Back
शिरूरच्या थिटेवाडी धरणाचा विसर्ग: शेतकऱ्यांना दिलासा!
Shirur, Maharashtra
Feed 2C
Slug: Shirur Thitewadi Dam Overflow
File:02
Rep: Hemant Chapude ( Shirur)
Anc: उत्तर पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळे शिरूर तालुक्यातील पाबळ येथील थिटेवाडी धरण ओव्हर फ्लो झाल असून धरणाच्या सांडव्या वरुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, यंदा जून महिन्यातच हे धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने या भागातील शेतकऱ्यांचा वर्षभराचा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे याचाच धरण परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी
Wkt: हेमंत चापुडे (प्रतिनिधी)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Thane, Maharashtra:
राष्ट्रवादी महाराष्ट्र मुख्य प्रवक्ते
आनंद परांजपे बाईट पॉइंटर
लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला आपली बाजू मांडण्याचा संपूर्ण अधिकार आणि स्वातंत्र्य आहे पण महायुतीचं सरकार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देण्यात येईल अशा प्रकारची स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मांडलेली आहे आणि महायुतीच्या सरकार शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे..
कुठल्याही प्रकारचे आंदोलन केली तरी महाराष्ट्राची जनता आणि बळीराजा हा सरकारच्या मागे उभा आहे..
शेवटी असं आहे की लोकशाहीमध्ये ज्या वळेला निवडणुका होतात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटांनी तर 90 पेक्षा अधिकच्या जागा लढल्या आणि केवळ दहा आमदार संपूर्ण महाराष्ट्र त्यांचे निवडून आले त्या नैराश्येतून अजून देखील तो पक्ष बाहेर येत नाहीये महायुतीची भूमिका स्पष्ट आहे की योग्य वेळेला बळीराजाला संपूर्ण कर्जमाफी हे महायुतीचे सरकार देईल..
18 ते 20 हजार कोटी रुपये ही वीज माफी देण्यात आली सोयाबीन असेल कापूस असेल यांना चांगला भाव देण्यात आला आणि त्यामुळे सातत्याने हे सरकार बळीराजाच्या मागे खंबीरपणे उभी आहे ..
ज्यांना नाटक करायचे काम आहे...
ऑन राऊत..
जी भूमिका पहिली ते चौथी हिंदी नको अशा प्रकारची भूमिका ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले बहुतेक तो बाईट संजय राऊत यांनी ऐकला नसेल..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका जी राष्ट्रीय अध्यक्षांनी मांडली पहिली ते चौथी हिंदी नको पाचवी नंतर हिंदी असावी अशा प्रकारची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे आणि ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांची त्यांची भेट होईल त्यावेळेला मुख्यमंत्री असतील त्यांच्याशी अजित दादा पवार नक्कीच या विषयावर चर्चा करतीl..
राष्ट्रवादीची भूमिका मी स्पष्टपणे मांडलेली आहे सोमवारपासूनच पावसाळी अधिवेशन सुरू होतंय ज्या वेळेला महायुतीचे तिन्ही नेते एकत्रितपणे बसतील त्यावेळेला योग्य तोडगा कुठेही मराठी भाषेवर अन्याय होईल अशा प्रकारचा निर्णय महायुतीचे सरकार घेणार नाही हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम केलं त्यामुळे मराठी हीच महाराष्ट्राची भाषा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी भाषेच्या विरोधात जाईल असा कुठलाही निर्णय महायुतीचे सरकार घेणार राष्ट्रवादी घेणार नाही.
त्यांना लव यू कुणाला बोलायचं होतं त्यांना विचारलं तर बरं राहील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली वेगळा राजकीय पक्ष आहे. आमची वेगळी राजकीय भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीच्या घटक पक्ष आहोत आणि केंद्रातील एनडीए सरकारमध्ये आम्ही आहेत..
एकत्र यायचं की नाही हे अजित पवार ठरवतील..
जयंत पाटील हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ते प्रांतात अध क्ष आहेत त्यांनी कधी कसा निर्णय घ्यावा यावर बोलू शकत नाही...
त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले असेल.परंतु अजित पवार यांच्या पक्ष कडे नाही...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुती घटक पक्ष आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हा महायुतीमध्येच लढण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे महाराष्ट्राचे महायुतीचे तिन्ही नेते महायुतीबद्दलचा योग्य निर्णय घेतील...
0
Share
Report
Akola, Maharashtra:
Anchor : पहिली ते तिसरीपर्यंत हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहे , तर त्यांच्या एकत्र येण्याचा फायदा राज्याला होणार का ? हिंदी सक्ती नामंजूर होणार का ? काय आहे जनतेच्या मनात पाहूया..
Byte : 6 bytes आहेत..
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मोर्चाला समर्थन..
Anc हिंदी सक्तीच्या विरोधात मुंबईमध्ये पाच तारखेला होणाऱ्या मोर्चेला डोंबिवलीतील नागरिकांनी समर्थन दिला आहे जे मोर्चा होणार आहे तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने मराठी माणसांचा भलं होणार आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र आले तर महाराष्ट्रासाठी दोन्ही भाऊ काहीतरी करतील असा विश्वास डोंबिवलीकरांनी दर्शवला आहे
Byte... नागरिक 3
डोंबिवलीकर
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडाऱ्यात आगमन... जल पर्यटनाला दिली भेट
Anchor ;- शिवसेना शिंदे गट तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टरने भंडाऱ्यात आगमन झाले असून याप्रसंगी राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यावेळी मंचर उपस्थित आहेत उपमुख्यमंत्री यांनी भंडारा शहरातील जल पर्यटन प्रकल्पाला भेट दिली आहे हे विशेष...!
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2806ZT_WSM_UNCLEAN_WATER_SUPPLY
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिम शहरातील नागरिकांना दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून तोही गढूळ, गाळयुक्त आणि अस्वच्छ पाणीपुरवठा करण्यात आला असून, हे पाणी ना पिण्यायोग्य आहे ना घरगुती वापरासाठी सुरक्षित.परिणामी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून नालेसफाई,अपुरा पाणी शुद्धीकरण प्रक्रिया आणि जलवाहिन्यांतील गाळ यामुळे पाणी पुरवठ्याचा दर्जा खालावला आहे.शहरातील अनेक भागांतून अशा निकृष्ट पाण्याच्या तक्रारी सातत्याने येत असूनही नगरपालिकेकडून त्याकडे दुर्लक्षच केले जात आहे.स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष गंभीर बाब मानली जात आहे.त्यामुळे लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा,अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
बाईट:रवी वानखेडे,
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेच्या बसवरील ‘माय मरो… मौसी जगो!’ बॅनर चर्चेचा विषय;.. शिक्षण क्षेत्रातूनच हिंदी सक्तीविरोधात आवाज
Anc.. डोंबिवलीत विद्यानिकेतन शाळेच्या बसवर लावलेला “माय मरो… मौसी जगो!” बॅनर सध्या सोशल मीडियावर आणि शहरभर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. मराठी भाषेवरील वाढता अन्याय, मुंबईतील मराठी लोकसंख्येचा घटता टक्का, आणि शिक्षण संस्थांमधील हिंदी सक्ती यावर या बॅनरद्वारे थेट आणि परखड भाष्य करण्यात आलं आहे.विशेष म्हणजे, हा विरोध कुणा राजकीय पक्षाकडून नव्हे, तर थेट शाळा प्रशासन, शिक्षक आणि पालकांच्या वतीने झाल्याचं चित्र समोर येतं आहे यात २० पेक्षा कमी मराठी विद्यार्थ्यांसाठी हिंदी सक्ती केली जाते ,अनेक शाळा सातवी-आठवी नंतर मराठी विषय थांबवतात शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन मराठी अस्मिता आणि हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढण्याच्या पार्श्वभूमीवर हा बॅनर खालीपासून उठणाऱ्या आवाजाचं प्रतीक ठरत आहे.या बॅनरमुळे मराठी भाषिक समाजातील असंतोष आणि अस्मितेची भावना पुन्हा एकदा उफाळून आली आहे, आणि शिक्षण क्षेत्रात हिंदी सक्तीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला दुसऱ्या दिवशीही विरोध,तिसंगी मध्ये आक्रमक शेतकऱ्यांनी मोजणी सलग दुसऱ्या दिवशीही धरली रोखून..
अँकर - शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीमध्ये आंदोलन सुरूच आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातल्या तिसंगी येथे सलग दुसऱ्या दिवशीही शेतकरयांनी मोजणी रोखून धरली आहे.कालपासून शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन संपादन करण्याच्या प्रक्रियेसाठी पोलीस फौज फाट्यासह प्रशासनाकडून मोजणीची प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय,मात्र शेतकऱ्यांकडून याला तीव्र विरोध करण्यात येतोय दुसऱ्या दिवशीही प्रशासनाला शेतकऱ्यांनी मोजणीपासून रोखून धरला आहे कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही,अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे तिसंगी या ठिकाणची मोजणी प्रक्रिया थांबलेली आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा देखील तैनात आहे,मात्र शेतकऱ्यांचा रोष पाहता प्रशासनाकडून मोजणी थांबवण्यात आली आहे.
बाईट - दिगंबर कांबळे - नेते - शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समिती.
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_THOSEGHAR_WKT
सातारा -निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण असलेल्या सातारा जिल्ह्यातील ठोसेघर धबधबा ओसंडून वाहू लागला आहे . पावसाळ्यामुळे तब्बल 1500 फुटावरून कोसळणारा हा ठोसेघर धबधबा पाहण्या साठी राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत .
विओ १- उंचावरून कोसळणारे पांढरे शुभ्र फेसळणारे पाणी...हिरवागार निसर्ग...काही किलोमीटर चा घाट रस्ता या अशा सातारा शहरा पासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेला ठोसेघर धबधबा पर्यटनचा केंद्र बिंदू ठरू पाहतोय . या भागात अनेक छोटे मोठे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत . या ठिकाणी धबधब्याचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक ग्यालेरी सुद्धा उभारण्यात आली आहे . सुरक्षित पणे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या मुळे पर्यटक खुश आहेत आणि या धबधब्याचा मनमुराद आनंद घेत आहेत . त्याच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी
wkt
0
Share
Report
Pune, Maharashtra:
pimpri fraud baba
kailas puri pune 28- 6- 25
feed by 2c
Anchor - ... पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या बावधन पोलिसांनी एका भोंदू भावाला अटक केलीय. प्रसाद दादा उर्फ दादा उर्फ प्रसाद दादा भीमराव तामदार असं अटक केलेल्या 29 वर्षीय भोंदू बाबा च नाव आहे. त्याच्या विरुद्ध एका 39 वर्षीय व्यक्तींन बावधन पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार या भोंदू बाबांना त्याच्याकडे दिव्यशक्ती असल्याच बसवत फिर्यादीला अनेक गोष्टी करण्यास भाग पाडले. या भोंदू बाबांनी फिर्यादीच्या मोबाईल मध्ये एक ॲप डाऊनलोड करत त्याद्वारे मोबाईलचा ऍक्सेस मिळवत फिर्यादी आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या खाजगी घटनांवर लक्ष ठेवले.. एवढेच नाही तर फिर्यादीला प्रेयसी बरोबर अश्लील कृत्य त्याच बरोबर वेश्या गमन करण्यासही भाग पाडल्याचं आणि मोबाईल ॲप द्वारे ते बाबाने पाहिल्याचं फिर्यादित नमूद करण्यात आलं आहे. या भोंदू बाबा ने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादित सांगण्यात आलं आहे. फिर्यादी बरोबरच इतरही अनेकांना या बाबा ने फसवणूक केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय... याच संदर्भात पोलिस उपायुक्त बापू बांगर यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी....!
kailas 1 to 1+ vis
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn murder update avb
Feed on 2 c
एका महिला कीर्तनकारची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना तालुक्यातील चिंचडगाव शिवारात शनिवार रोजी सकाळी साडे सहावाजेच्या सुमारास उघडकीस आली. हभप संगीता ताई अण्णासाहेब पवार वय 50 वर्षे राहणार चिंचडगाव असे घटनेतील मयत कीर्तनकार महिलेचे नाव आहे.या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितींनुसार हभप संगीता ताई पवार या चिंचडगाव येथील सदगुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रम येथे रहिवासास होत्या,शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिरातील पुजारी शिवाजी चौधरी हे नेहमीप्रमाणे मंदिरात पूजे साठी आले होते,त्यांनी हभप संगीता ताई पवार यांना आवाज दिला मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने मंदिरा शेजारी असलेल्या शेड मध्ये जाऊन बघितले असता त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या,यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच वीरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक, व फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले.उपविभागीय पोलिस अधिकारी फुंदे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहे.
Byte भागवत फुंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी
0
Share
Report