411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करण्याची मागणी; विखे पाटलांच्या नावावर निशाणा
Dharashiv, Maharashtra:मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा, अध्यक्षपदावरून विखे पाटलांनी नाव घालवलं मनोज जरांगे पाटील यांचा राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार मराठा समाजाच्या पूर्णवेळ कामासाठी स्वतंत्र मंत्रालय गरजेचं मराठा समाजाच्या सुखदुःखाकडे लक्ष देणे उपस समितीचे काम मात्र उपसमितीचे नेमकं काम काय कळत नाही ?, सातारा समितीचा अहवाल घ्यायचा कधी ? मराठवाड्यात मराठा समाजाची एक बैठक लावायला विखे पाटलांकडे वेळ नाही, उपद्रवी विदूषक लोकांसाठी त्यांच्याकडे वेळ मराठा आरक्षण उप समितीच्या कामावरून मनोज जरांगे पाटील नाराज सातारा गॅझेटला आठ महिने उलटून गेले आणखी किती दिवस वाट पाहायची ? मनोज जरांगे पाटलांचा सवाल0
0
Report
नातों विवाद चलते जावई ने सासुरवाड़ी व पड़ोस का घर जलाया; लाखों का नुकसान
Dhule, Maharashtra:धडगाव तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. पत्नीला परत पाठवत नसल्याच्या रागातून एका जावयाने सासूरवाडीच पेटवून दिली आहे. केवळ सासूरवाडीच नाही, तर शेजाऱ्याचे घरही या आगीत जळून खाक झाले असून संतापलेल्या जावयाचे हे टोकाचे पाऊल सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. धडगाव तालुक्यातील कुंडल मोहूपाडा येथे नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. खडक्याचा पाटीळ पाडा येथील मिथुन पाडवी याचे लग्न कुंडल येथील मुलीशी झाले होते, मात्र वादामुळे पत्नी माहेरी राहत होती. पत्नीला परत नेण्यासाठी आलेल्या मिथुनला सासऱ्यांनी नकार दिला, आणि याच रागातून जावई मिथुनने थेट सासुरवाडी गाठून घराला आग लावून दिली. उन्हाळ्याचा तडाखा आणि वाऱ्यामुळे ही आग शेजारी राहणाऱ्या सुभाष वळवी यांच्या घरापर्यंतही पसरली. या भीषण आगीत दोन्ही कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात अन्नधान्य, कपडे आणि घराचे छप्पर जळून खाक झाले असून दोन्ही कुटुंबे आता उघड्यावर आली आहेत. या घटनेनंतर जावई फरार झाला असून त्याचा विरोधात सासूने दिलेल्या फिर्यादीवरून धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.0
0
Report
राज्य सरकार के कर्मचारियों के शिष्टमंडल और मुख्य सचिव के बीच चर्चा जारी
Mumbai, Maharashtra:ब्रेक - राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम - मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या सोबत दीड तास झाली चर्चा - सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शिष्टमंडळासोबत मुख्य सचिवांची चर्चा - संघटनेसोबत केलेल्या चर्चेची माहिती राजेश अग्रवाल मुख्यमंत्र्यांना देणार - मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर निर्णय शिष्टमंडळाला कळवणार - सरकारी कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री व मुख्य सचिवांच्या निर्णयाकडे लक्ष0
0
Report
Advertisement
सातारा में अचानक आंधी-बारिश, गर्मी से परेशान लोग पावस का आनंद लेते हैं
Satara, Maharashtra:सातारा -सातारा शहरासह ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने काही वेळ नागरिकांची तारांबळ उडाली. दिवसभराच्या कडक उन्हाने आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने मोठा दिलासा दिला.अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावर धावपळ उडाली, तर काही ठिकाणी गारांचा मोठा पाऊस झाला. ढगांच्या गडगडात विजेचा कडकडासह अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडवली. मात्र गर्मीने त्रस्त झालेल्या नागरिकांनी या पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. लहान मुलांसह नागरिकांनी पावसामध्ये भिजण्याचा आनंद लुटला आहे. अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून तापमानातही घट झाली आहे0
0
Report
शेगाव के वाटिका चौक में भीषण आग, दो सिलेंडर फटने से सात दुकानें जलीं
Buldhana, Maharashtra:शेगावतील वाटिका चौकात भीषण आग — सिलेंडर स्फोटामुळे सात दुकाने भस्मसात Anchor : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील वाटिका चौक परिसरात सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागून सात दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग अधिक भडकली आणि मोठे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, शेगाव शहरातील वाटिका चौक येथे एका खाजगी जागेमध्ये लहान व्यावसायिकांसाठी दुकाने उभारण्यात आली होती. दुपारी सुमारे चार वाजताच्या दरम्यान अचानक एका दुकानातून आग लागली. सुरुवातीला ही आग लहान प्रमाणात असली तरी काही वेळातच दोन सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे आगीने भीषण रूप धारण केले आणि एका लाईनमधील सात दुकाने पूर्णपणे जळून भस्मसात झाली. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनीही आग विझविण्यास मदत केली. या आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून सुदैवाने जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणा पुढील तपास करत आहे.0
0
Report
रांजणगाव औद्योगिक क्षेत्र में यूनियन बनाम भिड़ंत; पुलिस ने हस्तक्षेप किया
Shirur, Maharashtra:रांजणगाव औद्योगिक क्षेत्र में यूनियन बनते के मुद्दे पर मनसे व भाजप के स्थानीय पदाधिकारियों में तीव्र मतभेद पैदा हुए। इस विवाद ने कुछ समय के लिए तनाव का रूप धारण किया और परिसर में गड़बड़ी की स्थिति बन गई। कंपनी में मजदूरों के लिए स्वतंत्र यूनियन बनाने के प्रयत्नों पर दोनों पक्षों के बीच विवाद बढ़ गया। इस दौरान दोनों पक्षों ने जोरदार घोषणाबाजी की। परिस्थिती हाथ से निकलने के जोखिम को देखते हुए पुलिस ने तुरंत घटनास्थल पर पहुँचकर हस्तक्षेप किया। तनाव बढ़ने से रोकने के लिए पुलिस ने भाजप के कुछ स्थानीय पदाधिकारियों को ताब्यात लिया। इस घटना से औद्योगिक क्षेत्र में कुछ समय के लिए तनाव की स्थिति बनी रही।0
0
Report
Advertisement
समता पतसंस्थे पर हवाला रैकेट के आरोप; खके ने पुरावे देकर चौकशी की मांग
Shirdi, Maharashtra:भोंदू अशोक खरात प्रकरणात चर्चेत आलेली समता पतसंस्था आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.. समता पतसंस्था गेल्या अनेक वर्षापासून हवाला रॅकेट, काळे पैसे पांढरे करण्याचा गोरखधंदा करत असल्याचा आरोप उद्योजक ओमप्रकाश खके यांनी केलाय.. 2003 / 04 सालीच या पतसंस्थेत अनेकांच्या नावे बेनामी ठेवी ठेवल्याची Mाहीती खके यांनी बाहेर काढलीय तर कर्जदारांची जमिन परस्पर विक्री करून अनेकांची फसवणूक सुरू असल्याचं खके यांनी म्हणटलंय..समता पतसंस्थेच्या अध्यक्षांवर वरिष्ठ मंत्री आणि राजकीय नेत्यांचा हात ; उद्योजक ओमप्रकाश खके यांनी झी 24 तासशी बोलतांना समता पतसंस्थेच्या अध्यक्ष आणि संचालक मंडळावर गंभीर आरोप केलेत...त्यांनी समता पतसंस्थेच्या संदर्भातील अवैध व्यवहाराचे पुरावे आज शिर्डी पोलीसांना दिलेय..इडीने आणी पोलीसांनी या पतसंस्थेची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलीय.. याबाबत ओमप्रकाश खके यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...0
0
Report
पुलूस तालुक़े में आंधी-बारिश से फसलों को बड़ा नुकसान, केला-आम-ऊस-झेंडू प्रभावित
Sangli, Maharashtra:पुलुस तालुक्यातील वादळी वाऱ्यासह पावसाने शेतीला मोठा फटका, केळी, आंबा ऊस आणि झेंडू पिकाचे अतोनात नुकसान. भिलवडी व भुवनेश्वरवाडी परिसरात झालेल्या अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. रात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण तालुक्याला झोडपून काढले असून, यात भुवनेश्वरवाडी आणि भिलवडी परिसरातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः केळी आणि आंबा फळपिकांना या वादळाचा मोठा फटका बसला असून याशिवाय झेंडू आणि उसाचे पीकाला फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून प्रशासनाने नुकसानीची तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरयांमधून होत आहे.0
0
Report
नागपुर: नारा नदी पुल के पास शव पॉलीथिन में बंधा मिला, हत्या की आशंका
Nagpur, Maharashtra:नागपूर - जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडालीय.. - नारा नदी पुलाखाली पोत्यात बांधलेला मृतदेह आढळला, नाल्याच्या कोरड्या भागात मृतदेह पोत्यात बांधून फेकल्यान परिसरात खळबळ - सुनिल साहू असे मृत व्यक्तीचे नाव आहे..मृतक गेस्ट हाऊस व्यवसायिक होता. दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाल्याची तक्रार सदर पोलिसांत असल्याचं समोर आले - हत्या करून पोत्यात बांधून आणून टाकल्याने पोलीसांकडून तपास सुरू केला आहे.. - हत्या करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट, विविध अँगलने चौकशी सुरू - जरीपटका पोलिसांची घटनास्थळी पाहणी, पुरावे गोळा करण्याचे काम सुरू - आरोपींचा शोध सुरू..... घटनेचा लवकर उलगडा करण्याच पोलिसांना आव्हान0
0
Report
Advertisement
पुणे IT क्षेत्र में धर्म के नाम पर नया आरोप, माधुरी मिसाळ का आरोप
Pune, Maharashtra:नाशिक के कार्पोरेट जिहाद के प्रकरण ताजे होने के बीच अब पुणे में भी एक अलग आरोप उभर कर सामने आ रहा है। हिंजवाडी की एक IT कंपनी के विश्राम कक्ष का इस्तेमाल नियमबाह्य तौर पर विशिष्ट धर्म की प्रार्थनाओं के लिए किया जा रहा है, इस कथन के साथ राज्यमन्त्री माधुरी मिसाळ ने आरोप लगाया है। वहीं पुणे IT क्षेत्र को धर्म के नाम पर बदनाम न करने की मांग पवार गट ने भी की है। कंपनी के विश्राम कक्ष का उपयोग धार्मिक विधियों के लिए किया जाना बताया गया है और अन्य धर्मीय कर्मचाऱ्यों को अवरोधित किया गया है—यह तक्रार मंत्री माधुरी मिसाळ के पास आई है और इसी के आधार पर उन्होंने पुणे पुलिस आयुक्त को पत्र लिखकर कार्रवाई की मांग की है। तृप्ती देसाई ने भी मिसाळ के तक्रारी को गंभीरता से लेने की बात कही है। meanwhile, पवार गट के प्रवक्ते सुनील माने ने आरोपों की कसौटी परखी है और कहा है कि बिना ठोस प्रमाणों के धार्मिक आरोप लगाकर पुणे के IT क्षेत्र को बदनाम करना उचित नहीं है; हिंजवडी के ट्रैफिक से जुड़ी चिंताओं के कारण कुछ कंपनियां पुणे छोड़ चुकी हैं, ऐसे समय में निराधार आरोप से बाकी कंपनियां भी नुकसान उठा सकती हैं। पुणे और हिंजवडी पुलिस आगे की कार्रवाई की दिशा में जुटी हैं, क्योंकि सरकार और प्रशासन को भी इस मामले पर गंभीरता से विचार करने की आवश्यकता है। चंद्रकांत फुंंदे, Zee Media, पुणे0
0
Report
मालेगांव बॉम्बस्फोट: चार आरोपींना महत्त्वपूर्ण दिलासा, निर्दोष मुक्तता से मामला आगे बढ़ा
Nashik, Maharashtra:मालेगाव 2006 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात महत्त्वाचा निर्णय गेला. 2006 साली झालेल्या स्फोट प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून, सत्र न्यायालयाने यांच्याविरोधात निश्चित केलेले आरोप रद्द केले आहेत. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेला खटला समाप्तीच्या दिशेने असून आरोपींना दिलासा मिळाला आहे. प्रकरणातील तपास आणि पुराव्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. मालेगावच्या पीडित कुटुंबांनी नाराजी व्यक्त केली. आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी यावर चर्चा केली. या बॉम्ब ब्लास्टमध्ये माझे मूल गेले. तो ब्लास्ट भगवा आतंकवादी, हिरवा आतंकवादी यांनी केला नसून सरकारने तिसरा कलर शोधून आणून त्यांना आरोपी बनवावं असा विचार करायला लागला. मग तो ब्लास्ट झाला कोण? मुलं कशी मारली गेली यावर आमच्या संशय आहेत. तपास यंत्रणा पोपटासारखी पिंजऱ्यात बंद आहे, अशी टीका पीडित कुटुंबांनी केली. या बॉम्ब ब्लास्टमध्ये 9 मुस्लिम संशयितांना निर्दोष मुक्तता झाली, तर आज चार जणांची निर्दोष मुक्तता झाली. मग या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली जाईल कोण? प्रकरणातील तपास यंत्रणांची भूमिका आत्ता काहीच स्पष्ट नाही. मालेगावकर विचारत आहेत. विशाल मोरे यांनी ही बातमी मालेगाव झी मिडिया येथे दिली.0
0
Report
ठाणे महापालिकेचे ऑनलाइन प्रक्षेपण: गटनेत्यांची लवकर बैठक
Thane, Maharashtra:ठाणे महापालिकेच्या महासभांच्या ऑनलाईन प्रक्षेपणाबाबत लवकरच गटनेत्यांची बैठक भाजप नगरसेविका नम्रता कोळी यांच्या मागणीवर महापौरांचा निर्णय ठाणे महापालिकेतील महासभांच्या ऑनलाईन प्रक्षेपणाबाबत उपमहापौर व सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत लवकरच निर्णय घेण्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी जाहीर केले. भाजपाचे गटनेते मुकेश मोकाशी यांनी पुढील महासभेपासून थेट प्रक्षेपण करण्याची आग्रही मागणी केली. या विषयावर भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी यांनी पहिल्या महासभेपासून पाठपुरावा सुरू केला आहे. महापालिकेच्या आजच्या महासभेचे कामकाज सुरू झाल्यावर भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी यांनी महासभेच्या ऑनलाईन कामकाजाच्या कार्यवाहीबाबत विचारणा केली. त्याला मृणाल पेंडसे यांनीही पाठिंबा दिला. त्यावेळी महापौर पिंपळोलकर यांनी अद्यापी कार्यवाही झाली नसल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी महापालिका प्रशासनाकडून महासभा सर्वांसाठी खुली असली, तरी गोपनीयता राखण्याची तरतूद असल्याचे नमूद केले. त्याला भाजपाचे गटनेते मुकेश मोकाशी, भरत चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही आक्षेप घेतला. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपण ऑनलाईन सभेची मागणी अनेक वर्षांपासून असल्याचे नमूद केले. मुंबईसह राज्यातील इतर महापालिकाांमध्ये सर्वसाधारण सभेचे ऑनलाईन कामकाज सुरू असताना, ठाण्यामध्ये अडचणी का येत आहेत, असा सवाल केला. शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांनी महापौरांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौर व सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेण्याची सूचना केली. अखेर या विषयावर लवकरच गटनेत्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे निर्देशन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिले.0
0
Report
Advertisement
अकोला शिवसेना में बड़े पैमाने पर राजीनामे, आंतरिक मतभेद उजागर
Akola, Maharashtra:अकोल्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षश्रेष्ठींच्या कथित हुकूमशाही कारभाराला कंटाळून अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. अकोला शहरातील विविध विभाग, प्रभाग आणि शाखा स्तरावरील सुमारे 100 कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा राजीनामा सादर केला आहे. पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप करत, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी उफाळून आल्याचे सांगितले जात आहे. काही पदाधिकाऱ्यांनी स्थानिक नेतृत्वावरही गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, या सामूहिक राजीनाम्यामुळे अकोल्यातील उबाठा शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पक्षांतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. यावेळी पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे एकमात्र असलेले आमदार नितीन देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत..0
0
Report
लोणावळा में ऑनलाइन विला बुकिंग स्कैम से पर्यटकों में हड़कंप
Varsoli, Maharashtra:पर्यटन नगरीとして देशभर प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात सध्या पर्यटकांची फसवणूक करणारा ऑनलाईन व्हिला बुकिंग स्कॅम उघडकीस आला आहे. थंड हवेच्या ठिकाणाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. मात्र आता याच पर्यटकांना लक्ष्य करत सोशल मीडियावर आकर्षक व्हिला आणि बंगल्यांचे फोटो टाकून ऑनलाइन भामटे सक्रिय झाले आहेत. बुकिंगच्या नावाखाळे २० ते २५ हजार रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम घेतली जाते… इतकंच नाही तर विश्वास बसावा म्हणून संबंधित ठिकाणाचे लाईव्ह लोकेशनही पाठवले जाते. मात्र प्रत्यक्षात पर्यटक लोणावळ्यात पोहोचल्यावर त्या ठिकाणी कोणताही व्हिला किंवा बंगला अस्तित्वात नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय. या वाढत्या फसवणुकीमुळे पर्यटक आर्थिक फटका सहन करत आहेत. तर दुसरीकडे स्थानिक व्यावसायिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.या स्कॅममुळे लोणावळ्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर स्थानिक व्यावसायिकांच्या मते, हे स्कॅम लोणावळ्यातील नसून बाहेरील भामट्यांकडून रचले जात आहेत. त्यामुळे पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंग करताना अधिकृत वेबसाईट्सचाच वापर करावा आणि सतर्क राहावे, असं आवाहन करण्यात येत आहे. “ऑनलाईन बुकिंग करताना खात्री करूनच व्यवहार करा, अधिकृत माध्यमांचा वापर करा.” सह्याद्रीच्या पर्वत रांगेत हिरवाईने नटलेल्या लोणावळ्यात पर्यटनाचा आनंद घ्यायला येणाऱ्या पर्यटकांसाठी हा मोठा इशारा आहे. पर्यटन नगरीत फिरायला येण्यापूर्वी ऑनलाइन बुकिंगच्या फंद्यात न पडता फसवणुकीपासून सावध रहा आणि थेट लोणावळ्यात आल्यावरच व्हीला, रिसॉर्ट, बुकिंग करण्याचं आवाहन पर्यटकांना करण्यात येत आहे.0
0
Report
नाशिक के पंचवटी में सिगरेट मांगने पर आरोपी ने चॉपर से हमला कर राहुल राऊत की मौत
Nashik, Maharashtra:सिगारेट देण्यास नकार दिल्याच्या रागातून संशयित आरोपीने चॉपरने हल्ला करत तरुणाचा जीव गमवावा लागल्याची घटना नाशिकच्या पंचवटी परिसरात घडलीये... राहुल कृष्णा राऊत असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय... राहुल राऊत हा टिल्लू पवार व सुनील गुंजाळ या मित्रांसोबत शनिवारी 18 तारखेला रात्री साडेनऊच्या सुमारास नवनाथ नगर परिसरातील साईबाबा मंदिराजवळ बसला होता. यावेळी रोहिदास वामनराव आहेर हा तेथे आला व त्याने राहुलकडे सिगारेटची मागणी केली. मात्र राहुलने नकार दिल्याने संतापलेल्या आहेरने आपल्या जवळील चॉपरच्या उलट्या बाजूने राहुलच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला. मात्र राहुल याचा सोमवारी पहाटे दोनच्या sसमयी त्याचा मृत्यू झाला. मयताचे वडील कृष्णा हरी राऊत यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे... यात संशयित आरोपी रोहिदास आहेर सराईत गुन्हेगार असून कुणाच्या प्रयत्नात त्याला वर्षभरापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती... यावर तो जामीनावर काही दिवसांपूर्वीच सुटलेला होता... केल्यानंतर रोहिदास फरार असून हा संशयताला शोधण्यासाठी पोलिसांनी दोन पथक रवाना केली आहे.... बाईट- सुनील पवार, पोलीस निरीक्षक0
0
Report
Advertisement
