icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चंद्रपुर नगरपालिका कांग्रेस गुटों में विवाद: आडूर-धानोरकर गुटों की सत्ता संघर्ष

Chandrapur, Maharashtra:टायटल:-- फेब्रुवारी महिन्यात चंद्रपूर मनपाच्या सत्ता स्थापने दरम्यान संधी हुकलेल्या काँग्रेसच्या गटात पुन्हा एकदा कलह, वडेट्टीवार- धानोरकर यांच्यातील काँग्रेस पक्षांतर्गत गटांमध्ये वर्चस्वाची लढाई उफाळली, वडेट्टीवर गटाचे चंद्रपूर मनपा गटनेते राजेश अडडूर यांना हटविण्यासाठी धानोरकर गट पोचला नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात अँकर:-- चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या एकूण 27 नगरसेवकांपैकी फेब्रुवारीत गट स्थापनेवेळी राजेश अडडूर या वडेट्टीवार समर्थक नगरसेवकाला गटनेता म्हणून मान्यता देण्यात आली होती. मात्र केवळ चार महिन्यातच खा. धानोरकर गटाने आपल्या तंबूत अनेक नगरसेवकांना ओढत अड्डूर यांना पायउतार करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यावरून चंद्रपूर काँग्रेसमध्ये कलहाचा दुसरा अंक सुरू झाल्याचे स्पष्ट झाली आहे व्ही. ओ. १)फेब्रुवारी महिन्यात चंद्रपूर मनपाच्या सत्ता स्थापने दरम्यान संधी हुकलेल्या काँग्रेसच्या गटात पुन्हा एकदा कलह बघायला मिळत आहे. आ. वडेट्टीवार- खा.धानोरकर यांच्यातल्या काँग्रेस पक्षांतर्गत गटांमध्ये वर्चस्वाची लढाई उफाळली आहे. 66 सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर मनपात काँग्रेस 27 नगरसेवक संख्येसह सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांना 3 समर्थीत नगरसेवकांचा पाठींबा आहे. अशी एकूण 30 नगरसेवकांची मजबूत फौज असताना फेब्रुवारीत नाराजी नाट्याचा पहिला अंक पार पडल्यावर वडेट्टीवार गटाचे चंद्रपूर मनपा गटनेते म्हणून राजेश अडडूर यांची निवड झाली होती. मात्र आता वडेट्टीवार गटातील काही नगरसेवकांनी धानोरकर गटात उडी घेतल्याने अडडूर यांना पदावरून खेचण्यासाठी 2 बैठका झाल्या.  आज धानोरकर गट नागपुरात विभागीय आयुक्त कार्यालयात पोचला. आपल्याकडे बहुमत असून अडडूर यांना हटवा असे पत्र त्यांनी आयुक्तांना दिले. विद्यमान गटनेते वडेट्टीवार गटाचे राजेश अडडूर हे देखील नागपुरात आपल्या समर्थक नगरसेवकांसह आयुक्त कार्यालयात पोहोचले त्यांनी खा. धानोरकर यांच्या गटाच्या मागणीला आक्षेप नोंदवला. अडडूर यांनी धानोरकर गटाचे हे प्रयत्न शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली आहे.  त्यांना बैठक बोलवण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं अड्डूर यांनी म्हटलं आहे. बाईट १) राजेश अडडूर, गटनेता, काँग्रेस, चंद्रपूर शहर मनपा ( वडेट्टीवार गट) व्ही. ओ. २) दरम्यान प्रतिभा धानोरकर गटाच्या सुरेंद्र अडबाले यांचे नाव नवे गटनेते म्हणून पुढे केले जात आहे . या घडामोडींवर भाष्य करताना खा. प्रतिभा धानोरकर यांनी मात्र गट कायम असून केवळ नेता बदला ची मागणी आहे अशी माहिती दिली.  गटनेत्याचा व्हीप हा सभागृहातील कामकाजापुरता असतो बाहेर तो लागू होत नसल्याचे सांगत त्यांनी व्हीप वॉर मधली हवा काढून टाकली. आ. वडेट्टीवार विरुद्ध खा. धानोरकर यांच्यातील लढाई नसून ही नगरसेवकांची लढाई आहे. ते कोर्टात जाणार असतील तर आम्हीही कॅव्हेट दाखल केला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. कुठल्याही पैशाच्या- आमिषाच्या दबावाने गटनेतेपद बदलले जात नसल्याचेही त्या ठामपणे म्हणाल्या. बाईट २) प्रतिभा धानोरकर, खासदार, चंद्रपूर व्ही. ओ. ३) विभागीय आयुक्तांनी यावर कुठलाही निर्णय अद्याप दिलेला नाही. अगदी चार महिन्यातच वडेट्टीवार गटाच्या प्रमुख कार्यकर्त्याला पदावरून हटवण्यासाठी खा. धानोरकर गट का सक्रिय झाला? यामागे कोणते राजकारण आहे, याची मात्र जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. यात काही वेगळा प्लान आहे का? की हे केवळ नगरसेवकांच्या नाराजीचे शमन आहे याची उत्तरं अजून शिल्लक आहेत. नागपूरहून अमर काणे सह आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

भंडारा कपड़ा बाजार में भीषण आग, दमकलों की रातभर कोशिशें जारी

Bhandara, Maharashtra:भंडारा शहरातील गजबजलेल्या कपडा बाजार परिसरात असलेल्या लालचंद कपडा शShop मध्ये आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी दोन फायर ब्रिगेड पाठवून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. दुकानातील मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जात असून आग लागण्याचे कारण स्पष्ट झाले नाही, अग्निशमन दल और संबंधित यंत्रणा का घाटोकात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
0
0
Report

FDA की कार्रवाई से वाशीम में पानटपरी बंद, भेसळ पर सख्त कदम

Washim, Maharashtra:वाशिम शहर सहित जिल्हे में काल से कई पानटपऱ्या, खाद्य पदार्थ विक्रेता और कुछ व्यावसायिक आस्थापना अचानक बंद हो गए। अन्न व औषध प्रशासन की संभाव्य जांच और कार्रवाई की चर्चाओं से व्यापाऱ्यां में हडकम्प पैदा हुआ और बाजार में डर व भ्रम का माहौल बना। स्पेशल रिपोर्ट में बताया गया कि अन्न व औषध प्रशासन के दल वाशिम शहर व जिल्हे में दाखिल होने की सूचना सोशल मीडिया पर फैली। इसके कारण कई पानटपरी, होटल व्यवसायी, चिकित्सा दुकानदार और खाद्य विक्रेताओं ने दुकानें बंद कर दीं; कुछ जगहों पर ग्राहकों के रहते ही शटर गिरा दिए गए। मुख्य बाजार, बस स्टैंड और चौकों में पानटपऱ्या बंद रहे, जिससे नागरिकों में चर्चा तेज हो गई। भेसळयुक्त खाद्य पदार्थों पर कार्रवाई जरूरी है; ऐसी तपासणियाँ नियमित हों तो ग्राहक स्वास्थ्य सुरक्षित रहेगा। नागरिकों ने नियमित तपासणी व कार्रवाइयों को बनाए रखने की मांग की। शिकायतों के आधार पर तथा सामान्य जांच मोहिम के अंतर्गत कार्रवाहियाँ जारी हैं; नियमों के उल्लंघन पर आवश्यक कार्रवाई की जाती है।
0
0
Report
Advertisement

भांडुप के रामकली विद्यामंदिर से आनंदनगर क्षेत्र में फेरीवालों का कब्जा बढ़ा, यातायात बाधित

Mumbai, Maharashtra:भांडुपमधील गाढव नाका परिसरातील रामकली विद्यामंदिर ते आनंदनगर परिसरात फेरीवाल्यांचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फेरीवाल्यांनी ठाण मांडल्याने वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे पालिकेचे अतिक्रमण पथक कारवाईसाठी येत असले तरी गाडी निघून जाताच काही मिनिटांतच फेरीवाले पुन्हा जागा बळकावत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
0
0
Report

त्र्यंबकेश्वर मंदिर में एक दिन में 70 लाख से अधिक कमाई, 12.72 लाख रुपए दान

Nashik, Maharashtra:Anchor त्र्यंबकेश्वर संस्थानला अधिक मासात लक्ष्मी प्रसन्न झाली आहे. दर्शन रांगेतून अतितातडीचे दर्शनातून चक्क 70 लाखांहून अधिक कमाई झाली आहे. महाधिदेवाच्या दर्शनासाठी रविवारी एकाच दिवसात त्र्यंबकेश्वर संस्थानला पंचवीसशे रुपयांच्या तिकिटाच्या माध्यमातून बारा लाख 72 हजार पाचशे रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. अति तातडीच्या दर्शनाचा रविवारी एकाच दिवसात एकूण 509 जणांनी याचा लाभ घेतलाये. विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वर मध्ये येणाऱ्या अनेक पूजेसाठी येणाऱ्या भाविकांनी आणि त्यांच्या पूजा करणाऱ्या ब्राम्हणांनाई भरभरून प्रतिसाद दिला आहе. मिळालेल्या देणगीतून आता सर्वसामान्य भाविकांसाठी रांगेत लाडू चिवडा आणि पाण्याची बाटली दिली जातेय. लवकरच उत्तम दर्जाच प्रसादालय सुरू करण्याचा मानस संस्थांनने व्यक्त केला आहे.
0
0
Report

112 हेल्पलाइन का दुरुपयोग: चार दोस्त गिरफ्तार

Latur, Maharashtra:स्क्रिप्ट :- ११२ ला विनाकारण फोन कराल, तर मिळणार चोप... AC :- मित्रांची मैफल रंगली... नशा चढली... आणि मग चौघांनी केला एक फोन! फोन होता थेट ११२ वर... माहिती होती हाणामारीची... आणि पुढच्या काही मिनिटांतच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पण, प्रत्यक्षात तिथे काय सुरू होतं... आणि चौघांची नशा कशी उतरली... पाहूयात या रिपोर्ट मधून... VO 01 :- भांडण, मारहाण, छेडछाड, अपघात किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती... अशा वेळी नागरिकांच्या मदतीला धावून येण्यासाठी ११२ ही अत्यावश्यक हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, उदगीर तालुक्यातील वाढवणा परिसरात या सेवेलाच चार जणांनी विनाकारण वेठीस धरले. मित्रांची मैफल, धाब्यावर रंगलीली पार्टी आणि त्यात दारूची नशा... नशा इतकी चढली की, चौघांच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली. त्यांनी थेट ११२ वर फोन करून परिसरात हाणामारी सुरू असल्याची खोटी माहिती दिली. आपत्कालीन कॉल समजून पोलिसही तातडीने घटनास्थळी धावले. मात्र, तिथे ना भांडण होते, ना हाणामारी... समोर होते फक्त दारूच्या नशेत तर्र झालेले चार मित्र. आणि यानंतर चौघांची मजा क्षणातच उतरली. बाईट :- सुनील गायकवाड (सहाय्यक पोलीस निरीक्षक) VO 02 :- ११२ वरून हाणामारीचा कॉल येताच वाढवणा पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली. परिसरात मोठा गोंधळ सुरू असावा, असे गृहित धरून पोलिसांचे पथक क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तिथे पोहोचल्यावर चित्र पूर्णपणे वेगळेच होते. ना कुठे भांडण... ना हाणामारी... धाब्यावर शांत वातावरण आणि समोर दारूच्या नशेत तर्र झालेले चार मित्र! काही वेळातच हा संपूर्ण प्रकार खोटा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. घटनास्थळी हाणामारीचा कोणताही प्रकार नसल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याविरुद्ध वाढवणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एका खोट्या फोनमुळे चौघांची नशा तर उतरलीच, पण आता त्यांना कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, ११२ ही अत्यावश्यक सेवा असून, केवळ आपत्कालीन परिस्थितीतच या क्रमांकाचा वापर करावा. खोटे किंवा दिशाभूल करणारे कॉल करून पोलिस यंत्रणेला वेठीस धरू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. बाईट :- सुनील гायकवाड (सहाय्यक पोलीस निरीक्षक ) VO 03 END :- दारूच्या नशेत केलेला एक 'प्रँक कॉल' चौघांना चांगलाच महागात पडला. आपत्कालीन सेवेसाठी असलेल्या ११२ हेल्पलाइनचा गैरवापर केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे....
0
0
Report
Advertisement

साईबाबा ट्रस्ट: 2025-26 आय घटकर 638 करोड़, दान-गोल्ड-चांदी धमाकेदार बढ़त

Shirdi, Maharashtra:शिर्डी स्थित साईबाबा संस्थान ट्रस्ट के 2025-26 आर्थिक वर्ष के आय-व्यय का लेखा सामने आया है। पिछले वर्ष की तुलना में कुल आय में कमी दिखी है, पर वस्तु-रुपात दान तीन-चार साल के भीतर 15 करोड़ रुपये अधिक मिलने के कारण दान अधिक बताया गया। पिछले वित्त वर्ष में मुदत-समय पर आए ब्याज आय में 14 करोड़ रुपये की वृद्धि हुई। 2024-25 में साईबाबा संस्थान की कुल आय 648 करोड़ रुपये थी, जबकि 2025-26 में यह घटकर 638 करोड़ रुपये पर आ गई। इसका मतलब आय में लगभग 10 करोड़ रुपये की कमी है, फिर भी भक्तों से 15 करोड़ रुपये के अतिरिक्त दान मिला है। 2024-25 में सोना-चांदी दान कुल 13.95 करोड़ रुपये था, जो 2025-26 में बढ़कर 19 करोड़ रुपये तक पहुँचा। सोना लगभग 16 किलो और चांदी लगभग 197 किलो मात्रा में दान शामिल है। इसके अलावा अस्पताल व अन्य इमारतों के लिए 15 करोड़ रुपये का वस्तुरुपात दान मिला है। संस्थान के पास आज कुल जमा 3603 करोड़ रुपये हैं; कुल सोना 550 किलो और कुल चांदी 7030 किलो है।
0
0
Report

प्रतिभा धानोरकर के समर्थकों के बीच चंद्रपूर कांग्रेस में गुटबंदी तेज

Nagpur, Maharashtra:Ngp Dhanorkar 121 चंद्रपूर काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचा 121 पाठवला आहे चंद्रपूर काँग्रेस मधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा समोर आला है. काँग्रेस गटनेटा बदलवण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थकांनी नागपूर विभागीय आयुक्त धाव घेत वडेट्टीवारांना धक्का दिलाय. विद्यमान गटनेते राजेश अडून यांना पदावरून हटवण्यासाठी 16 नगरसेवक नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात आले होते... अडूरही आपल्या समर्थकांसह पोहचले होते आणि त्यांनी प्रतिभा धानोरकर यांच्यावर आरोप केले... दरम्यान प्रतिभा धानोरकर यांनी अडूर यांच्यावर पलटवार करत अडूर यांनी काम केले असते तर गटनेता बदलवण्याची वेळ आली नसती अशी प्रतिक्रिया दिलीय...दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी ------ बाईट --खा प्रतिभा धानोरकर, काँग्रेस नेत्या ---- 121 पॉईंटर NgP Dhanorkar 121 खासदार प्रतिभा धानोरकर (121 केलाय ) --- गेल्या वेळेस सर्वानुमते राजेश आढळून काँग्रेसचे गटनेते झाले होते.... गट राष्ट्रीय काँग्रेसचा अजूनही जशाचा तसा आहे.. काही नगरसेवकांची नाराजी गटनेत्यांवर होती... त्यामुळे गटनेता बदलवण्याची प्रक्रिया काँग्रेस नगरसेवकांनी आज येथे केली --- अडूर यांनी आक्षेप नोंदवला असला... तरी या नगरसेवकांनी दहा तारखेला नोटीस काढून मीटिंग बोलवली होती.....बहुमताची बैठक पन्धरा तारखेला होती... त्यामुळे त्यांनी जरी आक्षेप घेतला असला तरी.... वीप सभागृहाच्या कामकाजा करता लागू होतं असतो... सभागृहाच्या बाहेर लागू होत नाही -(on पैशाचे आरोप ) --- येथे 16 ही नगरसेवक आहे.... त्यांना विचारले पाहिजे..... ही प्रक्रिया दबावाने नाही नगरसेवकांच्या मनाने होत आहे ---- पहिल्या अंकातच योग्य कामकाज झाला असता तर दुसऱ्या अंकाची जरुरत पडली नसते.... पहिल्या अंकात विश्वासात घेतलं नसल्यामुळे हा दुसरा अंक सुरू झाला.... नवा गटनेता 27 ही नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करेल ---- राजेश अडूर यांनी काम केलं असतं तर त्यांना बदलण्याची वेळ आली नसती --- आमची वाद घालायची इच्छा नाही.... या वादावर कायमस्वरूपी तोडगा काढू --- घटक नेत्यांच्या बाबतीत ती सगळ्यांना सांगितलेलं गोष्ट स्तरावर झालं नाही त्यामुळे --- ते कोर्टात जात असेल पण आम्ही पण कॅव्हेट दाखल केला आहे --- ही लढाई धानोरकर केव्हा वडेट्टीवारांची नाही नगरसेवकांची लढाई आहे... ही लढाई नगरसेवकांची आणि ते नक्की यशस्वी होतील
0
0
Report
Advertisement

अधिक मास में विठ्ठल-रुक्मिणी मंदिर में दान 9.46 करोड़ के रिकॉर्ड के साथ बढ़ो

Pandharpur, Maharashtra:पुरुषोत्तम मासामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या उत्पन्नात अधिक अधिक वाढ 9 कोटी 46 लाखांचं भरभरून दान भाविकांनी विठुरायाच्या चरणी अर्पण केला आहे. दर तीन वर्षातून येणाऱ्या पुरुषोत्तम तथा अधिक मासाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी देणगी सोने-चांदी दागिने अर्पण केले आहेत. तसेच मंदिर समितीच्या इतर उपक्रम माध्यमातून नऊ कोटी 46 लाख 28 हजार 233 इतके दान प्राप्त झाले आहे. अधिक महिन्यांमध्ये पाच लाख तीस हजार 620 भाविकांनी देवाच्या चरणस्पर्श दर्शन घेतला आहे तर नऊ लाख तीस हजार 68 भाविकांनी मुखदर्शन घेतला आहे. 2023 च्या अधिक मासामध्ये मंदिर समितीला मिळालेल्या उत्पन्नापेक्षा दोन कोटी 26 लाख 85 हजार 796 रुपयांची वाढ झाली आहे.
0
0
Report

कोळी महासंघ का आक्रोश मोर्चा: जात प्रमाणपत्र सरल बनाने की मांग

Akola, Maharashtra:अनुसूचित जमातीतील कोळी महादेव समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज अकोल्यात महाराष्ट्र राज्य कोळी महासंघाच्या वतीने भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चात अकोला जिल्ह्यासह विदर्भातील विविध भागांतून मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, तसेच रक्त नात्यातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले आणि आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर केले. सरकार आणि प्रशासनाने समाजाच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लाखोंच्या संख्येने मोर्चा काढून राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कोळी महासंघाचे विदर्भ प्रमुख सुरेश पाटकर यांनी दिला आहे.
0
0
Report

वेदांत बंडगर हत्या मामले में मोक्का लगाने की तैयारी, मंत्री पाटिल का बयान

Sangli, Maharashtra:सांगलीत सध्या गाजत असलेल्या वेदांत बंडगर हत्या प्रकरणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आता ॲक्शन मोडवर आले आहेत. हत्या प्रकरणातील आरोपींना मोक्का लावणार असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटीलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हत्ये प्रकरणात कोणत्याही दोषी व्यक्तीची गय केली जाणार नसून पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून देण्याबाबत पोलीस प्रशासनाला कडक सूचना देखील करण्यात आल्याचा मंत्री चंद्रकांत पाटलांकडून निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचा दबाव पोलिसांनी घेऊ नये, अशा सूचनाही चंद्रकांत पाटलांकडून देण्यात आल्या आहेत.
0
0
Report
Advertisement

शिंदे के निर्देश पर बैठक चल रही, निर्णय आने तक प्रतीक्षा

Satara, Maharashtra:विधान परिषदेच्या अनुषंगाने बैठक झाली एक तास सर्वांचं आम्ही ऐकून घेतलं लोकांनी आपल्या भावना कोर कमिटीकडे मांडल्या आहेत आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही या सर्व लोकांचा अहवाल हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही सादर करणार आहोत यावर शिंदे साहेब जो निर्णय घेतील जो आदेश देतील त्यावर आम्ही निर्णय घेऊ शिंदे साहेब सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल फक्त या बैठकीमध्ये सर्वांचे म्हणणे आहे की आहेत की आमच्या भावना साहेबांपर्यंत पोहोचवा काल तिढा सुटला असे म्हटले जात होते .आमच्यापर्यंत तसा कोणताही निर्णय अद्याप आलेला नाही जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब आम्हाला आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही काही बोलणार नाही.आमचा निर्णय मतदानाच्या अगोदर होईल नवनाथ बन हे अनुभवी प्रव वक्ते आहेत त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही भाजपचे मला अद्याप पर्यंत कोणीही भेटलेले नाही कसलीही चर्चा झालेली नाही संजय राऊत यांना कोल्ह्याला द्राक्ष आंबट या म्हणीप्रमाणे संजय राऊत आहेत मनाला वाटेल ते बोलत असतात दिवसेंदिवस ते तर तेही बोलत असतात त्यांच्या या असा बोलण्यामुळे त्यांच्याकडे सकाळी दहा वाजता भूम घेऊन जाणारे हळूहळू आता कमी झालेले दिसतील शिवसेनेतील अजून कोणीही फुटलेले नाही त्यांच्याकडे संशयाने का बघायचे तसे त्यांनी कुठे वक्तव्यही केलेले नाही ऑपरेशन पूर्ण झाल्यावर कळते ऑपरेशन काळजीपूर्वक केले जातात 2022 ला उद्धव ठाकरे म्हणाले होते ज्यांना शिवसेना सोडून जायचे आहे ते जाऊ शकतात त्या अगोदर बोलले होते त्यामुळे आत्ताही बोलले असण्याची शक्यता नाकारता येत नाही भाजप बहुमत्ताजवळ आहे महायुतीच काम केले जाणार महायुतीचा नियम पाळला जाणार भाजप गॅसवर नाही आमच्या सदस्यांना टूरवर पाठवलेले नाही आमचे सदस्य फ्री आहेत टूरवर जायची गरज नाही आत्ताच्या या बैठकीला सर्व सदस्य हजर आहेत भाजपच्या बैठकीला शिवसेनेचे आमदार महेश शिंदे हे उपस्थित होते ते महायुतीतला एक घटक होते म्हणून ते तिथे होते आता त्यांना काहीतरी काम होते म्हणून ते या बैठकीला आलेले नाहीत
0
0
Report

जालना में भीषण पानी संकट: बोरगांव बुद्रुक और पारध में हर घर तक पानी नहीं पहुँच रहा

Jalna, Maharashtra:जालना :जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या कायम बोरगाव बुद्रुकसह पारध गावात भीषण पाणीटंचाई सार्वजनिक नळांना पाणी येत नसल्यानं ग्रामस्थ हतबल जालना जिल्ह्यातील बोरगाव बुद्रुक आणि पारध गावात सध्या भीषण पाणीटंचाई पाहायला मिळत आहे.जाफ्राबाद तालुक्यातील बोरगाव बुद्रुक येथे सार्वजनिक नळांना दर दोन दिवसांनी प्रत्येक घराला दोनच हंडे पाणी येतं.गरजेप्रमाणे पाणी मिळत नसल्यानं गावातील महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे.तर भोकरदन तालुक्यातील पारध गावाच्या परीसरात लघु पाणी प्रकल्प असूनही ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आलीय.त्यामुळे दैनंदिन पाण्याची गरज भागवावी तरी कशी असा प्रश्न ग्रामस्थांना पडलाय.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top