icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

राजदेरवाडी में पहाड़ी से पत्थर गिरा, 52 वर्षीय इंदूबाई देवरे की मौत

Chandvad, Maharashtra:अँकर-नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी येथे आज पहाटे अत्यंत दुर्दैवी घटना घडली. इंदुबाई संतोष देवरे (वय ५२, रा. दरेगाव) या नातेवाईकांकडे राजदेरवाडी येथे आल्या होत्या. पहाटे प्रातर्विधीसाठी घराबाहेर गेल्या असता, डोंगरावरून अचानक मोठा दगड कोसळून त्यांच्या अंगावर पडला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. स्थानिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून देवरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून घटनेची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.या परिसरात सध्या पावसाची सारखी रिप रिप सुरू असल्याने डोंगरावरून माती दगड येत असतात त्यातूनच ही घटना घडल्याचे बोलले जात आहे
0
0
Report

अमरावती से पंढरपूर: 50 वारकरी साइकिल रैली में महिलाओं सहित 600 किमी यात्रा

Washim, Maharashtra:अँकर:आषाढी एकादशी निमित्त अमरावती सायकल असोसिएशनच्या वतीने 50वारकरी सायकलने पंढरपूर वारीसाठी निघाले आहेत.यंदा या सायकल रॅलीचा चौथं वर्ष असून दिवसेंदिवस सायकलवारीमध्ये वारकऱ्याची संख्या वाढत आहे.या वारीत13महिलांसह 40 ते 80 वयोगटातील वारकऱ्यांचा समावेश आहे.अमरावतीहून 7 जुलै रोजी निघालेल्या या वारकऱ्यांनी रात्री वाशिमच्या मुक्कामानंतर आज पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत.दररोज 100 ते 120 किलोमीटर प्रवास करत हे वारकरी 600 किलोमीटर अंतर पार करून 12 जुलै रोजी पंढरपूरला पोहोचणार आहेत.पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनाचा संदेश देणारी ही सायकल वारी मागील चार वर्षांपासून सुरू असल्याचे वारकरी सांगत आहेत。
0
0
Report

सातारा जिले में भारी बारिश से बाढ़, भू-स्खलन और नदी-घाटों पर जलभराव

Satara, Maharashtra:सातारा -गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे, कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगम असलेल्या संगम माहुली येथील छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या समाधीला पुराच्या पाण्याने वेढा दिला है त्याचबरोबर काशीविश्वेश्वर मंदिराच्या पायरीला देखील पाणी लागले आहे. एकूणच सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपून काढून जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे, अनेक ठिकाणी घरांची पडझड तर काही ठिकाणी जनावरे देखील दगावली आहेत, घाटमाथा परिसरात दरड कोसळली आहे त्याचबरोबर रस्ते खचले आहेत, अनेक गावात भूस्खलन झाले आहे, एकूणच जिल्ह्यातील याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी....
0
0
Report
Advertisement
Advertisement

बारिश से सिन्नर के समृद्धि महामार्ग किनारे प्राकृतिक झरने लोगों को आकर्षित कर रहे हैं

Sinnar, Maharashtra:अँकर : नाशिक जिल्ह्यात सुरूलेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र धबधबे प्रवाहित झाले असून सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गालगत अनेक ठिकाणी नैसर्गिक धबधबे वाहू लागले आहेत. रस्त्याच्या कडेला कोसळणारे हे मनमोहक धबधबे वाहनधारक आणि प्रवाशांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना निसर्गाचे हे मोहक रूप अनुभवता येत असल्यून प्रवासात नयनरम्य दृश्यांचा आनंद घेत आहेत. सततच्या पावसामुळे सिन्नर परिसरातील हा निसर्गरम्य नजारा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
0
0
Report

बारिश से बदला चिखलदार घाट: पर्यटक जान जोखिम में डालकर फोटोग्राफी

Amravati, Maharashtra:धक्कादायक, चिखलदऱ्यात पर्‍यटकांची जीवघेणी फोटोग्राफी; नुसतं धाडस कशाला गेल्या आठ ते दहा दिवसांपासून चिखलदर्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे पर्यटक चिखदऱ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. सध्या चिखलदरा पर्यटकांनी हाऊसफुल झालं असल्याच पाहायला मिळत आहे तर काही पर्यटक हुल्लडबाजी करत असल्याच पाहायला मिळत आहे तर काही अतीउत्साही पर्यटक चिखलदऱ्यातील गावीलगड शेजारी असलेल्या पॉईंटवर बॅरिकेट नसलेल्या ठिकाणी टेकडीच्या काठावर जाऊन आपला जीव धोक्यात टाकून जीवघेणी फोटोग्राफी करत आहे. तर काही पर्यटक किल्ल्याच्या भिंतीवर अगदी काठावर जाऊन फोटो काढत आहे त्यामुळे हे नुसतं धाडस कशाला असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला
0
0
Report
Advertisement

अहिल्यानगर जिले में यलो अलर्ट, भारी बारिश जारी

Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्हयास यलो अलर्ट ; जिल्हयात सर्वदूर पावसाची हजेरी... दोन दिवसांपासून पावसाची संततधार , मुसळधार पाऊस सुरू.. शिर्डी , अकोले , संगमनेर ,कोपरगाव , नेवासा, राहुरी तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी... तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची हजेरी... भंडारदरा ‌, मुळा आणि निळवंडे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ... भंडारदरा 50% , मुळा 40 तर निळवंडेत 26 टक्के पाणीसाठा.. खरिप पेरणीला मिळणार मुहूर्त... गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके रखडली... अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
0
Report
Advertisement

यवतमाल में सोयाबीन की बुवाई के बाद उग नहीं, किसान चिंतित, जांच की मांग

Yavatmal, Maharashtra:चालू खरीप हंगामात पिकांची पेरणी किंवा लागवड केल्यानंतर बियाण्यांची उगवण होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी पुढे येत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी लागवड केलेली सोयाबीन बियाणे उगवलेच नाही, त्यामुळे बियाण्यांची उगवण क्षमता व त्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. बाभुळगाव तालुक्यातील मिटणापूर येथील शेतकरी रणजीत दांडगे यांनी आपल्या शेतात सोयाबीन ची लागवड केली होती. मात्र त्यांनी लागवड केलेल्या 11 एकर शेत जमिनीवरील सोयाबीन उगवले नाही. त्यामुळे त्यांना शेतात पुन्हा नांगर फिरवून दुबार पेरणी करावी लागत आहे. याबाबत त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. दांडगे यांच्याप्रमाणेच अनेक शेतकऱ्यांच्या अशाच प्रकारच्या तक्रारी असून त्यांच्या माथी कृषी केंद्रांमधून बोगस बियाणे मारल्या गेले असावे अशी शक्यता आहे. अशा प्रकारच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे कराव्या असे आवाहन जिल्हा कृषी अधीककांनी केले आहे.
0
0
Report

नाशिक में भारी बारिश, जलाशयों में पानी का स्तर तेज़ी से बढ़ा

Nashik, Maharashtra:ब्रेकिंग नाशिकमध्ये मुसळधार पावसाची हजेरी; धरणसाठ्यात वाढ • नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासांत अनेक भागांत जोरदार पावसाची नोंद. • सर्वाधिक पाऊस अंबोली 224 मिमी, इगतपुरी 205 मिमी, त्र्यंबक 148 मिमी, गौतमी-गोदावरी परिसर 121 मिमी, नाशिक शहर 88 मिमी. • पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ सुरू. • दारणा धरण 36 टक्के , गंगापूर 53.34%, कश्यपी 40.93%, कडवा 49.64%, करंजवण 23.07%, चणकापूर 60.20% वर • नाशिक पाटबंधारे विभागातील एकूण उपयुक्त पाणीसाठा 37.96%, गेल्या वर्षीपेक्षा अद्याप कमी, मागील वर्षी याच दिवशी तो 71.91% होता. • गौतमी-गोदावरी धरणातून 1,280 क्युसेक, तर चणकापूर धरणातून 4,732 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. • धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे येत्या काही दिवसांत धरणसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top