411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पंढरपुर में किसानों ने तहसील के सामने पावर सप्लाई की मांग पर ठिय्या प्रदर्शन
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर तालुक्यातील शेती पंपाला पुरेशा त्या प्रमाणात वीज कोर्टात द्यावा या मागण्यासाठी आज आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. सध्या सुरळीत वीज पुरवठा अभावी शेतातील पिके जळू लागली आहेत अनेकांना पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही अशी अवस्था झाली आहे या आंदोलन दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचा आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आला0
0
Report
NEET परीक्षा मालेगांव में कल, 2051 छात्र देंगे परीक्षा
Nashik, Maharashtra:*मालेगाव ब्रेकिंग.. विशाल मोरे नाशिक* - रद्द झालेली NEET ची परीक्षा उद्या मालेगावातही होणार.. - एकुण 2051 विद्यार्थी परीक्षा देणार.. - मालेगावात शहरात एकूण 3 परीक्षा केंद्र.. - NEET परीक्षा केंद्रावर अपर जिल्हाधिकारी, अपर पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांच्यासह अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांची केली पाहणी.. - परीक्षा योग्य रीतीने पार पडण्यासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती.. *बाईट: अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकान*0
0
Report
तुर्भे सेक्टर 24 में PWD कर्मियों की कॉलोनी में गाड़ियाँ जलाने का मामला
Navi Mumbai, Maharashtra:anchor - तुर्हे सेक्टर 24 मधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामगार वसाहतीमध्ये गाड्या जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याच्या घरासमोर उभ्या गाडीला लावली आग. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीकडे दुर्लक्ष. ना सुरक्षा रक्षक ना सिसीटीव्ही कॅमेरे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी त्यांच्या वसाहती मध्येच असुरक्षित.0
0
Report
Advertisement
वसई में ट्रांसफॉर्मर ब्लास्ट, तीन घायल; मानिकपुर क्षेत्र में अफरा-तफरी
Vasai-Virar, Maharashtra:वसईत ट्रान्सफॉर्मरचा स्फोट; तीन जण जखमी, मानिकपूर परिसरात खळबळ वसई : वसई पश्चिमेतील मानिकपूर येथील फुटाडो टॉवरसमोर शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याने तीन जण जखमी झाले. स्फोटानंतर ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सांडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. माहितीनुसार, अचानक झालेल्या स्फोटामुळे ट्रान्सफॉर्मरमधील गरम ऑईल बाहेर पडून रस्त्यावर पसरले. यावेळी तेथून जात असलेल्या दोन पादचाऱ्यांच्या अंगावर ऑईल उडाल्याने ते किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच महावितरणाचा एक कर्मचारी दुरुस्तीच्या कामासाठी घटनास्थळी पोहोचला. मात्र, काम सुरू असतानाच त्याच्या डोक्यावर ऑईल पडल्याने तो जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रस्त्यावर सांडलेले ऑईल पाण्याच्या फवाऱ्यांच्या मदतीने हटवून वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे काही काळ परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. स्थानीयांच्या म्हणण्यानुसार, वसई-विरार परिसरात ट्रान्सफॉर्मर फुटण्याच्या घटना वारंवार घडत असून यापूर्वीही अशा दुर्घटनांमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे महावितरणाच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, संबंधित ट्रान्सफॉर्मरची क्षमता 315 केव्हीए असून त्यावर सुमारे 300 ग्राहकांचा वीजपुरवठा अवलंबून आहे. वाढत्या उष्णतेमुळे आणि विजेच्या वाढलेल्या वापरामुळे अतिरिक्त भार पडल्याने ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती महावितरणाकडून देण्यात आली आहे. नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू असून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत वेळ लागू शकतो.0
0
Report
वाशिम में संजय देशमुख की बगावत पर शिवसेना का जोरदार विरोध प्रदर्शन
Washim, Maharashtra:यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या बंडखोरीच्या निषेधार्थ मानोरा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी संजय देशमुख यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जनतेने निवडून दिल्यानंतर पक्षाशी बेईमानी केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मतदारांच्या भावनांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांनी गद्दारांचा निषेध असो अशा घोषणा दिल्या.0
0
Report
मनसे का पनवेल: 19 जुलाई से आमरण अनशन, अवैध डांसबार बंद कराने की चेतावनी
Navi Mumbai, Maharashtra:रायगड जिल्ह्यात मुख्यत्व पनवेल तालुक्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या शेकडो डान्सबार विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड जिल्ह्याची ओळख डान्सबारचे माहेरघर अशी होऊ नये यासाठी 19 जुलैपासून मनसेतर्फे आमरण उपोषणाची हाक देण्यात आलेय. मनसे महिनाभर बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या डान्सबार मुळे होणारे नुकसान याबाबत नागरिकांमध्ये जाऊन जनजागृती करणार आहे. महिनाभरात सरकारने डान्सबार बंदी कायद्याची अंमलबजावणी करून डान्सबार बंद केले तर ठीक अन्यथा आमरण उपोषण करून हे सर्व बेकायदेशीर डान्सबार बंद करू असा इशारा मनसे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांनी सरकारला दिलाय.0
0
Report
Advertisement
चंद्रपूर पुलिस ने पुणे के फर्जी फाइनेंस कर्मचारी को गिरफ्तार किया; 9 नकली नामों से आर्थिक धोखाधड़ी का खुलासा
Chandrapur, Maharashtra:नऊ वेगवेगळी नावे बदलवून देशातील विविध शहरात आर्थिक फसवणूक करणाऱ्या पुण्याच्या भामट्याला चंद्रपूर पोलिसांनी केली अटक, एका ख्यातनाम फायनान्स कंपनीचा कर्मचारी असल्याचे भासवून चंद्रपुरातील हार्वेस्टर मशीन विक्रेत्याची व त्यांच्या ग्राहकांची साडेचार लाखांनी केली फसवणूक चंद्रपूरच्या एका हार्वेस्टर मशीन विक्रेत्याने हार्वेस्टर मशीन खरेदी करण्यासाठी आपल्या ग्राहकांसह हेमंत जोशी नामक फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याशी मे महिन्यात संपर्क साधला. त्यानुसार हेमंत जोशी यांनी दोन ग्राहकांच्या प्रत्यक्ष घरी भेट देत कर्ज एग्रीमेंट सह विविध कागदपत्रे तयार केली. अगदी काहीच दिवसात 15 लाखाच्या कर्जासाठी 4 लाख 46 हजार रुपये भरावे लागतील असे सांगत पुनावाला फिन कॉर्प च्या जनरल मॅनेजर चा खाते क्रमांक कळवत रक्कम वळती करण्यास सांगितली. रक्कम वळती झाल्यावर वाहन डिलिव्हरी प्रमाणपत्र व कर्ज मंजुरी पत्र देखील पाठविले. मात्र यानंतर हेमंत जोशी याचा नंबर सतत बंद राहिला. शंका आल्याने नागपूर पुन्हा वालाच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता अशा नावाचा कुणीही कर्मचारी नसल्याचे निष्पन्न झाले. व्यक्ती आणि कागदपत्रे दोन्हीतून फसवणूक झाल्याचे लक्षात येतात या प्रकरणाची सायबर पोलीस ठाणे चंद्रपूर येथे करण्यात आली. सायबर पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या कारवाईत हा इसम विनोद शांताराम गडाख पाटील असल्याचे निष्पन्न झाले. तो पुण्यातील बाणेर जवळच्या मोहन नगर येथील पॉश सोसायटीत फ्लॅट मध्ये वास्तव्याला असल्याचे कळले. चंद्रपूर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने तातडीने त्याचचे घरी गाठत त्याला अटक केली. त्यातून धक्कादायक माहिती पुढे आली. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर गुजरात ,उत्तर प्रदेश ,मध्य प्रदेश व इतर राज्यातूनही या भामट्याने अशाच पद्धतीने आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले. यासाठी त्याने हेमंत जोशी, हेमंत पवार , रणवीरसिंग सिकरवार, राम हरिचंद, मयंक वानखेडे, अभिषेक शर्मा, जितेंद्र श्रीवास्तव , निखिल यादव, विठ्ठल पाटील अशी एकूण 9 बनावट नावे आणि कागदपत्रे वापरली. चंद्रपूर न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांचा पीसीआर दिला असून यातून आर्थिक फसवणुकीची अन्य काही प्रकरणे उजेडात येण्याची शक्यता आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
सुषमा अंधारे के विवादित बयान पर कृष्णा पाटील का तीखा जवाब
Nanded-Waghala, Maharashtra:Anchor - युबीटी च्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र नागेश पाटील यांच्या बोचरी टीका केल्यानंतर कृष्णा पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सुषमा अंधारे ह्या मानसिक रोगी झाल्यात त्यांना चांगल्या मनोविकार तज्ञाची गरज आहे. त्यांनी हिंदू देवी देवतांबद्दल, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल एकेरी भाषेत वक्तव्य केली ते आम्ही उकरून काढावे का असे कृष्णा पाटील म्हणाले. जिवंत पाणी वडिलांचे श्राद्ध घालण्याची भाषा ही न शोभनारी आहे. मी चांगल्या संस्कृतीत वाढलोय वडिलांच्या विरोधात बोलणार नाही एकवेळ राजकारण थांबवेल असे कृष्णा पाटील म्हणाले. त्यांच्याशी बातचित केलीये आमचे प्रतिनीधी सतीश मोहिते यांनी.0
0
Report
बीड़ के गेवराई में रेत घोटाला: एक बाइक पर ई-परमिट जारी, मचा हड़कंप
Beed, Maharashtra:बीड जिल्ह्यातील गेवराई येथील वाळू घोटाळ्याचे नवे धक्कादायक पैलू आता समोर येत आहेत. तहसील कार्यालयातील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांदरम्यान आता वाळू वाहतुकीसाठी दिले जाणारे इलेक्ट्रॉनिक ट्रान्सपोर्ट परमिट चक्क एका दुचाकीच्या क्रमांकावर जारी करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेमुळे वाळू माफिया आणि महसूल प्रशासनातील संगनमताच्या आरोपांना अधिक बळ मिळाले असून जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. पाहूयात यासंदर्भातील हा विशेष रिपोर्ट... बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील वाळू पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे आरोप पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने लिलाव प्रक्रिया राबवली होती. मात्र या प्रक्रियेचा गैरफायदा घेत तहसीलदार संदीप खोमणे आणि महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांनी वाळू माफियांसोबत संगनमत करून तब्बल 26 हजार ब्रास वाळूचा अपहार केल्याचा गंभीर आरोप आमदार विजयसिंह पंडित यांनी केला आहे. विशेष म्हणजे वाळू वाहतुकीसाठी इलेक्ट्रॉनिक ट्रान्सपोर्ट परमिट हे नियमांनुसार चारचाकी किंवा मालवाहू वाहनांसाठी दिले जाते. मात्र येथे चक्क एका दुचाकीच्या क्रमांकावर परमिट जारी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात किती मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असावा, याची चर्चा सुरू झाली आहे. संबंधित तहसीलदारांवर तात्काळ बडतर्फीची कारवाई करून त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करावा, अशी मागणी आमदार विजयसिंह पंडित यांनी केली आहे. वाळू पट्ट्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली. आतापर्यंत चोरट्या मार्गाने वाहनांमधून वाळू तस्करी होत असल्याच्या घटना समोर येत होत्या. मात्र यावेळी घरकुल लाभार्थ्यांच्या नावाचा उपयोग करून दुचाकीच्या क्रमांकावर वाळू वाहतुकीची परवानगी मिळाल्याने प्रशासनही काही काळ गोंधळात पडले. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार संदीप खोमणे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात नेमकी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाळू घोटाळ्याचे एकामागोमाग एक धक्कादायक तपशील समोर येत असताना जिल्हा प्रशासनाचीही मोठी गोची झाली आहे. कारण दुचाकीच्या क्रमांकावर इलेक्ट्रॉनिक ट्रान्सपोर्ट परमिट जारी होऊन त्याचा वापर होत असतानाही प्रशासनाला याची माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांच्या कार्यकाळातील इतर व्यवहारांचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या नार्को चाचणीची मागणीही पुढे येत आहे. त्यामुळे या प्रकरणातील चौकशीचा आवाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुचाकीच्या क्रमांकावर वाळू वाहतुकीचे ई-परमिट जारी होणे ही केवळ तांत्रिक चूक आहे की संगनमतातून झालेला मोठा भ्रष्टाचार, याचे उत्तर आता चौकशीतूनच समजेल.0
0
Report
Advertisement
NEET परीक्षा के लिए संभाजी नगर में सुरक्षा के साथ 50 केंद्र, 17700 छात्र तैयार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn collector on neet 121 Neet परीक्षेसाठी प्रशासनाने अभूतपूर्व तयारी केलीय संभाजी नगर जिल्ह्यात 50 सेंटर्स वर ही परीक्षा होणार आहे, 17700 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत प्रत्येक सेन्टरवर या वेळी ड्युटी मॅजिस्ट्रेट तैनात असणार आहे आणि पोलिसांसह पॅरॅमिलिट्री फोर्स सुरक्षे साठी तैनात करण्यात आला आहे, एकूणच उपाययोजना आणि तयारी बाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी..0
0
Report
उच्च न्यायालय ने नौ दोषियों को निर्दोष माना, अण्णा हजारे ने सराहना की
Ahilyanagar, Maharashtra:पवनराजे निंबाळकर खटल्यातील सर्व नऊ जणांना उच्च न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केला आहे. यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाने दिलेला निर्णय सगळ्यांनी मान्य करायला हवा आणि जो निर्णय न्यायालयाने दिला आहे तो आपण मान्य केला पाहिजे असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.0
0
Report
लातूर में नी트 परीक्षा के लिए सुरक्षा कड़ी, मॉक ड्रिल शुरू
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... नीट पेपरफुटी प्रकरणानंतर उद्या पुन्हा नीट परीक्षा... लातूरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त... परीक्षेपूर्वी लातूरमध्ये मॉक ड्रिल सुरू... सुरक्षा व्यवस्थेची रंगीत तालीम...नीट परीक्षा गैरप्रकारमुक्त करण्यासाठी प्रशासन सज्ज... परीक्षा केंद्रांवर सुरक्षा यंत्रणांची चाचणी... नीट पेपरफुटी प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा नीटची परीक्षा घेण्यात येणार असून उद्या ही परीक्षा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांकडून परीक्षा केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लातूर शहरातील सरस्वती विद्यालयात सध्या मॉक ड्रिल सुरू आहे. यात ठिकाणावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी...0
0
Report
Advertisement
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर त्रासदायक दुर्घटना: 5 दोस्त डूबल्याचे निधन, 3 बचावले
Ratnagiri, Maharashtra:गणपतीपुळे पॅकेज.. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरून एक अत्यंत सुन्न करणारी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रशासनाने मान्सून आगमनाच्या पार्श्वभूमीवर आणि वातावरणातील बदलांमुळे २५ मे पासूनच संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पर्यटकांना समुद्रात उतरण्यास कडक बंदी जाहीर केली आहे. मात्र, असे असतानाही सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून समुद्रात उतरणे पर्यटकांच्या एका ग्रूपला अत्यंत महाग पडले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथील १९ मित्रांचा गट गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. यातील काही तरुण आज सकाळी समुद्रात पोहण्यासाठी उतरले असता, भरतीच्या पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात वाहून गेले. यातील 3 जणांना स्थानिक बचाव पथकाने तातडीने सुखरूप बाहेर काढले, मात्र दुर्दैवाने ५ जणांचा बुडून मृत्यू झाला असूनचे मृतदेह हाती आले आहेत. पाहूयात सविस्तर स्पेशल रिपोर्ट... रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आज सकाळी १० च्या सुमारास हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील बिडकीन येथील १९ जणांचा हा गट एकत्र आनंदाने पर्यटनासाठी कोकणात दाखल झाला होता. सकाळी किनाऱ्यावर फिरत असताना यातील ८ युवक उत्साहाच्या भरात समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने समुद्राचे रौद्र रूप आणि लाटांचा प्रचंड ओढ याचा अंदाज या तरुणांना आला नाही. अचानक आलेल्या मोठ्या लाटेसोबत हे सर्वजण खोल पाण्यात खेचले गेले आणि बुडू लागले. किनाऱ्यावरून आरडाओरड सुरू होताच स्थानिक जीवरक्षकांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात उड्या घेतल्या.. स्थानिक जीवरक्षकांच्या तत्परतेमुळे तीन तरुणांचे प्राण नक्कीच वाचले, परंतु ५ मित्र खोल पाण्यात बेपत्ता झाले. या दुर्घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक देवस्थानचे पुजारी आणि ग्रामस्थही मदतीसाठी पुढे सरसावले. समुद्राला सध्या उधाण असल्यासारखी परिस्थिती असल्याने आणि पाण्याचा प्रवाह मागे खेचणारा असल्याने बचाव कार्यात प्रचंड अडथळे येत होते. पर्यटक स्थानिक प्रशासनाच्या बंदी आदेशाकडे आणि चेतावणीकडे कसे दुर्लक्ष करतात, यावर स्थानिक मंदिर पुजारी अमित गवाणकर यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.. स्थानिक जीवरक्षक, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर बोटींच्या मदतीने शोधमोहीम राबवली. मात्र, निसर्गाच्या रौद्र रूपापुढे या तरुणांचा निभाव लागला नाही. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर बेपत्ता झालेल्या पाचही युवकांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. ऐन उमेदीच्या वयातील हे पाचही मित्र आता मृत अवस्थेत आढळल्याने बिडकीन गावावर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत पावलेल्या युवकांमध्ये आदित्य संतोष राऊत (वय २२), अनिकेत बंडू हिवराळे (वय २०), आनंद राजू नरवडे (वय २०), प्रेम दीपक आत्माने (वय १९) आणि यश रमेश्वर कांबळे (वय १९) या मित्रांचा समावेश आहे. या संपूर्ण घटनेनंतर रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळाची पाहणी करत पर्यटकांना कडक इशारा दिला आहे.. प्रशासनाने वारंवार बजावलेले धोक्याचे इशारे आणि सुरक्षेचे नियम क्षणिक आनंदासाठी हवेत उडवणे किती महागात पडू शकते, याचे अत्यंत भीषण आणि विदारक उदाहरण आज गणपतीपुळेच्या किनाऱ्यावर पाहायला मिळाले. ३ तरुणांचे प्राण नक्कीच वाचले, मात्र बिडकीन येथील ५ निष्पाप युवकांना आपला जीव गंवावा लागला आहे..0
0
Report
उद्धव ठाकरे से बगावत के बाद संजय जाधव पर शिवसेना में तीखी प्रतिक्रियाएं
Parbhani, Maharashtra:अँकर - परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत केलेल्या बंडखोरी नंतर खासदार संजय जाधव यांच्या विरोधात ठाकरे यांचे शिवसैनिक आक्रमक झाले असून, ठीक ठिकाणी त्यांच्या विरोधात आंदोलने उभारली जात आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून खासदार संजय जाधव यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी जल्लोष करताना चे चित्र पहायला मिळत आहे. परभणीत संजय जाधव याच्या समर्थकाकडून जाधवांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक करत जल्लोष करण्यात आला आहे. अद्याप खासदार संजय जाधव यांनी शिवसेनेत जाण्याबद्दल अधिकृत कुठलीही प्रतिक्रिया दिली नसली तरी मात्र त्यांच्या विरोधात होत असलेल्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे यांची शिवसेना मैदानात उतरल्यााने परभणीत राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे...0
0
Report
रत्नागिरी में पानी की कमी से उद्योग ठप्प, मंत्री पर उठे सवाल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - पाण्याअभावी उद्योगधंदे बंद पडवेत असं एक वातावण निर्माण केल गेलय पाऊस पडला नाही हे उद्योग मंत्र्यामुळेच का... माणसाचं जीवनमान हे पहिलं महत्त्वाचं म्हणून राज्यभरात एमआयडीसीने जीथे रेसिडेन्सी एरियाला देखील पाणी कमी पडणार नाही ही आमची भूमिका माणसांना जेवढे पाणी लागते तेवढे पाणी एमआयडीसीत देणार इंडस्ट्रीदेखील बंद पडणार नाही याची काळजी घेतली जाईल नैसर्गिक स्त्रोत आटला असेल एमआयडीसी काही करू शकत नाही मी जलसंपदा मंत्र्यांशी बोलणार आहे कोयनेतील काही पाणी सोडून त्यातून काही मार्ग काढता आला तर हे पाहता येईल ऑपरेशन टायगर ला जर नंबर देता आले तर 365 दिवस ऑपरेशन सुरू राहील रोजच पक्षप्रवेश सुरू असतात जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे संपर्कात आहेत म्हणजे टायगर ऑपरेशन नव्हे रत्नागिरी जिल्ह्यातल प्रवेश करणारे भरपूर आहेत आणि अशीच परिस्थिती राज्यामध्ये आहे उद्धव ठाकरे पक्ष सोडून जाणार कुठे काँग्रेसने जेवढा त्रास दिला नाही तेवढा आम्ही दिला हे किती दुर्दैव असे उद्धव ठाकरे म्हणाले काँग्रेसने हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला पहिली शिवसेना फोडण्याचे काम काँग्रेसने केले दुसरी पुन्हा शिवसेना फोडण्याचं काम भुजबळ साहेबांन बाहेर काढून काँग्रेसनं केलं सावरकारांवर काँग्रेस प्रचंड टिका करते त्यांच्या.मांडीवर हे बसलेत उद्धव ठाकरेंच कालच भाषण ही उरलेली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होतेय की काय अशा पद्धतीचं भाषण युबीटीची पुर्ण काँ्रेस झालीय हे चार वर्षापुर्वी एकनाथ शिंदेनी सांगितलं हे कालच्या भाषणातून सिद्ध झाल राजिनामा जर युबीटीच्या पक्षप्रमुखांन द्यायचा असेल तो कार्यकर्त्यांना विचारुन चालणार नाही ते राहूल गांधी आणि सोनिया गांधींना विचारावं लागेल राज ठाकरेंनी मतदारांना आणि जनतेला आवाहन केले मतदार प्रतिसाद देतात की नाही हे भविष्यात कळेल 2018 ला जो सल्ला दिला ते 2019 ला पाळला गेला का त्यामुळे पुढच्या निवडणुकीची वाट बघू राज ठाकरेंनी जो सल्ला दिलेला आहे तो पुढच्या निवडणुकीत मतदार पाळतात का नाही हे पाहू कमळ ऑपरेशन म्हणजे कमळ हातात घेऊन फिरणार का उदय सामंत यांचा युबीटीला सवाल भास्कर जाधव यांना मांडलेला मुद्धा माझ्यासाठी महत्वाचा तोच आमचा मुद्धा होता बाह्ययंत्रण काय.करतात या पेक्षा आंतर्गत संवाद संपलेला आहे अंतर्गत काळाबरोबर आपण बदललं पाहीजे लोकांशी संवाद ठेवला पाहीजे भास्कर जाधव यांच्या मागणीचं जर पालन केलं तर असलेली युबूटी टिकेल -; उदय सामंत0
0
Report
Advertisement
