411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अक्कलकोट में गुरु पूर्णिमा पर 25 फुट फूलों से बनी स्वामी समर्थ प्रतिमा
Solapur, Maharashtra:गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट नगरीमध्ये हजारोंच्या संख्येने स्वामीभक्त दाखल - श्री अन्नछत्र मंडळाच्या वतीने साकारण्यात आली 25 फुटांची विविध फुलांची स्वामींची प्रतिमा - शेवंती, झेंडू, सुपारी अशा विविध फुलांपासून बनवण्यात आलेली श्री स्वामी समर्थांची प्रतिकृती पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी - फुलांच्या साकारण्यात आलेल्या स्वामी समर्थांच्या कलाकृती सोबत सेल्फी काढण्यासाठी स्वामी भक्तांची मोठी गर्दी0
0
Report
सोनू सूद ने गुरु पूर्णिमा पर साईं दरबार में दर्शन दिए, मंदिर परिसर में भीड़
Shirdi, Maharashtra:अभिनेता सोनू सूद साई दरबारी.. गुरुपौर्णिमेच्या दिवशी साई दर्शनाला हजेरी.. दुपारी होणाऱ्या मध्यान्ह आरतीला सोनू सूद याची उपस्थिती.. सोनू सुदला पाहण्यासाठी मंदिर परिसरात गर्दी... वाढलेली दाढी आणि निळ्या शर्ट परिधान केलेला सोनुचा हटके लुक...0
0
Report
IIT बॉम्बे हॉस्टेल में द्वितीय वर्ष के छात्र ने आत्महत्या, पुलिस जांच जारी
Mumbai, Maharashtra:IIT बॉम्बेमध्ये द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या IIT बॉम्बेच्या वसतिगृहात 20 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या सोहिल राजकुमार सांगवान हा मटेरियल सायन्सचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी हॉस्टेल क्रमांक 4, रूम G-4147 मध्ये बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेतल्याचा संशय घटनाची माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली बीएनएसएस कलम 194 अंतर्गत एडीआर क्रमांक 83/2026 नोंद आत्महत्येमागील नेमके कारण व परिस्थितीचा पवई पोलिसांकडून तपास सुरू0
0
Report
Advertisement
नाशिक के गड्ढे बन गए परेशानी, नागरिकों ने महापौर से गड्ढे रोकने की मांग तेज
Nashik, Maharashtra:खड्ड्यांमुळे नाशिककर झाले हैराण... कंबर दुखी पाठ दुखीचा करावा लागत आहे त्रास सहन.... नाशिक मध्ये पडलेल्या खड्ड्यांवर बोलवावी महासभा नगरसेवकांची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्हा भरात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास काम सुरू आहेत... शहरात देखील मोठ्या प्रमाणात रस्त्याचं काम सुरू असताना आता शहरातील सगळेच रस्ते हे खड्डेमय झाल्याचे चित्र पाहायला मिळते.... या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना कंबर दुखी पाठदुखीचा त्रास सहन होतोय... त्याचबरोबर अनेकांचे अपघात देखील या शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे झालेत.. आता या खड्ड्यांमुळे नाशिकचा राजकारण तापणार असून खड्ड्यांवरच महासभा बोलवावे अशी मागणी नगरसेवक करताना पाहायला मिळतायेत.. तर खड्ड्यांमुळे नाशिककर हैराण झाले असून अनेकांचे अपघात होतात याची तक्रार नाशिककर करतायेत.... त्याचबरोबर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक शहरातील खड्ड्यांचा अनुभव घ्यावा आणि शहरातील सगळे रस्ते सुधारित करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.... या संदर्भात नाशिक मधून आढावा घेत नागरिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....0
0
Report
आंद्रा बांध 1248 क्यूसेक पानी छोड़ता: नदी किनारे निवासी सतर्क रहें
Varsoli, Maharashtra:आंद्रा धरण शंभर टक्के भरल्याने धरणातून आंद्रा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या धरणाच्या द्वारविरहित सांडव्यावरून तब्बल १,२४८ क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाचा आणि धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकाचा अंदाज घेता, या विसर्गामध्ये कोणत्याही क्षणी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण कमी झाले असले, तरी धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पावसाच्या तीव्रतेनुसार आणि धरणात होणाऱ्या आवकनुसार या विसर्गात कोणत्याही वेळी वाढ किंवा घट होऊ शकते, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. त्यामुळे आंद्रा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी नदीपात्रात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
नाशिक बागलाण में इंदौर की प्याज गोण्या सड़क किनारे मिलने से किसानों में हंगामा
Nashik, Maharashtra:बागलाण (नाशिक) विशाल मोरे - साक्री - शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला मध्यप्रदेशातील इंदोरच्या कांद्याच्या गोण्या आढळल्या फेकलेल्या अवस्थेत... - नाशिकच्या बागलाण तालुक्यातील घटनेने खळबळ.. - कालच उमराणा येथील एनसीसीएफ कांदा खरेदी केंद्रावर मध्यप्रदेशातल्या ट्रक शेतकऱ्यांनी अडवला.. नाशिकच्या बागलाण तालुक्यात साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील सावकी फाटा परिसरात मध्यप्रदेशातील इंदोर येथील कांद्याच्या गोण्या रस्त्याच्या कडेला फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नुकतेच मध्यप्रदेशातून आलेल्या कांद्याबाबत वाद सुरू असताना आता ही नवी घटना समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, कालच उमराणा येथील एनसीसीएफ कांदा खरेदी केंद्रावर मध्यप्रदेशातून आलेल्या कांद्याच्या ट्रकबाबत शेतकऱ्यांनी आक्षेप घेत गोंधळ घातला होता. त्या घटनेनंतर अवघ्या एका दिवसात पुन्हा इंदोर येथील कांद्याच्या गोण्या रस्त्याच्या कडेला आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा व प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. या गोण्या येथे कोणी आणि कोणत्या उद्देशाने फेकल्या, त्यांचा संबंध कांदा खरेदी प्रक्रियेशी आहे का, याचा तपास करण्यात येणार आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे。0
0
Report
Advertisement
दापोली-खे़ड़ मार्ग पर दुचाकी दुर्घटना: नर्सिंग छात्रा की मौत, मित्र घायल
Ratnagiri, Maharashtra:दापोली-खेड मार्गावरील शिरसिंगे फाटा येथे आज सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या भीषण दुचाकी अपघातात २२ वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेजल भागवत असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, तिची मैत्रीण वैष्णवी चंद्रकांत अहिरे ही या अपघातात जखमी झाली आहे. जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोनही मैत्रिणी दापोलीहून आपल्या गावाकडे जात असताना हा हृदयद्रावक अपघात घडला. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे दापोली परिसर आणि शेजलच्या गावावर शोककळा पसरली आहे.0
0
Report
सप्तशृंगगड़ में गुरु पूर्णिमा पर आदिमाये के मंदिर में फूलों की सजावट
Nashik, Maharashtra:सप्तशृंगगड ( नाशिक ) : - सप्तशृंग गडावरील आदिमायेच्या मंदिर गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरास - गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने सप्तशृंगगडावर भाविकांची गर्दी... - भाविकांनी घेतले आदिमायेचे दर्शन... उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या व देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगड वणी येथील आदिमायेच्या मंदिर गाभाऱ्यात आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आकर्षक अशी फुलांची आरास करून सजावट करण्यात आली..फुलांच्या माळांनी मंदिर गाभारा पूर्ण सजलेला होता..गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सप्तशृंगगडावर आज भाविकांनी आदिमायेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती..हजारो भाविकांनी मनोभावे आदिमायेचे दर्शन घेतले..सण उत्सवाच्या निमित्ताने हजारो भाविक आदिमायेच्या चरणी नतमस्तक होतात..0
0
Report
मुंबई-पुणे रेलमार्ग पर मंकी हिल में बारिश से निखरे नैसर्गिक दृश्यों का जादुई नज़ारा
Varsoli, Maharashtra:मुंबई-पुणे लोहमार्गावरील खंडाळा घाटातील मंकी हिल परिसर सध्या पावसामुळे निसर्गाच्या अप्रतिम रंगांनी खुलून आला आहे. डोंगररांगांवर पसरलेलं दाट धुकं, हिरव्यागार दऱ्या आणि उंच कड्यांवरून फेसाळत कोसळणारे असंख्य धबधबे... हे दृश्य पाहताना जणू निसर्गानेच चित्र रंगवल्याचा भास होतो. रेल्वे या घाटातून मार्गक्रमण करत असताना खिडकीतून दिसणारी ही नयनरम्य दृश्यं प्रत्येक प्रवाशाच्या कॅमेऱ्यात आणि मनात कायमची घर करून जातात.0
0
Report
Advertisement
शिर्डी में गुरुपौर्णिमा उत्सव: लाखों भक्त दर्शनों के लिए उमड़े
Shirdi, Maharashtra:साईबाबांच्या शिर्डीत आज गुरूपोर्णीमेचा मोठा उत्साह बघायला मिळत आहे.साईबाबांना गुरूस्वरूप मानणारे लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झाले असून साईबाबांची शिर्डी गजबजून गेली आहे.. तीन दिवस चालणा-या उत्सवाचा आज दुसरा मुख्य दिवस असून देश विदेशातून आलेल्या भाविकांना आज साईबाबांचे दर्शन मिळावे यासाठी मंदिर रात्रभर खुले राहणार आहे...साईबाबांच्या शिर्डीत तीन दिवस गुरूपोर्णीमा उत्सव साजरा केला जातो .आज उत्सवाचा दुसरा मुख्य दिवस असून साईबाबांची काकड आरती झाल्यानंतर पादूकांच्या मिरवणूकीने आजच्या दिवसाच्या कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे.साईबाबांचे मंदिर आकर्षक फुलांनी आणी विद्युत रोषणाईने सजवण्यात आले असून शिर्डी माझे पंढरपूर म्हणत हजारो साईभक्त पायी पालख्या घेऊन शिर्डीत पोहचले आहेत.आम्ही गेल्या १५ वर्षापासून दर गुरुपौर्णिमा उत्सवाला शिर्डीत येऊन आम्ही साईबाबांच्या चरणी लीन होतो , साईबाबा आमचे गुरु आहेत आणि आम्ही आमच्या गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साईनगरीत येतो असल्याची प्रतिक्रिया साईभक्तांनी झी 24 तासशी बोलतांना दिलीये.साईभक्तांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी0
0
Report
कोल्हापुर में फिर बाढ़ की चेतावनी: पंचगंगा नदी तीसरे बार अपनी सीमा पार
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर जिल्हा सर्व दूर पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या sध्या दुधडी भरून वाहत आहेत. पंचगंगा नदीने तिसऱ्यांदा आपले पात्र ओलांडले असून जिल्ह्यातील धरण देखील पूर्ण क्षमतेंन भरू लागली आहेत. राधानगरी धरण तब्बल 97% इतके भरला आहे. याच पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. कोल्हापूरची पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्रा बाहेर पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फूट 6 इंचावर राधानगरी धरण - 97 टक्के भरले तुळशी 78 टक्के भरले वारणा 85 टक्के तर दूधगंगा 59 टक्के भरले कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव चिकोत्रा, जगंहटी, धामणी यासारखे लघुपाटबंधारे प्रकल्प सुमारे 60 ते 100 टक्के इतकी भरली आहेत.0
0
Report
सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती के त्रिभजन का निर्णय रद्द, भाजपा को झटका
Sangli, Maharashtra:सांगली बाजार समितीचे त्रिभजन कोल्हापूर खंडपीठाकडून रद्द, भाजपाला धक्का. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडून रद्द करण्यात आला आहे. राज्याच्या सहकार विभागाने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करत कवठे महांकाळ आणि जत कृषी उत्पन्न बाजार समिती नव्याने निर्माण करण्याचे आदेश दिले होते, त्यांनी विरोधात बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाकडुन मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठामध्ये धाव घेण्यात आली होती. ज्यावर कोल्हापूर खंडपीठाने राज्य सरकारच्या त्रिभजनाच्या आदेश रद्द केला आहे, तसेच राज्य सरकारला त्रिभाजनाबाबत फेर सुनावणी घेऊन, पुढील निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यमान संचालकांना तुर्त दिलासा मिळाला आहे, तर न्यायालयाच्या निर्णयामुळे आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपाला धक्का बसला आहे.0
0
Report
Advertisement
नवी मुंबई महापालिका कोरोना फंड घोटाला: 230 करोड़ खर्च, सिर्फ 55 करोड़ का हिसाब
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मनपा में कोरोना कालात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत असून सहा विभागांना खर्चासाठी दिलेल्या 230 कोटी पैकी केवळ 55 कोटी रुपयांचा हिशोबच प्रशासन देत आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली असून प्रशासनाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलाय. यात आरोग्य विभागावर 120 कोटी खर्च केलेत मात्र आरोग्य विभागाने 20 कोटी चा खर्चचा हिशोब दिला आहे. नवी मुंबई मनपातर्फे कोरोन काळात मार्च 2019 ते 2020 आणि मार्च 2021 ते 2022 या दोन वर्षाच्या काळात आरोग्य, शहर अभियंता, घनकचरा, विद्युत अभियंता, आपत्ती व्यवस्थापन आणि परिवहन अश्या सहा विभागांना एकूण 230 कोटी रूपये खर्चापोटी दिले मात्र या सहा विभागांकडे हा खर्च कुठे व कशासाठी झाला याची माहिती अधिकाराखाली माहिती मागवली असता केवळ 55 कोटी रुपयांचा हिशोबच प्रशासनाकडून देण्यात येतोय. यासंदर्भात लेखी तक्रार मुख्यमंत्र्यांसह आयुक्तांकडे केली असता सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागांना माहिती देण्याचे आदेश दिल्या नंतरही माहिती दडपण्यात येत असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र हडकर यांनी केलाय. नरेंद्र हडकर (आरटीआय कार्यकर्ते) कोरोना काळात सर्वाधिक 120 कोटी रुपयांचा खर्च आरोग्य विभागाने केला मात्र माहितीच्या अधिकारात केवळ 20 कोटींच्या खर्चाचा हिशोब देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आलेय. प्रशासकीय काळात मनमानी पद्धतीने कामे केल्याव्हा आरोप करत या कामांची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या तदर्थ समितीला देखिल माहिती देण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे. कोरोना काळात उभारलेले सेंटर, त्यातील सामान याची देखील माहिती देण्यात येत नसून संपूर्ण माहिती मिळेपर्यंत आम्ही थांबणार नसण्याची प्रतिक्रिया आरोग्य समिती सभापती जयाजी नाथ यांनी व्यक्त केलेय. डॉ .जयाजी नाथ (आरोग्य समिती सभापती) यासंदर्भात मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेले बहुतांश सामान डिसपोजल केले असून उर्वरित सामान काढण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच ऑक्सीजन प्लांट मनपा रुग्णालयात हलवण्यात आले असून बेड चे लिलाव करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केलेय. कैलास शिंदे (मनपा आयुक्त) कोरोना काळात साहित्य खरेदी केले गेले मात्र त्या साहित्याचा हिशोब लपवला जात असल्याने यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट आहे. भयावह संकटकाळात देखिल प्रशासनाने निर्दयीपणे केलेला भ्रष्टाचार संतापजनक असून यावर सत्ताधारी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.0
0
Report
इंस्टाग्राम पर हथियार दिखाते हुए रील बनाते गिरफ्तार, दो चाकू जप्त
Amravati, Maharashtra:इन्स्टावर रील बनवून दहशत माजवणं पडलं महाग; हातात दोन चायना चाकू घेऊन रील बनवणारा पोलिसांच्या जाळ्यात राजापेठ पोलिसांची धडक कारवाई, विधीसंघर्षित बालकाला घेतले ताब्यात, दोन नवीन चाकू जप्त (आरोपी हा विधी संघर्षित असल्याने व्हिडिओ मधील चेहरा मोझॅक करावा)0
0
Report
कोयना डैम का जलस्तर 83 टीएमसी पहुँचा; अन्य डैमों में विसर्ग जारी
Satara, Maharashtra:*सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाचा जोर कायम असून धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा आता 83 टीएमसीवर पोहोचला आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रणासाठी धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून 1 हजार 50 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर धोम धरणातून 1 हजार 668 क्युसक, तर उरमोडी धरणातून 500 क्युसेक आणि कन्हेर धरणातून 3 हजार 217 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या 24 तासांत कोयना परिसरात 88 मिलीमीटर, तर नवजा येथे 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पश्चिम भागात पावसाचा जोर अद्यापही कायम आहे.0
0
Report
Advertisement
