Back
कोयना धरण 51% भरले! पावसामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी सजली!
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_KOYNA_UPDATE
सातारा - सातारा जिल्ह्यातील कोयना पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असणारे कोयना धरण जून महिन्यातच 51 टक्के भरले आहे.सध्या धरणात 53.69 टीएमसी पाणीसाठा असून धरणात 30 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक होते आहे.सध्या धरणाचा पायथा वीजगृहातून 1050 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात होतो आहे.गेल्या 24 तासात कोयना पाणलोट क्षेत्रात 87 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Pandharpur, Maharashtra:
01072025
Slug - PPR_VINA_TABALA
feed on 2c
file 02
-----
Anchor - आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात भजनी साहित्य विक्रीची दुकानं सजली आहेत. येथील विणे गल्लीतील दुकानांमध्ये भजनी साहित्य निर्मिती केली जाते.
वारकरी संप्रदायामध्ये वीणा,टाळ आणि पखवाज या वाद्यांना महत्वाचे स्थान आहे. किर्तन आणि भजनामध्ये तर विण्याचे स्थान आग्रभागी असते. वारी काळात वीणा वाद्याला मोठी मागणी असते. याशिवाय पखावाज आणि टाळांना ही मागणी असते. पंढरपुरात सर्व प्रकारचे भजनी साहित्याची निर्मिती व विक्री केली जाते. कच्च्या मालाचे व मजूरी दरात वाढ झाल्याने यंदा भजनी साहित्यामध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे रामेश्वर कोकाटे या विक्रेत्यांनी सांगितले.
--------
बाईट - रामेश्वर कोकाटे.भजनी साहित्य विक्रेते.
0
Share
Report
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज
स्किप्ट ::- शक्तीपीठ मोजणी अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी.... मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विचारला जाब.... मोजणीसाठी अधिकारी येताच शेतकरी संतापले....
लातूर चे शेतकरी आक्रमक... लातूर जिल्ह्यातील तीन तालुके.... तेरा गावे.. 41 किलोमीटरचा रस्ता... यासाठी जमीन मोजणीला होतोय विरोध... मोठा पोलीस बंदोबस्त... अनेक गावातील शेतकरी एकवटले....
AC ::- सरकार महत्वकांक्षी उपक्रम म्हणून शक्तिपीठ महामार्गाकडे पहात आहे. मात्र यास अनेक ठिकाणी विरोध होत आहे.आज लातूर जिल्ह्यातील ढोकी आणि रुई रामेश्वर गावाच्या शिवारात मोजणी साठी महसूल विभागातील अधिकारी आणि काही कर्मचारी तसेच ज्या कंपनीस काम देण्यात आले आहे त्याचे कर्मचारी दाखल होत आहेत. मात्र ढोकी येथे आजुबाजूच्या काही गावातील शेतकरी त्या ठिकाणी येऊन आपला विरोध दर्शविला आहेत... या भागातील शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहे.. शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत...कोणत्याही यंत्रणेला गावात येऊ देणार नाही अशी भूमिका या भागातील शेतकऱ्यांनी घेतली आहे.
बाईट ::- शेतकरी
0
Share
Report
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - ठाणे बेलापूर मार्गावर कंटेनरचा अपघात.
ठाणे बेलापूर मार्ग पर अपघात
ftp slug - thane belapur road accident
shots-
reporter - swati naik
navi mumbai
anchor - ठाणे बेलापूर रस्त्यावर ट्रक पलटी होऊन अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी सकाळी या मार्गावर झाली होती।
ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेन वर घणसोली येथे हा अपघात झाला.
जिओ कंपनीजवळील उड्डाणंपुल चढत असताना कंटेनरचा झाला अपघात.
अपघातमुळे ठाणे बेलापूर मार्गावर ठाण्याच्या दिशेने जाताना मोठी वाहतूक कोंडी.
जेसीबी च्या सहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु.
रबाळे वाहतूक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय बेंडे घटनास्थळी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांसह वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम करत आहेत.
gf -
----------
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - शक्तीपीठ महामार्गासाठी
सरकारने,शेतकऱ्यांवर बळजबरी करू नये, गाव निहाय बैठका घ्याव्यात,आपण मध्यस्थी करू - खासदार विशाल पाटील..
अँकर - शक्तीपीठ महामार्गाला शेतकरयांचा विरोध असून सरकारने बळजबरी करू नये, शेतकऱ्यांना समजण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे,त्यासाठी गाव निहाय बैठका घेण्याची गरजेचं आहे,अशी भूमिका खासदार विशाल पाटलांनी व्यक्त केली आहे,शेतकरी व प्रशासनाच्या बैठकांसाठी आपण मध्यस्थी करू,असे देखील विशाल पाटलांनी स्पष्ट केला आहे,शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीच्या अंकलीत येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं,आंदोलनात खासदार विशाल पाटलांनी देखील सहभाग घेत शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
बाईट - विशाल पाटील - खासदार, सांगली.
0
Share
Report
Wardha, Maharashtra:
वर्धा ब्रेकिंग
SLUG- 0107_WARDHA_NCP_PROTEST
- वर्ध्याच्या हिंगणघाट इथं राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे रास्ता रोको आंदोलन
- राष्ट्रीय महामार्ग 44 वरील उड्डाण पुलावर पडलेल्या खड्याच्या निषेधार्थ आंदोलन
- हिंगणघाट येथे राष्ट्रीय महामार्गावर भर पावसात राष्ट्रवादी चे आंदोलन सुरू
- खड्ड्याच्या जागेवरील आंदोलन सुरू झालं असून रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याय
- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात आंदोलन
- पोलिसांचाही मोठा लागलाय बंदोबस्त
- एक तासापासून राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
- राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रीय महामार्गावर आक्रमक
अँकर - वर्ध्याच्या हिंगणघाट राष्ट्रीय महामार्ग 44 वरील उड्डाण पुलावर पडलेल्या खड्ड्याला बुजविण्यात यावा व रस्ता प्राधिकरणावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन सुरू झालं आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी...
बाईट- wkt मिलिंद आंडे
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
01072025
Slugb- PPR_AKLUJ_RINGAN
feed on 2c
file 12
-----
Anchor - पांडुरंगाच्या आणि , ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने अकलूज मध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे गोल रिंगण पार पडले
टाळ- मृदंगाचा गजर, ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने, अनोख्या चैतन्य व भक्तिरसाने प्रफुल्लित झालेल्या वातावरणात अकलूज येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. त्यानंतर सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर पार पडलेला रिंगण सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज सोहळा पुणे जिल्ह्यातून अकलूज येथे सराटीहून सोलापूर जिल्ह्यात सकाळी दाखल झाला.
प्रथम झेंडेधारी वैष्णवांनी रिंगणी धाव घेतली. त्यानंतर तुळशी वृंदावन व हंडा घेतलेल्या महिला भगिनी, वीणेकरी, टाळकरी यांनीही धावत प्रदक्षिणा पूर्ण केली. आजच्या रिंगण सोहळ्याला वारकऱ्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला होता. तर हा क्षण डोळ्यात टिपण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. या यामध्ये अबाल वृद्धांसह तरुणांची संख्या लक्षणीय होती. रिंगण संपल्यावर रिंगणाच्या परिघातच हमामा, फुगडी, हुतूतू, आट्यापाट्या, एकीबेकी हे खेळ टाळ-मृदंगाच्या गजरात सुरू होते. रिंगणात मनसोक्त नाचणारे वारकऱ्यांना नवीन ऊर्जा मिळाली. हीच ऊर्जा त्यांना पुढील प्रवासाची बळ देते.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
अधिवेशनात तरी महिला आमदारांनी तरी प्रश्न मांडून न्याय दयावा.
महिलांसाठी लोकल चे तरी डब्बे वाढवावे...
पुन्हा लोकलमध्ये महिलांची हाणामारी
एकमेकींच्या झिंज्या उपटत तुफान हाणामारी
विरार लोकलमध्ये एका महिलेला रक्त पडेपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा डोंबिवली मध्ये सकाळी आठ वाजून वीस मिनिटाच्या डोंबिवली वरून सीएसएमटी ला जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली एकमेकींच्या झिंजा उपटत मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे सकाळी आसनगाव येथून फास्ट लोकल ही डोंबिवली स्टेशनं मध्ये आली असतांना महिला डब्यात चढणे कठीण होत असल्याने नेहमी भांडण होतात, त्याकारता महिला डब्बे वाढवावे आता पावसाळी अधिवेशन सुरु आहे महिला आमदार यांनी रेल्वे चा प्रश्न माडावा आणि महिलांना न्याय मिळून दयावा
Byte... लता आरगडे
रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष
0
Share
Report
Niphad, Maharashtra:
अँकर :- नाशिकच्या निफाड तालुक्यातील थेटाळे येथे मध्य रेलच्या गेट क्रमांक 103 जवळील अंडरपास मधील पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने शालेय विद्यार्थ्यांना या पाण्यातून जीव मुठीत धरत शिक्षणासाठी पाण्यातून सायकल वर प्रवास करण्याची वेळ आली आहे मध्य रेल तातडीने या पाण्याचा निचरा कसा होईल यासाठी पाऊले उचलण्याची मागणी या शालेय विद्यार्थ्यांसह पालक करत आहे
0
Share
Report
Niphad, Maharashtra:
अँकर :- नाशिकच्या निफाड तालुक्यात ब्रिटिश कालीन 1916 मध्ये बांधलेल्या नांदूर मधमेश्वर धरणाच्या इतिहासात प्रथमच जून महिन्यात 13.16 टीएमसी पूर पाण्याचा जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदीतून विसर्ग करण्यात आला आहे या अगोदर कधीही जून महिन्याच्या सुरुवातीपासून पाण्याचा विसर्ग झालेला नाही यावर्षी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, नाशिक आणि निफाड तालुक्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी व मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच तडाका दिला त्यात जून महिन्यात मान्सूनच्या पावसाने चांगली हजेरी लगावल्याने दारणा, गंगापूर, कडवा आणि पालखेड धरणाची पाणीपातळी 60 टक्क्यांच्या वर गेल्यामुळे या धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नांदूर मधमेश्वर च्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे त्यामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून जून महिन्यात आज सकाळपर्यंत 13.16 टीएमसी पूर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे असाच नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यात पाऊस होत राहिला तर जायकवाडी धरण भरण्यासाठी मदत होत लवकरच 100 टक्के भरेल गेल्या दोन दिवसात नाशिक जिल्ह्यात पावसाने उघडीप जरी दिली असेल तरी नांदूर मधमेश्वर धरणातून पूर पाण्याचा आज 5 हजार 377 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- शक्तीपीठ महामार्गाला शासनाने 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्यानंतर शक्तीपीठ बाशीत शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी नांदेड परभणी महामार्गावरील पिंगळी परिसरात रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे. गाड्या बैल घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरले असून जमीन अधिग्रहण करण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय. यामध्ये विविध शेतकरी सामाजिक संघटना यामध्ये सहभागी होणार आहे.
0
Share
Report