411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
ओबीसी जनगणना में स्वतंत्र कॉलम के लिए घर-घर स्टिकर के साथ विरोध तेज़
Bhandara, Maharashtra:ओबीसी जनगणनेत स्वतंत्र कॉलमच्या मागणीसाठी जनजागृती....घरोघरी स्टिकर लावत निषेध अभियान.... होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम नसल्याने समाजबांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विविध संघटनांचे पदाधिकारी घरोघरी जाऊन नागरिकांना याबाबत माहिती देत जनजागृती करत आहेत. जनगणना प्रक्रियेवर निषेध नोंदवत जनगणनेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य करू नये, असे आवाहनही करण्यात येत आहे. यासाठी तशा आशयाचे स्टिकर घरांवर लावून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. ओबीसी समाजाची अचूक नोंद व्हावी, यासाठी स्वतंत्र कॉलमची मागणी करण्यात येत असून येत्या काही दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे。0
0
Report
अकोला के पातूर-नंदापूर में आंधी-बारिश ने किसानों की परेशानी बढ़ा दी
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील पातूर नंदापूर येथे आज 12 च्या sुमारास अचानक हवामानात मोठा बदल झाला. चक्रीवादळासह जोरदार वारे, गारपीट आणि मुसळधार पावसाने परिसराला अक्षरशः झोडपून काढले. अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पातूर नंदापूर परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्याची माहिती समोर आली आहे. काही भागात विजांचा कडकडाट आणि गारपीटही झाली. अचानक झालेल्या या बदलामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. विशेषतः उन्हाळी पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी काढणीसाठी तयार ठेवलेले पीक आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. दरम्यान, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
विरार के वात्सल्य कॉम्प्लेक्स के बाहर आग, नागरिकों ने आग पर नियंत्रण पाया
Vasai-Virar, Maharashtra: विरारपूर्वीच्या मनवेल पाडा रोड येथील वात्सल्य कॉम्प्लेक्स इमारती बाहेर मध्यरात्रीच्या सुमारास ट्रान्सफॉर्मरला मोठी आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. आग लागल्याचे कळताच स्थानिक रहिवाशांनी तात्काळ अग्निशमन दल आणि महावितरण च्या तक्रार निवारण नंबर वर फोन करून माहिती देण्याचा प्रयत्न केला मात्र महावितरणच्या नंबर वर कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. यावेळी स्थानिक नागरिकांनी स्वतः joखीम पत्करून fire extinguisher च्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. त्याचवेळी अग्निशमन दलाची एक गाडी देखील घटनास्थळी दाखल होऊन आग पूर्णपणे विझवली.0
0
Report
Advertisement
वाशीम में अचानक मौसम बदला: मेघगर्जन के साथ अवकाली बारिश से गर्मी में मिली राहत
Washim, Maharashtra:वाशीम: वाशिम जिल्हा मध्ये मागील आठवड्यापासून तापमानाचा पारा ४३ अंशांच्या पुढे गेल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.मात्र आज दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि तापमानात काही प्रमाणात घट झाली.मानोरा आणि मंगरूळपीर तालुका परिसरातील काही भागांत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी पडला .या पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे。0
0
Report
नाशिक: येवला में कांदा कटाई के लिए मजदूर नहीं, किसान परिवार खेत में जुटे
Yeola, Maharashtra:अँकर : नाशिक जिल्ह्यात येवला, लासलगाव परिसरात उन्हाळी कांदा काढणीला वेग आला असताना येवला तालुक्यात मजुरांचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. बाजारभाव कमी असल्याने शेतकरी कांदा साठवणुकीकडे वळत आहेत; मात्र मजूर उपलब्ध नसल्यामुळे संपूर्ण कुटुंबच शेतात उतरून काढणी, वाळवण आणि साठवणुकीची कामे करत आहे. महिला, ज्येष्ठ आणि मुलांचाही या कामात सहभाग दिसून येत आहे.0
0
Report
अकोला में बारात के दौरान गाड़ी में फटाकों से आग, कोई हताहत नहीं
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील कोथळी बुद्रुक गावात एका वरातीत अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. वरातीत सहभागी असलेल्या एका चारचाकी गाडीत ठेवण्यात आलेल्या फटाक्यांनी अचानक पेट घेतल्याने गाडीला भीषण आग लागली. वरातीत डीजेच्या तालावर आनंदात नाच सुरू असतानाच गाडीतून धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्या. गाडीत मोठ्या प्रमाणात फटाके ठेवण्यात आले होते. अचानक फटाक्यांनी पेट घेतल्याने काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. ही घटना लक्षात येताच वरातीत एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक आणि वरातीत सहभागी झालेल्या युवकांनी तत्काळ पाण्याच्या बकेटच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, चारचाकी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.0
0
Report
Advertisement
अहिल्या नगर में महायुती की ताकद बढ़ी: शिवसेना शिंदे गट सक्रिय, उदय सामंत का जिल्हा दौरा शुरू
Shirdi, Maharashtra:क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेल्या आणि 12 विधानसभा मतदारसंघ असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढली असून आता महायुतीतील शिवसेना शिंदे गट देखील अहिल्या नगर जिल्ह्यात ऍक्टिव्ह मोडवर आला आहे.. अहिल्यानगर जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदी मंत्री उदय सामंत यांची निवड झाल्यानंतर आज ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत... गटप्रमुखांपासून ते जिल्हाप्रमुख अशा सर्व कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत पक्ष वाढीचे धोरण ठरवणार आहे... चिल्ला नियोजन मंडळासो अथवा महामंडळ यात शिवसेनेला वाटा देण्याचं समन्वय समितीत ठरला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणार असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं... काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करणारे अमोल खताळ यांच्या मतदारसंघातून त्यांनी आज आपल्या दौऱ्याला प्रारंभ केला..\n\nमंत्री उदय सामंत बाईट पॉइंटर\n\nऑन अहिल्यानगर जिल्हा दौरा\n\nगट प्रमुख ते जिल्हा प्रमुख पर्यंत रिक्त पदे भरणार..\nपालकंत्र्यांना भेटून शासकीय समित्यांमध्ये शिवसेनेला स्थान देणार..\nमहायुतीच्या समन्वय समितीत ठरलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणार..\n\nऑन संगमनेर MIDC निधी\n\nउद्योग विभागाला निधीची जास्त गरज पडत नाही..महामंडळातून आम्ही निधी उभा करतो..\nदोन ते तीन महिन्यात संगमनेर सह जिल्ह्यात अनेक ठिकाणी MIDC उभी करणार...\n\nऑन पुणे जिल्हा पोक्सो गुन्हे वाढती आकडेवारी\n\nही नीच विकृती.. पोलिसांनी ही ठेचून काढली पाहिजे..\nभविष्यात अशा विकृतीचे धाडस होणार नाही अशी कारवाई झाली पाहिजे..\nपोलिस काम करताय मात्र अधिक कडक पद्धतीने कारवाई केली पाहिजे..\n\nशक्ती कायद्याला विधानसभेने एकमताने मंजुरी दिलेली आहे. आम्ही देखील याबाबत पाठपुरावा करतोय..\nशक्ती कायदा लागू झालाच पाहिजे अस आमचे मत..\n\nऑन अपक्ष आमदार तांबे व खताळ श्रेयवाद लढाई\nअशा गोष्टींसाठीच मला संपर्कमंत्री केलं आहे..\nआता अशा बाबतीत मी मध्यस्थी करणार..\nमी यासाठीच बैठका लावल्या आहेत..\nशिर्डी संस्थान विश्वस्त मंडळाबाबत समन्वय समितीत चर्चा झालीं आहे\nलवकरात लवकर विश्वस्त मंडळ अस्तित्वात येईल अशी आम्हाला अपेक्षा..\n\nऑन हिंदी भाषा पेपर व मराठी सक्ती\n\nप्रधान सचिवांना न विचारता मंत्रालयातून पत्र काढण्यात आले..\nते समोर येताच ती परीक्षा मी रद्द केलीय..\n1976 मधील परिस्थिती वेगळी होती..\nहिंदीची परीक्षा कशासाठी घेतली जात होती याचा आढावा घेऊ..\nआवश्यकता नसेल तर ही परीक्षा पूर्णपणे रद्द करणार..\n\nमराठी भाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे..\nही सक्ती नाही तर मराठी माणसाची भावना..\nपार राज्यातून आलेले अधिकारी मराठी शिकत असतील तर उद्योगासाठी आलेल्यांनी शिकली पाहिजे..\nअमराठी लोकांनी देखील मराठी शिकून घेतली पाहिजे..\nमराठी भाषा App तयार होत असून त्या माध्यमातून मराठी भाषा शिकण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार0
0
Report
उंबर्डा बाजार के बंद पंप, गर्मी में पानी की भारी कमी से नाराज़ ग्रामीण
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील उंबर्डा बाजार येथील नादुरुस्त हातपंपांमुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. गावातील पाचही वॉर्डांमधील अनेक हातपंप बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हातपंप दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या; मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. परिणामी, महिलांसह नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत असून दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून बंद पडलेले हातपंप दुरुस्त करावेत तसेच गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
सोलापुर के बोरामणी तिहेरी हत्याकांड: मुख्य आरोपी शंकर मस्केला गिरफ्तार, बंगाल से पकड़ा गया
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूरच्या बोरामणीतील तिहेरी हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी ताब्यात - सोलापूरच्या बोरामणीतील तिहेरी हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी ताब्यात - पश्चिम बंगालच्या सीमेवरून आरोपी शंकर मस्केला पोलिसांनी घेतले ताब्यात - संपत्तीच्या वादातून आरोपीने आपली वहिनी आणि पुतण्या, पुतणीचा खून केला होता - त्यानंतर आरोपी मागील पाच दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता - अखेर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला पश्चिम बंगाल येथून ताब्यात घेतले - सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून आज आरोपीला कोर्टात हजर करण्याची शक्यता0
0
Report
Advertisement
नांदेड ग्रामीण पुलिस ने 4800 से अधिक हथियार जब्त किए; तलवार-गुप्ती-खंजीर
Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड ग्रामीण पुलिस ने 4800 से अधिक हथियार जब्त किए; तलवार-गुप्ती-खंजीर0
0
Report
पालघर के सफाले बाजार में फिर हिट-एंड-रन, ट्रक ने कारों और दोपहिया को मारा, चालक गिरफ्तार
Palghar, Maharashtra:पालघर - पालघर तालुक्यातील सफाळे बाजारपेठेत पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. डाय सिमेंटने भरलेल्या भरधाव ट्रकने दोन कार आणि दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. धडक दिल्यानंतर चालकाने ट्रकसह पळ काढण्याचा प्रयत्न केला. काही स्थानिक तरुणांनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने सुमारे एक ते दीड किलोमीटरपर्यंत ट्रक अतिवेगाने पळवला. अखेर स्थानिकांनी पाठलाग करून ट्रक अडवला आणि चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव रणजितकुमार रामचंद्र महतो, वय ३०, राहणार बिहार अकामकाजीसे असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.0
0
Report
पनवेल रेलवे स्टेशन पर भाड़ा विवाद में दो रिक्शाचालक भिड़े, वीडियो वायरल
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल रेलवे स्टेशन परिसरात रिक्षा भाड्यावरून दोन रिक्षाचालकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आलेय. किरकोळ शाब्दिक वादातून सुरू झालेले या प्रकरणाने काही वेळातच हिंसक वळण घेतले आणि दोन्ही रिक्षाचालकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. प्रवाशांकडून भाडे घेण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही रिक्षाचालकांमध्ये आधी बाचाबाची झाली. त्यानंतर काही अन्य रिक्षाचालकही घटनास्थळी जमा झाले आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामुळे काही वेळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पनवेल रेल्वे स्थानक परिसरात रिक्षाचालकांमधील वाद आणि प्रवाशांसोबतचे किरकोळ संघर्ष वाढत असल्याने प्रशासनाने या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. या हाणामारीचा विडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे.0
0
Report
Advertisement
वर्धा के करंजा कचरा डिपो में प्लास्टिक से मूक पशुओं की जान खतरे में
Wardha, Maharashtra:वर्ध्यातील कारंजा कचरा डेपोतील प्लास्टिकमुळे मुक्या जनावरांचा जीव धोक्यात; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहार नेते तथा स्वराज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयकुमार बेलकडे यांच्या नेतृत्वात अनोखे आंदोलन तहसीलदारांना कचऱ्याची भेट देत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन; तातडीच्या कारवाईची मागणी दुर्गंधी, प्लास्टिक कचरा आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त; वारंवार तक्रारीनंतरही कारवाई नसल्याचा आरोप अँकर - वर्धा जिल्ह्यातील करंजा शहरातील कचरा डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकसह विविध घनकचरा साचल्याने मोकाट गायींसह इतर मुक्या जनावरांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. कचऱ्यामध्ये मिसळलेले प्लास्टिक खाल्ल्याने जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून परिसरातील नागरिकांनाही दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार नेते तथा स्वराज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयकुमार बेलकडे यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्ष आणि स्वराज्य शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनोखे आंदोलन केले. यावेळी तहसीलदारांना प्रतिकात्मक स्वरूपात कचऱ्याची भेट देत तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनातून कचरा डेपोतील प्लास्टिक कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावणे, परिसराची स्वच्छता करणे तसेच मुक्या जनावरांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.0
0
Report
वाशीम में भुईमूग के दाम 7000 रुपये प्रति क्विंटल, किसान राहत
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात भुईमूग काढणीला सुरवात झाली असून बाजारात सध्या चांगले दर मिळताहेत. मानोरा येथील खासगी बाजार समितीत भुईमूग शेंगाला ७ हजार रुपये प्रतीक्विंटल इतका दर मिळालाय. सुरुवातीच्या टप्प्यात भुईमुगाची आवक मर्यादित असली, तरी पुढील काही दिवसांत आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येतेय.यंदा हवामानाचा काही प्रमाणात भुईमूग उत्पादनावर विपरीत परिणाम झाला असला, तरी बाजारात मिळालेल्या चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.0
0
Report
हुतात्मा शक्कर कारखाने के अध्यक्ष के अधिकार छीन, आंदोलन तेज
Sangli, Maharashtra:स्लग - हुतात्मा साखर कारखान्याच्या अध्यक्ष वैभव नायकवाडी यांचे अधिकार काढले ! अँकर - सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या हुतात्मा साखर कारखान्याच्या अध्यक्षां विरोधातील आंदोलन 17 व्या दिवशीही कायम आहे. हुतात्मा साखर कारखान्यासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या ठिकाणीच संचालक मंडळ व सभासदांची बैठक पार पडली, ज्यामध्ये अध्यक्ष वैभव नायकोडे यांचे सर्व अधिकार काढून घेण्याचा ठराव करण्यात आला आहे. ठरावाची प्रत कारखान्याच्या उपाध्यक्षांकडे देण्यात आली आहे. कारखान्यामध्ये अध्यक्ष वैभव नायकवडींकडून मोठा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप करत अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा,या मागणीसाठी सभासदांचं हुतात्मा साखर कारखान्यासमोर गेल्या 17 दिवसांपासून आंदोलन सुरू असून राजीनामासाठी आता अधिक तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
