411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कल्याण-डोंबिवली में मुसलाधार बारिश से भारी पानी बहे, कई इमारतें पानी में डूबीं
Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्व येथील अडवली ढोकली परिसरामध्ये पूर परिस्थिती. रस्त्यावरती पाणी साचल्याने नदीचा स्वरूप. अनेक दुकानांमध्ये पाणी साचले तर घरांमध्ये देखील पाणी साचले. मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवलीकरचे जनजीवन विस्कळीत. कमरेवर पाण्यातून काढावे लागते वाट. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवलीकरांची जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक सकल भागामध्ये पाणी साचला आहे तर कल्याण पूर्व येथील अडवली ढोकली परिसरामध्ये पाणी साचल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे अडवली ढोबलीला जाणारा हा मुख्य रस्ता आहे गेल्याने 50 ते 100 इमारती पाण्याखाली गेल्या आहेत तर दुकान मध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहेत त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी0
0
Report
आयुक्त तुकाराम मुंडे ने दूध केंद्रों में मिलावट के खिलाफ छापे शुरू कर दिए
Sinnar, Maharashtra:अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवाईचा धडाका सुरू केला असून मुंडे यांनी आता आपला मोर्चा दूध संकलन केंद्र व खवा उत्पादनाकडे वळवला आहे सिन्नर तालुक्यात काही दूध संकलन केंद्रावर मेलामाईन नावाची पावडर मिसळल्यागत असल्याची तक्रार अन्न औषध प्रशासन विभागाला प्राप्त झाली होती. यानंतर विभागाने या ठिकाणी आता छापे टाकून कारवाईला सुरुवात केली आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
नवी मुंबई के एमआयडीसी में भारी बारिश से बड़ा जलजमाव, सड़के पानी में डूबीं
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकिंग नवी मुंबईत मुसळधार पाऊस. एमआयडीसी भागात मोठ्या प्रमाणात साचले पाणी. एमआयडीसी मधील रस्ते मोठ्या प्रमाणात जलमय. एमआयडीसी मध्ये कामाला आलेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल. गुडघाभर पाणी साचल्याने अनेक वहाने पडतायत बंद. एमआयडीसी प्रशासनाने नालेसफाई केली की नाही, नागरिकांचा प्रश्न.0
0
Report
Advertisement
वसई-विरार में भारी बारिश से जनजीवन प्रभावित, बुलेट ट्रेन प्रोजेक्ट में मजदूर फंसे
Vasai-Virar, Maharashtra:वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाचा कहर बुलेट ट्रेन च्या कामात अनेक कामगार अडकले सर्जा मोरी गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या अनेक नागरिकांची सुटका NDRF जवान आणि नायगाव पोलिसांकडून बचावकार्य पुरात अडकलेल्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर आज झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार परिसरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. वसई कामण – सर्जामोरी परिसरात सुरू असलेल्या बुलेट ट्रेन च्या कामादरम्यान पाच कामगार पुराच्या पाण्यात अडकले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि NDRF पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या तत्पर बचाव मोहिमेत अडकलेल्या पाचही कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे... नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये आणि स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात येत आहे.0
0
Report
सोलापुर में बारिश नहीं, नदियाँ-तालाब सूखे, किसानों की फसलें बर्बाद
Solapur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातून पाऊस गायब, नादि, नाले, तलाव पडले कोरडे ठाक जिल्ह्यात दोन नक्षत्रे उलटूनही पावसाची ओढ कायम मागील वर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये सीना नदीला आला होता महापूर यंदाच्या वर्षी मात्र तीच सीना नदी पूर्णपणे कोरडी ठाक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या पेरण्या गेल्या वाया गेल्या आठ दिवसांपासून रोज आभाळ येतंय मात्र पाऊस पडायला तयार नाही जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव, विहिरींनी गाठला तळ आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी याविषयीचा आढावा घेतला आहे0
0
Report
लातूर में सूखा-उत्पन्न किसान आत्महत्याएं, सरकार से मदद की मांग तेज
Latur, Maharashtra:राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, लातूर जिल्ह्यातील अनेक भाग आजही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणी खोळंबली आहे, कर्जाचा डोंगर वाढत आहे आणि आर्थिक विवंचनेत शेतकरी सापडला आहे. या नैराश्याच्या वातावरणात निलंगा तालुक्यात अवघ्या आठ दिवसांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने चिंता अधिकच वाढली आहे. पावसाची प्रतीक्षा, कर्जाचा फास आणि वाढते शेतकरी संकट... पाहूया याच संदर्भातील स्पेशल रिपोर्ट. रिपोर्टर वैभव बालकुंदे जून महिना संपला... जुलैचा पहिला आठवडाही सुरू झाला... पण लातूर जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक शेतकरी अजूनही पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत, तर काहींनी कर्ज काढून बी-बियाणे आणि खते खरेदी केली आहेत. मात्र, पाऊस नसल्याने शेतात ओलावा नाही आणि खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. बँकांचे हप्ते, खासगी सावकारांचा तगादा आणि वाढता घरखर्च यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. या वाढत्या नैराश्याच्या पार्श्वभूमीवर निलंगा तालुक्यात अवघ्या आठ दिवसांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे लातूरमधील शेतकरी संकट पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. शेतकरी पाऊस लांबल्याने शेतकरी आर्थिक संकटात अधिकच अडकत चालला आहे. पेरणीसाठी काढलेले कर्ज, वाढते व्याज, खासगी सावकारांचा तगादा आणि उत्पादनाची अनिश्चितता यामुळे अनेक शेतकरी नैराश्याच्या गर्तेत जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि सुरू असलेल्या विधिमंतळ अधिवेशनात खासगी सावकारांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली आहे. राजू कसबे (प्रदेशाध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना) एका बाजूला राज्यातील काही भागात पुराचे संकट आहे, तर दुसऱ्या बाजूला लातूरमध्ये शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहे. वेळेत पाऊस झाला नाही, तर खरीप हंगामासह शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची भीती आहे. पाऊस, कर्जमाफी आणि तातडीच्या मदतीची अपेक्षा घेऊन शेतकरी सरकारकडे आशेने पाहत आहे. आता येणारे काही दिवस पाऊस आणि सरकारची भूमिका, दोन्ही शेतकऱ्यांचे भविष्य ठरवणार आहेत...0
0
Report
Advertisement
सोलापूर के भोंदू बाबा भोसले के खिलाफ मामला, 3 करोड़ के लेनदेन की जांच
Pandharpur, Maharashtra:सोलापूर के भोंदू बाबा भोसले के खिलाफ मामला, 3 करोड़ के लेनदेन की जांच एक महिला आरोग्याच्या तक्रारीसाठी आराम मिळावा यासाठी भोंदू म्हणून बाबाकडे आली होती आरोग्याच्या कारणाचे निराकरण करण्यासाठी ही अमावस्येला पूजा घालावी लागेल. या साठी पीडित महिलेकडून अश्लील कृत्य करण्याचे काम मनोहर मामा भोसले याने केले आहे. याबाबत त्याच्या घोटी आश्रमातून काही पुरावे सापडले आहेत. मनोहर भोसले प्रकरणाची एसआयटी कडून तपासणी आणि चौकशी सुरू आहे. यामध्ये मनोहर भोसले यांच्या 20 बँक खात्यातून तपासणी केली असता. तीन कोटी पेक्षा अधिक रूपयांचे व्यवहार समोर आले आहे.0
0
Report
पंढरपूर में उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार ने वारकरों के साथ पंगत में भोजन किया
Pandharpur, Maharashtra:राज्याच्या उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज पंढरपूर मधील एका कार्यक्रमात थेट वारकऱ्यासोबत पंगतीला बसून भोजनाचा आस्वाद घेतला. पुणे जिल्ह्यातील मंचर येथील वारकरी मंडळीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रम साठी उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार आल्या होत्या.0
0
Report
उरण में बेमौसम बारिश से चिरनेर समेत गांवों में पानी घूसा, घर तबाह
Navi Mumbai, Maharashtra:आज सकाळपासून उरण शहर व तालुक्यात जोरदार पाऊस सुरू झाल्याने या पावसाने चांगलीच दाणादाण उडाली आहे. अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. चिरनेर गावात पुरपरिस्थिती निर्माण झाली असून चिरनेर, नागाव तसेच तालुक्यातील इतर गावातील रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले असल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. उरण तालुक्यात दरवर्षी मुसळधार पाऊस पडत पडतो. यावेळी पुरग्रस्त रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम हे प्रत्येक गावातील रहिवासी करत होते. तरी शासनाने पुरग्रस्तांना नुकसान भरपाई देऊन,यापुढे रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. Navi Mumbai0
0
Report
Advertisement
भीमाशंकर में छुट्टी के कारण भारी बारिश में भक्तों की भीड़
Shirur, Maharashtra:भीमाशंकर/पुणे भिमाशंकर येथे सुट्ट्यांमुळे भर पावसात भाविकांची मोठी गर्दी पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर येथे सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भिमाशंकर परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून धुक्याची चादर आणि हिरवागार निसर्ग पर्यटकांना आकर्षित करत आहे. मुसळधार पावसाची पर्वा न करता राज्याच्या विविध भागांतून भाविक आणि पर्यटक भिमाशंकरमध्ये दाखल होत आहेत. अनेक भाविक पावसात भिजतच भगवान भिमाशंकराचे दर्शन घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया भिमाशंकर पुणे...0
0
Report
भीमाशंकर-नाणेघाट में धुंध-बारिश से प्रकृति का जादुई नजारा
Shirur, Maharashtra:भीमाशंकर/पुणे - धुक्याचे ढग, पाऊसाची रिमझिम, हवेतील गारवा, हिरवाईने नटलेल्या वनराईची पर्यटकांना भुरळ पावसाच्या आगमनानंतर सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील भिमाशंकर, नाणेघाट आणि आहुपे परिसर निसर्गसौंदर्याने बहरून गेला आहे. धुक्याचे ढग, रिमझिम पावस आणि हिरवाईने नटलेली वनराई पर्यटकांना भुरळ घालत आहे. सह्याद्रीत मुसळधार पावसाची प्रतीक्षा असली, तरी सध्याचे हे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहे.0
0
Report
नवी मुंबई के बेलापुर-ठाणे मार्ग पर पानी भरने से ट्रैफिक प्रभावित
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकिंग नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला. नवी मुंबईतील अनेक सखल भागात साचले पाणी. ठाणे बेलापूर रोड वर कोपरखैरणे येथे मोठ्या प्रमाणात साचले पाणी. ठाणे बेलापूर मार्गाला आले नदीचे स्वरूप. ठाणे बेलापूर मार्गावरून गाडी चालवताना प्रवाशांना होतोय प्रचंड त्रास, अनेकांची वाहने पडतायत बंद.0
0
Report
Advertisement
रायगढ़ में भारी बारिश से जनजीवन अस्त-व्यस्त, जलजमाव शुरू
Khopoli, Maharashtra:रायगडमध्ये मुसळधार पावसाचा कहर गेल्या चार ते पाच दिवसांपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने २ ते ४ जुलैदरम्यान अतितीव्र पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार खोपोली शहरात सकाळपासूनच मुख्य रस्त्यांसह अनेक सखल भाग आणि गावांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासन सतर्क असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
पुणे ग्रामीण में भारी बारिश: किसानों के लिए राहत की अच्छी खबर
Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यातील सर्वच परिसरात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे, या दमदार पावसामुळे बळीराजा शेतकऱ्याला दिलासा मिळाला असून ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली आहे त्या पिकांना हा पाऊस वरदान ठरणार असून ज्या शेतकऱ्यांची पेरणी करायची राहिली त्यांच्यासाठी हि हा पाऊस दिलासा दायक ठरणार आहे0
0
Report
उरण में भारी बारिश, सखल इलाकों में पानी साठा; न्यायालय परिसर तक पानी घुसा
Navi Mumbai, Maharashtra:उरण मद्ये मुसळधार पाऊस पडत असून सखल भागात पाणी साचला आहे। न्यायालय परिसरात पाणी साचले असून न्यायालय इमारती पर्यंत पाणी शिरले आहे। उरण नगरपरिषद नगराध्यक्ष आणि अधिकारी रस्त्यावर उतरून नागरिकांसाठी मदतकार्य सुरू केले असून नागरिकाांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे0
0
Report
Advertisement
