411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रत्नागिरी में गणेश भक्तों के बीच आरटीओ की चेकिंग, रिक्षा भाड़ा वसूली रोक
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या गणेश भक्तांची रिक्षा चालकांकडून लुट होऊ नये म्हणून रत्नागिरी आरटीओ विभाग अक्शन मोडवर प्रवाशांच्या माहितीसाठी रेल्वे स्टेशनसह जिल्ह्याभरात मुख्य ठिकाणी लावले दर फलक, शेअर रिक्षाचेही लावले दरफलक प्रवाशांची गर्दी होणाऱ्या ठिकाणी आरटीओ पथकाची तपासणी मोहीम रिक्षा भाडे नाकारणे, जादा भाडे आकारणे आणि मीटर प्रमाणे भाडे न आकारणे अशा रिक्षा चालकांच्या विरोधात होणार कारवाई रत्नागिरी रेल्वे रेल्वे स्थानकावर येतात लाखोंच्या संख्येने गणेश भक्त अवाजवी भाडे आकारून लूट थांबवण्यासाठी जिल्ह्यात मुख्य वर्दळीच्या ठिकाणी RTO विभागाची तपासणी मोहीम..0
0
Report
शिर्डी में 629 ग्राम सोने का मुकुट दान, कीमत 82 लाख
Shirdi, Maharashtra:बैळपोळा सणाच्या दिवशी शिर्डीत भक्ती आणि श्रद्धेचं अनोखं दर्शन घडलंय. आंध्र प्रदेशातील एलुरु येथील देणगीदार साईभक्त एम. श्रीनिवास राव यांनी साईचरणी 629 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट देणगी स्वरूपात साईबाबांना अर्पण केलाय. आकर्षक नक्षीकाम असलेल्या या मुकुटाची किंमत तब्बल 82 लाख 39 हजार 271 रुपये इतकी आहे. साईबाबांवरील अढळ श्रद्धेतून अर्पण केलीली ही सुवर्णभेट भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक ठरलीय. यावेळी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साईभक्त एम. श्रीनिवास राव यांचा सत्कार केला. पोळ्याच्या पवित्र पर्वावर साईचरणी अर्पण झालेल्या या सुवर्ण मुकुटाने शिर्डीत भक्तीची श्रीमंती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे...0
0
Report
नागपुर की बडग्या प्रसार में आसिफ मुनीर के खिलाफ राजनीतिक फलक, विवाद तेज
Nagpur, Maharashtra:नागपूर पोळ्याच्या पाडव्याला म्हणजेच तान्हा पोळ्याच्या दिवशी नागपुरात मारबत बडग्यांच्या मिरवणुकीची ऐतिहासिक परंपरा आहे. सामाजिक कुप्रथेवर, भ्रष्टाचार, आंतरराष्ट्रीय विषयांवर भाष्य करणारे तसेच देशाविरुद्ध बोलणाऱ्यांवर टीका करणारे फलक बडग्यांवर लावण्यात येतात... राजकीय भाष्य व टीकाही करण्यात येते... सरकारी धोरण आणि वर्तमान घडामोडींवर थेट सवाल उपस्थित करणारे बडगे निघत असतात... यंदा छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव मंडळाने पाकिस्तानी फील्ड मार्शल आसिफ मुनीरचा बडग्या काढणार आहे... भारताविरुद्ध सगळ्या लढायांमध्ये हरणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचा हा फील्ड मार्शल... सतत पोकळ वल्गना करत असतो..... तसेच भारताविरुद्ध नेहमी कटकारस्थान करत असतो... म्हणून त्याच्या विरुद्ध हा बडग्या काढण्यात आलाय... गेल्या वेळेस याच मंडळाने भारतावर टेरिफ लादणाऱ्या ट्रम्पचाही बडग्या काढला होता ...यंदा आसिफ मुनीरचा बडग्या काढणाऱ्या छत्रपती शिवाजी पार्क समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी0
0
Report
Advertisement
कांग्रेस नेता नाना पटोले ने बैल पोळा पर बैलों को सम्मान दिया, ग्रामीण संस्कृति जीवंत
Bhandara, Maharashtra:कांग्रेस नेते नाना पटोले यांनी बैल पोळ्या निमित्त बैलांप्रती आदर व्यक्त करत त्यांचे औक्षण केले.... शेतकऱ्याचा खरा साथीदार म्हणून बैलाला विशेष महत्त्व आहे... वर्षभर शेतात नांगरणी, पेरणीपासून शेतीच्या विविध कामांमध्ये शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी आपल्या मूळ गावी सुकळी येथे पोळ्यानिमित्त बैलांची पूजा केली. बैलांना सजवून त्यांची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. यावेळी पारंपरिक पद्धतीने बैलांप्रती आदर व्यक्त करत त्यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी नाना पटोले यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधत बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. शेतकरीांच्या जीवनात बैलांचे असलेले योगदान आणि ग्रामीण संस्कृतीतील पोळा सणाचे महत्त्व यावेळी अधोरेखित झाले.0
0
Report
येओला में मूसलाधार बारिश, खरीफ फसलों को मिला जीवनदान—जानिए पूरी कहानी
Yeola, Maharashtra:येवला ब्रेक येवल्यात मुसळधार पावसाला सुरुवात... ta bb l च्या विश्रांतीनंतर पावसाची दमदार हजेरी... येवल्यात आलेल्या पावसामुळे खरीप पिकांना मिळाले जीवदान.....0
0
Report
अकोला की डाबकी रोड पर पाइपलाइन लीक से बड़ा गड्ढा, युवक कांग्रेस ने प्रदर्शन
Akola, Maharashtra:अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात पाईपलाईन लिकेजमुळे रस्ता खचून मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप करत युवक काँग्रेसने आंदोलन केले आहे. युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आकाश कवडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी थेट खड्ड्यात उतरून मनपा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. पाईपलाईनची गळती तातडीने दुरुस्त करून रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. केवळ पाहणी आणि आश्वासन न देता तातडीने काम न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे.0
0
Report
Advertisement
किसानों के महत्त्वपूर्ण बैल पोळ्या पर सुधीर मुनगंटीवार ने घर के बैलजोड़ पूजा की
Chandrapur, Maharashtra:ग्रामीण महाराष्ट्र और शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असलेल्या बैल पोळ्यानिमित्त आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज घरच्या बैलजोडीचे पूजन मनोभावे पूजन केले. शेतकरी वर्गासाठी एका दाण्याचे 100 दाणे करण्यासाठी बैलाचे मोठे महत्व आहे. शेतीकामात मदत करणाऱ्या बैलाचे ऋण व्यक्त करण्यासाठी सणाचे महत्त्व असल्याची भावना आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. राज्यातील शेतकरी सुखी समृद्ध व्हावा अशी कामना त्यांनी व्यक्त केली.0
0
Report
चंद्रपूर के सिंदेवाही में बैल पूजे के साथ ट्रैक्टर पोळा का भव्य आयोजन
Chandrapur, Maharashtra:चन्द्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे बैल पोळ्यासह साजरा झाला ट्रॅक्टर पोळा, सलग सातव्या वर्षीच्या आयोजनाने वेधले सर्वांचे लक्ष बैलपोळ्याची परंपरा जपत चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवरगावात यंदाही अनोख्या ट्रॅक्टर पोळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या घटत असताना, गेल्या ७ वर्षांपासून नवरगावात बैलपोळ्यासोबतच ट्रॅक्टर पोळा साजरा करण्याची नवी परंपरा रूजली आहे. शेतीत वर्षभर राबणाऱ्या सर्जा-राजाची पूजा करण्याची परंपरा आजही कायम आहे. मात्र कमी वेळात काम करणाऱ्या ट्रॅक्टरने बैलाची जागा घेतल्याने अनेक ठिकाणी पोळ्याला बैलजोडी मिळणे कठीण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर नवरगावातील ट्रॅक्टर मालकांनी एकत्र येत ट्रॅक्टर पोळा भरवण्यास सुरुवात केली. यंदा ३८ ट्रॅक्टर्सना आकर्षक फुलांनी, झेंड्यांनी सजवून गावातील मुख्य रस्त्यावरून वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी व बालगोपालांनी मोठी गर्दी केली होती. सहभागी ट्रॅक्टर चालकांना वॉटर कॅन बक्षीस म्हणून दिली गेली. पारंपरिक बैलपोळा और आधुनिक ट्रॅक्टर पोळ्याचा हा संगम पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे. बाईट १) स्थानिक शेतकरी, नवरगाव आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
अकोला में बारिश ने फसलें बर्बाद, किसान बैलपोला भी नहीं मना सके
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात पावसाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी आणि तूर यासह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उर्वरित पिकांवर वन्यप्राण्यांचा उपद्रव होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिकांचे नुकसान, प्रलंबित पीकविमा आणि दुष्काळ जाहीर न झाल्याने सरकार व लोकप्रतिनिधींविरोधात नाराजी असल्याचा आरोप शेतकरी यलगार समिती, बार्शीटाकळीने केला आहे. बैलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी वर्षभर राबणाऱ्या शेतकऱ्यांनी बैलपोळा साजरा करतो; परंतु यंदा आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने नैवेद्य देणेही कठीण झाले आहे.0
0
Report
Advertisement
यवतमाळ के बैल पोळे में किसानों ने पारंपरिक जोड़े दिखाए, सरकार पर दुष्काळ और कर्जमाफी सवाल
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ च्या पोस्टल ग्राउंड वर नगर परिषदेने भरविलेल्या बैल पोळ्यात शेतकरी सजविलेल्या बैल जोड्या घेऊन उत्साहात सहभागी झाले. दुष्काळाच्या सावटात आलेल्या पोळ्याला बैलांचा थाट बघायला मिळाला. यावेळी शेतकऱ्यांनी पारंपारिक खेळ खेळत, 'एक नमन गौरा पार्वती, हर बोला, हर हर महादेव' चा गजर करीत झडत्या म्हटल्या, शेतकऱ्यांनी फसवी कर्जमाफी, पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, दहीहंडीतील असभ्य नृत्य अशा मुद्द्यांवर ताशेरे ओढले, त्यानंतर उत्कृष्ट बैलजोड्यांना बक्षिस वितरित करण्यात आले。0
0
Report
डोंबिवली में FDA ने बड़ी कार्रवाई; 500 लीटर मिलावटी दूध जब्त
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत FDAची धडक कारवाई; सांगलीहून आणलेले ५०० लिटर भेसळयुक्त सुटे दूध जप्त.... डोंबिवलीत अन्न व औषध प्रशासन अर्थात FDAकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सांगलीहून डोंबिवलीत आणलेले तब्बल ५०० लिटर सुटे दूध भेसळयुक्त असल्याचे आढळून आल्याने हे दूध जप्त करत नष्ट करण्यात आले. कल्याण अन्न व औषध विभागाच्या पथकाने ही कारवाई करत दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.0
0
Report
नवी मुंबई नगर निगम ने मिठी नदी का गाद साफ करने के लिए 1.31 करोड़ खर्च कर दिया
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मनपाचा अजब कारभार, भूखंड सिडकोचा, प्राधिकरण एमआयडीसी आणि गाळ मिठी नदीचा असताना कंपन्यांमध्ये शिरलेला गाळ काढण्यासाठी मनपा करणार 1 कोटी 31 लाख रुपये खर्च. नवी मुंबई महापालिकेचा अजब कारभार समोर आला आहे. मुंबईतील मिठी नदीचा काढलेला गाळ सिडकोच्या भूखंडावर टाकण्यात आला होता. मात्र हा गाळ डोंगरातून पावणे एमआयडीसी मधील चार कंपन्यांच्या आत घुसला होता. आता भूखंड सिडकोचा, प्राधिकरण एमआयडीसी आणि गाळ मिठी नदीचा असताना कंपन्यांमध्ये शिरलेला हा गाळ काढण्याचे काम मात्र नवी मुंबई महानगरपालिकेने केलेय. यासाठी नवी मुंबई महापालिकेने तब्बल एक कोटी 31 लाख रुपये खर्च करण्याला स्थायी समिती सभेत मंजुरी दिलेय. केवळ कंत्राटदाराच्या फायद्यासाठी आणि त्यातून मिळणाऱ्या टक्केवारीसाठीच जनतेच्या पैशाचा चुराडा सत्ताधारी भाजपाकडून केला जात असल्याचा आरोप केला जात असून याविषयी स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी सारवासारव करणारी प्रतिक्रिया व्यक्त केलेय.0
0
Report
Advertisement
महाराष्ट्र में 79 हजार करोड़ के परमाणु ऊर्जा प्रोजेक्ट्स: 4200 मेगावॉट क्षमता का समझौता
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. महाराष्ट्रात तब्बल ७९ हजार कोटींची गुंतवणूक; अणुऊर्जा प्रकल्पांसाठी राज्य शासनाचे दोन मोठे सामंजस्य करार.. या करारांतर्गत दापोलीसह राज्यात एकूण ४२०० मेगावॅट क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प उभारले जाणार असून,यासाठी सुमारे ७९ हजार कोटी रुपयांची एकत्रित गुंतवणूक होणार आहे.. या मेगा प्रकल्पांमुळे राज्यात ११ हजारांहून अधिक थेट व अप्रत्यक्ष रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असून,या प्रसंगी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते..0
0
Report
नवी मुंबई में चार दिन प्रेम विवाह के बाद पत्नी की हत्या; पति गिरफ्तार
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील घणसोली येथे राहणाऱ्या सायली लोखंडे या नवविवाहितेचा पतीने केलेल्या जीवघेण्या मारहाणीत उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. घणसोली येथे राहणाऱ्या सायली चे तिथेच राहणाऱ्या सागर कदम या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. सायली 5 जून रोजी कामाला जाते सांगून निघाली ती थेट सागर बरोबर निघून गेली होती. त्यानंतर दोघांनी लग्न केल्याची माहिती समोर आली आणि अवघ्या चारच दिवसात सायली रुग्णालयात ऍडमिट असल्याचेकुटुंबियांना समजले. कुटुंबियांनी सागर विरोधात मारहाणीची तक्रार दिल्यानंतर रबाळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र मारहाणा इतकी गंभीर होती की 2 महिने मृत्यूशी सुरु असलेला लढा संपला आणि सायलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी रबाळे पोलीसांनी दाखल गुन्ह्यात हत्येचे कलम लावत आरोपी सागर कदम याला अटक केलेय. एकूणच सायलीचा 4 दिवसांचा प्रेमाचा संसार पती सागर कदम ने केलेल्या जीवघेण्या मारहाणी मुळे संपुष्टात आलाय. याप्रकरणी रबाळे पोलिस अधिक तपास करत आहेत.0
0
Report
कल्याण रेलवे स्टेशन के सामने खुलेआम शराब पीने पर सवाल, पुलिस कार्रवाई पर बहस
Kalyan, Maharashtra:कल्याण रेल्वे स्थानकासमोर दिवसाढवळ्या मद्यपान, पोलीस एसीपी कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरती उघड्यावर मद्यपान सुरू, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे मद्यपान होत असताना पोलिस प्रशासनाचे लक्ष कुठे आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या व्यक्तींवर अखेर कारवाई कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात यापूर्वीही नशेखोरांचा उपद्रव आणि गैरप्रकारांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये स्थानक परिसरात नशेसाठी वापरली जाणारी संशयित इंजेक्शने आढळून आल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. स्थानक परिसरात मद्यधुंद व्यक्तींकडून महिलांची छेडछाड तसेच चोरीसारख्या घटना घडल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात एखादी गंभीर घटना घडण्यापूर्वी पोलिसांनी अशा व्यक्तींवर तातडीने आणि सातत्याने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दिवसाढवळ्या स्थानकासमोर मद्यपान होत असेल, तर पोलिसांची गस्त आणि कारवाई नेमकी कुठे आहे? असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.0
0
Report
Advertisement
