Back
जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम, 4 जुलैपर्यंत अर्ज करा!
Raigad, Maharashtra
स्लग - जातपडताळणी प्रमाणपत्र विशेष मोहीम ...... सामाजिक न्याय विभागाचा उपक्रम ........
अँकर - मागास वर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध व्हावे यासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम 4 जुलै पर्यंत चालणार आहे. अकरावी, बारावी विज्ञान शाखा तसेच अभियांत्रिकी पदविका शिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोहीम राबवली जात आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या मूळ जिल्ह्यातील जात पडताळणी समिती कडे अर्ज करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Pune, Maharashtra:
hinjeadi ultimetum
kailas puri Pune 27-6-25
feed by 2c
Anchor - हिंजवडी गावाचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समावेश करण्यासाठी गेल्या काही दिवसापासून आयटी कर्मचाऱ्यांकडून स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. पाच दिवसात या मोहिमेत बावीस हजारहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी करत पाठिंबा दर्शवला आहे. आयटी कर्मचाऱ्यांकडून ही मोहीम सुरू असताना सरकारी पातळीवर मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आयटी कर्मचारी संतप्त झाले असून त्यांनी आणखी मोहीम तीव्र केली आहे. ट्राफिक आणि इतर समस्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आयटी पार्क हिंजवडी चेष्टेचा विषय झाला असल्याची खंत व्यक्त करतानाच येत्या काही दिवसात समस्या सोडवल्या नाहीत तर आणखी तीव्र मोहीम सुरू करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. तर ग्रामस्थांनी हिंजवडीला महापालिकेत घ्यायचं असेल तर आत्ताच घ्यावं अन्यथा पुढे आम्ही स्वतंत्र महानगरपालिकेची मागणी करू असा इशारा दिला आहे. याच मुद्द्यावर आयटी कर्मचारी आणि स्थानिकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...!
kailas chaupal+ vis
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2706ZT_JALNA_STUDENT_PKG(25 FILES)
जालना |PKG
बेडकांचा डराव डराव आवाज ठरतोय जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा,
पारधच्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात साचलं पाऊस आणि गावातील गटाराचं पाणी,पाण्यात बेडकांनी ठोकला मुक्काम
बेडकांच्या आवाजामुळे विद्यार्थी हतबल
शाळेसमोर साचलेल्या पाण्याचा बंदोबस्त न केल्यास थेट साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा ईशारा
अँकर : जालन्यातील पारध गावात जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण झालाय.हा अडथळा काही ईतर कोणत्याही वादाचा नाही तर हा अडथळा आणलाय चक्क बेडकांनी.नेमका हा अडथळा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कसा आला यावर बघूया हा स्पेशल रिपोर्ट
व्हिओ:१: जालन्यातील पारध गावच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर एक नवीनच संकट उभं राहिलंय.विद्यार्थ्यांना शिक्षक किंवा शिक्षिका शिकवत असताना त्यांना शिक्षक किंवा शिक्षिका काय शिकवतायत ते ऐकायला मिळत नाहीय.त्याचं कारणही तसंच आहे.काल परवा पारध गावात मुसळधार पाऊस झाला आणि शाळेबरोबरच गावातील गटाराचं सगळं पाणी शाळेसमोर तुंबलं. आता या तुंबलेल्या पाण्यात बेडकांनी ठिय्या मांडत डराव,डराव अशी घोषणाबाजी सुरू केलीय.ही बेडकं शांत बसायला तयार नाही. बेडकांचा कल्लोळ ईतका जोरात सुरुय की,शिक्षक काय शिकवतात हेच विद्यार्थ्यांना कळत नाहीय.त्यामुळे त्यांचं शिकवणीत लक्षच लागत नाही.
बाईट : विद्यार्थीनी (3 विद्यार्थीनीचे बाईट आहेत)
व्हिओ:2:पारधच्या जिल्हा परिषद शाळेसमोर पावसामुळे तयार झालेल्या डबक्यात बेडकांनी मुक्काम ठोकल्यानं विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत असल्यानं गावकरीही त्रस्त झालेत.त्यामुळे शाळेच्या आवारात साचणाऱ्या पाण्याबरोबरच गावातील नाल्यातून शाळेच्या मैदानात साचणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त ग्रामपंचायतीने शालेय शिक्षण समितीने करण्याची मागणी गावकऱ्यांनी केलीय.हा प्रकार असाच सुरू राहिला तर थेट शाळे समोर साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन करण्याचा ईशारा ग्रामस्थांनी दिलाय.
बाईट : बबलू तेलंग्रे,ग्रामपंचायत सदस्य(व्हाईट शर्ट,गोरा रंग,दाढी असलेले)
बाईट: सागर देशमूख, ग्रामस्थ(काळया रंगाचा टी शर्ट असलेले)
बाईट : प्रशांत देशमूख,ग्रामस्थ(पिवळा टी शर्ट)
व्हिओ :३:गेल्या तीन ते चार वर्षांपासून या शाळेसमोर पावसाळ्यात अशाच प्रकारचं पाणी साचतंय.त्यामुळे या पाणी साचलेल्या डबक्यात सापाचं देखील वास्तव्य आढळून येतं. त्यामुळे तातडीने या साचणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणात येणारा बेडकांचा आवाजाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे इतकंच.
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_jaganath_rath
नाशिक मध्ये देखील जगन्नाथ रथ उत्सव सोहळा
अँकर
जगन्नाथ पुरी मध्ये होणारा जगन्नाथ रथ उत्सव सुरू असताना नाशिक मध्ये देखील जगन्नाथ रथ उत्सव सोहळा पार पडतोय... शहरातील पंचवटी परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिराच्या इथून ही जगन्नाथ रथ यात्रा उत्सव सुरू झाला आहे.... जगन्नाथ रथ हा फुलांनी सजवलेला असून त्याला आकर्षक रूप प्राप्त झाल आहे...विशेष बाब म्हणजे जगन्नाथ यांचा रथ ओढण्यासाठी एकाबाजूला महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळतो तर दुसऱ्या बाजूला पुरुष सहभागी होतात ... या रथयात्रेमध्ये रथ उडत असताना पायात चप्पल न काढता भाविक भारत ओढत असतात यामुळे या रथ उत्सवाला एक वेगळंच महत्त्व पाहायला मिळतं... या रथोत्सवाची सुरुवात पंचवटी पंचमुखी हनुमान मंदिराच्या पासून सुरुवात झाली आहे... शहरातील मेन रोड मार्गे काळाराम मंदिर असा फिरून पुन्हा एकदा पंचमुखी हनुमान मंदिर पर्यंत येणार आहे... जगन्नाथ रथ उत्सवात भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालंय.... या रथ उत्सवानिमित्त नाशिक शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय...
0
Share
Report
Virar, Maharashtra:
Date-27june2025
Rep-prathamesh tawade
Loc-virar
Slug-VIRAR COW
Feed send by 2c
Type-AV
Slug- विरार मध्ये विजेचा धक्का लागून चार गाईंचा मृत्यू
विरार पूर्व देवीपाडा परिसरातील घटना
अँकर - विरार पूर्वेकडील देवीपाडा येथील शेतात चरणाऱ्या चार गाईंचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे..देवीपाडा येथील शेतावरून जाणाऱ्या वीज वाहकतारांपैकी एक तार तुटून शेतात पडली होती.. नागरिकांनी याची तक्रार केल्यानंतर महावितरण कडून या परिसरातील वीजपुरवठा खंडित केला होता.. दरम्यान या शेतात करण्यासाठी गाई गेल्या होत्या.. त्यावेळी अचानक शेतात पडलेल्या तारेतून वीजपुरवठा सुरू झाला व शेतात चढणाऱ्या गाईंचा जागीच मृत्यू झाला... महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे या गायींचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे..
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_mock_parliament
कराड -भारतात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चा माध्यमातून कराड मध्ये राज्यस्तरीय ‘मॉक पार्लमेंट’चे आयोजन करण्यात आले आहे.या ‘मॉक पार्लमेंट’चे
उद्घाटन भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ,भाजप सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांचा हस्ते उद्घाटन झाले.यावेळी 50 वर्षापूर्वी लावण्यात आलेल्या आणीबाणीवर चर्चा होणार आहे
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
डोंबिवली न्यूज फ्लश..
रेल्वे प्रवासात महिलांची सुरक्षितता धोक्यात
मद्यपी तरुणाचा महिलांच्या डब्यातून डोंबिवली ते मुंब्रा प्रवास
डोंबिवलीहून 10. 34 मिनिटांची सीएसटीएमला जाणाऱ्या एसी लोकल मधून मद्यपीचा प्रवास
महिलांनी विनंती करून देखील मद्यपीने दाद दिली नाही
व्हिडिओ व्हायरल,
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
Anchor -- विठुरायाच्या २४ तास दर्शनाला आजपासून सुरुवात , देवाचा पलंग निघाला , देवाचे नवरात्र सुरू
विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीची वाट चालू लागले असताना पंढरी देखील हजारो भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेली आहे . आषाढी साठी येणाऱ्या लाखो भाविकांना देवाच्या दर्शन घेता यावे यासाठी आज देवाचा चांदीचा पलंग काढून दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले करण्यात आले आहे . आज पासून विठुरायाचे नवरात्र सुरू होत असल्याने देवाच्या विश्रांतीचा चांदीचा पलंग या नवरात्री काळात काढण्याची परंपरा असल्याने आज विधिवत पूजा करून हे नवरात्र बसविण्यात आले .
आज सकाळी देवाच्या पूजे नंतर देवाच्या मागे आणि रुक्मिणी मातेच्या पाठीला मऊ कापसाचा लोड लावण्यात आला असून आता २४ तास दर्शनासाठी उभ्या असलेल्या विठुरायाला थकवा जाणवू नये यासाठि ही व्यवस्था करायची परंपरा आहे .
आज सकाळी देवाच्या शेजघरातील पलंग बाहेर काढण्यात आला . यावेळी या चांदीच्या पलंगावरील देवाच्या गाद्या गिरद्या देखील बाहेर काढून ठेवण्यात आल्या . देवाचे शेजघर मोकळे करून ठेवण्यात आले . आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करून देव फक्त भाविकांच्या दर्शनासाठी सज्ज झाला आहे .
असे असतील विठुरायाचे नित्यक्रम -- पहाटे साडेचार वाजता देवाचे स्नान आणि नित्यपूजा करण्यात येईल या काळात फक्त १ तास दर्शन बंद असेल . यानंतर दुपारी महानैवेद्याला १५ मिनिटे आणि रात्री नऊ वाजता लिंबू पाणी देण्यासाठी १५ मिनिटे दर्शन थांबविण्यात येणार आहे . याशिवाय संपूर्ण दिवस रात्र विठुराया आपल्या लाडक्या भक्तांना दर्शन देत उभा असणार आहे .
देवाचे दर्शन २४ तास खुले केल्याने आता रोज पायावर ५० ते ६० हजार तर मुखदर्शनातून ५० ते ६० हजार भाविकांना दर्शन मिळू शकणार आहे . सध्या गर्दी वाढू लागल्याने मिनिटाला ४० भाविकांच्या दर्शनाचा वेग आता मंदिर समितीला वाढवावा लागणार असून मुखदर्शन रांगेत देखील जास्तीतजास्त भाविकांना दर्शन देता यावे यासाठी वेग वाढवावा लागणार आहे . आषाढी यात्रा काळात देवाचे दर्शन घेण्यास १८ ते २० तास अवधी लागत असल्याने सध्या रोज लाखभर भाविक दर्शनासाठी येथे येत असून सध्या ८ ते १० तासात देवाचे दर्शन मिळत आहे . आता आजपासून २४ तास दर्शन व्यवस्था सुरू झाल्याने हाच अवधी कमी होऊ शकणार आहे.
--------
Byte - गहिनीनाथ महाराज औसेकर
wkt सचिन कसबे
0
Share
Report
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 2606ZT_INDRAPURAAROGY
FILE 5
राज्य महिला आयोग व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने आषाढी वारी काळात महिला वारकऱ्यांच्या स्वच्छ व सुरक्षित प्रवासासाठी आरोग्यवारीला सुरुवात. ...
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीत
क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या उपस्थित झाले आरोग्यावारीचे उद्घाटन
ANCHOR महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य वारीला आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात उत्साहात सुरुवात झाली. या आरोग्यवारी अंतर्गत गावात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.आरोग्य वारी अंतर्गत महिलांच्या आरोग्य तपासण्या, जनजागृती कार्यक्रम, तसेच मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
0
Share
Report
Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी - समुद्राच्या उधाणाचा वेळास गावाला फटका
उधाणामुळे सर्व कचरा वेळास - बाणकोट मार्गावर
मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर आल्याने वाहतूकीस होतोय अडथळा
ग्रामस्थांना देखील इथून चालत जाताना करावी लागतेय कसरत
समुद्राला लागून असलेलं वेळास गाव कासवांच गाव म्हणून जगप्रसिद्ध ओळख
मोठ्या संख्येनं पर्यटकांची पावलं ही वेळास गावाकडे वळतात
कच-यामुळे होतेय गावाचे विद्रुपीकरण
धुपप्रतिबंधक बंधा-याची होतेय ग्रामस्थांकडून मागणी
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Accident
Feed on - 2C
-----------------------------
Anchor - एस टी बस आणि ऑटोचा अपघात होऊन दहा प्रवासी जखमी झाले. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात काल हा अपघात घडला. देगलूर आगारातून बस उदगीरकडे जात होती. गोजेगाव येथून दहा प्रवासी घेऊन ऑटो देगलूरकडे जात होता. करडखेड वाय पॉईंटजवळ बसच्या एका बाजूला ऑटोची धडक बसली. या अपघातात ऑटोमधील दहा प्रवासी जखमी झाले. अपघातातील जखमीवर देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. सुदैवाने अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.
--------
0
Share
Report