Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध, अधिकारी अडकले!

SMSarfaraj Musa
Jun 27, 2025 13:00:31
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - शक्तीपीठ महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी धरली रोखून,अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या मध्ये वादा-वादा.. अँकर - शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातल्या तिसंगी येथे रोखून धरण्यात आले आहे,मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या सोबत शेतकऱ्यांचा वादावादीचा प्रकार देखील घडला आहे. सकाळपासून प्रशासनाचे अधिकारी पोलीस पाऊस फाटा घेऊन मोजणीसाठी तिसंगी मध्ये तळ ठोकून आहेत,मात्र शेतकऱ्यांकडून विरोध दर्शवण्यात आला आहे.कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी होऊ देणार नाही,अशी भूमिका शेतकऱ्यांकडून घेण्यात आली आहे.त्यामुळे तिसंगी मध्ये शासकीय अधिकाऱ्यांना सकाळपासून थांबून राहावे लागत आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्यपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे,अशी भूमिका शेतकऱ्यांकडून घेण्यात आली आहे. बाईट - दिगंबर कांबळे - नेते - शक्तिपीठ विरोधी महामार्ग कृती समिती,सांगली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 19, 2025 01:16:19
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- आरक्षणाच्या लढाईत जसा नियम इतरांना लावला तोच नियम ओबीसी समाजालाही लावा.... मंत्री पंकजा मुंडे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेणार मंत्री पंकजा मुंडे मंगळवारी भेट.... AC ::- आरक्षणाच्या लढाईत जसा नियम इतरांना लावला आहे तोच नियम ओबीसी समाजालाही लागू व्हावा या मागणीसाठी मंगळवारी मंत्री पंकजा मुंडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेऊन त्यांना विनंती करणारा असल्याचे माहिती पंकजा मुंडे यांनी दिले आहे. लातूरच्या भरत कराड यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांशी मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी त्यांनी गावकऱ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं सांगितला आहे. साऊंड बाईट ::- मंत्री पंकजा मुंडे
2
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 19, 2025 01:16:10
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 19, 2025 01:16:01
Kalyan, Maharashtra:केडीएमसीच्या कल्याणातील चार्य अत्रें नाट्यगृहातील उपहारगृहात प्रेक्षकांना विकले "Expiry coldirnk" उपहारगृह चालकाचा बेजबाबदारपणा नागरिकांनी केला उघड .व्हिडीओ वायरल Anchor :- केडीएमसीच्या कल्याण मधील आचार्य अत्रे रंग मंदिर नाट्यगृहात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला .आचार्य अत्रे नाट्यगृहात आज रात्रीच्या सुमारास जिग्नेश भाई ठक्कर या नाटकाचा प्रयोग सुरू होता .साडेदहा वाजता इंटरवल झाल्यावर प्रेक्षक नाट्यगृहातील उपहारगृहत गेले . काही प्रेक्षकांनी या उपहारगृहातून कोल्ड्रिंक्स बॉटल विकत घेतल्या. 20 रुपये किंमत असलेल्या बॉटल या उपहारगृह चालकाने त्यांना 25 रुपयाला दिल्या . प्रेक्षकांनी देखील वाढीव किंमत देऊन या बॉटल्स घेतल्या. मात्र काही जणांनी हे कोल्ड्रिंक पिल्यानंतर बॉटल पाहिले असता त्या बॉटलवर एक्सपायरी डेट दिसली .ती पाहून त्यांना धक्काच बसला या बॉटलची एक्सपायरी पंधरा-वीस दिवसापूर्वीच झाली होती. प्रेक्षकांनी याबाबत उपहारगृह चालकाला जाब विचारला यावेळी अत्रे रंग मंदिरात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं .उपाहारगृह मालकाने आपली चूक कबूल केली मात्र प्रेक्षकांनी एक्सपायरी डेट मुदत संपलेले कोल्ड्रिंक विकल्याने उपहारगृह चालकाची मात्र चांगलेच करडपट्टी काढली तसेच त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 19, 2025 01:15:45
Ambernath, Maharashtra:वडिलांना उपचारासाठी रुग्णालयात नेले चोरट्यांनी घर साफ केले तीन लाखांची रोकड, १० तोळे दागिन्यांवर डल्ला Ulh theft cctv Anchor :- वडिलांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेलेल्या मुलाचे घर चोरट्यांनी साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरट्यांनी घरातील तीन लाखांची रोकड आणि १० तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यानुसार चोरट्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.कॅम्प नंबर २ च्या आवती चौक परिसरातील बॅरेक क्रमांक २९३ मध्ये राहणारे शंकर बलानी यांच्या वडिलांची तब्येत रविवारी रात्री अचानक बिघडली. त्यामुळे शंकर व त्यांची पत्नी वडिलांना घेऊन रुग्णालयात गेले. त्यानंतर शंकर रुग्णालयातून घरी परत आले आणि त्यांना धककाच बसला, त्यांच्या दाराचे कलूप तुटलेले होते , घरात गेल्यावर त्यांनी पाहिले तर त्यांचे कपाट खोललेले होते, त्या कपाटातून रोख रक्कम तसेच दागिने घेऊन चोर फार झाले होते, याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही च्या आधारे चोराचा पोलीस शोध घेत आहेत. चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 19, 2025 01:15:18
Ambernath, Maharashtra:चिखलोली धरणात रासायनिक सांडपाणी सोडल्याचं प्रकरण आर. के. इंजीनियरिंग कंपनीला क्लोजर नोटीस एमपीसीबीने स्थळपाहणी करून केली कारवाई कंपनीचा वीज आणि पाणीपुरवठाही खंडित Amb midc pollution Anchor : अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाच्या ओढ्यात ऍसिड मिश्रित सांडपाणी सोडल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आर. के. इंजीनियरिंग वर्क्स या कंपनीवर ठपका ठेवत क्लोजर नोटीस बजावली आहे. यानंतर कंपनीचं काम बंद करण्यात आलं असून वीज आणि पाणीपुरवठाही खंडित करण्याचे आदेश एमपीसीबीने दिले आहेत. तर कंपनीने मात्र आपल्यावर झालेली कारवाई चुकीची असल्याचा दावा केला आहे. चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 18, 2025 18:01:38
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1809ZT_CHP_LEOPARD_DARE ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील गडबोरी गावात बिबट्याने सात वर्षीय मुलाला काकाच्या हातातून ओढून नेल्याची घटना , शोधकार्य सुरू, वनपथक घटनास्थळी      अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील गडबोरी गावात बिबट्याने सात वर्षीय मुलाला काकाच्या हातातून ओढून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.  ही घटना सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे घडली. प्रशिल बबन मानकर असं इयत्ता 2 री मध्ये शिकणाऱ्या मुलाचं नाव आहे. हा मुलगा संध्याकाळी गावातच मस्कऱ्या गणपती निमित्त आयोजित महाप्रसादात जेवणासाठी काका सोबत गेला होता. घरी परत येत असताना गावातीलच एका उघड्या बाथरूममध्ये दडून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालत काकाच्या हातातून मुलाला ओढून नेले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचा मोठा फौज-फाटा परिसरात दाखल झालाय. बेपत्ता मुलाचा आजूबाजूच्या परिसरात कसून शोध घेतला जात आहे. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
10
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 18, 2025 17:31:43
Sangli Miraj Kupwad, Maharashtra: सांगली ब्रेकिंग स्लग - गोपीचंद पडळकरांच्या जयंत पाटलांवरील जहरी टीकेनंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी आक्रमक,सांगली आणि जत मध्ये उद्या पडळकरां विरोधात निदर्शने आणि मोर्चा. अँकर - सांगलीच्या जत मधील अभियंता आत्महत्या प्रकरणावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर करण्यात आलेल्या जहरी टीकेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झालाय.पडळकरांच्या विरोधात नसांगली आणि जत मध्ये आंदोलन करण्यात येणार आहेत.सांगलीमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून पडळकर यांच्या निषेधार्थ राजारामबापु पाटील स्मारका समोर निदर्शने करण्यात येणार आहेत त्याचबरोबर जत मध्ये महाविकास आघाडीचे नेते व इस्लामपूर मतदारसंघातील जयंत पाटील यांचे समर्थक एकत्रित जत मध्ये भव्य मोर्चा काढणार आहेत.
11
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 18, 2025 16:33:09
Washim, Maharashtra:वाशिम: File:1809ZT_WSM_LOWHEIGHT_BRIDGE रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशीम जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत.अशा परिस्थितीत देवठाणा बुद्रुक येथील चंद्रभागा नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.परिसरात थोडा जरी पाऊस झाला तरी पुल पुराच्या पाण्यात बुडतो आणि नागरिकांना धोकादायक पद्धतीने वाट काढावी लागते.या पुलाची उंची कमी असल्याने विशेषत: पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेसाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. यामुळे वारंवार गावाचा तालुक्याशी संपर्क तुटतो.गावकऱ्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची उंची वाढवण्याची मागणी सातत्याने होत आहे.मात्र अद्यापही कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही.प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालून पुलाची उंची वाढवावी,अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
10
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Sept 18, 2025 16:32:52
Palghar, Maharashtra:पालघर - पालघरच्या एमआयडीसीत पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. स्फोटात एकाचा जागेचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत . पालघरच्या लिंबानी सॉल्ट इंडस्ट्रीज कंपनीत स्फोट झाला आहे . उत्पादन सुरुवात असताना स्फोट झाल्याची प्रशासनाची माहिती आहे. धातू आणि आम्लाच मिश्रण सुरू असताना स्फोट झाल्याची माहिती समोर आलीय . जखमींवर पालघरच्या ढवळे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख घटनास्थळी दाखल झाले आहेत . पालघर जिल्ह्यात एमआयडीसीत वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . Bite - यतीश देशमुख - पालघर पोलीस अधीक्षक
8
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 18, 2025 16:31:12
Kalyan, Maharashtra:खासदार श्रीकांत शिंदे 27 गावाच्या विविध समस्या घेऊन खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट 27 गावातील 499 कर्मचारी विषयी चर्चा होऊन त्यांना संबंधित विभागाशी बोलून त्या कर्मचारीला ज्या पदावर ते रुजू झाले आहेत त्यांना त्याच पदावरची रुजू कराची मागणी केली केली आणि शासनाने ती देखील मंजूर केली आहे 499 कर्मचाऱ्यांना 2010 मध्ये ज्या पदावरची स्थापना झाली होती त्याच पदावरती आज पुन्हा त्या पदावरती घेण्यात येईल असा नर्णय या बैठकीत झाला 180 कर्मचाऱ्यांना नवरात्रीच्या दिवशी कन्फर्मेशन लेटर पत्र त्यांना देण्यात येईल On संजय राऊत दिघे साहेबांना विरोध करायचं काम अशा लोकांनी केला आहे आत्ता जो रोज उठून शिव्या शाप देतात त्यांच्याकडनं दुसऱ्या अपेक्षा काही करू शकत नाही अशा लोकांकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही On राज ठाकरे निवडणुकी आल्या तर नेते येत असतात प्रत्येक नेता आपला पक्ष वाढवण्याचा काम करत असतो तसेच राज ठाकरे देखील उद्या येत आहेत byte.. श्रीकांत शिंदे खासदार
6
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 18, 2025 16:30:31
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1809ZT_CHP_MODI_FILM_1_2_3 ( 3 file sent on 2C)  टायटल :--- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणावर आधारित आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'चलो जीते हैं' लघुपटाचे चंद्रपुरात स्क्रिनिंग, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती अँकर : चंद्रपुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणावर आधारित 'चलो जीते हैं' या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लघुपटाच्या विशेष स्क्रिनिंगचे आयोजन एमडीआर मॉल येथील मिराज सिनेमात करण्यात आले. या वेळी राज्याचे माजी मंत्री भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लघुपटाच्या कथानकातून प्रेक्षकांना प्रेरणादायी संदेश मिळाल्याचे आणि लघुपट पाहून बाहेर पडल्यावर भारावून गेल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली. सामाजिक मूल्ये आणि संघर्षातून घडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवणाऱ्या या लघुपटाला चंद्रपुरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा लघुपट चंद्रपुरात 6 दिवस दाखविला जाणार आहे. बाईट १) आ. सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री, भाजप नेते आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
4
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 18, 2025 16:30:18
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Contro Feed on - 2C ----------------------------- Anchor - एकमेकांच्या शाळेतून टी सी काढण्याच्या अर्जानंतर आता पुन्हा त्याच गावात मराठा ओबीसी मध्ये वाद होऊन हाणामारीची घटना घडली. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातल्या रिसनगाव येथे मराठा आणि ओबीसी वाद पुन्हा पेटला. यात दोन्ही गटात हाणामारी होऊन तीन जण जखमी झाले. शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी हैदराबाद गॅझेट लागु केल्याच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामूळे रिसनगाव येथील धोंडे यांच्या शिक्षण संस्थेतील मीनाताई ठाकरे निवासी आश्रम शाळेतून मराठा विद्यार्थ्यांची टीसी काढून घेण्यासाठी 21 मराठा पालकांनी अर्ज केला होता. त्यानंतर ओबीसी समाजाने देखील मराठा समाजाच्या शिक्षण संस्थेतील शाळेतून पाल्यांना काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच आज रिसनगाव मध्ये आज एक बैठक होती. या बैठकीदरम्यान मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने आले . त्यांच्यात वाद होऊन हानामारी झाली. यात दोन्ही गटातील तीन जण जखमी झाले. दरम्यान मनोहर धोंडे त्यांनी या घटनेचा निषेध केला. तर भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. तर हा दोन समाजातील व्यक्तींमध्ये झालेला अंतर्गत वाद आहे. याबाबत कुठल्याही अफवा पसरवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सध्या गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून , गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू आहे ... Byte - सुरज गुरव - अप्पर पोलीस अधीक्षक. Byte - बालाजी एकलारे - जखमी Byte - मराठा आंदोलक Byte - मनोहर धोंडे Byte - अशोक चव्हाण --------------------------------
2
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 18, 2025 16:02:15
kolhapur, Maharashtra: Ngp Ajit pawar live u ने फीड पाठवले ----- नागपूर अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस नेते ( ऑन चिंतन शिबिर ) --- राजकीय पक्ष काम करत असताना अधून शिबीर घेत असते --स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहे... कोर्टाने 31 जानेवारीपूर्वी निवडणुका पूर्ण करायला सांगितले आहे --2022 लाच निवडणुका व्हायला हव्या होत्या... ----चार वर्ष गेली... कारण ओबीसीना त्याचे प्रतिनिधित्व मिळाले नव्हते....समाजात OBC मोठा आहे . त्यावेळेस राजकीय पक्ष, उद्धव ठाकरे सरकार कोर्टात गेले... त्यानंतर बराच काळ गेला -- ज्यांना आमदार/खासदार संधी मिळत नसते त्यांच्याकरता ZP, महापालिका यामध्ये काम दाखवायची संधी असते..त्याच्यातून विधानसभा, लोकसभा याकरता उमेदवार मिळतात --- आता समाधान आहे देर से आहे दुरुस्त आहे... या निवडणूक होत आहे (On गोपीचंद पडळकर) --- आमचं महायुतीचे सरकार आहे... भाजपाच्या लोकांच्या चुका होत असेल तर त्याची दोन भाजपने घेतली पाहिजे.. राष्ट्रवादी ची होतं असेल तर आम्ही घेऊ -- याबाबत मला काही माहित नाही... पत्रकार मित्र आम्हाला माहीत नसताना अचानक असे प्रश्न विचारतात --- कोणी कोणत्याही पक्षात असला तरी महाराष्ट्राला एक परंपरा आहे.. संस्कृती आहे... --- प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना कोणतेही स्टेटमेंट करत असताना वेदना देणारे स्टेटमेंट करू नये --- समाजात सलोखा राहील.. वातावरण चांगला राहील त्याबद्दलचा प्रयत्न राहील (On छगन भुजबळ ) -- मला त्याबद्दल माहिती नाही... त्यांना विचारून बोलेलन... त्यामागे त्यांची भूमिका काय आहे काय माहिती आहे हे जाणून घेईल (On गाडी खरेदी ) --- काही आपल्याला माहिती नाही कोणत्याही बातम्या पसरवतात ---मागे एक सरकार असताना गाड्या योग्य condition नसल्याने अपघात झाला होत्या =-गाड्या 12 लाखाच्या आहे.... गाड्यानी दुर्गम भागात, पूर असलेल्या भागात जावे लागते --उद्या त्या गाड्या जाऊ शकल्या पाहिजे,नाही जाऊ शकली तर तिकडून तुम्ही बोलाल --बोलेरो गाड्या आहेत... पोलीस, महसूल विभाग, कलेक्टर याबाबत काही सूत्र ल दिले आहे आणि या गाड्या बारा ते 30 लाखापर्यंत आहे हे खर आहे -(on मुंबई महापौर ) -- वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, प्रमुखांनी काय भूमिका मांडयची हा त्या पक्षांचा अधिकार आहे -- त्यांनी त्यांची भूमिका मांडली (On राहुल गांधी ) --याला काही अर्थ नाही... लोकसभेत MVA ला 31 जागा तर महायुतीला 17 जागा मिळाल्या... त्यावेळी EvM आणि इतर सगळं चांगले... हरल्यानंतर हे म्हणतात ते नवीन मुद्दा आणतात..... कर्नाटक हिमाचल, तेलंगणामध्ये ते जिंकले.... बंगालमध्ये ममता तीन वेळा जिंकल्यात... -- हरल्यानंतर हे गडबड झाल्याचे आरोप करतात --- ते विरोधी पक्ष नेता आहे काय बोलायचं आहे त्यांचा अधिकार आहे --- लोकसभा निवडणुकीत आम्ही मोठी किंमत मोजली आहे.. मात्र पुढील पाच सहा महिन्यात आम्ही अनेक महत्त्वाच्या चांगल्या योजना आणल्या --- सविधानचा फेक नेरेटिव्ह लोकसभा निवडणुकीत चालला मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचा चालला नाही (On स्थानिक स्वराज्य ) -- स्थानिक लेवलवर प्रत्येक प्रदेशाची परिस्थिती वेगळी असते... नऊ वर्षानंतर या निवडणुका होत आहे... त्यामुळे प्रत्येक पक्षात अनेक इच्छुक आहेत.... *विदर्भ प्रत्येक वेळेस कोणाचा बालेकिल्ला राहीलचं असं काही*.. -- मी राजकराणात अगदी नवा होतो.. त्यावेळी तालुका स्तरावर काम करायचो. तेव्हा काँग्रेसचा आय चे अनेक उमेदवारांना अपेक्षा नसताना यश मिळाल आहे... वेगवेगळ्या निवडणुकीत वेगवेगळ्या जणांना यश दिले हा इतिहास आहे --प्रत्येक जण आप आपल्या परीने काम करत आहे.... गडकरी, फडणवीस इथे काम करताय.. त्यांच्या कार्य कर्त्यांच्या अपेक्षा आहे.. आमच्याही कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहे.... आम्ही समन्वयाने सोडवू --
5
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 18, 2025 15:07:00
Nala Sopara, Maharashtra: Date-18sep2025 Rep-prathamesh tawade Loc-nalasopara Slug-NALASOPARA CCTV Feed send by 2c Type - AV Slug- नालासोपाऱ्यात इमारतीची सुरक्षा भिंत कोसळली घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद भिंत कोसळल्याने पार्क केलेल्या वाहनांचे नुकसान अँकर - नालासोपारा पूर्वेच्या चक्रधर नगर परिसरात बुधवारी रात्री मोठी दुर्घटना टळली. पूजा पॅलेस या इमारतीला लागून असलेली सुरक्षा भिंत अचानक कोसळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र भिंतीला लागून पार्क केलेल्या अनेक दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून असून त्यात भिंत काही क्षणातच कोसळताना स्पष्टपणे दिसत आहे. या इमारतीच्या आसपास नेहमीच लहान मुले खेळत असतात. मात्र भिंत कोसळली तेव्हा मुले जवळ नसल्यामुळे मोठी हानी टळली आहे. या घटनेबाबत सुरक्षा दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे ...
11
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 18, 2025 15:00:22
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- भरत कराड आत्महत्या प्रकरण...भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतली कराड कुटुंबीयांची भेट.... पंकजा मुंडे यांच्या हस्तक्षेपानंतर गावकर्याचे उपोषण मागे.... AC :: - ओबीसी आरक्षण संपेल या भीतीतून भरत कराड यांनी दहा दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर वांगदरी ग्रामस्थांनी न्याय आणि मदतीच्या मागणीसाठी सुरू केलेले साखळी उपोषण आज अखेर स्थगित झाले आहे. अचानक वांगदरीत दाखल झालेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कराड कुटुंबीयांना भेटून काळजी करू नका, मी पाठीशी आहे असा दिलासा त्यांनी दिला. त्यानंतर उपोषणकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर उपोषणकर्त्यांनी साखळी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे....
6
comment0
Report
Advertisement
Back to top