Back
छत्रपती शिवाजी महाराज शिबिर: महसूल समस्यांचे सोडवणूक अभियान!
Yeola, Maharashtra
अँकर:- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हा महत्त्वाचा व लोकाभिमुख उपक्रम शासनाकडून सुरु करण्यात आला असून हे अभियान नागरिकांच्या महसूल संबंधित तक्रारी व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राबवले जात आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला शहरातील माऊली लॉन्स येथे तहसील कार्यालय येवला आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात महाराजस्व अभियान राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाशी निगडित प्रश्न निकाली काढून नागरिकांच्या सोयीचे आहे. यात शेतकरी बांधवासाठी ७/१२ उतारा दुरुस्ती, फेरफार नोंदी,वारस नोंद, जाती,उत्पन्न,राहिवासी दाखले, जुने दस्त नोंदवही व पडताळणी,मालमत्ता नोंदणी, जमिनीचे वर्गीकरण व मोजणी यासह विविध योजनांचे लाभ, दाखले नागरिकांना उपलब्ध करून दिले जात आहेत. हे अभियान एक दिवसापुरते मर्यादित न ठेवता, गावोगावी, तालुक्याच्या पातळीवर, नियमितपणे आणि संपूर्ण सहभागासह राबविले जावे. तसेच प्रत्येक प्रलंबित प्रकरणाचा निकाल वेळेत, न्यायाने आणि पारदर्शकतेने दिला गेला पाहिजे हीच खरी जनतेची सेवा असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Akola, Maharashtra:
8 फाईल्स आहेत..PKG
Anchor : अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत श्रीराज राजेश्वर मंदिराला 'ब' वर्ग दर्जा देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी नगर विकास विभागाच्या बैठकीत घेण्यात आलाय..मात्र या नंतर अकोल्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झालीय..
Vo 1 : विकासात्मक कामांसाठी नेहमीच श्रेय घेण्यासाठी नेते मंडळी पुढाकार घेतात मात्र जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी एक पाऊल मागे टाकतात..अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत श्रीराज राजेश्वर मंदिराला ' ब ' वर्गचा तीर्थक्षेत्र दर्जा घोषित करण्यात आला आणि यानंतर जिल्ह्यात रंगला श्रेयवाद...श्रीराज राजेश्वर संस्थानला 'ब' वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्रदान करण्याचा मार्ग प्रशस्त झालाय...श्री राजेश्वर मंदिराला 'ब' वर्ग दर्जा द्यावा अशी मागणी करणारे पत्र भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी 22 जुलै 2024 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते..यानंतर आपण वारंवार ही मागणी रेटून धरली असल्याचं भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी म्हंटलं आहेय..तर नुकत्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकोला दौऱ्या दरम्यान त्यांनी ही मागणी पुन्हा जाहीररिते केली होती..आणि यानंतर मुख्यमंत्र्यांनी सचिवांना प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला होता, तीर्थक्षेत्राचे निकष ठरवण्यासाठी समितीची बैठक मंत्रालयात झाली आणि श्रीराज राजेश्वर संस्थांना 'ब' वर्ग देण्याबाबतचा निर्णय बैठकीत निश्चित करण्यात आला..मात्र ज्याचं या विषयाशी कोणतही संबंध नाही अशा लोकांनी श्रेय घेऊ नये असा टोला भाजपने काँग्रेसला लगावलाय..
Byte : रणधीर सावरकर , भाजपा आमदार..
Vo 2 : श्री राज राजेश्वर मंदिराला ' ब ' वर्गाचा तीर्थक्षेत्र दर्जा मिळाला असल्याची माहिती मिळाली आणि काँग्रेसचे अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भातील माहिती दिलीय..मंदिराला ' ब ' वर्गाचा दर्जा मिळावा म्हणून आपण गतवर्षी सत्तास्थापनेनंतर पहिल्याच हिवाळी अधिवेशनात राजेश्वर मंदिराला 'ब' दर्जा मिळावा करिता आपल्या पहिल्याच अधिवेशनात ही मागणी केली होती तर 15 दिवसांआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीतही हा मुद्दा आपण पुन्हा उपस्थित केला होता म्हणत पठाण यांनी भाजपला टोला लगावलाय..भाजपला राहुल गांधी मंदिरात जातात या पासून त्रास होतो त्याच प्रमाणे साजिद खान पठाण मंदिरात जातो त्यांना ते ही आवडत नसल्याचा आरोप पठाण यांनी केलाय..मात्र आपण कोणताही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नसून ज्यांनी ज्यांनी मंदिराला ' ब ' वर्गाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले त्यांचे ही त्यांनी आभार मानले..
Byte : साजिद खान पठाण, काँग्रेस आमदार..
Final : प्रस्ताव नगर विकास विभागाला सादर झाल्यानंतर शासन निर्णय जाहीर होण्यासह अन्य प्रक्रिया होईल..'ब' दर्जाचा आदेश पारीत झाल्यानंतर मंदिर व परिसराच्या पुनर्विकासासाठी २५० कोटी रुपये मंजूर ही होतील..मात्र श्रेय वादाच्या या फेरीत जिल्ह्यात विकासात्मक काम होत असल्याचा आनंद सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेय..
जयेश जगड,
झी मीडिया,
अकोला
0
Share
Report
Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Hindi Wad
File:02
Rep: Hemant Chapude(Khed)
Anc: राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरुन राजकारण रंगलं असताना भाषा हि विषय म्हणुन नाही तर भाषा म्हणुन शिकवली जावी असं मत दत्तात्रय वारे गुरुजींनी व्यक्त करत भाषाच्या शिक्षणाचे यशस्वी उदाहरण विद्यार्थींमध्ये करुन दाखवलय....!
पुण्याच्या वाबळेवाडी शाळेनंतर खेड तालुक्यातील जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेत मराठी सोबत प्रादेशिक भाषेसह इतर देशातील भाषांचे शिक्षण दिलं जातंय अन विद्यार्थींना भाषा शिक्षणात अव्वल ठरलेत लहान वयातच भाषा शिक्षणाचे ज्ञान अवगत झाले तर त्याचे फायदे वयोवृद्ध काळापर्यंत होतेय
Byte: दत्तात्रय वारे गरूजी (वर्ल्ड टॉप बेस्ट स्कूल शिक्षक)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
जांभळाने ओलांडली देशाची सीमा
बदलापूरची जांभळे लंडनच्या बाजारात
जांभळाची शेती शेतकऱ्यांसाठी सक्षम पर्याय
Bdl jambhul
Anchor आपल्या अवीट चवीमुळे लोकप्रिय असलेल्या बदलापूर येथील जांभळांला भौगोलिक मानांकन मिळाले आहे, मात्र एक पाऊल पुढे जात आता बदलापूरच्या जांभूळाने देशाची सीमा ओलांडत ती लंडनच्या बाजारात गेली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अस्सल, रसदार आणि गोड बदलापुरचा हलवी आणि गरवी जातीच्या जांभळाची आता जागतिक पातळीवर दखल घेतली जाणार आहे, यावर्षी पहिल्यांदाच कर्नाटकच्या अपीडा संस्थेच्या वतीने भारतातील विविध प्रजातीची जांभळं लंडन येथे पाठवण्यात आली आहेत , यात बदलापूरच्याही जांभळांचा ही समावेश आहे. बदलापूर येथून दहा किलो जांभळंही प्रायोगिक तत्त्वावर लंडन येथे पाठवण्यात आली आहेत ,2023 -24 साली बदलापूरच्या जांभळाची आंतरराज्य निर्यात होत ती उत्तर प्रदेशात गेली होती .मात्र आता पहिल्यांदाच ही जांभळं आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्यात झाली आहे. त्यामुळे भविष्यात आता शेतकऱ्यांनी सक्षम पर्याय म्हणून जांभळाच्या शेतीकडे पाहण्याची गरज असल्याचं गरज जांभूळ परिसवर्धन ट्रस्टचे आदित्य गोळे यानी सांगितले
Byte आदित्य जांभळं ,जांभूळ परिसवर्धन ट्रस्ट
चंद्रशेखर भुयार (बदलापूर)
0
Share
Report
Shirdi, Maharashtra:
Anc - अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने श्रीरामपूर शहरातील पूर्णवाद नगर परिसरात दोन मटका बुकींवाल्यांबर कारवाई केली. या कारवाईत ९ दुचाकी ,२१ मोबाईल आणि रोख रक्कमेसह ८ लाख ३६ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या छाप्या दरम्यान पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या २२ आरोपींना विरोधात श्रीरामपूर शहार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आली असून. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पोलीस पथकच्या या कारवाईमुळे श्रीरामपूर शहरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
Bite - संतोष खाडे , परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक
0
Share
Report
Ratnagiri, Maharashtra:
आम्ही सत्तेत आहोत... प्रेश्न समजून घेऊन मार्ग काढू...
शिंदे साहेब यांना आम्ही याबाबतीत विचारू... आणि शिंदे साहेब मोर्चाला गेले तरी शासनचं धोरण ते मांडतील
लढाई तत्वशी आहे... पालकमंत्री पदावरून गोगावले यांचं विधान... पालकमंत्री मी व्हावे अशी आमच्या नेत्यांची चर्चा
आम्ही मराठी, हिंदी विरोधात नाही - गोगावले
0
Share
Report
Beed, Maharashtra:
बीड: केजमध्ये सांस्कृतिक कलाकेंद्रात वेश्याव्यवसाय; ठाकरे गटाच्या माजी जिल्हाध्यक्षाविरीद्ध गुन्हा दाखल
Anc : बीडच्या केजमधील महालक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्रात मोठा अनैतिक व्यवहार उघड झालाय. कलाकेंद्राच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू होता. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या चौकशीत शिवसेना ठाकरे गटाचा माजी जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.. सध्या आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
दीड महिन्यापूर्वी पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात केज येथील महालक्ष्मी कलाकेंद्रात वेश्याव्यवसाय सुरु असल्याचा पर्दाफाश झाला होता. पोलीसांच्या AHTU पथकाने केलेल्या कारवाईत १० महिलांची सुटका करण्यात आली. त्या विविध जिल्ह्यांतून फसवून आणण्यात आल्याचं उघडकीस आले होते. छाप्यात व्यवस्थापक मयूर अंधारे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पाच हजार रुपये रोख आणि निरोधही जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात सत्वशीला अंधारे, तिचा मुलगा आदित्य अंधारे हे मुख्य सूत्रधार होते. या ठिकाणी यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासात आणखी आरोपी रत्नाकर शिंदे याचा सहभाग असल्याचं आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बीडच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे..
कलाकेंद्रावर छापा पडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर केलकेंद्राची परवानगी कायस्वरुपी रद्द केली आहे..यापूर्वी देखील याच कलाकेंद्रावर पोलिसांनी छापा टाकला होता. यावेळी अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे उघड झाले होते. त्यावेळी देखील ठाकरे गटाचे तत्कालीन जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा रत्नाकर शिंदे हा दुसऱ्या प्रकरणात देखील आरोपी झाल्याने राजकीय गोठ्यात भुवया उंचावल्या आहेत. आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..
बीडमधील उमाकिरण खासगी क्लासेस मधील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण झाल्याचे उघड झाल्यानंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. आरोपी विजय पवार आणि प्रशांत खटावकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा समर्थक आहे. ही घटना ताजीच असताना आता उद्धव ठाकरे गटाच्या माजी जिल्हा प्रमुखावर वेश्याव्यवसाय करवून घेतल्याचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
१ जुलैला कल्याण-डोंबिवलीत सात तास पाणीपुरवठा बंद
टाटा पॉवरच्या कांबा उपकेंद्रात दुरुस्ती; नेतिवली-मोहिली केंद्रातून होणारा पाणीपुरवठा ठप्प
कल्याण पूर्व, पश्चिम, ग्रामीण,डोंबिवली पूर्व-पश्चिमसह अनेक ठिकाणी परिणाम
महावितरणकडून अधिकृत पत्राद्वारे माहिती
Anc..कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा मंगळवार, १ जुलै रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी चार दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे या कालावधीत महावितरणकडून विद्युत पुरवठा केल्या जाणाऱ्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या १५० दशलक्ष लीटर मोहिली उदंचन केंद्र आणि मोहिली येथील १०० दशलक्ष लीटर जलशुद्धीकरण केंद्राला महावितरणकडून पाणी पुरवठा केला जातो. हा विद्युत पुरवठा टाटा पॉवरच्या कांबा येथील उपकेंद्रातून केला जातो. या उपकेंद्राच्या एनआरसी-२ फिडरमध्ये दुरुस्ती करावयाची असल्याने या दोन्ही जलशुध्दीरकरण केंद्रांचा पाणी पुरवठा पालिकेकडून बंद ठेवण्यात येणार आहे . हे दुरुस्तीचे काम सात तास केले जाणार असून. त्यामुळे नेतिवली, मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होणाऱ्या कल्याण ग्रामीण भागातील मांडा, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, मोहने आणि परिसरातील गावे, कल्याण पश्चिमेतील ब प्रभाग हद्दीतील मिलिंदनगर, योगीधाम, चिकनघर, बिर्ला महाविद्यालय परिसर, म्हाडा वसाहत, मुरबाड रस्ता परिसर, डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
0
Share
Report
Yavatmal, Maharashtra:
बाभूळगाव मुख्याधिकारी हजर नसल्याने त्यांच्या नावाच्या पाटीला पुष्पहार अर्पण.
प्रभागातील रस्ते, नाल्यांची कामे तत्काळ करा.
फोटो मध्ये आपले निवेदन घेऊन आलेल्या महिला दिसत आहे.
प्रतिनिधी
बाभूळगाव नगर पंचायतच्या वार्ड क्रमांक 12 व वार्ड क्रमांक 8 मध्ये सुरू असलेल्या पावसामुळे चिखल झाले असून त्या भागातील रहिवाशांना रस्त्याने चालणे कठीण होऊन बसले आहे.
या वार्डमध्ये पाणी पुरवठा योजनेचि पाईपलाईन टाकण्यात आली. यावेळी माती टाकून नाल्या बुजविल्या, कुठल्याही प्रकारचे काँक्रीटीकरण करण्यात आले नाही. आता पावसामुळे माती उघडी पडल्याने सर्वत्र चिखल साचला आहे. दुरुस्त करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन घेऊन मोठ्या संख्येने महिला येथील मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी सुरेश सोटे यांना देण्याकरिता आले असता सी ओ गैरहजर होत्या त्यांचे चेंबर कुलूप बंद होते यामुळे महिलांनी पल्लवी सुरेश सोटे यांच्या नावाच्या पाटीला पुष्पहार घालून निषेध नोंदविला. अभियंता प्रज्ञा नरवाडे यांनी निवेदन स्वीकारले.
वार्ड (प्रभाग) क्र. 12 व 8 यामध्ये जेथे रहिवासी वस्ती आहे तेथे मोठ्या प्रमाणात रस्ते व नाल्यांच्या कामांची आवश्यकता असताना नगर पंचायत प्रशासनाने ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही, फक्त रिकामे प्लाट आहेत अश्या ठिकाणी रस्ते बांधले. सदर कामांचा कोणाला तरी आर्थिक लाभ व्हावा या हेतूपोटी काही ठिकाणी रस्ते बनविले. वार्ड क्र. 13 मध्ये नदीच्या काठावर काहीही आवश्यकता नसताना लाखो रूपये खर्चुन नगर पंचायतने सिमेंट रस्ता बांधला, रस्त्यासाठी सौरपथदिवे सुद्धा लावले. या बाबीची काहीच गरज नसताना उगाच खर्च केल्याचा आरोप महिलानी केला. काही भागाकडे नगर पंचायतने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे महिलांनी सांगितले . दिलेल्या निवेदनावर नगर सेवक अभय तातेड, सुदर्शन वैद्य , अनिता बद्दर शर्मा, रिजवाना कादर घाची, शारदा माहुरे, सतीश माहुरे, आरती दुर्गे, लता रणधीर रुमाले, सपना बद्दर, मनीषा दुर्गे, सौ. किरण खोब्रागडे, वर्षा रोडगे, मंगला चन्ने, ललिता वर्मा, हेमलता काळे आदींच्या स्वाक्षरी आहेत.
बाईट : नागरिक
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_AwardWinner
Feed on - 2C
----------------------------
Anchor - बालसाहित्यासाठी साहित्य एकादमीचा पुरस्कार जाहीर झालेले साहित्यिक सुरेश सावंत आणि राज्य शासनाचा उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार जाहीर झालेले सचिन मोहिते यांचा नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला. शासकीय विश्राममगृहात हा सत्कार सोहळा पार पडला. साहित्यिक सुरेश सावंत यांनी बाळासाहित्यावर आतापर्यंत 56 पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या अनेक कविता बालभारतीने आपल्या पुस्तकात समाविष्ट केलेल्या आहेत. त्यांच्या बाल साहित्याची दखल घेऊन साहित्यातील सर्वात मोठा पुरस्कार साहित्य एकादमीचा पुरस्कार त्यांना जाहीर झालाय. तसेच एका दैनिकाचे छायाचित्रकार असलेल्या सचिन मोहिते यांनी सामाजिक विषयावर आणि निसर्गावर अनेक अप्रतिम छायाचित्र काढली आहेत. त्यांच्या कल्पक छायाचित्रांची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून त्यांची निवड जाहीर केली आहे. हे दोन्ही पुरस्कार नांदेकरांसाठी अभिमानाची बाब असल्याने नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे दोघांचा सत्कार करण्यात आला.
------------------------
0
Share
Report
Akola, Maharashtra:
5 फाईल्स आहेत..PKG
Anchor : सध्या राज्यात खरीपाची पेरणीला सुरुवात झाली आहेय...मात्र या काळात
राज्यभरात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या माथी बोगस,अप्रमाणित आणि बनावट बियाणे मारण्यात येते..मागील काही वर्षात राज्यात अनेक ठिकाणी सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याच्याही तक्रारी अनेक ठिकाणांवरून आली होती..यातूनच अनेक ठिकाणी बोगस बियाण्यांची विक्री करणारे कृषी केंद्र
आणि कारखान्यावर धाडीही घालण्यात आल्यात , त्यामुळेच चांगलं आणि प्रमाणित
बियाणं निवडण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणती खबरदारी घेतली पाहिजे हे पाहूयात.....
Vo 1 : आर्थिक आणि नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मागील काही वर्षात
बाजारात मिळणाऱ्या बोगस बियाण्यांचा फटका सहन करावा लागलाय...कृषी केंद्र,बियाणे कंपन्यांकडून
शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारून कोट्यावधींची उलाढाल झाली होतीय..यापासून सुटका करून
घेतांना शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करतांना काही सावधानता बाळगल्या तर शेतकऱ्यांना होणारं नुकसान टाळता येईल.
Byte : डॉ आम्रपाली आखरे , बियाणे नियंत्रण विभाग प्रमुख, डॉ. पं. दे.कृ.वि , अकोला
Vo 2 : बियाणे घेतांना नेमकं कोणती काळजी घ्यावी,चांगल्या बियाण्याची पारख करून घेण्यासाठी काय कराव? यासाठी कृषी तज्ञांनी काही सल्ले शेतकऱ्यांना दिलेयेत...यासाठी काही अगदी सध्या गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे...
जसे सर्वात आधी
Grafix :
1 ) अधिकृत विक्रेत्याकडून निवष्ठाची खरेदी करावी ..
अनाधिकृत इसमाकडून
आणि अनाधिकृत जागेतून निविष्ठा खरेदी करू नये..
2 ) छापील किमतीतच खरेदी निविष्ठा खरेदी कराव्या व पक्क्या पावतीचा आग्रह करावा...
3 ) बियाण्यांच्या पिशवीवर हा निळ्या रंगाचा Tag असणे महत्वाचे आहेय..
4 ) बियाण्यांची "Expiry Date ", सील या गोष्टी पाहणे महत्वाचे आहेय..
5 ) याशिवाय बियाण्यांच्या पिशवीवर असलेली प्रत्येक माहिती शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक वाचली पाहिजे..शेतकऱ्यांनी आणखी कोणत्या खबरदाऱ्या घेतल्या पाहिजेत हे ही पाहूयात....
Byte : डॉ आम्रपाली आखरे , बियाणे नियंत्रण विभाग प्रमुख, डॉ. पं. दे.कृ.वि , अकोला..
Final Vo : कृषी तज्ञांनी दिलेल्या माहीतचा पाठपुरावा केल्यास शेतकऱ्यांची होणारी फसवणूकला मोठा आढा बसेल तर दर्जेदार आणि अधिकृत बियाणाची लागवड केल्यास उतपंनात निश्चितपणे भर पडेल ....
जयेश जगड,
झी मिडिया,
अकोला
0
Share
Report