icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

तीन महीनों से आतंक मचाने वाला पट्टेदार बाघ आखिर वन विभाग ने जेरबंद किया

Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरी, सावरी आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून दहशत निर्माण करणाऱ्या पट्टेदार वाघाला अखेर वनविभागाने यशस्वीरित्या जेरबंद केले. या वाघाच्या सततच्या वावरामुळे परिसरातील शेतकरी, नागरिक आणि शेतमजूर भयभीत झाले होते. जवाहरनगर ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात तसेच सालेबर्डी–सावरी मार्गावर अनेक वेळा वाघाचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या वाघाने पेवठा परिसरातील शेतकऱ्यांच्या बैलांवर हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. अनेक गावांमध्ये जनावरे चारण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. अखेर वनविभागाने रात्री रेस्कु करून वाघाला जेरबंद केले...
0
0
Report

नागपुर-जबलपुर NH 44 पर पवनी के पास अज्ञात वाहन ने बाघ को मार डाला

Nagpur, Maharashtra:नागपूर–जबलपूर राष्ट्रिय महामार्गावर पवनीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झालाय. नागपूर–जबलपूर राष्ट्रिय महामार्ग क्रमांक ४४ वर पवनी वनपरिक्षेत्र हद्दीत काल पहाटे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने नर बिबट्याला जोरदार धडक दिली. या अपघातात बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृत बिबट्याचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून वन विभाग आणि संबंधित यंत्रणा तपास करत आहेत.
0
0
Report

महाराष्ट्र: नकली बीज घोटाला, किसानो को धोखा देने वाले बूस्टर प्लांट जेनेटिक्स के खिलाफ एफआईआर

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाभुळगाव पोलीस स्टेशन मध्ये बनावट व निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणे विक्री प्रकरणी 'बूस्टर प्लॅंट जेनेटिक्स' कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांची विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातल्या गेवराई बाजार येथील 'बूस्टर प्लॅंट जेनेटिक्स प्रा. लिमिटेड' या कंपनीला दणका देत बियाणे निरीक्षक तथा कृषी अधिकारी दत्तात्रय तमलवाड यांनी रीतसर कायदेशीर फिर्याद नोंदवली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार, कंपनीने बियाण्यांच्या बॅगवर "BEST QUALITY GUARANTEED 100% SATISFACTION" असा मोठा दावा केला होता. मात्र प्रत्यक्ष पाहणीत बियाणे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले. प्रयोगशाळेच्या पडताळणी अहवालात हे बियाणे 'अप्रमाणित' असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यासाठी संबंधित कंपन्या आणि कृषी अधिकाऱ्यांचे साटेलोटे असून कृषी अधिकारी प्रत्येक कृषी केंद्राकडून पैसे उकळतात असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी केला आहे.
0
0
Report
Advertisement

राम मंदिर निधी पर सवाल: खेड में शिवसेना के नेताओं का तीखा विरोध

Shirur, Maharashtra:अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या देणग्यांवरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. श्रीराम मंदिर ट्रस्टने हजारो कोटींच्या निधीचा आणि भक्तांनी दिलेल्या सोन्या-चांदीच्या दानाचा कोणताही हिशोब ठेवलेला नाही, असा गंभीर आरोप करत खेड तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. सामान्य जनतेच्या पैशांवर आणि श्रद्धेवर हा एक प्रकारे दरोडाच टाकण्यात आलाय, असा घणाघात करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्थानिक हनुमान मंदिरामध्ये रामरक्षा पठण आणि हनुमान आरती करून या सरकारचा तीव्र निषेध नोंदवला. 'आमच्या श्रद्धेचा आणि पैशांचा हिशोब द्या', अशी मागणी यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी लावून धरली.
0
0
Report

खंडाळा घाट पर बस में आग, 43 यात्री सुरक्षित बाहर निकले

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पुसद तालुक्यातील खंडाळा घाटात एस टी महामंडळाच्या बसला अचानक आग लागली, आणि एकच धावा धाव झाली. पुसद-अकोलाधावणाऱ्या या बसमधील 43 प्रवासी घडलेल्या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. पुसद आगारातून ही बस निघाल्यानंतर खंडाळा घाटात बस मध्ये अचानक आग लागली. बसमध्ये 43 प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना तातडीने बसमधून सुरक्षित बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत एसटी बसचे समोरील केबिन पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

घोटी टोल पर हमला: गाड़ी रोके जाने और रॉड से हमला, पुलिस कार्रवाई

Nashik, Maharashtra:पूनम भागवत - - भावली धबधब्यावर १२ तारखेला फिरायला गेलो होतो - बिर्याणी घेऊन जेवलो, पाण्यात गेलो होतो - भिजल्यानंतर कपडे बदलायला गेले होते - तिथल्या तरुणांनी शिट्टी वाजवली आणि कमेंट पास केली - नंतर माझे पती आले त्यांनी त्यांना रागावले - आम्ही दादागिरी केली नाही, त्यांनी शिवीगाळ केली - नंतर आम्ही पण शिवीगाळ केली - ग्रामस्थांनी आमचा वाद सोडविला थोडी हातपायी झाली - नंतर काही लोकांनी बघतो म्हणून इशारा केला - बलोनो गाडीवरून आले आणि पाहिला हल्ला केला - नंतर दुचाकीवर आले आणि लोखंडी रॉडने हल्ला केला किरण भागवत - घोटी टोलवर पुन्हा हल्ला केला - आम्ही टोल गेट तोडून पळालो - परत मुंबई साईडला पळायचा प्रयत्न केला - नंतर तो गाडीला लटकलेला होता - आम्ही त्याला गाडीपासून बाजूला करण्याचा प्रयत्न केला - पिंक कलरवर दिसलेल्या तरुणाने गाडी बंद केली - गाडी रिव्हर्स करतांना चैन गेली - आम्ही परत गाडी पळवली त्यावेळी पाचव्यांदा अटक केला - नंतर थेट आम्ही अंबड पोलीस स्टेशनला पोहचलो - इगतपुरी पोलिसांनी नंतर संपर्क केला आणि सहकार्य केलं - पंचनामा झाला आहे, पोलिसांनी सहकार्य केले - आपण कुत्र्याला दगड मारतांना विचार करतो - आम्ही थांबलो असतो तर कुणीतरी मेलं असतं - गाडीच्या सगळ्या काचा फोडल्या होता - गाडीत लहान मुलं होतं - पहिल्यांदा मारलं होतं ठीक होतं - तीस किलोमीटर पाठलाग करत - आमचा ज्यांच्यासोबत वाद झाला ते चार ते पाच - बाकी इतर वेगळे होते - ११२ ला कॉल केला होता - गाडी जशी पुढे जात होती तसे वेगवेगळ्या पोलिसांशी फोन करत होते - आम्ही अंबड पोलीस गाठलं आम्ही - पहिली काच फायटरने फोडली - नंतर रॉड आणि दगडांनी फोडली - पोलीस तिथं राऊंड मारतांना दिसले होते - स्थानिक लोकांमध्ये गुन्हेगारी वाढत आहे - बायकोचा वाद होतांना दिसला म्हणून मी गेलो - त्याला टपली मारली म्हंटल चल निग - नंतर मुलगा मध्ये आला म्हणून वाद वाढला - भावली डॅम धोकादायक झाला आहे - मुंबईच्या लोकांचा वाद झाला होता - फॅमिली चांगला वेळ घालावा यासाठी जातात पण त्यांचा - केस दाखल करू नका म्हणून दहा लाखांची ऑफर दिली होती
0
0
Report

कोथरुड में बदमाश गैंग का कोयता हमला, युवक गंभीर रूप से घायल

Pune, Maharashtra:कोथरुडमध्ये कुख्यात गुंड घायवळ टोळीचा राडा, तरुणावर फिल्मी स्टाईल कोयत्याने वार!!! पुणे- शहरातील कायदा सुव्यवस्था मजबूत असल्याचा दावा करणाऱ्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून फरार असलेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळच्या कोयताधारी टोळीने राडा घातला. मध्यवर्ती कोथरुड परिसरात कोयता गॅंगने तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना मंगळवारी (दि.१४) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोकण हॉटेलसमोर घडली आहे. ८ ते १० जणांच्या टोळक्याने तरुणाच्या डोक्यात कोयत्याने दोन वर्मी घाव घातले आहे. त्यामुळे तो गंभीरपणे जखमी झाला आहे. फिल्मी स्टाईल मुळशी पॅटर्न प्रमाणे धावपळ करत टोळक्याने तरुणावर वार केल्याने खळबळ उडाली आहे. अमित सुरेश शिंदे (वय ३५, रा. कोथरुड ) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासाला गती दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, फिल्मी स्टाईल कोयता हल्ल्यात अमित शिंदे हा तरुण गंभीरपणे जखमी झाला आहे. दरम्यान, एका कुख्यात टोळी प्रमुखाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यामुळे संबंधित टोळीशी निगडित असलेल्या साथीदारांनी तरुणाला भर रस्त्यात कोकण हॉटेलजवळ गाठले. हाताने मारहाण केल्यानंतर लपवलेले कोयते बाहेर काढून थेट हल्ला चढवला. कोयत्याचे दोन वार अमितच्या डोक्यात लागले असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर के पलसगाव जंगल में बेशुद्ध कर पकडते वक्त टाइगर की मौत; पोस्टमार्टम शुरू

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागातील पळसगाव जंगलात वाघाचा संशयास्पद मृत्यू, या हल्लेखोर वाघाला जेरबंद करून निसर्गमुक्त केल्यानंतर पुन्हा हल्ल्याचे वर्तन आढळल्यावर जेरबंद करण्याची सुरू होती कारवाई चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पळसगाव जंगलालगत लोकवस्तीच्या परिसरात आज एका वाघास बेशुद्ध करून जेरबंद केले जात असताना त्याचा मृत्यू झाला. मागील महिन्यात या वाघाच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. 28 जून रोजी चोरगाव परिसरात या वाघाने हल्ला करून एका शेतकऱ्याला ठार केले होते. प्रकल्पाच्या जलद प्रतिसाद दलाने ४ जुलै त्याला बेशुद्ध करून यशस्वीरित्या पकडले होते. त्यानंतर नियमानुसार वाघाला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात सोडण्यात आले होते. मात्र, त्यानंतर या वाघाने कोणत्याही वन्यप्राण्याची शिकार न करता पुन्हा पळसगाव वनक्षेत्रातील लोकवस्तीच्या परिसरात वावर सुरू केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून संबंधित वाघाच्या हालचालींवर वन विभागामार्फत सातत्याने लक्ष ठेवण्यात येत होते. आज या वाघाला आमिष बांधून पकडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार वाघास बेशुद्ध करण्याची कार्यवाही सुरू असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. या वाघाचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्याचा सविस्तर अहवाल मागविण्यात येत आहे. हा वाघ अशक्त दिसत होता. त्यातच बेशुद्धीच्या इंजेक्शनची मात्रा अधिक झाल्याने मृत्यू ओढविला असल्याचे सांगितले जात आहे.
0
0
Report
Advertisement

संजय राऊत रामनगर राम मंदिर में रामरक्षा पठण, ऊर्जा और संघ-राजनीति पर चर्चा

Nagpur, Maharashtra:नागपूर: नागपूरात दाखल झाल्यानंतर शिवसेना UBT नेते, खासदार संजय राऊत लगेच रामनगर राम मंदिरात पोहोचले आणि राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रवि वाघमारे यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर संजय राऊत यांचा रामरक्षा पठण या मंदिरातच होईल अशी प्रतिक्रिया दिली गेली. रामनगर राम मंदिरात प्रवेश करताच मी रामाच्या प्रेमात पडलो, येथे सकारात्मक ऊर्जा असल्याची भावना व्यक्त केली. आम्ही राम रक्षा पठणच करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा संघाचे पदाधिकारी असतील तर सुद्धा आम्ही निमंत्रण देणार. राम सर्वांचे आहे; नेते आल्याजात राहतील, परंतु कार्यकर्ते राम रक्षा पठणात येतील. रामनगर राम मंदिरात रामरक्षा पठण करण्यास कोणतीही हरकत नाही परंतु मंदिराबाहेर नसून प्रभु श्रीरामांसमोरच व्हावे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सत्काराचे आश्वासन देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शांततेत होणार आहे. शिवसेनेचे विदर्भातून ४-५ हजार कार्यकर्ते येण्याची शक्यता व्यक्त केली गेली.
0
0
Report

एसआईआर सर्वेक्षण के दौरान 68 वर्षीय वृद्ध महिला की मौत, परिजनों ने अधिकारी पर आरोप

Mumbai, Maharashtra:मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील माऊंट मेरी परिसरात एसआयआर सर्वेक्षणादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. ६८ वर्षीय एका वृद्ध महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला असून, मृत महिलेच्या कुटुंबीयांनी सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एसआयआर सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी संबंधित ६८ वर्षीय महिलेला पहिल्या मजल्यावर येण्यास सांगितले. वृद्धापकाळामुळे चालण्यात अडचण असूनही त्या पायऱ्या चढून पहिल्या मजल्यावर गेल्या. त्यानंतर त्यांना अचानक चक्कर आली आणि रक्तदाब वाढल्याने त्या जागीच पडल्या उपस्थितांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, अधिकाऱ्यांनी वृद्ध महिलेची शारीरिक परिस्थिती लक्षात न घेता त्यांना वर बोलावल्यामुळे हा प्रकार घडला. त्यामुळे संबंधित बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
0
0
Report

चंद्रपूर में नाबालिग दुचाकी चालकों के अभिभावकों को पुलिस ने कड़ी फटकार दी

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेत आज चक्क अल्पवयीन दुचाकीस्वार आणि त्यांच्या पालकांचा पोलीस अधीक्षकांनी क्लासच घेतला. मागील आठवडाभरात वाहतूक नियंत्रण शाखेने चंद्रपूर शहर- जिल्ह्यात मिशन मोडवर कारवाई करत दुचाकी चालवणाऱ्या 65 अल्पवयीन मुला-मुली विरोधात कारवाया केल्या. चंद्रपूर जिल्ह्यात दररोज रस्ते अपघातात एक मृत्यू ओढवत आहे. यामुळे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी वाहतूक नियंत्रण शाखेला यावर नियंत्रण आणण्याची कामगिरी सोपविली. वाहतूक नियंत्रण शाखेच्या आवारात पोलीस अधीक्षकांनी अल्पवयीन दुचाकी चालवणारे मुले- मुली आणि त्यांच्या पालकांना या संदर्भातले कायदे, गुन्हा घडल्यास उद्भवणारी स्थिती आणि 25 हजार रु. चा जबर दंड याबाबत सविस्तर माहिती दिली. आपल्या, रस्त्यावरील नागरिकांच्या आणि पालकांसाठी अल्पवयीन मुला-मुलींना दुचाकी चालवायला देऊ नका असे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top