल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात ठिय्या घातला होता तेंव्हा तब्बल 22 तासानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता आरोपीला अटक करा या मागणीसाठी नातेवाईक संतप्त झाले असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. तब्बल 35 तासांपासून मृतदेह जिल्हा रुग्णालयातच आहे. पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन न्याय द्यावा अशी मागणी पीडित कुटुंबाची आहे. बाईट: पप्पू कागदे, रिपाई बाईट: मयताची पत्नी बाईट: मयताचे नातेवाईक
0
0
Report

आंबेनळी घाट हादसा: आठ की मौत, सुरक्षा पर उठा सवाल

Satara, Maharashtra:सातार्ा रायगड जिल्ह्यांना जोडणारा आंबेनळी घाट पुन्हा एकदा भीषण अपघाताने हादरला आहे. मौजमजा आणि फिरण्यासाठी गेलेल्या मित्रांवर काळाने घाला घातला असून, स्कॉर्पिओ गाडी तब्बल १५०० फूट खोल दरीत कोसळल्याने आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये एकाच आसगाव गावातील पाच जणांचा समावेश असल्याने गावावर शोककळा पसरली आहे. रात्रीच्या अंधारात झालेल्या या अपघाताची माहिती तब्बल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी समोर आली. सध्या महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, पोलीस आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू आहे. पाहूया यावरील हा रिपोर्ट... साताऱ्यातील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. हर्णे बंदरावरून शनिवारी रात्री परतत असताना मित्रांची स्कॉर्पिओ गाडी आंबेनळी घाटातील खोल दरीत कोसळली. तब्बल १५०० फूट खोल दरीत गाडी कोसळल्याने गाडीत असलेल्या आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे मृतांपैकी पाच जण हे एकाच आसगाव गावातील होते. त्यामुळे संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मित्रांसोबत आनंदाच्या क्षणांसाठी गेलेले तरुण कायमचे काळाच्या पडद्याआड गेले. रात्रीच्या अंधारात ही गाडी दरीत कोसळल्याने अपघाताची माहिती कोणालाच मिळू शकली नाही. रविवारी संध्याकाळी हा अपघात उघडकीस आल्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली. मात्र रात्रीच्या वेळी मृतदेह बाहेर काढणे धोकादायक असल्याने सोमवारी पहाटेपासून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमकडून अत्यंत कठीण परिस्थितीत बचावकार्य सुरू आहे. पोलीस, महसूल प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थही घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाले आहेत. या घाटात संरक्षक कठडे नाहीत. याआधीही अनेक अपघात झाले आहेत. अजून किती बळी गेल्यावर शासन जागं होणार? असा सवाल आसगावातील मृतांचे नातेवाईक करतायत. आंबेनळी घाट हा अत्यंत धोकादायक घाट म्हणून ओळखला जातो. या घाटात यापूर्वीही अनेक भीषण अपघात झाले आहेत. २०१८ मध्ये दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळून तब्बल ३० जणांचा मृत्यू झाला होता. मात्र तरीही या घाटातील सुरक्षेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मात्र या भीषण अपघातानंतर पुन्हा एकदा आंबेनळी घाटाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही क्षणांच्या निष्काळजीपणामुळे किंवा अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे आता तरी प्रशासन आंबेनळी घाटातील सुरक्षेबाबत ठोस पावले उचलणार का? हाच सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
0
0
Report

लातूर क्लासेस एरिया फैसले पर विरोध: प्रदर्शन ने प्रशासन से नोटिस वापस लेने की मांग

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज लातूर शहरातील क्लासेस एरियातील औद्योगिक वसाहतीत असलेले खाजगी कोचिंग क्लासेस, हॉस्टेल्स, खानावळी, हॉटेल, आशा व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश प्रशासनाकडून दिल्यानंतर आता या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. कोंग्रेस आणि क्लासेस एरियातील व्यावसायिक, क्लास चालक रस्त्यावर उतरले असून प्रशासनाने दिलेल्या नोटिसीची होळी करत निषेध आंदोलन करण्यात आणलं आहे. प्रशासनाने घेतला निर्णय मागे घ्यावा, आणि निट प्रकरणातील आरोपीला भरचौकात फाशी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे
0
0
Report
Advertisement

कल्याण में महंगाई के खिलाफ राष्ट्रवादी कांग्रेस का मोर्चा, सरकार विरोधी नारों से हंगामा

Kalyan, Maharashtra:महागाई विरोधात कल्याणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक, तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत वाढत्या महागाईचा केला निषेध, वाढत्या महागाई विरोधात कल्याणमध्ये राष्ट्रावादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गट आक्रमक झाले असून राष्ट्रवादीचे जिल्हाधिकारी डॉ. वंडार पाटील, यांच्या नेतृत्वाखाली कल्याणमध्ये तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत वाढत्या महागाईचा निषेध व्यक्त केला. पेट्रोल डिझेल दरवाढ आणि वाढत्या महागाई वरून कल्याण मध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने केंद्रातल्या नरेंद्र मोदी, सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. कल्याण पश्चिमेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. वाह रे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल अशा घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. वाढत्या महागाई मुळे आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्व सामान्य जानतेला महागाईचा नाहक त्रास सहन कारवा लागत आहे. वाढलेली हि महागाई त्वरित कमी न झाल्यास राष्ट्रवादी पक्षातर्फे रास्तारोको करण्याचा इशारा यावेळी पाटील यांनी दिला. बाईट, डॉ, वंडार पाटील, जिल्हाध्यक्ष,
0
0
Report

हिंदी में: ईद के ठीक पीछे चंद्रमुखी बकरा ‘बादशाह’ ने बाजार में मचाई धूम

Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात सध्या एका खास बोकडाची जोरदार चर्चा रंगली आहे... भारम येथील शेतकरी गजानन जेजुरकर यांच्या कडे असलेला “बादशाह” नावाचा काळा बोकड सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतोय... या बोकडाच्या कपाळावर नैसर्गिकरित्या उमटलेली पांढरी चंद्रकोर म्हणजेच “चांद” हे त्याचे वैशिष्ट्य ठरत आहे... मुस्लिम बांधवांचा पवित्र बकरी ईद सण जवळ येत असल्याने बाजारात बोकडांना मोठी मागणी वाढली आहे... विशेषतः कपाळावर चंद्रकोर असलेल्या बोकडांना लाखोंची बोली लागत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत... अनेक ठिकाणी अशा बोकडांची 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत विक्री झाल्याच्या बातम्यांमुळे आता गजानन जेजुरकर यांनाही त्यांच्या “बादशाह” कडून मोठ्या अपेक्षा लागल्या आहेत या संदर्भात बादशहाचे मालक गजानन जेजुरकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
0
Report

सांगली में हमाल संघटन ने सरकार के आदेश के खिलाफ अनिश्चित उपवास शुरू किया

Sangli, Maharashtra:सांगली मध्ये हमाल पंचायत संघटनेच्या वतीने राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अन्न नागरी पुरवठा विभागाकडून 24 एप्रिल रोजी एक अध्यादेश काढण्यात आला आहे. ज्यामध्ये रेशनिंग धान्य पुरवठा मध्ये थेट वाहतूक प्रणाली स्वीकारण्यात आली आहे, सरकारच्या निर्णयामुळे शासकीय धान्य गोदामातील आम्हाला यांच्यावर बेरोजगार होऊन उपासमारीची वेळ येणार असल्याचा आरोप करत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारने जारी केलेला अध्यादेश रद्द करून त्यामध्ये दुरुस्त करावी, अशी मागणी करत बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

नाशिक के राहुड में कर्ज और मौसम बदले से परेशान किसान ने की आत्महत्या

Nashik, Maharashtra:नाशिकच्या बागलाण तालुक्यात राहुड येथे गुलाब निकम यांची गळफास घेऊन आत्महत्या, गावात शोककळा. Anc: नाशिकच्या बागलाण तालुक्यातील राहूड येथे कर्जबाजारीपणा, बदलते हवामान आणि शेतीमालाला मिळणाऱ्या कवडीमोल दरांच्या विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. गुलाब केशव निकम (वय ५९) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या निधनाने राहुडसह काटवन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गुलाब निकम यांची स्वतःची सुमारे तीन एकर शेती कसून पत्नी व तीन मुलांसह कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शेतीच्या उत्पन्नावरच संसाराचा गाडा हाकणाऱ्या निकम यांच्यावर घरासाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. त्यातच बदलत्या हवामानामुळे शेतीचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते. यंदाच्या हंगामात त्यांनी कांदा पिकाची लागवड केली होती. मात्र परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला. उरलेला कांदा बाजारात विकला असता त्याला मातीमोल भाव मिळाल्याने त्यांच्या आर्थिक कोंडी आणखी तीव्र झाली होती. नातेवाईकांकडून घेतलेले हातउसने पैसे कसे फेडायचे, घरखर्च कसा चालवायचा आणि तीन मुलांचे विवाह कसे उरकायचे, या चिंतेने ते सतत विवंचनेत राहत होते. वाढते कर्ज आणि अपुरे उत्पन्न यामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, जनावरांना चारा टाकण्यासाठी ते काल गावाशेजारील खळ्यात गेले होते. रात्री ते शेतातच थांबले होते मात्र सकाळी उशिरापर्यंत घरी न परतल्याने मुलगा चेतन निकम हा खळ्याकडे गेला असता वडिलांनी गळफास घेतल्याचे his निदर्शनास आले. हा प्रकार पाहताच त्याने आरडाओरड केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येऊन राहुड गावात अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
0
0
Report

शंकर महादेवन ने साई दरबार में भजन से भक्तों को मंत्रमुग्ध किया

Shirdi, Maharashtra:प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी सहपरिवार साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले… साई दरबारात आल्यानंतर भजन गाण्याचा मोह त्यांना आवरला नाही… आपल्या सुरेल आवाजात त्यांनी साईभजन सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले…जगात शांती नांदावी अशी प्रार्थना त्यांनी साईचरणी केली तसेच शिर्डी साईमंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबा संस्थानने निमंत्रण दिल्यास आनंदाने भजनाचा कार्यक्रम सादर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले…दरम्यान, साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख गाडीलकर यांनी शंकर महादेवन यांचा सत्कार केला…
0
0
Report
Advertisement

अकोला में पेट्रोल-डीजल महंगाई के विरोध में बैलगाड़ी मोर्चा, वंचित बहुजन आघाडी आह्वान

Akola, Maharashtra:Anchor : वाढती महागाई आणि सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनोखा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, सरकारने तातडीने दरवाढ नियंत्रणात आणावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून बैलगादी, सायकल आणि गाढवाच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत टीका केली. खाजगी कंपन्यांकडून बांगलादेश आणि नेपाळला पेट्रोल-डिझेलचा पुरवठा होत असल्यामुळे देशात कृत्रिम टंचाई निर्माण झाली असल्याचा आरोपही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
0
0
Report

बीड में नीट पेपर फूटे के विरोध में जिला कार्यालय के बाहर प्रदर्शन

Beed, Maharashtra:बीड: नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर सामाजिक कार्यकर्त्यांची निदर्शने. देशभर गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शन केली. या प्रकरणात शिक्षण व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. पेपर फुटी प्रकरणात आरोपींची संपत्ती जप्त व्हावी या विरोधात घोषणाबाजी करत आरोपींच्या फोटो फलकावर फुल्या मारण्यात आल्या. नीट पेपर फुटीचे धागेदोरे बीड पर्यंत आढळून आले. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. नैराश्यात जाऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

पेट्रोल संकट के बीच महाराष्ट्र में चुनावी बहस तेज, सरकार पर सवाल

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ऑन पेट्रोल तुटवडा.... तीन महिन्यापासून प्रश्न आहे मात्र मधल्या काळात निवडणूक होत्या तेव्हा सत्ताधाऱ्यांनी सुख समाधानसारखं आल्यासारखं दाखवलं,राज्यात ग्रामीण भागात देखील रंग लागल्या आहे.मशागतीचे काम असल्याने इंधन गरजेचे आहे.सरकारचे हे अपयश आहे.अमृत काळाचा गोष्टी मारायच्या आणि दोन लिटर इंधन मिळत नाही. - ऑन इंधन काळाबाजार महाजन... ही बोलबच्चन कातडी बचाव भूमिका आहे.काळाबाजार होत असेल तर तुमची यंत्रणा झोपली का?काळाबाजार करणार हे सरकारच आहे.यामुळे फालतू भूमिका मांडणे सरकारने थांबवले पाहिजे होते. परवा माझी स्वतःची गाडी रात्री एक पर्यंत रांगेत होती.मी काँग्रेस वाला आहे का? शेतकऱ्यांना राजकारणी म्हणू नये - ऑन नितेश राणे..... दहशत वाड्यांचे अड्डे असेल मदरश्याला सरकार का मदत करते?सरकार झोपले आहे का? - ऑन पुणे महिला बेपत्ता.... ही पुण्याची परिस्थिती आहे संभाजीनगर मध्ये रोज तीन महिला बेपत्ता होतात.मुंबईत यापेक्षा वेगळी परिस्थिती आहे.यावर मुख्यमंत्री काय उत्तर देतात?सरकार फक्त बोटचेपी भूमिका घेत आहे. - ऑन विधान परिषद शिंदे मागणी... विधान परिषद निवडणुकीत कोंडी वाढत जाणार आहे.सरकार मध्ये शिंदे यांच्या मंत्र्यांची मोठी कोंडी झाली आहे. - ऑन चित्रपट महामंडळ निवडणुक मेडिकल कॉन्सिल निवडणुकांमध्ये तसेच चित्रपट निवडणुकीत भाजप वा सत्ताधार्यांनी नेत्यांची जायची का गरज आहे.सगळीकडे नाक खुपसायची सवय आहे.या गोष्टी अराजकतेकडे जात आहे. - ऑन वडेट्टीवार मतदार संघ... निवडणूक दूर आहे,निवडणूक आयोग अस बोलत असतो.सत्ताधारी पक्षाचे असेल तर झाकून ठेवतील विरोधक असतील तर पकडतील. जय पवार पोस्टर... - प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करत आहे.अजित दादा असताना मुलांना संधी मिळाली नाही आता मिळते आहे. - ऑन पोलिस/ नितेश राणे.... पोलिसांनी काय खाव हे राणे नि ठरवायचं का? तू कोंबडा खातो ते चालते का? हुतात्मा स्मारक त्याची दुरवस्था आहे सत्य आहे मात्र त्याचीअवहेलना होऊन नये अशी अपेक्षा आहे... - ऑन मोटेगावकर..... नीट ची तयारी करणाऱ्यांना पाणी शिंपडण्याचे गोष्टी करत असेल तर कठीण आहे - ऑन शिंदे उडघटनाला गैरहजर यावर मी काय बोलणार? माझ्या माहितीप्रमाणे ते दिल्लीला गेले आहे.त्यांच रूसने नेहेमीच आहे. ऑन गडकरी.... गडकरी नेहेमी अस बोलत असता चांगले काम करणारे ओळखे जातात,त्यांच्याच पक्षातील लोकांना ते बोलले असणार आहे. - ऑन वाळू वाहतूक... सत्ताधारी पक्षाचे लोक वाहनांवर फोटो लावून रात्री बे रात्री वाळू वाहतूक होते.पोलिस हप्ते वसुलीत व्यस्त आहे. - ऑन मोदी सरकार १२ वर्ष.... १२ वर्ष चांगले गेले आहे.अब नाही महेंगाइ की मार,पेट्रोल डिझेल १०० पार गेले आहे.खत २५०० पर्यंत गेले आहे.यामुळे मोदींचे १२ वर्ष बेमिसल आहे. - ऑन कांदा.... महाविकास आघाडीची चांदवड येथे कांद्यासाठी आंदोलन होणार आहे त्यासाठी मी जाणार आहे.या नंतर मंत्रालयात आंदोलन करू..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top