Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413102

उजनी धरण 92% भरले, भीमा नदीत 15 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग!

JMJAVED MULANI
Jul 10, 2025 03:33:15
Baramati, Maharashtra
JAVED MULANI SLUG 1007ZT_INDAPURUJJANI FILE 5 उजनी धरण ९२% भरले. उजनी धरणातून 15 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सोडला आहे. उजनी धरण सध्या 92.79 % भरले आहे. तर उजनी धरणात वरील भागातून 20 हजार क्युसेक पाणी जमा होत आहे. नीरा नदीवरील वीर धरणातून नीरा नदीत 5 हजार 479 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडला आहे. ---- ANCHOR:— पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण — म्हणजेच यशवंत सागर — सध्या ९२.७८ टक्के भरले असून, धरणातून १६ मोऱ्यांद्वारे १५ हजार क्यूसेकने भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दौंड येथून २०३३६ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून, वीज निर्मितीसाठी देखील सध्या १६०० क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे. यासोबतच सीना-माढा बोगदा, दहिगाव उपसा सिंचन योजना, आणि मुख्य कालव्यातून देखील पाण्याचा बहिर्वाह सुरू आहे.सध्या पावसाचा जोर असाच राहिला, तर पुढील ४-५ दिवसांत उजनी धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.गेल्या ४५ वर्षांतील पहिल्यांदा, यंदा मे महिन्यात उजनी धरणाची पातळी उणेतून प्लसमध्ये पोहोचली होती.धरणातील समाधानकारक पाणीसाठ्यामुळे शेतकरी, औद्योगिक क्षेत्र आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top