icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चिपळूण रेलवे स्टेशन के पास प्रमुख मार्ग में गड्ढे, यात्री और वाहन चालक परेशान

Ratnagiri, Maharashtra:कोकण रेल्वे मार्गावरील अत्यंत महत्त्वाचे स्थानक असलेल्या चिपळूण रेल्वे स्थानकाकडे शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज हजारो प्रवासी या मार्गाचा वापर करत असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. या मार्गाची तातडीने दुरुस्ती करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
0
0
Report

यवतमाळ में 'कामगार सुरक्षा निवारा' का लोकार्पण, श्रम पूजा के साथ सम्मान

Yavatmal, Maharashtra:आषाढी एकादशीच्या निमित्ताने यवतमाळ मध्ये शिवसेनेकडून कामगार बांधवांसाठी उभारण्यात आलेल्या "कामगार सुरक्षा निवारा" या लोकोपयोगी उपक्रमाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यवतमाळच्या पोस्टल मैदानाजवळ दररोज सकाळी कामगार एकवटतात, या ठिकाणी कामगारांना बसण्यासाठी व्यवस्था व्हावी याकरिता 'कामगार हाच विठ्ठल, श्रम हीच पूजा' या संकल्पनेतून कामगार सुरक्षा निवारा हा सेवाभावी उपक्रम सुरू करण्यात आला. या निमित्ताने कामगार बांधवांसाठी भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी बेघर मनोरुग्णांची सेवा करणाऱ्या समाजसेवी संदीप व नंदिनी शिंदे या दांपत्याचा विठू माऊलीच्या रूपात गौरव करण्यात आला. कामगारांचे पाय धुवून त्यांचा सन्मान करण्यात आला तर कामगारांच्या गुणवंत पाल्यांचा देखील सत्कार पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आला.
0
0
Report

माळशेज घाट पर खस्ताहाल सड़क से महामार्ग पर खतरा, यातायात प्रभावित

Barav, Maharashtra:कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर माळशेज घाटात तब्बल १०० फूट लांब आणि ८ फूट खोल रस्ता खचल्याने भीषण अपघाताचा धोका निर्माण झालाय. सुदैवाने रस्ता खचताना कोणतंही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र या प्रकारामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून जवळच असलेल्या घरांनाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही याच ठिकाणी रस्ता खचला होता. स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही NHAI आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने कामाच्या दर्जावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. माळशेज घाटातील या धोकादायक परिस्थितीचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर Congress सांसद प्रतिभा धानोरकर बयान: गटनेते पद हेतु पार्टी ने नहीं दी मदद

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे मोठे विधान ,चंद्रपूर महानगरपालिकेतील गटनेते पद बदलविण्यासाठी महाराष्ट्र अथवा राष्ट्रीय स्तरावर पक्ष संघटनेने कुठलीही मदत केली नसल्याचा धक्कादायक खुलासा चंद्रपूर शहर महानगरपालिकेत काँग्रेस गटनेते पद मिळवण्यासाठी खा. धानोरकर गटाने गेले सहा महिने प्रयत्न चालविले होते. यात आ. विजय वडेट्टीवार गटाच्या राजेश अडुर यांना हटवून नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी खा. धानोरकर गटाच्या सुरेंद्र अडबाले यांच्या बाजूने निर्णय दिला. आज महानगरपालिकेत गटनेते कक्षात सुरेंद्र अडवाले यांनी पदग्रहण केले. गेले सहा महिने आपण पक्षात खडतर वाटचाल केली असून माझ्या मतदारसंघातील महानगरपालिका असल्याने अन्य कुणाचा हस्तक्षेप नको अशीच आपली भूमिका होती असे सांगत पक्षात असे व्हायला नको होते असे खा धानोरकर म्हणाल्या. याही पुढे जात महाराष्ट्र अथवा राष्ट्रीय स्तरावरील पक्ष संघटनेने यात माझी कुठलीही मदत केली नाही असे मोठे विधान खा. धानोरकर यांनी केले.
0
0
Report

कोटमगाव विठ्ठल मंदिर में आषाढ़ी वारी के दौरान भक्तों की भारी भीड़

Yeola, Maharashtra:आषाढ़ी वारीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कोटमगाव विठ्ठल मंदिरात आज भक्तीचा महासागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. पंढरपूरला जाणे शक्य नसलेल्या हजारो भाविकांनी कोटमगावात येऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. राज्याच्या विविध भागांतून वारकरी दिंड्यांमुळे संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला. दरवर्षी आषाढी वारीच्या काळात येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. नाशिक, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून सुमारे 450 वारकरी दिंड्या कोटमगावात दाखल होत असल्याने या परिसराला आषाढी वारीचे वेगळे धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, मंदिर परिसरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. तसेच कोटमगावला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्याने या धार्मिक स्थळाच्या विकासाला अधिक चालना मिळाली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कोटमगावात भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळत असून, प्रति पंढरपूर म्हणून या स्थळाचे महत्त्व दिवसेंदिवस अधिक अधोरेखित होत आहे.
0
0
Report
Advertisement
0
0
Report

युवाओं के रोजगार पर मोदी सरकार को कांग्रेस का बड़ा आरोप

Nagpur, Maharashtra:नागपुर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेता सरसंघचालक संघचालक यांचा सल्ला नरेंद्र मोदी ऐकतात का? जर ऐकलं असेल तर या देशातील तरुणांची अशी वाताहात झाली नसती. या तरुणांचं रोष पाहून मोहन भागवत यांना आता काय उपरती आली का? तरुणांचं ऐकावं म्हणून.... रोजगार हिरावला जात होता. पेपर लीक होते परदेशातील नोकरी संपत होते. परदेशात भारतीय तरुणांना नोकरी मिळत नव्हती... यहच मोदी सरकार त्याला जबाबदार आहे. भागवत आज देशातील तरुण रस्त्यावर आल्यावर भडकला आहे... देशामध्ये त्याला या देशामध्ये भविष्य सुरक्षित वाटत नाही. अशावेळी मोहन भागवत यांना केंद्र सरकारला मोदींना सल्ला द्यावासा वाटतो.... आता हातात काही राहिलं नाही.... ज्या तरुणांच्या भरोशावर मोदी खुर्चीत बसले. तोच तरुण या देशाच्या पंतप्रधानाची खुर्ची हलवल्याशिवाय राहणार नाही असं वातावरण देशात निर्माण झाल्यावर याची उपरती मोहन भागवत यांना झाली असावी. मविआ आंदोलन तरुणांच्या प्रश्नासाठी जो कोणी महाविकास आघाडीतील विरोधी पक्ष घटक पक्ष आंदोलन करेल... त्या त्या सर्व आंदोलनाला आमचा पाठिंबा असेल... आम्ही केलं तर त्यांचाही पाठिंबा राहील अशी भूमिका ठरली आहे. पिंपरी चिंचवड घोटाळा महाराष्ट्रात घोटाळेबाजाचं सरकार रोज नवनवीन घोटाळे करत आहे... या सरकारची घोटाळा करणे आवड बनली आहे.... नवीन घोटाळा केल्याशिवाय यांना चैन पडत नाही.... पिंपरी चिंचवड मध्ये शालेय साहित्य भ्रष्टाचार म्हणून साडेपाचशे कोटीचा घोटाळा केला जात आहे....यात मंत्र्यांचा सहभाग आहे. सर्वोच्च न्यायालयाने डीबीटीवर पैसे टाकायचं आदेश झुगारून साडेपाचशे कोटी रुपयाचा टेंडर काढलं... मर्जीतील माणसांना काम दिलं. याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन दोषींवर कारवाईची मागणी करू. घोटाळे करून तिजोरीची लूट करून टक्केवारी सरकार करत आहे. जनतेची चिंता राहिली नाही टक्के वसूल करण्यात यांना सर्वोच्च आनंद मिळत आहे. स्वतःचा व्हिडिओ देशाचा व्हिडिओ देशातील पंतप्रधानांनी कधीही टाकला नाही... प्रेस मोर जाऊन बाजू मांडतात.. मध्यरात्री हा व्हिडिओ टाकण्याची गरज नाही. हे सगळे रिचेस आणि व्ह्यू त्यांच्या आयटी सेलने केले...जे पैसे घेऊन हे धंदे करतात हे सगळे आर्टिफिशल आहे.... लोकांनी केलेले नाही तर....जो वेळ उघडला 95 टक्के लोक सरकार आणि नरेंद्र मोदीच्या निषेध करत आहे. यावरून तरुण अजिबात आता पाठीशी राहिलेला नाही. भाजपचे आयटी सेल हे सगळं करत आहे. या देशाच्या पंतप्रधानांची ज्या पद्धतीने अब्रू काढली जात आहे असं कधी आतापर्यंतच्या इतिहासात झालं नाही... भाजप याचा आत्मचिंतन भाजपने कराव.
0
0
Report

अभिजीत दीपके की सेहत पर सवाल, माता-पिता ने इस्तीफे-चर्चा की मांग

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या आई-वडिलांनी चिंता व्यक्त केली आहे. अभिजीत दीपके यांची तब्येत बिघडली असून, त्यांना टायफॉइड झाल्याची माहिती माध्यमातून समोर आली आहे. यापूर्वी कधीही अभिजीतला असा त्रास झाला नव्हता, त्यामुळे त्याच्या प्रकृतीची आम्हाला मोठी चिंता आहे, अशी भावना त्यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केली. अभिजीत हा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढत असून, त्याला चांगला पाठिंबा मिळत आहे. मात्र दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही. आंदोलन मोडून काढण्यासाठी विद्यार्थ्यांवर चुकीच्या पद्धतीने मारहाण करण्यात आली. सरकारकडून अभिजीतच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही त्याच्या आई-वडिलांनी केला आहे. सरकारने अभिजीतच्या आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक चर्चा करावी. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारने सकारात्मक चर्चा केल्यास हे आंदोलन संपुष्टात येईल आणि विद्यार्थी आपापल्या घरी परततील, अशी प्रतिक्रिया अभिजीत दीपके यांच्या आई-वडिलांनी दिली आहे. त्यांच्या सोबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी..
0
0
Report
Advertisement

सांगली में तिरंगा रैली: हजारों स्टूडेंट्स ने जंतर मंतर आंदोलन का समर्थन किया

Sangli, Maharashtra:दिल्लीतील जंतरमंतर आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगलीत देखील विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले आहे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला. विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तिरंगा मोर्चा काढण्यात आला,ज्या मध्ये हजारोच्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होती. हातात संविधान,तिरंगे झेंडे ,डॉ. आंबेडकर व भगतसिंह यांची प्रतिमा घेऊन जोरदार घोषणाबाजी करत काढलेल्या मोर्चाच्या माध्यमातून दिल्लीतल्या जंतरमंतर आंदोलनाला पाठिंबा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा द्यावा,अशी मागणी करण्यात आली.
0
0
Report

देवरुख के कलाकार ने ईंट से बनी रांगोळी में विठ्ठल की अनोखी कला दिखायी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. तुळशीपत्र अन् मोरपिसानंतर आता भाजलेल्या विटेवर विठू माऊली! देवरुखच्या विलास रहाटे यांची अनोखी रांगोळी.. गळ्याखाली अषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरात विठ्ठल भक्तीचा उत्साह पाहायला मिळतोय.रत्नागिरीतील देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी मात्र आपली विठ्ठलभक्ती एका अतिशय अनोख्या कलाकृतीतून व्यक्त केली आहे.. गेल्या काही वर्षांत तुळशीच्या पानावर, मोरपीसावर आणि पाण्याखाली विठ्ठलाची रांगोळी साकारणाऱ्या विलास रहाटे यांनी यंदा नदीकाठच्या मातीपासून एक छोटी वीट तयार केली.ही वीट भाजून पक्की केल्यानंतर,त्यावर अवघ्या एका तासात श्री पांडुरंगाची अतिशय मनमोहक आणि कलात्मक रांगोळी साकारली आहे.त्यांची ही आगळीवेगळी कलाकृती सध्या भाविकांचे आणि कलाप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे..
0
0
Report

रत्नागिरी के सावर्डे-डेरवण में बच्चों की डिंडी से आषाढी एकादशी की धूम

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. सावर्डे-डेरवण येथे चिमुकल्यांच्या दिंडीने विठूनामाचा गजर;एस व्ही जे सी टी महाविद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी.. रत्नागिरीतील सावर्डे-डेरवण येथील एस व्ही जे सी टी महाविद्यालयात आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक अनोखा भक्तिसोहळा पार पडला.लहान विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी,संत तुकाराम आणि वारकऱ्यांची सुरेख पारंपरिक वेशभूषा साकारत महाविद्यालय परिसरात टाळ-मृदुंगाच्या गजातात भव्य दिंडी काढली.या वेळी विद्यार्थ्यांनी घातलेल्या फुगड्या आणि विठूनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भावभक्तीमय वातावरणात दुमदुमून गेला होता.
0
0
Report
Advertisement

शिर्डी में आषाढ़ी एकादशी पर 15 टन साबुदाणा खिचड़ी का महाप्रसाद, भक्तों की भारी भीड़

Shirdi, Maharashtra:सबका मालिक एक असा संदेश देणा-या साईबाबांच्या शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह दिसून आलाय. शिर्डी माझे पंढरपूर ही भावना घेऊन हजारो भाविक साईनगरीत दाखल झाले आहेत. आषाढी एकादशी निमित्ताने साईमंदिराला आकर्षक सजावट करत बाबांना तुळशीमाळेचा श्रृंगार करण्यात आलाय.. तर प्रसादालयात भाविकांसाठी खास 15 टनाची साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद बनवण्यात आलाय.साईदरबारी येणाऱ्या साईभक्तांसह शिर्डी पंचक्रोशीतील स्थानिक भाविक आवर्जुन या प्रसादरुपी खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. साई संस्थांनच्या भोजनालयातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी
0
0
Report

कांग्रेस सत्याग्रह के बीच दावा: धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दें, बच्चों पर अत्याचार की जांच!

Nagpur, Maharashtra:नागपूर - नाना पटोले, काँग्रेस नेते - On काँग्रेस सत्याग्रह आंदोलन - गेल्या 12-13 वर्षात मोदी सरकारच्या विरोधात असलेला जनतेचा राग झेन झी च्या माध्यमातून पुढे आलेला आहे, आणि तो राग प्रामाणिकपणे आणि शांततेने शमवण्यापेक्षा होण्यापेक्षा सत्तेचा गैरवापर कसा केला जातो, म्हणजे जालियनवालाबाग पेक्षाही मोठी घटना करण्याचा प्रयत्न जंतरमंतरवर करणेचा प्रयत्न या लोकांनी केला - लहान मुलींचे कपडे फाडले, विनयभंग केला, एक मुलगी मरण पावली अशा पद्धतीची ही गोष्ट पुढे आली, मुलांना बेदम मारला, ही मुलं कुठल्याही राजकीय पक्षाची नव्हती, ते आपल्या अधिकाराची लढाई लढण्यासाठी आलेले होते - अशा परिस्थितीत सरकारने एक पाऊल पुढे जाऊन धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा करून घ्यायला पाहिजे होता, एका परीक्षेसाठी दहा लाखाचा खर्च कुटुंबियांना करावा लागतो आणि तो पेपर लिक झाल्याने अनेक मुला मुलींची भविष्य खराब झाले - 22 पेक्षा जणांनी आत्महत्या केली, देशातील पंतप्रधानांना यापूर्वी लहान मुलांनी आणि सार्वजनिक रित्या कधीही बोलल्या गेले नसेल ते जंतर-मंतरवर आपण पाहतो की हे मुलं मुली आपला राग व्यक्त करत आहेत - याला पॉलिटिकल धार द्यायची नव्हती नाहीतर म्हटलं असतं हे राजकीय आंदोलन आहे, म्हणून राहुलजी तिथे गेले नाही, tollersसाठी ही लढाई आम्ही लढू अशी भूमिका राहुलजींनी घेतली आणि आज देशभरात शांततेने कँडल मार्च- सत्याग्रह आंदोलन करतोय - On धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही चर्चा - नरेंद्र मोदी यांच्या 2014 च्या पूर्वीचे भाषण आपण ऐकले, त्यात एक पेपर फुटीचा मुद्दा होता, तीन वेळचे पंतप्रधान तुम्ही झाला तर मग सुधारणा का केली नाही, आंदोलन सुरू असताना लोकसभेतून पळून जाता, 56 इंचीच्या सीना कुठे गेला - सोनम वांगचुक मध्यरात्री उपोषण सोडवता, मध्यरात्री पंतप्रधान सोशल मीडियावर बोलतात, लोकसभेत का बोलले नाही?, लोकांनी दिलेले सत्ता आहे पण भाजप बेईमानी ने मशीन मधून निवडून येते - On सोनम वांगचुक टीका - - त्यांना सोशल मीडियावर झेन झी मी काय बोलले त्याचं काय माहित नाही, काँग्रेस म्हणून आम्ही कुठलेही प्रतिक्रिया दिली नाही, त्यांच्या पत्नीने राहुल गांधी यांच्यावर टीका केली, राहुल गांधींच्या नेतृत्वात त्यांना आंदोलन करायचा होता तर आधीच सांगायला पाहिजे होता - On ठाकरे बंधू मोर्चा - - आमचा आंदोलन आज असल्यामुळे आज आम्ही त्यात व्यस्त आहोत, लोकांनी सगळ्या आंदोलनात जाऊन, जो पक्ष या मुलांच्या बाजूने उभा होतो आहेत त्यांच्याबरोबर सगळ्यांनी जावं - - हा राजकीय मुद्दा नाही हा देशाच्या भविष्याचा अजेंडा आहे त्यामुळे आज काँग्रेसचा आंदोलन देशभरात आहे त्यामुळे सगळ्यांनी त्यात सहभागी व्हावं - - अंधभक्त जे कोणी असतील भाजपचे त्यांनीही आजच्या काँग्रेसच्या आंदोलनास सहभागी व्हावा - On मोहन भागवत - - ते राम मंदिरात आज घोळात गुंतलेले त्यामुळे इतक्या उशिरा त्यांनी बोलावं हा चर्चेचा विषय आहे - - ते बोलतात तर इतका उशिरा का? सरकारचा रिमोट कंट्रोल तुम्ही आहात, पोरांचा जे नुकसान झालं पण तुम्ही इतके दिवस शांत का म्हणून राम मंदिराच्या चंदा आणि चंद्याच्या घोळा तुम्ही राहिला आहे त्यातून सिद्ध झाला आहे - On निर्मला सीतारामन - - महागाई आहे तर एक वेळा उपाशी राहा असं म्हणतात, देशाच्या अर्थमंत्री असलेल्या सितारामन या भगिनी आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एका संविधानिक महत्त्वाच्या पदावर आहात - - नेटचा पेपर लीग झाल्यावर काय नुकसान झालं याची थोडी काळजी असते तर हे सगळं पाप त्याची वेळी संपायचा कसं याचा प्रयत्न केला असता - - निर्मला सिताराम यांच्या या वाक्यावर मुला मुलींनी sosyal मीडियावर काय प्रतिक्रिया दिल्यात ते पहा - On भाजप नेते आंदोलन वक्तव्य - - त्यांच्या या लाईनवर सोशल मीडियावर जा, तुम्हाला त्यांच्यावर काय करता ते परत कळतील, जे कोणी भाजपचे मोठे नेते असे वक्तव्य करत असतील तर आमच्याबरोबर जंतर-मंतरवर चला आणि मग असं बोलावं मग काय होतं ते बघावं - - भाजपच्या कुठल्याही नेत्यांनी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ नये असं माझं मत आहे, आज जे काही झेन झी ची मानसिकता बिघडलेली आहे ते नरेंद्र मोदी सरकारच्या पापामुळे आहे - - तीन वर्षाच्या निवडणुकीची वाट पाहण्यापेक्षा नेपाळ मध्ये जशी परिस्थिती झाली तशी परिस्थिती या देशात निर्माण होणे याची काळजी सरकारने घ्यावी - On उपद्रवी तत्व - - आताचे आंदोलन कार्य आहे सरकारने जाहीर केलं ते आतंकवादी आहेत त्यांना आतंकवादी सारखं ट्रीट केल्या जाईल, त्यामुळे मला असं वाटतं की या देशाच्या तरुणाईला आतंकवादी म्हणून हे किती मोठे पाप नरेंद्र मोदीचे सरकार आणि भाजप करताय - - सरकारचा विरोधात जो बोलतो आतंकवादी,शहरी नक्षलवादी, अण्णा हजारेंनी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केलं होतं पण काँग्रेसने कधी त्यांना आतंकवादी म्हणाले नाही - - हे आंदोलन फेसलेस आहे, स्वयंस्फूर्त मुलमुले येतात, मुलींची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे आंदोलनाचे चेष्टा न करता या आंदोलनातला सकारात्मक मार्ग काढला गेला पाहिजे हे भूमिका आहे - On पीएम रील - - त्यांनी चुकीचा पाहिलं असेल, आपणही जा सोशल मीडियावर पाहिल्यावर ते पंतप्रधानांना काय काय बोलले तर मग आपल्याला कळेल, त्यामुळे मला असं वाटतं की जनमत हा जो भाग आहे याचा बीजेपीला काही देणं घेणं नाही - - हे आंदोलन टॉपवर आहे, हे जागतिक पातळीवर आहे, अमेरिका इंग्लड मध्ये झेन झी च्या सपोर्ट मध्ये आंदोलन झालं,त्यांचा राग कसा आहे हे देश बघतो आहे - - पाच वर्षांचा मालक समजू नका,जनतेसाठी काम करा,चौथ्या स्तंभाबद्दलचा राग समजला पाहिजे - On मुख्यमंत्री - - फडणवीस हे बुद्धीजीवी आहेत आणि आंदोलक हे आंदोलनजीवी आहेत, फडणवीस जेव्हा विरोधात होते तेव्हा ते काय होते मागच्या वळून बघितलं तर ते अशी प्रतिक्रिया देणार नाही, कदाचित मोदीजींना खुश करण्यासाठी ते असं बोलले असतील
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top