411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
जालना में भंडारे के बयान से नया विवाद, सर्वधर्म समभाव पर उथल-पुथल
Jalna, Maharashtra:जालना : सर्वधर्म समभाव हे जगातील सर्वात मोठे खोटे वाक्य ह.भ.प संग्राम बापू भंडारे यांच्या वादग्रस्त वक्तव्य परतूरमध्ये किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कुलच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी हिंदूंचा मोर्चा अँकर - सर्वधर्मसमभाव हे जगातील सर्वात मोठे खोटे वाक्य आहे, असे वादग्रस्त वक्तव्य ह.भ.प संग्राम बापू भंडारे यांनी केलंय. जालन्यातील परतूर येथील किड्स वर्ल्ड इंग्लिश शाळेच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.. यावेळी मोर्चात भंडारे यांनी हे वक्तव्य केलंय.. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साउंड बाईट - ह.भ.प. संग्राम बापू भंडारे0
0
Report
वर्धा में जोरदार बारिश, किसानों को मिली राहत
Wardha, Maharashtra:वर्ध्यात पावसाची दमदार हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा वर्धा : गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या वर्धा जिल्ह्यात अखेर पावसाने दमदार हजेरी लावली. बुधवारी दुपारनंतर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.सकाळपासूनच आकाशात ढगांची दाटी होती. हवामान विभागाने दिलेला पावसाचा अंदाजही यावेळी खरा ठरला. अनेक भागांत सततधार पाऊस पडल्याने रस्त्यांवर पाणी साचले होते. दुसरीकडे, खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांनी दिवसभर लागवडीची लगबग सुरू ठेवली. यंदा पावसाच्या उशिरामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र, लागवडीनंतर झालेल्या या पावसामुळे पिकांना आवश्यक ओलावा मिळणार असून शेतीच्या कामांना गती मिळणार आहे.0
0
Report
केतन अग्रवाल हत्या मामले में नए खुलासे, पुलिस के दावे की पड़ताल जारी
Varsoli, Maharashtra:लोहगडावरून खाली ढकलून केतन अग्रवालची हत्या करण्यात आल्याचा आरोप होत असताना या प्रकरणात दररोज नवे दावे आणि चर्चांना उधाण येत आहे. केतनचा मृत्यू झाल्यानंतर सिया गोयलने पार्टी केल्याची चर्चा, गहाळ झालेला पासपोर्ट, सिया आणि चेतन यांच्यातील कथित फोन कॉल्स, तसेच "How to Murder" असा गुगल सर्च केल्याच्या चर्चांमुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या सर्व बाबींवर पोलिसांनी काय भूमिका घेतली आहे, पाहूया हा रिपोर्ट... केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये अनेक दावे केले जात आहेत. त्यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेला दावा म्हणजे, केतनला लोहगडावरून खाली ढकलल्यानंतर सिया गोयलने पार्टी केली होती. मात्र, या दाव्याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. उलट अशा चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, याची तपासणी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केतनचा पासपोर्ट गहाळ झाल्याची बाब. तपासादरम्यान पासपोर्ट नेमका कसा आणि कुठे गायब झाला, याबाबतही विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र, या संदर्भातही पोलिसांनी सध्या तपास सुरू असल्याचे सांगितले असून कोणताही निष्कर्ष काढण्यास नकार दिला आहे. तपासादरम्यान सिया गोयल आणि चेतन यांच्यातील कथित फोन कॉल्सची माहितीही समोर आली आहे. या कॉल्सचे स्वरूप काय होते, त्यामध्ये नेमका कोणता संवाद झाला होता आणि त्याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. याशिवाय, दोन्ही कुटुंबांमध्ये याआधी कोणतेही वाद, मतभेद किंवा वितुष्ट नव्हते. कारण अनेक वर्षांपासून दोन्ही कुटुंबांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सिया गोयलने गुगलवर "How to Murder" असा सर्च केल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, या बाबत पोलिसांनी प्रतिक्रिया देताना तपासाशी संबंधित सर्व डिजिटल पुराव्यांची पडताळणी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणतीही सूचना अधिकृतरीत्या समोर येईपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. सध्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाचा तपास विविध अंगांनी सुरू आहे. सोशल मीडियावरील चर्चांपासून ते डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर तांत्रिक बाबींची छाननी करण्यात येत आहे. मात्र, या सर्व दाव्यांमागचे सत्य तपास पूर्ण झाल्यानंतर आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.0
0
Report
Advertisement
तीन दशकों की दोस्ती पर शादी की राह में विपत्ति: केतन अग्रवाल की मौत
Varsoli, Maharashtra:Headline : तीन दशकांची मैत्री, ठरलेलं लग्न आणि केतनचा धक्कादायक अंत Anchor: अग्रवाल आणि गोयल कुटुंबाची तीन दशकांची मैत्री... दोन कुटुंबांमधील जिव्हाळ्याचे संबंध... आणि त्याच विश्वासातून ठरलेला शुभविवाह. गोयल आणि अग्रवाल कुटुंबीयांमध्ये जवळपास ३० वर्षांपासून सलोख्याचे संबंध असल्याने या नात्यात कोणताही संशय किंवा दुरावा कधीच निर्माण झाला नव्हता. याच विश्वासाच्या पायावर केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा विवाह ठरला होता. मात्र, नियतीने वेगळेच काही लिहून ठेवले होते. Vo: कौटुंबिक ओळख आणि परस्पर विश्वास यामुळे नातं जुळवताना कोणतीही सखोल पडताळणी करण्यात आली नाही, अशी चर्चा आता या प्रकरणानंतर सुरू झाली आहे. एका आनंदी विवाहसोहळ्याची तयारी सुरू असताना अग्रवाल कुटुंुबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ज्या मुलाच्या लग्नाची तयारी सुरू होती त्याच तरुणाचा मृतदेह कुटुंबीयांना पाहावा लागला. बाईट : विशाल अग्रवाल, मृत केतनचे वडील (file no.01) Vo 2: आज या घटनेमुळे केवळ एका कुटुंबाने आपला तरुण मुलगा गमावलेला नाही, तर विश्वास, नाती आणि नातेसंबंधांबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून सत्य नेमके काय आहे, याचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.0
0
Report
धाराशिव महायुती में ओमराजे निंबाळकर के शिवसेना प्रवेश से तकरार तेज
Dharashiv, Maharashtra:ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव जिल्ह्यात महायुतीत धुसफूस चालू आहे. पाटील-निंबाळकर संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. अँकर: विकासाच्या मुद्द्यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी धाराशिव जिल्ह्यात त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. राज्यात महायुतीची ताकद वाढल्याचं चित्र असलं, तरी धाराशिवमध्ये महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत. पाटील कुटुंबाविरोधातील संघर्ष आता नव्या टप्प्यात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. अनेक दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे राज्यातील महायुती अधिक मजबूत झाल्याचं चित्र असलं, तरी धाराशिवमध्ये मात्र वेगळंच समीकरण तयार झालं आहे. पक्षप्रवेशानंतरही पाटील कुटुंबाविरोधातील संघर्ष कायम राहणार असल्याचं ओमराजेंनी स्पष्ट केलं. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव उघडपणे समोर आला आहे. ओमराजेंच्या या भूमिकेनंतर भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या कुटुंबाकडून सावध प्रतिक्रिया देण्यात आली. महायुती मजबूत होत असेल तर त्यासाठी सहकार्य करू, मात्र स्थानिक राजकारणात आपली भूमिका कायम राहील, अशी प्रतिक्रिया मल्हार पाटील यांनी दिली. दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांनी पाटील कुटुंबावर केलेल्या टीकेनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. योग्य वेळी जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. भाजपच्या या प्रतिक्रियेनंतर शिवसेनेतही संताप व्यक्त केला जात आहे. ओमराजे निंबाळकर यांच्यावर कोणीही अन्यायकारक टीका केली, तर त्याला शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर दिलं जाईल, असे इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. राज्यात महायुती अधिक मजबूत झाल्याचा दावा केला जा rata, धाराशिवमध्ये स्थानिक राजकारणातील जुना पाटील-निंबाळकर संघर्ष नव्या वळणावर पोहोचला आहे. हा संघर्ष केवळ शाब्दिक पातळीवर राहतो की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्याचे राजकीय परिणाम दिसून येतात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.0
0
Report
चंद्रपुर में कैंसरजनक थाई मांगुर मछली का 600 किलो का जखीरा पुलिस ने जप्त किया
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात कर्करोगाला कारणीभूत असलेला थाई मांगुर माशाचा 600 किलोचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. केंद्र शासनाने थाई मांगुर हा मासा देशात संवर्धन, विक्री आणि खाद्य म्हणून प्रतिबंधित केला आहे. गुप्त माहितीनुसार रामनगर पोलिस ठाणे पथकाने माशांच्या साठ्याच्या जप्तीसाठी स्थानिक बंगाली कॅम्प मासळी बाजारात कारवाई केली. तेव्हा त्यांना हा प्रकार नजरेस पडला. आंध्रप्रदेशच्या इलुरु जिल्ह्यातील व्येंकटेश्वरराव ग्रुिपथीराव घंटासाला नामक मासे विक्रेत्याला पोलिसांनी बोलेरो वाहनासह ताब्यात घेतले. माशांची किंमत सुमारे 60 हजार आहे. नंतर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मासे खोल जमिनीत पुरून नष्ट करण्यात आले. या कारवाईसाठी जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी विशेष मदत केली.0
0
Report
Advertisement
कल्याण में नाबालिग के साथ फिर दुष्कर्म, पुलिस ने आरोपी को गिरफ्तार किया
Kalyan, Maharashtra:कल्याण शहरात पुन्हा एकदा अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार, पोलिसांनी आरोपीला केली अटक. सात वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याचे माहिती मिळाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर शिवसेना, भाजप ठाकरे गट, मनसे, राष्ट्रीय सेवक संघाचे कार्यकर्ते पोलीस स्थानकात दाखल झाले होते. या आधी कल्याणमध्ये अल्पवयीन मुली सोबत लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. आरोपीला चौकात फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी शिवसेना नगरसेवक सहित सर्व पक्षीय नेत्यांनी केली आहे.0
0
Report
गरीबी के अड़चन के बीच रोहिणी का विश्व चैम्पियनशिप सफर
Kolhapur, Maharashtra:पट्टणकोडोली गांव, कोल्हापूर जिल्ह्यातील विठ्ठल-बिरुदेवाच्या भक्तीचं केंद्र, जगप्रसिद्ध येलो फेस्टिवलची भूमी आणि फरांडे महाराजांच्या भाकणुकीमुळे ओळखलं जाणारं गाव. याच गावातील एक लेक आज देशाचं नाव जगाच्या पटलावर नेण्याच्या तयारीत आहे.. रोहिणी खानू देवबा अस या राष्ट्रीय और आशियाई स्तरावर भारतासाठी पदक जिंकणाऱ्या कुस्तीपटूचे नाव. आत्ता हीच रोहिणी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरली आहे. पण जागतिक स्पर्धेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्यासमोर आर्थिक संकट उभं ठाकलं आहे. कुस्तीच्या आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी रोहिणी… पण आयुष्याच्या आखाड्यात ती आणि तिचं कुटुंब परिस्थितीशी दोन हात करत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली या गावातील रोहिणीने लहानपणापासून कुस्तीची आवड जोपासली. मर्यादित साधनसामग्री, आर्थिक अडचणी आणि संघर्ष यांवर मात करत तिनं राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सात पदकं मिळवली. 2024 मध्ये थायलंड येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून तिनं भारताचा तिरंगा उंचावला. त्यानंतर 2025 मध्ये कझाकिस्तानमध्ये झालेल्या स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. आणि आता 2026 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ट्रायलमध्ये सुवर्णपदक जिंकून तिनं जागतिक स्पर्धेसाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे.. रोहिणीच्या यशामागे तिच्या वडिलांचं मोठं योगदान आहे. विठ्ठल-बिरुदेव मंदिरात पुजारी म्हणून सेवा करणारे खानू देवबा यांनी मुलीच्या स्वप्नासाठी अक्षरशः स्वतःचं सर्वस्व पणाला लावलं आहे. घरची परिस्थिती बिकट असतानाही त्यांनी कधी मुलीच्या सरावात खंड पडू दिला नाही. नुकतीच वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी आणि खर्च भागवण्यासाठी त्यांनी घरातील शेळ्या मेंढ्या देखील विकल्या आहेत. कारण त्यांच्या मुलीचं स्वप्न अधिक मोठं आहे. एका बाजूला देशासाठी पदक जिंकण्याची जिद्द आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक अडचणी… या दोन्हींचा सामना करत रोहिणी वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी करत आहे. आज गरज आहे ती या गुणवंत लेकीच्या पाठीशी उभं राहण्याची. कारण उद्या जागतिक व्यासपीठावर भारताचा तिरंगा उंचावला गेला, तर त्या यशामागे एका बापाचे विकलेले पशुधन, त्याग आणि मुलीवरचा विश्वासही तितका मोठा असेल. संदीप पाटील प्रशिक्षक देशासाठी पदक जिंकण्याची क्षमता रोहिणीनं अनेकदा सिद्ध केली आहे. आता तिच्या स्वप्नांना आर्थिक बळ देण्याची जबाबदारी समाजाची, लोकप्रतिनिधींची आणि शासनाची आहे. कारण ही केवळ एका खेळाडूची लढाई नाही, तर महाराष्ट्राच्या अभिमानाची आणि भारताच्या तिरंग्याची लढाई आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.0
0
Report
नागपुर में सोना-चांदी की चोरी: महिला मोनाली अवतकर गिरफ्तार
Nagpur, Maharashtra:नागपुरात ग्राहक बनून खरेदीच्या बहाण्याने चोरी करणारी सराईत महिला आरोपी अटकेत.. आरोपी महिलने सराफा दुकानदारांसह अनेक महिलांना जाळ्यात ओढून केली होती फसवणूक.. मोनाली अवतकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव.. चोरीचे CCTV फुटेज ..आरोपी महिलेला नंदनवन पोलिसांनी ठोकल्या बेड्या विश्वास संपादन करून दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या महिलेचा केला पर्दाफाश..0
0
Report
Advertisement
शरद पवार का प्रवरानगर दौरा: गांधी विद्यालय में पूर्व विद्यार्थी ने किया संबोधित
Shirdi, Maharashtra:Anc - जेष्ठ नेते खासदार शरद पवार हे आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली आहे.. शरद पवार या विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी 1955 - 56 साली याच विद्यालयात इयत्ता 9 वी चे शिक्षण घेतलेले आहे.. याच विद्यालयाचा आज अमृतमहोत्सव तसेच माजी विद्यार्थी स्नेह मेळावा शरद पवारांच्या उपस्थितीत संपन्न होतोय.. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील, कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खा.निलेश लंके यांची प्रमुख उपस्थिती होती.. बाळासाहेब थोरात भाषण मुद्दे - शरद पवारांचे या भागावर विशेष प्रेम... याच विद्यालयात पवार साहेब शिकले आहे.. आज लोणीत प्रवेश करताच आज बाजाराचा दिवस असल्याची आठवण पवारांनी करून दिली.. *आपल्या संस्थेत प्रवेश करणारे जिल्हा परिषद शाळेतील* आज शहरात दोन विभागणी झाली.. एकीकडे इंग्रजी शाळा आणि दुसरीकडे मराठी शाळा.. *जिल्हा परिषद शाळा अनेक ठिकाणी चांगल्या मात्र त्यात अधिक वाढ करण्याची गरज* दिलीप वळसे भाषण मुद्दे पवार साहेबांचे मोठे बंधू नोकरीला असताना पवार साहेब इकडे शिक्षण घेत होते... पवार साहेबांनी राजकीय वाटचालीत अनेक खाती यशस्वीपणे सांभाळली आणि अनेक संस्थांचा कारभार देखील आज स्वतः पाहतात... *प्रत्येक जण आयकॉन शोधत असतो.. आज पवार साहेब ज्येष्ठ असून तरुणांनी केवळ राजकीय नव्हे तर सगळ्या बाबतीत त्यांचे काम मोठे* शासकीय नोकऱ्यांमध्ये शेतकऱ्याच्या मुलांना स्थान मिळाले ते शरद पवारांच्या दूरदृष्टीने.. पूर्वी केवळ साक्षर होणे गरजेचे होते.. मात्र स्पर्धात्मक युग.. प्रत्येक बाबतीत शिक्षण गरजेचे.. *आज लोकप्रतिनिधीबद्दल समाजात चांगले बोलले जात नाही.. त्याला आमच्या सारखे देखील लोकप्रतिनिधी कारणीभूत..* मी देखील जिल्हा परिषद शाळेत शिकलो.. आणि आठवीनंतर इंग्लजी विषय आला.. मात्र त्यानंतर महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी शहरात गेल्यावर अनेक अडचणी जाणवल्या.. आज शिक्षणाबरोबर अनेक क्षेत्रांची दरवाजे खुली... त्या दृष्टीने पुढे जा... यशाला शॉर्टकट नसतो.. परिस्थितीला दोष न देता संधीचे सोने करा.. *रयतच्या सगळ्या कार्यक्रमांना शाल, बुके देणं बंद करून पुस्तके द्या* हा पवार साहेबांचा निर्णय मी सांगतोय... *शरद पवार भाषण मुद्दे* आजचा कार्यक्रम माझ्या साठी अभिमानाचा आणि स्मरणात राहणारा.. *माझे एक वर्षाचे शिक्षण याच शाळेत झालं* एक वर्षात अनेक गोष्टी मला शिकवून गेल्या.. त्याकाळात झालेल्या शिक्षकांच्या गोळीबारामुळे राज्यभर संघर्ष निर्माण झाला.. त्यावेळी आम्ही देखील शाळा बंद ठेऊन निषेध केला.. त्यावेळी आम्ही बंद पुकारून साखर कारखाना बंद करायचा निर्णय घेतला व प्रवरा कारखान्यावर गेलो... *माझ्या आयुष्यातील पहिला मोर्चा मी याच प्रवरानगर मध्ये काढला* शरद पवारांनी सांगितल्या आठवणी.. आज हजारो विद्यार्थी रयतच्या संस्थेत शिक्षण घेत आहे याचा आम्हाला आनंद.. ही शाखा भविष्यकाळात राज्यात नावलौकिक घेईल याचा मला विश्वास...0
0
Report
टाकळी में विलास घुले हत्या: 9 आरोपी गिरफ्तार, आंदोलन थमा
Beed, Maharashtra:आदिवासी तरुणाला वाचवताना गमावला जीव; विलास घुले हत्या प्रकरणात चार दिवसांनी आंदोलन मागे, अब सत्याचा शोध..! ग्राफिक्स - 20 जून रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हॉटेल गावकरी येथे कदमवाडी येथील नऊ ते दहा लोक आले. - अनैतिक संबंधातून एकाला मारहाण होत होती. त्यावेळी विलास घुले हा त्याला वाचवण्यासाठी मध्यस्थी झाला - त्याचवेळी आरोपींनी विलास याच्या पोटात चाकू खुपसला. - उपचारादरम्यान विलास चा मृत्यू झाला. - याप्रकरणी दीड दिवसानंतर नऊ आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला - केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला - सर्व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला - दोन दिवसानंतर ही आरोपी अटक झाले नाहीत त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन छेडले - दरम्यान पोलिसांनी फक्त तीन आरोपींना अटक केली - सर्व आरोपींना अटक करावी या मागणीसाठी चौथ्या दिवशी ग्रामस्थांनी केज शहरात ठिय्या आंदोलन घातले - दुपारपासून केज शहर बंद करण्यात आले - आमदार धनंजय मुंडे यांनी सभागृहात हा विषय हाती घेतला. - त्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि पुन्हा तीन आरोपींना अटक केली - या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपी अटकेत आहेत - कदमवाडी येथील आरोपी कदम कंपनी बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांच्या मुलाचे समर्थक असल्याचा ग्रामस्थांचा आरोप - खासदार पुत्र सौरभ सोनवणे याला आरोपी करण्याची मागणी - आठ तासापासून विलास घुले याचा मृतदेह पोलीस ठाण्याच्या बाहेर - आमदार धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे या दोघांचेही फोनवरून आंदोलनकर्त्यांना संवाद - लक्ष्मण हाके देखील घटनास्थळी पोहचले - खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला आरोपी करा अन्यथा तीव्र आंदोलन छोडू लक्ष्मण हाके यांचा इशारा - संपूर्ण आरोपींना अटक होईपर्यंत ताब्यात घेणार नाही संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा - आरोपी अटक करण्याच्या मागणीसाठी मृतदेह चार दिवस ठेवण्यात आल्याचा बहुदा राज्यातली पहिलीच घटना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांना सूचना - सौरभ सोनवणे याच्या विरोधात जबाब नोंदविल्यानंतर आंदोलन मध्यरात्री अखेर मागे - घटनेतील सर्वच 9 आरोपी पोलिसांकडून अटक *प्रकरणातील आरोपी बाबासाहेब गुरुबा कदम, मंगेश गोरख कदम, रामेश्वर गायकवाड , शुभम रामभाऊ गायकवाड, भैय्या साहेब गायकवाड, अजय उर्फ बंकट कदम, नवनाथ परसराम कदम, दिपक परसराम कदम आणि संतोष नरहरी कदम हे अटकेत आहेत.* ANC - बीड जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या टाकळी येथील विलास घुले हत्याप्रकरणात अखेर चार दिवसांनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. आदिवासी तरुणाला मारहाण होत असताना मध्यस्थी करणाऱ्या विलास घुले यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मुख्यमंत्री स्तरावर कारवाईचे आश्वासन, सर्व नऊ आरोपींची अटक आणि खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याच्याविरोधात पुरवणी जबाब नोंदविल्यानंतर आंदोलक शांत झाले. मात्र या हत्येमागील नेमकं सत्य काय, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. पाहूयात हा विशेष रिपोर्ट...0
0
Report
शिर्डी में FDA की बड़ी छापेमारी: 500 किलोग्राम से अधिक पेड़ा जब्त
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash अन्न औषध प्रशासनाचे शिर्डीत पुन्हा धाडसत्र... निकृष्ट दर्जाचा 500 किलोहून अधिक पेढा केला जप्त.. आज सकाळपासूनच FDA ची शिर्डीत धडक कारवाई... साई मंदिर परिसरातील खासगी पेढे विक्रेत्यांच्या दुकानातून शेकडो किलो पेढा जप्त... झी 24 तास वृत्तवाहिनीने काही दिवसांपूर्वी केला होता शिर्डीतील निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांचा पर्दाफाश.. भाविकांच्या आरोग्याशी सुरू होता खेळ... झी 24 तासच्या बातमीनंतर FDA कडून दुसऱ्यांदा मोठी कारवाई...0
0
Report
Advertisement
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड पर सन सिटी कॉम्प्लेक्स के पास सड़क धंस गई; सुरक्षा दीवार क्षतिग्रस्त, क्षेत्र में गड्ढे
Mumbai, Maharashtra:जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड परिसरात मध्ये सन सिटी कॉम्प्लेक्स च्या परिसरात जाणारा रस्त्याचा काही भाग अचानक बसला या रस्त्यासोबत रस्त्याच्या बाजूला असलेली 50 मीटरची संरक्षक भिंत देखील घासली आहे यामुळे या परिसरात 50 फुल खड्डा झाला आहे त्याचा फटका आजूबाजूच्या इमारतीला देखील बसला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी घेतला हा आढावा0
0
Report
कल्याण में 70 साल की वृद्ध महिला पर बेदम मारपीट, वीडियो वायरल
Kalyan, Maharashtra:कल्याण तालुक्यातील दहिवली गावात ७० वर्षीय वृद्ध महिलेला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. दोन महिन्यापूर्वी म्हणजेच १९ एप्रिलला बारकूबाई राऊत यांनाही मारहाण करण्यात आली होती. मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रकरणी महिनाभरापूर्वीच टिटवाळा पोलीस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली आहे. शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून बारकूबाई यांना ही मारहाण करण्यात आली होती. १९ एप्रिलच्या सकाळी बारकूबाई या शेतावर जात असताना शेजारी राहणाऱ्या बाबाजी चोरगे आणि त्यांच्या पत्नी कुसुम चोरगे यांच्यासोबत वाद झाला. या वादानंतर कुसुम आणि बाबाजी या पती पत्नीने बारकूबाई यांना मारहाण केली.यात बारकूबाई या जखमी झाल्या होत्या. त्यानंतर गावकऱ्यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. मात्र दोन महिन्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलााय. आता मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.0
0
Report
भिवंडी-जासई कार रैली: एयरपोर्ट पर दि बा पाटील नाम की मांग
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावं यासाठी आज भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी भिवंडी ते जासई कार रॅली काढली. दि बा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त कार रॅली काढून दि बा पाटील यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देई पर्यंत आंदोलने सुरूच राहतील असा इशारा देत यामध्ये सत्ताधारी देखिल सहभागी होत असतील तर त्यांचेही स्वागत आहे अशी प्रतिक्रिया खासदार सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केलेय.0
0
Report
Advertisement
