411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर सरकारी पद का दुरुपयोग, वीडियो वायरल; रोहित पवार ने बर्खास्तगी की मांग
Washim, Maharashtra:वाशिम: वाशिमच्या रिसोड तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी शासकीय पद आणि कार्यालयाचा वैयक्तिक प्रसिद्धीसाठी वापरल्याचा आरोप होत आहे. तहसील कार्यालयात ‘प्रोफेशनल सिनेमॅटिक रील’ शूट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून तहसीलदारां वर जोरदार टीका केली आहे. एकीकडे शेतकरी दुष्काळामुळे होरपळत असताना तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याऐवजी रील बनवण्यात वेळ घालवला,असा आरोप पवार यांनी केला.या प्रकरणात केवळ निलंबन न करता संबंधित तहसीलदारांना बडतर्फ करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे.0
0
Report
गोकुळ महायुति में नामांकन शुरू, दिग्गज संचालक उमेदवारी दाखल करने पहुंचे
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीचे प्रत्यक्षात रणधुमाळी सुरू झाली आहे. आजपासून नामनिर्देशन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे गोकुळचे सर्वच दिग्गज संचालक निवडणूक कार्यालयांमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झालेत. त्याच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. नावेद मुश्रीफ , गोकुळचे माजी चेअरमन; शशिकांत चुयेकर, संचालक गोकुळ; विश्वास पाटील, ज्येष्ठ संचालक गोकुळ0
0
Report
गणपतीपुळे में ऋषीपंचमी के पावन अवसर पर श्री के चरणों में फूलों की आरास
Ratnagiri, Maharashtra:गणपतीपुळे: ऋषीपंचमी निमित्त श्रींच्या चरणी मनमोहक फुलांची आरास!.. भाद्रपद गणेशोत्सवातील ऋषीपंचमीच्या पावन पर्वावर श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपतीच्या मंदिरात विविधरंगी आणि सुगंधी फुलांची विलोभनीय आरास साकारण्यात आली आहे. बाप्पाचे हे देखणे रूप डोळ्यांत साठवण्यासाठी आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली आहे.0
0
Report
Advertisement
खेड के बोरज में भक्ती-पर्यावरण का संगम; सनगरे परिवार ने वटवृक्ष प्रतिकृति साकार की
Ratnagiri, Maharashtra:कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना खेड तालुक्यातील बोरज येथील सनगरे परिवाराने घरगुती गणेशोत्सवातून पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश दिला आहे. सनगरे परिवाराने अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर आणि पवित्र वटवृक्षाची हुबेहूब प्रतिकृती साकारली असून, यातून 'झाडे लावा, पर्यावरण वाचवा' हा संदेश देण्यात आला आहे..धार्मिक महत्त्व आणि निसर्ग संवर्धनाचा सुंदर मिलाफ साधणारा हा देखावा पाहण्यासाठी सध्या गणेशभक्तांची मोठी गर्दी होत आहे..0
0
Report
रत्नागिरी के स्टोन आर्टिस्ट अजय पारकर ने पर्यावरण-पूरक गणेश सजावट से बना नया रिकॉर्ड
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..दगडांवर फुलली चित्रकला! रत्नागिरीत स्टोन आर्टिस्ट अजय पारकर यांची अनोखी पर्यावरणपूरक गणेश सजावट.. या दगडी चित्रकलेमध्ये कशेळी पॉईंट,लोटेश्वर यांसारखी पर्यटन स्थळे तसेच ग्रामदैवत श्री भैरी देवासह विविध देवदेवतांच्या प्रतिमा जिवंत करण्यात आल्या आहेत.. याशिवाय चाफा, हापूस आंबा, काजू आणि मोदक यांसारखी हुबेहूब थ्री-डी (3D) स्टोन पेंटिंग्ज सध्या भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत असून ही कलाकृती पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे..0
0
Report
वाशिम: रोहित पवार ने किसानों से मुलाकात कर 50 हजार/हेक्टेयर मदद की मांग
Washim, Maharashtra:वाशिमच्या कारंजा तालुक्यातील पसरणी आणि धामणी परिसरातील शेतीपिकांची आमदार रोहित पवार यांनी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुबार पेरणी करूनही पावसा अभावी सोयाबीन पीक वाया गेल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. वर्षभराची भिस्त असलेलं पीक हातातून गेल्याने पुढे काय करायचं,असा प्रश्न शेतकऱ्यां समोर उभा ठाकला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये,तर मजूर कुटुंबांना २५ हजार रुपयांची तात्काळ मदत देण्यात यावी,अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.0
0
Report
Advertisement
78 साल बाद भी सड़क नहीं, सालईटोला में शव खाट पर लाया गया
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिले के धानोरा तालुक़े के सालईटोला गाँव से एक हृदयद्रावक वीडियो सामने आया है। स्वतंत्रता के 78 वर्ष बाद भी इस गाँव को सड़क नहीं मिली है। इसलिए मृत व्यक्ति का शव खाट पर बांधकर बांबू पर लाकर चिखल भरे रास्ते से मुख्य रास्ते तक लाना पड़ा। चार युवक शव खाट पर रखकर दो बाँसों के सहारे कंधे पर ले जाते दिखते हैं। रास्ते में पानी और चिखल था। अर्ध-किलोमीटर चलने के बाद शव मुख्य रस्ते के ट्रैक पर रखा गया। ग्रामीणों के अनुसार रुग्णवाहिका गाँव तक नहीं आ पाती। ग्राम पंचायत और प्रशासन से बार-बार माँग के बावजूद सड़क नहीं बन सकी।0
0
Report
बुलढाणा में किसानों के राजा की धूम; रविकांत तुपकार ने बैलगाड़ी से गणेश उत्सव सजाया
Buldhana, Maharashtra:बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या ‘क्रांतिकारी राजा’चे दणक्यात आगमन... डफड्याचा ताल, सजवलेली बैलगाडी आणि बैलगाडीचं सारथ्य करताना दिसले रविकांत तुपकर! श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बुलढाण्यात ‘शेतकऱ्यांच्या क्रांतिकारी राजा’ची यंदा पाचव्या वर्षी उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. विशेष म्हणजे गणरायाची मूर्ती सजवलेल्या बैलगाडीतून आणण्यात आली आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकरांनी स्वतः बैलगाडी हाकत गणरायाला मंडपात आणलं. यावेळी गणरायाच्या चरणी तुपकरांनी शेतकऱ्यांसाठी साकडं घातलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्या, बुलढाण्याला दुष्काळाच्या यादीत घ्या आणि सरकारला शेतकऱ्यांसाठी काम करण्याची सद्बुद्धी द्या, अशी मागणी त्यांनी केली. सत्ताधारी नेत्यांनी आपापसातील भांडणं बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढावं, असं आवाहनही तुपकरांनी केलं. दरम्यान, ‘क्रांतिकारी राजा’समोरचा आकर्षक देखावाही नागरिकांचं लक्ष वेधून घेतोय.0
0
Report
बुलढाणा के किसान टॉवर पर चढ़े, दुष्काळ घोषित कराने की मांग तेज
Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेक कोरडा दुष्काळ जाहीर करा! शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी टॉवरवर चढून आंदोलन! बुलढाण्यात शेतकरी प्रश्न पेटला; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक अटाळी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांचे टॉवरवर चढून आंदोलन शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, अशी मागणी पिकांची अवस्था बिकट असताना प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी टोकाचे आंदोलन कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन अमोल पाटील टॉवरवर चढल्याने प्रशासनाची धावपळ मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा0
0
Report
Advertisement
सरकार ने 15 मांगों को पूरा कहा, आंदोलन जारी रहेगा—अब क्या होगा?
Nagpur, Maharashtra:नागपूर - डॉ. बबनराव तायवाडे,अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ - जांरांगे पाटील आंदोलन - गेल्या 5-6 दिनोंांपासून आंदोलनकर्त्यांची मागणी आणि सरकारची भूमिका संदर्भात विचार केला तर असे दिसून येते की आंदोलनकर्त्यांनी ज्या काही 15 मागण्या सरकारपुढे मांडण्यात आल्या होत्या... त्या 15 मांगण्यांच्या संदर्भात 15 मुद्द्यांचा मसुदा सरकारने आंदोलनकर्त्यांना दिलेल्या दिवसापासून काल पर्यंत सरकार त्याच्यावर ठाम आहे. पहिल्या बारीक बातम्या: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि सरकारमधील आमदार बोलायला लागले आहेत की सरकारने यांच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत...ज्या दोन मागण्या आहेत... कोल्हापूर आणि सातारा ची गझेटीयरची मागणी आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत, विधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे सुरू आहे दुसरं प्रकरण चार लोकांची कास्ट व्हॅलिडिटी चे प्रकरण आहे,त्यावर सरकारने सांगितले आहे की एकदा जात पडताळणी समितीने नाकारलेले प्रमाणपत्र देता येत नाही,त्यासाठी कोर्टात जावे लागते उर्वरित मागण्या सरकारने मान्य-पूर्ण केल्या आहेत,वारंवार मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सांगत आहेत,त्यामुळे समाजातील विविध स्तरावर काम करणारेही चिंतन करून विचारात आहेत की सरकारने जर मागण्या पूर्ण केल्या आहेत तर हे आंदोलन कशासाठी आहे0
0
Report
शेगाव में श्री संत गजानन महाराज की 116वीं पुण्यतिथि पर भक्तों का महासंगम
Buldhana, Maharashtra:विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या श्री संत गजानन महाराजांचा आज 116 वा पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा होत आहे... ऋषिपंचमी आणि महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त संतनगरी शेगाव भाविकांच्या गर्दीने अक्षरशः दुमदुमून गेली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात दाखल झाले आहेत. तर शेकडो दिंड्याही शेगाव नगरीत दाखल झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. पुण्यतिथी उत्सवानिमित्त मागील तीन दिवसांपासून श्रींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज मुख्य पुण्यतिथी सोहळा असल्याने सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पालखी सोहळा आणि श्रींच्या दर्शनासाठी लाखोंचा जनसागर शेगावात दाखल झाला असून, भाविकांच्या सोयीसाठी मंदिर 24 तास खुले ठेवण्यात आले आहे. दिंड्यांच्या गजरात, भजन-कीर्तनाच्या स्वरात आणि ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने संपूर्ण शेगाव नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. श्रींच्या पुण्यतिथी सोहळ्यामुळे शेगावात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे.0
0
Report
मुंबई-गोवा हाईवे पर टैंकर लीकेज, बचाव दल की सतर्कता से बड़ा हादसा टला
Chendhare, Maharashtra:स्लग - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्ववत ...... अपघात ग्रस्त टँकर मधील गळती थांबवण्यात यश ........ बचाव पथकांच्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळला ....... अँकर - पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातामुळे विस्कळीत झालेली मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक आता सुरळीत झाली आहे. कोकणात जाणाऱ्या मार्गिकेवर कोलाड जवळ पुगाव इथं रसायन वाहुन नेणारा टँकर उलटला आणि त्यातून ज्वालाग्राही रसायनाची गळती सुरू झाली. मात्र बचाव पथकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास तासभर ठप्प होती. शिवाय रसायनाच्या गळतीमुळे मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र बचाव पथके, फायर ब्रिगेड आणि पोलिसांनी तज्ञांच्या मदतीने प्रयत्नांची शिकस्त करून गळती थांबवून टँकर पूर्ववत केला. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली.0
0
Report
Advertisement
वाशीम: धोत्रा फाटा-धोत्रा सड़क पर गड्ढे, यातायात बाधित
Washim, Maharashtra:अँकर:वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा फाटा ते धोत्रा रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.रस्त्यावरील डांबर पूर्णपणे गायब झालं असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.या मार्गावरून दररोज नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते.मात्र,खराब रस्त्यामुळे प्रवास करताना नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.0
0
Report
वाशिम की अडान नदी सूखी, किसानों की चिंता बढ़ी; बारिश अब अहम उम्मीद
Washim, Maharashtra:दरवर्षी पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील आडान नदी यंदा मात्र सप्टेंबरचा अर्धा महिना उलटूनही कोरडीच आहे. अपुऱ्या पावसामुळे नदीपात्रात अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. काही ठिकाणी मोजकेच पाणी शिल्लक असून अनेक भागांत नदीपात्र कोरडे पडले आहे.याचा थेट परिणाम नदीकाठच्या शेतकरी आणि नागरिकांवर झाला असून, आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.नदी आणि परिसरातील जलसाठे भरण्यासाठी आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.0
0
Report
चंद्रपुर में तीन DJ पर कार्रवाई, एक दिन में 12.5 लाख का माल जप्त
Chandrapur, Maharashtra:टायटल:---- चंद्रपुरात DJवर पोलिसांचा दणका,एकाच दिवशी 3 DJवर कारवाई, 12.50 लाखांचा मुद्देमाल जप्त चंद्रपूर जिल्ह्यात कर्णकर्कश आणि विनापरवाना डीजेविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. काल एकाच दिवशी राजुरा, दुर्गापूर आणि रामनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तीन डीजेंवर कारवाई करण्यात आली. रामनगर पोलिसांनी विनापरवाना उच्च क्षमतेचे प्लाझ्मा लाईट्स आणि कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीसह डीजे साऊंड सिस्टीम आणि प्लाझ्मा साहित्य जप्त केले. या कारवाईत एकूण 12 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित ऑपरेटर आणि वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशांचे आणि ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांची ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.0
0
Report
Advertisement
