Back
शेतकऱ्यांचा आक्रमक विरोध: शक्तीपीठ महामार्ग मोजणी थांबली!
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
Sng_shkatipith_virodh
स्लग - शक्तीपीठ विरोधात शेतकरी आक्रमक,शेतात झोपून मोजणीला दर्शवला विरोध..सकाळपासून सुरू आहे आंदोलन..
अँकर - सांगलीच्या शेटफळे मध्ये शक्तीपीठ महामार्ग जमीन संपादन करण्याच्या प्रक्रियेला शेतकऱ्यांनी आक्रमक पद्धतीने आता विरोध सुरू केला आहे.शेतामध्ये झोपून शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध दर्शवत भूसंपादनाची प्रक्रिया सकाळपासून रोखून धरली आहे,पोलीस फौज फाटा घेऊन प्रशासनाकडून शेटफळे येथे नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये जमीन देणार नाही,अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे,त्यामुळे या ठिकाणी प्रशासन आणि शेतकऱ्यांच्या मध्ये संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Kalyan, Maharashtra:
केडीएमटीच्या परिवहन बसमधून पडून विद्यार्थाचा अपघात..
विद्यार्थी गंभीर जखमी..
Anchor: – कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन (KDMT) सेवेच्या धावत्या बसमधून पडून तुषार देशमाने या आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघात गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात तुषारचा डावा हात पॅक्चर असून त्याच्यावर कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
vo.. कल्याण स्थानकातून रोनक सिटीच्या दिशेने तुषार देशमाने आपल्या घरी जात असंताना बसमध्ये चढताना बसचे हँडल अचानक तुटल्यामुळे तो चालत्या बसमधून खाली पडला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.
अपघात घडल्यानंतरही बस चालक व वाहकाने बस थांबवली नाही, तर बस थेट रोनक सिटीपर्यंत पोहोचली. नातेवाईकांनी चालक व वाहकावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
या घटनेमुळे विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट असून, त्यांनी KDMT प्रशासनाकडून तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे..कल्याण महात्मा फुले पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
बाईट:- राहुल आघाम नातेवाईक
बाईट:- तुषार देशमाने जखमी विद्यार्थी
0
Share
Report
Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Rain
Feed on - 2C
---------------------------
Anchor - मोठ्या खंडानंतर आज नांदेड शहरासह परिसरात पावसाचे आगमन झाले. गेल्यात तेरा चौदा दिवसापासून नांदेड मधे पाऊस बरसला नव्हता. आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमरास रिमझीम पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पावसाची रिमझिम सुरु होती. पाऊस गायब झाल्याने उकाडा वाढला होता. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली होती. या पावसामुळे नांदेड तालुक्यातील पिकांना थोडे जीवदानी मिळणार आहे. शिवाय या रिमीझिम पावसामुळे उकाडा कमी झाला. अजूनही मोठ्या पवसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांसह सर्वांनाच आहे.
----------------
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने मागील तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वनमाला उत्तम शेटे असे या शेतकरी महिलेचे नाव असून त्या पालम तालुक्यातील पेठशिवनी येथील रहिवासी आहेत,गट क्रमांक 74/5 मध्ये त्यांची शेती आहे, पण शेती त्यांचे दिर बबन शेटे यांच्या नावावर होती, गंगाखेड उपविभागीय अधिकाऱ्यांकडे त्यांनी ज्ञाय माघितला असता त्यांना ज्ञाय मिळाला, पण मागील चार वर्षांपासून त्यांचा दिर बबन शेटे त्यांना त्यांची शेती वहिती करू देत नाहीये, त्यांनी यंदा शेतात केलेली कपाशीची लागवड त्यांच्या दिराने मोडून टाकल्याचे ते सांगतायेत, आपल्याला ज्ञाय मिळावा यासाठी वनमाला शेटे यांनी मागील तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. पण येथे ही त्यांची कुणीच दखल घेत नाहीये,
बाईट- वनमाला शेटे - उपोषणकर्ती महिला
0
Share
Report
Akola, Maharashtra:
Anchor : आणीबाणीच्या कालावधीत लढा देणा-या, कारावास भोगलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींचा जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आलाय..यानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचाही शुभारंभही यावेळी करण्यात आलाय..देशात सन 1975 ते 1977 मध्ये आणीबाणी कालावधीत लढा देताना जिल्ह्यातील ज्या व्यक्तींनी मिसा व आयआरअंतर्गत सामाजिक व राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेला आहे, अशा व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आलाय...यावेळी आणीबाणीत कारावास भोगलेले ज्येष्ठ मान्यवर, त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते...यानिमित्त या काळाची माहिती देणारे प्रदर्शनही भरविण्यात आले आहे ही प्रदर्शनी नागरिकांकरिता सुद्धा खुली करण्यात आलीय..
0
Share
Report
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या साकुरहेटी येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसाठी शेतकऱ्यांचा ताबा असलेल्या ईक्लास जमिनी अधिग्रहित केली जात असल्याने शेतकरी आक्रमक झाले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुखांनी देखील कारवाईला विरोध दर्शविल्याने वातावरण तापले. या जमिनीवर १९८० पासून ११ शेतकऱ्यांचे अतिक्रमण आहे. सध्या पेरणी केलेली ही ६० एकर जमिन ताब्यात घेण्यासाठी महसुल आणि पोलिसांचा फौजफाटा पोहोचला. प्रशासनाने कोणतीही पूर्व सुचना न देता ही कारवाई सुरू केल्याने
शेतकरी आक्रमक झाले.
बाईट : शेतकरी
प्रवीण शिंदे : जिल्हाप्रमुख शिवसेना ubt
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_DESAI_VADETTIVAR
सातारा - महायुतीचे हे सरकार लुटारूंचे सरकार असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती.याला मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलं आहे. वडेट्टीवार हे फक्त भडक वक्तव्य करतायत.आम्ही लुटारू,दरोडेखोर असतो तर लोकांनी आम्हाला बहुमताने निवडून दिल नसते.आणीबाणी आणणाऱ्या काँग्रेस सरकार लोकांनी उलटून टाकलं. वडेट्टीवार फक्त भडक वक्तव्य करतायत.त्यांनी त्यांचा मुद्दा जनतेत जाऊन आणि अधिवेशनात मांडावा. महायुतीचा कामकाजावर जणमतांतून लोकांनी शिक्कामोर्तब केला आहे त्यामुळे आम्हाला वडेट्टीवार यांच्या सर्टिफिकेटची गरज नसल्याचे देसाई यांनी उत्तर दिलं आहे.
Byte -मंत्री शंभूराज देसाई
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
anchor - साक्री नगरपंचायतीच्या नगर अध्यक्षांवर दाखल अविश्वास ठरवायच्या मतदान प्रक्रियेवरून गोंधळ झाला. साक्री नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे, नगराध्यक्षांच्या कामकाजा विरोधात नाराजी व्यक्त करत भाजपच्या 11 पैकी सहा नगरसेवकांनी अविश्वास दाखल करण्याची मागणी केली होती. भाजपच्या सहा नगरसेवकांना विरोधकांनी पाठबळ देत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता अविश्वास ठराव. विद्यमान नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्या विरोधात
अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी आज विशेष बैठकीच आयोजन करण्यात आले होते. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी बैठकीला उपस्थित न झाल्याने नगरसेवक संतप्त झाले. बराच वेळ प्रतीक्षा करूनही पिठासीन अधिकारी न आल्यामुळे नगरसेवकांनी आक्रमक होत नाराजी व्यक्त केली. अविश्वास ठरावाच्या प्रस्तावावर निर्णय न झाल्याने सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधक आक्रमक झाले. प्रशासनाच्या विरोधात नगरसेवकांची घोषणाबाजी करत ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप केला.
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2506_BHA_ANDOLAN
FILE - 5 VIDEO
डाँ. बाबासाहेब आंबेडकर जागृत युवा संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्या करिता धरणे आंदोलन सुरू....
Anchor ;- अनुसूचित जाती व बौद्धांच्या कल्याणासाठी मंजूर झालेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निधीतून "लाडकी बहिण योजनेसाठी" ४१०.३० कोटी रुपये वळविण्यात आले.अनु. जाती/जमाती व इतर मागास वर्गाच्या हक्काचे निधी इतरत्र वळवू नये. अनूसूचित जाती जमातीचे उपवर्गीकरण व अनुसूचित जाती जमातीना क्रिमीलेअर न लावणे बाबत संसदेत घटना दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायलायाचा निर्णय रद्द करणे,तसेच महाराष्ट्रात उपवर्गीकरण साठी स्थापित झालेली समिती बरखास्त करण्यात यावी.भटक्या विमुक्तांच्या घरकुलांसाठी असणारी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत नवीन उद्दिष्ट न घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या घरकुल योजनेत नवीन घरकुल उद्दिष्ट घेणे सुरू ठेवावे जेणेकरून राज्य पुरस्कृत घरकुल योजना सुरू राहतील.१४००० जिल्हा परिषद, नगरपरिषद शाळा बंद करण्याचे निर्णय रद्द करावे.स्वाधार योजनेच्या धर्तीवर ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरु झालेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्या साठी असलेली ६०% गुणांची अट निरस्त करून सर्व ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा.विद्युत महामंडळातर्फे ग्राहकांवर स्मार्ट मीटर स्थापनेची सक्ती निरस्त करण्यात यावी.अश्या विविध मागण्या करिता डाँ.बाबासाहेब आंबेडकर जागृत युवा संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्या करिता धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2506ZT_WSM_SCHOOL_BUILDING
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर : वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सध्या जर्जर इमारतीच्या छताखाली सुरू आहे. 1956 साली बांधलेली ही शाळा आज 68-69 वर्षांची झाली असून, शाळेची इमारत पूर्णपणे जीर्णावस्थेत पोहोचली आहे.या शाळेत दररोज बाराशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि तब्बल 45 शिक्षक या मोडकळीस आलेल्या इमारतीत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. इमारतीची स्थिती इतकी खराब आहे की, केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.विशेष म्हणजे, 2016-17 मध्ये कामरगावच्या रामनगर भागात 20 ते 22 वर्गखोल्यांची नवी शाळा इमारत बांधून तयार झाली आहे. मात्र गेल्या नऊ वर्षांपासून ही इमारत वापरात आणली गेलेली नाही. सद्यस्थितीत ही नवीन इमारत धुळखात पडून आहे आणि त्यात गावकऱ्यांनी अतिक्रमण करून साहित्य ठेवले आहे.सोयाबीन हंगामात या वर्गखोल्यांचा उपयोग मजुरांच्या मुक्कामासाठी केला जातो,अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार,शाळेची नवीन इमारत उपलब्ध असूनही शाळा स्थलांतर केली जात नसल्यामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेचे तातडीने नवीन इमारतीत स्थलांतर करावे आणि मुलांच्या जिवाशी होणारा संभाव्य खेळ थांबवण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
बाईट:मीना भोणे,जि.प सदस्य कामरगाव
बाईट:धनराज उंटवाल, पालक कामरगाव
0
Share
Report
Pimpalgaon Baswant, Maharashtra:
अँकर:-नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा नाशिक यांनी जिल्हाभरात अमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू केले आहे
दरम्यान पिंपळगाव बसवंत येथून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा घालून अनिकेत खैरनार या आरोपीला अटक केली असून त्याच्या ताब्यातील 23 किलो 610 ग्रॅम बाजार किंमत 4 लाख 72 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे आरोपी विरोधात पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
0
Share
Report