Back
ठाकरे बंधूंचं एकत्र येणं: गोगावले यांची शंका!
Raigad, Maharashtra
स्लग - ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचं मंत्री भरत गोगावले यांनी केलं स्वागत ...... मात्र किती दिवस एकत्र राहतात यावर गोगावले यांना शंका ...... महायुतीला काही फरक पडणार नाही ...... जनता आम्हाला भरभरून यश देईल ..... मंत्री भरत गोगावले यांना विश्वास .....
अँकर - ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे मंत्री भरत गोगावले यांनी स्वागत केलं आहे. मात्र ते किती दिवस एकत्र राहतात यावर त्यांनी शंका व्यक्त केलीय. त्यांच्या एकत्र येण्याने महायुतीला काहीच फरक पडणार नाही. आम्ही जनतेचे सेवक म्हणून काम करतो आहोत. आगामी निवडणुकांमध्ये आम्हाला जनता भरभरून यश देईल असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केलाय.
बाईट - भरत गोगावले, मंत्री
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Kalyan, Maharashtra:
कल्याण जवळील मोहने गावठाण परिसरात विद्युत वाहिनीतून वायरीतून विद्युत प्रवाह
स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे लहान मुलगी बचावली
Anchor - कल्याण मोहने गावठाण माऊली नगर परिसरामध्ये रस्त्याच्या खालून टाकण्यात आलेल्या विद्युत वाहिनीतून विजेचा प्रवाह होत होता. याच दरम्यान या ठिकाणाहून जाणाऱ्या लहान मुलीला विजेचा झटका बसला . स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत या मुलीला बाजूला केलं त्यानंतर इलेक्ट्रिकच्या मदतीने तपासणी केली असता जमिनीतून विद्युत प्रवाह येत असल्याचे लक्षात आले याबाबत तत्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जमिनीखालून जाणाऱ्या विद्युत वाहिनीचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
0
Share
Report
Oros, Maharashtra:
अँकर ---- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थानकालीन असलेल्या सावंतवाडी येथील कार्यागृहाची भिंत दोन दिवसापूर्वी कोसळली होती त्याची आज पालकमंत्री रितेश राणे यांनी पाहणी केली पुढील शंभर वर्षे टिकेल असे या ठिकाणी बांधकाम करण्यात येईल तसेच यापूर्वी झालेल्या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिले..
Byte --- नितेश राणे, पालकमंत्री, सिंधुदुर्ग
byte on live लिंक ( press)
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
ANCHOR - वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि माजी आमदाराच्या मुलामध्ये शाब्दिक वाद झाला. बुलेट गाडी अडवल्याच्या कारणावरून हा वाद निर्माण झाला. शहरात वाहतूक शाखेकडून, बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई सुरु आहार, त्यादरम्यान स्वतः पोलीस अधिकारी सागर देशमुख उपस्थित होते. या कारवाईदरम्यान धुळे शहरातील लोकमान्य हॉस्पिटल जवळ पोलीस अधिकारी सागर देशमुख कारवाई करीत असताना, माजी आमदार फारुक शहा यांच्या मुलाची देखील गाडी अडवत फॅन्सी नंबर प्लेट असल्यामुळे दंड भरण्यात सांगितला. याचा राग आल्यामुळे माजी आमदार फारुक शहा यांच्या मुलाने देखील पोलिसांसोबत हुज्जत घातली. पोलिसांनी इंगा दाखवातच माजी आमदार पुत्र नरमला, मात्र भर चौकात माजी आमदार पुत्राची दमबाजी पाहायला मिळाली.
यावेळी पोलीस अधिकारी सागर देशमुख यांनी माजी आमदार यांचे मुलाला ताब्यात घेण्यात सांगितले व फॅन्सी नंबर प्लेट असल्यामुळे दंड भरावाच लागेल, कोणीही असो कायदा सर्वांना सारखा आहे असे ठणकावून सांगत त्याच दंड भरण्यास सांगितले. तर काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता.
Byet - सागर देशमुख, पोलीस उपधीक्षक
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
Nagpur, Maharashtra:
2c ला बाईट जोडला आहे
------
नागपूर
परीणय फुके, भाजप नेते.
- *हा ठाकरे बंधूंनी विजयी मेळाव्या ऐवजी आभार मेळावा घ्यायला हवा होता.. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जो यांनी चुकीचा निर्णय घेतला, तो फडणवीस यांनी रद्द केला आहे...त्यासाठी मुख्यमंत्री यांचे आभार मानले पाहिजे.*
- *मुंबईच्या माणसाला समजत, जे दोघे भाऊ बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना एकत्र आले नाही, बाळासाहेब ठाकरे हे शेवटच्या काळात त्यांनी प्रयत्न केले तर त्यावेळेस इथे एकत्र आले नाही, आज एकत्र येण्याची मजबुरी सर्वाना माहीत आहे.. आज दोन्ही भाऊ एकत्र येण्याची मजबुरी माहीत आहे.. जेव्हा यांचा सुफळा साफ होतो तेव्हाच दोन्ही भावना एकत्र बयेण्याव्हा मुद्दा लोकांना कळतो.*
On विदर्भात मनसे सेना ताकद नाही?
- *विदर्भात आंदोलन करण्याची ताकद नाही, मुंबईत पान टपरी आणि लहान लोकांवर जोर दाखवतात, मोठया उद्योगपतीं, बॉलीवुडवर का जोर दाखवय नाहीत. हिंदी भाषिक उद्योगपतीवर का जोर दाखवत नाही..
पाच लोक मिळुन मारत आहे. खरा मराठी माणूस असता तर हे नामर्दकी दाखवली नसती.... अडाणी, आंबानी कडडे का जात नाही...तुकडे फेलले की शेपूट हलवत आहे.*
On व्यापारी भीती
- या वागणुकीमुळे भीतीच वातावरण निर्माण होत आहे. महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहे... अनेकांना मुख्यमंत्री यांच्यामुळे आधार आहे. मात्र अश्या परिस्थितीमुळे वातावरण खराब होते...
On नारायण राणे
- उद्धव ठाकरे यांच्या राजकीय महत्वकांक्षेमुळे राजकीय वास्तविकता आहे, उद्धव ठाकरेंच्या राजकीय महत्वकांक्षेमुळे शिवसेना राज ठाकरे यांनी सोडले, ज्या भावाला 25 वर्षापूर्वी हाकलून दिलं. त्याच भावाला विधानसभेच्या निकालनंतर जवळ घ्यावं लागतं आहे...
On ड्रग प्रमाण वाढले
- यात MD अमली पदार्थांच व्यवसं लागले, या तस्करावर मकोका लागला पाहिजे... एक मकोका लावण्याचा आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले आहे..
ON रेशन धान्य लूट
- मागिल वेळी हा विषय मांडला होता, त्यानंतर कारवाई झाली होती..यात निश्चितच अश्या राईस मिलवर कारवाई संदर्भात, मागील वेळी विधनपरिषदेत धान घोटाळा लावला होता, कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्याचा यात सहभागी आहे, कॉंग्रेसचा नेता यात गुंतला, कॉल।रेकॉर्डिंग तपासले तर समोर येईल...
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn mim crowed avb
feed attached
ANCHOR : माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर दाखल असलेल्या ॲट्रॉसिटी गुन्ह्या प्रकरणी चर्चा करण्यासाठी पोलीस आज त्यांच्या घरी पोहोचले. मात्र याचवेळी जलील यांना अटक होणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात एमआयएमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जलील यांच्या घरासमोर एकत्र आले, मात्र पोलीस आपल्यासोबत फक्त ॲट्रॉसिटी प्रकरणी चर्चा करण्यासाठी आले होते असा खुलासा इम्तियाज जलील यांनी केला. तरी सुद्धा पोलीस गेल्यावर देखील कार्यकर्त्यांची गर्दी जलील यांच्या घराबाहेर कायम होती. यावेळी पुन्हा एकदा हा गुन्हा संजय शिरसाठ या मंत्र्यांनी दबाव टाकून दाखल करून घेतला असल्याचा आरोप केलाय...
Byte : इम्तियाज जलील
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
तीन वेळा तलाक तलाख असे
लिहून सदर लेखी पत्र बायकोच्या वडिलांच्या घरच्या पत्त्यावर पाठवून देत बेकायदेशीर तलाख देऊन दुसरे लग्न केल्या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबतची फिर्याद जिंतूर शहरातील फतन कॉलणी येथील सुमय्या बेगम मोहम्मद अमजद कुरेशी यांनी दिलीय. अंबाजोगाई येथील पती मोहम्मद अमजद हुसैने कुरेशी याने वडिलांच्या पत्त्यावर पत्र पाठवून तलाक तलाक तलाक असे तीनदा लिहून, मी कायदेशीर दुसरे लग्न केले आहे, तू आता माझी पत्नी राहिली नाहीस असे पत्रात नमूद केले. त्यामुळे माहेरी असलेल्या पत्नीने जिंतूर पोलिस ठाणे गाठून आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय...
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -
SAT_TRUCK_FIRE
सातारा - पुणे बंगलोर महामार्गावर खंबाटकी घाटात ट्रॅक ला भीषण आग लागली आहे. साताऱ्याच्या दिशेने येणाऱ्या या ट्रकला आग लागल्यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. अद्याप अग्निशमन दल पोहोचले नसल्याने ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0507ZT_CHP_SCHEME_START
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपुरात पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरुवात, योजनेत सर्वाधिक समावेशासाठी जनजागृती करण्याचे आवाहन
अँकर:--चंद्रपुरात राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरुवात करण्यात आली. स्थानिक प्रियदर्शिनी सभागृहात रंगतदार आदिवासी नृत्याने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून शेवटच्या घटकाच्या या योजनेत सर्वाधिक सहभागाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून 20 लक्ष पक्की घरे, आदिवासी क्षेत्रात रस्ते निर्मिती आणि आदिवासी घरांपर्यंत नळ पाणीपुरवठा योजना पोचविण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. अधिकारी वर्गाने वेगाने हे लक्ष्य साध्य निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
बाईट १) प्रा. डॉ. अशोक उईके, पालकमंत्री, चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
अंबरनाथ मध्ये नाल्याच्या बाजूला असलेल्या घराची भिंत कोसळली!
बैठ्या वस्तीतील घरांचं मोठं नुकसान
घरांची झाली पडझड महिला थोडक्यात बचावली
Amb wall collapsed
Anchor : अंबरनाथ शहरात आज सकाळपासून रिमझिम सुरू असलेल्या पावसामुळे एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली.त्यामुळे घरातल्या सामानाचं मोठं नुकसान झाल आहे.
Vo : अंबरनाथ पश्चिम मधील गांधी नगरमध्ये नालाच्या बाजूला बैठया घर आहेत मात्र आज दुपारी या घराची भिंत कोसळली आज सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे मागच्या नाल्याचा प्रवाह वाढला त्यामुळे माती खचत गेली नाल्याच्या बाजूला काही बैठ्या घर आहेत आज दुपारी ३.३० वाजता याठिकाणी घराची मागची भिंत अचानक कोसळली
तर संपूर्ण घरांची पडझड होऊन नुकसान झालं असून घरातल्या सामानाचं, वस्तूंचं प्रचंड नुकसान झालं.तर महिला काम करत असतानाच ही भिंत कोसळली आणि महिला थोडक्यात बचावली आहे. याच नाल्याच्या बाजूला पालिकेने संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे मात्र ती अर्धवट असल्याने ही दुर्घटना टळली आहे असा आरोप रहिवासी केला असून या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी या रहिवासींनी केली आहे.
Byte : रहिवासी
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Share
Report