Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001

नंदुरबारच्या विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास, पूल नसल्यानं संकटात!

PPPRASHANT PARDESHI
Jul 10, 2025 12:02:10
Dhule, Maharashtra
anchor - नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील डाब ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या मालीआंबा गावातील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा धोकादायक प्रवास करावा लागत आहे. गावातून वाहणाऱ्या वरखेडी नदीवर पूल नसल्याने गावकऱ्यांनी बांबू आणि दोरीच्या साह्याने तयार केला बांबूचा झुलता पूल वरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासन एकीकडे निधी नसल्याचा कांगावा करत अशा परिस्थितीत पूल बांधण्यास नकारघंटा देत असताना गावकऱ्यांनी हा तात्पुरता पूल बांधून प्रशासनाला चपराकदिली आहे. मात्र एका ठिकाणी पूल बांधल्यानंतर देखील दुसऱ्या ठिकाणी पुल नसल्याने नदीच्या पुराच्या पाण्यातून धोकादायक पद्धतीने कमरे एवढ्या पाण्यातून विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. चाळीस विद्यार्थी आणि जवळपास १३० अंगणवाडीचे लहान बालक रोज अशा पद्धतीने शिक्षणासाठी धोकादायक प्रवास करीत आहेत. केलंखाडी नंतर मालीअंबाच्या या परिस्थितीसमोर आल्यानंतरून शासन प्रशासन अशा ठिकाणी कधी लक्ष देणार हा प्रश्न अनुत्तारित आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी या चिमुकल्या मुलांना पाहून पूल तयार करून द्यावा अशीच काहीशी भावना व्यक्त केली जात आहे. byte - स्थानिक प्रशांत परदेशी, नंदुरबार.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top