icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कक्षा में मोबाइल के इस्तेमाल पर सत्तार का कड़ा निर्देश, शिक्षकों से पूर्ण समय शिक्षण पर जोर

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शिक्षकांनी वर्गात मोबाइल वापरल्यास कारवाई, आमदार अब्दुल सत्तारांचा इशारा ANC: विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांनी मोबाइलचा वापर करू नये, अन्यथा संबंधित शिक्षकावर कारवाई केली जाईल, असा इशारा आमदार अब्दुल सत्तार यांनी दिला. सिल्लोड येथील नगर परिषद प्रशालेच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. गोरगरीबांची मुले नगर परिषद शाळांमध्ये शिक्षण घेत असल्याने शिक्षकांनी दर्जेदार शिक्षण देण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. वर्गात अध्यापन सुरू असताना शिक्षकाजवळ मोबाइल आढळल्यास त्याला थेट घरि पाठवू, असा सज्जड दमही त्यांनी भरला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षकांनी पूर्ण वेळ अध्यापनावर लक्ष केंद्रित करावे, असेही सत्तार यांनी यावेळी स्पष्ट केले.
0
0
Report
Advertisement

बालू माफिया-पुलिस पर हत्या के आरोप, सुरेश बोरसे के परिजनों ने न्याय की मांग

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. बोरसे यांच्या मृत्यूस वाळू माफिया आणि पोलिस जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री अतुल सावे आणि आमदार प्रशांत बंब यांनी बोरसे कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी कुटुंबीयांनी "आम्हाला न्याय द्या" अशी भावनिक मागणी केली. दरम्यान, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री अतुल सावे यांनी कुटुंबीयांना दिले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

तुपकर के अन्नत्याग आंदोलन का दूसरा दिन: प्रशासन मौन, सरकार से जवाब की मांग

Buldhana, Maharashtra:रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तुपकरांची संतप्त प्रतिक्रिया रविकांत तुपकरांनी पुकारलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. मात्र, या आंदोलनाकडे राज्य सरकारने आणि स्थानिक प्रशासनाने पूर्णपणे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. प्रशासनाचा या प्रकरणातील उदासीन पवित्रा आता संतापजनक ठरत आहे. आंदोलनाचा आज दुसरा दिवस उजाडूनही सरकारी पातळीवरून तुपकरांशी चर्चा करण्यासाठी किंवा मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी कोणताही अधिकारी अद्याप फिरकलेला नाही. सरकारने या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप तुपकरांनी केला आहे. विशेष म्हणजे, एखाद्या नेत्याने बेमुदत अन्नत्याग आंदोलन पुकारल्यानंतर प्रशासनाने तातडीने वैद्यकीय पथक तैनात करणे अपेक्षित असते. मात्र, रविकांत तुपकरांच्या बाबतीत हे नियमही पायदळी तुडवले गेले आहेत.
0
0
Report

डोंबिवली में स्मार्ट मीटर विरोध: मीटर बॉक्स पर ताला, आंदोलन की चेतावनी

Kalyan, Maharashtra:महावितरण स्मार्ट मीटर बसवण्याची शक्ती तर डोंबिवलीकरांचा स्मार्ट मीटरला विरोध, स्मार्ट मीटरला विरोध करत सोसायट्यांनी मीटर केबिनला लावले कुलूप, महावितरण कंपनीने सक्ती केली तर वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू असा महावितरणला डोंबिवली घरांचा इशारा, Anc : महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याबाबत ग्राहकांच्या मोबाईलवर मेसेज येऊ लागल्यानंतर डोंबिवलीत नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढेल, असा आरोप करत डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील काही हाउसिंग सोसायट्यांनी थेट सोसायटीच्या मीटर बॉक्सलाच कुलूप ठोकले आहे. इतकेच नव्हे तर स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशी मागणी करत महावितरणला लेखी निवेदनही देण्यात आले आहे. Vo स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून डोंबिवलीत नागरिकांचा विरोध अधिक तीव्र होताना दिसत आहे. महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याबाबतचे मेसेज ग्राहकांच्या मोबाईलवर येऊ लागल्यानंतर अनेक नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील नवसंकुलसह काही हाउसिंग सोसायट्यांनी थेट इमारतीच्या मीटर बॉक्सलाच मोठे कुलूप ठोकत अनोख्या पद्धतीने विरोध दर्शवला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर बदलले जाऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेतल्याचे रहिवाशांनी सांगितले. स्मार्ट मीटरमुळे वीजबिल भरमसाठ वाढण्याची भीती तसेच अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त करत नागरिकांनी महावितरण प्रशासनाला लेखी पत्रही दिले आहे. आमच्या इमारतीत स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, कुलूप लावलेल्या मीटर बॉक्सचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून डोंबिवलीत स्मार्ट मीटरविरोधातील नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागतल्याचे चित्र दिसत आहे. जर महावितरण कडून स्मार्ट मीटर बसवले गेले किंवा सक्ती केली गेली तर मोठे आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला,
0
0
Report
Advertisement

वीटभट्टी धूल से महामार्ग पर यातायात समस्या, उपायों की मांग

Washim, Maharashtra:कारंजा ते शेलूबाजार दरम्यान एका वीटभट्टीमधून उडणारी धूळ वाहनधारकां साठी मोठी समस्या ठरत आहे. वीटभट्टीतील धूळ थेट महामार्गावर येत असल्याने वाहन चालविताना चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. भरधाव वाहनांमुळे धुळीचे प्रमाण वाढत असून काही वेळा समोरील वाहनही स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनधारक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report

नांदेड के टोशनिवाल मेडिकल ने एक्सपायर्ड दवाइयां वितरित कीं; FDA ने जांच शुरू की

Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड शहरातील प्रसिद्ध तोषनिवाल मेडिकलने मुदत संपलेल्या गोळ्या एका ग्राहकाला दिल्या. घरी गेल्यावर ही बाब कळाल्यावर ग्राहकाने थेट तुकाराम मुंडे यांना मेल केला आणि तात्काळ मेल ची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मेडिकल वर तपासणी केली. हनुमंत वनाळेकर यांनी आपल्या वयोवृद्ध वडिलांसाठी मधुमेहाच्या गोळ्या तोषनिवाल मेडिकल मधून घेतल्या होत्या. पण या गोळ्यांची एक्सपायरी डेट संपल्याचे त्यांच्या मुलीला लक्षात आले. तेव्हा त्यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांना तक्रारीचा मेल केला. सध्या गतिमान कारभार करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाने मेडिकलवर तपासणी केली. विशेष म्हणजे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा त्या ग्राहकाला त्याच गोळ्यांची मागणी करायला लावली आणि मेडिकल चालकाने पुन्हा मुदत संपलेल्या गोळ्या दिल्या. अन्न व औषध प्रशासनाने तपासणी पूर्ण केली असून मुदतबाह्य गोळ्या देणाऱ्या मेडिकल वर काय कारवाई होते हे पाहावे लागणार आहे.
0
0
Report
Advertisement

शिरूर के कारेगाव में युवक ने रात भर दहशत मचाई; ग्रामीणों ने उसे बांधकर नियंत्रण में किया

Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील कारेगावमध्ये एका तरुणाने रात्रीघातलेल्या धुडगुसामुळे परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय. संबंधित तरुण अचानक बिथरल्यासारखा वागू लागल्याने, शेजारील रहिवासी आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. या तरुणाचं वर्तन अनियंत्रित झाल्याने परिसरात रात्री उशिरापर्यंत गोंधळाची परिस्थिती होती. अखेर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून स्थानिक ग्रामस्थांनी मोठं धाडस दाखवलं, आणि या तरुणाला दोरीच्या साहाय्याने बांधून नियंत्रणात आणलं. या धक्कादायक प्रकारामुळे कारेगाव परिसरात रात्री उशिरापर्यंत कमालीचा तणाव निर्माण झाला होता.
0
0
Report

शिपिंग कंपनी की लापरवाही से कांदा निर्यातकों को नुकसान, सरकार से हस्तक्षेप की मांग

Lasalgaon, Maharashtra:शिपिंग कंपनीच्या बेजाबदार कारभाराचा फटका कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांना बसला असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे नाशिक जिल्ह्यातून मुंबई मार्गे श्रीलंकेतील कोलंबो येथे कांदा निर्यात करण्यासाठी १ जून रोजी १०५ कंटेनरचे बुकिंग करण्यात आले होते मात्र, नियोजित वेळेत जहाज उपलब्ध न झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला यामध्ये ४० एसी कंटेनरमधील कांदा जहाजावर चढवण्यात आला, तर उर्वरित ६५ बिगर एसी कंटेनरमधील कांदा नाकारण्यात आल्याने निर्यातदार व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले या प्रकरणात शिपिंग कंपनीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांनी केली आहे दरम्यान, आखाती देशांमध्येही कांदा निर्यातीसमोर अडचणी वाढल्या आहेत एक महिन्यापूर्वी दुबईकडे पाठवण्यात आलेले कांद्याचे जहाज अद्यापही पोहोचले नसल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे दुसरीकडे पाकिस्तान, चीन आणि तुर्की या देशांतील नवीन कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात कमी दरात उपलब्ध होत असल्याने भारतीय कांद्याला तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून केंद्र सरकारने शिपिंग समस्येत हस्तक्षेप करावा आणि कांदा निर्यातदारांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली
0
0
Report
0
0
Report
Advertisement

निलंगा के पालापूर में 70 वर्षीय किसान ने साहूकार के दबाव से आत्महत्या

Latur, Maharashtra:निलंगा तालुक्यातील पालापूर येथे ७० वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या. खासगी सावकाराच्या कथित जाचाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल. कर्जफेडीच्या तणावातून होत होता मानसिक छळ. निलंगा पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील पालापूर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली है. खासगी सावकाराच्या कथित जाचाला आणि मानसिक छळाला कंटाळून ७० वर्षीय अल्पभूधारक शेतकरी हणमंत पाटील यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी कर्ज काढून छोटे हॉटेल सुरू केले होते. मात्र कर्जफेड न झाल्याने सावकाराकडून सततचा त्रास होत असल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संबंधित सावकारावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, निलंगा पोलीस ठाण्यात त्या संबधीत सावकाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
0
0
Report

कोल्हापुर में नशामुक्ति शपथ: 6 लाख से अधिक लोगों ने लिया शपथ

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यात सहा लाखांहून अधिक जणांनी नशामुक्तीची शपथ घेतली आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षाच्या शालेय प्रथम दिनानिमित्त जिल्ह्यातील 3674 या सर्व शाळांमधील सुमारे 5 लाखांहून अधिक विद्यार्थी तर 1 लाखांहून अधिक ग्रामस्थ व पालकांनी मोठ्या दिमाखात नशामुक्त कोल्हापूर या अभियानाची शपथ घेतली जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील अनेक विद्यार्थी हे तंबाखू गुटखा गांजा सिगारेट तसेच इतर मादक पदार्थांच्या विळख्यात अडकल्याचे मोठ्या प्रमाणावर निदर्शनास आलेपर्यायाने हे व्यसन विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित न राहता याचे चटके संपूर्ण कुटुंबियासह समाजाला बसत होते नेमकी हीच बाब हेरून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून नशामुक्त कोल्हापूर अभियान राबवले जात आहे
0
0
Report

रिसोड में पुरानी रंजिश से हत्या, आरोपी गिरफ्तार

Washim, Maharashtra:वाशीमच्या रिसोड शहरातील माणुसकी नगर परिसरात जुन्या वादातून एका व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.भगवान सुभाष गायकवाड (वय 38) यांची मध्यरात्री झोपेत असताना डोक्यावर दगड किंवा लोखंडी रॉडने वार करून हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला असून पुढील तपास सुरू आहे.या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असून हत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे。
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top