411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मतदाता पुनरीक्षण में 16 बीएलओ कर्मी गैरहाजिर, नोटिस के साथ कड़ी कार्रवाई की तैयारी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमात संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी १६ जणांनी अद्याप कामावर रुजू न होता टाळाटाळ केली आहे. या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. खुलासा न दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा उपजिल्हाधिकारी यांनी दिला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १४ मेपासून मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० व १९५१ अंतर्गत बीएलओंची नियुक्ती केली होती. प्रशासनाकडून ३० शिक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यापैकी १४ जण बीएलओ म्हणून रुजू झाले आहेत. मात्र, उर्वरित १६ कर्मचाऱ्यांना दूरध्वनीद्वारे वारंवार संपर्क साधूनही रुजू झाले नाहीत..0
0
Report
शहादा नगरपालिका की सभा में सत्ता पक्ष और विपक्ष के बीच गरमा-गरमी; 9 प्रस्ताव मंजूर, 2 स्थगित
Dhule, Maharashtra:शहादा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत एकूण ११ विषयांवर चर्चा झाली. त्यापैकी ९ विषयांना मंजुरि देण्यात आली, तर दोन विषय पुढील सभेपर्यंत स्थगित ठेवण्यात आले. सभेदरम्यान शहरातील विकासकामे, स्वच्छता, रस्ता सुरक्षा आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर चर्चा झाली. मात्र, काही विषयांवरून नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांसह भाजप नगरसेवकांमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी नगराध्यक्षांनी विरोधी पक्षातील नगरसेवकांना उद्देशून, तुम्ही नगराध्यक्ष म्हणून मला कधीही पत्र देत नाही, तरीही प्रशासनाच्या कामकाजाबाबत तक्रारी करता, अशी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सभेचे वातावरण काही काळ तापले होते. अखेर चर्चेनंतर बहुतांश विषयांना मंजुरी देण्यात आली, तर दोन विषय पुढील सभेसाठी स्थगित ठेवण्यात आले.0
0
Report
छत्रपति संभाजी नगर में जून से बारिश, अब तक 3 मौतें, नुकसान की रिपोर्ट
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात १ जूनपासून започलेल्या पावसामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसात नऊ पशुधनाच्या नुकसान झाले असून जवळपास ११० कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली आहे. विभागीय आयुक्तालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाले असले, तरी आता ते जिल्ह्यात स्थिरावले आहे. जिल्ह्यात अजूनही मोठ्या आणि सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र, मध्यंतरी दोन ते तीन वेळा झालेल्या दमदार पावसामुळे अनेक भागांत दाणादाण उडाली होती. १ जूनपासून जिल्ह्यात आतापर्यंत १२४.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ही जिल्ह्याच्या १३९.९ मि.मी. या नियमित सरासरीच्या तुलनेत काहीशी कमी आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात दोन-तीन दिवस पावसाने रौद्ररूप धारण केल्यामुळे जीवित व वित्तहानी झाली आहे...0
0
Report
Advertisement
लोणावळा में घने धुंध के साथ मुसलाधार बारिश, पर्यटक चकित
Varsoli, Maharashtra:मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने लोणावळ्यात सध्या धुक्याची चादर पससरु लागली आहे. घाट माथ्यातील पट्टा हा धुक्यात हरवल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. थंडगार वारे आणि दाट धुकं यामुळे लोणावळ्याचा निसर्ग मनमोहक झालाय. तर दुसरीकडे वाहनचालकाना गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे. या आल्हाददायक वातावरणाचा आनंद वाहनचालकांना मिळत असून. सध्या या धुक्यात लोणावळा हरवला असल्याचा जणू काही पर्यटकांना भास होतोय...0
0
Report
कास पठार में दुर्लभ सातारी वायतुरा पौधे का आगमन, जैव विविधता फिर से जागी
Satara, Maharashtra:सातारा - जागतिक वारसा स्थळ असलेल्या साताऱ्यातील कास पठारावर दुर्मिळ 'सातारी वायतुरा' वनस्पतीचे आगमन झाले आहे. मर्यादित अधिवासामुळे जागतिक स्तरावर दुर्मिळ ठरलेल्या या वनस्पतीच्या आगमनाने कास पठारावरील जैवविविधतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. व्हिओ 1- 'सातारी वायतुरा' अर्थात Aponogeton satarensis ही वनस्पती केवळ सातारा परिसरातच आढळते. पावसाळ्याच्या दरम्यान उमलणारी तिची गुलाबी-पांढऱ्या रंगाची आकर्षक फुले पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. कास पठारावरील तलाव आणि ओलसर भागात ही वनस्पती फुलते. मर्यादित अधिवासामुळे तिचा जागतिक स्तरावर दुर्मिळ वनस्पतींमध्ये समावेश करण्यात आला आहे. या दुर्मिळ वनस्पतीचे संरक्षण आणि कास पठारावरील जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी या ठिकाणी वनविभागाकडून जाळीदेखील बसवण्यात आली आहे.पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची कास भागात गर्दी होऊ लागली आहे.या ठिकाणचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी...0
0
Report
सोलापूर के मालशिरस में माऊली मसाले कारखाने पर FDA raid; नमूनों को पुणे लैब भेजा गया
Pandharpur, Maharashtra:सोलापूरच्या माळशिरस मधील बागेची वाडी येथील माऊली मसाले या कारखान्या वर अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे येथील मिरची पावडर सह काही पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेत पाठवले आहेत येथे असणारी अस्वच्छता व भेसळ संशय यामुळे ही तपासणी झाली आहे येथे मिरची पावडर कांदा लसूण मसाला गरम मसाला काळ्या तिखटाचे मसाले अशा खाण्यासाठी वापरणाऱ्या पदार्थात टाकणारे मसाले बनवले जातात0
0
Report
Advertisement
पिंपरी-चिंचवड़ में लगातार तीसरे दिन बारिश, शहर में राहत की उम्मीद
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. शहरात काल रात्रीपासून सुरू असलेला पाऊस सकाळीही सुरू आहे. कालही शहरात दिवसभर पावसाच्या मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी बरसत होत्या. रात्रीही शहराच्या विविध भागात पाऊस बरसत राहिला. अजूनही शहराच्या विविध भागांमध्ये पावसांच्या सरी कोसळत असून शहरवासीयांनी समाधान व्यक्त केलं आहे.0
0
Report
भीमा घाटे में बारिश न होने से उजनी डैम पानी 28% से नीचे, चिंता बढ़ी
Pandharpur, Maharashtra:भीमा नदीच्या खोऱ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने उजनी धरण भरण्याबाबत चिंता वाढली आहे. सध्या उजनी धरणाची पाणी पातळी वजा 28 टक्के 4इतकी खाली गेली आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पर्जन्य न झाल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी आहे. यामुळे आगामी काळात पिण्याचे पाणी, शेती आणि औद्योगिक वापरासाठी पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामानातील बदल लक्षात घेता शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष आता पुढील काही दिवसांतील पावसाकडे लागले असून, समाधानकारक पावस झाल्यासच उजनी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.0
0
Report
धुळे में शिंदे गुट प्रवेश से ठाकरे गुट को बड़ा झटका
Dhule, Maharashtra:धुळ्यात ठाकरे सेनेला मोठ खिंडार पडले आहे. ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी ठाण्यात शिंदेशेनेचे मंत्री अरुण सरनाईक व शिंदेसेनेचे नेते श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय झाल्याने धुळ्यात ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे सेनेला राम राम ठोकत कार्यकर्त्यांसह पाटील यांनी शिंदे सेनेत पक्ष प्रवेश केला. रात्री उशिरा हा पक्ष प्रवेश सोहळा ठाण्यात पार पडला. शुभांगी पाटील यांनी महाविकास आघाडी कडन नाशिक विधान परिषद शिक्षक निवडणूक लढवली होती. त्यावेळेस त्यांनी चांगलंच वातावरण तापलं होतं.0
0
Report
Advertisement
लोणावळा में टाटा डैम का जलस्तर फिर से बढ़ा, बारिश ने स्थिति सुधारी
Varsoli, Maharashtra:मागील आठवड्यात लोणावळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने आणि उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे लोणावळ्यातील टाटा धरणाचा पाणीसाठा अक्षरशः तळाला पोहोचला होता. बाष्पीभवनामुळे धरणातील पाणी शून्य टक्क्यांवर आल्यानंतर चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेल्या दमदार पावसाने चित्र पालटले आहे. टाटा धरणात पुन्हा पाण्याची आवक वाढू लागली असून, परिसरातील निसर्गही नव्याने बहरून आला आहे...0
0
Report
ठाणे में रेड अलर्ट: डोंबिवली में भारी बारिश से जलजमाव, स्कूल बंद
Kalyan, Maharashtra:ठाणे जिल्याला रेड अलर्ट.. कल्याण डोंबिवली परिसरात पहाटेपासूनच पावसाची संततधार. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सकल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात.. पहाटेपासून कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस आंबेडकर रोड पाण्याखाली पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाचा जोर वाढला. सखल भागांसह अनेक रस्त्यांच्या कडेला पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील आंबेडकर रोड पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत वाहनचालकांना वाहने चालवावी लागत असून वाहतुकीचा वेग मंदावला आहे. हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे。 इशाऱ्यानंतर महापालिकेने कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे。0
0
Report
हिंगोली के सेनगांव गांव के रास्ते कीचड़ से बेहाल; ग्रामीणों ने पंचायत पर आरोप
Hingoli, Maharashtra:हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कोळसा गावातील मुख्य रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. पावसाच्या पहिल्याच पाण्यात गावातील रस्ते चिखલमय झाले असून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांना मोठी कसरत करत चिखलातून वाट काढावी लागत आहे. रस्त्यांच्या या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांना रोजचा मनस्ताप सहन करावा लागत असून ग्रामपंचायतीकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे0
0
Report
Advertisement
चुनाव आयोग ने विशेष मतदाता सूची की जाँच के लिए बूथ लेवल एजेंट तैनात किए
Yeola, Maharashtra:भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने देशभरामध्ये विशेष मतदार यादी सखोल परीक्षण मोहीम सुरू असून या अंतर्गत शासन स्तरावर बीएलओ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या याचबरोबर प्रमुख राजकीय पक्षांनी बीएलओ यांना सहाय्य होण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी अर्थात बी एल ए अर्थात बूथ लेवल एजंट यांची नेमणूक केली आहे बीएलए यांना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार येवला प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माऊली लॉन्स या ठिकाणी मार्गदर्शन व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मतदार यादी संदर्भात सखोल निरीक्षण व फॉर्म भरणे याबत माहिती देण्यात आली याप्रसंगी सर्व प्रमुख राजकीय पक्षाचे बीएलए व पदाधिकारी उपस्थित होते0
0
Report
खेड में भारी बारिश से दीवार गिर गई, सीसीटीवी में थरारक दृश्य
Shirur, Maharashtra:ब्रेकिंग राजगुरुनगर/पुणे जोरदार पावसाने भिंत कोसळली, भिंत कोसळतानाचा थरारक क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद : सुदैवाने जीवित हानी टळली खेड तालुक्यात दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी फटका बसला आहे. राजगुरुनगर येथील सिद्धिविनायक व्यापारी संकुलाची संरक्षण भिंत मुसळधार पावसामुळे अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे भिंत कोसळतानाचा थरारक क्षण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भिंत कोसळल्यामुळे व्यापारी संकुलातील काही दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले असून व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी परिसरात कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.0
0
Report
12 बँक चुनाव: मंत्री अतुल सावे आणि डॉ. कल्याण काळे की प्रतिष्ठा दांव पर
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्ह्याचे राजकीय, आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उर्वरित १२ जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीत मंत्री अतुल सावे आणि काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत रंगणार आहे. बँकेच्या एकूण २० जागांपैकी ८ संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले असून आता १२ जागांसाठी ३१ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे एकूण १,०५३ मतदारांपैकी सर्वाधिक २६२ मतदार एकट्या छत्रपती संभाजीनगर तालुक्यात असल्याने बँकेचा पुढील अध्यक्ष कोण होणार याचा फैसलाही हा तालुका घेणार आहे या निवडणुकीच्या मैदानात दोन मंत्री, एक खासदार, पाच आमदार आणि तीन नगराध्यक्षांनी उडी घेतल्याने चुरस असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये थेट लढत आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून करण्यात आला.0
0
Report
Advertisement
