411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कोल्हापुर के प्रकाशक प्रशांत आंबी पर धमकी मामला; हाईकोर्ट में नया मोड़
Kolhapur, Maharashtra:शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या शीर्षकावरून कोल्हापुरातील प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केर्त जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्याच बरोबर महामानवांच्या नावावरून शिवीगाळ करून रोज 100 पुरुष घरी येतील अस देखील संजय गायकवाड यांनी म्हटल्याच आरोप करत आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात हायकोर्टात रीटपिटीशन दाखल केली होती. पण हायकोर्टाने यासंदर्भात जिल्हा न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला प्रशांतच्या वकिलांना दिला आहे.. त्यानुसार प्रकाशक प्रशांत आंबी हे कोल्हापूर जिल्हा न्यायालयात दाद मागण्याचे ठरवले आहे.0
0
Report
यवतमाल के वेकोली क्षेत्र में भाजपा आंदोलन से कोयला खदानों की ढुलाई ठप
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ च्या वणी येथील वेकोली क्षेत्रात असलेल्या मुंगोली, कोलगाव आणि पैनगंगा कोळसा खाणीची वाहतूक भाजपा च्या आंदोलनामुळे ठप्प झाली आहे. शंभरहून अधिक कोळसा वाहतूक करणारे ट्रक भाजपचे नेते विजय पिदुरकर आणि माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आंदोलन करून रोखून धरल्याने कोळसा खाणीतील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प पडले. दरम्यान वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्तीसाठी तीन दिवसांचा वेळ मागितला आहे. कोळसा वाहतुकीमुळे कोलगांव चेकपोस्ट ते कोलगांव फाट्यापर्यंत प्रमुख जिल्हा मार्ग पूर्णतः उखडलेला आहे. कोलगांव फाटा ते भिमनगर मुंगोली रस्ता वेकोली ने नियमबाह्य परावर्तीत केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे जीव धोक्यात आले आहे. वेकोली चे अधिकारी मुजोरपणे वागत असून येथे होणाऱ्या जीवितहानीस तेच जबाबदार राहतील असा ईशारा भाजपने दिला. मुंगोली कोलगांव कंत्राटी कामात बेरोजगार स्थानिकांना रोजगार द्यावा. शिवनी रस्त्यावरील पुलाला पिचींग करावे. रेल्वे अंडरपास साखरा, कैलासनगर, मुंगोली चेकपोस्ट, शिवनी येथील साचलेले चिखलमय पाण्याची विल्हेवाट लावावी, सर्वत्र स्ट्रिटलाईट लावावे अशी मागणी भाजपचे विजय पिदुरकर यांनी केली.0
0
Report
नागपुर के उमरेड़ वन क्षेत्र में महिला पशुवैद्य ने वाघिण को जेरबंद कर बेशुद्ध किया
Nagpur, Maharashtra:नागपूर -- - वाघीण जेरबंद करनेासाठी पशुवैद्यकीय अधिकारी पिंजऱ्यात, पिंजऱ्यात बसून अचूक नेम साधत केले वाघाला ट्रँक्यूलाईज (Tranquilize) - नागपूर जिल्ह्यातील उमरेड वनपरिक्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून सुमारे अडीच ते तीन वर्षांच्या वाघिणीने धुमाकूळ घातला होता. वाघिणीच्या हल्ल्यात २७ मार्चला निर्मला गभणे व सहा जूनला दिगांबर पाटील यांचा बळी गेला. हे दोघेही शेतात काम करत होते. यानंतर दोन ते तीन जणांना जखमी केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते - दोन जणांचा बळी घेतलेल्या आणि अनेक दिवसांपासून वनविभागाला हुलकावणी देणाऱ्या वाघिणीला अखेर जेरबंद करण्यात यश आले. मात्र, या कारवाईमागे एका महिला पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे धाडस निर्णायक ठरले. - बचाव पथकाची वाहने मागे घेतल्यानंतर जंगलात ठेवलेल्या पिंजऱ्यात स्वतः बसून डॉ. प्रियल चौरागडे यांनी वाघिणीवर अचूक बेशुद्धीकरणाचा नेम साधला. - विशेष म्हणजे, महाराष्ट्रात वाघाला नेम धरून बेशुद्ध करणाऱ्या त्या पहिल्याच महिला पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. - वाघिणीला जेरबंद करण्यासाठी गावकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले होते. - वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. तसेच दोन ठिकाणी भक्ष्य बांधण्यात आले होते. मात्र, त्या भक्ष्याकडे न जाता वाघिणीने मोकाट जनावराची शिकार केली आणि ते जंगलात ओढून नेले. - त्यानंतर ती त्याच परिसरात असल्याचे स्पष्ट झाल्यावर वन्यप्राण्यांच्या वाहतुकासाठी वापरला जाणारा पिंजरा आडोशाला ठेवण्यात आला. या पिंजऱ्यात डॉ. प्रियल चौरागडे आणि त्यांचे सहकारी प्रतीक घाटे बसले. - काही वेळाने वाघीण पिंजऱ्याजवळ येऊन गेली आणि पुन्हा भक्ष्याकडे वळली. पिंजऱ्यातून दिसणारे दृश्य मर्यादित असल्याने नेम साधणे आव्हानात्मक होते. मात्र, योग्य संधी मिळताच डॉ. चौरागडे यांनी अचूक नेम साधला. - अवघ्या १५ मिनिटांत वाघीण बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला त्याच पिंजऱ्यातून नागपूर येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये हलवण्यात आले. - सध्या वैद्यकीयदृष्ट्या वाघीण सुदृढ असून तिच्याबाबत वनविभाग निर्णय घेईल0
0
Report
Advertisement
पिंपळगाव घोडे में भारी बारिश से विशाल बांगर का घर-खेत जलमग्न
Shirur, Maharashtra:पुण्यातील आंबेगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. तालुक्यात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे पिंपळगाव घोडे येथील विशाल बांगर या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नदी-नाल्यांना मोठा पूर आला आणि या पुराच्या पाण्याने विशाल बांगर यांच्या संपूर्ण घराला वेढले. पुराचा वेग इतका प्रचंड होता की, घराबाहेर उभा असलेला ट्रॅक्टर, कार आणि दुचाकी वाहने पाण्यात पूर्णपणे अडकली आणि त्यांचे मोठे नुकसान झाले. इतकेच नव्हे, तर पुराचे पाणी थेट घरात घुसल्याने घरातील अन्नधान्य, फर्निचर आणि इतर सर्वच साहित्याचं अतोनात नुकसान झालं आहे. एका रात्रीत या शेतकऱ्याचा संसार उघड्यावर आला असून, शासनाने तातडीने या भागाचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.0
0
Report
वाशीम में तीन साल की बच्ची अपहरण मामले में आरोपी गिरफ्तार, बच्ची सुरक्षित
Washim, Maharashtra:वाशीम शहरातून तीन महिन्यांपूर्वी अपहरण झालेल्या तीन वर्षीय चिमुकलीची वाशिम पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी आरोपी राम लांडकर याला अटक करण्यात आली आहे. २४ मार्च २०२६ रोजी पुसद नाका परिसरातून आईसोबत असलेल्या चिमुकलीचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी वाशीम शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी विविध पथके रवाना करून आरोपीचा शोध सुरू केला होता. आरोपी सतत ठिकाणे बदलत असल्याने तो पोलिसांना चकवा देत होता. अखेर अहिल्यानगर जिल्ह्यातील खडकी येथून आरोपीला ताब्यात घेऊन चिमुकलीची सुखरूप सुटका करण्यात आली. आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली असून,चिमुकलीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे.0
0
Report
मंगरुळपिर बसस्टॉप पर घायल दो: अज्ञात हल्लेखोर कोयता से हमला
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपिर शहरातील बसस्थानक परिसरात अज्ञात हल्लेखोराने कोयत्याने दोन जणांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.हल्लेखोराने दोघांवर सपासप वार केल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मंगरुळपिर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.घटनेची माहिती मिळताच मंगरुळपिर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध सुरू आहे.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून रुग्णालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.0
0
Report
Advertisement
येवल्या पैठणी कला दुबई तक पहुंची, चेतन धसे ने स्वामी समर्थ की प्रतिमा उकेरी
Yeola, Maharashtra:येवल्याच्या पैठणीला आता भक्तीचा अनोखा स्पर्श लाभला आहे. 'देऊळ बंद 2' चित्रपटातून प्रेरणा घेत दुबईतील स्वामीभक्त कौस्तुभ कमलापुरकर यांनी येवल्यातील पैठणी कारागीर चेतन धसे यांना पैठणीच्या साडीवर श्री स्वामी समर्थांची प्रतिमा साकारण्याची विशेष ऑर्डर दिली. चेतन धसे यांनी आपल्या हस्तकलेतून पैठणीच्या पदरावर स्वामी समर्थांची आकर्षक प्रतिमा विणली असून ही अनोखी पैठणी दुबईला पाठवण्यात आली आहे. या कलाकृतीमुळे येवल्याच्या पैठणी कलेची कीर्ती पुन्हा एकदा सातासमुद्रापार पोहोचली आहे0
0
Report
रत्नागिरी में दराड़ खतरे के बीच चिंचवली-गोटलवाड़ी में 27 परिवार सुरक्षित स्थानों पर शिफ्ट
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..दरडीच्या धोक्याने चिंचवली-गोटलवाडी सतर्क; २७ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर दहिवली-शेलारवाडी येथील दरड दुर्घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खेड तालुक्यातील चिंचवली-गोटलवाडी येथेही भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून २७ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. परिसरातील परिस्थिती, ग्रामस्थांमधील भीतीचे वातावरण आहे.0
0
Report
मानसून देर से आने से जलसंकट, दो प्रमुख सिंचन प्रकल्पों में पानी सिर्फ 7.37%
Washim, Maharashtra:मान्सून के देर से आने से जलसंकट, दो प्रमुख सिंचन प्रकल्पों में पानी सिर्फ 7.37%। गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा 40% होता. खरीप पिके वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात असताना सातत्यपूर्ण पावसाची गरज असून, धरणांतील कमी पाणीसाठ्यामुळे सिंचन आणि भविष्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे.0
0
Report
Advertisement
संगमेश्वर में भूस्खलन के कारण कोळंबे हाईस्कूल सील, 350 छात्रों के लिए सुरक्षा व्यवस्था
Ratnagiri, Maharashtra:संगमेश्वर/ रत्नागिरी भूस्खलनाच्या धोक्यामुळे कोळंबे हायस्कूलची इमारत अखेर सील; ३५० विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा निर्णय मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान झालेल्या भूस्खलनामुळे संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे येथील कमळजाबाई हायस्कूलची नवीन इमारत धोकादायक ठरली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने अखेर ही इमारत पोलिस बंदोबस्तात सील केली आहे. धोकादायक ठरलेल्या सहा वर्गखोल्यांतील विद्यार्थ्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, शाळेसाठी पर्यायी सुरक्षित व्यवस्था तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी आता जोर धरत आहे.0
0
Report
रत्नागिरी से पंढरपूर तक तीसरे सायकलवारी में 32 सायकलपटू रवाना
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. विठ्ठल नामाच्या गजरात रत्नागिरी ते पंढरपूर तिसऱ्या 'सायकलवारी'चा उत्साहात प्रारंभ; ७४ वर्षीय ज्येष्ठासह ३२ सायकलपटू रवाना. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सलग तिसऱ्या 'रत्नागिरी ते पंढरपूर सायकलवारी'ला आज सकाळी रत्नागिरीतील श्री विठ्ठल मंदिरापासून टाळ-मृदंगाच्या गजरात उत्साहात सुरुवात झाली. भक्ती,शारीरिक तंदुरुस्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या वारीत यंदा २० वर्षांच्या तरुणापासून ते ७४ वर्षांच्या ज्येष्ठ सायकलपटूपर्यंत एकूण ३२ हून अधिक जण सहभागी झाले आहेत.सुमारे ३३० किलोमीटरचा हा प्रवास तीन दिवसांत पूर्ण करून हे सायकल वारकरी शनिवारी संध्याकाळपर्यंत पंढरपुरात दाखल होतील.त्यानंतर रविवारी महाराष्ट्रभरातील सुमारे पाच हजार सायकलपटूंच्या उपस्थितीत होणाऱ्या भव्य 'सायकल रिंगण' सोहळ्यात ते सहभाग घेणार आहेत.शारीरिक व मानसिक आरोग्यासोबतच प्रदूषणमुक्त, हरित भविष्यासाठी जनजागृती करणे हा या अनोख्या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे..0
0
Report
अंकाई क्षेत्र में बिबटिये की मौजूदगी, कुत्ते पर हमला; पिंजरा लगाकर बंदोबस्त की मांग
Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवला तालुक्यातील अंकाई परिसरात शिवाजी गरुड यांच्या वस्तीवर बिबट्याने कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेल्या कुटुंबातील सदस्य जागे झाल्याने त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या दिसला. अंकाई परिसरामध्ये बिबट्याचा वावर दिसल्याने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी झाली.0
0
Report
Advertisement
सोयाबीन फसलों में मिलिपीड ने किया नया संकट, किसान चिंतित
Washim, Maharashtra:अँकर: वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील ऊंबर्डा बाजार परिसरात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर अमेरिकन जायंट मिलिपीड या किडीचे नवे संकट उभे ठाकले आहे. दमदार पावसानंतर उगवलेल्या सोयाबीनच्या कोवळ्या कोबांवर व मुळांवर या किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक ठिकाणी रोपे कुरतडली जात आहेत. त्यामुळे उगवण कमी होत असून काही शेतांमध्ये दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे. हंगामाच्या सुरुवातीला या किडीमुळे शेतकरी चिंतेत असून कृषी विभागाने तातडीने पाहणी करून प्रभावी नियंत्रण उपाययोजना करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.0
0
Report
पुणे के अम्बेगांव में भारी बारिश किसानों के लिए दुबार पेरणी का संकट
Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतांना अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले असून, खरीप हंगामातील पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवले आहे. मात्र, शेतात अद्यपही प्रचंड प्रमाणात पाणी साचल्यामुळे ही दुबार पेरणी नेमकी कधी करायची? असा गंभीर प्रश्न बळीराजाला पडला आहे. पहिल्या पेरणीचा खर्च वाया गेल्यानंतर आता संपूर्ण हंगामच हातातून जाण्याची भीती व्यक्त केली जात असून, शेतकरी वर्ग पुरता हतबल झालाय याचाच नुकसान ग्रस्त शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
होटेल व्यवसायी को नकली सोने की सिक्कों से 15 लाख का धोखा, सतर्क रहें
Akola, Maharashtra:स्वस्तात सोने मिळत असेल तर नक्कीच सावध व्हा... कारण अशा आमिषामागे अनेकदा फसवणुकीचे जाळे लपलेले असते. कोल्हापूरच्या एका हॉटेल व्यावसायिकाला बनावट सोन्याची नाणी देऊन तब्बल १५ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठीही त्यांना संघर्ष करावा लागला. अखेर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाने सर्वसामान्यांसाठी सावधगिरीचा इशारा दिला आहे. लालच बुरी बला है ही कहावत एकदा पुन्हा सत्य ठरली आहे. अवैध मार्गाने स्वस्तात मोठा फायदा मिळवण्याच्या मोहात पडल्यास किती मोठे नुकसान होऊ शकते, याचे हे जिवंत उदाहरण अकोला जिल्ह्यात पाहायला मिळाले. कोल्हापूर येथील हॉटेल व्यावसायिक युवराज कांबळे यांना अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील नांदखेड फाटा परिसरात घर पाडताना साडेतीन किलो सोन्याची नाणी सापडल्याचे आमिष दाखवण्यात आले. आरोपीने व्हॉट्सअॅपवर सोन्याच्या नाण्यांचे फोटो पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. तपासणीसाठी दिलेले एक नाणे खरे असल्याचे आढळल्यंतर ५० लाख रुपयांत व्यवहार निश्चित करण्यात आला. त्यानुसार कांबळे यांनी १५ लाख रुपये रोख दिले आणि तीन किलो तीनशे ग्रॅम कथित सोन्याची नाणी ताब्यात घेतली. मात्र तपासणी केली असता ती सर्व नाणी बनावट असल्याचे समोर आले. युवराज कांबळे, तक्रारदार. फसवणूक झाल्यानंतर युवराज कांबळे यांनी सुरुवातीला पातूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी थेट अकोला पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार अखेर पातूर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र लालसे पोटी आपली फसवणूक झाल्याचं कांबळे यांनी मान्य केलं आहे, मात्र इतरांचीही अशा प्रकारे फसवणूक होऊ नये आणि आरोपीचा शोध घेऊन फसवलेली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी कांबळे यांनी केली आहे. युवराज कांबळे, तक्रारदार. या संपूर्ण घटनेतून एक महत्त्वाचा संदेश समोर येतो. बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दरात सोने, चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू देण्याचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नका. कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी वस्तूची अधिकृत तपासणी, संबंधित कागदपत्रे आणि व्यवहाराची कायदेशीर खातरजमा करणे अत्यावश्यक आहे. थोड्याशा लालसेमुळे मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे सजग राहा, सुरक्षित राहा. जयेश जगड झी मीडिया, अकोला.0
0
Report
Advertisement
