411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
यवतमाल के सूखे से किसान परेशान, सितंबर के पहले हफ्ते तक मदद नहीं मिली
Yavatmal, Maharashtra:खरीप हंगामातील ऑगस्ट महिन्यानंतर आता सप्टेंबर चा पहिला आठवडा देखील पावसाअभावी कोरडा गेल्याने कृषी क्षेत्रावर मोठे संकट निर्माण झाले आहे. पिकांची अवस्था अतिशय बिकट झाली असून, त्यांना वाचविण्याची अखेरची धडपड करताना शेतकरी दिसत आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांवर तर मोठा खर्च व परिश्रम करून देखील शेत शिवार आता सोडून देण्याची वेळ आलेली आहे. यवतमाळतील दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी.0
0
Report
रास्ता न देने के कारण टेम्पो चालक पर पेपर स्प्रे से हमला, दो फ्रिज सहित नुकसान
Kalyan, Maharashtra:भर रस्त्यात डोळ्यात पेपर स्प्रे मारत टेम्पो चालकाला बेदम मारहाण. गाडीसह मालाची तोडफोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात टेम्पो चालकाने कार को रास्ता न दिल्याच्या रागातून टेम्पो चालकाला डोळ्यात पेपर स्प्रे मारकर बेहम मारहाण करवी, टेम्पोमध्ये असलेले दोन फ्रिज आणि इतर साहित्याची तोडफोड केली. टेम्पो चालक सुनील याला बेहम मारहाणी केली असून गजानन गायकवाड यांच्या विरोधात कोळसेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी गजानन गायकवाड याचा शोध घेत आहे.0
0
Report
बावड़ी के विषाक्त गैस से एक की मौत, बचाने गया दूसरा बेहोश
Bhandara, Maharashtra:विहिरीतील विषारी वायूने एकाचा मृत्यू... वाचवायला गेलेला दुसरा बेशुद्ध... भंडारा जिल्ह्याच्या पालांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत खुनारी शेतशिवारात धक्कादायक घटना घडली आहे. विहिरीतील विषारी वायूमुळे एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उतरलेली दुसरी व्यक्ती बेशुद्ध पडली. रामदास कोहळे, वय ६०, रा. दिघोरी हे शेतावरील घरात राहत होते. ते विहिरीत पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच विहिरीतील विषारी वायूमुळे बचावासाठी गेलेल्या व्यक्तीचा श्वास गुदमरला आणि तो बेशुद्ध झाला.यानंतर स्थानिकांच्या मदतीने बेशुद्ध व्यक्तीला विहिरीबाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, विहिरीत नेमका कोणता धोका आहे, हे तपासण्यासाठी स्थानिकांनी कोंबडी विहिरीत सोडली. मात्र काही वेळातच कोंबडीचाही मृत्यू झाल्याने विहिरीत विषारी वायू असल्याचा संशय बळावला होता. अखेर अग्निशामक दलाच्या मदतीने रामदास कोहळे यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे,0
0
Report
Advertisement
खेत में विद्युत प्रवाह की चपेट में आकर किसान पिता की मौत, पुत्र घायल
Bhandara, Maharashtra:शेतात पडलेल्या विद्युत कंडक्टरचा धक्का... खत मारताना वडिलांचा दुर्दैवी मृत्यू तर मुलगा जखमी मोहाडी तालुक्यातील ताडगाव येथील शेतकरी सकाळी शेतावर खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विद्युत प्रवाहाचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. गणेश केशव गिरी वय (65) वर्ष मृत्यू झाला. तर दुर्गेश गणेश गिरी (३३) वर्ष असे जखमीचे नाव आहे. जीर्ण असलेल्या पोल वरून विद्युत कंडक्टर तुटून शेतात पडलेला असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
सातारा में गणेश उत्सव मिरवणुकी के दौरान ड्रैगन प्रतिमा जलकर राख, कोई हताहत नहीं
Satara, Maharashtra:सातारा : साताऱ्यात गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणुकीदरम्यान साताऱ्यातील राजवाडा बसस्थानक परिसरात ड्रॅगनच्या प्रतिकृतीला अचानक आग लागल्याची घटना घडली. सह्याद्रीचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या आगमन मिरवणुकीत ही घटना घडली असून आगीचा मोठा भडका उडाल्याचे समोर आले आहे. मिरवणुकीत फटाक्यांची आतषबाजी सुरू असतानाच ड्रॅगनच्या प्रतिकृतीने अचानक पेट घेतल्याचे सांगितले जात आहे. या आगीत हा ड्रॅगन जळून खाक झाला आहे. गर्दीच्या राजवाडा बसस्थानक परिसरात ही घटना घडल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.0
0
Report
रोहित पवार का बड़ा बयान: BJP छोड़ने पर करेंगे एक साथ विलय
Bhandara, Maharashtra:रोहित पवार ऑन विलीनीकरण प्रफुल पटेल यांनी भाजपची साथ सोडली तर एकत्र येऊ.... रोहित पवारांचं विलनीकरणावर मोठ वक्तव्य... पक्षातीलच काही नेते राष्ट्रीय अध्यक्ष पद मागत आहेत असं वक्तव्य रोहित पवारांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.. त्याच्यावर आज रोहित पवारांना विचारलं असता प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे पक्षावर ताबा घेण्याचे प्रयत्न करत होते त्याचे पुरावे देखील मी सादर केले असं रोहित पवार यांनी म्हटलं तर पुढे बोलताना.... "जर भाजपची साथ सोडली तरच आम्ही एकत्र येऊ असं मोठं वक्तव्य रोहित पवार यांनी राष्ट्रवादी विलनीकरणावर केला आहे..." रोहित पवार ऑन mpsc अध्यक्ष आरोप MPSC पेपरफुटी प्रकरणात अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यावर रोहित पवारांचे गंभीर आरोप... चौकशीसह हकालपट्टीची मागणी... रोहित पवार ऑन नवनाथ बन वक्तव्य "मी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा आवाज उठवला तेव्हापासून भाजपचे लोक माझ्यावर टीका करत आहेत..." रोहित पवारांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा आवाज उठवला असून यावर नवनाथ बन यांनी रोहित पवार आपलं राजकीय करिअर सेट करण्याकरिता आंदोलन करत आहेत असं वक्तव्य केलं यावर रोहित पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर देत मी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा आवाज उठवला तेव्हापासून भाजपचे काही लोक माझ्यावर टीका करतात म्हणजेच आम्ही योग्य मुद्दा उचलला आहे असं प्रत्युत्तर त्यांनी दिला.. रोहित पवार ऑन चित्रपट सोहळा पुरस्कार नवी दिल्ली येथे पारंपरिकपणे आयोजित केला जाणारा प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा यावर्षी गुजरातला हलवण्यात आला आहे... यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून... गुजरात मधले काही नेते यांना भविष्यात सरकार येणार नाही हे त्यांना माहीत झाला आहे... आणि त्यामुळे गुजरात मध्ये आपलं वर्चस्व जमविण्याकरिता आणि राजकारण मेंटेन करण्याकरिता असे कार्यक्रम गुजरातला हलवत आहेत अशी टीका त्यांनी केली आहे...0
0
Report
Advertisement
दोपहर में बिजली कटौती से किसान नाराज, 14 सितम्बर को महामार्ग रोके जाने चेतावनी
Shirur, Maharashtra:शिरूर/पुणे दिवसा वीजपुरवठ्यासाठी करडेत रास्ता रोको, १४ सप्टेंबरला महामार्ग रोखण्याचा इशारा ANC : महावितरणकडून रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच्या निषेधार्थ करडे येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. रात्री ९.४५ ते पहाटे ३.४५ या वेळेत होणारा वीजपुरवठा बंद करून बिबट प्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिवसा सलग किमान ८ तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महावितरणचे शिरूर उपकार्यकारी अभियंते सुहास माने यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दिवसा ८ तास वीजपुरवठ्याचे सुधारित वेळापत्रक लागू न केल्यास १४ सप्टेंबरला न्हावरा फाटा येथे अहिल्यानगर–पुणे महामार्ग रोखण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते。0
0
Report
डिंभे-मानिकडोह बोगदा: किसान विरोध से सरकार पर दबाव तेज
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील डिंभे ते माणिकडोह धरण बोगदा प्रकल्पावरून राजकारण आणि शेतकरी वर्तुळात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बोगद्याला मंजुरी मिळाल्यानंतर, माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी हा बोगदा तत्काळ रद्द करण्याची आग्रही आणि आक्रमक भूमिका घेतली आहे. हा बोगदा झाल्यास आंबेगाव, जुन्नर, शिरूरसह लगतच्या पारनेर तालुक्यातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहतील आणि हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय ठरेल, असा इशारा वळसे पाटील यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून डिंभे-माणिकडोह बोगदा योजना रद्द करण्याची आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची अधिकृत मागणी केली आहे. शेतकऱ्यांचा वाढता विरोध आणि सत्ताधारी आमदारांसह उपमुख्यमंत्र्यांनीच थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतल्याने आता सरकार डिंभे-माणिकडोह बोगद्याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
मालेगांव में प्राध्यापक के गिरने से मौत, जांच और कार्रवाई की मांग
Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) मालेगावात प्राध्यापकांचा जिन्यावर पाय घसरून मृत्यू... तपासणी पथकाच्या अधिकाऱ्यांचा धसका... संस्थेच्या शिक्षकांचा आरोप.. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी... नाशिकच्या मालेगावातील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या म्युनिसिपल शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक सोपान बोरसे हे जिन्यावर घसरून जखमी झाले. त्यांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान आज याच महाविद्यालयात तपासणीसाठी अधिकाऱ्यांचे पथक आले होते. या तपासणीचा ताण तणावातून प्रा.बोरसे जिन्यावरून घरतल्याचा आरोप करण्यात आलाय. प्रा. बोरसे यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संस्थेच्या शिक्षकांनी मालेगाव शहर पोलिस स्थानकात गर्दी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.0
0
Report
Advertisement
AI से मॉर्फ फोटो शेयर कर मंत्री शिवेंद्रसिंहाराजे भोसले की बदनामी, समर्थकों ने कार्रवाई की मांग
Satara, Maharashtra:सातारा : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा फोटो AI द्वारे मॉर्फ करून सोशल मीडियावर चुकीची पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकाराविरोधात कार्यकर्त्यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची भेट घेत निवेदन दिले. मॉर्फ केलेल्या फोटोंचा सातारा येथे झालेल्या कार्यक्रमाशी कोणताही संबंध नसल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. राजकीय हेतूने शिवेंद्रसिंहराजेची बदनामी करण्यासाठी हे फोटो तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.दरम्यान, संबंधित सोशल मीडिया अकाऊंटचा शोध घेऊन फोटो मॉर्फ करणाऱ्या तसेच ते प्रसारित करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.0
0
Report
चंद्रपूर में अमृता फड़णवीस के कार्यक्रम को लेकर हंगामा, गरबा समेत बयानों पर चर्चा
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या विविध विषयांवर प्रतिक्रिया... ऑन नितेश राणे गरबा वक्तव्य # आपला उत्सव सर्वांचा समावेश करतो, एखादा मुस्लिम व्यक्ती जर गरब्यात येत असेल आणि नीट आनंद घेऊन जात असेल तर त्यात काही गैर वाटत नाही ऑन डीजे विवाद # सरकार आणि कोर्टाने जे नियम ठरवून दिले आहे त्याप्रमाणे सर्वांनी सणवार साजरी करावे, ज्या सोसायटीमध्ये आपण राहतो त्या लोकांना त्रास व्हायला नको, धर्माचे पालन घरात जेवढं करू तेवढं चांगलं, बाहर जे सणवार साजरे करतो ते नियमत राहून केले पाहिजे ऑन संभाजी भिडे वक्तव्य # दहीहंडी फोडताना महिलांचा जो मनोरा तयार केला जातो ती एक समानतेची गोष्ट आहे पण तिथे तुम्ही स्त्रियांना वेडे वाकडे डान्स करवाल तर ते मला योग्य वाटत नाही. जिथे जे योग्य वाटतं तेच करावं. ऑन अमृता फडणवीस यांच्या मुंबईत झालेल्या कार्यक्रमातील गोंधळ # मला माहित नाही ती स्त्री कुठून आली, ती अचानक आली आणि गायब पण झाली. बीच क्लब समोर ज्या गाड्या पार्क केल्या होत्या त्या पंधरा मिनिटात निघून पण गेल्या होत्या, त्यामुळे हे माहीत करावं लागेल की हा पब्लिसिटी स्टंट आहे की तिला खरच त्रास झाला0
0
Report
पुणे ग्रामीण पुलिस ने 14 लाख के माल के साथ 14 घरफोड़िए गिरफ्तार
Shirur, Maharashtra:महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत घरफोड्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. दीपक भीमराव दांडगे असं या २४ वर्षीय आरोपीचं नाव असून, पोलिसांनी त्याला अमरावतीतून ताब्यात घेतलं आहे. आरोपीकडून तब्बल १८ तोळे सोने आणि दुचाकी असा एकूण १४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्यावर दोन राज्यांत मिळून घरफोडीचे तब्बल १४ गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय.0
0
Report
Advertisement
अमृता फडणवीस ने चंद्रपुर के मातोश्री वृद्धाश्रम का दौरा, सेवा ही धर्म
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर में अमृता फडणवीस ने बल्लारपुर मार्गावरील मातोश्री वृद्धाश्रमला भेट दी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काकू शोभाताई फडणवीस यांच्या संस्थेच्या वतीने हा वृद्धाश्रम चालविला जातो. 70 हुन अधिक ज्येष्ठांनी अमृता फडणवीस यांचे उत्साहात स्वागत केले. फडणवीस यांच्या घरात आल्यानंतर शोभाताई कर्तृत्ववान महिलेच्या कामाची छाप आपल्यावर पडल्याचे अमृताबाई म्हणाल्या. सेवा हाच धर्म ही भावना शोभाताई यांच्या मार्गदर्शनाखाली रुजली असल्याचं त्यांनी व्यक्त केलं.0
0
Report
मोदी के विरोधी माहौल के बावजूद क्या कुछ लोग मुद्दे बना रहे हैं? नाना पटोले का बयान
Bhandara, Maharashtra:मोदी है तो मुनकिन है! देशात मोदींविरोधी वातावरण आहे त्यामुळे असे काही मुद्दाम करून घेतात काय असा प्रश्न आहे.. नाना पटोले. नाना पटोले: नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात घुसखोरीचा प्रयत्न झालेला असून PMO कार्यालयाचा बनावट आय कार्ड मिळाला आहे. एकाकडे बंदूक देखील आढळून आले आहे.या वर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हे सर्व सहानुभूतीसाठी मुद्दामहून करतात काय असा प्रश्न उपस्थित केला आहे. देशात मोदी विरोधी वातावरण आहे आणि मुद्दामहून वातावरणाला वळण देण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने केला जात असल्याचे सांगितले आहे.0
0
Report
नालासोपारा पश्चिम के जिला परिषद स्कूल में खिचड़ी कुकर फटा; तीन घायल
Vasai-Virar, Maharashtra:नालासोपारा पश्चिमच्या जिल्हा परिषद शाळेत खिचडीचा कुकर फुटला; दोन विद्यार्थी व महिला जखमी\n\nनालासोपारा पश्चिम येथील जिल्हा परिषद शाळेत आज दुपारी साडेएकच्या सुमारास कुकर फुटल्याने मोठा अपघात झाला. या घटनेत दोन विद्यार्थी आणि एक महिला जखमी झाली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, शाळेत दररोजप्रमाणे दुपारच्या भोजनाचे वाटप सुरू होते. यावेळी विद्यार्थी जेवण घेण्यासाठी रांगेत उभे होते. त्याचवेळी अचानक कुकरचे झाकण उडाले आणि कुकरमध्ये शिजत असलेली गरम खिचडी आजूबाजूला उडाली. या गरम खिचडीच्या संपर्कात आल्याने दोन विद्यार्थी आणि एक महिला जखमी झाले.\nजखमी विद्यार्थ्यांची नावे आयुष चौधरी आणि गौतम प्रसाद अशी आहेत, तर जखमी महिलेचे नाव पूनम मंगेश कदम असे असल्याची माहिती मिळाली आहे.\nघटनेची माहिती मिळताच वसई-विरारचे महापौर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले.0
0
Report
Advertisement
