Back
ठाकरे बंधूंचा विजय जल्लोष: शिवसैनिक आणि मनसैनिकांचा एकत्रित उत्सव!
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 04, 2025 08:02:35
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_SENA_MNS_WKT दोन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यासाठी अमरावतीत शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र; जुन्या आठवणी आठवल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते गहिवरले
अँकर :- मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू उद्या प्रथम मुंबईत एकत्र येत आहे. राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्ध केल्यानंतर ठाकरे बंधू मुंबईत विजय जल्लोष सभा करणार आहे. यासाठी अनेक शिवसैनिक आणि मन सैनिक अमरावतीतून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. त्यापूर्वी अमरावतीत शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र आले आहे. दरम्यान जुन्या आठवणी आठवल्याने शिवसेनेचे पदाधिकारी गहिवरल्याचे पाहायला मिळाले आहे. याविषयी शिवसैनिक आणि मनसैनिकांशी अधिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी
चौपाल
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 17, 2025 11:36:50Hingoli, Maharashtra:
अँकर -हिंगोली जिल्ह्यांमध्ये कृषी विभागाच्या वतीने भरारी पथकाच्या माध्यमातून कृषी निविष्ठा विक्री केंद्रामध्ये तपासणी केली असता गोरेगाव येथील नऊ कृषी निविष्ठा विक्री केंद्रात अनियमितता आढळून आली होती. याचा अहवाल कृषी अधीक्षकांकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर हिंगोलीचे जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांनी याप्रकरणी सुनावणी घेऊन या नऊ दुकानांचे परवाने निलंबित केलेत. काही दुकानांचे परवाने हे पंधरा दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहेत तर काही दुकानांचे परवाने सात दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहेत.
0
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 17, 2025 11:36:40Raigad, Maharashtra:
स्लग - रायगडमधील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक ........ पशुसंवर्धन आयुक्तांना घातला घेराव ......... खाद्यपुरवठादार कंपन्यांची मनमानी ....... खाद्याच्या बँगांवर त्यातील अन्नघटक नमूद नाहीत. ....... शासनाने निर्णय घेवून देखील अंमलबजावणी नाही .........
अँकर - पोल्ट्री कंपन्या व खाद्य पुरवठादारांच्या मनमानीविरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक झाले आहेत. अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात धडक देवून त्यांनी आयुक्तांना घेराव घातला आणि चांगलेच धारेवर धरले. पक्षांना पुरवल्या जाणारया खाद्याच्या बँगांवर त्यातील अन्नघटक नमूद केले जात नाहीत. करार पद्धतीने पोल्ट्री फार्मिंगच्या नियमांचे पालन होत नाही. शासनाने याबाबतचा निर्णय घेवून देखील याबाबत अंमलबजावणी होत नसल्याने पोल्ट्रीधारक संतापले आहेत. वर्षभरापूर्वी याबाबतच्या सूचना देवून देखील कुठलीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप पोल्ट्री व्यावसायिक शेतकरयांनी केलाय.
बाईट 1 – पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी
बाईट 2 – डॉ. सचिन देशपांडे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन ....
0
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 17, 2025 11:36:24Beed, Maharashtra:
बीड: कौटुंबिक कलहातून पतीकडून विष प्राशन करण्याचा प्रयत्न, बीड पोलिस अधीक्षक कार्यालयातील घटनेने खळबळ... पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले...!!
Anc- नवरा-बायकोतील भांडणे भरोसा सेलमध्ये आले. बायको नांदण्यास तयार होती, परंतू पतीने नकार दिला. त्यांच्यात मनजुळवणी सुरू होती, परंतू पती नकार देत होता. अशातच आपल्यावर गुन्हा दाखल केल्यास आपण आत्महत्या करू, असा ई-मेल सहा दिवसांपूर्वी पतीने पोलिसांना पाठविला. त्याप्रमाणे गुरूवारी दुपारच्या सुमारास या पतीने तळ मजल्यातील भरोसा सेलसमोरच विषारी द्रव प्राशन करण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांनी त्याला वेळीच पकडल्याने अनर्थ टळला.
बबन श्रीराम पाखरे असे आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो शिरूर कासार तालुक्यातील पाडळी गावचा रहिवासी आहे. पती छळ करून मारहाण करत असल्याची तक्रार पत्नीने भरोसा सेलला केली होती. त्याप्रमाणे दोन तारखा झाल्या. या बबन यांच्याकडून समेट घडविण्यास पूर्ण नकार दिला होता. त्यामुळे त्याच्यावर छळाचा गुन्हा दाखल होणार होता. हे समजल्यानेच त्याने सहा दिवसांपूर्वी पोलिसांना ई-मेल करून माझ्यावर अन्याय झाल्यास मी आत्महत्या करेल, अशी धमकी दिली होती. त्यादृष्टीने पोलिस सतर्क होते. गुरूवारी दुपारी भरोसा सेलमध्ये बोलणे सुरू असतानाच बबन तेथून बाहेर पळाला आणि सोबत आणलेले विषारी द्रव प्राशन करण्याचा प्रयत्न केला. परंतू स्थानिक गुन्हे शाखा व इतर शाखांच्या कर्मचाऱ्यांनी त्याला रोखत बाटली हिसकावली. त्यामुळे अनर्थ टळला. या घटनेनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिसांची मोठी धावपळ उडाली होती.
0
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 17, 2025 11:36:09Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shikrapur Police Chor Zatapat
File:02
Rep: Hemant Chapude(Shikrapur)
Anc: पुण्याच्या शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरी करुन गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी चोरी करण्यासाठी आलेल्या दोघा सराईत चोरट्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट झालीय, पोलिस हवालदार विकास पाटील व राम जाधव यांनी रात्रीच्या सुमारास पाठलाग करत चोरट्यांशी झटापट करुन अखेर शिताफीने चोरट्यांना पकडले आहे.
रात्रगस्त घालत असताना पोलिसांना दोन संशयित युवक दिसून आल्याने पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला मात्र दोघेजण दुचाकीहून पळून जात असताना चोरट्यांच्या गाडीची पोलिसांच्या गाडीला धडक बसली नंतर ते दुचाकी सोडून पळ काढत असताना पोलिसांची आणि चोरट्यांची यावेळी झटापट झाली आणि पोलिसांनी चोरट्यांना सिनेस्टाईल पाठलाग करत पकडले
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिक्रापुर पुणे...
0
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 17, 2025 11:33:44kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ जोडला आहे
----
नागपुरात पावसाच्या जोरदार सरी मुळे पावसामुळे सखल भागात खासकरून रेल्वे अंडरपास मध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे.. उत्तर पूर्व नागपुरातील खैरिपुरा मेहदीबाग अंडरपास मध्ये गुडघाभर पाणी साचला आहे... त्यामुळे वाहतूक बंद झालीच आहे.. शिवाय परिसरातील मुलांनी साचलेल्या पाण्याचा वापर स्विमिंग पूल सारखा करत तिथे पोहणे सुरू केले आहे..
3
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 17, 2025 11:10:49Beed, Maharashtra:
बीड: साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरण; आरोपी पोलिस शिपाई शीतल कदमची जामीन रद्द करा.. साक्षीच्या आईची अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे आर्त हाक..!!
Anc- बीडच्या केएसके महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या साक्षी कांबळे या तरुणीने छेडखानी आणि लैंगिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी आरोपी अभिषेक एकनाथ कदम आणि रेल्वे पोलिस कर्मचारी असलेली त्याची बहीण शीतल कदम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी अभिषेक कदम याची जामीन रद्द करण्यात आली आहे. साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी अनुसूचित जाती जमातीचे आयोग आज बीडमध्ये आले होते. यावेळी साक्षीची आई कोयना यांची आयोगाने भेट घेत विचारपूस केली. या प्रकरणातील जामीन रद्द झालेला आरोपी अद्याप अटकेत नाही. शिवाय त्याची बहिण आरोपी शीतल कदम हिचेही जामीन रद्द करण्याची मागणी पीडित कुटुंबाने केली आहे.
बाईट: कोयना, मयत साक्षीची आई...
0
Share
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 17, 2025 11:05:46Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Dowry
Feed on - 2C
-----------------------------
Anchor - हुंड्यासाठी विवाहितेला विष देऊन मारल्या प्रकरणी नांदेड मध्ये सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुखेड तालुक्यातील वसुर तांडा येथिल ताऊबाई चव्हाण हिचा विवाह 2 जुलै रोजी राठोडवाडी येथिल सुधाकर राठोड याच्याशी झाला होता. 7 तारखेला परतनीला माहेरी येऊन नवविवाहिता 8 तारखेला सासरी गेली. 9 तारखेला मुलीला उलट्या होत असल्याचा फोन माहेरी आला. सुरुवातीला ताऊबाईवर मुखेड येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपाचारासाठी हैद्राबादला हलवण्यात आले. उपाचारा दरम्यान 13 जुलै रोजी नवविवाहितेचा मृत्यू झाला. हुंद्यासाठीच मुलीला विष पाजवून मारण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. एकूण 6 लाख रुपये हुंडा देण्याचे ठरले होते. 5 लाख रुपये हुंडा लग्नात देण्यात आला होता. पण एक लाख रुपयासाठी विष पाजवून हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात खूण आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान आरोपी पतिसह सासू, सासरे अश्या चौघाना अटक करण्यात आली असून विवाहितेला विष पाजन्यात आले का तिने स्वतः विष प्राशन केले याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी दिली.
Byte - वामन चव्हाण - मुलीचे वडील
Byte - अशोक राठोड - मुलीचा मामा
Byte - शांताबाई - नातेवाईक
Byte - अबिनाशकुमार
----------------------------------
1
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 17, 2025 11:04:49Raigad, Maharashtra:
स्लग - पेणच्या दुरशेत ग्रामस्थांचे बाळगंगा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन ....... अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी ..... पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न ..... पोलिसांचे कडे तोडून आंदोलक नदीत उतरले ......
अँकर - पेण तालुक्यातील दुरशेत ग्रामस्थानी आज बाळगंगा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन सुरू केलं. गावातील नागरिक मुलाबाळांसह या आंदोलनात सहभागी झाले. पोलिसांनी कडे करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला परंतु कडे तोडून आंदोलक पाण्यात उतरले. गावाजवळून जाणाऱ्या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक होते आहे. त्यामुळे अपघातांची भीती आहे. दगड खाणींकडे जाणाऱ्या या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी अशी इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे. काही दिवसांपूर्वी यासाठी रास्तारोको आंदोलन केले होते परंतु त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं. म्हणून आता जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 17, 2025 11:03:04Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक हल्ला केल्याप्रकरणी दीपक काटेला जामीन मंजूर
- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक हल्ला केल्याप्रकरणी दीपक काटेसह त्याच्या सहकाऱ्याला जामीन मंजूर
- अक्कलकोट दिवाणी व फौजदारी न्यायालयाने तिला जामीन अर्ज मंजूर
- वीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर करण्यात आली जामीन
- दीपक काटे व त्याच्या सहकाऱ्याला आजच कोर्टात हजर केल्यानंतर पंधरा दिवसांची मिळाली होती न्यायालयीन कोठडी
- मात्र दीपक काटे आणि सहकार्याने जामिनासाठी अर्ज ठेवल्यानंतर अक्कलकोट दिवाणी व फौजदारी न्यायालयाने केला जामीन अर्ज मंजूर
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 17, 2025 10:39:48Navi Mumbai, Maharashtra:
story slug - नवी मुंबई शहराचा स्वच्छ सर्वेक्षणातील सुपर स्वच्छ लीग’ मधे समावेश
नवी मुंबई शहर को स्वच्छ शहर अभियान मे मानांकन प्राप्त
ftp slug - nm nmmc swach abhiyan
shots-
reporter- swati naik
navi mumbai
anchor -नवी मुंबई शहराचा स्वच्छ सर्वेक्षणातील ‘सुपर स्वच्छ लीग’ मधे समावेश होऊन त्यामध्ये उच्च मानांकन मिळालं आहे. नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनात झालेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ पारितोषिक वितरण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्विकारला.
10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये नवी मुंबईला सुपर स्वच्छ मानांकन मिळालं आहे. त्यामुळे नवी मुंबईने आता स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये मानांकन मिळवलं आहे. विशेष म्हणजे ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये समाविष्ट झालेल्या देशातील मोठ्या शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे. यासोबतच कचरामुक्त शहराचे सर्वोच्च ‘सेव्हन स्टार मानांकन’ तसेच ओडीएक कॅटेगरीमध्ये सर्वोच्च ‘वॉटरप्लस’ मानांकन नवी मुंबईने कायम राखलं आहे.
gf-
1
Share
Report
MAMILIND ANDE
FollowJul 17, 2025 10:38:49Wardha, Maharashtra:
*वर्धा ब्रेकिंग*
SLUG- 1707_WARDHA_CHETAN_121
- वर्ध्यात सफाई कर्मचाऱ्याला दिली शिक्षकाची जबाबदारी
- वर्ध्याच्या पुलंगाव येथील धक्कादायक प्रकार उघड
- वर्धा जिल्ह्यात शिक्षणाचा खेळ खंडोबा
- शिक्षण राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हे चाललेय तरी काय ?
- पदोन्नतीचा आदेश काढतांना चेतन चंडाले देखील पूर्वकल्पना दिली नाही
- पदोन्नतीच्या आदेशाने चेतन चंडाले धक्का बसल्याची प्रतिक्रिया
अँकर- वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव नगर परिषदेत स्वच्छता विभागात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला प्राथमिक शाळेत शिकविण्याची जबाबदारी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिक्षण राज्य मंत्री म्हणून स्वतः पालकमंत्री असणाऱ्या जिल्ह्यात ही धक्कादायक बाबा एका पत्रामुळे समोर आली आहे...पदोन्नती करणाऱ्या चेतन चंडाले याला साधी मराठी देखील बोलता येत नाहीय..परंतु या कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे सांगितले की जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाहीय..मात्र या आदेशाने देखील त्याला धक्का पोहचल्याची प्रतिक्रिया चेतन चंडाले यांनी दिली आहेय.. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी...
बाईट- 121,चेतन चंडाले,सफाई कर्मचारी,पुलंगाव
0
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 17, 2025 10:37:08Beed, Maharashtra:
बीड: वाल्मीक कराड आणि टोळीने महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आय विटनेसला संपवलं-विजयसिंह बांगर.
- महादेव मुंडे हत्याकांड हे दुहेरी हत्याकांड आहे-बांगर.
- वाल्मीक कराड ने जेलमध्ये राहून 42 सराईत गुन्हेगारांचा जामीन केला.
anc-- परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत काल महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केलं होतं. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सध्या उपचार सुरू आहेत. आज पुन्हा एकदा विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची रुग्णालयात भेट घेतली. यानंतर मिडीयाशी संवाद साधताना त्यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.
महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आय विटनेसला वाल्मीक कराड आणि प्रशासनातील टोळीने संपवलं असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. तसेच वाल्मीक कराडने जेलमध्ये गेल्यापासून 42 सराईत गुन्हेगारांचा जामीन केला ते सध्या बाहेर आहेत. आणि वाल्मीक कराड हा जेलमधून अंडरवर्ल्ड बीड जिल्ह्यात चालवत आहे. असे धक्कादायक खुलासे त्यांनी केले आहेत तर पोलीस प्रशासना समोर चॅलेंज आहे त्यांनी यामध्ये तळागाळापर्यंत तपास करावा अशीही मागणी विजयसिंह बांगर यांनी केली आहे.
बाईट - विजयसिंह बांगर (वाल्मीक कराडचे जुने सहकारी)
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 17, 2025 10:36:56Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1707ZT_CHP_POLE_CRIME
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात नव्या इलेक्ट्रीक पोल उभारणी कामात फसवणूक, ३ इसम अटकेत, २१.६५ लाखांचा माल जप्त
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात अशोका बिल्डकॉन लिमिटेड, नाशिक कंपनीच्या कामात इलेक्ट्रीक लोखंडी पोल उभारणीच्या कामात फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक करून ११४ लोखंडी पोल आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने, असा २१,६५,१९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फिर्यादी विक्रमसिंग ब्रजेंद्रसिंग यांनी दिलेल्या तक्रारीनंतर, प्रकाश एंटरप्रायझेसचे मालक अजयकुमार मिश्रा (रिवा, म.प्र.), गेंदलाल शाहू (छत्तीसगड) आणि ट्रेलर चालक धनराज सूर्यवंशी (नागपूर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी दिलेल्या पोलपैकी १२७ पोल (किंमत १२,९८,१५०/- रु.) परस्पर विल्हेवाट लावून कंपनीची फसवणूक केली होती.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
MNMAYUR NIKAM
FollowJul 17, 2025 10:06:31Buldhana, Maharashtra:
नर्सिंग शिक्षकांचं बेमुदत आंदोलन: रुग्णांच्या सेवेवर होणार परिणाम...
Anchor: महाराष्ट्रातील नर्सिंग शिक्षक त्यांच्या मागण्यांसाठी आता रस्त्यावर उतरले आहेत. 'असोसिएशन ऑफ नर्सिंग टीचर्स इन महाराष्ट्र' या संघटनेने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेसोबत मिळून आंदोलन सुरू केलं आहे. आज, १७ जुलै २०२५ रोजी त्यांनी 'काम बंद' आंदोलन पुकारलं आहे, आणि १८ जुलै २०२५ पासून हे आंदोलन बेमुदत असेल.
या आंदोलनाचं मुख्य कारण म्हणजे, नर्सिंग ट्यूटर पदावर काम करणाऱ्या शिक्षकांचे पगार आणि इतर काही मागण्या बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहेत. खाडे समिती आणि राज्य वेतन त्रुटी निवारण समिती (वश्वी समिती) यांच्या शिफारसींनंतरही या शिक्षकांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप नाराजी आहे आणि त्यांना वाटतंय की त्यांच्या कामाची किंमत कमी केली जात आहे.
या शिक्षकांची निराशा वाढत आहे आणि जर त्यांच्या मागण्या लवकर मान्य झाल्या नाहीत, तर याचा थेट परिणाम रुग्णांच्या सेवेवर होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
Byte - प्रतिभा मेहेत्रे, प्रशिक्षक
0
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 17, 2025 10:06:14Ambernath, Maharashtra:
बदलापुरातील बेंडशीळ रस्ता बनला मृत्यूचा सापळा
बेंडशीळ रस्त्याच्या पुलावरील संरक्षक कठडे गायब
वाहनचालकांच्या सुरक्षेकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचं दुर्लक्ष
Amb bridge
Anchor - बदलापूर जवळचा बेंडशीळ रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय. या रस्त्याच्या पुलावर संरक्षक कठडेच नसल्यामुळे मोठ्या अपघाताची भीती व्यक्त होतीय. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय.
बदलापूरपासून 7 किलोमीटर अंतरावर बेंडशीळ हे आदिवासी वस्ती असलेलं गाव आहे. या गावालगत आठ ते दहा आदिवासी पाडे असून, या पाड्यांना लागूनच वडोदरा-जेएनपीटी महामार्गाचं काम सुरू आहे. मात्र एकीकडे एवढा मोठा रस्ता सुरू असताना दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने या आदिवासी पाड्यातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलय. या रस्त्यावर दोन पूल असे आहेत, ज्या ठिकाणी संरक्षक कठडेच नाहीत. पावसाळ्यात इथले नैसर्गिक ओढे दुथडी भरून वाहत असतात. संरक्षक कठडे नसल्यामुळे एखादं वाहन ओढ्यात कोसळून वाहून जाण्याची भीती आहे. या ठिकाणी सावित्री पूल दुर्घटनेसारखी घटनाही घडू शकते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर पुलाभोवती संरक्षक कठडे बांधावेत अशी मागणी स्थानिक रहिवाशांमधून होतीय.
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Share
Report