411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पेण के खरोशी गांव में गणेश विसर्जन: मूर्ति सिर पर नाचती अनोखी परंपरा
Chendhare, Maharashtra:गणेश विसर्जनाला डोक्यावर नाचवली जाते गणेश मूर्ती पेणच्या खरोशी गावातील आगळीवेगळी परंपरा नामदेव पाटील या गणेश भक्ताची अनोखी कला गणपती बाप्पाच्या विसर्जनाला भक्तीचे अनेक रंग पाहायला मिळतात; मात्र रायगडच्या पेण तालुक्यातील खरोशी गावात बाप्पाच्या विसर्जनाची परंपरा काहीशी अनोखी आहे. इथे विसर्जनाला निघालेली गणेशमूर्ती चक्क डोक्यावर नाचवली जाते... ना हाताचा आधार, ना कोणतीही डोरी किंवा टेकू! नामदेव कृष्णा पाटील हे गेली अनेक वर्षे ही अनोखी कला श्रद्धेने जपत आहेत. गणेशमूर्ती डोक्यावर तोलून धरत, तालावर बाप्पाला अक्षरशः नाचवत ते घरापासून विसर्जन घाटापर्यंत जातात. डोक्यावर विराजमान बाप्पा आणि त्याच्या तालावर थिरकणारे नामदेव पाटील... हे दृश्य पाहण्यासाठी गावकरी आणि भाविकांची मोठी गर्दी होते. श्रद्धा, कौशल्य आणि परंपरेचा अनोखा संगम असलेली ही विसर्जन मिरवणूक खरोशी गावाच्या गणेशोत्सवाची वेगळी ओळख बनली आहे.0
0
Report
उद्धव ठाकरे रात में मराठवाड़ा मुक्ती संग्राम स्मारक पहुंचे, राजनीतिक हलचल तेज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन त्या निमित्ताने उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजी नगर मध्ये येणार आणि मध्यरात्री मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन करणार आहेत.. एरव्ही मराठवाडा मुक्ती संग्रामच्या दिवशी मुख्यमंत्री सकाळी पहिला अभिवादन करतात मात्र उद्धव ठाकरे यावेळेस मध्यरात्रीच अभिवादन करणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शह देण्याचा उद्धव ठाकरे यांचा हा प्रयत्न आहे का अशा पद्धतीच्या ही चर्चा सुरू आहे , दरम्यान मराठ्यावाड्याच्या न झालेल्या विकासावर उद्धव सेनेकडून गेली दहा दिवस मराठवाड्यात आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे 17 तारखेला छत्रपती संभाजी नगर मध्ये आंदोलन करणार आहेत त्यासाठी ते येताय, यादरम्यान आज मध्यरात्री ते मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारकावर अभिवादन करतील मात्र यामुळे नव्या राजकीय वादाला मात्र सुरुवात होऊ शकते...0
0
Report
सोलापूर गणेशोत्सव के लिए तीन लाख मांगने पर हॉटेल व्यवसायी से खंडणी मामला दर्ज
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - गणपतीसाठी तीन लाखांची वर्गणी मागितल्याने हॉटेल व्यवसायिकाला आली चक्कर, कार्यकर्ता " नेताजी " विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल - सोलापूर शहरातील एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवानिमित्त हॉटेल व्यवसायिकाला मागितली तब्बल तीन लाख रुपयांची वर्गणी - वर्गणीची रक्कम ऐकताच हॉटेल व्यवसायिक एकनाथ घाडगे यांना आली चक्कर - मंडळाच्या नावावर पाचशे ड्रेसचे प्रत्येकी 600 रुपये याप्रमाणे तीन लाखांची करण्यात आली होती मागणी - मात्र हॉटेल व्यवसायिकांनी यापूर्वी दोन लाख रुपये दिल्याचे सांगत प्रत्येक वर्षी 25 हजार रुपये वर्गणी देण्याची दर्शवली होती तयारी - मात्र गणेश मंडळाचा कार्यकर्ता नेताजी शिवाजी शिंदे यांनी काहीही ऐकून न घेता हॉटेल व्यवसायीकाला शिवीगाळ केल्याचा आरोप - नेताजी शिंदे यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल0
0
Report
Advertisement
5 वर्षीय गणेश भक्त ने बारिश के लिए विनती की, नंदुरबार में उम्मीद जगी
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्याचे यंदा पावसाने पाठ फिरवली आहेत. त्यामुळे भीषण काळजी परिस्थिती निर्माण होताना दिसून येत आहे. गणपती बाप्पाचा आगमन जिल्ह्यात झालेला आहे. हितेन जयेश तांबोळी या अवघ्या 5 वर्षच्या गणेश भक्ताने बाप्पाला पावसासाठी विनवणी केली आहे. जिल्ह्यात पाऊस पडू दे आणि दुष्काळाचे सावट दूर कर असा विनवणी हे हितेन ने बाप्पाला केली आहे.0
0
Report
Vidarbha me agle hafte barish ki sambhavnā nahi; Nagpur me taapman 32-34°C.
Nagpur, Maharashtra:Vidarbha me agle hafte barish ki sambhavnā nahi; Nagpur ke Pradeshik Hawa-Mausam Vibhag ne kahā. Taapman 32 se 34°C tak pahunchne ki sambhavnā vyakt ki gayi. Julai–August me barish ki bahut kam thi. Uske baad September me bhi Nagpur me achhi barish hone ki sambhavnā nahi. El Niño ke prabhav se monsoon par bada prabhav dekha ja raha hai.0
0
Report
ओझर के अष्टविनायक मंदिर रोशनाई से जगमगा उठा, गणेशोत्सव की धूम
Barav, Maharashtra:गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात अष्टविनायक तीर्थक्षेत्र ओझरची विघ्नहर नगरी डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या आकर्षक विद्युत रोषणाईने अक्षरशः उजळून निघाली है. बाप्पाच्या आगमनानिमित्त संपूर्ण मंदिर परिसर रोषणाईच्या लखलखाटात न्हाऊन निघाला असून, उत्सव काळात येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी रंगणार आहे. मंदिर परिसराचे हे मनमोहक आणि विहंगम रूप थेट ड्रोन कॅमेऱ्यातून टीपण्यात आले असून, पाहुयात विघ्नहर नगरीची ही खास एक्स्क्लुझिव्ह दृश्ये.0
0
Report
Advertisement
नागपूर में 15 दिनों में स्वाइन फ्लू के 70 मरीज, डेंगू-मलेरिया के केस बढ़े
Nagpur, Maharashtra:नागपुरात १५ दिवसांत स्वाइन फ्लूचे ७० रुग्ण मिळून आले आहेत. बदलत्या हवामानामुळे व्हायरल तापाच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे; १ ते १५ सप्टेंबरदरम्यान डेंग्यूचे ९ तर मलेरियाचे ४ रुग्ण आढळले आहेत. यातच गणेशोत्सवाच्या गर्दीत संसर्ग वाढण्याचा धोका असल्यानं आरोग्य विभागाकडून खबरदारीचा आवाहन करण्यात आला आहे. स्वाइन फ्लूची प्रमुख लक्षणं ताप, खोकला, घसा खवखवणे, नाक वाहणे, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजणे आणि थकवा असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आरोग्य यंत्रणेचं आवाहन करण्यात आलं आहे. गणेशोत्सवातील गर्दीत मास्क आणि हातांची स्वच्छता महत्त्वाची असून खोकलताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करावा, बाहेरून आल्यावर साबणाने हात धुवा किंवा सॅनिटायझर वापरा; ताप २-३ दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. श्वास घेण्यास त्रास, उलट्या किंवा तीव्र डोकेदुखी असल्यास तातडीने उपचार घ्या; स्वतःच्या मनाने प्रतिजैविक औषधं घेणं टाळा. गणेशोत्सवाच्या गर्दीत आजारी व्यक्तींनी जाणं टाळण्याचं आवाहन, लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठांनी अतिगर्दीच्या वेळा टाळाव्या.0
0
Report
कोल्हापूर में डॉल्बी उत्सर्जन से ध्वनि प्रदूषण: 6 मंडलों पर FIR
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरातील राजारामपुरी मध्ये डॉल्बीचा वापर ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा मंडळांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजारामपुरी मध्ये आगमन मिरवणुकी दरम्यान पोलिसांनी 29 मंडळाच्या साऊंड सिस्टिमच्या आवाजाचे नमुने घेतले. त्यामध्ये 104 ते 109 डेसिबल पर्यंत आवाज गेलेल्या सहा मंडळांच्यावर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. शहरातील राजारामपुरी पोलिसात मंडळाचे अध्यक्ष आणि साऊंड सिस्टिम मालकाविरोधात हे गुन्हे दाखल झाले आहेत.0
0
Report
न्यू जर्सी में गणेशोत्सव का जश्न: नाभरे परिवार ने कला से शिवरूप गणेश बनाया
Amravati, Maharashtra:अमेरिकेतील न्यू जर्सीच्या नाभरे कुटुंबीयांच्या घरी बाप्पाचे थाटात आगमन; घरातील कला साहित्यातून साकारला शिवरूप गणरायाचा देखावा. महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत असून शशीन शंकरराव नाभरे यांच्या न्यू जर्सी येथील राहत्या घरी बाप्पाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले आहे. विशेष म्हणजे त्यांचा मुलगा यश नाभरे आणि मुलगी निधी नाभरे यांनी घरातील उपलब्ध कला साहित्याचा कल्पक वापर करत बाप्पाचा सुंदर देखावा साकारला आहे. या देखाव्यात बाप्पाचे पिता भगवान शिव यांचे त्रिशूळधारी रूपही आकर्षक पद्धतीने साकारण्यात आले आहे. परदेशात राहूनही आपल्या मातीतल्या संस्कृतीशी आणि गणेशोत्सवाच्या परंपरेशी नाते जपण्याचा हा सुंदर प्रयत्न ठरत आहे. त्यामुळे नाभरे कुटुंबीयांच्या या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.0
0
Report
Advertisement
अमित शाह कोल्हापुर दौरे पर, ग्रीन एनर्जी प्रकल्प का भूमिपूजन करेंगे
Kolhapur, Maharashtra:केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह 19 और 20 सितंबर को कोल्हापूर जिला दौरे पर आएंगे। 19 सितंबर शाम 5.05 बजे उनके कोल्हापूर विमानतळ पर आगमन होगा और उसके बाद वे शासकीय विश्रामगृह में ठहरेंगे। 20 सितंबर को हु्परी इथल्या कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्यात महालक्ष्मी ग्रीन एनर्जी कॉम्प्लेक्स के भूमिपूजन और किसान मेळाव्याला वे उपस्थित रहेंगे। उसके बाद दोपहर 4 बजे विमान से मुंबई लौटेंगे। इसके जरिए देश के पहले ग्रीन एनर्जी प्रकल्प के भूमिपूजन अमित शाह करेंगे, यह भाजप नेता प्रकाश आवाडे ने बताया।0
0
Report
शिरूर के किसान महिलाएं बारिश के लिए पारंपरिक गीत गाकर बरसात की मांग कर रहीं
Shirur, Maharashtra:गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने बळीराजाच्या नजरा पुन्हा एकदा आभाळाकडे लागल्या आहेत. पावसाअभावी उभी पिके करपू लागल्याने अनेक भागांत दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे शेतात कांदा लागवड करताना महिलांनी थेट पारंपरिक गाणी गात वरुणराजाला पावसासाठी आर्त साकडं घातलं आहे. हाता-तोंडाशी आलेली पिके वाचवण्यासाठी आता दमदार पावसाची नितांत गरज असून, वरुणराजा कधी बरसणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.0
0
Report
झिलपा तालाब में डूबे दो 13 साल के बालकों की दर्दनाक मौत
Nagpur, Maharashtra:गौराई विसर्जनासाठी आईसोबत तलावावर गेलेल्या दोन १३ वर्षीय बालकांचा तलावाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास झिलपा शिवारातील तलावावर घडली. आयुष हरीष कुमरे आणि दर्शन धनराज लाड दोघेही रा. झिलपा अशी मृत बालकांची नावे आहेत. या घटनेने झिलपा गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गावातील महिला गौराई विसर्जनासाठी सकाळी झिलपा शिवारातील तलावावर गेल्या होत्या. यावेळी काही मुलेही महिलांसोबत तलावाच्या पाण्यात उतरली होती. गौराई विसर्जन सुरू असताना आयुष कुमरे व दर्शन लाड हे दोघे पाण्यात बुडाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांसह उपस्थितांनी तत्काळ तलावाकडे धाव घेतली. आयुषचे काका आणि दर्शनचे काका यांनी पाण्यात उतरून दोन्ही बालकांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने काटोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच काटोल पोलिसांनी नोंद घेत पुढील कार्यवाही सुरू केली. आयुष हा आठवीत, तर दर्शन हा सातवीत शिक्षण घेत होता.0
0
Report
Advertisement
झुरकुटोला में बाघ के हमले से किसान की मौत, इलाके में दहशत
Bhandara, Maharashtra:वाघाच्या हल्ल्यात ७२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दुपारी उघडकीस आली. वातू बकाराम राऊत असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने झुरकुटोला परिसरासह लगतच्या गावांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, जंगलालगतच्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वातू राऊत हे सकाळच्या सुमारास घरातील शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी झुरकुटोला येथील पहाडीवरील जंगल परिसरात गेले होते. हा भाग एफडीसीएमच्या कंपार्टमेंट क्रमांक ५२४ मध्ये येतो. जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक राऊत यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. राऊत यांच्यासोबत असलेल्या इतर शेतकऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने गावात धाव घेत गावकऱ्यांना याची माहिती दिली. गावकऱ्यांनी तत्काळ वन विभाग व पोलिसांना कळविले. माहिती मिळताच वन विभागाचे पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वन कर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी करून वाघाच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. वाघाच्या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे...0
0
Report
सानपाड़ा गैस सिलिंडर विस्फोट: दो भाइयों की हालत गंभीर, दुकानें और इमारतें क्षतिग्रस्त
Navi Mumbai, Maharashtra:anchor: removed सानपाडा सेक्टर-१ येथील प्रतीक सोसायटीतील फास्ट फूडच्या दुकानात मंगळवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन दोन सख्खे भाऊ गंभीररित्या भाजल्याची घटना घडली. मनिष लालबहादुर यादव (२७) आणि अर्जुन लालबहादुर यादव (४६) अशी जखमी भावांची नावे आहेत. दोघांवर ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. सानपाडा सेक्टर-१ मध्ये प्रतीक सोसायटीतील गाळा क्रमांक १ मध्ये यादव बंधू फास्ट फूडचे दुकान चालवत होते. तसेच ते दुकानातच ते राहत होते. सोमवारी दिवसभर काम केल्यानंतर दोघे भाऊ रात्री उशिरा झोपी गेले. प्राथमिक तपासात दुकानात ठेवलेल्या तीन व्यावसायिक गॅस सिलेंडरपैकी एका सिलेंडरमधून रात्रीच्या सुमारास गॅसची गळती झाली..दुकान पूर्णपणे बंद असल्याने गळती झालेला गॅस दुकानातच साचून राहिला. मंगळवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास एका भावाने कामासाठी उठून दिवा लावण्यासाठी विद्युत स्विच दाबला. स्विच दाबताना झालेल्या स्पार्कच्या संपर्कात दुकानात साचलेला गॅस येताच आग भडकल्यानंतर क्षणार्धात सिलेंडरचा bhiषण s्फोट झाला. या स्फोटात दोन्ही भाऊ गंभीररित्या भाजले. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, दुकानाचे शटर उचकटून मोठे नुकसान झाले. आसपासच्या सुमारे पाच दुकानांनाही स्फोटाचा फटका बसला. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या सुरज हॉस्पिटललाही स्फोटाचे हादरे जाणवले. तसेच समोरील आणि आजूबाजूच्या इमारतींमधील घरांच्या व दुकानांच्या काचा फुटल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि सानपाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. दोन्ही जखमी भावांना प्रथम वाशीतील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरमध्ये हलविण्यात आले.0
0
Report
दीघी में देश का सबसे बड़ा ग्रीनफील्ड जहाज निर्माण प्रकल्प; 27 हजार करोड़ निवेश
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रायगडच्या दिघीत देशातील सर्वात मोठे शिपयार्ड; कोकणात २७ हजार कोटींची गुंतवणूक.. कोकणातील दिघी येथे देशातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकार आणि ‘माझगाव डॉक’ यांच्यात २७ हजार कोटींचा ऐतिहासिक करार झाला..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारामुळे देशाच्या जहाजबांधणी क्षमतेत महाराष्ट्राचा वाटा ४० टक्क्यांवर पोहोचणार आहे. युद्धनौका आणि व्यापारी जहाजांची निर्मिती करणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्यात सुमारे ९० हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत..0
0
Report
Advertisement
