icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

महाराष्ट्र दिवस पर रत्नागिरी के कलाकार ने रांगोळी से महाराष्ट्र का नक्शा बना डाला

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त रांगोळी कलेतून अनोखी मानवंदना.. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त रांगोळी कलेतून अनोखी मानवंदना दिली आहे. रहाटे यांनी नदीतील लहानशा दगडावर रांगोळीच्या सहाय्याने सर्वात लहान ३ ते ४ इंच आकाराचा महाराष्ट्राचा नकाशा साकारला असून, त्या नकाशावर छत्रपती शिवाजी महाराज व हुतात्मा स्मारकाची प्रतिमा रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे, संपूर्ण रांगोळी साकारण्यासाठी विलास रहाटे यांना सुमारे एक तासाचा कालावधी लागला आहे.
0
0
Report

महाराष्ट्र दिवस पर पुणे-सोलापूर मार्ग के सरडेवाडी टोल पर लंबी कतारें, प्रवास बढ़ा

Rui, Maharashtra:पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी ट toll नाक्यावर लांबच लांब रांगा... एक मे महाराष्ट्र दिनी पुणे मुंबईकर गावाकडे परतल्याने गर्दी... आज एक मे महाराष्ट्र दिनी सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी आहे. उद्या शनिवार और परवा रविवार जोडून आल्या असल्याने सलग सुट्ट्या जोडून आल्या आहेत. त्यामुळे पुणे मुंबईकर गावाकडे परतत आहेत. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदাপूर तालुक्यातील सरडेवाडी टोल नाका परिसरात लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. सरडेवाडी टोल नाका परिसरात तब्बल एक ते दीड किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
0
0
Report

रत्नागिरी के समुद्री तट गर्मी से खाली, पर्यटन प्रभावित

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीत उन्हाचा तडाखा.. पर्यटनाला 'ब्रेक',भर हंगामात समुद्रकिनारे ओस.. कोकणची पंढरी समजल्या जाणाऱ्या रत्नागिरीत सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानाने उच्चांक गाठल्यामुळे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांवर आता शुकशूकाट पाहायला मिळत आहे.. ऐन पर्यटन हंगामात उष्माघाताच्या धास्तीने पर्यटकांनी किनाऱ्यांकडे पाठ फिरवली आहे.. नेहमी पर्यटकांनी गजबजलेले गुहागर,गणपतीपुळे,भाट्ये,आरे-वारे आणि मांडवी यांसारखे समुद्रकिनारे आता ओस पडले आहेत.. एरवी सकाळपासूनच गर्दी असणाऱ्या या ठिकाणी आता केवळ शुकशूकाट दिसत आहे. दुपारी 12 ते संध्याकाळी 5 या वेळेत समुद्रकिनाऱ्यावर चिटपाखरूही दिसत नाही. पर्यटकांची संख्या घटल्याने स्थानिक व्यावसायिक, घोडेस्वार आणि वॉटर स्पोर्ट्स चालकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे..
0
0
Report
Advertisement

नागपुर में भीषण गर्मी: 58 मरीजों को अस्पताल में भर्ती, स्थिति नियंत्रण में

Nagpur, Maharashtra:नागपूर - यंदा एप्रिल महिन्यात उन्हाचा कहरच पाहायला मिळाला ...शहरात तापमान ४५ अंशांच्यावर तापमान पोहचले होते - शहरात उष्णतेमुळे फटका बसलेल्या ५८ रुग्णांची नोंद झाली आहे...मनपाच्या आरोग्य विभागाचा अहवालात उन्हामुळे मृत्यूची नोंद नाही... - एकही उष्माघात होऊन संशयित मृत्यूचीही नोंद नसल्याचा दावा मनपाच्या आरोग्य विभागाने केलं आहे.. - ५८ रुग्णांमध्ये विविध तक्रारीत स्नायू वेदना, पुरळ, भोवळ, बेशुद्धी असे तक्रारीच्या रुग्णाची नोंद झालीय.. - उन्हाचा तडाखा बसल्याने १४ रुग्णांना स्नायू त्रास, तर२२ रुग्णांना अंगावर पुरळ, १७ रुग्णांना भोवळ, ५ जण बेशुद्ध पडल्याची नोंद - बहुतांश प्रकरणे किरकोळ, उष्माघाताचे गंभीर लक्षण नाहीत - खासगी-सरकारी रुग्णालयात गर्दी, उलट्या, अशक्तपणा, निर्जलीकरण वाढले, त्यामुळे रुग्ण कमी दाखवले जात नाही ना अशी शंका व्यक्त..
0
0
Report

नाशिक के उपनगर में नाबालिग के साथ दुर्व्यवहार; आरोपी गिरफ्तार

Nashik, Maharashtra:मुलीची छेड काढणारे दोघे गुंड म्हणाले, 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' अँकर एका अल्पवयीन मुलीचा बलजबरीने पाठलाग करून तिच्या घरी जाऊन कुटुंबीयांना शिवीगाळ, मारहाण करत त्रास देणाऱ्या दोघा गुंडांना नाशिकच्या उपनगर पोलिसांनी अटक केलीये. काल गुन्हेच्या शाखेच्या युनिट-१च्या कार्यालयात आणून संशयित आरोपी प्रेम गागुर्डे दर्शन उर्फ ओंकार सूर्यवंशी यांचा चांगलाच 'पाहुणचार' केलाय... त्यानंतर दोघांना पुन्हा पोलिस ठाण्यात नेण्यासाठी बाहेर आणण्यात आले तेव्हा ते दोघे हात जोडून 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' म्हणाले....संशयितांच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. तिला तातडीने कुटुंबीयांनी रुग्णालयात हलविल्याने अनर्थ टळला. तत्पुर्वी रविवारी दोघा संशयितांनी तिच्या राहत्या घरी येऊन धिंगाणा घातला होता. यावेळी पीडितेच्या आईने 'माझ्या मुलीला त्रास देऊ नको, तिच्या मागे व नादी लागू नको, असे बजावले' त्याचा राग मनात धरून गांगुर्डे याने मुलीच्या आईला शिवीगाळ करून मारहाण केली. पीडितेचा बळजबरीने हात पकडून विनयभंग केला. यावेळी तिच्या भावाने मध्यस्ती केली असता त्याने कम्बरेचा कोयता काढून त्याच्या दिशेने फेकून मारला. त्याने नेम चुकविल्याने तो थोडक्यात बचावला होता. पीडित मुलीने या दोघांच्या त्रासाला कंटाळून सोमवारी रात्री साडेअकराच्या Sुमारास घरी फिनेल प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात विनयभंग, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय...
0
0
Report

नाशिक में भीषण गर्मी से लोग परेशान, कुंभ की तैयारी तेज, मंत्री ने निर्देश दिए

Nashik, Maharashtra:नाशिक @ गिरीश महाजन - मंत्री बाईट मुद्दे - ऑन तापमान - सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो - कामगार दिवस आणि बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो - तापमान वाढतंय, उच्चाकी तापमान - विदर्भात जास्त तापमान आहे - उन्हामुळे त्रास होतोय, हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्यात - आजारी लोकं, लहान मूल, वृद्धांनी १५ ते ५ या वेळेत बाहेर पडू नका - लहान मुलांना दुचाकीवर घेऊन तासंतास बाहेर घेऊन जातात - लग्नाला घेऊन जातात हे चांगलं नाही - ४७ तापमानात एक मुलगा माझ्या गावात एक महिला लग्नाला घेऊन आली तो रडत होता - शासनाने सूचना दिल्यात त्याचे तंतोतंत पालन करावं ऑन कुंभ कामे - कामाच्या दर्जाबाबत कुठेही तडजोड नाही - अनियमितता झाली असेल तर माहिती घेतो - काही चुकीच झाले असेल तर सांगा कारवाई करू - महापौर आणि उपमहापौर यांच्याकडून माहिती घेतो - नागरिकांना त्रास होतोय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय - नाशिक स्वच्छ आणि सुंदर आणि हरित करायचं आहे - नाशिकला १ नंबर करायचे आहे - ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत - सगळे खबरदारी घेत आहेत आणखी सूचना देऊ - दोन ते तीन महिने त्रास सहन करावा लागेल - पुढील सुखासाठी थोडा त्रास सहन करावा लागेल - कुंभमेळा पूर्वी कामे होतील - मुख्यमंत्री यांनी नाशिककरांना शब्द दिलाय ऑन खरातवर बांधकाम विभाग मेहरबान - माहिती घेऊन बोलतो - स्पेशल दिला असेल तर बोलतो ऑन उन्नत नाशिक - स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक आणि हरित नाशिक संकल्पना - नाशिकला एक नंबर करायचे आहे - लोकांची पसंती नाशिकला आहे - आमचं शहर आपलं शहर असे समजून काम करावे - स्वयंसेवक आहे त्यांनी पुढे येऊन सहभागी व्हावे - मोठे झाडे सुद्धा लागणार आहे ऑन हर्षवर्धन सदगिर - क्लासवनची मागणी केली आहे - सदगिरबाबत योग्य निर्णय होईल - चौधरीबाबत विशेष निर्णय घेतला होता ऑन सभागृह नेता एकमत - त्यावर एकमत झाले आहे - लवकरच होईल ऑन पालकमंत्री एकमत - त्यावर एकमत झालेलं नाहीये - ते लोकमत आहे
0
0
Report
Advertisement

सातारा में गुलमोहर डे: पेड़ों के नीचे रंगोत्सव का उल्लास

Satara, Maharashtra:सातारा: १ मे हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून राज्यभरात साजरा केला जात असला तरी साताऱ्यात 1 मे हा दिवस गुलमोहर दिन म्हणून गेली 28 वर्षा पासून साजरा केला जातो आहे. साताऱ्यातील काही पर्यावरण प्रेमींनी हा दिवस गुलमोहर डे म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि आज साताऱ्यात गुलमोहराच्या झाडाखाली रंगोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला लहान ,मोठे सर्वजन एका ठिकाणी जमून गुलमोहराचा झाडाची वेगवेगळी फुलांची चित्रे काढतात. काही हौशी निसर्गप्रेमी गाणी आणि कविता सादर करतात .जिल्ह्यातील त्याच बरोबर जिल्ह्याबाहेरील हौशी कलाकार या गुलमोहर दिनानिमित्त वेगवेगळ्या कला या ठिकाणी सादर करतात. उन्हाळ्यात बहरणारी फुले या विषयावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केल जाते.. साताऱ्यात होत असलेल्या गुलमोहर दिनानिमित्त या कार्यक्रमाचे स्वरूप दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी...
0
0
Report

मराठी भाषा पर चंद्रकांत पाटिल का स्पष्ट बयान: जबरदस्ती गलत, कानून से समाधान

Sangli, Maharashtra:स्लग - मराठी भाषा आलीच पाहिजे,पण सक्ती,मारहाण योग्य नाही,यातून आरजकात निर्माण होईल - मंत्री चंद्रकांत पाटील अँकर - मराठी भाषा आली पाहिजे,हे राज ठाकरेंचं म्हणणं आपल्याला देखील मान्य आहे,पण सक्ती,मारहाण आणि राज्य सरकारला दोष देणे,हे आपल्याला मान्य नाही,यातून अराजकता माजेल,असं मत भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.महाराष्ट्रात काम करताना मराठी हे आले पाहिजे,मराठी ही वाईट नाही.ते जर ऐकत नसतील तर कायदा केला पाहिजे,त्यांना कायद्याने शासन केलं पाहिजे,आम्हाला कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिला ? यातून अराजकात माजेल,त्यामुळे कायदाचा धाक दाखवून प्रेमाने केले पाहिजे,असे मत देखील मंत्री पाटील यांनी व्यक्त केले आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री. व्‍हाय वो - तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी यापुढे पवार कुटुंबाच्या विरोधात निवडणूक लढवणार नसल्याच्या भूमिकेचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्वागत केले आहे,आपल्या कुटुंबाच्या पुढे स्वार्थासहित न पाहणे,ही हिंदू भारतीय आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या निर्णयाचा आनंद आहे,असे मत मंत्री चंद्रकांत पाटलांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
0
0
Report
Advertisement

अमरावती में कुत्तों के हमले पर प्रशासन की कार्रवाई शून्य, 4 साल की बच्ची घायल

Amravati, Maharashtra:अमरावती शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस; लाखो निधी असूनही कारवाई शून्य, 4 वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्याचा हल्ला अमरावती शहरातील रोशन नगर परिसरात मोकाट कुत्र्यांच्या त्रासाने गंभीर रूप धारण केले असून याच पार्श्वभूमीवर एका 4 वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराजवळ खेळत असताना कुत्र्यांनी तिच्या गालावर हल्ला करत तिला जखमी केले. सुदैवाने तिचा जीव वाचला असला तरी जखम गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मुलीचे वडील संतप्त झाले असून, त्यांनी महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागावर गंभीर आरोप केले आहेत. मोकाट जनावरांच्या नियंत्रणासाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध असूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या चार दिवसांपासून ते महानगरपालिकेत तक्रार देऊन कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करत आहेत मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात अशा घटना जीवघेण्या ठरू शकतात असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
0
0
Report

ताडोबा-अंधारी में वर्चुअल रियालिटी से पर्यटन का नया अनुभव, महाराष्ट्र दिन पर उद्घाटन

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता वर्चुअल रियालिटी चा नवा अनुभव, 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले आभासी उद्घाटन ताडोबाच्या जैव विविधतेचा सर्व ऋतूंमधील अनुभव देणारा विशेष सहा मिनिटांचा VR चित्रपट यात आकर्षण ठरलाय. या माध्यमातून पर्यटकांना जंगलातील विविध वनस्पती प्राणी आणि अधिवास यांचे जवळून दर्शन घेता येणार असून पारंपरिक सफारीपेक्षा वेगळा आणि अधिक समृद्ध अनुभव यात मिळणार आहे. प्रकल्पातील विविध प्रवेशद्वारावर VR संच बसवण्यात येत असून गेटवरील सफारी जिप्सीच्या संख्येनुसार VR यूनिटची संख्या देखील निश्चित केली जाणार आहे. यामुळे पर्यटकांना सुलभपणे या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी प्रति व्यक्ती 50 रुपये नाममात्र शुल्क सेवा देखील घेतली जाणार असून सध्या मोहर्ली आणि खुटवंडा या प्रवेशद्वारांवर ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे。
0
0
Report

सोलापुर के बोरामणी नाका चौक पर भयानक हादसा, 4 महीनों में 7 मौतें

Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - सोलापुरातील बोरामणी नाका चौक बनला मौत का कुवा झालेल्या, 4 महिन्यात 7 जणांनी गमावला जीव. सोलापूर शहरातील बोरामणी नाका येथे टिपर चालकाची दुचाकीला धडक दिलीय. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. सोलापुरातील बोरामणी नाका चौक बनला मौत का कुवा. नितीन भास्कर जगळघंटे असे अपघातात मृत्यू झालेल्या 33 वर्षीय तरुणाचे नाव आहे. सोलापुरातील बोरामणी नाका परिसरात वारंवार अपघात होतायत. मागील 4 महिन्यात या परिसरात 7 जणांनी आपला जीव गमावला आहे. नितीन जगळघंटे हा वाहनचालक म्हणून काम करतो, काल आपले काम संपवून तो मालकाच्या दुचाकीवरून घरी निघाला होता. बोरमणी नाका परिसरात आल्यानंतर एका टिपर वाहनाने नितीन याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. टिपरचे चाक नितीन याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सिव्हिल पोलीस चौकीत सुरुवातीला अनोळखी व्यक्ती म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी दुचाकीच्या नंबरवरून तपास करत गाडी मालकाशी संपर्क केला तेव्हा मृत व्यक्ती हा नितीन जगळघंटे असल्याचे समोर आले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top