411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गोकुळ हलाल सर्टिफिकेट मामला चुनाव से पहले गरम
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिले के सहकार और आर्थिक क्षेत्र का प्रमुख केंद्र गोकुळ दूध संघ की निवडणुकियों के बिगुल बजते ही नया विवाद सामने आ गया है। गर्जना संघटना ने गोकुळ के उत्पादनों के लिए हलाल सर्टिफिकेट लेने पर सवाल उठाते हुए तत्कालीन संचालन पर निशाना साधा है। मंत्री हसन मुश्रीफ ने आरोपों को बिनबुडा़ बताते हुए कहा है कि यह चुनावी राजनीति का हिस्सा है। ज्ञात हो कि गोकुळ ने 2018 में हलाल सर्टिफिकेट प्राप्त किया था, तब महाडिक गुट और दिवंगत विधायक पी.एन. पाटील के नेतृत्वाधीन संचालक मंडल सत्ता में थे। विवाद अगस्त-नवम्बर चुनाव के समय फिर उभरा है और उद्योगजगत व सहकार क्षेत्र में इस मुद्दे की गहराई पर चर्चा हो रही है।0
0
Report
पंढरपूर में फेसबुक पर अश्लील फोटो भेजने वाले आरोपी को पुलिस ने गिरफ्तार किया
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर मध्ये असणाऱ्या एका महिलेला सोलापुरातील-अझहर शेख या आरोपीने फेसबुक अकाउंट वर फिर्यादीच्या मनाला लज्जा वाटेल अशा पद्धतीचे फोटो पाठवले यानंतरही तुम्हाला असे फोटो व्हिडिओ पाठवू का म्हणून मेसेज केले. याप्रकरणी सदर आरोपीवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पंढरपूर शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे0
0
Report
सोलापुर में 6 साल की बच्ची को आइसक्रीम के बहाने ले जाकर पैंजण चोरी
Solapur, Maharashtra:सोलापुरात 6 वर्षीय चिमुकलीला आयस्क्रीमचे आमिष दाखवून 10 तोळ्याचे पैंजण चोरले सोलापुरात 6 वर्षीय चिमुकलीला आयस्क्रीमचे आमीष दाखवून 10 तोळ्याचे पैंजण चोरले आरोपीने चिमुकलीला आयस्क्रीमचे आमीष दाखवत नेल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद नामकरण सोहळ्यातून आयस्क्रीमचे आमीष दाखवून निर्जनस्थळी नेत पैंजणची चोरी या प्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांनी आरोपी सोमनाथ सत्यनारायण यनगंटी याला तात्काळ ताब्यात घेत गुन्हा दाखल केलाय. दरम्यान नागरिकांनी लग्नसमारम्भ किंवा इतर कार्यक्रमादरम्यान आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे. आपल्या मुलांना गुड टच बॅड टच तसेच इतर गोष्टींचा प्रशिक्षण देण्याच्या आवाहन पोलिसांनी केलेय.0
0
Report
Advertisement
डीएपी लिंकिंग के आरोपों के बीच खरीप की तैयारी तेज, किसानों में भारी हड़बड़ी
Washim, Maharashtra:जिल्ह्यात खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकरी सध्या पेरणीपूर्व तयारीत व्यस्त आहेत. जिल्हाभरात खत आणि बियाण्यांच्या खरेदीला वेग आला असून कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. जिल्ह्यात आज डीएपी खत ४९२ मेट्रिक टन, १९:१९:१९खत ४८० मेट्रिक टन आणि युरिया १हजार१७३ मेट्रिक टन असा एकूण २हजार १५१ मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र,याच दरम्यान डीएपी खतासोबत १९:१९:१९ खताची सक्तीने लिंकिंग केली जात असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवकप्रदेशाध्यक्ष दामू इंगोले यांनी केला आहे. तसेच पीपीएल कंपनीवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.या प्रकरणात कृषी विभागाने तातडीने हस्तक्षेप करून चौकशी करावी आणि शेतकऱ्यांची होणारी गैरसोय थांबवावी,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.0
0
Report
कल्याण के काला तालाब में मृत मछलियों का ढेर, गर्मी से बढ़ता संकट
Kalyan, Maharashtra:कल्याणच्या काळा तलावात मृत माशांचा खच वाढत्या तापमानामुळे दररोज मरतायेत अनेक मासे? काल्याणच्या ऐतिहासिक काळा तलावात गेल्या काही दिवसांपासून दररोज अनेक मासे मृत्युमुखी पडत आहेत. वाढत्या तापमानामुळे मासे मृत पावत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. दररोज ६० किलोच्या आसपास मासे ही मृत अवस्थेत आढळून येत असल्याचं इथल्या सुपरवायझरने सांगितलं .सध्या काळा तलावाच्या पाण्यावर मृत माशांचा खच पाहायला मिळतोय. या मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. यासंदर्भात नागरिक वारंवार केडीएमसी प्रशासनाला तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे मृत झालेल्या माशांना तात्काळ तिथून काढून स्वच्छता केली जाते आहे.मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा पाण्यावर मृत मासे आढळून येत आहेत. मात्र खरच वाढत्या तापमानामुळे माशांचा मृत्यू होतोय की त्याला अन्य काही कारण आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे.0
0
Report
अकोले में 55 नाबालिग विवाहिताओं समेत एक गर्भवती नाबालिका, समाज में चिंता
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्हयातील अकोले तालुक्यात ५५ अल्पवयीन विवाहित मुली आणि १ अविवाहित मुलगी गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर... अंगणवाडी सर्वेक्षणातून उघड झाला प्रकार, काही मुलींची प्रसूतीही झालेली अनेक अल्पवयीन मातांची नोंदच नाही, खरी संख्या अधिक असण्याची शक्यता... बालविवाहाचे वाढते प्रमाण गंभीर चिंतेचा विषय... दोन दिवसाला एक मुलगी पळून जाऊन लग्न करत असल्याची माहिती... महिला आणि बालविकास विभागाच्या आकडेवारीत धक्कादायक वाढ... मातृत्व वंदना योजनेतही अल्पवयीन मातांची नोंद उघड सामाजिक दबाव, बदनामीची alsoती काही प्रकरणे दडपली जातात... अल्पवयात विवाहामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम अत्याचार आणि मिसिंग प्रकरणांमध्येही सातत्याने वाढ... प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी... जिल्हा महिला बालविकास अधिका-यांनी आकडेवारी केली मान्य... महिला बालविकास आणि शिक्षण विभागाने दखल घेण्याची गरज... बालविवाह रोखण्यासाठी गाव पातळीवरील यंत्रणा सक्रिय करण्याची गरज.... विवाह नोंदणी आणि जन्मदाखला अनिवार्य करण्याची मागणी... राज्यभर स्तनदा माता सर्व्हेचा आढावा घ्यावा... अकोले येथील बालसरंक्षण समितीचे अशासकीय सदस्य रेणुका दास यांची राज्य बालहक्क आयोगाकडे तक्रार...0
0
Report
Advertisement
पाथर्डी पुलिस के सामने 3 घंटे का धरना, शिकायत न लेने पर वंचित बहुजन आघाडी
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील औरंगपूर येथील आदिवासी महिलेची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पाथर्डी पोलिसांविरोधात वंचित बहुजन आघाडीने पोलीस ठाण्यासमोर गेल्या तीन तासांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. तक्रार घेतली जात नसल्याने पीडित महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. या गोंधळात पीडित महिलेसोबत आलेले विठ्ठल खर्चन यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या दबावामुळेच खर्चन यांचा मृत्यू झाल्याचा आरोप वंचितचे किसन चव्हाण यांनी केला आहे. आंदोलकांनी पोलीस निरीक्षक पुजारी यांचे निलंबन आणि दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून ठोस आश्वासन मिळेपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.0
0
Report
हिंदी में स्लग-नितेश राणे पर राजनितिक टीका: ईद के बहाने बैनर-टिप्पणी उछली
Sangli, Maharashtra:अँकर - मंत्री नितेश राणेंना आता कोणी सिरीयस घेत नाही,एंटरटेनमेंट साधन म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं,असा टोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी लगावला आहे.बकरी ईदच्या कुर्बानी वरून नितेश राणे यांनी केलेल्या विधानावरून इद्रिस नायकवडींनी हा टोला लगावलाय,त्याचबरोबर नितेश राणे यांनी आम्हाला धार्मिक तत्व कशी पाळावे, याचे मार्गदर्शन करण्याची गरज नाही,समाजात दुफळी निर्माण करून हिरो म्हणून पुढे येण्यासाठी त्यांचा सातत्याने बालिशपणाचे प्रयत्न सुरू आहेत,अशी टीका देखील आमदार नायकवडी यांनी केली आहे,तसेच मुस्लिम समाजाकडून गाईला राष्ट्रीय पशु म्हणून जाहीर करण्याच्या मागणीकडे सरकारने गंभीरपणे लक्ष देऊन,गाय राष्ट्रीय पशु म्हणून जाहीर करावा,अशी मागणी देखील आमदार इद्रिस नायकवडी यांनी केली आहे,ते सांगलीच्या मिरजेत बोलत होते.0
0
Report
मावळ में जनगणना के दौरान शिक्षিকা का दर्दनाक निधन
Varsoli, Maharashtra:मावळ तालुक्यात जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात असताना एका शिक्षिकेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कान्हे फाटा येथे घडली आहे.. दीपाली तांबे असे मृत शिक्षिकेचे नाव असून जुना पुणे-मुंबई महामार्गावरील कान्हे फाटा येथे भरधाव डंपरने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली.. हा अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला.. या घटनेनंतर मावळ तालुक्यातील शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शासकीय सुट्टीच्या दिवशीही जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांना बोलावले जात असल्याबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.. “या मृत्यूला जबाबदार कोण?” असा सवाल शिक्षकांकडून केला जात असून महामार्गावर भरधाव डंपर वाहतुकीवर तातडीने निर्बंध आणण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे..0
0
Report
Advertisement
इद्रिस नायकवडी ने राजीनामे की अफवाहों को खारिज किया, पार्टी में कोई चर्चा नहीं
Sangli, Maharashtra:स्लग - राजीनामाच्या केवळ माध्यमात चर्चा, पक्षाकडून कोणत्याही सूचना नाहीत -आमदार इद्रिस नायकवडी पक्षाचा कोणत्याही नेत्यांनी राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या नाहीत, पक्षामध्ये आपल्या राजीनामाची कोणतीही चर्चा झालेली नाही,या केवळ माध्यमात चर्चा असून यासर्व पेरलेल्या बातम्या असंखा खुलासा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी केला आहे.गेल्या काही दिवसांपासून आमदार इद्रिस नायकवडी यांना राजीनामा देण्याच्या सूचना पार्थ पवार आणि पक्षाकडून देण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत,मात्र नायकवडींनी सर्व चर्चांचे खंडन करत पक्षाच्या बैठकीत देखील अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नाही,त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही,असे स्पष्टीकरण दिलं आहे,त्याच्याशी बातचीत केली आहेत,आमचे सांगलीचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी 21 - इद्रिस नायकवडी - आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस ( AP )0
0
Report
राजापूर में धरण परियोजना के विरोधियों का उग्र प्रदर्शन: 100% पुनर्वसन की मांग
Ratnagiri, Maharashtra:राजापूर - रत्नागिरी.. राजापुरात धरणग्रस्तांचा उद्रेक! 'आधी पुनर्वसन, मगच धरण'.. काजिर्डा-राणेवाडी मार्गावर आंदोलकांचा ठिय्या,मोजणी अधिकाऱ्यांची गाड्या अडवल्या!.. 'आधी पुनर्वसन, मगच धरण'; पोलिसांच्या दडपशाहीमुळे परिसरात तीव्र तणाव! अँकर रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील प्रस्तावित जामदा धरण प्रकल्पावरून आता रणकंदन सुरू झालंय. 'आधी पूर्ण पुनर्वसन, मगच धरण' अशी आक्रमक भूमिका घेत जामदा प्रकल्पग्रस्तांनी आज सकाळपासूनच काजिर्डा-राणेवाडी मार्गावर तीव्र आंदोलन छेडलंय.. प्रशासनाकडून आजवर केवळ आश्वासनांची खैरात केली गेल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी धरणाच्या मोजणीसाठी जाणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्यांची वाट अडवून धरली आहे. विशेष म्हणजे, प्रकल्प संघर्ष समितीने यापूर्वीच प्रांताधिकारी आणि पोलिसांना निवेदने दिली होती.मात्र, शासनाच्या १००% पुनर्वसन धोरणाची अंमलबजावणी न करता आज प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करून मोजणीच्या गाड्या जबरदस्तीने गावात घुसवण्याचा प्रयत्न केला.. पोलिसांच्या या दडपशाहीमुळे आंदोलनकर्ते अधिकच आक्रमक झाले असून काजिर्डा परिसरात सध्या कमालीचा तणाव निर्माण झालाय.. कायदा आणि सुव्यवस्था बाजूला सारून अधिकारी केवळ काही मोजक्या लोकांना साथ देत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय.. मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास हे आंदोलन आणखी चिघळण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला असून,सध्या संपूर्ण राजापूर तालुक्याचं लक्ष या आंदोलनाकडे लागलं आहे..0
0
Report
पिंपरी-चिंचवड़ पुल खुलते ही चार दिनांत दो हादसे, सियासी टकराव तेज
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पिंपरी औंध मार्गावर रक्षक चौकात बनवलेल्या पुलावरून महायुतीत ठिणगी पडली आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे पत्र भाजप आमदार शंकर जगताप यांनी महापालिकेला दिल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पण वाहतूक सुरू झाल्यानंतर अवघ्या चार दिवसात या पुलावर दोन अपघात झाले. त्यावर शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पुलाची रचना चुकीची झाली असल्याचा आरोप करत या पुलाशी निगडित अभियंत्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा लागेल असा इशारा दिला. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि भाजप आमदार शंकर जगताप यांच्यात ज्या पुलावरून वाद सुरू झालाय त्याच पुलावरून माहिती देतायत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी.0
0
Report
Advertisement
आंधी-बारिश ने वसमत के केळी बागों को भारी नुकसान किया, किसान बेहाल
Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोली जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने मोठे नुकसान झाले आहे. विशेषत वसमत तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे काढणीला आलेल्या केळीच्या बागा अक्षरश जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वसमत तालुक्यातील बागल पार्डी, सोमठाणा, गिरगाव दाभाडी,पेडगाव आणि सालापूर या गावांच्या शिवारात मोठ्या प्रमाणात केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केळीची झाडे वादळी वाऱ्यामुळे आडवी पडली असून काही ठिकाणी संपूर्ण बागाच उद्ध्वस्त झाली आहे.केळीची लागवड केल्यानंतर जवळपास वर्षभर मोठ्या मेहनतीने आणि लाखो रुपयांचा खर्च करून शेतकरी बागांची जोपासना करतात. मात्र उत्पादन हाती येण्याच्या अंतिम टप्प्यातच अवकाळी पावसाने घात केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.0
0
Report
इंधन वृद्धि के विरोध में कुडाळ में उद्धव ठाकरे गुट का प्रदर्शन, वैभव नाईक की पहल
Oras Bk., Maharashtra:इंधन बढ़ाने के विरोध में उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष के वतीने कुडाळ शहर में आंदोलन छेडा गया. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. माजी आमदार वैभव नाईक यांनी हातात सायकल घेऊन पायी चालत आंदोलनात सहभाग घेतला होता. या आंदोलनात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजप आमदार मैथिली ठाकूर यांचं महंगाई डायन खाये जात है. हे गाण वाजवून भाजपला दबाव आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी सरकारवर टीका करत जनतेला जागरुक करण्यासाठी आमचे हे आंदोलन असल्याचे सांगितले.0
0
Report
मालेगांव में करोड़ों की जमीन 10 हजार में दस्तावेजीकरण: विवाद
Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) - हैदराबादच्या नवाबाची संभाजी नगरच्या वादग्रस्त जमीनीचे दस्त नोंदणी मालेगावात. करोडोंची जमिनीचे दस्त नोंदणी फी फक्त 10 हजार. हैदराबादच्या सालारगंज नवाबाची वारस असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीची संभाजी नगर येथील वादग्रस्त करोडोंची जमिनीचे नाशिकच्या मालेगावात अवघ्या 10 हजारात दस्त नोंदणी झाल्याचा खळबळ जनक आरोप भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी मालेगाव दौऱ्यावर केल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी त्यांनी विविध शासकीय अधिकाऱ्यांना भेट देत तक्रार देखील केली असून लवकरच यावर कारवाई होईल असे देखील त्यांनी सांगितले.0
0
Report
Advertisement
