Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Gadchiroli442605

गडचिरोलीमध्ये पावसाने आणले संकट, 15 मार्ग अजून ठप्प!

AAASHISH AMBADE
Jul 10, 2025 14:33:09
Gadchiroli, Maharashtra
Feed slug :--- 1007ZT_GAD_FLOOD ( single file sent on 2C)  टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यात पावसाने दिली उसंत, मात्र प्रमुख राष्ट्रीय महामार्गांसह अंतर्गत 15 मार्ग अजूनही ठप्पच, वैनगंगा- आष्टी -प्राणहिता नद्या धोक्याच्या पातळीवर, आरमोरी तालुक्यात नाल्याच्या प्रवाहात स्थानिक वृद्ध वाहून गेल्याची माहिती, आतापर्यंत 273 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले अँकर:-- विदर्भातील इतर जिल्ह्यांसह गडचिरोली जिल्ह्यातही गेले तीन दिवस पावसाने संततधार हजेरी लावल्यानंतर सध्या उसंत दिली आहे. असे असले तरी गडचिरोली -आरमोरी , गडचिरोली चामोर्शी व आष्टी- आलापल्ली यासह प्रमुख 15 मार्ग अजूनही ठप्पच आहेत. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीने विक्राळ रूप धारण केले असून गोसेखुर्द धरणातून होणारा सतत विसर्ग यासाठी कारणीभूत ठरला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा ,आष्टी, प्राणहिता नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत असून आरमोरी तालुक्यात एका स्थानिक नाल्याच्या प्रवाहात वृद्ध वाहून गेल्याची माहिती आहे. आतापर्यंत वैनगंगेच्या पुरामुळे देसाईगंज तालुक्यातून सर्वाधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.  जिल्ह्यात पुढील काही तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top