411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
शिंदे के सम्मान पर जोर, 2029 तक अधिक विधायक-सांसद जुटाने की तैयारी
Akola, Maharashtra:महायुतीचे शिल्पकार असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मान-सन्मान कायम राखला गेला पाहिजे, असे मत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असते. मात्र मुख्यमंत्रीपदासाठी संख्याबळ महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 288 पैकी केवळ 60 आमदारांच्या बळावर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे 2029 पर्यंत अधिकाधिक आमदार आणि खासदार निवडून आणण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचे सरनाईक म्हणाले. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून एकनाथ शिंदे यांचे महायुतीतील योगदान मोठे असल्याने त्यांना योग्य तो मान मिळालाच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. शिंदे यांच्यासोबत दगाफटका होण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगत कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभारण्यासाठी आपण राज्यभर दौरे करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, मন্ত্রী चुकत असेल तर त्यांना ठोका या बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर बोलताना सरनाईक यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली. ते काम न करणाऱ्या मंत्र्यांबद्दल बोलले असावेत, मात्र मी त्यात नाही, असे ते म्हणाले. तसेच बच्चू कडू आता प्रहारचे नव्हे तर शिवसेनेचे आमदार असून महायुतीत सर्वांना सोबत घेऊन चालण्याची विनंती त्यांना करणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले. अकोल्यात आयोजित शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकारी व एसआयआर मार्गदर्शन शिबिरानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.0
0
Report
लातूर के खंडापूर कुंभमेळे में करोड़ों निधि घोटाला: भक्तों के पैसे कहाँ गए?
Latur, Maharashtra:लातूर जिले खंडापूर में आयोजित उत्सव संतांचा कुंभमेळाव्यावर भाविकांनी दिलेला निधी मंदिर उभारण्यासाठी वापरला जाईल असे सांगितले जात होते. मात्र मेळावा संपल्यानंतर निधीचा संपूर्ण हिशाब समोर आला नाही. काही प्रमुख संयोजक संपर्काबाहेर गेल्याने संशय वाढला. जमा झालेल्या रकमेतील मोठा अपहार होण्याचा दावा केला गेला असून पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. तक्रारीनुसार हजारो पावती पुस्तकांच्या माध्यमातून तब्बल कोटींचा निधी गोळा झाला. या प्रकरणाचा पाठपुरावा करत आंदोलन आणि उपोषणही झाले होते. या निधीचे व्यवहार, जमा-खर्चाचा तपशील आणि कथित अपहाराची रक्कम तपासासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत. श्रद्धेने दिलेल्या देणग्यांचा हिशेब मागणीत असताना हा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका कुठे गेला, वापर कसा झाला, आणि अपहार कितपत खरे आहेत, याचे उत्तर पोलीस तपासातून मिळेल. परंतु या प्रकरणामुळे भाविकांचा आणि धार्मिक संस्थांबाबतच्या विश्वासालाही धक्का लागला आहे.0
0
Report
वर्धा में 5 करोड़ की फिरौती के बाद अपहरण, पुलिस की तत्परता से बचा व्यापारी
Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकिंग - ५ कोटींच्या खंडणीसाठी तुकाराम मुंडेचं अपहरण - परळीतील व्यक्तीची वर्ध्यात सुटका, धोत्रा परिसरात डोळ्यांवर पट्टी बांधून सोडले! अँकर : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथून अपहरण करण्यात आलेल्या एका व्यक्तीची वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील धोत्रा परिसरात सुटका झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरणकर्त्यांनी संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांकडे तब्बल ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची माहिती असून, पोलिसांचा दबाव वाढत असल्याची चाहूल लागताच आरोपींनी त्यांना धोत्रा गावाजवळील सुनसान रस्त्यावर डोळ्यांवर पट्टी बांधून सोडून पसार झाल्याचे सांगितले जात आहे. विवो -तुकाराम मुंडे (रा. परळी वैजनाथ, जि. बीड) हे परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातून काम आटपुन . दिनांक ४ जून २०२६ रोजी दुपारी काम आटोपून घरी परतत असताना तीन अज्ञात इसमांनी त्यांचे जबरदस्तीने चारचाकी vehicleातून अपहरण केले होते. या घटनेनंतर कुटुंबीयांकडे मोठ्या रकमेची खंडणी मागण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, बीड पोलिसांचे गुन्हे अन्वेषण पथक आरोपींचा शोध घेत विविध ठिकाणी तपास करत अमरावती पर्यत पोहोचली होती. बाईट- तुकाराम मुंडे, अपहरण झालेला दिनांक ७ जून रोजी धोत्रा परिसरातील रस्त्यालगत डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत सोडण्यात आल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी मदतीसाठी हाक मारली. त्याचवेळी त्या मार्गाने दुचाकीवरून जात असलेले प्रसन्ना घेमराज मांडवकर (रा. आंजदा वर्धा) यांना त्यांना पाहून मदत केली. मुंडे हे घाबरलेल्या अवस्थेत असल्याने काहीतरी गंभीर प्रकार घडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांची विचारपूस केली. यावेळी मुंडे यांनी आपल्यासोबत घडलेली संपूर्ण आपबिती सांगितली. प्रसन्ना मांडवकर यांनी प्रसंगावधान दाखवत तुकाराम मुंडे यांना आपल्या दुचाकीवरून हिंगणघाट पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तातडीने त्यांच्या नातेवाईकांशी तसेच परळी वैजनाथ पोलिसांशी संपर्क साधून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर तुकाराम मुंडे यांना पुढील तपासासाठी परळी वैजनाथ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. बाईट- प्रसन्ना घेमराज मांडवकर, मदत करणारा0
0
Report
Advertisement
रांजनगाव फाटे पर सीएनसी-वीएनसी टूल्स चोरी, लगभग 60 लाख के नुकसान
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शटर उचकटून ६० लाखांचे टुल्स लांबवले; सीसीटीव्हीत चोरटे कैद ANC : छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव फाट्याजवळील एका टूल्स विक्रीच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी तब्बल ६० लाख रुपयांचे सीएनसी व व्हीएनसी मशिनरीचे महागडे कटिंग टूल्स चोरून नेल्याची मोठी घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव फाट्याजवळ ई-३४ सेक्टरमध्ये जितेंद्र साळुंके यांचे लक्ष्मी इंटरप्रायजेस नावाने टूल्स विक्रीचे दुकान आहे. पवन सरोदे हे तिथे टूल्स डिलिव्हरीचे काम करतात. शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद करण्यात आले होते. रविवारी सकाळी शेजारील ट्रान्सपोर्ट चालकाने पवन सरोदे यांना फोन करून दुकानाचे शटर उचकटल्याची माहिती दिली. त्यानंतर मालक साळुंके आणि सरोदे यांनी दुकानात धाव घेतली असता, दुकानातील सीNC आणि व्हीएनसी मशिनरीचे सुमारे ६० लाख रुपये किमतीचे कटिंग टूल्स चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला.0
0
Report
नालासोपारा पूर्व के पार्किंग में गाड़ियों ने आग पकड़ी; दमकल ने आग पर काबू पाया
Vasai-Virar, Maharashtra:नालासोपारा : नालासोपारा पूर्वेतील सर्वोदय नगर, बावशेत पाडा परिसरात रविवारी दुपारी खुल्या मैदानात पार्किंग करून ठेवलेल्या अंदाजे पाच ते सहा चारचाकी वाहनांना अचानक आग लागल्याची घटना घडली. वाढत्या उष्णतेमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत है. माहिती मिळताच वसई विरार शहर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी होजच्या साहाय्याने पाण्याचा मारा करत कूलिंग पद्धतीने आग विझवली. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही वाहनांचे नुकसान झाले आहे. आजचे वसई-विरार तापमान हे कमाल तापमान सुमारे ३४°C येवढे नोंदवले गेले होते. त्यामुळे गाड्यांना आग उष्णतेमुळे लागल्या का कुणी जाणून बुजून लावल्या याचा तपास आता पोलीस करत आहेत.0
0
Report
एम्स अध्ययन बताता है प्रदूषण गर्भाशय तक पहुंचकर बच्चे के विकास पर खतरा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:प्रदूषित हवा गर्भातील बाळाच्या जीवावर धक्कादायक वास्तव दिल्ली एम्सच्या एका संशोधनातून पुढे आले आहे. प्रदूषण बाळाच्या नैसर्गिक विकासात अडथळा आणतंय. याचे दुष्परिणाम जन्मानंतरही अनेक वर्षांपर्यंत बाळावर दिसतात असे ही पुढे आले आहे. या प्रदूषणापुढे गर्भातील बाळ सुरक्षित नाही असे अभ्यासात पुढे आले आहे. हवेत पीएम2.5 आणि पीएम10 सारखे अतिसूक्ष्म प्रदूषित कण थेट गर्भाशयातील प्लासेंटातून पोहोचतात, ९९४ प्रसूतींचे विश्लेषण देवघरमधील भागात झाले. ज्या महिला जास्त वेळ पीएम2.5 कणांच्या संपर्कात आल्या, त्यांच्या पोटी कमी वजनाची बाळे जन्माला येण्याचा धोका सर्वाधिक. पीएम2.5 काय असते? हवेत तरंगणारे अतिसूक्ष्म कण ज्यांचा व्यास 2.5 मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी असतो ते श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसांमध्ये खोलवर जातात, रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात, त्यामुळे दमा, हृदयविकार आणि श्वसनाचे गंभीर आजार होतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार सुरक्षित हवेमध्ये पीएम2.5 ची पातळी प्रति घनमीटर 12 मायक्रोग्रॅमपेक्षा कमी असावी, परंतु प्रदूषित हवेत ही घनता वाढलेली दिसते. एम्सच्या अभ्यासात असे आढळले की गर्भवती महिला प्रदूषित हवेच्या संपर्कात आल्यास सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो, ज्यामुळे गर्भाच्या आणि प्लासेंटाच्या वाढीसाठी आवश्यक प्रोटीन कमी होतो. परिणाम म्हणून नवजात शिशुंचे वजन कमी, nine महिने पूर्ण होण्याआधी जन्म, गर्भात वाढ खुंटणे आणि जन्मानंतरही शारीरिक आणि मानसिक वाढीवर दीर्घकालीन परिणाम. हवेतील हा घटक आता सगळ्यांच्या जीवावर उभा आहे, काळजी कशी घ्यावी या विषयावरील तज्ञांचा अहवाल.0
0
Report
Advertisement
बीड में मानसून पूर्व बारिश से कृषि सेवा केंद्र में पानी घुसा, लाखों का नुकसान
Beed, Maharashtra:बीड : मान्सूनपूर्व पावसाचा तडाका, बीडच्या वडवणीत कृषीसेवा केंद्रात शिरले पाणी व्यापारांचे लाखो रुपयाचे नुकसान आर्थिक मदत देण्याची मागणी मान्सूनपूर्व पावसाने बीड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावताच वडवणी शहरातील व्यवस्थेचे अक्षरशः पितळ उघडे पडले आहे. मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेतील गटारे तुंबली आणि पावसाचे पाणी थेट एका कृषी सेवा केंद्रात घुसले. पाण्याच्या या लोंढ्यामुळे खताची पोती, सोयाबीन आणि कापसाच्या बियाण्यांच्या बॅगा पूर्णपणे भिजून लाखो रुपयांचे नुकसान व्यापाऱ्याचे झाले आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी व्यापाऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. काही तासांच्या पावसातच शहरातील निचरा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत असून, नुकसानीची भरपाई मिळण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.0
0
Report
रत्नागिरी में अज्ञात विकृत का कुत्ते पर क्रूर हमला, आंखें फोड़ दीं
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीत माणुसकीला कलंक! निष्पाप मुक्या प्राण्यावर अमानुष अत्याचार; दोन्ही डोळे फोडले,पायही तोडला.. रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला रोडवर माणुसकीला पुरते लाजवणारी अत्यंत क्रूर घटना समोर आली आहे.एका अज्ञात विकृताने भटक्या कुत्र्याचे मागचे पाय बांधून त्याच्या डोक्यावर टोकदार वस्तूने गंभीर वार केले.या अमानुष हल्ल्यात निष्पाप कुत्र्याचे दोन्ही डोळे फोडण्यात आले असून,त्याचा एक पायही तोडण्यात आला आहे.. ६ ते ७ जून दरम्यान घडलेल्या या अघोरी कृत्यामुळे संपूर्ण रत्नागिरीकरांमध्ये आणि प्राणीप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.याप्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,या विकृत नराधमाला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करून कडक शिक्षा करावी,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे..0
0
Report
नाशिक में Nafed-NCCF द्वारा प्याज ख़रीदी शुरू, किसानों ने दर को विरोध में
Lasalgaon, Maharashtra:नाशिक जिल्ह्यात आजपासून नाफेड आणि एनसीसीएफमार्फत शासकीय कांदा खरेदी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात खरेदी प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच मोठा वाद निर्माण झाला आहे. खरेदीदार संस्था बाजार समित्यांमध्येच फिरकलेल्या नसल्याचा आरोप होत असून शेतकऱ्यांनीही शासकीय खरेदी दरावर नाराजी व्यक्त केली आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट... नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आजपासून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून नाफेड आणि एनसीसीएफमार्फत कांदा खरेदी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र खरेदी प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित असतानाही संबंधित खरेदीदार संस्था बाजार समित्यांमध्ये उपस्थित नसल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जयदत्त होळकर यांनी याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. खरेदीदार संस्थांनी यापूर्वीच कमी दराने कांद्याची खरेदी केली असून, बाजार समित्यांमधील व्यवहार पारदर्शक असल्याने आधी खरेदी केलेला कांदा दाखविणे त्यांना शक्य होणार नाही. त्यामुळेच या संस्था बाजार समित्यांमध्ये खरेदीसाठी येत नसल्याचा आरोप होळकर यांनी केला आहे. दरम्यान, शासनाने निश्चित केलेला प्रतिक्विंटल १५८० रुपयांचा खरेदी दर शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याची भावना व्यक्त होत आहे. उत्पादन खर्च, साठवणूक खर्च आणि वाहतूक खर्च लक्षात घेता कांद्याला किमान २ हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळणे आवश्यक असल्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत. दुसऱ्या कडे, आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सुमारे ८०० वाहनांमधून कांद्याची आवक झाली. लिलावात कांद्याला कमाल २०९० रुपये, किमान ५०० रुपये तर सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बाजार समितीतील सरासरी बाजारभाव शासनाने जाहीर केलेल्या खरेदी दरापेक्षा अधिक असल्याचे चित्र समोर आले आहे.0
0
Report
Advertisement
कल्याण रेलवे स्टेशन परिसर में राडा: CCTV में मारपीट कैद
Kalyan, Maharashtra:कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रविवारी रात्री रिक्षा चालक आणि काही तरुणांमध्ये वाद झाला . वादाचे कारण अस्पष्ट असून मारहाणीच घटना CCTV कॅमेरात कैद झाली आहे . स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक, प्रवासी आणि रिक्षाचालकांची वर्दळ सुरू असतानाच काही व्यक्तींमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर काही क्षणांतच मारहाणीत झाले. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. CCTV फुटेजमध्ये दोन ते तीन तरुण एक रिक्षा अडवून रिक्षा चालकाला मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे काही जणांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले. दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असलेल्या कल्याण स्टेशन परिसरात अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने रेल्वे स्टेशन परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.0
0
Report
अनिल देशमुख के ड्रग मामले पर महाराष्ट्र सरकार की ठोस कार्रवाई का संकेत
Nagpur, Maharashtra:नागपूर Anil Deshmukh माजी गृहमंत्री. अमली पदार्थ महाराष्ट्रमध्ये अमली पदार्थाच्या घटना घडतात काही महिन्यापूर्वी गोरेगाव नेस्कोच्या म्युझिक कॉन्सर्ट मध्ये अमली पदार्थ सेवन केल्याने दोन तरुणाचा मृत्यू झाला. वरळीत म्युझिकल कॉन्सर्ट मध्ये मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी उपस्थित होती. तिथे सुद्धा ड्रगचा सेवन करून तरुण मुलगा मृत्यूमुखी पावला. पुणे ते अशीच घटना घडली वारंवार या घटना घडत आहे. शासनाने जे टॉलरन्स फॉर ड्रग मोहीम राज्य सरकार बाबत आहे. अजून प्रभावीपणे राबवल्या गेली पाहिजे. या सर्व वारंवार घटना घडतात त्यावर नियंत्रण मिळवता येईल असे पावले उचलले पाहिजे. ताडदेव पोलिसानी त्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली.. त्यानंतर पुन्हा कशी काय परवानगी मिळते. पोलीस शहानिशा करून परवानगी देते त्यामुळे कोणाच्या दवाखाली नंतर परवानगी दिली. आठ दहा दिवसात शेतकरी पेरण्याकरता करायच वेळेस मोठ्या प्रमाणात खताची आवश्यकता आहे. मिश्र खतांची आवश्यकता आहे...आज शेतकऱ्यांना युरिया, मिश्र खत मिळत नाही. राज्य शासनाने लवकरात लवकर पावले उचलून लवकर उपलब्ध करून द्यावी... जेणेकरून शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होणार नाही.. घरगुती गॅस सिलेंडर 90 रुपयांनी वाढला. राज्य शासनाने लवकरात लवकर पावल उचलून डिझेल आणि पेट्रोलचे दर किमती कमी होतील गॅसची किमती कमी होतील यासाठी योग्य पावलं राज्य सरकारने उचलायला पाहिजे. खताची लिंकिंग काही कंपन्या लिंकिंग केल्याच्या शेतकऱ्यांना खत देत नाही. त्यांच्यावर दबाव आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लिंकिंगने खत विक्री होते आहे. सरकार वारंवार सांगत लिंकिंग होऊ देणार नाही...ती खताची मागणी नाही आहे... ती खत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना घ्यावं लागतं. त्यामुळे शेतकऱ्यांचे अडचण झाली आहे. लवकरात लवकर लिंकिंगच्या बाबतीत कृषी सेवा केंद्र या कारखाने दबाव असतात... त्याची नोंद घेऊ मागणी नसतांना खरेदी करायला लावतात त्यांच्यावर कारवाईची आवश्यकता आहे. (शरद पवार दिलीप वळसे पाटील ) अनेक संस्थांमध्ये अध्यक्ष शरद पवार आहे. त्यासोबत दिलीप वळसे पाटील यांनी सदस्य आहे. त्या संस्थेच्या कामानिमित्त चर्चा करण्यासाठी दिलीप वळसे पाटील शरद पवार यांना भेटत राहतात त्या भेटीत काही वावग नाही. दोन्ही पक्ष एकत्र येण्याची कुठलीच शक्यता नाही....0
0
Report
रत्नागिरी के दापोली में रात के समय वन्य प्राणी सड़क पर, वीडियो वायरल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वन्य प्राण्यांची वर्दळ.. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वन्य प्राण्यांची वर्दळ वाढल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दापोली तालुक्यातील चिखलगाव ते आडिवाडी-बोरिवली या ग्रामीण मार्गावर रात्रीच्या वेळी एक रानरेडा रस्त्यावरून मुक्तपणे फिरताना दिसून आला. या घटनेचा व्हिडिओही स्थानिकांच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसमोर हा रानरेडा अचानक येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघाताची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत असून, वन विभागानेही तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.0
0
Report
Advertisement
मुरुड बीच पर पर्यटकों की घातक स्टंट, प्रशासन से कड़ी कार्रवाई की मांग
Ratnagiri, Maharashtra:दापोली -रत्नागिरी.. मुरुड बीचवर पर्यटकांची जीवघेणी स्टंटबाजी.. दुर्घटनेनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष? प्रसिद्ध मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या हुल्लडबाजीचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साकाळी साडेहाच्या सुमारास काही पर्यटकांनी आपली MH 42 BJ 4746 क्रमांकाची कार थेट समुद्राच्या वाळूत उतरवून बेदरकारपणे गोल फिरवत जीवघेणी स्टंटबाजी केली.. काही दिवसांपूर्वीच जवळच्या आंजरले बीचवर एक कार समुद्राच्या पाण्यात बुडाल्याची घटना ताजी असतानाही पर्यटकांनी यातून कोणताही धडा घेतला नाही.. या भरधाव कारमुळे किनाऱ्यावर उपस्थित इतर पर्यटकांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला होता,ज्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.. समुद्रकिनाऱ्यांवर वाहनांच्या प्रवेशाला तात्काळ बंदी घालावी आणि अशा हुल्लडबाजांवर प्रशासनाने कठोर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी आता जोर धरत आहे,अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही..0
0
Report
नागपूर के चुनावी बवाल: बीजेपी- कांग्रेस पर आरोपों की राजनीती तेज
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूर बाईट - आ परीणय फुके, भाजप नेते घोडेबाजाराचे आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून का केले जात आहेत? काँग्रेसचे नेतेच बिकाऊ आहेत. जे बिकाऊ असतात, त्यांचीच किंमत बाजारात ठरवली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेले सदस्य बिकाऊ आहेत, असे त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा दृष्टिकोन आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे केवळ माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. जर त्यांच्याकडे ठोस पुरावे असते, तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ते जनतेसमोर मांडले असते. हा केवळ चर्चेत राहण्याचा प्रयत्न आहे. भाजपच्या नगरसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून विविध प्रशिक्षण वर्ग राबविले जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेल्या प्रतिनिधींनाही या प्रशिक्षणाचा लाभ दिला जात आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत सामान्य नागरिक जसे पर्यटनासाठी जातात, त्याचप्रमाणे नगरसेवकही सहलीसाठी जाऊ शकतात. यात कोणतेही गैर नाही. विरोधी पक्ष कमकुवत झाला असून तो सामान्य जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडू शकत नाही. सध्या त्यांचे आंदोलन सोशल मीडियापुरतेच मर्यादित राहिले आहे. इंडिया आघाडीला आता इतर नव्या राजकीय पर्यायांकडून स्पर्धा निर्माण होत असल्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्याकडून अशा बैठका आणि प्रयत्न सुरू आहेत. दिलीप बनसोड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर त्याबाबत विचार केला जाऊ शकतो. त्यांनी अधिकृतरीत्या विनंती केली असती, तर त्यावर चर्चा झाली असती. त्यांनी खरोखर निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असता, तर त्याबाबत पक्षाने गांभीर्याने विचार केला असता. मात्र, त्यांच्या नेतृत्वाबद्दल आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यांनी आपले पदही गमावले आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा असते. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. पक्षाची संघटना सातत्याने जनतेसाठी काम करत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत केली जात आहे. हे सरकार सामान्य जनतेचे सरकार आहे. आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन-तृतीयांशपेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे.0
0
Report
इंडिया आघाडी बैठक: महंगाई और बेरोजगारी से देशभर में आक्रोश
Nagpur, Maharashtra:नागपूर - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते - On इंडिया आघाडी बैठक - - इंडिया आघाडीचे आजची बैठक अतिशय महत्त्वपूर्ण अशी बैठक आहे, देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालं, देशात तरुणांमध्ये असलेला आक्रोश आणि आक्रोश, महागाईच्या विळख्यात हा संपूर्ण देश सापडला आहे, डिझेल पेट्रोलचे दर दररोज वाढत आहेत भारताची अर्थव्यवस्था कोलमडली आहे रिझर्व बँक खाली केली जात आहे, - अशा स्थितीत तरुण रस्त्यावर उतरला आणि जिकडेतिकडे देशात हाहाकार पसरण्याची स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे या सगळ्यावर चर्चा करून या देशातून सगळ्यांना वाचवणार यासाठी इंडिया आघाडी कडून चर्चा केली जाणार आहे - विविध प्रश्नावर या ठिकाणी चर्चा होईल आणि इंडिया आघाडी एकत्रितपणे मजबुतीने राहुलजींच्या नेतृत्वात ती पुढे जाईल आणि या देशावर आलेल्या संकट आहे त्या संकटावर तोडगा काढण्याचे काम इंडिया आघाडी करेल, यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे On सीएम सर्वपक्षीय बैठक मागणी - - आपण सगळे बघत आहोत की अल निनो मुळे प्रचंड भयावह परिस्थिती निर्माण होईल अशी परिस्थिती आहे, यावेळी पावसाचा अंदाज अत्यल्प दाखवण्यात आला आहे म्हणूनच या सगळ्यावर या परिस्थितीत देशापुढे पुढे जे काही प्रश्न आहेत - 22 जून पासून राज्याचे पावसाळी अधिवेशन आहे, मात्र आता कांद्यापासून अवकाळी पावसामुळे झालेलं शेतकऱ्यांच नुकसान, मुंबईत दहा टक्के पाणी कपात सुरू झाले आहे, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी हे सगळे विषय घेऊन एक तातडीची सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे आणि महाराष्ट्रातील सद्यस्थिती आणि त्यावर चर्चा केली पाहिजे अशी महाराष्ट्रात परिस्थिती आहे On भुजबळ नाराजी - - ज्या परिस्थितीत भुजबळ आहेत त्यांना मंत्रीपद सोडायची इच्छा नसेल, राष्ट्रवादीत काय सुरू आहे यावर बोलण्याचा माझा अधिकार नाही, मात्र अजित दादांच्या राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय याचा अंदाज सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना आला आहे - आज अशी राजकीय परिस्थिती आहे की राज्याचे मुख्यमंत्रीच ठरवतात की कोणत्या पक्षाचा माणूस कुठे गेला पाहिजे, तो अधिकार त्या पक्षांकडे किती आहे यावर हे महाराष्ट्रात चर्चा आहे, सत्तेमध्ये सहभागी असलेल्या पक्षांचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्री महोदय घेतात, त्यांच्या नेत्यांना कुठे ठेवावे हे जबाबदारी द्यावी, कोणाला कुठे पाठवावं या परिस्थितीत भुजबळ साहेबांकडे जे फडणवीस साहेब चर्चा करून सांगतील तेच भुजबळ साहेबांना सुद्धा स्वीकारावा लागेल असं एकूण पूर्ण राजकीय वातावरण आहे On बच्चू कडू आमचा मुख्यमंत्री - - मुख्यमंत्री कोण होईल येणारा काळ सांगेल, पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यानेच हे सरकार आलं हे काही लपून राहिले नाही, त्यांनी लाडकी बहीण आणि विविध योजना आणल्या, सरकारी तिजोरीतून एका एका कुटुंबात 30 हजार 40 हजार तर कोणाच्या कुटुंबात लाख रुपये गेले - त्यावेळी सरकार आणण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा श्रेय होता कारण ते मुख्यमंत्री होते, पण आज जे काही सांगितलं जातं की मंत्र्यांना ठोकून काढा चुकलं तर, आमचे तर मंत्री नाही त्यांचेच मंत्री आहेत आणि त्याचा इशारा ते देत असतील तर त्याची सुरुवात लोकांना सांगण्यापेक्षा बच्चू कडून करावी On कर्जमाफी - - शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी नाही ही अटी आणि शर्ती लावून दिलेली कर्जमाफी आहे, तीन लाख दिल्याशिवाय दोन लाख मिळणार नाही, अशा सगळ्या मध्ये फार तर पंधरा-वीस लाखाच्या घरात हा आकडा जाईल तो आकडा फोन सांगितला जात आहे या कर्जमाफीच्या फायदा शेतकऱ्यांना होणार नाही ही बनवाबनवी ची कर्जमाफी आहे - काल भाजपच्या प्रवक्त्याने सांगितलं की शरद पवारांकडे ते बोट दाखवतात, एका झटक्यात मनमोहन सिंह यांनी 76 हजार कोटींचा कर्जमाफ करून टाकला होता, कोणाच्या काळात कोणाची कर्जमाफी झाले हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ठाऊक आहे - सरकारच्या जमिनी अदानीच्या घशात घालण्यापेक्षा त्याचं ओपन ओक्शन करा आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा On एलपीजी दरवाढ - - हीच सरकारची उपलब्ध आहे की आधी चुली बनवून गॅसवर आणला, एक-दीड महिन्यात सिलेंडरचे हेच दर दीड हजारावर येतील, हे पुन्हा चुलीकडे आणतील, सामान्य माणूस चुलीवर स्वयंपाक करून डोळ्यात धур घालून डोळ्यातील अश्रू पुन्हा वाहतील अशी On अशोक गेहलोत - - वरच्या लेव्हलचा विषय आहे, मला माहिती नाही, मी खालचा कार्यकर्ता आहे, ती परिस्थिती केंद्रस्तरावर काय झालं याचे उत्तर माझ्याकडे नाही0
0
Report
Advertisement
