411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चांदिवली के नालों की सफाई: सोमनाथ सांगळे के साथ रिक्षा-डस्टबीन हटे, प्रवाह बहाल
Mumbai, Maharashtra:चांदिवलीच्या टिळकनगर व सत्यनगर येथील मुख्य नाल्यांच्या साफसफाईचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र या नाल्यात चक्क रिक्षा तसेच मुंबई महानगरपालिकेचे लोखंडी डस्टबीन टाकल्याचे समोर आले आहे. ही बाब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख सोमनाथ सांगळे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत महानगरपालिका कर्मचार्यांच्या मदतीने रिक्षा व लोखंडी डस्टबीन बाहेर काढून घेतले. त्यामुळे नाल्याचा प्रवाह सुरळीत करण्यात यश आले. स्थानिक नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा किंवा मोठ्या वस्तू टाकू नयेत, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.0
0
Report
महाराष्ट्र में 25,400 मेगावॉट अणुऊर्जा, 1.23 लाख नौकरियाँ; बड़ा निवेश समझौता
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. बारसू, पूर्णगड, देवगड येथे अनुउर्जेसाठी सामंजस्य करार.. 25 हजार 400 मेगावॅट अनुऊर्जा आणि 1 लाख 23 हजार 500 रोजगार निर्मिती.. अँकर राज्यातील अणुऊर्जा निर्मितीसाठी एनपीटीसीएल सह चार कंपन्यांनी मंगळवारी राज्य सरकार सोबत साडेसहा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक करार केले.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारातून 25 हजार 400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती आणि 1 लाख 23 हजार 500 रोजगार निर्मिती निर्माण होणे अपेक्षित आहे.. यामध्ये रत्नागिरी बारसू येथील अदानी पावर लिमिटेड व त्यांची कोस्टल महा ऑटोमिक एनर्जी लिमिटेडचा 6 हजार मेगावॅट अणुऊर्जा प्रकल्प, पूर्णगड येथे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा अणुउर्जा रीऍक्टर प्रकल्प तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे नॅशनल थर्मल पावर कार्पोरेशन लिमिटेडच्या अणुउर्जा प्रकल्प आदींचा समावेश आहे..0
0
Report
कोल्हापूर के राजाराम बांध पर 12 वर्षीय बच्चे की डूबकर मौत
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरातील राजाराम बंधारा इथ पोहण्यासाठी गेलेल्या बारा वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. उज्वल गंगाराम बडगे असे मृत मुलाचे नाव आहे. मूळचे कर्नाटक मधील गोकाक येथील रहिवासी असलेले गंगाराम बडगे हे गेल्या काही वर्षांपासून कसबा बावडा इथं त्यांची 2 मुले आणि पत्नीसह राहतात. गंगाग्राम बडगे हे त्यांच्या दोन मुलांना सोबत पोहण्यासाठी राजाराम बंधारा इथ गेले होते. यावेळी गंगावाला काही कामासाठी बाजूला गेले, त्यावेळी काठावर उभा असलेला उज्वल हा त्याचा 12 वर्षीय मुलगा पाय घसरून नदीत पडला. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाकातील स्वयंसेवकांनी शर्थीचे प्रयत्न करून उज्वलला पाण्याबाहेर काढल. पण उपचारापूर्वीच उज्वल याचा मृत्यू झाला होता.. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आलीय.0
0
Report
Advertisement
बदलापुर म्हाडा कॉलनी में पानी की पाइपलाइन फूटी, पानी बर्बाद
Ambernath, Maharashtra:बदलापूर शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात पाणी गळती दररोज शेकडो लिटर पाणी जातय वाया बदलापूर शहरातील म्हाडा कॉलनी येथील काँक्रीट रस्त्याखालील पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही पाण्याची गळती सुरू असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाचे मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे बदलापूर शहरातील अनेक भागात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना, दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होणाऱ्या या पाण्याच्या अपव्ययाबद्दल स्थानिक नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.0
0
Report
सातारा नगरपालिका चुनाव: प्रतिज्ञापत्र में गलत जानकारी पर निशांत पाटिल की अयोग्यता की मांग
Satara, Maharashtra:सातारा पालिका निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक निशांत पाटील यांना अपात्र घोषित करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली असून 2 जून रोजी सुनावणी होणार आहे. तसेच निशांत पाटील यांनी नैतिकतेच्या आधारावर नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही मोरे यांनी केली आहे.0
0
Report
नाशिक येवला तालुक्यात विहिरीत पडलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा जीव पोलीस जवानाने उडी मारून वाचवला – कौतुक
Lasalgaon, Maharashtra:नाशिकच्या येवला तालुक्यातील लासलगाव जवळ असलेल्या कोटमगाव येथे ग्रामपंचायत कर्मचारी संतोष शिंदे हे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ गेले असता विहिरीत पाय घसरून पडल्याने विहिरीत पडले होते . दरम्यान परिसरातच कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई रुपेश कांबळे यांना विहिरीतून वाचवा वाचवा असा आवाज आल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न करता विहिरीच्या पाण्यात उडी घेऊन या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवल्याने पोलिसांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे0
0
Report
Advertisement
यवला में डीज़ल संकट: पंपों पर लंबी कतारें, किसान परेशान
Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवला तालुक्यात पेट्रोल आणि डिझेलसाठी पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळत आहेत. डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाल्याने ट्रॅक्टर चालक आणि शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. अनेक तरुणांनी कर्ज काढून ट्रॅक्टर खरेदी केले, मात्र डिझेलच उपलब्ध नसल्याने व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. डिझेल अभावी शेतीची मशागत खोळंबली असून आता पुन्हा बैल-नांगराच्या पारंपारिक पद्धतीने शेती करण्याची वेळ येत आहे.0
0
Report
अमरावती में गर्मी की लहर, पारा 46.8°C; 15 उष्माघात रोगी, 3-4 मौतें
Amravati, Maharashtra:अमरावतीत उष्णतेची लाट कायम, पारा पोचला 46.8 अंशावर; आतापर्यंत जिल्ह्यात आढळले उष्माघाताचे 15 रुग्ण अमरावती जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून काल जिल्ह्यात उन्हाचा पारा 46.8 अंशावर पोहोचण्याचा पाहायला मिळाल आहे. त्यामुळे सध्या अमरावतीकर उन्हाने त्रस्त झाले असून अंगाची लाही लाही करणारा ऊन अमरावतीकर अनुभवात आहे. दरम्यान या उन्हामुळे गेल्या दोन ते अडीच महिन्यात पंधरा 15 उष्माघाताचे रुग्ण आढळले असून जिल्हा सामान्य रुग्णालयात या रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी पाठवले आहे. तसेच आतापर्यंत तीन ते चार रुग्णांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र अजून पर्यंत अधिकृत ही आकडेवारी पुढे आली नाही. काही काम करायचे असल्यास सकाळी करून घ्यावी व बाहेर जायचे असेल तर भरपूर पाणी प्यावे तसेच पोटभर नाश्ता करून बाहेर पडावे व उन्हात गडद कपडे न घालता पांढऱ्या कपड्यांचा वापर करावा आणि बाहेरील काम करायचे असल्यास संध्याकाळच्या वेळेचा उपयोग करण्याचे आव्हान अमरावती जिल्हा शल्य चिकित्सक विनोद पवार यांनी केला आहे.0
0
Report
आरबीआई ने सातारा यशवंत सहकारी बैंक का लाइसेंस रद्द कर दिया; डिपॉज़िट धारक घबराए
Satara, Maharashtra:सातारा - आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेल्या द यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड फलटण या सहकारी बँकेवर भारतीय रिझर्व बँकने कठोर कारवाई करत बँकेचा परवाना रद्द केला आहे. 18 मे ला जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार 19 मे पासून व्यवसाय समाप्तीनंतर बँकेला कोणताही बँक व्यवहार करता येणार नसल्याने ठेवीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आरबीआय ने बँकेकडे पुरेसे भांडवल नसणे, उत्पन्नाची क्षमता कमी असणे तसेच बँकिंग रेगुलेशन ॲक्ट मधील विविध अटींचे पालन न केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली आहे. आरबीआय ने महाराष्ट्राच्या सहकार आयुक्त आणि सहकारी संस्था निबंधकांना बँक बंद करून लिक्विडेटर नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.0
0
Report
Advertisement
नीट-यूजी २०۲६ पेपर लीक: लातूर के कोचिंग नेटवर्क से जुड़े नए संकेत, सीबीआई तेज़
Latur, Maharashtra:नीट-यूजी २०२६ पेपर लीक प्रकरण की जांच में नए चौंकाने वाले संकेत सामने आ रहे हैं। पिछले साल भी नीट का पेपर लातूर के एक कोचिंग नेटवर्क तक पहुँच गया होने की संभावना सीबीआई जाँच कर रही है। जाँच में शिवराज मोटेगावकर के पेपर लीक नेटवर्क से पुराने संबंध होने का शक जताया जा रहा है। इस बीच, इस कोचिंग से नीट-२०२५ में १९ छात्रों का विभिन्न एम्स में चयन हुआ था। क्या कुछ विद्यार्थियों के लिए स्वतंत्र ‘वन-ऑन-वन मेंटरिंग’ के नाम पर विशेष क्लास चल रहे थे? यही जाँच अब शुरू हो गई है।0
0
Report
हर्ष दुबे की भारतीय टीम चयन पर नागपुर में जल्लोष
Nagpur, Maharashtra:हर्ष दुबे चा फोटो आणि त्याच्या क्लबमधील जल्लोष,व्हिडिओ बाईट 2c ला जोडला आहे ------------------- नागपूर विदर्भाचा फिरकीपटू हर्ष दुबे याची भारतीय क्रिकेट संघात निवड झालीय. त्याच्या भारतीय संघातील निवडीनंतर तो सराव घेत असलेल्या नागपूर क्रिकेट ॲकॅडमीत जल्लोष साजरा करण्यात आला. भारतीय कसोटी संघात स्थान मिळवणारा हर्ष विदर्भाचा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी विदर्भाचा उमेश यादव दीर्घकाळ भारतीय संघात होता. 2024-2025 रणजी सीजन मध्ये विदर्भाच्या विजयात त्याचा मोलाचा वाटा होता तसेच आयपीएल मध्ये हैदराबाद कडून घेताना त्यांनी स्वतःची वेगळी छाप उमटवली आहे0
0
Report
उल्हासनगर धर्मांतरण केस: मराठी न समझ पाने पर तीनों आरोपी को जमानत
Ambernath, Maharashtra:उल्लासनगरातील गाजलेल्या कथित ‘धर्मांतर’ प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून न्यायालयाने मराठी समजत नसल्याच्या कारणावरून तिन्ही आरोपींना जामीन मंजूर केला आहे. आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत, “आरोपींना मराठीत दाखल करण्यात आलेली FIR समजली नाही,” असा दावा करत जामिनासाठी युक्तिवाद केला. यावर सरकारी पक्षाने जोरदार आक्षेप घेत, आरोपींचा जन्म आणि शिक्षण उल्हासनगरमध्येच झाल्याने त्यांना मराठी भाषा व्यवस्थित समजते, असा दावा न्यायालयात केला. दरम्यान, पीडित महिलेच्या वकील अॅड. सरोज पगारे यांनी तपास अधिकारी न्यायालयात गैरहजर असल्यामुळे सरकारी बाजू प्रभावीपणे मांडली गेल्याचा आरोप केला आहे. आरोपींना PR बाँडवर जामीन मिळाल्यानंतर आता वरच्या न्यायालयात जाऊन कठोर कारवाईसाठी अर्ज करणार असल्याची माहितीही अॅड. पगारे यांनी दिली. या प्रकरणात आरोपींनी खोटं नाव सांगून एका हिंदू तरुणीशी विवाह केला आणि तिला बिहारला घेऊन जाऊन मानसिक तसेच शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेला बुरखा आणि हिजाब घालण्यास सक्ती केली गेली, गोमांस खाण्यास भाग पाडले गेले आणि आरोपीने दुसरे लग्न करून तिला घराबाहेर काढल्याची तक्रारही करण्यात आली होती. या प्रकरणी उल्हासनगरच्या सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी इम्रान शेख, सलमान शेख आणि एका अल्पवयीन आरोपीला अटक केली होती. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना जामिन मंजूर करण्यात आलाय.0
0
Report
Advertisement
परभणी के जिंतूर में युवक पर धारदार हमला, CCTV में कैद घटना
Parbhani, Maharashtra:परभणी ब्रेकिंग परभणीच्या जिंतूर शहरात युवकावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा सीसीटीव्ही आला समोर जमिनीवर पडलेल्या युवकावर आरोपी धारदार शस्त्राने वार करत असल्याचं cctv कॅमेऱ्यात कैद. या हल्ल्यात युवकाचा डावा हात छाटल्याची पोलिसांची माहिती. हल्ला केल्यानंतर हातातील धारदार शस्त्र फिरवत आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याचं सीसीटीव्हीत कैद. घटनेनंतर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांकडून पथके तैनात. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू0
0
Report
रत्नागिरी में गावठी बम विस्फोट: महिला के हाथ की पांच उंगलियां टूटीं
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- शिकारीसाठी लावलेल्या गावठी बाॅम्बचा स्फोट रत्नागिरी तालुक्यातील जांभारी येथील घटना जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेलेल्या महिलेचा या गावठी बाँम्बना धक्का लागल्याने स्फोट स्फोटात महिलेच्या हाताची पाच हि बोटे तुटली रेश्मा सुर्वे यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु शिकारीसाठी गावठी बाॅम्ब कुणी लावले याचा पोलिसांकडून शोध सुरु बाईट-१- नितिन बगाटे. पोलिस अधिक्षक रत्नागिरी0
0
Report
26 मई से रत्नागिरी- मालवण में जलपर्यटन बंद, मॉनसून सुरक्षा के लिए जारी आदेश
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीत,मालवणात 26 पासून जलपर्यटन बंद.. पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातील संभाव्य धोके लक्षात घेता जिल्ह्यातील बंदर शेत्र 26 मे पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यवसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याच्या आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत.. हा बंदी आदेश 31 ऑगस्ट पर्यंत लागू राहणार आहे.. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या रत्नागिरी, मालवण बंदर निरीक्षकांनी काढलेल्या अधिकृत पत्रानुसार 26 मे ते 31 ऑगस्ट या पावसाळी कालावधीत सर्व प्रकारच्या जल क्रीडा,नौका विहार,स्कूबा ड्रायव्हिंग या बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.. कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो अशा स्थितीत पर्यटकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून दरवर्षी प्रशासनातर्फे ही खबरदारी घेतली जाते..0
0
Report
Advertisement
