Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411037

पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा

Sept 24, 2024 05:46:17
Pune, Maharashtra

पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Dec 30, 2025 01:45:18
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 30, 2025 01:16:10
Yeola, Maharashtra:अँकर:-येवला नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भारतीय जनता पार्टी यांच्या महायुतीच्या गटनेतेपदी दीपक शिवाजीराव लोणारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, यांच्या नेतृत्वामध्ये येवला नगरपालिकेत महायुतीला 14 जागांवर बहुमत मिळाले होते सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्या उपस्थितीत सर्व नवनिर्वाचित सदस्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये ज्येष्ठ सदस्य छाया क्षीरसागर व प्रवीण बनकर यांनी सदस्य दीपक लोणारी यांची गटनेते पदासाठी सूचना मांडली यसानंतर जयाबाई जाधव यांनी अनुमोदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालनात दीपक लोणारी यांच्या नावाची अधिकृत घोषणा होऊन राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप महायुतीच्या गटाचे अधिकृत नोंदणी पूर्ण झाली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व नगरसेवक यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 30, 2025 01:15:21
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 29, 2025 16:30:37
Akola, Maharashtra:अकोल्यातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून सुरू असलेली चर्चा अधिकच लांबली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक गेल्या दोन दिवसांपासून अकोल्यात तळ ठोकून असून, आज शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड अकोल्यात दाखल झाले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रनील नाईक आणि संजय राठोड यांच्यात युती संदर्भात महत्त्वाची चर्चा होणार असून, या चर्चेनंतर भाजपसोबत अंतिम तोडगा काढण्यासाठी शेवटची बोलणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, जागावाटपाचा तिढा लवकरच सुटेल, अशी आशा व्यक्त करत चर्चा पूर्ण झाल्यानंतरच प्रतिक्रिया देणार असल्याचं मंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केलं आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 29, 2025 15:49:14
Kalyan, Maharashtra:कार्यकर्ते समोर झाले भाऊक.. डोंबिवलीत शिंदे गटा कडून बंडखोरीचे संकेत — अपक्ष उमेदवारीचा इशारा! शिवसेना शिंदे गटातील इच्छुक उमेदवाराकडून बंडखोरीचा थेट इशारा डोंबिवली पॅनल क्रमांक 29 मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील लोकसभा उपजिल्हा अध्यक्ष 2010 मधील माजी नगरसेवक रवी पाटील अपक्ष लढण्याच्या तयारीत 65 इमारती प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या मंदार टावरे यांना भाजपकडून उमेदवारी दिल्याने नाराजी यामुळे शिंदे गटातील जिल्हा लोकसभा अध्यक्ष रवी पाटील आक्रमक डोंबिवलीतील अहिरे गावात कार्यकर्ता मेळावा घेत अपक्ष निवडणूक लढण्याची मांडली स्पष्ट भूमिका अहिरे गाव प्रभाग 29 मधून रवी पाटील इच्छुक उमेदवार होते अनेक वर्ष महायुतीचं काम केलं मात्र आता अशा लोकांना उमेदवारी भाजप उमेदवारी देत असल्याने अपक्ष निवडणूक लढण्याची स्पष्ट मांडली भूमिका विशेष म्हणजे 65 इमारती प्रकरणात खोटे दस्तावेज सह अनेक अनधिकृत बांधकाम विषयी पालिकेने देखील त्यांच्यावरती ठपका ठेवला आहे .. ते उमेदवारी अर्ज देखील भरू शकत नाही तरीदेखील भाजप नेत्यांना उमेदवारी दिली आहे आम्ही आमचं स्वतःचं पॅनल तयार करून अपक्ष लढणार या संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यांना काल भेटू माहिती दिली असल्याची माहिती देखील त्यांनी सांगितले आहे यामुळे आता महायुतीत लढणारे दोन्ही मित्र पक्षांमधील इच्छुक उमेदवारांनी आता बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी लढणार असल्याने दोन्ही पक्षाच्या नेत्यांना डोकेदुखी ठरणार आहे
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 29, 2025 15:24:57
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 29, 2025 15:23:49
Virar, Maharashtra:ANC : वसई–विरार शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज एकूण ५४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. या अर्ज भरण्यावेळी शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत ढोल-ताशाच्या गजरात उमेदवारांनी अर्ज दाखल करत निवडणूक रणशिंग फुंकले आहे. शिवसेना ठाकरे गटाने वार्ड क्रमांक महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वबळाचा नारा दिला आहे. हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, मनसे आणि काँग्रेस हे एकत्र लढत असून आगामी शिवसेना ठाकरे गटाने स्वतंत्र लढण्याचा नारा दिला आहे. तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट महायुतीच्या माध्यमातून लढत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत विरार पश्चिममध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 29, 2025 14:38:35
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक आता तिरंगी होणार, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडी, महायुती आणि राजर्षी शाहू महाराज आघाडी एकमेकांसमोर उभ्या ठाकणार आहेत. असं असलं तरी, या निवडणुकीतील प्रमुख लढत काँग्रेस विरुद्ध महायुतीचे घटक पक्ष अशीच पाहायला मिळणार आहे. पण महायुती आणि महाविकास आघाडी मधील नाराजानी काही ठिकाणी बंडाचा झेंडा फडकवल्याने या निवडणुकीतील रंगत वाढली आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रत्येक प्रभागावर आपलं बारकाईनं लक्ष असल्याचं सांगत उमेदवारांना कामाला लागण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. एकीकडे काँग्रेस उमेदवारांच्या याद्या जाहीर करत असताना, दुसरीकडे मात्र महायुतीमध्ये जागावाटपावरून तब्बल 6 दिवस जोरदार रस्सीखेच सुरू होती. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या जागांवर ठाम राहिल्यामुळे तिढा अधिकच वाढला. या वादात अखेर राज्यस्तरीय नेत्यांनाही हस्तक्षेप करावा लागला. चर्चेअंती भाजप 36, शिवसेना 30 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 15 जागा असा फॉर्म्युला ठरवण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस 20 जागांवर ठाम होती, तर कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मतदारसंघातील सर्वच खुल्या प्रवर्गाच्या जागांवर दावा केला होता. अखेर महायुती मधील सर्व पक्षांनी एक पाऊल मागे येत तडजोड करून महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला. पण उमेदवारी यादी मात्र गुलदस्तात ठेवली आहे. महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटणार नाही, आणि त्यामुळे राष्ट्रवादी स्वबळावर जाईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, राष्ट्रवादीला 15 जागा देत महायुती टिकवण्यात भाजप आणि शिवसेनेला यश आलं. तरीही, भाजपला आणि शिवसेनेच्या आपल्या सर्व इच्छुकांना न्याय देता आला नाही. त्यामुळे उमेदवारी न मिळालेले कार्यकर्ते नाराज झाले आहेत. काहींनी बंडाचा झेंडा देखील उभारला आहे. एका दिशेने महायुती टिकवताना अनेक इच्छुक नाराज झाले, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील मोठा भाऊ असलेल्या काँग्रेसकडून शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीला अपेक्षित न्याय मिळाला नाही. याच नाराजीचा फायदा घेत वंचित बहुजन आघाडी, शरदचंद्र पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र येत राजर्षी शाहू महाराज आघाडी स्थापन करण्यात आली आहे. पण सुरुवातीला ही निवडणूक दुरंगी होईल, असं चित्र होतं. मात्र, महाविकास आघाडीतून दुखावलेल्या पक्षांनी स्वतंत्र आघाडी उभार कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात तिसरा पर्याय उभा केला आहे. त्यामुळे आता कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक अत्यंत चुरशीची आणि तिरंगी ठरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 29, 2025 14:37:45
Kalyan, Maharashtra:सेना और भाजपा के इच्छुक उम्मीदवारों के टिकट कटने से वे दूसरे दलों की ओर शिफ्ट हो रहे हैं. कल्याण डोंबिवली नगर निगम चुनाव के लिए सेना-भाजपा की आख़िर युति हुई, जिसके कारण इन दोनों पार्टियों के अनेक इच्छुक उम्मीदवारों के टिकट काट दिए गए. परिणामस्वरूप इन उम्मीदवारों ने सेना उद्धव बाला साहेब ठाकरे पार्टी और मनसे के पास जाने की दौड़ शुरू कर दी है. भाजपा और शिवसेना की युति के कारण कुछ उम्मीदवारों को टिकट नहीं मिला. इनमें भाजपा के Standing नगरसेवक वैशाली पाटिल, अर्जुन भोईर, और चार दिन पहले मनसे से भाजपा में आए त्रिप्ती भोईर भी टिकट नहीं पाए, इसलिए वे नाराज हैं. परिणामस्वरूप कुछ उम्मीदवारों ने अपने पक्ष से इस्तीफा दिया है. चूंकि कल नामांकन दाखिले की आख़िरी तारीख है, ये नाराज उम्मीदवार कल किस दल से नामांकन दाखिल करेंगे, यह देखना होगा. साथ ही यह भी देखना होगा कि इनमें से कितने नाराज़ उम्मीदवार दोनों पक्षों द्वारा मनाने में सफल होते हैं.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 29, 2025 14:36:42
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 66 उमेदवारी अर्ज झाले दाखल, शेवटच्या दिवशी मंगळवारी सकाळी 11 ते 2 या कालावधीत अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार असून अद्याप प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची नावनिश्चिती झाली नसल्याने गोंधळात भर पडली आहे. अनेक इच्छूकांनी उमेदवारी अर्ज आधीच दाखल केले असून एबी फॉर्म मिळाल्यावर ते जोडले जाणारे आहेत. उमेदवारांची अन्य पक्षांकडे पळापळ होऊ नये यासाठी यादी रोखून धरत सावध खेळी खेळली जात आहे. भाजपची यादी नागपुरात निश्चित होत असली तरी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या चंद्रपुरातील निवासस्थानी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top