icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सोलापुर में शिवाजी महाराज के पुतला विवाद सुलझा, मंत्री ने निधि मंजूर की

Pandharpur, Maharashtra:सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे रात्री उशिरा मोहोळ मध्ये पोहोचताच अंजनगाव खेलोबा मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा वाद संपुष्टात आला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दोन्ही बाजूच्या प्रमुख प्रतिनिधीशी, विशेष पोलीस महानिरीक्षक,जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्याशी रात्री उशिरा चर्चा करून पुतळ्याचा वाद सोडवला आहे. मराठा समाजाने धनगर देवस्थानच्या शेजारी उभारणीला पुतळा स्थलांतर करायला परवानगी दिली आहे. आज सकाळी सोलापूरचे जिल्हाधिक्षर्य सोलापूरचे पोलीस अधीक्षक आणि माजी आमदार राजन पाटील तसेच मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून योग्य जागेची पाहणी करून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतील. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नवीन जागेत पुतळा उभारणी आणि सुशोभीकरण करण्यासाठी तातडीने एक कोटी रुपये निधी मंजूर करण्याचे सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून अंजनगाव खेलोबा मध्ये सुरू असलेला धनगर मराठा समाजातील वाद अखेर संपुष्टात आला है.
0
0
Report

नाशिक के दिंडोरी में पानी से भरे कुएँ में कार गिरा; 9 लोग मृत

Dindori, Madhya Pradesh:नाशिकच्या दिंडोरी मध्ये कार पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळल्याने 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू. एका खाजगी क्लासच्या कार्यक्रमाहून घरी परतत असताना दिंडोरी - कळवण रस्त्यावर असलेल्या विहिरीमध्ये कार कोसळल्याने दुर्घटना. एकाच कुटुंबातील 5 ते 6 जणांवर काळाचा घाला.... स्थानिक प्रशासन ग्रामस्थ व आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून घटनास्थळी मदतकार्य मोहीम मृतांमध्ये 5 विद्यार्थिनी 1 विद्यार्थी.. 2 महिला व 1 पुरुषाचा समावेश दिंडोरी तालुक्यातील वनारे येथील सुनील दरगोडे व अनिल दरगोडे कुटुंबावर काळाचा घाला..... पहाटे दोन वाजेपर्यंत सुरू होते रेस्क्यू ऑपरेशन.....
0
0
Report

शिवाजी महाराज और ताराराणी की रथयात्रा: कोल्हापुर में परंपरा का जुनून

Kolhapur, Maharashtra:शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांचा जाज्वल्य इतिहास जनतेच्या स्मरणात कायम राहावा यासाठी राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी कोल्हापूरात रथोत्सव सुरु केला होता. कोल्हापूरात आजही ही परंपरा मोठ्या उत्साहानं जपली जाते. शुक्रवारी रात्री छत्रपती घराणं आणि जनतेच्या उपस्थितीत शिवाजी महाराज आणि महाराराणी ताराराणी यांच्या रथोत्सव काढण्यात आला. पारंपारिक वेशभुषा, ढोल ताशाचा गजरामध्ये शुक्रवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराराणी ताराराणी यांच्या रथोत्सव काढण्यात आला. भवनी मंडप इथुन छत्रपती घराण्याचे छत्रपती शाहु महाराज, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या रथाची पूजा करण्यात आली. त्यानंतर सुरवातीला छत्रपती घराण्याच्या हस्ते हा रथ ओढण्याता आला. त्यानंतर जनतेनं हा रथ ओढयला सुरवात केली. भवानी मंडप, बालगोपाल तालीम मंडळ, मिरजकर तिकटी, महाव्दार रोड, गुजरी या मार्गे हा रथोत्सव काढण्यात आला. रथोत्सव मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या, ढोल तासांच्या आवाज, आतशबाजी फटाक्यांची, मर्दानी खेळांनी यामध्ये रथोत्सवामध्ये रंगत आणली. काही नागरीक पारंपरिक वेशभुषा करुन या रथोत्सवामध्ये सहभागी झाले होते. राजर्षी शाहू महाराजांनी रयतेला शिवछत्रपती आणि महाराणी ताराराणी यांची आठवण सतत जागृत रहावी यासाठी इ.स. १९१४ मध्ये रथोत्सव सुरु केला होता. इंग्रजांच्या राजवटीत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराराणी ताराराणी याचं नाव घेऊन एखादा उत्सव साजरा करणे ही खूपच मोठी आणि क्रांतिकारी घटना होती. त्यामुळे या रथोत्सवाला अनन्य साधारण महत्व है.
0
0
Report
Advertisement

भिलवडी में असमय बारिश ने द्राक्ष बागों को लाखों का नुकसान पहुंचाया

Sangli, Maharashtra:स्लग - भिलवडी परिसरात अवकाळीचा घाला; काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचे लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.. सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या भिलवडी परिसरामध्ये अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात बसलाय काढलेल्या द्राक्षबागांवर पावसाचा अवकाळी पावसाचा कहर झाल्याने द्राक्षबाग शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्याने भिलवडी,माळवाडी ,सुखवाडी परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या द्राक्ष बागांवर या नैसर्गिक आपत्तीने घाला घातला असून, अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.सुखवाडी येथील शेतकरी सुभाष जगताप यांच्या द्राक्ष बागेत द्राक्ष काढणीचे काम सुरू असतानाच दुपारी अचानक वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष वेलींच्या ओळीच्या ओळी कोलमडून पडल्या, तर गारांच्या माऱ्यामुळे द्राक्षाच्या घडांचे मोठे नुकसान झाले.अनेक घड फुटून मणी खराब झाल्याने बाजारात विक्री योग्य माल पूर्णतः नष्ट झाला आहे.प्राथमिक अंदाजानुसार, सुभाष जगताप यांचे सुमारे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.वर्षभर मेहनत घेऊन उभे केलेले पीक काढणीच्या टप्प्यावर असताना निसर्गाच्या या अवकाळी प्रकोपामुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. बाईट - सुभाष जगताप - द्राक्ष शेतकरी - सुखवाडी - पलूस.
0
0
Report

अकोला पुलिस ने अपार्टमेंट में मानव तस्करी का भंडाफोड़, एक पुरुष समेत दो महिलाएं गिरफ्तार

Akola, Maharashtra:अकोल्यातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत एका अपार्टमेंटमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एका स्थानिक महिलेकडून एका विदेशी महिलेला घेऊन हा प्रकार चालवला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अकोला स्थानिक गुन्हे शाखा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग आणि खदान पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईदरम्यान एक इसम आणि दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले है. ताब्यात घेतलेल्या महिलांपैकी एक पीडित महिला तांझानिया (ईस्ट आफ्रिका) येथील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
0
0
Report
Advertisement

वाशिम में तूफानी हवा-बारिश से बड़ा पेड़ गिरा, प्रमुख मार्ग पर यातायात रोक

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर: वाशिम शहरात आज झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एक मोठे झाड आडवे पडले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. सुदैवाने, झाड पडत असताना रस्त्यावर कोणतीही रहदारी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा, हा मार्ग नेहमीच वर्दळीचा असल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता होती. घटनेची माहिती मिळताच नगरपालिके च्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी झाडाची कटाई करून रस्ता लवकरच वाहतुकीसाठी मोकळा केला. त्यामुळे काही वेळातच वाहतूक सुरळीत झाली.
0
0
Report

Shirdi: Namkarn Avare की पूछताछ तेज, ठगों के खातों में करोड़ों की लेनदेन का खुलासा

Shirdi, Maharashtra:नामकर्ण आवारेची आठ तासापासून चौकशी सुरू... भोंदू खरातचा हस्तक नामकर्ण आवारे शिर्डी पोलीसांच्या रडारवर... शिर्डी पोलीस ठाण्यात सकाळी 11 वाजेपासून चौकशी... भोंदू खरातचे समता पतसंस्था अॅणी जगदंब पतसंस्थेत अनेक खाती... जगदंब पतसंस्था नामकर्ण आवारेची... कोट्यावधीची देवाण घेवाण आणी इतरांच्या नावावर असलेल्या खात्यावरून भोंदूचे कोट्यावधीचे व्यवहार... शिर्डीतील शेतकऱ्याच्या फसवणूक प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी आल्या समोर... नामकर्ण आवारेकडून भोंदू संदर्भात आणखी काय माहीती समोर येणार याकडे लक्ष...
0
0
Report
Advertisement

शिर्डी में किसान फर्जीवाड़ा मामले में तीन दिन की पुलिस कोठड़ी मिली

Shirdi, Maharashtra:आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी... शिर्डीतील शेतकऱ्याला फसवणूक प्रकरण.. अटकेतील दोन आरोपींना पुन्हा तीन दिवसाची पोलीस कोठडी... भोंदू अशोक खरात आणी पत्नी कल्पना खरातही या प्रकरणात मुख्य आरोपी.. दोन जणांना पोलीसांनी घेतलंय तीन दिवसापूर्वी ताब्यात.. आज तीन दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा केले कोर्टात हजर.. आरोपी अरविंद बावके आणी किरण सोनवणे यास पुन्हा तीन दिवसाची पोलीस कोठडी.. फरार आरोपी कल्पना खरात आणी इतर आरोपींचा अजूनही शोध बाकी... पतसंस्थेत 132 अकांऊट सापडल्याने त्याचाही तपास बाकी आणखी कोण साथीदार आहेत का?.. हे मुद्दे मांडत पोलीसांनी मिळवली वाढीव तीन दिवसाची पोलीस कोठडी...
0
0
Report

नागपूर के MIDC में पुलिसकर्मी पंकज ठाकूर की हत्या, आरोपी गिरफ्तार

Nagpur, Maharashtra:Ngp Murder live u ने फीड पाठवले.. घटनास्थळ पोलीस स्टेशन आणि मयतचा फोटो -व्हिडिओ त्यात आहे -=========== नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत वानाडोंगरी मधील मातोश्री नगरात पंकज ठाकूर या पोलीस कर्मचाऱ्याची हत्या झाली आहे... परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांना जाब विचारल्यामुळे त्यांच्या एकाने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे... काल दुपारी पंकज ठाकूर यांनी आकाश मंडल या परिसरातच राहणाऱ्या तरुणाला माझ्या घराजवळ वारंवार कशाला चकरा मारतो असा जाब विचारला होता... त्याच्यातून रागावलेल्या आकाशने त्याच्या काही सहकारी आणि कुटुंबीयांसोबत मिळून काल रात्री साडेदहा वाजताच्या sुमारास पंकज ठाकूर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला... त्याावेळी पंकज सोबत असलेले काही नातेवाईक ही या भांडणात सहभागी झाली... त्यावेळी अचानक आकाशने हातातली लोखंडी सळी पंकज यांच्या छातीवर खूपसल्यामुळे ते गंभीर जखमी झाले.. या घटनेत पंकज सोबतचे त्यांचे काही नातेवाईकही जखमी झाल्याची माहिती आहे... पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून आकाश मंडल आणि त्याच्या भावाला अटक केली आहे.. त्यांच्या सोबत या हल्ल्यामध्ये आणखी कोणी सहभागी होते का, याचा तपास केला जात आहे... -------- पोलीस निरीक्षकाचा बाईट आणि आरोपींचे व्हिडिओ 2cला जोडले आहे
0
0
Report

अवकाली बारिश से मुरबाड के फलों में भारी नुकसान, किसान संकट में

Ambernath, Maharashtra:अवकाळी पावसामुळे मुरबाड तालुक्यातील फळ पिकांचे मोठे नुकसान नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याची मागणी मुरबाड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आदिवासी विभागातील टोकावडे , मोरोशी ,शिरोशी, आणि धसई विभागात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, चिकू सह इतर फळबागांमधील फळ गळून पडले आहेत , त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे . भाजीपाला पिकाचे नुकसान आणि फळबागांना फटका यामुळे मोठे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि कृषी विभागाला केली आहे केली आहे.
0
0
Report
Advertisement

शिरूर तालुक्य में गारपीट-आकस्मिक वर्षा से नुकसान; किसानों को 22 हजार मदद

Shirur, Maharashtra:शिरूर पुणे... शिरूर तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झालं असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिरूर हवेलीचे आजी-माजी आमदार मदतीला धावलेत, आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत तहसीलदारांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना केल्यात, यावेळी लोकप्रतिनिधींना शेतकऱ्याच्या रोशाला ही सामोरं जावं लागलं फळबागेला 5 लाख रुपये खर्च आलाय आणि तुम्ही फक्त 22 हजार रुपये मदत देणार असाल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा उद्विग्न सवाल शेतकऱ्यानी लोकप्रतिनिधींना केलाय.
0
0
Report

पारनेर क्षेत्र में आंधी-बारिश ने फलों और फसलों को भारी नुकसान पहुंचाया

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात गुरुवारी सायंकाळी वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपिट झाल्याने तालुक्यातील पश्चिम आणि उत्तर भागातील गावांना तडाखा बसला आहे या अवकाळी पावसाने आंबा, केळी, डाळिंब या फळबागांसह कांदा, गहू या पिकांच मोठ नुकसान झाला आहे....वासुंदे, पळशी, वनकुटे, खडकवाडी,वडगाव सावताळा, पाडळी आळे,म्हस्केवाडी, रेनवडी या गावात मोठे नुकसान झाल आहे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कहरामुळे हिरावून गेला आहे....अवकाळी पावसानंतर शासनाने तात्काळ संबंधित प्रशासनाला पंचनामे करण्याचा सुचना दिल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top