411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
यवतमाळ अर्णी में PWD की देरी से नाली जाम, दुकानों में पानी घुसा, नुकसान
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ च्या आर्णी शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका व्यवसायिकांना बसला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहरात रस्त्याच्या बाजूने नालीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम पावसाळ्यात हाती घेण्यात आल्याने तसेच अतिशय संथ गतीने सुरू असून, पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. परिणामी नाली तुंबल्याने पावसाचे वाहून जाणारे पाणी माहूर मार्गावर असलेल्या बेसमेंट मधील दुकानांमध्ये शिरले परिणामी दुकानातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बांधकाम विभाग अथवा संबंधित कंत्राटदाराने व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.0
0
Report
शिंदे गट के आ.बच्चू कडू ने दिव्यांग भाइयों के लिए स्टॉल का उद्घाटन किया
Shirdi, Maharashtra:शिवसेना शिंदे गटाचे आ.बच्चू कडू यांच्या हस्ते प्रहार संघटनेच्या दिव्यांग बांधवांसाठी स्टॉलचे उद्घाटन.. स्टॉलच्या उद्घाटनानंतर आ.बच्चू कडू यांनी घेतलं साईबाबांच्या समाधीचे दर्शन.. आ.बच्चू कडू बाईट मुद्दे - ऑन स्टॉल उद्घाटन dिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी सरकारने आणि नगरपालिकेने उपलब्ध करून दिल्या पाहिजे... या मागणीसाठी प्रहारच्या माध्यमातून सातत्याने आम्ही भांडत असतो... शिर्डी नगरपालिकेने दिव्यांग बांधवांसाठी स्टॉल उपलब्ध करून दिले , मी प्रशासन आणि नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांचे आभार मानतो... पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी देखील हा उपक्रम राबविला त्यांचे देखील मी आभार मानतो... नगरपालिका हद्दीतील एकूण दुकानांच्या पाच टक्के वाटा दिव्यांग बांधवांना मिळावा... या मागणीचे नवीन धोरण सरकारकडे आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय... अधिवेशनात या मागणीचा प्रस्ताव आम्ही ठेवलाय... ऑन FDA कारवाई तुकाराम मुंढे यांनी दूध भेसळीच्या कारवाईबाबत जो निर्णय घेतलाय ज्या कारवाई सुरू आहे त्याबाबत मी त्यांचे आभारच मानले... एखाद्या पदार्थात भेसळ करणं हे एखादा खून करण्यासारखं... अन्नभेसळ करणाऱ्यांवर खुनापेक्षाही मोठा गुन्हा दाखल झाला पाहिजे... रुग्णालयातील रुग्णांच्या वाढत्या संख्येला कारणीभूत पर्यावरण आणि भेसळीचे कारण आहे... पंकजा मुंडे पर्यावरण मंत्री आहेत आणि तुकाराम मुंढे अन्न प्रशासन विभागाचे आयुक्त... दोनन्ही मुंडेनी व्यवस्थित काम करायला हवं.... तुकाराम मुंढे व्यवस्थित काम करताय , मात्र दुसऱ्या मुंडेंनी चांगल्या पद्धतीने काम केल्यास चांगले रिझल्ट बघायला मिळतील... ऑन कॉकरोच जनता पार्टी आंदोलन कॉकरोच जनता पार्टीने जो मुद्दा हाती घेतला तो मुद्दा महत्त्वाचा... ते जरी सत्तेच्या विरोधात असतील तरी त्यांनी जो मुद्दा घेतलाय तो महत्वाचा... मी या आंदोलनाचं आणि मुद्द्याचं समर्थन करतोय... सरकारने या प्रश्नांवर दुरुस्ती करणे गरजेचे आहे... शेती मालाला भाव नाही , मोठ्या उद्योगमुळे छोटे व्यवसाय चालत नाही , युवकांना शासकीय नोकरीशिवाय पर्याय नाही... नोकरीमध्ये जर करप्शन होत असेल तर ते बंद झालं पाहिजे... सरकार विरोधात त्यांनी आंदोलन केलं म्हणजे ते आमचे विरोधक आहेत असं समजणारा मी नाही... हा देश आंदोलनातूनच उभा राहिला... सत्ताधाऱ्यांनी या आंदोलनाचा राग करणं योग्य वाटत नाही... तरुणांची शक्ती राष्ट्रीय कार्यासाठी कशी वळवता येईल याचा प्रयत्न झाला पाहिजे... ऑन ठाकरे बंधू काही बुवांनी संस्कृती नासवली त्यांच्याबद्दल काही शंकाच नाही.. खरात बुवा झाला आणि त्यांनी काय वाटोळं केलं हे राज्याला माहिती , अश्या बुवांना चटके दिले पाहिजे... ऑन बाबा रामदेव आपल्या भारताची व्यवस्था टिकवून आणि त्या व्यवस्थेला रोजगार देणे गरजेच... रामदेव बाबा जर मिरची पावडर काढत असतील तर छोट्या बचत गटाची मिरची पावडर कोण घेणार.? मोठ्या उद्योगपतींना बंधन टाकलेच पाहिजे... बंधन करण्यासाठी अशासकीय कायदा करावा अशी मागणी मी विधान परिषदेत करणार आहे... ग्राम उद्योग आणि लहान उद्योग छोट्या माणसाच्या हातून जाता कामा नये... श्रीमंताच्या हाती उद्योग गेल्यास छोट्या व्यवसायिकांना भेटणारा रोजगार देखील जातो... ऑन सत्ताधारी सत्ताधारी म्हणजे आम्हालाही दोन शिंग फुटत नाही... माध्यमांना असं वाटतं सत्तेचा झाला म्हणजे दोन शिंगं फुटले आणि तो मारायला बाहेर निघाला , अस काही होणार नाही... विचाराची लढाई ही कुठेही गेलं तरी विचार घेऊनच लढणार आहोत... शेतकऱ्यांचे प्रश्न असतील दिव्यांगांचे प्रश्न असतील छोट्या व्यवसायिकांचे प्रश्न असतील जो व्यक्ती पीडित आहे त्याच्यासाठी मी सत्तेत आहे म्हणून बोलायचं नाही हे मला माझ्या आयाने शिकवलं नाही.... ऑन मनोज जरांगे आंदोलन मी ठरवलं आहे कुठल्याही आरक्षणाच्या आंदोलनात बोलू नये कारण मी शेतकरी.. शेतकरी सगळ्या जातीचे आहेत... आरक्षणाच्या एका बाजूने बोललं तर नाराजी होती त्यामुळे शेतकरी विषय सोडून कुणाच्याही आरक्षणाच्या आंदोलनात नाक खुपसणे बरोबर वाटत नाही... आरक्षणाच्या लढाई पेक्षा मोठी लढाई शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची हमीभावासाठी आम्ही लढू.. माध्यम प्रतिनिधींना देखील एका चांगल्या नावाचा रोग लागलेला दिसतोय ते नाव सोडून दुसरा विचार केला तर बरं होईल... मनोज जरंगे हे फक्त मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट करतात..? या प्रश्नावर आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया.. Byte - आ.बच्चू कडू , शिवसेना शिंदे गट0
0
Report
नागपूर में NSUI ने भाजपा सांसद के खिलाफ प्रदर्शन, Ayush Navle ने सरकार पर निशाना
Nagpur, Maharashtra:नागपुरात भाजपा खासदार कडणार यांच्याविरुद्ध आंदोलनादरम्यान एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनासाठी परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष आयुष नवले यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर टीका केली. पन्ना राणवत यांनी काल जेन झीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या विरुद्ध आज काँग्रेसने आंदोलन केले.0
0
Report
Advertisement
मिरज पंचायत समिति के नामकरण पर महाविकास आघाडी और भाजपा के बीच विवाद
Sangli, Maharashtra:मिरजेच्या नूतन पंचायत समिती इमारतीला आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले. श्रेयवादाच्या राजकारणातून दोन वेळा उद्घाटन झालेल्या मिरज पंचायत समितीच्या नावावरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे.मिरज तालुक्यातील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांकडून मिरज पंचायत समितीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,असं नाव अचानकपणे देण्यात आले आहे.नुकतंच या इमारतीच्या लोकार्पण वरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद रंगला होता,यातून जयंत पाटील विशाल पाटील यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीकडून उद्घाटन झालं होतं,त्यापाठोपाठ भाजपाकडून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं होते.या पंचायत समितीला नाव देण्यावरून देखील माहाविकास आघाडी आणि भाजपमध्ये वाद सुरू होता,यावर मिरज तालुक्यातील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी मिरज पंचायत समितीच्या कार्यालयावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नावाची अक्षर लावून,पंचायत समितीला डॉक्टर भारतरत्न आंबेडकर असं नाव देण्याचा ठराव करण्यात यावा अशी मागणी केली आहे.0
0
Report
ओबीसी हक़ों पर सरकार की धार, विरोध तेज, सड़क पर उतरेगा
Nagpur, Maharashtra:नागपूर - जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या दबावात येऊन सरकराने ओबीसीच्या हक्कावर गदा आणली, तर संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल..सरसकटला आमचा विरोध - ५८ लाख नोंदी नव्या नाहीत, भारत स्वतंत्र झाला तेव्हापासूनच्या नोंदी आहेत - यापैकी ३८ लाख नोंदी विदर्भातल्या आहे. हे पिढीजात कुणबी आहें त्यांना आधीच कुणबी प्रमाणपत्र मिळालेय - जोपर्यंत वंशावळीनुसार कुणबी नोंद नाही, तोपर्यंत ओबीसी प्रमाणपत्र देऊ शकत नाही - जरांगे पाटील ओबीसी समाजाची दिशाभुल करत आहे - चुकीच्या माणसांना कुणबी प्रमाणपत्र राष्ट्रीय ओबीसी महासंघ देऊ देणार नाही0
0
Report
श्रीरामपुर पुलिस स्टेशन के बाहर हिंसक हमला, दो अल्पवयस्क जख्मी
Shirdi, Maharashtra:श्रीरामपुर शहर में कानून-व्यवस्था का प्रश्न फिर से सामने आ गया है. श्रीरामपुर पुलिस थाने के दरवाजे पर शिकायतकर्ता के साथ जबरदस्त मारपीट की घटना सामने आई. श्रीरामपुर शहर पुलिस थाना के प्रवेशद्वार पर दो युवकों पर धारदार हथियार से हमला किया गया. इस मारपीट में दोनों गम्भीर रूप से घायल हैं. दाखिल किए गए मुकदमे को वापस लेने के लिए आरोपी के परिवार वालों ने पिड़ित परिवार पर दबाव डालने की कोशिश की, इसी वजह से पिड़ित परिवार के युवक श्रीरामपुर पुलिस थाने पहुंचे थे. जख्मी दोनों अल्पवयस्क हैं; अस्पताल में उपचार जारी है. शहर पुलिस ने नौ लोगों के खिलाफ मारपीट का मामला दर्ज किया है; तीन को गिरफ्तार किया गया.0
0
Report
Advertisement
निलेश कोतकर सड़क दुर्घटना में निधन: गड्ढों से भरी सड़क पर पानी भरा
Nashik, Maharashtra:28 तारखेला निलेश कोतकर याचा सातपूर अंबड लिंक रोडवरील एक्स्ट्लो पॉईंट येथे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात झाला होता आणि उपचारादरम्यान मृत्यू झालाय... ज्या ठिकाणी हा अपघात घडला आहे त्या ठिकाणी दोन्ही बाजूला पाणी साचले असून रस्त्याच्या आजूबाजूला खड्डे पडलेले आहेत आणि याच खड्ड्यामुळे निलेश चा अपघात झाला होता... अपघात झाल्यानंतर ज्या पोलिसांनी निलेश कोतकर ची मदत केली, त्या ठिकाणाहून आढावा घेत पोलिसांची बातचीत झाली आहे, आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...0
0
Report
कर्जमुक्ति योजना से 2.33 लाख किसानों को मिलेगा लाभ, ईकेवाईसी में सुगमता मांग
Ahilyanagar, Maharashtra:राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली आहे... अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2 लाख 33 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून यातील पहिल्या टप्प्यात 1 लाख 32 हजार 734 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे... यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी पूर्ण करायची आहे... जिल्ह्यातील जवळपास 70 टक्के शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली आहे...केवायसी करण्यासाठी वेळ लागत आहे... इंटरनेटची समस्या किंवा सर्व्हरडाऊन या समस्यांमुळे शेतकऱ्यांना सेतू सुविधा केंद्रावर चार-पाच वेळेस हेलपाटे मारावे लागत आहेत... त्यामुळे सेतू सुविधा केंद्रावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे...सर्व्हर डाऊन समस्या लवकर कमी व्हावी आणि ई केवायसी पूर्ण व्हावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.0
0
Report
कोल्हापूर में किसानों को कर्जमाफी से राहत, घोटालों और राजनीति गरमाई
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील प्रेस मुद्दे ऑन कर्जमाफी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचा निर्णय सरकारने घेतला.. कर्जमाफी थकीत राहिली तर शेतकरी अडचणीत येतील म्हणून सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले..वीजबिल थकबाकी देखील सरकारने माफ केली. एका कोल्हापूर जिल्ह्यातील 1161 कोटी 2 लाख 55 हजार 168 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ.. प्रत्यक्ष जिल्ह्यात कर्जमाफीची संख्या कमी आहे, पण अनुदान मिळणाऱ्या शेतकऱ्याची संख्या अधिक ऑन अपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना वाटत असेल त्यांची कर्जमाफी अपूर्ण झालेली नाही. पण दोन लाखाच्या आत ज्यांचं कर्ज आहे त्यांची कर्जमाफी होणारच. ऑन राजू शेट्टी वीज बिल माफी घोटाळा आरोप करणाऱ्यांनी त्यांनी तेांचे मुद्दे मांडावेत.. घोटाळा झाला असेल तर त्यांनी सांगावे.. सध्या देशात आणि राज्यात हवेत बार मारणाऱ्यांची संख्या अधिक झाली आहे.. ते म्हणतात घोटाळा झाला आहे, आम्ही म्हणतो घोटाळा झाला नाही.. ऑन गोकुळ निवडणूक अनेक संस्था ह्या घटनेप्रमाणे स्वायत्त असतात. स्वायत्त असणाऱ्या संस्थांमध्ये सरकारने हस्तक्षेप करायचा नसतो. सहकारांमधल्या निवडणुका घेण्यासाठी सहकार प्राधिकरण आहे. ते त्यांचे अधिकार आहेत. सहकार प्राधिकरणाला हायकोर्टाचा निर्णय पोहोचला. जर सहकार प्राधिकरणाला इतक्या घाई मध्ये निवडणुका घेणं शक्य नसेल तर ते कोर्टात जातील.. सहकार प्राधिकरण आधीच मुदतवाढ मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात गेले आहे. कोर्टाने त्यांची विनंती फेटाळली तर त्यांना ओढाताण करून निवडणूक घ्यावी लागेल. याबाबत निवडणुका संदर्भात उत्तर देण्याची जबाबदारी माझी नाही, ती प्राधिकरणाची आहे. ऑन तुकाराम मुंढे तक्रार तक्रारी खऱ्या असतील तर त्याची दखल मुख्यमंत्री घेतील.. त्यांनी कुठे कुठे धाडी मारल्या.. काय कारवाई केली हे ठीक आहे.. पण दूध या विषयात या माणसाने बोगस दूध सर्व बंद केले. बोगस दुधामध्ये फक्त पाणी नाही तर शरीराला घातक असणारे अनेक रसायन आहेत. अस असताना देखील त्यांच्याबद्दल कंप्लेंट असू शकतात.. ऑन अमित शहा राजीनामा लोकशाहीची ब्युटी अशी आहे.. तुम्ही देखील आरोप करू शकता. ते तर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत.. आरोप केले म्हणजे ते सर्व खरं असतं असं नाही.. दिल्ली पोलिसांनी फार मोठा रिपोर्ट तयार केला आहे.. तो पाहिला तर आपल्याला चक्कर येईल. ज्यांना पकडलं ते कोणकोणत्या गुन्ह्यात होते त्याचं पोलिसांनी विश्लेषण केल आहे. पोलिसांनी सांगितल्या आहे, तिथे पडलेले प्रत्येक दगड उचलले आहे.. त्या दगडावर असणारे फुट प्रिंट आधारशी लिंक होतील. एका बाजूने राहुल गांधी आरोप करत आहेत.. अमित शहा यांनी हा लाठीचार्ज करायला लावला.. दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आकडेवारी दिली आहे. याबाबत पोलिसांना देखील प्रूव्ह करावं लागेल आणि राहुल गांधी यांना देखील प्रूव्ह करावा लागेल. On हाताळण्यात गृहमंत्रालय अपयशी परदेशातील मदत.. काही बॅड एलिमेंट असणं.. अशी माहिती असल्यामुळेच आपण व्यवस्थित सर्व गोष्टी हाताळत होतो.. जोपर्यंत ते संसदेकडे गेले नाहीत, तोपर्यंत त्यांना कोणी काही केले नाही... पण ज्या वेळेला ते संसदेकडे निघाले ही कळालं, त्यावेळी ते संसदेमध्ये घुसले असती तर काय स्थिती झाली असती, याचा विचार तुम्ही करा. ऑन राहुल गांधी इशारा माहित नाही याचा विचार करणारे करतील.. तुम्हाला आणि मला स्वतःला असं समजावता आलं पाहिजे.. आपल्याला शेतकरी कर्जमाफीवर बोलायला सांगितले आहे तर त्यावर बोलायचं.. शेतकरी कर्जमाफीवर बोलायचं ठरला आहे तर त्यावरच दोघांनी बोललं पाहिजे. मला वाटतं कर्जमाफी हा विषयात शेतकरी जेवढा समाधानी आहे तेवढं तुम्ही देखील समाधानी आहात.. त्यामुळे तुम्हाला इतर प्रश्न विचारायचे असतील. ऑन ईचलकरंजी भाजपा अंतर्गत धुसफूस दोन जिवंत माणसे, जिवंतपणे काम करतात.. झोपा काढत नाहीत. त्यावेळी काहीतरी असतं.. त्यावेळी कुटुंबप्रमुख त्यांना बोलून घेतात आणि तोडगा काढतो. मग ते पेल्यातील वादळ ठरतं. ऑन मराठी भाषा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर, जे जे करायला पाहिजे तो ते निर्णय घेतलाय. राज्य म्हणून निधीची मागणी करावी लागते. जिथं जिथं मराठीला सक्षम करावं लागणार आहे तिथे तिथे मराठी सक्षम केली आहे. पुण्यामध्ये जे साहित्य संमेलन घ्यायचं आहे, त्याला खूप मोठं बळ देण्याचाही सरकारने ठरवले आहे.0
0
Report
Advertisement
wardha: राजस्थान के दो शातिर चाकू दिखाकर लूट की कोशिश के आरोप में गिरफ्तार
Wardha, Maharashtra:चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्यांना अटक; राजस्थानातील दोन सराईत आरोपी वडनेर पोलिसांच्या जाळ्यात वर्धा जिल्ह्यातील वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकूचा धाक दाखवून जबरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या राजस्थानातील दोन सराईत आरोपींना वडनेर पोलीसांनी अवघ्या काही तासांत अटक केली. सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण, टोल नाक्यांवरील तपासणी आणि तातडीच्या नाकाबंदीच्या मदतीने ही उल्लेखनीय कारवाई करण्यात आली. विवो - गुणवंत वसंतराव झाडे (रा. छोटी आर्वी, ता. हिंगणघाट) हे पत्नीवर उपचार करून गावी परतत असताना अज्ञात आरोपींनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींच्या वाहनाचा माग काढण्यात आला आणि नाकाबंदी करून विशालसिंग दयालसिंग गवारिया (वय 26, रा. भिलवाडा, राजस्थान) व सांवरमल माधवलाल लोहार (वय 25, रा. भिलवाडा, राजस्थान) या दोघांना अटक करण्यात आली. आरोपी वाहनांची ओळख लपवण्यासाठी विविध राज्यांच्या नंबर प्लेटचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून महिंद्रा XUV-500 वाहन, विविध राज्यांच्या नंबर प्लेट, मोबाईल फोन, फास्टॅग तसेच धारदार चाकू असा एकूण ₹12.68 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.0
0
Report
सोलापूर विद्यापीठ दीक्षांत समारोह में सिनेट सदस्यों का गुस्सा, आसन-व्यवस्था पर हंगामा
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमात सिनेट सदस्यांचा गोंधळ - सोलापूर विद्यापीठातील सिनेट सदस्यांचा राज्यपालांसमोर संताप - सिनेट सदस्यांना आसन व्यवस्था न केल्यामुळे सिनेट सदस्यांचा व्यासपीठासमोरच ठिय्या - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात सिनेट सदस्यांची कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्यावर व्यक्त केली तीव्र नाराजी0
0
Report
मालेगाव रेल हादसे में दो लोगों की मौत, शवों की जांच जारी—पुलिस investigating
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूर जिल्ह्यातील मालेगाव टाऊन भागात रेल्वेखाली येऊन अपघातात दोघांचा मृत्यू मालगाडी थोड्यावेळापूर्वी गेली असून दोघेही रेल्वे खाली आलेल्या अवस्थेत आढळले प्राथमिक अंदाजानुसार दोघे शेतात गेले होते, यात नेमका अपघात आहे की आत्महत्या तर्कवितर्क लावले जात आहे. सावनेर पोलीस घटनास्थळी दाखल, नेमकं काय घडलं याची माहिती घेणं सुरू शरीराचे अवयव गोळा करून शवविच्छेदनास पाठवणार.. सावनेर पोलीस घटनास्थळी पोहोचून नेमकं काय घडलं याचा शोध घेणे सुरू...अद्याप काय झालं अस्पष्ट0
0
Report
Advertisement
नागपूर के मंदिर में दानपेटी चोरी: पुजारी ने हाथ जोड़कर माफी मांगी
Nagpur, Maharashtra:नागपूर मंदिराच्या दानपेटीतून चोरट्यांनी पैसे केले साफ मात्र तत्पूर्वी हात जोडून म्हटले देवा आम्हाला कर माफ... नागपूरातील चोरट्यांची मंदिरात चोरी करतानाची घटना सीसीटीव्ही चित्रित लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीतील मालधक्का रोडजवळ शीतला माता मंदिर व त्याच्या शेजारील मंदिरात 27 तारखेला सकाळी चोरी झाल्याचे उघडकीस आले.. या मंदिरातील पुजाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 तारखेला सकाळी ते मंदिरात आले असता मंदिराचे कुलपे तुटलेली दिसली... यावेळी सीसीटीव्ही तपासले असता दोन चोरटे शीतला माता मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरत असल्याचे दिसून आले दानपेटीतून पैसे चोरी करण्यापूर्वी दोन पैकी एका चोराने आधी हात जोडून मागितली देवाची माफी आणि मग केले मंदिरातील दानपेटीतून पैसे साफ या घटनेनंतर लाकडकंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.. यापूर्वी सुद्धा मंदिरातून चोरट्यांनी चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत0
0
Report
मुंबई-गोवा महामार्ग की हालत बदतर, गड्ढे-चिखल से यात्री परेशान; टोल वसूल की तैयारी
Wada Thikanat, Maharashtra:रत्नागिरी.. मुंबई-गोवा महामार्ग रखडलेलाच;खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य असूनही टोल वसुलीची तयारी! गेली १७ ते १८ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही अपूर्णच असल्याने कोकणवासीयांसह प्रवाशांचे प्रचड हाल होत आहेत... संगमेश्वर ते लांजा दरम्यान रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असून उखडलेले रस्ते,भेगा आणि चिखलाच्या साम्राज्यामुळे नागरिकांना रोजच मनस्ताप सहन करावा लागत आहे.. मंत्री आणि सरकारकडून वेळोवेळी मिळणाऱ्या आश्वासनांनंतरही प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे असून अनेक ठिकाणी काम ठप्प झाले आहे.. महामार्गाची ही दैना उघडी पडलेली असतानाच दुसरीकडे टोल वसुलीची तयारी सुरू असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..0
0
Report
वाशिम जिले में बारिश नहीं, जल संकट गहराने की आशंका
Washim, Maharashtra:वाशीम: वाशीम जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही.आज सकाळपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाने काहीसा दिलासा दिला असला,तरी जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्याची स्थिती अद्यापही चिंताजनक आहे.१ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात केवळ २४९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत १७१ मिलीमीटरची तूट आहे. जिल्ह्यातील १६० लघु प्रकल्प आणि दोन मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी केवळ १२.७० टक्के जलसाठा शिल्लक आहे. तर वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात अवघा ४.५१ टक्के पाणीसाठा उरला आहे.त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असून,जिल्ह्याला आता दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची नितांत गरज आहे。0
0
Report
Advertisement
