Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411037

पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा

Sept 24, 2024 05:46:17
Pune, Maharashtra

पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 23, 2025 12:34:47
Ambernath, Maharashtra:माजी नगरसेविका शुभांगी बहनवाल यांच्या पतीवर शिवसेना कार्यकर्त्यांचा हल्ला झाला. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भाजप मध्ये गेल्याने हल्ला केल्याचा आरोप यात आहे. शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका शुभांगी बेहनवाल यांच्या पतीवर शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी हल्ला केला. उल्हासनगरमध्ये घडलेल्या घटनेची नोंद मध्यवर्ती पोलीस ठाण्यात झाली. बेहनवाल यांच्या कार्यकर्त्यांचा रात्रौ 11 वाजता योगेश पवार यांच्या येण्याबरोबरच चौधरी यांच्या कार्यकर्त्यांनी पवार याला मारहाण केली, आणि शिलरत्न जाधव व आणखी एकाने सचिन आहेर यांना मदत केली. परिसरात दशहत पसरवण्यासाठी आरडा ओरडा व मारहाण करण्यात आली. या घटनेचा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल झाला. याप्रकरणी शीलरत्न जाधव, रतन उर्फ बाळा गायकवाड, सचिन आहेर व इतरांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 23, 2025 12:22:01
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यातील ३१५ शेतकऱ्यांच्या ई-केवायसी नसल्यामुळे नुकसानाच्या अनुदानापासून वंचित आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या नुकसान झालं होतं, प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते, पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवण्यात आलेला होता, या नुकसानीत ९१८ शेतकऱ्यांच्या नुकसान झालं होतं, त्यापैकी ६०३ शेतकऱ्यांना नुकसानाची भरपाई मिळालेली आहे. मात्र अजूनही ३१५ शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नसल्यामुळे सप्टेंबरपासून नुकसान झालेल्या शेतकरी अजूनही नुकसान भरपाई पासून वंचित असल्याने तातडीने ई-केवायसी करून घ्यावा जेणेकरून शासनाची मदत मिळण्यास मदत होणार आहे. प्रशांत परदेशी, नंदूरबार.
73
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 23, 2025 12:21:18
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात उसाच्या पाठोपाठ पपईच्याही दरांचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. व्यापारी पपईला योग्य दर देत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीली आहे. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड करण्यात आलेली असून आता पपई काढणीवर आली आहे. मात्र पपईला चांगला दर मिळत नसल्याने पपई उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, व्यापाऱ्याकडून पपईला आठ रुपये 11 पैसे देण्याच्या निर्णय घेतला होता मात्र ऐन वेळेस व्यापाऱ्यांनी ठरवून दिलेला दर शेतकऱ्यांना देत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून पपई तोडणी बंद करण्यासाठी विचार केला जात आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पपई घेण्यासाठी उत्तर भारतातून व्यापारी येत असतात, मात्र व्यापाऱ्यांच्या मनमानीमूळ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याने पपई नाशवंत फळ असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून मनमानी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहेत.
58
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 23, 2025 12:19:16
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणी सापडला आहे कांद्याला ५०० ते १,२०० रुपये प्रतिक्विंटलच्या दर मिळत असल्याने कांद्यावर केलेला खर्चही निघत नसल्याची परिस्थिती उद्भवली आहे नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करण्यात येत असते तिघेही हंगामात कांदा लागवड होत असतो, परंतु यावर्षी कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने बाजार समितीत देखील कांद्याची आवक घटले असल्याचे दिसून येत आहे. कांद्याला योग्य भाव आणि वेळेवर खरेदी व्हावी यासाठी कांद्याची स्वतंत्र बाजारपेठ सुरू करण्यात आलेली आहे मात्र कांद्याला दर मिळत नसल्याने बाजार समितीत कांदा पिकाची ओस पडले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने मध्यस्थी करत कांद्याला योग्य हमीभाव देऊन सरकारने स्वतः खरेदी करावा अशी मागणी शेतकरी राजा करू लागला आहे.
52
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 23, 2025 12:19:01
70
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 23, 2025 12:16:23
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर मतदार यादीत विचित्र वाढ? मनसेचे गंभीर आरोप – प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निवडणूक आयोगाकडून “एक जुलै 2025 रोजीची मतदार नावेच ग्राह्य धरली जातील” अशी अधिकृत माहिती देण्यात आली होती. मात्र तरीही 17 नोव्हेंबर 2025 रोजी नव्याने नोंदवलेली मतदारांची नावे 20 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर झालेल्या प्रारूप यादीत समाविष्ठ झाल्याचा दावा कदम यांनी केला आहे. मनसेच्या म्हणण्यानुसार, प्रभाग क्रमांक 14 मधील यादी भाग क्रमांक 297 मध्ये तब्बल 116 नावे वाढविण्यात आली आहेत. एका प्रभागात साधारण 15 ते 20 याद्या ग्राह्य धरल्या जात असल्याने एकाच प्रभागात 2 ते 3 हजार मतदार वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे. उल्हासनगरातील एकूण 20 प्रभाग आणि 78 वॉर्डमध्ये ही वाढ किती मोठी असेल, याचा अंदाज लावणे अशक्य असल्याचे कदम यांनी सांगितले. या वाढीमागे राजकीय हस्तक्षेप आहे का, अशी शंका देखील त्यांनी व्यक्त केली. विशेषतः उल्हासनगरात भाजपकडून “एम वाय पॅटर्न” राबवला जात आहे का, असा थेट सवाल करत मनसेने प्रशासनाची भूमिकाच संशयाच्या भोवऱ्यात आणली आहे.
17
comment0
Report
SMSamruddhi M Kolhe
Nov 23, 2025 12:07:06
Khopoli, Maharashtra:रायगड ब्रेकिंग अखेर तुटलेली युती पुन्हा जुळली खोपोली मध्ये उबाठा आणि अजित दादांची राष्ट्रवादी मध्ये मनोमिलन जुळले रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका असलेली खोपोली सर्वाधिक चर्चची बनली आहे. खोपोली नगरपालिका यंदा अजित दादांची राष्ट्रवादी आपल्या पारड्यात खेचून आणण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेऊन बाजी मारण्याच्या तयारीत आहे परंतु अंतर्गत उमेदवारीवरून या दोघांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वाद झाल्याने युती तुटली होती त्यानंतर दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आपापसातील भानगडी मिटवून पुन्हा युती केली असून खोपोली नगरपालिका पुन्हा ताकदीने लढून जिंकू असा निर्धार या नेत्यांनी केलाय.
93
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 23, 2025 12:04:37
Pandharpur, Maharashtra:सांगोल्यात नगरपालिका निवडणूक निमित्ताने विधानसभेच्या निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार पाडा पाडीच्या राजकारणाचे किस्से आता शिवसेनेचे पराभूत उमेदवार माजी आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये माझ्या विरोधात काम केलेल्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे पितळ आज उघडे पडले आहे. विधानसभा निवडणुकेंत त्यांनी शेकाप पक्ष आणि ठाकरे गटाचे उमेदवार यांना कशा रकमा पोहोच केल्या याची टायमिंग सह माहिती आहे. निवडणुकीपूर्वीच मला माहीत होते भाजपने माझे कंबरडे मोडले आहे. शेकाप पक्षाला मदत केली मला माहीत होत. पण मी भाजप अथवा देवेंद्र फडणविस यांच्या वर टीका केली नाही. मित्र पक्षाचा धर्म मी कायम पाळला आहे. आज जुळवायचे सोडून तोडायचे काम करत आहेत असा आरोप भाजप नेत्यांवर केला आहे.
126
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 23, 2025 11:33:10
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग -- स्मृती मानधनाचा विवाह सोहळा तूर्त रद्द, वडिलांना आला हृदय विकाराचा झटका. स्मृती मानधना भारतीय महिला संघाची उपकर्णधार असून स्मृती मानधना हीच विवाह सोहळा तुर्त रद्द झालाय. का स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लग्नाची तयारी सुरू असतानाच आजचा विवाह सोहळा तूर्त रद्द करण्यात आला आहे. संपूर्ण देशाचं लक्ष आजच्या पार पडणाऱ्या स्मृतीच्या लग्न सोहळ्याकडे लागून राहिलं होतं. गेल्या तीन दिवसांपासून या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय महिला क्रिकेट संघ देखील स्मृतीच्या सोबत होता; वेगवेगळे इव्हेंट्स या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने पार पडत होते, आज सायंकाळी मुख्य लग्न सोहळा पार पडणार होता. दुपारच्या सुमारास स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला, तातडीने त्यांना सांगलीच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र तूर्त विवाह सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती यांच्याकडून देण्यात आली आहे, याचाच आढावा घेतला आहे.
156
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 23, 2025 11:31:17
Pandharpur, Maharashtra:सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना भाजप आणि शेकाप यांनी एकट पाडल्यानंतर आज माजी आमदार पाटील यांच आक्रमक भाषण, भाजपसह शेकاپ नेत्यांवर सोडले टीकेचे बाण भाजप सोबत जाणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या समाधीची पूजा करण्याचा अधिकार नाही. तो अधिकार त्यांनी गमावला आहे. आता आपण गणपतराव देशमुख यांच्या समाधीची पूजा करूया या तालुक्यातच दोनच राजे एक स्वर्गीय गणपतराव देशमुख आणि शहाजी बापू पाटील तालुक्याच्या राजाला भिक वाढण्याची तुमची लायकी नाही. माझी एक दोन जागेवर बोळवण करण्याच्या यांचा डाव होता. नगरपालिका निवडणुका निमित्ताने कुठलीतरी माकडे एकत्र येऊन मला धमकावत आहेत. अरे मला धमकावत आहात.. सगळा महाराष्ट्र मला घाबरतो. असा शब्दात माजी आमदार पाटील यांनी भाजप आणि शेकाप नेत्यांना टीकेने घायाळ केले आहे.
186
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 23, 2025 11:25:04
Washim, Maharashtra:वाशिम: काँग्रेस कार्यकर्ते म्हणाले काँग्रेस पक्षाकडे विकासाचे व्हिजन नाही, काँग्रेस पार्टी पूर्ण चितर बितर झाली असून एक कार्यकर्ता म्हणाला काँग्रेसचे हाल खूप खराब आहेत, विजय वडेट्टीवार हे नाना पटोले कडे पाहायला तयार नाहीत; नाना पटोले हे विजय वडेट्टीवार कडे पाहायला तयार नाहीत; हे दोघेही मिळून त्या हर्षवर्धन सपकाळाला विचारायला तयार नाहीत असे काँग्रेसचे हाल झाले आहेत, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे वाशिमच्या मालेगाव येथे भाजपचे नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश बळी व भाजपाच्या नगरसेवकाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेकरिता आले असता बोलत होते. स्टेज बाइट-चंद्रशेखर बावनकुळे (महसूल मंत्री)
75
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 23, 2025 11:24:34
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महारेरा प्रकरण के 65 इमारतों के निवासी अब बड़ी राहत पाएंगे। दो दिनों पहले अदालत में सुनवाई हुई और 65 बिल्डिंगों के निवासियों को इस मामले में पक्षकार बनाने की मांग कोर्ट ने मान ली है। इससे निवासियों को अदालत में अपनी बात रखने का मौका मिलेगा। हाईकोर्ट ने निवासियों के पक्षकार बनने के निर्देश दिए, जिससे उनका संघर्ष मजबूत हुआ है। इस प्रकरण में भाजपा के दीपेश म्हात्रे ने पहल की और भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण से निवासियों का फोन पर संवाद कराया। चव्हाण ने निवासियों को पूर्ण समर्थन देते हुए कहा कि वे संघर्ष में उनके साथ हैं। अब निवासियों को कोर्ट में अपनी दलीलें पेश करने का अवसर मिलेगा। अगली सुनवाई में हाईकोर्ट उनके तर्क सुनेगा, यह चरण निवासियों के लिए अत्यंत महत्वपूर्ण है。
186
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 23, 2025 11:18:56
Chendhare, Alibag, Maharashtra:महाड के चवदार तळे के विकास हेतु केंद्र से विशेष निधि लाने का निर्णय लिया गया है। सत्याग्रह शतक महोत्सवी वर्ष के अवसर पर यह निधि उपलब्ध कराई जाएगी। खासदार सुनील तटकरे ने इसकी जानकारी दी। महाड नगर परिषद चुनाव के लिए युति का घोषणापत्र जारी किया गया है। महाड के प्रतिष्ठित व्यवसायी व वकील संघटनों के साथ संवाद के बाद महाड नगर परिषद के लिए अभियान तेज किया गया है। डाॅ बाबासाहेब आंबेडकर के सत्याग्रह को शताब्दी वर्ष में स्मरण किया जाएगा और आवेदन के अनुसार केंद्र से निधि प्राप्त कर क्षेत्र के सुशोभीकरण की योजना बनाई जाएगी। प्रधानमंत्री से मिलने की भी संभावनाओं के बारे में चर्चा की गई है।
88
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 23, 2025 11:18:39
Navi Mumbai, Maharashtra:anchor - नवी मुंबई मधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उदघाटन वरून मागील आठवडाभरापासून सुरू असलेले राजकारणाला अखेर आज पूर्ण विराम मिळालाय असे म्हणावे लागेल. आज मनसे नेते अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला भेट देत महाराजांना वंदन केले. यासोबतच पायी चालत पोलीस ठाणे गाठत अमित ठाकरे यांनी दाखल गुन्ह्याची नोटीस स्वीकारली. मनसे ने आज नेरुळ मधील शिव स्मारका जवळ भव्य शक्ती प्रदर्शन केले. शिवस्मारकाचे झालेले उदघाटन अमित ठाकरे यांच्या आंदोलनामुळेच झाले असल्याबाबत धान्यवाद अमित ठाकरे असे बोर्ड देखील झळकावले. उदघाटना पासून शिव स्मारकाचा मुद्दा श्रेयवादात अडकलेला होता. अमित ठाकरे यांनी उदघाटन केल्यावर चारच दिवसात मनपाने उदघाटन केले होते. मात्र शासकीय उडघटनाला शिवसेना शिंदे गटाने पाठ फिरवत एकदा उदघाटन केले तर पुन्हा करायची गरज नव्हती असे स्पष्ट केले. तर वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील अमित ठाकरे यांनी उत्स्फूर्त भावनेने उदघाटन केले असल्याचं त्यांनी निर्देश आयुक्तांना दिले. महायुती तर्फे अमित ठाकरे यांच्या कृतीचे समर्थन करण्यात आल्याने या उदघाटनाचे श्रेय अप्रत्यक्षपणे अमित ठाकरे यांना दिले. आज भव्य शक्ती प्रदर्शन करत मनसेने शिव स्मारका वरून सुरू असलेल्या राजकारणावर पडदा टाकत पूर्ण विराम दिलेला पहायला मिळत आहे. महाराजांसाठी असे कितीही गुन्हे घेऊ असे सांगत शिव स्मारकाचे उदघाटन माझ्या हस्ते व्हावं हे माझ्या भाग्यात लिहिलं होतं अशी प्रतिक्रिया ममसे नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केलेय.
172
comment0
Report
Advertisement
Back to top