Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

पूल नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण, कांदा बाहेर काढताना जीव धोक्यात!

TUSHAR TAPASE
Jul 01, 2025 08:37:41
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE 1 FILE SLUG NAME -SAT_KANDA_VAHTUK सातारा - खटाव तालुक्यातील पुसेगाव-फलटण मार्गावरील वेटण ओढ्यावर पूल नसल्याने काटेवाडी शिवारातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नेर तलावाच्या पाण्याचा फुगवटा ओढ्यात साचल्याने साठवलेला कांदा छाती इतक्या पाण्यातून बाहेर काढावा लागतो आहे. शेतकऱ्यांनी १४ मजुरांच्या मदतीने प्रति पिशवी ९० रुपये खर्च करून ४०० फूट अंतरावरून कांदा बाहेर काढला. मजुरांनी जीव धोक्यात घालून मदत केल्याचे समाधान असले तरी कांद्याला दर न मिळाल्याने नाराजी आहे.या भागात पाणी अडथळ्यामुळे यंत्र किंवा बैलांच्या मदतीने शेती करणे अशक्य असून, शेतकरी हातानेच पेरणी करत आहेत. त्यामुळे वेटण ओढ्यावर किमान साकव पूल तरी बांधावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement