411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मोदी के विरोधी माहौल के बावजूद क्या कुछ लोग मुद्दे बना रहे हैं? नाना पटोले का बयान
Bhandara, Maharashtra:मोदी है तो मुनकिन है! देशात मोदींविरोधी वातावरण आहे त्यामुळे असे काही मुद्दाम करून घेतात काय असा प्रश्न आहे.. नाना पटोले. नाना पटोले: नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात घुसखोरीचा प्रयत्न झालेला असून PMO कार्यालयाचा बनावट आय कार्ड मिळाला आहे. एकाकडे बंदूक देखील आढळून आले आहे.या वर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हे सर्व सहानुभूतीसाठी मुद्दामहून करतात काय असा प्रश्न उपस्थित केला आहे. देशात मोदी विरोधी वातावरण आहे आणि मुद्दामहून वातावरणाला वळण देण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने केला जात असल्याचे सांगितले आहे.0
0
Report
नालासोपारा पश्चिम के जिला परिषद स्कूल में खिचड़ी कुकर फटा; तीन घायल
Vasai-Virar, Maharashtra:नालासोपारा पश्चिमच्या जिल्हा परिषद शाळेत खिचडीचा कुकर फुटला; दोन विद्यार्थी व महिला जखमी\n\nनालासोपारा पश्चिम येथील जिल्हा परिषद शाळेत आज दुपारी साडेएकच्या सुमारास कुकर फुटल्याने मोठा अपघात झाला. या घटनेत दोन विद्यार्थी आणि एक महिला जखमी झाली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, शाळेत दररोजप्रमाणे दुपारच्या भोजनाचे वाटप सुरू होते. यावेळी विद्यार्थी जेवण घेण्यासाठी रांगेत उभे होते. त्याचवेळी अचानक कुकरचे झाकण उडाले आणि कुकरमध्ये शिजत असलेली गरम खिचडी आजूबाजूला उडाली. या गरम खिचडीच्या संपर्कात आल्याने दोन विद्यार्थी आणि एक महिला जखमी झाले.\nजखमी विद्यार्थ्यांची नावे आयुष चौधरी आणि गौतम प्रसाद अशी आहेत, तर जखमी महिलेचे नाव पूनम मंगेश कदम असे असल्याची माहिती मिळाली आहे.\nघटनेची माहिती मिळताच वसई-विरारचे महापौर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले.0
0
Report
केडीएमसी अधिकारी को फटे शॉल से सत्कार, खड्डे की मार बढ़ी नगर में
Kalyan, Maharashtra:फाटकी शॉल देऊन केडीएमसी अधिकारी यांना सत्कार. कल्याणच्या रामबाग खडक चिकनघर येथील अनेक रस्त्यावर खड्डे पडल्याने वारंवार तक्रार करून सुद्धा खड्डे बुजवत नसल्याने अखेर आज केडीएमसी अधिकारीाच्या दालनात शॉल देऊन सत्कार केला. केडीएमसी खड्डे बुजवण्यासाठी लाखो रुपये खर्च करते मात्र रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे तर केडीएमसी क्षेत्रात खड्डे बुवण्याचे काम सुरु देखील आहेत मात्र दोन दिवसांपूर्वी खड्डे बुवलेले खड्डे पुन्हा खड्डे पडत आहेत त्यामुले नगरसेवकांना नागरिक प्रश्न विचारत आहे काही दिवसांवर गणपती चे आगमन होणार आहे मुंबई मध्ये गणपती आगमनाच्या वेळी घटना झाली होती अशी घटना होऊ नये त्यामुळे आज पालिका अधिकारीांना फाटकी शॉल देऊन सत्कार करण्यात आला0
0
Report
Advertisement
फार्महाउस में बिबट्या प्रवेश, पालतू कुत्ता रॉकी ने दी बेमिसाल भिड़ंत
Ambernath, Maharashtra:मनसे माजी आमदार राजू पाटील यांच्या बंधूंच्या फार्महाऊसमध्ये दुपारी 7 वाजता बिबट्याची इंट्री. पाळीव कुत्रा रॉकीने दिली झुंज. थरारक CCTV फुटेज व्हायरल. विजय पाटील यांनी साखरे गावातील फार्महाऊसवर बिबट्याची इंट्री घेतली. फार्महाऊसमधील पाळीव कुत्रा ‘रॉकी’वर बिबट्यानं अचानक हल्ला चढवला. हल्ल्यानंतर रॉकीने प्रतिकार करत थेट बिबट्याचा जबडा पकडून ठेवला. बिबट्यानं नखांचे वार केल्यानंतर रॉकीने जबडा सोडला. त्यानंतर बिबट्याने माघार घेतली. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झालीय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने परिसरात भीती आणि चर्चेला उधाण आलंय.0
0
Report
विक्र्रोली के टैगोर नगर में 7 फुट का अजगर मिलने से क्षेत्र में दहशत
Mumbai, Maharashtra:विक्रोळी टागोर नगर येथील संदेश विद्यालय कॉलेज शेजारील छत्रपती शाहू महाराज मैदानात ७ फुटाचा अजगर आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी तात्काळ सर्पमित्रांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या सर्पमित्रांनी अजगराला सुरक्षितपणे रेस्क्यू करून जंगलात सोडले.0
0
Report
डिंभे बोगदा मामला: शरद पवार के साथी छोड़ने का कारण क्या बना?
Ambegaon, Maharashtra:शरद पवारांची साथ सोडण्यामागील खरं कारण अन् महायुती सरकारला निर्वाणीचा इशारा; वळसे पाटलांच्या विधानाने चर्चांना उधाण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अनेक नेत्यांनी पक्षांतरामागे विकासाचे कारण पुढे केले होते. मात्र, शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडण्याचे खरे कारण उघड केले असून, त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. "डिंभे धरणातून निघणारा बोगदा रद्द करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता, केवळ आणि केवळ त्या एका शब्दासाठी मी साहेबांची साथ सोडली," असा थेट आणि खळबळजनक खुलासा वळसे पाटलांनी केला आहे. डिंाभे ते माणिकडोह या १६ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित बोगद्यावरून आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटलांनी आपल्या राजकीय भूमिकेचा उलगडा केला. विधानसभा निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि माझ्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत हा वादग्रस्त बोगदा कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही, असा शब्द देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. हा बोगदा रद्द व्हावा आणि शेतकऱ्यांचे पाणी वाचावे, म्हणूनच आपण शरद पवार यांच्यापासून दूर होऊन अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पुणे जिल्ह्याच्या रांजणगाव येथे एका कार्यकामात ते बोलत होते.0
0
Report
Advertisement
खेड बस अड्डे पर भाजपा का प्रदर्शन; प्रशासन ने आश्वासन के बाद आंदोलन रोका
Ratnagiri, Maharashtra:खेड एसटी आगाराच्या मनमानी कारभाराविरोधात भाजपचे धडक आंदोलन; प्रशासनाची लेखी आश्वासनानंतर माघार. खेड आगारातील नियोजनशून्य कारभार, विद्यार्थ्यांचे होणारे हाल आणि कर्मचाऱ्यांच्या अरेरावीविरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने खेड बस स्थानकावर आक्रमक आंदोलन छेडण्यात आले. माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विद्यार्थी आणि नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाचा वाढता दबाव पाहून अखेर आगार व्यवस्थापकांनी नमती घेत फेऱ्या नियमित करणे, सर्व थांब्यांवर बसेस थांबवणे आणि वादग्रस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले; त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.0
0
Report
मराठा आरक्षण आंदोलन: उमरखेड में बंद, मनोज जारंगे पाटील के समर्थन में व्यापक जवाब
Yavatmal, Maharashtra:मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज उमरखेड तालुका व शहर बंद आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवण्यासाठी हा बंद शांततेत पाळण्यात आला. सर्व व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने व आस्थापने बंद ठेवून या आंदोलनाला समर्थन दर्शविले. "मराठा समाजाच्या न्यायासाठी आजही आम्ही लढतोय... मनोज जरांगे पाटील हेच आमचे नेते," अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.0
0
Report
मालेगांव में नाबालिग के साथ अत्याचार-हत्या, डोंगराळे केस का निर्णय जल्दी संभव
Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) : ब्रेकिंग... - डोंगराळे येथील अल्पवयीन मुलगी अत्याचार व खून प्रकरण.... - मा.मालेगाव अपर जिल्हा व सत्र न्यायालयात सरकारी पक्षाचा अंतिम युक्तीवाद संपला... - सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड.उज्वल निकम यांनी मांडला अंतिम युक्तिवाद... - आरोपी पक्षातर्फे 16 सप्टेंबरला ' युक्तिवाद ' मांडण्यात येणार... - त्यानंतर मा.न्यायालय निकालाची तारीख जाहीर करेल.. - मा. अपर जिल्हा सत्र न्यायालयात डोंगराळे खटल्याची ' इन कॅमेरा ' करण्यात आली सुनावणी... - आतापर्यंत 24 साक्षीदारांची तपासणी पूर्ण... - डोंगराळे खटल्याचा लवकरच निकाल लागणार.. - डोंगराळे खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लागले लक्ष..0
0
Report
Advertisement
इंदापुर में तेज बारिश से किसानों को बड़ी राहत मिली
Rui, Maharashtra:इंदापूर शहरासह तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात..पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा.. अंकोर - अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे इंदापूर शहर आणि परिसरात एक तासापेक्षा अधिक काळ पावसाने हजेरी लावली. सकाळपासून उकाडा जाणवत होता. मात्र, दुपारनंतर अचानक पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतर पावसाचा जोर कायम आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या शेतातील पिकांना पाण्याची मोठी गरज असताना हा पाऊस झाल्याने पिकांना चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे...0
0
Report
इंदापूर में दहीहंडी उत्सव: नगराध्यक्ष भरत शाह के साथ प्रदर्शन
Rui, Maharashtra:पारंपरिक वाद्याच्या गजरावर थिरकले इंदापूरकर.... नगराध्यक्ष भरत शहा यांसह इंदापूरकरांनी धरला ठेका इंदापूर शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात भरत शहा मित्र परिवाराचा दहीहंडी सोहळा पार पडला.या सोहळ्यात पारंपारिक वाद्याच्या गजरावर नगराध्यक्ष भरत शहा यांसह दिग्गज राजकीय मंडळी आणि इंदापूरकरांनी ठेका धरला.0
0
Report
डेरवण में 12वीं क्रॉस कंट्री: 700 से अधिक धावकों ने मचाई धूम
Ratnagiri, Maharashtra:डेरवण (चिपळूण).. रत्नागिरी डेरवणमध्ये १२वी क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहात; ७०० हून अधिक धावपटूंचा सहभाग.. एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकॅडमी व रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे आयोजित १२वी कमलाकरपंत वालावलकर स्मृती क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहात पार पडली.. राज्यातील ७०० हून अधिक खेळाडूंच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत प्रन्मय शेंबेकर, ईश्वरी मुळे, श्रावण साळुंखे, अबोली वास्के, वैभव गाडे, स्वरा उपशेटे, athर्व ताटे आणि रिया गोंडाळ यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंना ५५ हजार रुपयांची रोख पारितोषिके व पदके देऊन गौरवण्यात आले.0
0
Report
Advertisement
Shweta Mahale's power display sparks response; Sanjay Gaikwad strikes back
Buldhana, Maharashtra:‘बाप तो बाप रहेगा’वर श्वेता महालेंचा ठेका... गायकवाडांचा पलटवार, ‘बापासारखं शरीर कुठून आणणार?’ ANCHOR बुलढाण्यात महायुतीच्या संसारात पुन्हा एकदा ठिणगी पडलीये... भाजप आमदार श्वेता महाले यांच्या पतीच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात झालेलं शक्तिप्रदर्शन आता चांगलंच चर्चेत आलंय... ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर श्वेता महालेंचा ठेका... धनुष्यबाणाचं चिन्ह दाखवत दिलेला राजकीय इशारा... t्यानंतर संजय गायकवाडांना दिलेलं थेट ओपन चॅलेंज... आणि आता गायकवाडांचा तुफान पलटवार... ‘माझ्याकडे हरामाचा पैसा नाही, मोठ्या रॅली काढायला... बाप तो बाप रहेगा, पण बापासारखं शरीर कुठून आणणार?’ या वक्तव्यामुळे बुलढाण्यातील राजकीय संघर्ष आणखी पेटलाय... --- VO-1 वाढदिवस... पण शक्तिप्रदर्शन मात्र एखाद्या निवडणूक प्रचाराच्या रॅलीसारखं... कार्यकर्त्यांची गर्दी... घोषणांचा गजर... आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी भाजप आमदार श्वेता महाले... ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर महालेंनी ठेका धरला... मात्र, गाण्यापेक्षा चर्चेत आलं ते त्यांचं धनुष्यबाणाचं चिन्ह दाखवणं... नेमकं हे चिन्ह कुणासाठी? राजकीय इशारा कुणाला? याची चर्चा सुरू असतानाच वीजपुरवठा खंडित झाला... आणि श्वेता महाले थेट आक्रमक झाल्या... --- VO-2 वीज गेल्यानंतर श्वेता महालेंनी नाव न घेता संजय गायकवाडांवर निशाणा साधला... ‘हिम्मत असेल तर समोरासमोर येऊन लढा... बुजदिलासारखं काम करू नका,’ असा थेट इशाराच त्यांनी दिला... इतकंच नाही... ‘बुलढाण्यात हुकूमशाही चालणार नाही... बुलढाणेकरांनी घाबरू नये, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,’ असं म्हणत महालेंनी गायकवाडांना थेट आव्हान दिलं... BYTE – श्वेता महाले --- VO-3 महालेंच्या या आव्हानानंतर आता संजय गायकवाडांनीही मैदानात उतरत पलटवार केलाय... शक्तिप्रदर्शनावरून गायकवाडांनी महालेंना लक्ष्य केलं... ‘माझ्याकडे हरामाचा पैसा नाही, मोठ्या रॅली काढायला...’ असा थेट हल्लाबोल त्यांनी केला... पण गायकवाड इथेच थांबले नाहीत... ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्याचा धागा पकडत त्यांनी श्वेता महालेंची खिल्ली उडवली... ‘बाप तो बाप रहेगा... पण बापासारखं शरीर कुठून आणणार?’ असा खोचक टोला गायकवाडांनी लगावला... BYTE – संजय गायकवाड --- VO-4 म्हणजे एकीकडे महालेंचं ओपन चॅलेंज... तर दुसरीकडे गायकवाडांचा बोचरा पलटवार... आणि या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या शक्तिप्रदर्शनाची... विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी संजय गायकवाड यांच्या पुत्राचाही चिखलीत शक्तिप्रदर्शन करत वाढदिवस साजरा झाला होता... आता महाले यांच्या कार्यक्रमातही तसंच शक्तिप्रदर्शन... त्यामुळे हे केवळ वाढदिवसाचे कार्यक्रम आहेत? की बुलढाण्यातील आगामी राजकीय ताकद आजमावण्याची रंगीत तालीम? हा सवालही आता उपस्थित होतोय... --- OUTRO एकाच महायुतीतले दोन आमदार... पण बुलढाण्यात मात्र आरोप-प्रत्यारोपांची धग... ‘हिम्मत असेल तर समोरासमोर या’, म्हणणाऱ्या श्वेता महाले... आणि त्याला... ‘माझ्याकडे हरामाचा पैसा नाही, मोठ्या रॅली काढायला... बापासारखं शरीर कुठून आणणार?’ असं म्हणत पलटवार करणारे संजय गायकवाड... वाढदिवसाच्या रॅलीपासून सुरू झालेला हा वाद आता थेट व्यक्तिगत टोमण्यांपर्यंत पोहोचलाय... महायुतीत दोन्ही नेते एकत्र... पण बुलढाण्यात राजकीय तलवारी मात्र म्यानातून बाहेर... तर सवाल आता हाच— महायुतीच्या मंचावर एकत्र असलेले हे नेते बुलढाण्यात एकमेकांविरोधातच मैदानात उतरलेत का? आणि बुलढाण्यात महायुतीच्या संसारात पडलेला हा मिठाचा खडा... पुढे मोठ्या राजकीय वादळाचं रूप घेणार का? मयुर निकम, झी 24 तास, बुलढाणा.0
0
Report
केडीएमसी मुख्यालय के बाहर आशेळेकर समर्थकों का पानी के लिए आक्रोश
Kalyan, Maharashtra:आशेळेकरांचा पाण्यासाठी आक्रोश; रिकामे हांडे-बादल्या घेऊन केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा. केडीएमसी आतुक्त अभिनव गोयल च्या कार्यालय बाहेर ठिय्या आंदोलन.. केडीएमसी आशेळेगाव परिसरातील पाणी समस्येवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या वतीने पाणी समस्येमुळे केडीएमसी मुख्यालयत बाहेर हंडा,कळशी मोर्चा काढण्यात आला नागरिकांनी रिकामे हंडे कळशी घेऊन केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाच्या विरोधात आक्रोश करत रिकामे नळ आता नाही चालणार’, ‘पाणी नाही... जगणं कठीण’ हातात बँनर घेत जोरदार घोषणा देत नागरिकांनी संताप व्यक्त केला. आशेळेकरांना हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच जोपर्यत आयुक्त लेखी लिहून देत नाही तो पर्यत केडीएमसी आतुक्तच्या कार्यालया बाहेर बसून राहणार अशी भूमिका नगरसेविका कीर्ती ढोणे आणि नागरिकांनी घेतली आहे.0
0
Report
नाशिक में गणेशोत्सव बैठक: डीजे बंदी पर अभी निर्णय नहीं
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळे आणि पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, आमदार देवयानी फरांदे आणि सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या आयोजनादरम्यान येणाऱ्या विविध अडचणी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडल्या. या सर्व अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असं आश्वासन आमदार देवयानी फरांदे यांनी दिलं आहे. 'आपलं नाशик, आपला कुंभ, आपला गणेशोत्सव' या ब्रीदवाक्याने यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन आमदार देवयानी फरांदे यांनी गणेश मंडळांना केलं आहे. दरम्यान, डीजे बंदीबाबत या बैठकीत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. पुढील दोन ते तीन दिवसांत यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी दिली. तर डीजे बाबत न्यायालयाच्या नियमांचे पालन करूनच परवानगी दिली जाईल, अशी स्पष्ट भूमिका नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मांडली आहे. दरम्यान या बैठकीनंतर आमदार देवयानी फरांदे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी काय भूमिका मांडली ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे...0
0
Report
Advertisement
