411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक के म्हसरूल इलाके में दंगे के बाद पुलिस ने छह आरोपियों पर कड़ी कार्रवाई
Nashik, Maharashtra:Nashik breaking म्हसरूळ परिसरात र*** घालणाऱ्या आमचा नाशिक पोलिसांचा कायद्याचा बालक किल्ला * म्हसरूळ परिसरात राडा घालणाऱ्या सहा जणांची नाशिक जिल्हा कायद्याचा बालक किल्ला करत काढली पोलिसांनी धिंड... - दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर परिसरात घातला होता गोंधळ... * दोन्ही गटांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल... * मारामारी, धमकी आणि हत्यार बाळगल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई.... * सहा आरोपींना त्याच परिसरातून पायी फिरवत पोलिसांचा दणका.... * पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरात विश्वासाचे वातावरण निर्माण....0
0
Report
Shirur MP Amol Kolhe targets government, questions tunnel and rail projects
Barav, Maharashtra:डिंभे-माणिकडोह बोगदा, कल्याण-लातूर महामार्ग, पुणे-नाशिक रेल्वे और राज्यातील शेतकरी प्रश्नांवरून शिरूर चे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारवर जोरदार निशाना साधलाय.. डिंभे-माणिकडोह बोगद्याबाबत आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून, तांत्रिक बाबी आणि तालुक्यांचे पाण्याचे आरक्षण स्पष्ट झाल्याशिवाय या बोगद्याला आमचा १०० टक्के विरोध राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच कल्याण-लातूर रस्त्याच्या तिन्ही अलाइनमेंट तपासून शेतकऱ्यांशी चर्चा होईपर्यंत त्याला मंजुरी न देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय डॉ. अनिल काकोडकर यांच्या समितीसमोर डेटा मांडल्यामुळे पुणे-नाशिक रेल्वे सरळ मार्गानेच होईल असा विश्वास व्यक्त करत, राज्यात दररोज होणाऱ्या शेतकरी आत्महत्या आणि महागाईच्या प्रश्नावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला. या सर्व विषयांवर खासदार डॉ. अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले, पाहूयात.0
0
Report
सिंधुदुर्ग के स्कूल में मुदती मसाले और शौचालय में भोजन, 400 बच्चे प्रभावित
Oras Bk., Maharashtra:विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात उघडकीस आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील एका नामांकित विद्यालयात चक्क मुदत संपलेले मसाले वापरले जात होते. तर पोषण आहारासाठी वापरले जाणारे धन्य थेट स्वच्छतागृहात ठेवण्याचा किळसवाणी प्रकार उघडकीस आलाय. शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला असून या विद्यालयात तब्बल 400 मुल शिक्षण घेत आहेत त्यातील 140 मुल दररोज शाळेत शिजवला जाणारा आहार घेत आहेत. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शालेय प्रशासनाला धारेवर धरून कारवाईची मागणी केली तर पालकमंत्री नितेश राणे यांनी या सर्व प्रकारचा तपास सुरू असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्याावर कारवाई होणार असल्याचे सांगितले..0
0
Report
Advertisement
शिंदे समिति के अनुसार मराठवाड़ा में 49 हजार कुणबी नोंदी, रिकॉर्ड की गड़बड़ियाँ उजागर
Nagpur, Maharashtra:महाराष्ट्र सरकारने अनेक वर्ष जुन्या शैक्षणिक, महसुली आणि न्यायालयीन अभिलेखांमध्ये मराठा समाजातील व्यक्तींच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायाधीश संदीप शिंदे समिती स्थापन केली होती... समितीने राज्यभरात 58 लाख पेक्षा जास्त कुणबी अभिलेख शोधल्याचे सांगितले गेले.. त्यापैकी मराठवाड्यामध्ये 49 हजार पेक्षा जास्त कुणबी नोंदी सापडल्याचा दावा ही करण्यात आला होता... काही नाव तर पाच - पाच वेळेलाही आल्याचे दिसून येत आहेत... त्यामुळे नावांच्या पुनरावृत्तीमुळे (रिपीटेशन मुळे) सापडलेल्या कुणबी नोंदीचा आकडा फुगल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे म्हटलं आहे.0
0
Report
येवल्यात गणेश मूर्तियों की कीमत 30% बढ़ी, महंगाई से छोटी मूर्तियों की मांग तेज
Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवल्यात गेल्या काही दिवसांपासून प्लास्टर ऑफ पॅरिस तसेच कच्च्या मालाच्या किमतींमध्ये होत असलेली दरवाढ तसेच महागाई वाढल्यामुळे गणेश मूर्तींच्या किमतीमध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली असून मोठ्या गणेश मुर्त्यांची मागणी महागाई मुळे घटली आहे त्यामुळे येवल्यातील मूर्ती कारागिरांनी छोट्या आकाराच्या मूर्ती बनवण्यावर भर दिला असून महागाई मुळे किरकोळ विक्रेत्यांनी देखील मूर्ती विक्रीमध्ये घट झाल्याची माहिती दिली आहे यासंदर्भात आढावा घेतला आहे आमची प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
पंढरपूर कॉरिडोर विकास से पर्यटन और रोजगार को मिलेगी नई गति
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप सह सर्वपक्षीय नगरसेवकांनी कॉरिडॉर ठरावाला मंजुरी देण्याचा विरोध केल्यानंतर बहु चर्चित पंढरपूर अतिरिक्त क्षेत्र कॉरिडॉर बद्दल ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एक सूचक पोस्ट केली आहे त्यामुळे भविष्यात कॉरिडॉर प्रकल्पाला गती देण्याच्या स्पष्ट संकेत त्यांच्या पोस्ट मधून दिसत आहेत. त्यामुळे नगरपालिकेतून विरोध झाला तरी कॉरिडॉर होणार हे आता स्पष्ट आहे विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल! पंढरपूर हे कोट्यवधी वारकऱ्यांच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे पवित्र केंद्र आहे. या पवित्र भूमीचा विकास करताना वारकरी परंपरा, संस्कृती आणि अध्यात्माचा गाभा जपत, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ₹४,१५०.४६ कोटींचा सर्वसमावेशक पंढरपूर कॉरिडॉर विकास आराखडा साकारला जात आहे. याआराखड्यांतर्गत आधुनिक पायाभूत सुविधा, स्कायवॉक, चंद्रभागा घाटांचा विकास, वारकऱ्यांसाठी अधिक दर्जेदार सुविधा आणि तीर्थक्षेत्राचे नियोजनबद्ध सुशोभीकरण यावर विशेष भर देण्यात आला आहे. हा विकास केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे, पर्यटनाला बळकटी देणे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, हे देखील या प्रकल्पाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. श्रद्धेचा सन्मान, परंपरेचे जतन आणि विकासाची नवी दिशा यांचा समतोल साधत पंढरपूरला जागतिक दर्जाच्या तीर्थक्षेत्राच्या दिशेने नेण्याचा हा महत्त्वाकांक्षी संकल्प आहे.0
0
Report
Advertisement
पुणे मेगा ब्लॉक से त्योहार के दौरान कई ट्रेनें रद्द, इंटरसिटी समेत एक्सप्रेस मार्ग बदले
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - ऐन उत्सवाच्या काळात रेल्वे प्रवासात विघ्न, हुतात्मा, सिद्धेश्वर, इंटरसिटी गाड्या काही दिवस रद्द - ऐन उत्सवाच्या काळात रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बॅड न्यूज - पुण्यातील मेगाब्लॉकचा हजारो रेल्वे प्रवाशांना मोठा फटका - 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरच्या दरम्यान पुण्यातील मेगाब्लॉकमुळे हुतात्मा एक्सप्रेस, सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि इंटरसिटी काही दिवस रद्द - हडपसर ते घोरपडी दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू असल्याने घेण्यात आला मोठा निर्णय - तब्बल 42 रेल्वे गाड्या रद्द तर 25 रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल0
0
Report
विरार में सुरक्षा रक्षक ने राज ठाकरे के खिलाफ अपशब्द बोले; मामला जांच में
Vasai-Virar, Maharashtra:राज ठाकरेंविरोधात अपशब्द; मनसे कार्यकर्त्याने सुरक्षा रक्षकाला सुनावले विरार पश्चिम येथील म्हाडा वसाहतीत देव व्यास नावाच्या सुरक्षा रक्षकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीत झाला असून, संबंधित व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. ही बाब समोर आल्यानंतर मनसेचे विरार शहर सचिव जय जैतापकर यांनी संबंधित इमारतीत जाऊन सुरक्षा रक्षकाला चांगलेच धारेवर धरले. राज ठाकरे यांच्याबाबत अशा प्रकारे अपशब्द वापरणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी सुरक्षा रक्षकाला चांगलाच दम दिला व माफी मागायला लावली... सध्या संबंधित सुरक्षारक्षकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून त्याला कामावरून काढण्यात आले आहे.0
0
Report
बुलढ़ाणा में सूखा गहरा रहा है; किसानों ने कोरडा दुष्काळ घोषित करने की मांग की
Buldhana, Maharashtra:पावसाने पाठ फिरवला, पिकांनी मान टाकली! बुलढाण्यावर दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांची कोरड्या दुष्काळाची मागणी पावसाने पाठ फिरवल्याने संपूर्ण राज्यावर आता दुष्काळाचं सावट गडद होताना दिसतंय... डौलाने उभी असलेली पिकं आता पाण्याअभावी माना टाकू लागली आहेत... सोयाबीन आणि कापसाचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातही परिस्थिती गंभीर बनली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतातील पिकं सुकू लागली असून, शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक पाण्याअभावी वाया जाण्याची भीती असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आता सरकारकडे कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. नेमकी काय आहे शेतकऱ्यांची व्यथा? आणि पावसाअभावी बुलढाण्यात शेतीची परिस्थिती किती गंभीर झाली आहे? जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी0
0
Report
Advertisement
अमरावती में बारिश नहीं, सोयाबीन फसल भारी नुकसान का खतरा
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात पावसाचा अभाव सोयाबीन उत्पादक शेतकर्यांसमोर मोठे संकट बनला आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन लागवड असली तरी पावसाने उघडीक दिल्यानंतर पेरणीच्या फील्ड्सवर अडचण आली आहे. पीक बहरात आल्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेंगा भरल्या नाहीत, ज्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भातकูลि तालुक्यातही स्थिती इतकी गंभीर झाली आहे की काही शेतकर्यांनी शेतात बैलचारण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. पेरणीसाठी बँका- सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या फेडीच्या प्रश्नाने शेतकर्यांची काळजी वाढवली आहे. शासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून पंचनामे करावेत आणि शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.0
0
Report
वाशीम के मंगरुळपीर तालुक़े दाभा में ग्रामीणों ने चोरों को पकड़ लिया; पुलिस गश्त बढ़ाने की मांग
Washim, Maharashtra:वाशीम: वाशीम के मंगरुळपीर तालुक़े दाभा में ग्रामीणों ने चोरों को पकड़ लिया तथा चोरी के उद्देश्य से आए चोरों को गाँव वालों ने देखते ही उनका पीछा शुरू कर दिया। गाँव वालों के पीछा करते देख चोरों ने भाग खड़े हुए। इसके बाद क्षेत्र में बढ़ती चोरी की घटनाओं के प्रष्ठभूमि पर पुलिस ने रात की गश्त और पेट्रोलिंग बढ़ाने की मांग गांव वालों ने की है।0
0
Report
उदयनराजे भोसले ने जल मंदिर पैलेस में दहीहंडी फोड़कर परंपरा निभाई
Satara, Maharashtra:सातारा शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सप्ताह निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट १३वे वंशज खा.उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर पॅलेस येथे निवासस्थानी पारंपरिक दहीहंडी फोडली. आठवडाभर चालणाऱ्या या उत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित या सोहळ्यात राजघराण्यातील परंपरा कायम राखत त्यांनी हंडी फोडल्याने उपस्थितांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी साताऱ्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.0
0
Report
Advertisement
बुलढाणा में भाजपा नगरसेवक पर तलवार से हमला करने की कोशिश—सीसीटीवी फुटेज जारी
Buldhana, Maharashtra:बुलढाण्यात भाजप नगरसेवकावर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न! सीसीटीव्हीत हल्लेखोर पळतानाचा व्हिडिओ नगरसेवक आकाश दळवीची बुलढाणा पोलिसांत तक्रार अँकर - बुलढाण्यातील भाजपचे नगरसेवक आकाश दळवी यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे. ८ सप्टेंबरच्या रात्री ९ वाजता शहरातील कारंजा चौक परिसरात ही घटना घडलीय. हल्लेखोरच्या हातात तलवार असून तो पळतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, दळवी यांच्यासोबत शिवीगाळ, मारहाण, धमकी तसेच शस्त्र दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. निखिल शर्मा, आर्यन निखिल शर्मा व वंश निखिल शर्मा यांनी शिवीगाळ करून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.0
0
Report
बुलढाणा जिला केंद्रीय सहकारी बँक के अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे निर्वाचित
Buldhana, Maharashtra:बुलढ़ाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र शिंगणे उपाध्यक्षपदी गोविंद मिरगे यांची निवड; तब्बल १६ वर्षानंतर बँकेची निवडणूक तब्बल १६ वर्षानंतर झालेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून, उपाध्यक्षपदी गोविंद मिरगे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या २१ संचालकांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यापैकी १२ संचालक बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, कामगार मंत्री आकाश फुंडकर, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि आमदार संजय गायकवाड यांच्यासह प्रमुख नेत्यांचा समावेश होता. तर उर्वरित ९ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान पार पडलं. या निवडणुकीत सहकार पॅनलने ७ जागांवर विजय मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं, तर शेतकरी परिवर्तन पॅनलला अवघ्या २ जागांवर समाधान मानावं लागलं. दरम्यान, आज झालेल्या निवडीत डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं. विशेष म्हणजे, बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे परिवाराकडे तब्बल ३१ वर्षे सत्तेची धुरा राहिली आहे. बाईट : डॉ. राजेंद्र शिंगणे — नवनिर्वाचित अध्यक्ष0
0
Report
जगतलाई आश्रम सर्पदंश मामले में संस्थापक समेत तीन की अटकपूर्व जमानत याचिका नागपुर खंडपीठ ने खारिज
Nagpur, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंश आणि त्यामुळे तीन मुलींच्या मृत्यू प्रकरणी आरोप लागलेले जपतलाई आश्रम शाळेचे संस्थाचालक आणि गडचिरोलीचे माजी खासदार मारोतराव कोवासे, त्यांचा मुलगा व संस्थेचे सचिव विश्वजीत कोवासे, महिला वसतिगृहाची अधीक्षिका भाग्यश्री चिलमवार या तिघांना अटकपूर्व जामीन देण्यास नागपूर खंडपीठाने नकार दिले आहे.... तिघांनी वकिलांच्या माध्यमातून खंडपीठांसमोर अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केले होते.. मात्र नागपूर खंडपीठाने त्यांच्या अर्ज गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावले... * 10 ऑगस्ट 2026 रोजी जगतालाई आदिवासी आश्रम शाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची घटना घडली होती.. * त्यानंतर शासनाने गंभीर दखल घेत आश्रम शाळेची मान्यता रद्द केली होती... * कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संस्थाचालक आणि अधीक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता... * त्याच प्रकरणी अटकपूर्व जामीन घेऊ पाहणाऱ्या मारोतराव कोवासे, त्यांचा मुलगा आणि वसतिगृह अधीक्षिका यांचे अटकपूर्व जामीन अर्ज नागपूर खंडपीठाने फेटाळून लावले आहे...0
0
Report
Advertisement
