411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सातारा के कोयना में प्रकाश भोसले ने तापोला-अहिर पुल की हूबहू प्रतिकृति बनाई
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील कोयना विभागातील तेटली येथील प्रकाश भोसले यांनी यंदाच्या घरगुती गणेशोत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी 'तापोला-अहिर पुला'चा हुबेहूब देखावा साकारला आहे. पुलाची रचना, आकार आणि परिसराचे बारकावे अचूक टिपून तयार केलेली ही आकर्षक प्रतिकृती पाहण्यासाठी स्थानिक नागरिक मोठी गर्दी करत आहेत. विभागातील विकासकामांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि उपमुख्यमंत्र्यांवरील प्रेमापोटी साकारलेला हा कल्पक देखावा सध्या संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.0
0
Report
प्रतापगढ़ किले में मशाल महोत्सव की तैयारी तेज, उदयनराजे भोसले ने पूजा की
Satara, Maharashtra:सातारा: किल्ले प्रतापगड येथे १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मशाल महोत्सवाच्या तयारीला आता जोरदार वेग आला आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे किल्ले प्रतापगड येथील मशाल महोत्सव समितीच्या मावळ्यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हस्ते विधीवत मशाल पूजन पार केले. या पूजनानंतर उदयनराजेंनी मशाली तयार करणे, गडाची स्वच्छता, भव्य स्टेज उभारणी आणि महाप्रसाद अशा सर्व पूर्व तयारीचा आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला आणि शौर्याला अभिवादन करणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त हजेरी लावत असतात.0
0
Report
8 महीने की चिमुकली के लापता होने से नांदगांव में हलचल, पुलिस जांच तेज
Nashik, Maharashtra:नांदगाव(नाशिक) विशाल मोरे - 8 महिन्यांच्या चिमुकलीच्या बेपत्ता होण्याने खळबळ... नांदगाव तालुक्यातील मन्याड चौकी येथील (दि. 17) मध्यरात्रीची घटना.. मध्यरात्री 12 वाजेच्या दरम्यान आई - वडिलांच्या अंथरुणावरून चिमुरडी गायब.. स्थानिक गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस यंत्रणेसह स्थानिकांकडून चिमुरडीचा कसून शोध सुरु.. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटना स्थळी तळ ठोकून.. या प्रकरणी नांदगाव पोलिसात चिमुकलीच्या वडिलांनी दिली अपहरणाची फिर्याद.. केवळ आठ महिन्यांची चिमुकली बेपत्ता झाल्याने विविध प्रश्न व शंका केल्या जाताहेत उपस्थित...0
0
Report
Advertisement
पुणे जिले के 13 लाख मतदाताओं को नोटिस, मतदाता सूची पुनरीक्षण की तैयारी शुरू
Pune, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील 13 लाख मतदारांना नोटीसा... एस आय आर मोहीम त्या गुरुवारपासून सुनावण्यांना सुरुवात... मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुननिरीक्षण मोहिमेअंतर्गत अंतिम मतदार यादी निश्चित करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील १३ लाख ३२४१८ मतदारांना नोटीस बनवण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे जिल्ह्यात 24 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान सोनवणे घेतल्या जाणाऱ्या सून 28 सप्टेंबर पासून प्रक्रिया नियमितपणे राबवली जाईल.0
0
Report
पुणे में गणेश दर्शन: बेलबाग चौक पर AI कैमरे से भीड़ की गिनती शुरू
Pune, Maharashtra:पुणे पाच दिवसांमध्ये पंधरा लाख भाविक.... बेलबाग सह महत्त्वाच्या चौकात एआय द्वारे मोजणी.... गणेश उत्सवाच्या उत्साहात मध्यवर्ती पुण्यात गणेश दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे... 14 सप्टेंबर पासून पाच दिवसात 15 लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे गर्दीचे अचूक प्रमाण समजून घेण्यासाठी पुणे पोलिसांनी बेलबाग सहप्रमुख चौकात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कॅमेरे बसवले आहेत या हेडकाऊंट प्रणालीमुळे गर्दीचा प्रत्यक्ष आकडा उपलब्ध होत असून त्यानुसार बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्थेत बदल केले जात आहेत.0
0
Report
गायकवाड़ परिवार के खिलाफ मोका केस; अजय मिसाल की नियुक्ति, दो थानों में मामला
Pune, Maharashtra:गायकवाड़ परिवार के खिलाफ मोका केस के बढ़ते अड़चनों में, गुंड नाना गायकवाड, गुंड गणेश गायकवाड और नंदा गायकवाड के विरुद्ध मामला सामने आया है। इस मोका प्रकरण में विशेष सरकारी वकील के तौर पर एडवोकेट अजय मिसाळ की नियुक्तি की गई है और राज्य सरकार ने मिसाल नियुक्ति के आदेश जारी किए। चतुर्शिंगी और सांगवी पुलिस थानों में दाखिल गुन्हों के मामलों में मिसार की नियुक्ति हुई है। बेकायदे सावकारी, सशस्त्र डकैति, अपहरण और महापालिका में बनावट कागदपत्र बनाकर सरकार को धोखा देने जैसे गंभीर आरोप गायकवाड परिवार पर हैं। इन दोनो प्रकरणों में अजय मिसार सरकार की तरफ से कोर्ट में पक्ष रखेंगे।0
0
Report
Advertisement
कोथरूड में IT इंजीनियर ने घर पर वृंदावन-सरीखा प्रेम मंदिर बना कर चकित किया
Shirur, Maharashtra:पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच, कोथरूडमध्ये एका आयटी अभियंत्याने साकारलेला घरगुती देखावा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतोय. कोथरूडच्या नळस्टॉप परिसरात राहणाऱ्या सुरज सुतार यांनी आपल्या घरात थेट वृंदावनच्या प्रसिद्ध 'प्रेम मंदिरा'ची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. भक्ती आणि कलेचा हा अनोखा संगम पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे. सुरज सुतार यांनी मोठ्या खर्चाच्या दिखाऊ सजावटीला फाटा देत, घरगुती साहित्याचा अत्यंत कल्पकतेने वापर करत हे देखणे 'प्रेम मंदिर' उभारले आहे. मंदिराची बारीक कलाकुसर आणि आकर्षक रोषणाई यामुळे बाप्पाच्या दरबारात वृंदावन अवतरल्याचा भास होत असून, हा अनोखा देखावा पाहण्यासाठी परिसरातील गणेशभक्तांची पावले नळस्टॉपकडे वळत आहेत.0
0
Report
रामानंद संप्रदाय की वसुंधरा पायी दिंडी का यवतमाळ में जल्लोषपूर्ण स्वागत
Yavatmal, Maharashtra:नाणीजधाम येथील रामानंदाचार्य नरेंद्रचार्य यांच्या रामानंद संप्रदायाच्या वतीने उपपीठ नागपूर ते नाणीजधाम या वसुंधरा पायी दिंडीचे यवतमाळ मध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. वसुंधरा पायी दिंडीच्या निवासस्थानी वृक्षारोपण करण्यात आले. ‘पर्यावरणाची करु रक्षा मग पृथ्वीची होईल सुरक्षा’ अशा घोषणा करत वसुंधरा पायी दिंडीत सुमारे दोन हजार भाविक भक्तगण सहभागी झाले आहेत. पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदलाविषयी जनजागृती करण्यासाठी काढली जाणारी ही वार्षिक पदयात्रा आहे. सिद्ध पादुका रथासह निघालेली ही दिंडी ४० दिवसांत दररोज २० ते २५ किलोमीटर प्रवास करित आहे. यावेळी ग्रामस्वच्छता, पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपणाचे उपक्रम राबविण्यात येत असून, २१ ऑक्टोबर रोजी नाणीज येथे दिंडीचा समारोप होणार आहे.0
0
Report
ग्रामसभा में निधि-विकासकार्य के सवाल पर अधिकारी ने धमकी दी, वीडियो वायरल
Bhandara, Maharashtra:ग्राम विकास अधिकारीाची ग्रामस्थांवर मुजोरी.... निधीचा हिशोब मागितल्यावर प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी धमकी... पोलिस तक्रार करून जमानत होऊ देणार नाही.... ग्रामसभेतील व्हिडिओ व्हायरल Anchor :- भंडारा जिल्ह्याच्या डोंगरी बु. ग्रामपंचायतीच्या निधीचा hिशोब मागणे हा नागरिकांचा अधिकार असताना, डोंगरी बु. येथे ग्रामसभेत निधी व विकासकामांबाबत प्रश्न विचारले यात ग्रामविकास अधिकारी यांनी उत्तरे दिली नाही म्हणून एका नागरिकांनी तुम्ही राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यावर ग्राम विकास अधिकारी यांनी तुम्ही पगार देता का? तसेच मी तुमची पोलिस तक्रार करेन व जमानत (जामीन) होऊन देणार नाही. अशी धमकी दिली आहे. त्यामुळे एखाद्या ग्रामविकास अधिकाऱ्याला विकास कामाबद्दल प्रश्न विचारणे चुकीचे आहे. का असा प्रश्न आता ग्रामस्थांना पडला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर Viral होत असून अशा ग्राम विकास अधिकारीवर कारवाई होणे गरजेचे आहे.....0
0
Report
Advertisement
नांदगाव तालुक्यात सूखा संकट गहन, खेती और पशुधन के लिए सरकार तुरंत कदम उठाए
Nashik, Maharashtra:नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर करण्यासाठी दुष्काळसदृश परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करून आवश्यक उपाययोजनांची तातडीने कार्यवाही करा... - आ.सुहास कांदे यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश.. - पर्जन्यमान, पिकांची सद्यस्थिती, पिकांचे झालेले नुकसान, पाण्याची उपलब्धता, भूजल पातळी, चारा व पशुधनाचा घेतला विभागनिहाय आढावा.. - नांदगाव तालुका दुष्काळी आढावा बैठक संपन्न.. Anc- नांदगाव तालुक्यात अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने शेती क्षेत्रावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे.कमी पर्जन्यमानामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याबरोबरच आगामी काळात पशुधनासाठी चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.. या पार्श्वभूमीवर दुष्काळसदृश परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करून शासनस्तरावर आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या दृष्टीने विभागनिहाय कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार सुहास कांदे यांनी प्रशासकीय दुष्काळी आढावा बैठकीत दिल्या..दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आवश्यक शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विभागांनी समन्वयाने काम करावे..दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने केवळ कागदोपत्री अहवाल न तयार करता प्रत्यक्ष क्षेत्रीय परिस्थितीची पाहणी करून गावनिहाय वस्तुनिहावा आढावा घेण्यात आला. बैठकीस महसूल, कृषी, पंचायत समिती, ग्रामविकास, जलसंधारण तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..0
0
Report
मराठवाड़ा के जल संसाधन: निधि कमी, 10 साल और लगेंगे प्रकल्प पूरे
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडून सध्या २७ प्रकल्प बांधकामाधीन आहेत. या प्रकल्पांवर ४४ हजार ८६७ कोटी रुपये अद्ययावत खर्च होणार आहे. त्यापैकी १८,४८१ कोटी रुपये खर्च झाले असून २६,३८५ कोटींची मराठवाड्याला गरज आहे. मात्र, दरवर्षी २,६०० कोटींचाच निधी मिळत आहे. त्यामुळे आणखी किमान दहा वर्षे हे प्रकल्प पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार आहे. परिणामी, मराठवाड्यासाठी अतिरिक्त निधी देण्याची मागणी करण्यात येत आहे. एकीकडे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याची भाषा मुख्यमंत्री करत आहेत आणि दुसरीकडे जलसंपदा कामासाठी निधीच मिळत नसल्याने मराठवाडा दुष्काळमुक्त होणार कसा असा प्रश्न उपस्थित होतो..0
0
Report
विदर्भ में सूखे के बीच शिवसेना ने सरकार के खिलाफ मोर्चा निकाला
Yavatmal, Maharashtra:यंदाच्या खरीप हंगामात पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून पश्चिम विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात रस्त्यावर उतरून धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत यवतमाळ जिल्ह्यात आमदार नितीन देशमुख आणि आमदार संजय देरकर यांनी शिवसैनिकांची बैठक घेतली. 21 ते 30 सप्टेंबर दरम्यान विदर्भात हे मोर्चे निघतील, यवतमाळात 23 सप्टेंबरला शिवसैनिक शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकतील. सद्यस्थितीत पावसाअभावी पिकांची परिस्थिती अतिशय वाईट आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी, पिक विम्याचे चार ट्रिगर सुरू करावे, चारा डेपो चे नियोजन करावे, शेतकऱ्यांना 24 तास वीज द्यावी अशा प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना सरकारला धारेवर धरेल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिला आहे.0
0
Report
Advertisement
छत्रपती संभाजीनगर में अवैध प्लॉटिंग बेलगाम, प्रशासन क्यों नहीं सख्त?
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहराच्या चारही दिशांमध्ये मनपा hddaीत बेकायदेशीर प्लॉटींग सुरू आहे. महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आणि मुद्रांक विभागातील खाबुगिरीमुळे बेकायदेशीर प्लॉटिंग फोफावत आहे. जमिनीचे अनधिकृतरीत्या तुकडे करून ते विकणे तुकडाबंदी कायद्यानुसार बंद असतानाही मुद्रांक विभागातील अनेक दुय्यम निबंधकांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे. महसूल आणि मुद्रांक विभागाच्या या प्रकारामुळे बेकायदेशीर प्लॉटिंगचा सुळसुळाट सुरू आहे. मनपाने कारवाई केल्यानंतरही महसूल व मुद्रांक विभागाने अद्याप गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. गेल्या पंधरवड्यात पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाने कारवाई करीत जमिनीवर पाडलेले १ हजारहून अधिक प्लॉट सपाट करून प्लॉटिंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. त्यासोबतच महसूल विभागासोबत बैठक घेत सदरील सर्व गट क्रमांक खरेदी विक्रीच्या व्यवहारांसाठी लॉक करण्याची मागणी केली मात्र महसूल आणि मुद्रांक विभागाचं साफ दुर्लक्ष आहे त्यामुळे मनपाच्या कारवाईला काय अर्थ राहणार अशी चर्चा सुरू आहे..0
0
Report
नारळीबाग ड्रग्स सप्लायर नदीम शेख गिरफ्तार, 2.53 लाख कीमत के MD ड्रग्स जप्त
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:स्वतःच्या व्यसनाची गरज भागवण्यासाठी उच्चशिक्षित प्रॉपर्टी डीलरने अंमली पदार्थांच्या विक्रीत उतरल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजी नगर पोलिसांच्या अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाने नारळीबाग परिसरात कारवाई करत नदीम इब्राहिम शेख याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून २ लाख ५३ हजार ८७० रुपये किमतीचे ५१ ग्रॅम २९ मिलिग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. हे ड्रग्ज मुंबईतून आणल्याचे स्पष्ट झाले असून, सिटी चौक पोलिसांत मुंबईच्या सप्लायरसह दोनघांवर गुन्हा दाखल झाला आहे.0
0
Report
एल निनो के कारण फसल और पानी की स्थिति बिगड़ने लगी; सरकार ने आपात जल योजना शुरू की
Yavatmal, Maharashtra:अल निनोचा प्रचंड प्रभाव हवामानावर झाला असून, शेती पिके व पाण्याची अवस्था वाईट आहे... दरम्यान येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी राज्याचा जल व मृदा संधारण विभाग सक्रिय आहे अशी ग्वाही जल व मृदा संधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, पाण्याचे योग्य नियोजन करावे असे आवाहन त्यांनी केले. पावसाचा प्रत्येक थेंब उपयोगात आणण्यासाठी जल व मृद संधारण विभागातर्फे नाला खोलीकरण, गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार, नवीन स्ट्रक्चर आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. Yावेळी पिकांची अवस्था वाईट आहे, उत्पन्नात देखील घट राहील या बाबी आम्ही कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांपुढे मांडलेल्या आहेत असे मंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केले.0
0
Report
Advertisement
