411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मतदार संघ फंड आवंटन के बावजूद खर्च नहीं; कांग्रेस ने शिंदे के सांसदों पर निशाना
Hingoli, Maharashtra:मतदार संघात विकास करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही असे म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा फुटीर खासदार शिंदे सैन्य दाखल झाले आहेत मात्र या खासदारांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध झाला होता मात्र त्यांनी मतदारसंघात निधीच खर्च केला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे आता खासदारांच्या या भूमिकेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील टीका केली आहे0
0
Report
सांसद संजय देशमुख: विकास के लिए सत्ता के साथ गया, साथ नहीं छोड़ा
Yavatmal, Maharashtra:विकासासाठी मी सत्तेसोबत गेलो, जाणारा मी एकटा नाही, सहा खासदार गेलो... अशी प्रतिक्रिया यवतमाळ वाशीम चे खासदार संजय देशमुख यांनी दिली आहे. ठाकरेंची साथ सोडली असली तरी त्यांच्या विरोधात मी बोलणार नाही, मतदारसंघात जनतेची कामे होत नव्हती, विकासाचे अनेक प्रकल्प थांबले होते, शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी शिवसेनेत गेलो असे खासदार संजय देशमुख यांनी सांगितले त्यांचेशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी.0
0
Report
वरुणराज तळकोकण में जोरदार आगमन, बारिश ने किसानों में उम्मीद जगी
Oras Bk., Maharashtra:मागील काही दिवस दडी मारलेल्या वरुणराजाने तळकोकणात दमदार हजेरी लावलीय. काल सायंकाळ पासून तळकोकणात पाऊस सक्रिय झालाय. सिंधुदुर्गात आज पावसाचा यल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय. वरुणराजाच्या दमदार आगमनाने मागील काही दिवसांपासून चिंतेत बळीराजा सुखावलाय. पेरणीची काम आटोपून लावणीच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजा पुन्हा एकदा शेतात वावरताना दिसतोय.0
0
Report
Advertisement
देवाभाऊंके दैवी शक्ति, विधायक बनने वालों के लिए साफ संकेत
Sangli, Maharashtra:ज्यांना आमदार व्हायची इच्छा,त्यांनी काळजी करू नये - देवाभाऊंकडे दैवी शक्ती आहे - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे. अँकर - देवाभाऊंकडे दैवी शक्ती आहे,ती शक्ती सगळ्यांच समाधान करणारी आहे, त्यामुळे ज्यांना आमदार व्हायचे,त्यांनी काळजी करू नये,असे विधान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी मला,धैर्यशील कदम, अतूलबाबा, मनोजदादा,अश्या चौघांना विधानसभेत जाणार असल्याचे सांगितले होते.त्यानंतर आता मी चौघेही आमदार झालोत, प्रामाणिकपणे काम केल्यावर देवा भाऊ पाठीशी ठाम उभे राहतात आणि ज्यांना आता आमदार व्हायचं इच्छा आहे,त्यांनी काळजी करू नये,कारण देवाभाऊंकडे दैवी शक्ती आहे,जी सगळ्यांचा समाधान करणारी आहे, संविधान मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीतील धैर्यशील कदम यांच्या विजयानंतर सांगलीत आयोजित सत्कार समारंभ दरम्यान ते बोलत होते.0
0
Report
भास्कर जाधव के स्टेटस ने राजनीतिक गलियारों में उथल-पुथल मचा दी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चापलूसांच्या जमातीत...भास्कर जाधवांच्या 'त्या' स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण! अँकर नेहमीच आपल्या धडाकेबाज आणि रोखठोक विधानांसाठी प्रसिद्ध असलेले नेते भास्कर जाधव सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत.. भास्कर जाधव यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर एक सूचक पोस्ट शेअर केली आहे, ज्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.. स्टेटसमध्ये दिसणाऱ्या या स्टेटसमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, चापलूसांच्या जमातीत सरळ उभ्या राहिलेल्या माणसावरही ताठरपणाचा (अकडणे) आळ घेतला जातो... जाधवांनी हिंदीतील या ओळींच्या माध्यमातून नेमकं कोणावर निशाणा साधला आहे? हा टोला विरोधकांना आहे की पक्षांतर्गत परिस्थितीवर? याबाबत आता राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे.. यावर आता पुढे काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..0
0
Report
मुंबई-गोवा महामार्ग के उक्षी फाटे के पास पानी-कीचड़ से यातायात बाधित, चालक जोखिम में
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..Exclusive मुंबई-गोवा महामार्गाचा बोजवारा! उAxी फाट्यावर ढोपरभर पाणी; वाहनचालकांचा जीव धोक्यात.. अँकर कोट्यवधींचा खर्च... १८ वर्षांची प्रतीक्षा...आणि पदरी मात्र पुन्हा तोच रखडलेला कारभार! मुंबई-गोवा महामार्गावरील 'उAxी फाट्या'जवळ प्रशासनाच्या नियोजनशून्य कामाचे विदारक चित्र समोर आले आहे.. पावसाच्या पहिल्याच सरींमध्ये या ठिकाणी चिखल आणि ढोपरभर पाणी साचले असून, वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.. नुकत्याच झालेल्या काँक्रीटीकरणाची ठिकठिकाणी दुरवस्था झाली असून,पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही गटार व्यवस्था नसल्याने कामाच्या निकृष्ट दर्जावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.. एकीकडे महामार्ग पूर्ण झाल्याचे दावे केले जात असताना,दुसरीकडे दुचाकीस्वारांवर होणारा चिखलाचा अभिषेक आणि अपघातांची वाढती भीती यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.. प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एखादा मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल आता जनता विचारत आहे..0
0
Report
Advertisement
अकोला में संत गजानन महाराज की पालखी का भव्य स्वागत, पंढरपुर के लिए प्रस्थान
Akola, Maharashtra:संत श्री गजानन महाराजांची पालखी आज अकोल्यात दाखल झाली आहे. संत गजानन महाराज संस्थानच्या श्रींच्या पालखीचे यंदा ५७ वे वर्ष असून, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वारीसाठी २१ जून रोजी सकाळी ७ वाजता शेगाव येथून पालखी प्रस्थान करून अकोला जिल्ह्यात दाखल झाली आहे. रात्रीचा मुक्काम भौरद येथे घेतल्या नंतर आज पालखी अकोला शहरात दाखल होऊन दोन दिवस मुक्कामानंतर पंढरपूरला प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यात ७०० हून अधिक वारकरी, रथ, मेणा, अश्व, पताका वाहणारे भक्त सहभागी होणार आहेत. ३३ दिवसांचा सुमारे ७२५ किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण केला जाणार आहे. पालखी २३ जुलैला पंढरपूर येथे पोहचणार आहे. अकोल्यात भक्तिमय वातावरणात उत्तीर्ण श्रींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. गण गण गणात बोते जय घोषाने आज अख्खा अकोला शहर दुमदमून गेलं है.0
0
Report
लोहगड से प्रेमी ने केतन को दरी में ढकेला, पत्नी पर जाँच चल रही
Varsoli, Maharashtra:मावळातील लोहगडावरून घटनेनं आता वळण घेतलंय. फोटोची पोज देताना केतन अगरवाल घसरुन दरीत पडला नसून त्याला ढकलून दिल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आलीये. होणाऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराला याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. गुरुवारी होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने केतन आणि होणारी पत्नी लोहगडावर ट्रेकिंगला गेले होते. त्यावेळी फोटोची पोज देताना तो घसरुन पडला, असं समोर आलं होतं. मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात हा बनाव असल्याचं उघड झालंय. होणाऱ्या पत्नीच्या प्रियकराने केतनला दरीत ढकलून दिल्याचं समोर आलंय. या घटनेत होणाऱ्या पत्नीचा समावेश आहे का? यासंबंधीची चौकशी सुरुये. सोबतचं प्रियकराला कोणी-कोणी साथ दिली ka? याची चौकशी सुरुये.0
0
Report
नाशिक विधान परिषद चुनाव में गोकुळ गीते की जीत से महायुती को बड़ा झटका
Yeola, Maharashtra:नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांचा पराभव करून महायुतीला धक्का दिला दरम्यान गोकुळ गीते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन शिवसेनेत सहयोगी सदस्य म्हणून प्रवेश केला यावर नरेंद्र दराडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोनवर गोकुळ गीते यांच्या प्रवेशाबद्दल माहिती दिली होती तसेच यापुढेही नेहमी पाठीशी राहू असे आश्वासन देखील दिले असे दराडे यांनी सांगितले याबाबत नरेंद्र दराडे यांच्या सोबत बातचीत केले आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
Advertisement
Shinde faction attacked by Sanjay Patil: Traitors of Matoshree under fire
Mumbai, Maharashtra:संजय राऊत ऑन खासदार शिंदे सेनेत सामील काय भूमिका असणार काल त्याचं पक्षाचा नाशिक येथे पराभव झाला. नाशिक येथे विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला. भाजपाची सर्व मतं दुसऱ्याला पडली . आणि पुढच्या दोन तासात गोकुळ गीते ना विकत घेऊन पक्षात आणलं. राजकारण सध्या महाराष्ट्रात चालू आहे. आता जसे झाकलेले पुतळे उघडतात. तसेच झाकलेले गद्दारांची पुतळे उघड झाले. ते म्हणाले आम्ही त्यांचा मान सन्मान ठेव. आमच्या पक्षात मानसन्मान नव्हता मग काय होत.. काय तर काय निधीसाठी गेलो. आकडेवारी आली आहे जो निधी आहे तो देखील ते वापरू शकले नाही . ते आकडे समोर आले आहे. तो निधी का वापरला गेला नाही. आता तुम्ही बोलत आहे . निधी साठी पाच पंचवीस लाख खर्च केले. त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी.. काल काल एका शिंदे गटाच्या नेत्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल एक वक्तव्य केलं. आणि हे बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत का.. बाळासाहेब ठाकरे यांनी वृद्धाश्रम देखील काढले आणि पाळणाघर देखील काढली.. याच मातोश्रीच्या पाळणाघरातून या लोकांचं पालन पोषण झाले. ही कामे मानवतेची आहे. ही गद्दारांचा तुम्ही सन्मान राखा. मतदारसंघातील जनता माफ नाही करणे. उद्धव ठाकरे दौऱ्यावर आहे. कार्यकर्त्यांना भेटतील. नांदेड येथे गद्दाराना आमच्या लोकांनी विरोध केला.. ती तरी पोलिसवाले जिथे होते.. किती खोटे बोलत आहे सगळे जण. ठीक आहे ना २०२९ पर्यंतची गॅरंटी कोण देणार.. शिंदे तरी राहतील का. पुलाखालून बरच पाणी वाहून जाईल.. आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले आहे. ऑन संजय दिना पाटील मग राजीनामा द्या. तुम्ही सांगितलं पाहिजे तर तुमचं कोणासोबत भांडण नाही मातोश्रीवर सांगायला पाहिजे होतं. तेरा तारखेला खोके आले , मग परत चौदा तारखेला खोके आले. बाकीचे नंतर पस्तीस खोके आले. गेल्या काही काळात व्यवहार केले ते ed chya रडार वर आले. आमच्याकडे अनेक गोष्टी आहे. योग्यवेळी आम्ही सांगू. त्या मुलीसाठी उमेदवारीसाठी किती तमाशा केला ते खोटे बोलत आहे. ते minde गटामध्ये गेल्यावरती खोटं बोलण्याची गोळी दिली जाते.. मुलीला उमेदवारी दिली नाही तर मी राजीनामा देईन इथपर्यंत मजल गेली होती हे सगळे छापून आले आहे. गद्दाराना नशा आले आहे. कोणत्याही प्रकारे दहाव्या शेड्युलमध्ये पक्ष फुटीला मान्यता नाही. मी लागतो त्याच्या नादाला.. त्या बंदुका आम्हाला दाखवू नको संजय पाटील. मी नाव घेऊन बोलत आहे. भोसडीच्या.. बंदूक शिवसैनिकांना नको दाखवू.. मी इथेच आहे भांडूप येथे . शिवसैनिकांना बंदूक दाखवतो. ती बंदूक तुझ्या ढुंगणात घालेन.. तू सिक्युरिटी काढून ये. अरे सोड एकनाथ शिंदे0
0
Report
परभणी में सांसद संजय जाधव के समर्थकों ने शानदार स्वागत किया, शिवसेना छोड़ने पर विचार
Parbhani, Maharashtra:परभणीचे खासदार संजय जाधव आपल्या मतदारसंघांमध्ये आले आहेत परभणी शहरामध्ये मोठे शक्ती प्रदर्शन करत खासदार संजय जाधव यांचं स्वागत करण्यात आला आहे मी पैशासाठी गेलो नाही .. का ठाकरे शिवसेना सोडली याचा विचार त्यांनी करायला पाहिजे तुम्ही भूमिका बदलल्या त्यामुळे हे पानिपत बघायची वेळ आली आहे 2022 पासून 26 पर्यंत तुमच्या सोबत लढत राहिलो परंतु ज्या पद्धतीने लढाई लढला पाहिजे त्या पद्धतीने लढाई लढताना दिसले नाहीत कार्यकर्त्यांना संघटित करणाची भूमिका घ्यायला पाहिजे होती.. साहेबांची प्रकृती साथ देत नव्हती तर आदित्य ठाकरे यांनी राज्यभर फिरायला पाहिजे होतं रस्त्यावर उतरून लढाई करायला पाहिजे होती विरोधी पक्ष म्हणून फिरायला पाहिजे होतं मात्र हे न केल्यामुळे कार्यकर्ते दुरावले गेले स्थानिक गटबाजीमुळे मी नाराज होतो त्यामुळे मला ठाकरे शिवसेना सोडावी लागल्याची माहिती परभणीचे खासदार संजय जाधव यांनी दिली आहे.0
0
Report
मानसून आने से किसान मारूति दराडे ने किया नाच, वीडियो वायरल
Sinnar, Maharashtra:सिन्नर ब्रेक अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मान्सूनच्या पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला असून नळवाडी तालुका सिन्नर येथील शेतकरी मारुती कोंडाजी दराडे यांनी नाचून आपला आनंद साजरा केला आहे सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे0
0
Report
Advertisement
गोशाळा संचालक भगवान कोकरे ने लोटे एमआईडीसी में पानी मुफ्त देकर लोगों को राहत दी
Ratnagiri, Maharashtra:खेड-रत्नागिरी.. लोटे एमआयडीसी परिसरासाठी 'गोशाळा' ठरली संकटमोचक.. भगवान कोकरे यांच्याकडून मोफत पाणीपुरवठा!.. अँकर रत्नागिरीतून एक अत्यंत दिलासादायक आणि माणुसकीचं दर्शन घडवणारी बातमी समोर येत आहे..पावसाने ओढ दिल्यामुळे वाशिष्टी नदीचं पात्र कोरडं पडलं असून, लोटे एमआयडीसी परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.. मान्सून दाखल झाला असला तरी नद्या अद्याप भरलेल्या नाहीत.. अशा या भीषण संकटात लोटे एमआयडीसीतील गोशाळेचे संस्थापक भगवान कोकरे हे परिसरासाठी 'भगीरथ' ठरले आहेत..त्यांनी आपल्या गोशाळेतील विहिरीतून स्थानिक नागरिकांची तहान भागवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.. कोकरे यांच्याकडून दररोज तब्बल १० ते १२ पाण्याचे टँकर मोफत भरून दिले जात असून,या संकटकाळात ते परिसरातील नागरिकांची मोलाची सेवा करत आहेत.. त्यांच्या या कौतुकास्पद कार्यामुळे लोटेवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे..0
0
Report
अकोला के तेल्हारा में प्रतिबंधित गुटखा भारी जप्त, 11 लाख रुपए का माल पकड़ा गया
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे अन्न व औषध प्रशासन आणि तेल्हारा पोलीसांनी संयुक्तरित्या केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ६ लाख १९ हजार रुपयांचा गुटखा तसेच ५ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप असा एकूण ११ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार राज्यभरात अन्न व औषध प्रशासन विभाग तर्फे छापेमारी सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातून मिळालेल्या माहितीनुसार, तेल्हारा शहरातील एका पेट्रोल पंप परिसरात संशयित बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाल्यानंतर ही संयुक्त कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये पान बहारचे ८० पॅकेट, विमलचे १ हजार ८७० पाऊच, विमल किंग पॅकचे ५०६ पॅकेट, विमल बिग पॅकचे ७० पॅकेट, विमल बिग पॅक होलीचे ९० पॅकेट, राजनिवास प्रीमियमचे २४ पॅकेट तसेच १ हजार ७०० तंबाखू पॅकेट यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत ६ लाख १९ हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी बुलढाणा येथील एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून आणखी एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे तरी पुढील तपास अन्न व औषध प्रशासन आणि तेल्हारा पोलीस करीत आहेत.0
0
Report
रत्नागिरी में भारी बारिश, किसानों को मिली राहत
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात पावासाची जोरदार हजेरी.. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.. गेले २४ तास सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उष्मा आणि उखाणे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी वर्गातही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उकाड्याची तीव्रता वाढली होती पावसाची प्रतीक्षा लागून राहिलेल्या नागरिकांना अखेर सोमवारी सकाळपासून पावसाने दिलासा दिला.. सुरुवातीला हलक्या सरींनी हजेरी लावली असली तरी पावसाचा जोर नंतर वाढला.. त्यानंतर दिवसभर पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने शहर आणि ग्रामीण भागात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळाले.. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागात रस्त्यावर पाणी साचले.. दरम्यान शेतीच्या कामांसाठी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकरी वर्गाला या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.. भात लागवडी पूर्व मशागतीच्या कामांना गती मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उन्हाच्या तडाख्यातून मोठा दिलासा मिळाला आहे..0
0
Report
Advertisement
