Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

गोपाळपूर नगरीत संतांची पालखी, भक्तिमय वातावरणात गोपाळकाला संपन्न!

SKSACHIN KASABE
Jul 10, 2025 04:01:25
Pandharpur, Maharashtra
10072025 Slug - PPR_GOPALKALA feed on 2c file 01 ------- Anchor - 'गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला' या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूर नगरी लाखो वारकर्‍यांच्या गजराने दुमदुमून गेली. ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजरात गोपाळपुरात मानाच्या पालख्यांसह सर्व संताच्या पालख्या दाखल झाल्या. गोपाळ काल्यानंतर सायंकाळी पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर येथे मानाची अंमळनेरकर महाराजांची दिंडी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे पाच वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली. त्यानंतर भजन झाले. गण गण गणात बोते आणि विठू नामाचा जयघोष करीत शेगावच्या श्री संत गजानन महाराज पालखीचे पहाटे 4.30 वाजता गोपाळपुरात आगमन झाले. पहाटेपासूनच एकामागोमाग एक अशा सुमारे 350 संतांच्या दिंड्या, पालख्या विठ्ठलनामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल झाल्या होत्या. जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांची संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळे गोपाळपुरात दाखल झाले. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. मंदिराजवळ पालख्या विसावल्या. या पालख्यासह संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत गोरोबा, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, चांगावटेश्वर देवस्थान यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांचे व दिड्यांचे गोपाळपुरात आगमन झाले. अशा भक्तिमय वातावरणात गोपाळकाला संपन्न झाला
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top