Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

संगमनेर में जनआक्रोश मोर्चा, आदिवासी महिला मामले में कार्रवाई की मांग

KJKunal Jamdade
Oct 13, 2025 05:34:11
Shirdi, Maharashtra
संगमनेर तालुक्यात आज जनआक्रोश मोर्चा.. घारगाव येथील आदिवासी महिलेवरील अत्याचारप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाचा मोर्चा.. राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) आमदार संग्राम जगताप आणि शिवसेना आमदार अमोल खताळ राहणार उपस्थित.. अजित पवार यांच्या नोटीसीनंतर आज संग्राम जगताप काय भूमिका मांडतात याकडे लक्ष.. मोर्चास्थळाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Oct 13, 2025 07:19:41
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘सायबर जनजागृती सायकल रॅलीचे’ आयोजन, गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ऑक्टोंबर 2025 या संपूर्ण महिन्यात करण्यात येणार विविध सायबर जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन अँकर:–गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘सायबर जनजागृती सायकल रॅलीचे’ आयोजन करण्यात आले. दिवसेंदिवस सायबर अपराधांचे तसेच इंटरनेट व समाज माध्यमांद्वारे फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. यावर आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय आणि I4C (Indian Cyber Crime Coordination Centre) यांच्या मार्गदर्शनाखाली, ऑक्टोबर 2025 हा महिना ‘सायबर जनजागृती महिना’ म्हणून संपूर्ण देशभरातील सर्व जिल्ह्रामध्ये साजरा करण्यात येत आहे. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून ‘सायबर जनजागृती सायकल रॅलीचे’ आयोजन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले. सायकल रॅलीचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये सायबर सुरक्षा, सायबर फसवणूक प्रतिबंध आणि डिजिटल साधनांचा सुरक्षित वापर याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. तसेच वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे सायबर गुन्ह्रांचे प्रमाण देखील वाढत असून, प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून स्वतःची माहिती सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या महिन्यात विविध जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा, शाळा-महाविद्यालयांमधील जनजागृती मोहिम, ऑनलाईन वेबिनार्स तसेच सोशल मिडियावरील प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे. आशीष अंबाडे झी मीडिया गडचिरोली
1
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 13, 2025 07:18:13
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:केरे पत्रकार परिषद स्वतः मुख्यमंत्री सांगताय, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, विखे पाटील ही सांगतात ओबीसी आंदोलनाला धक्का लागत नाहीय तरी मराठा ओबीसी वाद का लावताय सरकार ला सांगतो नव्या जी आर मध्ये नोंदी असलेल्याना फक्त प्रणापत्र मिळेल म्हणजे मराठा आरक्षण विष्यब संपला नाहीय त्‍यामुळं दिवाळी नंतर आम्ही दिल्ली ला उपोषण करणार आहोत... मराठा ओबीसी वाद होऊ नये म्हणून ठोक मोर्चा पुढाकार घेतील आणि मराठा ओबीसी वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेईल हाके वाईट बोलतोय म्हणून त्याचे पोस्टर लावले , भुजहबळ वडेट्टीवार यांचे लावले नाही जरांगे पाटलांना विनंती आहे आपला लढा सरकार विरोधात आहे, लक्षात असू द्या..पाटलांना विनंती आहे त्यांनी शिवीगाळ करू नये... जी आर मध्ये लिहले आहे, नोंदी असणाऱ्या लोकांना प्रमाणपत्र मिळेल, जी आर मुळे फक्त नोंदी असणाऱ्या लोकांना मिळणार आहे.... त्यामुळं आरक्षण युद्ध संपलेले नाही आम्ही लढा देणार दिल्लीत उपोषण करणार.... जरांगे यांच्या आंदोलनामुळे ज्यांना नोंदी होत्या त्यांच्याच प्रश्न सुटला अवघे 10 टक्के लोकांना प्रमाणपत्र मिळाले इतरांसाठी आमचे आंदोलन आहे 50 टक्के मर्यादा पूर्ण झाली आहे कायद्यात बदल केंद्र सरकारला आहे त्यांनी कायदा बदलल्यावर फक्त टिकणारे आरक्षण मिळेल
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 13, 2025 07:16:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलन रमेश केरे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत लक्ष्मण हाके वर हल्लाबोल चढवला. लक्ष्मण हाके chा कुत्र्याचं पोस्टर त्यांनी बनवलं. इतकच नाही तर कुत्र्याला बिस्कीट खाऊ घालत हाके चा निषेध केला. हाके ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण होते त्यामुळे याच्या भाषेचा आणि हाकेचा आम्ही निषेध करत असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. त्यांनी आपली शिवीगाळ करणारी भाषा बंद करावी अन्यथा हाकेंना हे जड जाईल असा इशाराही त्यांनी दिला. सोबतच मनोज जणांगे असलीच भाषा वापरत असतील तर त्यांनाही आम्ही विनंती करणार आहे की त्यांनी असल्या भाषेत बोलू नये असेही रमेश केरे पाटील म्हणाले. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही यासाठी दिल्लीत जाऊन आंदोलन करू. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे अवघे दहा टक्के मराठ्यांचा प्रश्न सुटला मात्र 90 टक्के लोकांचा बाकी आहे असेही केरे पाटील म्हणाले.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 13, 2025 07:05:05
Nagpur, Maharashtra:Ngp Samir Meghe live u ने फीड पाठवले ----------- नागपूर आ समीर मेघे - भाजपा नेते-हिंगणा येथील भाजपा आमदार (एकाच घरात 200 मतदार आरोप यावर प्रतिक्रिया) (मराठी 121 आणि हिंदी बाईट) - हे अत्यंत हास्यास्पद आरोप आहेत - जवळपास एकाच घरात दोनशे लोकांची नावे आहेत - स्थानिक नगरसेवक आहेत ते एक एक माणूस तिथे राहतो हे स्पष्ट करतो - जेंव्हा जेंव्हा निवडणूक येते त्यावेळी ते आरोप करतात - एकाच घर क्रमांकावर टाकले आहे - आमचे दोन मेघे कुटुंब गेल्या 25 ते 30 वर्षांपासून तिथे राहतात - माझ्याकडे 26 बंग कुटुंबातील लोकांची यादी आहे ही यादी खरी की खोटी ( राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आहे) - तसेच घोडमारे कुटुंबियांची देखील नावे आहेत ते तिथे न राहता ( राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आहे) - आता निवडणूक आली आहे, त्यामुळे पवार साहेबांच्या पक्षाचे नेते करत आहेत - बंग साहेब आमदार आणि मंत्री होते त्यांनी तिथे काय विकासकामे केली हे लोकांना माहीत आहे - जी चूक झाली आहे ती प्रशासकीय बाब आहे - प्रत्येक गोष्ट भरल्यावर तो फॉर्म स्वीकारण्यात येतो - हे दोनशे लोक तिथे राहतात फक्त घर क्रमांक एक दिला आहे - ती प्रशासकीय बाब आहे - 2019 च्या निवडणुकीनन्तर माझ्यावर निवडणूक याचिका टाकण्यात आली होती - या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले पाहिजे
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 13, 2025 07:01:40
Chandrapur, Maharashtra:तब्बल सात वर्षानंतर चंद्रपूर शहरात शिर्डी येथून श्री साईबाबांच्या चर्मपादुका दाखल झाल्या आहेत. नवीन चंद्रपूर परिसरातील साईबाबा मंदिरात पादुका आगमनाच्या निमित्ताने मोठा सोहळा आयोजित करण्यात आलाय. चंद्रपुरात पादुका दाखल झाल्यानंतर मोठ्या संख्येत साई भक्तांनी पुष्पवर्षाव करत पादुकांचे दर्शन घेतले. नवीन चंद्रपूर परिसरातील साईबाबा मंदिरात रक्तदान शिबिर, विविध धार्मिक कार्यक्रम आणि साई सुमनांजली नामक सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. सुमारे 50 हजार साई भक्त कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे. यानंतर या चर्मपादुका रात्रीच्या मुक्कामानंतर गडचिरोलीला रवाना होणार आहेत.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Oct 13, 2025 06:48:44
Yeola, Maharashtra:मंत्री छगन भुजबळ पत्रकार परिषद.. मंत्री छगन भुजबळ On स्थानिक पातळीवर युती, मैत्रीपूर्ण लढती.. - मी वर्तमानपत्र यातून वाचले.. - तिन्ही पक्षांची युती होईलच असे नाही.. - तिथली परिस्थिती बघून निर्णय घेतील - काही ठिकाणी भाजप बाजूला असेल आणि शिंदे - अजित दादा युांची युती होईल.. - तर काही ठिकाणी भाजप व अजित दादा युती होईल शिंदे बाजूला असतील असेही होवू शकते..- स्थानिक पातळीवर काहीही होऊ शकते..मंत्री छगन भुजबळ On पालकमंत्री नाशिक जिल्हा ( महाजन - भुसे- महाजन, भुसे हे डोनाल्ड ट्रम्पकडे जाणार आहे का ?- मी काही एवढ्या लांब जाऊ शकत नाही..- मी आपला अजित पवार, देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे यांच्याकडे जाईल..- फार फार तर मोदी साहेबांकडे जाईल..- यापेक्षा लांब मी जाणार नाही..मंत्री छगन भुजबळ On गोपीचंद पडळकर वक्तव्य- असे काही वाक्य नाही..मी पुस्तक वाचणार आहे..मंत्री छगन भुजबळ On पडळकर वक्तव्य- मी टप्प्यात आणून कार्यक्रम करतो..- सुधाकर नाईक हे शिकारी होते तेव्हापासून या वाक्याचा वाद आहे..- शिकारी हा नाईक यांचा छंद- ते म्हणायचे टप्प्यात आल्याशिवाय कार्यक्रम करायचा नाही - सांगली लोकल वादळ आहे..- मंत्री छगन भुजबळ On रमेश पोडवाल यांची जमीन हडपली- मला त्याची कल्पना काही नाही- मंत्री छगन भुजबळ On ओबीसी बीड मोर्चा..- लोकशाही आहे, मला काही कळत नाही..- स्टेजवर मंत्र्यांनी जायचे नाही..हे कोण सांगणार- आंदोलन सगळ संपल्यावर मग जरांजे भेटीसाठी विखे पाटील कसे जाऊ शकता..- आम्ही कोणाच्या विरोधात बोलत नव्हतो, बोललो नाही..- आम्ही हायकोर्टात जाऊ, चॅलेंज करू त्यानंतर बघू..- आम्ही गप्प बसतो, - पण जरांगे माझे नाव घेऊन बोलतो, त्यामुळे मला बोलावे लागले...- मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे ही आमची भूमिका आहे..- मी मराठा आरक्षण विरोधी नाही..मंत्री छगन भुजबळ On छठ पूजा..- हा कार्यक्रम या वर्षाचा नाही..- अनेक वर्ष हा कार्यक्रम मुंबईमध्ये करतात.- युपी, चे लोक मुंबई शहरात आलेले आहे, आणखी काही शहरांमध्ये आहेत..तो धार्मिक कार्यक्रम आहे..- मंत्री छगन भुजबळ On कबूतर ( जैन मुनी..शांती पक्ष )- सध्या हत्ती, कुत्रे, कबूतर अशीच चर्चा आहे..- मला वाटत चिमणी पार्क, पोपट पार्क काढावा..- एक कावळा पार्क आहे तो दहाव्याच्या दिवशी लागतो, त्याचा ही पार्क करावा- मंत्री छगन भुजबळ On ठाकरे बंधू भेटी..- मला आणि माझ्या कुटुंबियांना या गोष्टीचा आनंद आहे- माझ्या मिसेस पण कुंदा वाहिनी त्यांच्या मैत्रिणी आहेत- ठाकरे घराण्यात ज्येष्ठ म्हणून कुंदा वाहिनी आहेत- मंत्री छगन भुजबळ On संग्राम जगताप...( सुप्रिया सुळे वक्तव्य )- त्याच्या त्या विधानाशी आम्ही सहमत नाही- एकाने चूक केली ती दुसऱ्याने नाही केली पाहिजे..- फुले, शाहू, आंबेडकर तत्वाचे आम्ही आहोत..- पक्षाचा फायदा होईल असे वक्तव्य त्यांनी करावे..- त्यांच्याविषयी आमचे अध्यक्ष अजित पवार हे बघतील-मंत्री छगन भुजबळ On सपकाळ..नथुराम- त्यात काही अर्थ नाही..मंत्री छगन भुजबळ On राजन विचारे, एकनाथ शिंदे यांचेवर आरोप एकनाथ शिंदे- मला काही माहिती नाही, -मंत्री छगन भुजबळ On आत्राम पराभूत- असे वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहे..- आमच्या पक्षातील काही लोकांनी जरांगेच्या सांगण्यानुसार प्रचार केला..- काही ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत..मंत्री छगन भुजबळ On शेतकरी - बच्चू कडू..- विरोधी पक्षातील काही नेते कडक भूमिका घेतात..- निवडणुका जवळ आल्या की सगळेच पक्ष विधाने करत असतात..काही फायदेचे बोलतात..मंत्री छगन भुجبळ On शिंदेंच्या योजना बंद..- आनंद शिधा यावेळी अडचणीत आहे..- लाडकी बहीण ४५ हजार कोटी रुपये खर्च..- सध्या नैसर्गिक आपत्तीत शेतकरी अडचणीत, ३२ हजार कोटी वाटायचे आहे..- त्यामुळे काही योजना अडचणीत आहे..- पुढच्या वेळी नक्की विचार करू...मंत्री छगन भुजबळ On मराठा ओबीसी वाद.. महाज्योती अजित पवार..विद्यार्थी आरोप- हे आरोप करतात..- बजेट मध्ये त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या जातील
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 13, 2025 06:20:15
Pune, Maharashtra:जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानाच्या वतीने महाराष्ट्रातील पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 11 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस सुपूर्द करण्यात आले. संस्थानचे अध्यक्ष व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज जालिंदर महाराज मोरे यांच्यासह विश्वस्त मंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे हा निधी सुपूर्द केला. या वर्षी अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. त्यांच्या पुनर्स्थापना आणि मदतीसाठी हा मदतीचा हातभार लावण्यात आला आहे. संस्थानने स्पष्ट केले की दीनदुबळ्या आणि पीडित जनतेची सेवा करणे हेच जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शिकवणीचे सार आहे आणि भविष्यातही सामाजिक गरजा ओळखून हे कार्य संस्थान मार्फत अखंडितपणे सुरू राहणार आहे.
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Oct 13, 2025 06:20:03
Mumbai, Maharashtra:संजय राऊत ऑन ठाणे मनसे-शिवसेना संयुक्त मोर्चा ठाण्यातला मनसे आणि शिवसेनेच्या मोर्चाच कारण स्पष्ट आहे, पद्धतीने मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात त्या महापालिका हद्दीत जे दंगेखोर, दरोडेखोर, भ्रष्टाचारी, जी लाचलूचपट सुरू आहे त्या विरुद्ध हा मोर्चा आहे महापालिकेच्या ज्या उपायुक्त वर एसीबीने कारवाई केली ते मिंदे पक्षाचे हस्तक होते मी मुख्यमंत्र्यांच अभिनंदन करतो त्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये जी गुंडगिरी विरोधात मोहीम सुरू केली आणि कोणाचाही मुलायजा न ठेवता, कोण कोणत्या पक्षाचा आहे याची फिकीर न करतात त्यांनी पोलीस आयुक्तांना जे आदेश दिलेले आहेत अशा प्रकारचे आदेश त्यांनी ठाणे जिल्ह्याच्या गुंडगिरी विरोधात देण गरजेचे आहे गणेश नाईक यांनी सुद्धा या रावण राज विरोधात आवाज उठवला, मी त्यांचंही अभिनंदन करील की त्यांनी ही सर्व हरामखोरी मोडून जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी त्यांनी जनता दरबार सुरू केला ऑन नाशिक पोलीस राजकीय गुंड कारवाई भाजप मधल्या नगरसेवकांना देखील मुख्यमंत्र्यांनी सोडलेलं नाही, ज्यांनी अलीकडच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केला अशा गुंडांच्या टोळीचा सुद्धा पोलीस आयुक्तांनी पूर्णपणे बिमोड करण्याचे धोरण स्वीकारला आहे नाशिक प्रमाणे कारवाई ठाण्यात देखील व्हावी ऑन पुणे टोळी,गुंडगिरी पुणे हे एक विद्येच माहेरघर, सांस्कृतिक शहर होतं, आज पुणे अजितदादा पवारांमुळे आणि नंतर भाजपच्या काही घटकांमुळे गुंडांचं माहेरघर झालेलं आहे कोयता गॅंग ही संकल्पना पुण्यातून बाहेर आली, पोलीस आयुक्त काय करत आहेत, पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडून प्रेरणा घ्यायला हवी राज्याच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे, पुण्यातील एक मंत्री केंद्रात आहेत, ज्या प्रकारे पुण्याची बदनामी सुरू आहे ही गंभीर बाब आहे, ठाणे इतकीच पुण्यात जबरदस्त गुंडगिरी सुरू आहे ऑन काँग्रेस बैठक राज ठाकरे युती निर्णय त्यांचं म्हणणं बरोबर आहे, आम्ही चर्चा करत आहोत, काल सुद्धा वेणू गोपाल यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे, राहुलजी आणि खर्गे यांच्याशी देखील चर्चा करु उद्याचं जे शिष्ट मंडळ आहे ते राजकीय शिष्ट मंडळ आहे हे हर्षवर्धन सकपाळ यांनी समजून घेतलं पाहिजे, हा विषय एका पक्षाचा नाही उद्या आम्ही सर्व पक्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना भेटत आहोत, निवेदन देऊन आम्ही चर्चा करणार आहोत, उद्या दुपारी दीड वाजता यशवंतराव प्रतिष्ठान मध्ये आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सकपाळ, राज ठाकरे, कॉम्रेड अजित नवले अशा सर्वांना आम्ही आमंत्रित केलं आहे आणि ते सर्व येत आहे हर्षवर्धन सकपाळ यांचा जो मुद्दा आहे की इंडिया आघाडी पक्षात नसलेले लोक त्यात आहेत, मग म्हणजे कोण आहेत, इथे इंडिया आघाडी पक्ष किंवा महाविकास आघाडी हा विषय नाही, आम्ही देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि इतर घटक पक्षांना देखील निमंत्रण दिल आहे, यात कोणी राजकारण आणू नये ऑन काँग्रेस राज ठाकरे दिल्ली निर्णय काँग्रेसच नेतृत्व दिल्लीत आहे, काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे निर्णय घ्यायचा कोणताही अधिकार नाही जस अजित पवार आणि एकनाथ शिंदे इथे निर्णय घेऊ शकत नाही, त्यांचा निर्णय अमित शहा घेतात दिल्लीत, काँग्रेसही तसंच आहे ऑन राज ठाकरे काँग्रेस युती ईच्छा स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे,कि आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेण गरजेचे आहे, त्यांची ही भूमिका आहे निर्णय नाही
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 13, 2025 05:46:53
Jalna, Maharashtra:जालना : भोकरदन नगर परिषदेच्या मतदार याद्यांमध्ये सावळा गोंधळ समोर आलाय. अनेक मतदारांची नावे ते राहत असलेल्या प्रभागा ऐवजी इतरत्र गेल्याने मतदार त्रस्त झाले आहेत. प्रारूप मतदार यादी बघून मतदारांचे आक्षेप मागविण्यात आले आहेत. यासाठी 13 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असून आतापर्यंत शेकडो नागरिकांनी आक्षेप दाखल केले आहेत. मतदार याद्या संदर्भात नगरपरिषद प्रशासन बीएलओचे नाव सांगत आहे. मात्र, शहरातील दहा प्रभागांची रचना आणि त्याप्रमाणे मतदार संख्या जुळविणे हे काम नगर परिषदेनेच केल्याचा आरोप आहे. नगरपरिषद प्रशासन ही चूक मात्र बीएलओची सांगत आहे. आगामी काही दिवसांत होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत भोकरदन शहरातील नागरिकांची नावे त्यांच्या रहिवासी प्रभागा ऐवजी दुसऱ्याच प्रभागात पळवण्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आतापर्यंत याबाबत 650 पेक्षा जास्त मतदारांनी याबाबत तक्रारी पालिका प्रशासनाकडे केल्या आहेत. भोकरदन नगर परिषदेच्या अंतिम मतदार यादीनुसार शहरात 20,916 मतदारांची संख्या आहे. नवीन प्रभाग रचनेप्रमाणे भोकरदन नगर परिषद निवडणुकीसाठी 20 प्रभाग करण्यात आले आहेत. 2016 च्या निवडणुकीत 17 नगरसेवक होते. आता 20 सदस्य संख्या झाली आहे. नवीन प्रभाग रचना ही नागरिकांना विश्वासात घेता करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. तसेच धक्कादायक प्रकार म्हणजे एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलं, सुना यांची नावे दुसऱ्याच प्रभागांमध्ये परस्पर टाकल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ज्या नागरिकांनी मतदार यादीमध्ये नाव बघितले त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. अनेक नागरिक याबाबतीत अजूनही अनभिज्ञ आहेत. दरम्यान, शहरातील मतदार यादी ही तत्कालीन बीएलओ यांनी बनवली होती. तर बहुतेश बीएलओ हे शिक्षक नगर परिषदेचे कर्मचारीही होते. त्यांच्या पैकी अनेकांच्या बदल्या झाल्याने तेथे आता दुसरे बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रभाग यादीतील नागरिकांच्या नावाच्या गोंधळाला जबाबदार कोण असा सवाल त्रस्त मतदारांनी केला आहे.दरम्यान, घटनास्थळी जाऊन पंचनामा केला जाऊन कारवाई केली जाईल असं मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी म्हटलं आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 13, 2025 05:46:06
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : रवींदर दंगेकर पहिले सुटारू होते आता एकनाथ शिंदेंकडे असल्यामुळे त्यांना शिस्तीत राहावे लागेल - प्रवीण दरेकर - ऑन वाढदिवस पूरग्रस्त मदत : - आज महाराष्ट्रतला शेतकरी उध्वस्त झालंय, जमिनी खरवडलं आहेत, गुरा-ढोराचं नुकसान झालं - त्यामुळे वाढदिवस उत्सव साजरा करणे मला संयुक्तिक वाटलं नाही - म्हणून धाराशिव जिल्ह्यातील वागेगव्हाण नावाचे गाव आहे, जिल्ह्याधिकाऱ्यांना विचारून त्या गावात आम्ही मदत करतोय - तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधतोय, तिथल्या परिस्थितीची पाहणी करून सरकारने दिलेली पॅकेजबद्दल माहिती देने - शेतकऱ्यांच्या सूचना या फडणवीस साहेबापर्यंत पोहोचवणे, या साठी आजचा दौरा करतोय - ऑन हर्षवर्धन सपकाळ : - एकदम एका मंडल अध्यक्ष एवढं पण हे नेतृत्व वाटतं नाही - त्यामुळे त्यांनी बोलणं हे महाराष्ट्रमध्ये कोण सिरीयस घेत नाही - अशा प्रकारे जर ते बोलले नसते तर त्याची बातमी देखील तुम्ही केली नसती - त्यामुळे असं कायतर वायफळ बोलायचं आणि बातमीत राहायचं, शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं यांचं काम आहे - देवेंद्रजी अशा वायफळ बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष देतं नाही, आम्ही ही देतं नाहीत - देवेंद्रजीची मोडस काय आहे हे महाराष्ट्र 20-25 वर्षांपासून पाहतोय - मागच्या पाच वर्षांमध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्य केलं त्याची कार्यपद्धत महाराष्ट्रला माहिती - दोन्ही पक्षाना सोबत घेत महाराष्ट्र विकासाकडे नेतायत हे सगळ्यांना माहिती आहे - सपकाळच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही आम्ही त्याची दखल घेत नाही - ऑन गोपीचंद पडळकर मुस्लिम : - मी काही ते विधान ऐकलेले नाही, तो संदर्भ तपासून मग मी यांसदर्भात बोलेन - ऑन कर्नाटक संघ बंदी : - देशहिताचे, राष्टभक्तीचे चांगले विषय असतील आणि त्याचं शिक्षण कुठं दिलं जातं असेल तर पोटात दुखायचे काही कारण नाही - शेवटी सरकारं हे देश हितासाठी, राष्ट्रभक्तीसाठी काम करतात - आणि जर चांगले विचार हे केवळ संघाच्यामाध्यमातून येतायत म्हणून नाक मुरडण्याचं कारण नाही, चांगल्या विचारांचे स्वागत केलं पाहिजे - ऑन एकनाथ शिंदे योजना : - घरं-संसार चालवताना बजट बघतो आणि त्याप्रमाणे नियोजन करतो - राज्यसरकार हे एक कुटुंब आहे, त्यांना कुटुंब चालवायचं असतो - ते चालवायचं असताना आजची प्रयोरिटी काय हे प्रयोरिटी बघून निर्णय होतात - शेतकरी आज उध्वस्त झालंय त्यामुळे त्यांच्यासाठी तीस हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलंय - लोकांच्या पैशातून लोकांना द्यायचं असतं, त्यामुळे काही योजना येतात, काही थांबतात, पुन्हा नव्याने सुरु होतात त्याचं राजकारण करण्याची गरज नाही - सगळ्या योजना पून्हा पुन्हा त्या ताकदीने जनतेसाठी असतील. B - ऑन संग्राम जगताप विधान : - त्याच्या मागच्या भावना ही स्वदेशीला महत्व द्या, आत्मनिर्भर व्हा त्यातून आलेली ती प्रतिक्रिया आहे - स्वदेशी करताना स्थानिक लोकांकडून स्थानिक वस्तू घ्या, ह्या देशात स्थानिक किंवा हिंदुस्थानमध्ये आपण हिंदू म्हणतो तसं ते हिंदूकडून घ्या असं म्हणाले असतील - त्यामुळे सर्वजण आत्मनिर्भर होतील अशा अनुषंगाने केलेले त्यांचे विधान असावे असं माझं आकलन आहे - ऑन संग्राम जगताप नोटीस : - अजित पवार हे त्याच्या प्रमुख आहेत. त्यांच्या आमदारांना काय करायचं त्यांचा लूकआउट आहे. त्याचे उत्तर काय मिळतं ते पाहू. - ऑन संग्राम जगताप भाजप निवडणूक : - आता तर आम्ही महायुतीत आहोत. मित्र पक्षाचा आमदार आमच्याकडून लढणार किंवा येणार हे संयुक्तिक नाही. - महायुती म्हणून आम्ही लढत आहोत आणि लढणार.. - मित्र पक्षाच्या आमदाराबाबतीत मी बोलणं उचित नाही. - ऑन नथुराम गोडसे वक्तव्य : - काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे डोके फिरले आहे. तेच माथे फिरू सारखे वल्गना आणि वक्तव्य करत आहे - एवढा बालिश आणि अपरिपक्व प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रने कधी पाहिला नाही.. - ऑन ठाकरे बंधू भेट : - ठाकरे बंधूंच्या भेटीचा अजिबात परिणाम होणार नाही - त्याचं कारण विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने जनाधार दिला आहे - मुंबईत महायुतीचे आमदार मोठ्या प्रमाणात निवडून आले आहे.. - मुंबई झपाट्याने बदलत आहे. मुंबईत मेट्रो रेल, कोस्टल रोड प्रकल्पांच्या माध्यमातून प्रगती होत आहे. यातून मुंबईचा चेहरा बदलत आहे. - ठाकरे यांना 30-35 वर्षे लोकांनी तपासला आहे. - यांनी ना बाळासाहेबांची विचारसरणी जोपासली. ना मुंबई आणि मराठी माणसांचे प्रेम राहिले* - मला आश्चर्य वाटतं. तसं काय युती, आघाडी महाराष्ट्रात कधी झालीच नाही. त्याच्याकडे पाहिलं जात आहे. - दोन भाऊ असणे स्वाभाविक आहे. दोन पक्ष आणि दोन नेते आहेत. ही लोकशाहीत असणारी प्रक्रिया आहे. - महायुतीत पण तीन आणि महाविकास आघाडीत पण तीन पक्ष आहेत. यात वेगळं काय घडत आहे. - वीस वर्षे झालं कुटुंब एकत्र नव्हतं ते जर एकत्र आले तर राजकीय दृष्ट्या काडीचाही परिणाम होणार नाही. - ऑन अंबादास दानवे : - आपण घर चालवत असताना उपलब्ध पैशाचे नियोजन करतो. - शेवटी सरकार चालवत असताना प्राधान्याचे विषय कुठले याचा विचार करून सरकार नियोजन करत असतात. - शेतकरी आज अडचणीत आहे त्यापेक्षा मोठं प्राधान्य आहे का? घराच्या घर उध्वस्त झाले आहेत. - शेतकऱ्याला जगायचं कसं हा प्रश्न आहे अशावेळी शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज दिलं असेल तर थोडा फार तान तिजोरीवर येतो. - मात्र पुन्हा हे सरकार योजना सुरळीत करेल. - ऑन वर्षा गायकवाड : - काँग्रेसची नाराजी असते जाते त्यांना वाटतं ते करतात. - नेत्यांच्या नाराजीचा काही नाही कारण जे हाय कमांडला वाटतं तेच होतं. - आम्हाला जे वाटतं तेच आम्ही करणार यातच काँग्रेसने अस्तित्व संपवून टाकलं. - ऑन वडेट्टीवार व्हायरल व्हिडीओ: - प्रत्येकाचं सोयीचं राजकारण सुरू आहे. जाते राजकारण होऊ नये. - सरकार योग्य भूमिका घेत असून सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करते. - मात्र काही लोकांना राजकीय दुकानदार करायच्या आहेत ते लोक आधी एक आणि आता एक अशी भूमिका घेत आहेत.* - विजय वडेट्टीवार हे जसं वारं वाहील त्याप्रमाणे वाहत असतात.* - ऑन बदलापूर शिंदे गट धक्का : - महायुतीच्या संदर्भात तीनही नेते, पक्ष आग्रही आहोत. ती आमची भूमिका आहे. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख म्हणून त्यांनी भूमिका स्पष्ट केली की महायुती म्हणून लढायचं आहे. - स्थानिक लेवलला सगळेच तुल्यबळ असतील तर सामोपचाराने त्या निवडणुका लढवल्या जातील. - मात्र कोणावर काही ठिकाणी होणार नाहीत अशी समंजस भूमिका तीनही पक्षांची आहे. - आमची सर्वांची मानसिकता सर्व ठिकाणी युती म्हणून लढायची आहे. - ऑन धर्मराव आत्राम : - भाजपने कुरघोडी केली याबाबत यांच्या बोलण्यातील सत्यता पडताळण्याची गरज आहे. - कोणी स्टेटमेंट दिलं की ते झालं असे मानायचं कारण नाही. - राजकारणात भाजपचा इतिहास तपासला तर सोबत राहून कधीच कुरघोड्या करणार नाहीत. - राज्याचे समंजस नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. महायुती सरकार चालवायचं असते तेव्हा सर्वांना विश्वासात घेऊन कामं करावं लागतं, देवेंद्र फडणवीस ते करत आहेत. - ऑन रवींद्र धंगेकर : - रवींद्र दंगेकरांना वेसन घालण्याची आवश्यकता होती. पहिले सुटारू होते आता एकनाथ शिंदेंकडे असल्यामुळे त्यांना शिस्तीत राहावे लागेल. - ऑन छटपूजा सवलती : - हिंदूंचे प्रत्येक सण उत्सव साजरे झाले पाहिजेत. - आपल्या उत्सवांनी ताण पडतो मात्र शेवटी ताण हाताळण्याची क्षमता मुंबई महापालिकेत आहे. - पूजा उत्सव करणाऱ्यांनी चांगलं नियोजन करून यंत्रणांवर ताण पडला नाही पाहिजे हे पहावं. Byte : प्रवीण दरेकर ( भाजप नेते)
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Oct 13, 2025 05:34:55
Beed, Maharashtra:बीड : आष्टीत हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, शरीराचे अनेक भाग गायब... परिसरात दहशतीचे वातावरण Anc : आष्टी तालुक्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. बावी दरेवाडी येथे हिंस्र प्राण्याच्या हैदोस पाहायला मिळाला आहे. गुरे चारण्यासाठी गेलेला राजू विश्वनाथ गोल्हार हा तरुण घरी परतलाच नाही. मात्र सकाळी त्याचा मृतदेह छिन्नविछिन्न अस्वस्थेत आढळून आला. त्याच्या शरीराचे अनेक भाग गायब दिसून आले. शिवाय शरीरावर दात आणि नखांचे व्रण आढळून आल्याने हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. सध्या त्याचा मृतदेह आष्टीच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच सदरचा प्रकार समोर येणार आहे. दरम्यान पाच वर्षापूर्वी याच परिसरात एका बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला चढवला होता. त्यात शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यामुळे हा हल्ला देखील बिबट्याने केला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय. दरम्यान या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून वन विभागाच्या पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top