icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

18 जून को छत्रपती संभाजीनगर-जालना में महायुती के पक्ष में मतदान की तैयारी तेज

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी 18 जून ला मतदान होणार आहे. त्यासाठी भाजपने रविवारी दोन्ही जिल्ह्यातील महायुतीच्या मतदारांकडून  पहिल्या पसंतीचे मतदान रंगीत तालिमीमध्ये करून घेतले. ४१९ बहुमताचा आकडा महायुतीकडे असताना ४५५ जणांनी पहिल्या पसंतीची मते टाकली. मतदानापूर्वीच इतर पक्षांचे ३६ नगरसेवक भाजपच्या गोटात आले असून पुढील दोन दिवसांत जालन्यातील आणखी काही नगरसेवक महायुतीकडे येतील, असा दावा भाजप नेत्यांनी केला. ५०० मतांचे पहिल्या पसंतीचे टार्गेट भाजपने ठेवले आहे. भाजप, उद्धवसेना व अपक्ष अशी तिरंगी लढत होत आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली...
0
0
Report

कोकण में मानसून बदला, फसलें सूखने से किसानों पर दुबार बुवाई का खतरा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणात पाऊस गायब.. धूळपेरणी वाया जाण्याची भीती, बळीराजा संकटात! रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात मान्सूनपूर्व सरींच्या भरवशावर शेतकऱ्यांनी धूळपेरणी तर उरकली, पण आता पावसाने अचानक दडी मारल्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.. 'अल निनो'च्या प्रभावामुळे यंदा मान्सून लांबला असून, तो थेट २० जूनच्या sुमारास सक्रिय होण्याचा अंदाज आहे.. दरम्यानच्या काळात कडक ऊन आणि वाढत्या उकाड्यामुळे शेतातील ओलावा संपला असून, नुकतीच उगवलेली कोवळी भातरोपे आता करपू लागली आहेत.. त्यामुळे कोकणपट्टीतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली असून, आता सर्वांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..
0
0
Report

शिरूर शिंदोडी में 11 केवी तार टूटने से किसान अक्षय हाके की मौत

Shirur, Maharashtra:महावितरणच्या हलगर्जीपणाचा आणखी एक बळी शिरुर तालुक्यात गेलाय. शिरुर तालुक्यातील शिंदोडी येथे ११ केव्ही क्षमतेची विद्युत वाहिनीanggावर तुटून पडल्याने, एका २७ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. अक्षय हाके असं या मृत तरुणाचं नाव आहे. अक्षय काल दुपारी आपल्या घराशेजारील ऊसाच्या शेतात पाणी धरण्यासाठी गेला होता. याच दरम्यान शेतातून गेलेली महावितरणची ११ केव्ही क्षमतेची जीर्ण तार अचानक तुटली आणि थेट ऊसाच्या शेतात पडली. शेतात पाणी देत असताना ही तार न दिसल्याने अक्षयला विजेचा तीव्र धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शिंदोडी गावावर सध्या शोककळा पसरली असून, महावितरण प्रशासनाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान, ही विद्युत वाहिनी जवळपास १९७५-७६ सालची असून, येथील तारा अत्यंत जीर्ण झाल्या आहेत. महावितरणने हे जीर्ण खांब आणि तारा तातडीने बदलाव्यात, अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
0
0
Report
Advertisement

भंडारय की वरठी में दीपक से पुराने लकड़ी के घर में आग, जान बची

Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या वरठी येथे दिव्याच्या वातीमुळे जुन्या घराला आग... जीवित हानी नहीं though मोठे नुकसान... हरकंडे यांच्या जुन्या लाकडी फाट्याच्या घराला रविवारी सायंकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, दिव्याच्या वातीमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटना घडली तेव्हा घरात कोणीही नसल्याने आग झपाट्याने पसरली. परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली। अग्निशमन दल व स्थानिकांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। मात्र, तोपर्यंत घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले होते। या घटनेत जीवितहानी टळली.
0
0
Report

खड़की के जिलािय परिषद प्राथमिक स्कूल में गर्मियों की छुट्टियाँ खत्म, पहला दिन उत्साह के साथ शुरू

Ahilyanagar, Maharashtra:आज शाळेचा पहिला दिवस उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून आजपासून शाळा सुरू झाली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील खडकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. शाळेतील शिक्षकांनी शाळा स्वच्छ धुऊन काढली आहे शाळेसोबतच शाळेचा परिसर देखील स्वच्छ केला आहे विद्यार्थ्यांसाठी पाठ्यक्रमाची पुस्तक गणवेश शाळेमध्ये दाखल झाले आहेत यावर्षी प्रशासनाकडून शाळेचा पहिली तासिका खेळाची घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खडकी येथील शाळेत विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून स्वागत केलं जाणार आहे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांमध्ये देखील शाळा सुरू होत असल्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे
0
0
Report
Advertisement

रोहित पवार का अन्नत्याग आंदोलन सरकार से बातचीत के बाद स्थगित; 22 तारीख को होगी विस्तृत चर्चा

Kolhapur, Maharashtra: आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन अखेर सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर स्थगित केले आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारतर्फे रोहित पवार यांची भेट घेतली. यावेळी 22 तारखेला सरकारसोबत सविस्तर चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले. यावेळी रोहित पवार यांनी, हे आंदोलन पूर्णपणे अराजकीय असून शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केले असल्याचे सांगितले. सरकार चर्चेसाठी पुढाकार घेत असेल, तर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आपण चर्चेला जाण्यास तयार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सरकारसोबत होणाऱ्या चर्चेला आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या इतर नेत्यांनाही सोबत घेऊन जाणार असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी अन्नत्याग उपोषण हा योग्य मार्ग नसल्याचे मत व्यक्त केले. अन्य पर्याय उपलब्ध असताना उपोषण करण्याची गरज नव्हती, असे सांगतानाच त्यांनी स्वतःच्या उपोषणाचा अनुभवही सांगितला. मी 11 दिवस उपोषण केले होते. त्यावेळी अजितदादा पवार यांनी माझ्या आंदोलनाकडे ढुंकूनही पाहू नका, असे सांगितले होते. तेव्हापासून मी उपोषणाचा मार्ग सोडून दिला असे महाजन म्हणाले. रोहित पवार आणि सरकारच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेनंतर आयोजकांनी स्टेजवरच उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यानंतर रोहित पवार यांनी आपण आणि इतर आंदोलक नामदेव पायरीचे दर्शन घेऊन उपोषण सोडणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार रोहित पवार यांच्यासह सर्व आंदोलकांनी एकत्रितपणे नामदेव पायरीचे दर्शन घेत अन्नत्याग आंदोलनाची सांगता केली.
0
0
Report

मालेगाव के तिवळी में पारिवारिक विवाद के चलते चार की मौत; मुख्य आरोपी गिरफ्तार

Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तिवळी येथे एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मृतक संतोष बकाल यांचे सख्खे भाऊसह चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतीजमिनीतील हिस्सा आणि पैशांच्या व्यवहारावरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून संतोष बकाल यांना मानसिक त्रास,अपमान व दबाव टाकण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी महादेव उर्फ महादा तुकाराम बकाल,उर्मिला महादा बकाल,पंकज महादा बकाल आणि भगवान उर्फ सावन महादा बकाल यांच्याविरुद्ध बीएनएस कलम 108 व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी महादेव बकाल याला अटक करण्यात आली आहे.इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
0
0
Report

नवी मुंबई में शिंदे-नाईक के नाम पर कलगीतुरा, नाराज सांसद

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकिंग नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील कलगीतुरा रंगणार. नवी मुंबई मनपातर्फे उद्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विविध आरोग्य विषयक सुविधांचा उद्घाटन सोहळा. मात्र कार्यक्रम पत्रिकेवर उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नाही. कार्यक्रम पत्रिकेतील नाव वगळल्याने खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली नाराजी. मात्र या ठिकाणी अशा प्रकारे होत असेल तर शिवसेनेचे नगरसेवक शिवसेना स्टाईलने उत्तर देणार. ज्या पद्धतीने नवी मुंबईचा कारभार सुरू आहे तो चुकीचा आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची एक हाती सत्ता आहे यापूर्वी सुद्धा शिवसेनेची एक हाती सत्ता होती युतीशिवाय आता युती आहे आम्ही सुद्धा या ठिकाणचे मंत्री आहेत त्याचं नाव टाकत असतो.
0
0
Report
Advertisement

पंढरपुर तालुक्यात मिनी टेम्पो खाई میں गिरा, आठ کی موت، سات घायल

Kolhapur, Maharashtra:पंढरपूर तालुक्यातील तांदुळवाडी या ठिकाणी मिनी टेम्पो विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात आठ जणांना जलसमाधी मिळाली आहे. तर सात जण बचावले आहेत. सातारा पंढरपूर मार्गावरील रस्त्या शेजारी अवघ्या चार ते पाच फूट अंतरावर असणाऱ्या विहिरीत हा टेम्पो कोसळून अपघात झाला. सातारा पंढरपूर महामार्गाचे काम केलेला ठेकेदाराने रस्त्याला संरक्षक कठडा न बांधल्याने ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे स्थानिकांसह लोकप्रतिनिधी मधून संताप व्यक्त केला जात आहे. या अपघात स्थळी प्रत्यक्ष उपस्थित असणारा प्रत्यक्षदर्शी इरफान मुजावर आणि तांदुळवाडीचे ग्रामस्थ योगेश चव्हाण यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
0
0
Report

रायगढ़ की हाई-प्रोफाइल सोसायटी में छापा, गांजा सेवन के आरोप; विदेशी महिला मामला

Chendhare, Maharashtra:रायगड पुलिस ने अलिबाग तालुक्यात सारळ स्थित एक हाई प्रोफाइल सोसायटी पर छापा मारकर गांजा सेवन करने वालों के विरुद्ध एनडीपीएस कानून के तहत कार्रवाई की। साथ ही वीजा खत्म होने के बाद भी भारत में प्रवास कर रही एक विदेशी महिला के खिलाफ इमिग्रेशन ऐंड फॉरेनर्स एक्ट के अंतर्गत मामला दर्ज किया गया। स्थानिक अपराध अन्वेषण शाखा और मांडवा समुद्री पुलिस के संयुक्त प्रयासों से यह कार्रवाई की गयी। छापे के दौरान कुछ लोग पार्टी करते दिखे; उनमें से दो ने गांजा सेवन किया हुआ पाया गया। आरोपी के रूप में सुनील चावला और हरेंद्रसिंग मंगलसिंग के नाम बताए गये। गांजा से भरे कागदी नालियाँ, अधविट जली नली और लाइटर भी जब्त किये गये। इसी दौरान एक विदेशी (युक्रेन) महिला के दस्तावेजों की जाँच की गयी; उसका वीजा 12 जून को समाप्त हो गया था लेकिन वह भारत में निवास कर रही थी; उसने भारत में रहने के लिए संतोषजनक दस्तावेज प्रस्तुत नहीं किये थे。
0
0
Report

शीफसेना के भीतर कर्ज माफी पर हंगामा: उद्धव ठाकरे के नेताओं पर दबाव बढ़ा

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण - रत्नागिरी Promod Jathar pointer.. भक्त Bhaskarrao Jadhav हे आमचे मित्रच आहेत २०२९ ला जेव्हा निवडणुका येतील तेव्हा कोण कोणाच्यात येत हे पाहावं लागणार आहे.. उद्धव ठाकरे यांचं सांगणं सध्या त्यांचे पक्षातले आमदार खासदार किंवा कार्यकर्तेही ऐकत नाहीत.. शेतकऱ्यांची जी दोन लाखांची कर्जमाफी होती ती ऑलरेडी आमच्या सरकारने केली आहे.. अजून काही जास्त हवं असेल तर आम्ही तशी मागणी उद्याच्या अधिवेशनात आमच्यातर्फे करू.. शिवसेनेचे आमदार खासदार नेते मंडळी कार्यकर्ते एक वाईट परिस्थिती आहे जनता सोडा पण त्यांची मंडळीच सिरियसली घेत नाहीत.. त्यामुळे तुम्ही तरी त्यांना का सिरीयसली घेता.. रोहित पवार.. रोहित पवारांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतच राहावं आणि त्याची दखल सत्ताधारी पक्षांनी घ्यायलाच पाहिजे आणि ती अधिवेशनात घेतली जाईल.. निलेश राणे BJP प्रवेश (Vaibhav Naik) आता माहित नाही कोण कधी प्रवेश करतील.. निलेश आणि हे भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये आहेतच यापूर्वी होते.. भारतीय जनता पक्षातूनच त्यांना निवडणूक लढविण्यासाठी पाठवलं होतं..
0
0
Report
Advertisement

पुलिस ने भोंदू आशोक खरात को गिरफ्तार कर 51 हजार ठगी का पर्दाफाश

Shirdi, Maharashtra:कोपरगावतील आणखी एका भोंदू अशोक खरातला शिर्डी पोलिसांनी ठोकल्या बेड्या. प्रेमविवाह टिकवून देतो, करणी काढतो आणि देवीची शक्ती असल्याचा दावा करत सांगली जिल्ह्यातील पती पत्नीची 51 हजारांची फसवणूक. सांगली जिल्ह्यातील अभिजित निकम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नं.515/2026, भा.न्या.सं. 318 (4) (5) सह महाराष्ट्र नरबळी, इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक कायद्यान्वये शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल. आरोपी भोंदू अशोक संपत खरात याला राहत्यातून आणि माया विठ्ठल कुरसळकर हिला राहत्या घरून शिर्डी पोलिसांनी ठोकल्या बेड्या. प्रेमविवाह टिकणार नाही, कुटुंबावर संकट येईल, पत्नी नांदायला येणार नाही अशी भीती दाखवून पूजा-अर्चा व करणी काढण्याच्या नावाखळून पैसे उकळल्याचा तक्रारीत उल्लेख. नोव्हेंबर 2025 ते जून 2026 या कालावधीत विविध पूजा व विधींसाठी हजारोंची रक्कम उकळल्याचा दावा. शिर्डी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या पथकाकडून घटनेचा अधिक तपास सुरू.
0
0
Report

सिंधुदुर्ग मंत्री के बयान से पट्टे विवाद तेज, उद्धव-शिंदे-राऊत के संघर्ष ने खींची राजनीति

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, मंत्री नितेश राणे ऑन पांढरे पट्टे वाद --- सांस्कृतिक दहशतवाद हा शब्द आता वापरला गेलेला आहे सांस्कृतिक दहशतवाद हा शब्द केवळ जैन समाज आणि हिंदू समाजा बद्दळ का काढला जातो . बकरी ईदच्या वेळी रस्त्यावर कितीतरी दोन भांडी वरती येताना बघितली आहेत. त्याला का कोणी आक्षेप घेत नाही. हिरव्या पट्ट्यांना का मिटवायला बघत नाही, उबाठा आणि मनसेच्या लोकांना बेहरामपाडा, नल बाजार आणि मुंब्रा मध्ये आंदोलन करताना आम्ही कधी बघितलं नाही. भोंगे बंद करण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलं. पट्टे काढायची हिम्मत असेल ना तर बेहराम पाडा मोहम्मद अली रोड वरचे हिरवे पट्टे काढा हिंदूंच्या विरोधात वारंवार कोणी आवाज उठवत असेल तर सरकार म्हणून भूमिका घ्यावी लागेल ऑन उद्धव ठाकरे बैठक ( आवाहन ) --- बैठकीला मोजून तीन खासदार आले. बाकीचे आऊट ऑफ नेटवर्क होते. तीन खासदारांच्या समोर एवढ्या मोठ्या वल्गना उभाटाच्या प्रमुखांनी करू नये. आता हम दो हमारे दो याचीच वेळ आलेली आहे. त्याच्या पलीकडे उभाटा पक्ष राहताना दिसत नाही. आम्हाला ऑपरेशन टायगर ऑपरेशन लोटस करण्याची गरज नाही त्यांच्याच लोकप्रतिनिधींना त्यांच्यासोबत राहायचं नाही. त्यांना मोदीजी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करायचं असेल तर त्यांना तुम्ही बांधून ठेवू शकत नाही. त्या खासदारांच्या यादीत संजय राऊत यांच्या नाव असेल ऑन संजय राऊत ( फडणवीस स्तुती ) --- चांगला चांगलं हा माणूसकीचा धर्म आहे. आदरणीय मुख्यमंत्री अर्थ खात सांभाळत आहेत राज्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी निर्णय घेत आहेत. त्यामुळे प्रत्येक विरोधकालाही वाटते की ह्याच व्यक्तींनी राज्याचे नेतृत्व केलं पाहिजे आणि अर्थ खात पण सांभाळलं पाहिजे. ऑन रोहित पवार ( उपोषण ) --- आमच्या रोहित पवारांना खाण्याचा शोक आहे चांगल्या हॉटेलमध्ये मी त्यांना जेवताना बघितलेला आहे. कदाचित त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना डायट प्लॅन दिला असेल. दोन दिवस झाले तरी ते बारीक होताना दिसत नाहीत. राज्यात कर्जमाफी झालेली आहे. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी, आमच्या सरकारने कर्जमाफी दिलेली आहे. शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. डायट प्लॅन राबवण्यासाठी उपोषणाचं गोंडस नाव देण्यात आलेय दोन दिवस झाले वजन कमी झालं नाही उलट वाढलेलं असेल
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top