icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अमरावती के खोलापुर में वर्षा कमी से फसल नहीं उगी, किसान ने किया आत्महत्या

Amravati, Maharashtra:पेरलेले पीक न उगवल्याने शेतकऱ्याने गळफास घेत केली आत्महत्या; अमरावतीच्या खोलापुरात पावसाअभावी दुबार पेरणीच संकटाने, बोगस बियाण्याचा फटका मिळालेल्या माहितीनुसार हरिभाऊ श्रीराम गाडे (वय ५५, रा. कोळीपुरा, खोलापूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. १५ जुलै रोजी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. यंदा पावसाअभावी पेरलेले पीक उगवले नसल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. त्यातच आर्थिक विवंचना आणि कर्जाच्या वाढत्या ताणामुळे नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच खोलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
0
0
Report

पंढरपुर में बारिश के दौरान सुरक्षा और सफाई के कदम, गोरे ने बताए

Pandharpur, Maharashtra:आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना स्नान साठी 18 जुलैपासून उजनी धरणातून पाणी सोडले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. संतांच्या पालख्या आणि वारकऱ्यांच्या पायगुणामुळे पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे एक दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे. किती मोठी संकटा आले तरी वारकाऱ्यांची आणि विठुरायाची शक्ती मुख्यमंत्र्यांना त्यातून मार्ग काढण्याचा बळ देईल. असे म्हणत वारी मुळे वरुण राजा सुद्धा बरसला असल्याचे सांगितले. काल पावसामुळे पंढरपुरात काही ठिकाणी पाणी साठलं पालखीतळावर काही प्रमाणात चिखल झाला होता त्यामुळे काही व्यवस्था करणे गरजेचे होतं त्यासाठी आपली तब्येत बरी नसताना सुद्धा आपण आलो मात्र विठुराया आपल्यालाही काम करायला ऊर्जा देतो त्यामुळे आजारी असले तरी काही अडचण नाही असे मंत्री गोरे म्हणाले सर्वसामान्य वारकऱ्यांना दर्शन जलद होण्यासाठी व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद केली आहे जर कोणी व्हीआयपी दर्शन देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर सक्त कारवाई केली जाईल असा थेट इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे. पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प होत असताना इथल्या इथल्या माणसाचं समाधान होत नाही तोपर्यंत कॉरिडॉर काम सुरू होणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे त्यामुळे कॉरिडॉर बाधित नागरिकांनी निश्चित राहावे. असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे. वारी काळामध्ये स्वच्छ त्याला फार मोठा महत्त्व ग्राम विकास विभागांना दिलेला आहे ज्या गावातून वारीचा प्रवास पुढे जातो त्या ठिकाणी स्वच्छतेची टीम जाऊन पूर्ण स्वच्छता करते. त्यामुळे तिथे साथीचे आजार पसरणार नाहीत आणि पंढरपूर मध्ये सुद्धा वारे संपल्यानंतर पंढरपूर स्वच्छ राहील तिथे कोणी आजारी पडणार नाही असा विश्वास मंत्री गोरे यांनी दिला. पंढरपूर वाखरी दरम्यान असणारा पुलाचा भाग खचल्याच समोर आलं होतं मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हा पुल खचला नसून त्याला टाकलेला भराव होता तो पावसामुळे वाहून गेला आहे असं स्पष्टीकरण दिलं आहे. पंढरपूर मध्ये सुरू असलेल्या रस्त्याची काम निकृष्ट सुरू असल्याचे तक्रार समोर आल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याचे दखल घेत जर अशी काम सुरू असतील तर त्याचं बिल काढले जाणार नाही त्याला पुन्हा रस्ता करायला लावू असा इशारा दिला आहे
0
0
Report
Advertisement

बाजार जाते समय पिकअप-बोलेरो की टक्कर से तीन वर्षीया बच्ची की दर्दनाक मौत

Bhandara, Maharashtra:वडिलांसोबत बाजारात जाणाऱ्या तीन वर्षांच्या मुलीचा पिकअप-बोलेरोच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू.. बालमाटोला येथील रहिवासी लक्ष्मीचंद सेवाईवार हे आपल्या तीन वर्षांच्या मुलीसोबत गोंदिया तालुक्यातील दासगाव येथील आठवडी बाजारात गेले होते. अचानक, भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात मालवाहू बोलेरोने त्यांना जोरदार धडक दिली आणि ती गाडी रस्त्यावरून पळून गेली. वडील आणि गावकऱ्यांच्या मदतीने मुलीला दासगाव प्राथमिक उपकेंद्रात दाखल करण्यात आले, जिथे मुलीचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी एका अज्ञात बोलेरो चालकाविरुद्ध रावणवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
0
0
Report

कोल्हापुर में अस्मिता काटकर आत्महत्या: सास-सर समेत परिवार गिरफ्तार

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील विवाहित अस्मिता काटकर आत्महत्या प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. शासन घराण्यात लग्न करताना तसाच खर्च केला पाहिजे असं सांगत सासरच्या कडून तब्बल सात लाखाचे दागिने आणि पाच लाखाचा संसार सेट घेत लग्नात बडेजाव करायला लावल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. लग्नासाठी मध्यस्थी केलेल्यांचा जबाब पोलिस तपासात नोंदवण्यात आला आहे. तानुल्या एक महिन्याच्या लेकीला सोडून सासरच्या जाचाला कंटाळून अस्मिता काटकर हिने काही दिवसापूर्वी आत्महत्या केल्याचे समोर आल होत .याप्रकरणी अस्मिताच्या आई यांच्याकडून राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल असून पोलिसांनी अस्मिताच्या पतीसह सासू, सासरे आणि ननंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

बारामती में तुकोबाराय पालखी के साथ मेंढ़ों का रिंगण, इतिहासिक परंपरा

Rui, Maharashtra:यामुळे घातलं जातं तुकोबारायांच्या पालखीला मेंढ्यांचं रिंगण..... सोमनाथ माने यांनी सांगितला इतिहास..... बारामतीच्या काटेवाडीत का घातलं जातं मेंढ्यांचे रिंगण.... या रिंगण सोहळ्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे. काही वर्षांपूर्वी मेंढ्यांना रोग आला होता आणि त्यामुळे त्यांच्या मृत्यू होत होता ज्यावेळी तुकोबारायांचा पालखी सोहळा या मार्गावरून निघाला होता त्यावेळी मेंढपाळ आणि आमच्या मेंढ्या वाचू द्या असं साकडं घातलं आणि मेंढ्यांचा मृत्यू थांबला गेला. आणि तेव्हापासून ही रिंगण घालण्याची परंपरा अद्याप पर्यंत सुरू आहे या संदर्भात मेढपाळ सोमनाठ माने यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी याने
0
0
Report

इंदापूर में पालखी सोहळा प्रवेश, राज की मौजूदगी और कृषिमंत्री दत्तात्रय भरणे का स्वागत

Rui, Maharashtra:संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा इंदापूर तालुक्यात प्रवेश, पालखी सोहळा इंदापूर तालुक्यात प्रवेश करतात वरून राजाची हजेरी, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले इंदापूर तालुक्यात स्वागत, जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा आज बारामतीकरांचा निरोप घेऊन पालखी सोहळ्याने इंदापूर तालुक्यात प्रवेश करताच वरून राजाने जोरदार हजेरी लावली आज दिवसभर उकाडा जाणवत होता उन्हाची तीव्रता मोठी होती मात्र पाऊस पडल्याने हवेमध्ये गारवा निर्माण झाल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे पालखी सोहळा इंदापूर तालुक्यात प्रवेश केल्यानंतर इंदापूर तालुक्याचे आमदार तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले
0
0
Report
Advertisement

मालेगांव के जळकू क्षेत्र में आंधी-बारिश से जलमग्न, फसलों को नुकसान

Nashik, Maharashtra:मालेगावच्या जळकूमध्ये ढग फुटी सदृश्य पाऊस. सर्वत्र पाणीच पाणी, पिकाचे नुकसान. पाऊस बरसल्याने बळीराजा सुखावला. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील जळकू परिसरात दुपारच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने सर्व परिसर जलमय झाला. नाशिकच्या पूर्व भागात कुठेच पाऊस नसताना फक्त जळकू येथे पावसाने धुवांधार बॅटिंग करीत सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले. अचानक झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी शेताची माती वाहून गेली तर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र असे असले तरी जोरदार झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
0
0
Report
Advertisement

सिंधुदुर्ग किले की दीवारों में बड़े भगदाड़, स्थानीय निवासी दुखी

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दोन नंबरच्या बुरुजाला जवळजवळ ३ मीटर रुंदीचे मोठे भगदाड पडले. काही दगड हलल्यामुळे हे भगदाड पडल्याची माहिती किल्ल्यावरील रहिवासी असलेले मंगेश सावंत यांनी दिली आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील किल्ल्यांपैकी सिंधुदुर्ग किल्ला असून किल्याची तटबंदी ढासळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला हा एकमेव ऐतिहासिक किल्ला असूनही त्याची अशी अवस्था बघून दुःख आणि हताशपणा झाल्यासारखं वाटतं असल्याची प्रतिक्रिया किल्ल्यावरील रहिवासी मंगेश सावंत यांनी दिली. पुरातत्व विभाग या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत ढिसाळपणे वागत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
0
0
Report

ओशिवरा में दिनदहाड़े पत्नी की क्रूर हत्या, पति गिरफ्तार

Mumbai, Maharashtra:मुंबईच्या अंधेरी पश्चिमेतील ओशिवरा परिसरात कौटुंबिक वादाचे भीषण रूप पाहायला मिळाले. भररस्त्यात पत्नीच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करून तिची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच घडली. हल्ल्यानंतर आरोपी पती फरार झाला होता. मात्र ओशिवरा पोलिसांनी अवघ्या काही तासांत त्याचा शोध घेत बेड्या ठोकल्या आहेत. पाहूया हा विशेष रिपोर्ट… १४ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आदर्श नगर परिसरातील अस्ट्रר बिल्डिंगसमोर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. माहिती मिळताच ओशिवरा पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस शिपाई आकाश बागल घटनास्थळी दाखल झाले. महिलेच्या गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी या महिलेची ओळख ३५ वर्षीय झुमरी धिरन पवार अशी पटवून दिली. तसेच तिच्यावर तिच्याच पतीने धारदार शस्त्राने हल्ला करून घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने झुमरी यांना निर्भया वाहनातून ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. प्राथमिक तपासात किरकोळ कौटुंबिक वादातून आरोपी धिरन पवार याने घरातील चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर ओशिवरा पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. अखेर बेहरामबाग परिसरातून आरोपी धिरन पवार याला ताब्यात घेण्यात आले आणि १५ जुलै रोजी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी त्याला अटक करण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक सचिन पाटील आणि ओशिवरा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ही जलद कारवाई केली. हत्येमागील नेमके कारण आणि इतर कोणता हेतू होता का, याचा सखोल तपास आता ओशिवरा पोलीस करत आहेत. कौटुंबिक वादातून घडलेली ही निर्घृण हत्या पुन्हा एकदा वाढत्या कौटुंबिक हिंसाचारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. क्षणिक रागाने एका महिलेचा जीव गेला, तर तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top