411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
श्रीरामपुर में दुपहर चाकू से हत्या, होटल मालिकों पर हमला; एक की मौत
Shirdi, Maharashtra:श्रीरामपुर येथे भर दुपारी चाकू भोसकून हॉटेल मालिकाची हत्या... शहरातील नेवासा रोडवरील लक्ष्मीनारायण हॉटेल येथील घटना... जेवणासाठी आलेल्या तिघांनी वाद घालत दोघा हॉटेल मालकांवर धारदार शस्त्राने केला हल्ला... आकाश शेखर दुबय्या मयत युवकाचे नाव तर कुणाल दुबय्या किरकोळ जखमी... जखमींना तातडीने साखर कामगार रुग्णालयात करण्यात आले होते दाखल... उपचारा दरम्यान आकाश दुबय्या याचा मृत्यू... घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक वाकचौरे आणि शहर पोलिस घटनास्थळी दाखल... तपासाची चक्रे वेगाने फिरवत श्रीरामपूर शहर पोलिसांनी घेतले तिघा हल्लेखोरांना ताब्यात.... ओमकार डफळ, सुरेश जाधव आणि यश जाधव पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे.... मारहाणीत एक हल्लेखोर देखील जखमी... भरदिवसा हॉटेल व्यवसायिकाची हत्या झाल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण.... गेल्या 11 दिवसात श्रीरामपूरात प्राणघातक हल्ल्याची 4 थी घटना....0
0
Report
शिंदे गुट के विधायक दराडे: महाजन से बातचीत पर स्पष्टता नहीं, पर स्थिति साफ
Yeola, Maharashtra:शिवसेना शिंदे गटाचे शिक्षक आमदार किशोर दराडे ऑन गिरीश महाजन टू द पॉईंट मुलाखत वक्तव्य मंत्री महोदय काय बोलले हे मला सांगता येणार नाही... युतीचे सरकार होते पक्षाच्या लोकांचा सपोर्ट होता त्यानंतर उमेदवारी फायनल झाली.... कोण काय बोलतो हे मला सांगता येणार नाही.... शिंदे साहेबांशी न बोलता गिरीश महाजन थेट माझ्याशी बोलले असते तर मी त्यांना स्वखुशीने सांगितले असते कोणताही उमेदवार द्या.. ही कल्पना मी स्वीकारली असती.... महायुतीच्या नेत्यांनी पराभव केला की नाही हे बोलणे कठीण आहे मात्र पराभव झाला हे नक्की....0
0
Report
इंदापुर में पालकी तळ और अश्व मैदान की तैयारी पर कृषि मंत्री भरणे ने समीक्षा
Rui, Maharashtra:कृषिमंत्री भारणेंकडून इंदापुरात पालकी तळाची पाहणी.... अश्वांच रिंगण पार पडणाऱ्या मैदानाचाही घेतला आढावा....Anchor _जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा पालखी सोहळा 18 जुलै रोजी इंदापूर शहरात मुक्कामी आहे.इंदापूर मध्ये तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांचं दुसरं गोल रिंगण पार पडणार आहे. त्या मैदानाची आणि पालखी तळाच्या तयारीची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली आहे.यावेळी नगराध्यक्ष भरत शहा आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.0
0
Report
Advertisement
ठाणे TDCC बैंक में कथोरे गट की सत्ता, अरुण पाटील अध्यक्ष
Ambernath, Maharashtra:ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर किसन कथोरे गटाचं वर्चस्व टीडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदी अरुण पाटील यांची निवड विजयानंतर कथोरे समर्थकांचा जल्लोष0
0
Report
नांदेड पुल हादसे पर शिवेंद्रराजे भोसले का बड़ा दावा: 100% कार्रवाई होगी
Latur, Maharashtra:नांदेड पूल दुर्घटनेवर बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा दावा... 'एकटाच पूल कसा पडला ? हि तर अधिकाऱ्यांची लपवाछपवी... दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर १०० टक्के कारवाई होणार.... नांदेड जिल्ह्यात भूकंपामुळे पूल कोसळल्या प्रकरणावर आता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मोठे वक्तव्य केले आहे. भूकंप झाला असता इतरही ठिकाणी पडझड झाली पाहिजे होती. मग एकटाच पूल कसा कोसळला ? ही अधिकाऱ्यांची लपवाछपवी आहे. संबंधित काम दर्जेदार झाले नव्हते, हे आम्ही मान्य करतो. या प्रकरणाला जबाबदार असलेल्या अधिकारी आणि कंत्राटदारांवर शंभर टक्के कारवाई केली जाईल अशी स्पष्ट प्रतिक्रिया मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.0
0
Report
मिरज के नए प्रशासनिक भवन उद्घाटन को लेकर प्रशासन-गठबंधन में टकराव
Sangli, Maharashtra:स्लग - प्रशासनाच्या उद्घाटना पूर्वी,सत्ताधारी महाविकास आघाडीने उरकला नुतून इमारतीचा उद्घाटन सोहळा... अँकर - सांगलीमध्ये मिरजेत मिरज पंचायत समितीच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनावरून प्रशासन विरुद्ध महाविकास आघाडी व भाजपचे मित्र पक्ष असा संघर्ष निर्माण झाला आहे.प्रशासनाकडून उद्घाटन करण्यापूर्वीच भाजपा विरोधी सर्वपक्षीय सत्ताधाऱ्यांनी नुतून इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उरकून घेतलाय.प्रशासनाच्यावतीने रविवारी ग्रामविकास मंत्री व भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आयोजित करण्यात आले आहे.मात्र पंचायत समितीच्या सत्ताधाऱ्यांना डावलून उद्घाटनाचा सोपस्कार प्रशासनाकडुन पार पाडला जातोय,असा आरोप करत प्रशासकीय उद्घाटनाच्या आधीच मिरज पंचायत समितीच्या कार्यालयाचा उद्घाटन भाजपा वगळता सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित केला आले आहे.राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील खासदार विशाल पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी,माजी मंत्री अजित घोरपडे व शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे.प्रशासनाकडून इमारत उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी विश्वासात घेण्यातच आलं नसल्याचा आरोप सभापतीकडून करण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
चंद्रपूर पुलिस ने पिस्तौल के साथ सरायित गुंड दिलशान काजी को गिरफ्तार किया
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, भर वस्तीत पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुंडाला अटक, सराईत गुंड दिलशान काजी याला पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसांसह केली अटक अँकर: आपल्याकडे असलेल्या गावठी पिस्तुलासह लोकांमध्ये दहशत पसरविणारा चंद्रपूर शहरातील रेल्वे स्टेशन जवळच्या मुन्ना कॅन्टीन परिसरातला सराईत गुंड धीरज मोहन दयाल उर्फ दिलशान काजी याला चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत अटक केली. पेट्रोलिंग दरम्यान पोलीस पथकाला या घटनेची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून या गुंडाला अटक करण्यात आली. त्यांच्या जवळून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि पाच जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली आहेत. या सराईत गुन्हेगाराला रामनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून अधिक तपास रामनगर पोलीस करत आहेत。0
0
Report
नेवासा: ज्ञानेश्वरी पालखी सोहळे में ज्ञानेश्वरी घाट नामकरण
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या नेवासा येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळा हा अवघड असा इमामपूर येथील ज्ञानेश्वरी घाट चढून नगरकडे रवाना झालाय...संत ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासा येथील पैस खांब मंदिरात ज्ञानेश्वरी लिहिली...त्याच मंदिरातून हा दिंडी सोहळा पंढरपूरकडे रवाना झालाय...विशेष म्हणजे वारकऱ्यांच्या आग्रहाखातर इमामपूरच्या घाटाचे आज ज्ञानेश्वरी घाट असे नामकरण करण्यात आले...हरिनामाचा गजर करत हे नामकरण पार पडले...यासाठी माजी राज्यमंत्री शंकरराव गडाख आणि यशवंत प्रतिष्ठान यांनी पुढाकार घेतला...शंकरराव गडाख, उदयन गडाख, हभप देविदास महाराज म्हस्के, हभप उद्धव महाराज मंडलिक हे यावेळी उपस्थित होते.0
0
Report
शिवाजी की मूर्ति पर एंटी मुस्लिम दावे गलत, इतिहासकार बोले नहीं विरोधी
Nanded-Waghala, Maharashtra:Anchor - छत्रपती शिवाजी महारাজ की मूर्ती मे एंटी मुस्लिम अँगल देखणा सरासर गलत है. शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी नही थे. किसी भी इतिहासकार ने शिवाजी महाराज को अँटी मुस्लिम नही लिखा है. शिवाजी महाराज की सेना कई मुस्लिम बडे औदो पर थे. शिवाजी महाराज के कार्यालय मे उनके पास लागभग साडेतीनसो किले थे जीनमे से कई किलो पर मंदिरो के साथ मस्जिद पी थी. शिवाजी महाराज जिस तरह से अफगान यासाठी आक्रमणकारीओ के खिलाफ लढे वैसेही गोवा मे पोर्तुगीज के खिलाफ और अन्य लोगो के खिलाफ भी लढे एसी प्रतिक्रिया जाणकार लोगोने दि.0
0
Report
Advertisement
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार का पाटण दौरा, पुनर्वसन तेज़ी से होगा
Varsoli, Maharashtra:Anchor : मावळ तालुक्यातील पाटण गावावर ओढवलेल्या दरड दुर्घटनेनंतर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. दरड कोसळून उद्ध्वस्त झालेल्या घरांची पाहणी करत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच या दुर्घटनेत सर्वस्व गमावलेल्या आणि तिकोने कुटुंबातील बचावलेल्या सदस्याची भेट घेऊन धीर दिला. यावेळी संपूर्ण पाटण गावाचे पुनर्वसन करण्यासाठी लवकरच मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेऊन हा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ग्रामस्थांना दिले आहे. मावळ तालुक्यातील पाटण गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. दरड कोसळून उद्ध्वस्त झालेल्या घरांची पाहणी करत त्यांनी प्रशासनाकडून बचाव आणि मदतकार्याची माहिती घेतली. तसेच दुर्घटनेत सर्वस्व गमावलेल्या तिकोने कुटुंबातील बचावलेल्या सदस्याची भेट घेऊन त्यांच्या सांत्वन केले.0
0
Report
कंडोनियम के तहत कोई हमीपत्र नहीं, महासभा के निर्णय की पुष्टि
Navi Mumbai, Maharashtra:नवी मनपा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झालेय. नवी मुंबई शहरात कंडोनियम अंतर्गत कामे करताना कोणत्याही सोसायटीला हमीपत्र देण्याची आवश्यकता नाही असा निर्णय महासभेने मंजूर केलाय. मात्र हा निर्णय प्रशासनाने मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला असल्याची माहिती समोर आल्याने सत्ताधारी प्रशासना विरोधात आक्रमक झाले आहेत. कंडोनियम अंतर्गत कामे करताना कोणतंही हमीपत्र देण्याची आवश्यकता नाही, सभागृहाचा निर्णय अंतिम राहील अशी अशी ठाम भूमिका यावेळी स्थायी समिती सभेत सभापती अशोक पाटील यांनी घेतलाय.0
0
Report
उलवे में लिफ्ट हादसे से बड़ा खतरा टला, बिल्डर पर कार्रवाई की मांग
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील उलवे मध्ये एका सोसायटीमध्ये लिफ्टचा अपघात. उलवे सेक्टर 17 येथील भव्येश्वर ओएसिस सोसायटीमध्ये पहाटे लिफ्टचा केबिन अचानक कोसळून मोठी दुर्घटना टळली. बिल्डरच्या निष्काळजीपणाचा रहिवाशांचा आरोप सुदैवाने लिफ्टमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच तिघे रहिवासी थांबल्याने जीवितहानी झाली नाही. संबंधित बिल्डरवर कारवाई करावी आणि लिफ्टच्या सुरक्षेची तातडीने तपासणी करण्याची रहिवासीयांची मागणी.0
0
Report
Advertisement
शास्त्रीनगर अस्पताल के लिए भाजपा का शिष्टमंडल मुख्यमंत्री से मिलने की तैयारी
Kalyan, Maharashtra:भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांची भेट, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सिव्हिल रुग्णालयाची मागणी करणार - दीपेश म्हात्रे, Anc : सतत पडणाऱ्या पावसानंतर तो रवी उगवला, पण आमचा रवी उगवलाच नाही अशी बोचरी टीका मनसे नेते, माजी आमदार राजू पाटील, यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, यांच्यावर केली. या टिकेनंतर खडबडून जागे झालेल्या भारतीय जनता पार्टीने प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, यांच्या निर्देशानुसार शास्त्रीनगर रुग्णालयात जाऊन डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची भेट घेतली. Vo केडीएमसीच्या डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे, यांनी डॉक्टर नर्स आणि कर्मचारी यांना बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर केडीएमसीच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत सत्ताधारी नगरसेवकांनी केलेल्या या गुंडगिरीवर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. या घटनेनंतर सर्वच विरोधी पक्षांनी यांवर संताप व्यक्त करत सत्ताधारी शिवसेनेचा निषेध व्यक्त केला. तसेच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला होता. मात्र एवढं सर्व होऊन देखील डोंबिवलीचे स्थानिक आमदार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, यांनी या प्रकरणाची दखल न घेतल्याचा आरोप मनसे नेते राजू पाटिल, यांनी केला. या आरोपांनंतर आज भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शास्त्रीनगर रुग्णालयात भेट देत डॉक्टरांशी संवाद साधत त्यांची बाजू जाणून घेतली. यावेळी भाजपचे सर्व नगरसेवक मिळून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लवकरात लवकर या शहराला सिविल रुग्णालय द्या अशी मागणी करणार आहोत असल्याचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले. तर मनसे नेते राजू पाटील यांनी केलेल्या टिकेबद्दल त्यांना विचारले असता, जे सूर्याकडे बघून थुंकतात त्यांचे काय होत ते तुम्हाला माहीत आहे. जे कधीतरी उगवतात त्यांच्याबद्दल मला टीका करायची नाही असे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.0
0
Report
मराठवाड़ा में सूखा गहराने से किसान बेहाल, Hingoli सहित खरीप फसलें डगमगा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : जुलै महिना अर्धा संपत आलय, तरीही आकाशातून पावसाचा थेंबही बरसलेला नाही. पहिल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या तर केल्या... पण आता गेल्या आठ-दहा दिवसांपासून पाऊस पूर्णपणे गायब झाला आहे. त्यामुळे उगवलेली पिके आता डोळ्यांदेखत करपू लागली आहेत. एकीकडे पेरणी कमी तर दुसरीकडे ज्यांनी पेरणी कमी केली त्यांनी करावी कधी हा प्रश्न आहे.. त्यामुळं आगामी वर्षभराच्या उदरनिर्वाहाची चिंता आता बळीराजाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली आहे. मराठवाड्यात निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीवर पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट भेगाळलेली जमीन, अजूनही जमिनीला पकडून असलेली छोटी रोप हे सध्याचे मराठवाड्याचे चित्र आहे.. पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल आहे... मराठवाड्यातील हे आहेत हिंगोली जिल्ह्यातील ब्रह्मपुरी गावचे शेतकरी बलदेव शुक्ला. पाहिल्याच पावसात त्यांनी पाच एकर शेतात सोयाबीन आणि तुरीची लागवड केली, वर्षभराच्या उत्पन्नाची स्वप्नं जणू त्यांनी पेरली होती. मे महिन्यापासून मशागत, महागडं बियाणे, खतं आणि मजुरीवर त्यांनी हजारो रुपये खर्च केले. मात्र, त्यानंतर पावसाने अशी काही पाठ फिरवली की, आता उगवलेली पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या ४० वर्षांत अशी भयानक परिस्थिती फार कमी वेळा पाहायला मिळाली, असं इथले शेतकरी सांगतायत. आता पाऊस पडला नाही, पेरणी कशी करायची आणि ज्यांनी केली त्यांना दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही. पण त्यासाठी पुन्हा बियाणं आणि खतांचा खर्च करायचा कुठून हाच मोठा प्रश्न आहे. Vo संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे डोळे आभाळाकडे लागले आहेत कधी येणार वरुणराजा याच प्रतीक्षेत आहेत...सगळ्यांना खरीप हंगाम वाया जाण्याची भीती वाटतेय... एकीकडे मुंबईसह राज्याच्या इतर भागांत मुसळधार पाऊस कोसळत असताना, मराठवाडा मात्र पाण्याच्या थेंबासाठी तरसतोय. पावसाची तूट तेरा टक्क्यांवर आहे तर संपूर्ण मराठवाड्यात अवघ्या 49 टक्के पेरण्या झाल्या आहेत... मराठवाडा खरिपाची आकडेवारी: एकूण खरीप क्षेत्र: ४९ लाख ७२ हजार ७६६ हेक्टर प्रत्यक्षात झालेली पेरणी: २४ लाख ५५ हजार १३३ हेक्टर (केवळ ४९%) अपेक्षित पर्जन्यमानात तूट: १३ टक्के तूट , वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ २२.३% पाऊस... विभागातील मुख्य पीक असलेल्या कापसाची पेरणी तर अत्यंत खालावली आहे. कपाशीची केवळ २३ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून, पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरताना हात आखडता घेतला आहे. कडधान्याची (तूर, मूग, उडीद) केवळ ३२% तर सोयाबीनसह गळीत धान्याची ५४% पेरणी झाली आहे. मराठवाड्यात जिल्ह्यानुसार पेरणीची टक्केवारी पाहिली तर भीषणता अधिक स्पष्ट होते. सर्वाधिक ६३ टक्के पेरणी नांदेड जिल्ह्यात झाली आहे, तर सर्वात कमी म्हणजेच केवळ ३३ टक्के पेरणी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात झाली आहे. या भागातील शेतकरी पेरणीचे धाडस करायलाही तयार नाहीत. छत्रपती संभाजीनगर: ५९% पेरणी जालना: ५८% पेरणी बीड: ४७% पेरणी परभणी: ४६% पेरणी हिंगोली: ४७% पेरणी राज्य सरकार ही यावर लक्ष ठेवून आहे, या मधल्या दिवसात थोडं प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आपण देऊ शकलो तर अडचण येणार नाही असं मला मुख्यमंत्री म्हणाले तर अलनिनोमुळे पावसात तूट आणि डिस्टन्स राहणार आहे याची कबुलीही त्यांनी दिलीय.. लास्ट vo : पाऊस आज ना उद्या येईल, मात्र तोपर्यंत शेतकऱ्याच्या मनातील आशेचा अंकुर जळणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. पेरणी रखडली असली तरी त्याचा धीर सुटू नये, यासाठी तात्काळ मदतीचे हात पुढे येण्याची गरज आहे. शेवटी, शेतकरी जगला तरच देश जगणार, हे सत्य आपण विसरून चालणार नाही... हिंगोली हुन गजानन वाणी सह विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...0
0
Report
Advertisement
