Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन: सरकारला दया येईल का?

NITESH MAHAJAN
Jul 03, 2025 13:39:00
Jalna, Maharashtra
FEED NAME | 0307ZT_JALNA_FARMER_ANDO(5 FILES) जालना | विहीरीत उड्या मारून जालना - नांदेड समृद्धी महामार्ग बाधीत शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. जालना - नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा देण्याची मागणी... अँकर | जालन्यात जालना - नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलंय.देवमूर्ती येथील विहीरीत उड्या मारून हे आंदोलन करण्यात आलं. जालना - नांदेड समृद्धी महामार्गात संपादित करण्यात आलेल्या जमिनीला योग्य मावेजा देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. जालना - नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा मिळावा या मागणीसाठी मागील 62 दिवसांपासून जालन्याच्या देवमूर्ती येथे बाधित शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र, अजून पर्यंत शासनानं शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेतलेली नाहीये. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज देवमूर्ती येथे विहिरीत उड्या घेऊन जलसमाधी आंदोलन केलय. राज्य सरकारने लवकरात लवकर जालना - नांदेड समृद्धी महामार्गात केलेल्या जमिनीला योग्य मावेजा देण्याची मागणी यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement