Back
नाशिकमध्ये सहा रेशन दुकानदारांचे परवाने रद्द, काय आहे कारण?
Nashik, Maharashtra
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_reshan_dukan
नाशिक जिल्ह्यातील सहा रेशन दुकानदारांचे परवाने झाले रद्द
अँकर
रेशनच्या धान्य वितरणातील अनियमितता, लाभार्थीना हक्काचे धान्य देण्यात होणारी टाळाटाळ, दुकान सतत बंद ठेवून ग्राहकांना वेठीस धरणे अशा एक ना अनेक तक्रारी असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील सहा रेशन दुकानदारांचे परवाने जिल्हा पुरवठा विभागाने रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय ई-केवायसी नोंदणीत हलगर्जीपणा करणाऱ्या ७३ रेशन दुकानदारांना पुरवठा विभागाने दंड ठोठावला आहे. जिल्हा पुरवठा विभागातर्फे गेल्या सहा महिन्यांत अचानक भेट देऊन केलेल्या तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. रेशन धान्य वितरणात बायोमेट्रिक मशीनवर थंब घेऊन ग्राहकांना धान्य वितरित होत असल्याने आता बऱ्यापैकी पारदर्शकता आली आहे. रेशन दुकानदारांच्या कारभाराबाबत सतत तक्रारी होतात. १ हजार ३९० दुकानांना अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत ८३ दुकानांच्या कारभारात अनियमितता आढळून आली. या पाहणीत दुकानदारांनी नियमांचे पालन केल्याचे दिसून आले नाही....
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Dhule, Maharashtra:
ANCHOR - नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा च्या डोंगर रांगांमध्ये निसर्गाने आरोग्य विभागाचे वाभाडे चव्हाट्यावर आणले आहेत. सातपुडा डोंगर रांगांमध्ये असलेल्या केलापानी येथून एका रुग्णाला बाबू ची झोळी करून तब्बत 3 ते 4 तासांची जंगलातून वाट काढत रुग्णालयात आणावे लागले. केलापाणी गावातील रतीलाल पारता पाडवी या 30 वर्षीय आदिवासी बांधवला बांबूच्या झोळीतून रुग्णालयात घेऊन जाण्याची नातेवाइकांवर वेळ आली. दुर्दैवाची बाब म्हणजे हा रुग्ण केल्या काही दिवसांपासून आजारी होता. मात्र पूर परिस्थितीमुळे रस्ते बंद असल्याने आणि रुग्णवाहिका येऊ शकत नसल्यामुळे तो तशाच स्थितीत घरी पडून होता. शेवटी स्थानिकांनी त्याला झोळीमध्ये आणत रुग्णालयात दाखल केले. ऐन पावसाळ्यात रुग्णाला घेऊन 15 ते 20 किलोमीटरची जीवघेणी पायपीट स्थानिलांना करावी लागली. उंच डोंगरावरून चिखलातून वाट काढत जंगलातून हा प्रवास जीवघेणा होता. अक्राणी तालुक्यातील केलापाणी गावाला रस्ता नसल्याने रुग्णहिका पोहचू शकत नसल्याची परिस्थिती आहे. प्रशासनाला वारंवार याबाबत तक्रारी करून निवेदन देऊनही त्याचा उपयोग झालेला नाही.
byte - स्थानीक नागरिक
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report
Mumbai, Maharashtra:
Anchor
शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समिती देखील पाच जुलै रोजी होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. यासोबतच कृती समितीकडून 29 जून शासन निर्णयाची होळी केली जाणार आहे आणि सात जुलै च्या धरणे आंदोलनावर देखील कृती समिती ठाम आहे. राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर कृती समिती देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. सरकार हे एका आंदोलनामुळे बदलणार नाही त्यामुळे आमची ही दोन आंदोलने आम्ही रद्द करणार नसल्याचं कृती समितीचे दीपक पवार यांच्याकडून सांगण्यात आलं
बाईट. दीपक पवार
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2706ZT_JALNA_PERNI(2 FILES)
जालना | पीकपाणी| जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 30 हजार 679 हेक्टरवर खरीप हंगामातील पेरणी पूर्ण
दडी मारलेल्या पावसाने पुनरागमन केल्याने पिकांना मिळाला दिलासा...
अँकर | जालना जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 30 हजार 679 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरणी पूर्ण झालीय. जिल्ह्यात यंदा 6 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचं नियोजन करण्यात आलय.यापैकी आतापर्यंत 4 लाख 30 हजार 679 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झालीय.जालना जिल्ह्यात मागील 10 दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट घोंघावत होतं. मात्र, दडी मारलेल्या पावसानं पुनरागमन केल्यानं पेरणी झालेल्या खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे.त्यामुळे शेतकरी सुखावलाय.
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File2:2706ZT_WSM_CROPS_DAMAGE_WKT121
WSM_CROPS_DAMAGE_SHOTS
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात जिल्ह्याच्या सर्व भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.यामुळे अनेक नदी-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली होती व काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती.गेल्या पंधरवड्यापासून गायब झालेल्या पावसाने दोन पासून जोरदार आगमन करत वातावरणात गारवा निर्माण केला.या पावसामुळे आधीच पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, मात्र दुसरीकडे, मालेगाव, वाशिम आणि रिसोड तालुक्यांमध्ये या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे.त्यामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने खरीपाच्या सोयाबीन,तूर, उडीद, हळद,मूग या पिकासह फळबागाचे मोठे नुकसान झाले असून, रिसोड तालुक्यातील उतावळी कांच,खारोळ व पैनगंगा या नद्यांचे पात्र फुटून रुद्ररूप धारण केल्याने नदीकाठाच्या हजारो हेक्टर ठिकाणी जमिनीसह पिके खरडून गेली परिणामी शेतकरी हताश झाले आहेत.त्यामुळे गरज आहे या शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकारने खंबीरपणे उभे राहुन आर्थिक मदत देण्याची या परिस्थितीचा थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे..
0
Share
Report
Navi Mumbai, Maharashtra:
story slug -उरण मद्ये सिडकोच्या कारवाई मुळे 80 कुटुंबावर भर पावसात बेघर होण्याची वेळ
सिडको की कारवाई
ftp slug - nm uran cidco action
shots-
reporter- swati naik
navi mumbai
anchor -
उरण मधील कामठा गावं येथील चिंतामणी अपार्टमेंटवर सिडकोकडून कारवाई करण्यात येत आहे ,सिडकोच्या कारवाईमुळे भर पावसात 80 पेक्षा अधिक कुटुंब झाली बेघर होणार आहेत।
भर पावसाळ्यात कारवाई करण्यात येत असल्याने रहिवासी संतप्त झाले असून,
पोलिसांचा फौंजफाटा घेऊन सिडकोची घरांवर तोडक कारवाई साठी आल्याने ,
कारवाई थांबाविण्याची रहिवासीयांची मागणी करत जेसीबी समोर अडवून रहिवास उभे राहिले आहेत।
gf -
--–--------
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2706ZT_CHP_VIJAY_1
( single file sent on 2C)
टायटल:-- मुंबईतील 5 जुलै च्या एकत्रित मराठी मोर्चा विषयी निमंत्रण आले आहे, काँग्रेस त्याबाबत सकारात्मक विचार करेल, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
अँकर:--काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत होणाऱ्या एकत्रित मराठी मोर्चावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती नको ही भूमिका आम्ही या आधीच मांडली आहे, जर दोन्ही भाऊ एकत्र येऊन या विषयावर मोर्चा काढणार असतील, जर कुठल्याही बॅनर शिवाय मराठी साठी मोर्चा काढणार असेल आणि निमंत्रण आलं तर आम्ही विचार करू आणि त्याबाबत आमची भूमिका सकारात्मक असेल असे वडेट्टीवार म्हणाले.
बाईट १) आ. विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2706ZT_WSM_SCHOOL_ROOF_COLLAPSED
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यातील भटउमरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले, एक विद्यार्थी गंभीर जखमी.
वर्गात शिकवणी सुरू असताना कोसळला स्लॅब चा भाग
स्लॅब कोसळल्याने विद्यार्थी भयभीत.
वाशिम जिल्ह्यातील भटउमरा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली घटना
डोक्यात स्लॅब पडल्याने जखमी झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले
दहावर्षापूर्वी बांधण्यात आली होती ही शाळेची इमारत.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
कल्याण शहरात अमली पदार्थविरोधात विद्यालयाची जनजागृती.. ‘पोलीस मित्र’ बनून विद्यार्थ्यांना पुढे येण्याचे आवाहन!
झोन ३ पोलिस, शिक्षण संस्था आणि नशामुक्ती संघटनांचा संयुक्त उपक्रम; पथनाट्य, अमली पदार्थांचे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडले
Anc..कल्याण शहरात अमली पदार्थांच्या विरोधात ठोस पावलं उचलत झोन तीन पोलिसांनी शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला
Vo..कल्याण झोन ३ चे पोलिस आणि स्थानिक शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहरभर अमली पदार्थविरोधात जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले शाळा आणि महाविद्यालयात सादर करण्यात आलेले पथनाट्य, ज्यात अमली पदार्थांचे दुष्परिणाम प्रभावी पद्धतीने मांडले गेले.या कार्यक्रमात ॲडिशनल सीपी, झोन ३ चे DCP, कल्याणचे ACP, तसेच शाळा-कोलेजचे प्राचार्य, नशामुक्ती केंद्रातील स्वयंसेवक आणि शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.पोलिसांनी विद्यार्थ्यांना संवाद साधत मार्गर्शन केले अमली पदार्थांचे शारीरिक आणि मानसिक नुकसान स्पष्ट केलं. "कॉलेज किंवा शाळा परिसरात कोणी अमली पदार्थांची विक्री करत असेल, तर ''''पोलीस मित्र'''' म्हणून तात्काळ माहिती द्या," असे आवाहन करण्यात आले.
Byte :- आतूल झेंडे ( कल्याण dcp)
0
Share
Report
Pune, Maharashtra:
hinjeadi ultimetum
kailas puri Pune 27-6-25
feed by 2c
Anchor - हिंजवडी गावाचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समावेश करण्यासाठी गेल्या काही दिवसापासून आयटी कर्मचाऱ्यांकडून स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. पाच दिवसात या मोहिमेत बावीस हजारहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी करत पाठिंबा दर्शवला आहे. आयटी कर्मचाऱ्यांकडून ही मोहीम सुरू असताना सरकारी पातळीवर मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आयटी कर्मचारी संतप्त झाले असून त्यांनी आणखी मोहीम तीव्र केली आहे. ट्राफिक आणि इतर समस्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आयटी पार्क हिंजवडी चेष्टेचा विषय झाला असल्याची खंत व्यक्त करतानाच येत्या काही दिवसात समस्या सोडवल्या नाहीत तर आणखी तीव्र मोहीम सुरू करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. तर ग्रामस्थांनी हिंजवडीला महापालिकेत घ्यायचं असेल तर आत्ताच घ्यावं अन्यथा पुढे आम्ही स्वतंत्र महानगरपालिकेची मागणी करू असा इशारा दिला आहे. याच मुद्द्यावर आयटी कर्मचारी आणि स्थानिकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...!
kailas chaupal+ vis
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2706ZT_JALNA_STUDENT_PKG(25 FILES)
जालना |PKG
बेडकांचा डराव डराव आवाज ठरतोय जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा,
पारधच्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात साचलं पाऊस आणि गावातील गटाराचं पाणी,पाण्यात बेडकांनी ठोकला मुक्काम
बेडकांच्या आवाजामुळे विद्यार्थी हतबल
शाळेसमोर साचलेल्या पाण्याचा बंदोबस्त न केल्यास थेट साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा ईशारा
अँकर : जालन्यातील पारध गावात जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण झालाय.हा अडथळा काही ईतर कोणत्याही वादाचा नाही तर हा अडथळा आणलाय चक्क बेडकांनी.नेमका हा अडथळा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कसा आला यावर बघूया हा स्पेशल रिपोर्ट
व्हिओ:१: जालन्यातील पारध गावच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर एक नवीनच संकट उभं राहिलंय.विद्यार्थ्यांना शिक्षक किंवा शिक्षिका शिकवत असताना त्यांना शिक्षक किंवा शिक्षिका काय शिकवतायत ते ऐकायला मिळत नाहीय.त्याचं कारणही तसंच आहे.काल परवा पारध गावात मुसळधार पाऊस झाला आणि शाळेबरोबरच गावातील गटाराचं सगळं पाणी शाळेसमोर तुंबलं. आता या तुंबलेल्या पाण्यात बेडकांनी ठिय्या मांडत डराव,डराव अशी घोषणाबाजी सुरू केलीय.ही बेडकं शांत बसायला तयार नाही. बेडकांचा कल्लोळ ईतका जोरात सुरुय की,शिक्षक काय शिकवतात हेच विद्यार्थ्यांना कळत नाहीय.त्यामुळे त्यांचं शिकवणीत लक्षच लागत नाही.
बाईट : विद्यार्थीनी (3 विद्यार्थीनीचे बाईट आहेत)
व्हिओ:2:पारधच्या जिल्हा परिषद शाळेसमोर पावसामुळे तयार झालेल्या डबक्यात बेडकांनी मुक्काम ठोकल्यानं विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत असल्यानं गावकरीही त्रस्त झालेत.त्यामुळे शाळेच्या आवारात साचणाऱ्या पाण्याबरोबरच गावातील नाल्यातून शाळेच्या मैदानात साचणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त ग्रामपंचायतीने शालेय शिक्षण समितीने करण्याची मागणी गावकऱ्यांनी केलीय.हा प्रकार असाच सुरू राहिला तर थेट शाळे समोर साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन करण्याचा ईशारा ग्रामस्थांनी दिलाय.
बाईट : बबलू तेलंग्रे,ग्रामपंचायत सदस्य(व्हाईट शर्ट,गोरा रंग,दाढी असलेले)
बाईट: सागर देशमूख, ग्रामस्थ(काळया रंगाचा टी शर्ट असलेले)
बाईट : प्रशांत देशमूख,ग्रामस्थ(पिवळा टी शर्ट)
व्हिओ :३:गेल्या तीन ते चार वर्षांपासून या शाळेसमोर पावसाळ्यात अशाच प्रकारचं पाणी साचतंय.त्यामुळे या पाणी साचलेल्या डबक्यात सापाचं देखील वास्तव्य आढळून येतं. त्यामुळे तातडीने या साचणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणात येणारा बेडकांचा आवाजाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे इतकंच.
0
Share
Report