Back
डिग्रस कऱ्हाळेतील वारकरी दिंडीने घेतला गावकऱ्यांचा श्वास!
Parbhani, Maharashtra
अँकर- हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचे पारंपारीक पोशाख परिधान करून दिंडीत सहभाग नोंदवला होता. विठ्ठल रुखमाईचा जिवंत देखावा यामध्ये साकारण्यात आला होता, टाळ मृदंगाच्या निनादात या दिंडीने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते, विद्यार्थ्यांनी आणि भविकांनी फुगड्यांचा आनंद घेतला.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0507ZT_CHP_SCHEME_START
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपुरात पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरुवात, योजनेत सर्वाधिक समावेशासाठी जनजागृती करण्याचे आवाहन
अँकर:--चंद्रपुरात राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरुवात करण्यात आली. स्थानिक प्रियदर्शिनी सभागृहात रंगतदार आदिवासी नृत्याने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून शेवटच्या घटकाच्या या योजनेत सर्वाधिक सहभागाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून 20 लक्ष पक्की घरे, आदिवासी क्षेत्रात रस्ते निर्मिती आणि आदिवासी घरांपर्यंत नळ पाणीपुरवठा योजना पोचविण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. अधिकारी वर्गाने वेगाने हे लक्ष्य साध्य निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
बाईट १) प्रा. डॉ. अशोक उईके, पालकमंत्री, चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
अंबरनाथ मध्ये नाल्याच्या बाजूला असलेल्या घराची भिंत कोसळली!
बैठ्या वस्तीतील घरांचं मोठं नुकसान
घरांची झाली पडझड महिला थोडक्यात बचावली
Amb wall collapsed
Anchor : अंबरनाथ शहरात आज सकाळपासून रिमझिम सुरू असलेल्या पावसामुळे एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली.त्यामुळे घरातल्या सामानाचं मोठं नुकसान झाल आहे.
Vo : अंबरनाथ पश्चिम मधील गांधी नगरमध्ये नालाच्या बाजूला बैठया घर आहेत मात्र आज दुपारी या घराची भिंत कोसळली आज सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे मागच्या नाल्याचा प्रवाह वाढला त्यामुळे माती खचत गेली नाल्याच्या बाजूला काही बैठ्या घर आहेत आज दुपारी ३.३० वाजता याठिकाणी घराची मागची भिंत अचानक कोसळली
तर संपूर्ण घरांची पडझड होऊन नुकसान झालं असून घरातल्या सामानाचं, वस्तूंचं प्रचंड नुकसान झालं.तर महिला काम करत असतानाच ही भिंत कोसळली आणि महिला थोडक्यात बचावली आहे. याच नाल्याच्या बाजूला पालिकेने संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे मात्र ती अर्धवट असल्याने ही दुर्घटना टळली आहे असा आरोप रहिवासी केला असून या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी या रहिवासींनी केली आहे.
Byte : रहिवासी
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0507ZT_JALNA_KHOTKAR(5 FILES)
जालना :राज ,उद्धव यांच्या एकत्र येण्यावर खोतकर यांची प्रतिक्रिया
ते त्यांचेच वेगळे झाले होते,त्यांचेच एकत्र आले आम्हाला काय देणं-घेणं-खोतकर
एका म्यानात राज,उध्दव या दोन तलवारी कशा राहतील.?
यांच्या एकत्र येण्याचा आमच्यावर कोणताही परीणाम होणार नाही
राज,उद्धव ठाकरे एकत्र राहणं टिकावं या आमचया त्यांना शुभेच्छा-खोतकर
जालन्यातील मुलीची छेड काढून तिच्या वडिलांना मारहाण करणारे आरोपी हे कॉंग्रेसचे लोक-खोतकर यांचा आरोप
अँकर |राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.ते त्यांचेच वेगळे झाले होते,त्यांचेच एकत्र आले त्यांच्याशी आम्हाला काय देणं-घेणं आहे असा सवाल शिवसेनेचे आमदार अर्जून खोतकर यांनी उपस्थित केला आहे.एका म्यानात राज,उध्दव या दोन तलवारी कशा राहतील.? असा सवाल खोतकर यांनी उपस्थित केलाय.यांच्या एकत्रित येण्यामुळे आमच्यावर कोणताही परीणाम होणार नाही असा दावाही खोतकर यांनी केला.
राज,उद्धव ठाकरे एकत्र राहणं टिकावं या आमच्या त्यांना शुभेच्छा असल्याचं खोतकर म्हणालेत.जालन्यात मुलीची छेड काढून तिच्या वडिलांना आरोपींनी बेदम मारहाण केली.या प्रकरणात आरोपी हे कॉंग्रेसचे लोक असल्याचा आरोप खोतकर यांनी केला आहे.
बाईट : अर्जुन खोतकर, आमदार,शिवसेना, जालना
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_rain_trafik
अँकर
सकाळपासून रिमझिम स्वरूपात येणाऱ्या पावसामुळे शहरातील महत्त्वाचा चौक म्हणून ओळख असलेल्या द्वारका आणि मुंबई नाका सर्कल हा वाहतूक कोंडी कोंडी झालीये... शहरात सकाळपासूनच पाऊस सुरू आहे आणि याचा परिणाम आता जाणवू लागला आहे... मुंबई नाका सर्कलवर तब्बल दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झालीये.... या वाहतूक कोंडीमुळे ॲम्बुलन्स देखील अनेक वेळ अडकून बसली होती यानंतर पोलिसांनी या अंबुलन्स करिता रस्ता केल्यामुळे हे ॲम्बुलन्स पुढे निघून गेली मात्र तरी देखील गेल्या दोन ते तीन तासापासून शहरातील द्वारका आणि मुंबई नाका सर्कल वाहतूक कोंडी मध्ये अडकला आहे....
0
Share
Report
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- जिल्ह्यात कापूस सोयाबीन झाला कमी तर मका पिकाची पेरणी वाढली
फीड 2C
अँकर:- यावर्षी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन या पिकांना फाटा देत मका लागवडी लक्ष केंद्रित केला आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 78 हजार हेक्टर वर घेतलं जाणार मका पीक हे एक लाख 25 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर घेतलं जाण्याची शक्यता आहे या तुलनेत दीड लाख हेक्टर वर असलेला कापूस वीस ते पंचवीस हजार हेक्टर कमी झाला आहे याबरोबरच सोयाबीन पिकाची लागवड देखील 25 ते 30 हजार हेक्टरने कमी होणार आहे कापूस आणि सोयाबीन पिकाचे पडत असलेले भाव आणि मजुरांची समस्या या कारणामुळे या दोन्ही पिकांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे तुलनेने मकाचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे याबरोबरच मका पिकातून पशुखाद्य मिळते आणि रब्बीचे पीकही घेता येतं या कारणांमुळे शेतकरी आता मका पिकाकडे वळला आहे अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत ६४% पेरणी झाली असून यामध्ये पिकांच्या सरासरी मध्ये सर्वाधिक प्रमाण मका पिकाच्या पेरणीच आहे
बाईट:- सुधाकर बोरळे, जिल्हा कृषी अधिक्षक
0
Share
Report
Manmad, Maharashtra:
अँकर- मनमाड शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिक बिकट झाले आहे रस्त्याच्या मधोमध वाहन नादुरुस्त झाल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे मनमाड शहरातून जाणारा पुणे इंदोर महामार्ग हा नेहमीच व्यस्त असणारा महामार्ग असून मनमाड शहरात रेल्वे उड्डाण पुलावर देखील वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे अनेक दिवसांपासून मनमाड शहराला बायपास रस्त्याची व्यवस्था व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0507ZT_CHP_SUDHIR_BITE
( single file sent on 2C)
टायटल:-- वर्गात नवा विद्यार्थी आला म्हणजे मेरिट वाल्या विद्यार्थ्यांने कशाला घाबरायचे, उबाठा- मनसे विजय मेळाव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
अँकर:--उबाठा- मनसे विजय मेळाव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वर्गात नवा विद्यार्थी आला म्हणजे मेरिट वाल्या विद्यार्थ्यांने कशाला घाबरायचे, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. दोन भाऊ एकत्र येत असतील तर शुभेच्छा आहे. गेल्या काळात उत्तम योजना आखून महायुती मतदारांपुढे गेली आणि मोठा जनादेश मिळाला, हे त्यांनी।लक्षात आणून दिले. म महापालिकेचा नव्हे तर मराठीचा आहे या टोल्यावर प्रतिटोला लगावताना म मतदारांचा आणि त्यांच्या मनाचा हवा असे म्हटले.
बाईट १) सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
आषाढी एकादशीनिमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढली आषाढी रॅली..
झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत काढलेली झाली..
नागरिकांना झाडाचे रोपटे देत दिले संदेश..
Anc..उद्या आषाढी एकादशी निमित्त कल्याण मधील अच्युवर शाळेच्या विद्यार्थ्यांनी कल्याण मध्ये रॅली काढली छत्रपती शिवाजी महाराज येथील विठोबा रखुमाईच्या मंदिरामध्ये दर्शन घेत झाडे लावा झाडे जगवा असे संदेश देत शाळेच्या विद्यार्थ्यांनी रैली काढली तसेच नागरिकांना झाडाचे रोपटे देऊन एक प्रकारे पर्यावरण जनजागृती व्हावी व झाडाचे महत्व पटवून देत झाडाचे रोपटे देण्यात आले शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठोबा रुक्माई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर माऊलीचे वेशभूषा परिधान केल्या होत्या.
byte... हनुमान म्हसे
शिक्षक
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
केडीएमसी नोकर भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत प्रशासनाने वाढवली
इच्छुकांच्या विनंतीमुळे कालावधी वाढवल्याची अतिरिक्त आयुक्तांची माहिती
Anchor :- केडीएमसीमध्ये तब्बल 490 विविध विभागातील पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येत आहेत. त्याचे अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवार 3 जुलै 2025 संपत होती. मात्र इच्छुक उमेदवारांकडून करण्यात आलेल्या विनंतीनुसार त्यामध्ये आणखी 12 दिवसांची वाढ करण्यात आल्याची माहिती केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे वेळेअभावी ज्यांना अर्ज दाखल करता आले नसतील अशांसाठी आणखी एक संधी महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे.
Vo..कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी बऱ्याच वर्षानंतर नोकर भरती केली जात आहे. त्यासाठी गेल्या 10 जून 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करून माहिती देण्यात आली होती. विविध विभागातील तांत्रिक आणि कार्मिक अशी सर्व पदे मिळून 490 जागांसाठी ही भरती केली जात आहे. त्यासाठी टीसीएस कंपनीच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र यासाठी असलेली 3 जुलै 2025 ची अर्ज दाखल करण्याची मुदत आणखी वाढवण्यासाठी केडीएमसी प्रशासनाकडे अनेकांचे विनंती अर्ज आले होते. त्यांचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून ही मुदत 15 जुलै 2025 पर्यंत वाढवण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी सांगितले.
तसेच या पदांसाठी इच्छुक सर्व उमेदवारांनी ही मुदत संपण्यापूर्वीच म्हणजे 15 जुलैपूर्वीच सगळ्यांनी अर्ज दाखल करावे. तसेच ज्यांना कोणाला अर्ज दाखल करताना अडचणी येत असतील त्यांनी संबंधित हेल्पलाइन नंबर किंवा ई मेलद्वारे त्या मांडण्याचे आवाहनही हर्षल गायकवाड यांनी केले आहे.
Byte :- हर्षल गायकवाड ( अतिरिक्त आयुक्त केडीएमसी)
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn bhumre land case avb
Feed attached
छत्रपती संभाजीनगर चे खासदर संदीपान भुमरे यांच्या चालकाला भेट म्हणून दिलेली 3 एकर जमीन बेकायदा असल्याचा दावा सालारजंग यांची कन्या सय्यदा तय्यबा फातेमा यांचे मुख्तियार धारक शिवकुमार चव्हाण यांनी केला. शहरात जमिनी सालारजंग या शाही कुटुंबियांच्या आहेत, अधिकार नसलेल्या लोकांनी त्या भेट म्हणून कशा दिल्या असा प्रश्न आहे. असे अनेक प्रकरण या आधीदेखील झाले असून प्रकरण न्यायालयात गेलेले आहे. असे असताना काही लोक वारस किंवा नवाब म्हणून घोटाळा करत आहेत. मागील वर्षी असाच एक व्यवहार झाला ज्यामध्ये धनादेश द्वारे व्यवहार झाला. प्रशासकीय अधिकारी आणि भूमाफिया यांच्यामध्यमातून फसवणूक सुरू आहे. या प्रकरणी अनेक वेळा तक्रार देऊनही न्याय मिळत नसल्याची खंत चव्हाण यांनी व्यक्त केली.
Byte शिवकुमार चव्हाण, मुखतीयर धारक
0
Share
Report