411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सातारा: सात दुभत्या म्हशी मृत, पशु चिकित्सक टीम ने शुरू की जांच
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील नाडे नवारस्ता व बेलवडे खुर्द येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या तीन दिवसांत विष्णू पवार, राजेंद्र पवार, लक्ष्मण पवार, श्रीपती पवार आणि मारुती पवार या शेतकऱ्यांच्या एकूण सात दुभत्या म्हशींचा अचानक मृत्यू झाला. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाले असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पशुवैद्यकीय विभागाने घटनास्थळी पाहणी सुरू केली असून या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
दिल्ली के लाठीचार्ज के विरोध में दापोली में आरपीआई अवले गुट का आक्रामक मोर्चा
Ratnagiri, Maharashtra:दिल्लीतील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आणि अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी आरपीआय (आठवले गट) कडून दापोलीत आक्रमक मोर्चा काढण्यात आला. दोषी पोलिसांवर कारवाई आणि उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. निर्णय न बदलल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा पक्षाने दिला.0
0
Report
चंद्रपूर एसटी कर्मचाऱ्यांची आठ दिवसांत आंदोलन; ड्यूटी रोस्टर बदलेच्या मागणी
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर बस आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. कर्मचाऱ्यांचे ड्युटी रोस्टर तयार करताना शहर आणि जंगल भागातील वेग मर्यादा लक्षात न घेता ड्युटी रोस्टर तयार केलं जातं असा आक्षेप घेत कर्मचाऱ्यांनी यामध्ये बदलाव करण्याची मागाणी केली आहे. व्यवहारिकता लक्षात न घेता तयार करण्यात आलेल्या ड्युटी रोस्टरमुळे सामान्य प्रवाशांना वेळेवर बस उपलब्ध होऊ शकत नाही असा कर्मचाऱ्यांचा आक्षेप आहे. सोबतच आठ तासांच्या ड्युटी वरील तासांचा ओव्हर टाईम देण्यात यावा अशी देखील प्रमुख मागणी या कर्मचाऱ्यांची असून याचा राज्यभरातील 70 हजार कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचा देखील इशारा दिलाय.0
0
Report
Advertisement
सीजेपी आंदोलन के समर्थन में छत्रपी संभाजीनगर के वकीलों का क्रांति चौक में प्रदर्शन
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:CJPच्या आंदोलनाला छत्रपती संभाजीनगरातील वकील संघटनांचा पाठिंबा; क्रांती चौकात आंदोलन0
0
Report
नाशिक में भारी बारिश से गोदावरी नदी बाढ़, 400 नागरिक सुरक्षित स्थानांतरित; प्रशासन अलर्ट
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासनाने तरुणांच्या मदतीने 400 नागरिकांचे स्थलांतर केले असून या नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू राहिल्यास पुराचा धोका आणखी वाढणार असल्यामुळे प्रशासन अलर्ट मोड वर असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्याधिकारी ओंकार पवार यांनी दिली आहे. या संदर्भात आढावा घेतला आहे.0
0
Report
नाशिक के पश्चिम में तेज बारिश से गोदावरी महापूर, चांदोरी-सायखेडा में बाढ़
Yeola, Maharashtra:गेल्या दोन दिवसांपासून नाशिकच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असून गंगापूर,दारणा, नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने गोदावरी नदीला महापूर आल्याने चांदोरी, सायखेडा नांदूर मधमेश्वर या गावांना पुराचा वेढा बसला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. चांदोरी व सायखेडा या दोन गावांचा संपर्क तुटला असून पुलावरून 10 फूट पाणी वाहत असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटना स्थळावरून आढावा घेतला आहे.0
0
Report
Advertisement
نवी मुंबई नगरपालिका کی صفائی ریلی سے بچوں میں پلاسٹک سے मुक्त महाराष्ट्र کا پیغام
Navi Mumbai, Maharashtra:स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 मधील सफाई अपनाओ, बिमारी भगाओ या अभियानांतर्गत आषाढी एकादशीचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका आणि ज्ञानदीप सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या वारीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची दिंडी यात्रा काढत विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र अश्या सामाजिक संदेशाची जनजागृती करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमध्ये मनपा आयुक्त अधिकारीगणांच्या सह शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.0
0
Report
कल्याण में कांग्रेस का रास्ता रोको, धर्मेंद्र प्रधान से राजीनामे की मांग
Kalyan, Maharashtra:कल्याणात काँग्रेसचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद प्रधान यांचा राजीनामा देण्याची मागणी. दिल्ली च्या जंतर मंतर येथे पोलिसांनी विद्यार्थ्यांवर आमनुष लाटीचार्ज च्या विरोधात देशभर आंदोलन सुरु आहे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या साठी कल्याण जिल्हा कॉग्रेसच्या वतीने कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसचे जोरदार रास्ता रोको करत भाजप विरोधी घोषणाबाजी करत आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले0
0
Report
अकोट में नीट पेपरफुटी के विरोध में प्रदर्शन, प्रधान से नैतिक जिम्मेदारी और इस्तीफे की मांग
Akola, Maharashtra:नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर आज अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात सर्वसामान्य नागरिकांसह विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अकोट शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या निषेध मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेऊन नीट पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करण्याची, दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. मोर्चादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी करावी, तसेच परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली. एकूणच, नीट पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार্জच्या निषेधार्थ अकोटमध्ये काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे परिसरात काही काळ आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले.0
0
Report
Advertisement
दिल्ली आंदोलन की गूंज: नाशिक के मालेगांव में महात्मा गांधी के सामने प्रदर्शन
Nashik, Maharashtra:दिल्लीच्या आंदोलनाचे नाशिकच्या मालेगावात पडसाद.. मालेगावकरांकडून शहरातील मोसम पुल भागात निषेध आंदोलन.. Anc: दिल्ली चालत आलेल्या आंदोलनाचे पडसाद आता देशात उमटू लागत असल्याने त्याचाच एक भाग म्हणजे नाशिकच्या मालेगावात देखील मालेगाव शहरातील नागरिकांकडून शहरातील मोसमपूल भागात महात्मा गांधी पुतळ्याजवळ घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.0
0
Report
तीनों नावें मौसमी मछली पकड़नी पाबंदी के उल्लंघन में वरसोवा डॉक से पकड़ी गईं
Mumbai, Maharashtra:दिनांक २० जुलै २०२६ रोजी वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार, वर्सोवा खाडीबाहेर तीन ट्रॉलर्स (नौका) नांगर टाकून उभ्या असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार रात्रीच्या सुमारास तिकडे जाऊन खात्री करण्यात आली असता, सदर तीन नौकांनी मासेमारी करून आल्याचे व मासळी उतरवण्याच्या तयारीत असल्याचा संशय आले. त्या अनुषंगाने वर्सोवा जेटी येथे परवाना अधिकारी वर्सोवा व सुरक्षारक्षक यांनी रात्रभर गस्त घालून सदर नौका येत आहेत किंवा कसे, याबत खातरजमा केली. परंतु, त्या दिवशी वारा आणि पाऊस अत्यंत मुसळधार असल्यामुळे सदर नौका जेटीवर न थांबता, खाडीच्या आतल्या दिशेने साधारणतः रात्री ३:०० वाजता गेल्याचे निदर्शनास आले. अंधार व प्रतिकूल हवामानामुळे काहीही स्पष्ट दिसत नसल्यामुळे त्या नौका नेमक्या कुठे गेल्या आहेत हे पाहणे शक्य झाले नाही. तसेच, वर्सोवा येथे गस्ती नौका उपलब्ध नसल्यामुळे देखील एवढ्या रात्री कोणतीही नौका पाठलागासाठी उपलब्ध होणे शक्य झाले नाही. त्याप्रमाणे पुढच्या दिवशी सकाळी सदर नौका कुठे आहेत याचा sविस्तर तपास घेतला गेला. सागरी पोलीस, महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) आणि परवाना अधिकारी वर्सोवा यांनी संयुक्त धाड या नौकांवर टाकून सर्व तपासणी केली. तपासणी दरम्यान या नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. तसेच काही नौकांवर आवश्यक ते कायदेशीर कागदपत्रे देखील आढळून आली नाहीत. या प्रकरणी तपासणी केलेल्या त्या तीन नौकांचे सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहेत: १. *पहिली नौका - अमनाथ (AMARNATH)* *नोंदणी क्रमांक व दिनांक:* IND-MH-7-MM-2615 & ०४/०१/२०१९ *मालकाचे नाव व पत्ता:* श्री. महेंद्र पांडुरंग दंडेकर, दंडेकर हाऊस, गोमा गल्ली, जरीमरी कृपा, आंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००६१ *मासेमारी मूळ बंदर:* न्यू फेरिवाफ (New Ferrywharf) २. *दुसरी नौका - जय बाबा अमरनाथ (JAY BABA AMARNATH)* *नोंदणी क्रमांक व दिनांक:* IND-MH-7-MM-2683 & १३/०२/२०१९ *मालकाचे नाव व पत्ता:* सौ. नेत्रा विक्रंत कोळी, रुम नं. ५, आनंदी सदन, बुधा गल्ली नं. १, सत्यजित बार जवळ, वर्सोवा, आंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००६१ *मासेमारी मूळ बंदर:* ससून डॉक (Sasoon Dock) ३. *तिसरी नौका - जरीमरी तिसाई (JARI MARI TISAI)* *नोंदणी क्रमांक व दिनांक:* IND-MH-7-MM-2170 & १९/१२/२०१९ मालकाचे नाव व पत्ता: श्री. विलास पांडुरंग दंडेकर, दंडेकर हाऊस, पांडुरंग रामले मार्ग, जरीमरी कृपा, गोमा गल्ली, वर्सोवा, आंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००६१ मासेमारी मूळ बंदर: न्यू फेरिवाफ (New Ferrywharf) सदर नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम व अधिनियम, १९८१ नुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करून तात्काळ प्रतिवृत्त दाखल करण्यात येत आहे.0
0
Report
चंद्रकांत पाटील बोले: आंबा चोर पर भी फांसी नहीं, समझाईश जरूरी
Sangli, Maharashtra:अँकर - एखाद्याने आंबा चोरला म्हणून, त्याची शिक्षा फाशी होत नाही, असे विधान भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.नीट पेपर फुटीवरून सुरू असलेल्या आंदोलनावरून मंत्री पाटील यांनी हे विधान केले आहे.एखाद्या पेपर फुटल्यानंतर,एखाद्याने आंबा चोरल्यावर फाशीची शिक्षा होत नाही,त्याला समज द्यावी लागते,आणखी काही चोरीची शिक्षा ठरलेली असते,त्यामुळे प्रत्येक गोष्टीची शिक्षा फाशी होत नसते,असं विधान मंत्री पाटील यांनी केले आहे。0
0
Report
Advertisement
आषाढ़ी वारी: पंढरपुर में भीड़, मंत्री गोरे ने भक्तों से हालचाल जानी
Pandharpur, Maharashtra:आषाढी वारी साठी पंढरपूर मध्ये विक्रमी गर्दी झालीं आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रात्री स्वतः दर्शन रांगेत जाऊन भाविकांची विचारपूस करत आहेत. काही अडचण आहे का ? पाणी चहा जेवण दर्शन रांगेत उपलब्ध आहे का ? याची देखील माहिती त्यांनी भाविकांकडून घेतली. आषाढी वारीला झालेली गर्दी पाहता या तात्पुरत्या सोयी सुविध तर आहेतच पण भविष्यात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे प्रयत्न सरकार करेल असे मत व्यक्त केले0
0
Report
अकोला में अवैध देसी शराब बनाने के ठिकाने पर दबिश, 30 लाख की सामग्री जब्त
Akola, Maharashtra:अकला जिल्ह्यात अघाडीचा मासिकवाढीचा विस्तार: बाळापूर तालुक्यात सतार गावस्थित अंधार्या जागेवर चालणाऱ्या बंद कारखान्यावर छापा टाकला. बनावट दारू तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य व उपकरणे हस्तगत; सुमारे ४०० लिटर स्प्रिट, ५५ हजार प्लॅस्टिकच्या बाटल्या, बनावट लेबल्स, पुठ्ठे, बाटल्या सीलिंगची साधने. एकूण अंदाजे ३० लाख ९० हजार रुपयांचा माल जप्त. या अवैध धंद्याच्या मुळ सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी तपास सुरू.0
0
Report
आषाढ़ी वारी में एयर एम्बुलेंस: महाराष्ट्र सरकार की तात्कालिक उपचार सुविधा
Pandharpur, Maharashtra:आषाढी वारीत पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून एअर ॲम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध केली आहे. पंढरपूर मध्ये लाखो भाविक दाखल झाले आहेत. यामध्ये भाविकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न तयार झाला तर गोल्डन अव्हर मध्ये त्या रुग्णाला तातडीचे उपचार पुणे मुंबई येथे मिळावा यासाठी आरोग्य विभागाने ही एअर ॲम्ब्युलन्स ठेवली आहे.0
0
Report
Advertisement
