Back
पवनी शहरात पाण्याची पाइपलाईन फुटली, नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा!
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0407_BHA_WATER_ISSUE
FILE - 3 VIDEO
पवनी शहरातील पाण्याची पाइपलाईन फुटल्याने नागरिकांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा
Anchor :- भंडारा जिल्ह्याच्या पवनी शहरातील पाण्याची पाइपलाईन फुटल्याने नागरिकांना पुण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देत पवनी शहरात पाणी पुरवठा करण्याचे निर्देश दिले. यातून चार टँकरच्या माध्यमातून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर पवनी शहराची पाइपलाईन लवकरात लवकर दुरुस्त करावी असा सूचना देखील दिल्या आहेत....
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0407ZT_JALNA_MARHAN(1 FILE)
जालना | मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या वडिलांना बेदम मारहाण,चंदनझिरा पोलिसांत गुन्हा दाखल,2 संशयीतांना अटक
अँकर: जालन्यात मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे तिच्या वडीलाला लाठ्याकाठ्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे.जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी मधील ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रिसिडेन्सी मध्ये काल ही घटना घडली असून याप्रकरणी जालन्यातील चंदनझीरा पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीसह ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक देखील केली आहे.
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn khaire byte
feed by 2 c
*ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे पॉइंटर*
- मी मातोश्रीचा सैनिक आहे. बाळासाहेबांच्या तालमीत आम्ही तयार झालोय, दोन्ही भाऊ एकत्रित यावे सर्वांचीच इच्छा आहे.
- आज महाराष्ट्रात भ्रष्टाचार सुरू आहे. महाराष्ट्रात बदल पाहिजे. दोन्ही भाऊ एकत्र येत आहे याचा आनंद आहे.
- राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंच्या नेतृत्वात मी काम केले आहे..
- ठाकरे ब्रँड राहणार आहे. तो दिसून येईल.
- राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सोडली होती तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते चिमण्यांनो परत या...
- उदय सामंत दोन्ही भावासमोर कचरा आहे, तो संभ्रम निर्माण करतो.
ऑन राणेवर गंभीर आरोप...
- भाई कोळेकर हा शिवसेनेचा कार्यकर्त्या होता, त्याची हत्या झाली. तेंव्हा संपूर्ण गावात चर्चा होती राणेंनी त्यांची हत्या केली.. त्यावेळी मी कणकवलीच्या निवडणुकीत राणेंच्या विरोधात प्रचाराला गेलो होतो....
- आम्ही कणकवलीला गेलो होतो तेव्हा राणेंचा मुलगा जो बडबड करतो त्या नितेश राणेला मी धमकावले होते... त्यावेळी तो पोलिसांची गाडी घेऊन फिरत होता....
- राणे मुख्यमंत्री असताना नारायण राणे मला काढणार होते मात्र त्यावेळी राज ठाकरे आणि बाळासाहेबांनी मला काढू दिले नाही... मातोश्री आणि ठाकरे परिवाराचे माझ्यावर उपकार आहे.म्हणून मी एकनिष्ठ आहे.
- तुम्ही आणि तुमचे पोट्टे काय म्हणतात ते पाहा... मनोहर जोशींना बाजूंना करून राणेंना केले होते...
- देवा भाऊ यांना दोन भाऊ एकत्र यावं असे वाटत नव्हते... आतून त्यांना वाटत होते दोघे भाऊ एकत्र येऊ नये...
0
Share
Report
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_SENA_MNS_WKT दोन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यासाठी अमरावतीत शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र; जुन्या आठवणी आठवल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते गहिवरले
अँकर :- मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू उद्या प्रथम मुंबईत एकत्र येत आहे. राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्ध केल्यानंतर ठाकरे बंधू मुंबईत विजय जल्लोष सभा करणार आहे. यासाठी अनेक शिवसैनिक आणि मन सैनिक अमरावतीतून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. त्यापूर्वी अमरावतीत शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र आले आहे. दरम्यान जुन्या आठवणी आठवल्याने शिवसेनेचे पदाधिकारी गहिवरल्याचे पाहायला मिळाले आहे. याविषयी शिवसैनिक आणि मनसैनिकांशी अधिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी
चौपाल
0
Share
Report
Akola, Maharashtra:
Anchor : दोन्ही ठाकरे बंधू एका मंचावर तब्बल वीस वर्षा नंतर एकत्र येत सभा घेणार आहेत.. या सभेचा मराठी माणसावर काय परिणाम होणार आणि राज्यातील राजकारणावरही काय परिणाम होणार यासंदर्भात मनसे आणि युबीटी सेनेच्या कार्यकर्त्यां सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जयेश जगड यांनी..
चौपाल.....
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0407ZT_CHP_ST_TIME_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- नवीन शालेय सत्र सुरू झाल्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची बस फेऱ्यांच्या अनियमिततेमुळे अडचण, मुल तालुक्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी तासनतास बसतात खोळंबून, एकीकडे कुटुंबीयांना भेडसावणारी चिंता तर दुसरीकडे शिक्षकांचे रागावणे झेलत शिक्षण करत आहेत पूर्ण, विद्यार्थ्यांनी शासनाला तातडीने बस फेऱ्या वाढवण्याची केली मागणी
अँकर:--
या बस मध्ये गर्दी आहे येऊ नका...
मागून बस येत आहे, यात गर्दी करू नका....
ही व अशी अनेक उत्तरे चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना एसटी वाहक देत आहेत. नवे शालेय सत्र सुरू झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लगतच्या गावांमध्ये जावे लागते. शासनाने यासाठी खास विद्यार्थी बस गाड्या देखील निश्चित केल्या आहेत. मात्र मूल असो अथवा सावली या संपूर्ण भागात बस स्थानकावर - बस थांब्यावर तिष्ठत राहिलेले विद्यार्थी नजरेस पडतात. एकीकडे कुटुंबीयांना विद्यार्थी- विद्यार्थिनी सुखरूपपणे शाळेत जाऊन परत येण्याची चिंता भेडसावते. तर दुसरीकडे योग्य वेळेत बस न मिळाल्याने वर्गात पोहोचताना झालेल्या विलंबाने शिक्षकांची बोलणी खावी लागतात. अगदी रस्त्यावर एसटी बस ची वाट बघत बसलेले विद्यार्थी आपल्याला या भागात दिसू शकतात. सध्या विद्यार्थ्यांना बस पासेस मिळालेले नाहीत. अशा स्थितीत तिकीट काढून शिक्षणासाठी पदरमोड सुरू आहे. मात्र तरीही योग्य व नियमित बस मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष आणि अधिक बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
बाईट १),२), ३) त्रस्त विद्यार्थी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
04072025
Slug - PPR_GORE_DARSHN
feed on 2c
--------
Anchor - ग्रामविकास मंत्री पालकमंत्री जय कुमार यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श रांगेत जाऊन साधला वारकऱ्यांची संवाद
विठोबाच्या दर्शनासाठी लाखी भाविक दर्शन रांगेत आहेत. यावर्षी मे महिन्या पासून आषाढी वारीची तयारी प्रशासन कडून सुरू आहे. त्या सुविधा आज भाविकांना अनुभवता येत आहेत. दर्शन रांगेतील स्वच्छता , मिनरल वॉटर , महा प्रसाद, स्वच्छता गृह याची व्यवस्था भाविकांसाठी उपयुक्त ठरत आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज स्वतः दर्शन रांगेत चालत वारकऱ्यां सोबत संवाद साधला. वारकऱ्यांनी उपलब्ध सुविधांवर समाधान भावना व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले
-----
byte - जयकुमार गोरे, पालकमंत्री
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
Nsk_thakrepkg
Feed by live u 51 and 2ç
Anchor कधीकाळी मनसे आणि शिवसेनेचा गड राहिलेला नाशिक शहर सध्या पूर्णपणे भाजपच्या ताब्यात गेलाहे. दोन्ही पक्षांमधील बुरुज ढासळल्याने आता एकत्रित होऊ नाही हे पक्ष ताकदवर राहिलेले नाहीत. दोन्ही ठाकरेंच्या एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला नाशिक शहरातील हा आढावा
Vo 1 नाशिक.. कधीकाळी शिवसेनेची प्रत्येक निवडणुकीची सुरुवात नाशिक मधून होत असे... बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे या दोघांचाही आवडतं ठिकाण असलेलं हे शहर आता ठाकरे बंधूंच्या हातातून निसटू लागला आहे.. 2017 च्या महापालिका निवडणूक मध्ये नाशिक महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत उद्धव सेनेचे ३५ नगरसेवक निवडून आले होते. यातील ५ नगरसेवक भाजपात तर, तब्बल२२ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तीन माजी नगरसेवकांचे निधन झाले असून, आता ठाकरे गटात केवळ ५ नगरसेवक उरले आहेत. त्यामुळे उबाठा गटाचे सुपडेसाफ झालेय.
उबाठातील सध्याचे माजी नगरसेवक
केशव पोरजे सुनीता कोठुळे मंगला आढाव डी. जी. सूर्यवंशी संतोष साळवे
शिंदे गटात प्रवेश केलेले माजी नगरसेवक
अजय बोरस्ते प्रवीण तिदमे विलास शिंदे मधुकर जाधव हर्षा गायकर सूर्यकांत लवटे आर. डी. धांगडे ज्योती खोले जयश्री खर्जुल किरणगामणे-दराडे पूनम मोगरे श्याम साबळे रंजना बोराडे नयना गांगुर्डे संतोष गायकवाड सुदाम डेमसे दीपक दातीर सुवर्णा मटाले
भागवत आरोटे सीमा निगळ चंद्रकांत खाडे संगीता जाधव
या माजी नगरसेवकांचे निधन
सत्यभामा गाडेकर
कल्पना पांडे
राधा बेंडकोली
मनसेचे 2017 मधील नगरसेवक
मनसे
एकूण नगरसेवक चार
शिल्लक नगरसेवक एक
शिवसेना शिंदे गटात गेलेले नगरसेवक एक
भाजपा मध्ये गेलेले नगरसेवक दोन
Byte राजकीय विश्लेषक
GFX
महायुतीतील पक्षात जाण्याचे फायदे
विकास निधी व प्रशासकीय सहकार्य मिळण्याच
राजकीय स्थैर्य व भविष्यात उमेदवारीची शक्यता
निवडणूक काळात पक्षाकडून अर्थार्जन होण्याची शक्यता
मनसे आणि उभाठा पक्षातील नेतृत्वाबाबत नाराजी
माजी नगरसेवक म्हणून करताहेत उबाठा आणि मनसेला जय महाराष्ट्र
मनसे आणि शिवसेनेतील फूट, नेतृत्वातील गोंधळ
भाजपसोबत युती न केल्याबद्दल नाराजी
कार्यकर्त्यांशी संपर्कातील कमतरता
राजकीय भविष्याची अनिश्चितता
स्थानिक स्वार्थ आणि राजकीय संधी
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची बंदिस्त नेतृत्वशैली
शिंदे गटातील थेट संपर्क व संवादसंपन्न कार्यपद्धती
Vo 2 शहरात दोन्हीही पक्षांची ताकद पूर्णपणे संपली आहे. संपूर्ण प्रभागात किमान तीन नगरसेवक असणे आवश्यक आहे मात्र तेही राहिले नसल्यामुळे कुठलाही प्रभाग आता या दोन्ही पक्षांचा राहिलेला नाही. दोन्ही पक्ष मिळून 122 उमेदवार देणे सुद्धा अवघड ठरणार आहे
Byte मिळाले की पाठवतो
Vo 3 नाशिक सह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात जवळपास अशीच बिकट स्थिती सर्वत्र निर्माण झाली आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणामुळे महापालिका निवडणुका शिंदे सेनेची मतं विभागली जाण्याची शक्यता आहे परिणामी फायदा भाजपला होणार हे मात्र निश्चित किती
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_NCP_Protest
Feed on - 2C
--------------------------
Anchor - ओबीसी चे नेते प्रध्यापक लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जोडे मारो आंदोलन केले. लक्ष्मण हाके यांनी काल त्यांच्या आंदोलना दरम्यान उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्याबाबत अपशब्द वापरले होते. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळलीये. आज नांदेडमध्ये कार्यकर्त्यांनी आय टी आय चौकात एकत्र येत लक्ष्मण हाके यांच्या फोटोला जोडे मारून रोष व्यक्त केला. हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माफी मागितली नाही तर राज्यभरात रस्त्यावर उतरून बदला घेण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षानी दिला.
Byte - बालाजी रावनगावकर - रा. जिल्हाध्यक्ष.
-----------------------
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
04072025
Slug - PPR_GORE_SHETTI
feed on 2c
file 01
------
Anchor - कुबुद्धि घेऊन पंढरपुरात येणारया राजू शेट्टी आणि त्यांच्या सोबतच्या महा विकास आघाडी नेत्यांना विठ्ठलाने सुबुद्धी द्यावी. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राजू शेट्टी सह येणाऱ्या नेत्यांना विकास कामाच्या आड न येण्याचे केले आवाहन
राजू शेट्टी यांच्या सह महा विकास आघाडी नेते पंढरपूर मध्ये येऊन शक्तीपीठ रद्द होण्यासाठी साकडे घालत आहे.
मात्र ते आज कुबुद्धि घेऊन पंढरपूर मध्ये येत आहेत. त्यांना पांडुरंग सुबुद्धी देईल. कोणत्याही विकास कामांच्या आड यायचे नसते. शक्ती पीठ माध्यमातून होणाऱ्या रस्त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास होणार आहे. असे सांगत अशी आंदोलने न करण्याचा सल्ला दिला
----
byte - जय कुमार गोरे, ग्रामविकास मंत्री
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
04072025
Slug - PPR_BHAVIK_CROWD
feed.on 2c
file 04
------
Anchor - पंढरपूर मध्ये लाखो वारकरी दाखल, श्री विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूर पर्यंत गेली, दर्शनासाठी लागतात 12 ते 15 तास
आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी आज नवमी दिवशीच लाखो वारकरी पंढरपूर मध्ये दाखल झालेले आहेत संत नामदेव महाद्वार, प्रदक्षिणामार्ग, सर्व परिसर हा वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला आहे अवघ्या पंढरी नगरीमध्ये फक्त पांडुरंगाचा जयघोष सुरू आहे
0
Share
Report