Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

चांदोली धरणात अतिवृष्टी: पाण्याचा विसर्ग 4500 क्यूसेक!

Sarfaraj Musa
Jul 03, 2025 10:38:38
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम,साडेचार हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय..धरण 76 टक्के भरले.. अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी कायम आहे.त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे,असून धरणातून वारणा नदी पात्रात येथे 24 तासात साडेचार हजार क्युसेक् पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय धरण प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सूर असून धरणात 34.40 टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात 27.50 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे,त्यामुळे धरण 76 टक्के भरले आहे.तर पावसाचा जोर आणि अतिवृष्टी कायम असल्याने धरणातुन वारणा नदीपात्रामध्ये विसर्ग करण्यात येणार असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे,असा इशारा पाटबंधारे प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement