icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

तळेगाव गणेशोत्सव पर पुलिस की कड़ी नजर

Varsoli, Maharashtra:Headline: तळेगावच्या गणेशोत्सवावर पोलिसांची करडी नजर डीजे-लेझरला कडक विरोध Anchor : तळेगाव दाभाडेतील गणेश मंडळांच्या आढावा बैठकीत पोलिसांनी डीजे आणि लेझरच्या वापराबाबत कडक भूमिका घेतली आहे. गणेशोत्सव शिस्त, सुरक्षा आणि समन्वयाने साजरा करण्याचे आवाहन करत, मिरवणुकीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कडक कारवाईचा इशारा पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी दिला आहे. डीजेच्या कर्कश आवाजामुळे ज्येष्ठांसह तरुणांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याने डीजे पूर्णपणे बंद करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली. डीजेऐवजी टाळ-मृदंगासारख्या पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले. VO : यंदा डीजे आणि लेझरच्या वापरावर पोलिसांची करडी नजर राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले.
0
0
Report

कोयना डैम 100% भर गया; पिछले साल से 17 दिन पहले ओवरफ्लो

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोयना धरण शंभर टक्के भरले; गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल १७ दिवस आधीच ओव्हरफ्लो.. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाणारे कोयना धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरले आहे.. ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असूनही पाणलוט क्षेत्रातील सततच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्याने १०५.२५ टीएमसीचा टप्पा गाठत १०० टक्के पातळी गाठली आहे.. विशेष म्हणजे,गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल १७ दिवस आधीच हे धरण ओव्हरफ्लो झाले असून,यामुळे राज्यावरील पाणी आणि वीजनिर्मितीचे संकट टळल्याने मोठा दिलासा मिळाला आहे..
0
0
Report

राष्ट्रीय स्तर की कुश्ती खिलाड़ी अश्विनी पौळ ने तीन बच्चों के साथ नेळदुर्ग किले से छलांग लगाई

Dharashiv, Maharashtra: धाराशिव: राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी ३ लहान मुलांसह ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून घेतली १०० फूट खाली उडी. आईसह दोन मुलांचा मृत्यू, एक मुलगी मृत्यूशी झुंजतेय धाराशिवमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटूने आपल्या तीन लहान मुलांसह ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून १०0 फूट खोल दरीत उडी घेतली आहे. या थरकाप उडवणाऱ्या घटनेत कुस्तीपटू अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू, तर अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांती नावाच्या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू.जुळ्या मुलींपैकी दुसरी मुलगी वीरा ही गंभीर जखमी असून, तिच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू. अश्विनी मनोहर पौळ असे या महिला कुस्तीपटूचे नाव असून, राष्ट्रीय स्तरावर कुस्तीत नाव कमावलेल्या अश्विनी पौळ यांनी आपल्या कारकिर्दीत ५ सुवर्ण आणि ६ रौप्य पदके जिंकून महाराष्ट्राचा गौरव वाढवला होता. मात्र मुलांना घेऊन आत्महत्याच टोकाचे पाऊल उचललेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि क्रीडा जगतातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.पती आणि सासरच्या मंडळींच्या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळूनच मुलीने आत्महत्या केल्याचा अश्विनी यांच्या वडिलांचा गंभीर आरोप; पोलीस करत आहेत चौकशी.
0
0
Report
Advertisement

शिर्डी में भास्कर जाधव ने परिवार के साथ साईंबाबा के दर्शन किए

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी : राज्यात राजकीय वातावरण तापले असताना भास्कर जाधव साईचरणी लीन पत्नी, कन्या आणि नातीसह घेतले शिर्डीतील साईबाबांचे दर्शन; महाप्रसादाचाही घेतला लाभ अँकर : राज्यात राजकीय वातावरण तापले असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी शिर्डी येथे श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. पत्नी, कन्या आणि नातीसह त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, जनसंपर्क अधिकारी लोखंडे आणि सहकाऱ्यांनी त्यांचे आपुलकीने स्वागत केले. मंदिरातील विविध कक्षांची माहिती घेतल्यानंतर भास्कर जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी श्री साईंच्या महाप्रसादाचाही लाभ घेतला. सुमारे दोन तास साईबाबांच्या दरबारात घालवल्यानंतर मन अतिशय प्रसन्न झाल्याची भावना भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.
0
0
Report

यवला के उपजिला अस्पताल का विस्तार: 30 से 100 बिस्तर, नई सुविधाएं लागू

Yeola, Maharashtra:अँकर:-मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघ असलेल्या येवला शहरातील उपजिल्हा रुग्णालयाबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या यावेळी यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनी तक्रारीची शहानिशा करण्यासाठी रुग्णालयाला भेट घेऊन वैद्यकीय अधिकारी सोनवणे यांच्याकडून माहिती घेतलीदरम्यान यापूर्वी येवल्यात ग्रामीण रुग्णालय कार्यरत होते मंत्री छगन भुजबळ यांनी मतदार संघाची धुरा सांभाळल्यानंतर सर्वात प्रथम आरोग्य सुविधा भर देत 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर 100 खटांच्या उपजिल्हा रुग्णालयात केलेत्यानंतर या ठिकाणी अस्थिरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, श्री रोग तज्ञ, जनरल फिजिशन ,बालरोग तज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली असून अपघात विभाग हा 24 तास कार्यरत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली या ठिकाणी सिटीस्कॅन सुविधा, सोनोग्राफी, एक्स-रे, अशा सुविधा देखील उपलब्ध असून कोविड काळात नाशिक जिल्ह्यातला पहिला ऑक्सिजन प्लांट या रुग्णालयात बसवण्यात आला आहे शेकडो नागरिक येथील सुविधेचा फायदा घेत असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी दिली
0
0
Report
Advertisement

Onion Express led to price drop, farmers struggle with concerns

Yeola, Maharashtra:कांद्याच्या दरात दररोज होत असलेल्या चढ-उतारामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.. त्यातच गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या ढगाळ हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून, चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने चाळीत साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडून खराब होत आहे.. कांदा साठवणुकीचा कालावधी वाढल्याने उत्पादन खर्चही वाढत असून, शेतकऱ्यांवर आर्थिक अडचणीत वाढत असतांना अशातच कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमधील कांदा दिल्ली आणि चेन्नईसारख्या बाजारपेठांमध्ये ‘कांदा एक्सप्रेस’च्या माध्यमातून पाठवला यानंतर बाजारभावात सुमारे ५०० ते ६०० रुपयांची घसरण झाल्याचे शेतकऱ्यांने कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य आणि समाधानकारक बाजारभाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडून केली जात आहे
0
0
Report

मतदाता सूची के गहन पुनरीक्षण में सुनवाई सभी के लिए सुनिश्चित करने के निर्देश

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मतदार यादीदेखील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पुढच्या म्हणजेच सुनावणीच्या टप्प्याबाबत मतदार नोंदणी अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांचे प्रशिक्षण छत्रपती संभाजी नगर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले. मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात प्रारूप मतदार याद्यांच्या प्रसिद्धी पश्चात आता जुळवणी न झालेले, विसंगती वा तफावत असणाऱ्या मतदार तपशिलाबाबत संबंधित प्रत्येक मतदाराला सुनावणीची संधी कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.. नागरिकांनी मतदार यादीतील आपले नाव आणि अन्य तपशील तपासावेत. पात्र असूनही नाव समाविष्ट नसल्यास वेळेत दावा दाखल करावा. तसेच आक्षेपार्ह अथवा अपात्र नोंद आढळल्यास त्याबाबत हरकत नोंदवावी, झाले जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
0
0
Report
Advertisement

सोलापुर के रामलाल चॉल में सभामंडप के भूमिपूजन का सफल कार्यक्रम

Solapur, Maharashtra:सोलापूर - शहरातील रामलाल चाळ येथे सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न. शहरातील रामलाल चाळ येथे सभामंडप उभारण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली. आ. देवेंद्र कोठे यांच्या हस्ते सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. भजन, कीर्तन, लहान मुलांवर संस्कार वर्ग अशा विविध कामांसाठी सभामंडपाचा वापर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सोलापूर शहरासाठी भरघोस निधी दिला जात असून शहराच्या विकासासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास यावेळी आ. देवेंद्र कोठेनीं व्यक्त केला.
0
0
Report

नवी मुंबई: वाशी में अतिक्रमण विभाग की कार्रवाई, मार्जिनल स्पेस सहित अवैध निर्माण ढाहे गए

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे वाशी मध्ये मोठी कारवाई कारण्यात आलेय. पहिल्यांदाच दुकानदारांच्या मार्जिनल स्पेस सोबतच वाढीव बांधकामांवर देखिल कारवाई करण्यात आलेय. दुकाना बाहेर करण्यात आलेल्या काचेच्या बांधकामांना तात्काळ काढण्याचं आदेश देण्यात आले असून अन्यथा तोडक कारवाई केल्याचा इशारा दिल्याने व्यापारी धास्तावले आहेत. व्यापाऱ्यांनी स्वतःच काचेचे वाढीव बांधकाम काढण्यासाठी सुरुवात केली असून या कारवाईमुळे फुथपाथ पूर्णपणे मोकळे झालेत.
0
0
Report

मीरा-भाईंदर में पर्युषण के दौरान आठ दिन मांस विक्रय बंद कराने की मांग

Mira Bhayandar, Maharashtra:मीरा भाईंदर मध्ये पर्युषण काळात 8 दिवस मांसविक्री बंद ठेवा! मिरा-भाईंदरमध्ये भाजप नगरसेवकाची प्रशासनाकडे मागणी जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर मांसविक्रीची दुकाने आठ दिवस बंद ठेवण्याची मागणी भाजप नगरपालिका भरत कोठारी यांनी आयुक्तांकडे केली मागणी जैन समाजाच्या धार्मिक भावना, अहिंसेचा संदेश आणि जीवदयेची भावना लक्षात घेऊन निर्णय घेण्याची मागणी सरकारी आदेशानुसार पर्युषण काळात केवळ दोन दिवस मांसविक्री बंद ठेवण्याची तरतूद मात्र भाजपकडून 8 ते 16 सप्टेंबर आठ दिवस मांसविक्रे बंद ठेवण्याचा आग्रह यामुळे मिरा-भाईंदरमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता
0
0
Report
Advertisement

बिना हेलमेट दोपहिया चालकों के खिलाफ पुलिस अभियान, चार घंटे में 4746 चालान

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत कारवाईचा बडगा सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहिला. गुरुवारी कार्यालयीन वेळेत सकाळी आणि सायंकाळी मिळून चार तासांत वाहतूक शाखा व स्थानिक पोलिसांनी ४ हजार ७४६ दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई करून हेल्मेट परिधान करण्याचा सल्ला दिला. रस्ते अपघातातील जीवितहानी टाळण्यासाठी राबवलेल्या या मोहिमेमुळे शहरातील मुख्य चौक व रस्त्यांवर विनाहेल्मेट फिरणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे。
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top