Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

कल्याण-डोंबिवलीत ७ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांची चिंता वाढली!

ATISH BHOIR
Jun 28, 2025 06:04:34
Kalyan, Maharashtra
१ जुलैला कल्याण-डोंबिवलीत सात तास पाणीपुरवठा बंद टाटा पॉवरच्या कांबा उपकेंद्रात दुरुस्ती; नेतिवली-मोहिली केंद्रातून होणारा पाणीपुरवठा ठप्प कल्याण पूर्व, पश्चिम, ग्रामीण,डोंबिवली पूर्व-पश्चिमसह अनेक ठिकाणी परिणाम महावितरणकडून अधिकृत पत्राद्वारे माहिती Anc..कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा मंगळवार, १ जुलै रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी चार दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे या कालावधीत महावितरणकडून विद्युत पुरवठा केल्या जाणाऱ्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या १५० दशलक्ष लीटर मोहिली उदंचन केंद्र आणि मोहिली येथील १०० दशलक्ष लीटर जलशुद्धीकरण केंद्राला महावितरणकडून पाणी पुरवठा केला जातो. हा विद्युत पुरवठा टाटा पॉवरच्या कांबा येथील उपकेंद्रातून केला जातो. या उपकेंद्राच्या एनआरसी-२ फिडरमध्ये दुरुस्ती करावयाची असल्याने या दोन्ही जलशुध्दीरकरण केंद्रांचा पाणी पुरवठा पालिकेकडून बंद ठेवण्यात येणार आहे . हे दुरुस्तीचे काम सात तास केले जाणार असून. त्यामुळे नेतिवली, मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होणाऱ्या कल्याण ग्रामीण भागातील मांडा, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, मोहने आणि परिसरातील गावे, कल्याण पश्चिमेतील ब प्रभाग हद्दीतील मिलिंदनगर, योगीधाम, चिकनघर, बिर्ला महाविद्यालय परिसर, म्हाडा वसाहत, मुरबाड रस्ता परिसर, डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement