Back
पिटबुलचा बैलावर हल्ला! नागरिकांनी वाचवले!
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - मिरजेत पेटबुल जातीच्या श्वानाचा बैलावर हल्ला,भर रस्त्यात बैलाच्या तोंडांचे तोडला लचका..
अँकर - सांगलीच्या मिरजेत एका पिटबुल जातीच्या श्वानाने बैलावर हल्ला करत बैलाच्या तोंडाचे लचके तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.बैलगाडीला बांधलेला बैलावर हल्ला चढवत पिटबुल जातीच्या श्वानाने बैलावर हल्ला चढवला आणि त्यानंतर अक्षरशः बैलाच्या तोंडाचे लचके तोडत त्याच्या मानेचा देखील चावा घेतला, कुत्र्याच्या तावडीतून बैलाला वाचवण्यासाठी यावेळी नागरिकांकडून प्रयत्न प्रयत्न करत बैलाची सुटका केली,त्यानंतर महापालिकेच्या डॉग व्हॅन पथकाकडून कुत्र्याला ताब्यात घेण्यात आलाय,सदर घटनेमध्ये बैल गंभीर जखमी झाला आहे, दरम्यान प्रकरणी बैलाच्या मालकाने कुत्र्याच्या मालका विरोधात महात्मा गांधी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Kalyan, Maharashtra:
हिंदी सक्तीविरोधी मोर्चा रद्द, पण ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची कार्यकर्त्यांची मागणी कायम
कल्याणमध्ये उद्धव, बाळासाहेब व राज ठाकरे यांच्या एकत्रित फोटोसह भावनिक बॅनर झळकले
हीच ती वेळ महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी, मराठी माणसासाठी एकत्र या.." अभि नहीं तो कभी नही " अशा आशयाने लागले बॅनर
Anchor :- हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू एकत्र आले . पाच जुलै रोजी मनसे आणि ठाकरे गटाचा एकत्रित मोर्चा निघणार होता मात्र त्याआधीच सरकारने हिंदीभाषा सक्ती रद्द केली . ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने ठाकरे गटासह मनसे कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे . मोर्चा रद्द झाल्याने आता या दोघांना एकत्रितपणेच पाहण्याची इच्छा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे . या पार्श्वभूमीवर कल्याण मध्ये झळकलेला बॅनर हा चर्चेचा विषय ठरलाय . या बॅनर मध्ये उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र फोटो लावण्यात आलाय .तसेच मोर्चा जरी रद्द झाला असेल तरी एकत्र या , "हीच ती वेळ महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी, मराठी माणसासाठी एकत्र या.." अभि नहीं तो कभी नही " अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आलाय . गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी ठाकरे गटासह मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी केली जात आहे . त्यातच आता मोर्चा रद्द झाला असला तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र यावं अशी भावना कार्यकर्त्यांनी बॅनरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग...
बाल सुधारगृहातून फिल्मीस्टाईल नऊ अल्पवयीन युवतींचे पलायन....
शहरातील छावणी बाल सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या नऊ मुलींचे पलायन....का निघून गेल्या कारण अस्पष्ट
जालना रोडवर दामिनी पथकाने पाठलाग करून सात मुलींना पकडले, दोन मुली अद्यापही फरार...
पलायन करणारा मुलींनी त्यांना थांबवणाऱ्या पोलिसांच्या दामिनी पथकावर केली दगडफेक...
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
शॉक सर्किट मुले एका घराला आग आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक तर,. एक जण किरकोळ जखमी
Anc..कल्याण पश्चिम वल्लीफिर रोडवरील मेहमान मस्जिद परिसरात गुलजार टांगे वाली चाळीतील एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे शॉर्टसर्किटमुळे लागली आग लागल्याची प्राथमिक अंदाज आहे संपूर्ण मात्र या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झाला असून घरात एक वेक्ती किरकोळ जखमी झाला असून त्याच्या वर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.तर सिलेंडर ब्लास्ट होण्याच्या भीतीने परिसरात मोठी धावपळ; नागरिकांनी आपल्या घरातील सिलेंडर घराबाहेर फेकलेअग्निशामक दल घटनास्थळी पोहचत आगीवर मिळवलं नियंत्रण मिळवले
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
भंडारा जिल्हात पावसाने झोडपले
Anchor - भंडारा जिल्हात आज सकाळ पासून संतधार पावसाला सुरुवात झाली असून दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने झोडपले असून जिल्हातील शेतकऱ्यांचे पेरणी खोळमंबली होती. मात्र ह्या दमदार पावसामुळे वातावरणा मध्ये गारवा निर्माण झालं असला तरी शेतकऱ्यांना रोवणी करिता दिलासा मिळाला आहे.
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
30062025
slug - PPR_PALKMANTRI
feed on 2c
file 01
-------
Anchor - पालकमंत्री जयकुमार गोरे आणि त्यांच्या पत्नीने वारीच्या वाटेवर खेळली फुगडी
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले.पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, यांच्या सह प्रशासन मधील अधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी पालकमंत्री जय कुमार गोरे यांनी त्यांच्या पत्नी सौ. सोनिया गोरे यांच्या समवेत वारकऱ्यांच्या उपस्थितीत फुगडी खेळत पालखी सोहळ्यात सहभागी झाले.
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:3006ZT_WSM_COTTON_CULTIVATION
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर :वाशिम जिल्ह्यात यंदा 26 हजार 438 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी अपेक्षित होती. मात्र आत्तापर्यंत केवळ 7 हजार 318 हेक्टर अर्थात सरासरीच्या केवळ 27.68 टक्के क्षेत्रावरच पेरणी होऊ शकलये.आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक मानोरा तालुक्यात 3 हजार 544 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालीये.आधी पावसात पडलेला खंड आणि आता सतत सुरू असलेला पाऊस यामुळं कपाशीच्या पेरणीला विलंब होताना दिसतोय.
0
Share
Report
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - शेतकऱ्यांचे ऊस बिल अदा करा या मागणीसाठी ठाकरे सेनेचे अक्कलकोट मध्ये रास्ता रोको आंदोलन
- शेतकऱ्यांचे ऊस बिल देण्यासाठी शेतकरी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे रास्ता रोको आंदोलन
- अक्कलकोट तालुक्यातील एम एस सी बी चौकात तब्बल एक तासांचा केला रास्ता रोको
- अनेक शेतकऱ्यांची साखर कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात ऊस बिलाची थकबाकी असून ती त्वरित अदा करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि शिवसैनिक आक्रमक
- ऊस बिलासाठी शेतकऱ्यांना वारंवार चुकीच्या तारखा देत असल्याचा ठाकरे सेनेचा आरोप
- वारंवार पक्षाच्यावतीने निवेदन देऊन देखील ऊस बिल अदा होत नसल्याने ठाकरे सेना आक्रमक
साऊंड बाईट -
आनंद बुक्कानुरे ( उबाठा अक्कलकोट तालुकाप्रमुख )
0
Share
Report
Shirdi, Maharashtra:
Anc - प्रसिद्ध दाक्षिणात्य सिने अभिनेते नितिन रेड्डी याने आज साई दरबारी हजेरी लावत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलय...साई दर्शनानंतर साईबाबा संस्थानचे वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला...
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn sachin ghayal by te
Fees on 2 c , use in shivsena beaten pkg
संत एकनाथ कारखान्याचे चेअरमन आणि शिवसेनेचे उपनेते सचिन घायाळ यांनी शेतकऱ्याला मारहाण केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे त्याचा आणि आमचा काहीही संबंध नाही त्यांना कारखान्यात ऊसही दिला नाही असा दावा सचिन घायाळ यांनी केला आहे.. राजकीय वैमनस्य तुन मला बदनाम करण्याचा हा कट असल्याचा सचिन घायाळ यांचं म्हणणं आहे
Byte सचिन घायाळ, साखर कारखाना अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 3006ZT_CHP_POSTMAN_DEATH_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मुधोली प्रा. आ. केंद्रात डॉक्टरने रुग्णवाहिका न दिल्यामुळे 25 वर्षीय युवा पोस्टमास्टरचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप, आरोग्य विभागाने फेटाळले आरोप
अँकर:-- डॉक्टरने रुग्णवाहिका न दिल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात एका 25 वर्षीय युवा पोस्टमास्टर चा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंकित उर्फ कुणाल गायकवाड असं या पोस्टमास्टरचं नाव असून भद्रावती तालुक्यातील मुधोली येथे पोस्टमास्टर म्हणून ते कार्यरत होते. काल पहाटे अचानक त्यांची तब्येत बिघडली, त्यामुळे त्यांना गावातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. यावेळी डॉक्टरने तपासणी करून त्यांच्या ऑक्सिजनची पातळी अतिशय कमी असल्याचे सांगितलं आणि सोबतच तातडीने त्यांना चंद्रपूरला नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर गावकऱ्यांनी डॉक्टरांकडे रुग्णवाहिकेची मागणी केली मात्र डॉक्टरांनी रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचं कारण सांगत रुग्णवाहिका देण्यास नकार दिला. त्यानंतर गावकऱ्यांनी एका मेटाडोर मधून पोस्टमास्टर यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये रोष असून त्यांनी या घटनेला डॉक्टरांची हलगर्जी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते डॉक्टर हे खाजगी कामांसाठी रुग्णवाहिका वापरतात मात्र रुग्णांना रुग्णवाहिका देण्यास टाळाटाळ करतात. या घटने विरोधात दोषी डॉक्टरवर कारवाई ची मागणी करत गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे पोस्टमास्टर चा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या आरोपांवर जिल्हा प्रशासनाने खुलासा दिलाय. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी स्वतः गावात जाऊन चौकशी केल्याचं सांगत रुग्णाच्या नातेवाईकांनी कुठल्याही प्रकारच्या रुग्णवाहिकेची मागणी केली नव्हती असं सांगितलं आहे. रुग्णवाहिका त्याच ठिकाणी उपलब्ध होती रुग्णवाहिका न देण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही, हे सर्व आरोप गैरसमजुतीतून झाल्याचा डॉक्टर कटारे यांनी खुलासा केलाय.
बाईट १) मयूर धारणे, ग्रामस्थ
बाईट २) तुळशीराम श्रीरामे, माजी सभापती, पंचायत समिती
बाईट ३) डॉ. अशोक कटारे, जिल्हा आरोग्य अधिकारी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report