पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरळी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बॅनरबाजी करून महापालिकेत समाविष्ट 33 गावांचे विक्रीच्या विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या जास्त करामुळे गाव विकण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.