Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442402

चंद्रपूर ग्रामीण विद्यार्थ्यांना बस फेऱ्यांची अनियमितता, शिक्षणावर परिणाम!

AAASHISH AMBADE
Jul 04, 2025 08:00:12
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 0407ZT_CHP_ST_TIME_1_2 ( 2 file sent on 2C)  टायटल:-- नवीन शालेय सत्र सुरू झाल्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची बस फेऱ्यांच्या अनियमिततेमुळे अडचण, मुल तालुक्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी तासनतास बसतात खोळंबून, एकीकडे कुटुंबीयांना भेडसावणारी चिंता तर दुसरीकडे शिक्षकांचे रागावणे झेलत शिक्षण करत आहेत पूर्ण, विद्यार्थ्यांनी शासनाला तातडीने बस फेऱ्या वाढवण्याची केली मागणी अँकर:-- या बस मध्ये गर्दी आहे येऊ नका... मागून बस येत आहे, यात गर्दी करू नका.... ही व अशी अनेक उत्तरे चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना एसटी वाहक देत आहेत. नवे शालेय सत्र सुरू झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लगतच्या गावांमध्ये जावे लागते. शासनाने यासाठी खास विद्यार्थी बस गाड्या देखील निश्चित केल्या आहेत. मात्र मूल असो अथवा सावली या संपूर्ण भागात बस स्थानकावर - बस थांब्यावर तिष्ठत राहिलेले विद्यार्थी नजरेस पडतात. एकीकडे कुटुंबीयांना विद्यार्थी- विद्यार्थिनी सुखरूपपणे शाळेत जाऊन परत येण्याची चिंता भेडसावते. तर दुसरीकडे योग्य वेळेत बस न मिळाल्याने वर्गात पोहोचताना झालेल्या विलंबाने शिक्षकांची बोलणी खावी लागतात. अगदी रस्त्यावर एसटी बस ची वाट बघत बसलेले विद्यार्थी आपल्याला या भागात दिसू शकतात. सध्या विद्यार्थ्यांना बस पासेस मिळालेले नाहीत. अशा स्थितीत तिकीट काढून शिक्षणासाठी पदरमोड सुरू आहे. मात्र तरीही योग्य व नियमित बस मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष आणि अधिक बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी केली जात आहे. बाईट १),२), ३) त्रस्त विद्यार्थी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top