411037
पुण्यात 33 गावे विकणे आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा
Pune, Maharashtra:पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नागपुर में अज्ञात युवक की हत्या, फोटो वायरल से पहचान के बाद जांच तेज
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूरच्या एमआईडीसी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत इसासनी आधार नगरी जवळ अज्ञात युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना पुढे आली... - आकाश कृष्णा बरडे असे मयताचे नाव आहे. - सुरवातीला मृतकची ओळख पटत नसल्याने फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या भागातील काही कंत्राटदार, मजूर यांना पाठवले. पोलिसांची ही ट्रिक कामी आली. - दुपारी पोलीस ठाण्यात मयताची पत्नी पल्लवी आली आणि फोटोतील व्यक्ती तिचे पती असल्याचे सांगितले. तिचा पती बुधवारी सायंकाळी घरून बाहेर पडला मात्र रात्री घरी आलाच नाही असे तिने सांगितले. - पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून शोधण्यासाठी टीम तयार केल्या आहेत.0
0
Report
सातारा में फडणवीस की सभा, 15,000 लाभार्थियों के साथ प्रधानमंत्री आवास योजना पर जोर
Satara, Maharashtra:अँकर-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी मेळावा साताऱ्यातील सैनिक स्कूल ग्राउंड येथे पार पडत आहे. मोठी जय्यत तयारी या सभेच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पहिल्यांदा 50000 लाभार्थ्यांना या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं होत परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचे जे आवाहन केले आहे त्याला प्रतिसाद देत आता केवळ 15000 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या ठिकाणी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे. साताऱ्यातील सैनिक स्कुल परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी0
0
Report
कांग्रेस का जलसमाधि आंदोलन: भंडारा-गोंदिया में किसानों की मांगों पर सरकार की लापरवाही
Bhandara, Maharashtra:भंडारा-गोंदिया जिल्ह्यात शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे राज्य व केंद्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. जिल्ह्यातील विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी आज भंडारा येथील वैनगंगा नदीवर जलसमाधी आंदोलन केले जाणार आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी, कामगार, युवक आणि सर्वसामान्य नागरीक विविध गंभीर समस्यांच्या विळख्यात अडकलेले आहेत. शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे राज्य व केंद्र सरकारकडे वेळोवेळी लक्ष वेधले. मात्र त्यांच्या प्रश्नांकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कष्ट, घाम आणि आशा घेऊन त्यांचा धान खरेदी केंद्राबाहेर पडलेला आहे. परंतु शासनाकडून धानाची खरेदी होत नाही. खरेदी लेल्या धानाचा चुकाराही देत नाही. बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. पिकविम्याची रक्कम दिली गेली जात नाही. ही परिस्थिती अत्यंत वेदनादायी आहे. शेतकऱ्यांचे धान खरेदी करायचे याचे नियम शासनाने निश्चित केले. मात्र आज नोंदणीकृत शेतकऱ्यांकडूनच धान खरेदी करण्यास सरकार नकार देत आहे. एकीकडे उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन दिले जाते तर दुसरीकडे धान खरेदी लिमिट वाढवायची नाही असा दुर्दैवी प्रकार राज्य सरकारकडून सुरू आहे. जिल्ह्यात होणाऱ्याधान उत्पादनाची पूर्व कल्पना राज्य सरकारला असूनही केंद्र सरकारकडे आवश्यक शिफारस केली नाही. भाजपचे नेते शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. म्हणून आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेऊन जलसमाधी आंदोलन काँग्रेसच्या वतीने करण्यात येणार आहे…0
0
Report
Advertisement
७ वर्ष से फरार ठग चंद्रकुमार सोनी गिरफ्तार; भंडारा पुलिस ने गिरफ्तार किया
Bhandara, Maharashtra:७ वर्षापासून फरार फसवणूकीतील आरोपीला अटक 'गुरुनानक ज्वेलर्स' या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून ग्राहकांची १७ लाख रुपयांनी फसवणूक करून फरार झालेल्या चंद्रकुमार आसनदास सोनी (वय ५५) याला भंडारा पोलिसांनी अखेर अटक केली. नागपूर ग्रामीण अंतर्गत हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तो पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये चंद्रकुमार सोनी आणि तोचा भाऊ मदनमोहन आसनदास सोनी (नागपूर) यांच्याविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला होता. मदनमोहनला २०२० मध्ये अटक झाली होती, मात्र चंद्रकुमार फरार होता. या काळात तो काही दिवस जयपूर (राजस्थान) येथे आश्रयाला गेला होता. चंद्रकुमार हा हिंगणा परिसरात लपून वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. भंडारा पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणाने त्याचा शोध लावला आणि हिंगणा पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त कारवाईत अटक केली.0
0
Report
छत्रपति शिवाजी महाराज की जयंती महामृत्युंजय मंदिर में रंगोली से खास अंदाज में मनाई गई
Yeola, Maharashtra:अँकर : येवला यहथील महामृत्युंजय मंदिरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी मंदिरातील नंदीभोवती शंभूराजांची आकर्षक व कलात्मक रांगोळी काढण्यात आली होती. या सुंदर रांगोळीने भाविकांचे व नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.0
0
Report
गर्मी के बाद शहर को 17 एमएलडी अतिरिक्त पानी, आपूर्ति में गैप घटेगा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील तीव्र पाणीटंचाई कमी करण्यासाठी मनपा उशिराने आता workआला है, उन्हाळा संपल्यावर जून महिन्यापासून पाणीपुरवठ्यात १७ एमएलडीने वाढ करण्याचा दावा मनपाने केला आहे. या वाढीव पाण्यामुळे शहराच्या पाणी वितरणातील किमान एक दिवसाचा गॅप कमी होणार असून, नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या ९०० मिमी व्यासाच्या योजनेतून शहराला २६ एमएलडी पाणी मिळत आहे. फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक मर्यादांमुळे पूर्ण क्षमतेने पाणी घेता येत नव्हते. मात्र, पालिकेने केलेल्या सुधारणांमुळे आता अतिरिक्त १७ एमएलडी पाणी उपलब्ध होईल.0
0
Report
Advertisement
उच्च अदालत ने महापालिका को साफ-सफाई मामले में जवाबदेही तय कर निधि विवरण मांगा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील कचरा नियमितपणे न उचलला जाणे आणि त्यावर योग्य प्रक्रिया न होणे या गंभीर बाबींची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महापालिकेला चांगलेच धारेवर धरले आहे. शेख इस्माईल यांनी ही जनहित याचिका दाखल केलेली आहे. सुनावणीदरम्यान धुळे-सोलापूर महामार्गावर गंधेली गावाजवळ कचरा टाकणाऱ्या कंत्राटदारावर काय कारवाई केली, याची विचारणा करत न्यायालयाने महापालिकेला याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली आहे. विशेष म्हणजे, न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे शासनाकडून प्राप्त झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीचा वापर नेमका कसा केला, याचा सविस्तर तपशीलही आता महापालिकेला न्यायालयासमोर ठेवावा लागणार आहे. केवळ कंत्राट देऊन महापालिका आपली जबाबदारी झटकू शकत नाही आणि कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांमध्ये जागृती करणे हे प्रशासनाचेच कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले.0
0
Report
चत्रपति संभाजीनगर में अवैध गर्भपात रोकथाम के लिए कड़ी कार्रवाई के निर्देश
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण चिंताजनकरित्या घटले असून, दर हजार मुलांमागे हे प्रमाण ८९७इतके खाली आले आहे. ही आकडेवारी जिल्ह्यासाठी अत्यंत अशोभनीय असून, अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपाताला आळा घालण्यासाठी प्रशासनाने आता धडक कारवाई करावी. विशेषतः डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या गोळ्या विकणाऱ्या मेडिकल चालकांवर थेट गुन्हे दाखल करून त्यांच्या परवाने रद्द करा, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची वारंवार आणि कसून तपासणी करावी. तसेच जिल्ह्यात छुपे अवैध गर्भपात केंद्र चालवले जात असल्यास ते शोधून काढावेत. चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या गोळ्या विकणाऱ्यांवर कारवाई करा. तसेच या गोळ्या मेडिकलमध्ये उपलब्ध कशा होतात? त्या येतात कुठून ? याचे मूळ शोधून काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले आहेत0
0
Report
समर स्पेशल ट्रेनें: मडगांव जंक्शन से पनवेल के बीच साप्ताहिक सेवा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..(कोकण रेल्वे) मडगाव पनवेल मार्गावर समर स्पेशल ट्रेन.. कणकवलीसह रत्नागिरी,संगमेश्वर,चिपळूण,खेड ला थांबे.. अँकर उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेने 17 मे (रविवार) पासून मडगाव जंक्शन आणि पनवेल दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.. यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना मोठा अतिरिक्त फेरीमुळे दिलासा मिळणार आहे.. या प्रवासात गाडी करमळी,थीवी,सावंतवाडी,रोहा,कुडाळ,सिंधुदुर्ग,कणकवली,वैभववाडी,राजापूर,विलवडे,अडवली,रत्नागिरी,संगमेश्वर,चिपळूण,खेड,माणगाव, रोहा आणि पेण या स्थानकांवर थांबणार आहे..0
0
Report
Advertisement
Kolhapur Shahar ki Seema Vistaar: Ab Special Planning Authority ka Darja
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला आता विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला आहे. शासन निर्णय 12 मे रोजी काढण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर शहर हद्द वाढीचा प्रश्न तसाच प्रलंबित राहिला आहे. कोल्हापूर महानगरपालिका शेजारी गावांचा हद्दवाढीला तीव्र विरोध आहे. त्यामुळे 16 ऑगस्ट 2017 रोजी शहरालगत असणाऱ्या 42 गावांसाठी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. पण या प्राधिकरणाचा फारसा फायदा झाला नाही. निधीची कमतरता असल्याने प्राधिकरणातील गावामध्ये अपेक्षित विकास कामांना गती मिळाली नाही. त्यामुळे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब निदर्शनास आणून दिली, त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्र शासनाकडून विकास कामांसाठी निधी मिळेल या उद्देशाने नाशिक, पुणे या विकास प्राधिकरण धर्तीवर विशेष नागरिक क्षेत्र प्राधिकरणाचा दर्जा दिला.0
0
Report
रत्नागिरी में वाहनों की संख्या 30% बढ़ी, ईंधन आपूर्ति संकट बनी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल साडेपाच लाख वाहने... वाहनात वापरण्यासाठी चार लाख लिटर इंधन लागतं.. सुट्टीचा हंगाम असल्याने वाहनांच्या संख्येत 30 टक्क्यांनी वाढ.. रत्नागिरी जिल्ह्यात विविध प्रकारचे एकूण वाहने साडेपाच लाखांपेक्षा अधिक आहेत.या वाहनांसाठी भारत पेट्रोलियम,इंडियन ऑइल कार्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यातील ऑइल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा केला जातो. तसेच काही वाहने एलपीजी आणि सीएनजी गॅस वर धावतात.. सध्या या सर्व वाहनांना सुमारे चार लाख लिटर्सचा इंधन पुरवठा होत आहे..मात्र सध्या सुट्टीचा हंगाम असल्याने पर्यटन वाढले आहे.. परिणामी वाहनांच्या संख्येेत सुमारे 30% वाढ झाल्याने आता इंधन पुरवठाही अपूरा पडू लागला आहे..0
0
Report
112 मदद कॉल पर ढील: कलमनुरी थाने के कर्मी का तत्काल निलंबन
Hingoli, Maharashtra:अँकर - डायल 112 वर मदतीसाठी कॉल आल्यानंतर घटनास्थळी वेळेेत न पोहोचल्यामुळे कळमनुरी पोलीस ठाण्यातील एका अंमलदाराला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे त्यांच्या निलंबनाचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ, निलाभ रोहन यांनी काढले आहेत हिंगोली जिल्ह्यातील १३ पोलीस ठाणे अंतर्गत प्रत्येक गाव मधून मदतीसाठी डायल 112 या क्रमांकावर कॉल आल्यास पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी पोहोचणे अपेक्षित असतानाही अमलदाराने याकडे दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे...0
0
Report
Advertisement
मावळ की ऐतिहासिक भूमि पर शिवकालीन युद्धकला की धूम, छत्रपति संभाजी महाराज जयंती
Varsoli, Maharashtra:धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत मावळच्या ऐतिहासिक भूमीत शिवकालीन युद्धकलेचा जयघोष घुमला आहे. सरसेनापती खंडेराव दाभाडे आणि उमाबाईसाहेब दाभाडे यांच्या भूमीत आयोजित युद्धकला उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला लहान मुला मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसला. शस्त्रपूजन मानाची तलवार आणि शिवकालीन पराक्रमाचा इतिहास यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला.छत्रपतींचा इतिहास फक्त वाचायचा नाही तर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असा संदेश या शिबिरातून देण्यात आला.0
0
Report
नाशिक में 4 माह की बच्ची उष्माघात से मृत्यु, विवाह समारोह में गर्मी का असर
Nashik, Maharashtra:नाशिक में 4 माह की चिमुरडी की दुर्दैवी मृत्यु. उष्माघात से चार माह की चिमुरडी की मृत्यु होने की प्राथमिक जानकारी. इंदापुर से लग्न के लिए काटेकर परिवार आए थे. निजी ट्रॅवल्स के माध्यम से यात्रा के दौरान गर्मी से मौत की चर्चा. नाशिकरोड के सामनगाव रोड परिसर स्थित लॉन में विवाह समारोह था. सुबह माँ को बेटी बेहोशी हालत में मिली; अस्पताल में दाखिल करते पर डॉक्टरों ने मृत्यु घोषित कर दी. मृत चिमुरडी की माँ प्रतीक्षा काटेकर महाराष्ट्र पुलिस दल के लिए चयनित हो चुकी हैं. बच्ची के उम्र के कारण सेवाकाल में भर्ती होने के लिए समय भी लिया गया था. चार माह की बच्ची की उष्माघात से मृत्यु. राज्य में तापमान बढ़ने से उष्माघात का खतरा बढ़ा. नाशिक रोड थाने में आकस्मिक मृत्यु दर्ज.0
0
Report
रायगढ़ जिला परिषद ने 45 कर्मियों को उनकी मूल जगह लौटने के निर्देश जारी किए
Chendhare, Maharashtra:प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची घरवापसी होणार रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष ... प्रतिनियुक्तीवरील ४५ कर्मचाऱ्यांना परत बोलावले गेले. आवडीच्या ठिकाणी चिकटून बसेलेल्या कर्मचाऱ्यांची गोची. अँकर - प्रतिनियुक्तीवर वर्षानुवर्षे असलेल्या रायगड जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची घरवापसी होणार आहे. त्यामुळे आपल्या आवडीच्या ठिकाणी चिकटून बसलेल्या कर्मचाऱ्यांची गोची झाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी तसे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने प्रतिनियुक्तीवर असलेल्या तब्बल ४५ कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुळ नेमणूक कार्यालयात परत हजर होण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात राज्य सरकार आणि विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.0
0
Report
Advertisement
