411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चंद्रपुर के विद्युत केंद्र से लाखों के कॉपर वायर की चोरी: CISF सुरक्षा के बीच 10 आरोपी गिरफ्तार
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- जिल्ह्यात सर्वोच्च सुरक्षा कवच असलेल्या चंद्रपूर वीज केंद्रातील लाखो रुपयांच्या कॉपर वायर चोरीचा पर्दाफाश, या केंद्राला आहे सीआयएसएफ जवानांचे सुरक्षा कवच , महाराष्ट्र सुरक्षा रक्षक अर्थात एम एस एफ जवानांसह 10 आरोपी अटकेत, लाखो रुपयांचा चोरीच्या कॉपर वायरचा साठा केला जप्त अँकर:-- जिल्ह्यात सर्वोच्च सुरक्षा कवच असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातून लाखो रुपयांच्या कॉपर वायर चोरीला जात आहेत. या केंद्राला सीआयएसएफ च्या केंद्रीय सुरक्षा दलाचे कवच आहे. मात्र दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असलेल्या एका मोठ्या घटनेचा तपास करताना पोलिसांना अपेक्षित यश मिळाले आहे. संच क्र 9, या अत्याधुनिक संचातुन कॉपर वायर चोरी करताना महाराष्ट्र सुरक्षा रक्षक अर्थात एम एस एफ जवानांसह 10 आरोपीना अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी लाखो रुपयांच्या चोरीच्या कॉपर वायर आणि ट्रक सह 22 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. CISF ची सुरक्षा असताना वीज केंद्रातील प्रमुख संचातून कॉपर वायरची चोरी होतेच कशी? यात कोण कोण सामील आहेत, महाजेनकोच्या लुटीत कोण सहभागी आहेत असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. बाईट १) संतोष शेगावकर, पोलीस निरीक्षक, दुर्गापूर पोलीस ठाणे आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
इंदापुर में राजनीतिक दोस्ती: भरणे और पाटिल परिवार एक साथ डिनर
Rui, Maharashtra:इंदापुरात कृषी मंत्री भरणे यांचे पुत्र आणि बंधू हर्षवर्धन पाटलांच्या निवासस्थानी...... श्रीराज भरणे आणि मधुकर भरणे यांची हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी भेट...... गौरी गणपतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटलांसोबत एकत्र डिनर.... गेल्या वर्षभरापासून दोन्ही घराण्यातील राजकीय कटूता संपली...... इंदापूरात माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुत्र पंचायत समितीचे सदस्य श्रीराज भरणे आणि मंत्री भरणे यांचे बंधू मधुकर भरणे यांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतलाय. गौरी गणपतीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवत हर्षवर्धन पाटील पुत्र राजवर्धन पाटील यांच्यासोबत जेवणाचा मनमुराद आनंद घेतलाय... गेली 25 वर्षाहून अधिक काळ इंदापूरच्या राजकारणात हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जात होते.मंत्री भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा सलग तीन वेळा पराभव केलेला आहे.मात्र मागील वर्षभरापासून आमच्या दोघांमधील गैरसमज दूर झालेत त्यामुळे आम्ही दोघं एकत्र आलो आहोत.असं सांगत दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांनी राजकीय वैर सोडत समझोता केलेला आहे. त्यामुळे इंदापूरचा राजकारण एका वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचला आहे. दोन्ही घराणी गौरी गणपतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर अधिक जवळ आल्याचे पाहायला मिळालं......0
0
Report
नागपुर के दीघोरी-इंदोरा फ्लाईओवर का उद्घाटन कल, गडकरी-फडणवीस की उपस्थिति में
Nagpur, Maharashtra:*Exclusive* नागपूर राज्यातील सगळ्यात लांब अशा नागपुरातील दिघोरी ते इंदोरा चौक या 8.9 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे उद्या लोकार्पण होणार्यानाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होगा... या उड्डाणपुलाचे एक्सक्लुझिव्ह एरियल व्हिडिओ आपण फक्त पाहू शकता झी 24 तास वर.... दिघोरी ते इंदोरा उड्डाणपुलाची वैशिष्ट्य पाहूया - प्रकल्पाची एकूण लांबी 8.9 कि.मी. आहे. - उड्डाणपूल 12 मीटर रुंदीचा असून, 2 लेन व दोन्ही दिशेने वाहतूक करण्याच्या दृष्टीने त्याची रचना करण्यात आली आहे. ---- उड्डाणपुलाची रचना UHPFRC (Ultra High Performance Fiber Reinforced Concrete) तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आली असून, कमाल स्पॅन 90 मीटर आहे, यामध्ये (60 मीटरचे 34 स्पॅन), (90 मीटरचे 2 स्पॅन - भांडे प्लॉट व शीतला माता चौक) आणि उर्वरित स्पॅन 45 मीटरचे आहेत. ---- मार्गिकेत दोन ROB व दोन RUB अंतर्भूत आहेत. ----- पाचपावली येथील जुना ROB पाडून नवीन ROB बांधण्यात आला आहे. पूर्वेकडील (नाईक तलावाच्या दिशेने) व पश्चिमेकडील (पाचपावलीच्या दिशेने) विद्यमान रॅम्प कायम ठेवण्यात आले आहेत. --- डागा मेमोरियल हॉस्पिटल येथे उभारण्यात येणारे चढ-उतार रॅम्प रुग्णालयात ये-जा करण्यासाठी सुलभ व सोयीस्कर प्रवेश उपलब्ध करून देतील. ----- अग्रसेन चौक येथे मेट्रोची मार्गिका दुसऱ्या स्तरावरून जात असून, प्रस्तावित उड्डाणपूल पहिल्या स्तरावरून मेट्रो मार्गिकेला ओलांडतो. ----- अशोक चौक येथे पायलॉन संरचनेची उन्नत रोटरी म्हणून रचना करण्यात आली असून, भंडारा रोड, मेडिकल चौक व नागपूर बस स्थानकाकडे जाणाऱ्या विद्यमान जोडरस्त्यांसाठी चढ-उतार रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. उड्डाणपुलाखालील रस्ता विकसित करण्यात येणार असून, प्रस्तावित उड्डाणपूल मार्गिकेत 3 प्रमुख चौक व 11 लहान चौकांचा समावेश आहे.0
0
Report
Advertisement
बलीराजा संघटना ने ऊस वाहतूक रोक दी, ट्रैक्टर के टायरों में हवा छोड़ दी
Sangli, Maharashtra:स्लग - बळीराजा संघटनेकडून ऊसवाहतुक रोखली, ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांची सोडली हवा.. ऊस गाळप हंगाम सुरू होण्याआधी सुरू झालेल्या ऊस गाळपाला सांगलीत बळीराजा संघटनेकडून विरोध करण्यात आला आहे. वाघवाडी येथील ND पाटील शुगर जत जॅगरी कारखान्यासाठी सुरू असलेली ऊस वाहतूक बळीराजा संघटनेकडून रोखण्यात आली आहे. ईश्वरपूर मधील कोल्हापूररोडवर संतप्त बळीराजा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ND पाटील शुगरसाठी सुरू असलेली ऊस वाहतूक रोखत 8 ते 10 ट्रॅक्टरच्या चाकांची हवा सोडली आहे. उसाचा FRP जाहीर होण्याआधीच ऊस तोडणी आणि वाहतूक होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत बळीराजा संघटनेकडून यावेळी ऊस वाहतूक रोखण्यात आली आहे. त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झाले होतं, तर या रस्त्यातच उसाच्या ट्रॅक्टरची हवा सोडल्याने काही काळ वाहतूक देखील टप्प्यात झाली होती.0
0
Report
बारामती झारगडवाडी में गौराई का अनोखा रूप, ग्रंथ पाठ से भक्तिप्रेरणा
Rui, Maharashtra:बारामती झारगडवाडीत ग्रंथ वाचन करणाऱ्या गौराईचे अनोखे रूप साकारण्यात आले आहे.. संतांची परंपरा आणि वाचन संस्कृती जपण्याचा सुंदर संदेश देणारा हा देखावा रूपाली बोरकर, वनिता बोरकर आणि रेश्मा बोरकर या महिलांनी साकारला आहे.. भक्ती, संस्कृती आणि सामाजिक प्रबोधनाचा संगम घडवणाऱ्या या गौराईचे परिसरात कौतुक होत आहे..0
0
Report
निमगांव केतकी में अष्टविनायक गणपती का हूबहू दर्शन, भक्तों की भीड़
Rui, Maharashtra:निमगाव केतकी गौरी गणपती समोर साकारला अष्टविनायक गणपतीचा देखावा... इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील विष्णू पवार कुटुंबाने हा देखावा साकारला असून तो पाहण्यासाठी भाविकांचं नागरिकांनी गर्दी केली आहे...0
0
Report
Advertisement
दौंड में गौरी आगमन: लोप पाती लोककलाओं को इनामदार परिवार ने जीवंत दिखाया
Rui, Maharashtra:दौंडमध्ये गौरी आगमनानिमित्त ‘महाराष्ट्रातील लोप पावत चाललेली लोककला’ हा देखावा; गेले काही वर्षांपासून इनामदार कुटुंबे जपता ते आलो की परंपरा दौंड येथे गौरी आगमनानिमित्त इनामदार कुटुंबीयांनी महाराष्ट्राच्या लोप पावत चाललेल्या लोककलांवर आधारित आकर्षक देखावा सादर केला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या पिंगळा, वासुदेव, बहुरूपी, नंदीबैलवाला, भविष्यकार, पोतराज, लक्ष्मीआई, गोंधळी, डोंबारी, कुडमुड्या जोशी आणि लावणी यांसारख्या पारंपरिक लोककलांचे दर्शन या देखाव्यातून घडवण्यात आले आहे. आधुनिकतेच्या युगात काळाच्या ओघात लोप पावत चाललेल्या या लोककलांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न दौंडच्या इनामदार कुटुंबीयांनी या माध्यमातून केला आहे. ‘परंपरा जपा... संस्कृती वाचा... लोककला टिकवा...’ असा महत्त्वपूर्ण संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि पारंपरिक कलावारसा भावी पिढीपर्यंत पोहोचवणे, त्यांचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने सादर करण्यात आलेला हा देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून, लोप पावत चाललेल्या लोककलांना नवसंजीवनी देण्याचा सुंदर संदेश देत आहे.0
0
Report
रत्नागिरी में गुरप परिवार की 88 वर्ष पुरानी दो गौरी पूजा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गुरप कुटुंबियांकडे 2 गौरींची 88 वर्षांपासूनची परंपरा डेरवण येथे दोन गौराई पूजनाची परंपरा गुरप कुटुंबीयांची पाचवी पिढी रत्नागिरी जिल्ह्यात संपूर्ण वातावरण गणेशमय झालं आहे. कालच ज्येष्ठा गौरींंचं आगमन झालं असून, आज घरोघरी गौरी मातेचं पूजन झालं. गौराई पूजनाच्या विविध परंपरा आजही कोकणात जपल्या जातात. कोकणात बहुतांश ठिकाणी एकच गौराई आणली जाते, मात्र चिपळूण तालुक्यातील डेरवण इथल्या गिरीश गुरप यांच्या घरी एक नव्हे तर दोन गौरी आणल्या जातात. गुरप यांच्या पाचव्या पिढीतही ही परंपरा सुरू आहे. यावर्षी त्यांच्या गौरी पूजनाचं 88 वं वर्ष आहे. या दोन गौराईंंचं पूजन करण्यासाठी महिला वर्गाची गर्दी होते.0
0
Report
दौंड में तृतीयपंथी का अनोखा अभियान: बालिका सुरक्षा के लिए सामाजिक संदेश
Rui, Maharashtra:यवतमध्ये तृतीयपंथी बांधवांनी स्त्रीभ्रूणहत्या रोखून गर्भलिंग निदानासारख्या चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी गौरी गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणारा देखावा साकारला आहे. समाजाने केवळ सुशिक्षित होऊन चालणार नाही, तर सामाजिक भान आणि सुसंस्कृतपणा जपणे गरजेचे आहे, असा महत्त्वपूर्ण संदेश यामधून देण्यात आलाय. 'दीपा गुरु रंजिता नायक' यांच्या मार्गदर्शनाखाली "मुलगी वाचवा, स्त्री भ्रूणहत्या थांबवा" या संवेदनशील विषयावर आधारित देखावा साकारण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी केडगाव परिसरात स्त्रीभ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणारे रॅकेट उघडकीस आले होते. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून पोलीस अद्याप तपास करत आहेत. या पार्श्वभूमीवर, केवळ पोलीस तपासावर अवलंबून न राहता नागरिक स्वतः सुजाण झाले, तर अशा सामाजिक गुन्ह्यांना वेळीच आळा बसेल, यावर या देखाव्यातून प्रकाश टाकण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
इंदापुर के निमगांव केतकी में वट की शाखाओं से नवनाथ प्रतिमा बनाकर गणेशोत्सव में आकर्षण
Rui, Maharashtra:इंदापूरच्या निमगाव केतकीत वडाच्या पारंब्यांपासून नवनाथांचा देखावा... चार दिवसांच्या मेहनतीतून साकारला अनोखा देखावा... इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे गणेशोत्सवामिर्थ गण गौरी गणपती समोर नवनाथांचा आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे... लक्ष्मी नीलकंठ भोंग यांनी हा अनोखा देखावा तयार केला आहे... विशेष म्हणजे वडाच्या पारंब्यांचा वापर करून नवनाथांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे... हा देखावा तयार करण्यासाठी तब्बल चार दिवस मेहनत घेण्यात आली... पारंपरिक साहित्याचा वापर करत साकारण्यात आलेल्या या देखाव्यामुळे गणेशोत्सवाला वेगळे स्वरूप आले आहे... नवनाथांचा हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होत आहे... वडाच्या पारंब्यांपासून साकारलेली कलाकृती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे...0
0
Report
खेड के पास मुंबई-गोवा मार्ग पर केमिकल टैंकर 300 फुट गहरे खड्डे में गिरा; चालक सुरक्षित
Ratnagiri, Maharashtra:खेडजवळ मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर ३०० फूट खोल दरीत कोसळला, चालक सुखरूप!.. अँकर मुंबई-गोवा महामार्गावर खेडजवळ एका धोकादायक वळणावर केमिकल टँकर थेट २५० ते ३०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे.. अपघातात गाडीचा पार चक्काचूर झाला असला, तरी सुदैवाने चालक यातून आश्चर्यकारकरीत्या बचावला आहे.. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य राबवले आणि जखमी चालकाला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.. या अपघातानंतर महामार्गावरील धोकादायक वळणांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून,पोलीस अपघाताच्या कारणाचा अधिक तपास करत आहेत..0
0
Report
इंदापुर के निमगाव केतकी में पीएम पोस्टमैन ई-बाइक थीम गणेश शो
Rui, Maharashtra:नيمगाव केतकीत पीएम पोस्टमन ई-बाइक योजना आधारित अनोखा गणेश देखावा; तेजस गायकवाड यांच्या कल्पकतेने वेधले लक्ष... यंदाच्या घरगुتی गौरी गणपती ऊत्सवात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील युवा उद्योजक तेजस ছाया संजय गायकवाड यांनी साकारलेल्या आगळ्यावेगळ्या प्रबोधनात्मक देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेय तेजस गायकवाड याने यंदा बाप्पांसमोर पीएम पोस्टमन ई-बायक योजना आत्मनिर्भर आणि हरित भारत की ओर या विषयावर देखावा साकारला होता. केंद्र सरकारच्या डाक विभागाने त्यांच्या याच योजनेला नुकतीच नीतिगत मंजुरी (Policy Approval) दिल्याचे अधिकृत पत्र दिल्लीहून आल्याने, या देखाव्याला दुप्पट महत्व प्राप्त झाले आहे. या देखाव्यात मेक इन इंडिया ई-बायकवरून टपाल सेवा देणारा पोस्टमन, चार्जिंग स्टेशन, हरित भारताचा संदेश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेचे सादरीकरण करण्यात आले होते. पारंपारिक सायकलवरून डाक वाटप करणाऱ्या 3 लाखांहून अधिक पोस्टमन बांधवांचे जीवन सुसह्य व्हावे आणि कार्बन फूटप्रिंट कमी व्हावा, हा या देखाव्यामागचा मुख्य संदेश होता. बाप्पाच्या आगमनाच्या मुहूर्तावरच दिल्लीहून नीतिगत मंजुरीचे पत्र प्राप्त झाल्याने गायकवाड कुटुंबात तसेच संपूर्ण निमगाव केतकी व इंदापूर तालुक्यात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
Advertisement
अकोला के मजलापुर में कर्ज के भार से तंग आकर किसान ने आत्महत्या कर ली
Akola, Maharashtra:अकोला तालुक्यातील मजलাপूर येथील अल्पभूधारक शेतकरी शेख सलीम शेख रशीद यांनी गुरुवारी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेख सलीम हे अल्पभूधारक शेतकरी असून शेती व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. मागील काही काळापासून शेतीमध्ये सातत्याने नापिकी होत असल्याने त्यांनी कर्जाचा आर्थिक भार वाढला होता. पिकांचे नुकसान आणि अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले होते. शेख सलीम यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. तसेच त्यांना दोन भाऊ असून, दोन्ही भावांची मानसिक प्रकृती ठीक नसल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर या घटनेमुळे मोठे संकट कोसळले आहे. मागील काही महिन्यांपासून पावसाची अनिश्चितता आणि पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशाच परिस्थितीत शेख सलीम यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.0
0
Report
नागपूर में शाम को बारिश, मौसम विभाग ने येलो अलर्ट जारी किया
Nagpur, Maharashtra:नागपूर शहरात संध्याकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडासह पाऊस कोसळला.. त्यामुळे एकीकडे दिवसभर उकडल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास पावसामुळे नागपूरकरांना थोडा दिलासा मिळाला असला तर दुसरीकडे महालक्ष्मीच्या नैवेद्य असल्याने अनेकांची पावसानं तारांबळ उडाली.. दरम्यान पुढील 24 तासाकरता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.. मात्र पावसाची अजून मोठी तूट नागपूरसह संपूर्ण विदर्भात आहे.0
0
Report
अकोला में कीटनाशक फवारणी से विषबाधा, GMCH में 22 मरीज भर्ती
Akola, Maharashtra:अकोला जिले से खबर: अकोला जिले में अत्यंत चिंताजनक बातमी सामने आ रही है कि पिकांवर कीटनाशकांची फवारणी करताना काळजी न घेतल्यामुळे शेतकरी और शेतमजुरांना विषबाधा होण्या의 घटना वेगाने वाढल्या आहेत. سध्या अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) सर्वोपचार रुग्णालयात तब्बल २२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अकोला जिल्ह्यात सध्या कपाशी, सोयाबीन और तूर पिकांवर कीटकनाशक फवारणीचा हंगाम शिगेला पोहोचला आहे. कपाशीची झाडे चार ते पाच फुटांपर्यंत वाढल्याने आणि पिके दाट झाल्याने फवारणी करताना मोठी अडचण निर्माण होत आहे. बहुतेक शेतकरी व मजुरांकडून मास्क, गॉगल, हातमोजे आणि योग्य संरक्षणात्मक साहित्याचा वापर केला जात नाही. परिणामी, कीटकनाशकांचे विषारी द्रावण नाक, डोळे व त्वचेच्या संपर्कात आल्याने विषबाधेचे प्रमाण वाढले आहे. तर दुसरीकडे जीएमसीच्या वॉर्ड क्रमांक ३१ आणि ३२ मध्ये सध्या २२ विषबाधित रुग्ण उपचार घेत असून, यामध्ये तरुणांची संख्या चिंताजनक रित्या अधिक आहे. रुग्णालयात दररोज एक ते दोन नवीन रुग्ण दाखल होत आहेत. या गंभीर परिस्थितीवर बोलताना जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांच्यासह रुग्ण कल्याण समिती सदस्य नितीन सपकाळ यांनी शेतकरी व मजुरांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शासन स्तरावर अशा शेतकऱ्यांना काही आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी कुटुंबीयांकडून होत आहे.0
0
Report
Advertisement
